विचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अमृत महोत्सवी आठवड्याच्या निमित्ताने... *माझ्या विचार समूहाकडून असलेल्या अपेक्षा*

*🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप*
📄 *आठवडा 7⃣5⃣वा* 📝
*अमृत महोत्सवी आठवडा*
🖊🖋✒🖌🖍✏🖋✒✍📖
 *14 एप्रिल 2019 ते 20 एप्रिल 2019*
💐🎊💐🎊💐🎊💐🎊💐🎊💐

अमृत महोत्सवी आठवड्याच्या निमित्ताने... *माझ्या विचार समूहाकडून असलेल्या अपेक्षा*


किरण पवार ,औरंगाबाद

वि४ ग्रुप म्हणजे नक्कीच एक आगळावेगळा आणि खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर करायला शिकवणारा ग्रुप आहे. आज समुहात असलेले वा नसलेले इतर व्यक्ती असतील ते एकमेकांच्या विचारांच्या देवाणघेवाणाने नक्कीच स्वत:त ज्ञानाची आणि विशेषत: जागृकतेची भर पाडत आले. मला नेमका दिवस आठवत नाही मी कधी इथे जॉईन झालो. पण ज्यादिवसापासून इथे आहे त्यादिवसापासून नक्कीच थोडाफार का असेना पण बदललो. मला लेख लिहायची पूर्वीपासून आवड होतीच परंतु काही विषयांबाबत मर्यादित माहिती असायची किंवा ती पूर्णत: नसायचीच. या ग्रुपने वैचारिक तारतम्य तर दिलचं शिवाय अजूनही भरपूर गोष्टी दिल्या त्या म्हणजे माझ्या लेखांमधे दिवसेंदिवस भर पडत गेली. बऱ्याचदा ग्रुपवर अनेक विषय लिहायचे सुटले पण ते सुटलेले विषयही जमा करून लिहण्यासाठी नंतर वेळ काढून लिहले. लेख समोरच्याला उद्देशून सांगायला अथवा पूर्णत: टिकात्मक असा काही वि४ माझ्या मनात नसतो. मी जेव्हा योग्य लेख लिहू शकतो तेव्हा मी स्वत:ची बुद्धी तपासत असतो. ज्या दिवशी स्वत:ला जाणवत नाही की, योग्य लिहलयं तेव्हा पुन्हा माझं वाचण सुरू होतं. असो.
           आता मुळ मुद्यावर येतो. वि4 समुहाकडून माझ्या असलेल्या अपेक्षा म्हणजे, समुहाने घडवलेल्या विविधांगी विचारांची ही पिढी पुढच्या पिढीसाठी काहीतरी अमुल्य ठेवा आणि शिकवण देऊन जाणारी असावी. इथल्या सुजाण नागरिकत्वाच मुल्य कायम जपून रहावं. साहित्यिकाला केवळ लिखाणातलं मर्यादित लिहीणचं नाही तर सामाजिकतेकडेही त्याच भान असावं. कारण साहित्यिक लिखाणातून एक वेगळी चळवळ एखाद्या अन्यायाविरूद्ध स्थापित करू शकतो, याची बरीच उदाहरण इतिहासात आपल्याला पहायला मिळतात. त्याचबरोबर समुहातल्या काही मंडळींनी किमान पंधरा मिनीटे वेळ काढून दिलेल्या विषयांबाबत आलेल्या लेखांवर मत मांडत जावे. आणि शक्यतो जमल्यास लिखाणही करावं. धन्यवाद!
*=============================*

वाल्मीक फड,निफाड ,नाशिक

अनेक दिवसापासून मनात एक प्रबळ इच्छा होती की,काहीतरी लिहावं पण आपण तर पडलो अल्पशिक्षीत आपण काय लिहीणार?ह्याचं मुख्य कारण म्हणजे मी जर एखादे पुस्तक वाचायला घेतले आणी त्यावर लेखकाचे नाव वाचले तर त्यांच्या नावापुढे प्रोफेसर,डाॕक्टर किंवा इतर त्यांच्या शिक्षणाचा उल्लेख असायच्या त्यामुळे मनाला एक हळहळ असायची कि आपण काय लिहीणार आहोत यांच्यासारखे.परंतु माझा पुतण्या सचीनकडून मला वि४ समूहाबद्दल माहीती मिळाली.मग काय मला तर आकाश ठेंगणे झाले आणी मी समूहात सामील झालो.
तसं मी सातवीत असताना सात आठ कविता केल्या होत्या त्यातिल दोन मी समूहावर टाकल्या पण होत्या नववीत असताना मी दोन नाटके लिहून ती नाटके शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात स्वता कलाकार होऊन सादर पण केली आणी भरपूर प्रमाणात दादही मिळाली होती.
खरं ह्या समूह तयार करण्याचा विचार ज्या महानुभवाच्या डोक्यात आला त्यांचे मनापासून आभार मानतो.कारण हा समूह मला मिळाला नसता तर कदाचित मी माझे विचार आपणापर्यंत पोहचवू शकलो नसतो आणी तुमचे पण चांगले विचार मला अनुभवायला मिळाले नसते.व्याकरणाची इतकी जाण नसताना आपण मला वाचता आहात यातच मला धन्यता वाटते.
समूहाकडून अपेक्षा इतकीच आपणासारखे उच्चशिक्षण घेतलेले नाही म्हणून तुमचे सुंदर विचार वाचण्यास मिळावे हिच प्रेमळ अपेक्षा.जय हिंद .वंदे मातरम्.
*=============================*

संगीता देशमुख,वसमत

            मला या समूहात येवून जवळपास एक वर्ष होत आले. समूहात कोणीही ओळखीचे नव्हते. अक्षय पतंगे यांनी या समूहात मला घेतले. समूहाचे शीर्षक पाहून समूहाचे वेगळेपण आणि गुणवत्ता कळाली. या समूहात काही अनुभवी लोकांसोबतच अगदी नवीन तरुण पिढी असल्याने आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव यांना आहे. लवकरच माझ्यावर ॲडमिनपदाचीही जबाबदारी टाकण्यात आली. फार धडाडीने मी ही जबाबदारी पार पाडत नसले तरी पूर्णत: निष्क्रियही नसते. आणि हीच अपेक्षा मी या समूहाच्या अमृतामहोत्सवी आठवड्यानिमित्त करते. असं म्हणतात की, "ये दुनिया इसलिए बुरी नही के यहाँ बुरे लोग ज्यादा है।

बल्कि इसलिए बुरी है कि यहाँ अच्छे लोग खामोश है…." याप्रमाणे तरुणांनी आजूबाजूला काय घडत आहे,यावर व्यक्त व्हायलाच हवं. त्याशिवाय त्यांना त्यांच्या कल्पनेतील भारत कसा पहाता येईल? देशाचा भावी आधारस्तंभ म्हणून माझे हेच कर्तव्य आहे. म्हणूनच समूहातील लोकांनी व्यक्त व्हावं म्हणून आपल्याला ते वारंवार प्रोत्साहीत करीत असतात. दररोज विषय बॅंक टाकून आवर्जून आठवण करून देतात. खरच काही जणांची हा समूह अतिशय उत्कृष्टरित्या कसा चालेल याची सर्वतोपरी धडपड चालू असताना मात्र बरेचसे सदस्य हे लेख वाचतात की नाही,हेही कळायला मार्ग नाही. या समूहात २५२ सदस्य आहेत. आणि ज्याअर्थी आपण व्हाटसॅप वापरतो त्याअर्थी मला वाटते,दिलेल्या विषयावर किमान चारपाच ओळी ह्या प्रत्येकाला लिहिता यायलाच हव्यात. कारण माझी ही अपेक्षा फार अवास्तव आहे,असं वाटत नाही. २५२ सदस्य आहेत म्हटल्यावर दर आठवड्याला किमान १००-१५० लेख हे यायलाच हवेत. काही वेळा आपल्याला हे विषय कठीण वाटत असतील तर आपण आपल्या पध्दतीने विषय सुचवायला हवेत. पण इतक्या संवेदनशील समूहात विचारविमर्श व्हायलाच हवा. मला वाटते,विचार करणे हे मानवाचे आणि विशेषतः जिवंतपणाचे लक्षण आहे. आणि आपल्या समूहाचे नावच आहे "वि४"! या अमृतमहोत्सवी "वि ४" समूहात विचार व्हायला हवा आणि तो व्यक्त व्हायला हवा,ही मी अपेक्षा करते.
*=============================*

अनिल गोडबोले,सोलापूर

एक विचार.. कोणालाही न भेटता 75 आठवडे सतत मराठी साठी काम करतो आणि ते देखील मोठे लेखक नसताना... त्यामुळे सर्वात पहिल्यांदा सर्वांना "अमृत महोत्सवी आठवड्यानिमित्ताने शुभेच्छा"

विचार ग्रुप चालत आहे मध्येच जोरात कधी हळू... पण थांबणार निश्चित नाही.. त्यामुळे माझ्या सर्व अडमीन सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन.!

सर्व सदस्य जे लिहितात, वाचतात त्या सर्वांचे देखील अभिनंदन.!

अपेक्षा म्हणाल तर फार माफक आहेत.
1. 257 सर्व सदस्यांनी सर्वच्या सर्व म्हणजे 3ही विषयावर एकतरी आठवड्यात लिहावे.
771 लेख....!

2. उदासीन लोकांना लिहिण्याची आणि वाचनाची गोडी लागली पाहिजे.

3. या नंतर एक विशेषांक काढावा आणि दिवाळी अंक.. भरपूर साहित्य घेऊन..!

4. एखादं संमेलन व्हावं सर्व विचार लेखक सदस्यांचे.. (त्याला बऱ्याच गोष्टी लागतील याची कल्पना आहे)

5. 100 वा आठवडा अजून काहीतरी वेगळं आणि भव्यदिव्य व्हायला पाहिजे.

6. नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून इतर प्रस्थापित साहित्यिक अभिमानाने उदाहरण देतील.

7. येणाऱ्या युगातील फार मोठी मराठी साहित्य संवर्धनासाठी चळवळ होऊन नवीनच इतिहास घडेल. मराठी अभिजात दर्जा मिळवेलच... आणि जगात सर्व मान्य भाषा होईल यात कोणतीही शंका राहणार नाही..


भरपूर अपेक्षा झाल्या.. त्या पूर्ण होवोत हीच एक मोठी अपेक्षा आणि सदिच्छा व पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद..!!
*=============================*

सौदागर काळे,पंढरपूर

आता वि४ बघता बघता ७५ आठवद्याचा होतो आहे. जवळपास दीड वर्षांचा.या दीड वर्षात २२५ च्या आसपास विषय चर्चेला घेतले.ते आपण वेळ मिळाल्यास ब्लॉगवरही पाहू शकता.वि४ ग्रुप कसा आकाराला आला .हे अगोदर सांगितले आहे.ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज वाटत नाही.आपला ग्रुप सतत बदलत राहिला आहे. प्रवाहासारखा.त्यात तुमच्यासारखे वाचक-लेखक चिऊच्या गोष्टीसारखं चोचीत जेवढं पाणी बसेल तेवढं मराठी साहित्याच्या माठात टाकत आला आहात. पण आपल्या घरातील पाण्याचा माठ नुसता भरून ठेवून त्याचे पिण्यासाठी वापर नाही झाला तर काही दिवसानंतर तो पिण्यायोग्य राहत नाही.ते पाणी शिळं झालं म्हणून आपण बदलतो.त्याप्रमाणे वि४ वर अनेक जण लिहीत आहेत.ते फेसबुक पेज,ब्लॉगवर इतरांना वाचण्यासाठी पोहोचावे म्हणून आपली ऍडमिंन टीम निस्वार्थ हेतूने वेळ काढून योगदान देत असते.या आपल्या ऍडमिंन टीमला वि४ सेवक म्हटले तर वावगे वाटणार नाही.अशा वि४ सारख्या माठात आपण विविधांगी विचारांचे पाणी भरतो.ते पाणी आपण पिण्यासाठी नाही वापरले तर तो माठ भरण्याचा काय उपयोग?अशावेळी ७५ आठवडे झाले!दीड वर्ष झाले!२२५ विषय चर्चेला घेतले!असा पोकळ अभिमान आपण प्रत्येक वेळी मिरवल्यासारखे होईल.म्हणून हा वि४ चा माठ रोज भरावा ,रोज वाचकांनी वाचून रिकामा करावा.
आता माझ्या विचार समूहाकडून असलेल्या अपेक्षाबद्दल:

१.ग्रुपमधील जुन्या लेखकांनी वेळ काढून लिहीत रहावे जेणेकरून आपली लेखणी अजून समृद्ध होईल.अन जे वाचक आहेत,जे लिहिण्यासाठी धडपडत आहेत.तेही आपल्यातील काही गोष्टी शिकून स्वतः समृद्ध होत राहतील.

२.फेसबुक पेज व ब्लॉगवर तुमचे प्रसिद्ध झालेले लिखाण किंवा तुम्हांला आवडलेले लिखाण लिंकद्वारे शेअर केले तर अनेक वाचकांपर्यंत आपले विचार पोहोचू शकतात.

३.महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात वि४ समूह आपल्या माध्यमातून पोहोचला आहे.तो प्रत्येक तालुक्यात पोहोचत जावा.

