राजकारण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकारण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण..



करिश्मा डोंगरे,पंढरपूर

           जाती कशाला उकरून काढता.गुन्हा हा गुन्हाच असतो.आणि गुन्हेगार कोणत्याही जातीचा असला तरी तो गुन्हेगारच असतो.असले भंपक युक्तीवाद करणार्या,वरून सात्वीकतेचे भजन आणि आतुन जातीच्या वर्चस्वाचा तमाशा करतात.उच्चवर्णिय पुरूषी मानसिकतेमुळे दलित स्रीचा शरीराचे लचके तोडण्याची वृत्ती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.जातीच्या विखारातून कोवळया कळ्यांना चुरगळनारा कुसंस्कृतीच्या कणाकणात भरला आहे.पीडितेचा जबाब नेहमी दाबला जातो.परंपरेने चालत आलेले आरोपींना जातिनिहाय संरक्षण.अत्याचार झालाच नाही,असे सांगण्यासाठी प्रशासनाचा वापर केला जातो.धडक पोलिस पुरावेच नष्ट करतात,हे कसले मोठे राजकारण म्हणावे लागेल.माध्यमानांही त्यांच्यापर्यंत पोहचू देत नाहीत,याला काय म्हनायचं?यामुळेच त्यांची नियत सिद्ध होतेय.

         आईसोबत गवत काढण्यासाठी गेलेल्या मुलीची कसली कपडे असतील ओ?आणि त्यांना धड जेवनाचा रोज प्रश्न पडत असेल,तिच्याजवळ कसला आलाय मोबाईल?उगीच मनाच बडबडून मुलींना दोषी नका ठरवू.ती साधी सरळ मुलगी तिने कोणाच काय वाईट केले.एवढी कसली जातीयता आणि राजकारण?

             कधीही असले करण्याअगोदर किंवा वाईट नजरेने बघान्याचं धाडस नाही झाले पाहीजे,असे प्रशासन हवं आहे की,डायरेक्ट निकालचं लागला पाहीजे.खाकी वर्दितल्यांनी पकडायचं नाही किवा तारखेवर तारीख मिळन्याची वाट न बघता,त्यांच वरचं तिकीट काढले पाहीजे.आपल्या घरातील स्रीयांना हेच शिकवा की, एखाद्याच तोंड कसे फोडायचे आणि हात पाय कसे मोडायचे.गरिबाची मुलगी असो किवा मुख्यमंत्र्याची मुलगी ही मुलगीच असते.स्वत:च्या घरातली मुलगी रडताना कसे लगेच वाईट वाटते,तसेच दुसर्यांच्या मुली काय रस्तावर पडलेत काय?रडत बसायला.जात बघून मानसाचं जनावरं बनू नका.माणुसकी हाच आपला धर्म आहे.आमच्या हातात कोणी मेणबत्या दिल्या तेव्हाच तलवार दिली असती तर,आज तोंड वर करून कोणी बघितले पण नसते.


वृषाली वाघ,मुंबई 

आपल्या भारतात बलात्कार हे काय नवीन कृत्य नाहीये.... अनेक वर्ष हे असले क्रूर कृत्य होत आहेत....रोज बातम्यात एक न एक तरी असली बातमी असते परंतु आपणच त्याला दुर्लक्ष करतो.... जो पर्यन्त पीडित व्यक्ति (मुलगी किंवा मुलगा) सोबत  काही राक्षसा ने केल्या प्रमाणे कृत्य होत नाही किंवा राजकिय नेत्यांना, पक्षांना त्याचा काही लाभ नाही भेटत तो पर्यन्त ना न्यूज मीडिया ना सोशल मीडिया मध्ये त्याचा विषय येत.... 

आपल्या सारख्या सर्व सामान्य लोकांचा कानावर आपल्या ओळखी मधील अशी एखादी बातमी सहजासहजी ऐकला नाही भेटत कारण मिडल क्लास वर्ग  कधी ही कोर्ट किवा पोलिस ठाण्यात जाऊ इच्छित नाही.... ह्याला देखील कारण आहे आपल्या देशात ला राजकारण आहे... कारण कधी एखादी घटना गंभीरतेने लक्ष ओढून घेत असल तर... राजकीय लोक पीड़ित व्यक्ति चा घरी जाऊन फोटो काढून मोकळे होतात...... त्या घटनेचा 4 - 5 वर्षात निर्णय (कोर्टात) लाऊन विसरून जातात...... परत अशी गंभीर घटना होऊ पर्यन्त ....

एखाद्या घटनेचा बोध घेऊन सरकारने, राजकिय पक्षाने, मीडियाने पुढाकार घेऊन लक्ष देऊन जर काम केल आणि  एखादा गंभीर कायदा (न्यायालयात) बनवला तर अशे कृत्य करणार्‍याना, करायचा आधी हजारो वेळा विचार करावा लागेल.....

आणि आपन आपल्या जाग्या वर राहून आपल्या पुढचा पीढ़ी ला,  समोरचा व्यक्ति ची मदत आणि इज्जत करायची शिकवण दिली तरी देशात असल्या घटना कमी होतील.... 


अनघा नंदाने

दिवस पहिला: अरे बातम्या पाहिल्या का? खूप वाईट झालं बिचाऱ्या त्या मुलीसोबत. 

दिवस दुसरा: काय चाललय काय आपल्या देशांत? तिची बाँडी परस्परच जाळली पोलिसांनी. हे पोलिस गुंड झालेत. आता कुठे गेली मिडिया, कुठे गेले विरोधी पक्ष? 

दिवस तिसरा: काय नौटंकी चाललीये देशांत.... ती ABP वाली आणि तो पप्पू.... नुसता पब्लिसिटी साठी चाललाय हा खेळ...

दिवस चौथा: काय राव चार दिवस झाले तेच तेच, मस्त पिक्चर लाव एखादा... बोअर झालंय, तेच तेच 


असंच होतं ना? 

तिसऱ्या दिवशी राख थंड झाली कि आपणही थंड होतो. आपापल्या कामाला लागतो. 


पण तुम्हाला एक लक्षात येतय का? या संपूर्ण चार दिवसांच्या संभाषणांत बहुतेक लोकांनी, पोलीस, मिडिया, काँग्रेस, यांच्यावरच चर्चा जास्त केली. जणूकाही सत्ता "काँग्रेसची" आहे. यांत खूप कमी लोकांनी "मुख्यमंत्री योगी" कुठे आहेत हा प्रश्न विचारला आणि मोदींना तर लोक विसरलेच. लोकांच्या लक्षातच आलं नाही, येत नाही, किंवा आणून दिल्या जात नाही कि आता गेली 6 वर्षे सत्तापक्ष बदलला आहे. वर्तमान पंतप्रधानांनी संपूर्ण घटनेवर एक वाक्य उच्चारलेलं नसताना, आपण पूर्व प्रधानमंत्री कसे मुके होते याच्या अजूनही चवीने चर्चा करतो आहे. 


आपण सरकार चं उत्तरदायित्वच विसरलो आहोत. ज्याप्रमाणे वर्तमान सरकार अजूनही "विरोधी पक्षाच्या" भूमिकेतून बाहेर आलं नाही, तसंच आपणही आपल्या डोळ्यातला "सत्ताधारी" पक्ष बदललेला नाही. 


प्रजासत्तेतला "राजाच" स्वतःची भूमिका, हक्क, जबाबदाऱ्या विसरला असतांना, त्याने निवडून दिलेल्या "नौकरांकडंनं" काय अपेक्षा ठेवणार? 130 कोटी राजांच्या राज्यांत, 1 एका राजकुमारीवर "बलात्कार" होतो, तेव्हा राजे आपापसांत लढत बसतात, शाब्दिक चकमकी रंगतात, कुणी निवडून दिलेला नोकर चांगला आहे हे सिद्ध करायला! मग नोकर मनमानी करणार नाही, घाणेरडं राजकारण करणार नाही तर काय करतील? 

राजांना कळायला हवं, कुणाचेही असले तरी ते नोकर आहेत, आणि ते नीट काम करत नसतील तर त्यांना जाब विचारणं, प्रत्येक राजाचं काम आहे आणि हक्क आहे. 


राजकारण घाणेरडं झालं आहे. वादचं नाही. झालंच आहे. पण पुढे काय? उपाय का? हे शोधायला हवं. आपल्याला माहिती असतं, सरकारचं चुकलं आहे पण आपण नेहमी मुख्यतः दोन भूमिका घेतो, एक, जाऊदे, आपल्याला काय करायचं आहे? आणि दुसरी, सगळे तसेच असतात... 

या दोन मतांमुळे आपण "नागरिक" होऊन सरकारला कधी प्रश्नच विचारत नाही. प्रजासत्तेत राहून राजसत्तेचं गुणगान गांत राहतो आणि कुणी "हिरो" आपल्याला वाचवायला येण्याची वाप बघत बसतो. चांगल्या राजंच्या राज्यात, प्रजा आपले हक्क आणि कर्तव्य कधीच विसरायची नाही आणि विसरली तर चांगले राजे प्रजेला त्याची जाणीव करून द्यायचे. "खबरदार जर टाच मारूनी याल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या" किंवा "राजा, माझा 1 रुपया अजूनही परत का नाही मिळाला?" असे प्रश्न शिवाजी महाराजांना सुद्धा रयतेनं विचारलेच. मग आता आपलीच सत्ता असताना आपण आपल्या सेवकांना प्रश्न विचारायला का घाबरतो? का गरज नसताना त्यांचं गुणगान करतो? या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधली पाहिजेत. 


आपल्या पुर्वजांनी चांगले मावळे बनून दाखवलं, आपण चांगले "नागरिक" बनू शकू का हे आपण आपलं बघायला हवं.



प्रतिक्षा बुध्दे,गडचिरोली 

कुण्यातरी गावात कुण्यातरी मुलीवर अत्याचार झाला, 

लगेच लावली गेली जाती-धर्माची, राजकिय पक्षांची फिल्टरं त्याला!

'ती' असते कधी दोन दिवसांची तर कधी ऐंशी वर्षांची,

जी नाहक शिकार होते समाजातील राक्षसी सत्तेची 


पुर्वी बलात्कार झाले की छत्रपति छाटुन टाकायचे हात पाय त्या नराधमांचे भर चौकात... 

मग नराधमांचंच राज्य आलं ज्यात पिडितेच्या लुटलेल्या आब्रूचेच धिंडवडे काढतंय समाज.


कधी तिच्या कपड्यांची तर कधी उच्चशिक्षणाची चुक पटवुन देण्याची थेरं आरोपींच पक्ष करतंय

आम्हीच इथले तथाकथित राजे म्हणत आरोपींनाच संरक्षण देतंय


बाहेरचे लोक काय म्हणतील म्हणुन आधी

घरचेच तोंड दाबुन मुक्का मार द्यायचे

आज त्याहीपेक्षा वाईट झालीय परिस्थिती, कोर्टाची पायरी चढण्यासाठी ही वेळ आलीय लढण्याची.


तिथं न्यायासाठी ऊभं रहायला सुद्धा पूर्व पडताडणी केली जातेय, 

पिडिता अन् आरोपी दोघांच्याही जाती-धर्माची टेहाळणी होतेय.


विरोधी पक्ष लागतो लगेच कामाला, ओतुन टाकतो सगळी जिव्हाळी

आणि मग भडकली आग सामान्य माणसांत की भाजुन घेतो आपली राजकिय पोळी


कुणाचा राजिनामा मागितल्या जातं तर कुणावर फेकली जाते शाई

मात्र आरोंपीना लवकरच शिक्षा नक्की होईल अशी हमी कुणीच देत नाही


वर्षानुवर्षे ताटकळत बसावं लागतं मग झालेला अन्याय सिद्ध करायला

तेव्हा येतं लक्षात की वास्तवात कोणताच पक्ष नाही आहे आपल्या मदतीला


पिडीतेच्या घरच्यांनाही बेआब्रू व्हावचं लागतं, पोरगी गेली ती गेली पण पैसे कमावुन गेली असंही ऐकावं लागतं. 

कधी संपेल कुणास ठाऊक आपल्या समाजाचे अधःपतन बघवत नाही मला आता हे बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण…


चैतन्यकुमार देवकर,माळशिरस

खरंतर बलात्काराची घटना घडली.. असं ऐकलं तरी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला प्रचंड राग येतो. अशा नराधमांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी आपली तीव्र इच्छा असते. कधीकधी तर आपल्याला वाटतं की प्रियांका रेडी प्रकरणात जसं एन्काऊंटर करून आरोपींना ठार मारण्यात आलं ते योग्य होतं बऱ्याच वेळा अनेक अमानवीय शिक्षांकडेही आपण एक पर्याय म्हणून पाहतो.हेच बरोबर आहे असं मानायला लागतो तर दुसरीकडे बऱ्याच वेळा आरोपीं हेच गुन्हेगार आहेत असं सिद्ध होईपर्यंत तरी थांबायला हवं असा सूर निघतो. या दोन्ही चा  सुवर्णमध्य म्हणजे  फास्टट्रॅक अर्थात जलदगती न्यायालयांची व्यवस्था असणे ठरु शकते.आणि विशेषता बलात्कारासारख्या गंभीर होण्यासाठी तर असायलाच हवी. आता अगोदर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला या घटनांचा प्रचंड राग येतो यातून आपल्यामध्ये संवेदनशीलता असल्याचं दिसून येत. ते आपसूकच असतं. परंतु ती संवेदनशीलता ,ती तीव्र इच्छा  गुन्हेगारांप्रती राज्यकर्ते, अधिकारी यांच्यात कशी नसू शकेल?? केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तर ' इथिक्स' चा स्वतंत्र पेपर असतो. तरीदेखील हाथरस मध्ये घडलेल्या घटनेमध्ये जबाबदारीची पदे भूषवणारे अधिकारी असं बेजबाबदार आणि असंवेदनशील कसं काय वागू शकतात?? भलेही राज्यकर्त्यांनी त्यांना वेगळे निर्देश दिले असतील परंतु एक अधिकारी म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य करणं भाग होतं. आणि राज्यकर्ते त्यांनी तर... लोकांचं प्रतिनिधित्व करायचं असतं.. परंतु ते तर अगदीच बेजबाबदार वागले उलटपक्षी गुन्हेगारांना पाठीशी घालू लागले ...  आपला  विषय आहे , बलात्कार आणि त्यावरील घाणेरडे राजकारण. मला वाटतं की, कोणतीही गोष्ट राजकारणापासून अलिप्त राहणं तसं अवघडच .. पण त्याच्या माध्यमातून संवेदनशीलतेचं दर्शन घडणं , आणि न्यायासाठी , सत्यासाठी पराकाष्ठा करणारे नेते , राजकारणी असणं , तयार होणं...हे फार आशादायी चित्र असतं…


क्षितीज गिरी,सातारा

     काही जण म्हणतात बलात्कार हा बलात्कार असतो त्यामध्ये तुम्ही जातीचा धर्माचा विषय का  आणता आरोपी कोणीही असू दे त्याला शिक्षा झाली पाहिजे.पण  निर्भया प्रकरणामध्ये झालेला बलात्कार आणि  खैरलांजी , हातसर  मध्ये झालेला बलात्कार यामध्ये तसा खूप फरक आहे.तुम्ही म्हणाल तसे कसे. बलात्कार तर शेवटी बलात्कार असतो.पण माझ्या मते कोणताही बलात्कार करणाऱ्या आरोपीचा उद्धेश हा खूप महत्त्वाचा असतो.निर्भयाच्या प्रकरणात तो फक्त सेक्स हाच होता.पण सगळी कडे तो सारखाच असेल असे नाही.आणि तसा तो नसतो पण ...

