माझा "🌱वि४🌿 ग्रुपसोबतचा आजवरचा प्रवास. भाग 3 ( तिसरा )


 तेजस महापुरे, कराड.
          माझा वि४ ग्रुप सोबतचा आजवरचा प्रवास हा अत्यंत चांगलाच राहिलेला आहे, मला वाटत जगाच्या पाठीवर इतका चांगला ग्रुप कोणता नसेल,सर्वप्रथम मी सौदागर जी यांचे आभार मानतो कारण त्यांनी मला या ग्रुप मध्ये ऍड केले.                       आपला वि४ ग्रुप हा एक प्रबोधनाचे अत्यंत प्रभावी माध्यम बनला आहे, इथे आपल्या सर्वांनाच मनमोकळे पणाने विचार मांडता येतात एवढं स्वातंत्र्य तर कोणत्या चॅनेल च्या संपादकाला पण नाही, दिवसेंदिवस अडमीन टीम ने आपल्या ग्रुप च्या कार्यपध्दतीमध्ये कमालीची सुधारणा आणली आहे त्या सर्वांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, मागे ४ वेळा माझे लेख हे ब्लॉग मध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हते पण जेव्हा जेव्हा मी अडमीन टीम ला मेसेज केला त्यावेळी तात्काळ माझे लेख हे ब्लॉग मध्ये ऍड केले जात एवढी तत्परता दुसरीकडे क्वचितच आढळत असेल.          माझ्यामते विचार ग्रुप हे नवीन जागतिक आश्चर्य आहे,   कारण आपण सर्वजण फार शिस्तप्रिय झालो आहोत, नव्याने विचार करू लागलो आहोत, या ग्रुप वरील लेख वाचल्याने नक्कीच प्रत्येकाच्या विचाराच्या कक्षा या रुंदावल्या असतील.            या ग्रुप मुळे आणखी एक फायदा झाला म्हणजे इथे सर्व महाराष्ट्र एक झाला भले आपण एकमेकांना भेटलो नसलो तरीही आपल्या सर्वांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध हे नकळत निर्माण झालेच आहेत, आपल्या ग्रुपचा दिवाळी अंक येईल तसेच मला वाटते की आपण वि४ परिषद आयोजित करू, वि४ वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा सुद्धा घेऊ शकतो, वि४ नावाने मासिक देखील सुरू करता येईल यामुळे आपला ग्रुप हा तळागाळातील लोकांपर्यंत पोचेल आणि यातून एक सामाजिक वि४ क्रांती होईल.                                मला वाटतंय नक्कीच आपण एका महान कार्याची सुरुवात केली आहे व ती अखंड सुरू राहावी हीच सदिच्छा.......
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संगीता देशमुख,वसमत.
           "इंटरनेटचे फायदे की तोटे" यावर जेव्हा मी विचार करते तेव्हा वैयक्तिक माझ्या जीवनात याचे फायदेच दिसतात. सोशल मिडियातून  अनेक चांगल्या माणसांचा परिचय मला झाला. आणि न पाहिलेली माणसेही अनुभवता आली. आपल्याच समूहातील अक्षय पतंगे सरांचा परिचय फेसबुकवरून झाला. त्यांच्या गावी मला व्याख्यानासाठी त्यांनी बोलावले होते. तिथे माझी आणि त्यांची भेट झाली नाही. पण आम्ही संपर्कात होतो. १३जानेवारीला त्यांनी मला आपल्या वि४ या समूहात घेतले. लिखाणाची आवड असल्याने समूहात आले. पण  समूहात पाहिले तर सर्व तरुण मंडळी! मला वाटले,या तरुणांमध्ये आपल्यासारख्या प्रौढ स्त्रीचे काय काम आहे?  मला सुरुवातीला थोडे बावरल्यासारखे झाले कारण आजकाल तरुण म्हटले की डोळ्यासमोर येतो कट्टर धर्मवाद! मला वाटले,इथेही तरुणमंडळीच आहे. असे जर असेल तर आपण फार काळ इथे टिकणार नाही. पण या समूहाची  विचारधारा पाहून मला वाटले की, आपण योग्य समूहात आलोत. खरेतर या समूहातील एकाही व्यक्तीला मी प्रत्यक्ष भेटलेले नाही.  परंतु या समूहाने मला इतकं केव्हा आपलसं केलं ते कळालेही नाही. आज मला वि४ हा समूह वाटत नाही,तो मला एक परिवार वाटतो. आणि पुन्हा एकदा जाणीव झाली की,समविचारी लोकांची अशीच शृंखला जुळत जाते. मी आपल्या परिवारात इतक्या उशीरा आले  आणि त्यात लवकरच ॲडमिनपदाची खुर्ची भेटली. हे जरा अनपेक्षितच होते. कितीही वरवर नाही म्हटलं,तरी खुर्चीचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही. आणि ती तर मला विनासंघर्षाची मिळाली. पण ही जबाबदारी पेलण्यास माझ्यापेक्षा समर्थ सदस्य असताना मला ती जबाबदारी दिल्याने जरा अवघड वाटले. मला माहीत आहे,या परिवारात अनेकांचे फारमोठे योगदान आहे. मला सर्वात कौतुक याचे वाटते की,या तरुणांना विचार करण्यासाठी विषय किती चांगले सुचतात. किती ज्वलंत आणि क्रांतिकारक,प्रेरणादायी विषय सुचतात!  मला का तसे विषय सुचत नाहीत,म्हणून हेवाही वाटतो बर!यात शिरीषजी,अक्षयजी,प्रवीणजी,नरेशजी, अनीलजी,सीमालाजी,वैशालीजी,पवनजी,मयूरीजी,सौदागरजी,नरेशजी,करणजी हे सर्व मंडळी प्रत्यक्ष भेटली नसली  तरी  माझ्या कुटुंबातीलच वाटतात.  खरेतर मला दिलेली जबाबदारी मी फार धावतपळत सांभाळते आणि ती या परिवारातील सर्व मंडळी गोड मानून घेतात,हे काय कमी आहे का? पण कितीही मी बिझी असले तरी या परिवारासाठी आवर्जून वेळ द्यावाच वाटतो.
मी फार घाईत आणि प्रवासात हे लिहिले आहे. चूकभूल क्षमस्व:!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पवन खरात,अंबाजोगाई.
  माझा माझा "🌱वि४🌿ग्रुप "सोबतचा आजवरचा प्रवास खरचं आयुष्याला वेगळं वळण देणारा आहे.
घर , ऑफिस आणि संसार यातच संपणारा प्रत्येक दिवस मला रोज नवीन गोष्टी आणि निरनिराळ्या लेखकांच्या लेखांचे वाचन करायची जणू सवयच लागून गेली.

 नकळत कधी या विचार कुटुंबाचा मी जुना सदस्य झालो हे कळलेच नाही.
या कुटूंबाने मला नव्या उमीदेने जगायला शिकवले. ज्या दिवशी ऑफिस मध्ये जर खूप बोर झालं की व्हाट्सअप्प वर विचार ग्रुप वाचतो आणि पुन्हा फ्रेश माईंड ने कामाला लागतो.
    माझा कविता लेखनाचा छंद तर खरं तर सुटलाच होता पण या विचार कुटुंबामुळे कधीतरी पुन्हा कविता लिहायची इच्छा होते.

अबोल माझ्या या मनाला बोलकं केले ,
कोंडलेल्या भावनांना पुन्हा मोकळ आभाळ दिले,
थांबलेल्या विचारचक्राला पुन्हा गतिमान केले.
गंजलेल्या माझ्या लेखणीला पुन्हा धार दिली ।

विचार कुटूंबाचा मी मनापासून आभार मानतो आणि आपली साथ अशीच राहू द्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


महेश देशपांडे,ढोकी, जिल्हा धाराशिव.
           खरच खुप चांगला अनुभव आला...
तस पाहिलं तर शब्दबद्ध करणं म्हणजे अवघड आहे...
मला माझ्या सोबत असलेले सर्वच्या सर्व लोक अस म्हणतात की,
तुम्ही फार गप्प राहता, बोलत रहा, मन मोकळं करत रहा..
माणसाने मनात गोष्टी ठेवल्या तर त्याचा त्रास होतो...
पण मला त्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नव्हतं, पण विचार ग्रुप ने ते मला दिलं, त्याबद्दल मी त्यांचे खुप आभारी राहीन...

विषय विविधांगी असतात, अगदी सर्व पैलूंना स्पर्श करणारे असतात...
आणि विशेष म्हणजे ९९.९९% नियमांचं पालन केले जाते, जे की भारतीयांकडून होत नाही सहसा..😊
त्यामुळे ऍडमिन टिम ला 👍👍..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


नरेश बदनाळे,जि.लातुर.
            🌱वि४🌿 सोबत चा प्रवास खरेतर शब्दात मांडणे म्हणजे शब्द सागरातल्या मौल्यवान मोत्यांची माळ तयार करणेच आहे...वि४ सोबत मी विचार च्या स्थापने नंतर ३ ते ४ महीन्यांनंतर सलग्न झालो. विचार हे विचारांचं मुक्त व्यासपीठ व निरंतर वैचारीक प्रवासाची आगीनगाडी आहे जिला समाज क्षेत्रातील विविध पैलुंचे डब्बे आणि विचारवंत रुपी प्रवासी आहेत.आणि ही आगीनगाडी लवकरच
समाजातील विविध कानाकोपऱ्यातुन प्रवास करत समाजातील विवीधांगी पैलुंचा अभ्यास करत तुमच्या आमच्या विचारांच्या सहयोगातुन समाजात वैचारिकतेच नविन चित्र निर्माण करेल हे मात्र नक्की आणि‌ तो दिवस दुर नाही...🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अर्चना खंदारे ,हिंगोली.
         खरे तर या ग्रुप सोबतचा माझा  प्रवास  हा फक्त  पूर्वीच्या  4-5  आठवड्य  पासून  चा आहे .मला या ग्रुप मधील  एका  व्यक्तीची  च ओळख  होती  ते म्हणजे प्रवीण  सर  ते काही काळ  माझे  सिनिअर  सुद्धा  होते ,ते मला  नेहमी  म्हणायचे  मॅडम  तुम्ही  काही लेख  लिहीत असता  का ? मला लिखाणाची  थोडी  आवड  तर होतीच  पण ती स्वतः  पुरतीच  मर्यादीत होती .कारण आपले विचार  मांडायला  असे कुठलेही  व्यासपीठ  नव्हते.माझा वाचन  कक्ष  हा कमी  आहे.
   पण सर नि  मला या ग्रुप विषयी  सांगितले सुरुवातीला  मी  या ग्रुप मधील लेखाचे  वाचनच  केले ,वाचना  वरून लक्षात  आले  कि  खरंच आज च्या तरुणांना  असा च व्यासपीठाची  गरज  आहे कि ज्यामध्ये  आज चा तरुण आपले विचार हे निर्भीड   पणे मांडू  शकतो .त्याच्या  विचारावर  इतर  लोकांस  विचार करण्यास  प्रवृत्त  करतो . इथे  एकमेकांना  न ओळखता  आपण सर्वजण त्याच्या  विचारावरून  त्यान्ना  ओळखतो .
खरंच मी या ग्रुप मधील सर्वांची  आभारी  आहे .🙏🙏कारण मी या ग्रुप परिवारातील  त्याचा  एक हिस्सा  आहे .
धन्यवाद  प्रवीण सर...🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रदिप इरकर,वसई,जि-पालघर.
        माझा वि४ सोबत च्या प्रवासाला तसे 6 महिने होऊन गेले असतील मलाही आठवत नाही.

*मला आवडलेले पुस्तक* ह्या पहिल्याच दिवशी सौदागर सरांनी लिहलेल्या *बनगरवाडी* या लेखावर मी अक्षरशः टाळ्याच वाजवायचो बाकी होतो इतका तो लेख आवडला होता.
त्यांच्यानंतर ग्रुपमधील राजश्री मॅडम यांचे लिखाण मला विशेषतः आवडत असे.
प्रवीण सरांचे प्रत्येक विषयांच्या लेखनामध्ये हास्यरसाचा😅 खूपच वापर केलेला असतो.
 ऍडमिन टीम मधील सर्व सदस्य खरच खूप मस्त लिहितात.

नवलेखक,नववाचक विशेषतः मराठी वाचन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
एकीकडे आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करतोय व दुसरीकडे आपणच तिच्या संवर्धनासाठी काही करताना दिसून येत नाही.
वसई -मुंबई मध्ये तर सध्या अशी परिस्थिती आहे दोन मराठी माणसे परस्परांशी हिंदी मधून संवाद करताना दिसून येतात त्यात दोघांचीही हिंदी अतिशय उत्कृष्ट(?) असल्यामुळे समोरचा मराठीच आहे हे ध्यानात आल्यावर मराठी मधून बोलायला लागतात व त्यासोबत *मराठी माणूस राहिलायच कुठे?* असा संवाद सुरू होतो परंतु इथेच जर आपण स्वतःहून सुरुवात मराठी मधेच केली तर कुठे बिघडतेय? तेच समजत नाही मला.निदान समोरच परप्रांतीय असेल तर मराठीचे एक वाक्य तरी शिकेल तो.
2011 च्या जंगणानेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी च्या वर आहे आणि मराठी बोलणारे फक्त 9 कोटी? हे कसे काय?
कारण आपण मराठीचा प्रसार आणि प्रचार करण्यात कमी पडतोय.
प्रसार करणे म्हणजे आपले कामधंदे सोडून प्रसार करत फिरवा असा मी कदापि म्हणत नाही परंतु सार्वजनिक ठिकाणी,कस्टमर केअर सोबत,बँकेत,बस-रेल्वे मध्ये आणि इतर सर्व तत्सम ठिकाणी आपण  स्वतःहून प्रथम मराठीच भाषेत बोलले पाहिजे हाही मराठीच्या प्रसारचाच एक भाग आहे.

ह्याचा एकच उपाय आहे आज तरुणांमध्ये (जे स्वतःमध्ये सुद्धा हिंदीत संवाद साधंतात) मराठी भाषा भिनलेली असली पाहिजे ती भिनवण्याचे काम वि४ सारखे ग्रुप खूप चांगल्या प्रकारे करू शकतील असे मला वाटते.

लेखक होण्यापेक्षा मला वाचक होण्यात जास्त रस आहे.ह्या ग्रुप मधील अनुभवी लेखकांचे वि४ जेव्हा वाचतो तेव्हा ते वाचताना खूप प्रश्न मला कधी कधी पडतात
एखादा लेख वाचाताना कळते की अरेच्चा हा विचार तर मी केलाच नव्हता😱
संबंधित विषयाकडे ह्या नजरेनेसुद्धा पाहता येऊ शकते एकंदरीत अगदी खोलवर कसे जायचे हे येथील लेखकांच्या विचार करण्याची पद्धती वरून समजते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अमोल धावडे,अहमदनगर.

