अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि त्याचे समाजावरील परिणाम

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 5⃣0⃣वा 📝 

❤🧡💛💚💙💜🖤💗💓💖

🎊🎉🎊🎉🎁🎈🎊🎉🎊🎉🎈


सुवर्ण महोत्सवी आठवडा

🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀

14 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2018

💬✍💬✍💬✍💬✍💬✍

  अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि त्याचे समाजावरील परिणाम


शिरीष उमरे, नवी मुंबई


२१ सप्टेंबर १९९५ गणपती दुध पिण्याची अफवेला तत्कालिन शासनाचे मुख्यमंत्री  महोदयांनी श्रध्दा म्हणुन मान्यता देण्याचा प्रयत्न केला होता. जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (स्थापना १९८९) तो हाणुन पाडला तो जागतिक अंधश्रध्दा निर्मुलन दिन मानला जातो.

जागतिक पातळीवरही अब्राहम कोवूरांच्या २२ अंधश्रद्धा आव्हानांपैकी एकही आव्हान एक लाखाचे बक्षीस असतांनाही आजगायत कोणीही स्विकारले नाही.

महाराष्ट्रात समाजसुधारकांचा ४०० हुन जुना इतिहास असतांना समाजकंटकानी श्रध्दा व अंधश्रध्दा ह्यातला फरक सामान्य जनतेच्या लक्षात येऊ दिला नाही.

जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत सोळा वर्षाच्या संघर्षानंतर सरकारने हे विधेयक विधानसभेत मांडले व तिथे ते चौदा वर्षे रखडत राहीले. नंतर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्घुण हत्येनंतर लोकप्रक्षोभाला घाबरुन काटछाट करुन हे विधेयक पास झाले. ह्या गोष्टीलाही आता पाच वर्षे उलटुन गेलीत.

महाराष्ट्र राज्यात नरबळी व इतर अमानवी, अघोरी प्रथा, जादूटोणा निवारण व उच्चाटन कायदा ज्याला सगळीकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतात तो २०१३ पासून अस्तित्वात आहे.

आजही या कायद्याबद्दल शासनाकडुन जनजागृतीचे काहीही प्रयत्न केले जात नाही. शालेय शिक्षणात ह्याचा अंतरभाव नाही. पोलीस यंत्रणेलाही याची पुर्ण माहीती नाही. त्यांच्या अधिकाराची त्यांना जाणीव नाही. शासनाकडुन त्यांच्या नियुक्त्या नाहीत. राजरोसपणे ह्या कायद्याच्या चिंधड्या फाडणे सुरु आहे.

जोपर्यंत आपण नागरिक जागृत होऊन एकत्र संघर्ष करत नाही तोपर्यंत ह्या कायद्याची अंमलबजावणी शासन करणार नाही.

जागृतीसाठी वाचाल तर वाचाल!!

नरेंद्र अच्युत दाभोलकर
मराठी  विज्ञानवादी व समाजसुधारक ह्यांचे साहित्य

वाचा
१)पुस्तक: समता-संगर
२) पुस्तकः ठरलं...डोळस व्हायचंच!
३) पुस्तक: प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे
(संकलनः संदेश बालगुडे)
४) अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम
५) अंधश्रद्धा विनाशाय
६) तिमिरातुनी तेजाकडे
७) श्रद्धा-अंधश्रद्धा
८) भ्रम आणि निरास
९) विचार तर कराल?
१०) प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर)
११) मती भानामती (सहलेखक माधव बावगे)
१२) ऐसे कैसे झाले भोंदू
१३) ठरलं... डोळस व्हायचंय
१४) विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी
१५) झपाटले ते जाणतेपण - सहसंपादक विनोद शिरसाठ
बघा:
 ज्याचा त्याचा प्रश्न (अंधश्रद्धा या विषयावरील नाटक - लेखक : अभिराम भडकमकर). या नाटकाचे ४५०+ प्रयोग
ऐका
दाभोलकरांच्या दहा भाषणांची सी.डी.- प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे - डी.व्ही.डी, निर्माते - मॅग्नम ओपस कंपनी.
==============================

