देशद्रोह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
देशद्रोह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

संविधान जाळणे , हा नेमका कशाचा निषेध ?

संविधान जाळणे हा नेमका कशाचा निषेध?

संदिप बोऱ्हाडे, वडगाव मावळ,पुणे.
             आम्ही भारताचे लोक , या शब्दांनी भारतीय संविधानाची सुरूवात होते. सर्व भारतीय नागरिकांचा गौरव आणि सन्मान ग्रंथ म्हणजे संविधान.
संविधान आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देते.

    संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा. आपण ज्या देशाचे नागरिक असतो, त्या देशाचा कायदा आपल्याला पहिल्यांदा मान्य करावाच लागतो.
तो ज्यांना मान्य नसतो, तो माझ्या दृष्टीने देशद्रोहीच.
जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून आपला देश ओळखला जातो ते फक्त आपल्या संविधानामुळेच.

    जात, धर्म, रंग, वर्ण, लिंग कशाच्याही आधारे नागरिकांत भेदभाव करता येणार नाही,
हे संविधानाचं तत्व.. आपला राष्ट्रध्वज, आपले राष्ट्रगीत आणि आपले संविधान हे आपले सर्वांचे तीन मानबिंदू. जशी राष्ट्रध्वजाबद्दल, राष्ट्रगीताबद्दल तशीच आस्था देशातल्या नागरिकांना देशाच्या संविधानाबद्दलही हवी.

     भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या संविधानाचा अपमान काही लोकांनी केला आहे.
संविधान जाळणे ही देशातली सगळ्यात दुर्दैवी घटना आहे, या घटनेचा जाहीर निषेधच!
विषय कोणताही असो, तुम्हाला समर्थनार्थ किंवा विरोधात मत मांडण्याचा पुरेपूर अधिकार आहे. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचाही अधिकार आहे, पण संविधान जाळण्याच्या कृतीचं कदापि समर्थन होऊ शकत नाही. पण  संविधान जाळल्यानंतरही
या देशातील जनता जर अजूनही शांत रहात असतील तर हे देशाचं दुसरे दुर्दैव, जाती, जमातीच्या अफुच्या नशेत लोकं 'लोकशाही' ला सर्रासपणे पायदळी तुडवुन अपमान करीत आहेत, ही येणार्या काळात 'देशात अराजकतेची' वाटचाल असल्याची धोक्याची घंटा आहे!

     संविधान जाळण्याऐवजी एखाद्या धर्माचा ग्रंथ जाळला गेला असता, तर त्या धर्मातील लोकं पेटून उठले असते..
काय काय झालं असतं ह्याची प्रचिती सर्वांना आहेच.
मग राष्ट्रीय ग्रंथ जाळल्या गेला तर एकाही न्यूज पेपर ला न्युज चॅनेल नाही कि, उशिरा न्यूज चॅनेल्स वर चर्चा सुरु नाही. कारवाईच तर नाव नाही. अवघड आहे माझ्या देशाच..
   
      जस इतिहास , भूगोल, विज्ञान , गणित टप्याटप्याने शिकवले जाते. तस राज्याची घटना का नाही शिकवली जात....? पण हे कुणाला करायचच नाही, हे जर झाल तर  राजकारण " कस खेळल जाईल. कुणालाच संविधान साक्षरता नको.

शेवटी जर संविधान वाचले तरच देश वाचेल अन्यथा हुकूमशाहीच !!


 

अनिल गोडबोले , सोलापूर.
         लोकशाही मध्ये एखादी गोष्ट पटली नाही की निषेध करण्याचा अधिकार आहे. आणि निषेध करणे हे चांगल्या समाजाचे लक्षण देखील आहे..

पण ज्या नियमामुळे आपल्याला सर्व अधिकार मिळाले आहेत किंवा ज्या संविधानाला बनवायला आपले पूर्वज झटले, जे सर्वात मोठी लोकशाही आणि लिखित स्वरूपात असेलेले संविधान म्हणून प्रसिद्ध आहे. तेच जाळण्यात आले.