४.या ग्रुपला अजून चांगल्याप्रकारे आपण सर्वजण मिळून पुढे कसे नेऊ शकतो.यावर प्रत्येक रविवारी या ग्रुपने ठरवलेल्या नियमातील वेळेनुसार चर्चा करावी.

५.हा ग्रुप कोणत्याच विचारधारेचा पुरस्कार करत नाही.म्हणून ग्रुपमध्ये अजून आपल्या माध्यमातून विविध विचारधारेचा पुरस्कार करणारी माणसे जोडत जायला हवीत.

६.वि४ ग्रुपचा प्रवास एखाद्या कुटुंबासारखा बळकट व्हावा.

७.वि४ चे ४-वि....१.विद्यार्थी २.विनय ३.विवेक ४.विरजा हे घटक प्रत्येकांनी निरंतर आत्मसात करत आपली वैचारिक वाटचाल करत राहावी.

८.तुम्ही सर्वजण या विषयाच्या माध्यमातून अपेक्षा मांडा.म्हणजे आपल्याला अजून ग्रुपला चांगल्याप्रकारे कसे वळण देता येईल.हे समजेल.
ही छोटीशी आशा .धन्यवाद.
*=============================*

निखिल खोडे, पनवेल

       युवकांचे मराठी भाषेत स्वविचार मांडण्यासाठी उपलब्ध असलेले व्यासपीठ म्हणजे वि४ व्हॉट्स अप ग्रुप! नवीन लेखकांचे विचार ब्लॉग, फेसबुक पेज द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविले जातात. गेल्या ७५ आठवड्यापासून सुरळीत चालू असलेला ग्रुप ज्यामध्ये प्रत्येक आठवड्याला विविधांगी विषय दिले जातात. आठवड्यात दिलेल्या विषयांवर तरुण मंडळी स्वतःचे विचार मांडत असतात.

वि४ ग्रुप कडून असलेल्या अपेक्षा

१) वि४ ग्रुप मधील वाचकांनी ४ ओळी मध्ये का होईना आपले विचार ग्रुप वर मांडावे.

२) ग्रुप मधील लेखांना जास्तीत जास्त वाचक वर्ग मिळवा यासाठी प्रयत्न असायला हवे.

 ३) वि४ ग्रुप ची लवकरच दुसरी शाखा म्हणजे वि४-२ सुरू व्हावा त्यासाठी नवीन लेखक जोडावे.

४) वि४ व्हॉट्स अप ग्रुप अविरत पणे चालू असाच चालु राहावा त्यासाठी शुभेच्छा!!
*==========================-==*

माझा "🌱वि४🌿ग्रुप "सोबतचा आजवरचा प्रवास. भाग -2 (दुसरा )




 निखिल खोडे, ठाणे.
           विचार ग्रुप म्हणजे स्वतःचे विचार बिंदासपने मांडण्याचे व्यासपीठ आणि त्याच बरोबर इतर सदस्यांचे विचार,  एकाच विषयावरचे वेगवेगळे मते वाचायला मिळतात.
            माझा वि४ ग्रुप सोबतचा प्रवास... सुरुवातीला ग्रुप ची लिंक शिरीष सरांकडून मला व्हॉट्स अप ला मिळाली. जून च्या शेवटच्या आठवड्यामध्ये मी करन दादा ला वयक्तिक संदेश पाठवून मला ग्रुप जॉईन व्हायचे आहे असे सांगितले. त्यांनी ग्रुप चे नियम मान्य आहे का? असा प्रश्न विचारून मी हो म्हटल्यावर मला ग्रुप मध्ये जॉईन केले. सुरवातीचे खुप दिवस हे बाकी सदस्यांचे ग्रुप वरील विचार वाचण्यात गेले. परंतु स्वतः लेख लिहिण्याची कधी हिम्मत नाही झाली.
             खुप दिवसानंतर ही लेख नाही आला तुझा? असा शिरीष सरांचा व्हॉट्स अप वरती मेसेज आला. त्यांना सांगितल की सर मला नाही जमत आहे लिहायला! त्यांनी लगेच म्हटल की बाकी लोकांचे लेख वाच आणि पहिल्या फक्त ४ ओळी लिही. नंतर आपोआप सुचेल. त्यानंतर मी लेख लिहायला सुरुवात केली. पहिला लेख लिहायला मला जवळपास ५ दिवस लागले... आज लिहू ... उद्या लिहू करता करता !! 😅 आणि विषय होता "नेमके कशात बिझी असतो आपण" !! 😆 माझा पहिला लेख १०-१२ ओळींचा लिहिलेला.
               त्यानंतर आतुरता होती ती म्हणजे लेखचा ब्लॉग कधी येतोय म्हणून 🤗 माझा पहिला लेख होता आणि ज्या दिवशी ब्लॉग वरती लेख आला तेंव्हा दिवसातून खुप वेळा लिंक उघडून बघितला व माझ्या मित्रांना शेअर केला. एक वेगळ्या प्रकारचा आनंद होता मनामध्ये. त्यानंतर हळूहळू लिहायची आवड निर्माण झाली आणि लिहायचं म्हटल की वाचन गरजेच आहे. वि४ ग्रुप मुळे जॉब वर लागल्या नंतर ची माझी वाचनाची कमी झालेली सवय आपोआप वाढली.
                 शेवटी ज्यांनी ह्या ग्रुप ची सुरुवात केली सौदागर काळे सर, ज्यांनी मला लिहिण्यासाठी प्रेरणा दिली शिरीष सर, मला ग्रुप मध्ये सामील केले ते करण दादा, मेहनत घेऊन ग्रुप सुरळीत रित्या चालवते अडमीन टीम, ज्यांचे सुंदर विचार वाचायला मिळते ते सदस्य त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वात सुंदर ग्रुप माझ्या व्हॉट अप मधला..!!😍👍🏻~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 
किरण पवार,औरंगाबाद.
                 नक्की काय काय लिहावं मुळात हाच प्रश्न पडलायं. जरी लिहण्यासाठी माझी शब्दमर्यादा थोडीशीच जाणवेलं पण भावनिक नातं मात्र पुरतं जोडल्या गेलयं माझं या विचार ग्रुपशी. मी जवळपास साधारणत: बऱ्यापैकी आधीच चालू झाला होता; मला आत्ता ते आठवतं नाही. पण मुळात ज्यावेळी मी सुरूवातीला नवीन जॉईन झालो तेव्हा मला या ग्रुपचा *कन्सेप्ट* फारच आवडला होता. मी आजवर इथे आहे त्याच कारण हेच आहे. खरतरं या ग्रुपने मला माझं वैयक्तिक मत व्यक्त करायला केवळ शिकवलचं असं नाही तर विविधांगी पैलू हाताळायला शिकवले. जसे आपण इंद्रधनुष्यात पाहतो; अगदी तसचं काहीसं. कमी वेळात अवाजवी पेक्षा ज्ञान मिळत नाही; हे सर्वांच सहसा मत असतं. पण मला या ग्रुपने ते भरपूर ज्ञान कमी वेळात दिलं. मी ग्रुपशी जुळलो तेव्हा आज आहे तितका प्रगल्भ कधीच नव्हतो. आजही अपुरा असेन. पण इथे आल्यापासून शिकायला मात्र खूप काही मिळालं.
                    कधी ग्रुपवर दिल्या गेलेल्या विषयांमधून बालपण उलगडलं तर कधी देशाची आर्थिक/ सामाजिक महाराष्ट्राव्यतिरिक्तचीही बऱ्याचवेळा परिस्थितीही समजत गेली. मला खरतरं एक आंतरिक उर्जा मिळवून दिली या ग्रुपने. मी बऱ्याचदा नैराश्यात असताना कधी-कधी एखादा लेख यायचा आणि मी ते वाचण्याच्या नादात माझं काय चालू होतं हे विसरून जायचो. चौकटीबाहेरच जग जे सहसा वृत्तपत्रांमधून काही ठराविकच विचारवंतांच्या स्वरूपात दिसायचं ते या ग्रुपमुळे भरपूर व्यक्तिंच्या माध्यमातून दिसू लागलं होतं. थोडक्यात म्हटलं तर , एक ना अनेक दार या ग्रुपच्या माध्यमातून सुरूवातीला आमच्यासारख्या नवीन लिखाणं करणाऱ्यांसाठी खुली झाली. विशेषत: मी सौदागर सरांचे खूप आभार मानतो. आयुष्यात किमान एकदातरी माझी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे. भेटेनही. थोडक्यात जे काही आहे ते जरा छोट्या काव्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतो.
धन्यवाद!

*वि4र:-*

वाटलेला एक आभास जो
तो शिक्षक झालासं तू नवख्यांसाठी *वि4र,*

काय असतो नेमका ग्रुप
पण एक बदलाचा अविष्कार
झालासं तू नवख्यांसाठी *वि4र,*

कधी कोणी नैराश्यात जखडलेला
त्यासाठी नकळतं आधार
झालासं तू सकारात्मकतेचा एक *वि4र,*

विविधांगी पैलूंचे विश्व देऊनी
आयुष्यातला आमच्या तो
झालासं तू तेजोमय एक दिव्याचा *वि4र.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वैशाली खरात,पंढरपूर.             
                                                               
           विचार ग्रुप वर येऊन मला खूप दिवस झाले नाहीत पण या ग्रुप मधून मला खूप काही शिकायला भेटल.मला वाचणा ची आवड आहे.पण मी कधी लिहल नाही पण मध्ये काही दिवस माझं वाचन बंद झालं होत.पण नंतर विचार या ग्रुप मूळ वाचनाला     सूरवात झाली वेगवेगळ्या विषयावर खूप जण लिहितात त्यामुळे आपल्या विचारात भर पडते आणि आपले विचार आजुन सुधारतात आणि आपल्या विचारला अजून चालना मिळते.या ग्रुप मध्ये आल्यापासून मला खूप छान वाटत आहे सगळ्यांचे विचार खूप छान असतात.या ग्रुप मधे मी माझी फ्रेंड वैशाली मुळे आली तिने मला विचार समूहाची माहिती दिली त्यामुळे या ग्रुप मध्ये आले आल्या पासून मी सगळ्यांचे विचार वाचती आहे छान वाटत आहे हे विचार वाचून अस वाटत की आपण पण लिहावं असं काही तरी मग लिहायला घेतलं तर  मराठी टाइपिंग कस करायच ते समजेनासे झाले मग एके दिवशी ग्रुप वर अाडमिन टीम नी मराठी टायपिंग च ऍप्लिकेशन पाठवलं अता मराठी टायपिंग सोप चालल आहे पण आजुन तरी काही लिहल नाही पण लीहणार आहे सगळे जण लिहतात म्हणून मला अस वाटत की आपण पण अस काही तरी लिहावं. आपले पण विचार मांडावे.समजत नवहतं काय लिहावं ते म्हणून मी कधी लिहाल नाही एकदा फ्रेंडशिप डे ला एकदा  लिहिलं होत नंतर काहीच  लिहिलं नाही ग्रुप मध्ये चर्चा चालू होती की जे लिहत नाहीत त्यांना काढून टकाययच त्या वेळेस मला वाट होत आता आपल्याला काढून टाकतेत पण नंतर टीम चा  विचार बदलला आणि त्यांनी कोणालाच काढल नाही त्या मुळे मी सगळ्या टीम चे आभारी आहे मला हे खूप छान व्यासपीठ मिळाले आहे ह्या ग्रुप वरचे विचार मी जेव्हा बाहेर मांडते तेव्हा ते सांगळे म्हणतात खूप छान विचार आहेत तुझे ते विचार मला ह्या ग्रुप मुळे मिळाले आहेत या ग्रुप मुळे मला अजुन जास्त  वाचनाची सवय लागली आहे तरी मी सगळ्यांना चे खूप आभारी आहे 🙏🏻🌱आसाच हा ग्रुप पुढे चालत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना काही चुकले असेल तर माफ करा🙏🏻
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मुकुंद बसोळे,लातूर.
        वि4 सोबतचा प्रवास तसा छोटासाच....आणि या प्रवासात मीच एकदा स्वतःच स्वतःला हाकललं🤣🤣😂😂 आणि परत आलो.....पण काही वेळेला असं होतं की तुमच्या जीवनात अगोदरच काही व्यवस्थित चालत नसतं.... आणि असं काहीतरी होतं... त्यावेळेस खूप वाईट वाटतं.... जीवनात कुणीच सोबत नसल्यासारखं  वाटतं.... आणि असं काहीतरी चुकून होऊन जातं....ते करावं  नाही म्हंटलं  तरी आपोआप होत....तसंच झालं माझ्यासोबत....असो शिरीष सरांनी मला परत add केलं आणि माझा ह्या ग्रुप सोबतचा जवळपास संपुष्टात आलेला प्रवास त्यांनी चालू केला...तो न संपण्यासाठीच....येथे खूप काही शिकायला भेटेल याची खात्री वाटते...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 शीतल शिंदे, दहिवडी, जि. सातारा .
          "विचार " ग्रुप खरोखरच आपल्या जीवनाला , आयुष्याला चालना देणारा मंच आहे .आपल्याकडे असलेली महितीची  , अनुभवाची  इतरांशी इतरांशी देवाण - घेवाण करणारा आणी आपल्या मतांना सामावून घेणारा असा एकमेव मंच आहे .
  खरेतर मला वाचनाची फार आवड आहे .msw पर्यंत कॉलेज पर्यंतच्या  जीवनात बरेच  वाचन केले अगदी सर्व कथा , कादंबरी, धार्मिक ग्रंथ , विचार ईत्यादि .मात्र एम . एस .डब्लू .पासून वेगळ्या वाचनाला सुरुवात झाली . मग
इतर वाचनाला वेळ कमी पडू लागला .मात्र डॉ .नरेंद्र दाभोळकर यांच्या बरोबर अंधश्रधा , सत्य शोधक समाज ईत्यादि विषयांवरील चर्च्या सत्रातील काही दिवस माझ्या पतीबरोबर  सहभागी झाले.
मात्र त्यानंतरलगेच जॉब मिळाला आणी  कामाचा एक भाग म्हणून  जनजागृतीपर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली .मग  कॉलेज युवक - युवती , विध्यार्थी @ पालक मेळावा , बचत गट , नेहरू युवा मंडळ , गावामधिल लोक ,  ग्राम पंचायत , शासकीय - अशासकीय विभाग आशा आणी अनेक ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली मात्र तेथे औपचारिक - अनौपचारिक शब्दामध्ये बोलणे होते .
  सुरवातीला "V 4 टिम "मधे जॉईन  झाल्यावर लिहायचे कसे हा प्रश्न पाडला .कारण मी कधी लिहिलेच नव्हते .
पण याच्याही पलीकडे जावून आपल्या विचारांची देवाण घेवाण व्हावी ही पण इच्छा " वी 4 च्या "माध्यमातून पूर्ण झाली  अलीकडे जास्त वाचन होत नाही तर आपल्या ग्रूप मधून बरीच महिती मिळते .मात्र आता लिहायला विचार करायला वेळचमिळत नाही .नोकरी करून लिखाणाला वेळ मिळतच नाही .खूप सारी कामे असतात .मिळाला तरी बाकीचे काम रहतेच.मला  विचार करून लिहायला वेळच मिळत नाही म्हणून मी डायरेक्ट लिहायला घेते .मी नास्तिक असल्यामुळे माझे लेखही तसेच असतात .म्हणून कोणी लाइक करत नाहीत पण हरकत नाही विचार च्या माध्यमातून माझे विचार 1000 मधील 10 जणांना पटले तरी पुष्कळ .आभारी आहे व  राहीन मी "वी  चार टीम ची ".आता सुद्धा काय लिहिले आहे हे पुन्हा वाचायला वेळ नाही .कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व .🙏
पुन्हा एकदा "v4 ग्रूप "ची आभारी 🙋🏻‍♀

