फेसबुक वरील समाजसेवा



प्रविण, मुंबई

महाराष्ट्राला सामाजिक सुधारकांची फार मोठी परंपरा आहे, अगदी संत ज्ञानेश्वर, तुकारामांपासून ते डॉ दाभोळकर, अण्णा हजारे पर्यंत. या मातीं देशकार्य आणि समाजकार्यात मोलाचा वाटा उचलला आहे. पण त्याच बाजारीकरण मात्र या परंपरेतील नाही. आज फेसबुक वरची समाजसेवा म्हणजे बाजारीकरण आणि कथित सामाजिकबांधिलकीच जाहीर प्रदर्शन झाले आहे. अगदी क्षुल्लक प्रसंगाचे फोटो टाकून कोणावर तरी उपकार केल्याचा आव आणला जातो. काही स्टेटस तर असे भन्नाट असतात का कळताच नाही नेमकं काय म्हणावं  ते "पूरग्रस्तांना मदत केली फीलिंग शोषली रिस्पॉन्सईबाल विथ करण, प्राची अँड 13 अदर्स"
या सोशल मीडिया च्या मायाजालात एक कळलं की फेसबुक कधीच फेस (चेहरा)बुक नव्हतं नाही आणि नसेल
________________________________________


            अभिजीत गोडसे , सातारा

              सामाजिक कार्य हा आपल्याकडे फारसा चर्चेत नसणारा विषय. दरवर्षीचा मॅगसेस पुरस्कार जाहीर झाल्यानंतर थोडीफार आपल्याकडे झालीस तर एक-दोन सामाजिक कार्यकर्त्यांची चर्चा होत राहते. कारण आपल्याला राजकीय गप्पातून सामाजिक गप्पांनकडे यायला मुळात वेळच नसतो.असो..शाहू, फुले , आंबेडकर , आगरकर , अलिकडचे आमटे , हजारे , कोल्हे इ. सामाजिक कार्य करणारी फळी होती / आहे.. शाश्वत विकासाकडे या सर्वांचे लक्ष होते.. आगरकरांनी तर राजकीय सुधारणा ऐवजी अगोदर सामाजिक सुधारणा झाल्याच पाहिजेत हाच मुद्दा रेटून धरला होता.. कारण या सर्वांनी देशहित आणि समाजहित हेच पाहिले आणि पाहत आहेत.. यांची महती पिढ्यानपिढ्या चालूच राहील.
        भारतामध्ये १९९१ नंतर खर्या अर्थाने दूरसंचार क्रांती उदयास आली.. भारत नवीन क्षेत्रांमध्ये चमकू लागला. आत्ता अलीकडे आलेले फेसबुक या माध्यमाने तर निवडणुका कशा जिंकायच्या हेसुद्धा दाखवून दिले.. या माध्यमाचा जेवढा फायदा आहे तेवढा तोटा देखील आहे. संपूर्ण जग या माध्यमाने व्यापले. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत या फेसबुकने प्रत्येकाला जोडले, देशात परदेशात मुखवटा नसणारी माणसं यांचे आचार-विचार चांगल्या वाईट घटना फेसबुकने पादक्रांत केल्या. आणि खऱ्या अर्थानं याच्यामुळे हा फेसबुकचा चव्हाटा चांगलाच फुलला. अलीकडच्या सात-आठ वर्षांमध्ये आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून समाजासाठी काहीतरी केले पाहिजे अशा भावनेने प्रेरित झालेली नवयुवक या फेसबुकच्या वाटेवरून समाजसेवा करू लागले.. कारण कमी कालावधीमध्ये कमी कामांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणजे हा फेसबुक चव्हाटा.. अलीकडच्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना बाबा आमटे कोण आहेत हे देखील माहीत नसेल पण ते फेसबूक वर फार मोठे सामाजिक कार्यकर्ते असतात.. अर्थात स्वयंघोषित देखील.. हे सामाजिक कार्यकर्ते फेसबुक वरील लाईक आणि कमेंट या आभासी माध्यमातून आपण किती थोर सामाजिक कार्यकर्ते आहोत याची त्यांना जाणीव होत राहते.. मागील महिन्यात पूरग्रस्तांना अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी खूपच तळमळीने फेसबुक चव्हाट्यावर मदत केली आहे असो.
       आपल्याकडे समाधानी माणूस कोणाला म्हणावे तर आपली एक ठराविक व्याख्या असते. ज्याच्या कडे गाडी, स्वतःचं घर, चार पैसे  आहेत.म्हणजे तो समाधानी पण त्याच्यापलिकडेही जग आहे हे त्याला आयुष्य संपलं तरी सुद्धा कळत नाही किंवा त्याच्या गावी ही नसते.. तसेच फेसबूक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम त्याच्यापलिकडेही जग आहे. हे अशा माध्यमातील चव्हाट्या मध्ये खेळणाऱ्या आणि त्यातल्या त्यात चव्हाट्यात राहून सामाजिक कार्य कर्त्यांना हे कळायला हवे. नाहीतर या फेसबुकच्या रंगीबेरंगी दुनियेत स्वतःचा बेरंग झालेला कळणार देखील नाही. आणि वयोवृद्ध झाल्यानंतर आपण  वेळ किती घालवला..हे सर्व वर्ष मोजून   त्याचा स्वतःला आणि  समाजाला काही उपयोग देखील होणार नाही.
________________________________________