             हातसर च्या घटनेकडे पाहू. ठाकूर आणि वाल्मिकी समुदायाच्या वादातून हा बलात्कार झाला आहे.तो पण खुले आम धमकी देऊन.संदीप ठाकूर यातला मुख्य आरोपी.6 महिने आदोगर ठाकुरानी  धमकी दिली होती.तेव्हा पासून मनीषा वाल्मिकी कोठे घरा बाहेर पडली नव्हती.पण त्या  दिवशी म्हणजे 14 सप्टेंबरला ती तिची आई गवत आणण्यासाठी रानात गेले.गवत कापणे चालू होतो.मनीषा बाजूला बसली होती तिची आई गवात कापता कापता थोडी  लांब निघून गेली.अश्या वेळी  सरेआम तिची आई तिच्या बरोबर असताना. मुली ला उचलून संदीप आणि त्याच्या मित्रांनी  तिच्यावर बलात्कार केला.आई ला ऐकू कमी येत होते .त्यामुळे मनीषचा आवाज ती ऐकू शकली नाही. बलात्कार करून झाल्यावर ती कुठे बोलू नये म्हणून तिची जीभ कापली. मानेची हाडे मोडली.शेवटी 29 सप्टेंबरला सकाळी 5 वाजता तडफडून तिला मरण आले.14 ते 29 तारखे पर्यंत तिच्यावर दवाखान्यात उपचार पण नीट झाले नाहीत.याच्या आगोदर पण तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला होता.

त्याच्यानंतर  आसपासच्या 12  गावातल्यांनी  त्यामध्ये ठाकूर आणि ब्राम्हण यांनी गुपचूप पंचायत लाऊन आरोपीचा साथ देणे आणि गावामधे कुणाला घुसून न देणे असा निर्णय घेतला.डॉक्टरांनी पोलिसांनी  मुख्यमंत्र्यांनी आरोपीच्या बाजून  साथ दिली.कारण आरोपी ठाकूर होता.योगी आदित्यनाथ बोलले आरोपीची आणि मनिष्याच्या घरातल्यांची  नार्को  टेस्ट करा.कारण सगळे अधिकारी यांचेच.डॉक्टररांचा रिपोर्ट पण चुकीचा दिला गेला.आपल्या मुलीला शेवटी जाळण्याचा अधिकार पण दिला जात नाही.लावारिस लाश जाळावी तसे जाळले जाते तिला.आणि नंतर बोलले जाते बलात्कार झालाय नाही.आमच्यावर खोटं आरोप केला जातोय.

आज पूर्ण कुटुंब दहशतीखाली राहत , वावरत आहे.त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मनीषा वाल्मिकी सारख्या भरपूर घटना  भारतामध्ये घडतात.त्यातल्या काहीच घटना प्रकशाझोतात आणल्या जातात.पण दुर्दुव त्यांना पण लोकशाही मार्गाने संघर्ष करून नीट न्याय भेटीत नाही.म्हणून बाबासाहेब नेहमी सामाजिक न्यायासाठी संघर्ष करायला सांगत.

 माझ्या मते या घटनांकडे पाहताना फक्त बलात्कार म्हणून पाहणे चुकीचे आहे.जसे निर्भया कडे पाहतो तसे.हा तर जातीय द्वेष भावनेतून केलेला बलात्कार आहे.जसा खैरलांजी मध्ये घडला.न्याय मागता मागता भोतमांगे परिवार संपला पण न्याय???

या आरोपींना फाशी मिळाली पाहिजे पण ते वाटते इवढे सोपे नाही.सगळी न्याय  व्यावस्था आरोपीच्या  बाजूने खंभिरपणे उभी आहे. पण शेवटी दिली तरी फाशी देऊन फक्त न्याय भेटेल पण सामाजिक न्याय ? 

आज एक संदीप गेला तरी उद्या हजारो लाखो संदीप तयार होतील.कदाचित झालेही असतील.

जोपर्यंत लोकांची या जतिव्यवस्थेकडे  बघण्याची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे असले जातीय द्वेषातून बलात्कार होतच राहतील.उत्तर प्रदेश सारख्या राज्यात अजुन पण अस्पृश्यता पाळली जाते.

यावर उपाय म्हणजे  समानतेच्या विचार करणाऱ्या प्रत्येकाने आता एकत्र येऊन या ना त्या मार्गाने या व्यवस्थे विरुद्ध लढले पाहिजे.कारण उद्या यामध्ये कदाचित तुमची पण मुलगी असू शकते.

जातीच्या राजकारणाचे परिणाम

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
📄 *आठवडा 7⃣4⃣वा* 📝
🖊🖋✒🖌🖍✏🖋✒✍📖


जातीच्या राजकारणाचे परिणाम

शिरीष उमरे यवतमाळ

ही जात आली कुठुन हे माहीत नाही पण दोन हजार वर्षीपुर्वी व्यक्तीला त्याच्या व्यवसाय व गावावरुन ओळखल्या जायचे. त्याचा काही धुर्त लोकांनी गैरफायदा घेत मानवीय उतरंड तयार केली व मानवी हक्क हीरावुन घ्यायला सुरुवात केली. एकदुसऱ्यात गैरसमज निर्माण करुन राग व द्वेषाची बीजे पेरली. सत्तेसाठी कुठल्याही थरावर जाणारी ही लोके म्हणजे आजकालच्या भ्रष्टाचारी गुन्हेगार राजकारण्यांची पुर्वजे....

 जातीच्या अयोग्य व्यक्तीला मत देणे म्हणजे स्वत:ला समाजात असुरक्षित वाटणे होय !!  सरकार कींवा राजकीय पक्ष नागरिकांमधे  ही असुरक्षितता वाढवुन स्वत:च्या स्वार्थाच्या भाकऱ्या  द्वेषाच्या व रागाच्या आगीत शेकुन घेत आहेत.

 एक नागरिक म्हणुन कवडीची कीमंत नाही आहे व्यक्तीला. पैसा व बाहुबल ह्याच्या जोरावर बहुसंख्यंकाना जातपात धर्मामधे गुंतवुन भांडणे लावुन ही गिधाडे मजा घेतात ह्या खेळाची...

एक इतर धर्मिय वा दुसऱ्या जातीचा चांगला उमेदवार निवडुन दिला तर विकास होइल की एक गुन्हेगार, भ्रष्ट स्वजातीचा व्यक्ती विकास घडवेल ??

 एकदुसऱ्यावरचा विश्वास का व कोणामुळे उडाला हे जाणुन घेणे गरजेचे आहे. एक देश म्हणुन विकास करायचा असेल ल संविधानानुसार स्वच्छ राज्यकारभार चालावा असे वाटत असेल तर चांगला स्वच्छ प्रतिमेचा सुशिक्षीत चारीत्रवान युवक राजकारणात निवडुन द्या. जात पाहुन चुकीच्या व्यक्तीला मत दिल्यास स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घ्याल.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवुन दिले. त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी लोकशाहीत आपल्या सगळ्यांची आहे. विचार करुन मत द्या.
*=============================*

वाल्मीक फड निफाड,नाशिक.

जातीय राजकारणाचे अनेक तोटे आपण भोगत आलो आहोत.त्यामुळे आपण नेमके जो लायक उमेदवार असेल त्याला टाळून जात पाहून मतदान करत असतो.प्रसंगी त्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची राजकारणाबद्दल काहीही माहीत नसते,परंतु एक जातवाला म्हणून आपण त्याला मतदान करत असतो.
मला वाटतं आपण हे जर कायम करत राहिलो तर लवकरच आपला देश माघारी जायला वेळ लागणार नाही.जात म्हणून आपण एखाद्या मुर्ख माणूस किंवा एखादा गुंड माणूस निवडून दिला तर त्याचा परिणाम निच्छितच आपल्यावर म्हणजे पर्यायाने आपल्या देशातील व राज्यातील राजकारणावर होऊ शकतो.अनेक प्रकारच्या विकास कामे तसेच योग्य निर्णय न घेतल्यामुळे आपलेच नुकसान जास्त होणार आहे.
म्हणून जवळजवळ सर्वच मतदार बंधु आणी बघीनींना माझे विनम्र आवाहन आहे कि कोणत्याही प्रकारच्या जातीय प्रलोभन कींवा आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता आपल्या उमेदवाराचे अपराधीक रेकाॕर्ड तपासून त्याचे शिक्षण त्याची समाजाशी असलेली वागणूक आणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचे चरीञ.
काय आहे की एखाद्या पोपटासारखा बोलणारा असला की आपण त्याला भुलतो आणी मतदान करुन मोकळे होतो पण आपलीच अधोगती आपण करुन घेतो.म्हणून आता भुलथापा मारणारा,चरीञहीन असलेला,अशिक्षित असलेला,जाती धर्माच्या नावाने मतदान मागणारा एकही उमेदवार निवडून येता कामा नये.देशाच्या संंविधानाला न माननारा देशाविरुद्ध बोलणारा तसेच सत्तेवर येण्यासाठी देशाला तुच्छ समजून आमूक एका जातीला प्राधान्य देऊन इतर जातिंची धर्माची पायमल्ली करणारा उमेदवार नसावा.
शेवट एकच विणवणी एक योग्य उमेदवार निवडावा नाहीतर सरळ NOTA दाबून आपलं मत व्यक्त करावं.
*=============================*

गणेश नारायणराव फाळके,कामशेत. पुणे.

कसंय मंडळी..
राजकारणातच काय..कुठंही जातीभेद नसावा..सर्वसमावेशक राजकारण असावं या हेतूनं राजकारणात विविध जाती जमातीतल्या शिकल्या सवरलेल्या मंडळींना प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या..पण याचा फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होतोय असं चित्र सध्या तरी दिसतय.
ग्रामीण भागातील राजकीय क्षेत्रात सरपंच,उपसरपंच,सदस्य,
झेडपी सदस्य, सभापती, उपसभापती अशा अनेक जागांवर उमेदवार उभा करताना
जात बघीतली जाते..
बघूद्यात.. पण ही सगळीच मंडळी हुशार,राजकारणात तरबेज असतात असं नसतय..
फक्त जात बघून उमेदवार उभा असतोय.. त्या पदाचं ज्ञान कमी असतय.. मग अशावेळी आजूबाजूला मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी मंडळी आपापला फायदा करुन घेतात.. विधायक कामं बाजूला राहतात..लबाडी,भ्रष्टाचार आणि जातीचे राजकारण केलं जातं.. सामान्य माणसाला फुकटचा मनस्ताप होतो..