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मयुरी देवकर ,पिलीव ता. माळशिरस.
             वि-४ म्हणजे  (1) विद्यार्थी,(2) विवेक ,(3)विनय आणि (4)विरजा हे मिळून "विचार " हा ग्रुप तयार झाला. प्रथमतः मला वैशालीने या ग्रुपमध्ये ऍड केले,नियम वगैरे वाचले आणि मग वैशालीला फोन करूनच ग्रुपविषयी चर्चा केली आणि मग विचार ग्रुपची संकल्पना नीट समजली आणि मग चालू झाला माझा विचार सोबतचा प्रवास....
             पहिलाच विषय होता 'श्यामच्या आईने माझ्यातला श्याम असा घडवला....' आम्ही सर्वांनीच यावर लेख लिहिले होते पण, श्यामची आई वाचून झाल्यावर जेवढा आनंद मिळाला त्यापेक्षा जास्त आनंद या विषयावरील लेख वाचून झाला.प्रत्येकाचे अनुभव प्रत्यक्षात अनुभवल्यासारखं झाले आणि हीच असते लेखणीची पावर....या ग्रुपच्या माध्यमातून रोज नवीन विचार वाचायला मिळू  लागले आणि थोड्याच दिवसांत सौदागरने ऍडमिन टीम मध्ये येण्याची संधी दिली.खरे तर सौदागर आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकलो, दोघेही वक्तृत्व स्पर्धेतील प्रतिस्पर्धी पण बोलण्याचा कधीच संबंध आला न्हवता पण या विचार ग्रुपच्या माध्यमातून पुन्हा आमचे विचार जुळले. ऍडमिन टीममध्ये आल्यानंतर अनिलजी,अक्षयजी,प्रवीणजी, पवनजी, करण,बालाजी,नरेशजी आणि  शिरिषदा यांची ओळख झाली.वैशाली आणि मी आधीपासूनच मैत्रिणी होतो पण सीमालिजी आणि संगीताजी यांची सोबत मिळाली. या 'विचार' ग्रुपने फक्त आणि फक्त विचारांवरच सर्वांना जवळ आणले आहे.या विचार ग्रुपमधील प्रत्येक सदस्य हा आपल्या कुटुंबातीलच वाटतो.सगळ्यांचे नवनवीन विचार वाचले कि, मनाला आशेचे पंख फुटतात.....
             विचार ग्रुपमध्ये असे खूप सदस्य आहेत ज्यांनी आधी कधीच लिखाण केलेले न्हवते पण आज त्यांचे लेखन उत्कृष्ठ आहे...आणि हेच या विचार ग्रुपचे यश आहे.आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रुपमध्ये असणारे नियम....कधी कधी या नियमांमुळेच ऍडमिन टीममला कठोर भूमिका घ्याव्या लागल्या.आज हा ग्रुप टिकला आहे आणि जो नावलौकिक आहे ते फक्त आणि फक्त या नियमांमुळेच....
          आज आपली वाचन संस्कृती हरवत चालली आहे असं आसपास लोक नुसतं म्हणत असतात तेव्हा अभिमानाने आपल्या ग्रुपविषयी सांगणं होतं. यामध्ये फक्त वाचनच नाही तर लेखनसंस्कृतीचा उदय झाला आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.इथून पुढे अजून नाविन्यपूर्ण कल्पना या विचारच्या  माध्यमातून पुढे येतील.आणि खऱ्या अर्थाने या स्मार्ट जगात स्मार्टफोनचा स्मार्ट वापर केल्याचे समाधान मिळेल....
विचारांनी विचारांना विचारलेला प्रश्न म्हणजे वि४
विचारांनी विचारांना दिलेलं उत्तर म्हणजे वि४
भग्न वाळवंटातील आशेचा किनारा म्हणजे वि४
आणि धडपडीतल्या जगण्यातला श्वास म्हणजे वि४
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सिमाली भाटकर, रत्नागिरी.   
     लेखणी हरवून बसलो होतो,
जीवनाच्या प्रवासात,
समुद्राच्या लाटा होत्या, 
लाटांच्या वाफा होत्या, 
ऋतूंच्या आभासात,
दाटले होते मेघ काळे, 
उणीव मात्र थंडगार फुंकरीची होती,
 कडक उन्हाच्या सावलीत भेट एका माऊलीची होती,
रखरखीत क्षण गारव्यात बदलले, 
दाटले ढग विचार रूपे बरसले,
कधी वीरश्री संचारली अन, 
अत्याचार विरोधी लेखणी बरसली,
जीवनाच्या प्रवासातली अबोलकी शाळा, 
यांनी पानोपानी साकारली,
अनाथांची आपुलकी मनी ठासून भरली होती,
विचार च्या कल्पनेने पानोपानी सजली होती,
डिजिटल इंडिया कल्पना भारताची होती,
विचार न मात्र ती गावरान मन हुबेहूब टिपली,
आणि गावच्या मातीला न्यायाची साद घातली,
 आयुष्याच्या प्रवासात ही लेखणी गवसली,
अन कोरी पडली पाने विचार नि सजवली.....

                 धन्यवाद
       विचार ग्रुप सोबत चा माझा प्रवास थोडक्यात रेखाटला. यांनी माझ्या विचारांना एक व्यासपीठ मिळवून दिले आणि बुद्धिमत्तेला चालना मिळाली.
       धन्यवाद विचार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


सानप बालाजी,बीड.
              मी बरोबर एकवर्षांपूर्वी हार्मोनि युथ फेस्टिवलला *कर्णाल, हरियाणा* येथे गेलो होतो तेथे गेल्यानंतर दिवसभराच्या घडणाऱ्या घडामोडींचा एक लेख लिहून आमच्या फेस्टिव्हलच्या ग्रुप मध्ये एक व्यक्ती टाकत असत, या लेखांची महती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून ते कला व क्रीडामंत्र्यांपर्यंत पोहोचली होती व जो तो त्या लेखकाची स्तुती करू लागला होता त्या लेखमालिकेमुळे माझी आणि त्या लेखकाची भेट झाली आणि ओळख झाली त्या लेखकाचे नाव म्हणजे *सौदागर सर*.
              माझ्या मनामध्ये मला विचार यायचे आणि निघून जायचे पण त्या विचारणा लेखनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न मी कधी केलाच नाही. फेस्टिवलनंतर  महाराष्ट्रामध्ये आल्यावर एके दिवशी सौदागर सरचा व्हाटस अँप ला एक मेसेज आणि एक ग्रुप लिंक आली, आणि मी लगेच ग्रुप जॉईन झालो.अश्याप्रकारे माझा आणि विचारचा पहिल्या आठवड्यापासून प्रवास चालू झाला.
              ग्रुप जॉईन झाल्यानंतर मग लेख लिहिण्यास कशी तरी जसे जमेल तसे सुरवात केली. पुढे चालून सौदागर सरांचा आणखी एक मेसेज आला तुम्ही ग्रुप मध्ये जबाबदारी स्वीकारण्यास इच्छुक आहेत का अश्या आशयाचा तो मेसेज होता आणि मी जबाबदारी तर नाही पण *फुल ना फुलाची पाकळी*आशा प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केला करत आहे आणि करत राहील.
              मध्ये काही वेळा कामामुळे आणि काही पर्सनल प्रॉब्लेम मुळे 2 वेळा इच्छा नसताना सुद्धा वि४ ग्रुप च्या माझ्या जबाबदारीतून मी न सांगता मुक्त झालो होतो त्याबद्दल मला सौदागर सर आणि ऍडमिन माफ करतीलच.
              सौदागर सर, अनिल सर, शिरीष सर, प्रवीण सर, करण सर,वैशाली मॅम, मयुरी मॅम, नरेश सर, पवन सर, संगीता  मॅम, सीमाली मॅम आणि अक्षय सर हे सध्या खुप मेहनतीने वि४ ग्रुप मधील विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत या सर्वांचे मनापासून अभिनंदन.
              मला ग्रुप मध्ये ऍड केल्याबद्दल सौदागर सरांचे खूप खूप आभार, आणि ग्रुप ऍडमिन टीम मधील सर्वांचे मला समजावून घेतल्याबद्दल आणि समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद....!
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 

सिताराम पवार,पंढरपूर(सध्या परभणी).
          हा ग्रुप स्थापन केला की मला लवकरच ऍड केलं कारण सौदागर काळे सर यांचा सहवास मला 11वी व 12 दोन वर्षे लाभला तेव्हा आमचा हा संबंध कामी आला आणि मला या ग्रुपमध्ये सामील होता आले. खरं तर हा एक नाविन्यपूर्ण असा विचार आहे .आपणमोबाईल चा वापर किती चांगल्या पद्धतीने करू शकतो याच उत्कृष्ट उदाहरण आहे.ह्या मुळे वैचारिक परिपक्वता येण्यासाठी ह्या ग्रुपमधील लेख खूप उपयोगी पडतात. वैचारिक संकल्पना, तत्वज्ञान, वैचारिक बैठक कृती याचा सध्या जगात घसरण सुरू असताना आणि आजच्या तरुणांना ह्या गोष्टींमध्ये रस कमी होत असताना असे ग्रुप एक संजीवनी आहे.मी बरेच लेख लिहिले आणि सगळे वाचतो त्यातून विचार करण्याची क्षमता वाढते.आजच्या चिखलफेकही राजकारणात तत्वनिष्ठ राजकारण पहायलाही मिळत नाही एकही पक्ष विचारला वाहून घेतलेला दिसत नाही.त्यामुळे आपल्याला सुजाण नागरिक बनण्यासाठी हा ग्रुप महत्वाची भूमिका बजावत आहे.
     ग्रुपमध्ये खूप मोठे विचारवंत असल्याने माझ्यासारख्याला त्यांचे लेखन वाचायला मिळत, अगदी ग्रामीण भाग, शहरी आणि तेही एका क्लीकवर हे खूप महत्वाचे आहे.काहींना वाटत फक्त लिहून काय कृती महत्वाची पण मला असा अनुभव आला की जर एखाद्या विषयावर लेख वाचला आणि आपल्या मनातील शंका दूर होते, चुकीची कृती होताना क्षणोक्षणी लेखातील शब्ध आठवतात. त्यामुळे जे लेख लिहीत नाहीत पण वाचतात त्यांना भरपूर सूट द्यावी.
      मला वाटते प्रत्येक आठवड्यात आपल्या देशातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, संशोधन ह्या सर्व प्रकारच्या क्षेत्रात जे आपलं सरकार निर्णय घेतात,उदा. रिझर्व्ह बँकेची जाहीर झालेली धोरण ह्यावर विषय नक्की असावा कारण आपल्या ग्रुपवरून जाणकाराकडून निःपक्षपाती अशी माहिती मिळते आणि त्याचे फायदे तोटे समजतात.आता या ग्रुपने बऱ्यापैकी महाराष्ट्र व्यापला आहेही आनंदाची बाब आहे.
     तुकोबारायांच्या अभंगानुसार"विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म!भेदाभेद भ्रम अमंगळ"आणि "उचणीच कोणी नाही भगवंता!तिष्टे भावभक्ती दवखोनिय!  असा मानवतेला वाहून घेलेला समाज निर्माण होण्यासाठी असा ग्रुप मोलाची कामगिरी बजावतो आहे.
      ग्रुप चालवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचा मी व्यक्तिशः ऋण व्यक्त करतो. काळे सर, वैशाली मॅडम यांनी प्रथम संकल्पना मांडली,असंच आपलं मार्गदर्शन राहो. सर्व ग्रुप सदस्य 🙏"" सुसंगती सदा घडो.......
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*शिरीष उमरे, नवी मुंबई*
          जेंव्हा हा विषय *शब्दमर्यादा नाही* म्हटल्यावर मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या.🤗 इनमिन पाच-सहा महीन्याचा प्रवास सहा दिवस झालेत, रोज विचार करतोय हे लिहीन अन ते लिहीन पण विचाराचे वासरु शब्दाच्या दावणीत बंधायला तयारच नाही. कानात हवा भरल्यासारखे सुसाट धावतेय सारखे. आज कसेबसे वाक्यांच्या गोठ्यात पकडले.