 अनिल गोडबोले
सोलापूर

समाज सेवा करणे हा आनंदाचा किंवा व्यवसायाचा भाग असू शकतो. आज व्यवसायिक समाज कार्यकर्ते समाजकार्याचे शिक्षण घेऊन काम करत आहेत.

काहीजण इतर सर्व व्यवसाय सोडून समाज कार्यामध्ये भरपूर जण येत आहेत... कारण काय ... तर तयार होणारी समाजातील प्रतिमा आणि  आणि वारेमाप प्रसिद्धी..

समाज सेवा करण्यासाठी निस्वार्थ राहून कार्य करता येईल पण भुकेल्या पोटाने कोणच समाजकार्य करू शकत नाही.. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे व्यक्तिमत्व आता होणे नाही.

तर मुद्धा आहे फेसबुक वरील फोटोचा तो टाकावा किंवा न टाकावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे..

काम करण्याला पैसे मिळतात ही बाब जरी खरी असली तरी.. पैसे मिळण्यासाठी प्रसिद्धी करावी लागते..

पूरग्रस्त मदत करताना आपण पाहिले की सर्वांनी केलेली मदत आपल्याला कळाली..
आता याच्या आड काही लोक... खोटे फोटो किंवा थोड्या कामाची मोठी प्रसिद्धी मिळवून मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतात..

काहीजण खोट्या हृदयद्रावक कथा मांडत असतात हे केल्या मूळे खर काम करणारे मागे पडतात, हे देखील खरे आहे..

पण तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आणि चांगले परिणाम असणारच.. पण खरे आणि खोटे समाज सेवक ओळखल्या शिवाय आपण विश्वास ठेवू नये.

बाकी समाज सेवा करण्यासाठी फेसबुकची गरज नाही, हे सत्य आहे.

एका सुसंस्कृत समाजाचा पाया घडविणारा घटक : शिक्षक


दत्तात्रय तळवडेकर सिधुदुर्ग

       शिक्षक म्हटलं की आपणास    वाटत की सगळा समाज घडविण्याचा ठेका घेतलेला व्यक्ती पण आपण हे विसरून जातो की पालक या नात्याने आपलीही तेवढीच जबाबदारी आहे ती सुसंस्कृत समाज घडविण्याची .असो पण शिक्षक आणि शैक्षणिक धोरण असा विषय हवा होता कारण सुसंस्कृत समाज घडवायचा असेल तर शिक्षकांसोबत शैक्षणिक धोरण ही महत्वाचे आहे पण आज कालच्या राजकर्त्यांनी शिक्षणाचा बाजार केलाय असे खेदाने म्हणावे वाटते  आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय मराठी शाळेतील विध्यार्थी संख्या त्या शाळेतील शिक्षकांपेक्षाही कमी झाली आहे.  आणि त्याव्यतिरिक्त  आपल्या शिक्षकांवर दिलेले अतिरिक्त कामाचा ताण म्हणजे जनगणना, आहार देने हिशोब ठेवणे , निवडणुकीची कामे देने वैगेरे . त्यामुळे शिक्षक आपले मुख्य काम सोडून बाकीच्या कामाकडे लक्ष देऊ लागलेत आणि त्यात मुलांच्या परीक्षाही बंद झाल्यात . मग अश्या अवस्थेत समाज घडेल कसा? आणि तो घडला नाही तर त्यास जबाबदार कोण ? शिक्षक की सरकार ?

