अस्वस्थ काळ, स्वस्थ शासन.


🌱वि४🌿 या व्हॉटसअप ग्रुपवरून…...

*अस्वस्थ काळ, स्वस्थ शासन*

या विषयावरचे निवडकजणांचे सडेतोड विचार नक्की वाचा.
(जसेच्या तसे दिले आहेत,त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक असू शकते)

निलेश पाटील,धुळे:
*अस्वस्थ काळ, स्वस्थ शासन*
सतत चा दुष्काळ आणि कवडीमोल बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताजनक असताना. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले. आस्मानी संकटांना तोंड देत असतांनाच शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचीच आवश्यकता असूनही मदत मिळत नाही, काळ शेतकऱ्यांना अस्वस्थ करतोय तर, शासन स्वस्थ आहे. उलट शेतकऱयांच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम सत्ताधाऱ्या कडून केलं जात असल्याचं आपणास दिसतं. ज्या परिस्थिती त्यांचं सांत्वन केलं जावं त्या परिस्थितीत शेतकऱ्यावर मुक्ताफळे उधळली जातात!!...

"ज्याचा माल त्याचे हाल" अशी गत शेतकऱ्यांची झालेली दिसते.

एकिकडे भाजपचे नितीन गडकरी साहेब म्हणतात की भाजपा मध्ये वाल्याचा वाल्मिकी करण्याची क्षमता आहे... तर दुसऱ्या बाजुला सत्तेचा माज चढल्यामुळे मानवाचा दानव(दानवे)झालेला आपल्याला दिसतोय.सत्तेचा माज चढलेला रावसाहेब दानवे विसरला की तो शेतकऱ्याच्या जीवावर मोठा झाला आणि आज शेतकाऱ्यांविषयी त्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाला अशोभनीय भाषेचा वापर करतो,काल-परवा हाच दानवे विरोधी पक्षाला म्हटला होता की, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर आत्महत्या थांबतील याची हमी घ्या.अशा बेताल बोलणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवलेला आहे. उजनीच्या पाण्यावरून मुतण्याची भाषा करणारे अजित पवार यांना आता सत्तेविना राहावे लागत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही 1995 मध्ये सत्तेत आल्यानंतर काही मुक्ताफळे उच्चारली होती. त्यानंतर शिवसेना अद्याप सत्तेत आलेली नाही.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात *_साले_*, अशा शब्दात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलेे. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली रडगाणी बंद करा, अशी मुक्ताफळे दानवेंनी उधळली. शिवाय असंसदीय भाषेचा वापरही दानवे यांनी केला आहे.

दानवेंना भाजपच्या एका कार्यकर्त्याने तूर खरेदी बाबत लोकांना काय उत्तर द्यायचे असा प्रश्न केला. त्याला उत्तर देताना दानवेंची जीभ घसरली. एक लाख टन तूर राज्य सरकारने खरेदी केली तरी लोक रडतात *साले*, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्याला झापले. त्याचबरोबर त्यांनी खालच्या पातळीवर टीकाही केली. शेतकऱ्यांना अभद्र बोलणाऱ्याला जनता विसरणार नाही....
जनतेने डोळे झाकुन (दानवे)दानवावर विश्वास ठेवुन निवडून दिले...आणि त्याच जनतेवर साहेब मुक्ताफळे उधळतात. त्यांनी लक्षात घ्यावे की जनतेनं त्यांना निवडून दिले आहे. निवडून येण्यापूर्वी त्यांनी अजेंडा तयार केला होता की, दोन वर्षांत शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करू. आणि आज एक लाख टन तुर खरेदी करून शेतकऱ्यांवर उपकार केला असल्याचं दाखवत आहे. वेळीच तुरीचा आयात शुल्क वाढवला असता,आणि तुरीची निर्यात केली असती तर आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती. लक्षात घ्या दानवे जनतेने सत्ता हातात दिलीय...जनतेचा बाप झाल्यासारखी भाषा वापरू नका नाहीतर तुमचा अजित पवार व्हायला वेळ लागणार नाय...

कर्जमाफीचा आव आणून शेतकऱ्याचा भ्रमनिरास केला! आपल्या लबाडी झाकण्यासाठी योजनेला शिवाजी महाराजांचे नाव देऊन , पांघरूण घालण्याचंच काम केलं!!

वैभव रोंगेसाहेब(PSI):
मित्रांनो सगळे शेतकरी आत्महत्या या विषयावर सरकारवर टीका करत आहेत सरकारची धोरणे युपीए सरकार असेल किंवा आत्ताचे सरकार या सर्वांवर राग व्यक्त करीत  आहेत .आपण सरकारच्या धोरणांवर टीका करत बसण्यापेक्षा आपण शेतकऱ्यांची  शिकलेली मुले  👨‍🎓आजच्या आधुनिक युगामध्ये आपण किती प्रयत्न करत आहोत हि समस्या रोखण्यासाठी याचेही आत्मपरीक्षण करण्याची अत्यंत गरज आहे .मला असे वाटते की शेतकऱ्यांनी सरकारची धोरणे सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा यावर सध्या तरी अवलंबून न राहता आपण सर्वांनी स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. आपण सगळे आधुनिक शेतीच्या दृष्टीने किती प्रयत्न करत आहोत याचेही आत्मपरीक्षण करण्याची सध्या गरज आहे .आज मला स्वतःला व आपल्या सर्वांना काही प्रश्न विचारायचे आहेत
👉 आपण व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला पण गटशेती या विषयावर कधी विचार केलेला आहे का .?
👉महाराष्ट्राच्या काही भागात गटशेती संकल्पना अतिशय  यशस्वी  ठरली आहे .
👉झिरो बजेट किंवा सेंद्रिय शेती ही संकल्पना आपण किती  राबवत आहोत ? 🍇🍅🥜(ती न राबवता आपण तथाकथित पुढाऱ्यांच्या कृषी केंद्रांचे गल्ले भरत आहोत. आणि  तेही कर्जाच्या  पैशातून 💰)
👉शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत🚛 या संकल्पनेचा आपण अवलंब करीत आहोत का ?(हे काम एकट्याचे नसून त्यासाठी शेतकऱ्यांचे गट 🤝👬👬तयार झाले पाहिजेत).
👉 शेत मालापासून इतर उत्पादने ह्या गोष्टींचा आपण विचार  केला आहे का?🍹🥗🥙🍟.
👉कृषी माल विकण्यासाठी आपण व्यापाऱ्यांची🤑 वाट बघत बसतो मात्र आपण स्वतः विक्रीचा प्रयत्न केला आहे का ?    
          मित्रानो सद्यस्थितीला मला असे वाटते की  आधुनिकतेमध्ये शेतकरी सुद्धा आधुनिक  होण्याची गरज आहे जर ग्रामीण भागामध्ये बघितलं तर अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करतात , त्यासाठी आपण शिकलेल्या पोरांनी या गोष्टीचा विचार करून बदल करण्याची अत्यंत गरज आहे .

