सेक्स लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सेक्स लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

लव, सेक्स आणि अश्लीलता या कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे ?

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

लव, सेक्स आणि अश्लीलता या कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे ?

IMAGE SOURCE  INTERNET

शिरीष उमरे, नवी मुंबई

प्रेम, शारिरीक संबंध व अश्लीलता ह्याच्या परिवाख्या कालानुरुप बदलत आहेत...

💝प्रेम हे निस्वार्थी असतच पण त्यात अपेक्षाचे रोप उगवायला लागले की त्याला तडा जायला लागतात... 💔

प्रेम आईचे, मावशीचे, बहीणीचे, भावाचे, बाबाचे, मित्राचे, प्रियसीचे, पत्नीचे व मुलामुलीचे आणि सरतेशेवटी नातवंडांचे ह्या इंद्रधनुष्यी छटातुन 😍🌈व्यक्त होते. काही निसर्गप्रेमी, वाचनप्रेमी, क्रीडाप्रेमी, प्रवासप्रेमी, धनप्रेमी वैगेरे प्रकार पण आहेत. 🤩 ह्यातला व्यक्तीप्रेमी हा प्रकार भयंकरच असतो 😅 जसे चित्रपटातले नायक नायिका वा क्रीकेट फुटबॉलचे खेळाडुचे चाहते ...

शारिरीक संबंध हा अजुनही कुजबुज करण्याचा विषय !! तशी ह्याला राजमान्यता व जनमान्यता पुर्वीपासुन आहे. संयुक्त कुटुंब पध्दत तर शिवकालीन... त्यानंतर रामायणातील बहुपत्नीत्व ब्रह्मचरित्व तसेच महाभारतातील विवाहपुर्व व विवाहपश्चात शारिरीक संबंध, बहुपतीत्व आणि राजा शिखंडी चे नपुसंकलिंगी पात्र व गणिका व्यवसाय हे दर्शवते की आपली संस्कृती कीती प्रगल्भ होती. ह्या विषयावर वात्सायनाने लिहीलेला कामसुत्र हा अभ्यासपुर्ण ग्रंथ कींवा  मध्यप्रदेश मधील खजुराहो मंदीरातील अप्रतिम शिल्पकला वा गडचिरोली मधील आदिवास्यांची गोटुल ही मुक्तसहवासाची सहजिवनाची शैली असो... आपली संस्कृती ह्या विषयाच्या ज्ञानाने समृध्द होती.

 आता मात्र कुटुंबनियोजनाचे अज्ञानामुळे वाढणारी अनिर्बंध लोकसंख्या व त्यातुन निर्माण होणार्या समस्या, असुरक्षित संबंधांमुळे होणारे असाध्य रोग, शालेय शिक्षणात अंतर्भाव नसल्याने होणारे गैरसमज, शरीर रचनेचे अर्धवट ज्ञान, शारिरीक व मानसिक स्वच्छता नसणे व ह्यातुन होणारे विनयभंग बलात्काराचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. आज पुरुषप्रधान संस्कृती मुळे स्त्रीला उपभोगाची वस्तु समजणार्यांचा कडाडुन विरोध करणे व त्यावर कडक कार्यवाई होणे हे अत्यावश्यक आहे.

राहीला प्रश्न अश्लीलतेचा तर तो उदभवतो अशिक्षणामुळे व अनैतिकतेला मिळत असलेल्या बेकायदेशीर राजमान्यतेमुळे. विकृती जन्म घेते ह्यातुन व हा मानसिक रोग मिटवण्याची सामाजिक ईच्छा च दिसत नाही त्यामुळे शिक्षण अत्यावश्यक... जागतिक आरोग्य संघटनेचा अहवालानुसार दर पाच भारतियांपैकी एक हा मानसिक रोगी असतो 😳🤔 ह्यावर विचार होणे गरजेचे ...अर्थात सगळेच विकृत नसतात. ह्यात दैनंदिन जीवनशैलीमुळे होणारे ताणतणावाचे शिकार ह्यांचे प्रमाण ९०% असते. 😅



IMAGE SOURCE  INTERNET

डॉ. विजयसिंह पाटील,
 कराड

प्रेम हा मनाचा आविष्कार,,, सेक्स(कामजीवन)ही शरीराची गरज,,, व अश्लीलता ही मनाची विकृती व त्याला शरीराने दिलेली साथ, असं मी म्हणेन..

प्रथम प्रेम म्हणजे काय ते पाहू,,,
प्रेम म्हणजे, स्नेह, आपुलकी, जिव्हाळ्याची, तळमळीची तीव्र भावना...
प्रेमाचे काही प्रकार,,, नर नारी प्रेम,,, अपत्य प्रेम,,, कौटुंबिक प्रेम,,, पशुप्रेम इत्यादी..

वयानुसार ही प्रेमाची नावं बदलतात.. लहानांबाबत स्नेह.. समान वयोगटातील प्रेम, उदा, पत्नीप्रेम, बंधू/भगिनी प्रेम, मित्र प्रेम इत्यादी.. आपल्याहुन वयाने जेष्ठ व्यक्ती साठी आदर...
मातेचे अपत्यावर असणारे प्रेम--ममत्व..
भक्ती हे प्रेमाचे परमोच्च रूप
प्रेमाची ही स्वरूपे फक्त मनुष्य प्राण्यात च आहेत असं नाही.. अपत्य प्रेम हे आपण सर्व प्राण्यांच्या त पाहतोच...
थोडक्यात प्रेम हे वैश्विक आहे व त्याला कसल्याही मर्यादा नाहीत

सेक्स /कामजीवन
आता, कामजीवन/ सेक्स ह्याबाबत पाहू...
काम  वा सेक्स ही शंभर टक्के शारीरिक गरज आहे, माणूस असो अथवा प्राणी, प्रत्येकाला सेक्स ची गरज असतेच असते. काही प्राण्यांत उदा, कुत्रा, ही भावना वर्षातून एकदाच येते ( ह्यामागचं कारण असे की, मादीला वर्षातून एकदाच पाळी येते, त्यालाच आपल्या कडे, मादी हीट वर आली अस म्हणतात).
मनुष्य प्राण्याचं तसं नाही,  काम क्रिया ही दैनंदिन जीवनातील एक गोष्ट आहे
कामक्रीडा/सेक्स ही दोघांनी मिळून करण्याची गोष्ट आहे. त्यात एकमेकांच्या आवडीचा विचार महत्वाचा आहे, त्याबद्दल बोललं पाहिजे, एकमेकांच्या मतांचा आदर ठेवला पाहिजे. ज्या गोष्टींचा त्रास होतो, त्या टाळायला पाहिजेत.
व जेंव्हा संभोगासाठी, दोघांच्या मनाची व शरीराची तयारी होईल, तेंव्हाच संभोग करणे योग्य

अश्लीलता...

अश्लीलता म्हणजे, माणसाचे काम इंद्रिये, नग्नता, व लैंगिक वर्तन, यांचा साहित्य, कला, व सार्वजनिक जीवनात, व्यक्त होणारा असभ्य ओंगळ, व्हलगर, आविष्कार होय. तो आक्षेपार्ह व अवैध असतो.
अश्लीलतेची कल्पना सामाजिक, कौटुंबिक व वयक्तिक नितीशी संबंधित आहे. ती संस्कृती शी निगडित असते. उदा. एका देशातील अश्लीलता, ही दुसऱ्या देशात अश्लीलता असेलच असे नाही.
अश्लीलता ही आक्षेपार्ह आहे हे साधारणपणे मान्य आहे. पण अश्लील म्हणजे काय, हे ठरविणे अवघड आहे.
विवस्त्र शरीर , लैंगिक वर्तन व विकृती, या अत्यंत खासगी गोष्टींचे प्रदर्शन केल्याने, लैंगिक वासना चाळवल्या जातात, . त्याच अनुकरण केल्यानं नैतिक अधःपतन होते, असं नितीवाद्यांना वाटतं.
तर दुसरा विवेकवादी गट, असभ्य व कामोत्तेजक (पोर्नोग्राफी), ह्यात फरक करून, कामोत्तेजकतेला आक्षेपार्ह मानतो.
अश्लीलता विषयक, प्रतिबंधक कायदे भारतात आहेत.
अश्लील साहित्य, नाटक, चित्रपट, प्रदर्शन, ह्यांना कायदेशीर मनाई आहे.
एक खटला गाजला, प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर, यांच्या काही कवितांवर अश्लीलतेचा खटल्यात (1947), त्यांना दोषमुक्त करण्यात आले.


