टीव्ही न्युज चॅनलवर लगाम गरजेचा?


वाल्मिक फड, महाजनपूर नाशिक .

खरोखर लगाम हा फार गरजेचा झाला आहे.कारण जेव्हा कधी बातम्या ऐकाव्या म्हणलं की,यांच्या चॕनलवर कायम वाद निर्माण होतील अशाच बातम्या चालू असतात.आणी हे पहा सामान्य माणसाला काय करायचे हो हे ऐकून की ह्या हिरोईनला मुलगा झाला मुलगी झाली,हि पळून गेली,ती परत आली सांगा काय करायचय सामान्य माणसाला आहे का काही गरज ह्या बातम्यांची?
अहो मला तर असं ऐकायला मिळालं की,हे चॕनेलवाले ज्याच्याकडून पैसा मिळाला त्याच्या बाजूने परत परत बातम्या देऊन सामान्य लोकांना टिवी नकोसा करतात.आत्तापर्यंत ज्या ज्या शेतकर्याच्या मुलाखती घेतल्या त्यांच्याकडून हे पैसे घेतल्याशिवाय मुलाखती घेत नाही.सरपंच असताना अशा एका चॕनेलवाल्याला फोन केला म्हटलो पंचवीस वर्षापूर्वीची गावकर्यांची व्यथा मांडावी सरकारसमोर परंतु गावात येण्याच्या बदल्यात आम्हाला विस हजार खर्च लागणार असल्याने आम्ही त्या गोष्टिकडे पाठ फिरविली.शेवटी पेपरला दिले आम्ही पण त्याचा एवढा काही परिणाम झाला नाही.
सांगायचे तात्पर्य इतकेच कि,हे न्युज देतात ना प्रामाणिकपणे द्या ज्यांच्यावर अन्याय होतोय ते सत्य जनतेला कळू द्या.नुसती कर्जमाफीची बातमी तुम्ही दाखवता पण प्रत्यक्षात गावांत येऊन गरीब शेतकर्याँना विचारा की झालीय का तुम्हाला कर्जमाफी.नुसता एखाद्या मंञ्याने शब्द काढला कर्जमाफीचा की तुम्ही दिवसभर जनतेला वेड्यात काढता आणी शहरातील जनतेला ते खरं वाटतं,सरकारला खरोखर कर्जमाफी करायची होती तर जे २०१७ जून मध्ये थकबाकीदार झाले त्यांना करायला हवी होती कारण हे सगळे शेतकरी नियमीत कर्जफेड करत होते.ह्या बाबतीत कधी न्युज चॕनेलवाले कधी मंञ्यांना प्रश्न विचारता का?नाही विचारत कारण गरीब शेतकरी त्यांना काही देऊ शकत नाही.सरळ असलेली बातमी ऊलटसुलट सांगून जातीय तेढ मोठ्या प्रमाणात हे न्युज चॕनेल करतात आणी म्हणूनच अशा गोष्टि थांबविण्याकरीता सर्वच टिवी न्युज चॕनलवर लगाम गरजेचा आहे असं मला वाटतं.जय हिंद.
______________________________________________

शिरीष उमरे, मुंबई

प्रेस स्वातंत्र ह्या घटकावर १८० देशाच्या जागतिक यादीत आपला देश १४० व्या क्रमांकावर !!
१००+ भारतीय न्युज चॅनल पैकी बहुतांश बड्या कार्पोरेट हाऊसच्या मालकीचे !!
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या रिर्पोर्टनुसार भारतिय मिडीया जगात सगळ्यात जास्त भ्रष्ट !!

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ, संविधानाचा रक्षक, लोकांचा आवाज वैगेरे आता अंधश्रध्दा झाल्या आहेत.

हा एक धंदा झालाय... भ्रष्टाचाराला बढावा देणारा, भ्रष्टाचाऱ्यांना लपवणारा, भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणारा आणि भ्रष्टाचाऱ्यांना प्रसिध्दी देऊन त्यांचा उदो उदो करणारा !

हा संघटीत गुन्हेगारी चा अड्डा झालाय ज्यात ब्लॅकमेलींग, खंडणी वसुली, पेड न्युज, मनी लाँड्रींग, आर्थिक घोटाळे, टीआरपी साठी फेक न्युज, नोकरवर्गांचे लैंगिक शोषण सारखे गंभीर गुन्हे सर्रास होत आहेत.

 ह्याला पाठींबा आहे राजकारण्यांचा, धार्मिक संघटनांचा, सरकारचा व मालक कार्पोरेटचा....

जे खरेखुरे पत्रकार होते त्यांचा आर्थिक व मानसिक छळ आणि हत्या करुन एका पध्दतीचे दहशतीचे वातावरण निर्माण केले गेले आहे.
बाकी उरलेले कणाहीन, चरित्रहीन, लाळघोटे, पाय चाटणारे कुत्रे व लचका तोडण्यास टपलेले गिधाडे आहेत.

अश्या वेळी आपण नागरिक म्हणुन काय करु शकतो ?
आंदोलनातुन अश्या न्युज चॅनलसाठी कठोर नियम तयार करण्यास व अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडु शकतो. बकवास टीवी चॅनल पाहणे बंद करु शकतो. खोट्या बातम्या फॉरवर्ड करणे बंद करु शकतो.
 माहितीच्या हक्कावर व सत्य बातमी साठी काम करणाऱ्या विसल ब्लोअर पत्रकारांच्या मागे ठामपणे उभे राहु शकतो. ह्या गंडागर्दीला आता विरोध नाही केला तर अनर्थ होऊ शकतो... जागे व्हा...सध्या संसदेत माहीतीच्या अधिकाराच्या कायद्यात जो बदल केल्या जातोय त्याला विरोध करा... ह्यावेळेसही शांत राहाल तर पुढची पीढी माफ करणार नाही तुम्हाला...
_____________________________________________

शिवकुमार म.पत्रे
कर्वे नगर,पुणे
                    प्रसार माध्यमाचे वेगवेगळ्या गटामध्ये वर्गीकरण केले जाते त्यातील एक महत्वाचा गट म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया होय,आणि आपल्या चर्चेच्या विषयातील न्यूज चॅनेल हा एक त्यातील छोटासा परंतु अत्यंत महत्वपूर्ण घटक होय म्हणून या विषयावर चिंतन मंथन करणे काळाची तसेच या देशाची तथा त्या अर्थाने सामाजिक गरज बनली आहे .

 २०१ सदस्य असलेल्या या अत्यंत छोट्यास्यां ग्रुप वर या प्रदीर्घ विषयावर विचार होतोय यापेक्षा अजून श्रेष्ठ गोष्ट कुठली नसेल,आणि या समुहाचा मी एक घटक आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो.खर तर या विषयावर प्रेतेकाने सामाजिक माध्यमांवर वेक्त होणे गरजेचे आहे त्याचा प्रभाव मोठ्याप्रमाणावर पडेल व टीव्ही न्यूज चॅनेलवर बंधने येतील ज्या मुळे आपला खरा मोटो ,अंजेडा उद्देश पूर्ण होईल. आता खऱ्या अर्थाने याची गरज का आहे यावर चर्चा करूया ,सध्या सामाजिक माध्यमांवर चर्चेचा विषय ठरलेली भारतीय खेळाडू हिमा दास जिने स्वर्ण पदक जिंकून भारताचे नाव मोठे केले आणि झाले काय आपल्या न्यूज चॅनेलवर तिचा जसा उल्लेख असावा तसा उल्लेख कुठल्याच न्यूज चॅनेलवर दिसत नव्हता पण सामाजिक माधामनवर जेव्हा तीच्या नावाने हॅच टॅग मारून बऱ्याच जणांनी न्यूज चॅनेलेवल्याना धारेवर धरले तेव्हा कुठे तिची ब्रेकिंग न्यूज बनली आणि तिचा संघर्षमय प्रवास यशोगाथा संबंध जगाच्या पुढे आली.

 जर २६/११  चा हल्ला आपल्या सगळ्यांच्या स्मृतीत असेल तर आपल्याल्याला एक गोष्ट नक्की आठवत असेल ,
ज्यावेळी पॅरा कामांडोज त्या हॉटेलच्या बिल्डिंगवर उतरत होते तेव्हा आपल्या सो कॉलड न्यूज चॅनेलवर त्यांचा लाईव्ह रिपोर्ट दाखवला जात होता त्यामुळे ते सावध झाले .ज्यामुळे भारतीय जवान व अनेक नागरिक मारल्या गेले.
अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये न्यूज चॅनेलवर  वेगवेगळी बंधने लादली आहेत , अमेरिकेत न्यूज चॅनेलवर  कुठली बातमी दाखवायची जी बातमी दाखवली जातीय तिचा कन्टेन्ट कसा असला पाहिजे ,
असे बरेच सुंदर व अत्यंत महत्वाचे नियम आहेत.एखादी बातमी जर सामाजिक तेढ निर्माण करणारी असेल तर ती दाखवली पाहिजे का जर दाखवली जातीय तर ती कश्यापद्धतीने दाखवावी असे बरेच विषय या मध्ये आहेत.

 प्रसार माध्यमे ही समाज मनाचा आरसा असतात आणि जर याच अरश्यामध्ये दाखवला जाणारा चेहरा हा खोटारडा असेल तर पाहणाऱ्या प्रेतेकलाच ते समजेल असे नाही.
निमूट पने डोळे झाकुन न्यूज चॅनेलवर जे काही दाखवलं जातंय ते त्रिकाल बाधित सत्य आहे अश्या मानसिकतेत असलेल्या सामाजिक भारत देशा मध्ये खऱ्या अर्थाने न्यूज चॅनेलवर बंधने असणे अत्यंत आवश्यक आहे.
मागच्या काही  वर्षांमध्ये प्रत्येक बातमीला एखाद्या विशिष्ठ जात,धर्म किंवा सांप्रदाय तथा विशिष्ट समुदयाशी जोडणे आणि आपल्या न्यूज चॅनेलचा टी आर पी वाढवणे एवढ्यापुरतेच न्यूज चॅनेल मर्यादित झाले आहेत हे प्रकर्षाने जाणवतंय. सर्रास पणे प्रत्येक विषयाला धार्मिक ,सांप्रदायिक रूप देऊन नुसत्या वायफळ गप्पा भरवणे
 इतक्या पुरतेच न्यूज चॅनेल मर्यादित नाहीयेत .

समाज मनातील वेगवेगळ्या समस्या,अडचणी व प्रश्न आपल्या न्यूज चॅनेल च्या माध्यमातून समोर आणून त्यावर कार्य करण्यासाठी प्रशासनास व सरकारला भाग पाडणे ,वंचित पीडित व शोषित समुदायाचा आवाज बनून त्यांना न्याय मिळवून देणे हा आपला खरा धर्म,कर्तव्य दायित्व तथा जबाबदारी आहे हे न्यूज चॅनेल चे तथाकथित भामटे मालक व सुटबुटात वावरणारे खोटरड्या अफवा व बातम्या सांगणारे खऱ्या अर्थाने गुन्हेगारीस पाठीशी घालून भ्रष्टाचारास बढावा  देणारे सुशिक्षित भ्रष्ट कर्मचारी विसरून गेले आहेत म्हणून त्यांना याची वेळोवेळी जाणीव करून देण्यासाठी कायद्याच्या
बेड्या घालून लगाम घालणे गरजेचे नव्हे तर महत्वाचे आहे.
____________________________________________

सौदागर काळे,पंढरपूर.

आपल्याला जशाच्या तश्या गोष्टी स्वीकारण्यास मजा नसते.काहीही करून तेल-मीठ लावलेल्या गोष्टी बघायला,ऐकायला आवडतात.मग त्यात भर टाकून पुढे पाठवल्याशिवाय आपला आत्मा तृप्त होत नाही. प्रसंग,वेळ कोणतीही असो.तशी आपल्याला सवय झाली किंवा करवून घेतली आहे.याला जुना साथीचा रोग म्हटलं तर चुकीचे वाटणार नाही.

खाजगी चॅनेल सुरू होण्यापूर्वीचा काळ आणि सुरू झाल्यानंतरचा काळ आपण जरा एकांतात बसून आठवून पहा.मग कळेल नेमकं लगाम कुणाला लावणं गरजेचे आहे?

मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राचा नियम. आपल्याला खाणं चवीचं लागतं तिथं न्यूज कशा अपवाद राहतील!तशा न्यूज पुरवण्याचे काम खाजगी चॅनेल करत असतात.आपल्याला अशा न्यूज बघायला आवडतात.ते दाखवत राहतात.आता हा पण थोडासा भूतकाळ झाला.आताच्या अवस्थेत न्यूज आपल्यावर लादल्या जात आहेत.आपल्या चवीचा ,मागणीचा विचार न करता."जनता मालक असते" फक्त मतदानादिवशी.आता त्या मतदान प्रक्रियेवरही संशय आहे.म्हणजे मालकाला गंडवले जात आहे.पध्दतशीरपणे.हा वेगळा मुद्दा असला तरी सध्या जनता मालक ना नोकर.भिकारी झाली आहे!जे झोळीत पडेल ते लाचार बनून स्वीकारायचे.अन अशावेळी आपण एकमेकांना विचारत आहोत....लगाम उगरायचा का? त्यासाठी अगोदर मालक बनायला हवं ना...मालक होणं  जमत नसेल तर...आपल्या सरकारच्या न्यूज वाहिन्या बघत चला...तिथेही मनासारख्या न्यूज नाही आल्या तर टीव्ही बंद करून टाका.जास्त डोकं आउट झालं तर विकून-फोडून टाका.पण लगाम आपल्या हातात राहिला नाही.हे सत्य स्वीकारा.

दुसरं म्हणजे पत्रकारांनाही पोट आहे.ते आपल्याने भरणं होत नाही.मग उपाशी राहण्यापेक्षा त्यांनी चाकरी केली तर काय वाईट !
______________________________________________

संगीता देशमुख,वसमत.

         फारपूर्वीचा काळ नाही परंतु आपल्याच पिढीने पाहिलेला तो काळ! आपण किशोरवयीन होतो. तेव्हा फक्त दिल्ली दूरदर्शन आणि सह्याद्री दूरदर्शन अशा दोनच वाहिन्या होत्या. त्यातही आपल्याला चॉइस नव्हता. त्यामुळे दोन्ही वाहिन्यांवरच्या बातम्या पहायला मिळायच्या. आजच्या न्यूजचॅनलच्या बातम्या पहाताना मला त्या दिवसाची आवर्जून आणि सातत्याने आठवण होते. किती संयतपणे,धीराने बातम्यांचे निवेदन होते! निवेदक कोणत्याही बातमीचा "इव्हेंट" न करता त्याचा फक्त वृतांत  आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम ते करायचे. ती बातमी राजकीय वादळाची असो अथवा नैसर्गिक वादळाची,त्याचे फक्त वृतांतकथन व्हायचे. तज्ञांच्या चर्चा मसलती शांतपणे व्हायच्या. मग आपण प्रेक्षक त्यावर आपली भूमिका बनवायचे.  आज मात्र बातम्यांच्या वाहिन्यांचा सुळसुळाट झाला. स्पर्धा वाढली. आपला टीआरपी वाढून घेण्यासाठी बातम्यांचे निवेदक(?) मात्र अत्यंत कर्कशपणाने,अतिअविर्भावात साभिनय व्यक्त होताना दिसतात.  बातम्या निवेदन करताहेत की ते आपल्यावर लादताहेत,हेच क्षणभर आपण विसरतो. प्रेक्षकांनी भूमिका बनविण्यापूर्वीच ते स्वतःला जे योग्य वाटेल तसेच  ठासून मांडतात. पर्यायाने यातून प्रेक्षकांची दिशाभूलच होते. वादविवादमध्ये तर हे निवेदक इतके मध्ये मध्ये हस्तक्षेप करतात की,वक्त्याचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याऐवजी त्यांचाच आवाज जास्त होतो. त्याचप्रमाणे यातही त्यांचीच मनमानी चालते. ज्या बाबींवर फोकस व्हायला हव्या त्या बातम्या दूरच रहातात. अनेकदा ज्या बाबींची गुप्तता पाळायला हवी असते,ती गुप्तता राखली जात नाही. त्यामुळे खरच या वृत्तवाहिन्यांवर कोणाचा लगाम असायलाच हवा. नाहीतर हे लोक  यांच्या आततायीपणामुळे येणाऱ्या पिढ्यांची दिशाभूल करू शकतात. किंवा शत्रूराष्ट्राला आयते कुरण मिळवून देऊ शकतात.
______________________________________________
टीप-( सर्व छायचित्रे गुगल इंटरनेट वरून घेतलेली आहेत)

पावसाळ्यातील ती आणि तो….

पावसाळ्यातील ती आणि तो….

राजश्री ठाकूर,मुंबई.
ती तशी बहुगुणी वगैरे ,ऋतूंचा वगैरे विचार न करता जमेल तशी कामात गर्क , तो मात्र काहीसा छंदी , स्वप्नाळू आभाळ पाहून काम करणारा ..
तिला रिमझिम पावसात चालत जाण प्रिय तर तो बाइक वर स्वार होऊन हवा भरून पसार  ..
भिजून अवगुंठून ती कोपऱ्यात उभी,
तर तो निडर उभा ठाकलेला ..
सवयीची म्हणून तिची बडदास्त नाहीच , त्याचा मात्र खास म्हणून थाट ..
परिटघडी चे जिणे मात्र दोहोंच्या नशिबी नाही . इतक्या गर्दीत त्यांचे सोबत असणे हरवून जाई ..
एका छताखाली असूनही सहवास असा नाहीच ..
ती छत्री तो रेनकोट जोडी जमतच नाही ..

प्रतिक्षा बुध्दे,गडचिरोली.
खुप दिवस झालेत, अगदी त्याच्या वाटेला डोळे लावून बसली होती ती. तो शेवटचा भेटून इतका काळ उलटला ना तरीही त्याची आठवण त्याचा ध्यास एक क्षणही तिच्या मनातुन जाईना. जवळ-जवळ एक वर्ष लोटेल ह्या गोष्टीला, तो जेव्हा तिला भेटायला आला होता ना तेव्हा हट्टाने तिने जाऊच दिलं नव्हत त्याला काही दिवस. ते 'काही' दिवस चिंब भिजत राहिली होती ती त्याच्या सहवासात.
या वेळीही त्याची किती आतुरतेने वाट पाहत होती ती. त्याच्या आठवणींत काळीजचं कोरडं पडलं होतं तिचं, मनाला जनु खोल चिरे पडले आहेत असं वाटत होतं. सगळं कसं भकास वाटु लागलं होतं...
पण शेवटी तो आलाच! केवढा तो आनंद अन् केवढा तो उत्सव!
तो येतोय हे लगेच कळलं होतं तिला. त्याने घातलेली साद दाही दिशांत घुमत राहिला. सगळी कडे गारवा जानवत होतं तिला. तिच्या आनंदाचं सुगंध दरवळत राहिला होता मळ्या-शेतात.
आता एवढ्या प्रदिर्घ प्रतीक्षेनंतर भेटले ते दोघं आणि आनंदाला सिमाच रहिली नाही त्यांच्या.
त्याचं प्रेम कोसळत राहिला तिच्यावर, अगदी तिच्या नसानसातुन ते ओसंडुन वाहु लागे पर्यंत. ती तृप्त झाली त्याच्या भेटीने आणि तो पार रीता झाला तिची आतुरता शमवुन.
ह्या वेळीही ती फुलून गेलीए, भिजून चिंब झालीए आणि अगदी टवटवीत दिसु लागलिए.
तो आहे अजुही इथेच, तिच्या भेटीला. पण फार वेळ थांबता यायचं नाही त्याला कारण तो जर आणखी जास्त थांबला.. तर..
तर पूर येईल! हो!
तो समजवेल तीला, म्हणेल " अगं राणी, माझे प्रिये धरणी... येईन ना मी परत पुढच्या वर्षी."
मग ती रागवेल त्याला, "अरे खोडकर पावसा, वाट पाहावी लागेल मला परत तुझी रे अन् हेच होतं सहसा".


यशवंती होनमाने,मोहोळ.
  आज मात्र हद्दच झाली , तिच्या संयमाचा अंत झाला होता .तो नेहमीच असं करायचा आत्ता लगेच येतो म्हणायचा आणि तिकडेच .ही बिचारी बापडी तो येणार , फिरायला जायला मिळणार म्हणून नटून बसायची .अहो करणार काय शेवटी नवपरिणीता वधू बावरी ती .तो रोजच हुलकावणी द्यायचा .तीही बिचारी कंटाळून गेली होती .असाच रोजचा आला दिवस जात राहिला .श्रावणाची सुरवात झाली .....आणि ......
     माहेरून बोलावणं आलं श्रावण आहे सणाला पाठवा ....मुराळी आला आणि तिला घेऊन गेला माहेरी .मग काय सासरी बावरलेली नववधू माहेरी आल्यावर हास्याचे कारंजे उडवू लागली , मन पाखरू पाखरू गाऊ लागली .....
     आत्ता त्याची मात्र पंचायत झाली .तिची सतत आठवण येऊ लागली .मग याने ठरवले अगदी फिल्मी स्टाइल ने सरप्राईज द्यायचे ठरवले .call केला मेहुणीला आणि सांगितल मी येतोय ते सांगू नको तूझ्या ताईला .तो  पोहोचला तिच्या घरी .ती न्हवती घरात , ती होती घरच्या टेरेस वर हातात कॉफी घेऊन पावसात उभी राहून गाणं म्हणत होती ' हाय हाय ये मजबूरी , ये मौसम और ये दूरी , तेरी दो टकिये की नौकरी , , , , , , ' तो तिला बघतच राहिला .......पिच colour ची साडी आणि त्यावर golden colour चा slivless ब्लॉउज , मोकळे केस , , , , अप्रतिम रूप पाहून हा दंग झाला .त्यानं तिला पाहिल पडत्या पाऊसात .....आणि तिच्या समोर गेला आणि गाऊ लागला ' भीगी भीगी रातो में , भीगी बरसातो में कैसा लगता हैं ' ? ? ?
      त्याने त्या दिवशी जे अनुभवल तेच तो अजूनही अनुभवतोय .....म्हणूनच त्याला पावसातली ' ती ' आणि तिला ' तो ' खूपच आवडायला लागले .....आत्ता ते दोघं गुणगुणत असतात ' टीप टीप बरसा पानी  , पानी ने आग लगा दि , आग लगी जो दिल में दिल को तेरी याद आयी ....

शिरीष उमरे,मुंबई.
पावसाच्या सरींमधे मनसोक्त वेड्यागत आसमंतात नाचणारा तो !! आपल्या काळ्याशार  शरिराला ओलेगच्च करुन दिवसभर तसाच रानोरान भटकणारा तो !!

बरसणाऱ्या पावसाच्या थेंबांनी उमलणारी ती !! आपल्या गुलाबी कांतीवर थेंबांना मोती बनवणारी ती !!

सायंकाळच्या मदमस्त वेळेतही धुडगुस घालणारा तो !! सांजवेळी त्याची वाट बघनाऱी ती !!

अलगद तीच्या मिठीत शिरुन विसावलेला तो !! त्याला मखमली अलिंगनात कैद करणारी ती !!

रात्रभराचा त्याच सहवास आणि पहाटे सैल झालेली तीची मिठी..

परत आकाशी भरारी घेणारा पाउसवेडा तो भुंगा
आणि
लाजेने गुलाबी झालेली ती कमळपुष्पाची पाकळी !!

जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे...



शिरीष उमरे, मुंबई

विषयार्थ हा की एखाद्याबद्दल जाणुन घ्यायचे असेल तर त्याच्या भुमिकेत खोल शिरल्याशिवाय कळणार नाही त्याच्याबद्दल....

जसे की डॉक्टर ! बऱ्याच लोकांना वाटते की हे नुसते बसुन, ऐकुन व तपासुन चार ओळी कागदावर खरडुन लाखो रुपये कमावतात. पण त्यांनी आयुष्यात डॉक्टर बनण्यासाठी घेतलेली मेहनत, जवळपास सात आठ वर्षे डीग्री मिळवण्यासाठी केलेला अभ्यास व त्यानंतरही स्वत:ला नविन संशोधनामधुन शिकत राहण्याची लावलेली सवय, २४ तास ड्युटी करण्याची मानसिक व शारिरीक ताकत बघता काही हजार कमवणारे डॉक्टर जास्त आहेत. फारच थोडे वाममार्गाने लाखो कमावणारे असतात...

