जीवनात काटेरी डंख आहेत डोळे उघडुन पहा ते तर फुलपाखरांचे पंख आहेत..!

🌱वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून


जीवनात काटेरी डंख आहेत डोळे उघडुन पहा ते तर फुलपाखरांचे पंख आहेत..!

(यातील सर्व फोटो गुगलवरचे आहेत)

आशितोष तरडे,खेड,पुणे:

वी-हवीशी वाटणारी माणसे जीवनाच्या चढ-उताऱ्यात हळू-हळू आपल्याला नको-नकोशी वाटू लागतात.कारण ते त्यांच्या वागण्यानं आपल्याला जाता-येता हर्ट करत असतात आणि आपलं ’हार्ट’ बिच्चार ’हर्ट’ होत राहतं.एखाद्या व्यक्तीच्या "विनोदबुद्धीला" आपणही जणु विंचवान डंख मारल्यासारखं मनावर घेतो आणि त्याच्या वेदना मनात रुतून बसतात.खरंच आपले काही मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, कुटुंबीय इतके वाईट आहेत का? आपल्याला छळायचंच असं ठरवून सतत मुद्दाम अडवतिडव बोलतात का? कुणी काहीही म्हणो, काहीही सांगो, आपण आपले तिरक्यातच घुसून मोकळे...

थोडं काही झालं की, आपण लगेच ’हर्ट’ होतो. एक गोष्ट तर आपण कायमचं अनुभवतो. आपल्या पासून दूर असलेले आपले काही मित्र-मैत्रिणी अचानक भेटतात. मग त्यांचा पार्टीचा बेत ठरतो, ते खूप एन्जॉय करतात आणि नंतर हे सगळं आपल्याला कळतं. त्यांचे सोशल मीडियावरचे फोटो पाहून किंवा त्यातला त्यात एखाद्या बिन महत्त्वाच्या मित्रांना त्यात पाहून तर आपण जाम ’हर्ट’ होतो. मुळात ते सगळे ठरवून तुम्हाला सांगत नाही असं नाही. तर कदाचित ते सहज बोलता-बोलता एकत्र आले असतील आणि गडबडीत सांगायचं राहून गेलं असेल, हे आपल्या डोक्यातचं शिरत नाही.

कधी असंही होतं कि, आपली जवळची व्यक्ती काळजीपोटी आपल्याविषयी दुसऱ्याला काहीतरी सांगते आणि आपण ते चुकून ऐकतो. बस्स, आपण लगेच हर्ट होतो. वाटतं, जे काय माझ्यात चूक आहे, ते मलाच सांगायचं ना, माझ्यामागे माझी गाऱ्हाणी, टिंगल करायची काय गरज आहे? आपण इतकं मनाला लावून घेतो की, मग विचारालायच नको...

कुणी काहीही म्हणालं तरी आपल्या भावना लगेच दुखावतात. इतक्या का नाजूक झाल्या आहेत आपल्या भावना? येता-जाता सहज दुखावल्या जातात. एक लक्षात घ्या, अशा गोष्टी आयुष्यात होतचं राहणार आहेत. कुणी काही बोललंच तर, आपण बोलावं तिथल्या तिथं हिशेब करून मोकळं तरी व्हावं, किंवा घडलेल्या घटनेमागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न तरी करावा. नाही तर ज्या कानानं ऐकलं त्याच कानानं सोडून तरी द्यावं. उगीच हर्टबिट होतं, भळभळत्या जखमा घेवून जगण्यात काय मज्जा?नकरात्मक काटेरी जीवनातही गुलाब म्हणून जगता आलं पाहिजे.लाईफ एन्जॉय करता आलं पाहिजे.मग कळेल कि हे काटेरी डंख नसून फुलपाखराचे पंख आहेत....

