पाणी व दुष्काळ निवारणासाठी लोकसहभागाची गरज


दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.

     आपण शाळेत असतांना बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या गुरुजनांनी हा प्रश्न विचारला होता तो म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? तर  त्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा ...असो आता त्यात आणखी बदल करावासा वाटतो तो म्हणजे अन्नपाणी आणि उर्वरित दोन.

    आपल्याकडे एक म्हण प्रसिध्द आहे  ती कोणती तर " तिसरे महायुद्ध पाण्यासाठी लढले जाईल " ही तर खरी वाटते कारण आपल्याकडे याची सर्रास गावकडली उदाहरणे देता येतील...तीच स्थिती राज्ये, देश आणि पुढे जाऊन जगाची अस सर्व चित्र आहे.

    हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे कारण हा थेट माणसाच्या दैनंदीन जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि त्याला अर्थ प्राप्त होतो तो " पाणी हेच जीवन आहे " या म्हणीनुसार.

    आज मागील काही दशकांपासून आपल्याकडे या पाण्याने आग लावली आहे मुळात पाणी आग विझवण्याचं काम करत पण त्याच उलट होऊन बसलं आहे कारण आहे आपल्याकडील सरकारी धोरण
1. पाणी आडवा पाणी जिरवा चं झालं पैसा जिरवा.
2. जलस्वराज्य चं झालं दुष्काळराज्य.
आणि आताच
3. जलयुक्त शिवार
या योजनेत खरा लोकसहभाग कधीच न लाभल्याने ह्या योजना पाहिजे तेवढ्या कमाल नाही दाखवू शकल्या आणि दुष्काळ हा सतत येत आहे आणि तो भविष्यात कमी होण्याची शाश्वती नाही.

    आपल्याकडे पाणी फौंडेशन ने गावं जलमय करण्याचं एक अनोखा कार्यक्रम आणला आणि तो लोकांच्या सहभागाने चालवण्याचा निर्णय एक चळवळ बनून गेला आहे आणि या चळवळीने वेगळाच इतिहास घडवला आहे आणि पुढेही घडवेल कारण या चळवळीला खरा लोकांचा पाठिंबा लाभला आहे आणि त्याला बळकटी मिळते जेव्हा मुख्यमंत्री महोदयांना " वाटरकप " देण्याला आमंत्रित केले जाते.
 
शेवटी,
झाडे लावा, झाडे जगवा।
नंतरच आनंदाने फळं खावा।।
तसच
पाणी आडवा , पाणी जिरवा।
नंतरच मिशीला पीळ देऊन मिरवा।।
======================

वाल्मीक फड, नाशिक.

            दुष्काळ हि एक नियमीत येणारी समस्या बनली आहे.शहर वगळता ग्रामीण भागात ह्या दुष्काळी परीस्थीतीने थैमान घातले आहे.सर्वात मोठा तडाखा शेतकरी वर्गाला बसला आहे कुठे चारा नाही कुठे पाणी नाही जनावरे पाळावी की,सोडून द्यावे अशी परीस्थीती शैतकर्यांची झाली आहे.
दुष्काळ निवारण्यासाठी अनेक ऊपाय करता येऊ शकतील.तसं जर पाहीलं तर सरकारची माणसिकता असेल तर यावर एक रामबाण उपाय आहे तो सरकारच्या मदतीने केला गेला तर माझ्या मते दुष्काळ हा शब्द सुद्धा शेतकर्याँना जुना वाटल्याशिवाय रहाणार नाही.
बघा आज आपल्या कोकणात भरपूर पाऊस पडतो मोठमोठे पूर येतात म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी समुद्राला जाऊन मिळते तर ते पाणी आपण धरणांची मर्यादा वाढवून म्हणा किंवा आणखी धरणे वाढऊन पाण्याचा साठा वाढवला पाहीजे.
वाढलेल्या साठ्यातून सरकारने हे अनुदान ते अनुदान देण्यापेक्षा जे शेतकर्याँना जाहीर करून कधीही मिळत नाही ते जाहीर करायचा कार्यक्रम सोडून जिथे पाणी ऊपलब्ध असेल त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी पाणी नसेल तेथे मोठाल्या पाईप लाईन टाकून दुष्काळी भागातील जे छोटे छोटे बंधारे आहेत त्यामध्ये सोडले तर कोठेही विहीरी कोरड्या पडणार नाही पर्यायाने शेतकरी व ग्रामीण भागात दुष्काळ आठवणार नाही.
पाण्याचे योग्य नियोजन केले गेले पाहीजे.पाणी वापर करताना पाणी विनाकारण वाया जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहीजे.
खरोखर जर शेतकरी व ग्रामीण भागात दुष्काळी भागात हा ञास होऊ नये असे जर प्रामाणिक मत असेल तर जो ऊपाय मी वर सांगितला आहे तो जर केला तर कायम दुष्काळी परीस्थीती दुर होऊन जाईल.पाणी पोहोचल्यामुळे झाडे वाढतील सगळीकडे हिरवेगार होईल पर्यायाने पाऊस पडेल म्हणजेच दुष्कळाचे निवारण झाल्याशिवाय रहाणार नाही.
====================

अर्चना खंदारे, हिंगोली.

           पाणी  हे जीवन आहे 'आणि जीवन किती अनमोल आहे हे हि आपल्याला माहित आहे. तरी हि आपण पाण्याचा  अपव्यव करतो. याचा अर्थ असा होतो  कि आपण आपलेच  जीवन अपव्यव करीत आहोत. हे लक्ष्यात  घ्यायला  पाहिजे ....

          आता चांगलाच  उन्हाळा  सुरु झालेला  आहे .म्हणजे सर्वांपुढे  पाणी समस्या  हा गंभीर  प्रश्न सुरु झाला आहे. मग आपलं सुरु होते, ' तहान लागली कि, विहीर खोदायची '!!!हा प्रश्न  आपल्याला पावसाळा किंवा हिवाळ्यात  का पडत नाही. तर त्याचे  कारण असे कि त्या ऋतूमध्ये पाणी आपल्याला जास्त प्रमाणात मिळते म्हणून आपण त्याची  किंमत  करत नाही. पाणी वाचवण्याचे  विविध उपक्रम आपण राबवत  नाही. त्याचा योग्य वापर करत नाही..या मध्ये शासनाच्या  योजना  हि काही अशाच  प्रमाणात राबविल्या जातात.. म्हणजे शासनाने योजना  राबविली  का ? तर हो..त्या योजने  मध्ये काम करणाऱ्या लोकांना रोजगार  मिळाला  का ? तर हो..पण जे काम पूर्ण करायचे होते ते चांगले किंवा योग्य झाले का ? त्याचा पत्ता  नाही..
       
               असो, सर्वतः हा दोष  शासनाला  देऊन काही उपयोग  नाही, सर्वात  मोठी चूक  तर आपलीच आहे म्हणजे ज्या योजनेत  किंवा योजनेसाठी  आपण काम करतो ते चांगल्या  प्रकारे राबवून घेणे हे आपलेच काम आहे..
 

               पाणी व दुष्काळ  निवारण्याचा  महत्वाचा मुद्दा असा कि, काही गावा मध्ये सार्वजनिक  पाण्याची  टाकी  असते व त्यातून संपूर्ण गावाला नळा च्या माध्यमातून पाणी पुरविल्या जाते. गावामध्ये  काही छोटी  तर काही मोठी कुटुंबे असतात.त्या कुटुंबांना  वेळ  ठरवून म्हणजेच एक किंवा दोन तास अस्यया प्रमाणे सारखेच पाणी पुरविल्या जाते. अस्या वेळी काय होते, छोट्या आणि मोठ्या कुटुंबाला सारखंच पाणी दिल्या  जाते, तर प्रत्यक्षात  छोट्या कुटुंबाला जास्त गरज नसतानाही  ते कुटुंब पाण्याचा अपव्यव करते.कारण त्या कुटुंबाला वाटते, पाणी आहे कुणाचं  शासनाच्या टाकीच  वाया  गेलं  तर गेलं...
पण ते कुटुंब हा विचार करत नाही.कि, आपल्याला आज गरज  आहे तेवढेच  पाणी आपल्या वापरात  आणले  तर उद्या  तेच  पाणी आपल्या व सर्वांच्या उपयोगाला येईल.गरज आहे तेवढेच पाणी प्रत्येकाने  वापरले  तर पाणी हि समस्या काही प्रमाणात तरी नक्कीच कमी होईल. माझ्या तरी मते, हा एक प्रकारचा  लोकसहभाग  होऊ शकतो असे म्हणता येईल..
मला तरी वाटते, पाणी व दुष्काळ  निवारणासाठी  चा लोकसहभाग हा पावसाळ्यातच  राबविला  तर आपल्याला पाणी समस्या वाटणार  नाही.
धन्यवाद.
===================
     
मुकुंद शिंदे.
         
     पानी प्रश्न म्हणाला की दुष्काळ डोळ्यासमोर येतो पण हाच प्रश्न घेऊन सत्यमेव जयते शो झाला होता,अमीर खान आणि टीम ने ठरवलं की नुसतं प्रश्न मांडून उपयोग नाही तर त्या वर उपाय शोधला पाहिजे
:- यावर उपाय म्हणून पानी फौंडेशन ची स्थापना झाली आणि  लोकसहभागातून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अंतर्गत किती तरी गावे दुष्काळमुक्त झाली आणि त्या गावांच्या वरचा कलंक पुसला.पण हा कलंक पुसन गेल्या 70 वर्षांमध्ये का जमलं नाही तर त्यामागे कारण होत लोकसहभाग पण या स्पर्धे मध्ये गावांनी लोकसहभागातून काम केलं आणि पानी प्रश्न मिटला.
आता आपला विचार विनिमय झालाच पाहिजे पण त्याबरोबर कृती ही झाली पाहिजे असं वाटतंय.कारण पेपर मध्ये किंवा बातम्यांच्या मध्ये पाण्यामुळे एवढे मृत्य वैगेरे बातम्या वाचताना हळहळतो आणि थांबतो पण तेच आता बदललं पाहिजे आणि आपण यामध्ये उतरलं पाहिजे
"य क्रियावान स पंडितः"
==================

संगीता देशमुख,वसमत.
     
       पाणी हे जीवन आहे. पण आज हेच जीवन हळूहळू लोप पावत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. पर्यावरणाचे असंतुलन,प्रचंड वृक्षतोड,दिवसेंदिवस पावसाळ्यात  पावसाचे कमी होणारे प्रमाण,झपाट्याने वाढती लोकसंख्या आणि या वाढत्या लोकसंख्येचा पाण्याचा प्रचंड वापर. यांत्रिकीकरणामुळेही घरात,सार्वजनिक ठिकाणी,कारखाने येथे  पाण्याचा वापर प्रचंड वाढलेला आहे. हा पाण्याचा वाढता वापर ही खरेतर काळाची अनिवार्य गरज बनली किंबहुना ती मानवाने बनविली. अशा परिस्थितीत पाण्याचा वापर कमी होणार नाही आणि जमिनीच्या पोटातले पाणीही आपण वाढवू शकणार नाही. म्हणून आहे त्या उपलब्ध पाण्यात आज आपल्या गरजा भागवणे गरजेचे झाले आहे.  पाण्याच्या वाढत्या दुष्काळाला समर्थपणे  तोंड देणे आवश्यक आहे. यासाठी गरज आहे ती  सर्वप्रथम लोकांमध्ये जलसाक्षरता आणण्याची. लोकांना घरापासून पाण्याचा वापर कमी करून,जिथे शक्य आहे तिथे पाण्याचा पुनर्वापर करणे,पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे याबाबतीत जागरूक करणे आवश्यक आहे.  आज गावोगावी पाण्याचा एवढा दुष्काळ आहे की,तिसरे महायुद्ध पाण्यावरून होऊन की काय अशी भीती वाटायला लागली. आणि पाण्याहून शेजाऱ्याशेजाऱ्यात झालेले खून मी स्वतः पाहिलेले आहेत. यासाठी पाणी नैसर्गिक संपत्ती आहे,ती आपण तयार करू शकणार नाही त्यामुळे लोकांचाच सहभाग घेऊन पाण्याचे महत्व लोकांना समजून सांगावे लागेल. जोवर पाण्याच्या वापरात,त्याच्या व्यवस्थापनात लोकांचा सहभाग वाढणार नाही तोवर आपण दुष्काळाचा सामना करू शकणार नाही. अण्णा हजारे,पोपटराव पवार,कांतराव झरीकर,दीपक नागरगोजे यांनी लोकसहभाग घेऊनच अत्यंत दुष्काळग्रस्त भागात आज पाण्याचा सुकाळ निर्माण केला आहे. गावे समृद्ध केली आहेत.
=====================

NOTA (मत नाकारण्याचा अधिकार) आणि त्याचे लोकशाही मधील महत्त्व.

शिरीष उमरे, यवतमाळ

NOTA म्हणजे None Of The Above. ... ह्यापैकी नाही ! सुची मधील निवडणुकीला उभे असणाऱ्या उमेदवारांपैकी कोणालाच मत नाही !!

 तसा हा अधिकार पुर्वीपासुन आपल्याला होता. तेंव्हा १७ अ ह्या रजिष्टर मधे तशी नोंद करुन सही करण्याची व्यवस्था होती. न्यायालयाच्या आदेशानंतर २०१३ पासुन इविएम मधे तशी व्यवस्था करण्यात आली. त्यात नोटा नावाची बटन असते जी प्रेस केल्यावर मत नोंदवल्या जाते. हे मत कोणत्याच उमेदवाराला जात नाही. ह्याची वेगळी नोंद होते.

 आता आठवण होत आहे कीे जेंव्हा आम्ही राइट टु रिजेक्ट च्या आंदोलनात होतो त्यावेळी काही तरतुदी व बदल करुन सरकारने ह्याला निष्क्रीय कायद्यात रुपांतर केले. ह्यानंतरही निराश न होता आम्ही राइट टु रिकॉल वर काम सुरु केले होते.

