महापुरुषांचे पुतळे उभारण्यामागील राजकीय हेतू

महापुरुषांचे पुतळे उभरण्यामागील राजकीय हेतू

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

Source:- INTERNET
-जयंत जाधव,
 लातूर

  "बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका
सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका"
कवी कुसुमाग्रज यांच्या वरील कवितेच्या ओळी आजच्या महापुरुषांचे पुतळे उभारण्यामागील राजकीय हेतू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत.

चांगला समाज निर्माण व्हावा यासाठी योग्य प्रेरणा व मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते.मग ती एखादी  महान व्यक्ती असू शकते अथवा तिचे स्मारक किंवा त्या व्यक्तीचा पुतळा.महान व्यक्तींच्या जीवन चरित्र यातून मिळणारा आदर्श शिकवण व प्रेरणा ही सतत प्रवाहित राहवी ह्या उद्देशाने  पुतळ्यांची निर्मिती केली जाते. हे काम चांगले आहे. पण फक्त पुतळे उभारुन आपली जबाबदारी संपते का? थोर व्यक्तींच्या शिकवणीतून समाजाला योग्य संस्कार,शिस्त लागते. आता आपल्या विषयाच्या मुद्दयाकडे वळू. कोणत्या विषयावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यावी हे राजकारणी लोकांना छान समजते.
 अनेक वर्षांपासून छञपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भोवती गल्ली पासून ते दिल्ली पर्यत  राजकारण चालते आहे.त्यांचे आचार-विचार साधारण जनता अमलात आणत आहे.यातूनच एक अस्मिता व भावना निर्माण झाल्या.राजकीय लोकांनी ही नस ओळखून आपल्या स्वार्थ साध्य करण्यासाठी पुतळे उभारण्याची अघोरी अशी पद्धत चालू केली.
पुतळ्यांवरुन गलीच्छ राजकारण सुरु झाले.समाजात फुट फाडून दंगली घडविल्यात व कायदा सुव्यवस्थेला बिघडवल्या गेली आहे. अशाने पुतळा निर्माण करण्यामागचे मुळ उद्देशांना तडे गेले आहेत.महापुरूषांचे आम्हीच खरे वारसदार म्हणून प्रत्येक संघटना व राजकीय पक्षांची चाललेली भांडणे, राडेबाजी हा आपल्या  भारतीयांसाठी शरमेची बाब आहे कौतुक किंवा गौरवाची नाही.ह्याचे अलीकडील उत्तरम उदाहरण  म्हणून दादर, शिवाजी पार्क येथे इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर महामानव, घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय  दर्जाचे स्मारक  उभारण्यासाठी गेल्या वर्षी बाबासाहेबांच्या शत्तकोत्तर जयंती उत्सवाच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाताने भूमिपूजन उरकण्यात आले.मात्र पुढे या स्मारकासाठी एक वीट तरी रचली गेली का? यावर राष्ट्रवादी पक्षाने दिनांक १९.२.२०१८ एक अनोखे आंदोलन केले.त्यांनी दुर्बिनीमधून अरबी समुद्रात शिवाजी राजेंचे स्मारक कुठे दिसते का?अरबी समुद्रात शिवाजी राजेंच्या स्मारकाचे ही भवितव्य अंधकारमय आहे?
पण भोळ्या स्वभावाची भारतीय जनता कुटील राजकारणींचा हा अघोरी खेळ  केंव्हा समजेल.माझ्या मते समजून देखील परंपरागत आंधळी भक्ती किंवा एक  बाटली दारु व थोड्या रुपयांसाठी लोक दुर्लक्ष करतात.
मानवाधिकार चळवळीचे कार्यकर्ते  ॲड. असिम सरोदे यांनी परखड पणे म्हणतात,'भारतीय राजकारण्यांनी पुतळ्यांचे राजकारण करून ठेवले आहे.त्यामुळेच आपण समाज म्हणून मागासलेले आहोत.पुतळे नको विचार पाहिजे, हे लोक ज्यावेळस म्हणतील, त्या वेळेस विकास व्हायला सुरूवात होईल.'
भारतात अलिकडे महाराष्ट्रात औरंगाबाद येथील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुतळ्यावरुन बरेच राजकारण घडले.एकीकडे विद्यार्थ्यांना राहायला पुरेशी वस्तीगृहे नाहीत,त्यासाठी पैसा नसल्याचे सांगितले.नंतर ह्याच विद्यापीठात एक अवाढव्य पुतळा उभारणीसाठी ४० लाख रुपये एका ठरावात मंजूर केले गेले.अशा दुटप्पी धोरणाला काय म्हणावे? देशाचे भवितव्य घडवणा-या विद्यार्थ्यांपेक्षा  लाखो-करोडो रुपयांचे निर्जीव पुतळे महत्त्वाचे काय? यावर विचार करावाच लागेल.
प्रत्येकाला सकारात्मक व रचनात्मक विचार करता आला पाहिजे.मानवी हक्काचा भाग आपण बनले पाहिजे.विचारांना कुंपण घालण्याचा अधिकार कोणाला नसल्याचे सरोदे यांनी यावेळी म्हटले.तर समाजात एकमेकांना शंकेने पहायला सुरूवात झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात होत असलेल्या स्मारकाबाबत बोलताना ते म्हणाले की, अशी स्मारके तयार होत असताना पर्यावरणाचा विचार करायला हवा होता.कोळी लोकांचे जीवन यामुळे उध्वस्त झाले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर किंवा शिवाजी महाराज यांचे पुतळे निर्माण करून विकास होणार नाही.त्यांचे विचार आपण घेतले पाहिजेत.


Source:- INTERNET
-प्रवीण,
 मुंबई

महापुरशांचे पूतळे बांधून त्यांच्या अनुयायांची मने जिंकने आणि त्यांचे रूपांतर मतात करने हा वर्षानुवर्षे चालत आलेला ट्रेंड आहे.
तसेच ह्या पुतल्यांचा, ते बंधनार्याचा आणि त्याचे समर्थन करणार्यांचा महापुरुषांच्या शिकवानीशी दूरं दूर पर्यन्त सम्बन्ध नसतो. आज बौद्ध धम्म हा मुर्तीपूजा मानत नाही आणि जगात सर्वात जास्त मुर्त्या या गौतम बुद्धांच्या. हा कसला विरोधाभास.म्हणजे अपण त्यांची शिकवानुक किती आत्मसात केलेय हे कळते.
महाराष्ट्रात पण हा विरोधाभास दिसतो. रयत उपाशी असताना करोडो खर्च करून महाराजांचा पुतळा जर बांधला जाणार असेल तर याला नक्की काय म्हणायचे?
शिवजीमहाराजांना विषयी चे भोले प्रेम की त्या प्रेमाचे भांडवल करणारे राजकारण?
शेवट एका महान क्रांतीकरकच्या विधानने करेन

क्रांतिकारक जीवन जगत असताना सत्ताधारी त्याचे अतोनात छळ करतात. त्याची पद्धतशीर बदनामी करण्याच्या कारवाया चालू असतात परंतु हा क्रांतिकारक मरण पावल्यानंतर मात्र तो  ज्या पददलित जनतेच्या सुखासाठी धडपडत असतो त्या जनतेला समाधान लाभावे म्हणून हेच चतुर सत्ताधारी या क्रांतिकारकाचे निरापुद्रवी स्मारके उभारतात. त्या क्रांतिकारकांच्या शिकावणूकीचा खरा अर्थ लोकांच्या स्मृतीतून कायमचा पुसला जावा यासाठीच हि दिखाऊ स्मारके उभारलेली असतात.

- ब्लामिदीर लेनिन
(रशियन क्रांतिकारक )


