अंगणवाडी:सद्यस्थिती व शिक्षणातील गरज.

अनिल गोडबोले,सोलापूर.

मी लहान असताना आमच्या शाळेमध्ये "बालवाडी" नव्हती पण मोठ्या मुलांच्या नादाने लहान मुलं शाळेत यायची आणि पहिली चा वर्ग शेजारी बसायची... छोटी मूल म्हणजे बाईंची (टीचर, मॅडम, मिस... म्हणत नाहीत अजूनही कोकणात) जबाबदारी... त्याच त्यांना बसवून घ्यायच्या झोपु द्यायचा..  त्या वर्गाला कोकणी भाषेत "खापरी" अस म्हणत.. कोणी विचारलं की "खापरित असा.."एवढं उत्तर मिळायचं...

महाराष्टमध्ये साधारण पणे 2000 साला नंतर मुलांना "महिला व बाल विकास विभागासोबत" जोडले गेले. आणि गावा गावात अंगणवाडी आल्या व त्याचा एक भाग म्हणून बालवाडी सुरू झाल्या..

लहान मूल घरी संभाळण्यातून सुटका म्हणून पालक मुलांना शाळेत पाठवतात..  तर शाळा पटसंख्या वाढवण्यासाठी मुलांना समभाळते आणि शैक्षणिक मानसशास्त्र असे म्हणते की बालकाच्या मेंदूची (पेशींची ) वाढ 5 वर्षापर्यंत होते त्यामुळे शिक्षण सुरू करण्याचा योग्य टप्पा त्याच वयात आहे..... 

शालेय पोषण आहार आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आणि गेली काही वर्षे "जननी शिशु आहाराची केंद्र " म्हणून अंगणवाड्या ओळखू जाऊ लागल्या..  

असो... मूळ मुद्धा असा आहे की, अंगणवाडी किंवा बालवाडी असण्याची गरज काय?
तर... मुलांचं समाजिकीकरण होत. 
शिक्षणाची गोडी लागते
चांगल्या सवयी विकसित करता येतात
अक्षर, पाठांतर आणि बुद्धी मत्ता या गोष्टीवर काम करत येत.

मुलांचे आरोग्य तपासणी व लसीकरण होत... व खेळ एकत्र खेळण्याची भावना वाढीला लागते...
 मुलांमध्ये किंवा कुटुंबांना समजून घेऊन मदत करता येते..

फक्त याचा अतिरेक होता कामा नये.. मुलांना तणावाखाली ढकलता नये आणि पालकांनी जबाबदारी तुन सुटलो बाबा म्हणून मुलांना शालेत पाठवू नये..

त्यामुळे कमी वयात हसत खेळत शिक्षण ही योजना व्यवस्थित पार पाडली जाईल..
__________________________________
सौदागर काळे,पंढरपूर.

एक प्रश्न सर्वांना विचारावसा वाटतो तो म्हणजे तुम्ही शेवटचे केव्हा आपल्या भागातील अंगणवाडीमध्ये जाऊन तिचे निरीक्षण,कामकाज पाहिले?अंगणवाडी सेविकांशी मुलांच्या बाबतीत चर्चा केव्हा केली?स्वतःलाच याचे उत्तर द्या.सकारात्मक उत्तर असेल तर उत्तम.
बालकांचा 3 ते 6 वर्षांचा कालावधी खूप महत्त्वाचा असतो.अशावेळी बालक अंगणवाडीत जाणे हे त्याच्या सर्वांगीण वाढीसाठी फलदायी असते.प्राथमिक शिक्षणाचा पाया अंगणवाडीच्या माध्यमातून मजबूत करण्यासाठी साहाय्यक ठरवायचे असेल तर अंगणवाडी आधुनिक पद्धतीने साकारायला हव्यात.

अंगणवाडीत रोजची बालकांची उपस्थिती सुद्धा खूप परिणामक ठरते.सध्या अंगणवाडीत मुलं दररोज न जाण्याची काही कारणे आहेत.त्यात काही बालकांना आई -वडील,आजी -आजोबा यांचा लळा लागतो.त्यामुळे त्यांना सोडून राहायचे म्हटले की रडायला लागतात, काहीजण घरच्या अडचणीमुळे मुलांना पाठवण्यास उत्सुक नसतात,काही हुशार पालक घरीच मुलांना संस्कार देण्याच्या नावाखाली या अंगणवाडीसेविका व्यवस्थित ध्यान देत नाहीत या गृहीत मतांमुळे बालवाडीत पाठवत नाहीत.अंगणवाडीत सर्व मुले रोज उपस्थित असणं याच्यासाठी महत्त्वाचे आहे की,मुल एकलकोंडी होत नाही.सर्वांबरोबर खेळल्याने शरीराचा व व्यावहारिक ज्ञानाचा विकास होताना दिसतो.

