देशप्रेमी आणि देशद्रोही याची नेमकी व्याख्या काय ?

देशप्रेमी आणि देशद्रोही याची नेमकी व्याख्या काय ?

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

देशप्रेम आणि देशद्रोही याची नेमकी व्याख्या काय ?


Source: INTERNET
-तेजस महापुरे
कराड
                   दोन्ही शब्दातच याचा अर्थ दडलेला आहे,देशप्रेम याचा अर्थ देशावर असलेलं निस्सीम प्रेम आणि देशद्रोह म्हणजे देशाशी केलेली गद्दारी या ढोबळमानाने होणाऱ्या व्याख्या.. आता आपण याचे सविस्तर पैलू पाहू,खरे देशप्रेम जर पाहायचे असेल तर आपल्याला ते स्वातंत्र्यपूर्व काळात जास्त दिसेल,आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकपासून ते ज्या महापुरुषांनी या चळवळी निर्माण केल्या त्या मागे निस्सीम देशप्रेमाची भावना होती..आणि त्यावेळचे देशद्रोही म्हणजे ज्यांनी फितुरी केली,लालसेपोटी ब्रिटीश लोकांची चाकरी केली ते म्हणजे देशद्रोही...देशाने माझ्यासाठी काय केल यापेक्षा मी देशासाठी काय केल हा जेव्हा प्रत्येक जण विचार करेल तेव्हा ते खरे देशप्रेम असेल,जेव्हा आपल्याला देशाच्या प्रतिज्ञेचा अर्थ खऱ्या अर्थाने समजेल आणि ती आचरणात आणली जाईल ते खरे देशप्रेम असेल,देश म्हणे आपण सर्व लोकच मिळून बनलेला आहे, जर एखाद्याच्या कृत्याने कोणाला बाधा झाली,हानी झाली तर तोही देशद्रोहच आहे,भ्रष्टाचार  करणे,जातीय दंगली घडवणे,समाजातील चांगल्या काम करणाऱ्या वैचारिक,पुरोगामी लोकांच्या हत्त्या करणे व ते करणाऱ्यांना पाठीशी घालणे हा देखील देशद्रोह होय,मग देशप्रेम म्हणजे काय फक्त पोलीस होणे,सैनिक होणे एवढेच मर्यादित नाही,तर पहिल्यांदा आपण भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीय आहोत ही भावना निर्माण ज्याच्या मनात होईल तो खरा देशप्रेमी असेल,आणि जो भ्रष्टाचारी असेल,जातीवादी असेल,फक्त
स्वतःचाच विचार करणारा असेल तो देशद्रोही.....