आपल्याकडे राष्ट्रीय प्रतीक हे खूप उच्च स्थानी असतात आणि त्यांचा अपमान करू नये यासाठी कायदे देखील आहेत..

परंतु आपण कायदे पाळतो कुठे? .. संविधानाचा अपमान तर देश चालवणारे पदोपदी करत असतात म्हणून खरतर संविधान जळणाऱ्या पेक्षा ते काही कमी दोषी नाहीत.

संविधान जाळणे हा नेमका भारतीय म्हणून स्वस्तात मिळालेल्या अधिकारांचा निषेध आहे.
माणुसकीचा निषेध आहे.
प्रत्यक्ष कृती करताना त्यांना काहीच वाटले नाही, कारण त्यांना असाच इतिहास सांगितला गेला आहे जो द्वेषमूलक विचाराने प्रेरित आहे.

कायदा मोडणारे, संविधान जळणारे किंवा देशा विषयी उदासीन असणारे किंवा देशाच्या हिताचा निर्णय न घेणारे हे सगळेच देशद्रोही आहेत.

आरक्षणाचा मुद्धा किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा मुद्धा हा निमित्तमात्र आहे.

संविधान आहे म्हणून तर आपण सगळे बोलू शकतो नाहीतर मुंडकीच उडवण्याची पद्धत होती राजेशाही मध्ये..

मला वाटत फक्त मतांसाठी केलेलं राजकारण आहे. मूळ मुध्ये बदलून टाकायचे किंवा भावनिक खोट्या मुध्या मध्ये तरुण वेगळा करायचा आणि मत मिळवायची पुन्हा सगळे जिकडे तिकडे... असा प्लॅन आहे सगळा

कुठल्याच राजकीय पक्षाला विकास आणि मूलभूत हक्कांसाठी काम करायचंच नाही.. त्यांना फक्त या आणि अशाच मुद्यावर विचलित करणे हाच खेळ आहे असं चित्र दिसत आहे..

पण संविधान जाळणे हे निंदनीय कृत्य आहे. त्याच समर्थन कधीच।करता येणार नाही.


 

शिरीष उमरे नवी मुंबई

तसा मी वैश्विक विचारसरणीचा पण आपल्या देशाची संस्कृती व संविधान बद्दल मला खुप अभिमान आहे.

*वसुधैव कुटुम्बकम्* हे प्रत्येक भारतीय मानत असला तरी मानवाने जमीनीवर व परस्परात रेघोट्या ओढुन कीतीतरी भिंती उभ्या केल्यात.  त्या उध्वस्त झाल्या आपल्या संविधान मुळे !!

एकच पृथ्वी आहे आणि आपला देश  वैश्विक विचारसरणीचा पुरस्कर्ता ✨👍🏻 पण काही समाजकंटक परत द्वेषाच्या रेघोट्या ओढुन मनामनात चरे पाडुन आपल्या मध्ये जातीधर्माच्या भिंती उभारण्याच्या  तयारीत आहेत...

यामागील खरे कारण राजकारण .... निवडणुका जवळ आल्या की ह्या जनावरांच्या कटकारस्थानाला सुरुवात होते...
हे दंगली घडवुन आणतील... सातवा वेतन आयोगाचे गाजर दाखवतील... कदाचित शेजार राष्ट्रासोबत युध्द घडवुन आणतील. आरक्षण आंदोलने, पुतळे विटंबना, हींसा, खुन, रेप तर होतच राहतील... कोणता पक्ष कीती वर्ष जुना आहे ह्या ला महत्व नाही... देशसेवेत व विकासात त्यांचे काय योगदान राहीले हे महत्वाचे !!

संविधान जाळल्या गेल्यावर  मिडीया कीती विकल्या गेली आहे हे लक्षात आले. राजकीय पक्ष आपली पोळी भाजुन घेत आहेत...आपण सामान्य माणसे स्वताचे डोके फीरवुन घेतोय.  ह्या विकृत लोकांचा निषेध करुन होणार नाही...