IMAGE SOURCE  INTERNET

मयूर डुमणे ,
उस्मानाबाद

लव्ह / प्रेम
प्रेमासारखी सुंदर गोष्ट या जगात दुसरी नाही . इतर व्यक्तींप्रती  असलेला आदरभाव ,आपुलकी, काळजी म्हणजे प्रेम . मुलाला साधं खरचटल तरी आई चा जीव खाली वरी होतो ते आई च प्रेम असत . भूक लागलेल्या वासराने हंबरडा फोडल्याक्षणी गाई वासरांकडे धावून येते ते गाई च प्रेम . प्रेमाला जात, धर्म, प्रांत,देश अशा कोणत्याही चौकटी नसतात . भारतीय असलेली सानिया पाकिस्तानी असलेल्या शोएब वर प्रेम करू शकते तिथे देशाच्या शत्रुत्वाच बंधन आड येत नाही . या जन्मावर आणि या जगण्यावर शतदा प्रेम करावे असे मंगेश पाडगावकर सांगून गेले . इतरांवर प्रेम करण्याआधी व्यक्तीने पहिल्यांदा स्वतःवर प्रेम केले पाहिजे . स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय ? स्वतःमध्ये काही सुप्त प्रतिभा दडलेली असते त्या प्रतिभेवर आपण प्रेम केले पाहीजे .स्वतःच स्वतःचा आदर केला पाहिजे आपण आपल्या "स्व" वर प्रेम केलं पाहीजे . एकतर्फी प्रेमातून आत्महत्या अशी बातमी जेव्हा कानावर येते तेव्हा त्या व्यक्तीने खरच प्रेम केलेले असते का ? असा प्रश्न मला आवडतो म्हणून  पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करणे मला महत्वाचे वाटते .  द्वेष हा प्रेमाचा शत्रू आहे .द्वेषातून हिंसाचार जन्माला येतो तर प्रेमातून शांतता जन्माला येते . मानवतेचा धर्म वाढविण्यास, जोपासण्यास प्रेम मदत करते . साहित्य, कला, संगीत, विज्ञान अशा आवडत्या विषयां मध्ये झोकून देणे हे त्या विषयांप्रती असलेले आपले प्रेम च असते . द्वेषाने माणसे तोडली जातात तर प्रेमाने माणसे जोडली जातात .

सेक्स -
सेक्स ही मानवी शरीराची गरज आहे . अपत्य जन्माला घालणे हा एकमेव सेक्सचा उद्देश नाही . सेक्स ही वयात येणाऱ्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाची समान गरज आहे . वयात येत असताना स्त्री आणि पुरुषाच्या शरीरात हार्मोन्समुळे वेगवेगळे बदल होतात , त्यामुळे सेक्स ची जाणीव निर्माण व्हायला मदत होते .सेक्स करून बघण्याची इच्छा मनात निर्माण होते . लग्नाशिवाय सेक्स करता येत नाही असं सामाजिक बंधन समाजाने घालून दिले आहे अशावेळी masturbation हस्तमैथून करून सेक्स ची भूक भागविली जाते या मध्ये काहीही गैर नाही . लग्नाआधी सेक्स करण्यात मला काहीही चुकीचे वाटत नाही . शारीरिक भूक भागविण्यासाठी परस्पर संमतीने सुरक्षित रित्या लग्नाआधी सेक्स करणे यात मला काहीही गैर नाही . सध्य परिस्थितीत बेरोजगारीमुळे लग्नाच्या वयाचे प्रमाण वाढत आहे पूर्वी लवकर लग्न व्हायची त्यामुळे योग्य वयात सेक्स ची इच्छा पूर्ण व्हायची आता मात्र तशी परिस्थिती राहीली नाही . सेक्स करण्यासाठी स्त्री आणि पुरुषाची शारीरिक आणि मानसिक तयारी असणे एकमेकांवर विश्वास असणे गरजेचे आहे. सेक्स मधून स्त्री आणि पुरुषाला परमोच्च शारीरिक, मानसिक आनंद मिळतो . मानसिक आणि शारिरीक थकवा घालविण्यासाठी सेक्स सारखी दुसरी उपयुक्त गोष्ट नाही . पती आणि पत्नीमधील नात अधिक गठ्ठ करण्यासाठी सेक्स ही गोष्ट महत्वाची भूमिका बजावते . आपल्या जीवन साथी कडून काही कारणांमुळे सेक्स चा आनंद मिळत नसेल तर साथीदाराला विश्वासात घेऊन इतर व्यक्ती बरोबर संबंध ठेवण्यात काही सुद्धा गैर मला वाटत नाही. आपल्या  समाजात सेक्स या गोष्टीला नैतिकतेच्या बंधनात अडकवले जाते त्यामुळे सेक्स कडे पाहण्याचा दृष्टीकोन संकुचित झालेला आढळून येतो .दुर्देवाने अजूनही आपला समाज स्त्रीच्या योनीत तिचे चारित्र्य शोधतो . बलात्काराचे प्रमाण वाढण्यामध्ये समाजाची सेक्स कडे पाहण्याची संकुचित दृष्टीकोन कारणीभूत आहे . सेक्स ही मानवी शरीराची अभिव्यक्ती आहे सामाजिक बंधनामुळे ती दाबून ठेवणे घातक आहे ती जेवढ्या उत्स्फूर्तपणे बाहेर येईल तेवढे चांगले .
पुरुषप्रधान व्यवस्थेत सेक्स कडे फक्त पुरुषाची मक्तेदारी, गरज म्हणून पाहिले जाते . स्त्री कडे केवळ भोगवादी वस्तू म्हणून बघितले जाते हे अत्यंत चुकीचे आहे यांमुळे अनेक स्त्रियांची कुचंबणा होते . स्त्रियांना देखील सेक्स ची भावना, इच्छा असते  हे आपण समजून घेतले पाहिजे .
   सेक्स ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे प्रत्येकाने  या गोष्टीचा मनापासून कोणताही संकोच न बाळगता आनंद घेतला पाहीजे

अश्लीलता
मासिक पाळी , सेक्स, कंडोम यांविषयी बोलणे म्हणजे काही लोकांना अश्लील वाटते तर काहींना यात काही च अश्लील वाटत नाही म्हणजे व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अश्लीलता ठरते . अश्लीलता ही परिस्थितीजन्य असते कुटुंबात असताना जर आपण शिव्या दिल्या तर त्या अश्लील वाटू शकतात पण त्याच शिव्या जर आपल्या अत्यंत जवळच्या मित्रांमध्ये दिल्या तर त्यात आपल्याला काही च अश्लील वाटत नाही . समाजात राहताना काही सभ्यतेच्या मर्यादा पाळाव्या लागतात त्या मर्यादांचे उल्लंघन केल्यास अश्लीलता निर्माण होते . उदा . सार्वजनिक स्थळी आपण मोठ्या आवाजात शिव्या देणे ही गोष्ट माझ्या दृष्टीने अश्लील आहे . सेक्स ही प्रेमाने एकमेकांना समजून घेऊन करण्याची गोष्ट आहे पण सेक्स जर जबरदस्तीने हिंसक पद्धतीने होत असेल तर माझ्या दृष्टीने तो सेक्स अश्लील आहे . मुलींना पाहून मुलींना संकोच वाटेल असे हावभाव करणे ही अश्लील कृती आहे .

IMAGE SOURCE  INTERNET

जयंत जाधव, लातूर

नारळ हे आतून कसा निघेला हे जसं  सध्याच्या जगात ठोकपणे सांगू शकता नाही अगदी तसं लव म्हणजे प्रेम पुढे  कसे निघेल हे सांगता येत नाही.कारण प्रेमाचे संदर्भ परिस्थिती प्रमाणे सतत बदलत जाताना दिसतात. आजच्या काळात प्रेमात प्रेम कमी कामुकता व अश्लिलतेची भावना अधिक आहे. माझ्या सभोवताली असे बरेच सत्य घडलेले प्रसंग आहेत.लव सेक्स व अश्लिलता या गोष्टी क्रमाने घडणाऱ्या आहेत. एखादी गोष्ट पाहिजेच हा हट्ट देखील या घटना घडण्यास कारणीभूत ठरतात. एखाद्या स्त्रीने तुमचे प्रेम नाकारले तर तिला भावनात्मक पध्दतीने तिला भूरळ पाडून मी तुझ्या साठी काहीही करेल म्हणणारे एकदा की सावज आपल्या पाशात आले की मजा करुन तिला वा-यावर सोडणारे महाभाग गल्लो गल्ली सापडतात. शहाणपण हे कधी पण उशिरा येते पण आपल्याकडे डोळसपणा जर असला तर लव सेक्स व अश्लिलता या गोष्टी काही बिघडवू शकत नाही. सैराट चित्रपटातील सैराटपणाचे आयुष्य क्षणभर असते. वास्तव व चित्रपट यातील गोष्टीत बराच फरक असतो. खर प्रेम असेल तर रानावनात घडते. बाबा आमटे,डॉ.बंग-गडचिरोली,डॉ.कोल्हे- मेळघाट या व्यक्तीनी देखील प्रेम केले ते करताना त्यांनी सर्वच गोष्टी मिळवल्या आहेत. कामावर,पत्नीवर व निसर्गावरही केले.याला खरं प्रेम म्हणता येईल.

रोटी,कपडा व मकान या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तशी सेक्स देखील आहे.पण ते करत असताना दोन्ही जणांच्या नात्यात समजसपणा,आपुलकी,त्याग इत्यादी भावनांचा मेळ असावा. भूक लागल्यावर अधास्या सारख खाल्ले की पोट बिघडत.तस सेक्सला देखील ही गोष्ट लागू पडते. सेक्स करताना समोर च्या जोडीदारची इच्छा महत्त्वाची असते.जबरदस्ती करुन फक्त भूक मिटवता येते पण तृप्ती किंवा संतुष्ट त्याचे काय?

