कालबाह्य होत चाललेली लोककला ...आणि लोककलावंत.


कालबाह्य होत चाललेली लोककला ...आणि लोककलावंत.


झंजाड अतुल तुकाराम
 (पारनेर जिल्हा अहमदनगर)
            लावणी ,तमाशा , भारुडे ही मनोरंजनाची आणि समाज परिवर्तनाची महत्वाची साधने आहेत. पण आज लोककला आणि कलावंत यांना दुय्यम पणाची वागणूक मिळते. यात्रेत होणाऱ्या तमाशा त दगडफेक ,भांडण तंटे होतात.तसेच समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन योग्य नाही. त्याना माणूस म्हणून वागणूक न देता . जातीच्या ,धर्माच्या, बंधनात अडकवल जात. मला वाटतं, कलावंताला कोणती जात नसते. तो त्याची कला सादर करत असतो.                                 "नटसम्राट" या शिरवाडकर नाटकात कलावंत ची उपेक्षा मांडली आहे. किशोर शांताबाई काळे यांच्या  आत्मचरित्रात कोल्हाटी समाजाततील दुःख ,वेदना, मांडल्या आहेत. अशा प्रकारे लोककला वंतांची होणारी उपेक्षा थांबली पाहिजे. समाजात मान सन्मान मिळाला पाहिजे. लोककलेच संवर्धन व संरक्षण होणे त्याच प्रमाणे शासन दरबारी लोककलेला मान्यता मिळाली . तर लोककला, आणि कलावंत जिवंत राहू शकेल. 


डॉ. विजयसिंह पाटील. कराड

    आत्ता आत्तापर्यंत, ग्रामीण समाज, हा बलुते, अलुते,  फिरस्ते व मध्यभागी शेतकरी, अशा व्यवस्थेत जगत होता. बारा बलुतेदार, आठरा अलुतेदार, व मागते...  उदा. सुतार लोहार, लाकडी लोखंडी अवजारे बनवून शेतकऱ्यांना द्यावी, व त्याबदल्यात, शेतकऱ्याने धान्य द्यावं, 
    पण मागत्याचा, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपयोग न्हवता. 
देवधर्म, दानधर्म, हे ग्रामीण भागात, समाजकारण इतकं किंबहूना जास्तच महत्वाचे होते. 
   परंपरेने जे देवाधर्माच्या नावाने मागते होते , त्यांना दान धर्म केला तर पुण्य लाभेल, ह्या भावनेतून शेतकरी वर्ग दान देत राहिला.. 
  अजूनही, ग्रामीण भागात, ह्यात फारसा फरक पडलेला नाही ( माझ्या माहिती प्रमाणे, गोंधळी, वाघ्या मुरळी, )...
  नवनवीन मनोरंजन उपकरणे, बदललेली गृह व्यवस्था, ह्यामुळे, मनोरंजक कलाकारांची फार वाईट परिस्थिती आहे...
आता आपण मुख्य लोक कलाकार पाहू..
तमाशा
   तमाशाचे खेळ गावोगाव भरणाऱ्या जत्रांत, उघड्यावर किंवा तंबूंत होत असतात. तमातमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, फार्स, रंगबाजी आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते.
गण
गण म्हणजे गणपतीला केलेले आवाहन. 
गौळण
गण संपल्यावर , गौळणीं...
गोपी, मावशी, श्रीकृष्ण व पेंद्या, ह्यांच्यातील सवांद आपल्यास भरपूर हसवतात.
रंगबाजी. म्हणजे लावणी
वग
वग म्हणजे नाट्यस्वरूप कथा. या कथा पौराणिक, ऐतिहासिक किंवा लोककथा असतात. या कथांमधील संवाद लिखित नसून पात्रांनी ते केवळ स्वतःच्या बुद्दीने म्हणायचे असतात
डोंबारी
  कोल्हाटी समाजाचा ‘डोंबारी’ हा खेळात, वेडयावाकडया उडया मारत  पोट भरतो.
रस्त्यावर दोरीवरच्या उडया,  मध्येच ढोलकीच्या तालावर ठेका धरत एखादी कसरत दाखवणारी ही लोक कला . नाच व खेळ ह्या दोन्ही कला आलटून पालटून दाखवणारी, ही भटकी जमात.
 दोरीवरून चालणं, नाचणं, उडय़ा मारणं वगैरे खेळ करणं आणि भिक्षा मागणं हा कोल्हाटी जमातीचा पारंपरिक व्यवसाय. 
डोंबारी हे गावाबाहेर झोपडया बांधून राहतात.
जिथं-जिथं जत्रा होतात, त्या गावात त्यांचा तात्पुरता मुक्काम असतो. जत्रा झाली की यांचा प्रवास दुसऱ्या गावाकडे सुरू. काही प्रमाणातकोल्हाटी, लावणी या नृत्यकलेकडे वळला. 
कोल्हाटी , फण्या, खेळणी या कलाकुसरीच्या वस्तू बनवून आपली उपजीविका करतात. काही स्त्रिया गोंदण्याचा व्यवसाय करतात. 
   फाटके कपडे, शिळे अन्न रस्त्यावरच कोप-यात बसून खाणा-या या जमातीच्या कसरती बघण्यापेक्षा , आता मनोरंजनासाठी, इतर साधनं उपलब्ध झाल्याने ह्यांच्या पोटावर पाय आलाय.
गोंधळी..
   महाराष्ट्रात गोंधळी लोक गोंधळ हे विधिनाट्य सादर करतात.
  गोंधळी हे देवीचे उपासक असून ते गोंधळ कार्यक्रमद्वारे मंगल कार्याची सांगता करतात. महाराष्‍ट्रात , कदमराई व रेणूराई अशा पोटजाती आहेत.( यांनाच रेणूराव व कदमराव असेही म्‍हणतात. ) रेणुराई हे माहूरच्‍या रेणुकेचे भक्त असून ते रेणुकेचीच उपासना करतात. तर कदमराई हे तुळजापूरच्‍या भवानीचे भक्त असून तिचीच पूजा मांडतात. 
   लग्‍नासारख्‍या विधीत गोंधळास फार महत्त्व आहे. गोंधळ यात  गोंधळी महिलांचा सहभाग कधीही नसतो. गोंधळ्यांची संख्‍या चार किंवा आठ असते. त्‍यातील एक प्रमुख गोंधळी असतो, बाकी त्‍याचे साथीदार असतात. वाद्यांमध्‍ये तुणतुणे आणि संबळ ही प्रमुख वाद्ये आहेत. तर कधी गोंधळी हाच वादकाची भूमिका बजावत असतो. आणि एखादा साथीदार दुसऱ्या वाद्यासह साथ करतो.

पोतराज
कडकलक्ष्मी 'दार उघड बया आता दार उघड' असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागते. या कडकलक्ष्मीला पोतराज असेही म्हणतात. हातातल्या चाबकाने  स्वतःच्याच शरीरावर प्रहार करत स्त्री वेशात रस्तोरस्ती फिरणाऱ्या या पोतराजच्या मोकळ्या सोडलेल्या केसांच्याजटा झालेल्या असतात.  कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट भरलेला, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार झालेले घागरावजा वस्त्र नेसलेला, गळ्यात मण्यांची माळ.
   पोतराज मंगळवारी वा शुक्रवारी डफडे वाजवत गावात येतो व गावात मरीआईचा फेरा आल्याची घोषणा करतो. मरीआईने प्रसन्न व्हावे म्हणून पोतराज आत्मपीडनाचा मार्ग अवलंबतो. अंगाला डावी-उजवीकडे डोल देत नाचत असतानाच शेंदूर फासलेला कोरडा हातात घेऊन त्याचे फटके स्वत:च्या अंगाभेवती मारणे, इत्यादी. मग त्याच्या अंगात आलेली देवी तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे
 पोतराजाच्या तोंडून देते. मग स्त्रिया देवीची पूजा करून तिची ओटी भरतात. पोतराजाला पैसे व सुपातून धान्य दिले जाते

महाराष्ट्राच्या ह्या लोककला, ग्रामीण भागातील लोकांचे मनोरंजनाचे प्रमुख साधन. पण कायम उपेक्षित राहिला. प्रतिष्ठा ह्यांच्या वाट्याला आलीच नाही. प्रसिद्धी तर दुरच. बहुतांश कलावंत पाठीवर बिर्हाड घेऊन जगणाऱ्या या कलाकारांचे वृद्धापकाळात फार हाल होतात. थोड्यांना सरकारी अनुदान मिळते. शिक्षण नाही, पैसा नाही, म्हातारपणात काम ही करता येत नाही. मग पडेल ते काम करून पोट भरायची वेळ येते.
   बहुतेक कलाकारांच्या जेवणाच्या वेळा अनियमित, अपुरी झोप व त्यामुळे आजार होतात. बऱ्याच दा, पैशाअभावी दुखणे अंगावर काढले जाते.

राज इनामदार 
पंढरपूर 

   लोककलेंची निर्मिती लोकसमुहातुंन , लोकांच्या एकत्रिकरणातुंन निर्माण होते .....प्राचीन युगात मनुष्य भटकंती अवस्थेत असल्यानें ..त्याला अन्न,  वस्त्र , निवारा या गोष्टी शोधण्यात वेळ जात असे .त्यामुळे लोककला त्यावेळेस अप्रगत अवस्थेत होती ..नंतर मनुष्य आपल्या बुद्धीचा वापर करून विविध शोध लावू लागला ...शेती करण्याची पध्दत त्याला माहीत झाली .शेतीसाठी लोकं एकत्रित राहू लागली ...मनुष्य समूहाने राहू लागला . शेतीमुळे अन्न , वस्त्र , निवारा या गरजा त्याच्या भागू लागल्या मग नंतर तो लोकं कलेकडे वळला ...म्हणजेच काय तर समाज्याचा लोकं कलेवर प्रभाव पडत असतो हे नक्की .जो  समाज सुधारलेंल्या अवस्थेत असतो तिथे लोककला सुधा प्रगत अवस्थेत असते . लोककला ही राज्यश्रय यामुळे वाढली .गुप्तकालीन राज्यकाळात लोककला भरभराटीला आलेली होती . लोककला ही करमणूक व ज्ञानाचे आदानप्रदान करण्याचे उत्तम साधन आहे .स्वातंत्र चळवळीत सुधा लोककलेंच्या माध्यमातुन लोकांनमधे देशप्रेम जागरूक करून स्वातंत्र्य चळवळीचा भाग बनविले जाई .लोककलेच्या माध्यमातून जनजागृती केली जाई ..जत्रा गावातील उर्स या वेळी लावणीचा  कार्यक्रम असल्याशिवाय तो कार्यक्रम पार पडत नसे ...पण सध्या काळ बदलत चाललाय .समाजखूप सुधारलाय पण त्याच्यातील आस्वादकता कमी होत चालली आहे .रसीकता न राहिल्यानें हळूहळू लोककला लोप पावत आहे . लोक घड्याळाप्रमाणे पळत आहेत .कामाचे तास वाढले ..मिळणारा थोडा वेळ whats app व facebook वर जावु लागला ..या social media च्या जमान्यात लोककला मात्र दम तोडत आहे .