–----------------------------------

रुपाली आगलावे,
सांगोला

 शिक्षक म्हणून समाजात वावरताना खरंच एक वेगळीच प्रचीती येते ती म्हणजे नेहमी जबाबदारीची जाणीव होत राहते की, आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य आपल्या हातात आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना एक शिक्षक म्हणून खूप विचार पूर्वक करावी लागते.
      शिक्षकाला सुसंस्कृत समाज घडवायचा एक मूलभूत घटक मानला जातो आणि ते तितकंच खरं आहे... मान्य आहे की समाजातील इतर मंडळींवर पण ती जबाबदारी आहे पण एका शिक्षकाची जबादारी ही जरा जास्त असते मुलाच्या जडणघडणी मध्ये. पण प्रत्येक वेळी एखाद्या मुलाने काही चुकीचं केलं तर त्यावेळी फक्त शिक्षकाला जबाबदार धरण चुकीचं आहे... कोणताच शिक्षक कोणत्याही मुलाला चुकीचं किंवा वाईट मार्गावर जाण्यासाठी कधीच सांगत नसतो... त्यामुळे आशा वेळेस शिक्षकाला वेठीस धरण चुकीचच...
      शाळेत आलेला विध्यार्थी शिक्षकाकडे एका अपेक्षित नजरेने बघत असतो.. आणि ती अपेक्षा पूर्ण करणं ही एक शिक्षक म्हणून प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी आहे... एका मातीच्या गोळ्याला कसा आकार द्यायचा हे त्या शिक्षकावर अवलंबून असत... आणि म्हणूनच एका सुसंस्कृत समाजाचा पाया घडविणारा घटक म्हणून शिक्षकाकडे बघितलं जातं.
--------------------------------------------


   किरण पवार
   औरंगाबाद,
 
             "शिक्षक" या शब्दाला अर्थ आणि भारतीय संस्कृतीत स्थान आपण तितकचं दर्जात देत आलो आहोत आजवर. कारण शिक्षक नाही म्हणजे सरळसरळ दिशाहीन भरकटणं, आणि हे भरकटणं कधीही न संपणार लवकरात लवकर साहजिकच अंताकडे जाणारं असतं. पण सध्या महाराष्ट्रात तरी किमान या शिक्षकावर अन्याय होताणाच दिसतोय. काही ठिकाणी एकीकडे शिक्षक बिनपगारी मुलांना शिकवून स्वत:च पोट भागवण्याकरता भाजी विकत आहेत तर कुणी अंड्याचा व्यवसाय करत आहे. खरतर शिक्षकभरती आणि रखडलेली प्रक्रिया एकदाची आत्ताकुठे मार्गी येऊ पाहतेय पण त्यातही सरकारची संथ गती चालूच असल्याचं निदर्शनास येतय.
            काही शिक्षकांना परिस्थितीपुढे हतबल व्हावं लागलं तर काही शिक्षकांनी नव्या प्रयोगांना राबवून समाजापुढे नवे आदर्श निर्माण केल्याच आज पहायला मिळतयं. एका ठिकाणी शिक्षकांनी नक्षलवाद्यांना दररोजच्या विश्वास संपादनातून सध्याच्या राहणीमानात आणून ठेवल. ही मोठी गोष्ट नक्कीच म्हणावी लागेल. आजवर ज्या शिक्षकांनी स्वावलंबनाचे विद्यार्थ्यांना केवळ धडेच दिले त्यांनीदेखील यावेळी स्वत: स्वावलंबनत्वाचे तीव्र धोरण हाती घेतल्याच पहायला मिळालं. पण एकूणच सारासार विचार करता शिक्षकांवर जी काही सध्याची वाईट परिस्थिती ओढावली आहे त्याला कुठेतरी सरकार जबाबदार आहे, हे मात्र निश्चित. बाकी शिक्षकांबद्दल मनात आदर व प्रेम कायम राहिल; एवढं नक्की.
धन्यवाद!

गणपती उत्सव..आनंदाचा उत्सव..

 गणपती उत्सव..आनंदाचा उत्सव..


अनिल गोडबोले, सोलापूर

सगळेच उत्सव आपल्याला प्रिय असतात परंतु गणेशोत्सव मात्र अत्यंत मनापासून वेगळा उत्सव वाट
तो कारण, हा उत्सव नसून मराठी माणसाची जगण्याची रीत आहे असे मला वाटते

मला आठवतो तो कोकणातला गणेशोत्सव, घरातील गणपती, दीड दिवस ते 11 दिवस वातावरण निर्माण व्हायचं ना... ते पुढच्या वर्षी पर्यंत जगण्याला बळ द्यायचं.