तीच गोष्ट लागु पडते आपल्या शिक्षकांना, बॉर्डरवरच्या सैनिकांना, शेतात राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांना व घरात काम करणाऱ्या गृहीणींना. त्यांच्याएवढे सचोटीने काम करणे म्हणजे अवघड असते हे जोपर्यंत आपण स्वत: ते अनुभवत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही.

बरेचदा हा गैरसमज व्यापारी वर्गाबद्दल व शासकीय कर्मचाऱ्यांबद्दल आणि खाजगी जॉब करणाऱ्या लोकांबद्दल ही असतो. प्रत्येकाला दुसऱ्याचे काम सोपे वाटते. काही फायदे पण त्यासोबत काही नुकसान हे प्रत्येक कामात असते. ह्याची जाणीव तोपर्यंत होत नाही जोपर्यंत ते काम आपण स्वत: करत नाही.

प्रत्येकाला दुसऱ्याचे आयुष्य छान, हीरवेगार, विना समस्याचे व आनंदी वाटते... प्रत्यक्षात असे नसते... समस्या सगळ्यांनाच असतात.. बहुतांश त्यातुन जगण्याचा मार्ग शोधतात... काही थोडे च असतात ज्यांना कायम दुसऱ्याबद्दल असुया, हेवा, मत्सर वाटत राहतो...

ह्यातुन एक नक्की शिकण्यासारखे आहे की एखाद्याबद्दल मत ठरवण्या अगोदर हा विचार करावा की मी त्याच्या जागी असतो तर काय केले असते !!

आपल्यातला चांगला माणुस जिवंत ठेवणे हे आपल्या हातात आहे. आपल्यातला वाइट माणसाला वेसण घालण्याचे काम ही आपलेच आहे.

ह्यातुन नक्कीच एकमेकांबद्दल चा आदर वाढेल. गैरसमज दुर होतील. समोपचाराची भावना वाढेल. हीसकावण्याची इच्छा मरुन वाटण्याची इच्छा वाढेल...  शेवटी हीच आपली खरी संस्कृती नाही का ?
____________________________

        मनोज वडे , पंढरपूर.

        ‎हा विषयच काही जणांना समजण्यास जड गेला असेल तसाच मला ही गेला होता.परंतु माझ्याच साथीदाराने हा खूप छान स्पष्ट केला. तरी ही ह्यात माझं व्यक्त करताना काही चुकत असेल तर आपण व्यक्त होऊन मला स्पष्ट सांगितले तरीही आवडेल .
        ‎कस आहे .आता बगा आपण एकाद्या office मध्ये गेलो तर आपल्याला तीत थोडा जरी जास्त वेळ जास्त गेला तरी आपण लगेच त्याला म्हणतो .काय राव इतका वेळ का कामाला? परंतु त्याच व्यक्तीला माहिती असत की, त्या कामाला किती वेळ लागणार आहे  .म्हणजेच जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.बघा एकदा गाडी वरून पडला तर आपण म्हणतो काय सहज पडला होता की, एवढं का आकड ला आहेस.पण जो पडला आहे .त्यालाच त्याच दुखणं कळू शकते ना म्हणजे कोणताही व्यक्ती आपल्याकडे  पाहून कधीच  बोलत नाही परंतु इतरांचं म्हटलं की , लागलीच हाताच्या भाया वर करून बोलतो .तर तो कधीही म्हणतो त्याचं चांगले चालले असेल  परंतु त्यालाच माहीत असत.आपण ह्यात किती समाधानी आहोत. ह्या म्हणी प्रमाणे जावे त्याचा वंशा तेव्हा कळे ,त्याच व्यक्तीला माहिती असत आपल्या क्षेत्रात किती अ, ब,क,ड आहे ते .म्हणून जो तो आपल्याप्रमाणे करत असलेले काम हे योग्यच असत .पण काय हे असंच करतो तसच करतो .त्यामुळे आपण जर त्यात नसेल तर आपल्याला त्या गोष्टींचे काय कळणार? पण कळायचे असेल तर जावे त्याच्या वंशा कळेल त्यात काय राम आहे आणि काय लक्षीमन हे नक्की .
____________________________

   निखिल खोडे, पनवेल

एक दिवस काढा राजस्थान सीमेवर तळपत्या उन्हात कींवा लडाखच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत... हातात रायफल घेवुन

एक दिवस काढा नांगरण, वखरण पेरणीसाठी शेतकऱ्यासोबत ... हातात कासरे घेवुन...

‘रक्ताचे पाणी अन् घामाची माती’ करून पिकवलेले रस्त्यावर ओतून तुमच्या नावाने ‘शिमगा’ करताना त्या कष्टकऱ्याच्या मनाला होणाऱ्या वेदनांनी काळीज चिरत गेलं पाहिजे तुमचे. वातानुकूलित वातावरणात बसल्यानंतर त्याच्या व्यथा, वेदनांचा विसर पडत असेल तर तुमचा ‘पाषाण’ झाला समजावे का?

सोपे आहे एसी मधे बसुन सल्ले देणे व दर महीन्याला पगार उचलणे...
जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे !!
____________________________

लग्न पहावे करून.


अनिल गोडबोले
सोलापूर

लग्न ही गोष्ट एकाच वेळी गंभीर आणि गमतीदार झालेली आहे.  हल्ली टी. व्ही. वर देखील वेगवेगळे चॅनल वाले लग्न लावून देण्यात पुढाकार घेताना दिसतात.

पूर्वी लग्न ठरवताना पत्रीला, वंश, जात, गोत्र, कुंडली आणि गुण जुळवायचे. हे सर्व पाहत असताना घराणे, खानदान, हुंडा, मानपान हे सर्व मुलीच्या वडिलांकडून करून घेणाऱ्याला प्राधान्य दिले जायचे.

आता नवीन जमान्यात कदाचित चित्र बदलले असेल. मुलगा आणि मुलगी आपला जोडीदार शोधत असतील अस जर वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. आता फक्त पद्धत बदलली आहे. आता टेक्नॉलॉजी चा वापर होत आहे. पण पत्रिका... पासून कुंडली जुळवण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो एवढंच..

वधू- वर सूचक मंडळ हा अतिशय विनोदी कार्यक्रम आहे. मी एकदा एका मंडळाचे पुस्तक वाचले...मला फार हसू आले. "मुलीला गाता आलं पाहिजे, मुलाला तबला वाजवता आला पाहिजे." हे एकवेळ मान्य असेल पण "मुलगी फेसबुक वापरते... मुलीला माणसांची आवड आहे (मग बाकीच्यांना जनावरांची असते का?...  असो)" अशी विधान वाचली आणि हसावं की रडावं ते कळेना.

पुण्यात नोकरीला मुलगा पाहिजे, शक्यतो सरकारी नोकरी पाहिजे, स्वतःच घर पाहिजे, आई वडील सोबत येणार का?,.... असे प्रश्न मुली कडून येत असतात. मुलांकडून तर विचारू नका. "गोरी (हल्ली उजळ रंगाची अस म्हणतात) व अनुरूप वधू पाहिजे." अनुरूप... म्हणजे कशी? याची व्याख्या कोणाकडे असेल तत सांगावी.

मॅट्रिमोनियल साईट वर आता लग्न ठरवतात. या साईटवर देखील आपल्या गोत्राचा, जातीचा, अनुरूप जोडीदार शोधता येतो. काही ठिकाणी तर ओळखपत्र पण दाखवले जातात.. असा सगळा लग्न जुळवण्याचा फंडा आहे.

मूळ मुद्धा असा आहे की, लग्न कशासाठी करायचे? या बद्दलची उद्दिष्टे लग्न करणार्या जोडीदारांना आणि घरच्यांना कळली आहेत का... असा प्रश्न पडला आहे. "चांगल्या घराण्यातील मुलगा-मुलगी" हे देखील मला तरी कोड उलगडलं नाही. मग वाईट घराण्यातील मुलं- मुली कसे असतात?.. त्यांचं लग्न कस होत असेल..?

अपेक्षा आणि त्या प्रमाणे जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. पण कधी कधी अपेक्षा अवास्तव होत आहेत का? या बद्दल विचार करायला पाहिजे.

पैसा, पद, प्रतिष्ठा बघून व्यवहार केला जातो परंतु लग्न करण्यासाठी दोघांना मनाने आणि विचाराने एकत्र येणे गरजेचे आहे, त्याचे गुण मिलन नक्की कसे होत असेल?.. पत्रिका आणि कुंडली सारख्या छदम विज्ञानाच्या मागे न  लागता वैद्यकीय सल्ला व चाचण्या करून घेण्याचे प्रमाण किती आहे?... हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे..

एकीकडे लग्नाची वय वाढत आहेत, अपेक्षा वाढत आहेत... आणि मग योग्य वय निघून गेल्यावर मिळेल त्या जोडीदार बरोबर आयुष्य काढावे लागते किंवा मग लग्नच होत नाहीत तेव्हा मग प्रचंड तणाव येतो.

लग्न व्यवस्था कोलमडते आहे आणि त्याचा तोटा कुटुंब व्यवस्थेवर होता आहे.. त्यामुळे यावर विचार करणे फार गरजेचे आहे. 'मागणी आणि पुरवठा' या तत्वावर लग्न केली जात आहेत.. खर तर काही ठिकाणी लग्न न करता "लिव्ह इन रिलेशन" राहण्याचा निर्णय घेतला जातो.. तो देखील चांगला आहे, पण त्याला समजूतदार पणा आणि जबाबदारीची जाणीव असणे गरजेचे आहे...

शेवटी, मग प्रेम विवाह, आंतरजातीय विवाह, स्वतःचा जोडीदार स्वतः निवडणे, विचारांनी योग्य निर्णय घेणे व ते कुटुंबातील मोठया व्यक्तींना मान्य असेल का?..असे बरेच प्रश्न उभे राहत आहेत.

लग्न पहावे करून... व घर पाहावे बांधून अशी एक म्हण आहे... कारण दोन्ही ठिकाणी आपण काय निर्णय घेतो हे महत्त्वाचे आहे..
______________________________________________

शिरीष उमरे, मुंबई

हींदीत एक म्हण आहे की " शादी का लड्डु खाये तो पछताये और ना खाये तो भी पछताये " ह्यातल्या खतरनाक विनोदामुळे तरुणाई अजुनच संशयी व भयभीत असते लग्न म्हटले की...

त्यामुळे जगातील सगळ्यात जास्त तरुण असलेल्या देशात म्हणजे आपल्या देशात युवांनी एक मध्यममार्ग शोधुन काढलाय... सहजिवनाचा !! लीव इन रिलेशनशिप !!

ह्यात सध्यातरी जरुरी तेवढे शिक्षण संपवुन कुठेतरी काम करुन पैसे कमावणारे तरुण जास्त आहेत. आपल्या वरिष्ठांकडुन लग्नाबद्दल चांगले वाइट अनुभव व विचार ऐकुन पहीलेच धास्तावुन गेलेले असतात. त्यातच घरच्यांचा लग्नासाठी रेटा सुरु झालेला असतो तर काही ठीकाणी घरचे हात धुवुन मागे लागलेले असतात... खास करुन मुलींच्या घरचे !!

अश्या वेळेला विष कींवा अमृत पिण्यापेक्षा त्याची चव घेउन त्यातल्या त्यात कमी विषारी व उत्तमातले उत्तम अमृत निवडता येइल असा सोइस्कर  व व्यावसायिक विचार करुन सहजिवनाचा मध्यममार्ग तरुणांना पसंद पडतोय.

एकंदरीत गाजराची पुंगी वाजली तर वाजली कींवा मोडुन खाल्ली...  आयुष्यभराचा तुरुंग नको... नंतर काडीमोडाचा भुकंप नको... असा विचार ह्यामागे असावा.

पुर्वी आईवडीलांच्या पसंतीने व नातेवाइकांनी सुचवलेले स्थळ व त्यातुन लग्नबंधनाचा सोहळा शक्यतो विकोपास जात नसे.