सिताराम पवार
पंढरपूर

   खरं तर "जुने ते सोने, नवे ते हवे" यानुसार नव्या कला आत्मसात करायला हवे ,कारण कला जेव्हा लोकांमध्ये पावन होते,लोकांचा प्रतिसाद दिला की ती लोककला होते.पण आपल्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कला अस्तित्वात आहेत, आणि काही विशिष्ट समूहापुरट्या मर्यादित आहेत. कलेतून लोकजागृती केली जाते .भेदी गाणी यामध्ये एकेक विषयावर स्पर्धा चालते, शिव का विष्णू असे विषय चर्चिले जातात.पोवाडा, धनगरी ओव्या, आदिवासी नृत्य, लावणी, तमाशा, वग,गोंधळ या कला सादरीकरयामागे खूप हेतू होते.आजही पोवाडा अंगावर शहारे आणतात. पहिल्या तामशमध्ये गण घौलन आणि वग असायची पण आता तामशमध्ये फक्त गाणी, dj सिस्टीम, असा प्रेक्षकांना अनुसरून बदलत आहे. आज लावणी मात्र प्रसिध्द आहे, dhulkine  लावणीचा रंग वाढवला. पण काही कला प्रेक्षकांच्या प्रतिसाद नाही मनुन ओस पडत आहेत,तर काही कलावंत नसल्याने.पण अपल्या कला जिवंत ठेवण्यासाठी काहीतरी करावे लागेल, करण पेंग्विन साठी पैसे खर्च होतो, पण कलावंतांना मानधन मिळत नाही.लावणी नाचनारीला,तमाशा करणारहाला समाज वेगळ्या नजरेने पाहतो, त्यांना कसे वाटेल की,आपल्या मुलांनी यात करियर करावं. गावच्या यात्रेत तमाशा अनु नका मानून काही लोक सांगतात पण स्वर्गात पण अप्सरा आहे हे विसरतात. काही ठिकाणी कलावंतांनी मोर्चे काढले मानधन मिळावं यासाठी, यशवंतराव चव्हाण यांनी नाटकावरील tax रद्द केला होता नाटक चालावी मनुन. पण आता मात्र कालावताची उपेक्षा होत आहे ."कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला" हा वाद आपण पहिला पण ,मला असे वाटते जीवनातील सुख दुःख अनुभवासाठी ,कला ही पाण्यात पोहता न येणाऱ्यासाठी आधार आहे, कोणासाठी भास तर कोणासाठी आभास आहे पण कला व कलावंत टिकला पाहिजे.

-अश्विनी खलिपे, तोंडोली(सांगली).
          महाराष्ट्र हे पूर्वीपासून सांस्कृतिक वारसा असलेलं राज्य आहे. आदिम काळापासून माणसांना एकत्र कळप करून राहायची जगायची सवय आहे. त्यामुळे मनोरंजनासाठी लोककला उदयास आली. लोककला अनेक प्रकारात आढळून येते. लावणी, लेझीम, पोवाडा, तमाशा, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, डोंबऱ्याचे खेळ, वासुदेव आदी प्रकारांचा समावेश लोककलेत होतो.
          खासकरून नागरीकरण न झालेल्या(आदिवासी) भागातील व ग्रामीण भागातील कलेसाठी लोककला असा शब्द बहुतांशी वापरला जातो. दैनंदिन जीवनाशी संबंधित कलात्मक आविष्काराला लोककला म्हणून ओळखलं जातं.
          समाज्यात वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, स्त्रीपुरुष भिन्नता हे सारं मोडून काढण्यासाठी अनेक संतांनी मराठीच्या माध्यमातून मार्मिक लिखाण केले. मराठी भाषा जपण्याचे काम संतांबरोबर समाजसुधारकांनी तसेच लोककलावंतांनी प्रामुख्याने केले आहे. लोककलावंतांनी मराठमोळ्या भाषेबरोबरच आपल्या लोककलेचा प्रसार आणि प्रचार केला. गोंधळ, पोवाडा, तमाशा, भारूड यांच्या सादरीकरणात रांगडेपणा दिसून येतो. यातून गायल्या जाणाऱ्या रचना पुढे प्रयोगशील झाल्या. गीते, नृत्य नट्यांच्या माध्यमातून सादर होऊ लागले. खऱ्या अर्थाने लोककलावंतांनी मराठी भाषा जपण्याचे काम केले. लोककलावंतांनी आणि शाहीर मंडळींनी हातात डफ, तुणतुणे घेऊन लोकांच्या मनोरंजनाबरोबर लोकांचे प्रबोधन केले.
          पण आज पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे लोककला मोडकळीस चालली आहे. सध्याच्या काळात समाजातील प्रत्येकजण एकच विचार करतो, आम्हाला मनोरंजनासाठी ज्याची गरज आहे ते मिळतंय की नाही. आजची परिस्थिती पाहता, मनोरंजनाची गरज भागविण्यासाठी मल्टिप्लेक्स, दूरचित्रवाणी त्याचबरोबर कम्प्युटर, मोबाईल आदी साधने उपलब्ध आहेत. हे सगळं सोडून रस्त्यावरच्या किंवा मंदिरातल्या लोककला पाहणं हे मूर्खपणाच लक्षण मानलं जातं. त्यामुळे लोककला जपल्या जात नाहीत आणि याच कारणाने लोककलावंतांना मिळेल ते काम करून पोट भराव लागतं. वृद्धापकाळात लोककलावंतांचे खूप हाल होतात कारण सरकारकडून कसलीही पेन्शन नाही आणि त्यांना त्या वयात कुठं कामही करणे शक्य नसते त्यामुळे लोककलावंत आता संपत चालले आहेत.
          लोककला समाजापर्यंत कशी पोहोचेल, यासाठी शासनाने व लोककलावंतांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी ज्या सरकारी योजना आहेत त्या कागदोपत्री न राहता त्यांची अंमलबजावणी व्हायला हवी.कारण लोककला ही अद्याप आर्थिक रेषेखाली आहे.
          लोककला जगवाची असेल तर लोककलावंतांना जगवायला हवं, त्यांचे आरोग्य, मुलांचे शिक्षण यासाठी सर्वांनी पावले उचलायला हवीत. त्यांच्या कलेचे सादरीकरण आकाशवाणी, दूरदर्शनवर व्हायला हवे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत लोककलावंतांसाठी फिरती ओपीडी तसेच फिरती शाळा करण्याचा प्रयत्न चालू आहे. यातून विद्यापीठ जिथे तमाशा चालू असेल तिथे जाऊन मोफत उपचार करणार आहे. लोककलावंत हे फिरस्थी असल्याने त्यांच्या मुलांना शाळेचं दर्शनही कधी घडत नाही त्यासाठी फिरती शाळा करून त्यांना साक्षर करण्यात येणार आहे, तसेच लोककलेचा अभ्यास, संशोधन आणि त्यांचे कल्याण अशा तीन पातळींवर विद्यापीठ काम करणार आहे. लोककलावंतांसाठी ट्रॅव्हलिंग मॅप तयार केला जात आहे, राज्यात कोठे तमाशा सुरू आहे ते ठिकाण माहीत होण्यासाठी याचा उपयोग होईल आणि याद्वारे लोककलावंतांपर्यंत फिरती ओपीडी व फिरती शाळा पोहोचवणे शक्य होईल.



सिमाली भाटकर,  रत्नागिरी

      कला म्हटले की पु ल देशपांडे यांचे सुंदर विचार डोळ्यासमोर येतात " एखाद्या तरी कलेशी मैत्री करा कारण पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील पण कलेशी असलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल" 
      पुलं चे हे प्रेरणादायी विचार आजच्या लेखात मला कलेविषयी लिहिण्यास प्रेरित करतात. 
     महाराष्ट्र म्हणजे कलेचं दालन इथे हजारो कलाकार घडले. मराठी मातीतल्या कला मग कोंकण चा दशावतार, कोल्हापुरी तडफदार लावणी किंवा आदिवासींच्या पाड्यातील वारली नृत्य, शेतकरी नृत्य, सकाळच्या समयी संपूर्ण आसमंत मोहून टाकणारा वासुदेव असो किंवा तुकडोजी चे अभंग अशा अनेक कला या मराठी मातीत रुजल्या उमलल्या आणि फुलल्या. 
         आज जग बदललं माणसं 21व्या शतकात खूपच धावत जीवन जगू लागली आणि माझा कलाकार मातीतील कला जपता जपता माती मोल ठरू लागला. गरज आहे त्याला सावरण्याची आणि कलेचा वारसा जपण्याची. 
      समाजात हिप्पोप, वेगवेगळ्या प्रकारचे पाश्चिमात्य नृत्य प्रकार आज आपण टीव्ही रियालिटी शो ला पाहतो त्यात फारच अभावाने आढळते भारतीय राज्यातील विविध सांस्कृतिक कला, कारण मुलांना मायकल जॅक्सन tv वरती कळतो पण आपल्या मातीतील कला, संस्कृती ही आपण सांगणार असतो आणि त्यातूनच घडतो कलाकार आणि जपली जाते ती लुप्त होणारी कला. 
        अनेक ठिकाणी कथकली भरतनाट्यम सारखेक्लास चालतात पण लोककला ही कुठे शिकवली जात नाही तर ती जपावी लागते. 
        विविध  प्रकारातील नृत्य सादर करणाऱ्यां एक विनंती कधीतरी आपल्या मातीतील कलेला जपण्यासाठी आणि जगाला कळावं म्हणून आपली संस्कृती आणि कला यातलं काही सादर करा आणि कलेला जिवंत राहू द्या. 
       कोंकण सारख्या भागात नमन, दशावतार, पालखी सोहळा हे खूपच कमी होऊ लागले. शिमगोत्सव साठी ओसंडून वाहणारा उत्साह, समजू दे संपूर्ण जगाला. 
   मला इतकंच सांगायचं की कलाकार जगला तर कला जिवंत राहील आणि कलेतून संस्कृती जपली तर वारसा पुढे जाईल. 
    लावणी ही खूप सुंदर प्रकार पण लोकांनी त्याला नकोत ते लेबल लावले आणि लावणी हरवुन गेली. 
         आज अशा कलाकार मंडळी साठी आणि कले साठी उपक्रम राबविले पाहिजे 
      फार काही नको पण 4 पाश्चिमात्य नृत्यामध्ये एक तरी संस्कृती जपणार असावं. 
     फक्त महाराष्ट्र भारतात नाही तर संपूर्ण जगाला कळायला पाहिजे भारतातील नाना कला आणि ते जपणारे मायबाप कलाकार आणि साथ देणारे उत्साही प्रेक्षक.
      धन्यवाद