संगीता देशमुख,वसमत 


धर्माच्या व परंपरेच्या नावाखाली युगायुगांपासून  समाजात सामान्य लोकांची आर्थिक,शारीरिक,मानसिक,सामाजिक पिळवणूक ही अत्यंत मोठ्या प्रमाणात होत होती आणि खरेतर ती आजही आहे. याच गर्तेतून सामान्य लोकांना बाहेर काढण्यासाठी
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी घातले. त्यासाठी त्यांना बलिदानही करावे लागले. त्यांच्याच अखंड प्रयत्नांचा विचार करून राज्य सरकारला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानानंतर का होईना पण २०१३ मध्येअंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करावा लागला. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर दाभोळकरसमर्थकांना बरचसं समाधान झाले होते. पण आजवर आपल्या देशात असे अनेक कायदे अस्तित्वात आहेत परंतु त्याची अमलबजावणी मात्र शून्य आहे.म्हणून जोवर भारतीय लोकांची मानसिकता बदलत नाही,तोवर कोणतेही कायदे करून उपयोग होणार नाही. याचा अर्थ असा नाही,की असे कायदेच अस्तित्वात आणण्याची गरज नाही. पण जेव्हा कायदे अस्तित्वात येतात तेव्हा अशा कायद्याबाबतची जागरूकता निर्माण करण्याची अपेक्षा  समाजातील सूज्ञ लोकांकडून आहे. आपल्या राज्याचे म्हणा किंवा देशाचे दुर्दैव म्हणा,परंतु ज्यांच्या हातात देशाचे सूत्र आहेत,तेच लोक अशा अंधश्रद्धाचा अवलंब आणि  प्रसार करतात. मग कायदाउल्लंघनाची कारवाई कोणावर करायची आणि देशातील सामान्य लोकांनी अनुकरण कोणाचे करावे? त्यामुळे डॉ. दाभोळकरांच्या बलिदानानंतरही,कायदे अस्तित्वात येऊनही याबाबतीत सुधारणा दिसून येत नाही. सामान्य लोकांचे प्रबोधन व्हावे,त्यांना अज्ञानातून बाहेर काढण्याच्या ऐवजी देशात कट्टर धार्मिकतेच्या नावावर जास्त फूट पाडण्याचे आणि अंधश्रद्धा रुजविण्याचे काम लोकप्रतिनिधींकडूनच सातत्याने होत आहे. डॉ. दाभोळकरांचे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नाही,असे जर काही सूज्ञाना वाटत असेल तर सामान्य लोकांना या कायद्याबाबत जागरूकता आणि अंधश्रद्धेच्याबाबत प्रबोधन करून बाहेर काढणे,ही काळाची गरज आहे. अन्यथा असे कित्येक कायदे विनाअमलबजावणीविना  कागदोपत्री अस्तित्वात आहेत.  जर त्याची नोंदच होत नसेल तर या कायद्याचे समाजात चांगले परिणाम दिसून येणार नाहीत.
==============================

किशोर शेळके. लोणंद. जि. सातारा



    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अथक प्रयत्नानंतर महाराष्ट्र शासनाने २०१३ ला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आमलात आणला. अर्थातच हा कायदा धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करीत असल्याने त्याची अंमलबजावणी करणे जरा अवघड काम आहे. पण समाजहितासाठी या कायद्याची अंमलबजावणी करणे खुप गरजेचे आहे.

    या कायद्यामध्ये हिंदू परंपरेतील नेमक्या कोणत्या अंधश्रद्धा समाविष्ट करायच्या यात बरीच मत-मतांतरे झाली. महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडावा म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी महापूजा पासून ते लिंबाला चहूबाजूनी टाचण्या टोचून केलेल्या करणी पर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा होऊ लागली. कारण दाभोळकरांच्या विचारसरणीचा महाराष्ट्र घडविणे म्हणजे झाडावरून आंबा तोडण्याएवढं सोप्पं काम मुळीच नाही. आणि याचं कारण ही तसंच आहे. राज्याचा प्रथम नागरिक जर या गोष्टीला खतपाणी घालत असेल तर अंधश्रद्धा मुक्त महाराष्ट्र हे दाभोळकरांचं स्वप्न स्वप्नच राहणार ना?.

     महाराष्ट्र राज्य शिक्षणाच्या बाबतीत चांगलेच सक्षम झालेले पहायला मिळतेय. अशिक्षीत वर्ग कमी होऊन शिक्षित वर्ग थोड्याफार प्रमाणात का होईना पण वाढलाय. आणि तरीही अंधश्रद्धा कमी होत नसेल तर यासारखं मोठं दुर्दैव नाही.