राजकीय क्षेत्रात जातीवाद नसावा असं म्हणनं नाही..कारण सर्व क्षेत्रात संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलाय..कुणी कुठल्याही जातीत वा धर्मात जन्माला येवो..त्याला सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याची मुभा आहे..तशी ती राजकीय क्षेत्रातही आहेच..पण किमान तो माणूस लायक असावा.. त्याला सामाजिक व राजकीय जाण व भान असावं..म्हणजे झालं.
*=============================*

जगताप रामकिशन शारदा,बीड

जातीच्या राजकारणाचे दुष्परिणाम असतात ते फक्त परिणाम नसतात. मग ते विविधांगी असतात. सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक ही. प्रत्येकाने आप आपली जात जपली पाहिजे कारण त्याला सांस्कृतिक, सामाजिक विविधतेची किनार असते पण सध्याच्या परिस्थितीत जात ही दुधारी तलवारी सारखी वापरली जात आहे. माणूस नावाची जात तर कधीच हद्दपार झाली असून विविध प्रकारच्या आणि सोयीस्कर जाती जन्माला आलेल्या आहेत. सर्वधर्मसमभाव समजावून घेतानाही इतर जातींना कस प्राधान्य किंवा स्वजातीला कस दुर्लक्षित केले जाते पटवून सांगताना जी उदाहरण दिली जातात तिथून खर जातीच गलिच्छ राजकारण चालू होते. पुढे चालून गेल्यावर लक्षात येते की जातीच्या नावाने रंग विभागून घेतलेले आहेत आणि जातीच्या नावावरून फळांची पण विभागणी माणसान केली आहे. आपला सुधारणेचा अजेंडा का सपशेल अपयशी ठरला किंवा आपण समाजासाठी का योगदान देऊ शकलो नाही याची प्रांजळ कबुली देण्यापेक्षा आपण काही विशिष्ट जातीत असल्यामुळे डावलले गेलो हा मुद्दा प्रखर आणि ठळकपणे मांडला जातो. विविध मतदार संघातील उमेदवार जाहीर करतानाही जातीय समिकरणे जुळतात का? याचा आढावा घेतला जातो. आणि मतदारही जात नावाच्या अफुच्या नशेत उमेदवार किती पात्रतेचा आहे हे न पाहता त्याला डोळेझाकून मत देतात. कितीही पुरोगामी विचारांचा दाखला दिला तरीही सुरवात करायला नेहमीच इतरांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा तळागाळापर्यंत रूजलेली आहे. निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जात धर्माच्या नावावर मत मागितली जाऊ नये यासाठी प्रयत्नशील असतानादेखील सत्ता काळात किंवा विरोधी पक्षाच्या कार्यपद्धतीत कसा कोणाकोणावर अन्याय झाला किंवा कसा फक्त विशिष्ट वर्गाला फायदा झाला याचे उदाहरण देऊन देऊन जनतेच्या मनावर जात बिंबवली जाते. जाती निर्मूलन साठी प्रयत्न केले जात नाहीत अशातला भाग नाही पण ते कितपत यशस्वी होताहेत हे परिक्षण कोणीही करत नाही. अलिकडील गोष्ट आहे भिमा कोरेगाव चा जो हिंसाचार झाला त्यावेळी सोशलमेडियावर एका लहान मुलाचा हातात दगड घेतलेला व्हिडिओ व्हारल झाला ज्याला अजून लेखणी कशी धरावी याच ज्ञान नसाव पण तो इतर जातींच्या लोकांबद्दल ज्या तिरस्कार भावनेने बोलत होता ती तिरस्काराची भावना नक्कीच विचार करायला लावून शर्मेने मान खाली घालायला लावणारी होती. जात कधीपर्यंत टिकेल माहिती नाही पण जो पर्यंत राजकारण राहील तोपर्यंत जात नावाचा बागुलबुवा समाजामध्ये राहणार कारण जात हे असे बटण आहे की ते दाबले कि लोकांना दोन वेळच्या जेवणाचाही विसर पडतो आणि ते जातीच्या भल्यासाठी समोर येतात, समाजाच्या नाही. महापुरुषांच्या नावाखाली पण जातीचा जोगवा फिरवून मत मागायला ही राजकारणी कमी करत नाहीत. लाजीरवाणी बाब ही आहे की सोशलमेडियावर फिरणारे भडकावू मेसेज वाचून तरुणपिढी आपल मत बनवत आहे आणि राजकीय नेते पण समाजासाठी महापुरुषांच्या असणाऱ्या विचारात सोयीस्कर तफावत असंदर्भीय माहिती देऊन आपली पोळी भाजत आहेत. कितीही विद्रोह झाला तरीही जात नावाची किड पुन्हा रूजवण्याच आणि तिला खतपाणी घालण्याच काम राजकारणी करतच आहेत. मग जिथे विठ्ठलाच्या वारीचा झेंडा घेणारा हातात फक्त दांडा घेऊन फोडत राहतो इतरांचे माथे आणि आख्ख्य कुटुंब जे त्याच्या उपजिविकेवर चालते ते टाहो फोडत असते. घरातील सदस्य आपल लेकरू अस करणारच नाही अस ठामपणे सांगत राहत पण त्यांना काय माहिती की ते लेकरु कोणत्यातरी साहेबांच्या आदेशानुसार काम करणार सांगकाम्या बनल असून घरात वाट पाहणाऱ्या लोकांपेक्षाही त्याला साहेब आपला वाटू लागला आहे कारण तो अमक्या जातीचा आहे.
*============================*

मुकुंद शिंदे

जोपर्यंत निळ्या विरुद्ध भगवा न भगव्या विरुद्ध हिरवा याच्या पलीकडे आपण जाणार नाहीत तोपर्यंत तिरंगा आपल्याला कळणार च नाही,आणि यानेच फावताय राजकारण.
राजकारण हा शब्द नवा नाही पण आज काल "राज" करायचं कारण च समजून घेतलं नाही आणि यात येत ते जातीचे राजकारण आरक्षण,थोर पुरुषांचे पुतळे,त्यांच्या जयंत्या आणखी खूप कारण हे यांना जातीचे राजकारण करायला पुरेसे पडतात.कोणता मुद्धा तापला असला की तो किती तापवायचा हे राजकारणी ठरवतात आणि आणि आपण फक्त हातात वेगवेगळे झेंडे घेऊन भिडतोय एकमेकाला.एका टोकाला एखाद्या जातीच्या माणसाला काय झालं की दुसऱ्या टोकापर्यंत ती आग पसरत जाते यात होरपळतात ती सामान्य जन आनि यावर पोळी भाजतात ते राजकारणी.जेव्हा मुंबई बॉम्बस्फोट झाले तेव्हा भारतामध्ये एकूण वातावरण खूप बिघडलं होत,पुण्यात त्यावेळी सवाई गंधर्व कार्यक्रम घ्यायचा का नाही त्याचा विचार चालला होता आणि पहिली जुगलबंदी होती झाकीर हुसेन यांची पण,कार्यक्रमात जेव्हा झाकीर हुसेन म्हणाले की मी जो तबला वाजवतो तो माँ सरस्वती की देणं हे तितच जात संपली.आपण जर एकमेकांच्या जातींचा आदर केला तर राजकारणाचा प्रश्न च उरणार नाही.
जातीचा अभिमान असावा पण अहंकार नसावा तरच भारत खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव होईल नुसता कागदावरचा समभाव मनामना मध्ये रुजला पाहिजे.
*=============================*

आकाश थिटे, उपळाई  (खुर्द ).

           आपला भारत देश हा लोकशाही असलेला देश आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले सरकार होय .  आपल्या देशात लोकसभा व राज्यसभा यांमार्फत राजकीय पक्ष, राजकीय नेते संघराज्य पद्धतीने शासन चालवले जात आहे.
राजकारण हे देशाच्या विकासासाठी, देशातील जनतेसाठी, व्हायला पाहिज, परंतु आजच्या राजकारणाचे स्वरूप खूपच बदलून गेले आहे. आजचे राजकारण हे जातीयता, धर्म, भ्रष्टाचार, अशा मुद्यावर चालते. याचे जे काही परिणाम होतात ते पुढीलप्रमाणे आहेत;
   ज्या वेळेस जातीचे राजकारण होते तेव्हा होणारे परिणाम हे देशाच्या विकासासाठी मारक ठरतात. यामुळे देशाची प्रगती खुंटली जाते.देशाची प्रगती खुंटणे म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकांची प्रगती थांबणे असे आहे. याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.
जातीच्या राजकारणाने जाती-जातीत तेढ निर्माण होऊन नंतर त्याचे रूपांतर दंगल,हल्ले, यात होऊन मोठी हानी होते. यामध्ये जास्तीत जास्त होणारा त्रास हा सर्व सामान्य जनतेलाच सोसावा लागतो. याविरुद्ध जनतेने आवाज उठवला पाहिजे व लोकशाही च्या माध्यमातून अशा  राजकारणारण्यांना धडा शिकवला पाहिजे.
  राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्रही नसतो व शत्रूही नसतो. याचा वापर करूनही जातीचे राजकारण केले जाते. राजकारणी लोक आपल्या विरोधीपक्ष यांवर टीका टिप्पणी करून आपली बाजू योग्य आहे हे जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. अशा गोष्टींचा उपयोग करून त्यांना कसेबसे सत्ता मिळवाची असते. त्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता फसते.
    अशा जातीच्या राजकारणात  मोठ्या प्रमाणात आपल्या देशाच्या युवाशक्ती चा र्हास होतो. ही शक्ती देशाच्या विकासासाठीच्या कार्यात वापरता येते.
        समाजात होणाऱ्या अशा जातीचे राजकारण, तसेच जातीविषयक काही गोष्टी जेव्हा लहान बालकांच्या कानी पडतात तेव्हा त्यांच्या मनात जातीबद्दल विचार येतात आणि जेव्हा हीच बालके मोठी होऊन देशाचे नागरिक होतात तेव्हा यांच्या कडून जातीच्या राजकारणाला हातभार लागला जातो. तर यावरून असे वाटते की आज असे जातीचे राजकारण करणारे राजकारणी लोक आपल्या देशाच्या पुढच्या काही पिढ्यानपिढ्या या जातीयतीच्या संघर्षा खाईत ढकलून देण्याचे काम करत आहेत.

आणि या सर्व गोष्टींत आपल्याला व कोणालाही काहीच साध्य होत नाही परंतु प्रत्येकाचा बहुमोलाचा, परत न येणारा, विकतही न मिळणारा वेळ मात्र नक्की वाया जातो.
   समाजातील लोक शिकले, सुशिक्षित झाले तरीही "जात" या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते.सर्वांनी याचा विचार करायला हवा.
सर्व जाती नष्ट करून "मानव- माणूस "हीच एक जात मानली पाहिजे.
*=============================*
*Image source INTERNET*

गोंधळलेली जनता व राजकारण

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 7⃣0⃣वा 📝 
🖊🖋✒🖌🖍✏🖋✒✍📖
 10 मार्च 2019  ते  16 मार्च 2019

गोंधळलेली जनता व राजकारण




सिताराम पवार,पंढरपूर

            लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते. पण कधी कधी जनताच चुकीच्या लोकांना निवडून देते त्यामुळे डोकं सुन्न होत.त्याला कारणही तशीच असू शकतात. काही लोक पैशाचा वापर, धाक दाखवून, किंवा सक्षम स्पर्धक नसल्यामुळे निवडून येतात.सध्या मात्र खूपच सामाजिक गोंधळ निर्माण झाला आहे.समाजसुधारकानी जीवच रान करून सामाजिक सुधारणेची पायाभरणी केली पण खलील कारणांमुळे सामाजिक एकोप्याला सुरुंग लागत आहे.
1. वाढताजातीअभिमान
2. जातीवर आधारित आरक्षण व त्यामुळे जातीवर आधारित संघटना स्थापन
3. सार्वजनिक हितासाठी आपल्यातला 'मी'पणा न सोडण्याची मानसिकता.
4. सत्ताधारी विरोधात बोललं की लागेचंच विरोधी पक्षाचाच आहेस अस मानण्याची वाढलेली वृत्ती.
5. महापुरुषांच्या विचारांचा केलेला रिंडगुड.
सध्या जनता स्वतःलादोन विचारातच गुंफू पाहती आहे आणि त्यात तटस्थ लोकांनाही ओढते आहे.
सध्या राजकारणावरील गोधळ खूप हीन पातळीवर गेला आहे.आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वसा यशवंतरावानी दिला आजचे महाराष्ट्रातील राजकारणही  गोंधळलेल्या विचारांत सापडले आहे.कळतच नाही कोणता पक्ष व राजकारणी तत्वानुसार वागतोय. कुणाचा मुलगा एका पक्षाचा खासदार तर सून दुसऱ्याच पक्षाच्या पाठींब्यावर जि. प. अध्यक्ष, तर पुतण्या तिसरीच पक्षाचा आमदार. नवल या गोष्टीच आहे की तत्व, विचार यासाठी सत्तेवर न  लाथ मारता सत्तेसाठी नव्हे तर जाणून बुजून सत्ता आपल्याच घरात प्रस्तापित लोकांनाच मिळावी म्हणून राजकारण्यांनी सामाजिक तत्वे धुळीस मिळवली आहेत.विशेष म्हणजे ही लोकं सामाजिक विषमतेच्या वाढीस पूरक भूमिका घेतात. आशा आहे गोंधळलेल्या राजकारण्यांना गोंधळलेली जनताच गोंधळ( मत)  घालून ताळ्यावर आणील.
*==============================*

संगीता देशमुख,वसमत

             आजकाल सोशल मिडियामुळे लोकांचा एवढा गोंधळ उडत आहे की,काय खरं,काय खोटं याचा ताळमेळ कोणालाच नाही. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापरच जास्त होतो आहे. कुठलेही फोटो,विडिओ एडिट करून आपल्यापर्यंत पोहचत आहेत. आता जेव्हा एअर स्ट्राइक झाला तेव्हा त्याचा लाइव्ह विडिओ व्हायरल झाला. तोच अनेक सुशिक्षितानी अजून पुढे पाठवला. बारकाईने पाहिल्यावर त्यावरची वेळ पाहून कळाले हा विडिओ फेक आहे. तसेच राजकीत क्षेत्राबद्दल सुध्दा घडत आहे. मूळ  विडीओ वेगळाच असतो त्यावरचा आवाज वेगळाच असतो. पण सामान्य म्हणण्यापेक्षा आपल्यासारख्या उच्चशिक्षित लोकांचाही काय खरे आणि काय खरे कळत नाही तेव्हा अतिसाधारण शिकलेल्या लोकांचा गोंधळ उडत असेल? जो तो आपापल्या सोयीनुसार पोस्ट तयार करून टाकतात. त्यात मोठ्या दिग्गजांची नावे टाकून तो पसरवतात. विकास आमटे,विश्वास नांगरे यांच्या नावाने ते पाठवलेली असल्याने लोकांचा त्यावर विश्वास असतो. त्यातून अनेकदा चुकीचीही माहिती पसरविल्या जाते. अनेकदा देवाच्या पोस्ट पाठविणे,त्या इतरांना पुढे पाठवायला सांगून दहशत पसरविणे हे म्हणजे लोकांचा गोंधळ उडविणेच  आहे. सध्या निवडणुकीच्या काळातही असेच जनतेचा गोंधळ उडविणारे सर्वच राजकीय नेते व त्यांचे कार्यकर्ते संदेश पसरवत रहातील,यामुळे जनतेचा गोंधळ उडून दिशाभूल होण्याची शक्यता जास्त आहे.
*================================*


दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम


            मानव हा एक सामाजिक प्राणी आहे तसाच तो समाजप्रिय पण आहेच, समाजात राहताना माणसांनी स्वतः ला काही नियम घालून दिलेले आहेत ते यासाठीच की आपला गोंधळ नको व्हायला म्हणून. पण आजच्या सामाजिक वातावरणात वावरताना कुठला अनुभव येतो तर तो म्हणजे सारा गोंधळात गोंधळ दिसतोय.