-जयंत जाधव,लातूर.
         आज अनेक लोककला व लोककलावंत शेवटच्या घटका मोजत आहेत.यासाठी कलावंता संबंधीचे शासनाचे नकारात्मक धोरण कारणीभूत आहे.लोक-कलावंतांना सरकारी मानधन मिळण्यासाठी अक्षरशः मंत्रालयात खेटे घालावे लागतात,मानधन तर भेटत नाही मात्र मृत्यू भेटतो. ‘मी कलाकार आहे’, असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगावे लागते किंवा  कागदी घोडा नाचवत मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागतात.
लावणीचा अतिरेकी लाड ?
    लावणी म्हणजे  महाराष्ट्राचा सांस्कृतिक चेहराच असा सर्वत्र समज करुन टाकला आहे.उदा. सुरेखा पुणेकर हिने ‘नटरंगी नार’ सुरू केले. महाराष्ट्रातील राजकीय नेते यांचे  ‘लावणी’वर असलेले प्रेम लक्षात घेता लावणीला शासन दरबारी लाडक्या सूनेसारखे नाते किंवा स्थान मिळाले .अनेक शासकीय कार्यक्रमांमध्ये लावणी सादर होत असल्याने ‘ सिनेमांमधून विशेषत: लावणीचे सर्व प्रकार प्रसिद्ध झाले आणि सामान्य प्रेक्षकही लावणीप्रेमी झाला. शासनाच्या ह्या लावणीच्या अतिरेकी प्रेमामुळे महाराष्ट्रात अस्तित्वात असलेले आदिवासी, धनगरी तसेच इतर नृत्यप्रकार सध्या कोणत्या अवस्थेत आहेत याची साधी चौकशी करण्याची तसदी राज्याचे सांस्कृतिक खाते यांनी घेतली नाही.एक प्रकारे हे खाते पांढरा हत्ती ठरले आहे 
    महाराष्ट्राची संस्कृती ‘लावणी’च्या पलीकडे देखील आहे हे शासकीय कर्मचार्‍यांच्या डोक्यात प्रकाश केंव्हा पडणार?
लोककलाकारांना राजाश्रय मिळाला पाहिजे-
   लोककलाकार जगले तरच लोककला टिकेल उपाशी राहून कोणीही कलेचा अविष्कार करू शकत नाही. शासनाच्या  अनेक सामाजिक योजना आहेत पण त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही.  खेडोपाडी लोककलावंतांचे जाळे आहे.उदाहरणार्थ झाडीपट्टीतील नाटके. त्यांच्या कामाचे योगदान लक्षात घेता शासनाने त्यांच्या कलांचा उपयोग करून घेतला पाहिजे.  ‘एचआयव्ही एड्स जनजागृती’, ‘स्वच्छ भारत’ यांसाठी स्थानिक लोककलाकाराची ब्रँड अॕबेंस्डर म्हणून नियुक्ती करावी. यामुळे  जनतेच्या कल्याणाची माहिती अधिक तळागाळापर्यंत पोहोचवली जाईल, तसेच या आधारे लोककलांचे जतन आणि प्रसारही होईल.

तुमची आमची नैतिकता...!


🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿

१)अर्जुन रामहरी गोडगे सिरसाव, ता. परंडा, जि. उस्मानाबाद

‌          सध्याच्या काळात जो तो स्व विचारत मग्न असतो. 'आपण भलं आपलं काम भलं' ,या विचारात जीवन जगत आहे. आपण ज्या समाजात वाढलो त्या समाजच आपण काहीतरी देणं लागतो हे विसरता काम नये. मानवाच्या चुकीच्या वागण्यामुळे अनेक समाजात दुही निर्माण होते. जगभरात भारतच्या नैतिकता चे दाखले दिले जात होतो त्याला काळिमा फसण्याचे प्रकार घटत आहेत. नैतिकता ही बोलून दाखवण्याची गोष्ट नाही. सध्याच्या काळात चंगळवाद, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अत्याचार यासारखा घटनांमुळे मानवी गाबर्यातील नैतिकतेचा ऱ्हास झाला आहे. वरच्यावर माणूस नुसता बोलतच आहे वागणूक मात्र कृतीशानुन्य करत आहे.

___________________________________________________________________________________________
___________________________________________________________________________________________

२)संगीता देशमुख,वसमत जि. हिंगोली

         नैतिकता म्हणजे समाजात सुव्यवस्था रहावी म्हणून माणसांनी माणसांसाठी घालून दिलेले नियम म्हणा अथवा माणसांनी पाळावयाचे संकेत म्हणा,पण कायदे नाही. कायदा आणि नैतिकता ही वेगळी आहे. कायदे म्हणजे समाजात,राज्यात,देशात सुव्यवस्था रहावी म्हणून घालून दिलेले अनिवार्य बंधने आहेत. कायद्याचे उल्लंघन झाले की नियमाने शिक्षा होते पण नैतिकतेमध्ये तसे नाही. नैतिकतेचे उल्लंघन झाल्यास त्या व्यक्तीला कमी दर्जाचे समजल्या किंवा वेळप्रसंगी समाजबाह्य ठरविल्या जाते. नैतिकतेचे उल्लंघन म्हणजे व्यक्तीचे दुराचरण. ढोबळमानाने परस्त्री किंवा परपुरुषाशी असलेल्या विवाहबाह्य शारीरिक संबंधाना आपण अनैतिकता म्हणतो. त्यातही पुरुषाचे परस्त्रीशी संबंध असल्यास त्या पुरुषाला ते क्षम्य असतं पण त्याच संबंधात स्त्रीला मात्र अनैतिक समजल्या जाते. पण ही तुमची आमची नैतिकता पहायची असेल तर, मद्यप्राशन,भ्रष्टाचार,चोरी,खोटारडेपणा,फसवणूक,स्वार्थ,देशद्रोह हेही लक्षात घ्यावे लागेल. अशी अनैतिकता समाजाला,देशाला कलंक आहे. यात पण ही नैतिकता व्यक्तिपरत्वे,समाजपरत्वे बदलत असते. उदाहरणार्थ आदिवासी समाजात स्त्रियांनी दारू पिणे,हे वाईट समजल्या जात नाही. पण तीच दारू मध्यमवर्गीय स्त्रियांनी पिली तर ते अनैतिक ठरवल्या जाते. म्हणून ढोबळमानाने नैतिकता-अनैतिकतेच्या संकल्पनाही व्यक्तिपरत्वे बदलतात.
           एकमेकांशी प्रेमाने,प्रामाणिकपणे  वागून 
एकमेकांना सुखदुःखात साथ देऊन आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करून तुमची आमची नैतिकता जोपासू शकतो.
___________________________________________________________________________________________

३)अनिल गोडबोले,सोलापूर

नैतिकता... हा शब्द खूपच गम्मतशीर आहे. जो तो हा शब्द आपल्या सोयीने दुसऱ्यासाठी वापरतो.
खर तर नितीमत्ता ही... क्रूरता किंवा मानवी हक्क आणि अधिकार विरोधी माणसाने वागू नये या साठी अलिखित नियम लागू करावेत या पलीकडे काहीच नाही असं मला।वाटत.

जे विज्ञानाला धरून नाही किंवा ज्याने मानवी जीवनाचे नुकसान होईल किंवा ज्याचा हेतू चांगला नसेल ते सर्व नैतिकतेच्या बाहेर असले पाहिजे..

आता नैतिकता आपल्याकडे कशी मानतात ते पाहू.मला आलेले अनुभवा वरून मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

जेव्हा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत मत व्यक्त करतो किंवा एखादी गोष्ट करतो तेव्हा.. त्याला नकळतपणे नैतिक आणि अनैतिकतेची फुटपट्टी लावली जाते.

काही उदाहरणे पाहू. (मला आलेले अनुभव)

1. जर विज्ञान या विषयाला धरून जर मत मांडले तर प्रथम त्यावर प्रतिक्रिया अशी असते की हे पूर्वी पासून आमच्याकडे आहे. उलट काही प्रश्न विचारले की अनैतिक.. म्हणजे आता नवीन पिढीला(बोलणारा विज्ञान वापरत असतो हे विशेष) नैतिकता नाही.. कारण पूर्वीचे काय वेडे होते का?

2. प्रेम हा मुद्दा तर अनैतीकच . "आज काल काही शुद्ध प्रेमच उरलेलं नाही.." का? तर मुली निर्णय घेऊ लागला तर मुळीच नैतिकता सोडून वागतात.

एखाद्याने प्रेम करून लग्न केले किंवा प्रेम आहे... म्हणजे परंपरे च्या विरोधात.. अनैतिक

3. सेक्स... सगळ्यात जास्त अनैतिकता तर या विषयावर आढळली मला, 
असुरक्षित लैंगिक संबंध हा शब्द अनैतिक संबंध या अर्थाने वापरतातच आणि व्यभिचारी वृत्ती असा शब्द वापरला जातो.
एखाद्याने सेक्स वरती मत जरी व्यक्त केलं तरी तो अनैतिक 
असंस्कृतिक.. आपली संस्कृती किंवा नैतिकता नाही .. 
एड्स आणि गुप्तरोग तसेच वाढते गर्भपात किंवा विवाह बाह्य तसेच पूर्व समंध हे अनैतिक मानले गेले..
पण हे होत।आहे याचा अर्थ हे कुठेतरी चालू आहेच ना "मांजराने डोळे बंद केले तरी बाकीच्यांना दिसतच."

4. देवा धर्माच्या विरोधी बोललं।की अनैतिक बोलणं. एखाद्याला होणाऱ्या त्रासातून वाचवलं तरी अनैतिक.
अशी खूप उदाहरण देता येतील 
पण 
1. आम्ही अंधश्रद्धा पाळून एखाद्या ला त्रास देतो किंवा जीवे ठार मारतो तरी ती गोष्ट अनैतिक होत नाही.

२. आम्ही टेबलाखालून पैसे घेतो लोकांना फसवतो, काम करत नाही.. तरी आम्ही अनैतिक होत नाही

3. आयुष्यभर एका विशिष्ठ पद्धतीने जगणार जीवन धुडकावून दिल की त्यांना टोचून बोलणारे अनैतिक नाहीत(या मध्ये कोणत्याही व्यसनाला मी पाठीशी घालत नाही ते शारीरिक व मानसिक रित्या चुकीचे आहे.. पण पुरुष करत असेल तर टेन्शन मुले आणि बाई करत असेल ते अनैतिक.!)

4. गपचूप पणे संबंध ठेवणे, बाईला छेडछाड करणे, विनयभंग करणे आणि बलात्कार करणे हे अनैतिक नाही मानत... का?... तर ती बाईच तशी आहे, कपडे तशे वापरते किंवा तिला पण तेच पाहिजे होत.. अस करणारे पुरुष अनैतिक नाहीत.!