माझी एक मैत्रीण आहे.दिसायला एकदम सुंदर.चार चौघात उठून दिसेल अशी पर्सनॕलिटी.ती नेहमी स्पष्ट म्हणते,एखादी गोष्ट सुंदर असेल तर त्याचे कौतुक नक्कीच करावे किंवा ती गोष्ट पाहाण्यास हरकत नाही पण ते पाहताना त्यात घाणेरडी वासना नसावी व अशा नजरेवाल्यांना ती धडा शिकवायला विसरत नाही.

IMAGE SOURCE  INTERNET

स्वप्नील चव्हाण ,
बुलडाणा

   विषय निघाला तर सर्वप्रथम ज्यांच्याकडे लक्ष जाते ते म्हणजे युवा पिढी...विशेषतः पौगोंडावस्थेत असणारे ......कारण हेच ते वय असतं की ज्या मध्ये तो व्यक्ती लव्ह आणि सेक्स च्या भावनांवर आवर घालतो की वर नमूद केल्याप्रमाणे अश्लीलतेकडे जातो हे ठरते........
प्रेम ...इंग्रजीत लव्ह म्हणूयात ...ही अशी गोष्ट आहे की कोना phd झालेल्या माणसाला ही सर्वस्वी स्पष्ट करता येणार नाही.......कारण प्रत्येक वेळी.... प्रत्येक ठिकाणी..व्यक्ती नुसार ते प्रेम बदलत जात...प्रत्येकासाठी त्याची व्याख्या वेगळी असू शकते....कोणाला टाईमपास करत करत प्रेम मिळत....तर कोणाचा प्रेम करत करत टाईमपास होऊन जातो......कोणासाठी प्रेमच सगळ काही असतं ....तर बरेच जण प्रेम आहे की नाही हेच ठरवू शकत नाहीयेत.....
...तर काय असतं हे प्रेम ...???
आपल्या गरजेसाठी करतो ते खरं प्रेम की प्रेम झाल्यावर आपल्या गरजा पूर्ण होतात ते खरं....??
हेच आणि असे बरेचशे प्रश्न निर्माण होतात या पौगोंडावस्थेत.... मग काय करावं....??
आणि मग ते सेक्स करावं का....लग्नाआधी कराव की लग्न होईपर्यंत थांबावं......

प्रेमाची व्याख्या तर नाही सांगता येणार पण....हे सगळे प्रश्न ज्या वयात पडतात त्याला नक्कीच आपण पौगोंडावस्था म्हणूयात......
थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेम हे देवाचं रूप आहे.....ज्याच्या अस्तित्वावर बरेच जण साशंक आहेत पण जे त्याला मानतात त्यांच्यासाठी ती सर्वोच्च शक्ती आहे.....कुठे आहे माहित नाही पण सदैव आपल्या सोबत असावं असं वाटतं...देव असो की प्रेम.....।।
सेक्स हा एक नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे आणि त्याबद्दल आपण अनेक भ्रम बनवून ठेवलेले आहेत त्यामुळेचं लोकांचे विचार अश्लीलता या प्रकारात मोडतात......

मी जास्त या मुद्द्यावर बोलन्यापेक्षा त्यातुन होणाऱ्या अडचणी आणि निवारण कस होईल याकडे वळतो.....
सर्वात महत्वाचे हे राहील की पालकांनी त्यांच्या पाल्याशी या गोष्टींबाबत बोलणे गरजेचे राहील.......योग्य त्या वयात योग्य त्या गोष्टींची माहिती करून देणे त्यांच्याशी चर्चा करणे खूप महत्त्वाचा उपाय होऊ शकतो असे मला वाटतं..... कारण प्रेम प्रकरणामध्ये धोका मिळाला म्हणून जीव देणारे बरेच जण आपण बघतोय....जर अश्या परिस्थितीमध्ये पालकांचा सपोर्ट मिळाला तर त्यांचा जीव वाचवण्यासाठी उपयुक्त राहील....कारण माय-बापासाठी त्यांच्या लेकराचा जीव सर्वात महत्वाचा असतो..बाकी सर्व गोष्टींपेक्षा.....
आणि यासोबतच पालक स्वतः बोलतात म्हणून त्यांना हे सर्व नैसर्गीक वाटेल आणि तो अश्लीलतेचा प्रश्न निर्माण होणारच नाही........
आणि हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पालक त्यांच्या मुलांशी बोलताना थोडं फ्री होऊ शकत नाहीत....जर असं झालं असत तर बरेच प्रॉब्लेम्स सोडवण्यात यश आलं असतं....
आणि या बाबतीत तरी थोडं सरळ सरळ बोलणं गरजेचं राहील ...ते इंडिरेक्टली बोलून त्यांना समजेल ही भावना ठेवू नये.....कारण तास इंडिरेक्टली बोलताना आपण बऱ्याच गोष्टी बोलतच नाहीत हे लक्षात राहत नाही....
......आणि एक विशेष म्हणजे आज काल मुलांना पॉर्न चं वाढत आकर्षण....अगदी एखाद्या व्यसनाप्रमाणे चिटाकून बसते ती सवय....आणि सोडणं तेवढचं कठीण होऊन जात....मला तर नेट वर ते उपलब्ध असण्याचं कारणंच आतापर्यंत कळलेलं नाहीये.....कारण त्यामुळेच अनेक जण सेक्स साठी प्रवृत्त होतात...कारण ते आपल्या भावना ताब्यात ठेवण्यात असह्य होऊन जातात......आणि बलात्कार सारखे अडथळे निर्माण होतायेत...... म्हणून पालकांचं मार्गदर्शन जर असेल तर हे आणि अशे बरेच अडथळे दूर होऊ शकतील असे मला वाटते........



IMAGE SOURCE  INTERNET

अनिल गोडबोले
सोलापूर

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रजनन संस्था असते. परंतु त्याचा विकास आणि त्याचे काम हे पौगंडवस्थेमध्ये (teen age) मध्ये चालू होते, हे काही कोणाला वेगळे सांगायला नको.

लव :- प्रेम या गोष्टीबद्दल बोलताना मी आईचे प्रेम, बाबांचे प्रेम, मित्र प्रेम या बद्दल अजिबात बोलत नाही. मी फक्त स्त्री आणि पुरुष या मध्ये होणाऱ्या भावनिक प्रेमाबद्दल बोलत आहे.

माणसाचे वागणे हे त्याच्या भावनेवर अवलंबून आहे त्यामुळे वयात आल्या नंतर प्रजनन होण्यासाठी किंवा आपल्या सारखा जीव जन्माला घालण्यासाठी स्त्री आणि पुरुष एकत्र यावे लागतात..
पण खरी इथंच तर गोची होते.. हे असे एकत्र येऊन जात नाहीत तर आयुष्यभर एकमेकांना आपल्या सोबत राहण्यासाठी बांधून ठेवण्यासाठी मानसिकरित्या एकत्र येतात.
तेव्हा आकर्षणातून सुरू झालेला प्रवास हा प्रेम आणि मग भावनिक गुंतवणूक इथपर्यंत येतो.

प्रेम हे स्त्री आणि पुरुष या मध्ये होत. किंवा समलिंगी संबंध असतील तर त्या जोडप्या मध्ये ही असू शकत. त्याला जात,धर्म, देश,संस्कार, दिसणं किंवा एकूणच अमुक बंधन असेल असं नाही.. पण आपल्याला अस वाढवलेलं आहे की आपण या सगळयांच्या नादात आपलं खर प्रेम विसरून जातो..
आणि मग खूप साऱ्या स्टोर्या चालू होतात


सेक्स:- प्रेम आहे हे दाखवण्याची किंवा अनुभवण्याची उच्च पातळी म्हणजे सेक्स. शारीरिक संबंध हे माणसाला शारीरिक आणि मानसिक सुख देण्यासाठी असतात. आपल्याकडे सगळ्यात जास्त (शक्यतो मुलींना) बंधन घातली जातात कारण लग्न होण्याआधी तिने कोणाशीही शरीर संबंध ठेवू नयेत. असे संबंध असलेली व्यक्ती(शक्यतो मुलगीच काही ठिकाणी मुलांना देखील त्रास असतो.. ) व्यभिचारी, वाईट चाल असलेली(भौतिक शास्त्रात नसलेली चालीची व्याख्या) किंवा वाया गेलेली मानतात.

तरीसुद्धा कधीकधी शारीरिक गरज ही शिकवणुकीच्या बाहेर वर्तन करायला भाग पाडते तेव्हा ते सगळं होत खर... पण नंतर ते खूप मानसिक ताण करून घेतात.

सेक्स फक्त प्रेम केलेले किंवा लग्न केलेले व्यक्ती एकमेकांसोबत करतात, असा खूप मोठा गैरसमज आपल्या संस्कृती मध्ये आहे. ज्याला जशी संधी मिळते तो त्या प्रेमाणे फायदा घेत असतो नाहीतर आपल्या कडे देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची आणि हल्ली तर असे काही तरुण मुलं आहेत जे असा व्यवसाय करतात त्याची खूप मोठी बाजार पेठ भरली नसती.