सिताराम पवार:
नमस्कार मित्रांनो सरकार कोणत्याही पक्षाचे असो पण जी निवडणुकपूर्वी आश्वासने जनतेला दिली आहेत त्यादृष्टीने वाटचाल तरी असावी, तसेच सरकार मध्ये काही तरी बदल, सेवा देण्यात,कर्ज,दाखले, पिकांना हमीभाव, व्यापाऱ्यांवर नियंत्रण व अजून काही क्षेत्रात परिस्थिती बिकट आहे.आज मी मराठवाडयामध्ये पाहतोय की,सोयाबीनला 400-550रु हमीभावापेक्षा कमी दर आहे,शेजारी म.प्र. सरकारने हमीभाव व प्रत्यक्ष खरेदी यांतील फरक देत आहे पण आपल्या शेतकऱ्याना नाही, कापसाची तीच परिस्थिती आहे, या दोन पिकावर तर मराठवाडा आहे त्या शेतकऱ्यांना दिलासा कसा देणार??आज तलाठी ते तहसीलदार कोणताही दाखला चिरीमिरी शिवाय मिळत नाही यात पण काडीचाही बदल नाही.मी सांगतो आर्थीक मागासवर्गीय दाखला काढायला पंढरपूर येथे सर्कल चैकाशी लागते आणि करमळाचा मित्र दोन दिवसात काढतो
तेपण विना सर्कल चौकशी, सामान्य लोकांना सरकार बदललं आहे याची काहीच लक्षणे दिसत नाही, युवकांना रोजगार उपलब्ध नाही 4-5वर्षे गरीबीतुन पदवी  शिक्षण पूर्ण करायच नंतर नोकरी नाही,काय करावे त्या पालकांनी, आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात पाहिलं तर ग्रामीण भाग खूप नाराज आहे.कर्जमाफी मध्ये नियम व अटी  पूर्णपणे काळजीपूर्वक वाचून समजते हि कासली कर्जमाफी??कर्जमाफी आहे पण ती खुप चाळून चाळून चालू आहे. आता सरकार स्वस्थ आहे का नाही यावरून कळते,
1-शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात नापास
2-प्रशासनात काहीच बदल नाही
3-कृषी कर्जपुरवठा कमी
4-वाढती बेरोजगारी
5-सरकारी दवाखान्याकडे दुर्लक्ष
6-आदिवासी भागातील समस्यात चांगला बदल नाही
7-शिष्यवृत्ती वेळेवर नाही मुल वाट पाहतात
8-ग्रामीण व शहरी झोपडपट्टी तील महिला व लहान मुले यांचे प्रश्न
याचा विचार पक्षविरहित विश्लेषण केले तर जड मनाने मानावे वाटते" करायला गेलो गणपति अन झाला मारुती""
याहून वाईट म्हणजे संस्कारीत लोकसुद्धा खोटं बोलतात हाच!!
          ‎
दत्तात्रय डोईफोडे:
माझ्या मते सरकार कुठलेही असो  खूप असे काही प्रश्न असतात की ते सोडवणे त्यांना एक तर जमत नाही, तर काही प्रश्न मुद्दामहून सोडविले जात नाहीत. त्यातील काही प्रश्न या ग्रुप मध्येही दिले आहेत जसे शेतकर्यांचे प्रश्न, सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न ई. मला समजलेलं, लक्षात आलेलं सत्य, असत्य तुम्हालाही कळेलच माझ्या दोन शब्दांतून अशी आशा...
अस्वस्थ काळ, स्वस्थ शासन माझ्या मते वर नोंदविल्या प्रमाणे काही प्रश्न सोडविले जात नाहीत कारण राजकीय इच्छाशक्ती नसल्याने जसे...
उदा. आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील दोन तीन वर्षा पूर्वी दुष्काळ पडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता त्याची माहिती शासनालाही होतीच तरीही अभ्यासाचं नाटक ( होय ते नाटकाचं होतं ) करत शासनाने २-३ वर्ष शेतकरी प्रश्न रेंगाळत ठेवला. होय मान्य आहे पीक विमाही दिला पण त्यातही तो कित्येकांना मिळाला आणि गरजूंना किती मिळाला हाही प्रश्न अनुत्तरित राहलाच.
जो बळीराजा जगाचा पोशिंदा होता त्याला आंदोलनं करावी लागली इथेच खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारच  काय मोदी सरकारही चुकलं.मागील सरकारच्या चुका समोर होत्या म्हणून तुम्हाला निवडून दिलं तीन वर्ष झाली अजूनही विश्वास ठेवून आहोत पण त्याच चुका तुम्हीही करू लागल्यावर मन मात्र कासावीस होऊ लागलं.
उदा. मागील शासनाने कर्जाचा पाया रचला पण तुम्हीही त्यावर डोंगर उभा केला होय तुम्ही चुकलात आर्थिक प्रश्नही सोडवण्यात...
सामजिक परिस्थितीत काही सुधारणा होण्या ऐवजी स्थिती खलावतच आहे,
उदा. गोरक्षक आता माणुसकी भक्षक होऊ लागलेत.

बालाजी सानप:
1) शेतकरी
Positive point:
आपण बोलतो की 200शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण खरी वास्तुस्तीती आणि शेतकाऱ्यांवरचा कळवळा मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये AC मध्ये बसून दाखवण्यापेक्षा शेतकर्यांमध्ये मिसळा मग कळेल शेतकऱ्याला किती वेदना असतात ते( हे फक्त त्यांच्यासाठी जे फक्त social media  पुरतेच मर्यादित राहून त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना पाहून त्रास होतो, आणि त्या त्रासावर ते सरकारला आणि सामाजिक संघटनाना सल्ला देतात अश्या कथित समाजसेवकांसाठी आणि कधीही शेतामध्ये न गेलेल्या स्वघोषित शेतकरिपुत्रांसाठी)

Negative point:
आता दुसरी बाजू अशी की, माझ्या अनुभवानुसार 10 पैकी 6 ते 7 शेतकरी स्वतःच्या वयक्तिक problems मुळे जीव देतात आणि सांगताना बोलतात की कर्जाला वैतागून आत्महत्या केली, अरे त्या शेतकार्यावर कर्ज आहे पण कश्यासाठी हे कर्ज झालाय दारू साठी की खतासाठी  ते पण पहा जरा आणि राहिलेले 3 ते 4 शेतकरी खऱ्या त्रासामुळे मरतात,
पण प्रॉब्लेम असा आहे की त्या 7 शेतकार्यामुळे राहिलेल्या 3 शेतकऱ्यांच्या घरच्यांना त्रास होतो, हा real fact आहे.....
2)तरुण:
Positive point :
भारतात पुढील काही वर्षात सगळ्यात जास्त तरुण असतील ही नक्कीच आनंदाची बाब असली तरी त्यांच्या त्या तरुणाईचा फायदा जर सरकारला करता नाही आला तर भारत महासत्ता होणार कधी.....? हि पण विचार करण्याची गोष्ट आहे🤔त्या सगळ्या तरुणाना नौकरी देण्यापेक्षा किमान काही जणांना तरी व्यवसाय करण्याचं प्रशिक्षण द्यावं (फक्त ऑफिस च्या  कागदपत्रांवर नको.)
म्हणजे खेड्यापाड्यातील मुलांना नौकरी साठी जास्त दूर जावे लागणार नाही, आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

Negative point :
एक तरुणांमध्ये इतकी शक्ती आहे की तो पर्वत पण हलवू शकतो पण सध्या भारतातील अनेक तरुण व्यसनाच्या अधीन जाऊन झुलत आहेत त्यासाठी व्यसनमुक्त तरुणाई करण्यासाठी काहीतरी योजना सरकारने आणि सामाजिक संघनानी आखाव्यात असे माझं मत आहे.....
+91 77090 91804‬:
आज पेपर मध्ये headline आली की गेल्या 10 महीन्यात 2414 शेतकऱ्यांनी म्रुत्यू ला स्वतः आमंत्रण दिले..
म्हणजे दररोज 8 शेतकरी लावतात गळ्याला फास..किती ही म्हंटल की कारण वय्क्तीक असतिल किंवा सरकारचे अपयश तरी दुष्काळ अतिवृष्टी गार्पिट यासारखी अनेक नैसर्गिक  कारण सुधा कारणीभूत आहेतच..पूर्णपणे सरकार ला दोष देणे चुकीचे आहे ..हो मान्य आहे सरकार पण कुठे तरी कमी पड्तय..कर्ज माफी पण नोट बंदी सारखी अफवा च आहे की काय वाटत आहे.जर सरकार ला खरच कर्ज माफी करायची होती तर ती नीट आणि technically proper करायला हवी होती.असे न झाल्यामुले शेतकरी हतबल होत आहे याची जाणीव सरकार ने ठेवली पाहिजे.

प्रवीण:
*अस्वस्थ काळ, स्वस्थ शासन*
शासन व्यवस्था कि शोषण व्यवस्था
नवीन सरकार आले त्यावेळी एक वेगळीच अशा तयार झाली होती. प्रत्येक जन सरकारकडे आशेने पाहत होता.प्रत्येक शिक्षित तरुणाने भविष्याचे स्वप्न पाहू लागला होता, शेतकऱ्याला त्याच्या पिकांना हमीभाव मिळतोय अशी अशा दिसत होती. ह्या आशेच्या लाटेवर केंद्रातून अनेक राज्यात पण हेच सरकार आले. पण आज ३ वर्षानंतर कळतंय तहानलेल्या वाटसरूला मृगजळ दाखवले जात होते. शेतकऱ्यांची वाढती आत्महत्या हमीभाव देण्यात आलेलं अपयश land acquisition act नावाने भांडवल दारांना पाठीशी घालणे,नोटा बंदीचा फसलेला प्रयोग वाढलेला धर्मांधपणा,नेत्यांची बेजबाबदार विधाने,पुतळ्यांचा अट्टाहास,बुलेट ट्रेनचे दाखवलेलं गाजर,मंत्र्यांचा घोडेबाजार ह्या सर्वात झालेली जनतेची होरफळ शासकीय योजनेतील घोटाळे पडद्यामागून चालणारे घोटाळे
रस्त्याच्या दुर्दशेने वाढलेले अपघात
तूर डाळीचे फसलेले व्यवस्थापन
इत्यादी इत्यादी इत्यादी इत्यादी इत्यादी.........
हे सर्व पाहून कार्ल मार्क्स च्या विधानांची आठवण होते.... शोषणावर आधारित शासन व्यवस्था. गेले ३ वर्षात ला अनुभवच समीकरणा मांडायचं म्हंटल तर ते असा होईल ...
राज्यव्यवस्था+अर्थव्यवस्था= शा(शो)सन व्यवस्था

Saudagar kale:
*अस्वस्थ काळ, स्वस्थ शासन*

_शासन आणि सरकार हे दोन शब्द समानार्थी वापरून आपला खूप गैरसमज निर्माण होत राहतो._
     आपण जे आमदार -खासदार संसदेत किंवा विधानमंडळात निवडून देत असतो. ते संविधानाच्या चौकटीत राहून कायदे व नियम बनवतात.त्यालाच थोडक्यात *सरकार* म्हणतात.
  मग हे सरकार जेव्हा कायदे व नियम बनवते तेव्हा ते अमलात आणणारी व्यवस्था म्हणजे *शासन* .