5. एखाद्याच्या भावनेशी खेळणे अनैतिक नाही.

6. अवैज्ञानिक।गोष्टी मानणे आणि चर्चा करणे.. दुसऱ्याला करायला भाग पडणे अनैतिक नाही!

7. वाद घालणे, संस्कृती रक्षक भूमिका दाखवण्यासाठी जुने बरोबर कसे आहे या साठी खरे खोटे बोलणे, शब्दांचा खेळ करणे अनैतिक नाही.!

8. कट्टर समर्थक किंवा विरोधक बनून हीन पणे बोलणे. आडणाववरून जात शोधणे, पूर्वज शोधणे, दूषण लावणे. अनैतिक नाही!

तर असो... उपहासात्मक रित्या वरील 9 मुद्ध्ये लिहिले आहेत.
या मध्ये कुठेही विकृतीला पाठिंबा नाही.

शेवटी .....त्रास देणारी किंवा अवैज्ञानिक नैतिकता ही अनैतिकताच..!!

___________________________________________________________________________________________

४)डॉ. विजयसिंह पाटील, कराड

हजारो लाखो वर्षांपासून मानवाची उत्क्रांती होत आहे. सुरुवातीची हजारो वर्षे, माणूस व प्राणी /जनावर , ह्यात फारसा फरक नव्हता. जंगली प्राण्यांच्या प्रमाणे, माणूसही दोन वेळच्या अन्नासाठी धडपडत होता. आपण प्राण्यासमोर , हतबल होतोय हे लक्षात आल्यावर, तो टोळीने राहायला लागला व कालांतराने,अशा अनेक टोळ्या बनून, त्या त्या ठिकाणी एक समूह बनत गेला. प्राथमिक अवस्थेत, फ़क्त अन्नासाठी व सुरक्षेसाठी एकत्र आलेल्या ह्या समाजात, बरेच कलह, वाद सुरू झाले,(कारणे--मुख्यतः, श्रेष्ठत्व, लैंगिकता). त्या काळातील समाज धुरीणांनी, परिस्थिती लक्षात घेऊन, काही कायदे बनवले असावेत व प्रत्येकाने आपल्या परीने कसं वागायचं ह्याचे काही नियम घालून दिले.
अर्थात हे नीती नियम, ज्यांनी घालून दिले हे ,त्या त्या वेळी विचारवंत वा हुशार / ज्ञानी असणार हे निश्चित. 
पुढं समूहाचे, समाजात, समाजाचे तत्कालीन धर्मात रूपांतर झाले. 
धार्मिक गुरूंनी,  आपल्या धर्माची नीती नियमाची चौकट  घालून दिली व जो त्या नियमाप्रमाणे वागेल तो आदर्श , असं शिक्कामोर्तबच झाले...
धर्मप्रमाणे  नीती नियम झाले, कायदे झाले...
बऱ्यापैकी कालावधीनंतर, एक धर्म आपले नियम दुसऱ्या धर्मावर लादू लागले. 
हे झाले सामाजिक..
पण , वैयक्तिक रित्या, माणूस,, आप आपल्या बुद्धिनुसार, आपण कसे वागायचं ते ठरवू लागला, समाजाच्या नैतिकतेच्या , व्याख्येत पळवाटा शोधू लागला,
जस जसा, समाज/ धर्म वाढू लागला, नीतीची चौकट त्याप्रमाणात विस्तारत गेली नाही.
कायदे आले. पण जे कायदेशीर आहे ते नैतिक असेलच असे नाही. 
पाश्चिमात्य देशांच्या नीतीच्या कल्पना वेगळ्याच.
आताच्या, "जग हे जागतिक खेडे", ह्या संकल्पनेने, सर्वांच्या नीतीच्या कल्पनांची सरमिसळ होऊ लागले. काय नैतिक व काय अनैतिक, हे कोणच ठामपणे सांगू शकत नाही.

___________________________________________________________________________________________

५)प्रा. रोहन बाळकृष्ण वर्तक रा. लोणावळा, ता-मावळ, जिल्हा-पुणे

नैतिकता..... मला उमजलेला ह्या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे आपल्या मुळे इतरांना कोणताही मानसिक, शाररिक त्रास न होणे, किंवा आपल्या कृतीमुळे समाजात वैचारिक अस्थिरता, अराजकता उद्भउन न देणे होय.

पृथ्वीवर राहणाऱ्या असंख्य जीव सृष्टीकडे बघाताक्षणी असे वाटते की नैतिकता ही मनुष्य निर्मित समाजहित राखण्यासाठी निर्माण केलेली नियमावली होय.

खरंतर आपल्या सर्वांच्या आयुष्यातील बहुतांशी वेळ हा, अमुक गोष्टी बरोबर आणि अमुक गोष्टी चूक , किंवा हे योग्य आणि ते अयोग्य अशा वर्गवारी करण्यातच निघून जात. 

उदारणार्थ दारू पिणे अयोग्य आहे आणि दारू न पिणे ही एक नैतिकता आहे. परंतु समाजात एखाद्या झोपडपट्टीतील अशिक्षित व्यक्ती ने दारू पिणे हे असभ्यतेचे लक्षण मानले जाते तर प्रतिष्ठित पार्टीत मान्यवरांनी दारू पिणे सहजच आणि सोपस्कर पणे स्वागतार्हय ठरते. म्हणजेच आपण केलेली चूक आणि बरोबरची वर्गवारी ही खरच गरजेची आहे का? 

माझ्या दृष्टिकोनातून नैतिकता ही पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष असते आणि बऱ्याच वेळा ती काळ सापेक्ष देखील असते.

व्यक्तिसापेक्ष म्हणजे परक्या व्यक्तीने एखाद्या मुलीला छेडले तर अनेक लोक नैतिकतेचे धडे गिरवताना दिसतील परंतु, स्वतःच्या मुलाने एखाद्या मुलीची छेड काढली तर मात्र हीच नैतिकता कुठे निघून जाते कुणाचं ठाऊक. कारण येथे नैतिकते पेक्षा प्रेम महत्वाचे ठरते.

काळसापेक्ष नैतिकता सांगायचे म्हटले तर भ्रष्टाचार करणे हा गुन्हा आहे किंवा अनैतिक आहे परंतु निवडणुकीच्या वेळी एका मताला उमेदवाराकडून पैसे घेताना काही काळा पुरती नैतिकता बांधून ठेवली जाते.

नैतिकता... ही प्रत्येकाच्या दृष्टीकोनावरून ठरते, आणि स्पष्टपणे सांगायचे तर सध्या नैतिकता म्हणजे "पकडला तो चोर आणि लपवला तो नैतिकतेचा पुतळा"...अशीच झाली आहे.

जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छा आकांशा आणि पूर्ण करताना नैतिक तत्वाचा वापर करून यशाची सर्वोच्च शिखरे गाठतो असे नाही मात्र सर्वोच्च स्थानी पोहचल्यावर नैतिकतेचे गुणगान मात्र सतत गात राहतो हे तेवढेच सत्य आहे.
आणि त्यामुळेच समाजातल्या कोणत्या व्यक्तीकडे आज नैतिकता शिल्लक राहिली आहे हे शोधणे खूपच अवघड झाले आहे.

___________________________________________________________________________________________

६)बायस करण,जि. हिंगोली

नैतिकता आणि अनैतिकता ही समाजाने घालून दिलेली बंधने आहेत.नैतिकता आणि अनैतिकता यांच्या व्याख्या व्यक्तीनुसार, वेळेनुसार वेगवेगळ्या बदलत जातात.आणि प्रत्येक गोष्टीची नैतिकता आणि अनैतिकता यांचा दर्जा हा त्या-त्या व्यक्तीने त्याच्या मनात ठरवलेला असतो.
प्रत्येकाचे ज्याचे त्याचे अनुभव, त्यांवर असलेले संस्कार, त्यांचे वाचन यांवरून त्या विषयावर त्यांचे मत,नियम,धोरण हे ती गोष्ट नैतिक की अनैतिक हे ठरवत असते.
समाजात काही अशा गोष्टी असतात किंवा समाजात अमुक अमुक गोष्टी आधी पासून करतात किंवा करत नाहीत अशी समजूत लोक काढतात. मग इथं कोणतीही गोष्ट करण्याआधी आपल्याकडे दोन मार्ग असतात ती गोष्ट नैतिक की अनैतिक हे ठरवण्यासाठी.
बऱ्याच गोष्टी आहेत जे की आधी पासून ठरलेल्या आहेत जर एखादा मनुष्य इतरां पेक्षा काही वेगळं वागला किंवा बोलला तर ते समाजाला पटत नाही मग समाज त्या व्यक्तीच्या अनैतिक कृती बद्दल प्रश्न करतात. त्यात बरंच काही उदाहरणे आहेत जसे स्त्रिया कडे बघण्याचा दृष्टिकोन, प्रेमाविषयी बोलणे किंवा प्रेम करणे, एखादा व्यक्ती जर दुसऱ्याची चूक काढत असेल तर इ.
जर समाजाने ठरवलेल्या गोष्टींच्या विरोधात गेले की ती गोष्ट समाजासाठी अनैतिक कृत्य ठरते,अशी समाजाची समजूत आहे.
*मला एक गोष्ट समजत नाही समजतील प्रत्येक जात, धर्मातील लोक ठरवलेल्या पध्दतीने का वागतात?*
मला असं म्हणायचं की समाजानं जे नियम दिले ज्यांना समाज 
नैतिकता म्हणतो त्यावर लोकांनी चाललं पाहिजे तरच ती नैतिकता होय, असं का?
प्रत्येकजण स्वतंत्रपणे विचार करू शकतो.