पॉर्न साईट च मार्केट आहे, गंमत म्हणून चालणारे सेक्स क्लब आहेत(अरेच्या ! हे तर आम्हाला माहीतच नव्हतं .. अस म्हणू नका), कॅज्युअल सेक्स च्या नावाखाली पण बरच काही चाललेलं आहे.. याच एक वेगळं मार्केट आहे पण तो काही आजचा विषय नाही..

आमच्या वेळेला नव्हतं बाबा असलं अस म्हणणाऱ्यांना फक्त त्यांना संधी मिळालेली नसते बाकी एड्स चा प्रसार भारतात झाला तेव्हा.. या एकनिष्ठ असण्याचा बुरखा टराटरा फाटलेला आहे.

या मध्ये कुठेही बलात्कार, अमिश दाखवून किंवा दाखवून केलेलं सेक्स, किंवा नकळत मनाविरुद्ध घेलेला फायदा याला अजिबात पाठिंबा नाही. ते चुकीचेच आहे.

ग्रुप सेक्स हा त्या ग्रुपवर अवलंबून आहे. समलिंगी संबंध हे देखील मान्य समंध आहेत. काहीच नाही तर हस्तमैथुन हा सुरक्षित प्रकार आहे.(जर एका पेक्षा अनेक व्यक्ती सोबत शरीर संबंध असतील तर निरोध चा वापर जरूर करा.. कारण गुप्तरोग आणि एड्स सारखे आजार वरून कळत नाहीत)


अश्लीलता:- सेक्स आणि प्रेम यांच्यामध्ये आलेली विकृती किंवा असंवेदनशीलता आणि माज आल्यामुळे माणूस जे वागतो ना.. ते वर्तन अश्लील वर्तन आहे.

विकृत मनोवृत्ती चे व्यक्तीच अश्लील असू शकतात. मुलांनी मुलींशी कसं वागायला पाहिजे किंवा मुलींनी मुलांशी कस वागायला पाहिजे या पेक्षा कस नाही वागायचं हे शिकवायची गरज आहे.
सामाजिक सभ्यता मोडणे, अश्लील हावभाव करणे हे सुदृढ मन नसलेली लक्षण आहेत. त्यांना मानसोपचार तज्ञाकडे ताबडतोब नेणं गरजेच आहे.

फार काही बोलणं गरजेच नाही फक्त.. कोणी कोणाशी प्रेम करावे कोणी कोणाशी सेक्स करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
पण एखाद्याच्या सन्मानाला ठेच पोहोचेल अस न वागणं हा मात्र संस्कृतीचा भाग असला पाहिजे.

तर.. प्रेम करा.. सेक्स करा (सुरक्षित करा).. आनंदी रहा पण घाणेरडी हरकत किंवा त्याने एखाद्याला त्रास होईल असे वागलं तर त्याला मानसोपचार देण्यापलीकडे काही उपयोग नाही असं माझं मत आहे.

IMAGE SOURCE  INTERNET

अश्विनी खलिपे,
तोंडोली (सांगली)

          संध्याकाळ होताच रातराणीनं उमलावं, अंधाराच साम्राज्य सगळीकडे पसरलेलं असलं तरी डोळ्यांच्या वाटेने न येता नाकाच्या मार्गाने सुगांधाच्या रूपाने मनात घुसावं आणि त्यावेळी आपल्याला जे सुख, प्रसन्नता मिळते अगदी तीच हळुवार जपण्याजोगी भावना प्रेम झाल्यावर मनाला अनुभवता येते. प्रेम म्हटलं की मन आलंच आणि मन म्हंटल की प्रेम आलंच. प्रेम हे कोणत्या एका नात्यासाठी सिमीत नाही, जिथं नातं तिथं प्रेम असतं. आई-वडील, भाऊ-बहीण, मावशी-काका, आजी-आजोबा अशा अनेक नात्यांमध्ये प्रेम लपलेलं असतं आणि याव्यतिरिक्त म्हणाल तर मग राष्ट्रप्रेम,  पुस्तकप्रेम, मैत्रिप्रेम, प्राणिप्रेम अशा प्रेमाची गणना ही प्रेमातच केली जाते. याचाच अर्थ असा की एखाद्या गोष्टीचा आपल्याला लागलेला ध्यास म्हणजे प्रेम. पण या प्रेमाला ही काहीतरी मर्यादा असतात, मर्यादेपलीकडचे प्रेम हे स्वतःसाठी किंवा इतरांसाठी विनाशकारी ठरतं यात काही शंकाच नाही. प्रेमाची भावना कदाचित आतापर्यंत सर्वांना कळली असेलच आणि प्रेमाबद्दल इतक्या जणांनी लिहिलंय की आता त्याबद्दल लिहायला कदाचित काहीच शब्द उरले असावेत असं मला तरी वाटतंय.
          सध्या प्रेम असा शब्द जरी कानावर पडला तरी प्रत्येकाच्या मनात एकाच प्रेमाचा विचार डोकं वर काढतो आणि सगळ्यांच्या नजरा बदलतात. आताच्या प्रेमात पावित्र्य उरलेलंच नाही असं बोलणं ही वावगं ठरणार नाही, कारण प्रेम फक्त मनाची भूक म्हणून उरलेली नाही. प्रेमात त्याग, ओढ, निस्वार्थपणा, विरह कुठंच दिसत नाही. पूर्वी प्रेम नजरेतून मनात आणि नंतर लग्नाच्या रूपाने जगासमोर यायचं आणि आताच्या प्रेमात नजरा कुठं कुठं घुसतात त्याला सीमाच उरल्या नाहीत. एकंदरीत काय तर, आजचं प्रेम म्हणजे लॉजवरची गेम एवढंच झालंय...
          प्रेमानंतर जी भावना जन्म घेते ती म्हणजे सेक्स. सेक्स म्हणजे शारीरिक संबंध, शरीराला लागलेली भूक. मुलं-मुली वयात येताना शरीरात होण्याऱ्या अंतर्गत बदलांमुळे निर्माण होणारी शरीराची गरज म्हणजे शारीरिक संबंध. वयात येताना या भावना होणं आणि एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं स्वाभाविक असतं पण त्यालाही काहीतरी मर्यादा असावी लागते; म्हणून वेळीच काळजी घेणं योग्य असतं, कारण वाहणाऱ्या प्रवाहात जर स्वतःला झोकून दिलं तर अंत होणं निश्चित असतं. सेक्स च्या भावना प्रकृती साठी चांगल्या असतात असं डॉक्टरांचं ही म्हणणं आहे पण त्या मर्यादेबाहेर गेल्या तर त्याची विकृती व्हायला वेळ लागत नाही. विकृतीतूनच पुढे बलात्कारासारख्या घटना घडतात. सेक्स हा प्रकार खऱ्या अर्थाने लग्नानंतरचं योग्य असं वैयक्तिक माझं तरी मत आहे. सेक्स हे दोघांच्या सहमतीने करण्याची गोष्ट आहे, कारण यात फक्त शरीराची भूक शमवणं गरजेचं नसून; सुखाची प्रचिती करून देणाऱ्या भावनेला अनुभवणं ही तितकंच गरजेचं असतं. सेक्स हा विषय आजही एकांतात कुजूबुजण्याचा विषय आहे असं मानलं जातं, त्यामुळे याबाबतीतील संपूर्ण ज्ञान योग्य वयात स्पष्टपणे न मिळाल्यामुळे आजची पिढी चुकीच्या दिशेने भरकटत चाललेली दिसते.
          अश्लीलता काल्पनिक आहे असं माझं मत आहे, कारण अश्लील काय आहे व काय नाही हे निश्‍चितपणे ठरवणं शक्य नाही, ज्याच्या त्याच्या कल्पनेप्रमाणे ती उदयास येते. अश्लील म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, हे ठरविणे कठीण आहे, कारण अश्लीलता ही लैंगिक गोष्टींशी जरी निगडित असली तरी त्यासाठी इंग्लिश शब्द वापरले तर त्यात अश्लील काहीच वाटतं नाही, पण त्यासाठी जर ग्रामीण बोली भाषेतला शब्द उच्चारला तर तो अश्लील मानला जातो, म्हणून अश्लीलतेचा प्रश्न न काढलेलाच योग्य असं मला तरी वाटतंय.

