आरोग्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आरोग्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आजारी आरोग्य व्यवस्थेवर औषध काय?

🌱 वि४ 🌿

आजारी आरोग्य व्यवस्थेवर औषध काय?

IMAGE  SOURCE  INTERNET 

डॉ. विजयसिंह पाटील,कराड.

आरोग्य सेवेचे दोन भाग होतात, एक शासकीय व दुसरा खाजगी.
येथे मी शासकीय आरोग्य सेवा ह्याबाबत लिहीत आहे. 
शासकीय आरोग्य सेवा आजारी असण्याची कारणे प्रथम पाहू...
(1)..आरोग्यासाठी असलेली अर्थसंकल्पीय तरतूद ही अतिशय कमी आहे. महाराष्ट्र शासन हे, एकूण उत्पन्नाच्या फक्त अर्धा टक्का, आरोग्य सेवेसाठी वापरते.
शासन दरडोई फक्त 840 रुपये खर्च करते...
(2) आरोग्य सेवेतील डॉक्टरांची रिक्त पदे,,, ह्याच प्रमाण जास्त आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची पदे मंजूर आहेत, तिथं किमान एक तरी पद रिक्त असतेच. एकाच डॉक्टर ने, पेशंट तपासायचे, कुटुंब नियोजन चे operation करायचं, भागातील उपकेंद्रांना भेटी द्यायच्या, जि. प.,, पंचायत समितीच्या मीटिंग ला हजर राहायचे व इतर अनेक कामे... त्या मुळे कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतोच..
(3)ग्रामीण/कुटीर/सिविल हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे,,, फिजिशियन, सर्जन, हाडांचे डॉ, इत्यादी जर नसतील, तर तालुका, जिल्हा पातळीवर
दर्जेदार सुविधा उपलब्ध होत नाहीत...
(4) सरकारी डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टिस करणे, इत्यादी
(5)डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था, अगदी वाईट नसली तरी, चांगलीही नाही, मूलभूत सुविधा पण काही ठिकाणी उपलब्ध नाहीत

जनतेला मोफत व चांगली आरोग्य सेवा देणे ही शासनाची जबाबदारी आहे, पण शासनाला ह्याचा विसर पडल्याचं दिसतं

आता ह्यावर उपाय काय ? 

(1) आरोग्यावर, अर्थसंकल्पीय तरतूद, किमान तीन हजार दरडोई करावी, काही राज्यात आहे, उदा, केरळ, गोवा..
(2) डॉक्टरांची रिक्त पदे शासनाने, लवकरात लवकर भरावीत, व हे फार अवघड नाही.
(3) तज्ज्ञ डॉक्टरांची पदे भरावीत, हे थोडे अवघड आहे,(कारण खाजगी प्रॅक्टिस सोडून, शासकीय सेवेत येण्याची शक्यता फार कमी) पूर्ण वेळ डॉ, मिळाले नाहीत तर part time डॉ ची नेमणूक करावी.. सध्या हा प्रयोग चालू आहे व बऱ्यापैकी यशस्वी पण होतोय.
(4)..खासगी प्रॅक्टिस वर निर्बंध आहेच, पण त्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक
(5) डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था ही चांगली च असली पाहिजे, व सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत




IMAGE  SOURCE   INTERNET

संदिप सावंत,

मुंबई


नमस्कार मित्रानो
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मानवी जीवन फारच कष्टमय झालेले आहे. त्यातच भरीसभर म्हणून नवनवीन आजार उदयास येत आहेत. निपाह, स्वाइन फ्लू , लेप्टो स्पारोसिस, डेंग्यू इत्यादी शिवाय ह्रदयविकाराचे आजार किडनीचे आजार कर्करोगाचे आजार असे कित्येक भयंकर आजार आहेत. काहींवर उपचार उपलब्ध आहेत काहींवर संशोधन सुरू आहे. पण सर्वात मह्त्त्वाचे म्हणजे या आजारबद्दल असलेली माहीती आणि उपचार पद्धती. लोकांना याबद्दल पूर्ण माहिती नसल्याने खुप मोठी समस्या निर्माण होत आहेत. त्या आजाराची योग्य ती माहिती आणि उपचार जर लोकांना समजली तर मला वाटते नक्कीच जनजागृती आणि यशस्वी पणे आपण अश्या प्रसंगाना सामोरे जाऊ शकतो


IMAGE  SOURCE   INTERNET

सौदागर काळे,

पंढरपूर. 


डॉ.अभय बंग एका व्याख्यानात आरोग्यावर बोलले होते त्यातील एक वाक्य सांगणे महत्त्वाचे वाटते.ते म्हणतात, "पहिली आरोग्य सेवा श्रद्धाराज होती तर दुसरी नोकरराज आणि तिसरी पैसाराज बनली." 

