बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण..



करिश्मा डोंगरे,पंढरपूर

           जाती कशाला उकरून काढता.गुन्हा हा गुन्हाच असतो.आणि गुन्हेगार कोणत्याही जातीचा असला तरी तो गुन्हेगारच असतो.असले भंपक युक्तीवाद करणार्या,वरून सात्वीकतेचे भजन आणि आतुन जातीच्या वर्चस्वाचा तमाशा करतात.उच्चवर्णिय पुरूषी मानसिकतेमुळे दलित स्रीचा शरीराचे लचके तोडण्याची वृत्ती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.जातीच्या विखारातून कोवळया कळ्यांना चुरगळनारा कुसंस्कृतीच्या कणाकणात भरला आहे.पीडितेचा जबाब नेहमी दाबला जातो.परंपरेने चालत आलेले आरोपींना जातिनिहाय संरक्षण.अत्याचार झालाच नाही,असे सांगण्यासाठी प्रशासनाचा वापर केला जातो.धडक पोलिस पुरावेच नष्ट करतात,हे कसले मोठे राजकारण म्हणावे लागेल.माध्यमानांही त्यांच्यापर्यंत पोहचू देत नाहीत,याला काय म्हनायचं?यामुळेच त्यांची नियत सिद्ध होतेय.

         आईसोबत गवत काढण्यासाठी गेलेल्या मुलीची कसली कपडे असतील ओ?आणि त्यांना धड जेवनाचा रोज प्रश्न पडत असेल,तिच्याजवळ कसला आलाय मोबाईल?उगीच मनाच बडबडून मुलींना दोषी नका ठरवू.ती साधी सरळ मुलगी तिने कोणाच काय वाईट केले.एवढी कसली जातीयता आणि राजकारण?

             कधीही असले करण्याअगोदर किंवा वाईट नजरेने बघान्याचं धाडस नाही झाले पाहीजे,असे प्रशासन हवं आहे की,डायरेक्ट निकालचं लागला पाहीजे.खाकी वर्दितल्यांनी पकडायचं नाही किवा तारखेवर तारीख मिळन्याची वाट न बघता,त्यांच वरचं तिकीट काढले पाहीजे.आपल्या घरातील स्रीयांना हेच शिकवा की, एखाद्याच तोंड कसे फोडायचे आणि हात पाय कसे मोडायचे.गरिबाची मुलगी असो किवा मुख्यमंत्र्याची मुलगी ही मुलगीच असते.स्वत:च्या घरातली मुलगी रडताना कसे लगेच वाईट वाटते,तसेच दुसर्यांच्या मुली काय रस्तावर पडलेत काय?रडत बसायला.जात बघून मानसाचं जनावरं बनू नका.माणुसकी हाच आपला धर्म आहे.आमच्या हातात कोणी मेणबत्या दिल्या तेव्हाच तलवार दिली असती तर,आज तोंड वर करून कोणी बघितले पण नसते.


वृषाली वाघ,मुंबई 

आपल्या भारतात बलात्कार हे काय नवीन कृत्य नाहीये.... अनेक वर्ष हे असले क्रूर कृत्य होत आहेत....रोज बातम्यात एक न एक तरी असली बातमी असते परंतु आपणच त्याला दुर्लक्ष करतो.... जो पर्यन्त पीडित व्यक्ति (मुलगी किंवा मुलगा) सोबत  काही राक्षसा ने केल्या प्रमाणे कृत्य होत नाही किंवा राजकिय नेत्यांना, पक्षांना त्याचा काही लाभ नाही भेटत तो पर्यन्त ना न्यूज मीडिया ना सोशल मीडिया मध्ये त्याचा विषय येत.... 

आपल्या सारख्या सर्व सामान्य लोकांचा कानावर आपल्या ओळखी मधील अशी एखादी बातमी सहजासहजी ऐकला नाही भेटत कारण मिडल क्लास वर्ग  कधी ही कोर्ट किवा पोलिस ठाण्यात जाऊ इच्छित नाही.... ह्याला देखील कारण आहे आपल्या देशात ला राजकारण आहे... कारण कधी एखादी घटना गंभीरतेने लक्ष ओढून घेत असल तर... राजकीय लोक पीड़ित व्यक्ति चा घरी जाऊन फोटो काढून मोकळे होतात...... त्या घटनेचा 4 - 5 वर्षात निर्णय (कोर्टात) लाऊन विसरून जातात...... परत अशी गंभीर घटना होऊ पर्यन्त ....