अक्षय पतंगे,हिंगोली:
      तसं पाहायला गेल्यास काट्यांशी फुलपाखरांचा रोजचाचं संबंध पण त्याला काट्यांची किंवा काटेरी डंखाची अजिबात चिंता वाटतं नाही पण फुलांच्या अन् त्याच्या निरागस मैत्रीत मात्र अजिबात उणे  राहत नाही. एक-दुसरा-तिसरा सर्व फुलांशी फुलपाखरू मैत्री करतं. त्यांचे परागकण घेत सर्जनशील आयुष्याचा आनंद घेतं. माणुसकी किंवा मानवता हे शब्द त्याच्या कोसोंदुर असतात. प्रसन्न आयुष्य हा त्याचा जणु मुलमंत्र असतो. उन्हाळा,पावसाळा,थंडीची त्यास तमा नसते, तर आनंदी जगणं हा त्याचा ध्यास असतो.
            माणसांचं जीवन मात्र फुलपाखरांपेक्षा किती तरी जास्त काळ असतं, पण आपण फुलांपेक्षा डंखाचा आपण विचार जास्त करतो त्यात जास्त वेळ घालवतो. आपण फुलपाखराकडं पाहतो क्षणभर डोळ्यांना बरं वाटतं. ते नजरेआड झालं की, विचार सुरू होतो जीवनाचा मग मला प्रश्न पडतो माणुस जगतो कशासाठी ? या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीत राहतं. मग डोळ्यासमोर येत फुलपाखरू स्वत: ची वाट शोधत आनंदी होण्यासाठी आणि या जगण्यासाठी-जन्मावर शतदा प्रेम करण्यासाठी...
किरण पवार,औरंगाबाद:
 या ओळीनुसार लक्षात घ्यायच झालं तर बरच काही समजून घेऊ शकतो. बऱ्याच वेळा आपल्यासोबत असं होतं की, एखादी गोष्ट आपल्याला विशिष्ट पद्धतीत विचार केल्याने चुकीची वाटून जाते. किंवा आपण त्या गोष्टीबद्दल साशंकता बाळगतो. एक दैनंदिन जीवनातलं उदाहरण देतो.
            आपण तरूण वयातली मुलं खूप वेळा आई‌वडीलांशी छोटेसे मतभेद होत असले तरी बऱ्याच वेळा आपण त्यांच्याशी अगदीच टोकाची भूमिका घेऊन वागतो. आपल मत नोंदवताना त्यांना अस वाटत नाही की एकदा घरच्यांशी स्पष्टपणे बोलायला हवं, असो.
            अशी खरतर बरीचशी उदाहरन आपण वेगवेगळ्या साच्यात, वेगवेगळ्या बंधनात अडकलेली पाहतो. पण आपण एखादा गुंता स्पष्ट आणि *समोरासमोर विचार* करून न सोडवता खोट्या गोष्टींचा आधार घेऊन तो वाढवतो. त्यामुळे वास्तवतेत असलेले फुलपाखराचे पंख हे आपल्याला काटेरी डंख वाटतात.
         शेवटी एवढंच मत मांडतो की, जर जीवन खरच नेटकं व सुंदर बनवायच असेल तर वास्तवतेच्या जगात थोडा *खऱ्याचा आणि स्पष्टपणाचा* आधार घ्या.
         ‎
अजय नरवडे,लातूर:
जीवनाच्या दुनियादारीत अडकल्यावर काटेरी झुडपं खुप येतात, पण संकटांवर स्वार होण्याचं भाग्य काही फुलपाखरांनांचं मिळत.

अमर चिखले,पुणे
जीवन ही अशी गोष्ट आहे की वि.दा.करंदीकर सांगतात की सांगा कसे जगायचे कन्हत कन्हत की गाणे म्हणत
म्हणजे चांगले जगलो तर जीवनाला अर्थ आहे नाही तर व्यर्थ आहे. जगताताना असे जगावे की साऱ्या दुनियेला आदर्श ठरावे .मग आपल्याला ते काटेरी डंख नाही तर फुलपाखराचे पंख वाटतील.
   

सोमनाथ आदमिले,पंढरपूर
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष  अटळ आहे ,अडचणी तर आहेत परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर निश्चितच त्यातून मार्ग निघत असतो त्यामुळे वरील शीर्षक योग्य ठरते .

जीवन जगत असताना काटेरी डंख आहेतच त्याकडे उघड्या डोळ्याने पहिले  आणि सकारात्मक विचार केला तर ते आपल्याला फुलपाखरांचे पंख वाटतील आणि त्यावर स्वार होऊन आपण आपली प्रगती निश्चितच करू शकतो .

स्वामी विवेकानंद म्हणतात की,   'जेवढा मोठा संघर्ष तेवढा विजय मोठा असणार .
आपण जीवन जगत असताना आपले मित्र ,नातेवाईक आणि समाजातील लोक यांच्याबरोबर बऱ्याच वेळेला गैरसमज होत असतात ते जर आपण समजूतदारपणे समजून घेतले किंवा दुर्लक्ष केले तर बरेच वाद टाळले जातात .