सडेतोड उत्तर द्या ...

 निवडणुकीत जातपात धर्म आणि राजकीय पक्ष न बघता निष्कलंक, निगर्वी, निष्कपटी, भ्रष्टाचारी नसलेला, गुन्हेगार नसलेला, रेपीस्ट/मर्डर/डाका न करणारा, युवा व सच्चा नागरिक असलेल्या उमेदवाराला निवडुन द्या 🙏🏼




प्रविण, मुंबई
           स्वतंत्र भारताच्या सुरवातीला अनेक वर्ष जातीय बंधनात अडकलेला एक मोठा शोषित वर्ग या देशात होता, त्यांना मुख्य प्रवाहात आणण हे मोठ आवाहन या देशासमोर होत. हजारो वर्ष दबलेला समजा, त्याच्या न्याय हक्कापासून वंचित होता आणि मानव असूनही अमानवी आयुष्य कंठीत होता. स्त्री ला कस्पटासमान मानणारा पुरुषप्रधान समाजच त्यावेळी प्राबल्य होत. तिला डावलून देशकार्य करण कठीणच होत. ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशासमोर अनेक समस्या होत्या. दलित आणि महिला या वंचित घटकांच्या प्रगतीशिवाय देश प्रगत होणार नाही. याची जाणीव तात्कालिक पुरोगामी नेत्याना होती. त्यामुळे एक सर्वसमावेशक संविधान देण गरजेच होत.

बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तशी एक घटना तयार हि केली. We the people of India ….अशी संविधांनाची सुरवात होते. संविधानाने आपल्याला माणूस म्हणून जगायचा अधिकार दिलाय. अधिकारासोबत त्यात अनेक गोष्टींची तरतूद केली गेली आहे कि जेणेकरून शोषित घटकांना न्याय मिळावा, समाजात एक स्थान मिळव आणि एक आदरपूर्वक आयुष्य जगता याव. पण ज्यावेळी घटना तयार झाली तेव्हापासून काही धर्मांध आणि मुलातात्वाद्याकडून सतत संविधानाची अवहेलना केली गेली आणि आजही चालू आहे. ९ ओगस्ट २०१८ ला  जे संविधान जाळण्याच प्रकरण झाल हे धर्मांध शक्तींनी पेरलेल्या द्वेषातून घडल आहे. या घटनेचे बीज हे धर्मांध शक्तीकडून रोवले गेले आहेत. हि धर्मांध बीजे  आपल्या नेहमीच आपल्या समोर अनेक माध्यमातून पेरले जात असतात, कधी ती संघटनेच्या रुपात, कधी बिनडोक नेत्यांच्या भाषणातून, तर कधी सोशल मेडिया च्या रुपात बीजारोपण चालू आहे.
संविधान जाळण हा नेमका कशाचा निषेध होता?

हा निषेध देशाच्या “धर्मनिरपेक्षतेचा” होता.....

हा निषेध देशातील प्रत्येक पुरोगामी लोकांचा, त्यांच्या विचारांचा निषेध होता, ...

हा निषेध लोकशाहीचा होता.....

हा निषेध मानवाला मानव मानणाऱ्या विचारसरनीचा होता......

देशामध्ये अशा घटनेची वेळ नेमकी का आली याचा विचार करणे गरजेच आहे. हा दोष हा त्या २०-२५ लोकांचा, ज्यांनी संविधान जाळले त्यांचा नाही. त्यानी हे कृत्य केल कारण कोणीतरी त्यांना प्रभावित करत होत. या निषेधाला समर्थन होत ते मानुवाद्यांच, कारण मनुवाद जिंदाबाद चे नारे त्यावेळी लावले गेले. या आधी असा प्रकार नाही झाला गेल्या ५ वर्षातील घटना जर पहिल्या तर संविधान जाळण्याचे बीज कसे रोवले गेले हे कळून येईल.