एखाद्या घटनेचा बोध घेऊन सरकारने, राजकिय पक्षाने, मीडियाने पुढाकार घेऊन लक्ष देऊन जर काम केल आणि  एखादा गंभीर कायदा (न्यायालयात) बनवला तर अशे कृत्य करणार्‍याना, करायचा आधी हजारो वेळा विचार करावा लागेल.....

आणि आपन आपल्या जाग्या वर राहून आपल्या पुढचा पीढ़ी ला,  समोरचा व्यक्ति ची मदत आणि इज्जत करायची शिकवण दिली तरी देशात असल्या घटना कमी होतील.... 


अनघा नंदाने

दिवस पहिला: अरे बातम्या पाहिल्या का? खूप वाईट झालं बिचाऱ्या त्या मुलीसोबत. 

दिवस दुसरा: काय चाललय काय आपल्या देशांत? तिची बाँडी परस्परच जाळली पोलिसांनी. हे पोलिस गुंड झालेत. आता कुठे गेली मिडिया, कुठे गेले विरोधी पक्ष? 

दिवस तिसरा: काय नौटंकी चाललीये देशांत.... ती ABP वाली आणि तो पप्पू.... नुसता पब्लिसिटी साठी चाललाय हा खेळ...

दिवस चौथा: काय राव चार दिवस झाले तेच तेच, मस्त पिक्चर लाव एखादा... बोअर झालंय, तेच तेच 


असंच होतं ना? 

तिसऱ्या दिवशी राख थंड झाली कि आपणही थंड होतो. आपापल्या कामाला लागतो. 


पण तुम्हाला एक लक्षात येतय का? या संपूर्ण चार दिवसांच्या संभाषणांत बहुतेक लोकांनी, पोलीस, मिडिया, काँग्रेस, यांच्यावरच चर्चा जास्त केली. जणूकाही सत्ता "काँग्रेसची" आहे. यांत खूप कमी लोकांनी "मुख्यमंत्री योगी" कुठे आहेत हा प्रश्न विचारला आणि मोदींना तर लोक विसरलेच. लोकांच्या लक्षातच आलं नाही, येत नाही, किंवा आणून दिल्या जात नाही कि आता गेली 6 वर्षे सत्तापक्ष बदलला आहे. वर्तमान पंतप्रधानांनी संपूर्ण घटनेवर एक वाक्य उच्चारलेलं नसताना, आपण पूर्व प्रधानमंत्री कसे मुके होते याच्या अजूनही चवीने चर्चा करतो आहे. 


आपण सरकार चं उत्तरदायित्वच विसरलो आहोत. ज्याप्रमाणे वर्तमान सरकार अजूनही "विरोधी पक्षाच्या" भूमिकेतून बाहेर आलं नाही, तसंच आपणही आपल्या डोळ्यातला "सत्ताधारी" पक्ष बदललेला नाही. 


प्रजासत्तेतला "राजाच" स्वतःची भूमिका, हक्क, जबाबदाऱ्या विसरला असतांना, त्याने निवडून दिलेल्या "नौकरांकडंनं" काय अपेक्षा ठेवणार? 130 कोटी राजांच्या राज्यांत, 1 एका राजकुमारीवर "बलात्कार" होतो, तेव्हा राजे आपापसांत लढत बसतात, शाब्दिक चकमकी रंगतात, कुणी निवडून दिलेला नोकर चांगला आहे हे सिद्ध करायला! मग नोकर मनमानी करणार नाही, घाणेरडं राजकारण करणार नाही तर काय करतील? 

राजांना कळायला हवं, कुणाचेही असले तरी ते नोकर आहेत, आणि ते नीट काम करत नसतील तर त्यांना जाब विचारणं, प्रत्येक राजाचं काम आहे आणि हक्क आहे. 