_जेव्हा सरकार बदलत राहतं पण ही शासनप्रणाली जशी काल होती तशीच आज आहे._
*म्हणून ......*

1.जेव्हा आदिवासी भागात आजही रस्ता,आरोग्य सेवा पोहोचली नाही,तिथे सरकारने राबवलेल्या  *108 या सुविधेचा हक्कार्थी* न होताच तेथील रुग्णांना, गरोदर महिलांना उपचाराअभावी मृत्यूस अधीन व्हावे लागते.तेव्हा मात्र मन अस्वस्थ होत...

2.जेव्हा फक्त पोटासाठी धडपड करणाऱ्या कुपोषित बालकांना, गरीब लोकांना *आधार सारख्या सक्ती मुळे* आपला जगण्याचा हक्क या जगातून सोडावा लागतो. तेव्हा मन अस्वस्थ होत..

3.आजही माझा कामगार, शेतकरी, नोकर आर्थिक दृष्ट्या बीमार आहे,त्यानं साध एसटीने प्रवास करायचा म्हटलं तर!रेल्वेच्या स्लीपर, एसीतून प्रवास करायचा म्हटलं तर!उद्याच्या जगण्यासाठी खिशात काही उरेल का ?या धास्तीने *रेल्वेच्या जनरल डब्यात टॉयलेट जवळ* उभे राहून त्याला रात्र दिवस प्रवास करावा लागतो.मग तिथे हे सरकार *खर्चिक बुलेट ट्रेन* आणू पाहते.तेव्हा मात्र मन अस्वस्थ होत..

4.आजही दुष्काळ, गारपीट यासारख्या आपत्ती वेळी शेतीचा पंचनामा करण्याऐवजी अधिकारी त्यांच्या टाळूवरचे लोणी खातात,तेव्हा मात्र मन अस्वस्थ होतं....

5. दिवसा ढवळ्या महिलांवर अत्याचार, समाजसुधाकरांच्या हत्या होत राहतात, गुन्हेगार मोकाट फिरत राहतात तेव्हा मात्र मन अस्वस्थ होतं...

6. ‎महत्त्वाचे म्हणजे या शिक्षण प्रणालीतून ,विद्यापीठाच्या परीक्षा पध्दतीतून *क्वांटीटी बाहेर पडत राहत आहे मात्र क्वालिटीचा* पत्ता नाही ?तेव्हा मात्र मन अस्वस्थ होतं..

7. ‎ *अनेकांच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रु येतात अन त्यांच्या सहानुभूती बद्दल  डोळ्यात  असते फक्त आपल्या पाणी.. समुद्रासारखं....कोणाचीच तहान न भागवणारे......*

जेव्हा हे सारे घडत असताना शासन स्वस्थ राहते.
तेव्हाच काळ अस्वस्थ वाटतो. अन आपण हतबल होतो....हात असूनसुद्धा...

करण हिंगोली:
‎आपण दररोज वर्तमानपत्रात वाचतो की अमुक अमुक जिल्ह्यातील अमुक अमुक गावातील शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही बातमी वाचल्यानंतर कमी लोक विचार करतात की त्याने आत्महत्या का केली असेल,वर्तमानपत्रात येते की त्याने आत्महत्या त्याच्यावर असलेली कर्जामुळे केली पण हे किती टक्के खार असते ते कोणाला माहीत.आत्महत्येचा एक कारण नसू शकते असे मला वाटते कारण भरपूर आहेत.आणखी एक गोष्ट मी observe केली ती म्हणजे maximum जे शेतकरी आहेत ना ते काय करतात जे पैसे मिळाले पीक विकल्यानंतर ते त्या पैश्याचा management नाही करत.म्हणजे मी बघितलं आमच्या गावाकडच्या मार्केट मध्ये ते पैसे आले की ज्या गोष्टीची गरज नसते त्यात पैसे टाकतात. मला वाटते त्यांनी पैश्याचा management केलं पाहिजे.नाहीतर आपल्यासारखे युवा ज्यांच्या लक्षात आशा गोष्टी आल्या त्यांना थोडस काही मार्गदर्शन शिबिर arrange करून त्याच्या मार्फत सांगितलं पाहिजे आणि खरच समाजाला सुधारण्याची गरज आहे.मी अस म्हणत नाही की सरकार जिम्मेदार नाही सरकार पण जिम्मेदार आहेत ते पण कुठंतरी कमी पडत आहे.त्याच कारण त्यांच्यात असलेलं अशिक्षितपणा मी कोणत्या सरकार वर टीका नाही करत पण आतापर्यंत जे सरकार आलं त्यांच्या राज्यात आत्महत्या झाल्याच.

विचार केला तर असं लक्षत आलं की जे आपले वडीलधारी लोक आहेत ते दिवसरात्र मेहनत करतात त्यांच्यावर होणारा जे अन्याय आहे त्याला पण ignore करतात का तर पोटासाठी पण जे young generation आहे ते अन्याय सहन नाही करत आपलं उदाहरण घ्या आपण हा ग्रुप चालू केला आपल्या विचारांची देवाणघेवाण करतो आणि मला असं वाटतं की जे नव generation येईल ते smart असेल आणि खरा भारत तेव्हा स्वतंत्र होईल. कारण त्या वेळेस लोकांना समजेल की ह्या राजकारनात अशिक्षित लोक खूप आहेत की ज्यांच्याकडे future ला बघणारे एक vision नाही.आपल्या राजकारणाला खरतर vision असलेला नेता पाहिजे.
आता आपल्या विषयात अस दिल की ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची झालेली दैनवस्था मला सांगा सरकार ने छान एक स्वछ भारत अभियान चालू केला कोणतं ग्रामीण भाग स्वच्छ झालं स्वच्छतेच सोडा आपणच या गोष्टीला जिम्मेदार आहोत कारण शेतीत लोक chemical खत वापरतात सरकार पण शेंद्रिय खताचे फायदे सांगायचे सोडून त्या chemicals ला पुढं नेण्याचा प्रयत्न करीत राहते.
आता बेरोजगारीचा प्रश्न त्याला पण तरुण मुलं जिम्मेदार का कारण मुलं परीक्षा जवळ आली की अभ्यासाला लागतात वर्षभर काय तर झोप काढायची. मग result जे काही येईल त्यात खुश आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यांना नौकरी हवी ते पण त्यात भरपूर पैसे आणि काहीही काम नको आणि कोणाला हे नाही वाटत की मला नौकरी द्यायची मला नौकरी करायची नाही मग एवढ्या नौकऱ्या कुठून आणणार मग लोक म्हणतात ते आम्हाला सरकार ने दिल्या पाहिजे आणखी महत्वाचं त्यातल्या त्यात लोकना आरक्षण पण पाहिजे त्यात काही असे असतात की माझ्या ओळखी खूप वर पर्यंत आहेत मला कमी marks आले तरी मी सरकारी नौकरी ला लागून जाईल. लोकांना comfort झोन पाहिजे काहीही काम न करता .
आता कुपोषणला जिम्मेदार पण लोक कारण लोकांना hybrid पाहिजे त्या हायब्रीड सगळं त्या अन्नात असलेले महत्वाचे घटक कमी केले हे आपल्याला दिसत नाही आपल्या फायद्यासाठी आपण जे कमी दर्जेदार अन्न विकतो तेच आपल्याला मार्केट मध्ये भेटते. आता एकदा एक शेतकरी अन्न चांगलं टिकून ठेवण्यासाठी औषध घ्यायला आला तो म्हणत होता एखादा विषारी औषध असेल तर द्या त्याला माझे आजोबा म्हणाले की आमच्याकडे विषारी तर नाही पण दुसर औषध आहे जे की हानिकारक नाही.
आजोबा म्हणाले विषारी घेऊन लोकांच्या आरोग्याशी का खेळता तर तो शेतकरी म्हणला मला माझ्या पिकाचे चांगले पैसे मिळाले बस झालं मला बाकीच देणंघेणं नाही .

अनिकेत:
‎मला वाटत की फक्त शासनाच्या स्वस्थ असल्याने काळ अस्वस्थ झालेला नाही... कुठेतरी लोकही चुकत आहेत.
हल्ली माणूस व्यक्त होताना ही 'बोळ्याने पितोय' असा भोळसट वागतो आहे... मुलभुत हक्कांबरोबर काही कर्तव्येही आहेत हे विसरला आहे... कर्तव्यहीन भरकटत चाललेली तरुणाई dj वर थिरकताना पाहताना मन अस्वस्थ होतं...
"विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, मानवता वाद , आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे"
हे घटनेत दिलेल एक मुलभुत कर्तव्य ... पण किती लोक त्यानुसार वागतात.