Source: INTERNET
-जयंत जाधव,
 लातूर

    सध्या देशप्रेम व देशद्रोह म्हणजे नेमके काय याबाबतीत कमालीचा संभ्रम देशात निर्माण झालेला आहे.कारण प्रत्येक जण सोयिस्करपणे आपणास पाहिजे तसा अर्थ लावत आहे.सर्वात जास्त गैरसमज हे देशप्रेम व देशभक्ती यांना एकाच साच्यात मापन किंवा मोजले जाते.ह्यात फरक हा असलाच पाहिजे.भक्ती ही आंधळी असते पण देशप्रेम हे आंधळे नसते.आपण देशावर प्रेम करु शकतो पण भक्ती नाही. ऐखाद्या गोष्टींची पूजा केल्यास त्याला अलौकिकत्व प्राप्त होते.करायचे असले तर देशावर प्रेम करा.उदाहरणार्थ जपानच्या नागरिकांना सारखे.
        धर्माबद्दल एखाद्या गोष्टीला विरोध केला की तो देशद्रोही असा त्या व्यक्तीवर ठपका ठेवला जातो, 10-15 वर्षांपूर्वी बोलण्याचे जे स्वातंत्र्य होते तेही आता कमी होत आहे.जेएनयू प्रकरणानंतर ‘देशद्रोह’ व्याख्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली.
भोपाळमधील मोतीलाल विज्ञान महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने ही कारवाई केली आहे. ‘भगत क्रांति दल (बीकेडी) या संघटनेसोबतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही भगतसिंह यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 23 मार्च रोजी कार्यक्रमाची परवानगी मागितली होती. महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार होता, परंतु व्यवस्थापनाने त्याला परवानगी दिली नाही. यानंतर संतप्त झालेल्या बीकेडीची सदस्य असलेल्या अस्मां खान या विद्यार्थीनीने फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यात तिने महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकांना देशद्रोही म्हटले होते.
       राजद्रोहाचा होणारा गैरवापर थांबवायचा असेल तर व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. कारण राजद्रोहाची कायद्याच्या चौकटीतील तील व्याख्या आणि लोकांच्या आकलनातील व्याख्या यांत तफावत आहे.‘लोकशाही व्यवस्थेत राजद्रोह ही संकल्पनाच कालबाह्य़ ठरु शकत नाही. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये व्यापक जनहित लक्षात घेता अत्यंत टोकाच्या स्थितीत कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी राजद्रोहाची तरतूद ही खूप आवश्यक आहे. व्यापक जनजागृती आणि सरकारकडून ‘राजद्रोह’ कायद्याच्या जबाबदार उपयोगासाठी जागृत जनमताचा रेटा, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील ‘संतुलन’ अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
देशप्रेम व देशद्रोह साठी कोणत्याही धर्माच्या लोकांना दोष देऊ नये, माणुसकीला समाजामध्ये विभागणे ही चुकीची कृती ठरते, ही लढाई चांगल्या आणि वाईट गोष्टी ठरवण्यासाठी आहे. कोणाच्या बाजूने उभे राहायचं हा निर्णय आपला आहे,पण कायद्याला दुर्लक्षित करणे शक्य नाही.


Source: INTERNET
-करण बायस
जि. हिंगोली

देशद्रोह या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर तो म्हणजे ‘देशासोबत केलेला विश्वासघात’ होय.आजकालच राजकारण बघून असं वाटतं की देशद्रोही म्हणजे फक्त आपल्या देशातील काही गुपीत गोष्टी शत्रू देशाला सांगणे किंवा सरकार विरोधात बोलणे किंवा देशाविरोधात बोलणे.
काही उद्योजक बँकेचा पैसा घेऊन फरार झालेत, देशात अधिकार्यापासून ते राजकारणी लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोक भ्रष्टाचारी झालेत किंवा अस पण म्हणता येईल की ते फक्त स्वतः साठी कमवत आहेत.
आज कित्येक लोकं उपाशी झोपतात, कित्येकांना राहण्यासाठी घर नाहीत या लोकांची फसवणूक म्हणजे देशद्रोह नाही का ?
आपल्या देशात विकासाच्या नावावर राजकारण होत, लोकांना काही मुद्द्यांवर भडकावून विरोधी पक्ष आपल्या हातात सत्ता कशी येईल यासाठी मोर्चे काढून वातावरण बिघडवण हा देशद्रोह नाही का ?
लोकांना निवडणूक जवळ आली की काही पैसे देऊन मत विकत घेणे आणि जनतेला खोटे आश्वासन देऊन तात्पुरत समाधान करणं हे देशद्रोह नाही का ?
आणखी आपण किती दिवस जात आणि धर्म हे मुद्दे घेऊन मोर्चे काढणार आणि आणि काही देशद्रोही लोकांना या मुद्द्यांवर राजकारण करू देणार?
काही मुठभर लोकांनी समाजाला सुधरवण्याचा प्रयत्न केला किंवा अशा लोकांच्या विरोधात लिखाण केले आणि समजाला खरं ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची हत्या करण्यात येते हा देशद्रोह नाही का ?
देशप्रेम शिकावं तर गांधीजी, भगतसिंग, देश सीमेवर लढणाऱ्या जवनांकडुन.स्वतः थोडं जागृत राहून या भ्रष्टाचारी, खोटे आश्वासन देणारे लोकांपासून लांब राहिले आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष दिले तरी ते देशाला प्रगतीकडे घेऊन जाईल.
माणसाला जर स्वतःची जाणीव असेल की आपण कोण आहोत आणि काय आहोत तो स्वतः प्रगती करण्याचा प्रयत्न करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************