माझा वि४ ग्रुप सोबतचा प्रवास खूपच सुंदर आहे. प्रथम मी ग्रुपसोबत आल्यावर ग्रुपमध्ये काय सुरू आहे हे समजत नव्हत सगळेजण लिहियाचे व मी फक्त वाचन करायचो ग्रुपच्या नियमानुसार प्रत्येक आठवड्याला एक लेख लिहिणं बंधनकारक होत परंतु प्रथम मी कोणत्याही प्रकारचे लिखाण न केल्याने ग्रुपमधून मला काढण्यात आले अडमीन साहेबाना विनंती करून मला पुन्हा ऍड करण्यात आले व त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली जसा वेळ मिळेल तसा मी लेख लहीयचो.
विचार सोबतचा माजा प्रवास अत्यंत सुंदर आहे. ग्रुपच्या माध्यमातून खुप नविन शिकण्यास मिळाले. ग्रुपमधील प्रत्येकाचे वेगवेगळे विचार वाचण्यास मिळाले. या माध्यमातून लिखाण करण्यास सुरुवात झाली.
विचार ग्रुप अत्यंत सुंदर आहे येथे एकमेंकाच्या विचारांची देवाणघेवाण होते.
ग्रुपमधील सर्व सदस्यांचे आभार व विचार ग्रुप हा पुढे असाच सुरू राहील ही अपेक्षा।।।।।

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अक्षय पतंगे,आ बाळापुर हिंगोली.
        सौदागर काळे, शिवाजी शेंडगे आणि मी बारामती आणि मुंबईमध्ये दोन वेळा भेटलो. विविध विषयांवर चांगली चर्चा घडून आली. त्यानंतर फोनवर महिन्यात कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन वेळा बोलणं व्हायचं. ही चर्चा दोघांनी वाचलेल्या किंवा दोघांपैकी एकाने वाचलेल्या एखाद्या पुस्तकावर, लेखावर असायची. एखाद्या जीवंत आणि ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर असायची. तर कधी कधी बळीराजा पासुन तुकोबांच्या मार्गे गांधीजींपर्यंत यायची. पण यात लिखीत नोंद कुठेच नव्हती. एका दिवशी सौदागर काळे यांचा फोन आला व एक ग्रुप चालु करण्याविषयी ते मला विचारताचं मी होकार दिला. त्यानंतर त्यांनी वैशालीस विचारले, त्यांनीही होकार दिला अन विचारचा श्रीगणेशा झाला. Admin टीमसाठी नवीन सदस्यांची चर्चा सुरू झाली तेव्हा प्रा. संगीता देशमुख Madam यांना मी विनंती करताचं त्यांनी स्विकारली व सामाजिक क्षेत्रातील जबाबदारी सांभाळत वेळ काढून दर्जेदार लिखाण व blog नियमीतपणे करतात. करण तर सगळ्या ग्रुपमधील वयाने सर्वांत लहान पण त्याचे blog पाहीले तर कामाची पद्धत किती दर्जेदार आहे, हे लक्षात येते.  त्याचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मला व सौदागर काळे यांना पहिले सहा महिने काही लोकांकडून खुप विरोध झाला. काही काळ blog ची लींक पण बंद केल्या गेली,फेसबुक पेज अडमीन ची अकाऊंट रिपोर्ट करण्यात आले.कारण होतं विचार ग्रुपचे विषय व अभयपणे व्यक्त होणारी तरूणाई.  पण आम्ही आता घेतलेले पाऊल मागे हटणारे नव्हतो. व पुन्हा जोमाने सुरूवात झाली. वैशाली, प्रविण, प्रा.मयुरी देवकर,पवन, श्री गोडबोले, शिरीष, नरेश, बालाजी ही सर्व टीम वेगवेगळ्या जबाबदार्या पार पाडते.

आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. Admin  टीम गेल्या वर्षभरात सातत्याने सक्रिय राहिली. मी मात्र सक्रिय राहतो हे नेहमी म्हणतो, पण शक्य होत नाही.
यादरम्यान नवीन माणसं जोडल्या गेली. नवीन दर्जेदार लेखन वाचण्यात आले. बघताबघता वर्षे कसे निघुन गेले कळलेच नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


वैशाली सावित्री गोरख,पंढरपूर,सोलापूर.
          खरं तर मला सुरुवात कुठून करावी ते कळत नाही कारण वि४ ग्रुप सोबतच्या प्रवासा आधी सौदागर नि माझ्या जडणघडणीचा प्रवास चालू झाला होता .अत्यंत हलाखीच्या परिस्थिती मध्ये शिकून आम्ही येथे पर्यंत मजल मारली ह्याचच मला आश्चर्य वाटतं .मी नि सौदागर दहावी मध्ये एका शाळेत शिकलो , त्यावेळी मला माहित होतं सौदागर एक चांगला वक्ता आहे पण नंतर एक दिवशी लोकसत्ता वाचत होते त्यावेळेस सौदागर ब्लॉग बेंचर विजेता पाहून खूप आनंद झाला व एका उत्तम लेखकमित्र गवसला.मग नंतर हळू हळू संपर्कात ही आलो ते पण एक विचार परिवर्तन होतं असच मला वाटत.मला वाचन व लेखनाची आवड लहानपणा पासूनच होती एखादी कादंबरी वाचली की त्याच्यावर मला काय वाटतं हे लिहून ठेवणं ,होस्टेलला असताना रोजच्या रोज डायरी लिहणं हे सुरू होतचं व त्यातून पुढे जाऊन फेसबुकसारखं प्रभावी माध्यमाची माहिती झाली त्यावरती ही लेख लिहणे,एखाद्या घटनेविषयी स्वताच मत मांडणे हे चालू होतं . मग गेल्या वर्षी सौदागर ने 🌱वि४🌱 ग्रुपविषयी कल्पना मांडली व ती खूप प्रभावी वाटली पण मनात एक भीती ही होती ,एक जबाबदारी होती की बाकीचे जे ग्रुप असतात त्या पद्धतीने आपला ग्रुप होऊ नये. ग्रुप अत्यंत व्यवस्थित चालावा ह्यासाठी खूप कठोर भूमिका ही घ्याव्या लागल्या पण त्यावेळेस, पण त्या भूमिकांच आज सार्थक झालं असं वाटतंय .
त्याचपद्धतीने हा ग्रुप व्यवस्थित चालवण्याचं श्रेय पूर्ण अडमीन टीम ला जात कारण खूप वेळ काडून ग्रुपवरती नियंत्रण ठेवणं ,ब्लॉग तयार करणं ,विषय ठरवणं नि सगळ्यात महत्वाचं एकमेकांना समजावून घेणं हे आहे .आतापर्यंत सगळ्याच अडमीनने खूप छान ग्रुपला सांभाळून घेतलं आहे .
व ग्रुपचे जे सदस्य आहेत त्यांचं ही खूप अप्रूप वाटत मला कारण एकाहून एक चांगले लेखक वाचायला भेटले ,नि सगळेच अत्यंत काटेकोर पणे ग्रुपचे नियम पळताना दिसतात
पुढे जाऊन ही हा वि४ आपण मोठया प्रमाणात रुजवूयात ह्याच छोटंसं रोपटं आम्ही लावलं होत त्यांच झाडात रूपांतर होताना पाहायचं आहे ,ह्या वेळेस आपण e दिवाळी अंक काढतोय पुढे जाऊन ह्याच्यात खूप प्रगती होणार आहे हा विश्वास आहे व ती प्रगती आपल्या एकमेकांच्या साथीनंच होणार आहे .
विचार सोबतचा प्रवास अत्यंत छान राहिलेला आहे व पुढे ही असाच राहील .🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माझा "🌱वि४🌿ग्रुप "सोबतचा आजवरचा प्रवास. भाग -2 (दुसरा )




 निखिल खोडे, ठाणे.
           विचार ग्रुप म्हणजे स्वतःचे विचार बिंदासपने मांडण्याचे व्यासपीठ आणि त्याच बरोबर इतर सदस्यांचे विचार,  एकाच विषयावरचे वेगवेगळे मते वाचायला मिळतात.
            माझा वि४ ग्रुप सोबतचा प्रवास... सुरुवातीला ग्रुप ची लिंक शिरीष सरांकडून मला व्हॉट्स अप ला मिळाली. जून च्या शेवटच्या आठवड्यामध्ये मी करन दादा ला वयक्तिक संदेश पाठवून मला ग्रुप जॉईन व्हायचे आहे असे सांगितले. त्यांनी ग्रुप चे नियम मान्य आहे का? असा प्रश्न विचारून मी हो म्हटल्यावर मला ग्रुप मध्ये जॉईन केले. सुरवातीचे खुप दिवस हे बाकी सदस्यांचे ग्रुप वरील विचार वाचण्यात गेले. परंतु स्वतः लेख लिहिण्याची कधी हिम्मत नाही झाली.
             खुप दिवसानंतर ही लेख नाही आला तुझा? असा शिरीष सरांचा व्हॉट्स अप वरती मेसेज आला. त्यांना सांगितल की सर मला नाही जमत आहे लिहायला! त्यांनी लगेच म्हटल की बाकी लोकांचे लेख वाच आणि पहिल्या फक्त ४ ओळी लिही. नंतर आपोआप सुचेल. त्यानंतर मी लेख लिहायला सुरुवात केली. पहिला लेख लिहायला मला जवळपास ५ दिवस लागले... आज लिहू ... उद्या लिहू करता करता !! 😅 आणि विषय होता "नेमके कशात बिझी असतो आपण" !! 😆 माझा पहिला लेख १०-१२ ओळींचा लिहिलेला.
               त्यानंतर आतुरता होती ती म्हणजे लेखचा ब्लॉग कधी येतोय म्हणून 🤗 माझा पहिला लेख होता आणि ज्या दिवशी ब्लॉग वरती लेख आला तेंव्हा दिवसातून खुप वेळा लिंक उघडून बघितला व माझ्या मित्रांना शेअर केला. एक वेगळ्या प्रकारचा आनंद होता मनामध्ये. त्यानंतर हळूहळू लिहायची आवड निर्माण झाली आणि लिहायचं म्हटल की वाचन गरजेच आहे. वि४ ग्रुप मुळे जॉब वर लागल्या नंतर ची माझी वाचनाची कमी झालेली सवय आपोआप वाढली.
                 शेवटी ज्यांनी ह्या ग्रुप ची सुरुवात केली सौदागर काळे सर, ज्यांनी मला लिहिण्यासाठी प्रेरणा दिली शिरीष सर, मला ग्रुप मध्ये सामील केले ते करण दादा, मेहनत घेऊन ग्रुप सुरळीत रित्या चालवते अडमीन टीम, ज्यांचे सुंदर विचार वाचायला मिळते ते सदस्य त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वात सुंदर ग्रुप माझ्या व्हॉट अप मधला..!!😍👍🏻~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 
किरण पवार,औरंगाबाद.
                 नक्की काय काय लिहावं मुळात हाच प्रश्न पडलायं. जरी लिहण्यासाठी माझी शब्दमर्यादा थोडीशीच जाणवेलं पण भावनिक नातं मात्र पुरतं जोडल्या गेलयं माझं या विचार ग्रुपशी. मी जवळपास साधारणत: बऱ्यापैकी आधीच चालू झाला होता; मला आत्ता ते आठवतं नाही. पण मुळात ज्यावेळी मी सुरूवातीला नवीन जॉईन झालो तेव्हा मला या ग्रुपचा *कन्सेप्ट* फारच आवडला होता. मी आजवर इथे आहे त्याच कारण हेच आहे. खरतरं या ग्रुपने मला माझं वैयक्तिक मत व्यक्त करायला केवळ शिकवलचं असं नाही तर विविधांगी पैलू हाताळायला शिकवले. जसे आपण इंद्रधनुष्यात पाहतो; अगदी तसचं काहीसं. कमी वेळात अवाजवी पेक्षा ज्ञान मिळत नाही; हे सर्वांच सहसा मत असतं. पण मला या ग्रुपने ते भरपूर ज्ञान कमी वेळात दिलं. मी ग्रुपशी जुळलो तेव्हा आज आहे तितका प्रगल्भ कधीच नव्हतो. आजही अपुरा असेन. पण इथे आल्यापासून शिकायला मात्र खूप काही मिळालं.
                    कधी ग्रुपवर दिल्या गेलेल्या विषयांमधून बालपण उलगडलं तर कधी देशाची आर्थिक/ सामाजिक महाराष्ट्राव्यतिरिक्तचीही बऱ्याचवेळा परिस्थितीही समजत गेली. मला खरतरं एक आंतरिक उर्जा मिळवून दिली या ग्रुपने. मी बऱ्याचदा नैराश्यात असताना कधी-कधी एखादा लेख यायचा आणि मी ते वाचण्याच्या नादात माझं काय चालू होतं हे विसरून जायचो. चौकटीबाहेरच जग जे सहसा वृत्तपत्रांमधून काही ठराविकच विचारवंतांच्या स्वरूपात दिसायचं ते या ग्रुपमुळे भरपूर व्यक्तिंच्या माध्यमातून दिसू लागलं होतं. थोडक्यात म्हटलं तर , एक ना अनेक दार या ग्रुपच्या माध्यमातून सुरूवातीला आमच्यासारख्या नवीन लिखाणं करणाऱ्यांसाठी खुली झाली. विशेषत: मी सौदागर सरांचे खूप आभार मानतो. आयुष्यात किमान एकदातरी माझी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे. भेटेनही. थोडक्यात जे काही आहे ते जरा छोट्या काव्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतो.
धन्यवाद!

*वि4र:-*

वाटलेला एक आभास जो
तो शिक्षक झालासं तू नवख्यांसाठी *वि4र,*

काय असतो नेमका ग्रुप
पण एक बदलाचा अविष्कार
झालासं तू नवख्यांसाठी *वि4र,*

कधी कोणी नैराश्यात जखडलेला
त्यासाठी नकळतं आधार
झालासं तू सकारात्मकतेचा एक *वि4र,*

विविधांगी पैलूंचे विश्व देऊनी
आयुष्यातला आमच्या तो
झालासं तू तेजोमय एक दिव्याचा *वि4र.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वैशाली खरात,पंढरपूर.             
                                                               