त्यामुळे जीवन जगत असताना आपल्या मार्गातील अडथळे दूर करून किंवा दुर्लक्षित करून  भविष्याचा वेध घ्यावा आणि आपले जीवन समृद्ध करावे.
राज इनामदार,पंढरपूर

बाँसुरी से सीख ले सबक ए ज़िन्दगी,
छेद हैं कितने सीने में फिर भी गुनगुनाती है|

मानवी आयुष्य हे अनंत अडचणी , दुःखे , अशा गोष्टींने  भरलेलें जरी असलेना मित्रांनो तरी सुद्धा या गोष्टी जीवनात येणे सुधा गरजेचं असत .आयुष्यात अपमान , अपयश आणि पराभव हेही गरजेच आहे ,कारण यामुळेच पेटुन उठतो आपला स्वाभिमान जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो आपल्यातील खंबिर आणि अभेद माणूस.  जिराफच्या पिलाला जन्म घेतां ना कदाचित तुंम्ही बघितलं सुधा असेल .की हे पिलू मातेच्या गर्भाशयातूंन अंदाजे दहा ते बारा  फुट ऊँचीवरून जमिनीवर पड़ते .या पिलाला त्याची माता पाच मिनट पाजते व चाटते .व नंतर अचानक आक्रमक रूप धारण करते या नवजात पीलाला धडाधड लाता मारायला चालु करते .पहिल्या लाथेला हे पिलू दूर फेकले जाते .मात्र जमिनीवर पडून राहते .परत लाथ बसल्यावर उठून उभा राहण्याचा प्रयत्न ते पिलू करू लागत .
ज्या वेळी असंख्य लाथा खाल्यावर हे पिलू स्वतच्या पायावर उभे राहत .तेव्हा त्या पीलाची आई त्याला परत चाटते व पळायला लागते तेंव्हा हे पिलू सुधा आईच्या माघे पळू लागते .
ती आई त्याला या साठीच लाथा मारीत असते की .हे पिलू स्वतच्या पायावर जन्मताच उभा राहावे व हिँस्रश्वापदा पासून त्याचे संरक्षण झाले पाहिजे त्याला पळता आले पाहीजे . ही नियती सुधा जेव्हा आपल्या आयुष्यात नवीन संकटे , आव्हाने , अपयश घेवुन येते तेंव्हा ऐक प्रकारे आपल्याला ती सामर्थ्यवानच बनवत असते.भर दरबरात विष्णुगुप्त पंडिताचा अपमान राजाने केला.त्या अपमानातूंन पेठुन उठून आचार्य चाणक्य झालें.
Dr .APJ कलाम वैमानिक या पदासाठी मुलाखत देण्यास गेलें  असता .त्यांना सोडून सर्व उमेदवारास घेण्यात आले.dr.कलाम मनातून नाराज झाले .तेंव्हा मठातील ऐका गुरुंनी त्यांना सांगितल की,  कलाम कदाचित नियतीला मान्य नसावे की तु वैमानिक व्हावे .तुझ्या हातून मोठ काहीतरी कामं करून घ्यायचं असेल परमेश्वरास.त्या जिद्दीतुंन अग्नी मिसाईल निर्माण होवून. missile man ह्या नावाने सार जग त्यांना Dr.कलाम यांना ओळखू लागल.सुंदर गाणाऱ्या पक्षाला सुधा जेव्हा काळजात काटा घुसतो तेंव्हाच मधुर आवाज़ निघतो .
कारण काटेरी डंक जो पर्यंत होत नाही तोवर ओठांनवर मधुर गीत येणं अशक्य आहे.

असे जगावे छातीवर लावून आव्हानाचे अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

तेजस्विनी जाधव,पुणे:
फुलपाखराचं आयुष्य किती लहान  असतं तसेंच आपल्या अडचणीचे,दुःखाचे असते, जे आज आहे तर उद्या नसते पण आपण मात्र त्या दुःखातच एवढे गुंग होऊन जातो की आपल्याला आनंदी क्षणाचा विसर पडतो.

अशी आपल्या आयुष्यात एखादी एक तरी घटना घडते ज्यामुळे  आपल्याला एखादी गोष्टी खुप दुख:दायक वाटते ,काटेरी डंक सारखी त्रासदायक वाटते आणि आत्मविश्वास पूर्ण पणे खचून जातो समजत नाही काय करावे ........आणि त्या गोष्टीबद्दल एक भीती मनात निर्माण होते ,माझ्या आयुष्यातील एकघटना म्हण्जे लहानपणी उंच उडीचा खेळ खेळताना मी पडले होते माझा पायाला खूप लागले किती दिवस तरी मला चालता नव्हते येत मला आणि त्यानंतर अजुन परत तो खेळ मी नाही खेळला, अजुनही माझी मानसिकता नाही झाली परत तो खेळ  खेण्यासाठी.