___________________________________________________________________________________________

७)अश्विनी शोभा श्रीकांत खलिपे, तोंडोली(सांगली)


          एखादी गोष्ट करणं अथवा न करणं, तसेच ती एका विशिष्ट पद्धतीने केली जावी हे स्वतःच्या मनाने ठरवतो आणि तसंच आपलं वागणं ही असतं, आपलं हे वागणं आपल्या दृष्टीने नैतिकतेने वागणे असते त्या तत्वाच्या विरुद्ध वागणं हे आपल्या दृष्टीने अनैतिकता ठरू शकते. त्यामुळे नैतिकता ची व्याख्या नक्की काय हे व्यवस्थित मांडता येणार नाही. कारण नैतिकता ही प्रत्येक व्यक्तीच्या विचारांवर ठरते.
          बऱ्याचदा नैतिकतेला धर्माची जागा दिलेली दिसून येते आणि जिथं धर्म येतो तिथं परंपरा येतातच. परंपरेने जर नैतिकतेचा अर्थ लावायला गेलं तर कोणाशी वाईट वागू नये, कोणाबद्दल वाईट चिंतू नये, इर्शा करू नये, कोणावर जबरदस्ती करू नये इ. गोष्टींचा विचार करून वागणं म्हणजे धर्माचे पालन करणे. पण धर्म हा परंपरा नसून तो जगण्याची कला आहे. धर्मातूनच नैतिकता निर्माण होते. सध्या नैतिकता माणसांपेक्षा जास्त महत्त्वाची ठरतं असल्याने माणूस नक्की कसा आहे हे कळलं जात नाही. समाज्यातून माणसांना नैतिकतेसंदर्भात जी काही बंधन घालून दिली आहेत त्याप्रमाणे माणसाचे वागणे आहे. त्यामुळे सगळेच लोक नैतिकतेच्या दृष्टीने योग्य असले तरी त्यांना योग्य मानले जाऊ शकत नाही. समाज्याने घालून दिलेली बंधन ही कृतीतून दर्शवली जातात पण नैतिकता ही मनावरून ठरते.
          माणसाच्या अंतःकरणाच्या सांगण्यावरून जी कृती घडते ती खरी नैतिक आणि जी कृती प्रयत्नातून घडते ती कृती अनैतिक असते. नैतिकता ही माणसाचा स्वभाव दर्शवते, मनाचं खरं दर्शन घडवते. धर्मातील परंपरा ह्या काळानुसार बदलू शकतात पण नैतिकता ही काळानुसार बदलणारी गोष्ट नाही. नैतिकतेचा खरा अर्थ माणुसकी असा जरी लावला तरी त्यात काही गैर वाटणार नाही, कारण आपल्या कोणत्याही कृतीमुळे इतरांना त्रास होऊ नये असं वागणं हे नैतिक वागणं मानलं जातं.

___________________________________________________________________________________________

८)जयंत जाधव,लातूर

नैतिकता ही मानवीय आचरणासंबंधी विषयी योग्य-अयोग्य,चांगले-वाईट,गुण-दोष यातील फरक स्पष्ट करण्यास मदत होते.यामुळे मनुष्य जेव्हा कोणत्याही परिस्थितीत त्रस्त असला तरी तो नैतिकतेच्या बाबतीत विचार करतो.
नैतिकता ही समाजात राहणाऱ्या लोकांसाठी असते.हा काही जणांना याचा त्रासदायक ठरते. उदा. पूर्वी महिलांना फक्त चूल व मुल यापर्यंत सिमित केले होते. आज मात्र महिलांनी हा सिमित केलेला उंबरठा ओलांडून कितीतरी क्षेत्रात पुरुष यांच्या बरोबरीने वा त्यापेक्षा सरस यशस्वी प्रगती केली आहे. पुरुषी नैतिकता आज महिलांच्या या यशस्वी विकासाला अनैतिक समजतात.
म्हणूनच समाज विकासाचा गाडा व्यवस्थित सुरू राहावा किंवा चालण्यासाठी लोकांमध्ये नैतिकता असायला पाहिजे.यासाठी वेळोवेळी समाजातील प्रत्येक व्यक्ती सोबतच संपूर्ण समाजाच्या विकासासाठी नैतिकतेच्या व्याख्यांना नवीन आयाम मिळून देणे आवश्यक आहे.

___________________________________________________________________________________________

मार्क... हे नुसतेच गुण की गुणवत्ता !

मार्क... हे नुसतेच गुण की गुणवत्ता !

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

मार्क… हे नुसतेच गुण की गुणवत्ता !



Source: INTERNET
-शिरीष उमरे, नवी मुंबई
विषयाचे शिर्षक च आपल्या शिक्षणप्रणालीची शोकांतिका दर्शवते. कालबाह्य पाठ्यक्रम व तात्पुरत्या काळासाठी नेमलेले शिक्षक व त्यांचा शिकवण्याचा दर्जा आणि राजकीय पक्षांचे अतिक्रमण व लुडबुड यामुळे ह्या शियणाच्या बाजारात विद्यार्थी कसे राहणार हे स्पष्ट दिसते आहे. लाखो बेरोजगार इंजिनियर्स, अवाढव्य खर्च केल्याने पेशंट ला कस्टमर समजणारे डॉक्टर्स, करप्शन ला सरकारी मान्यता मिळवुन देणारे वकील व सीए अशी अवस्था असतांना सरकारी नोकरी साठी आस धरुन बसलेले करोडो नवयुवक... स्वयंरोजगार साठी सरकारचे शुन्य प्रयत्न... आणि दलाली, बाबागिरी, गुन्हेगारी व स्मगलींग मधुन मिळणारा झटपट पैसा बघुन ह्यामुळे दिशाहीन झालेला आजचा विद्यार्थी ह्यावर आमुलाग्र बदलाची गरज आहे असे मला वाटते.

Source: INTERNET
-संदीप बोऱ्हाडे, पुणे

    दहावीचा निकाल 8 जून रोजी जाहीर झाला .सर्व यशवंताचे खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा !
ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता आपल्यातील कलागुण आणि आवड याची जोड देऊन पुढील वाटचाल करावी. फक्त मार्कांवरच आपले यश याचे मापन करू नये आणि पालकांनीही मुलांची तुलना करून त्यांचे खच्चीकरण न करता त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. आज बऱ्याच वाटा मोकळ्या आहेत ज्यावर कोणी गेलेले नाही.

    आज बऱ्याच मुलांचे मार्क्स पाहून मला तर  आश्चर्य वाटले..कुणालाही विचारले तरी 80 च्या 90 च्या पुढेच मार्क. बोर्डाने बेस्ट ऑफ फाईव्ह याच्या बेसवर निकाल जाहीर करून मार्कांचा फुगा फुगवण्याचा उद्देशच मुळात समजत नाही???? मग परीक्षा सहा विषयांची तरी कशाला ????
बेस्ट ऑफ फाईव्ह याच्याच बेसवर घ्यावी. त्यात ग्रेस मार्क कशाच्या बेसवर????
यामुळे हा निकालाचा फुगा अधिकच फुगत जातो आहे. ७० , ८० आणि 90 त्याच्याही पुढे जाऊन १०० % मार्क्स मिळणेही सहजच झाले आहे. आणि इतके मार्क मिळवूनही पालक  मात्र नाराज आहेत. आजच्या स्थितीला बेस्ट ऑफ फाईव्ह चा फुगा पाहिल्यानंतर आमचे १० वर्षापूर्वीचे कसलेही ग्रेस मार्क्स वैगेरे न मिसळता आणि बेस्ट ऑफ फाईव्हचे मापन न करता मिळवलेले अधिक मोलाचेच मला आज वाटत आहेत.

    माझ्या काळात 10 वीला 35 मार्क मिळवून पास होणे देखील  खूप अवघड होते खूप मुले गणित आणि इंग्रजी मध्ये नापास होत असत मी तर 10 वि ला कसेतरी इंग्रजी मध्ये 35 मार्क मिळवून पास झालो...risult च्या दिवशी तर जीव नुसता खालीवर होत राहायचा पण चेहऱ्यावर आनंद पण असायचा की मी नक्की पास होईल तेव्हढा आत्मविश्वास पण असायचा..आणि निकाल लागल्यानंतर पास झाल्यावर तो आनंद शब्दात नाही व्यक्त करता यायचा. आमच्या काळात मराठी , हिंदी आणि इंग्रजी या भाषा विषयाला कधीही 100 पैकी 100 मार्क कोणाला मिळालेले मला ऐकायला मिळाले नाहीत. आणि आज मुले 100% पाडतात हे विशेष..!!

  दोन दिवसांपूर्वी पेपरमध्ये अस वाचायला मिळाले की,  
125 विद्यार्थ्यांना 100% मार्क मिळाले आहेत ,त्यांच्या कष्टाला सलाम, परंतु त्यांना नाही माहित हे मार्क म्हणजे नुसताच फुगवटा आहे. उदाहरण द्यायचे झाले तर ,
एका मुलाला किंवा मुलीला ९९ % गुण मिळाले आणि त्याला किंवा तिला इंग्रजी किंवा गणित विषयात जेमतेम 50 ते 60 च्या आसपास गुण मिळाले आहेत. पण टक्केवारी जास्त असल्यामुळं ते नक्कीच इंजिनिअरिंग मेडिकल किंवा science ला नक्कीच जाणार. आणि या क्षेत्रामध्ये गणित आणि इंग्रजीचेच वर्चस्व आहे, मग मला सांगा त्या विद्यार्थ्यांचा तिथे निभाव लागेल का ? मग पुढे जर त्याला किंवा तिला तो कोर्स नाही झेपला तर वर्ष आणि पैसे दोन्हीही खर्च होणार आणि नापास झाल्यामुळे त्या मुलाची, मुलीची मानसिकतेचा विचार तर करूच शकत नाही..आणि 10 वी topper science ला जाऊन fail झाल्यावर इतर लोकांचे टोमणे वेगळेच. दहावीला एवढे मार्क्स पाडणारे साधारण ९०% मुलं बारावीला कुठेच दिसत नाहीत...आणि नेमकं त्यावेळी ही मुलं ६०..७० च्या रेंजला आलेली असतात...मेडिकलला, इंजिनिअरिंगला किंवा नीट ला दहावीचे टॉपर्स कुठे गायब होतात यावर सुद्धा संशोधन केले पाहिजे.

    दहावीच्या मार्कांच्या बाबतीत जे लिबरल धोरण ठेवलं मग ते कोणतेही बोर्ड असो त्यांनी या शिक्षणाची वाट लावली हे मात्र नाकारता येणार नाही.
चुकीच्या शैक्षणिक धोरणांवरील मलमपट्टी म्हणजे हे १०वी बोर्डाचे मार्क्स. जखम बरी करण्याऐवजी, एखादे चांगले गोंडस बँडेज बांधणे म्हणजेच हे मार्क्स होत.
मग भले आत ती जखम चिघळली तरी हरकत नाही.
आपली शिक्षण प्रणाली व संबंधित धोरणे वरचेवर चुकीची ठरताना दिसत आहेत.
मूल्यमापन पध्दतीचीच पध्दत कुणी आत्मसात करीत नाही.
काहीही निकष ठरविले जातात.
अजून एक उदाहरण आहे माझ्या परिचयाचे चुक बोर्डाची आहे माझ्या परिचयातील एक उदाहरण आहे मागच्या वर्षी एका मुलाला 102% पडले होते
98 + स्पोर्ट 25 ..अजब कारभार आहे.

    कस आहे माहितीये का ?? जर 90% मार्क्स नाही मिळाले तर science ला लोक कमी जाणार Classes चा बाजार बंद पडणार . इंजिनिअरिंग ला खूप कमी जण जातील.. मेडिकल ला पण संख्या कमी होईल आणि हा सगळा जो पैश्यांचा बाजार चालतो तो पूर्णपणे कोलमडून पडेल त्यासाठी हा फुगवटा सुरू आहे. सुरुवातीला science नको म्हणणारे मुलांचे मार्कस पाहुन science ला प्रवेश घेण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. ही मुलांची आणी पालकांचीही फसवणुक आहे.फक्त निकालाचा आलेख वाढवला जात आहे. नाहीतर हा बाजार बंद झाला की , जे राजकारणी शिक्षणसम्राट आहे त्यांचा शिक्षणाचा धंदा बंद पडायला वेळ लागणार नाही..आणि बहुतेक मंत्री कोणत्याही पक्षातील असो यांचीच शाळा आणि कॉलेजेस आहेत.