अशीच काहीशी अवस्था शासनाची सुद्धा आहे... राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे अवलंबन्याच्या बाबतीत... नुसती घोषणाबाजी, अंमलबजावणी ना के बराबर...
आणि ज्यांना काम करायचं आहे त्यांना सरकारकडून सहकार्य नाही...
सर्वांनी मिळूनच या अस्वस्थेतून बाहेर पडता येईल... हा कुणा एकट्या दुकट्याचा घास नाही...
पण अशक्य ही नाही, हे ही तितकेच खर ....

जयंत जाधव,लातूर:
आपल्याकडे लोकशाही मध्ये लोक त्यांचे अस्तित्वच दाखवत नाहीत .शासन त्यांना गृहित धरून मन मानेल तसा कारभार करीत आहे.अन्याय करणाऱ्या पेक्षा तो सहन करणारा अधिक दोषी ठरतो.एकञ येऊन चुकीची धोरणांना विरोध करा व चांगल्या धोरणांना पाठिंबा द्या.पण यासाठी लोकांनी स्वतः ची मानसिक ईच्छा बदलली पाहिजे.फक्त सरकारला दोष देऊन उपयोग नाही .

तीलोमत्ता मांजरेकर,रत्नागिरी:
शेतकरी, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस सर्वजण आपापले प्रश्न घेवून धडपडत आहे. ग्रामीण असो वा शहरी सगळीकडे प्रश्न वाढतायत पण उत्तर सापडत नाहीत. सरकार कडून घेतल्या जाणार्या निर्णयांवर विश्वास ठेवावा का? असा विचार सर्रास मनात येतो. पण यात ही सरकार लोकांच असत हे विसरून चालणार नाही.  देश सरकार जितकं चालवते तितकंच ते लोक ही चालवतात. थोडक्यात काय तर काँग्रेस असो वा बीजेपी कोणीही स्वच्छता मोहीम सुरू केली तरी आपला कचरा आपल्यालाच सावरायचा असतो.
वाढत्या अस्वस्थतेबद्दल शासन स्वस्थ आहे नक्की म्हणून आपल्याला परीने आपण हातपाय हलवू नये असे नाही.

‪+91 99239 72006‬:
सरकार एखादी योजना राबवते तेंव्हा जनतेचा सहभागही अपेक्षित असतो.आणि ती योजना व्यवस्थित राबवली जातीय की नाही हे बघणं सरकारचं काम आहे.पण तसं होत नाही.एकमेकांवर आरोप करण्या पलीकडे काहीही घडत नाही.हे बदलायला हवं तरच अस्वस्थता कमी होईल

मयुरी देवकर :
आज जर आपण सभोवताली पहिले तर काय परिस्थिती दिसते ? वर्तमानपत्र उघडले की काय दिसते ? आज या भागातील शेतकऱ्याने आत्महत्या केली , आज या भागातील तरुणाने आत्महत्या केली , बेरोजगारी , अनारोग्य , कुपोषण , लहान बालकांचे म्रुत्यू , वैफल्यग्रस्त तरुण हेच दिसते ..........आणि यांवर उपाय काय केले जातात ?    तर  आत्महत्याग्रस्त कुटुम्बाला कितीतरी लाखांची मदत जाहीर केली जाते .  खरंच एवढ सोपं आहे का कोणाच्या तरी जीवनांची किम्मत करण....?  
          आज शहर असो वा खेडे सगळीकडे च वैफल्यता आणि अस्वस्थता पसरली आहे सगळीकडे च समस्या च समस्या आहेत .....खेड्यात तर अशी अवस्था झाली आहे की तरुण मुले शिकून सूद्धा बेकार आहेत तर त्यांना ना नौकरी ना शेती .....आणि हे सर्व अगदी मनाला हेलावून सोडणारे द्रूश्य पहिले की वाटते मनाला अस्वस्थ करणारी परीस्थिती आहे की खरंच काळच अस्वस्थ आहे ......आपण ज्याँच्याकडे या परिस्थितीवर मात करण्यासाठी आशेने पाहतो ते शासन तर फक्त मदत जाहीर करते नी रिकामे होते .....पण त्यांना कोण सांगणार त्यांच्या मदतीची , पैकेजची नव्हे तर त्यांच्या सुयोग्य सोबतीची च गरज आहे .....पण ते आज बाकी कामातच ईतके व्यस्त आहेत आणि म्हणूनच ते स्वस्थ शासन आहे .....खरंच हे वाक्य मनात घोळतच राहतय .......' अस्वस्थ काळ , स्वस्थ शासन '  .
+91 99872 69476‬:
सरकार म्हणजे नेमके कोण ? तर आपण ज्यांना निवडून देतो त्या लोकप्रतिनिधी मधील जे मंत्री, मुख्यमंत्री होतात ते.
जेव्हा हे सत्तेत येतात तेव्हा ते सरकार आणि सत्तेत नसतात ते विरोधक. आता सत्ताबदल झालाय. प्रत्येक सरकारची एक भूमिका असते. त्या भूमिकेनुसार ते निर्णय घेतात. पण हे निर्णय घेताना अनेक अडचणी सामोऱ्या येत असतात. कारण कोणताही मंत्री वा मुखमंत्री थेट निर्णय घेत नाहीत. त्यासाठी एक यंत्रणा राबत असते. या यंत्रणेला नोकरशहा अथवा सरकारी अधिकारी असे आपण म्हणू.
ही यंत्रणा नियम तयार करते. कायदे तयार करते. नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून योजना तयार करते. या योजना असतात सामान्य जनतेसाठी.
या नोकरशाही यंत्रणेने तयार केलेल्या योजना पुढे मंत्री मंडळाच्या मान्यतेकरता येतात आणि मग त्या योजना घोषित केल्या जातात. याना आपण सरकारच्या घोषणा म्हणतो.जसा काळ बदलला तसे निर्णयही बदलत गेले. सरकार बदलले तरी नोकरशहा तेच राहिले. मग नेमका दोष कुणाचा. या नोकरशहा याना वाकविणारे कुणी राज्यकर्ते काही अपवाद वगळता पुढील काळात झालेच नाहीत. किंबहुना राज्यकर्त्यांची भिस्त ही नेहमी नोकरशहा यांच्यावरच अवलंबून राहिली आहे.
खरं तर सरकारने जाहीर केलेल्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी ही सरकारी यंत्रणेची. पण ही यंत्रणा सुस्त झाली आहे. परंतु या यंत्रणेला सरळ करण्याची किंवा त्यांच्यावर अंकुश ठेवण्यास सरकार अपयशी ठरत आहे हे ही तितकेच खरे.म्हणूनच सामान्य जनतेला सरकारच्या निर्णयाचा लाभ मिळत नाही. गेल्या 3 वर्षात सरकारने 1057 योजना आणि निर्णय जाहीर केले. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. याला सरकार आणि नोकरशहा हे दोन्ही जबाबदार आहेत.
आणि आपणही ..

किशोर झोटे, औरंगाबाद:
अच्छे दिन म्हटल्यावर
जर तुम्हाला वाटतं बरं !
मग कशाला राव काही
तुमच्यासाठी करावं बरं ?


मनोज वडे,पंढरपूर:
खरच हा विषय छान आहे परंतु ह्याचा वर solution पाहिजे.बेकारी तर प्रचंड प्रमाणात वाढली आहे. रोज कोण तरी भेटते आणि काय करावं परीक्षा पास होत नाही ह्याच गुण गाणं गात राहतात अशावेळी education जास्त झालेलं असत वय वाढ लेलं असत अशात लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या मग काय कूठ तरी 5000 रुपये ते 10000 रुपये ची नोकरी.त्यात समाधान काहीच होत नाही हे चित्र भयानक आहे कारण जवानी अशीच जाते परंतु दुसऱ्या बाजूला श्रीमंत मुलाचं काय असतं तर गाडी ,जवानी सगळं छान.अजून plusम्हणजे त्याला नेते अशी उपमा; युवा नेतृत्व; मग त्या आमदाराच्या घरी काय कमीच पडत नाही with त्याला pension मान सन्मान with मी ह्या योजना केल्या  जातात अशावेळी एक सर्व साधारण मुलाचं  अपेक्षा असती की एक 10000 ची नोकरी लागावी .खरच  ह्या वर आवाज आपण सर्वांनी उठवला पाहिजे

ऋषिकेश खिलारे, सर (युवा मेळघाट) :
देश सध्या परिवर्तनाच्या फेज मधून जात आहे यात अनेक गोष्टी अनाकलनीय असतात.

+91 98509 57799‬:
अनुशासन* हि मुख्य गरज आहे. सामाजिक बदल घडेल. समाज परिवर्तन होणार, समाज्याची मानसिकता बदलली पाहिजे.कोणत्याही देशात हे चालत नाही. पण आपल्या देशात पंतप्रधानांबद्दल एकेरी बोलले जाते, अपशब्द वापरले जातात. अतिशय खेदजनक आहे. सत्ता मिळवण्यासाठी कोणीही चिखलफेक करतयं. कायदा आणि शासनाची अंमल बजावणी व्हायला हवी.