राइट टु रिजेक्ट म्हणजे उमेदवार नाकारण्याचा हक्क म्हणजेच नोटा !! ह्यात समजा १,००,००० मतापैकी ५०,००१ मते नोटाला असेल तर परत निवडणुका होतील व दुसऱ्यावेळी नविन उमेदवार राहतील असा हरियाणा कोर्टाचा निर्णय आहे २०१८ चा.

 पण हा नगरनिगम च्या निवडणुकीपुरता मर्यादित आहे. आमदार खासदार निवडणुकीत हा नियम लागु नाही सध्यातरी !!
उलट समजा १,००,००० मतांपैकी ९९,९९९ मते नोटाला असेल तरीही १ मताने उमेदवार निवडुन येऊ शकतो. आहे ना हास्यास्पद ?!!

 मग आपण का नोटाला वोट करायचे ? हा खरा प्रश्न आहे. मी फक्त दोन मुद्दे मांडतोय. बाकीचे तुम्ही मांडा !!

मुद्दा एक की माझे हे गुप्त मतदान असल्याने मी कोणाला मत दिले हे उमेदवारांना कळणार नाही व त्यामुळे सगळ्यांसोबत संबंध चांगले राहतील आणि सोबत राजकारण्यांना हेही कळेल की कीती लोकांनी त्यांना नाकारले आहे !!
पुढे जाऊन कायदा आमदार खासदारासाठी पण लागु होऊ शकतो जर नोटाचे टक्केवारी पहील्या बहुमत असलेल्या उमेदवारापेक्षा जास्त राहीली तर !!

दुसरा मुद्दा हा की मी स्वत: नोटाला वोट केल्याने माझ्या जागेवर दुसरा कोणी वोट करु शकणार नाही. त्यामुळे डुप्लीकेट वा फेक मताची शक्यता राहणार नाही.

चांगला उमेदवार नसेल तर नोटाला वोट करुन तुम्ही विरोध नोंदवु शकता. ह्यामुळे भविष्यात चांगलेच लोक जातील निवडुन !!

तसेच राइट टु रिकॉल वरही आपले मत मांडत राहा. चांगल्या राजकरणासाठी पुढे या ...
*=============================*

जगताप रामकिशन शारदा,बीड
NOTA=None of the above
2013 सालपासून भारतीय निवडणूक आयोगाने उचलेल एक कौतुकास्पद पाऊल. कितीही अपेक्षा ठेवल्या कितीही वेळा दात उगळून थकलो तरीही मतदान करताना मतदान केंद्रावर असणारी उमेदवारांची यादी पाहता हे थोडे चांगले म्हणून नाइलाजाने द्यावे लावणारे मत आता निदान मतदार NOTA ला.तरी देऊ शकतात. भारतीय संघराज्याची घडी बसवताना निवडणूक आयोग त्याला अपवाद ठरवून एक स्वतंत्र व घटनात्मक संस्था निर्माण केली याच श्रेय घटनाकारांच्या दूरदृष्टी ला जात. आज पर्यंत निवडणूक आयोगाने अनेक कौतुकास्पद सुधारणा घडवून आणून सर्वसामान्य जनतेच्या विश्वासार्हतेला पात्र ठरले आहे. निवडणूक आदर्श आचारसंहिता हे एक उदाहरण आणि NOTA हे दुसरे.
 NOTA ला मतदान करणे म्हणजे कोणालाही मतदान न करणे अस नाही तर अनेक राजकीय पक्षांना आपला संदेश देणारे एकमेव मार्ग आहे. कारण NOTA ला प्रभावी माध्यम बनवण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक पाऊले उचलली आहेत. जर यादीत समाविष्ट उमेदवारांपेक्षा NOTA ला आधिक मत मिळाली असतील तर संबंधित क्षेत्रातील संबंधित निवडणूक लढवणारे उमेदवार बाद ठरवून त्या जागी नवीन उमेदवार उभे करुन नव्याने निवडणूक घेतली जावी अशा प्रकारचे प्रयोग निवडणूक आयोगाने याअगोदर च्या निवडणूकांमध्ये लहान स्तरावर केले आहेत.{हरियाणा}. मोठ्या स्तरांवर ही लागू करतील पण त्यासाठी थोडा आवकाश आहे. यासाठी आपण NOTA चा वापर प्रभावी करणे गरजेचे आहे कारण आपल्याकडे काही युरोपियन देशांसारखी लोक प्रतिनिधींना परत बोलवण्याचा कायदा सध्यातरी अस्तित्वात नाही आणि त्याची वाट पण बिकट दिसत आहे म्हणून दिलेल्या साधनांचा प्रभावी वापर करून आपण आपल्या निवडीविषयी जागृत आहोत हे दाखवणे गरजेचे आहे आणि याचाच जर प्रभावी वापर दिसून आला तर राजकीय पक्ष समजून घेऊन जनतेला ग्रहित धरण्याचा समज सोडून देतील आणि स्वच्छ व कार्यक्षम उमेदवारांना उमेदवारी जाहीर करतील
*=============================*

प्रदीप इरकर,वसई
माझ्या मते NOTA म्हणजे गोळ्या नसलेली बंदूक होय.
NOTA=NONE OF THE ABOVE
एखाद्या मतदारसंघात उभे राहिलेले सर्वच उमेदवार मत देण्यास लायकीचे नसल्याचे लक्षात आल्यावर NOTA हा पर्याय वापरावा लागतो,
त्यामुळे जर निवडणूकीमध्ये NOTA ला सर्व उमेदवारांपेक्षा जास्त मते मिळाली तर आपल्याला मतदारांनी नाकारले आहे असा अर्थ उमेदवार गृहीत धरू शकतात,
परंतु त्यानंतर काय?
जर असा झालेच तर त्या मतदारसंघात फेरनिवडणूक होते काय?
जरी झाल्याचं तर ते उमेदवार ज्यांच्या पेक्षा NOTA ला जास्त मते आहेत त्यांना त्या मतदारसंघात निवडणूक लढवायला(काही काळासाठी) बंदी आहे का?

जेव्हा असे काही बंधने येतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपण म्हणून शकतो की NOTA सक्षम झाला.
तोपर्यंत  आपले NOTA ला दिलेल मत हे वाया गेलेल्या मतासारखेच आहे...
*=============================*



ऋषिकेश जोहरे,डोंबिवली
       भारत एक असा देश ज्यात अनेक विध जाती जमाती भाषा . तेवढ्याच क्षमतेने असलेला प्रांतिक स्वाभिमान .या सगळ्यात देशाची चाललेली लोकशाही अत्यंत जीव कोंडून बसली आहे. कुठल्याही निवडणुका येतोय पहिला मुद्दा तो जात . या सगळ्यांना कंटाळलेले देशातले लोक पण लोकशाही वर अपार श्रद्धा असलेले लोक यांच्या साठी सर्वोत्तम असा पर्याय म्हणजे NOTA . आज अनेक असे लोक आहेत जे राजकारण ऐकला की त्यांची पायाची आग मस्तकात जाते . पण हाच राग व्यक्त करण्याचा प्रभावी तंत्र नव्हे तर शस्त्र म्हणजे NOTA . NOTA माध्यमातून आपण आपला राग व्यक्त करू शकता . कोणताच पर्याय न निवडता तुमची रोक ठोक भूमिका स्पष्ट करू शकता . याने लोकशाही बळकट तर नव्हे पण लोकशाहीत कोणत्या उमेदवाराला कोणत्या पद्धतीने निडवा व याची जान आणि योग्य ते ध्यान नक्कीच जनतेला मिळेल या वर विश्वास आहे .आजच्या राजकारणात नक्की कोणाला आपला प्रतिनिधी निवडावा हे जरी आपल्याला माहीत नसले तरी लोकांची उमेदवार बद्दल ची जागरूकता ही नक्कीच स्पष्ट होईल याबाबत शंका नाही .
*=============================*

पवन खरात,अंबाजोगाई

निवडणुका लागल्या की आपल्या देशात NOTA  (मत नाकारण्याचा अधिकार) या पेक्षा चलनी नोटांचा अधिकाधिक वापर होताना दिसतो.
        जर खरच तुम्हाला भारताचे भविष्य घडवायचे असेल आणि ही लोकशाही टिकवायची असेल तर चलनी नोटा पेक्षा NOTA  (मत नाकारण्याचा अधिकार) जाणून घ्या.
नोटा (NOTA) म्हणजे 'NONE OF THE ABOVE' कोणत्याही उमेदवाराला मत द्यावयाचे नसल्यास 'वरीलपैकी कोणीही नाही' हा पर्याय प्रत्येक मतदात्यासाठी मतदान यंत्रात उमेदवारांची यादीमध्ये सर्वात शेवटी असते. जर 'नोटा' हा पर्याय निवडलेल्या मतदारांची संख्या ही अधिक असेल तर ती निवडणूक रद्द होते व निवडणूक पुन्हा घेण्यात येते.
       18 सप्टेंबर 2015 रोजी नोटासाठी एक ब्लॅक क्रॉस असलेली एक मतपत्रिका, नोटाचा विशिष्ट चिन्ह सादर करण्यात आले. हे चिन्ह राष्ट्रीय डिझाईन ऑफ अहमदाबाद येथे डिझाइन केलेले आहे.
     नोटा अतिशय महत्वाचा अधिकार आहे, याचा विचार प्रत्येक मतदात्याने विचार नक्कीच करायला हवा.
जे उमेदवार लायक नाहीत त्यांना नक्कीच त्याची जागा दाखवावी आणि आपले मत योग्य आणि निर्णायक असायला हवे.
*=============================*

डिप्रेशन आणि आत्महत्या यांनी ग्रासलेला भारत.

अनिल गोडबोले,सोलापूर

एक IAS असलेले ऑफिसर, गोळी मारून घेऊन आत्महत्या करतात आणि पोलीस असा दावा करत आहेत की त्यांना मागील काही महिन्यांपासून डिप्रेशन नावाचा आजार होता.

जो माणूस IAS होतो, अतिशय मेहनती व आशावादी आहे असं सर्वाना वाटतो. स्टेज वरुन  किंवा प्रशिक्षण कार्यक्रमातून लोकांना प्रेरणा देतो... त्याला डिप्रेशन कसं असू शकते?.
एक मॉडेल जी इन्स्टाग्रामवर फेसबुकवर तिच्या लाइफस्टाइल चे फोटो, विविध पदार्थांचे फोटो टाकायची. ट्रेकिंग, समुद्र किनारे, मॉल यामध्ये जाऊन fb live करायची. फॅशन ब्लॉगर म्हणून तरुणांमध्ये प्रसिद्ध होती तिला प्रचंड मद्यपान सवय व एकटेपण यातून डिप्रेशन आलं होतं.

एक व्यावसायिक जो बऱ्यापैकी बिझनेस करून कमवत होता. बायको , मुलं व घर गाडी सर्व होत. विशेष म्हणजे नवीन करिअर आणि प्रचंड मेहनतीवर विश्वास होता. तो हल्ली बिझनेसवर वेळेवर जात नसे, घरातच tv पाहत बसलेला असे, बायको आणि मुलांशी बोलत नसे, सतत व्हाट्सप वर बघत असे. याचा फायदा घेऊन दुकानातील महिला कर्मचारी यांनी जबरदस्त गैरव्यवहार केले व जेव्हा त्याने याबाबत चौकशी केली तर उलट बदनामी आणि चारित्र्य वर आरोप केल्या मूळे आत्महत्त्या केली.

या आणि अशा भरपूर कथा आहेत, शेतकरी आत्महत्या पासून ते चित्रपट निर्मात्या च्या आत्महत्या पर्यंत हा प्रवास वाढत जाताना दिसत आहे.

डिप्रेशन(उदासीनता), हा 2020 पर्यंत भारतातील मोठा आजार असेल असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे व यावर्षीचा "हॅपिनेस इंडेक्स" भारताला 113 व्या स्थानावरून 140 व्या स्थानावर घेऊन गेला आहे.

माणसाला आलेली प्रचंड हतबलता किंवा आवाक्याबाहेर असलेलं मिळालं की नंतर त्याला फक्त आपलेपणा आणि प्रेम पाहिजे असत. पण त्याच्याकडे असलेल्या परिस्थिती चा फायदा घेणारे फक्त कामपूरत त्याला वापरू लागतात. व या मानसिकतेत तो जे काही मनात धारणा करून बसतो त्याच प्रतीक म्हणून उदासीनता येते.

कामाचा ताण, परफॉर्मन्स चा ताण, काहीच मनासारखं घडत नाही, पैशाच्या समस्या, पासून काहीही आपल्याला क्षुल्लक वाटणारे कारण सुद्धा उदासीनता घेऊन येतात.

अशावेळी छान जिवलग मित्र बनवावेत, काही दिवस ब्रेक घ्यावा, आपल्या मनातील गोष्टी शेअर करणारा हक्काचा कोपरा तयार ठेवावा. .. तरीही त्रास झालाच तर डॉक्टरांची मदत घ्यावी, काही मानसोपचार व थेरपी यांनी माणसाचे अवास्तव विचार बदलता येऊ शकतात.

आता सगळं संपलं असा विचार न करता, जेव्हा सर्व काही संपल्या सारख वाटत ना तेव्हा तीच वेळ असते नवीन काहीतरी चालू करण्याची.. हे मनाला सांगावं, स्वतःशी संवाद साधावा.

नाहीतर भारतात तरुण पिढी संपून जाईल आणि ध्येयवेडे उभे न राहता नुसतेच "वेडे" उरतील, याची काळजी प्रत्येक भारतीयाने घेणे गरजेचे आहे.

____________________________

अंजली प्रवीण, रत्नागिरी.
हा विषय समजून घेण्यासाठी थोडं टप्याटप्यात मांडणी करू. 

पहिला टप्पा : डिप्रेशन म्हणजे नेमक काय?