देशात मोठ्या पुरोगामी नेत्यांच्या हत्या झाल्या ...डॉ . दाभोळकर, कॉ पानसरे, कलबुर्गी आणि गौरीलांकेश यांची हत्या धर्मांध लोकांकडून झाली पण तपास शून्य. दोनच दिवसापूर्वी उमर खालीद वर भ्याड हल्ला झाला.

भीडतन्त्रचा वापर करून गोराक्षेच्या नावाखाली अल्पसंख्याकांच्या झालेल्या हत्या
मेडिया ला हाताशी घेऊन जातीवाद, भ्रष्टाचार ला  विरोध करणाऱ्या JNU च्या विद्यार्थ्यांच्य

बनावट चित्रफिती करून त्यांना देशद्रोही करण्याचा झालेला प्रयत्न

सतत हिंदू-मुस्लीम वादावर प्राइम टाइम मध्ये विकलेल्या वृत्तवाहिन्यांकडून दाखवण्यात येणार्या चर्चा (भांडण)

भीमा-कोरेगाव दंगल, त्याचा कुचकामी तपास आणि मेडिया ट्रायल द्वारे पसरवला गेलेला द्वेष

हे सर्व गेल्या चार वर्षात या देशाने पाहिलं त्यामुळे संविधान जाळणे हि घटना आश्चर्य करणारी नक्कीच नाही. शेकडो आश्वासन देणारे आणि ते पूर्ण झाले असे छाती ठोकून सांगणाऱ्या मोदींचा सर्वात मोठा पराभव हा ९ ओगस्ट २०१८ ला झाला. देशाचा अभिमान जाळला गेला.. संविधान जाळल गेल त्याचा निषेध फारच दुर्मिळ वाटला आणि नेहमी प्रमाणे यावरही प्रधानसेवकांची NO COMMENT . इथ मनात विचार आल कि जर एखाद्या धर्माचा ग्रंथ जाळला असता तर काय झाल असत? ....

देशातील बराच मोठा वर्ग आहे (मग तो कोणत्याही जातीचा वा धर्माचा असो) जो आपली सद्सदविवेक बुद्धी  काही नेत्यांकडे गहाण ठेऊन असामाजिक कृत्ये करत आहे. (जर स्वतःची सद्सदविवेक बुद्धी वापरून संविधान वाचल असत तर कदाचित ते  जाळण्याच कुकर्म केलेंच नसत ). स्वतंत्र दिनी अशी अपेक्षा करतो कि अशा वर्गाला उसन्या विचारांकडून स्वतंत्र मिळू दे. देशाला संविधान पुढे नेऊ शकत ना कि कुठला धर्म, पंथ वा जात. १९४७ साली देश राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झाला पण सामाजीक परतंत्र तसेच राहिले. या देशा आज गरिबी पासून, उपसामारीपासून, जातीवादापासून आणि उसन्या भडकावू विचारांपासून  स्वतंत्र हव आहे आणि संविधान हाच एकमेव मार्ग आहे. या लेखाद्वारे सर्व भारतीयाना कळकळीची विनंती आहे कि संविधान वाचवा तरच देश वाचले अन्यथा शिल्लक राहील निव्वळ अराजकता ज्यात माणुसकी नसेल.


