मला टायम नाही….मग नक्की तुझा वेळ जातोय तरी कुठं ?(भाग-1)

🌱वि४🌿  या व्हाट्सअप्प ग्रुप वरून

मला टायम नाही….मग नक्की तुझा वेळ जातोय तरी कुठं ?(भाग-1)



Source: Internet

रविराज आकोसकर,लातूर:

प्रत्येकाने स्वतच्या काहीतरी प्राइयारिटी ठरवून आयुष्य खूप बांधून ठेवलंय.
अहो सहजच आपण कुणाला तरी मदत करण्यास नाकरतो पण समोरची व्यक्ति कुठे तरी दुखवली  जाते .आणी वरून आपण वेळ च कारण देऊन विषय बंद करतो..हे अस होण्याची कारणे म्हणजे  आपली फिक्स्ड पॉलिसी..
पण त्या नाकारले ल्या वेळात आपण पण काहीच नाही करत उगाच आपला आळस आणी कामाची प्राइयारिटी आपण सर्व कामात आडवी आणतो..
आणी  मी पण कधी कधी आई ची कामे माज्या प्राइयारिटी मुळे करत नाही..मला कुठेतरी चुकलं अस वाटत आहे..
आणी आजकाल पण आपण नाते आणी सम्बंध पाहून त्यांची कामे करायची का नाही हे ठरवतो.म्हणजे आपण एक तर आपली जीवनशैली पक्की करून ठेवली आहे नाहीतर आपण आपला तोटा पाहून कुठेतरी समोरच्या व्यक्तीला दुर्लक्षीत करत आहोत..
ह्याने फक्त समाजमन चिरडलि जातील..आणी आपले अनुकरण आपली पुढची पिढी नक्कीच करेन..
म्हणून आपण स्वतच बदलण्याची गरज आहे अस मला वाटत..धन्यवाद

Source: Internet

गणेश पाटील:

*"ते दिवस खूप छान होते,*
*घड्याळ एखाद्याकडेचं असायचे,*
*आणि वेळ सर्वाकडे…!*
आता घड्याळ सर्वांकडे आहे परंतु वेळ कुणाकडेच नाही....!
       का कुणाष्टुक आपण वेळ असून नसल्याचा आव आणतो. कदाचित आपण कायम दुसऱ्याबरोबर असतानाही स्व:च्या शोधात असतो म्हणून आपल्याला वेळ नसतो दुसऱ्याच्यानंत रमण्याचा
जेव्हा एखादे काम आपण आपलेच आहे असे समजतो तेव्हा वेळ कसा गेला हे सुद्धा नाही कळत पण याचा मला काय फायदा असे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वेळ असून ही नसतो आपल्याकडे. खरा वेळ तर आपला मी किती चांगला आहे , मी किती बलवान आहे हे सांगण्यात च जातो. दुसऱ्याच्या मनाचा विचार करायला वेळ नसतो. आपल्याला आपल्या मनोरंजनासाठी खूप वेळ असतो पण कधी आपण कुणाचे तरी मनोरंजन करावे हे वाटत नाही आपल्याला.
     आपण आपल्या कालिग सोबत खूप वेळ घालवतो आपण अनेकांशी खोटे बोलतो पण आपल्या कालिगास एकटे सोडत नाही. पण त्याच वेळी जेव्हा आपल्या घरातून फोन येतो तेव्ह तो फोन सुद्धा घ्यायला वेळ नसतो. खर तर तो फोन आपल्या काळजी साठी च असतो बर का??
वेळ निघून गेल्यावर कळन्यापेक्षा तशी वेळच येऊ नये याची काळजी घ्या. आपलं म्हणून तरी वेळ द्या आणि आपलं करून टाका सगळ्यांना !!!
Source: Internet

दत्तात्रय डोईफोडे,वाशीम:
होय हे खरं आहे की आजकाल वरील वाक्य सहसा सर्वांच्याच तोंडून बाहेर पडत,

आज खरचं नोकरी, व्यवसाय, पैसा यामागे सतत धावत राहून वेळ कधी निघून जातेय याचा पत्ताच लागत नाही, पण तरीही वेळात वेळ काढून काही कर्तव्य बजावत असणारे ही आहेत.