लहान पणी जेवढा आनंद होत असे तेवढा आनंद आता देखील होत असतो. तुम्ही कोणीही असा पण वातावरण मात्र तुम्हाला मरगळ झटकायला मदत करते.

आता गावी गणपतीला जाणे होते. खर तर सर्वाना भेटायला मिळणार या आनंदाने जावे लागते.
सगळे मुंबईकर गावाकडे येतात.. भजन आरती चालू असतात.

गावाकडे गणपती आणल्या पासून विसर्जन करेपर्यंत जे वातावरण असते ते काही निराळेच असते.

गावाकडे एखादी म्हातारी विचारते, " झीला, बरो आसय मा. नोकरी काम बरा चालला ना. चांगला होयत रे बाबा तुझा. आवशी बापाशी चा नाव काढशीत  , सगळा चांगला होतला." हे ऐकून मनाला उमेद येते.

भजन आणि आरती करण्यासाठी घरोघरी रात्री उत्साहाने फिरतात मुलं.

नवी उर्मी येते आणि मंत्र मुग्ध करून जाते. तुम्ही कोणीही असा, आस्तिक, नास्तिक, विचित्र, चमत्कारिक, प्राकृतिक... तुम्हाला गणेशोत्सव अवडणारच... कारण बालपण तिथे फिरत असते ना.

आज जरा बदलत आहे सगळं.
वातावरण, प्रदूषण, नको असलेल्या चाली रीती या मात्र बदलत नाहीत.
थोडं कालानुरूप बदललो तर अजून मजा येईल...

तर सर्वाना जगण्याचे बळ देणारा गणेशोत्सव सर्वांच्या घरात साजरा होवो, ही सदिच्छा
*---------------------------------------------*

संगीता देशमुख,वसमत

         हिंदूंच्या अनेक सण उत्सवापैकी गणेशोत्सव हा एक महत्वाचा आणि चैतन्यदायी सण असतो.यात  विशेष बाब म्हणजे सेलेब्रिटी  हा उत्सव सर्वधर्मसमभावाने साजरा करतात.  महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणूनही गणेशाचा उल्लेख होतो. श्रध्दा आणि अंधश्रद्धा यापलीकडे जाऊन निर्गुण निर्विकार अशा एका प्रतिकाचे हे पूजन वाटते.  यात गणेशाची निर्मिती,त्यामागची मिथके हे सर्व जर पाहिले तर हे पूजन निरर्थक वाटते. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात एका विशिष्ट हेतूने भारतीयांना एकत्र आणण्याचा जो उद्देश होता तो महत्वाचा आहे. आज भारताला स्वातंत्र्य असले तरी काळानुसार आजही ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी भारतीयांना एकत्र येणे आणि संविधानात्मक कार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण आज अशा सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपयोग करू शकतो. परंतु आजची तरुण पिढी ही मात्र दिशाहिन आहे. या उत्सवाला आलेला भडकपणा,सवंगपणा जास्त प्रभावी झालेला आहे. त्यातून शांतता व सुरक्षिता व्यवस्थापन यावर पडणारा ताण,कर्णकर्कश आवाजातून होणारे प्रदूषण व आबालवृध्दांवर होणारे दुष्परिणाम,जनतेकडून होणारी  वर्गणीतून लूट,प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांतून होणारे जलप्रदूषण,हे सर्व पहाता आजचा गणेशोत्सव हा आनंददायी वाटत नसून तो तापदायक वाटायला लागला आहे. आजच्या तरुणांनी थोडे औचित्यपूर्ण व विवेकाने साजरा करायचे ठरवले तर हा उत्सव नक्कीच आनंददायी वाटेल.
*---------------------------------------------*

दत्तात्रय तळवडेकर,सिंधुदुर्ग

 आमच्या कोकणात गणपती उत्सव जोरात साजरा केला जातो.  पण हा उत्सव  आला की मला भीती ही तेवढीच वाटते कारण हा उत्सव खरा सुरू झाला तो लोकांना एकत्र आणायला पण यावेळी मात्र भजनी मंडळातील ग्रुप बाजी जोरदार दिसते आणि वाडीतील हेवेदावे सुद्धा  यातही सात्विक भावना न राहता यात सुरू होत ते राजकारण.
        आपण या उत्सवासाठी खूप पैसे खर्च करतो पण मला वाटत एक गाव एक गणपती ही चांगली संकल्पना आहे ती जर अमलात आली तर या उत्सवा साठी होणार खर्च सुद्धा गावातील गरीब  व होतकरू याना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी केला तर दरवर्षी जरी 1 कुटुंब उभं राहिलं तरी या उत्सवात आणखी आनंदाची भर पडेल . काही  चुकलं असेल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा .
*---------------------------------------------*