Source:- INTERNET
-ज्ञानेश्वर तात्या टिंगरे,
उस्मानाबाद

या आठवड्यात लिखाणासाठी घेतलेले दोन्ही विषय महत्वाचे आहेत व काळाची गरज ओळखून ते समोर ठेवलेत त्याबद्दल ग्रुप अडमीन चे आभार...
महापुरुषांचे पुतळे व हे पुतळे उभारण्यामागील राजकीय हेतू खरंच विचार करण्यास भाग पाडणारा विषय आहे पण आजकाल काही ठराविक लोक वगळता सर्वच जण या चक्रव्यूहात अडकून पडलेले आहेत असं आपणास दिसतं..
आणि आता याविषयी परखड मत व्यक्त केले कि जनभावना दुखावत आहेत हे आपण पाहतोय.
पुतळे उभा करून महापुरुषांचे विचार लोकांच्या गळी उतरवता आले असते किंवा त्या पुतळ्यांच्या दर्शनाने सामाजिक सुधारणा झाल्या असत्या तर संबंध जगात शाळा महाविद्यालय ऐवजी पुतळ्याचे राज्य पहायला मिळाले असते.ठराविक समाजाला पुतळ्यांच्या भोवताली फिरवून आपल्या मतांची झोळी वर्षानुवर्षे भरली जाऊ शकते हे राजकिय लोकांनी केंव्हाच ओळखले आहे, पण हे कुटील राजकारणी या पुतळ्यांच्या नावानं राजकारण करून नागरिकांचं भविष्य उज्ज्वल होण्यापासून रोखत आहेत हे सुजाण नागरिकांना कधी कळणार.
आज पुतळे उभारण्यासाठी देशभर अनेक आंदोलन झाली, आज पुतळ्यांच्या नादात नागरिक आपल्या प्राथमिक गरजा सुध्दा राजकीय लोकांकडून पूर्ण करून घेऊ शकला नाही हे देशाचं दुर्दैव आहे.
आज देश एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करतोय म्हणे अन आपण अडकलो आहोत पुतळ्यांच्या अस्मितेत.
पुतळे प्रेरणा देतात हे मान्य आहे पण आज पुतळ्याच्या नादात किती पद्धतीने समाज जातीधर्मा मध्ये विभागला जात आहे किती द्वेष निर्माण होत चालला आहे हे कुणी पहात नाही.
आज देशात भूकबळी जाणाऱ्या किंवा दारिद्र्याने त्रस्त लोकांची संख्या किती आहे हे तुम्हाला आकडेवारी लिहून सांगायची गरज नाही, तरी देखील आज देश पातळीवर एखादं अन्नछत्र का उभारलं जात नाही, कमी किमतीत अन्न मिळवण्यासाठी का एखादी योजना आजपर्यंत एका ही सत्ताधारी मंडळी च्या मनात अली नाही हे प्रत्येकानं पाहावं.
काही लोकांना पुतळे हवे आहेत तर काहींना दोनवेळेच अन्न..
आपली गरज भागली म्हणून दुसर्याकडे काणाडोळा करणारी काही निष्ठूर लोकं याच समाजात वावरताना दिसतात.
समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी, त्यांचे विचार समाजात रुजवण्यासाठी पुतळे उभारले जातात हा दावा धादांत खोटा आहे,
या पुतळ्याच्या नादात कोट्यवधी खर्च करायला सरकार कडे पैसा व वेळ आहे पण लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारकडे ना पैसा आहे ना वेळ , याला कोणताच पक्ष अपवाद नाही.

असं म्हणतात कि माणूस धर्मासाठी मरायला तयार असतो पण धर्माप्रमाणे वागायला तो कधीच तयार नसतो अगदी त्या प्रमाणे आजकाल लोक व राजकीय मंडळी महापुरुषांच्या पुतळ्यासाठी काही पण करतील पण त्यांचा एक ही विचार आचरणात आणण्यास तयार होणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे..
नागरिकांना सुध्दा राजकीय लोकांनी पुतळ्या सारखं बनवून सोडलंय असं खेदाने म्हणावं लागेल.


Source:- INTERNET
-जगदीश लोंढे,
 मुंबई

                  देशात महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते.पुरोगामी म्हणजेच प्रत्येक नव्या विचाराला सोबत घेऊन समाजाची योग्य ती प्रगती करणे.समाजातुन जुनाट आंध्रश्रध्दा , चालीरीती , प्रथा नष्ट करून समाजात सर्व लोकांमध्ये समता प्रस्थापित करणे.त्याची महाराष्ट्रला मोठी परंपरा आहे.शिवराय , फुले , शाहू , आंबेडकरी विचारधारा महाराष्ट्र मानतो. ही विचारधारा ही चळवळ आजही लोकांमध्ये जिवंत आहे.हे  महाराष्ट्रचे  महापुरुष आहेतच.
           प्रत्येक समाजाचे स्वतःचे महापुरुष आहेत.आणि प्रत्येक समाजाला त्याचा अभिमान आहे.आणि तो असलाच पहिजे.आजच्या काळात  महापुरुषांचे मूळ विचार बाजूला ठेवून तरुण युवक जाणीवपूर्वक वळवले जातंयत.राजकीय लोक स्वतःचे लक्ष्य साधण्यासाठी महापुरुषांच्या नावाने समाजची मूळ प्रश्नापासून दिशाभुल करण्याचे काम करत आहे.आजकल भावना भड़कवन्यासाठी आणि आपल्या सोयीनुसार जाती धर्माच्या भिंती उभारण्यासाठी काही पातळयांत्रि लोक लोकपुरुषांच्या  नावाचा वापर करून सारासार  राजकारण करतात.लोकं कसं जगत असतील रोजचं आयुष्य याची काहीही फिकर न करता धडाधड योजना राबवण्याने तुम्ही आज मोठे व्हाल. कारकीर्द संपल्यावर खतम खेळ. उद्या दुसरे राजे येतील अशीच शिवाजी महाराज, टिळक, आंबेडकर, फुले, सावरकर, गांधी, नेहरू यांच्या नावांच्या ढाली घेऊन. या सगळ्यांनी काय केलं ते माहीतीये हो लोकांना.. तुम्ही यातल्या कुणाचंही नाव न घेता काय करणार ते बोला. काय खरं नाही. जनतेला नकोयत स्मारकंनफिरकं. गरीबाला भरकटवण्याचे त्यांना आशा दाखवून स्वार्थ साधण्याची कामं आहेत ही सारी.महापुरुषांच्या नावाने पुतळे उभारून होणार आहे,  का गरीबी कमी.आजही मोजक्या टुट्क्या पगारावर जगणारी 60% लोकसंख्या आहे आपली.त्यांच दैनंदिन आयुष्य कसलीही हौस मौज न करता फक्त पोट भरण्यातच त्यांच आयुष्य खर्ची जातंय.ही त्यांची ही चूक असेलच की,  पण त्यांना योग्य ती संधी वेळेवर उपलब्ध करून देने यासाठी मुळात राजकीय इच्छाशक्ति लागते.आणि आपले राजकीय लोक बसलेत महापुरुषांचे पुतळे उभारत.यामध्ये जनता खरंच भावनिक होते त्याचा पुरेपूर फायदा राजकीय लोक घेतात.लोकांनीच भावनांना आवर घालत कोणता  राजकीय नेता आपला खरा उद्धार करेल , याची जाणीव ठेवून ती लोकप्रतिनिधी निवडला पहिजे.आपण निवडलेला लोकप्रतिनिधी जर नुसतंच महापुरुषांच्या नावाने लोकांची दिशाभुल करत असेल तर त्याला योग्य तो रस्ता दाखवायला हवाच...
           
                  ‎

इच्छा मरण कायदा : प्रगत मानवाची गरज की अधोगती



🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

इच्छामरण कायदा : प्रगत मानवाची गरज की अधोगती


Source:-INTERNET
-ओंकार क्षीरसागर,
श्रीरामपूर

    खरतर हा कायदा खरच आपण पारीत करावा याची आजच्या धावत्या युगात जरा जास्तीच गरज भासू लागलीये असच हॉस्पिटल कडे बघून वाटू लागलंय.
कारण आजकालची वाढती आर्थिक लाचारी वाढते आजार आणि त्यातून बाहेर येणाऱ्या कमी वाटा आणि त्यात आर्थिक संकट हे आता डोळ्यांनासुद्धा न सोसणारे होत चाललंय.

मागच्या वर्षात tv वर एक बातमी बघितली सरकारी अधिकारी होते कोणीतरी त्यांना काय आजार झाला होता माहीत नाही पण दिवसांगणिक त्याच्या त्रिव्रता आणि आर्थिक चणचण वाढतच गेली आणि शेवटी त्यानं घरी हलवण्यात आलं कारण त्या कुटूंबियाकडे तेवढंच उरलं होत हक्काचं अस काही. त्यामुळे त्यांना घरी हलवण्यात आलं त्यांची न जगण्याची ईच्छा बघून हे साफ जाणवत होतं की त्यांना कुटुंबियांची फरफड दिसत होती त्यामुळे त्यांनी बऱ्याच शिफारशी वगैरे वगैरे पण केल्या की मला *स्वईच्छा मरण* वगैरे वगैरे त्याचं पुढे काय झालं कुठेच खबर नाही त्यांचा पुण्यात शोध घेतला सापडले नाही. असो जर एका सरकारी अधिकारी असलेल्या मनुष्यावर असली वेळ येत असेल आम्ही तुम्ही कुठे आहोत याचा विचार करणे आज गरजेचे झाले आहे असे नाही का वाटतं तुम्हाला?


मुळात काय तर चांगलं भाजीपाला फळे मिळत नाहीच त्यामुळे आजार आणि परिस्थिती नसणे खूप वाईट होऊन बसते मग त्यामुळे मला अस वाटतं तीळतीळ मारण्यापेक्षा एकदाचं काय ते *ईच्छा मरण* येऊन जावे आणि त्या  देहातील काही अवयव दान करावे असं केलं तर काही वावडं ठरणार नाही असं मला वाटतं.
पण मग याचा पण गैरफायदा उठवला जाऊ शकतो बाकी गोष्टींसारखा मग त्या साठी प्रतिबंधात्मक उपययोजना असाव्यात जसे की एखादी समिती करावी. त्या जो कोणी व्यक्ती असेल त्या कडून नोटरी करून घ्यावी त्यावर साक्षीदार घरचे असावेत म्हणजे भविष्यात जर त्याचे घरचे काही objection घेत असतील तर सबळ पुरावे असायला हवे ना.

मूळ म्हणजे मला वाटतं आपण या गोष्टीचा मुळाशी जाणं गरजेच आहे चांगलं खाणं (अर्थत ते भेटलंच तर भाग्यच म्हणावं) योग्य व्यायाम चालणे फिरणं राहणं शारीरिक स्वच्छता नानाविविध गोष्टींचा अभ्यास करून आपण स्वतःवर विजय किंवा अस म्हणता येईल प्रकृतीवर विजय मिळवण्यास यशस्वी ठरू.