डिप्रेशन मराठी मध्ये “नैराश्य किंवा उदासीनता ” असे म्हणतात. जेव्हा सतत उदास वाटते. निराश वाटू लागते. जेवणाची इच्छा होत नाही किवा भूक लागत नाही. वजन कमी कमी होत जाणे. अधिक थकवा जाणवतो किंवा शक्ती हीन वाटू लागते.  शांत व पुरेशी झोप न लागणे. किवा काही जणांना अधिक झोप लागते. कोणतेही काम करू वाटत नाही. किवा काहीच करण्याची इच्छा होत नाही. कोणताही निर्णय घेता येत नाही. चिडचिडेपणा वाटणे. अपराधीपणा वाटणे. आपण निरर्थक आहोत किवा काहीच कामाचे नाही किवा मी काही करूच शकत नाही. असे वाटत राहणे.  आपलं कधीच चांगल होणार नाही. कोणीही आपल्याला मदत करणारं नाही किवा मी कोणाकडे मदत मागू शकेन असे कोणी नाही. सतत नकारात्मक विचार करत राहणे. आत्महत्येचे विचार मनात येणे तसेच तसे प्रयत्न देखील करणे. अशी लक्षणे ज्यांच्या मध्ये दोन आठवड्या पेक्षा अधिक काळ दिसत असेल तर ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते.

दुसरा टप्पा : डिप्रेशनची कारणे कोणती?

आयुष्यातील दुर्देवी दुखद प्रसंग किवा दुर्घटनेनंतर काही दिवस उदास किवा निराश वाटू लागते.  जीवघेणी स्पर्धा, आर्थिक टंचाई, एकमेकांशी बिघडलेले नातेसंबंध, त्यामुळे आलेला दुरावा, स्वतःला कमी लेखणे, नापास होणे, असफलता, धंद्यामध्ये नुकसान, पती-पत्नींचे न पटणे, घटस्फोट, मुलांची प्रगती न होणे, शारीरिक आजार, बाळंतपणात होणारे संप्रेरकातील बदल अशी बरीच कारणे डिप्रेशन म्हणजेच नैराश्य या आजाराची असू शकतात.   काहीजणांना  त्याप्रसंगातून बाहेर पडता येत नाही. व सतत त्याच प्रसंगाचा विचार करत राहिल्याने नकारात्मक विचार येऊ लागतात. तेव्हा डिप्रेशनची लक्षणे दिसू लागतात. किवा काहीवेळा विनाकारण हि डिप्रेशन येत असते.  कोणत्याही घटनेमुळे आलेला तणाव जर जास्त काळ टिकला तर कॉरटीसोल नावाचे रासायनिक द्रव्य दीर्घकाळासाठी तयार होते. मेंदूतील हिपोकंपस आक्रसतो. यामुळे शरीर व मेंदूत झपाट्याने बदल दिसून येतात.

तिसरा टप्पा : डिप्रेशन आणि आत्महत्या यांचा एकमेकाशी असलेला संबंध

आत्महत्या करू वाटणे हेच डिप्रेशन मधील एक लक्षण आहे. आत्महत्या करणाऱ्या किंवा करू वाटणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूमध्ये  “५ एच आय ए ए” द्रव्याची कमतरता आढळून येते.  सततचे नैराश्य किवा उदासीनता यावर  काहीच उपाय न केल्यास नकारात्मक विचार हे “आत्महत्या” करू वाटणे या टोकाच्या निर्णयाकडे जाऊन पोहचतात.



चौथा टप्पा : डिप्रेशन - आत्महत्या आणि भारत



WHO यांनी नेशनल केअर ऑफ मेडिकल हेल्थ द्वारे केलेल्या संशोधनात  भारत हा सर्वाधिक डिप्रेशनग्रस्त असलेला देश आहे असे निदर्शनास आले. वर्ष २०१४ मध्ये भारतात एक लाख लोकसंख्येतून १ टक्के लोक नैराश्यग्रस्त असायचे पण  २०१८ मध्ये १०.९ टक्के इतकी आकडेवारी वाढली आहे. वर्ष २०१५ च्या नेशनल क्राईम ब्युरो रेकोर्ड मध्ये वय  १५ ते २९ मधील  चाळीस मिनिटाला एक आत्महत्येचा प्रयत्न केला जातो. वर्षाला साधारणत ८ लाख आत्महत्या होतात. हि धक्कादायक आकडेवारी समोर आली. पब्लिक हेल्थ फौंडेशन ऑफ इंडिया मधून राखी दांडोना यांनी १९९० ते २०१६ वर्षातील स्त्री पुरुष आत्महत्या विषयावर संशोधन केले. यामधून असे दिसून आले कि,  १९९० मध्ये आत्महत्या केलेल्या स्त्रियांची आकडेवारी २५.३ % ते २०१६ मध्ये ३६.६ % तर १९९० मध्ये आत्महत्या केलेल्या पुरुषांची आकडेवारी १८.७  % ते २०१६ मध्ये २४.३  % इतक्या प्रमाणात वाढली आहे. या झालेल्या आत्महत्येची कारणामध्ये नैराश्य हे प्रमुख कारण संशोधनात दिसून आले. “The Lancet Public Health” या मेडिकल जनरल मधून या संशोधनाचे प्रकाशन करण्यात आले.  भारतामध्ये मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी एकूण ५००० मानसोपचार तज्ञ तसेच  त्याहूनही कमी २००० क्लिनिकल सायकोलॉजीस्ट आहेत. पण यांच्याकडे उपचारासाठी जाणारे संख्या हि खूप कमी आहे.



पाचवा टप्पा : डिप्रेशन- आत्महत्या आणि आपण



आपल्या हातात असणाऱ्या मोबईलमध्ये शेकडो फोन नंबर असतात. हजारो फ्रेंड्स फेसबुक ट्वीटर सोशल मिडियावर असतात. समारंभात अनेक नातेवाईकांची गर्दी होते.  ऑफिस – शाळा – कॉलेज  जाताना येताना हजारोंची गर्दी आजूबाजूला असते. पण इतक्या गर्दीतही एक व्यक्ती अशी सापडत नाही कि जिला आपण आपल्या मनातील गोष्ट सांगू शकू... आपण व्यक्त होऊ शकू.. आपल्याला समजून घेऊ शकेल...हे गर्दीतील एकटेपण डिप्रेशन आणि आत्महत्येचे एक महत्वाचे कारण आहे. डिप्रेशन आणि आत्महत्या यांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या आणि कारणे सर्वसाधारण सर्वांनाच माहिती असतात. यावरील उपाय योग्य समुपदेशन आणि औषधे वेळेवर घेणे गरजेचे असते. पण त्याच बरोबर महत्वाचे आहे “आपण” “आपलं बोलण- ऐकण- भावना व्यक्त होण- समजून घेण- योग्य वेळ देण.” जितकं स्वतःने स्वतः ला सावरण्याची गरज असते तितकीच कुणीतरी समजून घेणारा मायेचा स्पर्श- बोल हि गरजेचे असतात.

____________________________

किरण पवार,औरंगाबाद,

                हा विषय सध्या खरचं हाताळण्यायोग्य आहे. कारण सध्या आपला देश एका महत्वाच्या बदलाच्या टप्यावर आज येऊन पोहोचला आहे. मागे याविषयी सहसा तरूण विद्यार्थी आत्महत्येवर मी थोडासा सर्वे करण्याचा प्रयत्न केला होता. कौटुंबिक त्रासांनी भारतात जास्त बळी विद्यार्थी दशेतले जातात हे त्यावेळी समजलं होतं. मुद्दा कौटुंबिक किंवा इतर कोणताही असो नैराश्य जेव्हा जखडतं तेव्हा माणूस आत्महत्येच्या जाळ्यात साहजिकपणे ओढला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी स्टेज येते आणि वाटतं की, माझ्या असण्या-नसण्याने कोणाला काही फरक पडणार नाहीये. तेव्हा नैराश्येने ओढलेला गर्ता गळफास बनून जातो. पण मुळात सध्या डिप्रेशन येण्याची मुळ कारणे काय आहेत? हे आम्ही शोधत नाही. आजवर जेवढ्या आत्महत्या झाल्या फार फार तर त्यांच्या चार दिवस चर्चा आणि मानसोपचारतज्ञांचे व्याख्यान एवढचं झालयं. मुळात विद्यार्थी वयात येताना आई-वडील आज त्याला व्यक्त व्हायला फार कमी प्रमाणात शिकवतात. घरातलं सततचं भांडणातलं वातावरण असो,पालकांच मुलांसोबतचं कमी झालेलं संभाषन असो, मुलांच्या आवडीचं आणि जमेलं ते शिक्षण न घेऊ देणं, मुलांमधली दिवसेंदिवस होतं चाललेली सहनशिलता, सामंजस्यपणाचा वाढता अभाव आणि न जाणो अजून छोट्या काही बाबी आहेत ज्या मुलांना हळूहळू नैराश्याच्या(नाऊमेदीच्या) गर्तेत घेऊन जातात. प्रत्येक माणूस खास हसतो आणि त्याच देशासाठीचं छोट छोट योगदान देशाला गती प्रदान करतं असतं. आपल्याकडे मानसिक आजाराला आजही आजार म्हणून पाहिलं जातं नाही यामुळेही कितीतरीजण ग्रासलेले आहेत. आज हा विषय ठेवलाच आहे तर एक गोष्ट सांगतो, मी मागे काही गोष्टींचा आढावा घेऊन एक 5 ते सात मिनीटांचे पंधरा एपिसोड्स बनवले होते ज्यात मी आत्महत्येची कारणे आणि त्यावरचे उपाय सुचवले होते. मी अजूनतरी त्यांना प्रकाशित केलं नाहीये पण लवकरचं मी ते करेन आणि त्याचा इतरांना नक्कीच फायदा होईल अशी माझी आशा आहे. बाकी एवढ्यावरचं थांबतो. धन्यवाद!

____________________________

नरेंद्र हिरालाल पाटील.विमान नगर, पुणे.
       या विषयावर ना... मला असं माझा अनुभव सांगावासा वाटतो. माझं कसंय ना, की मी अध्यात्मवादी आहे  आणि त्यात भारतीय संस्कृती बद्दल आदर. गम्मत अशी होते की मलाही कधी कधी एकट वाटण, असं... निराशा आल्यासारखं वाटणं होतंच. स्वाभािक आहे, प्रत्येक मनुष्याला, या स्पर्धेमध्ये या गोष्टींना सामोर जावंच लागतं. पण मग अशा वेळी मी माझ्या देवसोबत बोलू शकतो. कारण कासाय ना.. की शेवटी आपल्याकडे अस जवळच किव्वा तसं कुणी तरी असेलच अस नाही ना! मग संतांची शिकवणं कामात येते. मोह माया कमी झाली की अनावश्यक ताण कमी होतो. बरं वेदांत बघितला तर विषयच संपला. असो हे प्रत्येकाला जमलंच पाहिजे असं नाही.
          पण हे झालं माझ, आता माझ्या भोवती ची गोष्ट सांगतो, मी आहे tattoo artist, सर्व भोगवादी आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे पाईक मंडळी माझ्या अवती भोवती मी भरपूर प्रमाणात मी बघतो. यांचं अस असतं की भरपूर गोष्टी मनात दाबून ठेवलेल्या, भौतिक जगातील लोकांवरील विश्वास उडालेला, बरं ज्याच्यामुळे ही स्पर्धा निर्माण झाली त्याला काय सांगावं ? मग cool दिसण्याच्या नादात सिगारेट पासून प्रवास सुरू होऊन पार drugs पर्यंत गोष्ट पोहोचते. आणि मग भरपूर मानसिक आजार त्यांना सुद्धा coolness चा touch. आता सांगा हा प्रवास संपेल कुठे? आणि माझ्या सारख्या असंख्य मध्यम वर्गीय तरुणांसाठी हीच मंडळी एक high profile म्हणून आदर्श. मग संगल्यांचाच प्रवास जातो या पाश्चात्य संस्कृती कडे. आहे की नाही वाईट हे? मग वाढणार की नाही नैराश्याच प्रमाण?
     हे झालं श्रीमंतांच असं म्हणाल तर आपल्या कडे सुद्धा आपलं तत्वज्ञान फक्त cool  नाही म्हणून आपण दुर्लक्ष करतो मग पोरगं, तरूण मुलं, मानसं या नैराश्याच्या वर्यमध्ये स्वतःच्या भारी तत्वज्ञानाचा आधार नसल्यामुळे कोलमडून पडतात. कारण राव इंग्लिश बोलायचय, इंग्लिश मत आपलंसं करायचंय तर आपलं कोण अंगीकार करणार? 
    मला तरी हे थोड गणित भरकटल्या सारखं वाटतं. आपण अपला पाया विसरलो तर त्याचे परिणाम दिसतीलच. मग भयंकर स्पर्धा, तुलना, आणि मग त्याचा परिणाम शरीरावर आणि मनावर दिसतीलच आणि एक दिवस सर्व भस्म होऊन जाईल.
       || विश्व स्वधर्म सूर्य पाहो ||
( नोंद: येथे धर्म म्हणजे, तत्वज्ञान व जीवनपद्धती हा अर्थ घ्यावा ही विनंती. )

