स्वच्छ भारत अभियान : सेल्फिमय की गांधीमय वाटचाल ?

🌱वि४ 🌿 या व्हॉटसअप ग्रुप वरून
            Source: INTERNET
स्वच्छ भारत अभियान : सेल्फिमय की गांधीमय वाटचाल ?
            Source: INTERNET
पी . प्रशांत कुमार , अहमदनगर :

....कोणत्याही कारणाने का होईना पण 'स्वच्छ भारत' ह्या विषयाकडे सरकारने लक्ष दिलं त्यासाठी सर्वप्रथम सरकारच अभिनंदन...
...फक्त स्वच्छ भारत ह्या मोहिमचं चळवळीत रूपांतर होण्याऐवजी इव्हेंट मधे रूपांतर होत चालल्याची भीती वाटते.. कारण स्वच्छ भारत साठी जे Brand ambassadors (पक्षी:स्वच्छतादूत) त्यातल्या काहींच्या तर बेडशीट साफ करायला देखील बाहेरची कामावाली माणसं असतील. ही विसंगती दिसते आणि हसू येत.. आधीच स्वच्छ असलेल्या रस्त्यावर स्वच्छ कोरडा कचरा टाकून तो सर्व sefty gears (मास्क,हातमोजे,शूज वगैरे) वापरून साफ करतानाचे फोटो काढायचे आणि ते सोशल नेटवर्कवर टाकून आपणही स्वच्छ अभियानाला हातभार लावला याचा ढिंढोरा पिटायचा ..
....कशाला स्वतःलाही फसवायच ? सरळ त्याऐवजी सफाई कामगारांना मास्क/ग्लोव्हज वाटा वापर कसा करावा हे समजवा..
...खरंतर गांधीजींचे स्वच्छतेचे विचार/नियम वाचा ..
मी सार्वनिक टॉयलेट मधे गेलो तर व्यवस्थित पाणी टाकूनच येतो ही सवय आहे..कुणीच आपल्याकडे पहात नसतानाही आपण ज्या सार्वजनिक स्वच्छतेच्या चांगल्या गोष्टी करतो त्याच खऱ्या..
....चार दिवसात स्वच्छता शक्यच नाही.. It's long process ..सार्वजनिक स्वच्छता अंगी भिनवावी लागेल..दंड वगैरे खूप नन्तर आधी प्रबोधनाची गरज आहे. या मोहिमेत 'शाळा' हा खूप महत्त्वाचा घटक आहे.. कचरा स्वच्छ करने वगैरे गोष्टींऐवजी मी कमीत कमी कचरा कसा करू शकेल आणि त्या कचऱ्याचही घाणीत रूपांतर होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी हे शिकवण महत्वाच..
एक उदाहरण आहे ..राहुल मोरे माझा मित्र..माझ्या मित्राची छोटी शाळा आहे .. माणिकदौंडीला..नगर-मराठवाड्याच्या सीमेवरच्या छोट्या खेड्यात .. टॉयलेट बांधले..स्टाफसाठी पण ..स्वच्छता कशी करायची? बरं वेगळा माणूस ठेवणे तर खेड्यात मिळणार पण नाही आणि नवीन शाळा बजेट कमी शाळेचं त्यामुळे परवडणार पण नाही.. तर एक शिक्षिका पटकन म्हणाली,"आम्ही एक-एक दिवस वाटून घेतला आणि तशी कॅलेंडरवर नोंद पण केली उलट तुम्ही आमची इतकी सोय केलीत थँक्स सर.."
....इथेच गोष्ट संपत नाही..माझा मित्र म्हणाला,"मग त्यात एक दिवस माझा आणि एक दिवस सारिकाचा (त्याची पत्नी) पण नोंदवा.. आम्ही पण स्टाफचाच भाग आहोत.." ...आणि विशेष म्हणजे हे त्याने मोठेपण मिरवायला केलं नाही..
....सहल घेऊन जातो तेव्हा ते ठिकाणचं कचरा मुक्त करून येतात ते..
मुलांना स्वच्छतेच चांगलं वळण तेही खासकरून सार्वजनिक ठिकाणच्या हे ठरवून लावता येत नाही.. आसपासच्या मोठ्या लोकांचं ते अनुकरण करत शिकतात..
...असली उदाहरण पाहिली की स्वच्छ भारत अभियानाची गांधींमय मार्गाकडे वाटचाल दिसते आणि बरं वाटत..
        Source: INTERNET
     
किरण पवार , औरंगाबाद :

             ही जरी सध्यस्थिती असली की आपण सध्या स्वच्छतेचे उपक्रम फार मोठ्या  प्रमाणात राबवत आहेत. तरी बऱ्याच वेळा आपण केवळ दिखाव्यासाठी काही गोष्टी करतो. कुठेतरी त्या गोष्टींबद्दल प्रामाणिकपणे आपण स्वत:ला विचारल पाहिजे. पण या *सेल्फिमय कल्चरचा आपल्या देशात कुठेतरी चुकीचा उपयोग करोत आहोत. आणि त्याचा थेट परिणाम लहान लहान मुलांवर होतो आहे.* ही गोष्ट बदलनं आपल्या हातात आहे.
             काही ठराविक शिल्लक व्यक्ती फक्त प्रामाणिकपणे स्वच्छता अभियान राबवतात. जे खरोखरच सेल्फिचा उहापोह करत नाहीत. त्यामुळे भारत जर खरोखर स्वच्छ पुर्णपणे करायचा असेल तर सेल्फिची क्रेझ बंद व्हायला हवी.
       Source: INTERNET
मयुरी देवकर , पंढरपूर :

           भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत आम्हांला भारत  अजूनही स्वच्छ झाला  नाही  याचीच खूप खंत वाटते .खरंच आपण स्वतंत्र झालो आहोत काय ?प्रत्येक क्षेत्रामध्ये एवढी प्रगती करूनही आजही आम्ही स्वच्छतेच्या बाबतीत एवडे अडाणी कसे ?  
          प्रत्येक व्यक्ति आज स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकली आहे अस मला वाटत .प्रत्येकाने जर स्वतः च्या घराचा परिसर स्वच्छ ठेवला तरी एवड्या मोठ्या स्वच्छ भारत अभियान ची सुरवात झाल्यासारख होईल .आज आम्ही स्वत ला सुशिक्षित समजतो आणि स्वतः च्या घरातील कचरा रस्त्यावर फेकतो आणि आणि पुन्हा तीच स्वच्छता करण्यासाठी सगळे मिळुन जमतो आणि हातात झाडु घेतो आणि सेल्फी काडतो .....आणि काय मग स्वच्छ भारत मिशन कडे वाटचाल ......झाल .....अस हे अजून किती दिवस चालणार ? आणि हे जर असच चालू राहिले तर भारत स्वच्छ कधी होणार ?
            आज आम्हांला स्वच्छतेचे , स्वच्छ पर्यावरणाचे महत्व सर्वांनाच पटले आहे .तरीही ही उदासीनता का ? मग जर खरंच स्वच्छता करायची नसेल तर  हे अभियान नुसते वर्षोंवर्षे चालवत ठेवायचे असेल तर मग सेल्फी तरी कशाला काढायचा ?  
            आज वातावरणच असे झाले आहे की आम्हांला आमच्याच चुकीच्या कामांचा अभिमान वाटतोय आणि म्हणूनच कधी कधी तर आम्ही कचरा नसला तरी हातात झाडु घेवुन सेल्फी काढतोय कशासाठी ?... तर दुसऱ्याना दाखवण्यासाठी ? ...
हेच मिरवने हारतुरे बंद करून खऱ्या अर्थाने स्वच्छतेची  सुरुवात स्वतः च्या घराच्या परिसरातून करने हीच खरी काळाची गरज झाली आहे ....आहे आणि हीच योग्य वाटचाल होय .....

     Source: INTERNET
आर. सागर ,  ,सांगली:
परवाचीच गोष्ट. सकाळी घरून ऑफिसला निघालेलो. जाताना नेहमीच्या चौकात गेल्यावर पुढे एक मोठं डिजिटल लागलेलं. तसंही रोज कुणाचा ना कुणाचा विशेषतः स्वयंघोषित नेत्याचा वाढदिवस वगैरे असतोच त्यामुळे चौकात डिजिटलची गर्दी नेहमीचीच. पण हे डिजिटल नेहमीपेक्षा थोडं वेगळं होतं. सध्या जे स्वच्छता सर्वेक्षण सुरू आहे (4 जानेवारी ते 10 मार्च) त्यासंबंधीचं डिजिटल होतं ते.. गेल्या 4 वर्षांपासून राबवल्या जात असणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाच्या यशापयशाचा आढावा घेण्यासाठीचं सर्वेक्षण.. विशेषतः शहरी भागासाठी..
.
त्यानिमित्ताने या स्वच्छता अभियानाबद्दलच्या यापूर्वीच्या योजना आठवल्या. 1999 साली स्व. आर. आर. पाटील (आबा) महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केलं. साधारण त्याच सुमारास केंद्र सरकारनेही संपूर्ण स्वच्छता अभियान देशपातळीवर सुरू केलं. 2012 साली त्याचंच नाव बदलून निर्मल भारत अभियान या नावाने ते सुरू ठेवलं. 2014 साली मोदी सरकारने 2 ऑक्टोबरचा गांधी जयंतीचा मुहूर्त स्वच्छ भारत अभियान सुरू केलं. त्याद्वारे 2 ऑक्टोबर  2019 पर्यंत हागणदारीमुक्त गावे, सार्वजनिक रस्ते व पायाभूत सोयी-सुविधांची स्वच्छता करण्याचा संकल्प करण्यात आला.