त्यांचे हे वक्तव्य  आपल्याला आजारी आरोग्य व्यवस्थेवर औषध शोधायला लावते.आणि वास्तवता दाखवते.

आपल्या देशातील ग्रामीण व दुर्गम भागातील समाज कुठंतरी अंधश्रद्धामधून
मुक्त होत होत दवाखान्याकडे पाऊल टाकत आहे.पण तिथे आपले दवाखाने त्यांचा विश्वास संपादन करू शकले नाहीत.हे तेवढेच सत्य.याचं कारण अंधश्रद्धेपेक्षा आरोग्य व्यवस्थेच्या अपुऱ्या सोयीमुळे जास्त माणसे दगावली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.उदा.काही महिन्यांपूर्वी गोरखपूर (उ.प्र.) येथे घडलेले ऑक्सिजन अभावी बाल हत्याकांड.

खाजगी दवाखाने मुळातच श्रीमंत लोकांची पसंती आहे.पण तिथे बाह्यवातावरण स्वच्छ असले तरी उपचार स्वच्छ मनाने होईलच याची खात्री नाही.
सरकारी दवाखाने फक्त गरीब लोकांसाठी नावापुरते आहे. थोडक्यात रडक्याचे डोळे पुसल्यासारखे . तिथे जाणारा गरीब माणूस सरकारी दवाखाने दर्जात्मक आहेत म्हणून नव्हे तर पैशाअभावी पर्याय नसतो यासाठी जात राहतो.अन दीर्घकालीन आजाराचे शिकार होत राहतो

मग औषध काय? 
1.वैद्यकीय शिक्षण मोफत करणे.
2.दवाखान्याची पायरीच चढू नये म्हणून निसर्गपूरक आरोग्यदायी वातावरण जिवंत ठेवणे.
3.सरकारने मुळावर घाव घालावेत.म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय योजनेवर लक्ष द्यावेत. उदा.सार्वत्रिक मोफत शुद्ध पेयजल.
4.नागरिकांनी प्रत्येक पक्षाने सदृढ आरोग्य व्यवस्था ही त्यांच्या जाहिरनामाचा प्रथम अजेंठा करावा यासाठी दबावगट करावा.
5.देशातील प्रमुख मंदिरांचा उदा. शिर्डी, बालाजी यांच्या दानपेटीतील निम्मा निधी आरोग्य व शिक्षण व्यवस्थेवर खर्च करणे.


IMAGE  SOURCE   INTERNET


डॉ. दिलीप कदम,

अहमदनगर


सरकारी खर्चा ने चांगले उपचार मिळाले पाहिजेत ही अपेक्षा आज तरी पुर्ण होणे शक्य दिसत नाही.

खाजगी आरोग्य व्यवस्था नफ्याच्या प्रेरणेतुन निर्माण झाली आहे त्यामुळे शोषण हे होणारच.

लोक आणि वैद्यकीय व्यवसायिक यांनी एकत्र येवून सहकारी रुग्णालये सुरु करून कार्यक्षम पद्धतीने चालविणे हा एकमेव पर्याय सध्या तरी उपलब्ध आहे.

शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीने आपले आरोग्य ‘फिट’ आहे का?


🌱 वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 22 वा 📝                                   
31मार्च ते 06एप्रिल 2018

शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीने आपले आरोग्य "फिट' आहे का?

(या विषयावर  किरण पवार , सत्तार शेख,अनिल गोडबोले यांनी मांडलेले मत सविस्तर वाचा तसेच यातील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत)


किरण पवार,औरंगाबाद


     मला वाटत ज्यांनी सध्या स्वतःला तिन्ही अंगांनी आरोग्य फिट ठेवलंय त्यांना खरंच मानल पाहिजे. मला एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते ती म्हणजे सध्याच मानसिक स्वास्थ्य फार ढासळलेल आहे ज्याचा शरिरावरही होतो आहे. आणि मानसिक स्वास्थ्य बिघडला मुळ कारण आपला *इंटरनेटला असलेला वापर.* फेसबुक आणि व्हाट्स अॅपच्या आहारी गेलेल्यांना जीवन *पोरखेळ* वाटत चालला आहे. 18 वर्षे हे वय आहे का एखाद्या मुलाला हार्ट अटॅक येण्याच? 