 
 क्षितीज गिरी,  सातारा.
              दिल्ली मध्ये जंतर मंतर वर भारतीय सविधन जाळले ऐकून मला धक्काच बसला.?का जाळले असेल त्यांनी जगातील सगळ्यात मोठी लोकशाही व्यवस्था असलेले जगानी आदर्श घेतलेले भारतीय  संविधान? त्यांना नक्की सांगायचे तरी काय होते.sc-st अॅक्ट ला विरोध करण्यासाठी त्यांनी चक्क भारतीय संविधान जाळावे ?का मनुस्मुती चा उदो उदो करण्यासाठी?बाबासाहेबांचा विरोध करण्यासाठी संविधान    जाळावे?नक्की काय ठोस कारण असावे की त्यांना हे पाऊल उचलावे लागले.या पाठीमागे त्यांची कोणती नक्की मानसिकता होती.कारण घोषणा तर sc-st अक्ट रद्द करा,आरक्षण रद्द करा,मनुस्मुती जिंदाबाद ,बाबासाहेबांबद्दल अपमानजनक घोषणा दिल्या.
        थोडक्यात सांगायचे झाले तर sc-st act रद्द करा म्हणजे त्या समाजाने संरक्षण नका मागू   अन्याय सहन करा,आरक्षण रद्द करा म्हणजे प्रतिनिधित्व नका मागू,मनुस्मुती जिंदाबाद म्हणजे आमच्या जातीचे वर्चस्व राहू द्या जसे पाहिले होते तसे.आणि बाबासाहेबांना विरोध म्हणजे त्यांच्या समतेच्या विचारांना  विरोध.पण यांची हिम्मत कशी झाली सरळ सरळ विरोध करायची.मागून वार करणारे आज समोर कसे आले.पण जाऊ द्या त्या निमित्त का होईना त्यांची खरी मानसिकता तर आपल्या समोर आली.
       मला तर वाटते मुसलमान तर बहाणा आहे खरा निशाणा इथला बहुजन समाज आहे.तो कधीच सगळ्याच्या बरोबर आला नाही पाहिजे.मागासच राहिला पाहिजे त्याच्या पायाखाली.तरच त्यांना त्यांच्या जातीचा मोठेपणा मिरवता येईल.म्हणजे आमची प्रगती नाही झाली तरी चालेल पण इथल्या बहुजन समाजाची होता कामा नये.अशी अतिशय खालच्या पातळीची विचारसरणी असलेले हे देशद्रोही. असमानतेचा पुरस्कार करणारे भडवे, समानतेचा संदेश देणाऱ्या माहामानवांचा अपमान करणारे कुत्रे,जातीय विष पसरविणाऱ्या हरामखोरांना फाशीची शिक्षा पण कमी पडेल.ती तरी लवकरात लवकर भेटावी इवढीच ती माफक अपेक्षा.




दर्शन जोशी, संगमनेर.
      देशाच्या राज्यकारभाराची माहिती ज्या पुस्तकात असते त्याला त्या देशाचे संविधान म्हणजे constitution  असे म्हटले जाते. प्रत्येक देशाची संसद  , राज्यकारभार करण्याची पद्धत वेगवेगळी असते.

       आपल्या भारताचे वैशिष्ट्य असे की भारताचे संविधान हे जगातील एकमेव प्रदीर्घ व लिखित संविधान आहे. सुमारे 63 लाख रुपये खर्चून संविधानाची निर्मिती झाली आहे. हे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समितीचे अध्यक्ष  डाँ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या समितीतील सदस्यांना 2 वर्षे , 11 महिने व 18 दिवस लागले आहेत.

      परंतु  " जेथे पिकते तेथे विकत नाही " या म्हणीनुसार आम्हां भारतीयांना संविधानाची किंमत कळत नाही. मनुस्मृतीचे दहन करण्यामागची बाबासाहेबांची भूमिका लक्षात न घेता विनाकारण सरसकट ग्रंथांचे दहन करुन सदर ऐतिहासिक प्रसंगाला जातीय रंग देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारत हे सार्वभौम, समाजवादी , धर्मनिरपेक्ष ,लोकशाही गणराज्य आहे या विचाराला स्वत:च्या व्यक्तिगत स्वार्थासाठी सोयिस्करपणे फाटा देण्यात आला आहे. हे टाळण्यासाठी शासकिय पत्रकातून जात , संवर्ग , प्रवर्ग तसेच तत्सम धार्मिक शब्द यांना बाजूला ठेवून " भारतीय " हा एकच अजेंडा जोपर्यंत ठेवला जात नाही , तोपर्यंत आपल्यासाठी प्रत्येक प्रसंग हा युद्धाचाच आहे , हे नक्की !



