कोरोना: वाढती बेरोजगारी व नैराश्य. (भाग-2/3)

प्रविण दळवी,नाशिक

कोविड-१९ महामारीमुळे जगासमोर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे हे संकट अनेक पातळ्यांवर आहे. वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक, मानसिक अशा विविध पातळ्यांवर मानवजातीसमोर संकट उभे राहिले आहे. कोविड-१९ महामारीचा प्रसार रोखण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊनची उपाययोजना केली आहे. कोविड-१९चा प्रसार रोखणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे मात्र लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. आर्थिक व्यवहारच थांबल्यामुळे किंवा फारच कमी प्रमाणात सुरू असल्यामुळे त्याचा विपरित परिणाम मनुष्यबळावर झाला आहे. कोविड-१९च्या संकटामुळे जगभरात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे आणखी एक नवे संकट उभे राहिले आहे. काही रोजगार आतापर्यतच्या कालावधीत गेले आहेत, तर काही रोजगार आगामी काळात जाणार आहेत. कोविड-१९ महामारीला रोखण्यावर सध्या सर्वच सरकारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावण्यात झाले आहे. अलीकडच्या काळात भारतात आणि जगभरातदेखील हळूहळू लॉकडाऊनमधून बाहेर येत अर्थचक्राला चालना देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र अजूनही कोविड-१९चे गांभीर्य मोठे आहे त्यामुळे ही दीर्घकालीन लढाई आहे. दुर्दैवाने नकळत या सर्व घटकांचा दीर्घकालीन मोठा परिणाम समाजातील कमजोर घटकांवर झाला आहे त्यांच्यासमोर आगामी काळात मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व परिस्थितीत मानसोपचार सेवा योग्यरितीने उपलब्ध होणे आणि त्यांचा सर्वसामान्यांना योग्य तो प्रतिसाद मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.


मीकवी,मंगळवेढा,सोलापूर

ह्या रोगराईला सामोरे जात असताना कित्येकांना आपला जीव गमवावा लागला तर कित्येकांना आपला रोजगार गमवावा लागला.मी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांपैकी एक आहे.खरं तर या स्पर्धेत जागा असतात 250 आणि उमेदवार असतात 4 लाख 50 हजार.उरलेल्या  4 लाख 49 हजार 750 उमेदवारांचं काय होईल...? आता ह्या सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगार कुठून उपलब्ध व्हायचा....


दुसरा मुद्दा :- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत मुलांना प्रशिक्षण दिलं गेलं पण ते खरंच योग्य आणि दिशादर्शक होत का...? हा प्रश्न मुळात मला सतावतो.


कोरोनाच्या काळात ना परीक्षा झाल्या ना कोणता रोजगार भेटला... मग आपलं जीवन जगायचं कस हा प्रश्न वारंवार आजच्या युवकाला पडतो....खरं तर याच प्रभाव उभरत्या भारतातील युवकावर पडत आहे.ना रोजगार उपलब्ध ना रोजगारक्षम मार्गदर्शन वा शिबिर. 


वाढतं नैराश्य :- जर रोजगार नसेल तर प्रत्येकजण तणावाखाली येणार हे साहजिकच आहे.आजचे युवक म्हणजे वय 18 ते 35 च्या आतील सर्व जण नैराश्याने जगत आहेत....एकीकडे कोरोना तर दुसरीकडे कोरोनाच्या प्रभावाने कमी होत असलेल्या नोकऱ्या.नैराश्याची अनेक कारणे येतात परंतु बेरोजगारी हे प्रमुख कारण आजकाल दिसत आहे.यावर उपाय सापडेल अस मला वाटत नाही...२०२७ पर्यंत भारत लोकसंख्या बाबतीत जगात एक नंबर होईल तेव्हा बेरोजगारी अजून कोणत्या थरापर्यंत जाईल हे अंदाजही लावू शकत नाही.


शुभम देशमुख,नांदेड़.

कोविड-१९ महामारीमुळे जगासमोर अभुतपुर्व संकट निर्माण झाले आहे. या महामारीमुळे आनेक क्षेत्र माघे पडले आहेत. आनेक बाबींवर याचा गंभीर असा परिणाम दिसून येत आहे, ज्यामध्ये आर्थिक, मानसिक, वैधकीय, सामाजिक आशा आनेक बाबी आहेत. मानवजातीसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे.हे संकट रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशानी वेगवेगळी उपाययोजना केली आहे पण बहुतांश देशांनी लॉकडाउनची उपाययोजना केलेली आहे. लॉकडाउन मुळे कोविड-१९ चा प्रसार रोखण्यास मदत तर होत आहे परंतु आर्थिक द्रश्ट्या आनेक देश मागे पडले आहेत. याच लॉकडाउनमुळे जागतिक आर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आनेक उद्योग-धंदे थांबले आहेत काही तर बंद पण पडले आहेत. उद्योग-धंदे बंद पडल्यामुळे किंवा जे सुरु आहेत ते खुप कमी प्रमाणात सुरु आहेत त्यामुळे बेरोजगारी पण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 


बेरोजगारी वाढल्यामुळे खुप जणांना नैराश्य आले आहे. त्याचा परिणाम आत्महत्येच्या प्रमाणावरदेखिल झालेला आहे. त्यामुळे आनखी एक मोठे संकट आपल्या पुढे उभे टाकले आहे. आता सर्वसामान्य माणूस जीव वाचवणार की आपली उपाजिविका वाचवणार काही कळत नाहिये. या संकटा मुळे पुर्ण मानवजाती खचली आहे. आपण सर्वानी मिळुन या संकटाला सामोरे जा लागेल. नियम पाळुनच आपल्याला या कोरोनाला टाळता येईल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************