शेवटी एवढंच सांगेन की *ईच्छा मरण* कायदा असावाच अस मला तरी मनापासून वाटतयं कारण परिस्थिती असहाय्य आणि दिवसांगणिक हतबल होत चालली आहे.

Source :- INTERNET
-जयंत जाधव,
लातूर

    जगातील अंतिम सत्य कोणते?त्याचे उत्तर मरण होय जीवनाचे अंतिम सत्य आहे.मरण कोणालाही नको असते.पण जो जीव जन्माला आला तो एक दिवस नष्ट होणारच आहे.
   "कळावे त्यालाही कसे असते जगणे क्षणाक्षणाला तिळतिळ मरणे  मुक्ती जीवनातून मिळेल की नाही मरणाला माझ्या न्याय मिळेल की नाही "
इच्छा मरण म्हणजे जेव्हा एखाद्या असाध्य आजारातून आणि त्याच्या त्रासातून मुक्ती मिळवण्याचा मृत्यू हाच एक उपाय उरतो तेव्हा रुग्णास त्याच्या इच्छे प्रमाणे मृत्यू देणे. असं करणारे आपल्या इच्छेने आपलं जीवन संपवतात. 'इच्छा मरण' ह्याला इंग्रजी मध्ये 'युथनेशिया' euthanasia  असे  म्हणतात.भारतात इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता नाही .सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच इच्छा मरणावर केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना नोटीसा पाठवून मत मागितले आहे.  जगात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढयाच देशात स्वित्झर्लंड, जपान, जर्मनी, अमेरिका या देशांमध्ये इच्छामरणाला कायदेशीर मान्यता मिळालेली आहे.
विषय हा आहे इच्छा मरण कायदा: प्रगत मानवाची गरज की अधोगती. माझ्या मते इच्छामरण ही प्रगत मानवाची गरज ठरलेली आहे.मी स्पष्ट पणे इच्छामरणाचा अधिकार असावा ह्या मताचा आहे.विज्ञानाच्या मदतीने मानव मरणाला लांबवू शकतो पण त्याच्या वर विजय मिळवू शकलेला नाही.ते शक्य पण नाही.निसर्गाच्या कार्यात मानवाने लुडबूड करु नये व शेवटीच जरी मानव मरणाला जिंकू शकला तो दिवस ह्या जगाचा शेवट ठरेल.
मी स्पष्ट पणे इच्छामरणाचा अधिकार असावा ह्या मताचा आहे.त्यासाठी पुढील उदाहरण महत्त्वाचे ठरते.मुंबईच्या रुग्णालयातील अरुणा शानबाग परिचारिकेवर बलात्कार करण्यात आला आणि 37 वर्षांपासून ती कोमात होती. तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकाच तिची सेवा करत होत्या.अशा  प्रकरणांमध्ये इच्छा मरण वैध मानले पाहिजे.यावर न्यायालयात व बाहेरच्या जगात  बराच वादविवाद झाला पण ठोस निर्णय झालाच नाही.शेवटी ईश्वरानेच दया करुन त्यांना नैसर्गिक मरण दिले.
दुसऱ्या एका प्रकरणात  (संदर्भ-प्रविण तांबे) एक जेष्ठ वृद्ध आजोबा  वय वर्षे ९० हे गेली दोन वर्षांहून जास्त काळ अंथरुणावर पडून आहेत.त्यांनी आयुष्य अगदी समाधानकारक जगले आहे व यापुढे त्यांना जगण्याची इच्छा नाही.आत्महत्या  त्यांना मान्य नाही.त्यांना मरण हवे आहे  पण कायदेशीर.जीवनात त्यांनी कायद्याला खूप महत्त्वाचे स्थान दिले.अशा वेळी इच्छामरणाचा अधिकार असावाच.
इच्छामरण देण्याचा कायदा अवश्य करा परंतु कुटुंबातील व्यक्तींच्या परवानगीसह अनेक कायदेशीर बाजू लक्षात घ्याव्यात.भारतामध्ये अनेक वृद्ध त्यांची शारीरिक क्षमता गमावून बसले आहेत.कुटुंबाने त्यांचेकडे लक्ष्य देऊनही त्यांना आत्मसन्मानाने जगता येत नाही.तर काही वृद्ध लोकांना कोणाचा आधारही नसतो.त्यातूनही दोघांपैकी एखादी व्यक्ती दगावल्यास एकटेपणा येउन चिडचिडे बनतात त्यातच आजारपण वैगेरे अनेक गोष्टींचा त्रास त्यांना होतो.अश्या लोकांसाठी हा कायदा अवश्य असावा.पण त्याचा गैरफायदा कुटुंबातील इतरांनी घेऊ नये यासाठी कायदेशीर बाजू तपासाल्या पाहिजे.
इच्छामरणाचा अधिकार असावा पण त्याची अंमलबजावणी किती योग्य  प्रमाणात होईल यात शंका आहेच.जर हा अधिकार दिला तो एक प्रकार खून करण्याचा परवाना तर ठरेल का? हा पुढील प्रश्न नक्कीच निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही.हे काळ ठरवेल पण एक नक्की आहे जिवंत सजीव माणसाला तडफडून मरण्यापेक्षा त्याच्या स्वेच्छेने मरण मिळालेले केव्हाही चांगले ठरेल. "What life is not supposed to be, but it should be good, or if it is a problem for ourselves and others to suffer, then such a world does not have meaning. Every person should have the right to accept dignity along with dignity."


Source :- INTERNET
-किरण पवार,
औरंगाबाद
         
     खरं तर इच्छा मरण कायदा असाही कायदा असतो किंवा असावा याची जाणीव मला आत्ताच झाली. मला तरी वाटत की, असा कायदा अमलात आणणे किंवा त्याबद्दल विचार करावा लागणे हीच मुळात खेदाची बाब आहे. *प्रगत माणूस नेमका इतका प्रगत कसा आणि केव्हा झाला की, जेणेकरुन निसर्गाच्या इतक्या महत्वपूर्ण भूमिकेतही तो हस्तक्षेप करू लागला. प्रांजळपणे मी एक गोष्ट मानतो की, इच्छा मरण कायदा ही बाब प्रगत माणसाची झालेली फार मोठी अधोगती आहे.*
                अडचणी, संघर्ष आणि तडजोडीच जगणं एवढं निरर्थक का वाटत? आपणच म्हणतो की, अडचणी जेवढ्या बलाढ्य तेवढंच जास्त उद्या आपल सामर्थ्य. आणि दुसरीकडे आम्ही विचार करतो कशाचा? तर इच्छा मरणाचा. मी तरी आजवर माणूस प्राणी सोडून इतर कुठल्याही प्राणीमात्राने किंवा पक्षाने इच्छा मरण स्विकारल्याच ऐकल नाही. तुम्ही म्हणाल माणूस हा वैचारिक दृष्ट्या सक्षम आहे. पण मी म्हणतो जिथे आपल्याला निसर्गाने ठरवलेल आयुर्मान दिल आहे ते कमी का करू पाहतो आहोत आपण. *समजा कायदा लागू झाला म्हणून उद्या मी इच्छा मरण स्वीकारल तर माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईच काय? किंवा मुल, पत्नी यांच काय?* त्यांचा यात काहीही दोष नव्हता.
             केवळ देशात आत्महत्येच प्रमाण वाढतंय आणि म्हणून आम्ही या कायद्याकडे आस लावून जगणार असू तर हा शुद्धपणे पोरकटपणा झाला. *सध्या सुशिक्षित समाजाच असं झालंय की, त्यांना नक्की जीवन काय आहे हेच माहित नाही.* चाकोरीबद्ध आयुष्य जगण आणि दुसर म्हणजे ताण आल्यावर हसणं एवढ आपल तोंडपाठ असत. आज प्रत्येकाला जवळपास 90% लोकांना जगण्यातली सहजता लक्षातच येत नाही. आणि म्हणूनच आम्हाला इच्छा मरण कायदा म्हणजे एक सुखाची वाट दिसतो.
                आजचा समाज वाचणं कमी करतो पण निर्णय मात्र एका सेकंदात घेऊन मोकळा होतो. *आणि ही त्याच्यातली उणीव आपण ही आजकालची पिढी किती फास्ट आहे, असं बोलून खपवतो.* फार काही तरी मोठ करायचंय म्हणजे खूप व्याप आणि अडचणीत गुंतत चाललोय हा समज आपल्याला छळतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी ह्रदयाला दिलासा द्यावा लागतो की, या गोष्टी फार शुल्लक आहेत. मी हे मान्य करतो की, वयस्कर व्यक्ती स्वत:ला असा दिलासा नाहीत देऊ शकत. पण अशा क्षणी इतर कुणीतरी ते नक्कीच करू शकतं. *काही वेळा काही गोष्टी घडण्यासाठी आयुष्य नाही तर एक क्षण पुरेसा असतो.*
                 माझ एवढंच म्हणणं आहे की, इच्छा मरण हा कायदा दुसऱ्या देशात कोणत्या तत्वांवर लागू करण्यात आला याच्याशी आपल काहीच देणंघेणं नाही. पण आपल्या देशात मात्र तो नको. कारण हा कायदा सरळपणे पळवाट आहे जे की, जीवणाच्या अंतिम सत्याला अनुसरून नाही. *कारण अंतिम सत्य मृत्यू होणे होय. तो स्वत:हुण करणे नाही.*
                 शेवटी एवढंच म्हणेन की, जर *निसर्गाने जन्म दिलाय ना तर त्याच्या मान ठेवून शेवटच्या श्वासापर्यंत बिनधास्त जगेण. मृत्यू येईल तेव्हा येवो. मी माझ कार्य तोवर करत राहो.*