     वाईट याचेच वाटते की यात ग्रामीण भागातली मुले सर्वात जास्त भरडली जात आहेत कारण ते काहीतरी स्वप्न घेऊन शहरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करायला आपल्या तुटपुंज्या साधनांसह येतात आणि मोट्या प्रमाणावर निराशा पदरी घेऊन जातात. वास्तवाचे भान सुटले की काय होते त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे दहावीच्या निकालाचा फुगवटा.
१० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या
सर्व विदयार्थ्यांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा...!!
आणि हो १० वी मध्ये थोडे चांगले मार्क मिळाले म्हणून भावनेच्या भरात Science ला जाऊ नका..तुमची आवड कश्यामध्ये आहे तिकडे जा..!!


Source: INTERNET
-किरण पवार, औरंगाबाद

                  निकाल लागला की, जवळपास पुढच्या विचारांची म्हणजेच *फ्युचर प्लँनिंगची* तयारी सूरु झालेली असते आणि हालचालींना वेग आलेला असतो. मग ती परीक्षा दहावीची असो, बारावीची असो वा इतर मेडीकल,  फार्मसी, इंजिनीअरींग अशा क्षेत्रांच्या परीक्षा असोत. बऱ्याच वेळेला दिसून येत की, मार्कस् मुलांना चांगले मिळतात पण पुढे काही निर्णय चुकीचे होऊन लाईफ रिव्हर्स येते. *गुणवत्ता इतक्या लवकर कधीच ठामपणे ठरवली जाऊ शकत नाही जितक्या लवकर आपली प्रवेश प्रक्रिया होते.* मुल चुकतात ऐन उमेदीच्या वळणावर कारण दहावीच्या आधीच्या जगात पालक मुलांना *निर्णयक्षमता* काय असते? याची प्रचितीच येऊ देत नाहीत.
                 ही गोष्ट आपण सकारात्मकतेने घेतचं नाही, हीच मोठी मेख आहे. आपण बोलतो, एकदा पाण्यात पडला की, शिकेल आपणहून. माझ्या मते तरी आपण हा आपला कॅज्युअल ॲप्रोच शिक्षणाच्या बाबतीत तरी काढून टाकला पाहिजे. कारण बऱ्याचदा या दबावाखाली मुलं आयुष्य मन मारुन जगतात. काही आत्महत्येच टोकाचं पाऊल उचलतात; हे आणखी वेगळ सांगायलाच नको. बऱ्याच वेळा नातेवाईक काय म्हणतील? यासाठी मुलांना एखाद्या विशिष्ट शिक्षणासाठी प्रवृत्त केलं जातं. सवांदही अशा ऐन निर्णयाच्या उंबरठ्यावर पालकांनी त्यांच्या पाल्याशी जास्त करायला हवा जो की, सहसा फारसा होतं नाही.
                विद्यार्थी आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत; एवढचं महत्वाच. कारण प्रत्येक सजीव स्वत:त एक विशिष्टता घेऊन जन्माला येतो आणि ती हक्काने त्याला जगासमोर मांडता यायला हवी. *कमी गुण असणाऱ्यांकडे गुणवत्ता नसतेच हा विचार चुकीचा आहे.* बाकी मार्कस... हे नुसतेच कागदावर मर्यादित राहण्यापेक्षा त्या जिवात दिसावे असं मी मानतो.......


Source: INTERNET
-वैभव डेंगळे

मार्क हे नुसतेच गुण आहे गुणवत्ता अजिबात नाही
निकाला वरील मार्क पाहून मुलगा खूप हुशार वाटतो पण ज्या विषया मध्ये टॉपर आहे त्याच त्याला प्रेझन्ट करता येत नाही कारण त्याला फक्त गुण पाडून पुढे जाऊन उभे राहायचे असते
पण तो हे एक गोष्ट विसरून जातो की मार्क मिळवायच्या नादात तो आपली गुणवत्ता हरवून जातो


Source: INTERNET
-स्वप्नील चव्हाण, बुलढाणा

  विषय थोडा मजेशिर आहे ....कारण एक बाजू अशी येते की फक्त परीक्षेत आलेले गुण म्हणजे तुमची गुणवत्ता म्हणता येत नाही......पण त्याच गुणांच्या आधारे गुणवंत कोण आहे...हे ठरवलं जात......मग नेमकं गुणवंत म्हणायचं तरी कोणाला.....??
गुणवत्ता म्हणजे काय....??

जर सरळ विद्यार्थी दशेबद्दल बोलायचं झालं तर....कर्मवीर भाऊराव पाटील नेहमी म्हणायचे...वर्गात शिकवलेल विसारल्यानंतर जे तुमच्या डोक्यात उरतय त्याला आपण विद्यार्थ्यांची गुणवत्ता म्हणूयात.......... म्हणजे फक्त गुणपत्रिकेला आलेली मार्कांची सूज म्हणजे गुणवत्ता नव्हे........
पहिले तर फक्त शैक्षणिक क्षेत्रातच गुणवंत असावं असं काही नाही....गुणवत्ता ही आपल्या व्यक्तिमत्व विकास करणाऱ्या कोणत्याही क्षेत्रात असू शकते.....
पहिले तर जे"शिक्षण" आपण घेतोय तेच आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी असत हे आपण बऱ्याचदा विसरून जातो......महात्मा गांधी शिक्षणाबद्दल बोलताना नेहमी म्हणायचे....."EDUCATION IS THE POWERFUL WEAPON WHICH BRINGS NEW CHANGE IN OUR PERSONALITY"
...म्हणजे शिक्षण हे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी एक महत्वाच शस्त्र आहे.........म्हणून येणाऱ्या गुणांबरोबर ज्याचा सर्वांगीण विकास होतोय त्याला आपण गुणवंत म्हणूयात........

"3 idiots" या चित्रपटामध्ये खूप महत्त्वाच वाक्य आहे एक......"कामयाब मत बनो ....काबिल बनो....कामयाबी झक मारके आपका पिछा करेगी...."

तर या "कामयाबी" ला आपण गुणवत्ता म्हणूयात......कारण फक्त नोकरी मागे पाळणारे चांगले मार्क्स नक्की मिळवतील पण ते यशस्वी होतील हे नक्की सांगता येत नाही.........
सगळं इंग्रजी येत असतानाही जर तुम्ही कोणापुढे दोन वाक्य बोलायला घाबरत असाल तर तुम्ही गुणवंत नाहीत......कारण" चाबकाच्या भीतीने तर सर्कस मधला वाघ पण खुर्ची वर बसतो.... पण त्याला आपण well trained म्हणतो.... well educated नाही...." हे पण "3idiots" मधलं एक वाक्य.......
तर फक्त गुण मिळाले म्हणून तुम्ही गुणवंत झालात अस काही नाही......पण गुण मिळालेले गुणवंत नाहीच अस पण मी म्हणणार नाही.....कारण कोणतंही काम करायचं असू द्या ....गुणवत्ता शेवटी लागतेच......
पण परीक्षेत कॉपी करून चांगले गुण मिळवणे म्हणजे गुणवत्ता नव्हे........
एक थोडा सामाजिक हेतू पण असतो शिक्षणाचा...जो कदाचित सर्वात जास्त दुर्लक्षित विभाग आहे.......डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे....''EDUCATION IS A POWERFUL WEAPON WHICH BRINGS NEW CHANGE IN OUR PERSONALITY.... It's true but when....IF EDUCATION SYSTEM TEACHES WHAT HAPPENS IN SOCIETY..OR ...STUDENTS DO THAT TYPE OF WORK WHICH TEACHES IN CLASSROOM"...म्हणजे एक तर वर्गात जे शिकवलं जातं ते समजात घडू दे....किंवा जे समाजात घडतं ते वर्गात शिकवल जाऊ दे......पण आपल्या शिक्षण व्यवस्थेची शोकांतिका म्हणजे या दोन्हीपैकी एकही गोष्ट समाजात घडत नाही.......
तर या आपल्या शिक्षणाच्या आपल्या गुणांमागचे हे व असेच अजून उद्देश जाणून घेत जो वाटचाल करतोय त्याला आपण गुणवंत म्हणूयात........
गुणवत्ता ही फक्त मार्क्स पुरती विशिष्ट नसते.....डॉक्टर बनायला पण गुणवत्ता असावी लागते.....अभियंता बनायला पण गुणवत्ता लागते.....नेता...बनायला राजकारण करायला पण गुणवत्ता लागतेच..........
म्हणून गुणवत्तेच्या नावाखाली आपण कुणाच्या तातखलच मांजर होत नाहीयेत याची काळजी घ्यावी......आपली आवड आपलं करिअर बनलं...तर त्या क्षेत्रात तो व्यक्ती गुणवंत झाला असं आपण म्हणूयात.....

"विद्या बलंच उपास्व"

किंवा "विद्या विनएन येते"
ह्याप्रमाणे जर वागलात आणि ती विनयशीलता आणि ते बल आपल्या अंगी आले तर नक्कीच आपण...समाजात चांगली प्रतिमा निर्माण करू शकतो....आणि एक चांगला व्यक्ती बनणे.... ही माझ्या मते तरी सर्वश्रेष्ठ गुणवत्तेचं प्रतीक आहे........

कारण पुस्तकं सगळे वाचतात पण त्यातील विचारांचे आपल्या जीवनात वापर फारच कमी जण करतात....कारण गुणवत्ता शेवटी लागतेच .....।।।
तर सर्व युवकांना माझं आव्हान राहील की गुणवंत व्हा.....गुण सर्वच मिळऊ शकतात......

धन्यवाद.....!!