तर झाले असे की व्हॉटस्अप ग्रुपच्या महापुरात वि४ ची लींक आली. ब्लॉगच्या लिंक ला जाऊन एकदोन लेख वाचले. कंसेप्ट आवडला. जुन्या लिहीलेल्या लेखांची व डायर्यांची आठवण झाली... परत लिहीण्याची खुमखुमी वाढली. ✍🏻

जुने दिवस आठवले !! माझ्या वडीलांनी मला वयाच्या पाचव्या वर्षी लावलेली वाचनाची सवय वीस वर्षे टिकली. त्यानंतर माणसे व समाज वाचण्याची चटक वीस वर्षे कायम होती. ह्याच दरम्यान इंटरनेटच्या मायाजालात जे गुरफटलो ते आजगायत... पण मागील पाच वर्षापासुन जे निसर्ग वाचतोय तेंव्हापासुन प्रत्येक क्षण वाचतोय... अनुभवतोय 😇

ह्या माझ्या प्रवासात जे मी अनुभवलय ते इतरांना वाटायचे ह्या शुध्द स्वार्थी विचाराने ग्रुप जॉइन केला. झपाटल्यासारखा दिलेल्या विषयावर लिहीत गेलो. कोणी पसंती देवो वा ना देवो.... बसस् लिहीत गेलो माझे मन मोकळे करण्यासाठी... जवळपास दोन महीने सगळ्याच विषयांवर !!

मग हळुहळु रवीवारी होणार्या चर्चेत भाग घ्यायला लागलो. तोपर्यंत  कोणकोण अॅडमिन आहेत याचा अंदाज आला होता. त्यांचे डीपी, स्टेटस व सोशल मिडीया प्रोफाइल वरुन त्यांच्या व्यक्तीमत्वांचा आढावा घेणे चालु होते. सोबतच त्यांचे ग्रुपवरचे वर्तणुक, त्यांचे लेख व त्यांचे अभिप्राय यांचा अभ्यास सुरु होता. ( जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही.😜) त्यावरुन त्याच्यांतले दुर्गुणांसोबत त्यांची ताकद लक्षात येत गेली. अर्थात मी त्यांच्या पॉजिटीव्ह गुणांबद्दल च बोलणार 😅 हे वाचुन काहींनी सुटकेचा श्वास टाकले असतील😆

जाड भिंगाचा चष्मा, नेहमी गंभीर तर कधी चुकुन हसरा असा खादी मध्ये दिसणारा सौदागर मला पहीले पत्रकार च वाटला. मग गांधी  फेलोशिप वर प्रोजेक्ट करणारा हा ऐन पंचविशीतला तरुण काहीतरी वेगळच बेणं आहे हे लक्षात यायला लागले. मोजक्या शब्दात लिहुन शांततेने समर्पक प्रत्युत्तर देणे ह्यातली त्याची मॅच्युरिटी  भावली मला. माणसे हेरण्याची त्याची स्पेशॅलीटी अॅडमिन टीम मेंबर्स वरुन लक्षात आली होती. असा हा इंट्रोस्पेक्टीव्ह पर्सोना आजही हळुहळु उलगडतोय त्याच्या सहकारी मित्रांच्या लेखातुन. ..

असाच गैरसमज माझा अनिल बद्दल झाला होता. त्याच्या स्थितप्रज्ञ व बर्फासारख्या शांत स्वभावामुळे मला वाटले होते की ह्या अॅडमिनचे एकतर साडीचे दुकान असावे कींवा कुठल्या धार्मिक स्थळाचा ट्रस्टी असावा. माझे सगळे अंदाज धुळीला मिळवले. 🙃 हा समाजशास्त्राचा प्राध्यापक जीम चालवतो 😳 होय हे खरे आहे !! 🤩
विचाराची खोली बघता हा माणुस साठीचा वाटतो पण तिशी ही न गाठलेला हा जबरदस्त हरफनमौला  जिवलग मित्रांच्या मोठ्या नेटवर्कचा खजिना दडवुन ठेवतो.

बालाजी, पवन व संगिता हे अॅडमिन ही असेच छुपे रुस्तुम!! तिघांनाही स्वत:च्या ताकदीची पुर्ण कल्पना पण वेळेच्या तारेवर कसरत करत आपली जबाबदारी पार पाडत पडद्यामागे ह्या ग्रुपचे आधारस्तंभ म्हणुन कार्यरत आहेत.

माझ्या आवडीचे अॅडमिन आहेत प्रविण व करण !! हे दोघे  अक्षरश: ग्रुप जगतात. चोविस तास ग्रुप ह्यांच्या मनात असावा. निस्वार्थी सेवा काय असते हे अनुभवयाला मिळते ह्यांच्याकडे बघुन!! पॅशन काय असते हे कळत ह्यांच्याकडे बघुन 😍

तर गोष्ट आहे काही रविवारांची ... सुरुवात शाब्दिक चर्चेची... वादविवादाची.. आवाहनाची आणि मग हळुहळु शाब्दिक हींसेची, वादावादीची, आव्हानाची !! शब्दांचे फटकारे ओढत, नैतिकता पाळत नियमांच्या कील्ल्याला सुरुंग लावत आमचा रथ सुसाट वेगाने गडाकडे !! गडकरी गोडबोले धास्तावलेले.... मग स्वत: सुत्रधारानेे तुम्ही स्वत: च अॅडमिन व्हा ह्या आवाहन देऊन आमची बोलती बंद केली. सदस्याकडुन सुत्रधाराकडे असा प्रवास सुरु झाला. जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे ही म्हण आठवली. आ बैल मुझे मार अशी अवस्था झाली.  इफ यु वॉन्ट टु नो दि पर्सन देन वॉक इन हीज शुज असे का म्हणतात ते समजायला लागले होते. 😅

अॅडमिन टीममध्ये सुरुवातिला काहीसे उपहासात्मक तर काहीसे कुतुहलात्मक तर काहींनी मदतीचा हात समोर करुन स्वागत केले. मी परत सवयीप्रमाणे नविन ग्रुपचा अभ्यास करायला लागलो. दिलेल्या जबाबदार्या इमानइतबारे पार पाडायला लागलो. येड करतेय तर द्या अजुन जबाबदार्या असे समजुन ह्या खेचरावर अजुन जबाबदार्या दिल्या गेल्या. 😜

काही वेळ माझी अवस्था दोन कारवर उभे राहणार्या अजय देवगण सारखी झाली. सहन ही होइना अन बोंबलता ही येइना !! दोन्ही ग्रुपवर अॅक्टीव राहण्याची कसरत करतांना मला पुलंची गोष्ट आठवली.. रेल्वेच्या जनरल डब्यात प्रवेश करतांना आतल्यांशी युध्द आणि एकदा आत घुसल्यावर मग आत येणार्यां बाहेरच्यांशी युध्द !! 😅
त्यातच मधातच आलेली सौदागरची विरक्तीची भावना 😱

मग मी उचलला जागृतीचा विडा ( एकदम शायिस्तेखानाची आठवण आली की हो... लगेच डाव्या हाताची तीन बोटे चाचपुन बघितली😝) मग चालु झाला माझा दाणपट्टा ... उजव्या हाताने पँट वर करुन डाव्या हाताने कपाळावरचा घाम पुसत उसणे अवसान गोळा करुन मी सिंव्ह का काय म्हणतात तशी गर्जना करुन पाहीली. कोणी सिरीयसली घेतली नाही हा भाग अलहीदा... पण मला सौदागरने दिलेली सुट चा गैरफायदा घेत मी सदस्य कसे खुष होतील, वाचकातुन नवलेखक कसे तयार होतील, जुने लेखक परत कसे जोडता येइल, वाचकांची संख्या कशी वाढेल ह्यावर काम करणे सुरु केले. ह्यात मोलाची साथ मिळत गेली सगळ्या अॅडमिन टीमची !! त्यांचाच वेळ क्रीएटीविटी कडे वळवल्याने पुढचे सगळे सोपे होते.
ह्यातही जुने नियम मोडतोड करुन अनिलला जीमची कसरत करायला लावली. ह्या बर्फाची गरमी अनुभवयाला मिळाली. सौदागरला मौनव्रतातुन बाहेर आणुन अॅक्टीव मोडमध्ये आणले. सगळ्यांना मोठी मोठी स्वप्ने दाखवली. ते जे मराठी भाषेच्या विकासासाठी करत आहेत व त्याचा खासकरुन ग्रामीण भागातील युवांवर काय पॉजिटीव्ह इंपॅक्ट पडतोय ह्या माझ्या शब्दजाळ्यात अडकुन सगळ्यांनी भारावुन जे सहकार्य दिले त्याचे रिझल्ट आपण सगळेच बघत आहात. माझ्या पोपटपंचीमुळे त्यांना त्यांच्यातल्या ताकदीची जाणीव झाली. मी शतश: आभारी आहे सगळ्या अॅडमिन व वि४ सदस्यांचा 🙏🏼
माझ्या दाखवलेल्या स्वप्नाचे मुर्त रुप तुम्ही मला दाखवले ... मी ऋणी आहे तुम्हा सगळ्यांचा 😇
ह्या म्हातार्याच्या अनुभवातुन झालेल्या कामाची कडवट सुरुवात झाली तरी आता गोड फळे आलीत...
# विषय संख्या ३ वरुन ५ वर.
# एका आठवड्यात ५०-६० उत्तम लेख येणे !
# एका दिवसात १५-१६ लेख लिहील्या जाणे !!
# २५-३० नविन लेखक मिळणे !!!
ही वर्षपुर्तीची उपलब्धी !!😍

आज फेसबुकवर २५०+ फॉलोअर्स आणि आठवड्याला १२००+ वाचकांची पोष्टला पसंती ह्याव्यतिरिक्त एकेका पोस्टला लाभलेली ६००-७०० जणांची वाचकसंख्या हे वैभव 🤩

आज ब्लॉग साइटवर २१००० विजिटर्स, ६०० पेक्षा जास्त लेख अशी भव्य कामगिरीचे शिलेदार आहेत करण व प्रविण आणि अॅडमिन टीम !! 🤗

मी आता नविन स्वप्न बघतोय..

