पहिला पाऊस...आणि माझ्या आठवणी(भाग-1)

आठवडा 30 वा.


पहिला  पाऊस...आणि माझ्या आठवणी(भाग-1)

(यातील सर्व संबंधित प्रातिनिधिक छायाचित्रे इंटरनेटवरुन घेतलेली आहेत.)

शिरीष उमरे,नवी मुंबई
लहानपणी जुन महीन्यात काळे ढग आकाशात  बघितले की की इवल्याश्या मनात भावनांचे वादळ सुरु व्हायचे... पहील्या पावसात भिजण्यास आतुर झालेली धरणी व त्यानंतर होणार्या सुगंधाच्या दरवळीची चाहुल लागलेले माझे अपर् नाक ... काळ्याकुट्ट आभाळात चमकनार्या विजांचे तांडव बघण्यास अधिर झालेले पिटुकले नयन व कडकडाट ने बधिर होण्यास उत्सुक असणारे माझे एवढेसे कान ... सोबतच येणारे थंडगार पाण्याचे टपोरे थेंब झेलण्यास रोमांचित असणारे गोबरे गाल... अजुनही डोळ्यासमोर उभा राहतो तो सोहळा पहील्या पावसाच्या आगमनाचा !!
मग सुरु होतात वाहणार्या पाण्याच्या ओहळात  व्हलवायच्या छोटुश्या कागदी होड्या बनववायची तयारी ... न डुबता दिसेनास्या होडींमुळे  झाल्याचा निरागस आनंदव डुबल्यावर होणारे अबोल दु:ख .. भावनांचा हा हींदोळा झुलतांना ताई ने करुन दिलेली शाळा सुरु होण्याची आठवणीने पार झोका झपकन थांबायचा. सुट्ट्या संपणार ह्या कल्पनेने कावरेबावरे झालेले मन व   उतरलेला चेहरा आई ने शाळेतल्या मित्रांची करुन दिलेल्या आठवणीने परत खुलायचा ...मग सुरु व्हायचा हट्ट बाबांकडे नवीन छत्री साठी... खालेले धपाटे व नंतर आजोबानी घेउन दिलेला रंगीबेंगी रेनकोट घालुन मिरवणे...
ह्या अविट आठवणींचा ठसा मनाला अजुनही गारुड करते...  अमिट क्षणांचा हा खजिना हा आपल्या सगळ्यांकडे असतो जपुन ठेवलेला ... मनाच्या खास खणात ... जो उघडतो दर वर्षी येणार्या पहील्या पावसासोबत !!!

मयूर डुमणे ,उस्मानाबाद
पहिल्या Romantic पावसाची Romantic आठवण
आज बऱ्याच दिवसांनी ती मला पुन्हा दिसली. खरंच किती सुंदर दिसत होती ती ! मी माझ्या रोजच्या सवयीप्रमाणे रस्त्यावरून उनाडक्या करत फिरत होतो. तिला पाहता क्षणीच स्तब्ध झालो हृदयाची धड धड वाढली माझ्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता सोबत चालणाऱ्या मित्राने विचारले अस का वेड्यासारख करतोस मी म्हणालो हा प्रेमरोग आहे जस मलेरिया असतो ना तसा हा loveria रोग आहे त्याचीच ही लक्षण आहेत त्याचवेळेस मला भूतकालातील एक प्रसंग आठवला ज्या प्रसंगाशिवाय माझी प्रेम कहानी पूर्णच होऊ शकत नाही.  पावसाल्याचे दिवस नुकतेच सुरु झाले होते . रविवार होता त्यामुळे बहुतेक mess संध्याकाळी बंद होत्या माझी mess मात्र चालू होती mess वर जाताना रिम झिम पाऊस चालु होता काही क्षणातच रिम झिम पडणाऱ्या पावसाने रौद्र रूप धारण केले मी mess वरच अडकून पडलो, आता करायच काय ? आपल्या सगल्यांचा लाडका मित्र whats up चालु केल तिकडे ती पण तिच्या मैत्रिणीं सोबत जेवायला बाहेर आली होती योगायोगाने ती ज्या ठिकाणी होती तिथेच माझे हितचिंतक मित्र पण होते भाऊने केला msg ती पोटलीत आहे त्याच वेळेस आम्ही दोघेही online होतो मी तिला म्हणालो तू जिथे आहे तिथे येऊ का ती हो म्हणाली एवढ्या मोठ्या पावसात मी कशाला येईल तिथे अस तिला वाटल असेल रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याला नदीच स्वरुप प्राप्त झाल होत मला mess वरुण जायचे होते Libraryt  आणि वाटेत जाताना लागणार होत पोटली मुसळधार पडणाऱ्या त्या Romantic पावसात मी पळत सुटलो रस्त्यावरुन वाहणाऱ्या पाण्याच्या लाटांचा विरोध झुगारुण मी पळत होतो फ़क्त तिला पाहण्यासाठी अखेर मी त्या ठिकाणी पोचलो माझी नजर तिलाच शोधत होती पण ती काय दिसत नव्हती मन सैर भैर झाल अचानक तिच्या हसन्याचा आवाज आला आणि मला ती दिसली तिनेही माझ्याकडे पाहिल मी ओलाचिंब भिजलो होतो ती अवाक झाली तिने गोड smile केली आणि हात हलवून hi म्हणाली (whats up वरुण hi करण आणि अस hi करण खुप फरक आहे बर का) तिची ती smile अजुन ही माझ्या स्मरणात आहे खरच मी त्यावेळेस वेगल्याच प्रेमाच्या धुंधित होतो त्या नंतर बरेच मोठे पाऊस झाले पण तो पाऊस मी कधीच विसरु शकत नाही