           विचार ग्रुप वर येऊन मला खूप दिवस झाले नाहीत पण या ग्रुप मधून मला खूप काही शिकायला भेटल.मला वाचणा ची आवड आहे.पण मी कधी लिहल नाही पण मध्ये काही दिवस माझं वाचन बंद झालं होत.पण नंतर विचार या ग्रुप मूळ वाचनाला     सूरवात झाली वेगवेगळ्या विषयावर खूप जण लिहितात त्यामुळे आपल्या विचारात भर पडते आणि आपले विचार आजुन सुधारतात आणि आपल्या विचारला अजून चालना मिळते.या ग्रुप मध्ये आल्यापासून मला खूप छान वाटत आहे सगळ्यांचे विचार खूप छान असतात.या ग्रुप मधे मी माझी फ्रेंड वैशाली मुळे आली तिने मला विचार समूहाची माहिती दिली त्यामुळे या ग्रुप मध्ये आले आल्या पासून मी सगळ्यांचे विचार वाचती आहे छान वाटत आहे हे विचार वाचून अस वाटत की आपण पण लिहावं असं काही तरी मग लिहायला घेतलं तर  मराठी टाइपिंग कस करायच ते समजेनासे झाले मग एके दिवशी ग्रुप वर अाडमिन टीम नी मराठी टायपिंग च ऍप्लिकेशन पाठवलं अता मराठी टायपिंग सोप चालल आहे पण आजुन तरी काही लिहल नाही पण लीहणार आहे सगळे जण लिहतात म्हणून मला अस वाटत की आपण पण अस काही तरी लिहावं. आपले पण विचार मांडावे.समजत नवहतं काय लिहावं ते म्हणून मी कधी लिहाल नाही एकदा फ्रेंडशिप डे ला एकदा  लिहिलं होत नंतर काहीच  लिहिलं नाही ग्रुप मध्ये चर्चा चालू होती की जे लिहत नाहीत त्यांना काढून टकाययच त्या वेळेस मला वाट होत आता आपल्याला काढून टाकतेत पण नंतर टीम चा  विचार बदलला आणि त्यांनी कोणालाच काढल नाही त्या मुळे मी सगळ्या टीम चे आभारी आहे मला हे खूप छान व्यासपीठ मिळाले आहे ह्या ग्रुप वरचे विचार मी जेव्हा बाहेर मांडते तेव्हा ते सांगळे म्हणतात खूप छान विचार आहेत तुझे ते विचार मला ह्या ग्रुप मुळे मिळाले आहेत या ग्रुप मुळे मला अजुन जास्त  वाचनाची सवय लागली आहे तरी मी सगळ्यांना चे खूप आभारी आहे 🙏🏻🌱आसाच हा ग्रुप पुढे चालत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना काही चुकले असेल तर माफ करा🙏🏻
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मुकुंद बसोळे,लातूर.
        वि4 सोबतचा प्रवास तसा छोटासाच....आणि या प्रवासात मीच एकदा स्वतःच स्वतःला हाकललं🤣🤣😂😂 आणि परत आलो.....पण काही वेळेला असं होतं की तुमच्या जीवनात अगोदरच काही व्यवस्थित चालत नसतं.... आणि असं काहीतरी होतं... त्यावेळेस खूप वाईट वाटतं.... जीवनात कुणीच सोबत नसल्यासारखं  वाटतं.... आणि असं काहीतरी चुकून होऊन जातं....ते करावं  नाही म्हंटलं  तरी आपोआप होत....तसंच झालं माझ्यासोबत....असो शिरीष सरांनी मला परत add केलं आणि माझा ह्या ग्रुप सोबतचा जवळपास संपुष्टात आलेला प्रवास त्यांनी चालू केला...तो न संपण्यासाठीच....येथे खूप काही शिकायला भेटेल याची खात्री वाटते...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 शीतल शिंदे, दहिवडी, जि. सातारा .
          "विचार " ग्रुप खरोखरच आपल्या जीवनाला , आयुष्याला चालना देणारा मंच आहे .आपल्याकडे असलेली महितीची  , अनुभवाची  इतरांशी इतरांशी देवाण - घेवाण करणारा आणी आपल्या मतांना सामावून घेणारा असा एकमेव मंच आहे .
  खरेतर मला वाचनाची फार आवड आहे .msw पर्यंत कॉलेज पर्यंतच्या  जीवनात बरेच  वाचन केले अगदी सर्व कथा , कादंबरी, धार्मिक ग्रंथ , विचार ईत्यादि .मात्र एम . एस .डब्लू .पासून वेगळ्या वाचनाला सुरुवात झाली . मग
इतर वाचनाला वेळ कमी पडू लागला .मात्र डॉ .नरेंद्र दाभोळकर यांच्या बरोबर अंधश्रधा , सत्य शोधक समाज ईत्यादि विषयांवरील चर्च्या सत्रातील काही दिवस माझ्या पतीबरोबर  सहभागी झाले.
मात्र त्यानंतरलगेच जॉब मिळाला आणी  कामाचा एक भाग म्हणून  जनजागृतीपर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली .मग  कॉलेज युवक - युवती , विध्यार्थी @ पालक मेळावा , बचत गट , नेहरू युवा मंडळ , गावामधिल लोक ,  ग्राम पंचायत , शासकीय - अशासकीय विभाग आशा आणी अनेक ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली मात्र तेथे औपचारिक - अनौपचारिक शब्दामध्ये बोलणे होते .
  सुरवातीला "V 4 टिम "मधे जॉईन  झाल्यावर लिहायचे कसे हा प्रश्न पाडला .कारण मी कधी लिहिलेच नव्हते .
पण याच्याही पलीकडे जावून आपल्या विचारांची देवाण घेवाण व्हावी ही पण इच्छा " वी 4 च्या "माध्यमातून पूर्ण झाली  अलीकडे जास्त वाचन होत नाही तर आपल्या ग्रूप मधून बरीच महिती मिळते .मात्र आता लिहायला विचार करायला वेळचमिळत नाही .नोकरी करून लिखाणाला वेळ मिळतच नाही .खूप सारी कामे असतात .मिळाला तरी बाकीचे काम रहतेच.मला  विचार करून लिहायला वेळच मिळत नाही म्हणून मी डायरेक्ट लिहायला घेते .मी नास्तिक असल्यामुळे माझे लेखही तसेच असतात .म्हणून कोणी लाइक करत नाहीत पण हरकत नाही विचार च्या माध्यमातून माझे विचार 1000 मधील 10 जणांना पटले तरी पुष्कळ .आभारी आहे व  राहीन मी "वी  चार टीम ची ".आता सुद्धा काय लिहिले आहे हे पुन्हा वाचायला वेळ नाही .कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व .🙏
पुन्हा एकदा "v4 ग्रूप "ची आभारी 🙋🏻‍♀

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मयुरी देवकर ,पिलीव ता. माळशिरस.
             वि-४ म्हणजे  (1) विद्यार्थी,(2) विवेक ,(3)विनय आणि (4)विरजा हे मिळून "विचार " हा ग्रुप तयार झाला. प्रथमतः मला वैशालीने या ग्रुपमध्ये ऍड केले,नियम वगैरे वाचले आणि मग वैशालीला फोन करूनच ग्रुपविषयी चर्चा केली आणि मग विचार ग्रुपची संकल्पना नीट समजली आणि मग चालू झाला माझा विचार सोबतचा प्रवास....
             पहिलाच विषय होता 'श्यामच्या आईने माझ्यातला श्याम असा घडवला....' आम्ही सर्वांनीच यावर लेख लिहिले होते पण, श्यामची आई वाचून झाल्यावर जेवढा आनंद मिळाला त्यापेक्षा जास्त आनंद या विषयावरील लेख वाचून झाला.प्रत्येकाचे अनुभव प्रत्यक्षात अनुभवल्यासारखं झाले आणि हीच असते लेखणीची पावर....या ग्रुपच्या माध्यमातून रोज नवीन विचार वाचायला मिळू  लागले आणि थोड्याच दिवसांत सौदागरने ऍडमिन टीम मध्ये येण्याची संधी दिली.खरे तर सौदागर आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकलो, दोघेही वक्तृत्व स्पर्धेतील प्रतिस्पर्धी पण बोलण्याचा कधीच संबंध आला न्हवता पण या विचार ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा आमचे विचार जुळले. ऍडमिन टीममध्ये आल्यानंतर अनिलजी,अक्षयजी,प्रवीणजी, पवनजी, करण,बालाजी,नरेशजी आणि  शिरिषदा यांची ओळख झाली.वैशाली आणि मी आधीपासूनच मैत्रिणी होतो पण सीमालिजी आणि संगीताजी यांची सोबत मिळाली. या 'विचार' ग्रुपने फक्त आणि फक्त विचारांवरच सर्वांना जवळ आणले आहे.या विचार ग्रुपमधील प्रत्येक सदस्य हा आपल्या कुटुंबातीलच वाटतो.सगळ्यांचे नवनवीन विचार वाचले कि, मनाला आशेचे पंख फुटतात.....
             विचार ग्रुपमध्ये असे खूप सदस्य आहेत ज्यांनी आधी कधीच लिखाण केलेले न्हवते पण आज त्यांचे लेखन उत्कृष्ठ आहे...आणि हेच या विचार ग्रुपचे यश आहे.आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रुपमध्ये असणारे नियम....कधी कधी या नियमांमुळेच ऍडमिन टीममला कठोर भूमिका घ्याव्या लागल्या.आज हा ग्रुप टिकला आहे आणि जो नावलौकिक आहे ते फक्त आणि फक्त या नियमांमुळेच....
          आज आपली वाचन संस्कृती हरवत चालली आहे असं आसपास लोक नुसतं म्हणत असतात तेव्हा अभिमानाने आपल्या ग्रुपविषयी सांगणं होतं. यामध्ये फक्त वाचनच नाही तर लेखनसंस्कृतीचा उदय झाला आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.इथून पुढे अजून नाविन्यपूर्ण कल्पना या विचारच्या  माध्यमातून पुढे येतील.आणि खऱ्या अर्थाने या स्मार्ट जगात स्मार्टफोनचा स्मार्ट वापर केल्याचे समाधान मिळेल....
विचारांनी विचारांना विचारलेला प्रश्न म्हणजे वि४
विचारांनी विचारांना दिलेलं उत्तर म्हणजे वि४
भग्न वाळवंटातील आशेचा किनारा म्हणजे वि४
आणि धडपडीतल्या जगण्यातला श्वास म्हणजे वि४
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सिमाली भाटकर, रत्नागिरी.   
     लेखणी हरवून बसलो होतो,
जीवनाच्या प्रवासात,
समुद्राच्या लाटा होत्या, 
लाटांच्या वाफा होत्या, 
ऋतूंच्या आभासात,
दाटले होते मेघ काळे, 
उणीव मात्र थंडगार फुंकरीची होती,
 कडक उन्हाच्या सावलीत भेट एका माऊलीची होती,
रखरखीत क्षण गारव्यात बदलले, 
दाटले ढग विचार रूपे बरसले,
कधी वीरश्री संचारली अन, 
अत्याचार विरोधी लेखणी बरसली,
जीवनाच्या प्रवासातली अबोलकी शाळा, 
यांनी पानोपानी साकारली,
अनाथांची आपुलकी मनी ठासून भरली होती,
विचार च्या कल्पनेने पानोपानी सजली होती,
डिजिटल इंडिया कल्पना भारताची होती,
विचार न मात्र ती गावरान मन हुबेहूब टिपली,
आणि गावच्या मातीला न्यायाची साद घातली,
 आयुष्याच्या प्रवासात ही लेखणी गवसली,
अन कोरी पडली पाने विचार नि सजवली.....

                 धन्यवाद
       विचार ग्रुप सोबत चा माझा प्रवास थोडक्यात रेखाटला. यांनी माझ्या विचारांना एक व्यासपीठ मिळवून दिले आणि बुद्धिमत्तेला चालना मिळाली.
       धन्यवाद विचार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सानप बालाजी,बीड.
              मी बरोबर एकवर्षांपूर्वी हार्मोनि युथ फेस्टिवलला *कर्णाल, हरियाणा* येथे गेलो होतो तेथे गेल्यानंतर दिवसभराच्या घडणाऱ्या घडामोडींचा एक लेख लिहून आमच्या फेस्टिव्हलच्या ग्रुप मध्ये एक व्यक्ती टाकत असत, या लेखांची महती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते कला व क्रीडामंत्र्यांपर्यंत पोहोचली होती व जो तो त्या लेखकाची स्तुती करू लागला होता त्या लेखमालिकेमुळे माझी आणि त्या लेखकाची भेट झाली आणि ओळख झाली त्या लेखकाचे नाव म्हणजे *सौदागर सर*.
              माझ्या मनामध्ये मला विचार यायचे आणि निघून जायचे पण त्या विचारणा लेखनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न मी कधी केलाच नाही. फेस्टिवलनंतर  महाराष्ट्रामध्ये आल्यावर एके दिवशी सौदागर सरचा व्हाटस अँप ला एक मेसेज आणि एक ग्रुप लिंक आली, आणि मी लगेच ग्रुप जॉईन झालो.अश्याप्रकारे माझा आणि विचारचा पहिल्या आठवड्यापासून प्रवास चालू झाला.
              ग्रुप जॉईन झाल्यानंतर मग लेख लिहिण्यास कशी तरी जसे जमेल तसे सुरवात केली. पुढे चालून सौदागर सरांचा आणखी एक मेसेज आला तुम्ही ग्रुप मध्ये जबाबदारी स्वीकारण्यास इच्छुक आहेत का अश्या आशयाचा तो मेसेज होता आणि मी जबाबदारी तर नाही पण *फुल ना फुलाची पाकळी*आशा प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केला करत आहे आणि करत राहील.
              मध्ये काही वेळा कामामुळे आणि काही पर्सनल प्रॉब्लेम मुळे 2 वेळा इच्छा नसताना सुद्धा वि४ ग्रुप च्या माझ्या जबाबदारीतून मी न सांगता मुक्त झालो होतो त्याबद्दल मला सौदागर सर आणि ऍडमिन माफ करतीलच.
              सौदागर सर, अनिल सर, शिरीष सर, प्रवीण सर, करण सर,वैशाली मॅम, मयुरी मॅम, नरेश सर, पवन सर, संगीता  मॅम, सीमाली मॅम आणि अक्षय सर हे सध्या खुप मेहनतीने वि४ ग्रुप मधील विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत या सर्वांचे मनापासून अभिनंदन.
              मला ग्रुप मध्ये ऍड केल्याबद्दल सौदागर सरांचे खूप खूप आभार, आणि ग्रुप ऍडमिन टीम मधील सर्वांचे मला समजावून घेतल्याबद्दल आणि समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद....!
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 

सिताराम पवार,पंढरपूर(सध्या परभणी).
          हा ग्रुप स्थापन केला की मला लवकरच ऍड केलं कारण सौदागर काळे सर यांचा सहवास मला 11वी व 12 दोन वर्षे लाभला तेव्हा आमचा हा संबंध कामी आला आणि मला या ग्रुपमध्ये सामील होता आले. खरं तर हा एक नाविन्यपूर्ण असा विचार आहे .आपणमोबाईल चा वापर किती चांगल्या पद्धतीने करू शकतो याच उत्कृष्ट उदाहरण आहे.ह्या मुळे वैचारिक परिपक्वता येण्यासाठी ह्या ग्रुपमधील लेख खूप उपयोगी पडतात. वैचारिक संकल्पना, तत्वज्ञान, वैचारिक बैठक कृती याचा सध्या जगात घसरण सुरू असताना आणि आजच्या तरुणांना ह्या गोष्टींमध्ये रस कमी होत असताना असे ग्रुप एक संजीवनी आहे.मी बरेच लेख लिहिले आणि सगळे वाचतो त्यातून विचार करण्याची क्षमता वाढते.आजच्या चिखलफेकही राजकारणात तत्वनिष्ठ राजकारण पहायलाही मिळत नाही एकही पक्ष विचारला वाहून घेतलेला दिसत नाही.त्यामुळे आपल्याला सुजाण नागरिक बनण्यासाठी हा ग्रुप महत्वाची भूमिका बजावत आहे.
     ग्रुपमध्ये खूप मोठे विचारवंत असल्याने माझ्यासारख्याला त्यांचे लेखन वाचायला मिळत, अगदी ग्रामीण भाग, शहरी आणि तेही एका क्लीकवर हे खूप महत्वाचे आहे.काहींना वाटत फक्त लिहून काय कृती महत्वाची पण मला असा अनुभव आला की जर एखाद्या विषयावर लेख वाचला आणि आपल्या मनातील शंका दूर होते, चुकीची कृती होताना क्षणोक्षणी लेखातील शब्ध आठवतात. त्यामुळे जे लेख लिहीत नाहीत पण वाचतात त्यांना भरपूर सूट द्यावी.
      मला वाटते प्रत्येक आठवड्यात आपल्या देशातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, संशोधन ह्या सर्व प्रकारच्या क्षेत्रात जे आपलं सरकार निर्णय घेतात,उदा. रिझर्व्ह बँकेची जाहीर झालेली धोरण ह्यावर विषय नक्की असावा कारण आपल्या ग्रुपवरून जाणकाराकडून निःपक्षपाती अशी माहिती मिळते आणि त्याचे फायदे तोटे समजतात.आता या ग्रुपने बऱ्यापैकी महाराष्ट्र व्यापला आहेही आनंदाची बाब आहे.
     तुकोबारायांच्या अभंगानुसार"विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म!भेदाभेद भ्रम अमंगळ"आणि "उचणीच कोणी नाही भगवंता!तिष्टे भावभक्ती दवखोनिय!  असा मानवतेला वाहून घेलेला समाज निर्माण होण्यासाठी असा ग्रुप मोलाची कामगिरी बजावतो आहे.
      ग्रुप चालवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचा मी व्यक्तिशः ऋण व्यक्त करतो. काळे सर, वैशाली मॅडम यांनी प्रथम संकल्पना मांडली,असंच आपलं मार्गदर्शन राहो. सर्व ग्रुप सदस्य 🙏"" सुसंगती सदा घडो.......
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*शिरीष उमरे, नवी मुंबई*
          जेंव्हा हा विषय *शब्दमर्यादा नाही* म्हटल्यावर मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या.🤗 इनमिन पाच-सहा महीन्याचा प्रवास सहा दिवस झालेत, रोज विचार करतोय हे लिहीन अन ते लिहीन पण विचाराचे वासरु शब्दाच्या दावणीत बंधायला तयारच नाही. कानात हवा भरल्यासारखे सुसाट धावतेय सारखे. आज कसेबसे वाक्यांच्या गोठ्यात पकडले.