 आता व्यक्तीस्वातंत्र, प्रेम, आर्थिक स्वातंत्र, करिअर ओरियंटेड जीवनशैली, साथिदाराकडुन वाढलेल्या अपेक्षा वैगेरे वैगेरे मुळे तीशीपर्यंत लग्नाच्या बेडीत अडकण्याची कोणाचीच तयारी नाही... कारण लग्न म्हणजे जबाबदारी !! लग्नानंतरच्या सुमधुर तीन वर्षानंतर येणाऱ्या संभाव्य पालकत्वाची जाणीव ह्याची पुर्वकल्पना असल्याने सध्या तरुणाई " जी लो अपनी जिंदगी" ह्या ब्रीदवाक्याला अनुसरुन  जगतेय...

तसे योग्य च आहे कारण लग्न केल्यानंतर एकदुसऱ्यासाठी करावा लागणारा त्याग व त्यानंतर  आयुष्याच्या बागेत रोपटे लावुन त्याला जगवणे व वाढवणे ह्याची अनुभती व असे स्वर्गीय जगण्यासाठी मानसिकरित्या टफ व अथक शारिरीक मेहनतीला तयार होण्याशिवाय पर्याय नाही..

  आपली कुटुंबव्यवस्था ही आपल्या संस्कृतीची जगाला दिलेली खुप मोठी गिफ्ट आहे...
म्हणुन उशिरा का होइना... " लग्न नक्कीच पहावे करुन!! "
____________________________________________

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.

आयुष्यात आपल्या कोणीतरी असावं,
जेव्हा आली आठवण नजरेसमोर दिसावं,
मनात आले असता हळूच पाहावे दुरून,
म्हणून तर म्हणतात लग्न पाहावे करून।

कोण असते कोणासोबत आयुष्यभरासाठी,
त्यासाठी तर जुळवून आणल्या जातात सोनेरी रेशीमगाठी,
अशा क्षणी तर येतात सर्व नाती गोती मिळून,
म्हणून तर म्हणतात लग्न पाहावे करून।

जेव्हा येतो मनामध्ये लग्नाचा पहिला विचार,
सुरू होतो तेव्हा पत्रिका जुळवण्याचा प्रचार,
बरीच जुळतात नाती, दुरच्याही अंतरावरून,
म्हणून तर म्हणतात लग्न पाहावे करून।

मानामनामध्ये उमटू लागतात आनंदाचे भाव,
कोणी कोणी म्हणतो देवा एकदा तरी पाव,
सहवास हवाहवासा वाटतो जेव्हा कळवळून,
तेव्हाच तर वाटते लग्न पाहावे करून।
___________________________________________

पवन खरात,अंबाजोगाई.

बापानं पै पै जमवून जणू
लेकी साठीच सार कमवलं होत ।
लग्नात लेकीच्या,काळजा सोबत,
बापानं सार सुखं ही गमवलं होत ।
_____________________________________________
टीप (सर्व छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत)

भाकरीच्या शोधात फिरणारे आयुष्य...



शिरीष उमरे, मुंबई

१३५ कोटी लोकांचा देश आपला... आर्थिक अभ्यासकार सांगतात की देशाची ५०% पेक्षा जास्त संपत्ती फक्त १% लोकांकडे आहेे.  देशाच्या एकुण मालमत्तेपैकी ७७% मालमत्ता फक्त १०% लोकांच्या ताब्यात आहे. बाकीचे ९०% लोकांचे काय अस्तित्व ?

कोण असतील हे १% लोक ? आणि कोण आहेत हे १०% लोक ? १% लोक आपल्यासमोर कधीच येणार नाहीत... एक करोड ची ही आबादी माझ्या मते व्हाइट कॉलर कार्पोरेट गुंतवणुकदार असतील... ह्यातले काही चांगले सुध्दा असु शकतात.

 पण बहुतांश वाइट धन्याडांना सपोर्ट करणारी ही १०% वाली बारा करोड ची विषारी पिलावळ माणुसकी साठी धोकादायक असते... उरलेल्या ९०% लोकांना कायम गुलामगिरीत ठेवण्यासाठी ह्यांचा सक्रीय सहभाग असतो...
ह्यात भ्रष्टाचारी राजकारणी, धार्मिक नेते, सरकारी नोकरशाही,  कंत्राटदार, दलाल, मिडीया, शिक्षणसम्राट, डॉक्टर, सीए, सीएस, वकील, जज, कारखाणदार, बिल्डर्स, माइन ऑपरेटर, गुन्हेगारी क्षेत्रातले दादा व मोठा व्यापारी वर्ग हे सगळे सामील असतात...

सगळे स्वार्थापायी कायम एकमेकांच्या जिवावर उठलेले असतात तरीही संघटीत असतात...यांचा वरती पण रिमोट कंट्रोल असतो...

ह्यात पिसले जातात गरीब, असंघटीत, अशिक्षीत, अंधश्रध्दाळु व कमकुवत ९०% लोक...

ह्यातील बऱ्याच जणांचे अख्खे आयुष्य दोन वेळच्या जेवणाची सोय करता करता मोलमजुरीत निघुन जाते...
काहीजण काळ्या मातीतुन धान्य पिकवण्याच्या फीकरीत स्वत:चा जीव पणाला लावतात...
काहीजणांचे जीवन दुसऱ्यांसाठी नोकऱ्या करता करता मुलांच्या शिक्षणासाठी व घराच्या कर्जाचे हप्ते फेडण्यात संपुन जाते..

जे प्रतिकार करतात ते एकतरी नक्षलवादी, आतंकवादी बनतात व संपवल्या जातात कींवा कालांतराने सामदामदंडभेद च्या  माराखाली झुकुन वरच्या भ्रष्टाचारी लोकांच्या हातातले बाहुले बनुन आपल्याच लोकांवर अन्याय करतात...

भाकरीसाठी वणवण फीरणाऱ्या लोकांना अस्तित्व च नसते... ह्याला कारणीभुत भुकेची जाणीव नसणारा, निष्क्रीय, षंढ, कणा नसलेला, लाचार ८० करोड लोकांचा मध्यम वर्गीय समाज....
___________________________________________


सीमाली भाटकर ( गंधेरे )  रत्नागिरी

नमस्कार मंडळी विचार च्या व्यासपीठावर आज प्रथमच विषय आलाय भाकरीच्या शोधात फिरणारे आयुष्य. काय वाटत तुम्हाला या विषयी असा प्रश्न विचारला तर वाईट वाटू नये. कारण फक्त गरीबी भाकरीच्या शोधात आहे असं नाही आहे. सुशिक्षित तरुण देखील स्वतःच पोट भरण्यासाठी नोकरीच्या मागे धावत आहे. कुणी व्यवसायासाठी झगडत आहे तर कुणी तो टिकवण्यासाठी.
          अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत हे आपण पहिली पासून शिकलो पण त्याचा अर्थ कळला तो पदवीधर झाल्यानंतर, ही झाली सुशिक्षित माणसांची गाथा. आज मला सांगायचे आहे ते जगातल्या सर्व स्तरातील माणसाविषयी भारत शेतीप्रधान देश आहे पण इथला शेतकरी अजूनही भुकेलाच आहे. आपण ऑफिस मध्ये, देवळात जातो आपल्याला खुप सारे भिकारी दिसतात. खूप लहान मुले देखील असतात. ज्या वयात त्यांनी पुस्तक हाती घ्यायची त्या वयात ती मंदिरा बाहेर किंवा सिग्नल समोर उभी दिसतात. फक्त एक वेळच्या जेवणासाठी. त्यात फायदा कुणा तिसऱ्याचाच असतो. भीक मागणे हा काही लोकांच्यासाठी व्यवसाय बनतो आहे, पण आवाज मात्र कुणीही उठवू शकत नाही. कारण डोळ्यांना आणि मनाला वाटत अरेरे ही किती गरिबीतून आलीत. प्रत्यक्ष दर्शी परिस्थिती तीच असते पण त्या पलीकडकाहीतरी वेेगळ घडत असते ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. आणि मग आपण चार चाकी गाडीतून फिरणारे मात्र त्यांना चिल्लर काढून देऊन बाजूला होतो. पण कधी आपण त्यांच्या शिक्षणाचा विचार केलाय.... नाही?
           फटाक्यांच्या कंपनी मध्ये काम करणारी झोपडपट्टीतील मुलं अचानक एका स्फोटात भस्मसात होतात कशासाठी दोन वेळच्या जेवणासाठी. पण कमी पैशात कामगार नाहीत, आणि एखाद्याच्या गरजेचा फायदा कसा करून घ्यायचा हे आमच्या व्यापारी वर्गाला जमलेलं उत्तम गणित आहे. कारण ती लहान मुले त्यांचे आई बाप भांडायला कधीच येणार नसतात किंवा त्यांचा विमा मागणारे कुणी नसतात आणि असले तरी ते व्यापारीच खातात ही आहे लोकशाही प्रधान भारतातील भाकरीच्या शोधात फिरणाऱ्यांची अवस्था.
            आज प्रत्येक शहरात एकतरी अनाथ आश्रम आहे वृद्धाश्रम आहेत. ह्यांचा खर्च कसा चालतो कुणी पाहिलंय का कधी? सरकारी अनुदान कमी पडतंय पण आजची पिढी मात्र नको असलेले उद्योग करून अनाथ आश्रम भरायचे बंद करणार नाहीत. मला एक प्रश्न करावासा वाटतो त्या माणसांना ज्यांनी अनैतिक संबंधातून निर्माण झालेल मुलं अनाथ आश्रमात नेऊन टाकलंय, रस्त्यावर फेकलय कधीतरी तुमच्या मनात हा विचार येतो का तो कोवळा जीव काय खात असेल? तुम्ही हॉटेलात घरात पार्टी करून सण समारंभ साजरे करतात छान छान खाता तंदुरुस्त राहता. पण ज्या नरकात आपण आपलं छोटस अस्तित्व टाकून दिलंय ते काय करत असेल काय खात असेल? ते भले कुठेही असो पण एक माणूस म्हणून कधी वाटत का तुम्हाला जाऊन तिथल्या मुलांसोबत खेळावं त्यांना खाऊ पिऊ द्यावं. तुम्ही गुन्हेगार आहात त्या बाळाचे असा जराही लवलेश नसतो बरं या माणसांमध्ये.
             या देशातील प्रत्येक माणसाने माणूस म्हणून त्यांना थोडी जरी मदत केली ना तर दसरा दिवाळी ईद ख्रिसमस सारखे सण प्रत्येक अनाथ मुलं आनंदाने साजरे करेल. आणि हो फक्त अन्न नाही त्यांचे शिक्षण ही झाले पाहिजे ज्यातून ते स्वावलंबी बनतील. आयुष्यात अस एकदा नक्की करून पाहा कारण यातून मिळणार समाधान आणि आनंद तुम्हाला एक नवीन दिशा देईल जे तुम्हाला जगायला शिकवेल.
           आपण माणसं प्रचंड डिगऱ्या घेतो पण आजची परिस्थिती पाहता नोकरी मिळवणे देखील खूपच कठीण होऊन बसलय. स्टार प्रवाह ने एक सुंदर मालिका दिली मोलकरीण बाई खरंच खूप अभिमान वाटतो त्या कष्टाळू माऊलीचा ज्यांना पोटासाठी स्वतःच्या घरात आणि इतरत्र राबावं लागत तरी त्या थकत नाही. पोटासाठी कष्ट करावे पण बेईमानी नको असा सल्ला यांच्या कडूनच मिळतो कारण पैशाच्या हव्यासापोटी वाम मार्गाला जाणारी पिढी घडतेय यांना एकच सांगावस वाटत आहे तुम्हाला जगायच आणि जगवायचं असेल तर भाकरीच्या शोधात फिरणाऱ्या त्या कामवाली पहा ती तुम्हाला बळ देईल.
           तुम्ही प्रचंड शिकता नोकरी नाही म्हणून निराश होता. आजच युग स्पर्धेचं युग आहे. पण म्हणून खचून जाऊन आत्महत्या करणे हा त्यावरचा पर्याय नक्कीच नाही. भाकरीच्या शोधात आयुष्य सावरू शकत पण निराशेने संपवलं तर शोधाची प्रक्रियाच संपुष्टात येते आणि जिथे शोध आणि संशोधन संपत तिथे नवीन काहीच उमलत नाही. गरज ही शोधाची जननी आहे हे नेहमी लक्षात असू द्या.
           वाईट वाटून घेऊ नका पण मतिमंद असणाऱ्या त्या बाळाकडे पहा परमेश्वराने त्यात काहीतरी दिलेलं असत. त्यांच्या कलाकृती इतक्या अप्रतिम असतात. की त्यांना ते जगवतात. तुम्ही म्हणाल आम्हाला कोणतीच कला अवगत नाही पण प्रत्येकाने स्वतःमध्ये काहीतरी शोधा जे पोटापूरत का होईना तुम्हाला जगवेल. महागाई वाढली झोपडपट्टी तिथल्या लोकांचे अन्नवाचून होणारे हाल पाहिले. उपासमारीत राहणारा शेतकरी पाहिला की कीव येते आणि चीड येते या लोकशाही प्रधान भारताची हाच आहे का 2020 मधील अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला भारत, कदाचित नाही?
             भाकरीच्या शोधात फिरणारे आयुष्य खूप कठीण आहे पण आपण ठरवलं तर ते सोपं नक्की होईल. सिग्नल च्या कडेला पावसात भिजणाऱ्या मुलाला छत्री सोबत एक पुस्तक आणि चपाती भाजी देऊन पहा. 50 मधले 5 विद्यार्थी नक्की असतील. उभं राहून पैसे मिळत नाहीत तर ते कसे कष्टाने मिळतात याच ज्ञान त्यांना दिल पाहिजे. मंदिरांना श्रीमंत करून महाप्रसाद वाटण्यापेक्षा एका अनाथ आश्रमाला ते अन्नदान करा जास्तीच पुण्य पदरात पडेल.
         आज भाकरीच्या शोधात सगळेच फिरतात फरक इतकाच आहे. जे चार वेळा खातात ते लोकांना लुबाडून सुद्धा खातात आणि एकवेळ ची भ्रांत असणारा चार वेळा कष्ट करून इमानदारीने एकवेळ खातात..... यालाच म्हणतात आयुष्य...... गरिबीत देखील इमानदारीने जगणार.
        धन्यवाद।
___________________________________________


पवन खरात,अंबाजोगाई.