राजकारण घाणेरडं झालं आहे. वादचं नाही. झालंच आहे. पण पुढे काय? उपाय का? हे शोधायला हवं. आपल्याला माहिती असतं, सरकारचं चुकलं आहे पण आपण नेहमी मुख्यतः दोन भूमिका घेतो, एक, जाऊदे, आपल्याला काय करायचं आहे? आणि दुसरी, सगळे तसेच असतात... 

या दोन मतांमुळे आपण "नागरिक" होऊन सरकारला कधी प्रश्नच विचारत नाही. प्रजासत्तेत राहून राजसत्तेचं गुणगान गांत राहतो आणि कुणी "हिरो" आपल्याला वाचवायला येण्याची वाप बघत बसतो. चांगल्या राजंच्या राज्यात, प्रजा आपले हक्क आणि कर्तव्य कधीच विसरायची नाही आणि विसरली तर चांगले राजे प्रजेला त्याची जाणीव करून द्यायचे. "खबरदार जर टाच मारूनी याल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या" किंवा "राजा, माझा 1 रुपया अजूनही परत का नाही मिळाला?" असे प्रश्न शिवाजी महाराजांना सुद्धा रयतेनं विचारलेच. मग आता आपलीच सत्ता असताना आपण आपल्या सेवकांना प्रश्न विचारायला का घाबरतो? का गरज नसताना त्यांचं गुणगान करतो? या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधली पाहिजेत. 


आपल्या पुर्वजांनी चांगले मावळे बनून दाखवलं, आपण चांगले "नागरिक" बनू शकू का हे आपण आपलं बघायला हवं.



प्रतिक्षा बुध्दे,गडचिरोली 

कुण्यातरी गावात कुण्यातरी मुलीवर अत्याचार झाला, 

लगेच लावली गेली जाती-धर्माची, राजकिय पक्षांची फिल्टरं त्याला!

'ती' असते कधी दोन दिवसांची तर कधी ऐंशी वर्षांची,

जी नाहक शिकार होते समाजातील राक्षसी सत्तेची 


पुर्वी बलात्कार झाले की छत्रपति छाटुन टाकायचे हात पाय त्या नराधमांचे भर चौकात... 

मग नराधमांचंच राज्य आलं ज्यात पिडितेच्या लुटलेल्या आब्रूचेच धिंडवडे काढतंय समाज.


कधी तिच्या कपड्यांची तर कधी उच्चशिक्षणाची चुक पटवुन देण्याची थेरं आरोपींच पक्ष करतंय

आम्हीच इथले तथाकथित राजे म्हणत आरोपींनाच संरक्षण देतंय


बाहेरचे लोक काय म्हणतील म्हणुन आधी

घरचेच तोंड दाबुन मुक्का मार द्यायचे

आज त्याहीपेक्षा वाईट झालीय परिस्थिती, कोर्टाची पायरी चढण्यासाठी ही वेळ आलीय लढण्याची.


तिथं न्यायासाठी ऊभं रहायला सुद्धा पूर्व पडताडणी केली जातेय, 

पिडिता अन् आरोपी दोघांच्याही जाती-धर्माची टेहाळणी होतेय.


विरोधी पक्ष लागतो लगेच कामाला, ओतुन टाकतो सगळी जिव्हाळी

आणि मग भडकली आग सामान्य माणसांत की भाजुन घेतो आपली राजकिय पोळी


कुणाचा राजिनामा मागितल्या जातं तर कुणावर फेकली जाते शाई

मात्र आरोंपीना लवकरच शिक्षा नक्की होईल अशी हमी कुणीच देत नाही


वर्षानुवर्षे ताटकळत बसावं लागतं मग झालेला अन्याय सिद्ध करायला

तेव्हा येतं लक्षात की वास्तवात कोणताच पक्ष नाही आहे आपल्या मदतीला


पिडीतेच्या घरच्यांनाही बेआब्रू व्हावचं लागतं, पोरगी गेली ती गेली पण पैसे कमावुन गेली असंही ऐकावं लागतं. 