✨ वि४ चा डीजीटल दिवाळी अंक
 ✨वि४ चे दहा व्हाॅटस्अप वाचक ग्रुपस
✨ वि४ ची १००+ लेखकांची फौज

ह्यासाठी हवी नविन दमाची युवा टीम... 👍🏻आहात ना तुम्ही तयार 🌱वि४🌿 च्या वर्ष २ च्या प्रवासाला ? ही *वि४* ची मशाल 🔥आता तुमच्या हाती 🤝🏻मित्रांनो 🙏🏼😊

माझा वि४ ग्रुप सोबतचा आजवरचा प्रवास. भाग - 1 (पहिला)



डॉ. विजयसिंह पाटील MBBS. DA. कराड
           लहान असताना, घरात करमणूकीचे साधन एकमेव रेडिओ. मला गाण्यांची, बातम्यांची फारशी आवड नसल्याने, मैदानी खेळ आणि वाचन याची आवड लागली.
अगदी लहानपणापासून मला वाचनाची दांडगी आवड. लहान असताना चांदोबा वाचत असे. आठवीत असताना कराड नगर वाचनालयाचे सभासदत्व कार्ड वडिलांनी दिलं. आणि मोठा खजिनाच सापडला. बाबुराव अर्नाळकर ते सुहास शिरवळकर, पु .ल. ते व .पु , शिवाजी सामंत ते रणजित देसाई, व बा बोधे ते शंकर पाटील , मिरासदार ते राम नगरकर, चि व्ही जोशी, नेमाडे ते अरुण साधू यांची जवळ जवळ सर्व पुस्तके MBBS ला जाईपर्यंत वाचून झाली होती. पुढं कॉलेज जीवनात इंग्रजी साहित्य वाचायला लागलो.
शिक्षण पूर्ण झाले. नोकरी आणि व्यवसाय सुरू झाले. अशीच वीस वर्षे लोटली. वाचन चालूच होते, पण प्रमाण कमी झाले होते. त्यात स्मार्ट फोन आले आणि वाचनाची व्याख्याच बदलून गेली.
व्हाट्सअप्प / फेसबुक वरील पुस्तक प्रेमी, साहित्य विषयक ग्रुप्सना जॉईन झालो. सहज कुठंही वाचायला मिळू लागले. भरपूर लेखकांचे लेख वाचायला मिळू लागले.
तसं बघायला गेलं तर, स्थिरस्थावर झाल्यावर माझ्या मनात, आपणही काही तरी लिहावं असं सारखं वाटत होतं. तसा प्रयत्नही केला चारपाच वेळा. लिहिल्यावर एखाद्या तज्ज्ञांना लेख दाखवला तर, सूचनाच इतक्या यायच्या की , मी निराश होऊन लिखाण बंद व्हायचं. मग चार पाच महिन्यांनी परत काहीतरी लिहायचो. परत ये रे माझ्या मागल्या. आपल्याला लिहायला बिलकुल जमणार नाही असं वाटलं आणि तो विषयच सोडून दिला.
एके दिवशी, आमच्या मेडिकलच्या ग्रुपवर एकानं कळकळीने लिहिलं ' अरे नुसते पोस्ट फॉरवर्ड करू नका, स्वतः काही तरी लिहा हो '. झालं माझ्या मनानं उचल खाल्ली.
त्यात एका ग्रुपवर वि4 ग्रुपची लिंक आली. कुतूहलाने जॉईन झालो. पहिले पंधरा दिवस कोण काय आणि कसं लिहितयं याचं निरीक्षण करत होतो .काही दिवसांनी थोडी माहिती असलेला विषय आला. घाबरत घाबरत, थोडं फार लिहिलं आणि शेवटी ' माझं काही चुकलं असेल तर माफ करा ' अशी तळटीपही टाकली . लगेच या ग्रुपवरील काही लोकांनी धीर दिला आणि लेख चांगला आहे, असा अभिप्राय पण दिला. (त्यांचं परत एकदा आभार ). धीर दिला नसता तर , कदाचित माझं लिखाण बंद पडले असते. भित्या पोटी ब्रम्हराक्षस अशी माझ्या मनाची स्थिती होती. जवळपास सर्व भौतिक आकांक्षा पूर्ण झालेल्या होत्या. जीवन एका लयीत चाललेलं ( त्यावर मी पंधरा दिवसांपूर्वी ग्रुपवर लिहिलंय ). पुढच्याच आठवड्यात वैद्यकीय संबंधित विषय आला. मी मोठ्या उत्साहात लिहिलं पण. त्यालाही बऱ्यापैकी प्रोत्साहन मिळालं. काही दिवसांनी समलैंगिकता हा विषय आला. माहिती होतीच, पण चार दिवस त्या विषयावर अभ्यास केला. आणि लेख लिहिला. चार वेळा एडिट करून ग्रुपवर टाकला. त्यालाही अडमीन मंडळी आणि ग्रुप सदस्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पुढं 'माझी विनोदी कथा'  हा विषय आला . विचार केला, आपण रोज इतके रुग्ण तपासतो , त्यावर काहीतरी विनोदी लिहावं. डोक्यात तोच विषय भुंगा घालायला लागला . ' पेशंट व्यक्ती आणि वल्ली असा लेख लिहिला . प्रतिसाद चांगला मिळाला. बऱ्याच सदस्यांनी वैयक्तिक मेसेज करून अभिनंदन केलं. तो लेख फेसबुकवर टाकला. माझ्या अपेक्षेपेक्षा फारच चांगला प्रतिसाद मिळाला. (त्याचे पुढे नऊ भाग फेसबुकवर टाकले, असो. )
(म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीसाठी योग जुळून यावा लागतो. )
माझा वि4 ग्रुप बरोबरचा सहवास जेमतेम सहा महिन्यांचा, पण वीस वर्षांत जे जमलं नाही ते या कालावधीत जमलं असं निदान मला तरी वाटते. सर्व श्रेय वि4 ग्रुपचं..
माझ्या लिखाणाची , भलं ते चांगलं असेल किंवा बोअर असेल, मला जे समाधान मिळालं त्याची किंमतच होउ शकत नाही , सुरुवात आपल्या वि 4
ग्रुपमुळं झाली यात शंकाच नाही.
मी ग्रुपच्या अडमीन मंडळी आणि सर्व सभासदांचे मनापासून आभार मानतो..
मनःपूर्वक धन्यवाद . 🙏🏻🙏🏻🙏🏻
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

करण बायस, जि. हिंगोली.
       आधीपासून वाचनाची आवड होती ,पण कधी लिहिण्याचा प्रयत्न केला नव्हता पण कधीतरी लिहायला सुरुवात करणार हे मनात चालू असायचं.
*🌱वि४🌿* ग्रुप चालू झाल्यानंतर काही २-४ दिवसांनी अक्षय ने मला ग्रुप मध्ये ऍड केले.पहिल्या आठवड्यातील विषय आलेले होते त्यापैकी *श्यामच्या आईने माझ्यातला श्याम असा घडविला* या विषयावर लिहायचं ठरवलं आणि माहिती गोळा करून माझे शब्द मांडण्याचा प्रयत्न केला. लेख टाकायचा शेवटचा दिवस होता पण मनात चालू होतं टाकावं की नाही लेख पुन्हा पुन्हा वाचला मित्रांना दाखवला आणि काही पॉसिटीव्ह फीडबॅक आला म्हणून टाकला लेख ग्रुपवर त्यातून बऱ्याच जणांनी चांगला प्रतिसाद दिला.
काही दिवसांनी ग्रुपवर थोडा गोंधळ होत होता ,मी एक मेसेज टाकला “ग्रुप बंद करा” म्हणून 😜 (मला ग्रुप लिंक म्हणायचं होत पण घाईत लिंक लिहायचं विसरलो) ,मला ग्रुप मधून रेमोव करण्यात आलं पण मी माझ्या अडमीन मित्र अक्षय ला सांगितलं मग पुन्हा ऍड झालो .
त्यांनतर ग्रुप साठी ब्लॉग बनवण्याची संधी मिळाली, मी पूर्वी कधीही ब्लॉग बनवला नव्हता आणि मला ते जमत पण नसे, ग्रुप वर मेसेज आला होता ब्लॉग बनवण्यासाठी कोणाची तयारी असेल तर पर्सनली मेसेज करा आणि मी बनवण्यासाठी तयार झालो मला थोडा वेळ देण्यात आला एखादी पोस्ट एडिट करून दाखवायला मी ते करून दाखवलं आणि ९-१० महिन्यापासून विचार अडमीन टीम मध्ये ब्लॉगर म्हणून मला योगदान करण्याची संधी मिळाली,काही काळसाठी पूर्ण ब्लॉगची जबाबदारी आल्यामुळे मला ब्लॉग बद्दल आणखी शिकता आलं.
ग्रुपच्या अडमीन टीम आणि सर्व मेंबर्सचे धन्यवाद 🙏ग्रुप कडून खुप काही शिकता आलं आणि ग्रुपला भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. सर्व मेंबर्सनी ग्रुपवर थोडं का होईना पण लिहीत राहावं आणि आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवावे.🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अर्जुन बर्गे,अहमदनगर.
      सर्वप्रथम मी या ग्रुप चा आभारी आहे।।।👏👏
मला अवांतर वाचनाची पहिल्यापासून एवढी आवड नाही ।।।पण पहिल्यांदा हा ग्रुप जॉईन केला तेव्हा यातील प्रत्येक लेख जेव्हा वाचत गेलो त्यातून समजत गेले अवांतर वाचनात किती ताकद असते।।।आज प्रत्येक गोष्टीवर ठाम मत मला या ग्रुप मूळे मांडायला शिकलो।।।।
     या ग्रुप मुळे मी लिहायला शिकलो।।।।।🙏🙏
ज्या वेळेस एखादा लेख ग्रुप वर एखादा लेख येतो तेव्हा लेखकाची विचार करण्याची क्षमताच खरच कुतूहल वाटत🤔।।।प्रत्येक दृष्टीने त्या लेखसंदर्भात पोसिटीव्ह,,, निगेटिव्ह सगळ्या गोष्टींना विचार करून लेख लिहीत असतो🤔🤔।।।
माझं अवांतर वाचन कमी असल्यामुळं शब्द संग्रह जास्त नाही पण विचार ग्रुप मध्ये जॉईन झाल्यापासून तो नक्कीच खूप मोठा वाढलाय।।।।😊😊
    मला माझे मित्र बऱ्याच वेळेस विचारतात की तुझ्यात अचानक एवढा कसा बदल झाला की प्रत्येक गोष्टीवर आपल ठाम मत मांडतोय।प्रत्येक गोष्टीवर स्वतःचे विचार व्यक्त होतायत।।।👊👊।।।
तर मी त्यांना एकच म्हणतो माझ्याकडं विचार आहे।।।त्याने माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवलाय।।। आणि आयुष्याच्या प्रत्येक turning पॉईंट ला तो माझ्या सोबत असेल।।।।।
       आणि खरच सांगतो तुमच्या विचाराने माणूस प्रगल्भ बनतो👏👏।।।ज्याच्या कडे विचार करण्याची क्षमता आहे तो व्यक्ती आयुष्यात येणाऱ्या कोणत्याच गोष्टीपासून पळ काढत नाही👊👊।।।।प्रत्येक गोष्टीला भिडून त्यातून मार्ग काढत असतो।।।।🎯🎯
      माझ्या विचार करण्याला विचार ग्रुप पासून सुरुवात झाली😊हे माझ्या आयुष्यातील खूप मोठं आचिवमेंट आहे👏👏।।।।
     मी आभारी आहे ग्रुप मधील सदस्यांचा।अडमीन मंडळींचा।।।।

Thanks🙏🙏🙏
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.
        प्रवास शब्द आजवर सर्वांनी ऐकला, अनुभव ला आहे असा एकही व्यक्ती नसेल जो कोणताही प्रकारचा प्रवास केला नाही, तसाच मीही आहे बराच प्रवास केला तो विविध प्रकारचा बरेच अनुभवही आलेत पण "विचार" ग्रुप बरोबरचा आजवरचा प्रवास नेत्रदीपक नाही पण शुरवात तर झाली आहेच आणि पुढे बराच  प्रवास बाकीही असेल... असो.
       मी ह्या ग्रुप मध्ये आलो ते माझ्या खोलिमित्र सीताराम पवार साहेब यांच्या शिफाशीनुसार आणि पाहिले काही दिवस बघितलं या ग्रुप मध्ये काय विचार चालतात सुरवातीला काही आवडीचे विषय आले वेळ मिळत असल्याने काही लेखही लिहिले, सॉरी काही लेख नव्हे ते आता काही दिवसा पूर्वी pdf स्वरूपात वाचले तर ते ब्लॉग, लेख तर नवतेच ते फक्त गद्य उतारे होते असे जाणवले.
      मध्ये काही दिवस नोकरी च्या शोधात असताना ती मिळाली आणि सवतःला त्यात गुरफटून घेतलं वेळच मिळत नाही असं व्हायला लागले कारण खाजगी नोकरी म्हणजे...समजलात असाल...
     मागीलच आठवड्यात सौदागर सर चा एक प्रेमळ संदेश आला सतत विचार शाळेत गैरहजर राहिल्यास remove केले जाईल खडबडून माफी मागत मागील आठवड्यात लेख लिहिला आणि येथून पुढेही लिहू इच्छित आहे...
      जी संधी विचार ग्रुप ने दिली त्या साठी मी या ग्रुप चा ऋणी तर आहेच आणि हो हा प्रवास मला शेवटपर्यंत अनुभवायचं आहे...अशीच साथ आणि प्रेमाची अपेक्षा...