तर झाले असे की व्हॉटस्अप ग्रुपच्या महापुरात वि४ ची लींक आली. ब्लॉगच्या लिंक ला जाऊन एकदोन लेख वाचले. कंसेप्ट आवडला. जुन्या लिहीलेल्या लेखांची व डायर्यांची आठवण झाली... परत लिहीण्याची खुमखुमी वाढली. ✍🏻

जुने दिवस आठवले !! माझ्या वडीलांनी मला वयाच्या पाचव्या वर्षी लावलेली वाचनाची सवय वीस वर्षे टिकली. त्यानंतर माणसे व समाज वाचण्याची चटक वीस वर्षे कायम होती. ह्याच दरम्यान इंटरनेटच्या मायाजालात जे गुरफटलो ते आजगायत... पण मागील पाच वर्षापासुन जे निसर्ग वाचतोय तेंव्हापासुन प्रत्येक क्षण वाचतोय... अनुभवतोय 😇

ह्या माझ्या प्रवासात जे मी अनुभवलय ते इतरांना वाटायचे ह्या शुध्द स्वार्थी विचाराने ग्रुप जॉइन केला. झपाटल्यासारखा दिलेल्या विषयावर लिहीत गेलो. कोणी पसंती देवो वा ना देवो.... बसस् लिहीत गेलो माझे मन मोकळे करण्यासाठी... जवळपास दोन महीने सगळ्याच विषयांवर !!

मग हळुहळु रवीवारी होणार्या चर्चेत भाग घ्यायला लागलो. तोपर्यंत  कोणकोण अॅडमिन आहेत याचा अंदाज आला होता. त्यांचे डीपी, स्टेटस व सोशल मिडीया प्रोफाइल वरुन त्यांच्या व्यक्तीमत्वांचा आढावा घेणे चालु होते. सोबतच त्यांचे ग्रुपवरचे वर्तणुक, त्यांचे लेख व त्यांचे अभिप्राय यांचा अभ्यास सुरु होता. ( जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही.😜) त्यावरुन त्याच्यांतले दुर्गुणांसोबत त्यांची ताकद लक्षात येत गेली. अर्थात मी त्यांच्या पॉजिटीव्ह गुणांबद्दल च बोलणार 😅 हे वाचुन काहींनी सुटकेचा श्वास टाकले असतील😆

जाड भिंगाचा चष्मा, नेहमी गंभीर तर कधी चुकुन हसरा असा खादी मध्ये दिसणारा सौदागर मला पहीले पत्रकार च वाटला. मग गांधी  फेलोशिप वर प्रोजेक्ट करणारा हा ऐन पंचविशीतला तरुण काहीतरी वेगळच बेणं आहे हे लक्षात यायला लागले. मोजक्या शब्दात लिहुन शांततेने समर्पक प्रत्युत्तर देणे ह्यातली त्याची मॅच्युरिटी  भावली मला. माणसे हेरण्याची त्याची स्पेशॅलीटी अॅडमिन टीम मेंबर्स वरुन लक्षात आली होती. असा हा इंट्रोस्पेक्टीव्ह पर्सोना आजही हळुहळु उलगडतोय त्याच्या सहकारी मित्रांच्या लेखातुन. ..

असाच गैरसमज माझा अनिल बद्दल झाला होता. त्याच्या स्थितप्रज्ञ व बर्फासारख्या शांत स्वभावामुळे मला वाटले होते की ह्या अॅडमिनचे एकतर साडीचे दुकान असावे कींवा कुठल्या धार्मिक स्थळाचा ट्रस्टी असावा. माझे सगळे अंदाज धुळीला मिळवले. 🙃 हा समाजशास्त्राचा प्राध्यापक जीम चालवतो 😳 होय हे खरे आहे !! 🤩
विचाराची खोली बघता हा माणुस साठीचा वाटतो पण तिशी ही न गाठलेला हा जबरदस्त हरफनमौला  जिवलग मित्रांच्या मोठ्या नेटवर्कचा खजिना दडवुन ठेवतो.

बालाजी, पवन व संगिता हे अॅडमिन ही असेच छुपे रुस्तुम!! तिघांनाही स्वत:च्या ताकदीची पुर्ण कल्पना पण वेळेच्या तारेवर कसरत करत आपली जबाबदारी पार पाडत पडद्यामागे ह्या ग्रुपचे आधारस्तंभ म्हणुन कार्यरत आहेत.

माझ्या आवडीचे अॅडमिन आहेत प्रविण व करण !! हे दोघे  अक्षरश: ग्रुप जगतात. चोविस तास ग्रुप ह्यांच्या मनात असावा. निस्वार्थी सेवा काय असते हे अनुभवयाला मिळते ह्यांच्याकडे बघुन!! पॅशन काय असते हे कळत ह्यांच्याकडे बघुन 😍

तर गोष्ट आहे काही रविवारांची ... सुरुवात शाब्दिक चर्चेची... वादविवादाची.. आवाहनाची आणि मग हळुहळु शाब्दिक हींसेची, वादावादीची, आव्हानाची !! शब्दांचे फटकारे ओढत, नैतिकता पाळत नियमांच्या कील्ल्याला सुरुंग लावत आमचा रथ सुसाट वेगाने गडाकडे !! गडकरी गोडबोले धास्तावलेले.... मग स्वत: सुत्रधारानेे तुम्ही स्वत: च अॅडमिन व्हा ह्या आवाहन देऊन आमची बोलती बंद केली. सदस्याकडुन सुत्रधाराकडे असा प्रवास सुरु झाला. जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे ही म्हण आठवली. आ बैल मुझे मार अशी अवस्था झाली.  इफ यु वॉन्ट टु नो दि पर्सन देन वॉक इन हीज शुज असे का म्हणतात ते समजायला लागले होते. 😅

अॅडमिन टीममध्ये सुरुवातिला काहीसे उपहासात्मक तर काहीसे कुतुहलात्मक तर काहींनी मदतीचा हात समोर करुन स्वागत केले. मी परत सवयीप्रमाणे नविन ग्रुपचा अभ्यास करायला लागलो. दिलेल्या जबाबदार्या इमानइतबारे पार पाडायला लागलो. येड करतेय तर द्या अजुन जबाबदार्या असे समजुन ह्या खेचरावर अजुन जबाबदार्या दिल्या गेल्या. 😜

काही वेळ माझी अवस्था दोन कारवर उभे राहणार्या अजय देवगण सारखी झाली. सहन ही होइना अन बोंबलता ही येइना !! दोन्ही ग्रुपवर अॅक्टीव राहण्याची कसरत करतांना मला पुलंची गोष्ट आठवली.. रेल्वेच्या जनरल डब्यात प्रवेश करतांना आतल्यांशी युध्द आणि एकदा आत घुसल्यावर मग आत येणार्यां बाहेरच्यांशी युध्द !! 😅
त्यातच मधातच आलेली सौदागरची विरक्तीची भावना 😱

मग मी उचलला जागृतीचा विडा ( एकदम शायिस्तेखानाची आठवण आली की हो... लगेच डाव्या हाताची तीन बोटे चाचपुन बघितली😝) मग चालु झाला माझा दाणपट्टा ... उजव्या हाताने पँट वर करुन डाव्या हाताने कपाळावरचा घाम पुसत उसणे अवसान गोळा करुन मी सिंव्ह का काय म्हणतात तशी गर्जना करुन पाहीली. कोणी सिरीयसली घेतली नाही हा भाग अलहीदा... पण मला सौदागरने दिलेली सुट चा गैरफायदा घेत मी सदस्य कसे खुष होतील, वाचकातुन नवलेखक कसे तयार होतील, जुने लेखक परत कसे जोडता येइल, वाचकांची संख्या कशी वाढेल ह्यावर काम करणे सुरु केले. ह्यात मोलाची साथ मिळत गेली सगळ्या अॅडमिन टीमची !! त्यांचाच वेळ क्रीएटीविटी कडे वळवल्याने पुढचे सगळे सोपे होते.
ह्यातही जुने नियम मोडतोड करुन अनिलला जीमची कसरत करायला लावली. ह्या बर्फाची गरमी अनुभवयाला मिळाली. सौदागरला मौनव्रतातुन बाहेर आणुन अॅक्टीव मोडमध्ये आणले. सगळ्यांना मोठी मोठी स्वप्ने दाखवली. ते जे मराठी भाषेच्या विकासासाठी करत आहेत व त्याचा खासकरुन ग्रामीण भागातील युवांवर काय पॉजिटीव्ह इंपॅक्ट पडतोय ह्या माझ्या शब्दजाळ्यात अडकुन सगळ्यांनी भारावुन जे सहकार्य दिले त्याचे रिझल्ट आपण सगळेच बघत आहात. माझ्या पोपटपंचीमुळे त्यांना त्यांच्यातल्या ताकदीची जाणीव झाली. मी शतश: आभारी आहे सगळ्या अॅडमिन व वि४ सदस्यांचा 🙏🏼
माझ्या दाखवलेल्या स्वप्नाचे मुर्त रुप तुम्ही मला दाखवले ... मी ऋणी आहे तुम्हा सगळ्यांचा 😇
ह्या म्हातार्याच्या अनुभवातुन झालेल्या कामाची कडवट सुरुवात झाली तरी आता गोड फळे आलीत...
# विषय संख्या ३ वरुन ५ वर.
# एका आठवड्यात ५०-६० उत्तम लेख येणे !
# एका दिवसात १५-१६ लेख लिहील्या जाणे !!
# २५-३० नविन लेखक मिळणे !!!
ही वर्षपुर्तीची उपलब्धी !!😍

आज फेसबुकवर २५०+ फॉलोअर्स आणि आठवड्याला १२००+ वाचकांची पोष्टला पसंती ह्याव्यतिरिक्त एकेका पोस्टला लाभलेली ६००-७०० जणांची वाचकसंख्या हे वैभव 🤩

आज ब्लॉग साइटवर २१००० विजिटर्स, ६०० पेक्षा जास्त लेख अशी भव्य कामगिरीचे शिलेदार आहेत करण व प्रविण आणि अॅडमिन टीम !! 🤗

मी आता नविन स्वप्न बघतोय..

✨ वि४ चा डीजीटल दिवाळी अंक
 ✨वि४ चे दहा व्हाॅटस्अप वाचक ग्रुपस
✨ वि४ ची १००+ लेखकांची फौज

ह्यासाठी हवी नविन दमाची युवा टीम... 👍🏻आहात ना तुम्ही तयार 🌱वि४🌿 च्या वर्ष २ च्या प्रवासाला ? ही *वि४* ची मशाल 🔥आता तुमच्या हाती 🤝🏻मित्रांनो 🙏🏼😊

आमदार- खासदारांचे पेंशन.

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 51वा 📝 

सुवर्ण महोत्सवोत्तर आठवडा

21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2018

आमदार- खासदारांचे पेंशन.


अभिजीत गोडसे,सातारा

           ज्याला मनापासून लोकसेवा करायची आहे . त्याला कोणत्याही प्रकारच्या  फळांची अपेक्षा , लोभ नसावा. बरेच ज्येष्ठ  समाजसुधारक सरकारात नसताना सुद्धा चांगली कामे केलेली आपण पाहिले आहे . काही करत आहेत. जे आपल्या जिल्हाचे , तालुक्याचे खासदार , आमदार म्हणजेच लोकप्रतिनिधी आपण जर पाच वर्षेनी निवडून देतो. ते संसद आणि विधानमंडळ यांन मध्ये सेवा करण्यासाठी. ही एक संधी आपण त्यांना  दिलेली असते. आपल्या जिल्ह्याचा ,  तालुक्याचा विकास करण्यासाठी सरकारने दिलेली कामे , योजना प्रशासनाला हाताला धरून हे करणे गरजचेचे असते. ही एक जबाबदारी मतदारांनी विश्वासाने दिलेली असते. यासाठी सेवा हाच एक निकष राहीला हवा पगार किती , पेंशन किती  या नंतरच्या गोष्टी .


पण होते उलट संसदेमध्ये आणि विधानमंडळामध्ये अधिवेशन होतात .जनतेच्या प्रश्नांसाठी. ते न होता जास्त प्रमाणात आमदार आणि खासदार यांच्या प्रश्नांवर त्याच्या पगार आणि पेंशनवर चर्चा आपण वरचेवर पाहतो. मुळात प्रश्न निर्माण होतो या लोकप्रतिनिधींना  येवढ्या सर्व सुविधा असताना पेंनशची काय गरज आहे. दवाखान्या पासून विमान प्रवासा पर्यत सोयीसुविधा असणारे . हे मतदार संघात अलिशान गाड्या वर्षीतुन किमान दोन - तिन वेळा बदलतात. येवढच नाही  यांच्या मुलाकडे , नातवाकडे पाहिले तर सामान्य वर्गाचे डोळेदिपतील. या लोकप्रतिनिधीचे वाढदिवस तर सामान्य माणूस स्वप्नात सुद्धा करु शकणार नाही . देशातील ८२ टक्के खासदार करोडपती आहेत. एका सर्वे नुसार महाराष्ट्रातील १०० आमदारांची संपत्ती १० कोटी रुपये पेक्षा जास्त आहे. काहीनी पुढच्या पिढीची सोय करून ठेवली आहे. अशांनी पेंशनची मागणी करावी ? आणि समजा एखाद्या लोकप्रतिनिधीं पाच वर्षीनी पुन्हा कदीच निवडणू नाही आला तर .अशांना आयुष्यभर पेंशन द्यावी ? तिही अर्धा लाख भर . अगोदरच सरकारवर कर्जाचा डोंगर . त्यात कर्ज माफी , दुष्काळ निधी , आपत्ती व्यवस्थापन , विविध विकास कामे यासाठी ही पैसा जातोय. आणि आगोदरच सर्व सुख- सुविधांनी आयुष्य पुढे ढकलत असताना यांना निवृत्त झाल्यावर पेंशनचे चोचले पुरवण्यासाठी हे सर्वजण मागणी करतात. वैशिष्ट्ये म्हणजे अशा वेळी सर्व  एकत्र येतात. मग कोण - कोणत्या पक्षाचा असा काही भेदभाव करत नाहीत ही मंडळी. पेंशनसाठी  दाखला देताना हे सर्व  बाहेरच्या देशाचा दाखला देतात. पण आपली आणि इतर देशाची अर्थव्यवस्था यात खूप फरक आहे.


हे लोकप्रतिनिधी मतदार संघात विकासकामा एवजी राजकारण करत बसतात. पाच वर्षे हे फक्त आमदार - खासदार यांची भांडणे, पक्ष्यांची अंतर्गत भांडणे , याने त्याच्यावर आरोप कराचे. त्यांने त्याच्यावर आरोप करायचे यातच यांची पाच वर्षे निघून जातात. पण यांचे कार्यकर्ते यांच्या विकास कामावर प्रचंड खूष असतात. दवंडी पेटवायचे हेच तर काम करतात. आणि जोडीला पञकारीतेचा अर्थ न कळलेले पञकार असतात. पण विकास कामे  फक्त  कार्यकर्त्यांना दिसतात. मतदारांना नाहीत. प्रत्येक जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूकीत हे लोकप्रतिनिधी दिसतात. त्या नंतर ते पाच वर्षीनी दिसतात. तिकडे संसद किंवा विधानमंडळामध्ये यांच्या तोंडातून प्रश्न विचारायला कधीही 'ब्र' निघत नाही . काहीतर तिकडे फिरकत देखील नाहीत . विकास कामे आणि यांचा दुरतक संबंध नसतो. पण मतदारसंघात हेच लोक प्रतिनिधी पोपटागत बोलतात. स्वतःच्या सुखसुविधे साठी माञ एकञ येताना आणि बोलताना दिसतात. कित्येक तास अधिवेशनाचे वाया घालवले महाराष्ट्रत यांनी. नियम तोडणे , वाटेल तसे वागणे , वाटेल तसे विधाने करणे हे काही लोकप्रतिनीधी वरुण आलेली परवानगीच असावी ! आता तर खासदार आणि आमदारांची निवडणूक खर्च मर्यादा वाढवली आहे. खासदारांची ४० लाखावरून ७० लाख मर्यादा झाली तर आमदारांची १६ लाखांवरुन २८ लाख झाली आहे. निवडणूकीत येवढा खर्च ही करत नसतील तो भाग वेगळा. पण  प्रचंड पैसा आलाय. येतो. पण याचा विकासाठी वापर होत नाही. ही वस्तुस्थिती आहे.