     एखाद्या स्वयंघोषीत भोंदूबाबाच्या आश्रमासमोर एखादी मर्सिडीस सारखी गाडी उभी दिसली ना, तर माझी तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. आपल्याला चांगलं माहीत असतं की चमत्कार हे विज्ञानाचे अविष्कार आहेत आणि कोणत्याही आजाराचे निदान डाॅक्टरच करू शकतो. हे माहित असूनही आपला सुशिक्षित वर्ग काय विचार करून इथं नतमस्तक होतो, ते त्यांनाच ठाऊक.

        डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पाठपुराव्याने त्यांच्या मृत्यू पश्चात का होईना पण या कायद्याची निर्मिती झाली. पण या कायद्या अंतर्गत कारवाई किती जणांवर झाली हे विचारले तर ही संख्या अगदी बोटावर मोजता येईल इतकीच भरेल. पोलिस यंत्रणेतील पोलिस निरीक्षकांच्या वरच्या हुद्यावरील सर्वच अधिकारी नुसत्या संशयावरून ही कारवाई करू शकतात, पण आजपर्यंत त्यांचा नाईलाज माझ्यातरी लक्षात आला नाही.

     महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांचा विचार केला तर अंधश्रद्धेला पूर येण्याचं उगमस्थान हेच. आणि गरीबीने होरपळणारा समाज, अख्ख्या देशाचे बजेट पुर्ण करू शकेल एवढा पैसा दरवर्षी या मंदिरात देतो, आणि स्वतःला आत्मिक समाधान लाभल्याचं ढोंग आणून पूढील पाप करण्यासाठी मोकळा होतो. शिक्षण, विज्ञानवाद, सतसदविवेकबुद्धी किंवा विवेकवाद या गोष्टी मानवी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आज या सर्व गोष्टी माणसाकडे आहेत, पण या गोष्टींचा योग्यवेळी व योग्य ठिकाणी वापर केला जात नाही.

     माझ्या मते, अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी कायद्याची वाट बघण्यापेक्षा समाजाने जागृत होणे गरजेचे आहे, तरच दाभोळकरांसारख्या विचारवंतांचे बलिदान सार्थकी लागेल.
==============================

शीतल शिंदे - दहिवडी


   अंधश्रद्धा म्हणजे समाजाला लागलेली कीड , अंधश्रधा म्हणजे समाजाला लागलेली वाळवी .ही वाळवी आपल्याला कधी खावून टाकते म्हणजे दारीद्र्याकडे नेते आणी उध्वस्त करते ते कळतही नाही .
          शिवरायांनी त्यांच्या काळात हया गोष्टींचा कधीही महत्व दिले नाही .कारण त्यांचे गुरु संत तुकाराम ह्यांच्या विचारांवर ते चालत होते .त्यांनी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी  कोणतेही होम , हवन , मंत्र , तंत्र पूजा पाठ , विधी केले नाहीत .शिवरायांनी बरेच गड किल्ले अमव्शेच्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून जिंकले .त्यांनी कधी कोणत्याच किल्ल्याला काळी बाहुली , लींबु मिरची बांधली नाही .आपल्या राजाने नाही मग आपण का ?🤔 हा प्रश्न नाही का पडत ह्या रयतेला . ज्या रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी या राजानी आपले प्राणांचे बलिदान दिले .
    शिवरायांच्या साम्राज्यानंतर ह्या देशात स्वतःचे अस्तित्व राखण्यासाठी ह्या भोळ्याभाबड्या जनतेवर अंधश्रद्धेचे जाळे पसरवले गेले ते अजून काही निघालेच नाही .
          आज विजया दशमी दिन  याच दिवशी सम्पूर्ण जगामधे पसरलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार करणारा राजा सम्राट अशोक यांनी आपले हातातील शस्त्र खाली ठेवून जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बौध्द धम्माचा स्वीकार केला की जो
विज्ञाननावर आधारित आहे जेथे अंधश्रध्दा नसून  समता , करुणा , प्रज्ञा आहे. म्हणून हा दिवस विजया दशमी दिन म्हणून साजरा केला जातो . जगातील पहिला समाजकार्य करणारा राजा , युद्ध नको तर (शांती  ) बुद्ध हवा म्हणणारा आणी जगाला शांतीचा संदेश देणारा असा राजा होता .
       यांचे विचारांचे आचरण करणारे संत तुकाराम , शिवराय , राजे संभाजी , ह्याच विचारांचा वारसा पुढे चालवणारे,  ह्या समाज सुधारकांना सुद्धा प्राणांचे बलिदान द्यावे लागले .
    ह्या  समाजाला अंधश्रेतून बाहेर काढानारे दाभोळकर ह्यांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागले. 
   भारतीय संस्क्रुतीच्या  नावाखाली आपल्या समाजावर लादलेली अंधश्रद्धा ह्या समाजातील ऊच्य शिक्षित तरुणांनी मोडून काढल्या शिवाय समाप्ती होणार नाही .प्रत्येक तरुणाने आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे अंधविश्वासू , कुकर्म  , पूजा पाठ , जप तप , मंत्र होम हवन , प्राण्यांचे बलिदान , ह्या प्रतांना कडाडून विरोध केला पहिजे .तरच ह्या दरिद्र्याकडे नेणाऱ्या,  बुद्धीला गंज लावणाऱ्या आणी आशीर्वादाने मिळणाऱ्या गोष्टींकडे आशा लावून बसविन्यास भाग पाडणाऱ्या आशा थोतांड गोष्टींना  लाथाडुण  लावले पाहिजे तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वावलंबी होवू .