Source:- INTERNET
-संजय साळुंके,
जळगाव

  'ज्याचं जळत , त्यालाच कळतं'.  जेव्हा सर्वांशी साधे सरळ , मनात काही न ठेवता , प्रामाणिकपणे वागूनही , चारही बाजूंनी संकट समोर येतात तेव्हा इच्छा मरणाचा कायदा असो किंवा नसो , काही फरक पडत नाही. सध्या वाढलेले आत्महत्याचे प्रमाण यावरून हेच दिसून येते. वंचितच नाही तर सक्षम व्यक्ती देखील आत्महत्या करण्यासाठी का प्रवृत्त होतात ? हल्लीच्या जगात मुखवटे घातलेले लोकच जास्त दिसत असल्याने संवेदनशील माणसाचं जगणं खूपच अवघड आहे. आपल्याशी तोंडावर अतिशय गोड बोलणारे , आपल्यावर  पाठीमागुन वार करण्यासाठी किती उत्सुक असतात हे लक्षात आलेवर साधेपणाने जगणं खूपच अवघड होते. एखादी मुलगी/ मुलगा पैशासाठी प्रेमाच नाटक करून लुबाडून घेतो व नंतर अधिक श्रीमंत  व्यक्तीवर प्रेम करताना दिसणं, भिकारी केविलवाणे तोंड करून जेवणासाठी भिक्षा मागतो व नंतर त्या पैशाची दारू पिताना दिसणं , कायद्याचा रक्षक कायदेशीर कामासाठी लाच मागताना दिसणं , आईवडील यांचेकडून आपल्याच  मुलांमध्ये भेदभावाची वागणूक मिळणं, पत्नी/ पति वर खुप प्रेम करुनही अचानक दुसऱ्या व्यक्ती सोबत नको त्या स्थितीत दिसून येणं इ . अनेक कारणं अशी आहे की संवेदनशील व्यक्तीला त्या क्षणी जगणं निरर्थक वाटतं. मग ईच्छा मरणाचा कायदा असो / नसो .आत्महत्या हा एकमेव पर्याय समोर दिसतो. नव्हे त्याक्षणी तोच योग्य पर्याय वाटतो . जगात सर्वत्र टिळा लावून गळा कापणारेच जास्त दिसून येतात. तत्वज्ञान दुसऱ्याला सांगणं खुप सोपं असतं, जेव्हा स्वतः वर वेळ येते तेव्हा तेच तत्वज्ञान निरर्थक वाटू लागते. त्यामुळे इच्छामरण कायदा प्रगत मानवाची गरज की अधोगती याचं उत्तर म्हणजे, अधोगती.

Source:- INTERNET
-पी.प्रशांतकुमार,
अहमदनगर

...कायदा हा शब्द वाचला की लगेच *कायद्यातील पळवाटा* हा शब्द डोळ्यांपुढे येतो पण हे आपलं दुर्दैव आहे..
...कुठलाही कायदा योग्य प्रकारे पाळला जाईल, त्याचा गैरफायदा, चुकीचा उपयोग होणार नाही हे यंत्रणेने पाहणं गरजेचं आहे .. आणि आपला समाज आणि कायदा राबवणाऱ्या यंत्रणा पहाता गैर उपयोग होणारच नाही या कायद्याचा अस म्हणणं चुकीचं ठरेल..
.....इच्छा मरण का हवं?कुणाला हवं ?..
हा काही आत्महत्या करण्याची परवानगी देणारा कायदा नाही.. जेव्हा रोगांनी/वेदनांनी शरीर जर्जर होत.. असह्य आणि कधीच बऱ्या न होऊ शकणाऱ्या रुग्णांना जेव्हा यातून सुटका हवी असते मृत्यू हा त्यांना आणि  आता या त्रासातून सुटका व्हावी मृत्यू हा मुक्ती वाटू लागतो तेव्हा नक्कीच इच्छामरण या संकल्पनेचा विचार व्हावा..
....अन्न पाणी यांचा त्याग करून जीवन संपवन या संकल्पना भारतात नवीन नाहीत. *समाधी मरण*, *प्रायोपवेशन* किंवा *संथारा* आदीचा वापर अनादी कालापासून होतोय..विनोबा भावे,सावरकर यांनीही जीवनासक्ती संपल्यावर खंगून अत्यावस्त अवस्थेत रुग्णशैय्येवर जगण्यापेक्षा मरणाचा स्वीकार केला.
....दुरुपयोग टाळल्यास आणि चांगला मसुदा आणल्यास हा कायदा योग्यच..खूप मरणशय्येवरचे रुग्ण हेच म्हणत असतात...
मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको

डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुँचे
        दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
        ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन

जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आऐ
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको
(गुलझार)

Source:- INTERNET
-आर. सागर,
सांगली

    आज विविध क्षेत्रांमध्ये मानवाने प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत. पण तरीही मृत्यू कुणाला चुकला नाही. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे आणि हेच अंतिम सत्य आहे. इच्छामरण म्हणजे तरी काय? तर आपल्या मृत्यूची वाट न बघता स्वइच्छेने मृत्यू स्वीकारणे. प्रश्न असा उरतो की 21व्या शतकात विज्ञानाने इतकी प्रगती केली असताना इच्छामरण कायदा खरंच गरजेचा आहे का?
.
खरंतर या प्रश्नावर प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं. पण मला असं वाटतं की अपवादात्मक (शासकीय भाषेत बोलायचं तर दुर्मिळातील दुर्मिळ) प्रकरणांमध्ये इच्छामरण स्वीकारायची तरतूद कायद्यात असावी. काही देशांमध्ये असा कायदा आहे पण आपल्याकडे अजून असा कुठलाही कायदा केला गेला नाही. पण तरीही काही घटना याबाबत विचार करायला भाग पाडतात.
.
अशीच एक घटना घडलेली अरुणा शानभाग यांच्याबाबत. 1973 पासून 2015 साली मृत्यू येईपर्यंत साधारणपणे 42 वर्षे त्या कोमात होत्या. श्वासोच्छवासापलीकडे स्वतः काहीही करणं अशक्य असताना आणि रक्ताच्या नातेवाईकांनी पाठ फिरवलेली असताना केईएम हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी 42 वर्षे त्यांचा सांभाळ केला ही खरं तर कौतुकाचीच गोष्ट. पण तरीही 42 वर्षे त्यांनी ज्या मरणयातना सहन केल्या त्याचं काय? अशा स्थितीत जेव्हा रुग्णाच्या परिस्थितीत काहीच सकारात्मक बदल होत नसेल किंवा भविष्यात काही सुधारणा व्हायची शक्यताच दिसत नसेल तर अशा व्यक्तीला इतकी वर्षे त्याच स्थितीत ठेवणं किती योग्य आहे? अशा स्थितीत इच्छामरणाची तरतूद का असू नये?