__________________________

वाल्मीक फड, महाजनपूर
सध्या तरी अनेक लोक हे अनेक कारणाने डिप्रेशन मध्ये जात आहेत.काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलवत नाहीयेत,काहिंच्या नोकरीच्या समस्या,तसेच एखादा व्यवसायिक त्याचे व्यवसायात नुकसान होणे आणि शेतकर्याचा माल तयार झाला बराच खर्च करुन तयार केलेले पिक आणी त्या पिकाचे अचानक भाव पडणे आणी ऊत्पादन खर्चही न निघणे तसेच अवकाळी पावसाने नुकसान होणे अशा अनेक गोष्टीमुळे माणूस डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो.
मी स्वतः अनुभवलेली घटना सांगतो माझा एक परीचय असलेली व्यक्ती कायम माझ्याशी संवाद साधणारी व्यक्ती,एक दिवस मला म्हणाली "आज माझा शेवटचा दिवस आहे भाऊ"मला वाटलं कामाला जातोय इकडं तिकडं असेल कामाचा शेवटचा दिवस मी बोललो चल चहा घेऊ आम्ही चहा पिलो बाकी चहा पिऊन झाल्यावर तो म्हणाला हा तुमचा शेवटचा चहा मी घेत आहे .मी तर चपापलो राव!मग त्याने माझ्याशी बोलायला सुरुवात केली.बायकोला नको त्या अवस्थेत बघीतलेला इसम होता तो !तो बोलला मी घरच्या माणसांना सांगितलं पण मला आईवडीलांनी व भावाने खुप मारले माझे कोणी ऐकत नाही म्हणून मी आत्महत्या करणार आहे.
हे ऐकल्यावर मी त्याला जवळ घेतले आणी पाठीवरुन हात फिरवत सांगितले तु घाबरु नकोस चल तुझ्या घरी जाऊ .बराच वेळ संवाद साधल्यावर त्यांना माझे बोलणे पटले आणी आईवडीलांनी याची बाजू घेतली आणी शेवटी थोडासा सज्जड दम देऊन समोरील व्यक्तीला सांगितले असा विचार पुन्हा नाही बायका अनेक करता येतील पण हा नरदेह पुन्हा मिळणार नाही .त्याला ते पटले आणी तो शांत झाला.
म्हणून मला वाटतंय भारतातील माझ्या बांधवांनी ह्या गोष्टि सर्व सोडून देऊन ,न पटणार्या गोष्टि तत्काळ सोडून द्यावा आणी आत्महत्येसारखा विचार मनात आणू नये हीच विणवणी आणी तिही"लागोनिया पाया"

___________________________

प्राची सुलक्षणा अनिल,अहमदनगर

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा
का रे भुललासी वरलिया रंगा..
खरं तर या पिढीला स्वतःला जे हवंय तेच बघायची सवय लागलीये असं म्हणायला हरकत नाही आणि मग असं झालं नाही तर डिप्रेशन.. हा डिप्रेशन शब्द गेल्या 20 - 25 वर्षांत अगदी शेंबड्या पोराच्या तोंडातही सहज यायला लागलाय आणि क्षुल्लक कारणांवरूनही या पिढीला डिप्रेशन यायला लागलंय हे आजचं जळजळीत वास्तव आहे..

शाळेत भरमसाठ स्पर्धा वाढल्याने मी स्वतः सारखा होण्याऐवजी दुसऱ्या कुणासारखा होऊ बघतोय आणि यात अपयश आलं की मी डिप्रेशनमध्ये जातोय.. वर्गात चार मुलांसमोर एखाद्या मुलीला रागावलं की तिचा अपमान होतोय आणि ती डिप्रेशनमध्ये जातेय..
कॉलेजात एखाद्या पोरीने माझं प्रपोजल सगळ्या कॅम्पससमोर झिडकारलं तर मला डिप्रेशन येतंय आणि मी सरळ आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय.. पण याआधी इतकी वर्ष माझ्या आईबाबांनी माझ्यावर घेतलेली मेहनत मी क्षणात विसरून जातो अन कॉलेजच्या माळ्यावरून उडी मारतोय..
ऑफिसात मागून आलेल्या एखाद्या हुशार सहकाऱ्याचं प्रमोशन होतं आणि मला डिप्रेशन येतं.. मीटिंगमध्ये बॉस ओरडला की मी अपमानित होतो..
खरं तर माणूस संकुचित विचार करायला लागलाय आणि म्हणूनच हे डिप्रेशनचं सो कॉल्ड फ्याड आपल्या डोक्यात बसलंय.. समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला आपल्यातला दोष दाखवतेय किंवा आपल्याला नकार देतेय तेव्हा आपण कुठं कमी पडतोय हे पाहण्यापेक्षा आपण डोक्यात राग घालून घेतो आणि स्वतःच्या दुःखाचं कारण बनतो..

कुणा दुसऱ्यामळे आपण दुःखी व्हावं किंवा कुणा दुसऱ्यामुळे आपण खुश व्हावं इतकेही आपण कुणाचे गुलाम बनू नये आणि असं जर असेल तर याहून दुःखद गोष्ट कुठलीही नाही..

शेवटी काय तर, आपल्या आनंदाची आणि दुःखाची चावी आपल्याकडे असेल तर डिप्रेशन आणि आत्महत्येसारख्या समस्याच उरणार नाहीत..

आणि होय, जगात समस्या नाही असा माणूस नाही तसंच उत्तर नाही अशी कुठलीही समस्या नाही.. हे सुंदर आयुष्य एकदाच मिळालंय आणि ते मनसोक्त जगून घ्यावं.. मरताना कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नसावा की अरेरे जग राहाटी सांभाळताना आयुष्य जगायचं तर राहूनच गेलं..
"मला सांगा..
सुख म्हणजे नक्की काय असतं..
काय पुण्य असतं की ते..
घरबसल्या मिळतं.."

तर हे पुण्य दुसरं तिसरं काहीही नसून आपली खुशहाल मनोवृत्ती असते..
________________________

यशवंती ....मोहोळ
   हल्ली सकाळ चा चहा आणि पेपर हे समीकरण नकोस झालय .का ? ? ? अहो पेपर हातात घेतला की दोन चार तरी आत्महत्या च्या घटना वाचयला मिळतात आणि अश्या बातम्या वाचल्या की काही सुचत नाही ...
डिप्रेशन मुळे आत्महत्या हे समीकरण च झालय ...कळत च नाही की लोकांना नेमक कशाचं डिप्रेशन येत ते ...अगदी कोवळ्या वयातील मुलं सुध्दा एकमेकाला सांगतात की मला ना सध्या खुप डिप्रेशन आलय ....लोकांनी ना नको तितक्या स्वतःच्या गरजा वाढवून घेतल्या आहेत , आणि त्या पूर्ण नाही झाल्या की वाटत समाप्त झाल सगळ ..हल्ली कोणी एकमेकांना नीट बोलत नाहीत , भावना व्यक्त करत नाहीत , आणि अश्या व्यक्त न केलेल्या गोष्टीचा ताण येतो अन मग ते नाही सहन झाल की आत्महत्या करतात लोक ...
जीवन खुप सुंदर आहे ..चांगल जगता आल पाहिजे , नेहमी आपल्या मित्र मैत्रीण , नातेवाईक  यांच्या सम्पर्कात राहिले पाहिजे ..आपली आवड जपली पाहिजे .आनंदी राहील पाहिजे .
सत्यमेव जयते च्या एका भागात सांगितल होत की रोड आक्सिडेंट  नंतर सगळ्यात जास्त म्रुत्यू हे आत्महत्या मुळे होतात ..
एकच सांगते आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात , मार्ग असतात , सापडतात आपण फक्त थोडा वेळ दिला पाहिजे ..
क्युंकी ....जिंदगी गुलज़ार हैं ...थोड़ी हैं ...मगर लाजवाब हैं ! ! ! !

___________________________

श्रीनाथ कासे, सोलापूर

प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये, कॉलेज जीवन संपल्यानंतर आणि करीयर च्या सुरुवातीला एक असा वेळ येतो. ज्यावेळी तो एकटा पडतो. अशी वेळ त्याच्यावर येते जिथे त्याला तणाव (डिप्रेशन) यायला सुरुवात होते. तो आजूबाजूला आधार शोधण्याचा प्रयत्न करतो. जिवलग मित्र मैत्रिणींना बोलण्याचा प्रयत्न करतो पण सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात. ते आता फक्त कामापुरते बोलतात. मग त्याला कळून चुकते की मी या जगात एकटाच आहे, मलाच माझ्या जीवनाचा शिल्पकार व्हावे लागेल. यात जो कष्ट करतो, तो जिंकतो आणि हो, सगळे जींकतीलच अस नाही. तेव्हा तो परत हाक देतो पण त्याच्याकडे बघायला कोणालाच वेळ नसतो. जो कुटुंब तो चालवतोय, त्यांचंही फकत आर्थिक गोष्टीवर लक्ष असेल तर त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट या जगात काहीच नसेल.
स्वाभिमानी माणूस हरण्यामधे त्याची (आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक) परिस्तिथी कारणीभूत असेल तर त्याला हरणे असे म्हणू नये आणि माणूस जींकण्यामधे हीच परिस्थिती कारणीभूत असेल तर मी त्याला अत्यंत दयनीय माणूस म्हणेन.
कर्णाची परिस्थिती हीच होती तो राजपुत्र होता पण त्याला आयुषयभरासाठी सुतपुत्र असल्याची वागणूक दिली गेली. भर सभेत त्याचा अपमान करण्यात आला. एकलव्य ही यापासून सुटला नाही. त्यालाही गुरुदक्षिणा द्यावी लागली. सभेत अपमान, तिरस्काराची वागणूक जर मिळत असेल तर तुम्ही इतिहास बदलणार आहात एवढे नक्की.....
भारत देश समजायला आयुष्य पुरणार नाही. कारण आपल्या देशाची इतिहास, भूगोल एवढे मोठे, विस्तीर्ण आहे.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय, देवालाही देवपण येत नाही त्यामुळे तणाव असणे गरजेचे आहे. तणावामुळे खरा माणूस समोर येतो. जोपर्यंत आपल्याला तणाव येत नाही तोपर्यंत आपण सुधारणार नाही, एवढे मात्र नक्की... त्यामुळे शक्य होईल तेवढे तणाव सहन करा आणि तणाव सहन करण्याची शक्ती वाढवा. आपल्याला कोणी जवळ घेत नसेल किंवा इतर लोकांचे आपल्या बरोबर पटत नसेल तर ही कविता नक्की वाचा.
मला ग. दी.मा ची ही कविता फार आवडते.
एक तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥ धृ. ॥

कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥ १ ॥

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणासी?
जो तो तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक ॥ २ ॥

एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाह्ताना, चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक ॥ ३ ॥
 ग. दि. माडगुळकर
जेव्हा आपल्या मनामध्ये तणाव किंवा आत्महत्येचा, इतर बाबीचा विचार येईल तेव्हा तेव्हा ही कविता आपल्याला साथ देईल.

____________________________

वैशाली सावित्री गोरख,पंढरपूर

आपण लहान असतो त्यावेळेस वाटते कधी एकदा मोठे होईन ,वेगवेगळी स्वप्न उराशी बाळगतो .पण ज्या वेळेस खऱ्या आयुष्यात पाय ठेवतो त्यावेळी पाय डगमगता .प्रत्येक गोष्टीचा तणाव येतो नि आपल्याला लहान पणा पासून डिप्रेशन कस हँडल करावं हे कधी सांगितलेलं नसतं .घरामध्ये भांडण झाले तरी मोठया माणसाचं एकच वाक्य असत मीच जीव देतो आत्ता, मीच घर सोडतो ,तोंड दाखवत नाही माझं .नि ह्या सगळ्या मूळे आपल्याला ही वाटत की डिप्रेशन मधून बाहेर पडण्याचा एकच उपाय आहे आत्महत्या .
आज आपल्या सामाज्यात कोणीच डिप्रेशन फ्री नाही इव्हन मी हे लिहतेय म्हणजे मी डिप्रेशन फ्री असेल असं नाही
पण जीवनात आपण काही तरी शिकण्यासाठी आलो आहे नि ह्यामध्ये आपण येणाऱ्या समस्यांचा सामना कसा करतोय ह्यावर सगळं अवलंबून आहे.
माणूस सध्या खूप एकटा पडला आहे ,तो कोणाजवळ व्यक्त होऊ शकत नाही नि कोणाकडे व्यक्त जरी झाला तरी तो समाधानी नसतो कारण समोर असणारा व्यक्ती त्याला जो हवाय तो नसतो ,मग तो प्रेम करायला लागतो त्यात ही ब्रेकअप झाला की मग डिप्रेशन मग आत्महत्या पण मला वाटतं आपल्या आयुष्यातील कोणतीच गोष्ट शाश्वत नाही , मग अशी आपल्या जीवनात येणारी नि जाणारी ही खूप असतात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या ,त्यातून जा .फक्त एकाच गोष्टीचा अनुभव घेऊन जीवन संपवलत तर त्याला काही अर्थ राहणार नाही .कितीही डिप्रेशन आलं तरी हसतमुखाने त्याच स्वागत करा नि मी हे कधी अनुभवलं नाही मला ह्याला अनुभवायचं आहे ,मला ह्याचा सामना करायचा आहे असं म्हणून त्याचा सामना करा ,त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या लोकांचे अनुभव ऐका,वाचन करा ,नवीन नवीन आवडी जोपासा .

____________________________

गणेश नारायणराव फाळके.

मध्यंतरी कोणता तरी पिक्चर बघून धडाधड कॉलेजची पोरं आत्महत्या करू लागली..शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करु लागले.. पोरं पोरी एकतर्फी दोनतर्फी,अनेकतर्फी प्रेमातुन,टेंशन घिऊन आत्महत्या करू लागली.. सासरच्या जाचानं सुना औषधं पिऊन मरु लागल्या..
पोरं सांभाळत नै म्हणून म्हातारा म्हातारी मरु लागले..कुणी ना कुणी कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या टेंशननं *आत्महत्या* हा सोयीस्कर(?)मार्ग अवलंबायला लागलं..

इथं सगळ्यांना टेंशन हैच की.. बिगर टेंशनचं कुणीच नै.. आपल्या मरण्यानं..आत्महत्या करण्यानं फक्त घरच्यांना जोराचा मानसिक त्रास आन् लोकांना चर्चा करायला विषय मिळत असतोय..

आपण माणसं हौत राव..जरा आजूबाजूला पाह्यलं की लक्षात येईल..आपल्यापेक्षा जास्त टेंशन असणारी मंडळी परीस्थितीशी दोन हात करताहेत..