शिक्षकांना शिकवायला, डॉक्टरांना पेशंटना तपासायला, विद्यार्थ्यांनाही शिकायला वेळच नाही, आता वेळ आली आहे की आजकाल का वेळ नाही सर्वांकडे हे शोधण्याची…

Source:Internet

   किरण पवार,औरंगाबाद :  
            वेळ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक बाब बदलवण्याच सामर्थ्य ठेवते. पण सध्या असं चित्र पहायला मिळतं की, बरेच जण मला वेळ मिळत नाही म्हणून तक्रार करतात. या तक्रारी करुन किंवा या विषयावर कोणी एकाने काही सुचवल्यामुळे हा प्रश्न मुळात सुटत नाही. फार फार तर थोड्या प्रभावामुळे आजची तक्रार लांबणीवर जाईल. याच्यावर तोडगा काढण्यासाठी जो-तो स्वत: समर्थ असला पाहिजे. *आपल्याला जे साध्य करायचंय त्या वाटेत कोणती गोष्ट किती महत्त्वाची आणि आपण अधिक प्राधाण्याच्या गोष्टीला किती जास्त वेळ देऊ शकतो, हे ठरवलं पाहिजे.*
          बऱ्याच वेळा अशा गोष्टी आपल्यासोबत होतात. ज्यातआपण जेव्हा *टाईमपास करतो तेव्हा वाटत की, आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे आणि मी नंतर ती गोष्ट पूर्ण करेन. पण ही एक प्रकारची आपल्या मनाची झालेली तात्पुरती चुकीची समजूत असते आणि ज्याक्षणी टाईमपास सोडून त्या गोष्टीच्या पाठी लागतो त्यावेळी लक्षात येतं की, आपल्याजवळ तर वेळ खूप कमी उरलाय.* यातून नंतर बऱ्याच गोष्टी उद्भवतात. जसं उदा.:- नैराश्य येणे, उदास वाटणे... वगैरे. मग कधीकधी आपण अशा स्थितीत आपल्या जवळच्या मित्रांचे बरेच सल्ले घेतो पण त्यातून मन समाधानी होत नाही. कारण त्याला पुढे दिसत असलेल्या कमी वेळेची भिती वाटतच असते.
             *एकदा प्रसिद्ध लेखक उत्तम कांबळे म्हणाले होते की, तरुण वय(साधारण तीशी येईपर्यंत) हे असं वय आहे ज्यात तुम्ही ठरवलं तर तुमच्याकडे वेळच वेळ आहे*. आणि ही गोष्ट खरीच आहे. कारण या वयात जी जिद्द असते ती जिद्दच इतकी अफाट असते की, तीच महत्व ती तुम्हाला पुर्णत्वाला नेऊनच सिद्ध करते.

आपला वेळ जातो कुठे व का?
           निश्र्चितच आपला वेळ जातोय म्हणजे तो वेळ का जातो याच कारणही आपण स्वतच असल पाहिजे. *सध्या आपल्या सर्वांचा वेळ जास्त घेणार महत्त्वाच ठिकाण म्हणजे सोशल मीडिया*. या सोशल मीडियावर वेळ कसा जातो याच्याशी प्रत्येकजण आता परिचित आहे. याच्यापासून शक्य तितका वेळ वाचवायला आणि तो महत्त्वाच्या गोष्टीत वळवायला आपण शिकल पाहिजे.
           दैनंदिन जीवनात बऱ्याचदा रस्त्यावर कोणी ना कोणी भेटत रहात. पण आपण या भेटीत बऱ्याच वेळा अडकून पडतो. या अशा गोष्टींमधून साध्य काहीच होत नाही उलट आपला वेळ जातो. *त्यामुळे वेळेवरही एकदा विचार करून विश्वस्त तोडगा काढाच.*

या विषयावर कविता:-

वेळ म्हणतो वेळ दे
स्वप्न पुर्णच करेन
दुर्लक्षित करशील मला
ध्येय तुझ दूर करेन,

हिशोब ठेवशील माझा
व्याजासहीत चुकता करेन
बुडवशील कर जर
तुला नजरअंदाज करेन,

थोड संयमाने घे
एक दिवस बक्षीस देईन
चुकांना वेळेवर दुरुस्त कर
मी तुझा सन्मान करेन,

अखेर निर्णय तुझाय
तेव्हा सावकाश ठरवं
पण वेळेला वेळ देशील
तर तुलाच मी राजा करेन.

