ओंकार क्षिरसागर,अहमदनगर
दाखव रे ती गायछाप नाहीतर सोड डबल घे..
आय आर थांब बाबा काय रे काय झालं रंगा???
बाबा नको नको मीच माझी इकत घेऊन खातो.
का रे बाबा म्या काय इष कालवल हाय व्हय र सुकळीच्या...
अरे बाबा नको म्हटलं ना.
अरे पण का सांगशील तर???
अरे बाबा तू तालुक्याला जाऊन आलास न व्ह.
हा मग त्याच काय???
अरे मग तो कोरोना का फोरोना आलाय ना बाबा तिथं त्याच्याने लोक हात लावल्या लावल्या मरतात म्हणे.
संप्या नसलं खायची तर खाऊ नकोस पण उगाच माझ्या मनात भीती नको घालून देऊस लगा तू
शहरी बाबू आला शहरी बाबू
संकेत कधी आलास बाळा
नाना आठवडा झाला आलोय आणि आल्या आल्या स्वतःला घरात कोंडून घेतलं मी.
ते म्हणून का रे बाबा??
अहो नाना मी सांगतो हा शहरी बाबू तिकडून आलाय आपल्याला ते व्हायरस होऊ नये म्हणून हो ना रे संक्या??
हो रे आणि त्याला कोरोना असे म्हणतात.
अरे मला एक सांग की ते गावात येताना लांबून दत्त मंदिर दिसायचं ते एवढं खराब का झालं की किती पडझड झाली आहे त्याची असे का??
आणि आणि प्रवरेला पाणी केव्हा येणार आहे रे शहरात बघ ते अडवलेल्या पाण्यात पोहायची मजा काही येत नाही बघ लगा आणि आणि पद्मावतीला केव्हा जायचंच आपण मेंढरं घेऊन? आणि आणि तो नदी पलीकडचा काळभैरव चला राव चला अरे आणि तिथे अजून पण रविवारी पिठलं भाकरी मिळते का रे?? अरे बघ ना आठ वर्षे झालीत पण जिभेवरची ती चव अजून विसरलो नाहीये हा मी..
अरे आय भुसपांग्या जरा गप की श्वास घे थोडा.
दत्त मंदिराचे झालं असे की साल बदलले आणि त्याचे हक्क मोठया वाड्याकडे गेले आणि तुला म्हणून सांगू काय काका काकू आणि आज्जी वर्षभरात कायमचे दत्ताकडे गेले रे.
काही काय बोलतोय हे शक्यच नाही काका सैन्यात होते त्यांचे ते सकाळचे व्यायाम अजून पण डोळ्यासमोर आहेत रे.
गप लगा तुला माहीत तरी आहे का काही इथलं?
तू शेवट केव्हा आला होतास तुला आठवत का?
येतोस आणि पुन्हा सांजच्याला निघतोस लगा
आम्हाला तू आलास याची खबर मिळे पर्यत तू पुन्हा जायला निघालेला असतोस बघ.
अरे हो रे कामाची गडबड खूपच वाढली आहे रे आजकल काय करू समजतच नाहीये जबाबदारी वाढली आणि सर्वच.
ते सोड मला एक सांग आता मग मंदिर कोण बघत???
अरे त्यांची मुले शहरात असतात चांगलं कमवतात म्हणून त्यांना इकडे यायला नको वाटतं. आता अवकाळी झाला तेव्हा आपली ती *आमटी चिंच* जिच्यावर आपण सुरपा-रंब्या खेळायचो ते पडली की रे खाली सरळ मंदिरावर.
वाईट झालं रे आपल्या गावातलं एकूणच सर्व..
अरे तू गेलास गाव सोडून तुझ्या सोबतच ज्यांनी ज्यांनी गाव सोडलं त्यांनी पुन्हा कुठे गावाकडे ढुंकून पण बघितलं नाही.
आणि बाकी जे आम्ही इथे थांबलो ते उसाला,घासाला आणि दुधाच्या किटलीत पाणी देऊन देऊन आयुष्य काढतोय..
हे सर्व बोलत असताना संकेतच्या डोळ्यासमोरून संपूर्ण लहानपणीचे आयुष्यच गेले जसे
टचकन डोळ्यात पाणी आलं आणि इथून पुढे वेळ मिळेल तसे गावाकडे यायच त्याने ठरवलं आणि जमेल तशी आर्थिक मदत करून यांना एक सरळ आयुष्याच्या घडीत घेऊन यायचे याचा मनोमन संकल्प त्याने केला.