म्हणजे एकंदरीत गेल्या 8 ते 9 वर्षांपासून स्वच्छतेसाठी देशपातळीवर वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. सध्या त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत आणि अमिताभ बच्चनपासून शिल्पा शेट्टी, प्रियांका चोप्रापर्यंत विविध दिग्गजांची निवड केली आहे. पण तरीही त्याबाबत आपले नागरिक जागरूक आहेत का? फक्त सामान्य नागरिकांच्याबाबतच न बोलता ज्यांनी यासाठी योजना बनवली, ज्यांची प्रचार-प्रसारासाठी निवड झाली ते तरी समर्पित भावनेने त्यात कधी सहभागी झालेत का किंवा होताहेत का हाही प्रश्न आहेच..
.
हातात झाडू घेऊन रस्ता साफ करणारे नेते तर नेहमीच झळकत असतात. बऱ्याचदा सामाजिक बांधिलकीच्या गोंडस नावाखाली हे कार्यक्रम सुरू असतात. पण खरंच त्यांचा त्यामागे स्वच्छता करण्याचा हेतू असतो की फक्त फोटोसाठीच हाती झाडू घेतलेला असतो हेच समजत नाही. कारण अपवादात्मक एखादा फोटो सोडला तर कुठल्याच फोटोत नेत्याच्या कपड्यावर एखादा डागही दिसत नाही किंवा कपड्यांची इस्त्रीची घडीही मोडलेली नसते. मग खरंच ते स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरतात का हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
.
सरकारी कार्यालयांमध्येदेखील फारशी वेगळी स्थिती नसते. सरकारची योजना म्हणून बहुतांश कर्मचारी सहभागी होतही असतील. पण ज्यावेळी तुम्ही एखाद्या सरकारी इमारतीत जाता त्यावेळी तिथल्या जिन्याच्या बऱ्याच भिंती पिचकाऱ्या मारूनच रंगवलेल्या दिसतात. हे होऊ नये म्हणून जिन्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यात देव-देवतांचे फोटो लावावे लागतात हे तसं दुर्दैवच.

                Source: INTERNET
अशी परिस्थिती असताना स्वच्छ भारत अभियानाचं प्रतीक म्हणून चष्मा आणि योजना राबवण्याचा कालावधी गांधी जयंतीपासून गांधी जयंतीपर्यंत ठेवलाय हा तसा विरोधाभासच.. कारण गांधीजींच्याच मार्गानं जायचं असेल तर त्यासाठी फक्त चष्मा उपयोगाचा नाही तर त्या चष्म्याआडची दृष्टी आणि विचारही तितकेच महत्वाचे आहेत.. नेते असोत किंवा सेलेब्रिटी त्यांना आधी स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. स्वतःपासून , स्वतःच्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. आधी केले मग सांगितले या विचारातून काम केलं पाहिजे. काम करत असताना फक्त फोटोसाठी न करता *मी राबतोय तुम्हीही राबलं पाहिजे तरच आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकतो* हा मंत्र आपल्या कृतीतून दिला पाहिजे. तरच सर्वसामान्य जनता तुम्हाला मनापासून साथ देईल. मातीत राबताना मातीचाच टिळा कपाळी लावून जर प्रत्येकजण काम करत राहिला तर कुठल्याही योजनेला यश नक्कीच मिळेल.
.
(सगळेच नेते किंवा सरकारी कर्मचारी फक्त सेल्फीसाठीच काम करतात असं नाही. काहीजण तळमळीने राबत असतातच. त्यांच्या कार्यासाठी त्यांना सलाम..)

कुणी माझं ऐकाल का ? अहो,मी तिरंगा बोलतोय….(भाग:-२)




  🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

कुणी माझं ऐकाल का? अहो, मी तिरंगा बोलतोय….(भाग:-२)

Source: Internet

-अमर चिखले
 पुणे

       उगवत्या सूर्याचा रंग भगवा आहे म्हणून त्याने स्वतःला कधी हिंदू म्हणून घेतले नाही; आकाशाचा रंग निळा आहे म्हणून त्याने कधी स्वतःला बौद्ध म्हणून घेतले नाही; या सृष्टीचा रंग हिरवा आहे म्हणून तिने कधी स्वतःला मुस्लिम म्हणून घेतले नाही परंतु हेच रंग याच भारत देशातल्या लोकांनी आणि राजकारण्यांनी वाटून घेतले .ते सर्व हे विसरले का याच रंगांचा मिळून बनलेल्या तिरंग्याचा सन्मानासाठी किती तरी क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होय मी तोच तिरंगा बोलतोय ! आज भारतातील किती तरी गरीब जनता हाच तिरंगा विकून पोट भरते . अशी अवस्था पाहिली की वाटते हा तोच भारत देश का ज्याचा दिल्लीच्या तिजोरीवर  जेव्हा इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा संपूर्ण देश पेटून उठला तिरंगा हातात घेऊन परंतु आज मात्र आम्ही अजुनही इतक्या वर्षानंतर त्याच दिल्लीतली युवतीला अजून सुरक्षित करू शकलो नाही .वास्तव फार वेगळेच आहे म्हणून तर
आण्णाभाऊ साठे म्हणून गेले की ,"यह आझादी झूठी है देश की जनता भूखी हैं !" होय मी अशाच देशाचा राट्रध्वज तिरंगा आहे.ज्या गावात माझा स्वतःचा जन्म झाला त्याच गावात एका क्रांतिकारकाचाही जन्म झाला आहे ते गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ आणि ते क्रांतिकारक म्हणजेच हुतात्मा बाबू गेनू सैद होय .या युवकाने परदेशी मालाच्या गाडीपुढे आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्याच्याही हातात तिरंगाच होता होय मी तोच तिरंगा . दिवसेंदिवस आपले जवान रोजच शहीद होत आहेत देशाच्या रक्षणासाठी त्यांना बहाल केला जातोय तोच हा तिरंगा . आशा लोकांना आपण विसरत चाललोय असे मला वाटते . म्हणून तर कुसुमाग्रज म्हणून गेले ती त्यांची कविता 'स्वातंत्र देवतेची विनवणी ' त्यात ते सुद्धा आपल्याला समजवतात की वाट वाकडी धरू नका  परंतु आपण मात्र भान विसरत चाललोय . एकीकडे दादाभाई नौैरोजी यांनी भौतिक संपत्ती निसारणाचा सिद्धांत मांडला तो आजही लागू होत आहे की भारतातली संपत्ती आजही विजय मल्यासारखे लोक विदेशात नेत आहेत ज्याला आपण काळा पैसा हे नाव दिले आहे होय मी त्याच भारत देशातील सामान्य जनतेच्या आशेचा फडकलेला तिरंगा . कोण ऐकणार माझे गरिबांकडे वेळ पण पैसे नाहीत मध्यम वर्गीयांना यात काही रस नाही आणि श्रीमंत लोकांना वेळ नाही अशा परिस्थितीत ही सगळी परस्थिती बदलण्याची टाकत फक्त तुमच्या सारख्या युवकांमध्ये आहे म्हणून स्वामी विवेकानंद यांच्या शब्दात उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका .म्हणजे डॉ. कलाम सारख्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी प्रयत्न करा . मग तुम्हालाही जीवनाच्या अखेरिस माझी प्राप्ती होईल म्हणजे तिरंगा !
         