अस्वस्थ काळ, स्वस्थ शासन.

🌱वि४🌿

*विषय तिसरा* : _20 नोव्हें ते 26 नोव्हें._

 _शेतकऱ्यांच्या आत्महत्या,पोटासाठी करावी लागणारी धडपड, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची झालेली दैनावस्था,बेरोजगरामुळे वैफल्यग्रस्त झालेली तरुणाई,कुपोषणपणात वाढत चाललेला देशाचा उच्चांक, वणव्यासारखी  पसरत चाललेली गरिबी, अजून काही जैसे ते तैसे असणारे प्रश्न._
         
       हे सारं घडत असताना डोक्यावर बर्फ ठेऊन झोपी गेलेले आपले कुंभकर्ण  सरकार.
 म्हणूनच....

या आठवड्याचा विषय देत आहोत...

 *अस्वस्थ काळ, स्वस्थ शासन.* 

पण मित्रांनो, _तुम्ही स्वस्थ बसू नका.तुमचा एक विचार करू द्या या सरकारला अस्वस्थ._✍✍✍✍
https://vichar4.blogspot.in/?m=1

सरकारचा नोटाबंदीचा निर्णय क्रांतिकारक की फक्त जाहिरातबाजी??

🌱"वि४"🌿या व्हॉटसअप ग्रुपवर नोटबंदी या विषयावर व्यक्त झालेल्यांचे निवडकजणांचे विचार:

सचिन आशा सुभाष पुणे.-
नोटबंदी हा फक्त आणि फक्त राजकीय stunt होता हे एव्हाना आपल्या सर्वांना कळून चुकलं आहे, त्यामुळे मी त्यातील आकडेवारी, परिणाम किंवा पार्श्वभूमी बद्दल बोलणार नाही. आपण सुज्ञ आहात.मुद्दा उरतो What next.?केवळ वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षेपोटी  परिणामांची पर्वा न करता सबंध देशाची अर्थव्यवस्था दावणीला लावणाऱ्या मानसिकतेला आपण 'देश' या चष्म्यातून कसे पाहता.? राजकीय, सामाजिक मतभेद थोडे बाजूला ठेऊन जर आपण या घटनेकडे पाहिलं तर आपल्याला त्यातील धोक्याची पातळी अधिक स्पष्ट दिसेल असं मला वाटतं. म्हणूनच देशाचा सामान्य नागरिक या नात्याने मला अशी शासनकर्ती मानसिकता देशासाठी धोकादायक वाटते. कोणत्याही राजकीय संकटात नसताना जर असे निर्णय घेतले जात असतील तर *जेव्हा यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा देशात आणीबाणी आणायला ही हे लोक मागेपुढे पाहणार नाहीत* हे मी 2013 पासून सांगत आलो आहे. पक्ष, देश यापेक्षा जेव्हा जेव्हा माणूस मोठा झाला आहे, तेव्हा तेव्हा, इतिहास साक्षीदार आहे पक्ष आणि देशाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. म्हणूनच नोटाबंदी नंतर स्वतः पोळत असूनही त्याला समर्थन देणारे देशबांधव जेव्हा मी पाहतो तेव्हा मला त्यांच्यात भिनवल्या गेलेल्या चुकीच्या राष्ट्रप्रेमाची ही चिंता वाटते. कारण हे तेच असतात जे व्यक्तिपूजेसमोर आपले नागरिकत्व गहाण ठेवून देश अजूनच धोक्यात आणत असतात. म्हणूनच मला आधी अशा लोकांचं राष्ट्रीयकरण करणं  महत्वाचं वाटतं. शेवटी *भारतीय राजकारण हे अस्मितेच्या आडून केलं जाणारं अस्तित्वाचं राजकारण आहे.* कधी गाय पुढे येईल तर कधी गीता तर कधी नोटबंदी तर कधी अजून काय पण मी या सर्वच घटनांमध्ये माझे सर्व विचारधारा, पूर्वग्रह दूर ठेवत होणाऱ्या बदलांना 'देशाच्या चष्म्यातून' बघू शकलो तरच आपली विचारांची बैठक पक्की होईल त्यातून ठाम आणि व्यापक कृती जन्म घेईल आणि पर्यायाने हे राजकीय stunt फसतील असं मला मनोमन वाटतं.

सौदागर काळे,पंढरपूर-
💠 *नोटबंदी हा क्रांतिकारक निर्णय माझ्यामते नाही.*
🔸 _- क्रांती ही समूहाच्या,समाजाच्या उस्फूर्त व विद्रोही भावनेतून उदयास आलेली असते.असा आपल्याला जगाचा इतिहास सांगतो.उदा.रशियन राज्यक्रांती,फ्रेंच राज्यक्रांती किंवा आपल्या भारताचा स्वातंत्र्यलढा._
🔸 _नोटबंदी व्हावी म्हणून कोणीच लढताना दिसला नाही._
🔸 _प्रत्येक क्रांती ही अनेक दुःखाना विसरून चेहऱ्यावर हसू व विजयाची भावना आणते.पण इथं उलट झालं ;नोटाबंदी झाल्यानंतर अनेकांना नोटांबदली साठी रांगेत उभे राहताना जीव द्यावा लागला._
🔸 _या जगात अशी कोणती क्रांती झाली की ती मिळाल्यानंतर अनेकांना आपला लाखमोलाचा जीव गमवावा लागला असेल!🔸 महमंद तुघलक ने आपली राजधानी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली होती.म्हणून इतिहासाने त्याची नोंद क्रांतीकारक नव्हे तर *लहरी महंमद* अशी केली.
🔸 *ज्याचा माल खपत नाही त्यालाच बाजारात इतरांपेक्षा जास्त ओरडावे लागते.कदाचित नोटाबंदीसाठी मोदी सरकारला असे  जाहिरातीद्वारे ओरडावे लागत आहे.*
         
            
अक्षय पतंगे,हिंगोली -
मी दिल्लीवरून घुमान या ठिकाणी गेलो.घुमाण हे ठिकाण पंजाब राज्यात आहे. घुमाणनगरी संतशिरोमणी नामदेव महाराजांच्या वास्तव्याने पंजाबची  अलंकापुरी झाली आहे. मी गेलो तो निश्चलीकरणाचा काळ होता. घुमाण मुक्कामी असताना मला पुढील प्रवासासाठी पैसे हवे होते. शोधाशोध करून एटीएम दिसायचे, सगळे लोक एटीएमसमोर उभे असल्याचे दिसायचे, गर्दी दिसायची,नोटाबंदीची चर्चा ऐकू यायची, कुणाला बाजार, कुणाला मुलांची शाळेची फीस इत्यादी.
वाटायचं आता पैसे मिळतील,पुढील प्रवास मजेत होईल पण एटीएममधील पैसे काही वेळातचं संपायचे. बरेचं लोक सकाळपासुन रांगा लावायचे. पैसे संपल्याने परत जायचे, माझीसुद्धा तीचं गत होती.असो.
     काही दिवसांपुर्वी रिजर्व बँक ऑफ इंडीयाने सांगितले ९९% पेक्षा जास्त सर्व जुन्या नोटा परत आल्या. म्हणजे निश्चलीकरणामुळे  नेमकं काय साध्य झाले ?
           देशाची आर्थीक घडी विस्कटण्याबरोबरचं सामान्य माणसांच्या झालेल्या हालअपेष्ठा,बँक अधिकारी, कर्मचारी यांना कराव्या लागलेल्या प्रचंड मेहनतीची मोजदाद होणे अशक्य आहे.
रोजगार,लघुद्योग इ. उपजिवीकेशी निगडीत असलेला वर्ग अजुनही सावरण्याचा प्रयत्न करत आहे. २० कोटींपेक्षा जास्त लोक गरीबी सोसत असताना त्यापेक्षा हा निर्णय खरचं महत्वाचा होता ?
पाहूया वाट,अजुन काही वर्षे...!!