पूर्वीच्या लोकप्रतिनिधीनां लोकशाही बद्दल प्रचंड आदर होता. ते सरकारकडे काही मागण्या पेक्षा आम्ही सरकारला काय देवू शकतो हे पाहत होते. मी जनतेचा सेवक आहे आणि शेवट पर्यत सेवकच राहिन अशा पद्धतीने ते वागत . महाराष्ट्रातील पूर्वीच्या आमदारांनी दिड रुपाया माणधण घेऊन उत्कृष्ट सेवा केली आहे. पण आज कोणतीच सेवा जास्त पैसा घेतल्या शिवाय किंवा काहीतरी मिळाल्या शिवाय होत नाही. हे वास्तव आहे. अशी परिस्थिती  बदलण्यासाठी चांगल्या लोकप्रतिनिधीची  गरज आहेच. पण त्या पेक्षा जास्त सुजान नागरिकांची जास्त गरज आहे.
==============================

संदिप बोऱ्हाडे. ( वडगाव मावळ , पुणे)


    राजकारणी, नेते मंडळी हे शब्द जर ऐकले तर माझ्या तोंडात तर शिव्याच येतात यांच्याबद्दल..अपवाद जर वगळला तर काही नेते नक्कीच प्रामाणिक आहेत.. पण यांची संख्या किती 100 राला 5 पण मिळणार नाहीत. काही बोटांवर मोजण्या इतके आहेत मनोहर पर्रीकर, माणिक सरकार, गणपतराव देशमुख, बच्चू कडू अजूनही असतील पण सध्या मला हे नेते खूप आवडतात

    मागे काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचायला मिळाली होती , ब्रिटन मधील ..एक मिनिट उशीर झाला संसदेमध्ये यायला म्हणून मंत्र्यांनी दिला राजीनामा.
मी वेळेवर जागेवर नव्हतो, त्यामुळे मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो," असं म्हणत ब्रिटनमधल्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे प्रतिनिधी आणि मंत्री लॉर्ड बेट्स यांनी राजीनामा दिला होता..

आणि आमच्या देशात अधिवेशनात 98% गैरहजर राहणाऱ्या सदस्याला उत्कृष्ट संसदपटुचा पुरस्कार देण्यात येतो. आणि पवित्र संसदेत हजर न राहता महान पंतप्रधान होता येते. तसेच संसदेत झोपा देखील काढता येतात. आमच्या भारतातले मंत्री खासदार देशाचे प्रश्न मांडण्यासाठी जातात आणि संसदेत porn film बघतात बरका. आणि हे वास्तव आहे.
जनतेचे सेवक ना तुम्ही मग सेवा करायची सोडून लुटायचे धंदे करता का..?? मग शिव्या नाही येणार तोंडात तर काय येईल तुम्हीच सांगा. 15 दिवसांपूर्वी दिल्ली ला पेपर ला जाऊन आलो आणि एका महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्याच्या बंगल्यावर दिल्लीत रहायला मिळाले मी त्या मंत्र्याचे नाव नाही घेत पण वास्तव सांगतो मंत्र्याच्या बंगल्यावर राहायचा तपास नाही पण दोन- तीन गाड्या 10-20 नोकर चाकर प्रशस्त बंगला.. आणि अजूनही बऱ्याच सुविधा कशाला हवय हो हे सगळं.. ते ही जनतेच्या पैश्यांमधून.

   आमदार , खासदार यांची देशातील संख्या हजारोमध्ये आहे..पगार देखील लाखो मध्ये घेतात, इतर भत्ते नोकर, चाकर , घरभाडे, फोनबील आणि अजून एकदा फक्त निवडून यायचं नंतर मरेपर्यंत पेन्शन पण मिळते बर का ?? का बरं देशाने म्हणजेच सर्वसामान्य लोकांच्या पैश्यातून या अश्या लोकांचे लाड का
पुरवावेत.. असे कोणते दिवे लावतात हे महाभाग.. माझ्यानते हे तर अट्टल चोर असतात.................हे कधी चो-या करुन जातात; सामान्य माणसांना कळत सुद्धा नाही. यांच्यामुळेच देश कर्जबाजारी झाला आहे आणि आपण यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची म्हटली तर लगेच यांच्या तिजोरीवर बोजा येतो...अरे प्रत्येकाने तुमच्या सर्व आजी माजी आमदार खासदार मंत्री संत्री लोकांनी एक महिन्याच्या पगार दिला ना तरी सर्व शेतकऱ्यांची कर्जे माफ होतील आणि आमची ही आमदार खासदार पगार वाढीसाठी नुसते रडत असतात पगार वाढीला कोणताही पक्ष मला विरोध करताना दिसला नाही. महाराष्ट्र विधानसभेने काही वेळात 50 हजारांवरून एक लाख पगार वाढ केली कोणत्याही आमदाराने विरोध केला नाही बच्चू कडू आणि अजून असतील 1 2 अपवाद. म्हणजे आपण दोघे भाऊ भाऊ आणि मिळून खाऊ
देश कर्जबाजारी झाला आहे तो याच लोकांमुळे पण आपल्याला ते समजून येत नाही..एक आमदार बच्चू कडू यांचे वाक्य नेहमी आठवते नक्षलवाद्यांनी सर्वसामान्यांना मारण्यापेक्षा
आपल्यासारख्या पुढा-यांनाच गोळ्या घालायला हव्यात.

     भारतातील नेत्यांनी जर ब्रिटन चे त्या बातमीचे अनुकरण करायचे ठरविले तर ते फक्त लाजून लाजून मरून जातील. निगरगट्ट, अप्पलपोटी , नालायक , बेशरम वगैरे ' गुण ' आहेत इथल्या आमच्या भारतातल्या राजकारणी लोकांमधे. आणि अश्या बातम्या वाचल्यावर आपल्या संबंधित लोकांसाठी एकच शब्द आठवतो........... हरामखोर.. अजूनही खूप आहे पण तूर्तास इतकेच..
==============================

शिरीष उमरे, नवी मुंबई


स्वातंत्र्यापासुन फक्त खासदार मोजले तर अंदाजे ८००० असतील पेंशनधारी. तशी फार काही मोठी संख्या नाही पण एडीआर ह्या राजकीय संशोधन संस्थेच्या रिपोर्ट नुसार  ९०% खासदार हे करोडपती आहेत. बरेचसे फर्जी पॅन कार्ड होल्डर व क्रीमिनल रेकॉर्ड वाले आहेत. हीच गत आमदारांची !!

मग खरेच ह्या आमदार- खासदारांना पेंशन ची गरज आहे काय ? असा प्रश्न केला तर  सगळेजण नाही असेच उत्तर देतील. बहुतांशी खरे पण आहे. मग विचार येतो १०% प्रामाणिक, भ्रष्टाचार न केलेले वयस्कर व भरपुर विकासाचे काम  केलेल्या खासदारांचा... ह्या अंदाजे हजार लोकांचे काय ? ही लोक बरेचदा मृत्यु शिवाय रिटायर्ड होत नाहीत. ही आपल्या देशाची संपत्ती आहे. त्यांचा सांभाळ करणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी नियम बदलवावे लागेल.  कॅगप्रमाणे एखादी ऑटोनॉमस संस्था ह्याकडे लक्ष देऊ शकेल.

 भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हीस करणार्यांना सुध्दा पेंशन असते. माझ्यामते देशाच्या प्रत्येक नागरिकाला निवृत होण्याचे स्वातंत्र्य व पेंशन मिळायलाच हवी. अशी आपल्या सिस्टीममध्ये व्यवस्था करणे गरजेचे आहे.
असे मला वाटते
==============================

सागर राडे, सांगली

.
भारतात सध्या पेन्शन घेणाऱ्या आमदार-खासदारांची एकत्रित संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यापैकी जवळपास 70-80 % तरी करोडपती नक्कीच असतील. मग खरंच त्यांना पेन्शनची गरज आहे का?
खरंतर पेन्शनची तरतूद निवृत्तीनंतरचं उदारनिर्वाहाचं साधन म्हणून केलेली असते. आमदार असो वा खासदार निवृत्तीनंतरदेखील पूर्णपणे निष्क्रिय न होता कुठल्या ना कुठल्या पदावर नेहमीच असतात. त्यातून त्यांना उत्पन्न मिळत असतं. अशा व्यक्तींना पेन्शनची गरज आहे का?
दुसरं महत्वाचं म्हणजे आमदार/खासदार पदावर असताना अधिवेशन काळात किंवा इतर वेळी संसदेत/विधिमंडळात ते उपस्थित असतातच असं नाही. त्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. तरीही त्यांना पेन्शनची सोय आहे. अशा व्यक्तींना पेन्शन का द्यावी?
संपूर्ण आयुष्यात एखादी व्यक्ती  वर्षभरासाठीदेखील आमदार/खासदार पदावर असली (फक्त 1दा जरी निवडून आली असेल) तरीदेखील ती व्यक्ती पेन्शनसाठी पात्र ठरते. अशा वेळी खरंच पेन्शनची गरज आहे का?
==============================

सचिन कंन्नाके रा.पिंपळखुटी

  
    आजच्या आठवड्याचे विषय खूप छान निवडले आहे तरी त्यातून मला आमदार खासदार पेंशन हा विषयावर विचार मांडावे वाटत आहे.
      आज मित्रानो इकडे लोकांना काम मिळत नाही आहे.मनुन गावातील माणसे शहराकडे जात आहे आणि अजून समस्या म्हणजे आज शेतकऱ्यांना पीक होत नाही आहे. आणि कर्ज शेतकऱ्यांनवर भार वाढत आहे ते पण कर्ज माफ नाही करत आहे* .😢😢
                   त्यात अजून दुष्काळ पडत आहे त्यावर त्याचे लक्ष नाही आहे. पण स्वतःचे पेंशन कसे वाढवायचे त्यावर त्याचे लक्ष आहे.
                      *माझ्या मते पूर्वी आमदारांना दरमहा  पंचवीस हजार मिळत होते. आणि त्यात त्यांना सुविधा

 देण्यात येते. विमान, रेल्वे, एसटी त्यामध्ये त्यांना प्रवास मोफत असते.आज त्याच आमदारांना पंचात्तर हजार दरमहा देण्यात येते.
           त्यामध्येही त्याच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा मोफत आहे.अनावशक खर्च करत आहे आणि सरकारची म्हणजे आपलेच जनतेचे पैसे खर्च करत आहे.

     _माझ्या विचाराने पूर्वी आमदार खासदाराना जास्त लाभ मिळत नव्हता पण आज निवृत्ती वेतन त्यांना कायला त्यांना जर निवृत्ती वेतन दिले तर आपल्या भारतात वीस हजार आमदार खासदार आहे त्यांना सगळ्यांना निवृत्ती वेतन दयावे लागेन.
    त्यातही पूर्वी पेक्षा आज त्यांना वेतन दरमहा अंशी हजार आहे. आणि निवृत्ती वेतन चालू झाले तर चाळीस हजार दरमहा द्यावे लागेल. त्यामुळे आपल्या सगळ्या नागरिकांवर त्याचे परिणाम पाहवयास मिळेल. कारण प्रत्येक वस्तू मध्ये पैसे वाढेल. त्याचा परिणाम गरीब,मध्यम ,सगळ्यास होईल._
 😞😔😟☹😔😟😔
   
          पूर्वी स्वतंत्र काळात जे महान नेते होते. त्यांनी केव्हा ही स्वतःचे पाहिले नाही फक्त दुसऱ्यासाठी झटले ते महान नेते महात्मा फुले, छत्रपती शाहु, महात्मा गांधी,बाबासाहेब आंबेडकर थोरमोठ्या नावाची सर आजच्या मंत्र्यांना येणार नाही.
🏳🏳🏳🏳🏳🏳🏳
  _तरी2014-2015 मध्ये तो आमदार झाला पण त्याने पहिले आश्वासन खूप केले पण साडे तीन वर्ष होत आहे. पण आजपर्यत जेकाही सांगितले ते आज पर्यंत पूर्ण झाले नाही.
 फक्त प्रधानमंत्री राज्य मार्ग आता जोमात चालू आहे कारण आता2019 चा निवडणूक येत आहे.त्याचे मत असे होते की तीन पंचवार्षिक निवडून नाही आले तरी चालेल एक वेळा आलो तर तीन पंचवार्षिक ची कसर पूर्ण करू शकतो._
🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
            आणि त्यांला हे पद म्हणजे एक प्रतिष्टित नागरिक वाटते. म्हणून तो त्या पदासाठी करोडो रुपये खर्च केला. आणि त्यानंतर तो आता आमदार बनला,
💰💸💰💵💰💷💰💶
           *पण खरा प्रश्न आहे आमदार खासदाराना पेंशन ही समस्या थंबवायांचे आसेल तर मंत्र्यांना पेंशन मिळायला नाही पाहिजे.जो मंत्री पाच वर्षे त्या पदावर राहतो तर त्याला पेंशन.आणि जो 35 ते40  वर्षे सरकारी नोकरी करतो.त्याला पीएफ असे का. तरी हा प्रश्न माझ्या मते गंभीर आहे.
=============================

शीतल शिंदे .दहिवडी - जि सातारा


लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले , लोक कल्ल्यनासाठी  तात्पुरत्या - ठराविक कालावधीसाठी निवडून दिलेले लोकनेते सेवक म्हणजे आमदार , खासदार , आणी इतर सर्व मंत्रीमहोदय  .
  मात्र वर्षानुवर्ष ही मंडळी आपल्या पिढीजात व्यवसायासारखे आपल्या पुढच्या पिढीची सोय पण करून ठेवतात .ह्यांना पासपोर्ट - विसा , वाहन सुविधा सर्व काही ऐश.कुठून आले एवढे अब्जावधीची सम्पत्ती , टोलेजंग इमारती , व इतर प्रॉपर्टी . आरामदायी जीवन एवढ्या सोयी सुविधा की त्यांना आपण जनतेचे सेवक आहोत की मालक ह्यातला फरकच कळू दिला जात नाही .ह्याला जबाबदार आपले शासनच आहे .

जनतेचाच पैसा खावून स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेवर अन्याय , जतीजतीमधे तेढ , दंगली घडवून आणायच्या आणी जाब विचारायचा म्हटले की समिती नेमायची  मग ती समिती चार - पाच वर्षे लावायची तोपर्यंत दुसऱ्या पक्ष निवडून येतो .

सर्वसामान्य जनतेकडून त्यांनी कमावलेला पैसा त्याचा टेक्स, व्यापार टेक्स हा म्हणजे काळा पैसा आणी ह्यानी न कमावता जमा केलेल्या सम्पत्तील काहीच नाही .

🌟 खरेतर ह्यांना पेन्शन ची आणी एवढ्या भत्त्याची काहीच गरज नाही . एवढे नोकर सेक्यूरिटी नको एवढ्या सोई सुविधा आरोग्य विमा .सरकारच्या केवढा मोठा तोटा .