Source: INTERNET
-R. सागर, सांगली
.
परवाच 10वीचा निकाल जाहीर झाला. एखादं अपवादात्मक वर्ष सोडलं तर नेहमीच 60-70 टक्क्यांच्या घरात असणारा माझ्या शाळेचा निकाल गेल्या काही वर्षांमध्ये मात्र सातत्यानं 90 टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. तेच वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या बाबतीत. आमच्या वेळी 70 टक्के मिळवणारा विद्यार्थी फक्त शाळेतच नव्हे तर संपूर्ण परीक्षा केंद्रात टॉप 10 मध्ये नक्कीच असायचा. पण आता 90 टक्के घेणारादेखील टॉप 10 मध्ये असेलच याची खात्री नाही. इतकी गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. आणि ते विद्यार्थीही अभिनंदनास पात्र आहेत.
.
पण खरी परिस्थिती काय आहे? खरंच गुणवत्ता इतकी वाढली आहे का? कारण परवाच एक बातमी आली की सध्याच्या पद्धतीनुसार शाळेमधून द्यायचे जे 20 गुण आहेत त्या 20 पैकी सरासरी 18 गुण दिले जातातच. आणि कदाचित यामुळे देखील यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.
.
साधी गोष्ट आहे. एखादं लहान रोप वाढत असताना ऊन, वारा, पाऊस या सगळ्यातून तावून-सुलाखून निघत असेल तर नक्कीच ते एखाद्या मोठ्या वादळात तग धरू शकेल. करण त्याची मुळे कुठेतरी खोलवर गेलेली असतील. पण जर त्या रोपाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्याच गोष्टी जर त्याला सहज मिळत गेल्या तर मात्र रोपाची वाढ नक्कीच चांगल्या प्रकारे होईल पण एखाद्या वावटळातदेखील ते रोप उध्वस्त व्हायची शक्यताच जास्त. अगदी तसंच गुणवत्तेचंही आहे. जर तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर आणि तरच तुम्ही या स्पर्धेच्या वातावरणात टिकून राहू शकाल. आणि म्हणूनच हा जर गुणांचा फुगवटा असेल तर तो कमी करून गुणवत्ता निर्माण करायची जबाबदारी पालकांनी आणि शिक्षकांनी घ्यायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनीही त्याला योग्य तो प्रतिसाद देण्याची गरज आहे.
.
शेवटी एकच कुठेतरी वाचलेलं. जर तुम्ही पहिल्यांदा यश मिळवलं तर कदाचित तो अपघात असू शकतो. दुसऱ्यांदा यश मिळवलंत तर तो योगायोग असू शकतो. पण जर तुम्ही तिसऱ्यांदादेखील यशस्वी झालात तर मात्र ते तुमचं आणि तुमच्या प्रयत्नांचं यश आहे. आणि सध्याच्या सर्व यशवंत-गुणवंत विद्यार्थ्यांकडून याच तिसऱ्यांदा मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण यशाची अपेक्षा आहे..
Source: INTERNET
-सीमाली भाटकर, रत्नागिरी

      या विषयावर चर्चा सुरू केली आणि अनेक प्रश्न डोळ्यासमोर येऊ लागले. थोड्याच दिवसांपूर्वी10 वी व 12 वि चे निकाल लागले आणि प्रचंड मार्क मिळवुन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पण मुळात हे मार्क्स त्यांच्या बुद्धी चा कौल देतात की फक्त कागदावरील आकडेमोड काहीच कळत नाही याला कारण आहे कारण10 वी ला 100 % मार्क मग ते मूल नेमका कसा अभ्यास करते हा शोधाचा विषय होऊन बसेल.

       बेस्ट ऑफ फाईव्ह , आठवी परयंत पास करायचे ही शैक्षणिक धोरणे किती योग्य यातून मूल पास होतात पण त्यांना भविष्यात काय करावे किंवा नेमके त्यांची बुद्धिमत्ता काय हे न त्यांच्या पालकांच्या लक्षात येत ना मुलांच्या आणि जेंव्हा वास्तव समोर येते तेंव्हा खूप उशीर झालेला असतो. कारण विद्यार्थ्यांना असच वाटत की त्यांना सर्व येत आणि इथेच त्यांचं नुकसान होऊ लागले आहे. कारण अभ्यास कसा करावा मेहनत करून मार्क मिळवणे याची जाणीव त्यांना राहिलीच नाही.
      शिक्षण यंत्रणेने गणित सारखा विषय उच्च गणित मध्यम गणितं अशा प्रकारे ठेवला त्यामुळं गणिताची भीती बाळगून अभ्यास करणारे विद्यार्थी बिनधास्त पास होऊ लागले . पण याचे तोटे लक्षात घेणे फार गरजेचे आहे कारण आज ही मुलं पास होतात पण भविष्यात त्यांची बुद्धी आणि विचार क्षमता कमी होते त्यांचा अभ्यास कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
      आणि म्हणूनच आज स्पर्धा परीक्षा सारख्या ठिकाणी महाराष्ट्र मागे पडला. कारण बेस्ट ऑफ फाईव्ह च्या नादात आपण खरा आपल्या विद्यार्थ्यांना मागे पाडू लागलो.
   या मुलांच्या मार्क वरती किंवा त्यांच्या गुणांवरती आक्षेप नाही परंतु आपली शिक्षण पद्धती सुधारली पाहिजे. कारण तिथेच आपला त्या विद्यार्थी मित्रांचा आणि संपूर्ण महाराष्ट्रा चा विकास घडू शकतो असे मला वाटतं.
नाहीतर आज 7 वी पास शिपाई भरती साठी BE, BA, सारखे पदवीधर लोक फॉर्म भरून देऊ लागलेत हा बेरोजगारी चा प्रश्न आहे परंतु याला जबाबदार शिक्षण पद्धती आहे.
       म्हणून इतकंच म्हणायचे आहे की शिक्षण पद्धती बदला आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवा.
    कारण कागदोपत्री गुणांनी काहीच साध्य होत नाही.  
धन्यवाद



Source: INTERNET
-गणेश मोरे,चिपळूण

   चार दिवसांपूर्वी दहावीचा `फुगा` फुटला ; म्हणजेच वर्षभरात त्या फुग्यात किती हवा भरली हे समजलं. फुग्यात भारदार हवा भरलेल्या पोरांचं अभिनंदन ( रितीनुसार ).आणि बाकीच्यांनी पुन्हा एकदा दीर्घश्वास घेऊन हवा भरायला लागा.
दहावीच्या/ बारावीच्या निकालावर माझे वयक्तिक मते, जी तुम्हाला पटाविच अशी माझी काडीमात्र इच्छा नाही.
#1 दहावीचा निकाल लागल्यानंतर दहा दिवसांनंतर बाजारात कोथिंबीरच्या जुडीला जेवढी किंमत मिळते तेवढी किंमत ह्या निकालाच्या कागदाला सुद्धा मिळत नाही ( काही कागद अपवाद असतात ); म्हणजेच त्या कागदाचा उपयोग पुढील इयत्तेच्या एडमिशनची फी करण्यासाठी मात्र नक्की होतो.
#2  दरवर्षी महाराष्ट्रात `कोंकण` बोर्ड जरी अव्वल येत असलं तरी, कोकणची पोर किती हुशार आहेत हे कोंकण सोडून संबंध महाराष्ट्राला माहित आहे; भविष्यात ते दिसतच म्हणा. (मी कोंकणी आहे )
#३ `13% अभियंते फक्त कार्यशम`,`बेरोजगरीचा दर 0.7% ने वाढला`, `हतात degree असून सुध्दा घरी बसव लागत` ह्या सगळ्यांची पाल~मुळ ह्या निकालात रोवली जातात...
दहावीची परीक्षा घेणे म्हणजे `ठोकले` निर्माण करण्याचं काम आहे. साचा आमचा तयारच असतो.
    आज शिक्षणाची आवस्था ही `बढा घर पोकळ वासा, वारा जाई भसा भसा` ह्याप्रमाणे काहीशी झाली आहे. कारण आमच्या हातात जरी विद्यावाचस्पती (P.Hd.) सारख्या जरी डिगर्या असल्या तरी आम्हाला एखाद्या वनवास्याप्रमाणे भटकाव लागत आणि अनुभवाची जोड असली तर जॉब मिळतो नाहीतर फक्त P.Hd (अन्य डिगर्यांचे) पेटंट घेऊन नावाच्या पुढेमागे चीपकाव लागतं. आजचे शिक्षण हे गुणांचे प्रशस्तीपत्रक देण्यापुरते राहील आहे. असे गुण ज्यांची किंमत कागदावर जास्त असते आणि बाहेरच्या जगात कमी. आजचा विद्यार्थी हा गुणांच्या मागे जीव तोडून धावत आहे त्यामुळे त्याच्या ज्ञानाच्या कक्षा आकुंचित पावत आहेत. विद्यार्थी आपल्यातील सुप्त कौशैल्यांना कधी वावच देत नाही. कारण त्याचे आयुष्यात एकच उद्दिष्ट असते ते म्हणजे दोन अक्षरं शिकून चार पैसे कमावणे नी घरच्यांची उपजीविका करणे. ह्या गोष्टीला विद्यार्थी जितका जबाबदार  आहे त्याहून जास्त समाज आणि महाविद्यालये जबाबदार आहेत अस मला वाटतं. चांगल्या नोकरीसाठी जितकी गुणांची अवशक्याता आहे त्याहून जास्त गुणवत्तेची आहे, हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे.
       शेवटी `वपू`ना स्मरून ``कबुतराला गरुडाचे पंख लवता    येतीलही,पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.``
समजलं ना, अर्थातच तुम्ही टॉपर अहात. तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप (सावधानी) शुभेच्छा.


Source: INTERNET
-यशवंती होनमणे, कराड

 मार्क म्हंटल आपल्याला फक्त आकडे दिसतात 90%,95%,98%,100% ....पण विचार केला तर सध्याच्या युगात हे कितपत उपयोगी आहे ? आपण बघतो फक्त टक्के बाकी काहीच नाही.कारण आपल्याला वाटत की फक्त टक्केवारी महत्वाची आहे.पण अस नसत.समजा एखाद्याला असतील चांगले टक्के म्हणजे तो खूप हुशार झाला का?नाही कदाचित तो फक्त अभ्यासात हुशार असतील पण जगाच्या बाजारात त्याची काय किम्मत.अभ्यासात चांगले मार्क्स मिळवणारे जगाच्या बाजारात कुटेतरी कमी पडतात कारण त्याना फक्त अभ्यास माहीत असतो बाकी काही नाही.
       हल्ली तर घरचे लोक त्या टक्केवारी च्या इतके मागे लागतात की मुल frusted होऊन आत्महत्या करतात.कोणी सांगितल की चांगले मार्क्स मिळले म्हणजे खूप हुशार झालात  का ? अहो जगाच्या बाजारात कुट किम्मत आहे.तिथे लागते ती गुणवत्ता.माज्या ऑफीस मधील मैत्रीण आहे तिच्या मुलीला 10 वी ला 89% टक्के मिळाले तिला डाँस मध्ये करीअर करायच आहे.घरचे तयार झाले.त्याना महत्वाची आहे ती तिची आवड.असच जर सगळे पालक विचार करू लागले तर विध्यार्थी आत्महत्या होणार नाहीत.
    थ्री इडियत मध्ये रँचो चा डायलॉग आहे "काबिल बनो कामयाबी झक मारते हुये आयेगी ".त्या फिल्म मधील जसे farhan चे वडील वागले तसच आपले ही वागतील का ? सगळ्याला हे थोडं फ़िल्मी वाटेल.वाटेल की ती फक्त फिल्म आहे खऱ्या आयुष्यात हे अस नसत.पण विचार करा .....आपल्याला काय महत्वाचे आहे मार्क ...गुणवत्ता ...की ...आपले मुल ....