सिताराम ढगे,मंगळवेढा -
नोटबंदी हि देशाच्या इतिहासात काळिमा फासणारी घटना होय.
कारण यामुळे सर्वत जास्त मनस्ताप समान्यना झाला आणि त्याची जी अपेक्षा होती ती फोल ठरली .
     काळ्या पैसा ची माहिती बाहेरचे देश देईनात म्हणून काहीतरी करायचं म्हणून त्या बोकील सारख्यांच ऐकून नोटबंदी लादली गेली. यामुळे काय फायदा तर झालाच नाही पण याचे दूरगामी परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर झाले .
     व्यपार मंदावला अनेकांचे रांगेतच  प्राण गेले ? हेच का याचे अच्छे दिन आले? शेतकरी बेहाल झाले? यांच्यावर 302 नुसार कारवाई का करू नये ?
      मोदीजी जर का तुम्ही 8 वाजता म्हणाला असता कि
       " देश में आज से कोई भी किसान कि चीज सस्ती नहीं मिलेगी उसकी किंमत हम तय करेंगे वो भी देढं गुना "
       मग आम्ही तुमचे गुणगान गायले असते ....पण तुम्ही  आमचे मरण च निश्चित केले....
     होय मी लाभार्थी तुमच्या फडतूस योजनांचा आणि तुमच्या फसव्या नोटबंदीचा .....
        होय हे तुमचं सरकार ....
           आमचं नाही....
           ‎
अमोल घोडके, पंढरपूर.-
मोदींनी  घोषणा केल्यापासून भारताच्या रोख अर्थव्यवस्थेत गोंधळात फेकले गेले आहे की 500 आणि 1,000 रुपयांचे नोट्स कायदेशीर निविदा बंद होतील आणि वर्षअखेरीपर्यंत बँकेत जमा करावे लागतील. अर्थतज्ज्ञांच्या मते, ही योजना दीर्घकालावधीत फायदेशीर ठरणार आहे कारण ती कर चुकवणे आणि भ्रष्टाचार निर्मूलन करण्यावर लक्ष्य आहे. जरी अल्पकालीन काळात, भारताच्या इतिहासातील मनी लॉन्डरिंगवरील सर्वात मोठा कारवाई काही असामान्य दुष्परिणाम करत आहे. येथे काही अनपेक्षित परिणाम आहेत भारतीय अर्थव्यवस्थेची मंदावून चालू राहिली आहे, ज्यामुळे बँकेच्या व्यवसायावर विपरित परिणाम होऊ शकतो
काळ्या पैशाच्या समस्येचा ठाम निश्चय हे एक संपूर्ण यशस्वी झाले नाही.
उपभोक्ता टिकाऊ वस्तूंच्या स्थिरतेत अलीकडे पर्यंत बदलून दिल्याप्रमाणे डिसेंबर 2016 नंतर पूर्व-नॅनोटिसेझेशन वाढीचे सर्वात मजबूत ड्रायव्हर असलेल्या उपभोग आणि सेवा ही लक्षणीय घट झाली. सेवांमध्ये व्यापार, स्थावर मालमत्ता, हॉटेल आणि रेस्टॉरंट, बांधकाम आणि वाहतूक हे विशेषतः कठीण दाबा भांडवली वस्तूंच्या उत्पादनातील निरंतर वाढीचा आणि व्यावसायिक क्षेत्रातील सरासरी बॅंक पतपुरवठा जानेवारी-ऑक्टोबर 2016 मध्ये 9.9 टक्क्यांवरून 5.6 टक्क्यांवर घसरला असल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबर 2016 ते सप्टेंबर 2017. अनेक सूक्ष्म व लघु कंपन्यांचा व्यवसाय बंद झाला कारण त्यांना कामकाजाचे भांडवल मिळत नव्हते. हे केवळ तिमाही कॉर्पोरेट कमाईमध्ये घेतले जाते. तसेच, काही अंदाजानुसार, जवळपास 5 दशलक्ष रोजगार संसाधनामुळे गमावले गेले होते. रिटेल आणि एमएसएमई क्षेत्रांमधून येणार्या अतिरिक्त तणाव  मुद्द्यांनंतर बँकांच्या बॅलेन्स शीट्सवर मोठ्या प्रमाणावर ताण आला.

पत्रकार संकेत कुलकर्णी थोडक्यात पण मार्मिक मत मांडतात-:

नोटबंदी केवळ दलाल बैंकर्स याना मोठे करण्यासाठी ....
आणि व्यापरी वर्गला स्वत : च्या अधीन करण्यासाठीचा प्रयत्न ....

गुजराती है भाई .... ' धंदा ' तो होगाही

करण, हिंगोली-
नोटबंदी ही किती फायद्याची की नुकसानाची यावर मी जास्त काही  सांगू शकत नाही कारण मी तज्ज्ञ नाही पण माझा नोटबंदी वरचा अभ्यास किंवा नोटबंदीची माहिती  जी माझ्यापर्यंत आली त्यावरून मी सांगू शकतो की ज्या दिवशी संध्याकाळी नोटबंदी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी मार्केट मध्ये बघितलं की काही लोक म्हणत होते की निर्णय बरबोर आहे कोणी म्हणत होत निर्णय चुकीचा आहे पण मला वाटले जोपर्यंत मी या वर अभ्यास करत नाही तो पर्यंत मी काही सांगू शकणार नाही कारण प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात.
ज्या लोकांकडे काळा पैसा होता त्यांना हा निर्णय चुकीचा तर वाटणार कारण नोटबंदी झाल्यानंतर त्यांच्या कडे काही उपाय नव्हता त्यामुळे बऱ्याच काळा पैसा असलेल्या लोकांनी गरीब लोकांना काही रुपये देऊन रांगेत उभे केले हे मी नाही काही नोटबंदी समर्थक न्युज वर आलं.मग काही न्युज वर दाखवत होते किंवा मी वाचलं की ते निर्णय चुकीचा आहे असं ते म्हणत होते पण जवळ पस प्रत्येक राजकीय पक्षाने ज्याचे त्याचे न्युज CHANNEL किंवा वर्तमानपत्र विकत घेतले विपक्षाच काम आहे टीका करणं हे आपल्याला माहीत आहे आणि एक उदाहरण देतो जर मी एखाद्या माणसाला म्हटलं की मी तुला 1000 रुपये देतो तू म्हण की सूर्य पश्चिमेला उगवते ,तो म्हणेल.त्याच प्रकारे काही असच झालं .जर आपण POSITIVE बाजू बघितलं तर असं दिसलं की नोटबंदीची बरेच फायदे झाले जसे की काश्मीर मधले बरेच दंगे जवळपास कमी झाले,ज्या लोकांकडे काळा पैसा होता त्यांना मोठी अडचण निर्माण झाली,बरेच राजकारणी लोक ज्याच्याकडे काळा पैसा होता त्यांचे चेहरे समोर आले,बऱ्याच नक्षलवाद्यांनी surrenender केले.
मला असं वाटतं की हा निर्णय आपल्या प्रधानमंत्रीनी घेतला ते असच घेतला नसेल त्यांना पण बराच अभ्यास करावा लागला असेल त्यांनी पण बऱ्याच economist कडून समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल कारण नोटबंदी हा काळा पैसा आणि भ्रष्टाचार याविरुद्ध मोठा डाव होता.
पण मी नोटबंदीचा पूर्णपणे समर्थन करत नाही कारण यामुळे लोकांना बरंच त्रास सहन करावा लागला,100 जणांचा मृत्यू झाला रांगेत उभे असताना ,बऱ्याच छोट्या मोठ्या धंदे बंद पडली,शेतकऱ्यांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम झाले.
पण जर हा निर्णय पूर्णपणे यशस्वी झाला नाही याचा अर्थ काही प्रमाणात यशस्वी झाला आपण ते पण बघितलं पाहिजे आणि अस नाही की सगळे लोक या निर्णयाला oppose करत आहेत बऱ्याच राष्ट्रांनी,मोठी उद्योजकांनी या निर्णयाचे स्वागत केले.मला असं वाटतं की आपल्यापर्यंत या निर्णयाची negative वार्ता जास्त पोहचल्या कारण सरकारने होईल तेव्हढी जलद सुविधा पोहचवली.
काही चुकीचं वाटत असेल तर क्षमा असावी

सोमनाथ आदमीले-
8 नोव्हेंबर2016 लाआपल्या देशात नोटबंदी केली गेलीआणि एका क्षणात 500आणि 1000 रुपयाचे 86% चलन बाजारातून काढून घेतले गेले .हा खूप मोठा निर्णय होता कारण    भारताची अर्थव्यवस्था हि कृषिप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते,त्यामुळे शेतीशी संबधित आर्थिक व्यवहार ठप्प झाले,असंघटित क्षेत्रातील रोजंदारीवर काम करणाऱ्याचे हाल झाले .नोटबंदीचा खूप दूरगामी परिणाम होणार आहे,कारण हा निर्णय घेताना  पंतप्रधानांनी पूर्वतायरीची जोड दिली नव्हती असे मला वाटते.
                  नोटाबंदीने काळा पैसा बाहेर येईल,दहशतवाद कमी होईल ,कॅशलेस व्यवहारांना चालना मिळेल,नक्षलवाद कमी होईल ,महागाई कमी होईल,असे सांगण्यात आले परंतु यातील कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण वाढ सोडले तर कोणतेही ऊधिष्ठ पुर्ण झाले नाही .
                   15.44 लाख कोटींपैकीं15.28 लाख कोटींच्या  (99%)नोटा  आरबीआयकडे जमा झाल्या.म्हणजे डोंगर पोखरून  उंदीर बाहेर काढण्याचे काम मोदी सरकारने केले. काला पैसा हा रोख स्वरूपात कमी असतो,तर रियल इस्टेट,सोने यांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात असतो.                        