Source: Internet

विश्वनाथ कदम,हिंगोली:
                                                                      
 मुळात. हा विषय प्रतेक मानवाच्या दैनंदीन जिवनाशी निगडीत आहे.परंतु विषयाच्या दंभिरतेत मागील दोन चार वर्षात विशेष भर पडलेली दिसते.                                               मुळात विषयाच वास्तव्य वेगळच आहे,  विषयीचा अभ्यास केल्यास 'मला वेळ नाही' म्हननारी दोन प्रवूत्तीची मानस समाजात असतात.     पहिला वर्ग ज्यांना मुळात खरच वेळ नसतो, व दुसरा ज्यांना मात्र भरपुर वेळ आसतो,परंतु ते वेळ नसल्याची आव आनतात.                             ऐकेविसाव्या शतकात जशी विज्ञानाची प्रगती घडून आली ,तशीच आधोगती मानवी विचाराची झाली आहे.                                                             एकंनदर आधुनिकतेच्या काळात स्वत: साठी unlimited परंतु इतरांचा विषय आला कि....    ''मला  टायम नाही.''.      या प्रवूत्तीत वाठ झालेली आहे.                                         

Source: Internet
समीर सरागे यवतमाळ:
 सर्वांच्या जीवनात वेळेला अनन्य साधारण महत्व आहे.   कारण की आज लोकांच्या गरजा देखील वेळेवर अवलंबून आहेत. जेवढे तंत्रज्ञान विकसित झाले तेवढे आपण वेळेच्या बंधनात दिवसेंदिवस गुरफ़टत चाललो आहोत. आज च्या जीवनमानात पैशा पेक्षाही वेळेचे फार मूल्य आहे . कारण पैसा, धन संपत्ति देखील गेलेली वेळ परत आनु शकत नाही.
त्यातच मला वेळच नाही  हा शब्द अलीकडे अगदी परवलीचा होऊन बसला आहे. कुठेही कधीही ते सहज  कानावर पड़ते.   व मला वेळ नाही ही एक मोठेपनाची बाब बनली आहे. अगदी आपल्या जवळच्या नातेवाईक ,आप्तपरिवार  कडून किंवा जवळच्या मित्रा कडून हे शब्द नेहमी प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष पणे आपल्या कानावर पडले  असतील. म्हणजे कर्तव्ये, जबाबदा-या सहजा सहजी टाळण्यासाठी  अशा शब्दाचा सर्रास वापर केल्या जातो. म्हणजे मी किती बिझी आहे ?, मि किती Importent व्यक्ति आहे असा शंदेश त्यातून त्याला द्यायचा असतो.आणि मला किंचित ही वेळ नाही अस काही जनाना त्यातून सांगायचं असतं.

खरे तर मला वेळच नाही असे म्हणणे म्हणजे आपण एकप्रकारे आपली स्वतःचीच  फसवणूक करने होय.

हल्ली आजच्या धकाधकीच्या युगात कोना जवळ तितका वेळ शिल्लक राहिला नाही आणि ते १०१ टक्के खरही आहे.  मनुष्याचे जीवन जगणे अलीकडे  फार आवहानात्मक आणि संघर्षमय झाले आहे. खास करून शहरी भागातील जीवनशैली बाबत बोलायचे झाल्यास नौकरी आणि कामा करिता दिवसभराची धावपळ , कर्तव्ये,  कौटुंबिक जबाबदारी आणि त्यामुळे उतपन्न होणारा मानसिक तान (tress)या सर्वामुळे तो व्यक्ति आपल्या मित्र परिवाराला योग्यरित्या वेळ देउ शकत नाही. परिणामी नात्याय दुरावा निर्माण होत आहे.  म्हणजे तो आपल्याच व्यस्त जीवनात हरवून बसला आहे. परिणामी हे देखील वेळ न मिळण्याचे एक कारण आहे.