जनता ही सारी जनता
नुसतीच वाढलीय घनता
नुसता इथं राजकारणाचा गोंधळ,
जनतेच्या हाती देऊन संबळ।

जनता ही आहे बडी डोकेबाज
मतं विकून करते कसला माज
नको ती मतांची किंमत
नेता करतो मग 5 वर्ष गंमत।

समाज म्हणून पाळावी आपण आपली मूल्ये,
तेव्हाच कुठं चांगलं मिळवतील आपली पाल्ये,
आपलाही नको गोंधळ नको तो राजकारणाचा,
एक पाऊल पुढे टाकून साचा बनवू समाजाचा।

नाही व्हावा गोंधळ कुणाचाच यासाठी,
राज्यघटनेला आपल्या धर्मग्रंथ माना,
तीच उंचविल आपला जगामध्ये बाणा।
*===============================*
Image soucre INTERNET

आमदार- खासदारांचे पेंशन.

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

📄 आठवडा 51वा 📝 

सुवर्ण महोत्सवोत्तर आठवडा

21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2018

आमदार- खासदारांचे पेंशन.


अभिजीत गोडसे,सातारा

           ज्याला मनापासून लोकसेवा करायची आहे . त्याला कोणत्याही प्रकारच्या  फळांची अपेक्षा , लोभ नसावा. बरेच ज्येष्ठ  समाजसुधारक सरकारात नसताना सुद्धा चांगली कामे केलेली आपण पाहिले आहे . काही करत आहेत. जे आपल्या जिल्हाचे , तालुक्याचे खासदार , आमदार म्हणजेच लोकप्रतिनिधी आपण जर पाच वर्षेनी निवडून देतो. ते संसद आणि विधानमंडळ यांन मध्ये सेवा करण्यासाठी. ही एक संधी आपण त्यांना  दिलेली असते. आपल्या जिल्ह्याचा ,  तालुक्याचा विकास करण्यासाठी सरकारने दिलेली कामे , योजना प्रशासनाला हाताला धरून हे करणे गरजचेचे असते. ही एक जबाबदारी मतदारांनी विश्वासाने दिलेली असते. यासाठी सेवा हाच एक निकष राहीला हवा पगार किती , पेंशन किती  या नंतरच्या गोष्टी .


पण होते उलट संसदेमध्ये आणि विधानमंडळामध्ये अधिवेशन होतात .जनतेच्या प्रश्नांसाठी. ते न होता जास्त प्रमाणात आमदार आणि खासदार यांच्या प्रश्नांवर त्याच्या पगार आणि पेंशनवर चर्चा आपण वरचेवर पाहतो. मुळात प्रश्न निर्माण होतो या लोकप्रतिनिधींना  येवढ्या सर्व सुविधा असताना पेंनशची काय गरज आहे. दवाखान्या पासून विमान प्रवासा पर्यत सोयीसुविधा असणारे . हे मतदार संघात अलिशान गाड्या वर्षीतुन किमान दोन - तिन वेळा बदलतात. येवढच नाही  यांच्या मुलाकडे , नातवाकडे पाहिले तर सामान्य वर्गाचे डोळेदिपतील. या लोकप्रतिनिधीचे वाढदिवस तर सामान्य माणूस स्वप्नात सुद्धा करु शकणार नाही . देशातील ८२ टक्के खासदार करोडपती आहेत. एका सर्वे नुसार महाराष्ट्रातील १०० आमदारांची संपत्ती १० कोटी रुपये पेक्षा जास्त आहे. काहीनी पुढच्या पिढीची सोय करून ठेवली आहे. अशांनी पेंशनची मागणी करावी ? आणि समजा एखाद्या लोकप्रतिनिधीं पाच वर्षीनी पुन्हा कदीच निवडणू नाही आला तर .अशांना आयुष्यभर पेंशन द्यावी ? तिही अर्धा लाख भर . अगोदरच सरकारवर कर्जाचा डोंगर . त्यात कर्ज माफी , दुष्काळ निधी , आपत्ती व्यवस्थापन , विविध विकास कामे यासाठी ही पैसा जातोय. आणि आगोदरच सर्व सुख- सुविधांनी आयुष्य पुढे ढकलत असताना यांना निवृत्त झाल्यावर पेंशनचे चोचले पुरवण्यासाठी हे सर्वजण मागणी करतात. वैशिष्ट्ये म्हणजे अशा वेळी सर्व  एकत्र येतात. मग कोण - कोणत्या पक्षाचा असा काही भेदभाव करत नाहीत ही मंडळी. पेंशनसाठी  दाखला देताना हे सर्व  बाहेरच्या देशाचा दाखला देतात. पण आपली आणि इतर देशाची अर्थव्यवस्था यात खूप फरक आहे.


हे लोकप्रतिनिधी मतदार संघात विकासकामा एवजी राजकारण करत बसतात. पाच वर्षे हे फक्त आमदार - खासदार यांची भांडणे, पक्ष्यांची अंतर्गत भांडणे , याने त्याच्यावर आरोप कराचे. त्यांने त्याच्यावर आरोप करायचे यातच यांची पाच वर्षे निघून जातात. पण यांचे कार्यकर्ते यांच्या विकास कामावर प्रचंड खूष असतात. दवंडी पेटवायचे हेच तर काम करतात. आणि जोडीला पञकारीतेचा अर्थ न कळलेले पञकार असतात. पण विकास कामे  फक्त  कार्यकर्त्यांना दिसतात. मतदारांना नाहीत. प्रत्येक जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूकीत हे लोकप्रतिनिधी दिसतात. त्या नंतर ते पाच वर्षीनी दिसतात. तिकडे संसद किंवा विधानमंडळामध्ये यांच्या तोंडातून प्रश्न विचारायला कधीही 'ब्र' निघत नाही . काहीतर तिकडे फिरकत देखील नाहीत . विकास कामे आणि यांचा दुरतक संबंध नसतो. पण मतदारसंघात हेच लोक प्रतिनिधी पोपटागत बोलतात. स्वतःच्या सुखसुविधे साठी माञ एकञ येताना आणि बोलताना दिसतात. कित्येक तास अधिवेशनाचे वाया घालवले महाराष्ट्रत यांनी. नियम तोडणे , वाटेल तसे वागणे , वाटेल तसे विधाने करणे हे काही लोकप्रतिनीधी वरुण आलेली परवानगीच असावी ! आता तर खासदार आणि आमदारांची निवडणूक खर्च मर्यादा वाढवली आहे. खासदारांची ४० लाखावरून ७० लाख मर्यादा झाली तर आमदारांची १६ लाखांवरुन २८ लाख झाली आहे. निवडणूकीत येवढा खर्च ही करत नसतील तो भाग वेगळा. पण  प्रचंड पैसा आलाय. येतो. पण याचा विकासाठी वापर होत नाही. ही वस्तुस्थिती आहे.


पूर्वीच्या लोकप्रतिनिधीनां लोकशाही बद्दल प्रचंड आदर होता. ते सरकारकडे काही मागण्या पेक्षा आम्ही सरकारला काय देवू शकतो हे पाहत होते. मी जनतेचा सेवक आहे आणि शेवट पर्यत सेवकच राहिन अशा पद्धतीने ते वागत . महाराष्ट्रातील पूर्वीच्या आमदारांनी दिड रुपाया माणधण घेऊन उत्कृष्ट सेवा केली आहे. पण आज कोणतीच सेवा जास्त पैसा घेतल्या शिवाय किंवा काहीतरी मिळाल्या शिवाय होत नाही. हे वास्तव आहे. अशी परिस्थिती  बदलण्यासाठी चांगल्या लोकप्रतिनिधीची  गरज आहेच. पण त्या पेक्षा जास्त सुजान नागरिकांची जास्त गरज आहे.
==============================

संदिप बोऱ्हाडे. ( वडगाव मावळ , पुणे)


    राजकारणी, नेते मंडळी हे शब्द जर ऐकले तर माझ्या तोंडात तर शिव्याच येतात यांच्याबद्दल..अपवाद जर वगळला तर काही नेते नक्कीच प्रामाणिक आहेत.. पण यांची संख्या किती 100 राला 5 पण मिळणार नाहीत. काही बोटांवर मोजण्या इतके आहेत मनोहर पर्रीकर, माणिक सरकार, गणपतराव देशमुख, बच्चू कडू अजूनही असतील पण सध्या मला हे नेते खूप आवडतात

    मागे काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचायला मिळाली होती , ब्रिटन मधील ..एक मिनिट उशीर झाला संसदेमध्ये यायला म्हणून मंत्र्यांनी दिला राजीनामा.
मी वेळेवर जागेवर नव्हतो, त्यामुळे मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो," असं म्हणत ब्रिटनमधल्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे प्रतिनिधी आणि मंत्री लॉर्ड बेट्स यांनी राजीनामा दिला होता..

आणि आमच्या देशात अधिवेशनात 98% गैरहजर राहणाऱ्या सदस्याला उत्कृष्ट संसदपटुचा पुरस्कार देण्यात येतो. आणि पवित्र संसदेत हजर न राहता महान पंतप्रधान होता येते. तसेच संसदेत झोपा देखील काढता येतात. आमच्या भारतातले मंत्री खासदार देशाचे प्रश्न मांडण्यासाठी जातात आणि संसदेत porn film बघतात बरका. आणि हे वास्तव आहे.
जनतेचे सेवक ना तुम्ही मग सेवा करायची सोडून लुटायचे धंदे करता का..?? मग शिव्या नाही येणार तोंडात तर काय येईल तुम्हीच सांगा. 15 दिवसांपूर्वी दिल्ली ला पेपर ला जाऊन आलो आणि एका महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्याच्या बंगल्यावर दिल्लीत रहायला मिळाले मी त्या मंत्र्याचे नाव नाही घेत पण वास्तव सांगतो मंत्र्याच्या बंगल्यावर राहायचा तपास नाही पण दोन- तीन गाड्या 10-20 नोकर चाकर प्रशस्त बंगला.. आणि अजूनही बऱ्याच सुविधा कशाला हवय हो हे सगळं.. ते ही जनतेच्या पैश्यांमधून.

   आमदार , खासदार यांची देशातील संख्या हजारोमध्ये आहे..पगार देखील लाखो मध्ये घेतात, इतर भत्ते नोकर, चाकर , घरभाडे, फोनबील आणि अजून एकदा फक्त निवडून यायचं नंतर मरेपर्यंत पेन्शन पण मिळते बर का ?? का बरं देशाने म्हणजेच सर्वसामान्य लोकांच्या पैश्यातून या अश्या लोकांचे लाड का
पुरवावेत.. असे कोणते दिवे लावतात हे महाभाग.. माझ्यानते हे तर अट्टल चोर असतात.................हे कधी चो-या करुन जातात; सामान्य माणसांना कळत सुद्धा नाही. यांच्यामुळेच देश कर्जबाजारी झाला आहे आणि आपण यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची म्हटली तर लगेच यांच्या तिजोरीवर बोजा येतो...अरे प्रत्येकाने तुमच्या सर्व आजी माजी आमदार खासदार मंत्री संत्री लोकांनी एक महिन्याच्या पगार दिला ना तरी सर्व शेतकऱ्यांची कर्जे माफ होतील आणि आमची ही आमदार खासदार पगार वाढीसाठी नुसते रडत असतात पगार वाढीला कोणताही पक्ष मला विरोध करताना दिसला नाही. महाराष्ट्र विधानसभेने काही वेळात 50 हजारांवरून एक लाख पगार वाढ केली कोणत्याही आमदाराने विरोध केला नाही बच्चू कडू आणि अजून असतील 1 2 अपवाद. म्हणजे आपण दोघे भाऊ भाऊ आणि मिळून खाऊ
देश कर्जबाजारी झाला आहे तो याच लोकांमुळे पण आपल्याला ते समजून येत नाही..एक आमदार बच्चू कडू यांचे वाक्य नेहमी आठवते नक्षलवाद्यांनी सर्वसामान्यांना मारण्यापेक्षा
आपल्यासारख्या पुढा-यांनाच गोळ्या घालायला हव्यात.

     भारतातील नेत्यांनी जर ब्रिटन चे त्या बातमीचे अनुकरण करायचे ठरविले तर ते फक्त लाजून लाजून मरून जातील. निगरगट्ट, अप्पलपोटी , नालायक , बेशरम वगैरे ' गुण ' आहेत इथल्या आमच्या भारतातल्या राजकारणी लोकांमधे. आणि अश्या बातम्या वाचल्यावर आपल्या संबंधित लोकांसाठी एकच शब्द आठवतो........... हरामखोर.. अजूनही खूप आहे पण तूर्तास इतकेच..
==============================

शिरीष उमरे, नवी मुंबई


स्वातंत्र्यापासुन फक्त खासदार मोजले तर अंदाजे ८००० असतील पेंशनधारी. तशी फार काही मोठी संख्या नाही पण एडीआर ह्या राजकीय संशोधन संस्थेच्या रिपोर्ट नुसार  ९०% खासदार हे करोडपती आहेत. बरेचसे फर्जी पॅन कार्ड होल्डर व क्रीमिनल रेकॉर्ड वाले आहेत. हीच गत आमदारांची !!

मग खरेच ह्या आमदार- खासदारांना पेंशन ची गरज आहे काय ? असा प्रश्न केला तर  सगळेजण नाही असेच उत्तर देतील. बहुतांशी खरे पण आहे. मग विचार येतो १०% प्रामाणिक, भ्रष्टाचार न केलेले वयस्कर व भरपुर विकासाचे काम  केलेल्या खासदारांचा... ह्या अंदाजे हजार लोकांचे काय ? ही लोक बरेचदा मृत्यु शिवाय रिटायर्ड होत नाहीत. ही आपल्या देशाची संपत्ती आहे. त्यांचा सांभाळ करणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी नियम बदलवावे लागेल.  कॅगप्रमाणे एखादी ऑटोनॉमस संस्था ह्याकडे लक्ष देऊ शकेल.

 भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हीस करणार्यांना सुध्दा पेंशन असते. माझ्यामते देशाच्या प्रत्येक नागरिकाला निवृत होण्याचे स्वातंत्र्य व पेंशन मिळायलाच हवी. अशी आपल्या सिस्टीममध्ये व्यवस्था करणे गरजेचे आहे.
असे मला वाटते
==============================

सागर राडे, सांगली

.
भारतात सध्या पेन्शन घेणाऱ्या आमदार-खासदारांची एकत्रित संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यापैकी जवळपास 70-80 % तरी करोडपती नक्कीच असतील. मग खरंच त्यांना पेन्शनची गरज आहे का?
खरंतर पेन्शनची तरतूद निवृत्तीनंतरचं उदारनिर्वाहाचं साधन म्हणून केलेली असते. आमदार असो वा खासदार निवृत्तीनंतरदेखील पूर्णपणे निष्क्रिय न होता कुठल्या ना कुठल्या पदावर नेहमीच असतात. त्यातून त्यांना उत्पन्न मिळत असतं. अशा व्यक्तींना पेन्शनची गरज आहे का?
दुसरं महत्वाचं म्हणजे आमदार/खासदार पदावर असताना अधिवेशन काळात किंवा इतर वेळी संसदेत/विधिमंडळात ते उपस्थित असतातच असं नाही. त्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. तरीही त्यांना पेन्शनची सोय आहे. अशा व्यक्तींना पेन्शन का द्यावी?
संपूर्ण आयुष्यात एखादी व्यक्ती  वर्षभरासाठीदेखील आमदार/खासदार पदावर असली (फक्त 1दा जरी निवडून आली असेल) तरीदेखील ती व्यक्ती पेन्शनसाठी पात्र ठरते. अशा वेळी खरंच पेन्शनची गरज आहे का?
==============================

सचिन कंन्नाके रा.पिंपळखुटी

  
    आजच्या आठवड्याचे विषय खूप छान निवडले आहे तरी त्यातून मला आमदार खासदार पेंशन हा विषयावर विचार मांडावे वाटत आहे.
      आज मित्रानो इकडे लोकांना काम मिळत नाही आहे.मनुन गावातील माणसे शहराकडे जात आहे आणि अजून समस्या म्हणजे आज शेतकऱ्यांना पीक होत नाही आहे. आणि कर्ज शेतकऱ्यांनवर भार वाढत आहे ते पण कर्ज माफ नाही करत आहे* .😢😢
                   त्यात अजून दुष्काळ पडत आहे त्यावर त्याचे लक्ष नाही आहे. पण स्वतःचे पेंशन कसे वाढवायचे त्यावर त्याचे लक्ष आहे.
                      *माझ्या मते पूर्वी आमदारांना दरमहा  पंचवीस हजार मिळत होते. आणि त्यात त्यांना सुविधा

 देण्यात येते. विमान, रेल्वे, एसटी त्यामध्ये त्यांना प्रवास मोफत असते.आज त्याच आमदारांना पंचात्तर हजार दरमहा देण्यात येते.
           त्यामध्येही त्याच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा मोफत आहे.अनावशक खर्च करत आहे आणि सरकारची म्हणजे आपलेच जनतेचे पैसे खर्च करत आहे.

     _माझ्या विचाराने पूर्वी आमदार खासदाराना जास्त लाभ मिळत नव्हता पण आज निवृत्ती वेतन त्यांना कायला त्यांना जर निवृत्ती वेतन दिले तर आपल्या भारतात वीस हजार आमदार खासदार आहे त्यांना सगळ्यांना निवृत्ती वेतन दयावे लागेन.
    त्यातही पूर्वी पेक्षा आज त्यांना वेतन दरमहा अंशी हजार आहे. आणि निवृत्ती वेतन चालू झाले तर चाळीस हजार दरमहा द्यावे लागेल. त्यामुळे आपल्या सगळ्या नागरिकांवर त्याचे परिणाम पाहवयास मिळेल. कारण प्रत्येक वस्तू मध्ये पैसे वाढेल. त्याचा परिणाम गरीब,मध्यम ,सगळ्यास होईल._
 😞😔😟☹😔😟😔
   
          पूर्वी स्वतंत्र काळात जे महान नेते होते. त्यांनी केव्हा ही स्वतःचे पाहिले नाही फक्त दुसऱ्यासाठी झटले ते महान नेते महात्मा फुले, छत्रपती शाहु, महात्मा गांधी,बाबासाहेब आंबेडकर थोरमोठ्या नावाची सर आजच्या मंत्र्यांना येणार नाही.
🏳🏳🏳🏳🏳🏳🏳
  _तरी2014-2015 मध्ये तो आमदार झाला पण त्याने पहिले आश्वासन खूप केले पण साडे तीन वर्ष होत आहे. पण आजपर्यत जेकाही सांगितले ते आज पर्यंत पूर्ण झाले नाही.
 फक्त प्रधानमंत्री राज्य मार्ग आता जोमात चालू आहे कारण आता2019 चा निवडणूक येत आहे.त्याचे मत असे होते की तीन पंचवार्षिक निवडून नाही आले तरी चालेल एक वेळा आलो तर तीन पंचवार्षिक ची कसर पूर्ण करू शकतो._
🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
            आणि त्यांला हे पद म्हणजे एक प्रतिष्टित नागरिक वाटते. म्हणून तो त्या पदासाठी करोडो रुपये खर्च केला. आणि त्यानंतर तो आता आमदार बनला,
💰💸💰💵💰💷💰💶
           *पण खरा प्रश्न आहे आमदार खासदाराना पेंशन ही समस्या थंबवायांचे आसेल तर मंत्र्यांना पेंशन मिळायला नाही पाहिजे.जो मंत्री पाच वर्षे त्या पदावर राहतो तर त्याला पेंशन.आणि जो 35 ते40  वर्षे सरकारी नोकरी करतो.त्याला पीएफ असे का. तरी हा प्रश्न माझ्या मते गंभीर आहे.
=============================

शीतल शिंदे .दहिवडी - जि सातारा


लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले , लोक कल्ल्यनासाठी  तात्पुरत्या - ठराविक कालावधीसाठी निवडून दिलेले लोकनेते सेवक म्हणजे आमदार , खासदार , आणी इतर सर्व मंत्रीमहोदय  .
  मात्र वर्षानुवर्ष ही मंडळी आपल्या पिढीजात व्यवसायासारखे आपल्या पुढच्या पिढीची सोय पण करून ठेवतात .ह्यांना पासपोर्ट - विसा , वाहन सुविधा सर्व काही ऐश.कुठून आले एवढे अब्जावधीची सम्पत्ती , टोलेजंग इमारती , व इतर प्रॉपर्टी . आरामदायी जीवन एवढ्या सोयी सुविधा की त्यांना आपण जनतेचे सेवक आहोत की मालक ह्यातला फरकच कळू दिला जात नाही .ह्याला जबाबदार आपले शासनच आहे .

जनतेचाच पैसा खावून स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेवर अन्याय , जतीजतीमधे तेढ , दंगली घडवून आणायच्या आणी जाब विचारायचा म्हटले की समिती नेमायची  मग ती समिती चार - पाच वर्षे लावायची तोपर्यंत दुसऱ्या पक्ष निवडून येतो .

सर्वसामान्य जनतेकडून त्यांनी कमावलेला पैसा त्याचा टेक्स, व्यापार टेक्स हा म्हणजे काळा पैसा आणी ह्यानी न कमावता जमा केलेल्या सम्पत्तील काहीच नाही .

🌟 खरेतर ह्यांना पेन्शन ची आणी एवढ्या भत्त्याची काहीच गरज नाही . एवढे नोकर सेक्यूरिटी नको एवढ्या सोई सुविधा आरोग्य विमा .सरकारच्या केवढा मोठा तोटा .

ह्यानेच देशा ची आर्थिक व्यवस्था डबघाईला यायची .येवढ्या खर्चात कितीतरी कुटुंब जगून निघतील .एकिकडे  कुपोषण ,गरिबी ,  बेरोजगारी आणी उपासमार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या 😔.

 निवडणुका जवळ आल्या की विकास कामांना सुरवात करायची म्हणजे पाच वर्षे काय उद्योग केले ते जनता विसरते आणी पुन्हा नव्याने निवडून देते .विसरभोळे- दुसऱ्यांच्या मतांचा फुटबॉल बनणारे आपले  लोक .

ज्येष्ठांनो जागे व्हा.आपल्या मुलांमध्ये प्रामाणिकपणाचे  विचार भरा .जबाबदार नागरिक बनवा .

नवयुवकानो - मतदारांनो झोपेतूण जागे व्हा.तुम्हा प्रत्येकाला राज्यकर्ता बनन्याचा अधिकार भारतीय राज्य घटनेने दिला आहे .आधीही आणी या पुढेही  प्रामाणिक पणे कार्य करण्यासाठी .आणी मत देताना चांगला नेता निवडा .नवीन लोकांना संधी दया .तुमचे एक मत तुमचे , देशाचे भविष्य घडवू शकतो कारण तो तुम्हांला अधिकार आहे .त्यामुळे मत विकताना विचार करा .जागे व्हा नव्या पिढिनो जागे व्हा.
===============================

मुकुंद बसोळे,लातूर


स्थळ- गावातील वडाचं  झाडं आणि त्या वडाच्या भोवती असलेला पार....
वेळ- 11.30....गण्या त्या पारावर पेपर वाचत बसला होता....आणि मन्या नुकताच जेवण  करून आपल्या तुडुंब भरलेल्या पोटावरुन हात फिरवत पाराकडे येत होता.....
मन्या- ( गण्याच्या पाठीत एक धपका घालून...) ऐ 'हिरो' काय करायला बे....भर दुपारी......

 गण्या - आबे जनमल्यावर 'डोक्यावर' पडला होता का बे तू?..... दिसत नाही का पेपर वाचतोय ते....

मन्या-  ते दिसतंय बे...काही विशेष आहे का आज पेपर मधी....

गण्या- विशेष म्हणजे बघ....भारत आजचा सामना हरलाय वेस्ट इंडिज बरोबर....आणि ते 'राफेल' चा मुद्दा चांगलाच चघळत आहे की राव....आणि हे बघ हे काय...(मोठ्याने वाचत) आता आमदार आणि खासदारांना पेन्शन सुरू होणार आहे म्हण....

 मन्या- (ख्या ख्या हसत) आबे जोक करायलेत का म्हणतो मी आजकालचे राजकीय नेते....

गण्या- कस काय बे?...

मन्या-  (गंभीर होऊन)अरे गण्या मायला तुला खरंच वाटतं की ह्या आमदार आणि खासदारांना  खरंच ह्या पेन्शन ची गरज असलं म्हणून....आबे पुढच्या 10  पिढ्या सुद्धा बसून खातील एवढं 'भ्रस्टचार' करून कमावलेलं असतं ह्यांनी....( थोडं जास्तच गंभीर होऊन आणि भूतकाळात रमल्यासारख करून)  अरं गण्या काय सांगू तुला माझा बाप शाळांमास्तर.... इंग्रजी जिचा लै भारी शिक्षक...तो होता डोंगरगावात.... मास्तर  म्हणून ......आजसुद्धा मी तिथे गेलो की तेथले लोक म्हणतात की गुरुजींनी  आम्हाला घडवलं..आजपर्यंत तसा शिक्षक झाला नाही...पण काही गोष्टी 'नियतीला' सुद्धा मान्य नसतात...पाठवलं तिने माझ्या बापाला देवाकडे...( हे सांगताना डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या असतात).......त्यांनी 20 वर्ष सेवा केली शिक्षक म्हणून...अजून 10 वर्ष होती सेवेची.... पण शासन आम्हाला त्यांची सेवा पूर्ण नाही झाली म्हणून अर्धीचं पेन्शन देतंय... आम्ही कसे दिवस काढलेत आम्हालाच माहीत...भावा....आणि यांनी 5 वर्ष जरी आमदारकी केली तरी लगेच यांना पेन्शन...बरं ते जाऊदे....आमदारकी आणि खाजदारकी हे लोकसेवा ना बे...लोकसेवेचं माध्यम ना हे...पण आजकालचे आमदार- खाजदार तुला माहीत आहेत ना... हो एक काळ होता जेंव्हा आमदार- खाजदार लोकांसाठी तळमळीने काम करायचे...लोकनेते होते ते....पण आजकालचे आमदार खाजदार....फक्त प्रचारात वापरलेला पैसा कसा दुपटीने तिपटीने वापस कसा मिळवायचा याचाच विचार करतात....काही अपवाद असतील पण त्यांची संख्या नगण्य....मग अश्या वेळेला विचार करावसा वाटतो भावा की यांना पेन्शन ची खरंच गरज आहे का?....

 गण्या- पण 'मन्या'आपण काय करू शकतो यार...यावर...

 मन्या- हो भाई...हे सुद्धा बरोबर आहे म्हणा....पण विचार ग्रुप वर आपले विचार तर मांडू शकतो ना....

गण्या- हो ते करू शकतो.... चल आता चहा पाज....'कल का चहा उधार है तुम्हारे उपर'

 मन्या- चल भावा....
==============================
IMAGE SOURCE--INTERNET

गळाभेट... 2019 ची चाचपणी की आताच्या सरकारची सत्त्वपरीक्षा.

गळाभेट... 2019 ची चाचपणी की आताच्या सरकारची सत्त्वपरीक्षा.