नोटबंदीने आर्थिक मंदी आली ,रोजगार कमी झाले.सामान्य जनता मात्र या निर्णयाने भरडली गेली,पैशासाठी लोकांचा रांगेत मृत्यू झाला आणि त्यांना भक्तांनी राष्ट्रभक्तीच सर्टिफिकेट देऊन टाकले .

माझ्यामते नोटबंदी हा फसलेला निर्णय आहे .सरकार कॅशलेस इकॉनॉमी करण्याच्या नादात जनतेलाच लेसकॅश  केले.नोटबंदीचा सर्वात जास्त फायदा हा श्रीमंत लोकांना झाला,त्यांनी काळा पैसा पांढरा करून घेतला

राहुल अनपट,मंगळवेढा-
कवितेतून मत-
*नोटा बंदी*
होती काळी म्हणून
तिला रंग दिला
बंद केल जिला
१००० ची नोट म्हणतात तिला.।

कुणाकडे दोन नंबर होते
कुणाकडे कष्टकऱयांची होते
विकासाच्या नावावर मला टाळून
ह्यांची नोट बंदी होते ।

कुठे आहे मी
काळ्या पैशात कि पांढऱ्या
इथं माणसाचं नाहीत माणसात
मग नोटबंदी कुठं अन कशात ।

अमोल गायकवाड-
नोटबदी हा बहु-आयामी निर्णय असून त्याचे राजकारण होणे चुकीचे आहे. सरकारने सुरुवातीला लोकांना bank account सुरु करण्यास प्रोत्साहीत केले, नंतर लोकांना आपल्या जवळचे black money जाहीर करुन tax भरून मुख्य प्रवाहात येण्याची संधी दिली आणी त्यानंतर नोट बंदी जाहीर केली. आणि आता GST.
      यावरून असे लक्षात येते कि सरकारला लोकांच्या जवळील पैशाचे (cash) विवरण हवे होते. आता तुमचा पैसा मुख्य प्रवाहात आला आहे त्याच्या  पाऊलखुणा ठळक पणे उमठु लागल्या आहेत. यांत्रिक त्रूटी आहेत त्या कालांतराने दुरुस्त होतील. पण कोणत्यातरी पिढीला हा त्रास सहन करणे अपरिहार्य होते. Less-cash आपण सहज वापरु शकतो. जेव्हा सुरुवातीला mobile आले होते आणि आता तोच mobile आगदी दोन वर्षाची मुलहि सहज हाताळतात त्याप्रमाणे less-cash प्रणाली सुद्धा आपण वापरु याचा मला विश्वास आहे.
       शेवटी आपण एखादे नेतृत्व स्वीकारले तर त्याच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणे गरजेचे असते त्याशिवाय संघ विजयी होत नाही.

अनिल गोडबोले,सोलापूर-
८ नोव्हेम्बेरला रात्री जेव्हा नोट बंदी लागू झाली तेव्हा त्याच काय महत्त्व आहे किवा काय परिणाम होईल हे कळायला मी काही अर्थतज्ञ नव्हतो पण अस वाटत होत कि यातून भ्रष्ट्राचार कमी होईल आणि कॅशलेस मुले पैसे घेऊन फिरावे लागणार नाहीत, तसेच जे पैसे बाहेरून व्यवहार होऊन लोक गैर कामासाठी वापरणारे आहेत त्यांची गोची होणार असेही वाटत होते. त्यानंतर नोटा बदलून घ्यायच्या आहेत हे देखील कळाल. भरपूर चर्चा सोशल मिडिया, tv वरील कार्यक्रम.... भाषण... अस वाटत होत कि देशात खूप भारी काहीतरी होत आहे.

या मध्ये अर्थ तज्ञ अनिल बोकील यांचा कार्यक्रम ABP माझा वर बघितला. आणि अस वाटल कि जे होतंय ते योग्य होत आहे. पण हि द्विधा अवस्था पार कोलमडून तेव्हा पडली जेव्हा रांगेमध्ये उभारून नोटा बदलून घ्याची वेळ आली. ( जास्त पैसे नसल्यामुळे जास्त त्रास झाला नाही.) हॉस्पिटल मधून रुग्णांना बाहेर काढल्याच्या आणि रांगेत मेलेल्यांच्या कथांसोबत मदतीचे हात पुढे आलेत असेही वाचत होतो... ३१ डिसेंबर पर्यंत सगळ गोंधळत गेल.

त्या नंतर जी आकडेवारी आणि माहिती भेटत गेली ती काही फार बरी नव्हती. GDP कमी झाला. काळा पैसा काय दिसला नाही पण गुलाबी पैसे मिळतात कि नाही अशी अवस्था निर्माण झाली. जे लोक काम करून पैसे मिळवत होते त्यांच्या कडे पैसे कमी झाले त्यामुळे मार्केट रिकामा झाला.

त्या नंतर GST आल पण त्यावर काही आता जास्त बोलत नाही परंतु नोट बंदी मुले व्यवसाय चालत नाहीत लोक पैसा गुंतवत नाहीत अस नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. आतंकवाद कमी नाहीच झाला... त्याच मिडिया रिपोर्ट कमी झाल. वेश्या व्यवसाय करणार्या महिलना काही कमी नाही त्यांना त्यांचे पार्टनर मस्त सांभाळतात.. मानवी तस्करी वर परिणाम झाला असेल (मानवी तस्करी आणि वेश्या व्यवसाय हे दोन वेगळे भाग आहेत). थोडक्यात ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना काही फरक पडलेला नाही पण नवीन पैसा तयार होत नाही म्हणून ते हि चिंतेत आहेत.

आता तर ९ लाख करोड रुपये बँकांना दिलेत त्याचा काय परिणाम होतोय बघायचं पण लोकांनी पैशाचे व्यवहार थांबवलेले नाहीत तर बदलेले आहेत. बाकी मदत करायला CA तयार आहेतच. पण NGO चा फंड बंद झाला. गरीबाकडे फक्त आशा सोडून आता काही उरलेलं नाही अस चित्र दिसतंय. हे चित्र लवकरच बदलो हि अपेक्षा .....

 दत्तात्रय डोईफोडे-
 ‎ऐसे कैसे विचारी मना आले,
 ‎ अचानकपणे नोट बंदी केले,
 ‎जुन्या सर्व नोटा उद्या न चाले,
 ‎ ऐसें मोदी सहजच वदले.                      दुसऱ्या दिवशी गोंधळ उडाले,
 ‎ सगळीकडे सुट्टी जाहीर केले,
 ‎ त्यामुळे थोडेसे हायसे वाटले, 
 ‎पण लवकर चूक लक्षात आले,
 ‎ जनांसी थोडे दिवस मागितले,
 ‎ तरीही प्रश्न नाहीस सुटले,  
  काही मृत्यू अंगासी आले,    
  ‎काही करता काहीच झाले,  
  ‎सारवा सारव चालू केले,
  ‎पण तोवर नोट बंदी जणासी बुडविले,
  ‎ सर्व विचारे मोदी ऐसें कैसे केले,
  ‎मोदी आता एक शब्द ही न वदले
  ‎तेच जन म्हणे चांगलं केले,
  ‎झालं तेवढं वाटोळं पुरेसे झाले....

प्रविण देवरे,बागलाण-
खरतर नोट बंदीचा विचार केला तर तो अपयशी ठरला आहे अस मला वाटत ।।
कारण भारतातील जे काहि सर्व सामान्य नागरिक आहेत किव्हा अशिक्षित, वृद्ध, सर्वसामान्य शेतकरी यांच्यासाठी तो खरच काळा दिवस होता ।। मलातरी वाटत नोट बंदीची ती वेळ चुकली. नेमक्या त्याच कालावधीत लोकांच्या घरांमध्ये लग्नाचे वातावरण होते. काहि लोकांना तर थोडक्यातच आपले लग्न आटपुन घ्यावे लागले. अनेक लोकांना ATM च्या लाइनित हूभे राहवे लागले. त्यात अजुन एकादिवसाला कितितरिच पैसे मिळतील अशी अट ठेवण्यात आली. खर म्हणजे काळा पैसा बाहेर आणण्यासाठी हा सर्व खेळ चलला होता. पण ज्या लोकांकडे काळा पैसा होता त्यांनी आपल्या ओळखी किव्हा वशिल्याच्या माध्यमातून तो पांढरा केलाच मग यांच्यात गुंतल कोण तर गरीब वर्ग सर्वसाधारण मानुस ज्याला आपल्या एक हजार रूपयांसाठी देकिल बँकेच्या दारापुढे दिवसभर हूभे राहवे लागले.
     नोट बंदी झाली तेव्हा आम्ही वर्ग मित्र निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय मुंबई येथे एका ग्रामशहरी अध्यन सप्ताह साठी गेलो होतो. आणि तो पूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनीच आयोजित केला होता आणि तो सात दिवसांचा होता. नोट बंदी झाली त्या कालावधीत साधारण आमच्या कार्यक्रमाला तिन ,चार दिवस झाले असतील. आमचे सर्व पैसे त्या विद्यार्थ्यांनी बँकेत ठेवले होते. आणि अच्यानक आठ तारखेला नोट बंदी ची बातमी आली आणि आम्ही सर्व घबरलो.सर्व विद्यार्थांकडे घरपरति साठी पाचशे आणि एक हजारच्या नोट होत्या. त्याठिकाणी आम्हाला परिस्थितीचा खुप सामना करावा लागला. प्रत्येकावर मानसिक तान निर्माण झाला.
     तर मला याच्यातून हेच म्हणायचे आहे की शिक्षित लोकांना जर एवढा त्रास होत असेल तर आपण विचार करू शकतो की गरीब किव्हा अशिक्षित लोकांना किती त्रास सहन करावा लागला असेल. त्यांच्यावर किती मानसिक त्रास निर्माण झाला असेल .
    मला वाटत भारत सरकारचा हा निर्णय चुकीचा ठरला. गरीब जनतेला याचा खुप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. तरी देखील काळा पैसा हा पांढरा झाला आणि ते लोक अजुन देखील आनंदाचे जीवन जगत आहेत