पूर्वी देखील व्यस्त जीवन असायचे परंतु त्या सोबतच मायेचा ,आपुलकिचा , औदर्याचा ओलावा असायचा म्हणजेच तो आपल्या सर्व कर्तव्य आणि जबाबदार्या सांभालुन आपले नाते आणि  नात्यातील आपलेपन  जपायचा,
याउलट आजच्या तरुणपीढ़ी कड़े बघता  आजची तरुण पीढ़ी  आपला ७०% वेळ हा इंटरनेट आणि सोशल मीडिया वर  वाया घालवत असल्याचे एका माहिती नुसार उघड़ झाले आहे. ही बाब आजच्या पीढ़ी करिता धोकयाची घंटा आहे. म्हणजेच प्रत्येक वेळी आपल्याला घाईत आणि धावपळीत दिसनारी आजची युवा पीढ़ी ही माहिती तंत्रज्ञानाच्या  युगात इंटरनेट आणि  सोशल मिडियाच्या मायाजाल मध्ये मग्न आहे. ज्या सोशल मीडिया आणि इंटरनेट चा आविष्कार हा माहितीची अदान प्रदान अगदी सहज आणि सोप्या रितिने होण्या करिता तसेच नवनवीन माहिती संकलित करण्या करिता , आपले जीवन जगणे थोड़े सूखकर बनवन्या करिता या gadgets आणि उपकरणांचा आविष्कार झाला आहे. त्याचे गुलाम बनून त्याच्या आहारी जाण्या करिता नाही. आजची युवा पीढ़ी यात मात्र आपला वेळ दवडत आहे. वेळ घालविन्या करिता मनोरंजन म्हणून आपन चित्रपट बघणे, पुस्तके वाचने , खेळ खेळणे,  आपला परिवार किंवा आपल्या आप्तेष्टा बरोबर वेळ घालवने वैगरे  असे मनोरंजनाचे पर्याय असायचे म्हणजेच यातून मनोरंजना बरोबर करमनुक तर होतच असे सोबतच ,ज्ञान , मानुसकी आणि आपलेपन देखील जपल्या जात असे. परंतु आज प्रगत तंत्रज्ञानाच्य या भौतिक युगात माणसे तांत्रिक दृष्टया जेवढी जोडल्या गेली आहे तेवढीच मनाने   दुरावल्या देखील गेली आहे.उदा. मागे एका वृत्त वाहिनीने मातृदिवस या पर्वावर मुंबईचा एक   प्रसंग दाखविला होता कि,  एका वृद्ध महिलेचा  मुलगा अमेरिका स्थित न्यू यॉर्क शहरात नौकरी करण्या करिता गेला तीथे काही दिवस वीसा घेऊन राहिला, त्याला ग्रीन कार्ड मिळाले व तो तीथे कायमचा स्थाईक झाला त्याची आई त्याला 5 वर्षा पासून सतत  फोन करायची कधी येणार आहेस वैगरे परंतु तो नेहमी मला कामा मुळे वेळच मिळत नाही वैगरे उत्तरे द्यायचा, नंतर टाळटाळ  सुरु झाली व काही दिवसांनी  फोन येनेच बंद झालेत शेवटी वेदनेने निराश झालेल्या या वृद्ध  आईचा मृत्यु झाला मग फ्लैट मधील काही रहिवाशाना कळले की इथे एक वृद्ध महिला राहत होती व ति आता दिसेनासी झाली आहे मृतदेहाची दुर्गंधि सुटल्यावर माहिती पडले की ती महिला दोन दिवसा पासून मृतावस्थेत आहे. तेव्हा तिचा मुलाला कळविन्यात आले परंतु  तरीही तो आला नाही. सांगायचे तातपर्य म्हणजे  हेच की,एका  मुलाला आपल्या जन्मदात्रीला  भेटन्या करिता देखील सवड मिळाली नाही म्हणजेच  तो भावना शून्य वा  संवेदनहीन झाला होता. म्हणून आज या आभासी दुनियेत आपण पैसा,धन संपत्ति  तर भरपूर कमावली त्याबरोबर   आपण आपले मुल्यवान नातेसंबंध, आपले  अस्तित्व आणि संवेदना गमावुन बसलो आहे.
वेळेचा  चांगला सदुपयोग करन्या   बरोबरच  संवेदना व आपलेपन जपने देखील महत्वाचे आहे. परंतु वेळेचा विनाकारण  अपव्यय करणे  म्हणजे आपले भविष्य आणि आपले अस्तित्व  अंधकारमय बनविने होय.