धन्यवाद V4!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

R. सागर,सांगली.
    सर्वप्रथम आपला *वि४* समूह 1 वर्षाचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करतोय त्याबद्दल समूहाचे संकल्पक-संस्थापक सौदागर काळे सर, संपूर्ण admin टीम आणि सर्व सदस्यांचं अभिनंदन व आभार..
      माझ्याबाबतीत बोलायचं तर मी वि४ समूहाला जोडलो गेलो साधारणपणे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये. त्यावेळी समूहाचा चौथा किंवा पाचवा आठवडा होता. नोकरीला असल्यामुळे घरापासून दूर होतो. दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी निवांत वेळ असायचा. लॅपटॉप घरी ठेवलेला. त्यामुळे मोबाईल सोडला तर करमणुकीचं साधन असं काही नव्हतंच. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर ऑनलाईन राहायची सवय लागलेली. अशातच एके दिवशी वि४ समूहाची माहिती आणि सोबत सौदागर सरांचा नंबर मिळाला. त्यावर संपर्क करून समूहामध्ये सामील झालो आणि तिथून सुरू झाला वि४ समूहासोबतचा माझा प्रवास..
    मला लहानपणापासून वाचनाची आवड. मी 5वीला असताना पहिल्यांदा एक कादंबरी वाचायला घेतलेली. तिथून कॉलेज पूर्ण होईपर्यंत तो छंद जोपासला. जे मिळेल ते वाचायचो. त्यातून वेगवेगळी माहिती मिळत राहिली. विविध माध्यमातून सातत्याने आपल्या लेखणीची छाप पाडणारे आमचे लेखक-कवी-पत्रकार मित्र संदीपदादा असोत, सीमेवर पहारा करतानासुद्धा मिळेल त्या वेळेत वाचन आणि लेखनाची आवड जोपासणारा आमचा मित्र युवराजदादा असो, साधारण वर्षभर रेल्वेप्रवासात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणारे आमचे कथालेखक मित्र मानेसर असतील, शिवाजी विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना भेटलेले सतीश सरांसारखे पत्रकारितेचा अभ्यास करणारे मित्र असतील या सगळ्यांच्या सहवासात वाचनाची आवड जोपासता आली. पण तरीही एखाद्या विषयावर लिहायचं धाडस कधी झालंच नव्हतं.
    वि४ समूहात सामील झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात लिहायचा प्रयत्न केला. लेखनाचा कुठलाच पूर्वानुभव नसताना लिहिलेली पहिली पोस्ट समूहावर टाकली. विशेष म्हणजे मी जे काही लिहिलं ते admin टीम-सदस्यांनी समजून घेत मला प्रोत्साहन दिलं. त्यामुळं लिहायचा उत्साह वाढला. त्यानंतरचे काही आठवडे प्रत्येक वेळी लिहायचा प्रयत्न केला. पुढे विविध कारणांमुळे लिखाणात सातत्य राखता आलं नाही. पण लिखाणात सातत्य नसलं तरी कमीत-कमी सदस्यांनी पोस्ट केलेले त्यांचे लेख तरी कधी थेट समूहावर तर कधी एकत्रितपणे ब्लॉगवर वाचत असतो. त्यातून बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती मिळत असते. कधी काही विषयांबद्दलचे समज-गैरसमज दूर होतात. त्यामुळं खूप छान वाटतं.
     मागच्या आठवड्यापासून ठरवलंय प्रत्येक आठवड्यात एका तरी विषयावर व्यक्त व्हायचं. कितपत शक्य होईल माहीत नाही. पण प्रयत्न सुरूच राहील. त्यासाठी आतापर्यंत पुरेशी संधी मिळत राहिली. सर्वांनी विश्वास दाखवला. यापुढेही आपल्या सर्वांची साथ मिळत राहील हीच अपेक्षा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


किशोर शेळके,लोणंद. जिल्हा सातारा.
         मी आणि माझी लेखणी  याविषयी काही मांडायचे झाले, तर दूरवर काही संबंध नसलेली लेखणी आज माझी तहान, भूक अन् झोपही घेऊन गेलीय. अगदी चार महिन्यापूर्वीचा 'वि४' केला, तर लिहायला आजिबातच आवडत नव्हतं. आवडत नव्हतं म्हणण्यापेक्षा तसं कारणच नव्हतं. कारण मी माझ्या दैनंदिन जीवनात भरपूर मोकळा असलेला वेळ, आणि महागडा मोबाईल आणि त्यातिल न संपणारा नेटपॅक हे सगळं रमी सर्कल आणि कॅन्डी क्रश खेळण्यातच खर्च करत होतो. माझे व्हाट्सअॅप गुड माॅर्निंग, गूड नाईट, एखादा जोक फाॅरवर्ड करणे, किंवा एखादा व्हिडिओ डाऊनलोड करून घेणे, यापलिकडे वापरलेच नाही.
        मानव हा सृजनशील प्राणी आहे. आपापल्या बुद्ध्यांकाच्या जोरावर आपली वैचारिक पातळी ठेवतो. आपली वैचारिक पातळी वाढवण्याची ताकद प्रत्येकात आहे, फक्त प्रखर इच्छाशक्तीची गरज आहे. कहीतरी नवीन शिकण्याची जिद्द, आणि त्यासाठी मिळालेली संधी, या दोन गोष्टी एखाद्या व्यक्तीचे ध्येय ठरविण्यासाठी नव्हे तर ते गाठण्यासाठी पुष्कळ आहेत.
        मला कविता करायला आवडत होत्या. सहा ते सात वर्षांपुर्वी महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी एका मुलीसाठी मी पाच सहा कविता केल्या, साहजिकच त्या प्रेमकविता होत्या. त्या मी माझ्या मित्रांना वाचून दाखवल्या. मित्रांनी कवितेची समीक्षा करायची ठेऊन मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. वाचक मित्रांनो, आपल्या कलेला जर योग्य ती दाद मिळाली नाही ना तर त्या कलेचा आपल्यालाच खूप राग येतो. वाटते की ऊगीचच पडलो या फंदात. मलाही तसंच वाटलं. आणि माझी लेखणी उघडन्याआधीच म्यान केली.
        आपल्या जिवनाचा मार्ग बदलून टाकणारी गोष्ट म्हणजे आपल्याला मिळणारं प्रोत्साहन. आणि नेमकं तेच मला मिळालं आपल्या 'वि४' ग्रुप वर. मी इथं आलो कसा हे महत्त्वाचे नाहीच आहे, पण मी इथं आल्यावर माझ्यात जे लक्षणीय बदल झाले, हे खूप महत्वाचं आहे, कारण इथे आल्यानंतर मला माझे 'वि४' मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळणार होतं. इथे मला ते प्रोत्साहन मिळणार होतं, ज्याची गरज मला सहा वर्षांपुर्वीच होती. इथे मला तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळणार होते. इथे मला माझ्या चूकीला समज आणि चांगल्या कामाला शबासकी मिळणार होती. इथे मला माझी दिशा मिळणार होती, माझी लेखणी मिळणार होती.

संगतीत 'वि४'च्या, मी असा आलो होतो
घेऊन माझे हाती, मी भविष्य आलो होतो

        साधारणपणे मला 'वि४' या समूहाला जोडून आठ ते नऊ आठवडे ही नसतील झाले, पण असं वाटतं या परिवारातील लोकांचे अन् माझे मागील जन्माचे काहीतरी ॠणानुबंध असावेत. या समूहातील प्रत्येक व्यक्ती मला सखा असल्याची जाणीव होते. प्रत्येक व्यक्ती मला आपलीच वाटते. या स्वार्थी जगतात अगदी निस्वार्थी भावनेने काम करणाय्रा व्यक्तींच्या परिवारात माझा सहभाग झाला, म्हणजे नक्कीच मी मागील जन्मी काहीतरी चांगलं काम केलं असणार आहे. व्यक्तीशः नाव घेण्यापेक्षा समूहातील प्रत्येक व्यक्ती तेवढ्याच आपुलकीने आणि जिद्दीने आपले 'वि४' जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतो आहे. आज या समूहाला एक वर्ष पूर्ण होत असेल तरी ज्यावेळी या समूहाची सुरूवात झाली, त्याचवेळी हा समूह कौतुकास पात्र ठरलेला आहे. यामधील कुठल्याही व्यक्तीला कोणत्याही फळाची अपेक्षा नाही. आपले 'वि४' प्रेरीत करून समाज जागृतीचे काम करणारी ही समाजसेवक मंडळी. समाजातील चांगल्या गोष्टी बाजूला आणि वाईट गोष्टी बाजूला करण्यासाठी सतत धडपडणारी लोकं. म्हणजे काय तर यांच्या सान्निध्यात येणाय्रा दगडाचं सोनं करणारा हा परीस.

 समाजकंटकांचे घाव थोपविण्या, पुन्हा लेखणीच धावली.
करण्या सृष्टीचे रक्षण, आहे 'वि४'ची सावली...

         या समुहाचा भूतकाळ मी पाहिला नाही. पण भविष्यात या समुहाचं कार्य समाजाला अजून चांगल्या मार्गावर घेऊन जाईल, यात तिळमात्र शंका नाही.