खरेतर अंधश्रद्धेचे  ग्रहण लावलेल्या या देशाला,
             भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला 26 जानेवारी 1949 रोजीच अंध श्रद्धा मुक्त केले आहे . हे सम्पूर्ण जगाला मान्य आहे फक्त भारतात राहानाऱ्या लोकांना हे मान्य करू दिले नाही काही समाज
कंठकानीं !
        ज्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  या भारत देशाला संविधान रुपी अनमोल ग्रंथ बहाल केला त्याच दिवसापासून भारतामध्ये, , , , 😁😁🤔🤔
   स्वर्गामधूण देवांची येणे जाणे बंदच झाले .त्याआधी सर्व देवी-  देवता स्वर्गामधून मुक्त पणे प्रुथ्वी वर मुक्तपणे संचार करत होते .आता काय टेक्स पडतो काय त्यांना ? 🤔

देवांचे प्रुथ्वीवर अवतार घेणेपण बंद झाले आणी समुद्र मंथन पण बंद झाले की हो ! जटा तून नदी वाहने बंद झाले , मळा पासून नवीन जीव तयार करने बंद झाले पाण्यावर तरंगणारे पूल पण कोण आता बंधू शकत नाही का बरे 🤔 हे व्हायला पहिजे ना आता , मग  का नाही .
आता काही कोण वरदान , शाप देत नाही .आणी आता पहिल्यासारखे देव दानव यांचे हवेतून युद्ध पण होत नाही किंवा प्रुथ्वी निशस्त्र  करणारे शूरवीर पण जन्माला आले नाहीत .
   काय जादू केली बाबासाहेबांनी जादू नाही केली  रात्रं दिवस अभ्यास करून आपले सर्व आयुष्य ह्या जनतेच्या सुखासाठी  संविधानाच्या माध्यमातून सर्वांना स्वातंत्र्य  हक्क ,  अधिकार  आणी सर्वस्व बुद्धी बहाल केली आहे,  आपण फक्त त्याचा वापर करायचा आहे .
  त्याच्याही पलीकडे जावून बाबासाहेबांनी 14 अक्टोम्बर 1956 रोजी  सम्पूर्ण मानव जातीला
तारनाऱ्या आशा बौध्द धर्माचा स्वीकार केला .त्याचे कारण हेच की हा एकच धर्म असा आहे की तो या बहुजन समाजाला या अंधश्रद्धेतून , दारिद्र्यातून , दुखः तून , गलिच्छ विचारातून आणी गुलामगिरीतून बाहेर काढन्याचा एकच पर्याय आहे म्हणून .       

बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते की हा धर्म काही साधा सुधा धर्म नाही ,  समाजाला ह्या  धर्माचे ,   तत्वाचे म्हणजे पालन करने फार अवघड जाईल परंतु माझ्या पुढे दुसरा कोणता मार्ग नाही की तो या भाबड्या समाजाला बाहेर काढेल , समानतेची वागणूक देईल , स्त्रियांचे शोषण थाम्बवेल  .ते म्हणाले

 हळूहळू होईल पालन - कारण मला ह्या शिवाय कोणताहि मार्ग मला  दिसत नाही .
मात्र काही समाज कंठकानीं बौध्द धर्म म्हणजे अमुक तमुक जातीचा असे सांगत वाईट प्रचार केला .

बाबासाहेबांनी हा धर्म का स्वीकारला ते त्यांनी स्वतः  लिहिलेल्या
 "बुद्ध आणी त्यांचा धम्म "
ह्या पुस्तकात त्यांचे विचार सविस्तर मांडलेले आहेत .हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचा .

ज्या दिवशी भारतामध्ये प्रत्येक घरा घरात संविधानाचे पाठ वाचले जातील , महापुरुषांच्या कार्याचे  धडे शिकवले जातील त्या दिवसापासून सम्पूर्ण भारतातील प्रत्येक घरातील प्रत्येक मूल
विज्ञानवादि  , अंध श्रद्धा मुक्त आणी  शास्त्रज्ञ होतील .
"जय भारत जय अंधश्रद्धा मुक्त संविधान "
==============================

निखिल खोडे, ठाणे


            आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे म्हणजे अंधश्रद्धा होय. अंधश्रध्दे मध्ये विविध प्रकार येतात उदाहरण. जादुटोणा, बुवाबाजी, भूत- पिशाच्च, अंगात भूत येणे, तंत्र- मंत्र, नरबळी, अफवा पसरविणे इत्यादी असतात. २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या प्रयत्नानंतर महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अमलात आणला. परंतु त्याची अंबलबजावणी खऱ्या अर्थाने होते का आणि  जास्त करून ग्रामीण भागात कायद्याची माहीती तरी आहे का? याला कारणीभूत ठरते तो म्हणजे खेड्यातल्या लोकांमधील अशिक्षितपणा आणि बुवाबाजी करणारे संधीसाधू लोक जे गरीब लोकांना देवाचा शाप बसेल वैगरे म्हणून लुबाडत असतात.
  
                उदाहरण म्हणून सांगतोय की  माझ्या गावाजवळून ५ किमी अंतरावर आजणसरा नावाचे गाव आहे. भोजाजी महाराज नावाचे देवस्थान आहे. त्याठिकाणी नवस फेडण्यासाठी वेगवेगळ्या गावावरून आलेले लोक  तिथे येऊन स्वयंपाक करतात. रविवारी आणि बुधवारी जवळपास १०० क्विंटल डाळीचे पुरण पोळ्या बनविल्या जातात. भक्तीच्या नावाखाली अन्नाची नासाडी ही खूप मोठ्या प्रमाणात होते. आणखी एक उदाहरण म्हणजे गिरड म्हणून एक गाव आहे, ज्यांचे कुलदैवत बुवाफरिद आहे ते लोक घरचा कोणताही आनंदाचा प्रसंग उदा. लग्न वैगरे असेल तर त्याआधी गिरडला जाऊन तलावाच्या ठिकाणी बोकडाचा किंव्हा कोंबडीचा बळी दिला जातो. यामुळे तलाव मध्ये प्रदूषण  खुप मोठ्या प्रमाणात होते. या प्रकाराला काय म्हणाव?

                   ढोंगी लोकांमुळे, अशिक्षितपणा मुळे, जुन्या परंपरेमुळे अंधश्रद्धेचे प्रमाण वाढले आहे. याला जबाबदार लोकांमधील काही गोष्टीबद्दल चा अज्ञानपणा आहे. टेलिव्हिजन वरील मलिका, बातम्या व इतर दाखविले जाणारे कार्यक्रम सुध्दा याला जबाबदार आहे परंतु त्यांना मिळणारा पैसा हा मोठ्या रकमेत असतो आणि लोकांची पसंती अश्याच कार्यक्रमाला जास्त असते त्यामुळे करमणुकीच्या नावाखाली अंधश्रध्दा फैलवणे चालु आहे. हे बंद व्हायला पाहीजे. ह्या उलट ह्या कायद्याचे जास्त प्रसार व प्रचार व्हायला हवा....
==============================

IMAGE SOURCE INTERNET

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************