Source: Internet

- डॉ. कौस्तुभ कल्पना विलास

       भारत स्वतंत्र व्हायच्या आधी माझा जन्म झाला, भारताच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत भारतात जे घडले त्याचा मी साक्षी आहे. भारतात अनेक सुपुत्र जन्मले व अजून आहेत काही येणार आहेत त्यांचा मला अभिमानच आहे. त्यांनी दिशा दिली भारताला पण त्या दिशांची निवड व गती दिली ती सर्वसामान्य भारतीयांनी. मला अभिमान आहे भारतासारख्या महान देशाचे प्रतिक असल्याचा पण खंतही आहे अनेक गोष्टींची. जातींतील सामाजिक विषमता व परस्पर द्वेष, धार्मिक तेढ व दरी, आर्थिक दरी व त्यातील शोषण, लैंगिक अज्ञान व अत्याचार, वृक्षतोड, प्रगतीच्या नावाखाली सत्ता व पैशाचे केंद्रिकरण, अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, अवैज्ञानिक विचारसरणी, अस्वच्छता आदी अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांची यादी करायला बसलो तर पाने भरतील. पण या बदलायला तर पाहिजेच. यानेच आपल्या प्रिय भारताचे जगात हसू होते. मग बदलणार कसे? हातात तलवारी, दगडी घेऊन, तोडफोड वा रक्तपात करून??? नाही....हा बालिशपणा आहे याने कधीही प्रश्न सुटणार नाहित, चिघळतील मात्र. मग सुटणार कसे? तर प्रत्येक भारतीयाने स्वतःला बदलून. प्रत्येक जण स्वतः बदलला तर देश नक्की बदलेल. तुम्ही संविधान कधी वाचले आहे का? भारताच्या नागरिकांची मुलभूत कर्तव्ये वाचली आहेत का? वाचली असावीत, नसेल वाचली तर नक्की वाचा व भारतीय म्हणून आपण त्याचे किती पालन करतो ते स्वतःलाच विचारा. स्वतः स्वःतःला बदला, देश बदलेल. नक्की बदलेल. बुद्ध म्हणाल्याप्रमाणे "माणसाला फक्त स्वतःवरच (स्वत:च्या जीवनावरच) अधिकार असतो" व महात्मा गांधी म्हणाल्या प्रमाणे, "बदलाची सुरवात स्वतःपासून करा" हेच सांगणे - Be the change, what you want to see in society. बघा जमतंय का?
        


Source: Internet

✍️ निलेश पाटील,
    धुळे

कुणी ऐकाल का माझं? अहो मी तुमचा राष्ट्रध्वज अर्थात तिरंगा बोलतोय. तुम्ही तुम्ही तर ओळखले असेलच ना? माझा जन्म 22 जुलै 1947 ला झाला. नेहरूंनी माझी ओळख करून दिली आणि मला जगासमोर आणलं. माझा मानसन्मान व्हावा म्हणून काही विशेष तरतुदी ही केल्या गेल्या.
स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे.
माझा आकार रंग ठरवला गेला. माझ्यातील केशरी रंगाचे महत्त्व म्हणजे त्याग ,बलिदान आणि पांढरा रंग सत्य आणि शांततेचे प्रतिक तर हिरवा रंग साहस आणि शौर्याचे प्रतीक. खूप दिवसांनी बोलतोय ना... वेळच अशी आलीय म्हणून तुमच्यासोबत हितगूज साधतोय. हा तर मला असं सांगायचं होतं की, 15 ऑगस्ट 26 जानेवारी एवढे दोनच दिवस तुमची देशभक्ती असते का? हे 2 दिवस माझ्यासाठी ठरवले आहेत का? या दोन दिवशी तुमचा खूपच स्वाभिमान जागा होतो. आणि भारतीय असल्याचा गर्व वाटतो. छाती फुगते तुमची, नाही का? संध्याकाळ झाल्या बरोबर तुमच्यातला देशभक्ताचा अस्त होतो. वर्षांतून 2 दिवसच तुम्ही भारतीय असतात का? दुसऱ्या दिवसापासून तुमचे झेंडे वेगवेगळ्या रंगात दिसतात. भगवा, हिरवा अजून बरेच काही रंग दिसतात आणि तुम्हाला जातीची नशा चढते. मग कोणाला हिंदू असण्याचा गर्व होतो, कोणाचं रक्त भगवं होतं तर कुणाचं निळं होतं. तुम्ही तुमची ओळख जातीने दाखवता, भारतीय म्हणून कधी एक व्हाल? खरं तर मला तुमच्याकडून मानसन्मान मिळावा ही अपेक्षा मुळीच नाही. माझ्या निमित्ताने तरी एकत्र यावं, जातीधर्माच्या पलिकडे जाऊन भारतीय म्हणून एकत्र यावे ही अपेक्षा आहे. असं झालं तर तुमच्यासोबत झालेलं हितगुज सार्थ झालं म्हणावं. येत्या 26 जानेवारीला भारतीयांना बघायची संधी मिळावी हीच अपेक्षा.

Source: Internet

तेजस महापुरे,
कराड

              हॅलो आज दरवर्षी प्रमाणे मला सॅल्युट केला सर्वांनी तसेच फेसबुक वर ट्विटर वर इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप्प वर अनेकांनी माझेच फोटो ठेवलेत, तस हे वर्षातून दोनदा तुम्ही करताच,माझ्याबद्दल असलेल प्रेम या दोन दिवशी जरा जास्तच उफाळून येत असत, स्वातंत्र्यापासून पाहतोय मी तुमचे हे दोन दिवसाचे देशप्रेम,  याचा अर्थ तुम्ही तुमची प्रादेशिक अस्मिता विसरूनच जावा असे मी म्हणत नाही,कारण विविधता हे तुमचं फार मोठे वैशिष्ट्य आहेच मग त्यातून एकता का दिसत नाही,का अजून धर्म,जात,पंथ,भाषा यावरून एकमेकात भांडत असता,कशाला खोटा मोठेपणा मिरवत असता,केवळ विशिष्ट धर्मात,जातीत जन्माला आला यावरून तुमची श्रेष्ठता ठरते का,थोर महापुरुष वाटून घेण्याचा मूर्खपणा का केलाय तुम्ही,अजूनही त्यांचे विचार तुम्हाला समजलेच नाहीत,तुम्ही महापुरुषांची जयंती फक्त DJ लावून साजरे करता,विचार करा काय वाटलं असत त्या महापुरुषांना हे सर्व पाहून,आणि सेल्फीचे किती वेड यामुळे फक्त सेल्फीश झालात सर्वजण तुम्ही,शिवाजी महाराजांचे नाव घेणारे कितीजण त्यांच्या विचारांप्रमाणे कृती करतात,किती जण शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालतात, किंवा तसे धाडस करू शकतात,फार कमी भेटतील असे,या थोर महापुरुषांना एकमेकात वाटून घेणारे तुम्ही कोण,काय तुमचं कर्तृत्व,एक लक्षात घ्या या सर्वांनी कधीही जात पात मानली नाही,या भूमीसाठी अनेकांनी बलिदान दिले आहे,त्याची जाण ठेवा कुणाच्याही हातातले दगड बनून एकमेकांवर बरसू नका,कारण दंगलीत जात कधीच मरत नाही,मरतो तो फक्त आणि फक्त माणूस,एक लक्ष्यात ठेवा लोकशाही एवढे स्वातंत्र्य दुसरे कुठेही मिळत नाही,त्याचा उपभोग घ्या, सनदशीर मार्गाने तुमचे म्हणने मांडा, मूलभूत हक्क आणि कर्तव्ये समजून घ्या मनात भारतीय असल्याची भावना रुजवून घ्या,माणूसकी ने वागा,लक्ष्यात ठेवा कोणतेही वाद हे चर्चा आणि सुसंवाद यामाध्यमातूनच सुटू शकतात, आणि जर माझं ऐकणार नसाल तर मला सॅल्युट पण करू नका,एकवेळ माझा फोटो फेसबुक,ट्विटर,इंटग्राम, व्हाट्सअप्प वर ठेवला नाहीतरी चालेल पण मी जे काही सांगितलं आहे ते नीट वाचा,त्यावर विचार करा,त्याप्रमाणे कृती करा तरच भारत महासत्ता होईल,प्रत्येक महापुरुषांकडून किमान एकतरी गुण घ्या व त्याप्रमाणे वागा सगळ्यांचे कल्याण होईल, आणि तुमच्यामुळे माझी शान कमी होता काम नये याचे भान ठेवा...............



Source: Internet

-करण बायस
जि. हिंगोली

(आकाशवाणी द्वारे तिरंगा भरतीयांसोबत संवाद साधतो)

नमस्कार, माझ्या देशवासियांनो मी तिरंगा बोलत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की आज अचानक तिरंगा कसं संवाद करतोय कारण मला असं वाटलं की मला सध्याच्या परिस्थिती बघून तुम्हाला संवाद साधावा.

मित्रांनो तुम्ही दर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला माझी आठवण करून माझ्याप्रति असलेली तुमची भक्ती दाखवता मला त्या दिवशी खूप छान वाटते.मी तुम्हाला काही सांगणार आहे ते तुम्ही ठरवा ते बरोबर की चूक.