         आणि मला सामावून घेऊन, एक व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल मी 'वि४' समुहाच्या अॅडमीन टिमचा शतशः ॠणी....
~~~~~~~~~~~~~~~~~~

सौदागर काळे, पंढरपूर.
         *मा* झ्या🌱वि४🌿ग्रुपसोबत खूप आठवणी जोडल्या आहेत.हा ग्रुप मी व माझ्या साथीदारांनी का काढला असेल?त्याचा खरंच किती जणांना फायदा झाला ?तो चालू करण्याचा आपला काय स्वार्थ?आपण स्मार्ट फोन हाती येताच व्हॉट्सअपवर ग्रुप वर ग्रुप निर्माण करावे अन त्या ग्रुपने बेवारस अपत्य असल्यासारखं भटकत राहावं. तसं आपल्याही ग्रुपचे होईल का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे एक वर्ष संपताना हाती येत आहेत.ते सारे सकारात्मक आहेत म्हणून खूप भारी वाटत आहे.
     हा ग्रुप निर्माण कसा झाला.त्याची थोडी माहिती देतो.2016 आणि 2017 असे दोन वर्षे लोकसत्ता वर्तमानपत्राने वरिष्ठ महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ब्लॉग बेंचर्स ही स्पर्धा घेतली होती.ती आता बंद झाली.त्यात प्रत्येक आठवड्यातील एक संपादकीय निवडले जायचे अन पुढच्या आठवड्यापर्यंत त्याच्यावर विचार व्यक्त करणाऱ्या तरुणांकडून ब्लॉग मागितले जायचे.असे दोनदा मी त्या स्पर्धेचा विजेता ठरलो. तेव्हा मनात यायचे प्रत्येक आठवड्याचे ब्लॉग बेंचर्स विजेते यांचे व्हॉट्सअप क्रमांक एकत्र करून एक ग्रुप तयार करावा.त्यावर विचार जागर करावा.पण ते शक्य झाले नाही.पण जे माझ्यासारखे लिहिण्यासाठी धडपडत होते,वर्तमानपत्रे त्यांच्या मतांना दुर्लक्ष करत होते,काहीजण आपले मोडकेतोडके लिखाण करत असत पण ते  समाज माध्यमावर मांडत नसत, काहीजण फेसबुक पोस्ट टाकत पण व्हॉट्सअपचा वापर लिखाणासाठी करत नसत.म्हणून ठरवलं . लोकसत्तावाले आठवड्याला एक संपादकीय द्यायचे तसे आपण व्हॉट्सअपवर विषय देऊ.ते आपण आपल्या निर्माण केलेल्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू.ते ब्लॉग बेंचर्स तयार करत होते तर आपण कमीतकमी जागरूक,संवेदनशील तरुण-नागरिक व्हॉट्सअप विद्यापीठातून बाहेर येताना पाहू.ही संकल्पना मी माझे मित्र अक्षय पतंगे आणि वैशाली सावित्री यांच्यापुढे मांडली.त्यांनी तेव्हा साथ दिली अन 🌱वि४🌿नावाचा नियमाच्या अधिन चालणारा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला.
     "श्यामच्या आईने माझ्यातला श्याम असा घडविला.."असा विषय देऊन ग्रुपचा प्रारंभ केला.पहिल्याच विषयाला भरभरून प्रतिसाद मिळाला.विषयाची संख्या 1 वरून 3 पर्यंत नेली.तोपर्यंत अनिल गोडबोले आमच्या ग्रुपचे आधारस्तंभ झाले.आजतागायत आहे. पण ब्लॉग मात्र तीन -तीन विषयाचे निर्माण करणे मला झेपाणेसे झाले.अशावेळी ब्लॉग करण्यासाठी प्रविण भिकाले,करण बायस ,पवन खरात,नरेश बदनाळे जोडले गेले.त्याच बरोबर बालाजी सानप,मयुरी देवकर,जयश्री,संगीता देशमुख,जयंत जाधव,सीमाली भाटकर विषयाचे संकलन आणि ग्रुप नियंत्रण साठी जोडले गेले.काही महिन्यांपूर्वी शिरीष उमरे अर्थात शिरिषदा आम्हांला जोडले गेले अन ग्रुप नियंत्रण ,संकलन,फेसबुक पेज,तसेच काही काळ शांत व संथ गतीने चाललेल्या ग्रुपला ऊर्जा त्यांनी दिली.ते आपण पाहतच आहात.यातील काही ऍडमिन काही काळापुरते थांबले.काहींनी वेळेअभावी जबाबदारी पार पाडताना कसरत होते म्हणून ऍडमिन पद रिकामे केले.आम्ही ऍडमिन फक्त टीमपुरते उरलो नाही.तर ते एक आमचे कधीही एकमेकांना न भेटलेले पण जिव्हाळ्याचे, वादविवादाचे कुटुंब झाले आहे.ग्रुप नियंत्रण करताना आपल्याला दोघे-तिघे दिसतात.पण पडद्यामागे खुपजण निस्वार्थ भावनेने,आपल्या कामातून वेळ काढत ग्रुप चालवत आहेत.ही सारी माणसं आपली आहेत.म्हणून आभार नाही.आम्ही एकमेकांच्या ऋणात आहोत.
        *४-वि* म्हणजे *1.विद्यार्थी 2.विवेक 3.विनय 4.विरजा* हे चार मिळवून विचार(वि४) तयार केला.याचे नावापुरते ग्रुपला स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत आम्ही कधीच पडलो नाही.नकळतपणे ते सत्यात कसे आणता येईल याचा प्रयत्न ठेवला.काही मित्र मला म्हणाले ,तुम्ही या ग्रुपच्या माध्यमातून विचाराचा जागर,प्रहार करता जरा कृती पण करा.आपण सर्व जिथे-जिथे आहोत तिथे कार्य  करत आहोत.त्याच्यात सत्य,प्रामाणिकपणा भरलेला असेल तर अजून जगाला दाखवायचे म्हणून काहीतरी करायचे .हे बरोबर नाही.पण येथे होणाऱ्या विषयाचे विचार वाचून काहींनी कृती सुद्धा केली.मला वाटतं ग्रुपचे सदस्य सिद्धेश्वर गाडे हे असतील कदाचित.त्यांनी मराठी शाळेवरच्या एक विषयाचे विचार वाचून,त्यातून बोध घेऊन गावच्या शाळेतील सुधारणेसाठी पाठपुरावा केला अन त्यात त्यांना यशही मिळाले.असं त्यांनी मला अभिप्राय दिला होता.असे चांगले कृतिशील अनुभव आले.तर काही नकारात्मक बाबीसुध्दा घडल्या.आमच्या टीममधील काही ऍडमिन तरुणींना चुकीचे मॅसेज टाकुन त्रास देण्याचा प्रयत्न केला.आम्ही वेळीच ते रोखण्याचाही प्रयत्न केला.एक जणाला आम्ही ग्रुपचे नियम मोडले म्हणून रिमोव्ह केले तर त्याने रिमोव्ह का केले म्हणून मारण्याची धमकी दिली.टीमच्या व्यक्तिरिक्त कोणाला हे सांगितले नाही.तसेच पुरोगामी संबंधित,सरकार विरोधातातील काही पोस्ट फेसबुकपेजवरून आपोआप डिलीट केल्या गेल्या जात होत्या.काही असे अनुभव आहेत.जे व्हॉट्सअप सारख्या ग्रुपसंबंधी अनुभवायला मिळतील. असा एवढा विचारही केला नव्हता.
  हा ग्रुप टिकला,टिकवला त्याचे कारण एकच नियम.ते मोडण्यासाठी आम्ही बनवलेच नाहीत.ग्रुपमध्ये काहीही विषयांतर टाकले की आम्ही सरळ रिमोव्ह करत आलो.कित्येक वेळा खूप जवळचा मित्र आहे म्हणून कधीच सवलत दिली नाही.नियमांमध्ये मराठी भाषा इंग्रजी लिपीत न लिहिता देवनागरी लिपीत लिहावी ,असा अट्टहास केला.आपोआप संबंधित सदस्यांकडून मराठी भाषेचे संवर्धन होऊ लागले.अन त्यांचे सोशल मीडियावर मराठी लिखाणही सुधारू लागले.लिखाण न करणाऱ्याला रिमोव्ह करू असा नियम बनवला आहे .पण हाच नियम फक्त खूपदा काटेकोर पाळला नाही.पण यातील कुणी चुकीचा मॅसेज टाकला की रिमोव्ह करत होतो.भावनिकतेपेक्षा कर्तव्यनिष्ठतेला आम्ही प्राधान्य देत राहिलो.त्यामुळे काही जवळच्या व्यक्ती नाराजही झाल्या.पण त्यांनी वेळोवेळी समजून घेतले.
       काही महिन्यांपूर्वी मी 🌱वि४🌿ग्रुपला कामामुळे वेळ देत  नव्हतो.तर खूपवेळा आपण आता ग्रुप चालवण्याचे थांबवावे असा विचार इतर ऍडमिनना मी सांगितला.एकदा तर सदस्यांचा प्रतिसाद कमी झाल्याने 🌱वि४🌿 हे एक मढे झाले आहे.आपण कुठपर्यंत त्याचे राखण करायचे.असा शब्दप्रयोग केला.ऍडमिन टीमने समजूत काढून 🌱वि४🌿ची गाडी नीटपणे पुन्हा रुळावर आणली.आताही आमच्यातल्या खुपजणांना वेळ नसतो पण नव्या -जुन्या लेखकांचे अधिक चांगले लिखाण वाचायला मिळेल.अडकत-अडकत लिखाण करणाऱ्याचे व्यासपीठ बंद पडेल.जोडली गेलेली सर्व सदस्य-ऍडमिन पुन्हा विखुरली जातील.या विचाराने🌱वि४🌿ग्रुप आम्हांला वेळ काढण्यासाठी प्रेरणा देत राहतो.
   आमच्या टीममध्ये सर्व पक्षाचे,विचारधारेचे लोक आहेत.पण विषय निवडताना सर्वानी कधीच हाच विषय घ्या किंवा ग्रुपवर तो लादण्याचा प्रयत्न केला नाही.सर्व काही लोकशाही मार्गाने काम करत आहोत.आता विषय निवड ग्रुपवरच्या सदस्यांकडे सोपविले आहे.त्यामुळे इथे एक थोडे प्रत्येक आठवड्याला कोणते विषय द्यायचे हे टेंशन कमी झाले.
  आता पुढे काय?असा प्रश्न पडतो तेव्हा विचारबरोबर ग्रुपने कृती करावी का!असं वाटतं.पण आमच्यातले एकही एका ठिकाणचे नाही .प्रत्येकजण वेगवेगळ्या जिल्ह्यातले आहे.तर काहीजण आमच्यातले कामानिमित्त राज्याबाहेर आहेत.सर्व एकत्र येण्याची तारीख अद्यापतरी जमवता आली नाही.जे ऑनलाइन शक्य आहे ते करतो आहोत.एक मराठी साहित्यातील परंपरा म्हणून ऑनलाइन दिवाळी अंकाची भर टाकत आहोत .वेळेअभावी ठराविक सदस्यांकडून लेख घेत आहोत.ते कितपत यशस्वी ठरेल.हे आपण जाणालाच.
  ग्रुपमध्ये सर्व क्षेत्रातील लोक आहेत.त्यात विध्यार्थी, शिक्षक, कामगार, लेखक,सामाजिक संस्थाचालक, सरकारी अधिकारी,पत्रकार,डॉक्टर,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, असे विविध क्षेत्रातले मिश्रण असलेली भेळ तयार झाली आहे.या साहित्यरूपी भेळीचा आस्वाद लिहायला,मत व्यक्त करणाऱ्या महाराष्ट्रातील युवक-युवतींना होत राहावा.पुन्हा एकदा ग्रुपमधील सर्व सदस्यांचे व्हॉट्सअपचा विधायक वापर करण्यासाठी खारीचा वाटा उचलला त्याबद्दल खूप खूप आभार...तुमच्याशिवाय हा प्रवास अपूर्णच राहिला असता...

 *ही वाट अशीच दूर जावी न संपणाऱ्या प्रवासासाठी.....*
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~

 प्रमोद पांचाळ धर्मापुरी ता परळी  जिल्हा बीड
       वि४ ह्या ग्रुप वर मला येऊन खुप दिवस झाले नाहीत तरी पण मला जे अनुभव आले आहेत ते मी सांगेल
वि४ हा ग्रुप काही साध्या वेक्तिनि भरलेला नाही  इथे एका पेक्षा एक विद्वान मंडळी आहे व आपले विचार ते आशे मांडतात की त्या विचारावर त्या वाचकाने काहीना काही तरी विचार करावा म्हणण्या पेक्षा त्याने विचार करावाच लागेल  आशे विचार असतात
     सर्व मंडळी चे मी आभार मानतो कारण माझी वाचनाची सवय मोडली होती पण ह्या ग्रुप च्या साहाय्याने मला परत वाचनाची सवय लागली आहे
     मी रोज रात्री 8:30 ते सरासरी 10 पर्यंत आपले सर्वाचे विचार  वाचतो मला आपले विचार वाचनाची ओढ लागली आहे मी लिहिण्या पेक्षा वाचनातच मला रस वाढत जात आहे पण त्याच बरोबर लिखान करायची इच्छा पण होत आहे
       मी आभारी आहे वि४ ग्रुपचा मला आपण आपल्या बरोबर आणल्या बदल

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


अनिल गोडबोले,सोलापूर.
     विचार विषयी लेखन करताना फार विचार करावा लागत नाही. पण तरीही आठवत होतो.. कधी, कुठून सुरुवात झाली... आणि मला सुरुवातच आठवेना.. एवढा मी एकरूप झालो.
    तर गम्मत अशी आहे की.. लेखन करावं असं मला वाटत होत. मी कॉलेजला असताना कविता करायला आवडायचं(माझ्या कविता बाकीच्यांना सोडा.. जिच्यासाठी केल्या होत्या तिला ही सांगणं झालं नाही.. हा भाग वेगळा)..
पण लिखाण करावं हे मनात होत. फेसबुक वर ग्रुपवर लिहीत होतो. सोशल वर्कर म्हणून किंवा सोशल वर्क या विषयाचा शिक्षक म्हणून मला सामाजिक विषयावर लिखाण करावयाचे होते. पण तसा प्रसंग फार काही येत नव्हता.

माझा एक विद्यार्थी आहे. त्याने 'युवाशक्ती' नावाचा एक ग्रुप तयार केला आहे, आणि मला त्या ग्रुपमध्ये त्याने घेतलं होतं. त्या ग्रुपवर सौदागर यांची विचार ग्रुपची लिंक आली होती. लिखाण करण्याची हौस होतीच.. लगेच जॉईन झालो.

वेळोवेळी लेख लिहीत गेलो.. मला जसे जमेल तसे.. विषय सुचवत गेलो.. मला अडमिंन टीम वर घेण्यात आले व मी अडमिंन म्हणून गोंधळ घालू लागलो.

ते आधारस्तंभ वगैरे म्हणतात.. पण मला मात्र तसे वाटत नाही. मला खर तर या सगळ्याच कौतुक वाटत. सौदागरजी ब्लॉग लिहितात आणि त्यातून प्रेरणा घेऊन हे सर्व सुरू झाले..

कौतुक खरच खूप आहे कारण मराठी साहित्य आणि मराठी माणसाचे विचार याला बाजारात काहीही किंमत नसताना असा विचार करून असा ग्रुप तयार करणे, नियम करणे, संकलन करणे, ब्लॉग तयार करणे, विविध विषयावर चर्चा करणे.. अशी बरीच काम ही टीम करत आहे.

मला मात्र यातील काहीच येत नाही, हे मी अगदी मनापासून मान्य करतो. एकही व्यक्ती मला वैयक्तिक भेटलेला नाही. प्रवीण जी मात्र मला बोलवत असतात सोलापूरला आल्यावर... पण मलाच वेळ मिळत नाही..

एकदा भेटू सगळ्यांना.. तेवढाच माझ्या सारख्या पुंडलिकाला पांडुरंग भेटल्यासारखे वाटेल..

एकमेकांना न भेटता मोबाईल च्या माध्यमातून लोकांना व्यक्त करायला भाग पाडणं.. ही साधी गोष्ट नाही. मी वारंवार सांगतो त्या प्रमाणे... यातील एकही व्यक्ती एक रुपया देखील पगार न घेता अतिशय गुणवत्ता पूर्ण काम करत असतात..