     (Source : Internet )
अर्जुन (नाना) रामहरी गोडगे
सिरसाव ता. परंडा जि. उस्मानाबाद

          परवा जो अविश्वास ठराव संसदेत मांडला त्यावेळी विरोधला सुद्दा माहीत होते की आपण तो जिकणार नाही, पण त्यांनी मोठ्या विश्वासने भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यास ते यशस्वी झाले. अविश्वास ठरवावेळी पालकांवर 326 विरुद्ध  126 असे आकडे झळकल्यानंतर मोदी सरकारला यकिंचित धोका नाही असे सिद्द झाले. सर्व मोजमाप आकडयात करणे चुकीचे ठरते. काही वेळा अविश्वास ठराव सरकारला एक पाऊल मागे घेयला, खिंडीत धरायला मदत करते. ह्या अविश्वास ठरावाने मोदी सरकारचे हात बळकट केले हे म्हणणे म्हणजे बावळटपणाचे ठरेल. हा अविश्वास ठराव 27 वा होता.  मोरारजी देसाई व अटलबिहारी वाजपेयी वगळता,अविश्वास ठरावाचा कोणत्याही सरकारवर परिणाम झाला नाही. आकड्यांमध्ये हरणार हे त्यांनाही माहीत असते. पण भारतीय लोकशाही मधील ते एक आयुध आहे त्याच्यातुन विरोधाच्या हातात काही गोष्टी गवसतात. राहुल गांधी बोलायला उभे राहिल्यावर हेटाळणीच्या स्वरांत 'हिंदी मध्ये बोला', 'पप्पू' , 'अब भूकंप अनेवाला है'  अशी विषशने लावून भाजपा खासदारानी जी टर उठवली ती पूर्वनियोजित कारस्थान वाटतं होत . यावेळी मात्र राहुल गांधी काहीही हातात न घेता 35 मिनिटाचे भाषण दिलं . त्यामध्ये अमित शाह च्या मुलाचा घोटाळा , राफेल घोटाळा त्यामुळे हमेशा राहुल गांधींवर हषणार्या भाजपा खासदाराचे चेहरे लाल झाले.  
           काय होत या भाषणात कोणताही कागद हातात नव्हता, आकडेवारी गणित नव्हते , सर्वसामान्य ला कळेल अशी भाषा होती. राफेल असो वा अमित शाह पुत्रावरील आरोप वा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा प्रत्येकावर दोन तीन वाक्यच बोलले पण ते बोलणं शैलीदार होते. त्यालाच भाजपाचा झालेला कडवा विरोध यात रोमँटिक गाण्याला संगीत दिल्यासारखं वाटतं होतं. यावेळी भाषण झाल्यानंतर राहुल गांधी नी मोदीला मारलेली मिठी .. याला काही जण "जादूची झप्पी "असेही म्हणाले पण असे काहीही नव्हते. या मिठीचा अर्थ सरळ होता . मोदीजी कॉग्रेसप्रेनित लोकांचा जो तिरस्कार करत आहात तो करू नये.तुम्ही नेहमी कॉग्रेसची नफरत करत असता, तुम्ही माझा तिरस्कार करत असता. माझ्याविषयीं नकारात्मक राजकारण सोडून द्यावे. तुमि आजपर्यत भाजपा वतीने छुप्या पदतीने राष्ट्रीय स्वयसेवक संघ, बजिरंग दल, विश्व हिंदू संगठना या संगठना पाठबळ देता समाजामध्ये तेढ निर्माण करता , हे समाजविघातक आहे, ही असली कुटील कारस्थाने सोडून घ्या असे त्यांना सागव्याचे आहे.  तुह्मी गांधी चा नेहरू चा जो अनादर करता ते चुकीचे आहे. कॉग्रेस हा अहिंसावादी पक्ष आहे.  भाषणाच्या शेवटी त्यांनी मोदीला त्यांनी मिठी मारली , डोळा मारुन त्यांनी सर्व कामावर पाणी फिरवले अशी टीका होऊ लागली.
         गळाभेट वर ज्या पदतीने टीका झाली ती पूर्ण चुकीची आहे. आजपर्यंत मोदीने किती जणांना गळाभेटी दिल्या त्या पूर्ण चुकीच्या मनव्या लागतील. राजकारणात "आपलं तो बाबू दुसऱ्याच ते कार्ट" अशी प्रवृत्ती बळावली आहे. मोदी बराक बराक आशी हाक मारली होती की. 2014 मध्ये तर मोदीने किती जणांना मिट्टया मारल्या होत्या त्या सर्व चुकीच्या मानणे बरोबर नाही.  भाजपच्या द्वेषाचा राजकारनाला कॉग्रेसने प्रेमाने दिलेले उत्तर आहे. त्यावर मोदीही बोलले 2014 मध्ये मोदीला साऱ्या देशाने मिठी मारली ह्याला आज अक्कल आली आहे. असं बोलणं चुकीच आहे . या सर्व प्रकारात राहुल गांधी यांनी केलेलं आरोप योग्य होते हे भाजपा खासदाराच्या लालबुंद वागण्यावरुन दिसून येते. बाकी 2019 ची निवडणूक भाजपासाठी सोपी राहिलेली नाही, मागच्या वेळीचा "पप्पू ब्रँड" या वेळी काम करण असे वाटत नाही. राजकारण हा प्रतिमांचा खेळ आहे हे मोदीने जाणले आहे,संसदेच्या पायरीवर डोकं ठेवणं ,स्वतःला सेवक म्हणणे आता जनतेला चकवणे सर्व काही झाले आहे. ह्या डाव आता राहुल गांधी खेळले तर ते पूर्ण चुकीचे म्हणने बरोबर नाही. "नौटंकी का जबाब नौटंकी से" एवढेच राहुल गांधी यांनी केले, पप्पू ब्रँड मोदी विकू शकत नाहीत दाखवून हे अविश्वास प्रस्ताव आणून.  ह्या सर्वात मध्ये मोदी शाह जोडी यांना वाटतं असलेल्या "सदैव अजिंक्य" या प्रतिमेला तडा देण्यास राहुल गांधी काही प्रमाणात यशस्वी झाले. पण ही गळाभेट निश्चितचं मोदी सरकारची सत्वपरीक्षा असणार आहे... सर्वात  महत्त्वाचे म्हणजे मोदी हे चरूर राजकारणी आहेत. पण राहुल गांधी ही हुशार होत असल्याची झलक त्यांनी दाखवून दिली.


   (Source : Internet )
ज्ञानेश्वर तात्या टिंगरे
उस्मानाबाद.
मो.९७६७१७८०५२

मध्यंतरी काही कारणांनी ग्रुपवर कार्यरत राहता आलं नाही त्याबद्दल अगोदर सर्वांची माफी मागतो..🙏

मोदी सरकारच्या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने चर्चेसाठी एक विषय एडमीन टीम ने निवडला त्याबद्दल त्यांचे आभार ,कारण की या निमित्ताने लेखकाच्या मनातील राजकीय पैलूंवर प्रकाश पडेल व त्याचा इतरांना फायदा होईल असा त्यामागचा हेतू असेल, असो...

अविश्वास ठरावाच्या निमित्ताने जे काही घडले ते काही नवीन नव्हते.. सारा देश लोकशाहीच्या दरबारातील खेळ उभ्या डोळ्याने पहात होता, ज्यांना जे दिसलं त्यांनी ते मांडलं किंवा व्यक्त केलं. मला जे वाटलं ते मी खालील मुद्यांच्या आधारे लिहिण्याचा प्रयत्न करत आहे..

१. ज्यांना वाटलं की गळाभेट हि आपुलकीची किंवा माणुसकीची कृती होती त्यांनी संसदीय लोकशाही मध्ये वावरताना घातलेल्या नियमाकडे दुर्लक्ष केले आ7हे हे दिसून येते , स्पीकर नि त्याचवेळी सांगितले होते की He is not Narendra Modi, He is a Prime minister. पण याकडे सर्वानी दुर्लक्ष केलं.

२. गळाभेट घेणं हे वाईट नाही पण एका विशिष्ट हेतूने ते करणं आणि नंतर डोळा मारणं ह्याचा अर्थ सुज्ञ माणसांना सांगायची गरज नाही. मोदींनी बाहेर कोणालाही गळाभेट घेतली असेल तो देशाच्या रणनीतीचा भाग असतो त्याचा संबंध इथे जोडणं म्हणजे चुकीचे ठरेल.

३. काँग्रेसचे युवराज राहुल गांधींनी केलेलं भाषणं त्यांच्यातील राजकीय सुप्त गुणांची होत असलेल्या वाढीचे निदर्शक आहे पण त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण पण डोळ्यात अंजन घालणारे होते हे पण विसरता कामा नये.. ( आता सदस्यांच्या गोंधळात कोणाला ऐकायची इच्छा झाली नसेल तो भाग वेगळा ).

४. ज्या राजकीय पंडितांनी छातीठोकपणे सांगितले की इथुन पुढे मोदी सरकार सत्तेवर येणार नाही अशा सर्वांची बोलती आपल्या कार्याने बंद करून सुध्दा काही महाभाग अजूनही मोदींबद्दल गैरसमज पसरवत असतील तर त्यांची किव येते.

५. ज्या मोदींनी हिंदुत्ववादी संघटनांना हाताशी धरून द्वेष पसरवला तो कमी करावा ह्या हेतूने राहुल गांधी यांनी मिठी मारली असा युक्तिवाद जे करत आहेत त्यांना एकच सांगावेसे वाटते की या देशात द्वेषाची बीजे कोणी रोवली याचा इतिहास पहा.

६. मोदी सरकारची सत्त्वपरीक्षा आहे ती पुढील काळात, गेली कित्येक वर्षे ज्यांनी उभं आयुष्य एकमेकांना शत्रू समजून वागणूक दिली व सत्ता भोगली असे सत्तापिपासू लोक एकत्र आले म्हटल्यावर थोडे कष्ट घ्यावे लागतील.

७. थापा मारण्याचा प्रकार देश स्वतंत्र झाला तेव्हापासून सुरू आहे ( गरिबी हटाव ) तो आजपर्यंत लोकांना पचला देखील फक्त मोदींना बदनाम करून त्यांना आपल्या सारखेच दाखवून देण्याचा प्रयत्न चालू आहे..

मुद्दे भरपूर आहेत फक्त शब्द मर्यादा येतात त्यामुळे थांबतो.

जय हिंद..

   (Source : Internet )

शिरीष उमरे नवी मुंबई

एक सत्य त्यांचे, ज्यांना गळाभेट वाटते २०१९ ची चाचपणी !

दुसरे सत्य त्यांचे, ज्यांना गळाभेट वाटते आताच्या सरकारची सत्वपरिक्षा !! 

असे कीतीतरी प्रकाराचे, रंगाचे, ढंगाचे सत्य !!!!!!!!!

त्यातच एक सत्य हे की गळाभेट झाली याची जाणीव नसणारे भारतिय नागरिक जे पिढ्यांपिढ्या आपल्या कुटुंबाच्या प्राथमिक गरजांचा डोंगर सकाळपासुन संंध्याकाळपासुन राबराब राबुन हलवुन क्षणात रात्री उपाशी पोटी झोपी जाणारे .... ते नागरिक ज्यांना त्यांच्या हक्कांची माहीती नाही.... आणि ते, ज्यांना आपल्यावर अन्याय होतोय ह्याची जाणीव नाही... ते सुध्दा, ज्यांना आपले शोषण व वापर होत आहे हे कळत नाही... 

हे जळजळीत सत्य ज्यांना उमजत नाही, बोचत नाही, कळत नाही, समजवुन घ्यायचे नाही, हृदयात दुखत नाही अश्या कणखर, लोकशाहीचे मुखवटे लावणारे, वेगवेगळे रंगाचे झेंडे नाचवणारे, वेगवेगळ्या धर्माच्या अफुच्या गोळ्या बनवणारे, विकणारे, खाणारे,  विकृतीला राजमान्यता मिळवुन देणारे व ती मानणारे समस्त उच्चशिक्षीत भारतीय नागरिकांना माझा 🙏🏼🇮🇳


   (Source : Internet )

प्रविण, मुंबई

अविश्वासाचा ठराव हा सत्ताधारी पक्षासाठी खूपच महत्वाचा होता, जरी त्यांच्याकडे संख्याबळ होत तरीही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण रास्त होत. हा ठराव राहुल गांधी च्या भाषणाने गाजण्यापेक्षा त्यांच्या “बचाकाना” गळाभेटीने गाजला. मोदींच भाषण हे नेहमी प्रमाणे प्रभावी होत पण अर्ध सत्य सांगून असत्याला सत्य दाखवण्याचा एक यशस्वी प्रयत्न. हा प्रयत्न यशस्वी होता कारण बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांनी गळाभेटी ला पहिल प्राधान्य दिल जेणेकरून राहुल गांधींच्या आक्रमक भाषणावरून सर्व वाहिन्यांनी गळाभेटीवर आपले कॅमेरे फिरवले. त्यामुळे लोकांपर्यंत यावेळीही पूर्ण सत्य पोहचल नाही.
काही ठराविक मुद्द्यावर मला प्रकाश टाकायचा आहे.
पूर्ण भाषण हे फक्त भावनांचा “जुमला” होता. सतत “१२५ करोड जनाताने ....” अस म्हणून चेंडू जनतेच्या कोर्टात टोलवायाचा हे मोदिनी गेल्या चार वर्षात अनेकदा केलाय.
या भाषणात सुद्धा कॉंग्रेस चा इतिहास काढलाच. जेव्हा वर्तमान रिकामा असतो तेव्हा इतिहासात डोक खुपसाव लागत.
राफाल करार, शेतकऱ्यांच वाढीव उत्पन्न, १८००० घरात पोहोचलेली वीज, UGC मधले बदल यावर जे काही मोदी बोलले ते किती विश्वासाहर्त होते हे त्यानंच ठावूक.
२०१४ नंतर वाढलेला जातीवाद ह्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही पण तरीही मोदिनी जो जातीविरहित राजकारण चा केलेला दावा केविलवाणा होता.
मुळात मोदी सरकार आणि त्यांचे मेडियातले विकाऊ आणि सामान्य जनातेतले भोले भक्त त्यांच्या चुका मान्य करत नाही. हे पुन्हा एकदा दिसून आल.