 

शीतल शिंदे -दहिवडी.

 " विनाश काले विपरीत बुद्धि"  म्हणतात तसे. संविदान  जाळने म्हणजे संविधानाने लोकांना त्यांचे हक्का नी अधिकार संमजायला लागलेत म्हणून, आमच्या हातून सत्ता जावू नये म्हणून, प्रत्येक जाति धर्मा मधे तेड निर्माण व्हावि म्हणून,आणि मनुवा दाचि पोळी भाजावि म्हणून, पण ज़हाले उलट.आज संविधान जा ळ ले म्हणून सर्वाना दिसले समजले,पण हे काम खुप वर्षा पूर्वीपासून चालू आहे चेहऱ्यावर मुखवटा घालून.हिंदू विरोधी मुस्लिम भांडण लावणे_ ex "गोदरा 
 हत्याकांड" कायदा बदलू पहाने,
sc st obc मुले आम्हाला आरकक्षण नहीं ही भावना हिंदूंच्या मनात भरविने,पण जतनिहाय किती आरक्षण खरे किती मिलते हे कोणी पाहिले आहे काय? आणि बकीच्या  48%मधे नेमके आरक्षन कोण घेते हे  कोण पाहतेय का?
हेच भाड़खाऊ निषेध् करणारे स्वताच्या आई बहिनीला का शिक्षण देतात का पार्लमेंट पर्यन्त का पोहोचवतात,मनुस्मृति च्या गटारी का य दया प्र माने का नाही चुल नी मुल ठेवत. पाठवा की सति करा की मुंडन स्वताच्या घरातील महिलांचे.
      मकडानो तुमचा बाप आला होता काय संविधान लिहायला.तेव्हा तुमची डोकी पानी पित होती काय.सर्वानीआमचेच पाय चाटावेट ही तुमची भावना  आता लोकांच्या लक्षात आली आहेत.
      स्वातंत्र मिळले ते फक्त इंग्रजापासून, मनु शाही तशीच राहिली, श्रेष्ठ शेती आणि कनिष्ठ नोकरी म्हणना रे स्वता नोकरी करतात आणि दुसर्यां ना किसान बना म्हणतात.
     त्यांचे काय चुकतेय म्हणा आपणच बुद्धि ग हा न ठेवली आहे. जन्माच्या अधिपासुन च भविष्य पहयाचे ,त्यांच्या शि वा य पान च हालात नाही आपले .बाघा पंचांग दया मंदी रात दा न
       बकीच्या जातीत ,__मुस्लिम,क्रीचन बौद्ध etc जातीत आपापल्या च लोकांकडून धार्मिक विधि करतात मग काय जिवंत आहेत ना ते लोक, का डिवोस ज़हाले त, आहे ना सर्व ठीक .
      उलट या प्रकारामुळे सर्व भारतीय जागे ज़हाले आहेत .सर्वांना संविधना चे महत्व कळू लागले आहे .ज़ोपलेले जागे केले.
       तुमच्यासार ख्या देशद्रोहिनी हे काम केले म्हणून बाबासाहेबांचे महत्व्व कमी होणार नाही.
      ह्यांच्या पेक्षा पाकिस्तानी बरे एवढे मोठे हे आतंकवादी आहेत आणि सरकार जार पाठिंबा देणारे असेल तर ते महा आतंकवादी ठरेल.


 *केरळ वाट बघत आहे आपल्या मदतीची 🙏🏼*
( Do good and someone will return the favour in doing good for you too.



Note: (All images are taken from internet.)

देशप्रेमी आणि देशद्रोही याची नेमकी व्याख्या काय ?

देशप्रेमी आणि देशद्रोही याची नेमकी व्याख्या काय ?

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

देशप्रेम आणि देशद्रोही याची नेमकी व्याख्या काय ?