बलात्कारी विकृत लोक.. अशा किती निर्भया वर अत्याचार केल्यावर आपण पेटून उठणार? (भाग-१)

🌱 वि४🌿 व्हॉट्सअप ग्रुप

   📄आठवडा 24वा📝
14 एप्रिल ते 20 एप्रिल 2018

बलात्कारी विकृत लोक.. अशा किती निर्भया वर अत्याचार केल्यावर आपण पेटून उठणार? (भाग-१)

१.पी. प्रशांत कुमार,अहमदनगर
२.करण बायस,हिंगोली.
३.राज इनामदार,पंढरपूर.
४.संदिप बोऱ्हाडे,वडगाव मावळ,जि.पुणे.
५. सौदागर काळे,पंढरपूर
६.किरण पवार,औरंगाबाद
७. महेश देशपांडे,उस्मानाबाद.
८.ज्ञानेश्वर टिंगरे,उस्मानाबाद.
९. मयुरी देवकर,पंढरपूर.
१०. लक्ष्मी यादव,मुंबई

(यातील सर्व  छायाचित्रे इंटरनेटवरून घेतलेली आहेत)

यांचे विचार सविस्तर वाचा:-

पी.प्रशांत कुमार,अहमदनगर
परवाच मित्राच्या  घरी गेलो.. बारीक केस केलेली त्याची मुलगी ..काका काका करत बिलगली..  "काय रे किती बारीक केले केस अगदी मुलगाच वाटते.."
"...हो त्यासाठीच .."..शांतपणे मित्र म्हणाला..
...मोठे केस सुंदर दिसत होते रे..मग मलाच भीती वाटायला लागली.. आता समजतंय मुलीचा बाप होणं किती कठीण आहे ते..
....मला ते समजलं मीही एका मुलीचा बाप आहे..
मीही बरच काही केलं अगदी अगदी कराटे क्लास लावण्यापासून... मग वाटत रफ आणि टफ बनवण्यात आपण तीच बालपण तर नाही ना पणाला लावत??.. मुलींना सशक्त बनवण्या सोबतच मुलांना(boys) आचार विचार शिकवण गरजेचं आहे
....भीती वाटते..म्हणून स्कूल बस ऐवजी स्वतः सोडतो आणतो..भीती वाटते म्हणून जवळच्या ठिकाणीही सायकलवर पाठवणं टाळतो ..भीती ..रोज भीती वाटते.. आणि ती नीरागस आहे म्हणून तर जास्त..

पण हे माझं वागणही चुकतंय.. मी काळजी घ्यावी हे ठीक पण अति घेणं चूक..  का आपल्याकडे आपण सर्व काही मुलींनाच सांगतो..उलट काही अतिशहाने महाभाग तर ती अशी वागली रात्री बाहेर होती म्हणून झालं असलं समर्थन करताना दिसतात तेव्हा ते रागाचा पारा चढतो..
का आपल्याकडे कायद्याचा धाक नाही? कमकुवत कायदा नाही तर राबवणारे आहेत..जिच्यावर  अत्याचार झालाय आपण तिच्याकडेच गुन्हेगार म्हणून पहातो.. हे सर्व चीड आणणार आहे..
...
अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांच्या समर्थनार्थ जेव्हा तिरंगा घेऊन मोर्चे निघतात तेव्हा आपल्या भावना का दुखावत नाही..
....सत्ताधारी पक्षाचे एक आमदार मीडियासमोर म्हणतात की,'तीन बच्चों कि माँ पर रेप कैसे हो सकता है..' वगैरे तारे तोडतात तेव्हा आपल्याच लाज वाटते..

आम्ही कायदे कडक करू.. वगैरे वालग्नांना काहीही अर्थ नाही.. आहे ते कायदे जर व्यवस्थित वापरले तरी खूप होईल.. कायद्याच्या राज्याचा धाक असावा.. आणि स्त्री अत्याचाराच्या सर्व केस साठी एक स्वतंत्र fast track Court असावं..  आणि मुबलक पैसा ओतून श्रीमंत आरोपी सुटणार नाहीत याची काळजी घ्यावी..
...लक्षात घ्या ..  खूप उशीरा न्याय मिळणं हे ही एक प्रकारे न्याय नाकारणच होय..

करण बायस ,हिंगोली
आपण अशा देशात राहतो जिथे लोक ‘मी हिंदू आहे’ ,’मी मुस्लिम आहे’ असं म्हणायला लोकांना आवडते. पण खुप कमी लोक आहेत जे मनापासून म्हणतात की ‘मी भारतीय आहे’.लोकांची मानसिकता बदलण्याची नाही .

हिंदू संस्कृती मध्ये नवरात्री च्या वेळेस कुमारीका ची पुजा केली जाते आणि दुसरीकडे हिंदू देवाच्या मंदिरात बलात्काराच्या घटना घडतात.

ती मुस्लिम होती म्हणून काही लोक बलात्कारी लोकांना वाचवण्यासाठी पुढं येतात,खुप वाईट आहे हे. पण देवासाठी तर सगळे सारखेच ना. आपण ज्या मंदिरात देवाला शोधतो तो देव कुठे गेला होता?आज पर्यंत मी देवाच्या मूर्तीला निर्जिव समजत होतो पण नाही त्याला पण आता जात समजू लागली आहे. ‘मला वाटते देवसुद्धा आता जातीवादी झाला आहे.’ 😢  

मी कुठेतरी वाचलं होतं आणि ते एकदम खरं लिहिलेलं होत *‘Even I'm nude in my room,but you don't have any Right to Rape me’.*
राज इनामदार,पंढरपूर
*आज़ भारतकी बेटियोंके* *तनपरही नही , मनरभी हो रहा है बलात्कार*
*अगर एैसेही खत्म होती रही बेटियाँ तो कैसे चलाओगे संसार*

आजकाल कुठल्याही वर्तमान पत्राची आपण पाने चाळली असता , बलात्काराच्या बातम्या हमखास असतात .ज्या देशात स्त्री ला देवी समजलं जाते , तिची पूजा केली जाते , ज्या देशांत  शक्तीची आध्यदेवता स्त्री आहे .
त्या देशात आता रोजचेच बलात्कार होतायत , या पेक्षा मोठ दुर्दैव काय म्हणायचे.

*यत्र नार्यस्तु पुज्यंते रमनते तत्र देवता*
अर्थात: जिथं ठिकाणी स्त्री ची पूजा केली जाते , सन्मानाची वागणूक दिली जाते , त्या ठिकाणी ईश्वरीय क्रुपा होते , तेथे देवता वास करतात .
आपल्याला आपले धर्म ग्रंथ स्त्रीच्या आदर करण्याची शिकवण देतायत ...त्या भारत देशात दिलीच्या निर्भया , कोपर्डि येथील घटना , उ.प्रदेशातील घटना .राजस्थान , गुजरात , कर्नाटक येथील गर्दोली ..तमिळनाड् , आसाम अशा अनेक राज्यात सरास बलात्कार झालेले आपण वाचले असेल ..
 पण पुढे त्या नराधमाना काय शिक्षा झाली याकडे कोण लक्ष देतोय ..इथे काहीजण म्हणत आहेत अरे बलात्कार आमच्या समाजातील किंवा जातीतील मुलीवर झाला असता म्हणजे सांगितले असत , पेटवा पेटवी केली असती , तोडले असत , कापले असत , आम्हीं काय आहे , हे दाखवलें असते .
मित्रांनो आपल्या समाजातील , जातीतील मुलीवर बलात्कार झाल्यावरच पेटायच तोडायच , सरकारला हिसका दाखवायचा म्हणल्यावर , कस आपण म्हणू शकतो की आम्हीं सारे भारतीय बांधव आहोत .
सर्व प्रथम आपण लक्श्यात घेतलं पाहिजे की आपण सर्व भारतीय आहोत , भले राज्य कुठंलेंही असो .आणी जाती फक्त दोनच आहेत स्त्री आणी पुरुष ..मग स्त्रीवर   बलात्कार झाल्यावर , या पुरुष जातीने पेठुन उठून न्यायासाठी सरकारला धारेवर धरायला नको का ?
मग आम्हीं कधी पेठुन उठनार आहे , कधी आमच रक्त सळसळनार आहे ..अरे आपण जिवंत असल्याचा पुरावा देणार आहोत की नाही .आपल्याला आपल्या आपली मुलगी , बहीण याच्या चांगल्या भविष्याची काळजी आहे की नाही ..आम्हीं सरकारला केंव्हा धारेवर धरणार आहोत .आम्हीं जाती पातीच्या कोशातूंन बाहेर पडून केंव्हा सूजान नागरीक बनून लढणार् आहोत .
बलात्कारमुक्त भारत केंव्हा करणार आहोत ?
   कठुवा येथील घटनेने तर माणुसकीलाच काळिमा फासला , अरे शैतान सुधा लाजला असेल , जनावरेही आपआपसात बोलत असतील आपण माणूस नाही ते बरे आहोत म्हणुन .इतका माणूस ख़ालच्या पातळीला गेला .
साठ वर्षाच्या एका शैतानाने 8 वर्षाच्या मुलीवर पाशवी बलात्कार केला .नंतर त्याच्या मुलांने व पूतन्यानेही बलात्कार केला ..परराज्यातुंन ऐकाला बलात्कार करण्यास बोलावन्यात आले .सतत आठ दिवस ड्रॅगचे इंजेक्शन देवून तिचे लचके तोडण्यात येत होते .तीची विल्हेवाट लावण्यास पोलीसानाही यांनी सामील करून घेतले व पोलिसांनीही सदरक्षनाय खलनिग्रहनाय विसरून मेलेल्या मुलीवर ही बलात्कार करत्यात तेंव्हा डोक सुन्न होतेय ! हे वाचून , अजस्त्र नागांनी चावा घेवा तस होतय ,मती गुंग आहे .वारंवार त्या मुलीचा चेहरा समोर येतोय आणी म्हणतोय ..मला न्याय दया मला न्याय दया .
ही घटना तर सुन्न करतेच पण नंतरची घटना वाचून वाटंत आपण कुठल्या देशात राहतोय. छ. शिवराय , म गाँधी , शाहू फुले,  आंबेडकर यांच्या देशांत की.
रस्त्यावर उतरून नराधमांना वाचवन्यासाठी हातांत तिरंगा घेवुन , भारत माता की जय म्हणनार्या त्या धर्माँध जातीयवादी संघटनांच्या , काळे कोट घालून आरोपीच्या बाजूने असणाऱ्या त्या कायदेपंडिताच्या , आरोपीचे गोडवे गानार्या त्या दोन मंत्र्यांच्या. अरे कसली मानसिकता झालीय तुमची , घाणित लोळणार्या डुक्करापेक्षाही खाली घसरलात तुंम्ही इतके धर्मांध कसे काय झालात . अरे सिरियातील लोक सुधा इसिसवाल्याना म्हणत असतील .अरे सीरियाचा भारत बनवू नका , इतके खाली घसरलें आहेत ह्या नीच आवलादी .
अरे जगातील सगळ्यात भंगार देश , नालायक असा पाकिस्तान देश , त्या देशात गेल्या काही महिन्यात एका लहान मुलीवर बलात्कार झाला व नंतर तीची हत्या करण्यात आली .तेंव्हा तेथील कोर्टाने केस फास्ट ट्रेक वरती घेवुन आरोपीला पाँच दिवसांतच फाशीची शिक्षा दिली .स्त्रीला न्यायाच्या बाबतीत आम्हीं त्या देशाच्याही माघे पड़ाव कसलं आमच दुर्दैव आहे .
न्हाय अस होणार नाही ..ही भूमी पवित्र आहे , ही भूमी छ शिवराय यांची आहे .इथे स्त्रीची अब्रुवर नजर टाकणार्या पिसाळलेल्या कुत्र्यांना न्यायालयाने ठेचल तर ठीक नाहीतर ..त्या कुत्र्यांना ठेचायच कामं येथील तरुणांना कराव लागेल हे मात्र नक्की .