निकिता गडाख,अहमदनगर:

नेहमीचच झालेय हे रोज च ऊशीर
अजून थोडा वेळ मिळाला असता तर बर झाले असते..,
अस आपण सहज म्हणून जातो
पण मला एक कळत नाही आपला वेळे जातो कुठे मग?
खरतर जर वेळच अचुक नियोजन केले तर सगळ्या गोष्टीना बरोबर वेळ देता येईल.
यासाठी आपण यादी बनवू शकतो
1.अती महत्वाचे
2.जरा कमी महत्त्ववाचे
3. महत्त्ववाचे
जे ते काम ज्या त्या यादी मध्ये टाकून त्या प्रमाणे करून कामे पण वेळे पण मिळेल.
   
Source: Internet

निलेश पाटील:

"मला वेळ नाय" हा डायलॉग साधारणपणे सगळ्यांच्याच तोंडी असतो . असं म्हणतात की धकाधकीच्या जीवनात वेळ कुणालाच नाही. मग वेळ जातो कुठे हा सगळ्यांनाच मोठा प्रश्न आहे. याला वेळेच नियोजन नसणे हे मुख्य कारण आहे. आजच्या घडीला युवकांचा वेळ खास करून सोशल मीडिया वर जातो. फेसबुक, व्हाट्सउप ,इन्स्टाग्रामवर जातो. महत्त्वाचे कामे करायला वेळ नसतो. तेव्हा मग आपसूकच म्हणतात मला टाईम नाही.






तेजस महापुरे,कराड:
.वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे.कारण काहीही करून गेलेली वेळ परत आणता येत नाही.सध्या प्रत्येक जण हेच सांगतो की मला वेळ नाही, खरतर हेच सांगण्यात बहुमूल्य वेळ जात आहे.सध्या वेळ जात आहे ते नको ते कामे करण्यात, उदाहरण घ्यायचे झालेच तर अनेक मिळतील. सगळ्यात जास्त वेळ जात असेल तर तो मोबाईल मुळेच का तर उगीच काही कारण नसताना आपण मोबाईल ची स्क्रीन स्क्रोल करत असतो,  घरातल्यांनी जर एखादे काम सांगितले तर म्हणतो की मला नाही जमणार मी कामात आहे,आणि काम ते कसल उगीच निरर्थक पोस्ट्स पाहण्यात,आजकाल माणसे तुटण्यात सगळ्यात जास्त हातभार असेल तर तो या मोबाइलचा आहे,  टाइम जातोय तो इथेच जातोय, कातर मोबाइल मुळे फेसबुक,व्हाट्सअप्प, यांच वाचन आवश्यकतेपेक्षा जास्तच वाढलंय,, जे की अजिबात फायदेशीर नाही याने एकाच अवस्था निर्माण होईल जी म्हणजे मला अजिबात वेळ नाही असे बोलणे,यामुळेच आपण अनेक चांगल्या गोष्टी करू शकणार नाही, आपण हेच सांगत बसू की करावं तर खूप काही वाटत पण वेळ नाही,करण वेळ नसतो असे शक्यच नाही, आणि माणूस कितीही व्यस्त असला तरी तो आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढतोच, तर आजपासून मला अजिबात टाइम नाही असे म्हणून वेळ घालवण्यापेक्षा आवडत्या गोष्टींसाठी वेळ देणे सुरू करायला हवे असे मला वाटते..... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************