पी.प्रशांतकुमार सावेडी,अहमदनगर

.. मला वाटत ..वरच्या विषयाच्या पुढे एक प्रश्न चिन्ह हवं होतं..
...आजही घरगुती गणेशोत्सव म्हणजे प्रचंड आनंद आहे.. आता आमच्याकडचच पहा ना.. देव देव न करणारा मी पण मुलीला हौसेनं शाडू माती आणून देणार.. तिच्या चित्रकलेचा,शिल्पकलेचा श्री गणेशाच तीने गणेश मूर्ती बनवून केलाय.. ह्यावर्षी असा गणपती बनवायचा हे ठरवणार (फक्त ठरवायचा पण शेवटी तो वेगळाच होतो) ... त्याचे रंग त्यासाठी सजावट ती धावपळ.. सगळी मजा
... त्यात आपण देशावरचे त्यामुळे चुकत माकत मोदक करायचे..
सगळी मजा... मजाच मजा
पण हा झाला एक भाग आता त्याचा दुसरा पैलू म्हणजे सार्वजनिक उत्सव..
दुर्दैवाने आपल्याकडे सर्व धर्मियांचे सार्वजनिक उत्सव हे सार्वजनिक उच्छाद झाले आहेत..
DJ डॉल्बी आणि ढोल-ताशांचा दणदणाट..
त्यातही पूर्वी कातडी ढोल होते ते जाऊन कर्कश वाजणारे प्लास्टिक सदृश्य मटेरियल चे ढोल असतात.. त्या गोंगाटाने डोकं उठणाऱ्या आवाजात ज्याला सौंदर्य दिसत तो काय त्याला पिंडात ब्रह्मांड दिसेल..
'मद्य' आणि 'वाद्य' ह्या दोन 'द्य' चा उन्मात नसेल तर सर्वच कार्यक्रम सहज सुन्दर लोकांना त्रास न देणारे होवून वेळेवर संपतात ..... पण सद्य परिस्थितीत असे बोलणे हे निंद्य मानले जाते.
एकेकाळी समाजप्रबोधन आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची रेलचेल असे गणपतीत पण आता निव्वळ भावी राजकारणासाठी एक मंच बस एव्हडच आहे..
... मला मित्र म्हणाला..असा विचार कसा करतो चांगलं काम करणारी पण सार्वजनिक मंडळ आहेतच ना..
हो असतील ना पण एक तर ते आमच्या जवळ नाही आणि त्यांची संख्या इतकी इतकी तुटपुंजी आहे की उपयोगही नाही..
आमचा एक मित्र पोलीस आहे तो म्हणतो गणेशचतुर्थी जवळ आली की पोटातच गोळा येतो..कधी विसर्जन होतं असं होत .. 10-12 दिवस कुठेही झोपा,काहीही खा अंघोळ प्रतिर्विधी ते विचारूच नका :(
... आजूबाजूला अस चित्र दिसत ना तेव्हा आनंदाचा उत्सव अस म्हणताना जीभ चाचरते..
... एका tv वाहिनीवर ऐकलं भारतीय समाज हा उत्सवप्रिय समाज आहे.. मला वाटत आपण अतिरेक प्रिय समाज आहेत आपल्याला कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करायला प्रचंड आवडत आणि मग अराजकतेकडे वाटचाल होते... जस की 15 ऑगस्ट ला तरुणांचे जथ्थे ट्रिपल सीट बसून त्यातले काही अतिउत्साही चालू गाडीवर उभे राहत कर्कश हॉर्न वाजवत सिग्नल वगैरे मोडत वेगाने जाताना दिसतात .. सिग्नलवर गाडी थांबलेली आणि पोरगी विचारते 'पप्पा ते कोण', म्हणावंसं वाटत ते दिखाऊ आणि आपण खरे देशप्रेमी. पण अस न म्हणता तिला म्हणतो अरे लहान आहेत त्यांना समजत नाही अजून
.
तेव्हा हे बुद्धीच्या देवा गणराया आम्हा सर्वांना समज दे.. चांगलं नागरिक होण्याची बुद्धी दे ...
*----------------------------------------------*

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************