जेव्हा टोकाचं टेंशन येईल तेव्हा त्यावर सोल्युशन बघायचं असतं.. आत्महत्या हा पळपुटेपणाचा मार्ग धरायचा नै.. आपल्या मित्रांशी..अगदी जवळच्या मंडळीशी मनमोकळ्यापणानं आपल्या टेंशनवरचा उपाय विचारावा..आणि त्यानुसार चालावं..ज्यांनी हा मार्ग अवलंबला आणि त्यातून बचावले.. त्यांना आयुष्याचं मोल विचारा..आयुष्य मौल्यवान है.. सुंदर है.. ते आणखी सुंदर बनवण्याकडं कल पायजे..

निसर्गातल्या इतर सजीवांना आपल्यापेक्षा जास्त टेंशन आहे.. म्हणून ते असा अविचार करत नैत.. आपल्याला माणूस असूनही हे समजत नै.. हिच तर मेख है जी...
____________________________
नोट : (सर्व प्रतिमा या इंटरनेट वर घेतलेल्या आहेत)

लिव्ह इन रेलशनशीप - एक सांस्कृतिक बदल


शिरीष उमरे, यवतमाळ

लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे थोडक्यात सहजीवन ! दोन मानव  एकदुसऱ्या सोबत राहुन आनंदी जीवन जगु इच्छीतात इतकी सरळसोपी व्याख्या !! 

पण आपली कुटुंबव्यवस्था सामाजिक जाचक बंधनामुळे व कायद्याच्या कीचकट नियमांमुळे जगण्याचे मुलमंत्र विसरत चालली आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्था केंव्हाच  मोडकळीस आली आहे. व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेकामुळे लग्न ही सहजीवनाच्या संकल्पनेची गत आता ताक ही फुकुन प्यावे अशी झाली आहे. 

लिव्ह इन रिलेशनशिप ही कल्पना पाश्चिमात्य विकसित देशातुन भारतात आली. आता त्याला कायदेशीर मान्यता सुध्दा आहे. 

 युवा लोकांमध्ये ही कल्पना जास्त प्रसिध्द झाली. शिक्षण घेतांना आपल्या आवडीच्या व्यक्ती सोबत राहणे ह्याने सुरुवात झाली. त्यानंतर करिअर घडवतांना सुध्दा सहजीवन हे सुरु झाले. लग्नाच्या अगोदरपर्यंत सोबत राहणे हे कॉमन झाले होते. 

आता मुळ मद्दा हा की सहजीवन म्हणजे लैंगिक संबंध असलेच पाहीजे हे जरुरी नाही. ह्यात समाजाला एक तरुण व एक तरुणी ह्यांच्या लग्नाशिवायच्या सहजीवनाला  हरकत होती. आता हा विरोध मावळला असला तरी ग्रामीण भागात ह्यावर अजुनही समाज मान्यता नाही.

लग्नाच्या बंधनात जोडप्याला ज्या एकदुसऱ्याकडुन अपेक्षा असतात त्याची पुर्तता झाली नाही की त्याचे रुपांतर भांडणात, संशयात, रागात, द्वेषात होते व घटस्फोट कडे वाटचाल होते.  मग कायद्याच्या व समाजाच्या नियमांमुळे दोघांचे आयुष्य उध्वस्त होते. 

सहजिवनात कुठलिही बंधने नसतात. एक दुसऱ्यासोबत राहतांना गुणदोष कळतात. एकदुसऱ्याला गमावन्याच्या भितीने संबंध टीकवुन ठेवण्याचे दोन्हीकडुन प्रयत्न होतात. एकदुसऱ्याला ग्राह्य धरल्या जाऊ शकत नाही. एवढे होऊनही पटले नाही तर शांतपणे आपआपला प्रवास वेगवेगळ्या वाटेने करता येतो. 
आता ही कल्पना फक्त तरुणांपुरती न राहता वयस्करांपर्यंत पोहचली आहे. शहरात एकाकी निवृतीचे जीवन जगण्यापेक्षा हॅपी लिव्ह इन रिलेशनशिप चा ट्रेंड सुरु झाला आहे. 

एक अजुन नविन प्रथा समाजात मुळ धरुन राहीली आहे ती म्हणजे सिंगल मदर कींवा सिंगल फादर !! सरोगेटींग कींवा दत्तक ह्या मार्गाने सहजीवनाचा नविन प्रवास सुरु झालाय. ह्यात बॉलिवुड मधले नावाजलेले सेलिब्रेटी असल्यामुळे ही कल्पना लोकांना मान्य होऊन राहीली आहे. 

सहजीवन हे सोपे असले तरी ह्यात लाँग टर्म मैत्रीची कमीटमेंट राहीली नाही तर झटपट धरसोड प्रकाराने मानसिक आरोग्य बिघडु शकते...  विचार करा व तुमचे विचार मांडा ...
*==============================*
संगीता देशमुख,वसमत
       आजची पिढी ही स्वतंत्र विचाराची आहे. आपले आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगणारी आहे. थोरामोठ्यांचा मान म्हणून त्यांच्या मताचा आदर करणारी ही पिढी नाही. लव्ह मॅरेज करूनही काही महिन्यातच पतीपत्नीमध्ये वैचारिक मतभेद निर्माण होतात. यात दोघांपैकी एकही जण तडजोड करायला तयार नसतो. ही  प्रकरणे घटस्फोटापर्यंत जातात. त्यानंतरच्याही जीवनात प्रत्येकाला कोणीना कोणीतरी भावनिक,मानसिक,शारीरिक गरज भागवणारा/भागवणारी हवीच असते. परंतु त्यातही समोरच्याचे बंधन नको असते. यामुळे आज  लिव्ह इन रिलेशनशिप  ही संस्कृती जोमाने रुजतांना दिसून येते. या संस्कृतीची जेवढी गरज तरुणांना आहे तशी मध्यमवयीन स्त्रीपुरुषाना देखील आहे. ऐन उमेदीच्या काळात लाइफ पार्टनरचा मृत्यू होणं,त्यात लेकरे शिक्षणानिमित्त दूर असणं,यातून येणारा एकटेपणा घालवण्यासाठीही मध्यमवयीन स्त्रीपुरुषाना लिव्ह इन रिलेशनशिप ही संस्कृती मदतच करते. काळाची गरज ओळखून लिव्ह इन रिलेशनशिपला आता कायद्यानेही मान्यता दिली आहे. त्यात निर्माण होणाऱ्या समस्या त्यासाठी सामाजिक व्यवस्थेला बाधा न पोहोचू देता,त्या जोडप्यांच्याही जीवनात अपत्य जबाबदारीच्या,हक्काच्या समस्या निर्माण होऊ नयेत,यासाठी कायद्याने काही अटी व नियमही करून ठेवले आहेत.  आज काहीजणांना हे घातक किंवा बाधक असे वाटत असले तरी स्वतंत्र विचाराच्या पिढीसाठी,घटस्फोट होऊन त्यापासून होणाऱ्या मानसिक,शारीरिक,आर्थिक,शारीरिक,सामाजिक हानीवर हा एक चांगला पर्याय आहे. त्यासाठी  लिव्ह इन रिलेशनशिप ही संस्कृती काही अंशी का होईना आजच्या पिढीच्या मानसिकतेचा विचार  करता हा बदल स्वीकारणे अपरिहार्य आहे.
*==============================*
निखिल खोडे, पनवेल
                  लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणे पाच्यात्य देशामध्ये कॉमन आहेत. बदलत्या वेळेनुसार आपल्या कडे मेट्रो सिटी मध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये ही आता ट्रेण्ड बनत आहे. विवाह पूर्वी मित्र मैत्रीण एकच घरात सोबत राहणे, विचारांची देवाणघेवाण, एकमेकांचे गुणदोष समजुन घेणे. महानगरामध्ये शिकायला, नोकरी करायला इतर कामा निमित्त मोठ्या शहरामध्ये येणारे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणारे लोक या रिलेशन मध्ये राहणे पसंद करतात. कॉलेज मध्ये, कामाच्या ठिकाणी ओळखी झालेले लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात.

आजही आपल्या कडे ग्रामीण आणि बऱ्याचशा नागरी भागात लिव्ह इन रिलेशनशिप ला सामाजिक मान्यता मिळालेली नाही. अनेक सुजाण लोकांना वाटतात की हे आपल्या संस्कृती विरोधात आहे. काही संघटना या संबंधाचा तीव्र विरोध करतात. शासन मान्यता मिळालेली असली तरी परिस्थिती अजूनही बदलेली नाही. 

जुन्या पिढीची लोक लग्नाशिवाय सहजीवनाची कल्पना स्वीकारत नसली तरी लिव्ह इन रिलेशनशिप आपल्या समाजाचा भाग होणार आहे हे खरे आहे. नात्या बरोबर चांगल्या- वाईट परिणामांना सामोरे जाण्याची तयारी असायला हवी. एखाद्या व्यक्ती बद्दल, कुटुंबा बद्दल, आपले वेगळे विचार असतात लग्न केल्यानंतर आपण कुठेतरी चुकतोय का? याची जाणीव व्हायला लागते हा प्रश्न स्त्रियांचाच नाही तर पुरुषांना सुद्धा पडतो. त्यानंतर रोजच्या जीवनात भांडण, वादविवाद निर्माण होतात. या सगळ्यात मानसिक त्रास किती होतो याचा विचार न करणे योग्य. यावरच तोडगा म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप..
*===========================*
किरण पवार,औरंगाबाद.

              लिव्ह इन रिलेशनशिप नक्कीच एकच प्रकारे सकारात्मक संस्कृतीतील बदल मानता येईल. पण मुळात याची गरज आत्ताच्या नव्या पिढीला का पढावी? हा प्रश्नही तितकाच महत्वाचा ठरतो. साहजिकचं याची गरज खेड्यातल्या जीवणाशी फारपणे संबंधीत नाही. कारण तिथे सहसा अशी गोष्ट म्हणजे, एक प्रकारे पापच मानलं जात. लिव्ह इन रिलेशनशिप आपल्या भारतात मेट्रोपोलिटन सिटीझ मधे सुरू झालं; याची कारण मला वाटतं काही खालीलप्रकारे असावीत.
1) सध्याच्या पिढीतली संयम नावाची गोष्ट संपली, नात टिकवायला हे महत्वाच असतं.
2) मोबाईल प्रत्येकाकडे झाल्यापासून गैरसमज वाढीस लागले, प्रत्येक गोष्ट संशयी वृत्तीने पाहिली जाते.
3) आपल्याला आज थोडी तडजोड करून घ्यायला नको असते.
4) परफेक्ट मेड फॉर इच ऑदर असतं का खरचं कुणी? नसतं ते लग्नानंतर नात ऊलगडून बनतं. पण इथे लिव्ह इन रिलेशनशिप नक्की काय शोधतं? याचा विचारही व्हावा.
5) आपल्यातला अहंकार, वर्चस्व गाजविण्याची हौस.
*==============================*
रुपाली आगलावे, सांगोला.

लिव्ह इन रेलशनशिप - एक सांस्कृतिक बदल जरी वाटत असला तरी तो कितपत मान्य होतंय यावर जरा शंकाच वाटत्तेत...  यामध्ये जरी स्वतंत्र जगणाऱ्या आजच्या तरुण तरुणींना आपला हक्क वाटत असेल किंवा विवाहानंतर येणाऱ्या अडचणींमधून जरी काही अंशी सुटका मिळत असेल तरी ती आपली संस्कृती, जी पूर्वापार चालत आलेली आहे त्यामध्ये बाधा तरी निर्माण करत नाही न... यामधून भारताची वेगळीच संस्कृती निर्माण होतीय मान्य आहे... आणि ती काळाची गरजही आहे... पण ती एक चांगली संस्कृती म्हणून उदयास येईल का? .. कारण भारत म्हणजे विविधतेतील एकता म्हणून ओळखला जाणारा देश ... त्याच ते अस्तित्व टिकुन राहील का?...  आज आपण अमेरिकेसारख्या देशाकडे जर बघितलं तर त्याने आपली संस्कृती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला दिसून येतो म आपण आपली संस्कृती कितपत बदलायची?  माफ करा जर माझं काही चुकलं असेल तर... पण माझ्या मनात उभे राहिलेले प्रश्न मी इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे...
*==============================*
अंजली, रत्नागिरी.