आता ही गळाभेट पुढच्या निवडणुकांची चाचपणी असेल का? कदाचित असेल कारण यावेळी कॉंग्रेसला आणि इतर विरोधक पक्षांना “राफेल” चे खाद्य मिळाले आहे. असाच खाद्य “बोफोर्स” नावाने याच कॉंग्रेस विरुद्ध वापरलं गेल होत. कदाचित त्याचीच पुनारावृत्ती असेल आता. आणि बीजेपी कडे नेहमीचे राम मंदिर, हिंदू-मुसलमान आणि हल्लीचे भिडतंत्र असेल. पण तरीही NDA ची बाजू बळकट वाटते कारण “चेहरा” महत्वाचा आहे, जो NDA ने “मोदींच्या” रुपात दिलाय आणि कॉंग्रेस.....
शेवटी एकाच म्हणेन देशाचे मूळ मुद्दे बाजूलाच राहतील आणि जनता सुद्धा या मात्तबर पक्षांनी उठवलेल्या मुद्द्याला आपला मानून आंधळेपणाने मतदान करील.


   (Source : Internet )

*R. सागर, सांगली*
.
परवा संसदेत विद्यमान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झाला. अपेक्षेप्रमाणे तो बहुमताने फेटाळला गेला. सत्ताधारी NDA कडे असणारं संख्याबळ बघता हे अपेक्षितच होतं. त्यामुळं सरकारची सत्त्वपरीक्षा वगैरे गोष्ट इथे कुठेच जाणवली नाही. पण त्याचवेळी अविश्वास प्रस्तावापेक्षा चर्चा झाली ती राहुल गांधी-नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीचीच..
.
एक प्रकारे ही 2019ची चाचपणीच होती असं म्हणायला हरकत नाही. गेल्या काही वर्षात राहुल गांधींबद्दल जी पप्पूची प्रतिमा निर्माण केली जाते आहे त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मिळालेली ही एक संधी होती. अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यानच्या आपल्या भाषणात विविध मुद्द्यांना स्पर्श करून त्यांनी ती संधी बऱ्याच प्रमाणात साधायचा प्रयत्नही केला. पण दुधात मिठाचा खडा पडावा तसं त्यांच्या गळाभेटीनंतरच्या डोळा मारण्याच्या कृतीतून घडलं. आणि याच गोष्टीची ढाल करून आपल्या सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या मुद्द्यांना मुद्देसूद उत्तरं न देताच त्यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानली.
.
तरीही यातून एक गोष्ट निश्चित झाली. अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान इतर अनेक पक्षातील नेत्यांनी आपापल्या भाषणातून सरकारवर टीका केलेली असतानाही मोदींनी आपला जास्तीत जास्त वेळ हा राहूल आणि काँग्रेसवर टीका करण्यातच घालवला. याचाच अर्थ असा होतो की विरोधक जी महाआघाडी करायचा प्रयत्न करत आहेत त्या महाआघाडीचं नेतृत्व राहूल गांधींनी करावं असं भले विरोधकांना वाटत नसलं तरी राहूल आणि काँग्रेस हेच आपले 2019 साठीचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत हे मोदींनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मान्य केलंय.

राजकारण हा विषय अभ्यासक्रमात असावा का ??

राजकारण हा विषय अभ्यासक्रमात असावा का ??

🌱वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

राजकारण हा विषय अभ्यासक्रमात असावा का ??

Source : INTERNET
- मनोज वडे
राजकारण हा विषय नक्की असावा कारण ,ही घराणे शाही हठवण्यासाठी  आज आमदाराचे मूले आमदार , सर्व सामान्य चं काय तो कधी येत च नाही ,कारण त्याला दररोज कसे 200 रुपये मिळवायचे हे पडलेले असत,
मग त्याला कधी आमदारांचे स्वप्नं पडावी ,लिहण्या सारखे खूप आहे पण लिहतो वेळ मिळेल तस आज थांबतो. 🙏



Source : INTERNET
-किरण पवार,
औरंगाबाद

             राजकारण हा विषय अभ्यासक्रमात असणं ही सध्याच्या काळातली गरज आहे; असं तरी माझ वैयक्तिक मत आहे. पण आपण विषयाअंतर्गत विद्यार्थांना काय देणार..?? हा महत्वाचा मुद्दाही लक्षात घ्यावा लागेल. कारण शिकायचं वयं असं असतं की, तिथे मिळणाऱ्या गोष्टी आपल्या पुढील भविष्याचा पाया बनत जातात. आजकाल बऱ्याचवेळा असं आपल्या देशात घडतं की, नेतेमंडळी किंवा सत्ताधिकारी यांच शिक्षण तितकसं नसूनही ते आपल्यावर राज्य करतात. इतकचं नव्हे तर काही जणांवर खटलेही चाललेले असतात. हे चित्र बदलायला जावं तर आपण सहसा पुढाकार घेत नाही. पुढाकार न घेण्यापाठी काही गोष्टी म्हणजे, एक तर आपण घाबरतो दुसरं आपल्याला वाटतं की, कदाचीत आपण चुकीचे ठरलो तर काय..? यांसारख्या बऱ्याच गोष्टी असतात.
          आपल्या देशातल्या तरूणाईला सर्वधर्मसमभाव हा आज सोशल मीडियातून सांगायची वेळ का येते...? आमची तरूणाईला समाजात वावरताना तोच समाज मोठा होताना का चुकीचा भासू लागतो...? यावर तरूणांनीच विचार करणं गरजेच आहे. राजकारण हा विषय देशाला विकसीत, आर्थिकरित्या सक्षम व इतर चांगल्या हितोपयोगी गोष्टी देण्यासाठी तरूणांपर्यंत अभ्यासक्रमातून पोहोचला जावू लागला तर मला वाटतं निश्चितपणे देश घडण्याची तिव्रता वाढेल व देश वेगाने सर्वार्थाने प्रगतशील राष्ट्र होईल.


Source : INTERNET
-करण बायस,
जि. हिंगोली

भारतीय राजकारण हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. राजकारणात जास्तीत जास्त लोक हे स्वार्थ आणि मोहाच्या पायी उतरतात. आपण स्वतःचा फायदा कसा करून घ्यावा हाच नेमका ध्येय असतो. भारतीय राजकारण हे एका धंद्याप्रमाणे झाला आहे.
जास्तीत जास्त राजकारणी लोकांना देशाच्या विकासाशी घेणंदेणं नाही ते फक्त स्वतःची बाजू आर्थिक दृष्टीने कशी मजबूत होईल ते बघतात.

अशा स्तिथीत भारतीय राजकारणाला एक फक्त शिक्षीत नसलेला तर प्रत्येक सामाजिक प्रश्नांची जाणीव असलेल्या नेत्याची गरज आहे. असा नेता ज्याच्या कामात स्वार्थ नसला पाहिजे, ज्याला जनतेचा पैसा बघून मोह/लालच होता कामा नये.राजकारण हा विषय  अभ्यासक्रमात असला पाहिजे याची गरज वाटत नाही पण खरी गरज आहे प्रत्येकाला समाजाची जाणीव असली पाहिजे.

पण सध्या भारतात चित्र उलटं आहे राजकारणी लोक स्वतः च्या फायद्यासाठी तरुणांना दारूसारख्या व्यसनांना लावतात आणि तरुण आनंदी आहेत. भारतात लोकशाहीची व्याख्या पण बदलली आहे इथे जनता आपला नेता निवडत नाही तर निवडणुकीत उभा असणारा नेता 500-1000 रु देऊन आपलं मतं ठरवत आहे.
आणि हे बघून राजकारनांत येणाऱ्या नवीन तरुण पिढी वर हेच संस्कार पडत आहेत.
तरुण पिढी जात,धर्म वाद,विरोधी पक्षाने स्वतःची सत्ता गेल्यामुळे आंदोलनं भडकवतो जो की विरोधी पक्षाच्या फायद्या साठी असतो आणि तरुण मुलं आपला वेळ घालुन त्यात शमील होतात, खुप चिंताजनक गोष्ट आहे.
*राजकारण हा विषय अभ्यासक्रमात नसला तरी चालेल पण अभ्यासक्रमात माणुसकी शिकवणारा,गरिबांच्या पोटाचा प्रश्न कसा सोडवता येईल आणि कृषिप्रधान देशाचे प्रश्न कशा प्रकारे सोडवता येतील हा विषय नक्कीच असला पाहिजे.*


Source : INTERNET
-मयुरी देवकर,
ता. माळशिरस जि सोलापूर

          भारतीय राज्यप्रणाली 'लोकशाही ' या तत्वावर अवलंबून आहे.आज आपण पाहतच आहे की, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडेच प्रत्येक गोष्टीत 'राजकारण' चालतंय ....आता प्रश्न असा आहे की हा विषय अभ्यासक्रमात असावा का???
          खरंच आजच्या घडीला हा विषय अभ्यासक्रमात आणण्याची गरज आहे. राजकारण, समाजकारण या संकल्पना ,त्यांचे अर्थ खऱ्या अर्थाने विद्यार्थीदशेपासूनच समजले तर फक्त आणि फक्त घराणेशाही,हुकूमशाही यांचे वर्चस्व असणारे सध्याचे राजकीय चित्र पालटेल..... राजकारणाचा अभ्यास करून ,राज्यप्रणालीविषयी सर्व माहिती घेऊन ,त्याविषयीचे ज्ञान घेऊन जर राज्याचा किंवा देशाचा कारभार चालू लागला तर नक्कीच प्रगतीकडे वाटचाल होईल. आपल्या समाजातील सध्याची परिस्थिती ,सामाजिक प्रश्न,विविध योजना,त्यांची अंमलबजावणी कशी करायची या साऱ्यांचा समावेश राजकारण या विषयाच्या अभ्यासक्रमात करावा व फक्त आणि फक्त प्रश्नोत्तरे लिहुन ,गुण मिळवून पूढे न जाता त्यामध्ये प्रात्यक्षिकही असावे....यामधून ढासळत चाललेली नीतिमत्ता,सर्वसामान्य नागरीकांचा लोकशाहीवरील उडत चाललेला विश्वास हे प्रश्न मार्गी लागणं हीच आज काळाची गरज बनली आहे.' प्रत्येक क्षेत्रात राजकारण करण्यापेक्षा राजकारणाचा उपयोग प्रत्येक क्षेत्रात करायला हवा '. यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे राजकारण म्हणजे काय??आणि यासाठीच राजकारण हा विषय अभ्यासक्रमात असावा…


Source : INTERNET
-समीर सरागे,
नेर

आपल्या भारताची संपूर्ण विश्वात सर्वात मोठा  लोकशाही प्रधान देश अशी ख्याती आहे. कारण या देशात मागील 7 दशका पासून संसदीय लोकशाही प्रणाली अस्तित्वात आहे.  निवडणुका हा या प्रक्रियेचा मुख्य भाग होय. लोकशाही टिकवायची असेल तर राजकारण देखील त्या प्रकारचे असणे गरजेचे असते. केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करणे आणि मध्यावधिला सामोरे जाने म्हणजे राजकरन नव्हे ती सत्ता प्राप्तिची लालसा असून एक प्रकारे संधी साधू पणा होय.  अलीकडे लोकशाहीचे राजकरनातील अस्तित्व बघता प्रत्येक नेता सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष मतदाराना भूरळ घालण्यात आणि आपला हिताचा स्वार्थी अजेंडा चलविन्यात गुंतला आहे. त्या करिता नवनवीन कलुपत्या या मंडळी वापरत असतात. कधी अल्पसंख्याकाना खुश करण्या साठी टोप्या घालने ,कधी बहुसंख्याची मते आपल्या पदरात पाडूंन घेण्या साठी मंदिर दौरा करणे जानवं वैगरे घालने ,एवढेच नव्हे तर विवादास्पद वक्त्वये करुण विशिष्ट समाजाची किंवा धर्माची मते आपल्या पदरात पाडून  घेण्या करिता लांगूल चालण करणे किंवा त्या करिता प्रयत्न करणे वैगरे परंतु याला सोईचे आणि स्वार्थी राजकरन म्हणावे लागेल, कारण ही धडपड करने म्हणजे त्यांचे स्वतःचे अस्तित्व टिकविन्या करिता कलेले शर्थिचे प्रयत्न होय. म्हणजे चांगल्या सामाजिक मुद्यावर किंवा विकासावर, जनतेच्या मूलभूत गरजा वर , जागतिक प्रदूषण , आतंकवाद, ईत्यादी वर खरेतर राजकारण असायला हवे. परंतु इथे मात्र देशाच्या सुरक्षेला व देशाच्या सर्वभौमत्वला एवढेच क़ाय तर देशाचे दिवस रात्र रक्षण करणाऱ्या सिमेवरच्या जवाना वर (सिमेच्या सुरक्षे करिता केलेल्या सर्जिकल स्ट्राईक वरुण राजकारण तापविल्या जाते.) म्हणजे संधी साधु लोकानकड़ून  देशहिता सरख्या संवेदनशील मुद्दयला डावलून राजकारण केले जाते. इतके खालच्या स्तराला या देशाचे राजकरण आणि राजकारणी पोहोचले आहे. आणि म्हणून सुज्ञ जनता त्यातही आजची युवा पीढ़ी राजकारणाच्या फंदात पड़त नाही. व चार हात दूर राहन्याचा प्रयत्न करते. आणि हेच चित्र आपल्याला बदलवायचे आहे. आणि अशा खालच्या पातळीवरच्या स्वार्थी राजकारना मुळेच आज आपल्या युवापुढीच्या मनात राजकरना विषयी तसेच राजकरण्या विषयी विशेष घृणा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यात चांगले लोक बोटावर मोजन्या इतके आहे. ज्यांची या सिस्टीम ला बदलविन्याची इच्छा आहे ते एकतर यात टिकत नाही किंवा पुन्हा निवडून येत नाही. या करिता युवकामध्ये राजकारणा विषयी सकारात्मकता आणि त्याचे लोकशाहितील महत्व ,त्याचे गांभीर्य कळले पाहीजे. केवळ राजकारनावर चर्चा व वाद-विवाद घालने म्हणजे  आम्हाला राजकारण समजते असे नाही या उलट आपल्या देशातील 60 टक्के युवा पीढ़ी राजकारणा पासून अलिप्त राहते.(म्हणजे काहीजन तर निवडणुकी सारखा दिवस सुट्टी आणि मनोरंजनाचा दिवस म्हणून पाळतात. व त्या वेळेस मतदानाचा हक्क न बजावता हे संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार आहेत. व हिच राष्ट्रीय कर्तव्य व जबाबदारी ते पार विसरून जातात. आणि हेच लोक पुढे लोकशाही धोक्यात आहे म्हणून किंचाळतात) त्यांना लोकशाहीत घडणाऱ्या घडामोडिशी काही देणे घेणे नसल्याचे निदर्शनास येते. लोकशाही पद्धतितील स्थानिक स्वराज्य संस्था पासून ते लोकसभा पर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेत तरुणांची महत्वाची भूमिका असु शकते कारण हे तरुण सुज्ञ आहेत देश निर्माण करण्याची आणि देशाला महाशक्ति बनविन्याची त्यांच्यात उमेद आहेत एवढेच नव्हे तर त्यांच्या मध्ये योग्य लोकप्रतिनिधि निवडून देण्या इतपत ते  सुज्ञ आहेत. याही पेक्षा भयंकर बाब म्हणजे काही लोकाना तर आपल्याला मिळालेला मतदानाचा हक्क बजवाने देखील कंटाळवाने काम वाटते म्हणून दिवसेंदिवस मतदानाच्या टक्केवारीत घसरन होत आहे. मग हे तरुण राजकारणा विषयी इतके उदासीन का ? हा प्रश्न निर्माण होतो. एखादा चारित्र्य हीन , भ्रष्टाचारी, घोटाळबाज लोकप्रतिनिधि जर निवडून येत असेल तर आपल्याला त्याला बोलन्याचा काही एक अधिकार नाही! कारण आपण आपली जबाबदारी मतदानाच्या वेळी पार पाडली नसते. त्यावेळी आपण मनोरंजन म्हणून ती संधी घालवतो परिणामी संधिसाधु राजकारणी तुमच्या मांनगुटिवर बसतात. आणि आपल्या याच राजकीय अज्ञानामुळे आपण चांगले लोकप्रतिनिधी निवडण्यात चूक करतो.