जुन एक दिवस मला आठवतो, जेंव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं तेंव्हापासून ते आत्तापर्यंत मी फक्त आणि फक्त तिचे आणि माझेच स्वप्न रंगवत होतो. त्या माझ्या स्वप्नांच्या दुनियेत बाकी कोणाला शिरण्याची परवानगीच मी मुळी दिली नव्हती. तसं पाहता, तिच्या आणि माझ्या पहिल्या भेटीपासूनच घरच्यानाही आमच्या बद्दल कळालं होतं. आई तर म्हणाली होती, "तू तुझ्या पायावर आधी उभा राहा... पैसे कमाव... मग तुला काय करायचं ते कर. "
त्यानंतर आमच्या भेटी माहीत नाही का ? अचानक बऱ्याच कमी झाल्या. माझ्या रोजच्या रस्त्याला पुन्हा ती अजिबातच दिसेनाशी झाली. पण मी मात्र ती येण्याची वेड्या आपेक्षेपोटी तिची वाट पाहायचो.
असो, पण आज ती मला पुन्हा दिसली. अगदी तशीच होती ती. अगदी पूर्वीसारखी. डिट्टो....
तिला पाहताच मी सुखावलो. मला आमचे पूर्वीचे दिवस जसे च्या तसे आठवू लागले. पण पुन्हा ती माझ्याकडे दुर्लक्ष करूनच पुढे गेली. नाहीतर कदाचित मला पाहायला विसरली असेल. क्षणाचा विलंब न करता, मी पुन्हा दुखावलो. खरंच किती बदलली होती ती !
पण मी मात्र तिची एखाद्या वेड्या प्रियकरासारखी तिची वाट पाहत बसलोय.... त्याच रस्त्यावर…