समाज हा परिवर्तनशील असतो. हे सर्वानाच  माहिती आहे . पण हे परिवर्तन समाजातील प्रत्येक घटकात गोष्टीत  मात्र दिसून येत नाही.  ज्ञानात विज्ञानात आपल्या समाजाने खूप भरारी घेतली आहे. नवनवीन शोध संशोधन त्यानुसार समाजात बदल हि झपाट्याने दिसून येतात.  पूर्वी कंदमुळे खायचे नंतर अन्न शिजवून खावू लागले  आतातर  फास्टफूड असते. पूर्वी चामड्याचे वस्त्र असायचे नंतर कपड्याचा शोध लागला आता तर कपड्यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध झालेले दिसतात.  हे झाले समाजातील गरजांमधील बदल जे समाजाने काळानुसार स्वीकारले.  काही सांस्कृतिक परंपरांचा पण आपण आढावा घेऊ. साजरे केले जाणारे सणवार पूर्वी एखाद्या गावामध्ये एका ठिकाणी सार्वजनिक उत्सव किंवा सणवार साजरे केले जायचे आणि या उत्सवाची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली. आता प्रत्येक गल्लीचा वेगळा उत्सव असतो आणि अश्या  नवीन उत्सवांची परंपरा सुरु होत असते. टाळ मृदुंग ऐवजी डीजे स्पीकर आले.   आपल्या समाजात विज्ञानाने तर इतक्या झपाट्याने प्रगती केली कि असाध्य अश्या अनेक रोग विकारांवर उपाय आज आपल्याकडे आहेत. पण हाच आपला समाज आजही समजू शकत नाही कि स्त्रीची मासिक पाळी हि शारीरिक एक क्रिया असून ते “विटाळ” नाही. अश्या आपल्या समाजातील अनेक संस्कारातील एक संस्कार म्हणजे “विवाह”. जे होणे अत्यंत गरजेचे असते. विवाह केले तरच  “स्त्री-पुरुष” या  नात्याला आपल्या समाजात मान्यता मिळते. आदर मिळतो. मान सन्मान मिळतो. हा विवाह होण्यासाठी त्या मुलामुलीची समंती- पसंती  असो नसो पण विवाह केला जातो. त्यांचे विचार त्यांची आवड त्यांचे मत या कोणत्याही गोष्टीबद्दल विचारशील चर्चा न करता हुंडा- लग्नाचा खर्च- मानपान- जात- गुण या गोष्टींवर अधिकतम चर्चा केली जाते. अजूनही याच परंपरा संस्काराचा गाढा समाज अधिकतम ओढताना दिसतो.  पण याच समाजातील काहीजण स्त्री पुरुष आपले विचार-मते-आवड-निवड- गरज यांना प्राधान्य देऊन एकत्र येतात. त्यांना एकत्र राहण्यासाठी  विवाह नामक लेबलची गरज वाटत नाही. विवाहातील पतीपत्नीचे नाते असो किवा लिव्ह इन मधील नातेसंबंध असो.  दोन्ही प्रकारातील नात्यामध्ये तितकेच गुण दोष आहेत. विवाहासाठी हि आपल्याकडे कायदे आहेत व लिव्ह इन साठी हि कायदे आहेत. कायद्याने दोन्ही प्रकारातील नात्यांना  मान्यता दिली आहे. पण आज हि लिव्ह इन म्हटले कि भुवया उंच होतात. आपल्या बॉलीवूडमध्येही लिव्ह इन रिलेटेड अनेक फिल्म्स आल्या सलाम नमस्ते, शुद्ध देसी रोमान्स वैगरे पण या फिल्म्स मधून लिव्ह इन म्हणजे फ़क़्त शारीरिक ओढी साठी एकत्र आलेले नाते... लिव्ह इन म्हणजे मुल बाळ नको असलेले नाते... लिव्ह इन म्हणजे मंगळसूत्र नको... लिव्ह इन म्हणजे जबाबदारी नको... लिव्ह इन म्हणजे इतर नाते संबंध नको... लिव्ह म्हणजे किती अहंकारी  एवढेच चित्र उभे केले आणि अश्या फिल्म्सचा  शेवट “विवाहाने” म्हणजे  Happy Ending असा होतो.  यामुळे लिव्ह इन आपल्या संस्कृतीचा भाग होऊच शकत नाही. लिव्ह इन म्हणजे पाश्च्यात संस्कृती जे संस्कारवादी समाजाला स्वीकारता येत नाही पण पाश्चात्य शिक्षण- तंत्रज्ञान मात्र सहज स्वीकारता येत. 

भारतामध्ये जाहीररीत्या पाहिलं लिव्ह इन मध्ये एकत्र राहणारे जोडपे “अमृता-इमरोज”. चाळीस पन्नास वर्षे समाज काय म्हणेल याची पर्वा न करता एकमेकांची साथ शेवट पर्यंत देणार नात. ज्यांना आपल्या नात्याला  विवाह करून  पतीपत्नी नावच लेबल लावण्याची गरज वाटली नाही. जेव्हा अमृता यांना त्यांच्या नात्याविषयी विचारले जायचे तेव्हा त्या ठाम पणे म्हणत कि, " ज्या जोडप्याना परस्परांच्या प्रेमाची खात्री नसते , त्यांनाच समाजाच्या मान्यतेची गरज भासते. आम्ही आमची मन पूर्णपणे जाणतो आहोत ; मग समाजाची लुडबुड हवीच कशाला... " इमरोज शब्दात सांगायचं तर " मर्द ने औरत के साथ अभी तक सोना‌ ही सीखा है, जागना नहीं, इसलिए मर्द और औरत का रिश्ता उलझनों का शिकार रहता है "

 विवाह या संस्कारातील आधुनिक बदल म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप म्हणता येऊ शकेल पण त्याबदलास स्वीकारण्याची मानसिकता समाजात दिसून येत नाही. दोन्ही मध्ये हि चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहे. दोन्ही मध्येही तडजोड आहेच. जबाबदारी असते. या लेखातील पहिले वाक्य “ समाज परिवर्तनशील असतो, पण..... ठराविक गोष्टीमध्येच” असे म्हणता येऊ शकेल.
*==============================*

अनिल गोडबोले,सोलापूर

नवीन जीवनपद्धती नुसार नवीन काही बदल येतातच. लिव्ह इन रिलेशनशिप हा शब्द सरळ सरळ सांगतो की "नात्यांच्या आत मध्ये जगा". मग ते नात रक्ताचं असो की जोडलेलं असो.

लग्नामध्ये विधी करून एकत्र राहणारे स्त्री पुरुष आहेत की मग लग्न विधीची आवश्यकता आहे का?... तर अजिबात नाही. मनातून नात येण गरजेचं आहे नाहीतर घटस्फोट झालेच नसते. 

फक्त स्त्री व पुरुषच असतात का ? लिव्ह इन मध्ये.. स्त्री - स्त्री, पुरुष-पुरुष, एकत्र रूमवर राहणारे, हॉस्टेल वर एकमेकांची काळजी घेणारे हे देखील सहजीवनात राहणारे.

मुद्धा सहजीवनाचा असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण मुद्धा सुरू होतो लैंगिक संबंध आणि त्या मधून जन्मला येणारी बालक व त्यांची जबाबदारी.... असा आहे.

दोन व्यक्तींनी एकत्र येऊन शरीर संबंध ठेवावेत की नाहीत याचा सर्वस्वी अधिकार त्या व्यक्तीचा आहे. पण हे मान्य होत नाही हा विषय आहे.

समलिंगी संबंध ठेवणारे, एकत्र राहू शकणारे स्त्री पुरुष, आपला जोडीदार नसलेले स्त्री पुरुष, संमतीने किंवा गरजे पोटी एकत्र राहणारे सर्वजण या मध्ये शरीर संबंध हा मुद्धा आला की अजूनही सांस्कृतिक लोकांच्या भावना दुखावतात.

या पलीकडे, एकत्र राहताना येणारी " मालकी हक्काची भावना" इथे येत नाही. मनाला हुरहूर असू शकते की ही व्यक्ती कधी पर्यंत सोबत राहील, किंवा सोबत राहण्याची शाश्वती आहे की नाही(तशी ती लग्नानंतर देखील असते). 

असो... तर आता विवाह संस्था फार काही काळ काम करू शकत नाही. विवाहाच्या नादात 40 वयापर्यंत अविवाहित राहणारे देखील आहेत व बाल विवाह देखील आहेत. जर विवाह संस्था जाती धर्म मध्ये किंवा स्टेट्स व देवाणघेवाण मधून बाहेर येत नाही तोंपर्यंत "लिव्ह इन रिलेशनशिप" प्रमाण वाढत जाणार.. आणि हा सांस्कृतिक बदल आपण मान्य केला किंवा नाही केला तरी तो होत राहणारच.
*==============================*

प्रियांका, रत्नागिरी.

लिव्ह इन रिलेशनशिप हा आजच्या काळातला कळीचा मुद्दा बनला आहे. मुळात ही पाश्चिमात्यसंस्कृतीची देणगी म्हणून याला होणारा विरोध जास्त..ज्या सोसायट्या मध्ये लिव इन कपल्स राहतात हमखास ऐकू येणारा संवाद म्हणजे "काय ही थेर".शोभत हे" "लाजा कशा वाटत नाही यांना"..परंतु मित्रहो आपल्या सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द भारताचे मूलनिवासी आदिवासी समाजामध्ये मात्र विवाहपूर्व सहजीवनाला सुरुवातीपासून मान्यता होती. किंबहुना युवागृहे किंवा घोटुल याद्वारे जोडीदार निवड, लैंगिक शिक्षण अशा विषयांना चालना दिली जात असे. कालांतराने सुशिक्षित व सुसंस्कृत होण्याच्या स्पर्धेत आपल्याच समाजाने या प्रथेला कालबाह्य ठरवले.
मुळात प्रत्येक प्रौढ व्यक्तीला स्वतःचा जोडीदार निवडून त्याच्यासोबत सहजीवन व्यतीत पूर्ण अधिकार आहे. हे सहजीवन समाजमान्य होण्यासाठी विवाहविधी सुरू झाला . 
मुळात लिव इन रिलेशनशिप म्हणजे लैंगिक स्वैराचार चे माध्यम अशी मानसिकता बनली आहे म्हणून याला विरोध जास्त! पण जेव्हा दोन व्यक्ती परस्पर संमतीने सहजीवन ला सुरुवात करतात तेव्हा केवळ लैंगिक इच्छापूर्ती एवढाच हेतू न राहता बौद्धिक, भावनिक, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर आपण अनुरूप आहोत का याची पडताळणी करणे गरजेचे असते. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये नेमके हेच असते. आपण ज्याला आयुष्याचा जोडदार म्हणून निवडत आहोत व्यक्ती आपल्याला पटणारी,रचणारी आहे का याचे उत्तर मिळते. पण शेवटी आयुष्य म्हटले की तडजोड आलीच...ती इथेही आहे बरं का! अगदी दैनंदिन व्यवहारा पासून ते निर्णय चुकला तर होणारा भावनिक आघात, ठोस कायद्याचा अभाव, सामाजिक अमान्यता आणि त्यातून येणारी असुरक्षितताही आहेच.त्यामुळे या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेल्या जोडप्यांना विवाह करायचा की आजन्म विवाहशिवाय सहजीवन व्यतीत याचा निर्णय घायचा अधिकार असायला हवा ना?
*==============================*

मुंबईतील पडणाऱ्या पुलांचे मनोगत


शिरीष उमरे, यवतमाळ
       ३०० वर्षांचे उदंड आयुष्य लाभुनही वृध्दावस्थेत स्वत:ची डागडुजी करुन घेत न कुरकुरता मुंबईकरांचे अहोरात्र सेवा करणारे  आम्ही ब्रिटीशकालिन दादर !! इंग्रजीमधे दादरला पुल म्हणतात बरे...
       आम्हाला निवृत्ती देऊन नव्या दमाच्या पिढीची निर्मिती का होत नाही हे कोडे तेंव्हा उलगडले जेंव्हा आमच्या तब्येतीची नियमीत तपासणी करणाऱ्या इंजिनियर साहेबांची कुजबुज ऐकली. त्यातला एक युवा म्हणत होता की दरवर्षी मेंटनसवर इतका प्रचंड खर्च करण्यापेक्षा नविन ब्रीज बांधणे जास्त योग्य नाही का ?!! त्यावर अनुभवी सिनीयर म्हणाला की ह्यामुळे बऱ्याच जणांची वरकमाई बंद होते. राजकारणी फक्त उद्दघाटनाला फीता कापायला येतात आणि नंतर त्यांना हवी असते मेंटनसच्या तरतुदीतुन लक्षावधी रुपयांची मलाई वर्षानुवर्षे... ती पोहचवण्याची जबाबदारी नोकरशाहीतील भ्रष्टाचारी बाबु लोकांची...  आपल्या सर्वेक्षणाला कोण विचारतो ?? आता तर ह्या  कंत्राटदारांनी आपल्या लोकांना पण चायपानी ची सवय लावली !!
      सामान्य मानुस हा मरण्यासाठीच असतो ... घड्याळीच्या काट्याला बांधलेली ही मुंबाआईची लेकरे अशीच अकारण मरणार व उरलेले डोळे पुसुन परत कामाला लागणार...
      ह्या  प्रामाणिक जोडगळीची ही हताश चर्चा हृदयाला घर करुन गेली. परत एक छताचा प्लॉस्टर चा पोपडा पडला. त्याकडे विष्षणतेने बघत त्यांचा साहाय्यक शुन्यात पाहत बोलला की मागील पुलाच्या दुर्घटनेने त्याची आई हीरावुन घेतली ह्या सरकारने... गलबलुन आले हो हे उदास शब्द ऐकुन... 
    एक आशेचा कीरण जरुर दिसला जेंव्हा सैनिकी वेषातल्या काही अभियंतानी विक्रमी वेळेत एवढ्या मुंबईच्या गोंगाटात अहोरात्र परिश्रम घेऊन एलफीस्टन रोड स्टेशनचा ब्रीज नव्याने उभा केला... ती पण मानसेच होती ना !!

फार अभिमान वाटला त्यांचा ! अश्याच काही तरुण अभियंतानी समुद्रातुन बांद्रयाला ब्रीज बांधुन काढला... व्वा ! माणुसकी जीवंत आहे अजुन ... एक श्रीधरन नावाचा ध्येयवेडा माणुस ही मी बघितलाय... 

अजुनही आशा कायम आहेत नव्या पीढीकडुन !! नवनिर्मितीचा ध्यास असणारी... सेवावृत्ती असणारी.. पैश्यापेक्षा नितीमत्ते ला कीमंत देणारी !! 

गरज आहे अश्या लोकांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची !! मी म्हातारा एवढेच म्हणेन संधी हातात आहे... योग्य व्यक्तीला वोट करा जो सामान्याचा विचार करेल व विकासातुन भ्रष्टाचाराला हद्दपार करेल....
___________________________

प्रदीप इरकर,वसई जि-पालघर

परवा खूप वाईट वाटले हो!माझा अजून एक मित्र पडला..आपण तरी काय करणार अशावेळी वय झालेले बिचाऱ्याचे..तो तरी किती वेळ सोसनार होता?एरवी कोणी मनावर नसते घेतले पण जाता जाता 6 जणांचे प्राण व 30 जणांना जखमी करून गेला.इतके वर्ष ज्यांची सेवा केली त्यातील काहीजण होते ह्यात.परंतु गेल्यानंतरही काहीसे बेवारस मरण आलेय त्याच्या नशिबी म्हणजे असा झालेय की BMC म्हणतेय तो रेल्वे चा आहे रेल्वे म्हणते तो BMC चा आहे...असो तुम्हा सर्वांनाच माहित असेल तो कोणाचा होता.