आपला देश जगात सर्वात तरुण देश आहे कारण या देशातील 60 टक्के जनता  ही तरुण आहेत.
असे म्हणतात की,   *राजकारण हेच कोणत्याही देशाचे भविष्य सुनिश्चित करत असते."* आणि ते 100 टक्के योग्य आहे. म्हणून तरुणानी अधिकाधिक राजकारणात सक्रिय सहभाग घेणे अनिवार्य आहे. जगातील एवढ्या मोठ्या लोकशाही प्रधान देशात लोकशाही अस्तित्वात आनण्या करिता  राजकारणाला केंद्र स्थानी ठेवल्या जात असते. या विषयी व्यापक जनजागृती होने गरजेचे तर आहेच सोबतच या विषयीचे शिक्षण सर्वच अभ्यासक्रमात समाविष्ट करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. ज्या मध्ये राजकरणा विषयी सकारात्मक दृष्टिकोण , देशाला केंद्रस्थानी ठेउनच राजकारण असले पाहीजे, आरोप प्रत्यऱोपाने देशहिताला व देशाच्या सर्वभौमत्वाला बाधा पोहचता कामा नये वैगरे, लोकप्रतिनिधिची कर्तव्ये व जबाबदार्या, राजकारणाचे संसदीय लोकशाहितील महत्व, तरुणांची  भारतीय राजकारनातिल महत्वकांक्षा ,मतदनाचा हक्क व जबाबदरी इत्यादी, परंतु राजकरणांचा
शैक्षणिक  पाठ्यक्रमात समावेश केला म्हणजेच युवा वर्ग आकुष्ट होईल.असे नाही. त्या करिता राजकरना बरोबरच समजकारन ही तितकेच महत्वाचे आहे. त्या करिता प्रत्येकच व्यक्तीला जनसंपर्क वाढवावा लागेल.आणखी एक बाब म्हणजे जसे रोजगार निर्मिती मध्ये शैक्षणिक संस्थाची संघटनांची निर्मिती झाली आहे. विविध क्षेत्रात काम करणारे लोक त्यांच्या गुनवत्तेचा आणि कलेचा उपयोग करुण प्रावीण्य मिळवितात   अगदी तसेच राजकरणा विषयी राजकीय मार्गदर्शन ज्या मध्ये देश निर्मिति व देशाच्या विकास या संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या संस्थाची निर्मिती होने गरजेचे आहे. या उलट पाठ्यक्रमा सोबतच राजकरना संदर्भात विशिष्ट कायदे बनविन्याची सद्याच्या घडिला अत्यंत गरज आहे. जसे नौकरी मध्ये वयोमर्यादा घालून दिलेली असते ज्या प्रमाणे विशिष्ट वय झाले की सेवानिवृत्ति निश्चित असते अगदी त्याच धरतीवर राजकारणात देखील वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता निश्चित कण्यात यावी जेने करून नव नवीन युवा लोकप्रतिनिधि  या राजकारणाचा या संसदीय लोकशाहिचा भाग बनू शकेल व त्यांचे विचार व चांगल्या संकल्पना या देशाच्या सर्वांगीण विकसात ,देशाच्या जड़न घडणा मध्ये, देशाच्या निर्मिति मध्ये उपयोगी पडेल. तसेच राजकारणातील आतापर्यंत चालत आलेली किंवा सद्या अस्तित्वात असलेली घराणेशाही पद्धत व मक्तेदारी काही प्रमाणात होईना संपुष्टात येईल.

चांगले लोकप्रतिनिधि निवडून यायला हवे असे सर्वाना वाटते म्हणून प्रत्येक क्षेत्रातील गुणवंत व प्रख्यात व्यक्तिची राजयसभेवर निवड होत असते. म्हणून त्या करिता राज्यसभा आहे. *(जे लोक उच्च शिक्षित आहेत, जे लोकसभेत  विधानसभेत निवडून येऊ शकत नाही परंतु त्यांच्या गुणाचा व अनुभवाचा फायदा या देशाला , लोकशाहीला , देश निर्मिति मध्ये होऊ शकतो आशा व्यक्तिना ज्यानी आपल्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविले आहे अश्या लोकांच्या गुंणाचा  त्यांच्या अनुभवाचा फायदा देशाला व्हावा म्हणून त्यांची राजयसभेत वर्णी लावल्या जाते. संसदीय लोकशाहितील ही एक बाब अतिशय छान आणि कौतुकास्पद आहे.)*

आपल्या  संसदीय लोकशाहीत एकच एक लोकप्रतिनिधिस निवडून देण्याची पद्धत आहे.यामुळे राज्यकारभारात त्या व्यक्तिला एकाधिकार प्राप्त होऊन याचे रूपांतर मग घोटाळ्यात होते.यावर एकच उपाय म्हणजे  तरुनानी राजकारणात सक्रिय सहभाग घेणे व लोकशाहितील राजकारनाचे खरे महत्व क़ाय हे समजून घेणे देखील गरजेचे आहे. तेव्हाच भौतिक दृष्टया लोकसंख्येने तरुण असलेला देश राजकीय दृष्टया देखील तरुण देश अशी आपल्या देशाची ओळख निर्माण होईल. तसेच आजचे  तरुण हे उच्च शिक्षित असल्याने व ते जिज्ञासु महत्वकांक्षी असल्याने येणारे भारतीय लोकशाहीचे भविष्य नक्कीच उज्वल असेल.


Source : INTERNET
-अमोल धावडे,
अहमदनगर

आपल्या भारत देशात लोकशाहीची परंपरा लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या विकासासाठी तयार केलेली एक सिस्टीम. लोकशाही मध्ये लोक जो नेता निवडून देतील त्याच्या हातात सत्ता पण काय होत चालय हेच लोकांना माहीत नाही सगळीकडे राजकारण राजकारण. ज्या वेळी निवडणूक येतील त्या वेळेला राजकारणी लोकांना जनतेची आठवण येते एकदा का निवडुन आले पाच वर्षे डोकावूनही ही राजकारणी लोक जनतेकडे पाहत नाही मग कसा विकास होणार आपण आपला देश 2020 मध्ये महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहे परंतु असे जर राजकारण असेल तर ते शक्य नाही.
मला वाटते की आपण ज्या वेळेस निवडणूक घेतो त्यावेळेस निवडणूक आयोगाने अशी तरतूद केली पाहिजे की योग्य सुशिक्षित व्यक्तीच राजकारणत येऊ शकतो अन्यथा त्याला कुठल्याही प्रकारची संधी नाही. आणि त्यांची परीक्षा घेऊन त्यांना जो त्यात उत्तीर्ण होईल तोच निवडणूक लढाऊ शकतो.
पण आता चालाय काय घराणेशाही खासदारांचा मुलगा आमदार कुणी नगरसेवक तर कुणी सदस्य घरातल्या घरात सर्व पदे त्यामुळे कुठूनही आलं तरी ते आपल्याच घरात येणार असं त्यांचं समज पण हे सगळं थांबुन एक सामान्य जनतेच्या हातात सत्ता दिली तर तो नक्कीच चांगले करण्याचा प्रयत्न करेल.
आपल्या भारत देशात तरुणाची संख्या सर्वात जास्त आहे आणि हे राजकारणी लोक त्यांचा वापर करून त्यांना सोडून देतात.
राजकारण हा विषय  जरी अभ्यासक्रमात आला तरी काय उपयोग जी घराणेशाही सुरू आहे तीच रहाणार आहे फक्त त्यात जर बदल करून त्यांचे शिक्षण तपासून संधी दिली तर नक्कीच बदल होऊ शकतो.
आलेला अनुभव दोन शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो एकदा मी पोलीस निरीक्षक दर्जा असणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितले की हे राजकारणी लोक त्यानं क च ख कळत नाही अशा व्यक्तीला आम्हला सलाम करावं लागतो पण करणार काय लोकशाही लोकांनी निवडून दिलेला नेता. आय ए एस असणाऱ्या व्यक्तीला आमदार खासदार यांना सलाम करवा लागतो एवढे कष्ट करून हे लोक उत्तीर्ण होतात परंतु सातवी पास व्यक्तीला सलाम करावं लागतो त्यामुळे क्वालिटी असणारी लोक जर राजकारणात असतील तर नक्कीच आपला भारत देश महासत्ता होईल.
त्यासाठी अभ्यासक्रमात राजकारण हा विषय घेऊन काय उपयोग जनतेच्या हातात सर्व गोष्टी असतात.
धन्यवाद........


Source : INTERNET
-R. सागर,
सांगली

राजकारण.. शहरी भागाबद्दल जास्त माहीत नाही पण खेड्यापाड्यात अतिशय चवीनं चघळला जाणारा विषय.. राजकीय कट्टरता काय असते हे बऱ्याचदा खेडेगावात गेलं की लगेच लक्षात येतं. कित्येकदा हे राजकारण इतकं टोकाचं असतं की सख्खे भाऊही या राजकारणामुळे पक्के वैरी बनतात तर कधी पक्के वैरीही राजकारणासाठी एक होतात. दुसरीकडे राजकारणात राहून मालामाल होणारे नेतेही बघितलेत आणि त्या नेत्यांच्या मागे फिरून स्वतःच्या आयुष्याची आणि कुटुंबाची फरफट करणारे कार्यकर्तेही बघितलेत. आणि यातूनच राजकारणाचे बाळकडू नवीन पिढीला मिळत आहेत. अशा वेळी राजकारण हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची कल्पना नक्कीच स्वागतार्ह आहे.
पण फक्त विषयाचा समावेश अभ्यासक्रमात करून उपयोग नक्कीच नाही. त्यातून राजकारणाकडे बघायचा दृष्टिकोनदेखील बदलला पाहिजे. आणि सध्याचं *सत्तेसाठी काहीही* या पद्धतीचं जे राजकारण सुरू आहे ते बदलून पुढील पिढीला योग्य दिशा देणारं राजकारण सुरू झालं पाहिजे तरच राजकारणासारख्या विषयाचा अभ्यासक्रमातील समावेशाचा उद्देश सफल होईल.


Source : INTERNET
-अक्षय पतंगे,
आ. बाळापूर जि हिंगोली

राजकारण हा विषय अभ्यासक्रमात नसावा असे माझे मत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती सामान्य माणसाच्या हाताबाहेर गेली आहे. राजकारण म्हणजे पैसे गुंतवणे व कमावण्याचा धंदा झाला.
महाराष्ट्राचे 45% शहरीकरण झाले आहे. ग्रामीण भागातून शहरात  नियमित स्थलांतर सूरू आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था विदेशी कंपन्यांच्या हातात गेली. खेडे-पाडे-वाडी-तांडे-शहरे हे मार्केटिंगचे केंद्रे बनवण्यात या कंपन्या यशस्वी झाल्या आणि होत आहेत. पण आमच्या ओट्यावर, पारावर, चौकात , हॉटेलमध्ये राजकारण्याच्या चर्चेत बरेचजण जणू पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखी  त्याच्या पक्षाची बाजू लावून धरतो. पण साध्य काहीचं होत नाही. त्याऐवजी रोजगार, कायमस्वरूपी उपजीविकेचे साधन, ग्रामीण आर्थिक व्यवस्था, सकस आहार, लहान मुलांचे आरोग्य व शिक्षण, शेती , ग्रामीण व शहरी आरोग्य, बाजारव्यवस्था, वृद्धांचे प्रश्न, सेंद्रिय शेती असे विषय अभ्यासक्रमात घेतले तर काहीतरी सकारात्मक परिणाम होतील याची खात्री आहे.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************