Source:- INTERNET
-संगीता देशमुख,
 वसमत,
 जि.हिंगोली

    आजचे जग विज्ञान आणि तंत्रज्ञानयुग आहे. आज कोणत्याही माणसाला कोणत्या क्षणी कुठला आजार उदभवेल, हे सांगता येत नाही. आजची जीवन जगण्याची पध्दत पाहिली तर माणूस आपल्या पोटात येनकेन प्रकारे वेगवेगळी रसायने आणि अनेक प्रकारची विष सोडत आहे. त्यामुळे पूर्वी दीर्घायुषी असलेला माणूस हा निरोगीच असायचा. किंबहुना तो निरोगी असल्यानेच दीर्घायुषी ठरायचा . परंतु आजची परिस्थिती अतिशय विपरीत आहे. आज गरोदरपणात आईच्या चुकीच्या आहार-व्यसनामुळे जन्माला आलेले मूलही कुठलातरी आजार घेऊन जन्माला येतो आहे. आजची जीवनमानपध्दती,व्यसनाधीनता यामुळे अगदी उमेदीच्या काळात,तारुण्यात अनेक तरुण गंभीर आजाराला सामोरे जात आहेत. आज तंत्रज्ञानाच्या आधारे व औषधोपचारामुळे हे तरुण दीर्घायुषी ठरत आहेत,पण त्यासोबतच एक कटू सत्य हे आहे की, ते निरोगी नाहीत. अशी अनेक श्रीमंत,सधन कुटुंबातील व्यक्ती दुर्धर आजाराने वर्षानुवर्षे पिडीत आहेत. या औषधोपचाराने माणसाचे आयुष्य वाढत आहे,पण तो आजार सुसह्यच असेल,याची मात्र शाश्वती नाही. म्हणून आज अशी अंथरुणाला खिळून असलेले आणि मरणाची वाट पहाणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक फारमोठ्या प्रमाणात आपल्याला पहायला मिळतात. यातून पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे इच्छामरण आणि दयामरण याचा!
                   इच्छामरण आणि दयामरण यात फरक आहे. इच्छामरण हे स्वतःहून स्वतःसाठी मागितलेले मरण आहे तर दयामरण हे दुसऱ्याने दिलेले मरण आहे. अरुणा शानभाग ह्या  जवळपास चाळीस वर्षे कोमातच अंथरुणाला खिळून होत्या. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी अरुणा शानभागच्या दयामरणासाठी अर्ज केला होता. तिथे इच्छामरण नव्हते. आणि नारायण लवाटे यांनी वयाच्या ८८व्या वर्षी तर  इरावती लवाटे यांनी वयाच्या ७८व्या वर्षी  या दांपत्याने इच्छामरणासाठी अर्ज केला होता. इच्छामरण की दयामरण हाही विचार केला तर इच्छामरण म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर आत्महत्या आणि दयामरण म्हणजे खून!  त्यामुळे इच्छामरणाचा कायदा झाला तर या कायद्याचा गैरवापरच जास्त प्रमाणात होईल. आज समाजातील संवेदनशीलता हरवल्याचे दाखले पावलोपावली मिळतात. जन्मदात्या आईवडिलांनाच वृध्दाश्रमामध्ये ठेवण्याचे प्रमाण अतिशय जास्त आहे. बऱ्याचदा अशा प्रकारामुळे  त्या मुलाची समाजात निंदाही होते,तरीसुद्धा तो हा प्रकार करतो. आणि विचार करा,जर असा कायदा संमत झाला तर याच कायद्याच्या आधाराने दयामरणाच्या नावाने  अशीच मंडळी आईवडिलांचे जीवन संपवणार नाही कशावरून? कारण आपल्या देशाची शोकांतिका ही आहे की,आपल्या देशात कायद्याचा उपयोग होण्याऐवजी दुरुपयोगच जास्त होतो,हा इतिहास आहे.
          मानवी जीवन खूप सुंदर आहे. पूर्वी औषधोपचाराच्या अभावामुळे लोकांना मृत्यू लवकरच यायचा. परंतु आज विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढे प्रगत आहे की,प्रत्येक आजारावर निश्चित असा इलाज आहे. असे असतांना मरणाची इच्छा करणे,थोडे गैर वाटत नाही का? आपण त्या रुग्णाच्या वेदनांचा विचार करून इच्छामरणाचा विचार करत असू तर एकदा याही बाबीचा विचार व्हायला हवा की,आज जगात इतके दारिद्र्य आहे की,लोकं भीक मागून रस्त्याच्या काठावर,पुलाखाली राहून जीवन जगतात.एवढेच नाही तर काहीजणांना इतके अपंगत्व आहे की,जन्मापासून अशा व्यक्ती परावलंबी असतात. अशा अपंग व्यक्ती दारिद्र्यातही रस्त्याने फरकटत फरकटत भीक मागून आयुष्य जगणारी लोकं पाहिली की  असं वाटतं,मानवामध्ये जगण्याची किती उमेद आहे! त्याच्या जीवनात काहीच सुंदर नसेल पण त्याला जगातील सुंदरता पहायची असेल!  वंचिताचे,अभावाचे जीवन जगताना अशी अनेक लोकं दिसतात. त्यावेळी मनात विचार येतो,प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा खरचं अधिकार आहे. आणि असाही मानवाला निसर्गाच्या विरोधात जाण्याचा काय अधिकार आहे? जन्म कुठे घ्यावा,हे जसे आपल्या हातात नाही,तसेच मृत्यू कसा यावा,हेही आपल्या हातात नाही. मग निसर्गनियमानुसार जीवन जगण्यास काय हरकत आहे?एका परिचयाच्या दांपत्याला  मतिमंद एकुलती एक  मुलगी आहे. आज ती बारा वर्षाची आहे. तिची तब्येत वारंवार बिघडते.ती कितीही  आजारी असो आजही तिचे आईवडील तिला ताबडतोब इलाज करतात. त्यांना असं वाटतं कीअपंग का असेना तिने आम्हाला मातृत्व,पितृत्व दिले. तिच्यामुळे आमच्यावरचा वांझपणाचा ठपका पुसल्या गेला. ती मुलगी स्वतंत्र जीवन जगूच शकत नाही,हे माहीत असतानाही   असे पालक दयामरणाच्या कायद्याचा वापर करतील का?  अरुणा शानभागच्या नातेवाईकांनी तिच्या दयामरणासाठी अर्ज केला असला तरी तिच्याच सहकाऱ्यांनी मात्र तसा त्यांना अधिकार देण्यात येऊ नये म्हणून विनंतीअर्ज केला होता. अरुणा शानभाग शुध्दीवर येणारच नव्हती,हे माहीत असताना देखील त्यांची प्रिय व्यक्ती त्यांच्या डोळ्यासमोर रहाणार,याचेच समाधान त्यांना होते. खरेतर अरुणा शानभागच्या आयुष्याकडे पाहिले की,सुरेश भटांच्या ओळी आठवतात,
"सरणावर जाताना मला इतकेच कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते."
     असे असले तरी,हे जग खूप सुंदर आहे आणि ते जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि आजूबाजूचा नात्यात वाढत चाललेला दुरावा,स्वार्थ पाहिला की,असे वाटते,या कायद्याचा दुरुपयोगच जास्त होईल.म्हणून इच्छामरण कायदा हा नैतिकदृष्ट्या अधोगतीकडेच नेणारा ठरेल .

प्रेम म्हणजे खरोखर प्रेम असते का ?(भाग:-२)

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

प्रेम म्हणजे खरोखर प्रेम असते का?(भाग:-२)


Source: Internet

-वैशाली पंडित,
हिंगोली

        ती म्हणजे खरच प्रेम असतं का प्रश्नच आहे कुणाचेही असो . प्रेमाची परिभाषा प्रेमाचा अर्थ अजून कुणाला समजलेच नाही. अनाकलनीय भावना असमज  विचार म्हणजे प्रेम . विल्यम शेक्सपियर यांनी म्हटल्याप्रमाणे ,,खरे प्रेम म्हणजे काय आत्तापर्यंत कोणाला समजू शकले नाही. परंतु साधारणतः प्रेम म्हणलं की समोर एकंद जोडपं किंवा मग लग्नाचा प्रेम असंच चित्र डोळ्यासमोर तरंगत. प्रेम हे एका सेकंदात किंवा एका दिवसात किंवा एकाच वेळी होण्याचे नाव नाही तर प्रेम एखाद्या झाडा प्रमाण असतं परिस्थिती वातावरण यांची सांगड घालून वाढत जातो तसंच प्रेमाचाही बाबतीत होतं प्रेम हे हळूहळू होत जातो हळूहळू वाढत जातो घट्ट होत जातं कालानुरूप परिस्थितीनुसार ते वाढत जातं पण ते कधी बदलत नाही. लहानपणी आपल्या आईचा आपल्यावर आणि आपल्या आईवर आपलं प्रेम असतं तेव्हापासून जेव्हा आपल्याला काही कळत पण नसत. पण थोडी समज यायला लागल्यावर हे प्रेम अजून घट्ट होत जात. प्रेम करण्यापेक्षा प्रेम निभवणं महत्त्वाचं असत. आई जन्मभर प्रेम निभावत असते तीच प्रेम कधीच बदलत नाही ते आहे  खरं प्रेम.
          दुसरा मुद्दा लग्नाचा किंवा सध्याच्या gf bf( प्रचलित) प्रेमी युगुलांचा. हा प्रश्न आजकाल फार वाढला आहे, फार लांब जाण्याची गरज नाही आजकाल समाजाचं हुबेहूब वर्णन चित्रपटांत दर्शविला जात आहे. याचं उदाहरण म्हणजे 2 वर्षांपूर्वी आलेला सैराट "हा चित्रपट.
       काय होतं? चित्रपटातील नायक-नायिका एकमेका खूप प्रेम करत असतात खुप प्रेम करतात (खर आहे की नाही हा वादाचा विषय) मंग काय होतं पण घरच्यांच्या विरोधामुळे ही दोघं पळून जाऊन लग्न करतात. काय गरज पडली त्यांना पळवून जाण्याची? चित्र
घरच्यांचा विरोध,,, आणि फक्त चित्रपटातच नव्हे तर खऱ्या आयुष्यात सुद्धा खर्चांचा विरोधामुळेच प्रेमीयुगुलांना असे सेराट निर्णय घ्यावे लागतात. आणि मग बेघर बेकारी लाचारी अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. इथे खर प्रेम नव्हतं कुणाच्याच खरं प्रेम नव्हतं,, ना त्यांच्या आई-वडिलांचा या दोघांचं. कारण त्यांनी आई-वडिलांना सोडून दिली काल-परवा मिळालेल्या प्रेयसी साठी प्रियकरासाठी. पण त्यांच्या आई-वडिलांचेही प्रेम नसेल कदाचित त्यांच्यावर कारण समाज आणि इतर त्यांना मुलीच्या सुखा पेक्षा जास्त महत्त्वाची होती.               आजकाल "लव जिहाद" नावाचा पण एक  प्रकार चालतो. फार काही माहिती नाही याबद्दल पण त्यामध्ये मुलगा मुलीला फसवतो, इथेही खरं प्रेम नाही कारण जर आपण आपल्या प्रेमाला ओळखू शकलो नाही ,समजु शकलो नाही तर ते खर प्रेम करू शकत. प्रेम हे दोन सारख्या व्यक्तींसाठी नसून दोन असामान्य व्यक्ती ने हा निर्णय घेऊन जगण्याच नाव आहे.  
            जर दोघही एकमेकांवर खरंच प्रेम करत असतील , आणि ते आपल्या आई-वडिलांवर पण प्रेम करत असतील  , तर त्यांच्यामध्ये त्यांना राजी करण्याची क्षमता असते हे पटवून देण्याची क्षमता असते की ते दोघे एकमेकांच्या लायक आहेत. ते दोघे आयुष्य सुखात घालवू शकतील. आणि त्याच्या आई-वडिलांचं पण त्यांच्यावर खरंच प्रेम असेल तर ते स्वतःच्या स्वरचित प्रतिष्ठेची काळजी न करता लग्नाला राजी होतील. मुलगा बेरोजगार आहे ,तर त्याला रोजगार ,व्यवसाय उभारण्यासाठी हातभार लावतील .कारण त्यांनी जर स्वतःच्या पसंतीनुसार मुलींचे लग्न केलं असतं तर आला नसता खर्च? दिला नसता हुंडा ? (हुंडा कायद्याने गुन्हा असला तरी) हे आहे का खरं प्रेम???? नाहीतर मुलगा काहीच करत नाही बेरोजगार आहेत मुलीला कस जायचं याप्रकारचे मायबाप,,,🤔 आणि इकडं मुलगी 18 वर्षाची कमवता मुलगा शोधला चाळीस वर्षाचा, कुरूप वयस्कर असला तरी चालेल ,मुलीला पसंद नसला तरी चालेल,( रूपाला महत्त्व नाही पण) तरीही हुंडा दिला 10 lakh ,20 तोळे सोनं, भांडीकुंडी ,हिरो होंडा गाडी ,सगळीकडे धुमधडाक्यात वरात डीजे, हे सगळं काय आहे खरं प्रेम की दिखावा.
विषय खूप खोल आहे पण शब्दाला मोल आहे ,त्यामुळे एवढाच की प्रेम ही खूप सुंदर आणि पवित्र भावना आहे. आणि ते आणखी सुंदर बनवता येत. पण समाजातील प्रतिष्ठा ,अहंकार ,न झुकण्याची  प्रवृत्ती या सर्व बाबी प्रेमाचा खूण करत आहेत.
          प्रेम खूप सुंदर आहे फक्त ते समजून घेता आलं पाहिजे , पारखता आलं पाहिजे, सगळ आयुष्य सुंदर बनून जाईल जर प्रेमाला योग्य दृष्टिकोनातून समजून घेतले तर ,,,,
       