गेल्या वर्षी असाच आमचा अजून एक साथी तो तर पडला नाही परंतु त्याच्यावर झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये अनेक जण गेले म्हणून बिचारा आसवे  गाळत होता.तो अगोदर पासून च सांगत होता की 'बाबांनो माझे वय झालेय आता.माझी जागा पण कमी आहे जरा पर्यायी व्यवस्था बघा.' पण आमचे ऐकतो कोण?? 
चेंगराचेंगरी झाल्यावर आसवे  गाळत विचार करत होता आता माझे रुंदीकरण होईल माझ्यासारख्या अनेक जणांचे विस्तार होतील अनेक मुंबईकरांना सुद्धा ही भोळीभाबडी आशा होती परंतु तुम्हा लोकांना कसे मूर्ख बनवायचे हे तुमच्यातील काही जणांना अतिशय उत्तम प्रकारे येते. जिथे ही चेंगराचेंगरी झाली ना आता तिथे उपाय म्हणून त्या स्थानकाचे नाव बदलण्यात आले आहे.
असेच आमचे कित्येक बंधू एकामागून एक गेले जायच्या अगोदर ऊर बडवून सांगत होते परंतु त्यांचं कुणी ऐकलं नाही....

आम्हाला आमच्यापैकी कोणी पडतो ह्याचे जितके दुःख होते त्याहीपेक्षा जास्त दुःख तुमच्या चूकीमुळे तुमचीच माणसे आमच्या मार्फत मारली जातायत ह्या गोष्टीचे जास्त दुःख वाटते......
असो सर्वांनी सावधान राहा व आमच्या मार्फत तुमचे होणारे "खून" थांबवण्यास आम्हाला सहकार्य करा.

----------------------------------------------

जगताप रामकिशन शारदा,बीड.

मुंबई मध्ये पडणाऱ्या पुलांनी आपल्या कोसळलण्याने दोष द्यायचा कोणाला? कारण पूल कोसळा कारण गर्दी जास्त होती. पूल कोसळला कारण तो जर्जर झाला होता. अहो गेल्या महिन्यात तर सरकारी अधिकारी येऊन मी ठणठणीत असल्याची पावती मुख्यालयात सापडली अस बोलतात पण शास्त्रीय पध्दतीने कोणी माझी शहानिशा केली अस तरी माझ्या स्मरणात नाही. मग मी फक्त राजकीय पक्षांनी, सामाजिक कार्यकत्र्यांनी मला जनजागृती किंवा स्वतः च्या प्रचारासाठी केलेली आकर्षक रंगरंगोटी केलेली पाहून तो तपास आधिकारी फसला वाटत.  आणि मी ठणठणीत असल्याचा अहवाल सादर केला. अहवालच की तमाम मुंबई करांच्या अनिश्चित मरणाचे प्रमाणपत्र.
दगडांनाही पाझर फुटतो पण काय करावे तो इतका सहजासहजी दिसून येत नाही. अखंडपणे ओझे वाहून वाहून आम्ही वजनदार आणि टणक बनलेले असतो. विचार करा दररोजच्या लाखो लोकांची वाहतूक करुन आम्ही किती टणक बनत जातो. मध्यंतरी ऐकण्यात आल होत भक्तांच्या हाताच्या स्पर्शाने विठ्ठलाचे पाय झिझू लागले आहेत मग विचार करण्यासारखे आहे की पुलाच्या दगडांची काय अवस्था होत असेल.
अंगात कणकण असतानाही कामाचा व्याप सहन नाही झाला की कोलमडताना तसच आम्ही ही कोलमडतो कायमचे.मग चालू होत दोष द्यायला. दबणाऱ्या माणसांच्या अस्फुट किंचाळ्या तुमच्या कानापर्यंत कधीही येत नाहीत पण त्या खोलवर घुसतात आमच्या ऱ्हदयात.दलबदलू माणस पुलांना दोष देऊन मोकळी होतात. मेलेल्यासाठी दोन मिनिटं शांत उभी राहतात मतदानाच्या वेळ विकएंड साठी थंडहवेच्या पर्यटन स्थळी घालवतात आणि पुन्हा एखादी दुर्घटना घडली की येतात दोन मिनिटांसाठी.सोयीसाठी बांधल्या जाणाऱ्या पुलाच्या बांधकामाचा त्रास यांना तो कसा बांधला जातोय याची तिळमात्र काळजी कोणाला नसते. आणि सरकारी यंत्रणा कुचकामी असल्याची दार्पोटी करायला मोकळे. कधी ऐकलय का की सजग नागरिक संघाने केलेल्या परिक्षणात एवढे पूल धोकादायक आढळले आहेत. आहो ते इंग्रज आजही आमच्या स्थिती बद्दल माहिती देत आहेत पण तुम्ही एवढे निष्काळजी की  काय स्थिती आहे हे पण लक्षात घेत नाहीत. कोसळणारे पुल हे जूने झाले म्हणून नाही तर दुर्लक्ष केल्याने कोसळत आहे. अजुन किती लोकांचा जीव घेणार हा प्रश्न अजून किती लोकाचा बळी देणार तुम्ही असा विचारा.

----------------------------------------------

प्रवीण, मुंबई
     *खरच* *राव* *कोणी* *वालीच* *नाही* *उरल*
मी अनेक वर्षे दिमाखात उभा होतो, प्रत्येक प्रवाशांचा आधार होतो. अगदी सुटबुटातल्या प्रवाशाला ते अनवाणी धावपळ करणाऱ्या गरीब मजुराला पण इथे एकच मान होता. अनेक वर्षे मी इथे उभा होतो. पावसात भिजनार, उन्हाने तापलेला, मी असाच इथे उभा होतो. .सर्व प्रवाशांचा आधार असणारा मी मात्र निराधार होतो. मी थकलोय
कोणी वालीच नव्हता मला. माझी अवस्था ही सरत्या वयात पोरानं घराबाहेर काढलेल्या म्हाताऱ्या बापासारखी झाली आहे. दोन्ही पोर बापाची जबाबदारी एकमेकांवर ढकलतात तसच रेल्वे आणि BMC करत आहेत. ना मला रेलवे ने पाहिल ना BMC ने डागडुजी केली, म्हणून दोघांना जोडणारा मीच कोलमडून पडलो आहे.
मुंबईकरांचे आयुष्य पण जवळून पाहिलं आहे मी.  . पहाटे पहाटे पहिली ट्रेन मिळावी म्हणून धावणाऱ्या चाकरमान्यांचा धावपळीच्या आवाजाने माझी सकाळ होत होती, मग दिवसभर फेरीवाला आपलं पोट भरण्यासाठी बेंबीच्या देटाने वस्तू विकायला ओरडायचा, मग कोणीतरी एखादी बाई अर्धवट हिंदीत त्याच्याशी वाद घालत किमतीवर घासाघीस करून वस्तू विकत घ्यायची,"अगेन मंडे" अशा निराशेने कामावर जाणार आणि वीकएंड ला प्लॅन बनवत घरी जाणार मुंबईकर मी पहिला आहे, कोणाच्या चेहऱ्यावर बॉस ने दिलेल्या शिव्यांचा प्रभाव दिसत होता, तर कोण नोकरी मिळाली या खुशीत असायच, संध्याकाळी अनेक प्रेमीयुगल माझ्यापाशी यायची,.... असा पूर्ण दिवसभर गोंधळ, गडबड, भावनांची भेळ असायची.
त्यादिवशी सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होत, काहीतरी विपरीत घडेल असा भास होत होता, कोणीही माझ्याजवळ येऊ नये असच वाटत होत. 
मी आता थकलो होतो, हरलो होतो आणि अचानक धीर खचला. पाठीचा कणा मोडल्यावर जे होत तेच झालं, खाडकन आवाज झाला , कोलमडून पडलो आणि जिकडे तिकडे धुळीच साम्राज्य पसरलं होत.डोळ्यासमोर येत होता तो मुबईकर, फेरिवाला, अर्धवट हिंदीत बोलणारी बाई, बॉस च्या शिव्याखाऊन वैतागलेला तरुण, नवीन नोकरीच आनंदनाने घरी जाणार मुलगा, प्रेमात आकंठ बुडालेले जोडपे......
आता ये काहीच उरल नव्हतं, उरली होती जखमांतून येणारी किंकाळी, भयाण शांतता आणि माझा निपचित पडलेला देह. गर्दी होती पण माणसांची नाही तर जखमांची, मूडदयांची, स्वतःच्या माणसांना पाहायला आलेलं नातेवाईक आणि अंबुलन्स ची पण त्या गर्दीत पण माझा देह एकटा पडला होता.
विचार करत होता नेमकं चुकलं कोणाच , जीव गेलेल्या प्रवाशांचा, BMCच, रेल्वेच की कोणचं वाली नसलेल्या माझं.

--------------------------------------------

     विकास येवले ,पुणे.

नका बघू ना रे माझ्या कडे अशा संशयाच्या नजरेन...! काल कोसळलो जरी खाली ते ही तुमच्या हलगर्जीपणाने. माझी शारिरीक स्तिथी खराब होती, मी किती वेळा ओरडून सांगितल. तुम्ही तुमच्या सोईन आलात पाहणी करून गेलात, चार पांढरी कागद काळी करून गेलात दोन सह्या, चार शिक्के मारुन माझ्या दीर्घ आयुष्यावरच जणू मोहरच मारून गेलात. त्या नव्या कोऱ्या फायलींना नेहमी प्रमाणे रद्दीत धूळ खायला फेकून गेलात. यात माझा काय रे गुन्हा...! नव्हता रे घ्यायचा जीव कधीच कोणाचा मला. म्हणून सांगत होत तोडून टाका काही वाईट घरण्या आधीच मला. ठाउक आहे हे ही गुन्हा नव्हताच त्या चिरडलेल्या एकाही निष्पाप जीवाचा, पण मी तरी काय करू पेलवणास झाला होता भार मला माझ्याच जीवाचा. अरे छाताडावर भार झेललाच ना रे तुमचा...? कित्येक वर्ष मी एकही शब्द न बोलता. मग काय मिळेल सांगा मला माझ्याच निर्मात्याचा जीव घेऊन. कलंक लागेल की हे सार करून.
                           तुम्ही व्हाल बोलून आज मोकळे जीव घेतला याच निर्जीव पुलाने पण कस सांगू मन माझं ही धजातच होत न व्हावी माझ्या हातून दुर्घटना. जे घडायचं होत ते घडल या घटनेंन साऱ्यांचच मन हळवळल माझ्या प्रत्येक भागाला ही जाणवलं. आता तरी घ्याल का यातून काही बोध, अरे माणसा-माणसा तुझ्यातल्या त्या  माणुसकीला शोध...!

साहित्य: आपण पुढच्या पिढी साठी काय सोडून जाणार आहोत?

विषय क्र. 2:- साहित्य: आपण पुढच्या पिढी साठी काय सोडून जाणार आहोत?

Image result for marathi literature

अनिल गोडबोले.सोलापूर

Image result for marathi नाटक
मराठी मध्ये ज्याला "वारसा" असा शब्द आहे आणि त्या शब्दाचा अर्थ असा आहे की, मागच्या पिढीकढुन पुढीला मिळालेली देणगी.
सर्व बाबतीतच आपण पुढे जे काही देणार आहोत त्यात चांगलं किती आणि वाईट किती याचा हिशोब करू नये इतकं भयानक वास्तव समोर दिसत आहे. प्रदूषण, पर्यावरण ऱ्हास, कमी दर्जाचे जीवन आणि समस्या तर आहेत. त्यावर उपाय योजना देखील आहेत.
पण साहित्य निर्मिती बद्दल खरच चित्र समाधानी आहे का? यावर विचार करायला पाहिजे. साहित्य निर्मिती मध्ये आघाडीवर आहे... मराठीतील कथा, ललित आणि औचित्यपूर्ण लेख. काही केखक आहेत जे अतिशय ओघवत्या भाषेत लिहितात परंतु पु.ल. , किंवा व. पु. यांनी साधलेले प्रभाव आताच्या लिखाणातून येताना दिसत नाही.
कविता आणि नाटकं यांचा दर्जा वाढला पाहिजे नाहीतर या पुढच्यापिढी मध्ये स्तर अजूनच ढासळून जाईल. साध्या सध्या वाक्या मधून अतिशय योग्य व अर्थपूर्ण शब्द रचना होताना दिसत नाहीत.
कादंबरी आणि प्रेरणात्मक लेखन  व त्याचा वाचकवर्ग एवढा काही प्रभावित दिसत नाही. त्याचंच प्रतिबिंब म्हणजे आशय नसलेले चित्रपट. काही चित्रपट, नाटक चांगली आहेत पण ती नियमाला अपवाद असल्या सारखी वाटतात.
वाचक वर्ग, प्रेक्षक कमी झाला आहे किंवा आपण जे देऊ, लिहू, करू ते समाजात सहज ओढलं जाईल.. अस साहित्यकारांना वाटत असेल तर तो भ्रम आहे.
कॉमेडी शो ना चलती आहे सध्या पण बाकीच्या मालिका, त्यातील पात्रे व कथानक या मध्ये कुठेही ताळमेळ दिसत नाही.
सर्व ठिकाणी चित्र नकारात्मक नाही. पण ते अजून जास्त प्रमाणात आणि दर्जेदार साहित्य निर्मिती मध्ये बदलले गेले पाहिजे.
अभिजात भाषेचा दर्जा तर सोडा.. साधी भाषांतरित पुस्तके देखील न समजण्यासारखी असतात. त्या पेक्षा मूळ भाषेतील पुस्तक जास्त समजतात.
आपण मराठी टिकवली पाहिजे, वाचवली पाहिजे, नाहीतर पुढची पिढी दर्जेदार शिक्षण व मराठीतून आनंद कसा घेतील?.. हा एक प्रश्नच आहे.

अर्चना खंदारे,हिंगोली.