आता मी खूप लांब आहे खेळांपासून..... ही भिती म्हण्जे एक काटेरी डंकच आहे जो मी दूर करायला पाहिजे आणि त्या फुलपाखराच्या पंखारखी माझी भीती दूर करून अस आयुष्यातत आनंदाने जगायला पाहीजे. मी नकीच प्रयत्न करेल..
       जगतांना माणसाचा आयुष्यात अडचणी असणे पण आवश्यक आहे ,आयुष्यात सगळंच सहज मिळत असतें तर आनंददाची किंमत कोणालाच समजली नसती.
आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्याचावर मात करून जगायला शिकलं पाहिजे ,एखादी गोष्ट मागे राहिली जगताना तर  हसतहसत दुसरी गोष्ट मिळवा मग बघा आयुष्य किती सुंदर होतंय!!

रविराज अकोस्कर,लातूर:
हो खर आहे..
आपल्या आयुष्यात खुप असे क्षण असतात जेंव्हा आपण दुखावले जातो.स्वतला त्रास इजा करून घेतो पण आपल्याला हे ठाऊक नाहीये की नेमकं चुकतय काय ?
प्रत्येक व्यक्तीचा आत्मा हा केवळ 2 गोष्टी नी शुद्ध राहू शकतो -
1)चांगले विचार
2)चांगले वाचन ...
म्हणून मला वाट्त ह्या काटेरी जीवनाचा विचार न करता ह्या सोनेरी पंखांचा वापर करून घ्यावा.

कृष्णकांत राईलकर,डहाणू
परिवर्तन हा सृष्टीचा नियमच आहे.या न्यायाने चौऱ्यांशी लक्ष जीवयोनींचा अभ्यास केला तर असे लक्षात घ्यावयास हवे की प्रत्येक सजीवाला  अगदी जन्मापासून स्थित्यंतराना सामोरे जावे लागत असते.
प्राथमिक अवस्थेत कोणतिही गोष्ट ही अपरिपक्वच असते.कालांतराने जसजशी प्रगती होऊ लागते जसजसे बाह्यसंस्कार , अतर्संस्कार घडत जातात तेव्हा काटेरी सुरवंटाचे फुलपाखरु होण्यास वेळ लागत नाही.आणि संपूर्ण जिवस्रुष्टीला हा नियम लागू होतोच .ती समस्त प्राणीमात्राची व सृष्टीची अपरिहार्यता आहे.
त्याची येथे दिलेल्या उदाहरणा दाखल जी फुलपाखरू बनण्याची फलश्रुती आहे ती परिपक्वतेची तीच निसर्गदेवतीची  अप्रतिम,सुखद् अशीच कलाकृती होय.


पवन खरात,अंबाजोगाई:

पंखात बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं...
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं..
  
खरंच जे बाळ आई वडिलांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे  जपलेले असते . स्वतःच्या सर्व इच्छा , अपेक्षा एवढच काय तर कुठलाही परतीच्या मोबदल्याची शंका सुद्धा मनात आणलेली नसते. तेच बाळ जेव्हा तरुण होते, करते होते, स्वतःच्या पायावर उभा राहतं, तेव्हा मात्र स्वतःला फुलपाखरं सारखी जपणारे तेच आई वडील सांभाळायची वेळ येते तेव्हा मात्र ते काटेरी निवडुंगा सारखी वाटतात.

आई वडील यांचे प्रेम माया आणि राग या गोष्टी कधीही अनेक युवकाला खूप त्रास दायक वाटत.त्या समजून घ्या कारण जीवनात हेच फुलपाखरचे पंख असतात , जे अनेकांना काटेरी डंक वाटतात.

क्षितीज गिरी,सातारा
पैसा म्हणजे सुख हे गणितच झाले आहे आपले ते पहिल्यादा चुकीचे आहे असे मला वाटते। लहान लहान गोष्टी मध्ये पण आपल्याला आनंद शोधत आला पाहिजे कितीही दुःख असले तरी हसत हसत आयुष्य जगाता आले पाहिजे
आयुष्यात कोणत्या घटनेला किती महत्व देतोय यावरून तिची किंमत ठरत असते त्यामुळे कोणाला किती महत्त्व देयचे हे आपल्याला कळले पाहिजे.

     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************