Source: Internet

-नामदेव जाधव,
 जि. कोल्हापूर

             प्रेम म्हणजे खरचं प्रेम आणि फ़क्त प्रेम असतं. प्रेमा सारखी शुध्द सात्विक, भावना या जगात नाही.प्रेम आहे म्हणून माणूस माणसाला जोडला गेलाय.माणसाचे आयुष्य परिवर्तन करायचे असेल तर प्रेमासारखा दूसरा दुवा नाही.आजच्या काळात अनेक वेळा आपण तरुणांकडून प्रेमासाठी टोकाची पावले उचलेली पाहतो.पण ते कितपत योग्य आहे हे त्यांनाचं माहीत. प्रेम ही गोष्ट दाखवण्याची नसून ती अनुभवायची आहे,याचा जणु हल्ली विसर पडत चाललाय,. प्रेमात त्याग ही तितकीच महत्वाची भावना आहे. कधी कधी आपण आपल्या जोडीदारासाठी स्वतःला विसरायला हवं,व याची जाण जोडीदाराने ठेवायला हवी.मग अश्या प्रेमासाठी महागड्या वस्तूची गरज नाही की सुविधांची ,नात्यांतहवा तो फक्त विश्वास आणि प्रेमाचा ओलावा मग बघा हे प्रेमरुपी वृक्ष कसा भरतो ते.! सर्वाना जोडीदाराकडून ,आयुष्याकडून भरभरून  प्रेम मिळो या आशेसह इथं थांबतो.
             ‎धन्यवाद.



Source: Internet

-राज इनामदार,
 पंढरपूर

*प्रेम करांव  भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं*
*मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं*

प्रेम म्हणजे अनोखी ओढ़ ..त्याचाच द्यास ...प्रत्यक्ष भेंट जरी नाही झालीना ....तरीही स्वप्नात आणी विचारानच्या महेफलित होणारी साखर भेट ...आणी त्याच भेटीच्या  गोडीची चव चाखत प्रत्येक्श भेट होईल याची मनाला काढलेली समजूत .प्रेम म्हणजे प्रार्थना आणी प्रेम म्हणजे त्याग ...प्रेम म्हणजे पूजा ...प्रेम म्हणजे ह्रुदयाच्या गाभाऱ्यात आपण जपून ठेवलेला हीरा .
प्रेम म्हणजे ..आपण जिच्यावर् प्रेम करतो ती आपल्याला मिळो न मिळो तिचे आपल्यावर् प्रेम असो नसो ..पण दररोज परमेश्वराच्या दरबारात डोळ्यांत अश्रु अनावर होवून देवाजवळ केलीली प्रार्थना... हे ईश्वरा सुखी ठेव त्याला ..उदंड आयुष्य लाभो त्याला ..त्याची सर्व दुख मला मिळो व माझे सर्व सुख त्याला मिळो ...अशी प्रियकराविषयी असणारी सदभावना ..
     मित्रहो प्रेम हे कधीच करून होत नसत ...प्रेमात सुंदरता ...श्रीमंती ..जातपात ..रंगरूप याला काहीही किंमत नसते प्रेम आंधळ असत ...कोणावरही होवू शकत
प्रेम ही गोष्ट अंतकरनातून निर्माण होत असते ...प्रेमाची ओढ़ अतिशय तीव्र असते ..तो एक विषाचाही प्याला आहे पंचवताही आला पाहिजे .
*खयालें यार तो हर गमको भुला देता है*
*जिसको पीना है ओ पिये जाम से  औरसागर से*
*मेरा साकी मुझे आँखोंसे पीला देता है*

आयुष्यात कितीही दुःख आली संकटे आली तर ..जेंव्हा जगण नकोस वाटत त्या वेळेस तिचा चेहरा आठवला की हलकीसी स्माईल ओन्ठावर यावी व सर्व दुःख विसरून जावे तिच्या आठवणीत.
मजनू आपल्या लैला ला भेटन्यासाठी जंगलातील वाटेवरून जात होता ...तो बेभान होवून चालला होता ...पायात काहीही घातलेलें नव्हते तरीही भर उन्हात चालला ..काँटे कुंटे तुडवून अनेक दगडांच्या ठेचा लागून पाय रक्तबम्बाळ झाल पण याला कळलच नाही ...हा  फक्त लैला लैला करत निघालेला ...
त्या वाटेत ऐक फकीर नमाज पढ़त होता ..हा मजनू त्या फकिरां समोरुण गेला ....फकिर लाल बूंद झाला व तो मजनू शिव्या देवु लागला ....तेंव्हा मजनु हसु लागला व म्हणाला ...माझ्या लैला ला ईश्वराने बनवल ती एक साधारण स्त्री असून सुधा ..तिच्या प्रेमात मी इतका व्यापून गेलोय ..इथंका आंधळा झालोय की तिच्या भेटीची ओढ इतकी आहे की ये फकीरजी तुंम्ही नमाज पढ़त आहात हे सुधा मला दिसलं नाही .
तुंम्ही तर मग लैला ला बनवनार्या ईश्वरावर् जर प्रेम करतो असे म्हणता तर मग तुमी नमाज पठण करत असतांना मी तुम्हांला दिसलोच कसा ? हे सांगा ...फकीर नीरुत्तर झाला ...
*तेरे प्रीत मे सुधबुध सब बीसरी*
*कबतलक रहेगी ये बेखबरी*

असे ऐका ठिकाणी अमीर खुसरो म्हणतात .

मजनु लैला वर् इतका प्रेम करत होता की त्याला जिकडे तिकडे फक्त लैलाच दिसायची
अर्जुनाची धनुष्यविद्यावर् इतके प्रेम होते की त्याला फक्त पक्ष्याचा डोळाच  दिसला
पुंडलिक आई वडिलांनवर् इतक प्रेम केल की साशात भेटायला आलेल्या पांडुरंगालाही भेटायला त्याच्याकडे वेळ नाही .
पोट्च्या लहान बाळाच्या प्रेमापोटी हिरकणी बुरुज उतरून गेली .
आम्हीं प्रेम मुलांवर करू  , आई वडीलानवर् , ईश्वरावर् करू आमच्या प्रेमाचा आलेख किती उंचीचा आहे हे पाहणे गरजेचा आहे .