मयुरी देवकर-
8 नोव्हे 2016 रोजी नोटाबंदी ची घोषणा जाली व खऱ्या अर्थाने दररोजचे सुरळीत जीवन विस्कळीत झाले .व्यवस्थित चाललेले सर्व व्यवहार ठप्प झाले आणि जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी तर सर्वसामान्य लोकांचे खूपच हाल झाले .यामधे सगळ्यात जास्त भरडली गेली ती सर्वसामान्य जनता ...आपल्या व्यवस्थेमध्ये हाच दोष आहे की जे काही निर्णय होतात , कारवाया होतात या सर्वांमध्ये नुकसान होते ते  ' सर्वसामान्य जनतेचेच ' ....आम्ही स्वतः बाहेरगावी राहत असल्याने मेस , खर्चासाठी आम्हाला सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांनासुद्धा पैशासाठी  ATM च्या बाहेर 4-5 तास उभे रहावे लागले तेही दैनंदिन गोष्टींच्या च पूर्ततेसाठी फक्त ....
       खरंच ' नोटाबंदी  '  हा खुप विचार करायला लावणारा निर्णय होता . सर्वांनाच त्यावेळी निर्णय जाहीर झाल्यानंतर वाटले की , आता काळा पैसा कमी होईल , भ्रष्टाचार कमी होईल ...पण कशाचे काय काळा पैसा कसा पांढरा झाला ते कोणालाच समजले नाही  हेच याचे ' यश  ' म्हणावे लागेल 😬.....त्याचप्रमाणे कैशलेस अर्थव्यवस्था बनण्याच्या द्रुष्टीने हा निर्णय पूरक होईल अस वाटलं होत पण काय ....आम्ही स्वतः या cashless system वर नोटबंदी नंतर एक प्रोजेक्ट केला ..तेंव्हा आम्हाला समजून आले की , समाजामध्ये किती लोकांना माहीत आहे हा शब्द ..अशिक्षित न्हवे तर कॉलेज मधील मुलांना सूद्धा ऑनलाइन बँकिंग , नेट बँकिंग , कैशलेस साठी ची नवीन ॲप , बँक ॲप कोणती आहेत कशी वापरायची माहीत नव्हत.म्हणजे अजून तरी सर्वाना त्यांची साधी तोंडओळख ही नव्हती , नाव ही माहीत नव्हते मग कसे करणार आम्ही कैशलेस  व्यवहार ? ?
   त्यावेळी म्हणजे नोटाबंदी च्या काळात  खऱ्या अर्थाने छोटे छोटे व्यापारी , शेतकरी , रिक्षाचालक या सर्वांना खूप त्रास झाला . अगदी उपजीविका करने सुद्धा मुश्किल झाले होते .
    आणि म्हणुनच ही योजना जरी अयशस्वी झाली असली तरी आपण तरुणांनी सजग होवून  कैशलेसचे जे ॲप आहेत ते आधी आपण समजावून घेवुन कैशलेस सिस्टम चे फायदे काय आहेत यावर विचारमंथन करून आपण ज्यांना हे माहीत नाही त्यांच्याकडे पोहोचवून कैशलेस विषयी माहिती व जागरूकता निर्माण करायला हवी आहे ...

शरद कांबळे-
‎‬8 नोव्हेंबर 2016 ची ती रात्र,पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत अशी बातमी आली आणि मी टीव्ही समोर बसलो.पंतप्रधानानी अत्यंत धाडशी निर्णय घेतला.देशातील 500 आणि 1000 च्या नोटा बाद ठरवल्या.राजकारण बाजूला ठेवून विचार केला तर हा खरचं क्रांतिकारी निर्णय होता.सामान्य माणसांनी या निर्णयाचं स्वागतच केलं.पंतप्रधानानी भाषणात काळा पैसा, भ्रष्टाचार या वर घणाघात केला.त्यामुळे सामान्य माणूस सुखावला आणि मनोमन अत्यंत खुश झाला,कारण त्याला वाटत होतं की आता काळा पैसा असलेली लोक रस्त्यावर येणार,त्यांच्या घरावर धाडी पडणार इत्यादी.या काळात लोकांचे अत्यंत हाल झाले पण लोकांनी देशासाठी ते सहन केले.या निर्णयाला विरोध करणं देशभक्तीशी जोडलं गेलं.या निर्णयामागील उद्देश जरी चांगला असला तरी तो ज्या प्रमाणे अंमलात आणला गेला त्या अर्थव्यवस्थेचं अक्षरशः कम्बरड मोडलं.अर्थव्यवस्थेतील 86% चलन एका झटक्यात काढून घेतलं आणि त्यामुळे सामान्यांचे झालेले हाल आपण पहिलेच आहेत किंबहुना अनुभवले आहेत.नोटबंदीचा हा निर्णय यापेक्षा चांगल्या प्रकारे नक्कीच अमलात आणला असता.मूठभर लोकांना शोधण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरलं गेलं.आता वर्ष उलटून गेल्यावर सरकार निर्णयाच्या समर्थनात तर विरोधक विरोध करण्यात दंग आहेत.या विषयाचा अगदी चोथा झालेला आहे.निर्णय योग्य की अयोग्य या बद्दल प्रतेकांची मते वेगवेगळी आहेत आणि त्यांचा मी आदर करतो,पण काही तथ्य आहेत ती अशी:
1)बाद केलेल्या नोटांपैकी 99.96%पैसा अर्थव्यवस्थेत परत आला.मग काळा पैसा गेला कुठे?
2)नोटबंदी झाली तेव्हा शेतकऱ्यांची खरिपाची पिकं निघाली होती.पण बाजारात पैसाच नसल्यामुळे त्यांना आपलं धान्य कवडीमोल दराला विकावं लागलं.मजुरांना केलेल्या कामाचा रोजगार न मिळल्यामुळं अक्षरशः भूकं रहावं लागलं.
3)सरकार म्हणतंय आम्ही कुणाच्या खात्यात निहित स्रोतापेक्षा जास्त पैसे आले यावर लक्ष ठेवून आहोत,पण अजून अश्या एकही खातेदारावर कार्यवाही झालेली दिसत नाही.
4)काही लोकांकडून असं समर्थन केलं जातं की,यामुळे कॅशलेस व्यवहारांना चालना मिळाली.कॅशलेस साठी सामन्यांना वेठीस धरणं कितपत योग्य आहे?
5)नोटबंदीमुळं दाहशवाद्यांचं नुकसान होईल असं सांगितलं गेलं पण अजून तरी तसं दिसत नाही.शेवटी एवढचं सांगावं वाटतं की सरकारने हा निर्णय क्षुद्र राजकारणासाठी न रेटता, देशहितासाठी या कुरघोडीच्या राजकारणातून माघार घ्यावी आणि अर्थव्यवस्थेचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी देशातील जनतेला विश्वासात घेऊन उपाययोजना करावी.देश नक्कीच त्यांना साथ देईल.

बालाजी सानप-
मला वाटलेले negative point:-
नोटाबंदीचा उद्देश चांगलाअसो किंवा वाईट परिणाम मात्र सामान्य माणसांना माणसांना भोगावे लागले हे मात्र नक्की,
बऱ्याच ठिकाणी अनेक संस्थाचालकांनी,कारखानदारांनी,उद्योजकांनी त्यांच्याकडे असलेला काळा पैसा त्यांच्या कर्मचाऱ्यांची बळजबरीने मदत घेऊन पांढरा केला ही माझ्यासमोरची ताजी उदाहरणे आहेत....बऱ्याच लोकांना कॅशलेस अर्थव्यवस्था माहिती नव्हती ती नोटाबंदी नंतर बऱ्याच जणांना माहिती झाली
नोटाबंदी नंतर मी स्वतः अनेक व्यवहार कॅशलेस करू लागलो
आणि नोटाबंदीनंतर काश्मीर मधील आपल्या आर्मीवर होणारी दगडफेक बऱ्याच प्रमाणात कमी झाली....

©"वि४"व्हॉटसअप ग्रुप.
https://vichar4.blogspot.in/?m=1

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************