     सामाजिक स्वास्थ्याला घातक गोष्ट आपल *असमजुतदार* वागणं. आजकाल जशीजशी नवीन पिढी मी पाहतो आहे तसतस पिढी दर पिढी हा *समजून घेणे* नावाचा प्रकार लुप्त होत चाललाय. भविष्यात पुर्णच ही गोष्ट नाहीशी झाली तर काय होईल कुणास ठाऊक? सामाजिक स्वास्थ्याला घातक ठरते ती *तल्लक बुद्धीने व योग्य दृष्टीने न विचार करण्याची वृत्ती.*


सत्तार शेख
जामखेड, जि.अहमदनगर

      खरं तर एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जात असतानाच मानवी समुहाला वरिल प्रश्नांचा विसर पडलेला दिसतोय. आपण फिट राहावं या ऐवजी आपली आर्थिक ऐपत फिट ठेवण्यासाठीची सुरू असलेली जिवघेणी स्पर्धा मानवी जगण्याच्या तर्‍हा बदलवत चालली आहे. एकिकडे लाभासाठी एकत्रित येणारा समूह जसा आपला वाटतो तितकाच तो समूह सामाजिक पातळ्यांच्या विधायक अर्थात सामाजिक उत्क्रांतीच्या परिवर्तनीय कृतीशील उपक्रमांच्या अंगिकरणात मागे हटताना दिसतो.. याचा सरळस्पष्ट अर्थ सामाजिक असो अथवा व्यक्तिगत पातळीवर माणूस म्हणून अथवा मानवी समूहाच्या नेणिवा शारीरिक , मानसिक, आणि सामाजिक दृष्ट्या गंभीर आजारी पडू लागल्या आहेत. जर हा आजार असाच बळावत राहिला तर मानवी समूहांच्या जगण्याच्या तर्‍हांचे आरोग्य कायम सलाईनवर असेल यातून बाहेर पडण्याचा मार्ग जोवर मानवी समूह अथवा मानव स्वता:च्या माणूस असल्याच्या परिक्षेपाचा माणूस म्हणून नैतिकच्या बळावर  सामाजिक संरचनेची घडी बसवण्यासाठी कृतीशील होत नाही तोवर आधुनिक जगातील प्रगतशील मानव मानवी संस्कृतीचा विनाशाकडे एक एक पाऊल अतिशय वेगाने पुढे टाकत राहणार. या प्रक्रियेचा भाग बनलेला हरेक माणूस मग जगण्याच्या कलेपासून कायमचा वंचित राहणार हे वास्तव सत्य आहे. याला बदलण्यासाठी मानवता अन माणूसकी याशिवाय सत्य अहिंसा अन प्रामाणिकता या तत्वांचा अंगिकार सर्जनशीलपणे होणे आवश्यक आहे. 

अनिल गोडबोले,सोलापूर
जागतिक आरोग्य संघटनेने आरोफ्याची व्याख्या करताना अस सांगितल आहे कि आरोग्यपूर्ण कोणाला म्हणावे .... तर जो व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सुदृढ आहे तो आरोग्यदायी आहे. नुसता आजारी नाही म्हणजे तो आरोग्यपूर्ण होत नाही. 
तर आता या नुसार आपण आपला विचार करू. दरवर्षी ७ तारिखला जागतिक आरोग्य संघटने तर्फे जागतिक आरोग्य दिवस “साजरा” केला जातो. त्या नुसार ‘सर्वांसाठी आरोग्य’ असे ब्रीद वाक्य घेऊन WHO काम करत आहे. 

सर्वाना आरोग्यदायी राहता यावे या साठी प्रत्येक देश त्यांच्या देश मध्ये आरोग्य धोरण ठरवत असतो, त्यानुसार पैशाची तरतूद अंदाजपत्रकामध्ये केली जाते. एकूण देशाच्या अंदाजपत्रकातील हिशोबाप्रमाणे ५ % कमीतकमी पैसा हा आरोग्य क्षेत्रात दिला गेला पाहिजे परंतु भारतामध्ये २ % एवढा पैसा अंदाजपत्रकामध्ये दिला जातो.


हा झाला देशाचा प्रश्न.... पण आपण आपल्या मुलभूत गरजा मधील एक गरज असलेला प्रश्न म्हणजे आरोग्य. आपण खरोखर आरोग्यवर लक्ष देतो का ? मागील जीवनशैली च्या लेखामध्ये मी या संदर्भात लिहिले होते. फक्त काही प्रश्न आहेत त्यांची उत्तर आपल्याकडे आहेत का तेवध बघू...


मला जिना चढल्यावर धाप लागते का? थोड्या शारीरिक कष्टानी मी थकून जातो का? मी खाताना संतुलित आहार घेतो का? माझी खूप चिडचिड होते का? मला एखाद्याचा खूप राग येतो तेव्हा मला त्रास होतो का? समाजात घडलेल्या घटने कडे मी आपुलकी ने बघतो का? सरकारला संपूर्ण स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गाव, राष्ट्रीय आरोग्य अभियान राबवून आपल्याला आपली काळजी घेण्याबद्दल सांगण्याची वेळ का येते? 

बाकीकाही फार लिहित नाही.... आपण सगळे सोशल मिडिया तज्ञ आहोत. आरोग्य सारख्या गोष्टीवर देखील आपल्याकडे अर्धवट ज्ञान आहे किवा संपूर्ण अंधश्रद्धा आहेत.. 

मी प्रयत्न करतोय तुम्ही करताय का?

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************