प्रियशीला प्रियंकर पत्र लिहतो मी तुझ्यासाठी चंद्रसूर्य तोडून आणेल म्हणतो ..
जेंव्हा प्रियशी याला भेटीसाठी बोलवते तर हा म्हणतो सॉरी जानू आज़ आभाळ आलंय पावसाची शक्यता आहे त्यामुळे तूला भेटायला येवू शकत नाही ....😣...अरे जो माणूस आपल्या प्रियशीसाठी पावसात भिजू शकत नाही ..तो ..काय चंद्रसूर्य तोडून आणनार .
दररोज कपड़े बदल्याप्रमाणे प्रेम बदलणार्याना काय समजणार प्रेम ...नुसता कामं वासनाचा बाजार .....
प्रेम आतड्यावर असावे ...कातड्यावर् नको ....

ऐक शिकारी जंगलात हरनीची शिकार करताना हरनी च्या माघे धावत असतो ....काहीही करून त्याला त्या हरनीची शिकार करायचिंच होती ...पण अचानक पुढील वळणावर ते हरिण झुडपातूण गायब होत ..शिकारी खूप उदास व निराश होवून चालु लागतो ..त्याला समोर आदीवाशी लोकांची वस्ती दिसते तो तिथं जातो ...तेथील लोक त्याचा पाहूनचार करतात व त्याला सांगतात की आज़ रात्री आमच्या वस्तीवर उत्सव आहे तुंम्ही थाम्बा ......शिकारी त्यांच आमंत्रण स्वीकारून थांबतो ...
रात्र होती सगळीकडे शेकोटि पेटवून रोशनाई केली जाते ..व ती आदीवासी लोग विविध आभूषण घालून एका शेकोटि भोवती बेभान होवून नाचत असतात ..गाणी म्हणत असतात ...हे पाहून ढोल वाजनारा आणखीन जोराने ढोल वाजवत असतो .....तेवढ्यात तिथे हरिण येत शिकारी बघतो ...हरिण आयातिच सापडली म्हणून त्याला आनंद होतो ...बन्धुक उचलतो ..नेम धरतो ..गोळी झाड़नार तोच त्याला तेथील एक आदीवाशी माणूस त्याला अडवतो ...शिकारी म्हणतो ही माझी शिकार आहे .मला सोड मला शिकार करूदे नाहीतर तूला गोळी घालेन ...आदीवाशी म्हणतो मला गोळी घाल पण येकुन घे .
ही हरिण गेली पाँच वर्षे झाली इथे येतीय ...कारण पाँच वर्षापूर्वी हे हरिण याच्या प्रियकर हरणाबरोबर फिरत असतांना एका शिकार्याने हिच्या प्रियकर हरणांची शिकार केली ..त्या हरणाच्या कातड्यापासून ढोल बनवला गेला व तो ढोल आमच्याकडे आहे जेव्हा जेंव्हा त्या ढोलावर थाप पडते ...तेंव्हा तेंव्हा ती हरणाची कातडी या हरनीच्या आतडयाला साद घालते व हरिणी बेभान होवून अश्रु ढाळत आमच्या वस्तीत येते ...जो पर्यत ढोलचा आवाज़ बंद होत नाही ...तो पर्यंत थाम्बते  ........
मित्रहो एक प्राणी इतक पवित्र प्रेम करू शकत तर आपण का नाही
आता आपण आपल्या मनाला विचारू की खरच आपल प्रेम हे ..नक्की प्रेमच आहे का ?

खूप खुप फरक असतो खऱ्या प्रेमात व खोट्या प्रेमात .

आजकाल केल्या जाणाऱ्या प्रेमाला नक्की प्रेम म्हणता येईल का ? हेच समजत नाहीये .

चूक भूल झाल्यास शमा असावी 🙏



Source: Internet

-अनिल गोडबोले,
 सोलापूर

          “प्रेम” हा विषयच असा आहे कि त्यावर आपण कतीत बोलू तेवढ कमीच! या हिंदी चित्रपट सृष्टीने आणि एकंदरीत सर्व फिल्म वाल्यान हा विषय सतत वेगवेगळ्या माध्यमातून हा विषय अगदी ‘जिवंत” ठेवला आहे. तर सुरवातीला हा जो प्रश्न विचारला आहे त्या मागील कारण सुधा खासच आहे आणि ते नुसत १४ फेब्रुवारी ‘व्हॅलंटाईन डे’ पुरत मर्यादित नसून त्या मागे एक अर्थ दडलेला आहे.
आपण प्रेमाच्या खूप गप्पा मारतो. आईच प्रेम, वडिलांचं प्रेम, भाऊ-बहिण यांच्या मधील प्रेम एवढच कशाला.... मित्र प्रेम, शेजारी प्रेम (शेजारीण प्रेम नव्हे) असे  कितीतरी नाते संबंध आहेत जे प्रेमाच्या पायावर भक्कम उभे आहेत. या प्रेमाविषयी आपण किती बोलतो तर अगदी थोड म्हणजे जेवणातल्या मीठ एवढ... कारण ते जास्त झाल तरी खल जात नाही आणि कमी झाल तरी जाणवत ... आणि महत्त्वाच आहे ते प्रमाणात असण!.. हे प्रमाण देखील ज्याच्या त्त्यच्या चवीनुसार!.. तर जास्तीतजास्त वेळा स्त्री आणि पुरुष यांच्या मधील प्रेम संबंध बद्दल जास्त बोलाल गेलेलं आहे. शृंगार रस नावाचा एक रसच मुळात मराठी व्याकरण मध्ये आहे आणि तो रस ‘प्रणय’ या भावनेवर आधारित आहे. स्त्री आणि पुरुषांनी एकत्रित येणे ही निसर्गाची गरज आहे कारण त्या शिवाय प्रजनन होणार नाही. माणूस हा एक प्रगत प्राणी आहे त्यामुळे त्याच काही इतर प्राणी पक्ष्य प्रमाणे जीवन नाही त्यामुळे हे जीवन जगताना त्याने काही नियम घालून घेतले आहेत.
मानवी जीवन जगण्यासाठी घालून घेतलेल्या बंधनामध्ये माणूस एवढा गुरफटला आहे कि तो काही काल्पनिक गोष्टी त्या मध्ये मिसळून मूळ प्रेम भावनाच विसरला आहे. सता आणि शक्ती यांची लालसा माणसाला कुठलेही विधिनिषेध पाळायला लावत नाही तसेच काही लोकांना एवढी बंधन आहेत कि त्यांना जगणे मुश्कील झाले आहे.
प्रेम एक सुंदर भावना आहे जी एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीवर व्यक्त करत असतो. आता इथे जाणून बुजून व्यक्ती हा शब्द वापरला कारण शास्त्राच्या मते समलिंगी शरीरसम्बन्ध मध्ये hi प्रेम असते असे सिध्द झाले आहे. कोणी मानो किवा न मानो समलिंगी जोडपी सुधा “नॉर्मल” आहेत असे शास्त्र म्हणत आहे. प्रेम व्यक्त करताना व्यक्ती च्या भावनांचा आदर केला पाहिजे एवढ एकच सूत्र जर पाळल तर काही अवघड होत नाही.. पण अस होत नाही आणि तिथे समस्या निर्माण होते.
व्हॅलंटाईन डे च्या निमित्ताने सोशल मेडिया वर येणारे मेसेज वाचले किवा आजूबाजूला जर चित्र बघितले तर दोन्ही प्रकारची माणसे दिसतात. प्रेम करणारी आणि द्वेष करणारी आता या मध्ये अजून एक तिसरी अवस्था अशी आहे कि प्रेम करणार्याचा तिरस्कार करणारी ......
काही व्हिडिओ आले ग्रुप वरती या लोकांनी प्रेमी युगुलांना मारहाण केली.. किवा लग्न लाऊन दिल... आणि शेअर करणारे पण आनंदाने शेअर करत होते.. प्रेम करणे ही काही आपली संस्कृती नाही किवा प्रेम कशासाठी पाहिजे? पाश्चात्त्य लोकांच अंधानुकरण, किवा तरुणांना मजा मारण्यासाठी मोकळ केलेलं रान आहे.. अशा प्रतिक्रिया या तथाकथित “संस्कृती रक्षकाकडून” ऐकायला मिळतात. आज भारता मध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या बघितली तर त्या मध्ये जास्तीत जास्त आत्महत्या ह्या “अपेक्षा भंग” या मानसिकते मुळे होतात. आपल्याला जर आपल्या मनाप्रमाणे जगता येत नसेल प्रेम करता येत नसेल तर केवळ बहर मोकळे पाने फिरणे म्हणजे स्वातंत्र्य आहे का? असा देखील प्रश्न पडतो.
या दोन्ही टोकाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या मुले असा प्रश्न पडला कि खरोखर हे प्रेम गरजेच आहे का? फक्त प्रजनन करणे एवढाच उद्देश मनुष्य जीवनाचा आहे का? निश्चितच नाही! त्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे. डोपामाईन नावाच्या संप्रेरकामुळे प्रेम होत अस म्हणतात पण जीवन जगण्याच्या भीती पोटी पुढच्या पिढीत हा आढळून येईल किवा नाही असा प्रश्न पडतो कधी कधी....
खर प्रेम माणसाला माणूस म्हणून विचार करयला भाग पाडते. एकटेपणा दूर होतो, अपेक्षा भंग हा पचवता देखील येतो, आपण आपल्या आयुष्यात काय मिळवलं पाहिजे हे कळत... प्रेम बंडखोरी करायला शिकवत. प्रेम माणसाला नवीन गोष्टी करायला भाग पाडत. आईनस्टाईन ला तर म्हणे आपण जेवलो आहोत कि नाही हे सुद्धा लक्षात राहत नसे एवढ तो त्याच्या विषयावर प्रेम करत असे.
या मध्ये मात्र एक सीमा रेषा आहे ती सगळ्यांनी समजून घेण गरजेच आहे. जबरदस्ती, अत्याचार. पैशाच्या जोरावर किवा दुसर्याच्या कमजोरीचा फायदा घेऊन प्रेम मिळवणे हा काही माणूस असल्याचा पुरावा नाही.
व्यक्ती स्वातंत्र्य भारताने मान्य केलेले असताना देखील अशा प्रकारे “moral पोलिसिंग” करणारे हे नेमक काय साध्य करत आहेत हे कळत नाही
तरी hi भावना हे प्रेम खरोखर आहे आणि ते त्यच अस्तित्व दाखवत राहत ... कधी रोमिओ आणि ज्युलियेट आणून कधी सैराट होऊन कधी कोणताही रूप घेऊन.... अजूनही इज्जत कशाशी खातात हे न कळलेल्या लोकांना अस समजावणार हा देखील प्रशन  आहे. मुलगी प्रेम केली तर इज्जत जाते, दुसर्या धर्मातली मुलगी किवा मुलगा असेल तर इज्जत जाते, पैसा कमी असण्याने इज्जत जाते ... पण बलात्कार क्र्नार्यामुळे इज्जत जाते हे कधी कळणार? अत्याचार करणारे भ्रष्टाचार करणारे या मुले किती नुकसान होत आहे हे अजूनही कळलेलं नाही
शेवटी एवढच सांगतो..... प्रेम होतच राहणार कानीही कितीही प्रयत्न करा.. पण या मध्ये विकृती ला थारा नाही. एक जोडीदार किवा अनेक जोडीदार हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. “त्याने प्रेम केळ किवा तिने प्रेम केल.. मला सांगा तुमच्या बापच काय गेल... “ या प्रश्नाच उत्तर पाडगावकर यांना अजूनही कोणी दिलेलं नाही
“एक आग का दर्या है.... और डुबके जाना है” हेच खर !!!!!