मूळ याच श्रेय सौदागर जी याना असलं तरी बाकीचे फॅमिली मेम्बर भेटले. नरेशजी, पवनजी, करणजी ब्लॉग निर्मितीच काम करत असतात.. फार तांत्रिक आणि गुंतागुंतीचे काम आहे ते..!

पण सर्वजण लीलया ते पार पाडतात. वैशाली जी , मयुरीजी, संगीता जी आणि सीमाली जी यांचे योगदान देखील वाखाणण्याजोगे आहे. महिलांची संख्या अडमिंन टीम मध्ये कमी असली तरी कामामध्ये मात्र कोणीही कमी नाही.

मला आपला.. एक आनंद फुकटचा.. वर्गात मॉनिटर असल्यासारखा सगळ्यांना नियम शिकवत असतो. मुळात 'गोडबोले' असल्यामुळे चांगलं काही पटकन नाही दिसलं।तरी चुकीच काहीतरी पटकन दिसत (शिक्षक असण्याचे तोटे)

पण एक मात्र आहे. जे काही आहे ते प्रामाणिकपणे लिहिण्याचा प्रयत्न करतो. वाईट बरे अनुभव आणि समाज कार्यातील विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

बाकी अडमिंन टीम मध्ये असलेले शिरिषजी यांच्या सोबत चर्चा करणे (म्हणजे चर्चा कमी आणि नियम दाखवणे जास्त अशी महत्त्वाची काम (😳🤣) मला असतात.

ग्रुपवर सर्वाना समभाळून घेणं ही तारेवरची कसरत असते. तरी पण माझ्या मुळे काही जणांना त्रास झाला असेल तर मनापासून त्यांची माफी मागतो.

वाचक आणि लेखक वाढवणे हा उद्देश हा ग्रुप पूर्ण करत आहे.. हा माझा।विश्वास आहे. मराठी भाषा ही नक्कीच अभिजात साहित्य निर्मिती करू शकते यावर माझा ठाम विश्वास आहे.

तरीदेखील.. आपल्याकडे काहीजण कॉपी पेस्ट करून लेख टाकतात तेव्हा खुप त्रास होतो.
करणं जी ना गुगल वर कळत ते..
शक्यतो सर्वांनी 4 च ओळी का होईना स्वतःच्या लिहाव्यात अशी सदिच्छा आहे.
ग्रुप नियंत्रक म्हणून काम करत असताना काही ठिकाणी 'गोडबोले'असून 'कडू' व्हावं लागतं. कारण नियंत्रकाची भूमिका ही तशीच असते..

शेवटी... मी लिहिताना अतिशय भावनिक होऊन लिहीत आहे.. कारण हे सर्व काही घडू शकत ते सर्व आपल्या सारख्या सदस्यांमुळे..
आपण आमचं वाचन विश्व आणि।विचार विश्व समृद्ध करत आहात. त्यामुळे सर्व सदस्यांना मनापासून मानाचा मुजरा करतो..

लवकरच दिवाळी अंक काढत आहोत. काही दिवसांनी इ साहित्य सारखी वेबसाईट काढू.. एकेदिवशी साहित्य संमेलन देखील घेऊ..(अध्यक्षपदासाठी भांडण देखील करू😁).. अजून काय होईल भविष्यात काही माहीत नाही.. पण हा ग्रुप मात्र चालू राहील याची काळजी नक्कीच घेऊ..

कोणाचाही नामोल्लेख राहिला असेल तर माझ्या विसरभोळ्या स्वभावाचा भाग म्हणून सोडून देणे....

पुनःश्च.. सर्वांचे आभार
धन्यवाद
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संत कबीर यांचे विचार..आजच्या काळात किती उपयोगी.?

संत कबीर यांचे विचार..आजच्या काळात किती उपयोगी.?

शिरीष उमरे. नवी मुंबई

      संत कबीर पंधराव्या शतकातील उत्तरप्रदेशी प्रसिध्द कवी... हींदु व इस्लाम धर्मातील वाईट गोष्टींवर प्रकाश टाकुन त्या नाकारण्याचे धाडस लोकांमध्ये जागवल्यामुळे त्यांचे मित्रांएवढेच शत्रु होते. मानवता धर्म, एक ईश्वर, कर्मकांडावर अविश्वास, प्रेम, शांती सारख्या मुलभुत विचारसरणीचे पर्वक्ते... त्यांचे दोहे आजच्या युवकासाठी डोळ्यात अंजन घालण्याजोगे... पण वाचनार कोण ? महात्मा बसवेश्वरांनी कर्नाटकामध्ये ह्याच गोष्टी कबीरांच्या चारशे वर्षा अगोदर सांगितल्या होत्या. 
      गाडगेबाबांनी खुप मेहनत घेतली होती महाराष्ट्रात तरी पण अंधश्रध्दा व अज्ञान मिटवु शकले नाहीत. संत कबीरांच्या विचारांना शिख धर्मग्रंथ *गुरु ग्रंथ साहीब* मध्ये मानाचे स्थान आहे पण नवयुवकांना आपल्या संतांबद्दल फार कमी माहीती आहे. आपली थोर व खरी परंपरा माहीती होणे आवश्यक आहे. 


जयंत जाधव,लातूर.

        संत कबीर यांनी संपूर्ण आयुष्य मानव कल्याणासाठी प्रयत्न केले.त्यांची कबीरवाणी मध्ये बरेचसे प्रसंग आजच्या काळातही अनुकूल आहेत.भारताला जर खरच एक आदर्श देश निर्माण करायचे असेल तर कबीरवाणीतील विचार खूपच महत्त्वपूर्ण ठरतील.
       संत कबीर एक महान क्रांती असलेले विचारवंत म्हणून नेहमी लक्षात राहतात.सध्या जगात फक्त भारतच नाही तर बरेचसे देशांमध्ये त्यांच्या केलेल्या रचनांवर वेगवेगळ्या प्रकारे शोध सुरू आहेत. आज समाजात जी अशांतता,गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी संत कबीर यांचे आदर्श एक अनमोल ठेवा आहे.त्या दृष्टीने कबीर यांच्या विचारांनी आपण प्रत्येक सामान्य व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे.
           “ दुर्लभ मानुष जनम है, देह न बारंबार।
          तरुवर ज्यौं पत्ता झरै, बहुरि न लागे डार।।”
      संत कबीर यांचा जन्म अशा काळात झाला कि त्यावेळी सर्व जग हे अशांतीने ग्रासले होते.त्यांनी आपल्या विचारांनी पूर्ण जगात शांती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
संत कबीर यांचा प्रामुख्याने सामाजिक न्यायावर आधारित समाजाच्या निर्मितीवर भर दिला व लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला व याची आजच्या काळातही आवश्यकता आहे.
       संत कबीर यांनी आपल्या दोहेंमधून जातीभेद व वर्णभेदाला कडकडीत विरोध करुन समानतेचा शंख फुंकण्याचे,प्रेम संदेश निर्माण करण्याचे अनमोल कार्य विश्व नेहमी चिरंतन लक्षात ठेवेल.





डॉ विजयसिंह पाटील. कराड

संत कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते, धर्म जात, पंथ, या पलीकडे ते पोहोचले होते.
त्यांनीच हिंदू मुस्लिम समाज एकत्र येण्यासाठी "राम-रहीम"ही ऐक्याची भावना प्रकट केली
माणसाच्या विविध विकारावर त्यांनी, सुंदर दोहे रचले व समाजाला उपदेश केला, जो सद्यस्थितीतही लागू पडतो.
त्यांचे काही दोहे पाहू..
कहे कबीर देय तू, जब लग 'तेरी देह।
देह खेय हो जायेगी, कौन कहेगा देह।।
किती सुंदर दोहा आहे हा, हे माणसा जोपर्यंत जिवंत आहेस, दान देत राहा. एकदा मातीत गेल्यावर तुला मागायला येणार आहे?
धर्म किये धन ना घटे, नदी न घट्ट नीर ।
अपनी आंखो देखिलें, यो कथि कबीर।
धर्म,(परोपकार दान सेवा) केल्याने संपत्तीत घट होत नाही..
जीवन का मर्म समझे।
सही समय की प्रतिक्षा करे।
संतोषी परम सुखी।
कोई भी इंसांन छोटा नही होता।
प्रेम ही सच्चा ज्ञान।
जीवन का मर्म समझे।
सही समय की प्रतिक्षा करे।
संतोषी परम सुखी।
कोई भी इंसांन छोटा नही होता।
प्रेम ही सच्चा ज्ञान।
आसन मार बैठे,
मन मे बहुत गुमान(गर्व)|
पीपल (पेंड), पाथर (मूर्ती)
पूजन लगे,,
गर्व, अहंकार ग्रस्त माणसाने कितीही देवपूजा केली तरी निरर्थकच ..
ह्या सर्व दोह्यातून, त्यांनी मानवाच्या सर्व विकारांवर आसूड ओढलाय...
तोल मोल कर बोल ।
कबीर म्हणतात, भाषा/वाणी यांचा वापर फार विचार करून केला पाहिजे,
मन पर काबू रखें।
आपल्या मनात चांगले विचार जपल्यामुळे मन काबूत राहते
भले जाय बद्री,
भले जाय गया|
कहे कबीर सुनो भाई,
सबसी बडी दया ||
दया क्षमा शांती, हे गुण माणसातून नाहीसे झाले की काय अशी शंका येण्याचा काळ आहे हा !
ईश्वर अंश जीव अविनाशी,
इसिमें काबा (मक्का), इसिमें काशी |
आजच्या घडीला, धर्मद्वेष, जाती द्वेष,  याचे प्रमाण प्रचंड वाढलंय हे आपण पाहतोय. माणसातच, देव आहे, मक्का पण आहे व काशी पण,,.. किती बरोबर लागू पडतो ना हा दोहा ?
अपने को परखो, दुसरो को नहीं...
संत कबीर म्हणतात,'जेंव्हा मी विश्वातील वाईट शोधायला गेलो, तेंव्हा मला काहीच वाईट मिळालं नाही, पण जेव्हा मी माझ्यातच डोकावून पाहिलं, तेंव्हा लक्षात आलं की माझ्या इतके वाईट काही नाही..
आजच्या काळाला हा दोहा बरोब्बर लागू पडतो. बहुसंख्य समाजाला, नीती अनीती, चांगलं वाईट, हे लक्षात येईना झालंय. लोक नीती आचरण मर्यादा व संस्कार ह्यापासून लांब चाललेत. 
म्हणूनच प्रत्येकाने आपल्यात डोकावून पाहिलं पाहिजे.

माझ्या मते, संत कबीर यांनी ज्या काळात हे दोहे लिहिले, परखड टीका केली ती तीस टक्के लोकांसाठी...
आज ती सत्तर टक्के लोकांना लागू पडते.. आपलं काय मत?





*पी.प्रशांतकुमार*
*अहमदनगर*

तुम्ही जसजसा कबीर वाचत जाता तसतसे त्याच्या प्रेमात पडत जात..
कबिराचे विचार आणि आजचा काळ याबद्दल विचाराल तर.. ... तर मला कबिराचा आता हेवा वाटतो की तो आज नाहीये .. कारण...
*पाथर पूजे हरि मिले, तो मैं पूजू पहाड़ !*
*घर की चाकी कोई ना पूजे, जाको पीस खाए संसार !!*
किंवा...

.. *"कंकर पत्थर जोड़ी के मस्जिद लयी बनाय*
*ता चढ़ी मुल्ला बांघ दे क्या बहिरा हुआ खुदाय "*

यात पण हेच तर आहे की परमेश्वराला आत शोधा..
पण आज जर कबीर असता तर भाव न समजता अस लिहिल्याबद्दल दोन्ही समाजांनी त्याला सुळावर चढवलं असत..

आता आजच्या काळातील तथाकथित संतांना खालचा दोहा म्हणजे चपराक आहे .. संतच नाही तर त्यांच्या भक्तमंडळींनीसुद्धा हे समजून घ्यावं..
दोहा:-
*साधू भूखा भाव का, धन का भूखा नाहिं*
 *धन का भूखा जी फिरै, सो तो साधू नाहिं।*
*****
अर्थ:- कबीर सांगतात की साधू नेहमी करुणा और प्रेमाचा भूखा असतो.धन दौलत, पैसा यांची त्याला लालसा नसते.. आणि ज्याला असते तो नक्कीच साधू असत नाही

...धर्म /जात वगैरेंवरून भांडणाऱ्या कत्तरपंथीय लोकांना कबिराचे हे विचार निश्चित अंजन घालणारे ठरतील
*ना कुछ देखा राम भजन में, ना कुछ देखा पोथी में।*
*कहत कबीर सुनो भाई साधो, जो देखा दो रोटी में।।*

मला कबीरजी म्हणजे विद्रोही विचारांचे संत वाटतात..
आज शिक्षणपद्धतीत कबीर असायला हवा..पण नाही आहे तेही बरं.. नाहीतर आपण कबीराच एकूण योगदान 7 मार्क(परीक्षेपुरते) एव्हढच केलं असतं आणि काहींनी तर कबीर optioलाच टाकला असता

असो जाता जाता एव्हढच.
*बुरा जो देखन मैं चला ... बुरा न मिलिया कोय*
*जो दिल खोजा अपना ...  मुझसे  बुरा न कोय*




अश्विनी खलिपे, तोंडोली(सांगली).


          संत कबीर 15व्या शतकातील संत होते. कबीर हे मानवजातीचे व मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातीभेद मानत नव्हते. भारतातील सर्व समाज एकमताने चालावा व सर्वांनी एकजुटीने राहावं यासाठी अनेक महापुरुषांनी कार्य केलं त्यापैकी संत कबीर एक होते.
          संत कबीरांना हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. कबीरांचं असं मानणं होतं की राम व अल्लाह हे एकच परमेश्वराची दोन रूपे आहेत. परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही, म्हणूनच कबीर साधुसंतांना व सगळ्या देवांना एकाच परब्रह्मस्वरूप परमेश्वराची लेकरे मानत. संत कबीरांनी तत्कालीन रुढींवर प्रहार केला. तत्कालीन समाजाचे अवगुण त्यांनी अत्यंत परखडपणे दाखवले. निर्भीडता हेच त्यांच्या दोह्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यांचे दोहे आजही सर्वांना जीवन योग्यप्रकारे जगण्यास चालना देतात. त्यांनी त्या काळात लिहिलेले दोहे आजच्या समाज्यावर योग्य रीतीने लागू होतात. त्यांनी जीवनाचा खरा अर्थ सांगितला आहे. मी हिंदू नाही, नाही मी मुसलमान माझे शरीर हे पंचमहाभूतांनी बनलं आहे आणि अखेरीस ते त्यातच विलीन होणार आहे हे विदारक सत्य त्यांनी आपल्या दोह्यातून मांडलं आहे.
          संत कबीरांना खऱ्या अर्थाने लक्षात ठेवणं म्हणजे जणू स्वतःला थोडंस कबीर बनवण्याजोग आहे आणि आजच्या काळात संत कबीरांना आपल्या आयुष्यात जगवणं खूप गरजेचं आहे. संत कबीरांनी आपल्या दोह्यातून अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, मानवाने मानवजातीशी कसं वागलं पाहिजे, ऐक्याने राहायला हवे हे मांडले आहे. त्यामुळे जर आपण संत कबीर यांनी सांगितलेल्या मार्गाने जगलो तर आपल्या आयुष्यातील तसेच समाज्यातील अनेक समस्या सुटतील व आपण एकीने राहू शकू. त्यांच्या दोह्यातील प्रत्येक शब्द हा आजच्या पिढीचे मनोबल वाढविण्याजोगा आहे. संत कबीरांच्या तत्वानुसार आपण वागलो तर जगात सुख, शांती निर्माण होईल आणि सर्वच मानवजात गुण्यागोविंदाने नांदेल.

(सर्व प्रतिमा इंटरनेट वरून घेतलेल्या आहेत )

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************