ह्यानेच देशा ची आर्थिक व्यवस्था डबघाईला यायची .येवढ्या खर्चात कितीतरी कुटुंब जगून निघतील .एकिकडे  कुपोषण ,गरिबी ,  बेरोजगारी आणी उपासमार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या 😔.

 निवडणुका जवळ आल्या की विकास कामांना सुरवात करायची म्हणजे पाच वर्षे काय उद्योग केले ते जनता विसरते आणी पुन्हा नव्याने निवडून देते .विसरभोळे- दुसऱ्यांच्या मतांचा फुटबॉल बनणारे आपले  लोक .

ज्येष्ठांनो जागे व्हा.आपल्या मुलांमध्ये प्रामाणिकपणाचे  विचार भरा .जबाबदार नागरिक बनवा .

नवयुवकानो - मतदारांनो झोपेतूण जागे व्हा.तुम्हा प्रत्येकाला राज्यकर्ता बनन्याचा अधिकार भारतीय राज्य घटनेने दिला आहे .आधीही आणी या पुढेही  प्रामाणिक पणे कार्य करण्यासाठी .आणी मत देताना चांगला नेता निवडा .नवीन लोकांना संधी दया .तुमचे एक मत तुमचे , देशाचे भविष्य घडवू शकतो कारण तो तुम्हांला अधिकार आहे .त्यामुळे मत विकताना विचार करा .जागे व्हा नव्या पिढिनो जागे व्हा.
===============================

मुकुंद बसोळे,लातूर


स्थळ- गावातील वडाचं  झाडं आणि त्या वडाच्या भोवती असलेला पार....
वेळ- 11.30....गण्या त्या पारावर पेपर वाचत बसला होता....आणि मन्या नुकताच जेवण  करून आपल्या तुडुंब भरलेल्या पोटावरुन हात फिरवत पाराकडे येत होता.....
मन्या- ( गण्याच्या पाठीत एक धपका घालून...) ऐ 'हिरो' काय करायला बे....भर दुपारी......

 गण्या - आबे जनमल्यावर 'डोक्यावर' पडला होता का बे तू?..... दिसत नाही का पेपर वाचतोय ते....

मन्या-  ते दिसतंय बे...काही विशेष आहे का आज पेपर मधी....

गण्या- विशेष म्हणजे बघ....भारत आजचा सामना हरलाय वेस्ट इंडिज बरोबर....आणि ते 'राफेल' चा मुद्दा चांगलाच चघळत आहे की राव....आणि हे बघ हे काय...(मोठ्याने वाचत) आता आमदार आणि खासदारांना पेन्शन सुरू होणार आहे म्हण....

 मन्या- (ख्या ख्या हसत) आबे जोक करायलेत का म्हणतो मी आजकालचे राजकीय नेते....

गण्या- कस काय बे?...

मन्या-  (गंभीर होऊन)अरे गण्या मायला तुला खरंच वाटतं की ह्या आमदार आणि खासदारांना  खरंच ह्या पेन्शन ची गरज असलं म्हणून....आबे पुढच्या 10  पिढ्या सुद्धा बसून खातील एवढं 'भ्रस्टचार' करून कमावलेलं असतं ह्यांनी....( थोडं जास्तच गंभीर होऊन आणि भूतकाळात रमल्यासारख करून)  अरं गण्या काय सांगू तुला माझा बाप शाळांमास्तर.... इंग्रजी जिचा लै भारी शिक्षक...तो होता डोंगरगावात.... मास्तर  म्हणून ......आजसुद्धा मी तिथे गेलो की तेथले लोक म्हणतात की गुरुजींनी  आम्हाला घडवलं..आजपर्यंत तसा शिक्षक झाला नाही...पण काही गोष्टी 'नियतीला' सुद्धा मान्य नसतात...पाठवलं तिने माझ्या बापाला देवाकडे...( हे सांगताना डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या असतात).......त्यांनी 20 वर्ष सेवा केली शिक्षक म्हणून...अजून 10 वर्ष होती सेवेची.... पण शासन आम्हाला त्यांची सेवा पूर्ण नाही झाली म्हणून अर्धीचं पेन्शन देतंय... आम्ही कसे दिवस काढलेत आम्हालाच माहीत...भावा....आणि यांनी 5 वर्ष जरी आमदारकी केली तरी लगेच यांना पेन्शन...बरं ते जाऊदे....आमदारकी आणि खाजदारकी हे लोकसेवा ना बे...लोकसेवेचं माध्यम ना हे...पण आजकालचे आमदार- खाजदार तुला माहीत आहेत ना... हो एक काळ होता जेंव्हा आमदार- खाजदार लोकांसाठी तळमळीने काम करायचे...लोकनेते होते ते....पण आजकालचे आमदार खाजदार....फक्त प्रचारात वापरलेला पैसा कसा दुपटीने तिपटीने वापस कसा मिळवायचा याचाच विचार करतात....काही अपवाद असतील पण त्यांची संख्या नगण्य....मग अश्या वेळेला विचार करावसा वाटतो भावा की यांना पेन्शन ची खरंच गरज आहे का?....

 गण्या- पण 'मन्या'आपण काय करू शकतो यार...यावर...

 मन्या- हो भाई...हे सुद्धा बरोबर आहे म्हणा....पण विचार ग्रुप वर आपले विचार तर मांडू शकतो ना....

गण्या- हो ते करू शकतो.... चल आता चहा पाज....'कल का चहा उधार है तुम्हारे उपर'

 मन्या- चल भावा....
==============================
IMAGE SOURCE--INTERNET

माझा वि४ ग्रुप सोबतचा आजवरचा प्रवास. भाग - 1 (पहिला)



डॉ. विजयसिंह पाटील MBBS. DA. कराड
           लहान असताना, घरात करमणूकीचे साधन एकमेव रेडिओ. मला गाण्यांची, बातम्यांची फारशी आवड नसल्याने, मैदानी खेळ आणि वाचन याची आवड लागली.
अगदी लहानपणापासून मला वाचनाची दांडगी आवड. लहान असताना चांदोबा वाचत असे. आठवीत असताना कराड नगर वाचनालयाचे सभासदत्व कार्ड वडिलांनी दिलं. आणि मोठा खजिनाच सापडला. बाबुराव अर्नाळकर ते सुहास शिरवळकर, पु .ल. ते व .पु , शिवाजी सामंत ते रणजित देसाई, व बा बोधे ते शंकर पाटील , मिरासदार ते राम नगरकर, चि व्ही जोशी, नेमाडे ते अरुण साधू यांची जवळ जवळ सर्व पुस्तके MBBS ला जाईपर्यंत वाचून झाली होती. पुढं कॉलेज जीवनात इंग्रजी साहित्य वाचायला लागलो.
शिक्षण पूर्ण झाले. नोकरी आणि व्यवसाय सुरू झाले. अशीच वीस वर्षे लोटली. वाचन चालूच होते, पण प्रमाण कमी झाले होते. त्यात स्मार्ट फोन आले आणि वाचनाची व्याख्याच बदलून गेली.
व्हाट्सअप्प / फेसबुक वरील पुस्तक प्रेमी, साहित्य विषयक ग्रुप्सना जॉईन झालो. सहज कुठंही वाचायला मिळू लागले. भरपूर लेखकांचे लेख वाचायला मिळू लागले.
तसं बघायला गेलं तर, स्थिरस्थावर झाल्यावर माझ्या मनात, आपणही काही तरी लिहावं असं सारखं वाटत होतं. तसा प्रयत्नही केला चारपाच वेळा. लिहिल्यावर एखाद्या तज्ज्ञांना लेख दाखवला तर, सूचनाच इतक्या यायच्या की , मी निराश होऊन लिखाण बंद व्हायचं. मग चार पाच महिन्यांनी परत काहीतरी लिहायचो. परत ये रे माझ्या मागल्या. आपल्याला लिहायला बिलकुल जमणार नाही असं वाटलं आणि तो विषयच सोडून दिला.
एके दिवशी, आमच्या मेडिकलच्या ग्रुपवर एकानं कळकळीने लिहिलं ' अरे नुसते पोस्ट फॉरवर्ड करू नका, स्वतः काही तरी लिहा हो '. झालं माझ्या मनानं उचल खाल्ली.
त्यात एका ग्रुपवर वि4 ग्रुपची लिंक आली. कुतूहलाने जॉईन झालो. पहिले पंधरा दिवस कोण काय आणि कसं लिहितयं याचं निरीक्षण करत होतो .काही दिवसांनी थोडी माहिती असलेला विषय आला. घाबरत घाबरत, थोडं फार लिहिलं आणि शेवटी ' माझं काही चुकलं असेल तर माफ करा ' अशी तळटीपही टाकली . लगेच या ग्रुपवरील काही लोकांनी धीर दिला आणि लेख चांगला आहे, असा अभिप्राय पण दिला. (त्यांचं परत एकदा आभार ). धीर दिला नसता तर , कदाचित माझं लिखाण बंद पडले असते. भित्या पोटी ब्रम्हराक्षस अशी माझ्या मनाची स्थिती होती. जवळपास सर्व भौतिक आकांक्षा पूर्ण झालेल्या होत्या. जीवन एका लयीत चाललेलं ( त्यावर मी पंधरा दिवसांपूर्वी ग्रुपवर लिहिलंय ). पुढच्याच आठवड्यात वैद्यकीय संबंधित विषय आला. मी मोठ्या उत्साहात लिहिलं पण. त्यालाही बऱ्यापैकी प्रोत्साहन मिळालं. काही दिवसांनी समलैंगिकता हा विषय आला. माहिती होतीच, पण चार दिवस त्या विषयावर अभ्यास केला. आणि लेख लिहिला. चार वेळा एडिट करून ग्रुपवर टाकला. त्यालाही अडमीन मंडळी आणि ग्रुप सदस्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पुढं 'माझी विनोदी कथा'  हा विषय आला . विचार केला, आपण रोज इतके रुग्ण तपासतो , त्यावर काहीतरी विनोदी लिहावं. डोक्यात तोच विषय भुंगा घालायला लागला . ' पेशंट व्यक्ती आणि वल्ली असा लेख लिहिला . प्रतिसाद चांगला मिळाला. बऱ्याच सदस्यांनी वैयक्तिक मेसेज करून अभिनंदन केलं. तो लेख फेसबुकवर टाकला. माझ्या अपेक्षेपेक्षा फारच चांगला प्रतिसाद मिळाला. (त्याचे पुढे नऊ भाग फेसबुकवर टाकले, असो. )
(म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीसाठी योग जुळून यावा लागतो. )
माझा वि4 ग्रुप बरोबरचा सहवास जेमतेम सहा महिन्यांचा, पण वीस वर्षांत जे जमलं नाही ते या कालावधीत जमलं असं निदान मला तरी वाटते. सर्व श्रेय वि4 ग्रुपचं..
माझ्या लिखाणाची , भलं ते चांगलं असेल किंवा बोअर असेल, मला जे समाधान मिळालं त्याची किंमतच होउ शकत नाही , सुरुवात आपल्या वि 4
ग्रुपमुळं झाली यात शंकाच नाही.
मी ग्रुपच्या अडमीन मंडळी आणि सर्व सभासदांचे मनापासून आभार मानतो..
मनःपूर्वक धन्यवाद . 🙏🏻🙏🏻🙏🏻
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

करण बायस, जि. हिंगोली.
       आधीपासून वाचनाची आवड होती ,पण कधी लिहिण्याचा प्रयत्न केला नव्हता पण कधीतरी लिहायला सुरुवात करणार हे मनात चालू असायचं.
*🌱वि४🌿* ग्रुप चालू झाल्यानंतर काही २-४ दिवसांनी अक्षय ने मला ग्रुप मध्ये ऍड केले.पहिल्या आठवड्यातील विषय आलेले होते त्यापैकी *श्यामच्या आईने माझ्यातला श्याम असा घडविला* या विषयावर लिहायचं ठरवलं आणि माहिती गोळा करून माझे शब्द मांडण्याचा प्रयत्न केला. लेख टाकायचा शेवटचा दिवस होता पण मनात चालू होतं टाकावं की नाही लेख पुन्हा पुन्हा वाचला मित्रांना दाखवला आणि काही पॉसिटीव्ह फीडबॅक आला म्हणून टाकला लेख ग्रुपवर त्यातून बऱ्याच जणांनी चांगला प्रतिसाद दिला.
काही दिवसांनी ग्रुपवर थोडा गोंधळ होत होता ,मी एक मेसेज टाकला “ग्रुप बंद करा” म्हणून 😜 (मला ग्रुप लिंक म्हणायचं होत पण घाईत लिंक लिहायचं विसरलो) ,मला ग्रुप मधून रेमोव करण्यात आलं पण मी माझ्या अडमीन मित्र अक्षय ला सांगितलं मग पुन्हा ऍड झालो .
त्यांनतर ग्रुप साठी ब्लॉग बनवण्याची संधी मिळाली, मी पूर्वी कधीही ब्लॉग बनवला नव्हता आणि मला ते जमत पण नसे, ग्रुप वर मेसेज आला होता ब्लॉग बनवण्यासाठी कोणाची तयारी असेल तर पर्सनली मेसेज करा आणि मी बनवण्यासाठी तयार झालो मला थोडा वेळ देण्यात आला एखादी पोस्ट एडिट करून दाखवायला मी ते करून दाखवलं आणि ९-१० महिन्यापासून विचार अडमीन टीम मध्ये ब्लॉगर म्हणून मला योगदान करण्याची संधी मिळाली,काही काळसाठी पूर्ण ब्लॉगची जबाबदारी आल्यामुळे मला ब्लॉग बद्दल आणखी शिकता आलं.
ग्रुपच्या अडमीन टीम आणि सर्व मेंबर्सचे धन्यवाद 🙏ग्रुप कडून खुप काही शिकता आलं आणि ग्रुपला भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. सर्व मेंबर्सनी ग्रुपवर थोडं का होईना पण लिहीत राहावं आणि आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवावे.🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अर्जुन बर्गे,अहमदनगर.
      सर्वप्रथम मी या ग्रुप चा आभारी आहे।।।👏👏
मला अवांतर वाचनाची पहिल्यापासून एवढी आवड नाही ।।।पण पहिल्यांदा हा ग्रुप जॉईन केला तेव्हा यातील प्रत्येक लेख जेव्हा वाचत गेलो त्यातून समजत गेले अवांतर वाचनात किती ताकद असते।।।आज प्रत्येक गोष्टीवर ठाम मत मला या ग्रुप मूळे मांडायला शिकलो।।।।
     या ग्रुप मुळे मी लिहायला शिकलो।।।।।🙏🙏
ज्या वेळेस एखादा लेख ग्रुप वर एखादा लेख येतो तेव्हा लेखकाची विचार करण्याची क्षमताच खरच कुतूहल वाटत🤔।।।प्रत्येक दृष्टीने त्या लेखसंदर्भात पोसिटीव्ह,,, निगेटिव्ह सगळ्या गोष्टींना विचार करून लेख लिहीत असतो🤔🤔।।।
माझं अवांतर वाचन कमी असल्यामुळं शब्द संग्रह जास्त नाही पण विचार ग्रुप मध्ये जॉईन झाल्यापासून तो नक्कीच खूप मोठा वाढलाय।।।।😊😊
    मला माझे मित्र बऱ्याच वेळेस विचारतात की तुझ्यात अचानक एवढा कसा बदल झाला की प्रत्येक गोष्टीवर आपल ठाम मत मांडतोय।प्रत्येक गोष्टीवर स्वतःचे विचार व्यक्त होतायत।।।👊👊।।।
तर मी त्यांना एकच म्हणतो माझ्याकडं विचार आहे।।।त्याने माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवलाय।।। आणि आयुष्याच्या प्रत्येक turning पॉईंट ला तो माझ्या सोबत असेल।।।।।
       आणि खरच सांगतो तुमच्या विचाराने माणूस प्रगल्भ बनतो👏👏।।।ज्याच्या कडे विचार करण्याची क्षमता आहे तो व्यक्ती आयुष्यात येणाऱ्या कोणत्याच गोष्टीपासून पळ काढत नाही👊👊।।।।प्रत्येक गोष्टीला भिडून त्यातून मार्ग काढत असतो।।।।🎯🎯
      माझ्या विचार करण्याला विचार ग्रुप पासून सुरुवात झाली😊हे माझ्या आयुष्यातील खूप मोठं आचिवमेंट आहे👏👏।।।।
     मी आभारी आहे ग्रुप मधील सदस्यांचा।अडमीन मंडळींचा।।।।