Source: Internet

-करण बायस,
हिंगोली

प्रेम म्हणजे...💓💓💓............?
      कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.प्रत्येक बाळाचं पाहिलं प्रेम असते आई.कारण आई बाळाला जन्म देते तेंव्हा पासून आई आणि बाळाचं प्रेमच नात तयार होते.

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.बाबा पण आपल्या मुला/मुली साठी एक अस पात्र असते ज्यांच्या प्रेमाची तुलना करता येत नाही.

मैत्री हे एक अस नातं असते जिथे आपल्याला आपल्या भावा बहिणीसारखं प्रेम करणारे मित्र मैत्रिणी भेटतात.

आपल्या घरातील आजी आजोबा असतात आपल्या वर प्रेम करणारे.

प्रेम हे प्रत्येक नात्यांमध्ये असते.आज माणसांचे एकमेकांशी जे चांगले संबंध आहेत ते प्रेमामुळेच आहेत.
पण प्रेम म्हंटल की सर्वात आधी आपल्याला couples आठवतात.आपल्या समाजात लोकांना या गोष्टींशी खूप problem आहे.कारण त्यांना वाटते यामुळे आपल्या संस्कृतीवर वाईट परिणाम होईल.ते सर्व अवलंबून असते ज्याच्या त्याच्या mentallity वर.

प्रेम म्हणजे फक्त एक शारीरिक attraction नसते.

आज काल आपण बघत आहोत की प्रेमाच्या नावावर होणाऱ्या वाईट घडामोडी.खरं प्रेमात अस काही होत नाही.प्रेमात हे एकमेकांना समजून घ्यावे
लागते, कोणी जर चुकत असेल तर एकाला समजूत काढावी लागते.जवळ असो वा लांब असो एकमेकांवर विश्वास पाहिजे.

आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यावेळेस आपण ‘I Love You’ अस बोलतो, या I चा खूप deep अर्थ आहे.म्हणजे ज्यावेळेस आपलं मन हे एखाद्या मनाशी पूर्णपणे मिळतो( by heart,not by mind)
ते प्रेम खर असते.एखाद्या व्यक्तीला बघितलं आणि तो/ती आपल्याला आवडलं की आपला mind हे dopamine नावाचं एक chemical secrete करते जो आपल्या brain ला आवडतो आणि समोरची व्यक्ती by mind आपल्याला आवडते जे की खरं प्रेम नसते.mind न प्रेम हे स्वार्थ साठी असतो.

एक उदाहरण देतो,प्रत्येक आई आपल्या बाळावर प्रेम करते ते प्रेम पूर्णपणे तिच्या feelings, emotions ने असते.ते प्रेम करावे लागत नाही ते पूर्णपणे by heart असते.आणि त्या heart च heart म्हणजे तिच्या बाळाचं heart.

आपण प्रेमाची व्याख्या काय करतो हे महत्त्वाचं आहे.
बऱ्याच जणांचं म्हणणं असते की love marraige हे यशस्वी होऊ शकत नाही पर्याय फक्त arrange marraige च आहे.पण मला वाटते की इथं प्रेम खरं असेल तर काही problem नाही येणार.Arrange marraige मध्ये आधी सगळ्यांच्या संमती ने लग्न होत आणि नंतर प्रेम,पण जर दोघांचे विचार वेगळे असतील तर खूप प्रॉब्लेम्स येतात.

एकदा प्रेम केल्यावर ते आयुष्यभर टिकवला पाहिजे,लग्नानंतर पूर्ण आयुष्य काढायचं असते ते पूर्ण आयुष्यभर टिकवून ठेवलं पाहिजे,प्रेमात एकमेकांनी एकदुसर्याल समजून घेतलं पाहिजे.

अस म्हणतात प्रेम झाल्यावर माणसात खूप काही बदल घडलेले दिसतात, मग ते प्रेम सजीव गोष्टीवर असो वा निर्जीव गोष्टीवर उदा. जर एखाद्याला music आवडत असेल तर त्या गोष्टीत स्वतःला पूर्णपणे झोकून देईल,त्याला त्या गोष्टींशी एक attachment तयार होईल.

जर आज आपल्या पिढीने प्रेम या विषयाचा अर्थ समजून घेतला तर येणाऱ्या पिढीत खरा बदल होईल आणि जे काही आज देशात वाईट गोष्टी होत आहेत त्या कमी होण्याच्या भरपूर शक्यता असतील. आणि जर  आपण आपल्या पुढच्या पिढीला अशाच प्रकारे टॉर्चर केलं आपल्या सारख बनवण्यात तर खुप प्रॉब्लेम्स होतील त्यांना त्यांच्या स्वतंत्र मनाने/बुद्धीने विचार करू दिले पाहिजे.

जर तुम्ही आमच्या मनाप्रमाणे वागला तरच तुमच्या वर आमचे प्रेम आहे, हे चुकीचं आहे हे वडीलधारी मंडळींनी समजून घेतलं पाहिजे.

ज्या वेळेस एखादा व्यक्ती relatinship मध्ये असतो त्याने समोरच्या व्यक्ती वर बंधन टाकणं हे सुद्धा चुकीचं आहे कारण ते आपले विचार आपण दुसऱ्यावर थोपणं हे बरोबर नाही.
आपण म्हणतो माझ्या देशावर माझे प्रेम आहे.पण किती जण देश स्वछ ठेवण्यास पुढं येतात,मनापासून?किती जण रस्त्यावरचे सिग्नल follow करतात?किती जण curroption करतात?

किती जण देशात शांतता टिकवतात?




Source: Internet

-जयंत जाधव,
 लातूर

       प्रेमाची व्याख्या करणे तसे खूप अवघड काम आहे व कोणाच्या सोबत तुलना करणे ही शक्य नाही.प्रेमात अपेक्षांची यादी फार कमी असावी लागते व देण्याची यादी मोठी असावी.सर्वात श्रेष्ठ प्रेम हे आईच आपल्या मुलांच्या विषयी असलेले प्रेम आहे .शाळेत असताना शिकायला मिळाले की ऊर्जा ही अक्षय असते .अगदी तसेच खरे प्रेम हे अक्षय म्हणजे न संपणार असते.आपल्याला जीवनात कोणी यावे हे जरी नशिब ठरवते पण आलेल्या माणसाला थांबून ठेवणे आपल्या मनाच्या  हाती असते.
प्रेमाच्या प्रवासात जीवनाचे बंध हे नेहमी पुढे घेऊन जाणारे असावेत.मागे ओढून नेणार हे प्रेम नसते ते असते स्वार्थ.
शेवटी Love means a person's face, on her motives, on the role, vision. To sacrifice love for proving love, to bear exploitation- compulsion, to sacrifice excessive sacrifice - these are wrong ideas. Because love means respect for the person's mentality, self-respect. Love means acceptance of qualities and conflicts -deficiencies. To know about the person's problems and to take the initiative to solve them, to make his life happy.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************