संदिप बोऱ्हाडे,पुणे
बलात्कार हा मानवी जीवनातील सर्वात भयानक, माणुसकीला काळिमा फासणारा, हत्येपेक्षाही जास्त गंभीर असा गुन्हा आहे. त्याचं कोणत्याही अवस्थेत समर्थन होऊच शकत नाही.
बलात्कारी वृत्तीचा आता तर कहर होत चाललेला आहे.. फक्त बलात्कारच नव्हे तर सामूहिक बलात्कार करताना व्हिडीओ शूट करायचा आणि तोही सोशल एप्सवर प्रसारित करायचा इतकं धाडस आणि विकृती वाढत चाललेली दिसते ..आश्चर्य म्हणजे इतके बिनधास्त हे व्हिडीओ फिरत असताना पोलिस किंवा कायदा काही करु शकत नाही....???

    भारतात 3 4 प्रकरणे अत्यंत गाजली त्यापैकी थोडक्यात काही विषद करतो
१. दिल्लीत निर्भया प्रकरण झालं... थंडीत विवस्त्र करून रेप करून रस्त्यावर टाकलं... योनीत लोखंडी रॉड टाकला...
२. दिल्लीत 'गुडीया' या पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता.. योनीत मेणबत्ती आणि प्लॅस्टिकच्या बॉटल घुसवल्या होत्या...
३. सध्या इथे आसीफा चे एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे
आणि हो हद्द तर तेव्हा होते जेव्हा एका 8 महिन्याच्या मुलीवर बलात्कार झाला..ती मुलगी म्हणजे छोटं बाळ निष्पाप जीव तो... त्याला आपण मुलगी आहोत, योनी आहे आपल्याला हे पण कळलं नसेल.. आणि कोणीतरी रेप केला.

    माणसा जगाकड उघड्या डोळ्याने बघ . कोपर्डि काय, निर्भया काय किंवा आशिफा . ह्या सर्व घटना मानवता शून्य गोष्टीतून घडतात . नराधम कोणत्याही जातीधर्माचा असो त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे . मानवता संपलेली माणसे पाहिल्यावर मला कीव येते . देव काय रे नुसता उघड्या डोळ्यांनी तमाशा बघतोस . तुझंच मंदिरात हे निच काम करताना नराधमांना लाज वाटली नाही . आठ वर्षांच्या चिमुकलीला आठ दिवस देवळात ठेऊन गुंगीच औषध देऊन सामूहिक आणि पाशवी बलात्कार केला.....काय त्या देवालाही ऐकू गेली नसेल का वो तिची आर्त आणि काळीज भेदनारी किंकाळी.....एरवी न्याय आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी ज्या देवळात लोकांच्या झुंडी दिसतात त्याच देवळात चिमुकलीचे लचके तोडण्यात आले...

  जातीतल्या मुलिवर बलात्कार झाल्यावर.....हजारोच्या संख्येने..गुन्हेगारांना फाशी व्हावी यासाठी मोर्चा काढता.का ,ती आमची बहीण म्हणून.. आणि दुसर्या परकीय....मुलिंवर..महिलांवर बलात्कार झाल्यावर ती बलात्कारी...वारे...वा..भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत...आरे दिन दहाडय आया-बहीनींची इज्जत-अब्रू लुटलीजाते....आणि प्रत्येक जन बघत बसतोय......गुन्हयाला आणि गुन्हेगाराला जात नसते हे जरी ञिकाल बादित सत्य आसल तरी काहि लोकांच्या मानसीकतेतुन जात जात नाहि कोपर्डी आसो वा खैरलांजी बलात्कार म्हणजे बलात्कार आणि गुन्हेगाराला फाशीचं पण ऐकीकडे भारत माझा देश आहे आणि सारे भारतिय माझे बांधव मग मला प्रश्न विचारावासा वाटतो दिल्लीतील निर्भया,कोपर्डी
प्रकरणातील आमचीच बहीण ह्यांच्या साठी जो जमाव रसत्यावर ऊतरुण न्याय मागतो तोच जमाव आशिफा च्या न्यायासाठी रसत्यावर ऊतरेल का? पण इथे होतय नेमकं उलट इथे तुला संपवणाऱ्या बलात्कार करणाऱ्यां नराधमांना वाचवण्यासाठी मोर्चे निघाले आणि देशाचं प्रतीक तिरंगा झेंडा त्या मोर्च्यात लहरत राहिला....पण त्या झेंड्याला पण दुःख वाटलं नसेल का ग??

   लहानपणी पित्यानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलानं संरक्षण करण्याची ती वस्तू आहे.पित्यानं लग्न होईपर्यंत ती अनाध्रात राहील म्हणजे तिचा कौमार्यभंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. महिला या देखील पुरुषांसारख्याच माणूस आहेत...त्यांनाही तशाच भावभावना आहेत...अधिकार आहेत..हक्क आहेत..स्वातंत्र्य आहे..सर्वच बाबतीत.. हे अजूनही बहुसंख्य समाजाला समजतच नाही.........

   असंही काय उखाडतोय आम्ही म्हणा.. चार दिवस सगळीकडे आम्ही तुला न्याय मिळवून देण्यासाठी फेसबुक,व्हाट्सअपवर,अक्षर धुमसत असतील
आंदोलन, तमाशा...राजकारण पुन्हा काही दिवसांनी बलात्कार होत जातील... आम्ही पुन्हा फेसबुक व्हाट्स अप वर डी पी ठेवू , आंदोलने करू , मेणबत्या घेऊन तुला श्रद्धांजली वाहू आणि 8 दिवसाने सगळं विसरून जाऊ.
आम्ही माणूस आणि माणुसकी म्हणून कधीही लढणार नाही आम्ही कायम धर्माच्या, जातीच्या नावाखाली नंगानाच करत राहू..


सौदागर काळे,पंढरपूर.
खूप वर्षांपासून स्त्रीवर राजरोस अत्याचार होत आहेत.हे आताही,आजही.तुमच्या माझ्या घरात. फरक एवढाच की आपण तो बलात्कार या व्याख्येत घेत नाही. बलात्कारी विकृत लोक कोण आहेत.हे दाखवताना पाच बोटातील चार बोटे स्वतःकडे असतात. हे विसरून जातो आपण.
तुमची माझी मानसिकता ही *"कामापुरता मामा"* या म्हणीसारखी आहे.अन स्वतःस  म्हणे आम्ही याविरुद्ध कधी पेटून उठणार?

तुम्ही तिला आपल्या घरातून प्रथम हतबल करायचे,तिला आपल्याशिवाय जगता येणार नाही.अशी व्यवस्था करायची. तिला इतकं नाजूक करायचं की तू काचेचं फांडे आहे .असं सतत सांगत राहायचे.अन हे उपदेश दगडातले देव देत नाहीत तर तिच्याच योनीतुन जन्म घेतलेले हे महाभाग देत राहतात.

तिच्यावर हा समाज सतत बलात्कार करत असतो. सतत म्हणजे सतत.फक्त तो शारीरिक नसतो. जेव्हा शारीरिक होतो तेव्हा मात्र आपण साव असल्यासारखा आव आणत असतो.आज कित्येक जणांना शिव्यादेण्यासाठी *ती* लागते .हा रोजचा तिचा अपमान नाही का!आपलेच ओठ दातांविरोधात उठाव, पेटून उठलेले अजून तरी पाहिलेले नाही.