Source: INTERNET
-तेजस महापुरे
कराड
                   दोन्ही शब्दातच याचा अर्थ दडलेला आहे,देशप्रेम याचा अर्थ देशावर असलेलं निस्सीम प्रेम आणि देशद्रोह म्हणजे देशाशी केलेली गद्दारी या ढोबळमानाने होणाऱ्या व्याख्या.. आता आपण याचे सविस्तर पैलू पाहू,खरे देशप्रेम जर पाहायचे असेल तर आपल्याला ते स्वातंत्र्यपूर्व काळात जास्त दिसेल,आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकपासून ते ज्या महापुरुषांनी या चळवळी निर्माण केल्या त्या मागे निस्सीम देशप्रेमाची भावना होती..आणि त्यावेळचे देशद्रोही म्हणजे ज्यांनी फितुरी केली,लालसेपोटी ब्रिटीश लोकांची चाकरी केली ते म्हणजे देशद्रोही...देशाने माझ्यासाठी काय केल यापेक्षा मी देशासाठी काय केल हा जेव्हा प्रत्येक जण विचार करेल तेव्हा ते खरे देशप्रेम असेल,जेव्हा आपल्याला देशाच्या प्रतिज्ञेचा अर्थ खऱ्या अर्थाने समजेल आणि ती आचरणात आणली जाईल ते खरे देशप्रेम असेल,देश म्हणे आपण सर्व लोकच मिळून बनलेला आहे, जर एखाद्याच्या कृत्याने कोणाला बाधा झाली,हानी झाली तर तोही देशद्रोहच आहे,भ्रष्टाचार  करणे,जातीय दंगली घडवणे,समाजातील चांगल्या काम करणाऱ्या वैचारिक,पुरोगामी लोकांच्या हत्त्या करणे व ते करणाऱ्यांना पाठीशी घालणे हा देखील देशद्रोह होय,मग देशप्रेम म्हणजे काय फक्त पोलीस होणे,सैनिक होणे एवढेच मर्यादित नाही,तर पहिल्यांदा आपण भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीय आहोत ही भावना निर्माण ज्याच्या मनात होईल तो खरा देशप्रेमी असेल,आणि जो भ्रष्टाचारी असेल,जातीवादी असेल,फक्त
स्वतःचाच विचार करणारा असेल तो देशद्रोही.....


Source: INTERNET
-जयंत जाधव,
 लातूर

    सध्या देशप्रेम व देशद्रोह म्हणजे नेमके काय याबाबतीत कमालीचा संभ्रम देशात निर्माण झालेला आहे.कारण प्रत्येक जण सोयिस्करपणे आपणास पाहिजे तसा अर्थ लावत आहे.सर्वात जास्त गैरसमज हे देशप्रेम व देशभक्ती यांना एकाच साच्यात मापन किंवा मोजले जाते.ह्यात फरक हा असलाच पाहिजे.भक्ती ही आंधळी असते पण देशप्रेम हे आंधळे नसते.आपण देशावर प्रेम करु शकतो पण भक्ती नाही. ऐखाद्या गोष्टींची पूजा केल्यास त्याला अलौकिकत्व प्राप्त होते.करायचे असले तर देशावर प्रेम करा.उदाहरणार्थ जपानच्या नागरिकांना सारखे.
        धर्माबद्दल एखाद्या गोष्टीला विरोध केला की तो देशद्रोही असा त्या व्यक्तीवर ठपका ठेवला जातो, 10-15 वर्षांपूर्वी बोलण्याचे जे स्वातंत्र्य होते तेही आता कमी होत आहे.जेएनयू प्रकरणानंतर ‘देशद्रोह’ व्याख्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली.
भोपाळमधील मोतीलाल विज्ञान महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने ही कारवाई केली आहे. ‘भगत क्रांति दल (बीकेडी) या संघटनेसोबतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही भगतसिंह यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 23 मार्च रोजी कार्यक्रमाची परवानगी मागितली होती. महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार होता, परंतु व्यवस्थापनाने त्याला परवानगी दिली नाही. यानंतर संतप्त झालेल्या बीकेडीची सदस्य असलेल्या अस्मां खान या विद्यार्थीनीने फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यात तिने महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकांना देशद्रोही म्हटले होते.
       राजद्रोहाचा होणारा गैरवापर थांबवायचा असेल तर व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. कारण राजद्रोहाची कायद्याच्या चौकटीतील तील व्याख्या आणि लोकांच्या आकलनातील व्याख्या यांत तफावत आहे.‘लोकशाही व्यवस्थेत राजद्रोह ही संकल्पनाच कालबाह्य़ ठरु शकत नाही. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये व्यापक जनहित लक्षात घेता अत्यंत टोकाच्या स्थितीत कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी राजद्रोहाची तरतूद ही खूप आवश्यक आहे. व्यापक जनजागृती आणि सरकारकडून ‘राजद्रोह’ कायद्याच्या जबाबदार उपयोगासाठी जागृत जनमताचा रेटा, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील ‘संतुलन’ अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
देशप्रेम व देशद्रोह साठी कोणत्याही धर्माच्या लोकांना दोष देऊ नये, माणुसकीला समाजामध्ये विभागणे ही चुकीची कृती ठरते, ही लढाई चांगल्या आणि वाईट गोष्टी ठरवण्यासाठी आहे. कोणाच्या बाजूने उभे राहायचं हा निर्णय आपला आहे,पण कायद्याला दुर्लक्षित करणे शक्य नाही.