पोटाची खळगी भरण्यासाठी,
आयुष्याशी संघर्ष करत होतो ।
जगण्याची काय उमेद बाकी,
जिथं मी रोजच मरत होतो ।

स्वप्नांची ही हिम्मत नाही,
भाकरी पलीकडे जाण्याची ।
पैशा पुढे किंमत नाही,
माणुसकी सुद्धा पाहण्याची ।

भाकरीच्या शोधत हे सार,
आयुष्य ही करपून गेलं ।
माणसाच्या काळजातल ते,
माणूसपण ही हरपून गेलं ।
____________________________________________


   निखिल खोडे, पनवेल.

जीवन हे संघर्षाचे दुसरे नाव आहे असे आपण नेहमीच म्हणतो आणि ते अगदी बरोबर पण आहे. मानवी जीवन अनेक प्रश्नांनी गुंतलेले असते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या विचारात गुंतलेला असतो. श्रीमंत माणूस त्याच्या संपत्तीत आणखी कशी वाढ होईल हा विचार करत असतो तर हातावर पोट असणारे लोकं रात्रीची भूक कशी भागेल या विचारात असतात.

भूक प्रत्येकाला असते त्यासाठी सर्वांची धडपड चालू असते. भुकेने व्याकूळ झालेले लहान मुले ट्रॅफीक सिग्नलवर, बस स्टॉप वर व रेल्वे स्टेशन वर बघायला मिळतात. हे सुकलेले, कासावीस झालेले चेहरे अनवाणी पायांनी इकडे तिकडे भुकेच्या शोधात फिरत असतात तेंव्हा असे वाटते की गरीब असणे हा जणू गुन्हाच आहे..

अनेक लहान मुलांच्या आयुष्यातील शिक्षणाचे दिवस भाकरीच्या शोधात निघून जात आहे. आपल्या मुलभूत गरजे मध्ये मोडणारा अन्न हा महत्वाचा घटक आणि त्यासाठी दररोज लाखो लोक उपाशी  कींवा अर्धपोटी उद्याच्या भाकरीच्या शोधात रात्री झोपी जातात.

ह्यासाठी शहीदांनी आपले आयुष्य उधळुन टाकले होते का स्वातंत्र्य लढ्यात ? का लाजा वाटत नाही सऱ्हास आपल्याला अन्न उष्ट टाकायला ? का आपल्या संवेदना मेलेल्या आहेत आपल्याच देशातील गरीब नागरिकांसाठी? का परत परत भ्रष्ट राजकारण्यांना निवडुन देतो आपण ? का भ्रष्टाचारी नोकरशाही सहन करतो आपण ?
कधी उत्तरे मिळतील ह्याची की की असेच मुडद्याचे जीवन जगणार आपण ....
_____________________________________________


दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.

जन्माला आलो तेव्हा लहान होतो बाळ,
किती लवकर आयुष्यातून निघून गेला तो काळ।

त्यानंतर पुढचं आयुष्य विद्यार्थी दशेत गेलं,
तेव्हाही आई-बाबांनी खुप सांभाळून नेलं।

मोठा झालो होतो आली मग स्वतःवर जबाबदारी,
काम शोधायला सुरुवात केली तेव्हा कळली बेकारी।

आयुष्य संपायला लागल जेव्हा माझं उतारवयात,
तेव्हा कळलं भाकरीच्या शोधात निघून गेली सगळी हयात।
_____________________________________________


यशवंती होनमाने .
मोहोळ.

  विषय वाचला आणि मन भूतकाळात गेल .माझी आज्जी नेहमी म्हणायची लोक पोटाची खळगी भरायला पर मुलखाला जातात अनं आपण इथंच .त्यावेळी समजत न्हवत, पण आत्ता कळतय .वडील नेव्ही मध्ये असल्याने बरीच वर्ष मुम्बई मध्ये राहीलो आणि वडील रिटायर झाले की गावाकडे आलो .माझ शिक्षण सगळ गावाकडे झाल .मी msw केल आणि नोकरीला लागले .....
        आत्ता खरी फिरती सुरू झाली होती माझी .इतभर पोट भरण्यासाठी ची वणवण .आत्ता कळत होत की भाकरीसाठी किती फिराव लागत ते .म्हणतात ना विंचवाचे बिरहाड त्याच्या पाठीवर अशी अवस्था .
        पण एक आहे या भाकरी न माणुसकी शिकवली , माणस जोडली , हक्काची घर झाली , मन मोकळ करता यावं अशी माणस मिळाली .या भाकरीच्या फिरती ने आयुष्य जगायला शिकवल .
___________________________________________

प्रशांत देवळे,बीड.

दिवसाची सुरवात, आणि शेवट भाकरीच दारावरची टकटक भाकरीसाठीच
काँलेजात मित्राची नजर डब्यावर भाकरीसाठीच ,त्याचा बदला तसाच भाकरीसाठीच
मित्राचा वाढदिवस , मोठ्या ढाब्यावर
ऑर्डर घरगुती पध्दतीची भाकरीच
प्रवासाची सोबत , सहप्रवाशास आग्रह भाकरीचाच
सणाच जेवण ,जन्माच स्वागत ,मृत्यु नंतर ही सर्वांना द्यावी भाकरीच
बाँसची चिडचीड ,सहकार्यांचा रागराग आपलीच कामासाठीची धडपड सगळं शेवटी भाकरीच
माया,प्रेम,माणुसकी,समाजसेवा सर्वांचा शेवट इतभर पोट त्यात मावणारी भाकरीच
मुलाला मार अभ्यासासाठी, कोकरानं मोठ व्हाव साहेब व्हाव, पुढच्या सुखाच्या जीवनासाठी
मुडद्या दहा वाजले घरी ये ,मायेची तळमळ
माझ्या साठी पोटात जावी भाकरी..
आता वाट आहे दहा वाजण्याची ....
__________________________________________


संगीता देश,वसमत

           " सगळं चालतं कशासाठी?" या प्रश्नाचं उत्तर येतं-"पोटासाठी"... माणसाची पहिली गरज आहे पोटाची! त्यानंतर सुरु होतात त्याच्या इतर गरजा. ह्या गरजा अवलंबून आहेत आपल्याला आर्थिक स्टेटसवर. पण हीच पोटाची गरज माणसाचं संपूर्ण आयुष्य भाकरीच्या शोधातच फिरवते.
                माणसाला ही भाकर काय करायला भाग पाडत नाही? चोरीपासून तर कितीही निम्नदर्जाचे काम याच भाकरीसाठी करावे लागते. ही भाकर कधी सन्मार्गाने मिळते तर ह्याच भाकरीसाठी वाममार्गाचाही अवलंब करावा लागतो. अनेकांच्या जीवनात खूप बदल होत जातो,त्यांच्या घरात आधीच्या  लोकांनी जरी ही भाकर फार कष्टाने मिळवली असली तरी पुढच्या पिढीला तेवढे कष्ट करावे लागत नाही. परंतु काही समाजघटक असे आहेत की,पिढ्यानपिढ्या त्यांचे संपूर्ण आयुष्य भाकरीच्या शोधापलीकडे जातच नाही. आयुष्यात पहिली आणि शेवटची गरज तीच ठरते. देशात हरितक्रांती झाली तरी काहीजणांचा अजूनही मुख्य भाकरीचाही प्रश्न मिटलेला नाही. म्हणूनच कितीही विज्ञान आणि तंत्रज्ञान आले तरी मॅनहोलमध्ये यंत्राऐवजी  अजूनही आपल्या देशात भाकरीसाठी लाचार असलेल्या माणसांनाच उतरावे लागते.  ही किती खेदाची बाब आहे!
___________________________________________


नरेश शिवलिंग बदनाळे, लातूर.

असं म्हणतात की,ह्या पृथ्वीतलावर ८४ लाख जीव आहेत.त्यापैकी कोणीही उपाशी राहत नाही आणि आणि माणसाचं पोट कधी भरतच नाही. भाकरी खूप काही दडलं आहे ह्या भाकरी मध्ये माणसाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा त्यात पहिल्या स्थानी अन्न म्हणजे भाकरी आता नव्याने काही गरजा त्यामध्ये आल्या आहेत जसे की मोबाईल. पण भाकरीची जागा कोणीच घेऊ शकत नाही  तिच्या शोधात तर राव ही आहे आणि रंक ही किती कमाल आहे ना वित भर पोट आणि त्या साठी आयुष्यभर त्या भाकरीच्या मागे फिरावं लागतं बहिणाबाई म्हणतात
अरे संसार, संसार
जसा तवा चुल्हयावर
आधी हाताला चटके
मग मिळते भाकर
ह्या भाकरी साठी काय काय नाही करावं लागत कोणी साता समुद्रापलीकडे गेलंय तिला मिळवायला तर कोणी ह्या राज्यातून त्या राज्यात, कोणी राना वनात तर कोणी मोठ्या मोठ्या शहरात.मुंबई आर्थिक राजधानी,अर्थ नगरी ,माया नगरी जिथे रोज लाखों लोक ह्या भाकरीच्या शोधात एक नवीन स्वप्न घेऊन येतात, कोणी शोधातच होरपळून जातात आणि कोणी मिळवत राहतात, पण भाकरीच्या शोधात फिरणारे तर सर्वत्र सर्वचजण आहेत तुम्ही आम्ही पण या पैकी दर दहा सेकंदाला कोणीतरी या जगात शेवटचा श्वास घेतो सरासरी दहा लक्ष लोक दरवर्षी या भाकरीच्या अभावाने मरतात आणि आपण असणारे त्या भाकरीची कदर करत नाहीत ,पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तिच्या शोधात फिरतोच बहिणाबाईंनी म्हणल्याप्रमाणे हाताला चटके मिळाल्यानंतरच भाकरी मिळते म्हणजे त्यासाठी काहीतरी करावं लागतच पण ती मिळाली तरी आत्मा तृप्त होत नाही ना शरीर शेवटच्या श्वासा पर्यंत शोध चालूच असतो वित भर पोट, त्याला भरण्यासाठी मिळवावे लागतात नोट. मोबाईल आपल्या मूलभूत गरजांमध्ये आला,आणि कोणी आपल्याला त्यातलं काही मागितलं तर आपण लगेच शेअर इट सारख्या तंत्राने देतो तसेच आपल्या कडे असलेली भाकरी पण त्याच खुशीने द्यायला शिकलो तर खूप छान होईल शेअर इट सारखं तंत्र भूक भागवण्यासाठी पण असत तर कदाचित हा शोध संपला असता... आयुष्याचा शेवट आणि शेवटचा श्वास कधी ह्या शोधातून बाहेर निघेल का हो..?
___________________________________________


किरण पवार
औरंगाबाद,

भाकरीसाठी वणवन भटकत आलेले आयुष्य
नेमका शेवट काय करावा
याचे नसलेले उत्तर भाकरीच्या शोधातले आयुष्य

कधी जहाल वागावयास भाग पाडणारे
कधी देहाला विक्री करायला लावणारे,
कधी या न कधी त्या
पण बऱ्याचदा खूणही करवणारे,

भाकरी हा प्रश्न जेव्हा आस्तित्वावर घाव करतो
तेव्हा तरूणाईला स्वप्न तोडून कमवायला लावणारे,
न जाणो कोण भिकारी कोण संपूर्ण वेडे असलेले
पण आतड्याला चिकटलेले पोट घेऊन
रस्त्यांवर धुळीत लोळायला लावणारे,

गावासारखा स्वर्ग सोडून
नालीच्या किनाऱ्याला शहरात
घर वसवायला लावणारे,
पोरांपासून बापाला अन माईला
लहानपणी बऱ्याचदा वेगळं रहायला लावणारे,

काय आहे सर्व शेवटी समजतं नाही
अन् भाकरीच्या प्रश्नापोटी माणूस कधीच फिरणं थांबवत नाही.
________________________________________

वारी आणि शिकवण

विषय क्र. 2:- 

अनिल गोडबोले
सोलापूर

साधारण पणे 10 ते 15 लाख वारकरी वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूर पर्यंत पायी चालत येतात.