मी बघत आहे की देशात सध्या एक अभियान चालू आहे ‘स्वच्छ भारत अभियान’ मला खूप आनंद झाला जेंव्हा मी याबद्दल ऐकले. जसजसे हा अभियान पुढं येत गेला तस मी बघितलं की काही लोक चांगल्या स्वच्छ जागेवर कचरा टाकून त्या जागेवर हातात झाडू घेऊन selfie काढत आणि social media वर टाकत आणि poapularity मिळवत. तुम्हाला कधी वाटलं नाही का की खरंच आपलं परिसर स्वच्छ असलं पाहिजे ,बर समजा वाटलं असेल तर आपण या अभियानात किती आपलं contribution दिलं. आपण आपल्या परिसरातील वातावरण किती प्रदुषित आहे यावर कधी लक्ष दिल का?कधी विचार केला का की वृक्ष आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत?आपण आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करत अहो का ?


आपण आपल्या border वरच्या सैनिकांचा पण खूप आदर करतो.ज्या वेळेस एखादा सैनिक शहीद होतो आपण त्या वेळेस आपण त्याला सलामी देतो पण नंतर त्याच्या परिवरबद्दल कधी मानत विचार आला का हो?ज्याने आपल्या देशातील लोकांसाठी आपले जीव दिले. विचार करा त्याच्या जागी स्वतःला काही तरी वेगेळंच अनुभव येतो.


आणखी मी बघत आहे देशातील जास्तीत जास्त भागात आरक्षणासाठी आंदोलन चालू आहेत.काय करायचे हो आरक्षण ज्यावेळेस तुम्हाला बुद्धी दिली आहे त्याचा वापर करा काही गरज नाही आरक्षणाची. कधी आंदोलन करणार्यांनी या गोष्टींचा विचार केला का की जे लोक मेहनत करत आहेत त्यांचं काय? आरक्षण पाहिजे तर यासाठी आंदोलन करून दाखवा की मला border वर दुष्मणासोबत लढायचं करा !

या सर्व गोष्टी हे राजकारण करण्यासाठी काही लोक सामान्य लोकांना भडकवतात आणि आपण पेटून विरोध करतो कधी विचार केला की आपलं त्यात किती नुकसान आहे?


आपल्या देशात जातीवाद खूप चालत आहे.प्रत्येक जातीच्या लोकांनी आपला देव, आपला रंग एवढंच नाही तर स्मशानभूमी पण वाटून घेतली!!प्रत्येक जातीचे लोक आपल्या आपल्या जातीच्या माणसाला राजकारणात निवडून देतात त्यावेळेस हे बघत नाही की आम्हाला कोणता नेता योग्य ठरेल.


देशातील जे कष्टाळू शेतकरी आहेत आज त्यांना बरोबर भाव मिळत नाही कारण विचार केला का कधी? काय असेल? सरकार.ते तर आपण च निवडून देतो मग मला वाटते आपल्याला आणखी लोकशाहीचा अर्थ समजला नाही,आणखी हे नाही समजलं की तुमच्यात किती power आहे.


आज शिक्षणात बरोबर नौकरी मिळत नाही.कधी विद्यार्थ्यांनी विचार केला का की आपण शाळेत, महाविद्यालयात जाऊन काय करतो अभ्यासक्रम वर किती लक्ष देतो? त्या बद्दल किती जिज्ञासा असते आपल्याला?आपण नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो का?त्या नुसार आपल्याला आपल्या quality ची पगार मिळते.

माझी एक request आहे तुम्ही स्वतः ला बनवण्यात वेळ घाला कोण आपल्याला भडकवून देतो मग आपण पेटून विरोध करायची, धिंगाणा करायचं याकडे लक्ष देऊ नका.

आणि मी बोललो याचा विचार करा वाद करू नका.🙏🏻🙏🏻




Source: Internet

 -नवनाथ वाघ
   अहमदनगर

 झालं का सर्वांचं.....? की राहिलंय अजून..? नाही, राहिलं असेल अजूनही काही देशप्रेम (?)  दाखवायचं तर दाखवून घ्या. नाही मग कसं होतं पुन्हा वर्षभराची चिंता मिटून जाते ना. परत एकदा स्वातंत्र्यदिन सोडल्यानंतर पुन्हा पुन्हा संधी येणार नाही इतकं उफाळुन उफाळून देशप्रेम दाखवायला. राहिलेल्या वेळेत मग पुन्हा मग भगवे, निळे, हिरवे असे अजून कितीतरी रंगांचे मिरवायचे असतात ना तुम्हाला..
 वर्षातून दोनदा dp, प्रोफाइल, गाडी अजून कुठे कुठे मला चिकटवल की, वर्षभर झाले ना  मोकळे हेच सर्टिफिकेट दाखवीत, बेगडी देशप्रेमाच्या हाळ्या देत, रस्त्यावर थुंकण्यापासून ते बॉम्ब स्फोट घडवण्यापर्यंत आणखी बरच काही करायला.
 आणि म्हणे देश 2020 होणार. कोणी उतरणार आहे वरून देशाला महासत्ता करायला. हरामी साले... , राष्ट्रवाद, देशप्रेमाच्या नावाखाली काय काय चाललंय... मुजोर राजकारणी आणि हरामी जनता. राजकारणी सात पिढ्यांसाठी कमावण्यात व्यस्त, बिचारी भोळी(?), अन गरीब जनता तरी काय करणार नाही का? हा आता वेगवेगळ्या रंगाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन हीच गरीब, भोळी जनता बीफच्या संशयावरुन एखाद्याला ठेचून मारू शकते, शांत जमावावर दगडफेक करू शकते, पुतळे तोडू शकते, पार सार्वजनिक बलात्कारापर्यंत आणखी बरंच काही करू शकते. बघा विचार करा.
   तुम्हाला माझ्यासाठी, देशासाठी भयंकर त्याग करायची गरज नाही. याची सुरुवात अगदी तुम्ही सिग्नल पाळण्यापासून करू शकता. समोरच्याकड एक बोट दाखवताना तीन आपल्याकडं असतात हे लक्षात असू द्या..आणि इकडं तिकडं देशप्रेमाची सल्ले झाडत हिंडण्यापेक्षा कुठून तरी सुरवात करा... अगदी छोट्या छोट्या गोष्टी. हे जमलं तर मात्र देशाला महासत्ता होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही ....
          इति. तुमचाच तिरंगा......
     

Source: Internet

-कृष्णकांत मोरेश्वर राईलकर
 मु.डहाणू
 जि. पालघर

आज जानेवारी सत्ताविस
माझा जिव हो कासाविस।

कुठेसा पडलो अडगळीत
तर कुठेतरी कचराकुंडीत।

काल तर किती माझी ऐट
होतो लाल किल्यावर थेट।

प्रत्येकाच्याच कार्यालयात
गावो-गावी, चौकाचौकात।

होतोच शाळांवर फडकत
हाती घेऊन ते हो मिरवित।

मज साठी बलिदाने केली
स्वप्राणांची आहुती दिली।

पण आज दिसतसे दुर्दशा
धर्म,जातीच्या चढती नशा।

स्वार्थासाठी होतातच अंध
ना राही कोणताही धरबंध।

तरी मलाअजूनआहेआशा
कु-प्रथा गुंडाळतील गाशा।

सुविचारे थोपवतिल दंगा
होय.मीच तो आहे तिरंगा।

कुणी माझं ऐकाल का ? अहो मी तिरंगा बोलतोय ….(भाग:-१)

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून
  
कुणी माझं ऐकाल का?अहो,मी तिरंगा बोलतोय….(भाग:-१)

Source: Internet


-ज्ञानेश्वर तात्या टिंगरे,
 उस्मानाबाद

सर्वप्रथम हा विषय इथं चर्चेला घेतल्या बद्दल अडमीन चे अभिनंदन अन ते ही प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतला त्याबद्दल विशेष आभार,

अहो काका.. अहो मी तुम्हालाच बोलतोय, ओ काकी , अरे दादा,... अहो ऐका ना कुणी तरी प्लिज थोडातरी वेळ द्या ना मला.. अहो मी तिरंगा बोलतोय.. तिरंगा..
पण कोणी काहिकेल्या लक्ष द्यायला तयार नाहीत.. ओरडून ओरडून हा जेंव्हा थकून खाली बसतो तेव्हा रस्त्यावरून जाणार एक माणूस थांबतो तो ही एका पक्षाच्या मीटिंगला चाललेला असतो.. गाडीला पक्षाचा भलामोठा झेंडा लावलेला असतो..
गाडीवरचा तो झेंडा बघितल्यावर तिरंग्याला राग येतो पण बोलत नाही..
तिरंगा उठतो व दोघांचा संवाद चालू होतो..

माणूस - अरे तू इथं काय करतोय ?