Source: INTERNET
-करण बायस
जि. हिंगोली

देशद्रोह या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर तो म्हणजे ‘देशासोबत केलेला विश्वासघात’ होय.आजकालच राजकारण बघून असं वाटतं की देशद्रोही म्हणजे फक्त आपल्या देशातील काही गुपीत गोष्टी शत्रू देशाला सांगणे किंवा सरकार विरोधात बोलणे किंवा देशाविरोधात बोलणे.
काही उद्योजक बँकेचा पैसा घेऊन फरार झालेत, देशात अधिकार्यापासून ते राजकारणी लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोक भ्रष्टाचारी झालेत किंवा अस पण म्हणता येईल की ते फक्त स्वतः साठी कमवत आहेत.
आज कित्येक लोकं उपाशी झोपतात, कित्येकांना राहण्यासाठी घर नाहीत या लोकांची फसवणूक म्हणजे देशद्रोह नाही का ?
आपल्या देशात विकासाच्या नावावर राजकारण होत, लोकांना काही मुद्द्यांवर भडकावून विरोधी पक्ष आपल्या हातात सत्ता कशी येईल यासाठी मोर्चे काढून वातावरण बिघडवण हा देशद्रोह नाही का ?
लोकांना निवडणूक जवळ आली की काही पैसे देऊन मत विकत घेणे आणि जनतेला खोटे आश्वासन देऊन तात्पुरत समाधान करणं हे देशद्रोह नाही का ?
आणखी आपण किती दिवस जात आणि धर्म हे मुद्दे घेऊन मोर्चे काढणार आणि आणि काही देशद्रोही लोकांना या मुद्द्यांवर राजकारण करू देणार?
काही मुठभर लोकांनी समाजाला सुधरवण्याचा प्रयत्न केला किंवा अशा लोकांच्या विरोधात लिखाण केले आणि समजाला खरं ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची हत्या करण्यात येते हा देशद्रोह नाही का ?
देशप्रेम शिकावं तर गांधीजी, भगतसिंग, देश सीमेवर लढणाऱ्या जवनांकडुन.स्वतः थोडं जागृत राहून या भ्रष्टाचारी, खोटे आश्वासन देणारे लोकांपासून लांब राहिले आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष दिले तरी ते देशाला प्रगतीकडे घेऊन जाईल.
माणसाला जर स्वतःची जाणीव असेल की आपण कोण आहोत आणि काय आहोत तो स्वतः प्रगती करण्याचा प्रयत्न करतो.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************