दिंडी चालण्याचा अनुभव वेगळाच असतो. वेगवेगळ्या मुक्कामी राहून वारकरी पंढरपूर ला कळस दर्शन झाले तरी स्वतःला धन्य समजतात.. माऊली म्हणून एकमेकांच्या पाया पडतात...

खर तर भागवत संप्रदाय समानतेच्या शिकवणीचा पुरस्कर्ता आहे असं म्हणतात.. त्यामुळे महाराष्ट्र आपल्या भोळ्या भाबड्या विठुरायाच्या चरणी लिन होऊन जाण्याची शिकवण वारी देते..

परंतु ही शिकवण देव आणि दैवावर विसंबून ठेवणारी तर नाहीं   ना अस देखील कधी कधी वाटत..

वारीत येणाऱ्या दिंड्या, त्यांचे मान अपमान, मोठे पणा पाहता खरोखर समानता आहे का? असा प्रश्न पडला आहे.

वैयक्तिक जीवनात जातीयता पाळणे आणि कर्मठपणा पाळणे हेच जर दिंडी शिकवत।असेल तर याचा विचार केला पाहिजे

अंधश्रद्धा आणि चुकीच्या विचारांना संतांनी विरोध केला आहे पण आता ते चित्र दिसत नाही.

जातीयता गडद होताना रोटीबेटी व्यवहार, पैसे, संपत्ती या बाबत काहीच कृती होत नाही.

ऐन पावसाच्या वेळी पेरण्या करणे, शेती करणे या गोष्टी सोडून काही तरुण दिंडी मद्ये जातात त्या बद्दल देखील विचार झाला पाहिजे. ज्यांनी आपल्या कामामध्ये पांडुरंग बघितला यांनी तर कामामध्ये स्वतः च्या मुलाला तुडवला..  अस म्हणतात त्या गोऱ्या कुंभऱ्याच्या महाराष्ट्रात कर्तव्य निष्ठा खरोखर दिसेल का?..

दिंडी मध्ये होणारे 'मॅनेजमेंट'.. पोलीस यंत्रणा, प्रशासन, आरोग्य यंत्रणा इतर सर्व मार्केटिंग पाहता "कॉर्पोरेट" दिंडी होते आहे की काय असे वाटते..

अवैध मानणारे सर्व धंदे दिंडी मध्ये दिसून येतात. याचा अर्थ सर्व तसेच नाहीत पण यांचे प्रमाण देखील कमी नाही.. दारू, जुगार, वेश्या व्यवसाय सर्व काही चालू आहे.

कचरा, प्रदूषण याच्या समस्या बद्दल बोलू नये... पंधरपूरकर पुढील कमीत कमी एक महिना त्याचे परिणाम भोगत असतात..

जेवढ्या गोष्टी चांगल्या आहेत तेवढया वाईट देखील घडतात..त्यामुळे वारी नेमकी काय शिकवण देते या पेक्षा आपण काय घेतो यावर सर्व अवलंबून असते..

सर्वाना माऊली चा दर्जा मिळो आणि या दिंडी ने महाराष्ट्राचा कायापालट होवो ही पांडुरंग चरणी प्रार्थना.

____________________________

मनोज वडे ,पंढरपूर.

  वारी म्हटलं की सर्वाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न .जसा  'मे' संपतो तस सर्वाना वारी आणि पाऊसाची औढ लागती . जगाला काही तरी संदेश देणारी ही वारी खरी विसमर्णीय असते .कारण प्रत्येक भागातून येणारी वारी काही तरी वेगळं संदेश देऊन जाते.कारण बघाना एवढी मोठी लोक जवळ जवळ एक महिना सगळ्या सोबत कसे मिळून मिसळून राहतात.एकमेकांची काळजी घेतात.सर्व काही शिस्त ने चालते .एवढ्या मोठ्या संख्येने येतात मिळून मिसळून राहतात. जगाला एक हुरूप येईल अशी वागनुक ,संदेश, कोणत्या प्रकारचा शब्द वापरा असा हेवा वाटणारा हा सोहळा मनी कोणताही स्वार्थ नसलेला. हा सोहळा खूप काही शिकवून जातो.कारण आज आपण पाहतो. घराघरातील दशा .तरी ह्या सर्व गोष्टी ला वारी खूप काही शिकवून जाते.जस की गजानन महाराजांची पालखी ही जगाला फार मोठा संदेश देऊन जाते.ही पालकी साधारणपणे 1 महिन्याच्या आधी निघते .जवळजवळ '463'km येते ती पण त्याचा अंगावर असलेली कपडेच आपल्याला बरेच सांगून जातात ,तसेच त्याची शिस्त,एकोपा त्याची भजने ,आवाज त्याची वाहनांची दशा, लय,त्याच्या चालण्याची शिस्त बरेच काही सांगून जातात.जे की अस वाटत की , हे कसे सगळे नियोजन करत असतील .जे की आपणाला आपल्या घरी एक माणूस संभाळता संभाळता नाकी नवं येत .पण ही वारी खूप काही शिकवते .कस वागावं ,कस जगावे, कारण हेच एक महिना लोकांना वर्ष भराची स्फुर्ती देतात .वारकरी त्याच स्फूर्तीने आपलं पुढील 11 महिने नव्या जोशाने आपलं आयुष्य घालवतात .कोणताही स्वार्थ,मी श्रीमंत, तू गरीब,असा कोणताही भेदाभेद न बाळगता हा सोहळा पार पाडतो .खरच खूप काही शिकण्यासारखे असत बघा.
  ‎                         काही पालख्या आळंदी, देहू ,सासवड निघतात .टाळ ,अभंन,मृदंग,मनाला अस भाऊन जाते.की आयुष्य परिपूर्ण होत .ह्या पालख्या जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर चा रोज पल्ला गाठतात .पण त्यातील वारकऱ्यांना विचारले की, 'बाबा' पाय दुखतात का ? तर किती पण वयाचे वारकरी म्हणतात .काही होत नाही .बाबा!फक्त मन प्रसन्न होत हाच एक संदेश प्रत्येक वारकरी देतात.विट्टल, विट्टल,हा गजर नवी ऊर्जा निर्माण करतो.अस त्यांचं म्हणणं येत .बगांना किती एकरूप होतात आणि एक संदेश देऊन जातात.जर मनुष्यप्राणी एकत्र आला तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. हा खूप मोठा संदेश देऊन जातात.जशी जशी वारी पुढे सरकते तस तस प्रत्येक गावात नवा जोश,नवी ऊर्जा संचारलेली दिसते.कोणीही ह्या काळात स्वार्थ साधत नाही.अशी वारी सोहळा प्रत्येक टप्यात काही तरी नवीन सांगून जातो.म्हणून जन्मून एकदा नक्की करावी वारी.अनुभवा हा सुखद सोहळा.हा सोहळा प्रत्येक क्षेत्राला टच करून जातो .पंढरपूर आहे माझे माहेर घर कारण ह्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला नवा संदेश, नवी ऊर्जा,नवा एकोपा,नव जोश,नवी शिकवून देतो,म्हणून जन्म झाला तुका म्हणे करावी एकदा पंढरीची वारी.
  ‎                           काही तर म्हणतात खूप उशीर झाला मला वारी करण्यासाठी कारण त्याचा तोंडातून अस निघत की ,मी ह्याच्या 5 वर्षी आधी वारी केली असती तर खूप माझी प्रगती झाली असती. असे म्हणणारे वारकरी पण भेटतात. एवढा मोठा सोहळा पण त्याच नियोजनन मात्र आपआपली माणस उत्तम पध्द्तीने पाळतात .वागतात  हेच खरं आयुष्यतील  महत्त्वाचे असत.ते शिकण्यासाठी खरच एकदा करावी वारी .पंढरपूर तर भक्तांचे माहेर घर.कारण येते येणार प्रत्येक वारकरी .2 ते 3 दिवस राहतोच .कारण पंढरपुरात सर्व बाजूने त्या वारकऱ्यांचे हक्काचे मठ पंढरपूरात आहेत.हे मठ तर खूप काही शिकवून,आठवणी जाग्या करून जातात.प्रत्येक मठ आपलं वेगळं पण सांगतो आणि मग काय त्या वारकरी सर्व मठाचे दर्शन पालख्याचे दर्शन घेतो आणि त्याला परिपूर्ण झाल्याचे समाधान होते .तो प्रत्येक वारकरी खूप काही शिकुन निरोप घेतो.एका नव्या जोमाने कामाला लागतो.पंढरपुरात आता तर वारकऱ्यांना जवळजवळजवळ 7ते8 दोन मजली संडासाच्या बिल्डींग बांधल्या आहेत.जेणेकरून लोकांना चांगल्या पद्धतीची सेवा प्राप्त व्हावी आणि त्याची सवय ही लागावी.प्रत्येक पालख्याचे रथ बरेच काही सांगून जातात.मन भारावून जात हे सर्व पाहून ....