धनंजय खनके ,जालना
औरंगाबादमधला रखरखता दिवस, उन्हाळा संपणारचं होता; लवकरचं पावसाळा येणार होता.तरी सुर्य आग ओकत होता, घामाच्या धारांनी अंग न्हाऊन निघत होतं ;
       तेवढ्यात फोन वाजला पलिकडून आवाज आला "कुठेस तु मी केंव्हाची थांबलीये,सावरकर चौकात येतोय ना मला घ्यायला "
   "अहो, मेहता जी,आलोच की तुमच्या सेवेत..." अस्स म्हणत लगेच तिला घेण्यासाठी गेलो..
    आज तब्बल तीन वर्षांनंतर आम्ही भेटत होतो.. जुने वर्गमित्र-मैत्रिणी... मी ,प्रतू , आणि मेहता जी...
  'प्रतू' यायची बाकी होती अजून. तो पर्यंत एका कॉफी शॉप मध्ये बसलो..
     जुन्या गप्पा चांगल्याच रंगल्या.. कॉफी वगैरे घेतल्यानंतर बाहेर पडलो व निवांत कुठे तरी बसावं म्हणून फार्म फुड्स जवळच्या कॉर्नर वर बसलो होतो.
   अचानक आभाळात काळे ढग जमा झाले,आग ओकणारा सुर्य कुठेतरी गायब झाला होता;हवेत गारवा जाणवू लागला, एव्हाना, सर्वांना पावसाची चाहूल लागली होती.
 आकाशात वीजा कडाडल्या; पाऊस सुरू झाला, आणि अंगावर अलगद बरसू लागल्या त्या ' *पहिल्या पावसाच्या सरी*' उन्हानं लाहीलाही झालेलं अंग कसं,  चंदना सारखं थंड झालं होतं...
    बाहेर कितीही गोंधळ असेना, पण मनात शून्य विचार होते; अगदी निरागस लहान बाळासारखे.
    पावसात चहा पिण्याची गोष्टचं वेगळी असते म्हणे, आणि आमच्या सारख्या चहाच्या वेड्यांना पावसाचा आनंद चहाशिवाय फिकाचं असतो, जवळच्याच एका हॉटेलमध्ये, हॉटेल कशाला 'टपरीचं ' म्हणा की, चहा घेतला.
   पावसाचा गारवा आणि चहाचा गोडवा काय क्षण होता तो.. आयुष्याच्या पुस्तकातून फाडून विशेष डायरीत लिहायचा आणि आठवण येताच परत वाचायचा..
       पावसात आकंठ बुडलेलो होतो, तेव्हढ्यात मेहता जी म्हणाल्या,"ओय हिरो, बस्स कर तुझ चहाप्रेम आणि मला लवकर हॉस्टेलवर सोड"
  " हो जाता येईल की, थोडा वेळ तरी थांबा, आनंद तरी घेवू द्या पावसाचा, आठवणीत राहिला पाहिजे तुमच्या आणि माझ्या पण हा पहिला पाऊस"
मी.


संदिप बोऱ्हाडे,पुणे
 तस पाहिलं तर पहिला काय किंवा दुसरा काय??? पाऊस हा पाऊसच असतो.. वर्षातले 4 महिने पावसाळ्याचे असतात पण तस आपण पाहिले तर 2 , 3 महिनेच पाऊस चांगला पडतो...गावाकडे लहान असताना पावसात भिजण्याची मजा काही वेगळीच असायची...थोडा जास्त पाऊस झाला की रात्री खेकडे पकडायला जाणे...मध्येच साप दिसणे बेडक पण खूप... आणि चिखल तर बोलूच नका ही जी काही मजा होती ती शब्दात तरी नाही व्यक्त करता यायची..पण जसे जसे मोठे होत गेलो तर पावसाळ्याचे महत्व समजायला लागले.

 पहिला पाऊस पडला की गावाकडील मजा वेगळीच आंबे पडायचे पाऊस उघडला की लगेच आंबे गोळा करायला जाणे.. पहिल्या पाऊसानंतर करवंद अजून गोड होतात कशी होतात कुणास ठाऊक पण निसर्गाची किमया.

  पहिला पाऊस असाच कोसळतो धरणीवर त्याचे ते बरसणे अकारण नसते. तर ओढ असते धरणीची.  पहिला पाऊस आणि मातीला येणारा सुगंध अनुभवायचा असेल तर शहरापासून दूर गावालाच गेलं पाहिजे. पाऊसाच्या पाण्यासाठी तहानलेली धरती पहिल्या पाऊसाच्या थेंबाबरोबर मोहरून जाते. बऱ्याच दिवसाच्या विरहानंतरच ते पहिलंच मिलन असावं. त्यातून ती पूर्ण न्हाऊन निघते. त्यांचा तो मिलनाचा प्रसंग निसर्गाला सुगंधीत करून टाकतो.

थंड हवा, ढगाळ आकाश, धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध, कड़क चहा , चिंब भिजायला तयार रहा, पहिल्या पावसाच्या पहिल्या आठवणी जगायला तयार रहा....पहिला पाऊस आणि मातीला येणारा सुगंध
अनुभवायचा असेल तर शहरापासून दूर गावालाच गेलं पाहिजे.
    