Thanks🙏🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.
        प्रवास शब्द आजवर सर्वांनी ऐकला, अनुभव ला आहे असा एकही व्यक्ती नसेल जो कोणताही प्रकारचा प्रवास केला नाही, तसाच मीही आहे बराच प्रवास केला तो विविध प्रकारचा बरेच अनुभवही आलेत पण "विचार" ग्रुप बरोबरचा आजवरचा प्रवास नेत्रदीपक नाही पण शुरवात तर झाली आहेच आणि पुढे बराच  प्रवास बाकीही असेल... असो.
       मी ह्या ग्रुप मध्ये आलो ते माझ्या खोलिमित्र सीताराम पवार साहेब यांच्या शिफाशीनुसार आणि पाहिले काही दिवस बघितलं या ग्रुप मध्ये काय विचार चालतात सुरवातीला काही आवडीचे विषय आले वेळ मिळत असल्याने काही लेखही लिहिले, सॉरी काही लेख नव्हे ते आता काही दिवसा पूर्वी pdf स्वरूपात वाचले तर ते ब्लॉग, लेख तर नवतेच ते फक्त गद्य उतारे होते असे जाणवले.
      मध्ये काही दिवस नोकरी च्या शोधात असताना ती मिळाली आणि सवतःला त्यात गुरफटून घेतलं वेळच मिळत नाही असं व्हायला लागले कारण खाजगी नोकरी म्हणजे...समजलात असाल...
     मागीलच आठवड्यात सौदागर सर चा एक प्रेमळ संदेश आला सतत विचार शाळेत गैरहजर राहिल्यास remove केले जाईल खडबडून माफी मागत मागील आठवड्यात लेख लिहिला आणि येथून पुढेही लिहू इच्छित आहे...
      जी संधी विचार ग्रुप ने दिली त्या साठी मी या ग्रुप चा ऋणी तर आहेच आणि हो हा प्रवास मला शेवटपर्यंत अनुभवायचं आहे...अशीच साथ आणि प्रेमाची अपेक्षा...

धन्यवाद V4!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

R. सागर,सांगली.
    सर्वप्रथम आपला *वि४* समूह 1 वर्षाचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करतोय त्याबद्दल समूहाचे संकल्पक-संस्थापक सौदागर काळे सर, संपूर्ण admin टीम आणि सर्व सदस्यांचं अभिनंदन व आभार..
      माझ्याबाबतीत बोलायचं तर मी वि४ समूहाला जोडलो गेलो साधारणपणे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये. त्यावेळी समूहाचा चौथा किंवा पाचवा आठवडा होता. नोकरीला असल्यामुळे घरापासून दूर होतो. दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी निवांत वेळ असायचा. लॅपटॉप घरी ठेवलेला. त्यामुळे मोबाईल सोडला तर करमणुकीचं साधन असं काही नव्हतंच. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर ऑनलाईन राहायची सवय लागलेली. अशातच एके दिवशी वि४ समूहाची माहिती आणि सोबत सौदागर सरांचा नंबर मिळाला. त्यावर संपर्क करून समूहामध्ये सामील झालो आणि तिथून सुरू झाला वि४ समूहासोबतचा माझा प्रवास..
    मला लहानपणापासून वाचनाची आवड. मी 5वीला असताना पहिल्यांदा एक कादंबरी वाचायला घेतलेली. तिथून कॉलेज पूर्ण होईपर्यंत तो छंद जोपासला. जे मिळेल ते वाचायचो. त्यातून वेगवेगळी माहिती मिळत राहिली. विविध माध्यमातून सातत्याने आपल्या लेखणीची छाप पाडणारे आमचे लेखक-कवी-पत्रकार मित्र संदीपदादा असोत, सीमेवर पहारा करतानासुद्धा मिळेल त्या वेळेत वाचन आणि लेखनाची आवड जोपासणारा आमचा मित्र युवराजदादा असो, साधारण वर्षभर रेल्वेप्रवासात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणारे आमचे कथालेखक मित्र मानेसर असतील, शिवाजी विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना भेटलेले सतीश सरांसारखे पत्रकारितेचा अभ्यास करणारे मित्र असतील या सगळ्यांच्या सहवासात वाचनाची आवड जोपासता आली. पण तरीही एखाद्या विषयावर लिहायचं धाडस कधी झालंच नव्हतं.
    वि४ समूहात सामील झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात लिहायचा प्रयत्न केला. लेखनाचा कुठलाच पूर्वानुभव नसताना लिहिलेली पहिली पोस्ट समूहावर टाकली. विशेष म्हणजे मी जे काही लिहिलं ते admin टीम-सदस्यांनी समजून घेत मला प्रोत्साहन दिलं. त्यामुळं लिहायचा उत्साह वाढला. त्यानंतरचे काही आठवडे प्रत्येक वेळी लिहायचा प्रयत्न केला. पुढे विविध कारणांमुळे लिखाणात सातत्य राखता आलं नाही. पण लिखाणात सातत्य नसलं तरी कमीत-कमी सदस्यांनी पोस्ट केलेले त्यांचे लेख तरी कधी थेट समूहावर तर कधी एकत्रितपणे ब्लॉगवर वाचत असतो. त्यातून बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती मिळत असते. कधी काही विषयांबद्दलचे समज-गैरसमज दूर होतात. त्यामुळं खूप छान वाटतं.
     मागच्या आठवड्यापासून ठरवलंय प्रत्येक आठवड्यात एका तरी विषयावर व्यक्त व्हायचं. कितपत शक्य होईल माहीत नाही. पण प्रयत्न सुरूच राहील. त्यासाठी आतापर्यंत पुरेशी संधी मिळत राहिली. सर्वांनी विश्वास दाखवला. यापुढेही आपल्या सर्वांची साथ मिळत राहील हीच अपेक्षा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


किशोर शेळके,लोणंद. जिल्हा सातारा.
         मी आणि माझी लेखणी  याविषयी काही मांडायचे झाले, तर दूरवर काही संबंध नसलेली लेखणी आज माझी तहान, भूक अन् झोपही घेऊन गेलीय. अगदी चार महिन्यापूर्वीचा 'वि४' केला, तर लिहायला आजिबातच आवडत नव्हतं. आवडत नव्हतं म्हणण्यापेक्षा तसं कारणच नव्हतं. कारण मी माझ्या दैनंदिन जीवनात भरपूर मोकळा असलेला वेळ, आणि महागडा मोबाईल आणि त्यातिल न संपणारा नेटपॅक हे सगळं रमी सर्कल आणि कॅन्डी क्रश खेळण्यातच खर्च करत होतो. माझे व्हाट्सअॅप गुड माॅर्निंग, गूड नाईट, एखादा जोक फाॅरवर्ड करणे, किंवा एखादा व्हिडिओ डाऊनलोड करून घेणे, यापलिकडे वापरलेच नाही.
        मानव हा सृजनशील प्राणी आहे. आपापल्या बुद्ध्यांकाच्या जोरावर आपली वैचारिक पातळी ठेवतो. आपली वैचारिक पातळी वाढवण्याची ताकद प्रत्येकात आहे, फक्त प्रखर इच्छाशक्तीची गरज आहे. कहीतरी नवीन शिकण्याची जिद्द, आणि त्यासाठी मिळालेली संधी, या दोन गोष्टी एखाद्या व्यक्तीचे ध्येय ठरविण्यासाठी नव्हे तर ते गाठण्यासाठी पुष्कळ आहेत.
        मला कविता करायला आवडत होत्या. सहा ते सात वर्षांपुर्वी महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी एका मुलीसाठी मी पाच सहा कविता केल्या, साहजिकच त्या प्रेमकविता होत्या. त्या मी माझ्या मित्रांना वाचून दाखवल्या. मित्रांनी कवितेची समीक्षा करायची ठेऊन मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. वाचक मित्रांनो, आपल्या कलेला जर योग्य ती दाद मिळाली नाही ना तर त्या कलेचा आपल्यालाच खूप राग येतो. वाटते की ऊगीचच पडलो या फंदात. मलाही तसंच वाटलं. आणि माझी लेखणी उघडन्याआधीच म्यान केली.
        आपल्या जिवनाचा मार्ग बदलून टाकणारी गोष्ट म्हणजे आपल्याला मिळणारं प्रोत्साहन. आणि नेमकं तेच मला मिळालं आपल्या 'वि४' ग्रुप वर. मी इथं आलो कसा हे महत्त्वाचे नाहीच आहे, पण मी इथं आल्यावर माझ्यात जे लक्षणीय बदल झाले, हे खूप महत्वाचं आहे, कारण इथे आल्यानंतर मला माझे 'वि४' मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळणार होतं. इथे मला ते प्रोत्साहन मिळणार होतं, ज्याची गरज मला सहा वर्षांपुर्वीच होती. इथे मला तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळणार होते. इथे मला माझ्या चूकीला समज आणि चांगल्या कामाला शबासकी मिळणार होती. इथे मला माझी दिशा मिळणार होती, माझी लेखणी मिळणार होती.

संगतीत 'वि४'च्या, मी असा आलो होतो
घेऊन माझे हाती, मी भविष्य आलो होतो

        साधारणपणे मला 'वि४' या समूहाला जोडून आठ ते नऊ आठवडे ही नसतील झाले, पण असं वाटतं या परिवारातील लोकांचे अन् माझे मागील जन्माचे काहीतरी ॠणानुबंध असावेत. या समूहातील प्रत्येक व्यक्ती मला सखा असल्याची जाणीव होते. प्रत्येक व्यक्ती मला आपलीच वाटते. या स्वार्थी जगतात अगदी निस्वार्थी भावनेने काम करणाय्रा व्यक्तींच्या परिवारात माझा सहभाग झाला, म्हणजे नक्कीच मी मागील जन्मी काहीतरी चांगलं काम केलं असणार आहे. व्यक्तीशः नाव घेण्यापेक्षा समूहातील प्रत्येक व्यक्ती तेवढ्याच आपुलकीने आणि जिद्दीने आपले 'वि४' जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतो आहे. आज या समूहाला एक वर्ष पूर्ण होत असेल तरी ज्यावेळी या समूहाची सुरूवात झाली, त्याचवेळी हा समूह कौतुकास पात्र ठरलेला आहे. यामधील कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही फळाची अपेक्षा नाही. आपले 'वि४' प्रेरीत करून समाज जागृतीचे काम करणारी ही समाजसेवक मंडळी. समाजातील चांगल्या गोष्टी बाजूला आणि वाईट गोष्टी बाजूला करण्यासाठी सतत धडपडणारी लोकं. म्हणजे काय तर यांच्या सान्निध्यात येणाय्रा दगडाचं सोनं करणारा हा परीस.

 समाजकंटकांचे घाव थोपविण्या, पुन्हा लेखणीच धावली.
करण्या सृष्टीचे रक्षण, आहे 'वि४'ची सावली...

         या समुहाचा भूतकाळ मी पाहिला नाही. पण भविष्यात या समुहाचं कार्य समाजाला अजून चांगल्या मार्गावर घेऊन जाईल, यात तिळमात्र शंका नाही.