कधी संपेल कुणास ठाऊक आपल्या समाजाचे अधःपतन बघवत नाही मला आता हे बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण…


चैतन्यकुमार देवकर,माळशिरस

खरंतर बलात्काराची घटना घडली.. असं ऐकलं तरी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला प्रचंड राग येतो. अशा नराधमांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी आपली तीव्र इच्छा असते. कधीकधी तर आपल्याला वाटतं की प्रियांका रेडी प्रकरणात जसं एन्काऊंटर करून आरोपींना ठार मारण्यात आलं ते योग्य होतं बऱ्याच वेळा अनेक अमानवीय शिक्षांकडेही आपण एक पर्याय म्हणून पाहतो.हेच बरोबर आहे असं मानायला लागतो तर दुसरीकडे बऱ्याच वेळा आरोपीं हेच गुन्हेगार आहेत असं सिद्ध होईपर्यंत तरी थांबायला हवं असा सूर निघतो. या दोन्ही चा  सुवर्णमध्य म्हणजे  फास्टट्रॅक अर्थात जलदगती न्यायालयांची व्यवस्था असणे ठरु शकते.आणि विशेषता बलात्कारासारख्या गंभीर होण्यासाठी तर असायलाच हवी. आता अगोदर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला या घटनांचा प्रचंड राग येतो यातून आपल्यामध्ये संवेदनशीलता असल्याचं दिसून येत. ते आपसूकच असतं. परंतु ती संवेदनशीलता ,ती तीव्र इच्छा  गुन्हेगारांप्रती राज्यकर्ते, अधिकारी यांच्यात कशी नसू शकेल?? केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तर ' इथिक्स' चा स्वतंत्र पेपर असतो. तरीदेखील हाथरस मध्ये घडलेल्या घटनेमध्ये जबाबदारीची पदे भूषवणारे अधिकारी असं बेजबाबदार आणि असंवेदनशील कसं काय वागू शकतात?? भलेही राज्यकर्त्यांनी त्यांना वेगळे निर्देश दिले असतील परंतु एक अधिकारी म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य करणं भाग होतं. आणि राज्यकर्ते त्यांनी तर... लोकांचं प्रतिनिधित्व करायचं असतं.. परंतु ते तर अगदीच बेजबाबदार वागले उलटपक्षी गुन्हेगारांना पाठीशी घालू लागले ...  आपला  विषय आहे , बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण. मला वाटतं की, कोणतीही गोष्ट राजकारणापासून अलिप्त राहणं तसं अवघडच .. पण त्याच्या माध्यमातून संवेदनशीलतेचं दर्शन घडणं , आणि न्यायासाठी , सत्यासाठी पराकाष्ठा करणारे नेते , राजकारणी असणं , तयार होणं...हे फार आशादायी चित्र असतं…


क्षितीज गिरी,सातारा

     काही जण म्हणतात बलात्कार हा बलात्कार असतो त्यामध्ये तुम्ही जातीचा धर्माचा विषय का  आणता आरोपी कोणीही असू दे त्याला शिक्षा झाली पाहिजे.पण  निर्भया प्रकरणामध्ये झालेला बलात्कार आणि  खैरलांजी , हातसर  मध्ये झालेला बलात्कार यामध्ये तसा खूप फरक आहे.तुम्ही म्हणाल तसे कसे. बलात्कार तर शेवटी बलात्कार असतो.पण माझ्या मते कोणताही बलात्कार करणाऱ्या आरोपीचा उद्धेश हा खूप महत्त्वाचा असतो.निर्भयाच्या प्रकरणात तो फक्त सेक्स हाच होता.पण सगळी कडे तो सारखाच असेल असे नाही.आणि तसा तो नसतो पण ...