 ‎हीच व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास।।

पंढरीचा वारकरी। वारी चुको ने दी हरि।।

‘विठ्ठल आमुचे जीवन। आगम निगमाचे स्थान
____________________________

*संगीता देशमुख,वसमत*

    "टाळी वाजवावी,गुढी उभारावी,
     वाट ती चालावी,पंढरीची" 
असं महाराष्ट्रासह अनेक राज्यातील लोकांना वेड लावणारी,जीवनात एकदातरी वारीचा अनुभव घ्यावाच,अशी भावना जिच्याबद्दल  प्रत्येकालाच निर्माण होते,अशी ही पंढरपूरची वारी! "विठ्ठल,विठ्ठल,जय हरी विठ्ठल....!"असे म्हणत संपूर्ण महाराष्ट्र या दिवसात अगदी भक्तीमय झालेला असतो. अध्यात्माच्या अधिष्ठानावर आधारित ही वारी दिवसेंदिवस अधिकच तेजस्वी होत आहे. संत लोकानी या वारीला एक अद्भूत चैतन्य  आणि प्रभावी वैचारिक बैठक प्राप्त करून दिली आहे.आषाढ महिना एकीकडे  लागताच महाराष्ट्रातील भक्तांच्या पावलांना  पंढरीच्या वाटेचे वेध लागतात.मनात भक्तीचा मळा फुलू लागतो.  तर दुसरीकडे हे दिवस म्हणजे शेतकऱ्यांच्या लागवडी-पेरणीचे दिवस! शेतकऱ्यांच्या मनात एकाच वेळी भक्ती आणि शेती या दोन्हीचेही वेध लागलेले असतात. एकदाची लागवड,पेरणी करून शेतकऱ्यांच्याही पावलांना ओढ लागते ती,पंढरपूरची आणि पंढरपूरचा राजा पांडुरंगाची!
 मग मन गुणगुणते,
"माझे जीवीची आवडी|
पंढरपूरा नेईन गुढी||"
        सर्वसामान्यांचे आवडते,लाडके दैवत म्हणजे पंढरीचा सावळा विठ्ठल! या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांचे अनेक जथ्थे म्हणजे वारी होय.हिलाच "दिंडी" असेही म्हणतात. ही वारी म्हणजे महाराष्ट्रातील एकोप्याचा अनुपम असा नमुनाच म्हणावा लागेल. जिथे उच्चनीच,गरीब-श्रीमंत,शिक्षित-अशिक्षित,आपपर असा कुठल्याही भेदभावाचा लवलेशही आढळून येत नाही. मानवतेचा खराखुरा आविष्कार येथे प्रत्ययास येतो.जेथे "मी"पणा गळून पडतो, संसारातील मोह,काम,क्रोधादि षडरिपूंचा पराभव होऊन माणूस निर्विकार बनून त्या वारीत सामील झालेला असतो. सामान्य माणसाच्या जीवनात सुखापेक्षा दुखाचाच जास्त प्रभाव असतो. उदरनिर्वाहासाठी स्वीकारलेल्या मार्गाचाही कुठेतरी उबग आलेला असतो. आपली  कर्तव्यपूर्ती करत असताना व्यवहार,संसारातील तोचतोचपणा,सुख-दु:खाचा लपंडाव,आजारपण,नातेवाईकाकडून होत असलेला अपेक्षाभंग,या सर्व बाबीना सामान्य माणूस कंटाळलेला असतो. मग तो कुठेतरी आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि हा आनंद त्याला मिळतो तो याच वारीत!
"गांजुनिया भारी ,दु:ख दारिद्र्याने,
पडता रिकामे भाकरीचे ताट,
पाऊले चालती पंढरीची वाट!"
सर्वश्रेष्ठ संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांच्या पादुका श्रध्देने घेऊन हे वारकरी पंढरपूरकडे रवाना होतात. पंधरा-वीस दिवस चालणारा वारीचा हा सोहळा म्हणजे भक्तिरसाचा महापूर असतो. खरंतर यात कुठलेही पूर्वनियोजन नसताना आनंदाची टाळी वाजवत,हाती भक्तीच्या पताका,ध्वज घेऊन,टाळ-मृदंगाच्या निनादात,मी पणाचा त्याग करुन  एकेकजण सामील होतो. आणि मग ही सर्व पाऊले चालतात ती पंढरीची वाट! या वारीत,विठ्ठलाच्या नामघोषात पावले इतकी एकरूप होतात की,सर्व दु:ख,वेदना विसरून,पार केलेल्या अंतराचा किंवा उरलेल्या अंतराचा त्याला पत्ताही नसतो. भक्तिरसात तल्लीन झालेले मन केव्हाच पंढरपूरात विठ्ठलाच्या चरणी लीन झालेले असते.रस्त्याने कोणत्या गैरसोयी होतील,कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल,अशा विचाराचा कुठे मागमूसही नसतो. याउलट रस्त्याने होणारी गैरसोय  ही गैरसोय वाटत  नाही तर ती लाडक्या विठ्ठलाने केलेली व्यवस्था वाटते. वारीत जाणाऱ्या भक्तांवर विठ्ठलप्रेमाचा एवढा पगडा असतो की,त्याक्षणी त्याना असणाऱ्या दुर्धर व्याधींचाही विसर पडलेला असतो. ही जादू,हे भाग्य लाभले ते या महाराष्ट्रातील फक्त विठ्ठल याच देवाला! भरपावसात देवाच्या पादुका डोइवर घेऊन,डोंगरदऱ्याचा,आडवळणाचा रस्ता तुडवत भक्तांची अनंत पावले पंढरीची वाट चालत असतात.या वारीचे वैशिष्ट्य हे की,आज जिथे सर्वत्र प्रत्येक जातिधर्माने आपापले देव वाटून घेतले त्याच मातीत  सर्व जातिधर्माचे लोक या वारीत श्रध्देने वर्षानुवर्षापासून  सहभागी झालेले असतात. आज आजूबाजूला दिवसेंदिवस जातिवाद,धर्मवाद कट्टर होताना दिसतो तर याउलट पंढरपूरच्या वारीत जातिधर्मांच्या शृंखला कुठे मागेच गळून पडलेल्या दिसतात. संसार,व्यवहार,नातीगोती  मागे टाकून वारीतील प्रत्येक भक्त एकाच उद्देशाने निघालेले असल्याने एकमेकांना "माऊली" असे  प्रेमळ संबोधन देऊन एकजीवाने पुढे पुढे जातात.श्रध्दा-अंधश्रद्धा यावर मंथन न करता,या विवेकवादात न पडता,  नास्तिक- आस्तिक या सीमा पार करुन बुध्दिप्रामाण्यवादीही या प्रवाहात सामील झालेले दिसतात. याही पलीकडे जाऊन अनेक विद्यार्थी,तत्ववेत्ते या वारीवर  संशोधनात्मक  अभ्यास करतानाही दिसू  येतात. यापेक्षा या वारीचा महिमा कोणत्या शब्दात वर्णावा? आजच्या या  ताणतणावाच्या युगात ही वारी म्हणजे,एकप्रकारची विशिष्ट "थेरपी" ठरू पहाते आहे.म्हणून ही पंढरीची पारंपारिक वाट चालणारी आधुनिक पावले आजही श्रेष्ठ वाटतात.

____________________________

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे.

     *पाऊले चालती पंढरीची वाट*

     वरील पंक्ती मधील आशय मांडायचं झाल्यास अनेक पुस्तकं लिहावी लागतील, कारण या सर्वांची मूळ दडली आहेत त्या वारीत ( पांडुरंगाच्या आणि ईतर ). भारतामध्ये वारी करणारे ते वारकरी आणि या वारकऱ्यांचा समुदाय म्हणजे वारकरी संप्रदाय.
     
      मुख्यतः हा वारकरी संप्रदाय भारताच्या विविध भागातून वारीसाठी एकत्र येतो म्हणजे इथे आपल्याला जी शिकवण मिळते ती ऐक्याची, तसेच हा वारकरी संप्रदाय कधीच जातपात, पंत, रंग ई चा कधीही बागुलबुवा नाही करत येथे शिकायला मिळते ती समानता. वारीमध्ये चालताना एकमेकांच्या सुखदुःख समजून मदतीला तत्पर राहतात ते वारकरी इथं शिकवण मिळते ती प्रेम, आपुलकी, इतरांप्रती सद्भावना. या पेक्षा ही मोठी शिकवण म्हणजे माणसाला माणुसकी शिकवण्याच काम केलं ते याच वारकरी संप्रदाय मधील तुकोबा राय, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, नामदेव ई.

*अवघे गरजे पंढरपूर...*

     वारी मधील वारकरी पांडुरंगाचे नाम स्मरण करत त्यांची सर्व श्रद्धा पांडुरंगाचे सतत होणारे जप तप तल्लीन असलेले वारकरी पाहिले की एकरूपता याची प्रचिती पण येते. पाऊस नाही पडला तर देवाला मागणे मागून मुक्या जनावरांना पुरवेल एवढा तरी पाऊस पडावा ही विनवणी खूप काही शिकवून जाते.

____________________________

प्रविण दळवी
नाशिक

वारी करून येणे म्हणजे पाप-पुण्य आणि सुखदु:खाचा विसर पडून त्याचा त्याग करून विद्यार्थी देहाचा माणूस म्हणून पंढरपुरातून परत येणे. ‘वारी’ म्हणजे येरझार. चालत पांडुरंगाच्या भेटीला जाणे. भगवंताला भेटून आनंद घेणे आणि पुन्हा माघारी येणे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. तहानलेल्याला पाणी द्यायचे, भुकेलेल्याला अन्न द्यायचे ही साधुसंतांची शिकवण मनात ठेवून समाजात वावरायचे. परस्त्रीला मातेसमान मानायचे, कुणाचा मत्सर करू नये. अशी वचने स्वीकारून हा पांडुरंगाचा भक्त माघारी येतो. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक या वारीमध्ये सहभागी होतात. पायी प्रवास करताना कुठलाही आजार, कुठलाही आघात होत नाही. परमेश्वराचे नामस्मरण करता करता खूप बळ येते. भगवंताच्या दर्शनासाठी अधीर झालेला हा भक्तसमुदाय आनंदाने हा सोहळा साजरा करत असतो. अनेक वारकरी पिढय़ान्पिढय़ा पायी वारी करत आहेत.

संतांची शिकवण काय आहे. मनातला स्वार्थी हेतू जाळून टाकला पाहिजे. मत्सर, हेवा आणि दुस-याबद्दल कुलषित भावना यांचा नाश केला पाहिजे. परमार्थ काय आहे याची शिकवण मुलांना दिली पाहिजे. स्वत: आचरणही तसे करावे लागते. संत कुणाला म्हणावे, ज्याच्या ध्यानी-मनी परमेश्वर आणि त्याचे स्वरूप पाहतो. दुस-याच्या सुखात आपले सुख मानणारा तो खरा साधुसंत. माणसाची नीती आणि आचरण शुद्ध असावे असे म्हटले तरी ते पूर्णत: जाणवत नाही. भक्तीमार्ग हा अत्यंत सोपा पण तितकाच कठीण मार्ग आहे. मार्गात खूप अडथळे आहेत, प्रापंचिक अडचणी, आर्थिक अडचणी आहेत, पण त्यात भगवंतांची निस्सीम भक्ती करणारा जो भक्त आहे, त्याला सहज असा एखादा सुखद अनुभव येतो. ज्यात भगवंताच्या भक्तीचा वास असतो. आहे त्यात समाधान मानणारा हा भाविक असतो. कलियुगात स्वार्थीपणा प्रचंड वाढला तरी असा भक्तिसमुदाय आहे जो गाठीला पुरेसे पैसे नसतानाही पांडुरंगाच्या भेटीसाठी निघतो. ‘तोची माय बाप’ अशी धारणा ठेवूनच त्याचा पायी प्रवास असतो. इथे गरीब/श्रीमंत भेदभाव नसतो, जात-पात, धर्म-भेद नसतो. इथे वायफळ दिखावा नसतो, तर इथे प्रत्येकजण भगवंताचा भक्त असतो, ज्याचे नेत्र आसुसलेले असतात त्याच्या दर्शनासाठी. केव्हा जाऊन नतमस्तक होतो आणि भक्तीमध्ये वाहून घेतो. अशी आत्यंतिक ओढ असलेला हा पांडुरंगाचा भक्त असतो. ‘युगे अठ्ठावीस, विटेवरी उभा’ असलेला हा परमेश्वर चराचरात त्याची नजर आहे. गरिबांच्या हाकेला धावणारा हा विठुराया.

‘‘ज्ञानदेवे रचिया पाया.. तुका झालासी कळस’’ समस्त मानव जातीला परमार्थाची शिकवण देणारे संत. १३ व्या शतकातील हे संत भगवत गीतेचे महात्म्य त्यांनी सांगितले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांनी समाजाच्या प्रखर विरोधाला तोंड द्यावे लागले. अत्यंत हीन वागणूक दिली, पण त्यांच्यातले देवत्व समाजाला जाणवले तेव्हा त्यांना याच संतांनी शिकवण समाजासाठी तारणहार ठरली. "देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर" असा उल्लेख आहे कारण संतांनी या मानवी देहाचे वर्णन करताना मंदिर आणि आत्मा असे समीकरण जोडले आहे. मन आणि चारित्र्य शुद्ध असणा-याला इहलोकातल्या दु:खाचे निराकरण करण्याची नि:स्वार्थी भावना सतत जागृत असते. बरे-वाईट काय आहे हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. आपण ज्या नजरेने जे पाहू तसे ते दिसेल. म्हणून साधुसंतांनी सांगितले आहे की, दिवसभर देवाजवळ बसून भक्ती करू नका. तुमच्या आचरणात आणि विचारात चांगले विचार ठेवा आणि मेहनत करा, मग त्याचे फळ मिळेल. परिश्रमाशिवाय काहीही साध्य नाही.

असा कुठलाही देव म्हणत नाही फक्त माझी भक्ती करत राहा. मेहनत हाच परमेश्वर आहे. तुम्हाला जो वेळ मिळेल तो आपल्या शुद्ध आचरणासाठी देवाच्या नामस्मरणात घालवावा. तुम्ही कुठेही असाल, नि:स्सीम भक्ती असेल तर परमेश्वर नक्कीच कायम तुमच्या पाठीशी आहे. सुख तर ह्यातच आहे. प्रचंड संपत्तीने झोप येत नाही आणि गरिबीनेही निद्रानाश होतो, त्यासाठी ‘‘पोटापुरते असावे"असे संतांनी सांगितले आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे विष बनते असे सूचक ज्ञान संतांनी दिले.