         आणि मला सामावून घेऊन, एक व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल मी 'वि४' समुहाच्या अॅडमीन टिमचा शतशः ॠणी....
~~~~~~~~~~~~~~~~~~

सौदागर काळे, पंढरपूर.
         *मा* झ्या🌱वि४🌿ग्रुपसोबत खूप आठवणी जोडल्या आहेत.हा ग्रुप मी व माझ्या साथीदारांनी का काढला असेल?त्याचा खरंच किती जणांना फायदा झाला ?तो चालू करण्याचा आपला काय स्वार्थ?आपण स्मार्ट फोन हाती येताच व्हॉट्सअपवर ग्रुप वर ग्रुप निर्माण करावे अन त्या ग्रुपने बेवारस अपत्य असल्यासारखं भटकत राहावं. तसं आपल्याही ग्रुपचे होईल का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे एक वर्ष संपताना हाती येत आहेत.ते सारे सकारात्मक आहेत म्हणून खूप भारी वाटत आहे.
     हा ग्रुप निर्माण कसा झाला.त्याची थोडी माहिती देतो.2016 आणि 2017 असे दोन वर्षे लोकसत्ता वर्तमानपत्राने वरिष्ठ महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ब्लॉग बेंचर्स ही स्पर्धा घेतली होती.ती आता बंद झाली.त्यात प्रत्येक आठवड्यातील एक संपादकीय निवडले जायचे अन पुढच्या आठवड्यापर्यंत त्याच्यावर विचार व्यक्त करणाऱ्या तरुणांकडून ब्लॉग मागितले जायचे.असे दोनदा मी त्या स्पर्धेचा विजेता ठरलो. तेव्हा मनात यायचे प्रत्येक आठवड्याचे ब्लॉग बेंचर्स विजेते यांचे व्हॉट्सअप क्रमांक एकत्र करून एक ग्रुप तयार करावा.त्यावर विचार जागर करावा.पण ते शक्य झाले नाही.पण जे माझ्यासारखे लिहिण्यासाठी धडपडत होते,वर्तमानपत्रे त्यांच्या मतांना दुर्लक्ष करत होते,काहीजण आपले मोडकेतोडके लिखाण करत असत पण ते  समाज माध्यमावर मांडत नसत, काहीजण फेसबुक पोस्ट टाकत पण व्हॉट्सअपचा वापर लिखाणासाठी करत नसत.म्हणून ठरवलं . लोकसत्तावाले आठवड्याला एक संपादकीय द्यायचे तसे आपण व्हॉट्सअपवर विषय देऊ.ते आपण आपल्या निर्माण केलेल्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू.ते ब्लॉग बेंचर्स तयार करत होते तर आपण कमीतकमी जागरूक,संवेदनशील तरुण-नागरिक व्हॉट्सअप विद्यापीठातून बाहेर येताना पाहू.ही संकल्पना मी माझे मित्र अक्षय पतंगे आणि वैशाली सावित्री यांच्यापुढे मांडली.त्यांनी तेव्हा साथ दिली अन 🌱वि४🌿नावाचा नियमाच्या अधिन चालणारा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला.
     "श्यामच्या आईने माझ्यातला श्याम असा घडविला.."असा विषय देऊन ग्रुपचा प्रारंभ केला.पहिल्याच विषयाला भरभरून प्रतिसाद मिळाला.विषयाची संख्या 1 वरून 3 पर्यंत नेली.तोपर्यंत अनिल गोडबोले आमच्या ग्रुपचे आधारस्तंभ झाले.आजतागायत आहे. पण ब्लॉग मात्र तीन -तीन विषयाचे निर्माण करणे मला झेपाणेसे झाले.अशावेळी ब्लॉग करण्यासाठी प्रविण भिकाले,करण बायस ,पवन खरात,नरेश बदनाळे जोडले गेले.त्याच बरोबर बालाजी सानप,मयुरी देवकर,जयश्री,संगीता देशमुख,जयंत जाधव,सीमाली भाटकर विषयाचे संकलन आणि ग्रुप नियंत्रण साठी जोडले गेले.काही महिन्यांपूर्वी शिरीष उमरे अर्थात शिरिषदा आम्हांला जोडले गेले अन ग्रुप नियंत्रण ,संकलन,फेसबुक पेज,तसेच काही काळ शांत व संथ गतीने चाललेल्या ग्रुपला ऊर्जा त्यांनी दिली.ते आपण पाहतच आहात.यातील काही ऍडमिन काही काळापुरते थांबले.काहींनी वेळेअभावी जबाबदारी पार पाडताना कसरत होते म्हणून ऍडमिन पद रिकामे केले.आम्ही ऍडमिन फक्त टीमपुरते उरलो नाही.तर ते एक आमचे कधीही एकमेकांना न भेटलेले पण जिव्हाळ्याचे, वादविवादाचे कुटुंब झाले आहे.ग्रुप नियंत्रण करताना आपल्याला दोघे-तिघे दिसतात.पण पडद्यामागे खुपजण निस्वार्थ भावनेने,आपल्या कामातून वेळ काढत ग्रुप चालवत आहेत.ही सारी माणसं आपली आहेत.म्हणून आभार नाही.आम्ही एकमेकांच्या ऋणात आहोत.
        *४-वि* म्हणजे *1.विद्यार्थी 2.विवेक 3.विनय 4.विरजा* हे चार मिळवून विचार(वि४) तयार केला.याचे नावापुरते ग्रुपला स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत आम्ही कधीच पडलो नाही.नकळतपणे ते सत्यात कसे आणता येईल याचा प्रयत्न ठेवला.काही मित्र मला म्हणाले ,तुम्ही या ग्रुपच्या माध्यमातून विचाराचा जागर,प्रहार करता जरा कृती पण करा.आपण सर्व जिथे-जिथे आहोत तिथे कार्य  करत आहोत.त्याच्यात सत्य,प्रामाणिकपणा भरलेला असेल तर अजून जगाला दाखवायचे म्हणून काहीतरी करायचे .हे बरोबर नाही.पण येथे होणाऱ्या विषयाचे विचार वाचून काहींनी कृती सुद्धा केली.मला वाटतं ग्रुपचे सदस्य सिद्धेश्वर गाडे हे असतील कदाचित.त्यांनी मराठी शाळेवरच्या एक विषयाचे विचार वाचून,त्यातून बोध घेऊन गावच्या शाळेतील सुधारणेसाठी पाठपुरावा केला अन त्यात त्यांना यशही मिळाले.असं त्यांनी मला अभिप्राय दिला होता.असे चांगले कृतिशील अनुभव आले.तर काही नकारात्मक बाबीसुध्दा घडल्या.आमच्या टीममधील काही ऍडमिन तरुणींना चुकीचे मॅसेज टाकुन त्रास देण्याचा प्रयत्न केला.आम्ही वेळीच ते रोखण्याचाही प्रयत्न केला.एक जणाला आम्ही ग्रुपचे नियम मोडले म्हणून रिमोव्ह केले तर त्याने रिमोव्ह का केले म्हणून मारण्याची धमकी दिली.टीमच्या व्यक्तिरिक्त कोणाला हे सांगितले नाही.तसेच पुरोगामी संबंधित,सरकार विरोधातातील काही पोस्ट फेसबुकपेजवरून आपोआप डिलीट केल्या गेल्या जात होत्या.काही असे अनुभव आहेत.जे व्हॉट्सअप सारख्या ग्रुपसंबंधी अनुभवायला मिळतील. असा एवढा विचारही केला नव्हता.
  हा ग्रुप टिकला,टिकवला त्याचे कारण एकच नियम.ते मोडण्यासाठी आम्ही बनवलेच नाहीत.ग्रुपमध्ये काहीही विषयांतर टाकले की आम्ही सरळ रिमोव्ह करत आलो.कित्येक वेळा खूप जवळचा मित्र आहे म्हणून कधीच सवलत दिली नाही.नियमांमध्ये मराठी भाषा इंग्रजी लिपीत न लिहिता देवनागरी लिपीत लिहावी ,असा अट्टहास केला.आपोआप संबंधित सदस्यांकडून मराठी भाषेचे संवर्धन होऊ लागले.अन त्यांचे सोशल मीडियावर मराठी लिखाणही सुधारू लागले.लिखाण न करणाऱ्याला रिमोव्ह करू असा नियम बनवला आहे .पण हाच नियम फक्त खूपदा काटेकोर पाळला नाही.पण यातील कुणी चुकीचा मॅसेज टाकला की रिमोव्ह करत होतो.भावनिकतेपेक्षा कर्तव्यनिष्ठतेला आम्ही प्राधान्य देत राहिलो.त्यामुळे काही जवळच्या व्यक्ती नाराजही झाल्या.पण त्यांनी वेळोवेळी समजून घेतले.
       काही महिन्यांपूर्वी मी 🌱वि४🌿ग्रुपला कामामुळे वेळ देत  नव्हतो.तर खूपवेळा आपण आता ग्रुप चालवण्याचे थांबवावे असा विचार इतर ऍडमिनना मी सांगितला.एकदा तर सदस्यांचा प्रतिसाद कमी झाल्याने 🌱वि४🌿 हे एक मढे झाले आहे.आपण कुठपर्यंत त्याचे राखण करायचे.असा शब्दप्रयोग केला.ऍडमिन टीमने समजूत काढून 🌱वि४🌿ची गाडी नीटपणे पुन्हा रुळावर आणली.आताही आमच्यातल्या खुपजणांना वेळ नसतो पण नव्या -जुन्या लेखकांचे अधिक चांगले लिखाण वाचायला मिळेल.अडकत-अडकत लिखाण करणाऱ्याचे व्यासपीठ बंद पडेल.जोडली गेलेली सर्व सदस्य-ऍडमिन पुन्हा विखुरली जातील.या विचाराने🌱वि४🌿ग्रुप आम्हांला वेळ काढण्यासाठी प्रेरणा देत राहतो.
   आमच्या टीममध्ये सर्व पक्षाचे,विचारधारेचे लोक आहेत.पण विषय निवडताना सर्वानी कधीच हाच विषय घ्या किंवा ग्रुपवर तो लादण्याचा प्रयत्न केला नाही.सर्व काही लोकशाही मार्गाने काम करत आहोत.आता विषय निवड ग्रुपवरच्या सदस्यांकडे सोपविले आहे.त्यामुळे इथे एक थोडे प्रत्येक आठवड्याला कोणते विषय द्यायचे हे टेंशन कमी झाले.
  आता पुढे काय?असा प्रश्न पडतो तेव्हा विचारबरोबर ग्रुपने कृती करावी का!असं वाटतं.पण आमच्यातले एकही एका ठिकाणचे नाही .प्रत्येकजण वेगवेगळ्या जिल्ह्यातले आहे.तर काहीजण आमच्यातले कामानिमित्त राज्याबाहेर आहेत.सर्व एकत्र येण्याची तारीख अद्यापतरी जमवता आली नाही.जे ऑनलाइन शक्य आहे ते करतो आहोत.एक मराठी साहित्यातील परंपरा म्हणून ऑनलाइन दिवाळी अंकाची भर टाकत आहोत .वेळेअभावी ठराविक सदस्यांकडून लेख घेत आहोत.ते कितपत यशस्वी ठरेल.हे आपण जाणालाच.
  ग्रुपमध्ये सर्व क्षेत्रातील लोक आहेत.त्यात विध्यार्थी, शिक्षक, कामगार, लेखक,सामाजिक संस्थाचालक, सरकारी अधिकारी,पत्रकार,डॉक्टर,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, असे विविध क्षेत्रातले मिश्रण असलेली भेळ तयार झाली आहे.या साहित्यरूपी भेळीचा आस्वाद लिहायला,मत व्यक्त करणाऱ्या महाराष्ट्रातील युवक-युवतींना होत राहावा.पुन्हा एकदा ग्रुपमधील सर्व सदस्यांचे व्हॉट्सअपचा विधायक वापर करण्यासाठी खारीचा वाटा उचलला त्याबद्दल खूप खूप आभार...तुमच्याशिवाय हा प्रवास अपूर्णच राहिला असता...

 *ही वाट अशीच दूर जावी न संपणाऱ्या प्रवासासाठी.....*
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~

 प्रमोद पांचाळ धर्मापुरी ता परळी  जिल्हा बीड
       वि४ ह्या ग्रुप वर मला येऊन खुप दिवस झाले नाहीत तरी पण मला जे अनुभव आले आहेत ते मी सांगेल
वि४ हा ग्रुप काही साध्या वेक्तिनि भरलेला नाही  इथे एका पेक्षा एक विद्वान मंडळी आहे व आपले विचार ते आशे मांडतात की त्या विचारावर त्या वाचकाने काहीना काही तरी विचार करावा म्हणण्या पेक्षा त्याने विचार करावाच लागेल  आशे विचार असतात
     सर्व मंडळी चे मी आभार मानतो कारण माझी वाचनाची सवय मोडली होती पण ह्या ग्रुप च्या साहाय्याने मला परत वाचनाची सवय लागली आहे
     मी रोज रात्री 8:30 ते सरासरी 10 पर्यंत आपले सर्वाचे विचार  वाचतो मला आपले विचार वाचनाची ओढ लागली आहे मी लिहिण्या पेक्षा वाचनातच मला रस वाढत जात आहे पण त्याच बरोबर लिखान करायची इच्छा पण होत आहे
       मी आभारी आहे वि४ ग्रुपचा मला आपण आपल्या बरोबर आणल्या बदल

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अनिल गोडबोले,सोलापूर.
     विचार विषयी लेखन करताना फार विचार करावा लागत नाही. पण तरीही आठवत होतो.. कधी, कुठून सुरुवात झाली... आणि मला सुरुवातच आठवेना.. एवढा मी एकरूप झालो.
    तर गम्मत अशी आहे की.. लेखन करावं असं मला वाटत होत. मी कॉलेजला असताना कविता करायला आवडायचं(माझ्या कविता बाकीच्यांना सोडा.. जिच्यासाठी केल्या होत्या तिला ही सांगणं झालं नाही.. हा भाग वेगळा)..
पण लिखाण करावं हे मनात होत. फेसबुक वर ग्रुपवर लिहीत होतो. सोशल वर्कर म्हणून किंवा सोशल वर्क या विषयाचा शिक्षक म्हणून मला सामाजिक विषयावर लिखाण करावयाचे होते. पण तसा प्रसंग फार काही येत नव्हता.

माझा एक विद्यार्थी आहे. त्याने 'युवाशक्ती' नावाचा एक ग्रुप तयार केला आहे, आणि मला त्या ग्रुपमध्ये त्याने घेतलं होतं. त्या ग्रुपवर सौदागर यांची विचार ग्रुपची लिंक आली होती. लिखाण करण्याची हौस होतीच.. लगेच जॉईन झालो.

वेळोवेळी लेख लिहीत गेलो.. मला जसे जमेल तसे.. विषय सुचवत गेलो.. मला अडमिंन टीम वर घेण्यात आले व मी अडमिंन म्हणून गोंधळ घालू लागलो.

ते आधारस्तंभ वगैरे म्हणतात.. पण मला मात्र तसे वाटत नाही. मला खर तर या सगळ्याच कौतुक वाटत. सौदागरजी ब्लॉग लिहितात आणि त्यातून प्रेरणा घेऊन हे सर्व सुरू झाले..

कौतुक खरच खूप आहे कारण मराठी साहित्य आणि मराठी माणसाचे विचार याला बाजारात काहीही किंमत नसताना असा विचार करून असा ग्रुप तयार करणे, नियम करणे, संकलन करणे, ब्लॉग तयार करणे, विविध विषयावर चर्चा करणे.. अशी बरीच काम ही टीम करत आहे.

मला मात्र यातील काहीच येत नाही, हे मी अगदी मनापासून मान्य करतो. एकही व्यक्ती मला वैयक्तिक भेटलेला नाही. प्रवीण जी मात्र मला बोलवत असतात सोलापूरला आल्यावर... पण मलाच वेळ मिळत नाही..

एकदा भेटू सगळ्यांना.. तेवढाच माझ्या सारख्या पुंडलिकाला पांडुरंग भेटल्यासारखे वाटेल..

एकमेकांना न भेटता मोबाईल च्या माध्यमातून लोकांना व्यक्त करायला भाग पाडणं.. ही साधी गोष्ट नाही. मी वारंवार सांगतो त्या प्रमाणे... यातील एकही व्यक्ती एक रुपया देखील पगार न घेता अतिशय गुणवत्ता पूर्ण काम करत असतात..

मूळ याच श्रेय सौदागर जी याना असलं तरी बाकीचे फॅमिली मेम्बर भेटले. नरेशजी, पवनजी, करणजी ब्लॉग निर्मितीच काम करत असतात.. फार तांत्रिक आणि गुंतागुंतीचे काम आहे ते..!

पण सर्वजण लीलया ते पार पाडतात. वैशाली जी , मयुरीजी, संगीता जी आणि सीमाली जी यांचे योगदान देखील वाखाणण्याजोगे आहे. महिलांची संख्या अडमिंन टीम मध्ये कमी असली तरी कामामध्ये मात्र कोणीही कमी नाही.

मला आपला.. एक आनंद फुकटचा.. वर्गात मॉनिटर असल्यासारखा सगळ्यांना नियम शिकवत असतो. मुळात 'गोडबोले' असल्यामुळे चांगलं काही पटकन नाही दिसलं।तरी चुकीच काहीतरी पटकन दिसत (शिक्षक असण्याचे तोटे)

पण एक मात्र आहे. जे काही आहे ते प्रामाणिकपणे लिहिण्याचा प्रयत्न करतो. वाईट बरे अनुभव आणि समाज कार्यातील विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

बाकी अडमिंन टीम मध्ये असलेले शिरिषजी यांच्या सोबत चर्चा करणे (म्हणजे चर्चा कमी आणि नियम दाखवणे जास्त अशी महत्त्वाची काम (😳🤣) मला असतात.

ग्रुपवर सर्वाना समभाळून घेणं ही तारेवरची कसरत असते. तरी पण माझ्या मुळे काही जणांना त्रास झाला असेल तर मनापासून त्यांची माफी मागतो.

वाचक आणि लेखक वाढवणे हा उद्देश हा ग्रुप पूर्ण करत आहे.. हा माझा।विश्वास आहे. मराठी भाषा ही नक्कीच अभिजात साहित्य निर्मिती करू शकते यावर माझा ठाम विश्वास आहे.

तरीदेखील.. आपल्याकडे काहीजण कॉपी पेस्ट करून लेख टाकतात तेव्हा खुप त्रास होतो.
करणं जी ना गुगल वर कळत ते..
शक्यतो सर्वांनी 4 च ओळी का होईना स्वतःच्या लिहाव्यात अशी सदिच्छा आहे.
ग्रुप नियंत्रक म्हणून काम करत असताना काही ठिकाणी 'गोडबोले'असून 'कडू' व्हावं लागतं. कारण नियंत्रकाची भूमिका ही तशीच असते..

शेवटी... मी लिहिताना अतिशय भावनिक होऊन लिहीत आहे.. कारण हे सर्व काही घडू शकत ते सर्व आपल्या सारख्या सदस्यांमुळे..
आपण आमचं वाचन विश्व आणि।विचार विश्व समृद्ध करत आहात. त्यामुळे सर्व सदस्यांना मनापासून मानाचा मुजरा करतो..

लवकरच दिवाळी अंक काढत आहोत. काही दिवसांनी इ साहित्य सारखी वेबसाईट काढू.. एकेदिवशी साहित्य संमेलन देखील घेऊ..(अध्यक्षपदासाठी भांडण देखील करू😁).. अजून काय होईल भविष्यात काही माहीत नाही.. पण हा ग्रुप मात्र चालू राहील याची काळजी नक्कीच घेऊ..

कोणाचाही नामोल्लेख राहिला असेल तर माझ्या विसरभोळ्या स्वभावाचा भाग म्हणून सोडून देणे....

पुनःश्च.. सर्वांचे आभार
धन्यवाद
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************