   हैराण झालेली धरती,रणरणत्या उन्हाळ्याचा "कार" जमिनीची होणारी धूप ,पायाला चटके लागणाऱ्या वाट इत्यादी व त्या वाटांवर चालणारे तुम्ही-आम्ही .
हे चित्र खूप वेळा शहराप्रमाणे गावाकडील वाटांवर दिसतो .फरक असतो तो फक्त एका वहाणेचा. आकाशात निरभ्र प्रकाश असताना , अचानक वातावरणाचे रूप पालटते. थोडे मोठे काळे ढग आकाशात गर्दी करू लागतात. दाटीवाटीने,एकमेकांजवळ उभे राहतात. उभे राहिले जमले नाहीतर चक्क एकमेकांवर आदळतात. मग निर्माण होणारा गडगडाट पहिल्या पावसाची झुळूक देऊन जातो. या गोड झुळके बरोबर मानवी मन एक सुटकेचा श्वास सोडते .

तहानलेली धरती , एका एका थेंबासाठी व्याकुळ झालेली असते. वर्षभराचा विरहच असतो तोहि तिचा अन काळ्या मेघांचा....... ज्याची वाट पाहत,अंगाची लाही लाही होणारी धरती, या शांत वाऱ्याच्या 'गार' झुळकेने हळुच गाली गोड हसते. अन तेवढयात,पाखरांच्या चिऊ-काऊच्या किलबिलाट चाल मंद मंद टाकत हा मेघ राजा येतो तो थेट या धरणीवर..

  काही तज्ञांनी सांगितले आहे की , जगात तिसर महायुद्ध झाले तर ते पाण्यामुळे होईल...त्यामुळे सर्वांनी खूप झाडे लावा..आणि हो पावसा तू मला खूप खूप हवाहवासा वाटतो...खूप खूप जमके बरस.


सिमाली भाटकर,रत्नागिरी
 पाऊस म्हटले की प्रत्येकाच्या मनात वेगळी कल्पना रुजते. कुणी प्रेमाच्या पलीकडे जाऊन त्यात न्हाऊन निघत तर कुणी मैत्रीच्या गारव्यात सुखावत, कुणी त्यातच आपले अश्रु लपवून रडत. असा हा पाऊस खूप साऱ्या आठवणी देतो वर्षानुवर्षे आणि आज आठवण होऊन माझ्या लेखणीतून बरसतोय.

आठवणीत तुझ्या आले नभ दाटून अंबरी,
होऊन आसवे बरसल्या पावसाच्या सरी..
नकळे कुणा हा गंध प्रीतीचा,
विरह मनाचा,
अन ऋणानुबंध दोन जीवांचा,
जुळती रेशीमगाठी एक धागा सुखाचा,
आसमंत ही बरसून सांगे,
ना सोसला विरह
भूमीस चुंबण्या बरसला मिरग
फुलून उठली धरती
सुगंध उधली माती,
आठवणी सांगती,
सोड सखे अबोला,
रुसली नाती जुळून येती,
इंद्रधनू रंग अंबरी उधलती
जुळल्या बंध रेशीमगाठी,
आठवणीत तुझ्या आले नभ दाटून अंबरी ,
होऊन आसवे बरसल्या पावसाच्या सरी,

हा आपल्या आठवणी मधला पाऊस आज अशांच्या आठवणीतील पाऊस लिहायचा आहे जो अविस्मरणीय आहे मग तो 26 जुलै चा किंवा मराठवाड्याच्या आसुसलेल्या मातीचा.