तिरंगा - काय म्हणजे ? एक प्रश्न जास्त सतावत होता म्हणून यावं लागलं रस्त्यावर,  डायरेक्ट ऑफिस च्या टेबलावरून आलो बघ इथं.
तू कुठं निघाला आहेस एवढया गडबडीत ? अन हा कसला झेंडा लागलास रे ? अन याच्यावर कसलं तरी चित्र पण दिसतंय ना ?

माणूस - होय, तो आमच्या पक्षाचा झेंडा आहे , अन गाडीवरचा झेंडा काय घेऊन बसलायस मी माझ्या घरावर पण एक झेंडा लावलाय मोठा..अरे आमची शान आहे ती..

तिरंगा - शान ?

माणूस - हो शान आहे आम्हा सगळ्यांची आम्ही सगळे त्याच्याखाली एकत्र येतो व त्याच्या जोरावरच सत्ता, पैसा मिळवत असतो.
काय पण होवो झेंड्यासाठी आम्ही आमच्या मित्रांची, नातेवाईक लोकांची पण गय करत नाही.. समजलं ?

तिरंगा - अरे व्वा.. मग माझ्यासाठी तुम्ही काय करता ?

माणूस - तुझ्यासाठी म्हणजे ? काय वेगळं आहे का अजून?
अरे जानेवारी व ऑगस्ट मध्ये तुला आम्ही फडकवत असतोच कि दर वर्षी
अजून काय करायचं सांग बरं तुझ्यासाठी ?

तिरंगा - तुझ्या गाडीवर लावलेला हा झेंडा कोणी बनवला ?

माणूस - कोणी म्हणजे ? आमच्या पक्षाने बनवला आहे तो,

तिरंगा - मग मला कोणी तयार केलं सांग ?

माणूस - त्या वेळेस केलं कोणीतरी देश स्वतंत्र होण्याच्या टायमाला..

तिरंगा - का तयार केलं मला ?

माणूस - आपल्या देशात एकोपा टिकून राहावा सर्व जाती जमातींनी एकत्र नांदावे, कोणत्याही धर्मानं वर्चस्व न दाखवता या तिरंग्या खाली एकत्र यावं म्हणून हा तिरंगा तयार केला.

तिरंगा - हे माहिती असून देखील तुम्ही लोक मला जवळ बाळगत नाही.

माणूस - तुला आम्ही मान देतोय ना बास झालं ना तेवढं आणखी कशाला उठाठेव करतोय, अपेक्षा करतोय.

( बोलत बोलत तिरंगा त्या माणसाच्या गाडीला लावलेल्या झेंड्याला हात लावण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात.. )

माणूस - लांब हो बर अगोदर त्या झेंड्याला हात लावू नकोस, खराब होईल तो..
( हे ऐकून तिरंग्याला आता राग अनावर होत नाही )

तिरंगा - अरे एवढी काळजी घेता या झेंड्याची पण कधी जानेवारी व ऑगस्ट मध्ये झेंडा फडकल्या नंतर काही ठिकाणी रस्त्यावर, उकिरड्यावर माझी प्रतिकृती आढळत असते तेव्हा ती का उचलून व्यवस्थित ठेवत नाही, तेव्हा का मला साफ करत नाही तुम्ही मला ?

माणूस - हे बघ शेवटचं सांगतो तुला नीट लक्षात ठेव..
आजकाल तिरंगा हा फक्त राष्ट्रीय कार्यक्रम, शासकीय कार्यालये, आशा ठराविक ठिकाणी उरला आहे, अनेक पक्ष व संघटना यांनी आपापल्या स्वार्थासाठी, त्यात राजकिय, सामाजिक, आर्थिक असे सगळे स्वार्थ आले.. या साठी आपला वेगळा झेंडा तयार केला आहे. त्यात वेगवेगळी चित्र व रंग भरून तिरंगा बेरंग करून टाकला आहे, यांचे झेंडे फक्त एका विशिष्ट धर्माचे, प्रदेशाचे, जातीचे, विचारसरणी चे प्रतिनिधित्व करतात व सत्ता मिळवण्याच्या कामी येतात म्हणून तुला टाळलं जातं..
( तिरंग्याच्या डोळ्यात अश्रू वाहत असतात )

माणूस - अन एक सांगू तिरंगा...आजकाल लोकांना एकत्र करायला, लोकांचा गैरफायदा घ्यायला, लोकांना भडकवायला, लोकांना एका अस्मितेशी बांधून ठेवायला तिरंग्या पेक्षाही हा विशिष्ट आकाराचा, विशिष्ट रंगाचा झेंडाच कामी येतो..
तुझ्यातला जो केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे तो आम्ही आज विसरून गेलो आहे, पांढरा रंग जो शांतीचे प्रतीक आहे तो रंग राहू दे समाज अशांत कसा राहील हे काम आज राजकीय लोकांकडून होतं आहे, अन हिरवा रंग जो समृद्धी चे प्रतीक आहे ही समृद्धी आम्ही आता आमच्या पक्षापुरती ठेवतो. अन ते अशोक चक्र जे प्रगती व अखंड विकासाचं प्रतीक आहे ते आम्ही आता आमच्या विकासासाठी वापरतो भले त्यातून दुसऱ्याचे, एकंदरीत समाजाचं नुकसान होऊ दे आम्हाला फरक पडत नाही
अरे आम्ही तुला घेण्याऐवजी तुझ्यातले रंग वाटून घेतले..
त्यामुळं आता प्रत्येक रंग ठराविक लोकांचा आहे तिरंगा पण आता ठराविक लोकांचा आहे
( तिरंगा खेदाने बसून सगळं ऐकत असतो )

तिरंगा - ऐकून घे नीट आता तू पण एकदाचं, येणाऱ्या पिढ्याना तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत, देशाची अखंडता, एकात्मता तुमच्या हातात असताना चार पैशासाठी हे धंदे बंद करा,  नाही तर लोक झेंडा घेण्यापेक्षा त्याचा दांडा हातात घेतील अन तुम्हाला बडवून काढतील तेव्हा माझी आठवण या देशातील प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला येईल..
( एवढं बोलून तिरंगा काही न बोलता निघून गेला )



 
Source: Internet

-पवन खरात,
 अंबाजोगाई

रंग प्रत्येक जातीचा ,
आज प्रत्येकाच्या नसानसांत भिनलेला आहे,
पण माणुसकीच्या रंगानेच ,
माझा तिरंगा हा रंगलेला आहे ।

सैनिक माझ्या देशाचे ,
तिरंगाच्या रक्षणासाठी सीमेवर लढत आहेत ।
आपण मात्र भगवा , हिरवा , निळा ,
यातच भीडत आहेत ।

अरे सोड तो रंगीत झेंडा,
घे तिरंगा हाती ।
कुठली जात,कुठला धर्म,
लिहलं आहे का तुझ्या माथी ?

जात तुझी आणि माझी ,
फक्त माणसाची आहे ।
धर्म तुझा आणि माझा,
फक्त माणुसकीच आहे ।

गर्व आहे मला ,
मी भारतीय असल्याचा ,
अभिमान आहे मला,
फक्त आणि फक्त या तिरंगी झेंड्याचा ।