 जन्माला आलेल्या  प्रत्येक व्यक्तीला  समाजाचं  देणं  असते.प्रत्येक व्यक्तीवर  समाजाचं ऋण असते आणि ते फेडायचं असेल तर साहित्य सारखी  दुसरी  अनमोल  वस्तू  नाही.आणि हि अनमोल वस्तू येणाऱ्या पिढीला  देणे चांगले व महत्वाचे आहे.
आज एकविसाव्या शतकामध्ये आपण कित्येक पूर्वीच्या शतकाचा अभ्यास हा साहित्यामुळेच  करू शकतो  आहे.तथागत गोतम बुद्ध यांचे विचार, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज यांची  राजनीती,अनेक महान संत आणि शाश्त्रज्ञ  इत्यादी  यांची ओळख हि आपल्या ला साहित्यामुळेच झाली आहे.या ( पूर्वीच्या ) पिढीने अतिशय  अनमोल अशी साहित्य नावाची  रत्नाची  खान  नंतर च्या पिढीसाठी  सोडून  गेल्या मुळे च क्रांतीसूर्य  आणि क्रांतीजोति सावित्रीबाई जोतिबा फुले,राजर्षी  साहू  महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे  आणि इत्यादी सारखे अनेक संत, कवी आणि लेखक  निर्माण झाले..
आणि आज आपली पिढी या महान नायकांनी  सोडून गेलेल्या  साहित्याचा  आधार घेऊन आज समाजामध्ये पुढे  जात आहे .आणि याचा एक आदर्श आजच्या पिढीला घेणे  अतिशय महत्वाचे आणि काळाची गरज बनले  आहे..कारण आज ची पिढी हि तंत्रज्ञाचा खूप मोठ्या प्रमाणावर  वापर  करीत आहे आणि लिखित  साहित्याचा खूप कमी वापर करीत आहे.त्यांना हे लिखित साहित्य वाचन रटाळवाणे  वाटत आहे.त्यामुळे आज च्या या पिढीमध्ये वाचनाची गोडी  निर्माण करणे फार गरजेचे  आहे.
   माझ्याच घरचा  एक किस्सा  मला इथे सांगावासा  वाटतो आहे.माझ्या मामा  ची दोन मुले आहेत एक डि.फार्मसी प्रथम  वर्षात  आहे,तर दुसरा  मायक्रोबायोलॉजी  ला आहे.दोन दिवस  पूर्वीच सुट्टी  आहे म्हणून घरी आले आहे.संध्याकाळी सर्वजण एकत्र बसले  असता,सहजपणे वाचनाचा विषय निघाला.मी सहज मामा ला विचारले  कि,मामा तुम्ही मुलांना  पुस्तक वाचन करू नका  असे सांगितले आहे का ? त्यावर मामा तर शांतच  बसले.पण, माझ्या त्या दोन्हीही भावांनी  मला सांगितल,ताईडे आम्ही  हातामध्ये  पुस्तक घेतले  नाही म्हणजे आम्ही वाचन केले नाही याचा अर्थ असा होत नाही,तर आम्ही आमच्या  मोबाईल वर  वाचन केले आहे असे त्यांनी सांगितले...
यावर मामाकडून आणि माझ्याकडून त्यांना चांगलीच  शाबासकी मिळाली....
अशाप्रकारच्या घटना कित्येक घरामध्ये  घडत  आहेत अस्या प्रसंगांना  आळा घालण्याचे  काम आज च्या वडीलधाऱ्या  व्यक्तीने  करणे गरजेचे आहे. साहित्याचा वारसा  पिढ्यानपिढ्या  चालत  ठेवणे हे आपले कर्तव्य  आहे. आणि प्रत्येक पिढीसाठी  नाविन्यपूर्ण  साहित्य सोडून जाणे  आणि त्या पिढी चा कार्यकाळ  जागरूक  करून तो अजरामर  ठेवणे होय..
विचार ग्रुप हा नवीन लेखक आणि कवी घडविण्याचा  नाविन्यपूर्ण उपक्रम  तसेच अविरत  प्रयत्न  करीत आहे आणि या ग्रुप च्या माध्यमातून  मी चांगले लिखाण  करण्याचा  प्रयत्न करीत आहे..सर्वजण मिळून एक संकल्प  करूया  येणाऱ्या नवीन पिढीसाठी साहित्याची  एक आगळीवेगळी  भेट देऊन  जाऊया.....

संगीता देशमुख,वसमत

Image result for marathi नाटक
सगळ्याच बाबी काळानुसार कूस बदलत असतात. साहित्यही याला अपवाद नाही. साहित्यात  मधल्या काळात विद्रोही साहित्याने साहित्य क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. पण आज उच्च शिक्षण घेऊनही विद्रोही साहित्य हे अत्यल्प प्रमाणात निर्माण होत आहे. पूर्वीचे साहित्य हे त्या लेखकाची स्वतंत्र ओळख असायची. एका साहित्यिकाची संकल्पना दुसऱ्यालेखकाच्या साहित्यात आढळत नसे. परंतु आज  सोशल मिडियामुळे एकमेकांच्या संकल्पना तर सोडाच पण एकमेकांच्या चक्क साहित्याची चोरी होताना दिसते. त्यामुळे साहित्याला हवी तशी धार प्राप्त होत नाही. जवळपास जास्तीत जास्त साहित्य एकाच धाटणीचे दिसून येते. दोन चार शब्दांची जुळवाजुळव जमली तरी स्वतःला साहित्यिक,लेखक म्हणून मिरवून घेण्यात ही पिढी अव्वल आहे. परंतु साहित्यातील नवरस,अलंकार,वृत्त,छंद असा  अनमोल खजिना लुप्त होत आहे. आज दिवसाकाठी शेकडो साहित्य प्रकाशित होत आहे. एक वर्षच काय पण काही महिन्यात लिहायला सुरुवात करून स्वतःची पुस्तके बाजारात येत आहे.  परंतु यात नवतरुणांचे  होणारे पदार्पण नक्कीच आशादायी आहे. काहीवेळा अभिव्यक्ती होणं हे महत्वाचं असतं त्यावेळी ते  नियमानीच बांधील असणं महत्वाचे नसते.
पण येणाऱ्या साहित्यिकानी आपली  अभिव्यक्ती जपतानाच त्याला काही साहित्यिक मूल्यही प्राप्त होते की नाही,याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आजचे साहित्य हे उद्याच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरत असते. म्हणून उद्याच्या पिढीला कोणती दिशा द्यायची,हे आजच्या साहित्यिकांनी ठरवायला हवे.

किरण पवार,औरंगाबाद

सध्याच्या तरूणाईच साहित्य केवळं आपल्याला येतयं; एवढच मर्यादित नजरेतून पाहणं असं झालयं. मुळात साहित्याचा दुरवर बऱ्याचदा गंधही नसतो पण आपण टेंभा मात्रा अलगद लावून मिरवतो. साहित्याला अभिरूची असते, वेगळेपणातून उठावदारतेचा रंग असतो, अतिविशेषणांची बऱ्याचदा कादंबऱ्यातून जोड असते. मनातून भावलेलं न कल्पना करू शकलेलं जग उभं करण्याची ताकद ही साहित्यात असते. साहित्याला बऱ्याचदा व्याकरणात अडकवण्याचे प्रयत्न सध्या होतात पण बहिणाबाई चौधरी वा इतर लेखक घ्या त्यांनी जर कधी व्याकरणाचा विचार केला असता तर उत्कृष्ट कविता तयार झाल्या असत्या का...? प्रत्येक नवसाहित्यिक म्हणे, प्रेमापासून प्रवासास सुरूवात करतो पण मुळात सुरूवात मध्यापर्यंत आली तरूणाईला प्रेमचं विषय चघळायचा असतो. आज मराठी साहित्य सोडून इंग्रजी आणि हिंदी साहित्याचा जर विचार केला तर महत्वाचं असतं "प्रेम". हमखास चेतन भगतचं कौशल्य अपार आहे पण दरवेळी तो त्याचे उद्दिष्ट पोहोचवायला प्रेमाचा सहारा घेतो; याच कारण आपली प्रेमाप्रती असलेली अतिएकनिष्ठता. असे बरेच लेखकांची उदाहरणे देता येतील. पण आज मुळात मराठी साहित्य महाराष्ट्रातला तरूण खरचं किती उत्साहाणे वाचतो, हेदेखील विचारात घेणे महत्वाचे आहे. उत्तम कांबळेंच्या मनाला छेदून जाणाऱ्या लेखातली ताकद इतर कुठल्या गोष्टीत मिळते का...? साहित्य म्हणजे, अवघड काहीतरी खूप विचाराअंती लिहलं असं नाही. ते कागदावर योग्य स्वरूपात उतरलं जावं; हीच अपेक्षा असते.
महाराष्ट्रातील आपलीच तरूणाई आज इंग्लीश/हिंदी पुस्तके खरेदी करून आणि मराठी पुस्तके पी.डी.एफमधे वाचतात. वर सार्थ अभिमानही असतो. पण मुळात मराठी साहित्यानं जे "फिटे अंधाराचे जाळे", "नाच रे मोरा", "नटसम्राट", अशा विविधांगी साहित्याची सरं येते का इतर कुठे...? बऱ्याचवेळा साहित्यकार साहित्य लिहताना अनुभवानचा, तत्कालीन परिस्थितीचा, राजकीय हालचालींचा अशा प्रत्येक सूक्ष्म बाबींचा विचार करतो. थोडक्यात साहित्य छोट्याला रंगवून त्याची मैफील सजवून ते आपल्यापर्यंत पोहोचवतं. पण सध्या लिखाणात कुठेतरी ती भावना हरवत चालली आहे ते केवळ स्ट्रेट फॉरवर्ड मानसिकता होत चालल्यामुळे. त्यामुळे साहित्यात नेमका कोणता खास ठसा आपण पुढच्या पिढीसाठी सोडून जाणार हा खरचं एक मोठा प्रश्नयं. मृत्यूंजयातलं वा युगंधरेतलं (युगंधरा- डॉ.सुमित्री क्षेत्रमाडे) पात्र रंगवायला साहित्यकाराचं खर कसबचं लागतं.

राजश्री ठाकूर , मुंबई .

Image result for stoned age CAVES PAINTINGS
बुद्धी व मन यांना चालना देऊन कृतीत परावर्तित होण्याची निकड भासाविणारे साहित्य म्हणजे
' साहित्य ' अशी साहित्याची  सर्वसाधारण व्याख्या होऊ शकते.
अश्मयुगीन गुंफेतील चित्रांपासून ते फेसबुक पोस्ट , स्टेटस अपडेट पर्यंत सगळ्याचा समावेश साहित्यात होऊ शकतो.    आदिमानवाने फक्त साहित्यनिर्मिती कडे ध्यान दिले .. पुढली पिढी , हस्तातंरीत करणे वगैरे प्रकार नाही , जंगलातल्या झऱ्यासारखे . त्या साहित्याला वहात रहाणे ठाऊक . प्राशन कुणी करेल अथवा नाही याबद्दल सुतरामही चिंता न करणारे .
त्यापुढे लिपी आली , समूहाने राहणारे आले त्याबरोबर सहवासाने येणारी समूह निष्ठा आली , हावभावावरून एकमेकांना जोखणे आले म्हणून मग माझं ते चांगलं हि भावना असलेली माणसे , उत्तम कृती करण्यास माणसे कटिबद्ध होऊ लागली असतील . माझ्या उत्तम कृतीचा भावनिक लाभ माझ्या समूहातील व्यक्तींना व्हावा असे प्रकर्षाने वाटू लागले असेल , कधीतरी दोन समुहांच्या आदान प्रदानात स्पर्धेचा उगम झालेत आणि झऱ्याचे , ' माठ ' झाले .
हे असे झाले हे आजच्या पिढीतल्या आपल्याला कसे बरे कळले ? आजवरच्या साहित्यावरून .
मौखिक भिंत , जमीन , भूर्जपत्रे , कागद ते स्क्रीन आणि पुढे कदाचित स्क्रीनलेस अशा वाहनाने त्या त्या काळातील साहित्याच्या भोयांनी हे आनंदाने वाहून आज आपल्या कराग्रांवर आणून दिले आहे . त्याबद्दल त्या अनंत वाहकांना आदर व कृतज्ञता .
याच पालखीचा पुढला मार्ग पाऊलभारासाठी आपल्या स्कंधांवर आहे , काय हस्तांतरित करू आपण  पुढल्या पिढीला ?
रद्दी की संपदा ? माहिती की ज्ञान ? जाळे की सोपान ? अंधार की कवडसे ?
मला वाटतं आपण पुढल्या पिढीला साहित्यातून निवडण्याचे स्वातंत्र्य देणार आहोत . आपण नसतांनाही सांगणार आहोत त्यांना .. ' विपुल आहे , आपल्या कलाने वेचा ' हे महान , हे निषिद्ध अशी कुठलीच लेबलं न लावता  मोठ्ठ्या लायब्ररीज तुमच्या अंगुळीवर आहेत , नजरेच्या कक्षात , तिथून मेंदूमध्ये काय रुजवावे हे ठरवा .
' आहे ' ' मला मिळू शकत ' हा दिलासा आपण देतोय पुढल्या पिढीला . त्यात आपली जी काही गंगाजळी आहे ती ओतुया .. हि दिंडी जल्लोषात निघू दे , काळाची आणि पिढ्यांच्या कौतुकाची तमा न बाळगता ..

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.

विषयाला हात घालताना डोक्यात विचार होता तो म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्या पिढीसाठी काय दिले तर त्यामध्ये बरंच काही आहे संस्कृती, तंत्रज्ञान, साहित्य ई.

असो आता वेळ येते ती आपल्या येणाऱ्या पिढीला अपल्याकडून काय अपेक्षित असेल त्याची. तर मला वाटते जस आपण आजवर जे काही वाचून विचार करण्याची क्षमता मिळवली हे असाच काहीसं साहित्य येणाऱ्या पिढीला द्यायला हवं कारण याच्या बळावरच उद्याचा सामाज टिकणार की तुटनार हेही अवलंबून आहे.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************