आपण खरंच पेटून उठणारे असतो ना !तर आपल्या मुलीचे, बहिणीचे,मैत्रिणीचे 7 च्या आत घरात अन 18 च्या आत लग्न उरकून टाकण्याची धडपड केली नसती.हा मानसिक बलात्कार आपल्याच माणसांकडून होत असेल तर ती न्याय कोठे मागणार?

ती जन्मतःच निर्भय आहे. पण तिच्या एकटीच्या मर्यादा आहेत ताकदीच्या.ती आपल्या एकट्याला झेपणार नाही म्हणूनच पुरुष जातीतले पाच-सहा षंढ लोक एकत्र एकटीसमोर लढायला जातात.तरीही शेवटपर्यंत ती झुंज देते.स्वतःला पुरुषार्थ म्हणून घेणारे हे काय तिचे संरक्षण करणार?

खूप राग ,मनस्ताप होतो अशा वृत्तीचा की जे शारीरिक आकर्षणासाठी वस्तू बदलल्यासारखे तिला बदलत राहतात.हे सारं त्याचं *प्रेम* या पवित्र नावाच्या खाली चालू असतं.हे काम झालं की प्रेम संपुष्टात आणतात. आज त्यातलेच कितीजण तरी मेणबत्या जाळत पुढे चाललेले दिसतात. हे काय पेटून उठणार?

....कथुआ मधील मंदिरात घडलेली अमानुष घटना डोळ्यासमोर कल्पना करताना संत गाडगेबाबांचा उपदेश : *देव* हा *"दगडात नसून"* हे सत्यापित झालं मात्र *"माणसात आहे"* हे मात्र खोटं वाटू लागलं.

बलात्कारी विकृत लोक हे आभासी आकृती आहेत.ते पुसण्यासाठी डस्टर सुध्दा तसाच तयार करावा लागेल.तरच तिची अन त्याची प्रतिमा फळ्यावर नव्याने तयार करता येईल.

खरंतर अशा गोष्टीवर  सर्व मुलींनी लिहायला हवं. माझ्यासारखे सवत बनलेले पुरुष मदत करू शकतात,कायम आधार देऊ शकत नाही.तो त्यांनी गृहीत धरायचं सोडून द्यावं. तुम्ही स्वतःच पेटून उठायला हवं.उद्याच्या प्रकाशमय दिवसासाठी.. ..

किरण पवार ,औरंगाबाद
आपण सर्रास वृत्तपत्र वाचणार, आम्ही टि.व्ही वर सर्रास बातम्या पाहणार, आता तर आम्ही डोळ्यादेखत खूणही पहायला तयार. मानसिकता अशी काय करून घेतली आम्ही की, एका आठ वर्षांच्या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहून चक्क तिच्यावर बलात्कार केला जातो आणि आम्ही फक्त  पाहण्यापलीकडे, बोलण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. हां कारण आपण बांधील आहोत ना काही करायला.
             पेटून उठण हे काय आहे नेमकं? हे आज सांगायची वेळ आलीय तरूण पिढीला. खरं सांगायचं तर अक्षरशः कल्पना केली ना तरी अंगावर काटा येतो. विचारही करवत नाही, त्या आठ वर्षांच्या चिमुकलीने कसा सहन केला असेल तिच्यावर झालेला बलात्कार....?
          लहानपणापासूनच स्त्रीवर एक प्रकारचा बलात्कारच केला जातो आणि आम्ही तरीही अभिमानाने मिरवतो, आम्हाला मुलगी आहे. मुलगी जरा कुठे मोठी झाली की, नातेवाईक तिच्याकडे ज्या  नजरेने बरयाचदा पाहतात त्याइतक अस्वस्थ दुसर काहीच करत नाही मनाला. या गोष्टी घडतात सर्रास. फरक एवढाच की, मुली याची वाच्यता कुठेही करत नाहीत. आणि करणार तरी काय म्हणून? दुखः होतं, रागही प्रचंड येतो बलात्कार करणारया प्रवृत्तींचा पण हातात काहीच नाही उरत न्याय कधी मिळणार? हे वाट पाहणं सोडल तर.....

महेश देशपांडे,उस्मानाबाद
मला या विषयावर एवढंच म्हणावस वाटत की *आपण आपली बुद्धि गहाण टाकल्यासारखे वागत आहोत*. अतिशय असंवेदनशील होत आहोत. किती जणांनी या सगळ्या घटनेनंतर आपल्या घरातील किंवा संपर्कतील महिलांना कनखर बनायला सांगितले किंबहुना त्यांना तसे धड़े दिले...ईत्यादी इत्यादी...

आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपण अक्षरशः मीडिया च्या हतातील खेळण झालो आहोत... हे खर आहे .
कोणी कितीही नाही म्हणा... अहोच आपण मीडिया च्या हतातील खेळण... किती जण विचार करतात हो प्रत्येक बातमिबद्दल...?
आसिफा प्रकरणात आता सत्य समोर येत आहे तर सगळे चुप... कोणाला दोषी ठरवनार? मीडियाला? अहो तुम्हीच तर त्यांच्या संगन्यावर विश्वास ठेवलाय...
माझ्या अशा बोलन्यामुळे बऱ्याच जणांना राग येईल पण, माफी असावी अहो खरच... जरा तरी विचार करावा प्रतिक्रिया देण्यापूर्वी...🙏🏻🙏🏻

त्यात अजुन ह्या धर्मात अस त्या धर्मात अस...

हे सगळ असह्य आहे...

तुम्ही कितीही आरडा ओरड केल्यावर कोंण लक्ष देत?
सरकार?
त्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही... तस असत तर आतापर्यंत दखल घेतली असती...

या आशा घटना होउ नयेत म्हणून
आपल्याला जाग व्हायचे असेल तर...

याला *बोलण्या पेक्षा कृतिचीच गरज आहे* अस मला वाटत आणि पुरुष महिला दोन्ही घटकानी मिळून प्रयत्न करायला हवे.
ज्ञानेश्वर तात्या टिंगरे,उस्मानाबाद.
आजच्या परिस्थितीवर विषय चर्चेला घेतला त्याबद्दल टीमचे धन्यवाद..

पण लिहिताना मनात एक प्रकारची भीती पण वाटत आहे की इतक्या संवेदनशील विषयावर लिहीताना तितक्याच तोलामोलाची भाषा वापरली गेली तरच त्या घटनांचे गांभीर्य जाणवेल अन्यथा नाही, तरीपण धाडस करून थोडासा प्रयत्न करत आहे.

आज असिफाच्या निमित्ताने देशात जे वातावरण ढवळुन निघालं आहे ते पाहता असं लक्षात येते आहे कि अशा घटना घडल्या कि हमखास चर्चा केली जाते ती जाती धर्माची.. इतके शिंतोडे उडवले जातात कि मूळ मुद्दा बाजूला पडून नवीन घटना घडण्यास पोषक वातावरण तयार करून दिले जाते.
आजपर्यंत देशातील ज्या ज्या माता भगिनींवर अन्याय अत्याचार झाले त्या सर्व भारतमातेच्या लेकी होत्या.. पण विषयाला अनुसरून गेल्या लेखात जसे मला पडलेले प्रश्न विचारले होते तसेच आज देखील काही प्रश्न मी सगळ्यांना विचारणार आहे, तुम्ही त्यावर विचार करावा आणि काही चूक असेल तर मला वैयक्तिक सांगा ही विनंती..


१ . आज असिफा वर जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहेच, मात्र इतर माता भगिनींवर असाच अन्याय अत्याचार झाला त्यावेळी आपण का गप्प होता किंवा असता ?

२. अन्याय, अत्याचार झालेल्या स्त्रियांची / मुलींची जात व धर्म बघून तुम्ही मेणबत्ती हातात घेणार का ?

३. ज्या सोशल मीडियावर, इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवलेल्या चुकीच्या कव्हरेज मुळे तुम्ही डायरेक्ट न्यायाधीश बनून आरोपी कोण हे जाहीर करण्यात मोठेपणा मानता व कालांतराने सत्य बाहेर आल्यावर मूग गिळून गप्प बसता याबद्दल मला स्पष्टीकरण हवं आहे ?

४. अत्याचार हा अत्याचारच असतो, तो विशिष्ट जातीधर्मातील व्यक्तीने केला तरच तो घटनेत बसतो आणि अन्य लोकांनी केला तर बसत नाही हे होऊ शकत नाही , मग अत्याचार ज्याच्यावर झाला त्याला जात धर्म नसेल तर अत्याचार करणाऱ्याच्या जातीधर्माचा संदर्भ प्रत्येक ठिकाणी घेऊन का बदनामी केली जाते ?

५. आजकाल व्हाट्सअप्प, फेसबुकवर निषेधार्थ प्रोफाइल पिच्चर / dp काळा करा , भगवा, हिरवा, निळा करा म्हणून पोस्ट फिरताना दिसतात.. मला सांगा आज तुमच्या असल्या आभासी श्रद्धांजलीने, निषेधाने माणूस घराबाहेर पडणारच नाही..
Dp काळे केले की काम झाले ही त्याची मनोवृत्ती वाढीस लागेल, ही विकृती अशीच वाढू द्यायची आहे का ?