Source: Internet


-जयंत जाधव,
 लातूर
मला आजही आठवत आहे २६ जानेवारी २००४ ची राञ.मी व माझे काही मिञ प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपला की आम्ही एक मोहिम हाती घ्यायचो. रस्त्यावर पडलेले,अस्ता-व्यस्थ प्लास्टिक वा कागदी ध्वज-तिरंगा जमा करुन त्यांना व्यवस्थित जागी ठेवायचे.आम्हांला खूप आनंद  व्हायचा.आम्ही ठरलेल्या कार्याला निघालो,मी एकटा मागे राहिलो.तेवढयात एक आवाज आला."अहो ऐकलं का...जरा माझ्या अंगावरील हे चिखलाचे डाग स्वच्छ कराल का ? मी तिरंगा बोलतोय." मी पण जास्त वेळ न घालवता तिरंगा उचलून स्वच्छ केला.तिरंगाने स्मित हास्य करुन म्हणाला दुपारी पासून येथे रोडवर पडून होतो किती जण आले-गेले पण शेवटी तुला माझी किव आली व मला उचलले.मला तुझा अभिमान वाटत आहे.नाही तर देशप्रेम हे वर्षातील २६ जानेवारी व १५ आॕगस्ट ह्या दोनच दिवस उफाळून येते.तुला माझ्या विषयी काय माहिती आहे ? मी म्हटले जास्त नाही खूप थोडे.तो म्हणाला चल आज मी तुला माझा जीवन प्रवास सांगतो आणी तिरंगा याने त्याची गोष्ट सांगू लागला.
भारताचे स्वातंत्र्य जसे समोर दिसून आले त्या दिवशी २२ जुलै माझा जन्मदिवस म्हणा की मला आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण जगासमोर आणले.सर्वांनी टाळ्यांचा गडगडाने माझे स्वागत केले.तेव्हा माझा पेहराव रेशमी व सुती खादी हा होता.स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या वीरांच्या रक्ताचा रंग माझ्यात आहे.स्वातंत्र्य आपली प्राणांची आहूती देणार्‍यांमुळेच माझा जन्म झाला.चौदा ऑगस्ट १९४७ ला रात्री पावणेदहा वाजता कौन्सिल हाऊसवर सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमच्या गायनाने कार्यक्रमाला सुरू झाला होती .घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद व पं.जवाहरलाल नेहरू यांची भाषणे झाली.त्यानंतर हंसाबेन मेहता यांनी अध्यक्ष राजेंद्रप्रसाद यांनी मला सिल्कमधील रूप दिले आणि त्यांना सांगितले, की स्वतंत्र भारतात या सदनात जो राष्ट्रध्वज फडकावला जाईल तो भारतीय महिलांकडून देशाला दिलेली अनमोल भेट असेल.सर्व लोकांसमोर पहिल्यांदा मला सादर करण्यात आले होते.माझ्या निर्मात्यांनी मला खूप वेगवेगळ्या विचारांनी घडवले,माझ्यातील रंगांपासून शिकण्यासारखे खूप काही आहे. केशरी रंग साहस-बलिदानाचे, पांढरा सत्य ,शांतीचे तसेच  हिरवा रंग श्रद्धा आणि शौर्याचे प्रतीक आहे. चोवीस आर्‍याचे निळ्या रंगाचे चक्र  हे माणसाने २४ तास सतत प्रगती करावी ह्याच  प्रतीक आहे. प्रगतीचे रुप कसे  तर निळ्या अनंत आकाश व सागरासारखी.हे अपेक्षित आहे मला प्रत्येक भारतीय कडून.पण अचानक तिरंगा रडू लागला आणी सांगू लागला  मला आज दुःख वाटत आहे की माझा सन्मान जनता विसरत चालली आहे.आजच्या दिवसाकडे एक पिकनीक व करमणूकीचा दिवस करुन टाकला आहे.मला भिती वाटते येणारी पिढीला माझ्या फक्त कथा सांगाव्या लागतील का? मला देखील खूप वाईट वाटले व धीर देत मी तिरंगाला म्हणालो सर्वच वाईट नसतात.येणाऱ्या पिढीला आम्ही तुमचा सन्मान निश्चित करायला लावू.
शेवटी एकच,"विजयी विश्वतिरंगा प्यारा झेंडा उचा रहे हमारा!"

Source: Internet


- संदीप बोऱ्हाडे

  आपल्याकडे देशप्रेम हे 15 ऑगष्ट स्वातंत्र्यदिनी आणि 26 जानेवारी गणतंत्रदिनी ओसंडून वाहत असते. अगदी बरेचजण आवर्जून आपले प्रोफाइल फोटो तिरंगा ठेवतात. देशाभिमान असणे चांगलेच आहे. परंतु ते फक्त एकाच दिवसापुरते असणे कितपत योग्य आहे??

   यादिवशी संपूर्ण देशातील वातावरण हे देशप्रेमाने भरून गेलेले असते. गाडीवर तिरंगा विराजमान झालेला असतो. तर शालेय मुलांच्या हाताहातातून तिरंगा डोलत असतो आणि दुसऱ्यादिवशी हि देशभक्ती कुठे गायब होते ते समजत नाही

   रस्त्याच्या कडेला, कचराकुंडीत जिकडे - तिकडे हा तिरंगा विखुरलेला असतो. कचरा झालेला असतो तिरंगा ,जो काल माझ्या देशाची शान आणि माझा अभिमान होता.

     आजकाल स्वतंत्र किंवा
गणतंत्र दिवस म्हणजे एक सण झाला आहे … साजरा करा आणि नंतर विसरून जा
पण नागरिकांनी आपली कर्तव्ये हि लक्षात ठेवली पाहिजेत
कृपया ती विसरू नका
एक दिवस फेसबुक व्हाट्स अप वर झेंड्याचा फोटो अपलोड करून देशाचे भले होणार नाही
देशासाठी काहीतरी करून दाखवा ,,, चांगले नागरिक बना …. आपण स्वतः सुधारल्याशिवाय देश सुधारणार नाही हे लक्षात घ्या.

     देशातल्या ६०% नेत्यांच्या नावावर कितीतरी गुन्हे दाखल आहेत तरीही आपण प्रत्येक निवडणूकीत त्यांनाच निवडूण देतो, हजारो / करोडो खटले कित्येक वर्षांपासून न्यायालयात बाकी आहेत पण आजही त्यांचा निकाल लागत नाहीये. स्त्रियांवर आजही इथे अन्याय आणि बलात्कारा सारखे घृण अत्याचार केले जातात आणि त्यानंतरही तो गुन्हेगार छाती फुगवूण समाजात बिनधास्त वावरतो....
आणि काय म्हणे तर देश स्वतंत्र्य झालाय,
आरे हाड.....!
मी याला कधीच स्वातंत्र्य म्हणणार नाही...!
आता तरी जागे व्हा...!
आजून किती दिवस असे आंधळे, बहिरे आणि मुके बनून रहाणार आहात ? आता देशाला पुन्हा एका भगतसिंगची गरज आहे, चंद्रशेखर आझादजीं सारख्या व्यक्तीमत्त्वाची गरज आहे...

  जो भारतीय माझ्यासाठी स्वत:चा जीव ही द्यायला तयार असायचा .तोच भारतीय आज मला विसरलेला दिसतोय."15 ऑगस्ट " आणि "26 जानेवारी" हे दोन दिवस सोडले तर तुम्ही वर्षभर मला अडगळीत टाकताना
किंवा अपमानीत करताना दिसताय.

   भारतीयानो ; राष्ट्रगीत ; राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रीय स्मारके यासारख्या गोष्टी निर्जीव असल्या तरीही ....त्या समाज हितासाठी देशहितासाठी बरच काही देऊन जातात.  देशप्रेम हे एका दिवसापुरतेच मर्यादित नसावे
ते कायमचेच मनात असावे.



Source: Internet


-समीर सारगर
 नेर परसोपंत
 जि. यवतमाळ

राष्ट्रध्वज अर्थात तिरंगा हा आपल्या देशाच केवळ एक राष्ट्रीय प्रतीक नसून या  देशाचं गौरव आणि प्रतिष्ठा देखील आहे. म्हणून त्या ध्वजाला देशातील महत्वपूर्ण इमारती वर फड़कवल्या जाते उदा. राष्ट्रपती भवन, संसद, भवन, सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय ,सचिवालय ,आयुक्त कार्यालये ईत्यादी.  
 ध्वज संहिते नुसार राष्ट्रीय ध्वज हा स्वतंत्र दीनी आणि प्रजासत्ताक दिनी तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या जयंती दिनी फड़कवन्यात यावा असा नियम होता. परंतु जानेवारी 2002 च्या भारतीय ध्वज संहिते मध्ये काही संशोधन करून स्वांतत्र्याच्या बऱ्याच वर्षा नंतर भारतीय नागरिकांना आपल्या घरावर, कार्यलय,फैक्टरी, ईत्यादी खाजगी संस्थान येथे केवळ राष्ट्रीय दिवसच नाही तर इतर दिवशी देखील कोणत्याही प्रतिबंधा शिवाय ध्वज फड़कवन्यची अनुमती मिळाली म्हणजे भारतीय नागरिक आता कुठेही ,केव्हाही तिरंगा फड़कवु शकतो परंतु त्याला ध्वज संहिते चे कड़क पालन करावे लागेल तेही तिरंग्याच्या सन्मानार्थ कोणतीही कमी न पडू देता.

आपल्या देशात तिरंगा हा एकतेच, राष्ट्रभक्तिच प्रतीक आहे.  तिरंग्या कड़े बघूनच आपल्या शरीरात देशप्रेम आणि रष्ट्रवाद जागृत होतो.

या देशातील 135 करोड़  देशवासी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या राष्ट्रीय सनाच्या दिवशी या तिरंग्यच्य छत्रछाए खाली येऊन या देशाप्रति तसेच ज्या शूरवीर क्रान्तिकारानी या देशाला आपल्या रक्ताने  मिळून दिलेल्या स्वातंत्र्या प्रती आपली कृतज्ञता ,आपली निष्ठा व आपला सन्मान व्यक्त करत असतात.  

ध्वजसंहिते नुसार ध्वजा बाबत कड़क नियम देखील आहे. व त्याचे पालन करणे समस्त देशवासियाचे कर्तव्य आहे.