पंढरपूर वारीच्या निमित्ताने संतांची शिकवण यावर विचार मांडताना तुकारामांच्या अभंगातून स्पष्ट विचार जे मांडले ते सकल जनांना सार्थ ठरले.
‘हेचि दान देगा देवा.. तुझा विसर न व्हावा।। १।।
गुण गाईन आवडी। हेची माझी सर्व जोडी।। २।।
न लगे मुक्ती आणि संपदा। संतसंग देई 
सदा ।। ३।।
तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावी 
आम्हासी।। ४।।
अशा भगवंतासी नतमस्तक होऊन वारीतल्या वारक-यांना साष्टांग दंडवत !
____________________________

सिताराम पवार, पंढरपूर

संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका। परि नये तुका पंढरीच्या। पंढरीसी  नाही कोणा अभिमान। पाया पडे जन एकमेका।  आपल्या देशात कुठेही जा वयाने मोठा व्यक्ती लहान वयाच्या व्यक्तीच्या अगदी लहान मुलांच्या पाय पडताना दिसत नाही पण वारीत ते दिसते हाच वारीचा समतेचा पाया आहे. कोणत्याही प्रकारचा भेद वारीत दिसत नाही फक्त "माऊली आणि ज्ञानोबा तुकाराम" नामस्मरनाणे वाट वातावरण आनंदमय झालेले असते.   सर्वप्रकारचे दुःख, चिंता, सांसारिक त्रागा विसरून लोक या सार्वजनिकआनंदात तल्लीन होतात.
आता वारकरी शिकवण- संतांनी अगदी सोप्या भाषेत अभंग लिहिले आहेत संत तुकाराम महाराज अभंगात म्हणतात" हरी हरा नाहीं भेद। एका वेलांटीच्या आड।" तसेच विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ। म्हणजे शैव, वैष्णव, शंकराची भक्ती, नाथ पंथ यात भेदभाव नसून ते फक्त भक्तिमार्ग आहेत यावरून कोणीही वाद करू नये ज्याला योग्य वाटेल तो त्या मार्गाने जाईल पण त्यावरून माझा मार्ग चांगला, दुसऱ्याचा वाईट असं करू नका म्हणतात. असे अनेक अभंग, भारुड, गण गौळणी आहेत त्याद्वारे समाजप्रबोधन सुद्धा वारीत होते. संत ज्ञानेश्वर, नामदेव, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या समाजप्रबोधन पर अभंगही गायले जातात.  आणखीही वारकरी माणूस थोडाजरी चुकला तरी अभंगाचा दाखला कोणीही देतो त्यामुळे पंढरीचा वारकरी हा  "धारकरी" नसून काम, क्रोध, मध, मत्सर अशा विकारांवर तसेच वाईट विचारांवर "वार" करणारा वार'करी आहे.
____________________________

विषय क्रं.२-वारी आणि शिकवण
   करिश्मा डोंगरे
      देवाचीये द्वारी उभा श्कनभरी
       तेने मुक्तीचारी साधीयेल्या!
           हे आपलं बरोबरेय हं!जरी तुम्ही देवाचे दर्शन नाही घेतले, श्कनभर जरी उभारलात तरी चारी याञा तुम्ही मीळवल्या असे तुकाराम महाराज म्हनतात.या सगळ्या संतांच्या अभंगातून काही ना काही शिकायला मीळतेच.तुकाराम महाराजांनी सांगितले प्राणिमांञावर दया करा.त्यांनी कुञाला भाकरी टाकली आणि कुञे ते घेउन गेले तरी हे त्याच्या मागे तुपाची वाटी घेउन पळायचे.आपन करतो का आता एवढे?नाही ना!संत माउली नी सोळाव्या वर्षी न्यानेश्वरी लिहली.काय कळत असेल तेव्हा,अाता काय करतात ओ सोळाव्या वर्षात?कुठे चाल्लाय आपला संताचा महाराष्र्ट बघा जरा.काय शिकवन घेतोय.जनाबाईंच्या तर गौर्यातून विठ्ठल!विठ्ठल असा आवाज यायचा.कुठे हरवलेय का ही भक्ती प्रश्न पडतो मला?तेव्हाची जनाबाई आता नाही दिसत कुठे?या सगळ्या संताच्या शिकवणी नाहीत दिसत आता.माहीतेय खूप गर्दी होते पण तेवढी भक्ती आहे का?माझा लेकुरवाळा विठू त्या गर्दीत कुठेतरी हारवलाय.भक्तीचा भुकेला आहे.
             पंढरपूरची वारी म्हटलं की कामाची लगबग चालू होते,कारन बर्याच जनांची पोट त्यावरच असतात. हे इथले वास्तव आहे.अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत चीकाटीने कामे करतात.मोठ्या प्रमानात व्यवसाय चालतात या दिवसात.आणखी एक वास्तव लाजीरवाने आहे,की वारी करन्यासाठी सगळे येतात पण, ईथेच घरातले म्हातारी मानसे सोडून जातात.खूप -खूप लाजीरवानी गोष्ट आहे.वारी झाली की बघायचे बरीच अशी म्हातारी मानसे आपल्याला दीसतील.एकदा तर कॉलेज मध्ये असताना NSNS मधील मूलांनी अश्याच एका आजी ला आञमात नेउन सोडले होते.खूप बेकार अवस्था झाली होती तीची.ते बघून डोळे भरून आले.कुठे हरवलेय संताची वाणी.काय शिकवते ही वारी आपल्याला सांगा ना?माणूसकी राहीलीच नाहीये.विठू लेकुरवाळा आहे म्हणून असे करतात का ही लोक? मला तर असेच वाटतेय!म्हणून तर असे करतेत.तरी या पंढरीत अजुन माणुसकी आहे,त्या सोडलेल्या मानसांना सांभाळून घेतात.विठोबाराया बघ बाबा आता तूच!!जय हरी 

____________________________

३ पाऊस व पेरणी.



*रुपाली आगलावे, सांगोला*

     सांगोला......महाराष्ट्रातील सगळ्यात दुष्काळ ग्रस्त भाग, इथं पाऊस पडण्याची एवढी आतुरता असते, जेवढी एका आईला आपला मुलगा रात्री घरी नाही आला तर जशी काळजी लागते न अगदी तशीच... कारण, पाऊस आला तर आला नाही आला तर म वर्षाच टेन्शन डोक्यावर...
     पण जेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा मात्र सगळी मंडळी आनंदात कमाला लागतात ते म्हणजे पेरणीच्या.... लगबग सुरू होते, बियाणे गोळा करा बैल नांगर सांगा, ट्रॅक्टर वाल्याला सांगा, शेजारच्याच झालं आपलं कधी व्हायचं.... तो ट्रॅक्टरवाला आज येतो बोलून नाही आला म आता काय करायचं. दुसरा सांगायचा का? नको .... तो नीट पेरलं की नाही म उगाच दोन दिवसासाठी अख्या पिकांचं नुकसान नको.... म्हणून म परत त्याचीच वाट बघत बसायचं... हे असं एकंदरीत सगळं वातावरण बघायला मिळत....
     त्या पावसावरच शेतकऱ्याचं आयुष्य जोडलेल असल्यामुळं पाऊस पडला की शेतकरी सगळं दुःख विसरून नवीन आयुष्याची सुरवात करतो.... मला तर हा पाऊस म्हणजे पेरणीच्या स्वरूपात शेतकऱ्याला त्याच्या एका नवीन सुखमय आयुष्यचीच सुरवात करून देतो असच वाटत....
____________________________


*अक्षय डेरे यवतमाळ*

यवतमाळ म्हणजे आपल्या देशातील एक दुष्काळग्रस्त व  शेतकरी आत्महत्येसाठी कुप्रसिध्द जिल्हा म्हणुन ओळखला जातो.

गेल्या ३-४ वर्षापासून पावसाची हजेरी बेभरवश्याची व उपस्थिती कमी कमी होत असल्यामुळे सतत शेतकऱ्यांचे नूकसान होत आहे. साधारणतः ७ जून पासून आमच्याकडे पेरणीला सूरवात होते या एकाच आशेवर की ७ जून पासुन पाउसला सूरूवात होईल मात्र आता तसे काहीच राहीलेले नाही. पेरणी आम्ही ७ जून ला केली आणि पाऊस मात्र २७ जूनला हजेरी लावून निघून गेला आणि सगळ पेरणी चे बीयाणे जमिनीमधेच माती झाले.

 शेतकऱ्यांचा जिव खालवर होतो आता दोबार पेरणी करण्यासाठी. शेतकऱ्यापाशी पैसे नाहीत तरी सूद्धा त्याचा आत्मविश्वास कायम असतो. काहीतरी तडजोड करून पुन्हा पेरणी करतोच .पाऊसाचे आगमन ऊशीरा झाल्यामुळे यावर्षी परत उत्पनात घट होणार. अगोदर पाउसाचे आगमन जून महीन्यातच व्हायचे मात्र ह्यावेळेस संपुर्ण जुन महीना गेला तरी पाउसाचे नाव नाही .

पावसाच्या आगमनाचा आनंद शेतकऱ्या एवढा दूसऱ्या कुणाला होउच शकत नाही. शेतकऱ्यांची शेती ह्या पाऊसावर अवलंबून असते .शेतकरी आहेत तर शेती आहे आणि शेती आहे म्हणुन आपण आहोत.

पाउसाचे आगमन झाले. शेतीतली कामे सूरू झाली. सर्व शेतकरी वर्ग आपआपल्या शेतात काम करण्यास मग्न झाली आहेत..

पांडुरंगा यावर्षी तरी भरघोस शेती पीकु दे रे देवा ..
____________________________


*अमोल धावडे, अहमदनगर.*

घामाचे थेंब पेरून मातीतुन मोती मिळवुन देणारा जगातील एकमेव कारागीर म्हणजे शेतकरी.
मित्रानो पाऊस आणि शेतकरी यांचा एक घनिष्ठ संबंध आहे. लग्न झाल्यावर मुलगी आपल्या माहेरी यायला निघते व घरचे लोक आतुरतेने तिची वाट पाहत असतात त्याचप्रमाणे शेतकरी पाऊसाची आतुरतेने वाट पाहत असतो.

शेतकरी आपल्या जमिनीची मशागत उन्हाळ्यात करून ठेवतो. पाऊस पडण्याचा अंदाज वाटला की पेरणीसाठी जमीन तयार करून ठेवतो. पहिला पाऊस पडला की शेतकऱ्यांची बी बियाणे आणण्यासाठी लगबग सुरू होते. प्रत्येकजन पेरणी करण्याच्या तयारीला लागतो तो उत्साह इतका असतो की घरामध्ये कुठला सण साजरा होत आहे अस वाटत.

पेरणी करण्यासाठी शेजारच्याची बैलजोडी आपल्याकडे घेऊन येणे व पेरणी करून घेणे पुन्हा त्याला मदतीला जाणे. मालकीण बाई फक्त बांधावरून पाहते कस काम सुरू आहे व जेवणाची सर्व जबादारी पार पाडते. पेरणी झाल्यानंतर होणारा पाऊस पाहून तर शेतकरी इतका आनंदी होतो व त्याला विश्वास बसतो की आपलं पीक येणार व तो त्याच्यवरच भरोसा ठेऊन असतो.

आदिवासी पट्टीतील शेतकऱ्यांची तर वेगळीच गडबड असते पाऊस पडला की जमीमध्ये पाणी साठवून त्याची  पाऊसमध्येच मशागत करायची. सगळा चिखल करून त्यामध्ये भाताची लावगड करायची वरून पाऊस सुरू व शेतकरी भाताची लावणी करतो.

मागील दोन ते तीन वर्षे झाले पावसाने हजेरी लावली नाही व पीकही चांगल्या प्रकारे पिकलेले नाही. यावर्षी तरी देवाकडे एकच साकडं आहे की भरपूर पाऊस पडू दे आणि माझ्या बळीराज्याला खुश होऊदे आणि चांगले भरगोस पीक पिकू दे .
____________________________

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************