             हातसर च्या घटनेकडे पाहू. ठाकूर आणि वाल्मिकी समुदायाच्या वादातून हा बलात्कार झाला आहे.तो पण खुले आम धमकी देऊन.संदीप ठाकूर यातला मुख्य आरोपी.6 महिने आदोगर ठाकुरानी  धमकी दिली होती.तेव्हा पासून मनीषा वाल्मिकी कोठे घरा बाहेर पडली नव्हती.पण त्या  दिवशी म्हणजे 14 सप्टेंबरला ती तिची आई गवत आणण्यासाठी रानात गेले.गवत कापणे चालू होतो.मनीषा बाजूला बसली होती तिची आई गवात कापता कापता थोडी  लांब निघून गेली.अश्या वेळी  सरेआम तिची आई तिच्या बरोबर असताना. मुली ला उचलून संदीप आणि त्याच्या मित्रांनी  तिच्यावर बलात्कार केला.आई ला ऐकू कमी येत होते .त्यामुळे मनीषचा आवाज ती ऐकू शकली नाही. बलात्कार करून झाल्यावर ती कुठे बोलू नये म्हणून तिची जीभ कापली. मानेची हाडे मोडली.शेवटी 29 सप्टेंबरला सकाळी 5 वाजता तडफडून तिला मरण आले.14 ते 29 तारखे पर्यंत तिच्यावर दवाखान्यात उपचार पण नीट झाले नाहीत.याच्या आगोदर पण तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला होता.

त्याच्यानंतर  आसपासच्या 12  गावातल्यांनी  त्यामध्ये ठाकूर आणि ब्राम्हण यांनी गुपचूप पंचायत लाऊन आरोपीचा साथ देणे आणि गावामधे कुणाला घुसून न देणे असा निर्णय घेतला.डॉक्टरांनी पोलिसांनी  मुख्यमंत्र्यांनी आरोपीच्या बाजून  साथ दिली.कारण आरोपी ठाकूर होता.योगी आदित्यनाथ बोलले आरोपीची आणि मनिष्याच्या घरातल्यांची  नार्को  टेस्ट करा.कारण सगळे अधिकारी यांचेच.डॉक्टररांचा रिपोर्ट पण चुकीचा दिला गेला.आपल्या मुलीला शेवटी जाळण्याचा अधिकार पण दिला जात नाही.लावारिस लाश जाळावी तसे जाळले जाते तिला.आणि नंतर बोलले जाते बलात्कार झालाय नाही.आमच्यावर खोटं आरोप केला जातोय.

आज पूर्ण कुटुंब दहशतीखाली राहत , वावरत आहे.त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मनीषा वाल्मिकी सारख्या भरपूर घटना  भारतामध्ये घडतात.त्यातल्या काहीच घटना प्रकशाझोतात आणल्या जातात.पण दुर्दुव त्यांना पण लोकशाही मार्गाने संघर्ष करून नीट न्याय भेटीत नाही.म्हणून बाबासाहेब नेहमी सामाजिक न्यायासाठी संघर्ष करायला सांगत.

 माझ्या मते या घटनांकडे पाहताना फक्त बलात्कार म्हणून पाहणे चुकीचे आहे.जसे निर्भया कडे पाहतो तसे.हा तर जातीय द्वेष भावनेतून केलेला बलात्कार आहे.जसा खैरलांजी मध्ये घडला.न्याय मागता मागता भोतमांगे परिवार संपला पण न्याय???

या आरोपींना फाशी मिळाली पाहिजे पण ते वाटते इवढे सोपे नाही.सगळी न्याय  व्यावस्था आरोपीच्या  बाजूने खंभिरपणे उभी आहे. पण शेवटी दिली तरी फाशी देऊन फक्त न्याय भेटेल पण सामाजिक न्याय ? 

आज एक संदीप गेला तरी उद्या हजारो लाखो संदीप तयार होतील.कदाचित झालेही असतील.

जोपर्यंत लोकांची या जतिव्यवस्थेकडे  बघण्याची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे असले जातीय द्वेषातून बलात्कार होतच राहतील.उत्तर प्रदेश सारख्या राज्यात अजुन पण अस्पृश्यता पाळली जाते.

यावर उपाय म्हणजे  समानतेच्या विचार करणाऱ्या प्रत्येकाने आता एकत्र येऊन या ना त्या मार्गाने या व्यवस्थे विरुद्ध लढले पाहिजे.कारण उद्या यामध्ये कदाचित तुमची पण मुलगी असू शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************