केंद्र शासनाने  मागील दोन वर्षापासून प्लास्टिक तिरंग्यावर बंदी आणली तसेच  केवळ कागद व कापडाचेच  ध्वज असावे अशे निर्देश निर्गमित केले आहे. तसेच  कोणीही प्लास्टिकचे तिरंगे विकु वा खरेदी करु नए अशा प्रकारचे शासन निर्णय असताना देखील या प्लास्टिक तिरंग्याचा सर्रास खरेदी- विक्री  होताना दिसत आहे, राष्ट्रीय दिन साजरा झाल्यावर हे प्लास्टिकचे ध्वज रस्त्यावर इतरत्र नाली व गटारात पडलेले  असताना निदर्शनास येतात. ही सर्व भारतिया करिता अत्यंत लाजिरवानी व शरमेची बाब आहे.
त्या तिरंग्याचा सन्मान आपन असा करणार?
झाली आपली देशभक्ति? केवळ 10 तास असणाऱ्या आपल्या या(दिखाऊ) देशभक्तिने या तिरंग्याचा किती मान ठेवला ? आपली  एक दिवसाची देशभक्ति हवेत विरुन गेली ? राष्ट्रीय सन हि  केवळ औपचारिकता म्हणून जोपासणाऱ्याना क़ाय कळणार तिरंग्याचे आणि  स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे महत्व.

स्वातंत्र्य हे फुकट मिळालेल्याना तिरंग्याचा सन्मान क़ाय ठाऊक?

हल्ली मा.सर्वोच्च न्यायल्याने चित्रपटगृहा मध्ये राष्ट्रगानच्या वेळी उभे राहण्याची सख्ती थांबविली, म्हणजे  52 सेकंदच्या या राष्ट्रगीत गायनाला आता  प्रेक्षकाना उभे राहण्याची गरज नाही. काही बुद्धिभ्रष्टानि या करिता न्यायालयात या संदर्भात याचिका दायर केली होती म्हणे!

135 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातल्या लोकांजवळ राष्टगाणाच्या वेळी त्या तिरंगयाचा संन्मानार्थ 52 सेकंड उभे राहण्याचा वेळ नाही ? हि या देशाची सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल!    स्वताला  बुद्धिजीवी म्हणवून घेणारे यविरुद्ध  न्यायालयात धाव घेतात आणि म्हणतात हा आमच्या privasy वर आघात आहे?  आमच्यावर राष्ट्रगान गाण्या करिता  कोणी सख्ती करु शकत नाही? म्हणजे 52 सेकंडाचे राष्ट्रगीत म्हणने  हे देखील त्यांना सख्ती वाटत आहे.

तेलंगाना राज्यात जलिकुट्टा नामक एक गाँव  आहे, या गांवा मध्ये रोज राष्ट्रध्वज उभारुन राष्ट्रगीत म्हटल्या जाते याची सुरुवात तेथे पोलिस निरीक्षक असलेल्या एका व्यक्तिने केली सुरुवातीला कमी लोक जमले कालांतराने लोक जमत गेले आणि अलीकडे दररोज मोठ्यसंख्येने  राष्ट्रध्वज व देशाच्या सन्मानार्थ  राष्ट्रगीत गायल्या जाते.  याला म्हणतात तिरंगयाचा सन्मान करणे आणि  आपली देशभक्ति प्रकट करणे. यासाठी तेथील लोंकाना कोणी सख्ती वैगरे केली नाही, ना याबद्दल तेथील नागरिकांना विनंती वा विनवनी केली. अहो याकरिता देशप्रेम,  आत्मीयता ,निष्ठा  आणि रष्ट्रवाद बद्दलचे संस्कार महत्वाचे असतात आणि त्ये जलिकुट्टी च्या नागरिकां कडून दिसुन आले. आणि  इथे मात्र कोणाला चित्रपट गृहा मध्ये 52 सेकंड उभे राहिल्याने त्यांची privasy धोक्यात येते. सरकारने आम्हला देशभक्ति शिकवू नये अशे बालिश उत्तरे काही महाभाग अफ़ज़ल प्रेमी समर्थक गैंग देतात.
किमान एक भारतीय नागरिक  म्हणून, देशाच्या तिरंग्या प्रति  राष्ट्रभाव आणि कृतज्ञता दर्शविन्या करिता   राष्ट्रगान गायला लावले  किंवा येणाऱ्या पीढ़ी करिता राष्ट्रप्रेम व  देशभक्तिपर संस्कार देशातील जनमानसात रुजविन्या करिता एखादे पाऊल सरकार जर उचलत असेल तर यावर राजकारन  करुण देशातील जनतेवर देशभक्ति लादल्या जात आहे म्हणून ओरड़ सुरु होते.!  भारत तेरे टुकड़े होंगे म्हणाऱ्यांना आणि त्यांना साथ देणाऱ्यांना आज खऱ्या अर्थाने देशभक्तिची परिभाषा शिकविने अत्यंत गरजेचे  होऊन बसले आहे.

आपल्याला खरच जर  येणाऱ्या भावी पीढ़ी मध्ये देशाच्या तिरंग्याप्रति, त्याच्या  राष्ट्रगाना प्रति  अभिमान आणि सन्मान  प्रस्थापित करायचा असेल तर बालवायतच  त्यांच्यात राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचे संस्कार  रुजविने गरजेचे आहे.
कारण प्रत्येक गोष्टी करिता कायदा महत्वाचा नसून त्या सोबत इच्छाशक्ति आणि आत्मीयता निर्माण करणे महत्वाचे आहे.  


कमीत कमी राष्ट्रीय दिनी 52 सेकंड वेळ  काढून मनापासून त्या  तिरंग्याला वंदन करणे, आपली आत्मीयता दाखवीने  हेच त्याच्या  प्रति निष्ठा, समर्पण  आणि  मोठा सन्मान आहे.


Source: Internet


-नामदेव दत्तात्रय जाधव
 शाहूवाडी
 जि. कोल्हापूर

 जय हिंद   ,भारतीयानो. मी आपला सर्वाचा राष्ट्रध्वज तिरंगा बोलतोय.आज तुमच्याशी बोलण्याच कारण की,भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी जवळ  आला आहे. त्या दिवसापूरत सर्वांचं राष्ट्रप्रेम जागं होईल.पण तुम्ही वर्षभर माझा, व आपला सर्वांचा हा उत्सव राष्ट्र हिताच्या कृती द्वारे वर्षभर साजरा करायला हवा. हल्ली अश्या काही घटना देशभर घडत आहेत ,ज्यामुळे मला देशाबद्दल खूप काळजी वाटते. हा तोच देश आहे ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगदी कोवळ्या वयात भगतसिंह शहीद झाले.नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आयुष्भर खस्ता खाल्या ,महात्मा गांधी,सरदार वललभभाई पटेल यांनी लढा उभारला.तेंव्हा आपण स्वतंत्र झालो.याचा सर्वांनी एकवेळ जरूर विचार करावा. आताची ही वेळ मी अमुक जातीचा ,तमुक धर्माचा असे म्हणत बसण्याची निश्चितच नाही, आपला धर्म, जात, प्रांत हा एकच तो म्हणजे भारतीय. आणि तेव्हाच तुम्ही मला अभिमानाने फडकविल्याचा आनंद होईल. ही अशा आपल्याकडून करून इथेच थांबतो. आपला सर्वांचा प्राणप्रिय  तिरंगा. जय हिंद.
*



Source: Internet

-राजश्री
मुंबई

मी तिरंगा बोलतोय..

तिरंगा typing...