मित्रांनो आपण प्रेमाचा पाऊस पाहिला पण ही धरणीमाय ज्या हिरवळीने नटली होती ते सृष्टीसौंदर्य आज आपणच नष्ट करून टाकु लागलोय आणि तिच्या प्रियकराला आणि आपल्या प्रेमाच्या पावसाला हरवूनच बसलोय, आणि आज उरलं आहे ते फ़क्त पाहणं निळ्या आभाळाकडे आणि उजाडलेल्या धरणी मातेकडे खरंच असा होता आपल्या आठवणीतील पाऊस या पूर्वी?
  वाट चुकल्या वासरसारखं शेतकरी वाट पाहत बसलाय पण त्याच्या लेकरांना कडकडून होणारा घंटा नाद आणि दाटून आलेलं आभाळ आपल्या शिवारात अंगावर झेलण ही फक्त एक आठवण बनुनच राहिली की राव.
   ज्यांनी केला आणि पाहिला तो पाण्यासाठी चा मैलोनमैल प्रवास त्यांच्या आठवणीत हरवून बसलाय माझा पाऊस अन डोळ्यात उरल आणि डोळ्यांत उरल ते फक्त त्याच्या आठवणीत ओसंडून वाहणार पुरासारखं पाणी.
 त्यांच्या भावना पावसाच्या आठवणीत अश्रू होऊन प्रसवल्या पण त्या चातकाची तहान भागवण्यासाठी, धरणीला चिंब भिजवण्या, तो अजूनही नाही बरसला वाट पाहतेय ती आसुसलेली धरती कधी ओघळतील त्या प्रेमाच्या सरी, तहान भागेल लेकरांची आणि फुलेल आठवणीतील शेती, हिरवा शालू नेसलेली ती धरती.
 दुष्काळी भागात हा पाऊस आठवण होऊन राहिला त्या मेघराजला एक विनंती आहे.
    आसुसलेली धरणी माय तुझ्या मिलना साठी दोन हातांचे पंख पसरून उभी आहे, तुझ्या दाटलेल्या डोळ्यातल मोती आता बरसुदे आणि या प्रेमाच्या सरीत ती न्हाऊन निघू दे आणि हा विरह संपू देत.
हा आहे माझ्या शेतकऱ्याच्या मनातला पाऊस जो फक्त आठवण होऊन राहिलाय
जाता जाता पावसाच्या खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद


डॉ.दिलीप कदम,अहमदनगर
आम्ही लहान होतो तेव्हा घरोघरी पंखे नव्हते त्यामुळ  उन्हाळ्यात सर्व लहान पोरांना आंगभर घामोळ्या व्हायच्या. खाजवून हैराण.
आज्जी सांगायची कपडे काढून पहिल्या पावसात भिजल की घमोळ्या बऱ्या होतात.
पहिल्या पावसात भिजायला मज्जा यायची.

शाळेत गेलो तेव्हा पहिल्या पावसात भिजण्या पेक्षा दप्तर भिजायच टेंशनच जास्त असायच.

मुंबईला कॉलेजला असताना *तिच्या* बरोबर वरळी सी फेस वर पहिल्या पावसात भिजल्याच्या आठवणी अद्याप विसरल्या नाहीत.

आता मात्र पहिला पाऊस आला की व्हिक्सची डब्बी आठवते मग गॅलरीत बसूनच पहिल्या पावसाची मज्जा बघतो.

पण पहिला पाऊस बघताना बायको गर्मागरम भजी आणि मस्त वाफाळकेला चहा देते.
अस वाटत तिला खेचुन  न्याव आणि पहिल्या पावसात भिजाव.
पण तिच आपल एकच पालुपद असत.

"इश्श लोक काय म्हणतील"