६. उद्या अशाच घटना आपल्या आजूबाजूला किंवा घरात सुद्धा घडू शकतात मग उच्च शिक्षणासाठी स्वतःच्या मुलीला किंवा नोकरीसाठी बायकोला पाठवण्यासाठी सगळे तयार होतात मग त्यांना किमान  स्व - संरक्षण करण्यासाठी असणाऱ्या विविध कोर्सेस ला का पाठवले जात नाही ?

७. आज आशा घटना घडल्या कि काही चळवळी अनाहूत पणे काही राजकीय पक्षांना पोषक वातावरण निर्मिती करून देतात अन नाव मात्र सामाजिक असते ही   ' शाळा ' कधी बंद होणार ?

८. आज ज्या मीडियाच्या माध्यमातून आपणास आशा घटनांची माहिती मिळते, ही मीडिया किती विकलेली आहे हे माहिती असून सुद्धा जर सुशिक्षित म्हणवून घेणारे जर द्वेषाचे बीज समाजात पसरवत असतील तर याला जबाबदार कोण ?

धन्यवाद...


मयुरी देवकर ,पंढरपूर
खरंच मन आणि मेंदू अगदी सुन्न झाले आहेत प्राचीन संस्कृतीची परंपरा असलेल्या संस्कारमय  भारतात आपण राहत आहे असं म्हणायलाही आज लाज वाटते . काय चाललंय आज आपल्या आजूबाजूला? खरंच एकेकाळीची  प्राचीन संस्कृती, संस्कार ही सर्व विशेषणे आज निष्फळ वाटू लागली आहेत.प्राणीसुद्धा अशी कृत्ये करणार नाहीत अशा नराधमांना आज संरक्षण दिलं जातंय....... 
                 एकीकडे आम्ही स्त्रियांना किती मान, सन्मान देतो,त्यांच्या कौतुकाचे पोवाडे गायचे आणि दुसरीकडे इतक्या कोवळ्या मुलींना पाशवी अत्याचाराने नष्टच करून टाकायचे काय म्हणावे याला?कधी या वासनांनी बरबटलेल्यांचे डोळे उघडणार?आता ही वाट पाहण्याची वेळच नव्हे याच डोळ्यांना ठेचायला हवे आणि त्यासाठी जातीय राजकारण न करता माणुसकी लक्षात घ्यायला हवी.... पण आता माणुसकी म्हणलं कि पुन्हा बहिणाबाईंची आठवण झाली त्या म्हणतात 'अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस?'  खरंच बहिणाबाई अहो अजूनही हा माणूस *माणूसच* नाही झाला...या अशा गोष्टी करण्यातच त्यांना पुरुषार्थ वाटत आहे पण यांच्या या अट्टाहासापायी अजून अशा किती चिमुरड्यांना नाहक बळी जावं लागणार??? आणि हे सर्व घडत असताना अजूनही शेजारच्या मुलीबाबत हे सर्व घडत आहे मग मी मस्तच राहणार कधी आम्ही बदलणार.....एवढे करूनही हे नराधम मस्त राहतात, त्यांना काहीच शिक्षा दिली जात नाही उलट त्यांनाच प्रतिसाद दिला जातोय खरंच लाज वाटतेय अशा लोकात आपण राहतोय......
              स्त्रियांसाठी कायदे, नियम असून काय उपयोग???त्या कायद्याची अंमलबजावणी कोण करणार??? आज ७वर्षाच्या मुलीपासून ते ७० वर्षाच्या आजीपर्यंत कोणीच सुरक्षित नाही ....खरंच भय इथले संपत नाही .... परवा निर्भया, काल गुडीया, आज असिफा, उद्या अजून कोण हेच चालूच राहील जोपर्यंत आपण शांत बसू .... आता वेळ आली आहे ती स्त्रियांनी फक्त यावर आवाज उठवून, मेणबत्ती पेटवून शांत बसण्याची न्हवे तर यावर पेटून उठून लढा देण्याची आणि न्यायच मिळवण्याची व या नराधमांना शिक्षा देण्याची....

लक्ष्मी यादव,मुंबई.
१. बलात्कारी लोकांना 'विकृत'म्हणून मोकळं सोडू शकत नाही. या केसमधील व्यक्ती पूर्णपणे भानावर असतात आणि थंड डोक्याने नियोजन करून बलात्कार करतात.

२.असिफाच्या केसमधील बलात्कार करणारी अपराधीनी बलात्काराचा'बदला' घेण्यासाठी वापर केला. आजवर अनेक देश, समूह यांनी बदला घेण्यासाठी स्त्रियांवर बलात्कार केले. जवळचं उदाहरण घ्यायचं झालं तर भारत-पाकिस्तान फाळणी.आपणही बलात्कार झाल्यास 'अब्रू गेली'असच समजतो. बलात्काराच्या घटनेवर पेटून उठणारे किती तरुण बलात्कार पीडितेशी लग्न करायला तयार होतील?

३.जगात जवळजवळ  सगळीकडे लैंगिक छळ हा स्त्रियांचे दमन करण्यासाठी आणि सत्ता प्रस्थापित करण्यासाठी केला जातो. मग ते बायकोवर जबरदस्ती करणारे नवरे असू देत नाही तर लहान मुलीवर अत्याचार करणारे असोत.

४. असिफाला किंवा ज्यांच्यावर बलात्कार झाला त्यांच्या दोषींना फाशी/जन्मठेप झाली की न्याय मिळाला असं म्हणणं ही एक तात्पुरती बाजू झाली. मुळातच मुलींवर स्त्रियांवर बलात्कार होऊच नये असं वातावरण निर्माण करणं ही कायमस्वरूपी आणि टिकाऊ बाजू झाली. आपण तात्पुरत्या बाजूवर काम व्हावे म्हणून पेटून उठतो,पण दुसऱ्या बाजूसाठी आग्रह धरत नाही. मुलींना कराटे शिकवणं , त्यांना सातच्या आत घरात आणणं किंवा पोलिसांनी रात्री/दिवसा गस्त घालणं ही सगळी मलमपट्टी आहे.याच्या मुळाशी असणाऱ्या घटकांवर आपण काम करत नाही. उदा.मुलगे मोठे होऊन बलात्कारी होऊ नये म्हणून त्यांना लहानपणापासून फक्त आई बहिणीचाच नव्हे तर प्रत्येक स्त्रीचा, तिच्या हक्कांचा आदर करायला आपण पालक, कुटुंब,समाज म्हणून शिकवत नाही. उलट आपल्या मुलानं किंवा कुठल्याही मुलानं एखादया मुलीची छेड काढली तर 'men will be men' असं म्हणून नकळत त्यांना प्रोत्साहन देत असतो. आपल्याकडील सिनेमा'तू हां कर या ना कर तू है मेरी किरण'असंच शिकवितो.मुलांसमोर आपल्या बायकोला चिल्लर समजून तिचा वारंवार अपमान करणारे वडील आपल्या मुलाला आणि मुलीला स्त्रीवर अन्याय करणं आणि तिने ते सहज स्वीकारणंच शिकवीत असतात.मुळात पुरुष,मुलगे,मुली,स्त्रिया या सर्वांना प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणं, तिच्या शरीराचा सन्मान करणं हे शिकवलं पाहिजे.आपल्या/शेजारच्या/नात्यातील/समाजातील मुलानं एखाद्या मुलीची छेड काढल्यास आपण/समाज त्यावर कशी प्रतिक्रिया देतो हे विचार करण्यासारखे आहे.मुलाला काय म्हणतो आणि मुलीला काय म्हणतो?मुलीला नीट वागायला शिकविण्यापेक्षा तिला अत्याचाराचा विरोध करायला आणि मुलांना/पुरुषांना नीट वागायला शिकविण्याची गरज आहे.कोणत्याही स्त्रीवरील लैंगिक अत्याचार सहन केला जाणार नाही हा संदेश कुटुंब, समाज,शासन पातळीवर जायला हवा.

५.आपल्याकडे स्त्रियांवर लैंगिक अत्याचार वेगवेगळ्या वर्गवारीत मान्य आहे.उदा.जर एखाद्या स्त्रीवर परपुरुषाने लैंगिक अत्याचार केला तर तो बलात्कार,पण नवऱ्याची लैंगिक जबरदस्ती बलात्कार नाही.18 वर्षांच्या आतील मुलीवर लैंगिक अत्याचार झाला/शरीरसंबंध केले तर तो बलात्कार,पण तेच कृत्य त्याच मुलीशी नवऱ्याने केलं तर तो बलात्कार नाही.लग्न हे बलात्कार करण्याचे लायसन आहे.सेक्स वर्करवर बलात्कार होऊ शकतो हे आपण मान्य करत नाही. त्यामुळे लैंगिक छळ किंवा बलात्कार हा एका अर्थाने समाजमान्य आहे. खरं तर कुणीही केलेल्या लैंगिक अत्याचाराची वेदना सारखीच असते. पण आपण त्यावर पेटून उठत नाही.
६.बलात्कारीस फाशीने हा प्रश्न मिटत नाही.प्रश्न स्त्रीला वस्तू समजण्याची मानसिकता बदलण्याचा आहे; नाहीतर बलात्कारीस फाशी असणाऱ्या देशात बलात्कार होणं बंद झालं असतं.
७.दोषींवर तात्काळ कारवाई न होणं, कायद्याचा धाक नसणं हाही मुद्दा आहे.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************