  या आधीही बऱ्याचवेळा बोललो आहे पण जाणवेल असा बदल दिसला नाही म्हटलं यावेळी तुमच्या आवडीच्या माध्यमातून संवाद साधावा..तसही गेल्या चार वर्षात ठिकठिकाणी परराष्ट्र धोरण विकासासाठी जात असल्याने डिजिटल आणि technosavy होतो आहे मी ...
   आपला ६८ वा प्रजासत्ताक दिन अवघ्या तीन दिवसांवर आला आहे , यावेळी मी भारतातच आहे तसेच आपले मित्र राष्ट्र समारंभासाठी असणार नाहीत आपणच आपले ' प्रिय देशवासी ' ( घाबरु नका... तिरंगा च बोलतोय 😆 ) म्हणून म्हटलं बोलूया आज , देशातील बाब देशातच राहील..
   भीमा कोरेगाव , युवक दिन , संक्रांत - किंक्रांत , माघी गणेशोत्सव हे सगळं झालं आहे आणि खात्री आहे तुम्ही फोटोज् पोस्ट , लाईक , कमेंट सगळे सोपस्कार पूर्ण करून एव्हाना विसरून रिपब्लिक डे च्या सेलिब्रेशन साठी सज्ज असाल.. म्हणजे सेल मधून तिरंगी शर्टस , वारेमाप खरेदी , झालंच तर फिरायला जावं लागेल... ( लाँग वीकेंड ना.. एफबी ला पोस्ट करावच लागतं काहीतरी नाहीतर कळणार कस तुमचं सगळं कस्स मस्त्त मज्जेत सुरू आहे . )
    यावेळी काहीतरी वेगळं करूया ? दर वेळी तुम्ही सकाळी लवकर उठून मला सलामी देता , परेड बघता , यावेळी मला बोलायचय तुमच्यासोबत , पुन्हा एकदा आणि ऐकावं लागेल तुम्हाला..
   देश म्हणजे वाटतो काय तुम्हाला ? तुम्हाला जन्मापासून मिळालेली जहागिरी ? देव बाप्पाने दिलेलं वतन , की सासुरवाडीवरून मिळालेली भेट ?  शरम नाही वाटत उठसूट कुठल्यातरी बिंडोक गोष्टीवरून हातात तलवारी घ्यायला ? किंवा बसल्या जागी कुठल्याही मूर्ख गोष्टीला समर्थन करायला ? या देशात जन्म मिळाला म्हणून वाटली आहे कधी कृतज्ञता ? मनापासून म्हटलं कधी की हा माझा देश आहे मी जतन करेल याच ? खरच देश माझा वाटला असता न तुम्हाला तर अस नसता वागलात तुम्ही , दंगलीत कोट्यवधींच नुकसान करता , हा धर्म तो जात , याच्या सवलती त्याची दुःख वरून गजहब करता पण प्रश्न सोडवत नाही . कारण मुळात तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाहीत . ज्याला उत्तर हवी आहेत तो स्वतःपासून सुरुवात करतो , याच्या त्याच्याकडे बोट दाखवत नाही किंवा हे बघ मी केली सुरवात ( आणि वर्षानुवर्षे तिथेच आहे ) अशा गमजा करत नाही .    तो स्वतःपासून सुरुवात करतो , रामायणातील खारीची गोष्ट ऐकता आणि विसरून जाता , स्वातंत्र्य मिळावे म्हणून लढलेला माझा चिमुकला शिरीषकुमार ऐकता आणि विसरून जाता... खरतर तुम्हा सगळ्यांना आजार झाला आहे , ' *प्रभावित होऊन विसरून जाण्याचा*'  बघावं तिथे सभा होतात , भाषणे होतात बाहेर येताना बाहेर येताना घोळके प्रभावित असतात , मी उचंबळून येतो... मनात म्हणतो , ' हि पोर करणार काहीतरी... आशेने बघत असतो त्यांच्याकडे... ' पण घरी जाईपर्यंत विसरून जाता आणि पुन्हा गर्दीतील डोकी बनता..
 चांगली पुस्तके वाचता , नाटके बघता , कुठे कुठे प्रेरणा घेत हिंडता पण घरी येई पर्यंत पुन्हा ये रे माझ्या मागल्या... अस का होत आहे ठाऊक ?
कारण मुळातच या इम्पोर्टेड प्रेरणा आणि विचारांना काहीही अर्थ नसतो त्या संदर्भ साहित्य असल्यासारख्या वापरायच्या असतात , आणि आपले प्रश्न आपल्या वेगळ्या मार्गाने सोडवायचे असतात.. त्यासाठी स्वतःच्या विचारात खोलवर गाडून घ्यावं लागतं , झगडावं लागतं , इकडून प्रेरणा , तिकडून माती , तिसरीकडून पाणी , चवथ्याची जमीन या चार खांद्यावर त्या अंकुराची फक्त तिरडी निघते . जन्म नाही तोच अकाली मृत्यू कारण स्वंतत्र अस्तित्वाचा अभाव ..
आणि हो हे बंधुभाव , समता , स्त्री ही देवीचे रूप वगैरे नाटक तर आता बंदच करा... मान्य करा की जमत नाहीये हे तुम्हाला , सगळी भावंडं ना तुम्ही मग इकडचं पाणी तिकडे गेलं की तोंडचं पाणी का पळत तुमच्या ? याचाच अर्थ प्रत्येकाचा जीव तगण महत्वाचं आहे , बरोबर ? म्हणून ही असली सोंग आणण्यापेक्षा आपापली काम नीट करा . इकडे नोकरीला दांड्या द्यायच्या , टेबला खालून पैसे घायचे आणि कुठंतरी जाऊन चादरी वाटून यायच्या ही थेर बंद करा आता . तुम्ही स्वाभिमान मोडून खाल्ली आहेच किमान ज्यांचा अजून विक्रीला नाही त्यांना फुकट मिळण्याची नसती व्यसन लावू नका , कळू देत ना किंमत .. तुम्हाला स्वातंत्र्य फुकट मिळाल्याने किंमत नाहीये तसच त्यांनाही कळणार नाही तुमचा वेळ , तुमचे श्रम तुमचे भावना .. त्यापेक्षा रोजगार निर्मिती करा.. माणसं उद्योगाला लावा ..
मराठी माणसाला धंदा जमत नाही म्हणून केकाटण बंद करा , अंबानी टाटा बिर्ला यांच्यावर जळण बंद करा , त्यांच्या कष्टावर मोठे झाले आहेत ते तुमच्यासारखे सरकार , परिस्थितीला दोष देत नाही बसले , त्यांनी मोठी स्वप्ने पाहिली , अस्तित्वात आणली तेव्हा तुमच्यापैकी कित्येकांच्या घरी चुली पेटल्या.. लाख मरो पण लाखांचा पोशिंदा टिको .. माहीत आहे ना ही म्हण ?  तुम्ही निरुड्योगी , आळशी आहात म्हणून त्यांनी तुम्हाला पोसाव ही मानसिकता बदला ... पुढची पिढी पण तेच शिकते आहे तुमच्याकडे पाहून..
स्वतः ला अभिमान सुख मिळावे म्हणून चांगल्या चुंगल्यांना कुबड्या देऊ नका , बाबा आमटे आहेत ना ठाऊक ? बोटे नसलेल्यांकडून स्वाभिमान गिरवून घेतला त्यांनी आणि तुम्ही काय करताय ? जरा खरचटलं की चालले मानवतेची मलमपट्टी करायला , आणि जरा कुणी विरोध केला की हीच मानवता मग घाव घालयालही मागे पुढे बघत नाही..
शिक्षकाने उत्कृष्ट शिकवा , अधिकाऱ्यांनी कार्यक्षम व्हा , राजकारण्यांनी विकास करा ( खरोखर चा , लुटुपुटू चां नाही ) , डॉक्टरने रुग्ण तपासा.. मग वेगळ्या समाज सेवेची गरज पडणार नाही . आज होतंय काय , जो तो चाललाय वंचितांचे अश्रू पुसायला , बघावं तो कुठल्यातरी समाजसेवी संस्थेसोबत जोडलेला , तरी समाज अजून खोलात जातो आहे , असे का ? कारण माणूस स्वतःची परिस्थिती बदलावी म्हणून स्वतः झटत नाहीये ... अखेरच्या घटका मोजणाऱ्याला व्हेंटिलेटर वर ठेवल्यासारखे आहे हे , सपोर्ट काढला की गेलाच प्राण ..  
प्रत्येकालाच निबीड अरण्यात काहीतरी करायचं आहे , अशाने शहरात माणसं उरतील की नाही अशी शंका येते आहे आता मला..
इथे राहून प्रशासन प्रभावी बनवा , काही वर्ष शिकण्यासाठी द्या...
स्वतः शिक्षण पूर्ण न करणारे ( शिक्षणाचे वय असून ) काही लोक असतात , ते इतर मुलांना शिक्षणासाठी मदत करतात ( आश्चर्य वाटत मला ) ही जुजबी मदत का ? थोडा वेळ घ्या ना स्वतः साठी कष्ट , उत्तम तयार व्हा मुशीतून बाहेर आलेल्या शंभर नंबरी सोन्यासारखे मग करा समाजसेवा ..
कळतंय का ?? सगळंच चुकीचं आहे अस नाही पण ज्या तऱ्हेने तुमचे प्रयत्न आहे तसे परिणाम नाहीत हे मात्र खरे..
  आणि मी मात्र पुन्हा एकदा माझ्या तेजस्वी पुत्रांची वाट बघतोय , सुभाषबाबू , सरदार पटेल , राजा राम मोहन रॉय , इंदिरा , सरोजिनी , राणी लक्ष्मीबाई , नेहरू - गांधी ( आजकाल वावड आहे तुम्हाला यांचे .. पण आधी जाणून घ्या मग विरोध करा त्यांना )  
 बघ येतंय का लक्षात नाहीतर आहेच १ मे , १५ ऑगस्ट ... बोलेल पुन्हा.. कारण तुम्ही काय ७०-८० वर्षे कसेही वागून निघून जाणार , मला मात्र स्वतः च अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे.  जे तुमच्यासारख्यांवर अवलंबून आहे..
  या प्रजासत्ताकाला फक्त म्हणायचं म्हणून , जय हिंद म्हणणार असाल तर राहू द्या...

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************