किरण पवार ,औरंगाबाद
            पहिला पाऊस आठवतो तो शाळेतला. कारण त्याअगोदर अगदीच इतका लहान होतो की, काही समजूच शकत नव्हतो. पण शाळेतील त्या गमतीजमती काही वेगळ्याच. पाऊस पडला की, मातीचा अप्रतिम सुगंध अगदी संपूर्ण मैदानावर पसरलेला असायचा आणि त्यात अशातच आम्ही मैदानावर घसरगुंड्या बनवायचो. पोर त्यावरून इतक्या वेळा पडायची आणि ते बघून आम्हाला मजा यायची. ते वयच इतक अल्लड होतं की; चूक वा बरोबर, कमी वा जास्त अशा कोणत्याच गोष्टी मनाला स्पर्शत नसायच्या. पाऊस पडायला लागला की, मुद्दाम भिजत, हळू चालत घरी जायचं. मग भले जवळ छत्री का असेना. मला पावसाची एक आठवण अजूनही खूप लक्षात आहे ती म्हणजे, मी व मित्राने साधारण पाचवी-सहावीत असताना एक मोठी नाव बनवली होती. अगदी आम्ही दोघे बसू शकू एवढी आणि ती घेऊन एका पाणी साचलेल्या बंद चौकोणाकृतीत ती चालवली होती. कागदी नावातर चिक्कार बनवायचो. पाणी साचलेल्या मोठ्या मोठ्या खड्यात मित्राला ढकलूनही दिलं बऱ्याच वेळा आम्ही. ती मजा अन् ती आठवण काही औरच.
                पहिल्या पावसाच्या बालपणींच्या आठवणींखेरीज पावसाच्या इतरही बऱ्याच आठवणी आहेत. जसं की, पहिल्या पावसात पाहिलेली ती किंवा तिने पहिल्या पावसात भिजताना पाहिलेला मी. इतरवेळी तसा पाऊस कामानिम्मित्तच हवा असतो सर्वांना. पण काही ठरावीक क्षणी त्याची मजा काही निराळीच. आणि महत्त्वाचं म्हणजे, *माझ्यासाठी प्रत्येक नव्या क्षणी येणारा पाऊस हा पहिलाच असतो.* कारण मला तो दरवेळी एक नवी कविता देऊन जातो. मला त्या पावसात गुंतून राहणं नाही जमतं. तो स्वत:हून मला भावना देतो. तो स्वत:हून मला आशय पुरवतो. पाऊस सोबत केवळ गार हवा किंवा चिंब सरीच घेऊन येतो असं काहीच नाही. पाऊस त्याहीपलीकडे जाऊन प्रीत, विरह, आनंद यांसारख्या बऱ्याच भावना सोबत घेऊन येतो. पहिल्या पावसात तिने मला भिजत असलेला पाहून जो मनमुराद आनंद लुटला त्या क्षणाची तुलना किंचीतच दुसऱ्या क्षणाशी होईल. मला बेधुंद जगताना पाहून तिलाही पावसात भिजायची इच्छा झाली होती......
                अर्थात हळूहळू गोष्टी फारच बदलल्या. आज पाच वर्षांनी म्हटलं तर पाऊस तोच येईलही पहिला पण तिच येणं काही होणार नाही. आयुष्य छोडसं गोड अन् थोड कटूही असू शकतं. *फक्त त्या प्रसंगांना ओलाव्यातील सरींचा शिडकावा देता आलं म्हणजे जमलं.
                
सौदागर काळे,पंढरपूर
" येरे येरे पावसा,तुला देतो पैसा.पैसा झाला खोटा ,पाऊस आला मोठा."असं बडबड  करत नाचत पावसाचा आनंद लुटण्याचा निरागसपणा पहिला पाऊस लहानपणी अनुभवू द्यायचा .त्या पावसाच्या पाण्यात सारा आसमंत आपलाच वाटायचा. काहीजणांना पावसात आज ती दिसते.पण मला फक्त ती च आठवते जी पावसात भिजून आजारी पडेल म्हणून मारत घरात नेत असे.या पहिल्या पावसात आपण भिजून आजारी पडलेले आठवत नाही.जसजसे मोठे होत गेलो तसा पहिला पाऊस सुद्धा बदलत गेला.अचानक शाळा सुटण्याच्या वेळेस आलेला पाऊस सारे अंग भिजवायचा. त्यातून वह्या-पुस्तके वाचत नसत.मग कित्येक दिवस पावसाने त्या वह्या-पुस्तकात कैद केलेला वास सहन करावा लागत असे.

लहान लहान बेडके  उड्या मारत पावसाळ्यात कुतुहुल निर्माण करायचे. त्यामुळे ते कितीही अंगाने ओबडधोबड वाटत असले तरी त्यांच्याबरोबरच्या आठवणी  रम्य आहेत.

पहिला पाऊस पडायच्या अगोदर *पावश्या* नावाचा पक्षी सारखा ओरडायचा. याची खूप कीव यायची, वाटायचं कधी एकदा पाऊस पडेल अन याची तहान भागवेल.

कधी कधी पहिला पाऊस असाही अनुभवला .धुऊन वाळण्यास घातलेले कपडे पाऊस आला तर काढायची जबाबदारी घरचे देऊन जात. अशावेळी मित्रांबरोबर बाहेर खेळण्यास गेल्यानंतर अचानक पाऊस यायचा.घरी जाईपर्यंत सर्व कपडे भिजायचे.त्यावेळी पाऊसपण झोडपायचा अन घरचेही.