Source: INTERNET
-समीर सारागे, नेर

सद्या निकालांचा हंगामा सुरु आहे. 10 वी व 12 विच्या परीक्षेत मिळालेल्या घसघशित यशामुळे गुणवंत विद्यर्थ्यांचे  अभिनंदन स्पर मोठ मोठे शुभेच्छा फलक व वृत्तपत्रात जाहिराती सर्वत्र झळकत आहे. या सर्वच विद्यर्थ्यांना मनापासून शुभेच्छा व अभिनंदन ,

या सर्व घडामोडित एक बाब प्रखर्शाने जाणवते की,  आपल्या राज्यातील आज सर्वच विद्यालय व महाविद्यालयाचा 10 वी 12 वी चा निकाल  हा सरासरी 90 ते 92 % च्या वरच लागला आहे.हे येथे विशेष.
आज सर्वत्र खाजगी शिकवनीचे अमाप पिक आलेले आपल्याला दिसून येईल, इतकेच नव्हे तर गल्ली मोहल्यात देखील खाजगी शिकवनी(Coaching Classes) सुरु झाल्या आहेत. 10 वी ,12 वीत जायच्या आधी पासुनच म्हणजे अगदी बाल वया पासुनच मुलांचे शिकवनी वर्ग सुरु होऊन जातात आणि या शिकवनी म्हणजे अलीकडे थाटलेल्या दुकाणदारयाच म्हणा ! आमची शिकवनी किती दर्जेदार आणि ऊत्तम आहे हे पालक व मुलांना पटवून देण्याचा प्रयत्न यांच्या द्वारे केल्या जात असतो मग आकर्षक जाहिराती, विविध ऑफर्स , आमच्याच शिकवनी मध्ये जर मुलांना टाकल्यास तो 99 टक्के गुनानी पास होईल वैगरे वैगरे अमिषे दाखविलि जातात आणि हा बिजिनेस अलीकडे फार तेजीत आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे. कारण सर्वच  पालकाना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. आपल्या मुलाने परीक्षेत जास्तीत जास्त गुण प्राप्त करावे व तो या स्पर्धेत टिकावा आणि हिच एक महत्वकांक्षा आणि प्रामाणिक उद्देश्य प्रत्येक पालकांचा त्यामागे असतो. आणि तो असणे स्वाभाविक आहे.

प्रत्येकच पालकाला आपला मुलगा डॉक्टर इंजीनयर व्हावा हिच अपेक्षा असते. आणि तो चांगले मार्क्स मिळाले की सहज डॉक्टर किंवा इंजीनयर होईल व त्याला विदेशात एका चांगल्या पैकेजची नोकरी मिळेल  व भविष्यात तीथे स्थाईक होऊन आरमात आपल्या कुटुंबाचा मतीतार्थ चालवेल बस्स इतक्या सोप्या भाषेत ते आपल्या पाल्याच्या सुखी व समृद्ध जीवनाचे स्वप्न रंगवत असतात. परंतु ईथ पर्यंत जाने देखील इतके सोपे नाही. केवळ 10 वी 12 वीत 99% मार्क्स मिळाले म्हणजे समोरची वाट सहज पार करता येईल असेही नाही. कारण चांगल्या कॉलेज मध्ये अभियांत्रिकी करिता प्रवेश मिळविण्यासाठी जेव्हा AIEEE व JEEE सारख्या पूर्व परीक्षा द्याव्या लागतात तेव्हा हेच 90%, 95% वाले तीथे मुळीच टिकाव धरु शकत नाही ही वस्तुस्थिति आहे. मग क़ाय चाटायचे  का तुमचे 95% मार्क्स ? मग या सर्व शिक्षण संस्थावर प्रश्नचिन्ह उपस्थित होने स्वाभाविक आहे. आज 35 %वाला देखील इंजीनियरिंग करत आहे. परंतु IIT ,MIT ,VNIT सारख्या दर्ज़ेदार अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्या करिता तुमचे मार्क्सची टक्केवारी नाही तर पूर्व परीक्षेत तुम्ही किती यश मिळविले यावर प्रवेश निश्चित केला जात असतो.
90 च्या दशकात जितका इंजीनियरिंग  करण्याच अप्रूप वाटायच तितकं आता राहिलं नाही. कारण इथे गुणवत्ता नाही तर डोनेशनची दुकाने सर्वत्र  थाटल्या गेली आहेत. व हा एक व्यवसाय होऊन बसला आहे. आज केवळ एकटया महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या 80  हजारच्या वर जागा आज रिक्त आहेत ईतकी दैणा अवस्था आज या क्षेत्राची आहे. मग भारतात तर विचारायलच नको!
अलीकडे जेवढी औद्योगिक क्रांति झाली तेवढ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला नाही
मागच्या दोन तीन दशकच्या आधिच्या परिस्थितिचा आपण विचार करु ! उदा.तेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला 90% गूण मिळाले की तो सहज अभियांत्रिकी या क्षेत्राची निवड करायचा चार वर्षाच्या या शैक्षणिक कालावधीत त्याला महाविद्यालयीन कैम्पस द्वारे  एखादी कंपनी त्याची निवड करायची व चांगल्या पैकेजची नौकरी त्याला सहज प्राप्त व्हायची देखील. म्हणून कोणताही पालक वर्ग आपल्या पाल्याला इंजीनियर बनविन्याचे स्वप्न उराषि बाळ गत असे ! कारण तेव्हा बोटावर मोजन्या इतकेच अभियंते तयार व्हायचे याचे कारण आता सारखी कुत्र्याच्या छत्रर्या सारखी इंजीनियरिंग कॉलेजेस तेव्हा नव्हती  व 21 व्या शतका सारखी औद्योगिक प्रगती देखील झाली नव्हती तरीही सहज जॉब मिळत असे कारण तेव्हा मोजकीच आणि दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालये होती मात्र आता हजारों अभियांत्रिकी महाविद्यालये आणि त्यातून लाखो बेरोजगार अभियंते निघत आहेत मग यातून गुनवत्तेचा शोध घ्यायचा कुणी ? कारण 4% भारतीय अभियांत्रिकी महाविद्यालये जर सोडली तर बाकी गुनवत्ता शून्य आहेत असा मागिल दोन महिन्या आधीचा अहवाल होता

आता त्याची जागा 10 वी व 12 वी ने घेतली आहे. कारण आपले शैक्षणिक धोरणच पूर्णता बदलले आहे. की, कोण्याच विद्यर्थ्यांला नापास न करणे व टक्केवारीची खिरापत वाटन्याचे धोरण आज राबविल्या जात आहे यामुळे आपले राज्य जगाच्या पटलावर शैक्षणिक दृष्टया प्रगतशील जरी दिसत असले तरी गुणवत्त्ता आणि दर्जात्मक शिक्षणा विषयी कमकुवतच आहे.

अलीकडे एका ताज्या आकडेवारी नुसार ज्या महाराष्ट्रात केवळ SSC चे 48000 च्या जवळपास 90 पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी आहेत आणि त्यात भर CBSE आणि ICSE ची घातली तर हा आकडा 60000 च्या आसपास जाईल तिथे राज्याच्या MHTCET मध्ये 200 पैकी 190 च्या वर गुण घेणारे केवळ 10 विद्यार्थी आणि 75 टक्के म्हणजे 150 गुण घेणारे केवळ 2889. म्हणजे 60000 पैकी केवळ 5 % विद्यार्थी. आता बोला. काय करायचं या दहावीच्या गुणवत्तेचं.
MHTCET त हे हाल आहेत  तर JEE, AIEEE तर विचारायलाच नको.

म्हणून आभासियुक्त या टक्केवारीच्या खेळाचा भविष्यात  विचार होने अत्यंत गरजेचे आहे.


Source: INTERNET
-अश्विनी खलिपे,तोंडाली(सांगली)

         नुकताच दहावी-बारवीचा निकाल लागला आणि त्याबाबतीतल्या अनेक बातम्या कानावर आल्या. अमुक शाळेचा निकाल एवढा, तमुक शाळेचा निकाल तेवढा, तर कुणाचं काही वेगळंच... त्यात एक बातमी वाचण्यात आली की ५८% मार्क्स मिळालेल्या एका मुलीने कमी मार्क्स मिळाले म्हणून घरच्यांचा जराही विचार न करता आत्महत्या केली आणि डोक्यात विचार चालू झाले.
         ३५%...काटावर पास...असं ऐकूनही आमच्या काळात उड्या मारून आनंद व्यक्त करणाऱ्यांचा १% ही आनंद होत नसेल आताच्या ९०% मार्क्स मिळवणाऱ्या या मुलांना... आजची पिढी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नुसती प्रगतशील झालेली भासते, पण खऱ्या आयुष्यात पाहायला गेलं तर त्यांची बौद्धिक क्षमता वाढीस लागली नाही तसेच त्यांच्यात स्वतः विचार करून निर्णय घेण्याची ताकद कुठंच दिसत नाही. आजची पिढी ही हातचं सोडून सतत एका शर्यतीत धावत असते आणि ते त्यांना मिळालं नाही तर त्यांना ते सहन होत नाही , त्यामुळेच ते आत्महत्येचा मार्ग अवलंबतात.
         देशाचे भविष्य हे तरुणपिढीच्या हातात असतं आणि जर देशातील तरुणपिढी अशी वागत असेल तर भविष्य धोक्यात येईल या विचाराने शासनाने निर्णय घेतला की ८वी पर्यंत कुणालाही नापास करू नये, गणित, सा.विज्ञान, समाजशास्त्र यासारखे विषय १५० गुणांवरून १०० गुणांचे केले, त्यातलेही २० गुणांचे प्रात्यक्षिक ठेवले म्हणजे ते शाळेतील शिक्षकांच्या हाती दिले, बेस्ट फाईव्ह इ. अनेक नवनवीन बदल घडवून आणले.
         मुलांनी शिकावं, आत्महत्या करू नये, देशाचं भविष्य सुधारावं यासाठी जरी हे प्रयत्न केले गेले असले तरीही प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात अगदी तसंच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात एक चांगली व दुसरी वाईट. आत्महत्येच प्रमाण कमी झालं असं जरी दिसून येत असलं तरी यामुळे मुलांची अभ्यास करण्याची वृत्ती तसेच गुणवत्ता ढासळते यावर कुणाचंच प्रकर्षाने लक्ष नाही असं म्हणणं वावगं ठरणार नाही...
         आधीच्या काळातील एक म्हण "छडी लागे छमछम, विद्या येई घमघम" यातून शिक्षणाचे स्वरूप स्पष्टपणे दिसून यायचं आणि सध्याच्या काळात हे कुठंच आढळत नाही. याचाच अर्थ असा की नुसता गुणांनी उच्चांक गाठला पण गुणवत्तेने मात्र तळ गाठला...

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************