कधी कधी स्वयंपाक करण्याची सर्व लाकडे पाऊस भिजवत.तेव्हा रात्री उन्हाळ्यात केलेल्या शेवाळ्या खाऊन रात्र काढावी लागत.पुढे कधी कधी तो विजेच्या कडकडाटसह, ढगांच्या गडगडाटसह
मध्यरात्री आला आहे,तेव्हा एकच धांदल उडायची. शेळ्या,गुरा-ढोरांना सुरक्षित ठिकाणी बांधताना आपोआप तो भिजवायचा.

कधी कधी हा लवकर नाही आला म्हणून माझ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया गेल्या आहेत.ती केलेली गुंतवणूक मातीमोल झाली आहे.तेव्हा मात्र तो ढगातून नव्हे डोळ्यातून बरसायचा.


तेजस महापुरे,कराड                     
प्रत्येक वर्षीच्या पहिल्या पावसाच्या आठवणी या वेगवेगळ्या आहेत,लहानपणी   पहिल्या पावसात भिजण्याची जणू स्पर्धाच लागलेली असायची,त्यावेळी पहिल्या पावसात भिजणं म्हणजे जग जिंकल्याचा आनंद मिळत असे,पावसाच्या साठलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणे हा आमचा आवडता खेळ, यानंतर शाळेत असताना वृक्षारोपण बद्दल माहिती समजली तेव्हा पहिला पावसात एखाद रोप लावायचं अस पक्के झाले,त्यावेळी शाळेच्या मैदानात रोपे लावल्याच आजही आठवतंय,नंतर कॉलेजमध्ये असतानाचा पहिला पाऊस हा तर अनेक आठवणी ठेवून गेलाय,त्यावेळी पाऊस आणि गरम चहा हे ठरलेलं समीकरण ते रोमँटिक वातावरण,खरंतर पाऊस हा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे तो न पडल्यावरच समजत,पहिल्या पावसाच्या आठवणी या सुखकारक आहेत,तश्याच पुढील वेळेस राहोत हीच सदिच्छा…

R. सागर,सांगली
पाऊस म्हटलं की त्यासोबत प्रत्येकाच्याच काही ना काही आठवणी जोडलेल्या असतात. विशेषतः पहिल्या पावसाच्या.. कुणाच्या शालेय जीवनातल्या असतील तर कुणाच्या तारुण्यातल्या. पण प्रत्येक आठवण ही खासच असते. अजूनही आठवतंय बालपणी तो पहिलाच पाऊस असायचा जेव्हा घरचे कितीही ओरडले तरी पावसात भिजायची मज्जा काही औरच. त्यातही गारांचा पाऊस असला की मग तर काही विचारायलाच नको.
.
आपल्या घराच्या कौलारू छप्पराचं वानरांनी वर्षभरात किती नुकसान केलंय हे पहिल्या पावसातच समजायचं. आणि मग घरातील शक्य असतील ती सगळी लहान-मोठी भांडी आई-आजी घरात जिथं-जिथं पाणी गळतंय असं वाटायचं तिथं ठेवत जायच्या. पाऊस उघडला की मग घरावर चढून शक्य ती दुरुस्ती केली जायची.
.
शेतकरी कुटुंबात जन्म झाला असल्यामुळे पहिल्या पावसाची प्रतीक्षा घरी सर्वांनाच असायची. कधी-कधी पेरणीपूर्वीची सगळी कामं उरकून पावसाची वाट बघायचो तर कधी अंदाज चुकायचा. कामांची गडबड सुरू असायची आणि अचानक पावसाचं आगमन व्हायचं. पण तरीही मोठ्या उत्साहात पावसाचं स्वागत व्हायचं. आणि मग बाहेरच्या मातीचा दरवळणारा सुगंध आणि घरामध्ये गरमागरम कांदाभजी असा योग जुळून यायचा.
.
गेल्या 2 वर्षांत परिस्थिती बदलली. नोकरीनिमित्त गांव सोडावं लागलं. आपलं गांव, आपली माणसं सोडून यावं लागलं. पण तरीही गावाची ओढ कमी होत नाही. आजही गावी तुफान पाऊस पडतोय आणि मी इथे वसईमध्ये बसून अजून पहिल्या पावसाची वाटच बघतोय..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************