आज देशातील किंवा आपल्या राज्यातील किती अंगणवाडीना अंगण आहे?किती अंगणवाडी विविध खेळण्यांनी भरलेल्या आहेत?अंगणवाडीतील सेविका बदलत्या काळानुसार कोणती बालगीते ,गोष्टी शिकवत असते?अंगणवाडीत बालकांना बसण्यासाठी कशी व्यवस्था आहे?प्रत्येक अंगणवाडीत BALA आहे का?(BALA म्हणजे Building as Learning aid)असे प्रश्न घेऊन आपण आपल्या गल्लीतील,भागातील, गावातील अंगणवाडीला भेट देऊन विचारपूस करू शकतो.यातून सद्यस्थिती जाणायला मदत होईल.या वर्षी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प मध्ये राज्यातील 10 हजार अंगणवाड्या आदर्श करण्यासाठी 100 कोटींची तरतूद केली.त्यात आपल्या भागातील अंगणवाडी येण्यासाठी ग्रामपंचायतीने या स्थानिक प्रशासनाने  प्रयत्न केले आहेत का!केले नसतील तर पाठपुरावा करण्यासाठी सुचवायला हवे.

लहान वय हे फक्त ऐकत,बघत,अनुकरण करत शिकत असतं.आपण काहीही बोलण्यास सांगितले की ते बोलते.अन काहीही प्रश्न विचारत असते.जेव्हा ते अंगणवाडीत जात असते तेव्हा पौष्टिक आहारांबरोबर बालगीते, गोष्टी,भिंतीवरच्या चित्रातून- पक्षी,प्राणी,संख्या ओळख,रंग ओळख,शरीराची ओळख इत्यादी बाबींतून त्याला संस्कराची शिदोरी मिळणं गरजेचं असतं.

बालकांच्या जडणघडणीत सर्वात महत्त्वाचा हिस्सा बालगीते,गोष्टी आणि चित्र काढणे व त्याचे रंगभरण करणे हे असते.पण आपल्या अंगणवाडीत ठरलेली बालगीते आहेत.जे त्या बालकाच्या आई-वडिलांनी लहानपणी म्हटलेले असते तेच बालक आजही म्हणत असते.उदा-नाच रे मोरा,मामाच्या गावाला जाऊ या...पिढीनुसार बालगीते विज्ञान,इतिहास,गणित भूमितीशी निगडित असायला हवीत.अशा बालगीतांमुळे मुळे प्राथमिक शिक्षणात रुची निर्माण होते.गोष्टींचे ही तसेच..जास्त गोष्टी देवाभोवती असतात.तिथे महापुरुषांच्या, विज्ञानाच्या, काल्पनिक गोष्टीना स्थान नसते.ते असायला हवं.बदलत्या काळानुसार बालगीते,गोष्टींत बदल म्हणजे उदाहरण सांगायचे झाले तर..सद्या पाण्याची समस्या आहे.पाण्याचे महत्त्व सांगणाऱ्या गोष्टी,बालगीते  नेहमी बालकांच्या कानी पडायला हवीत.अंगणवाडीत किंवा पालकांनी आपल्या घरात कोरे पेपर ,रंगपेटी कायम ठेवायला हवीत.ते ठेवल्याने मुले हवं तसं कागदापासून फुले,पक्षी,वस्तू बनवणे ,त्या कागदावर रेघा ओढणे,कशीही ओबडधोबड चित्रे काढणे.हे त्यांच्या बुद्धीला चालना देत असते.

अंगणवाडीतील सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका ही अंगणवाडीसेविकेची असते.त्यांना आजही योग्य पगार व महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षण मिळत नाही.त्या कायम अपडेट ठेवण्यासाठी सरकारने त्यांचे प्रशिक्षण घ्यायला हवे.जर सरकार ते घेत नसेल तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांनी मागणी करायला हवी.त्यात त्यांना मुलांशी भावनिकदृष्ट्या जुळवून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संस्कारक्षम सवयी कशा लावता येतील याचे शिक्षण कसे द्यावे,काळानुसार बदलणाऱ्या शिक्षणासाठी अंगणवाडीची काय भूमिका राहील हे सतत त्या माध्यमातून सांगायला हवे.उदाहरणार्थ सध्या सोशल इमोशनल लर्निंग(SEL) द्वारे शिक्षणावर भर दिला जात आहे.ते अंगणवाडीत रुजवण्यासाठी  सेविकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे.गावातील किंवा शहरातील प्राथमिक,माध्यमिक शाळेंच्या मुख्याध्यापकांनी बालवाडीकडे लक्ष द्यायला हवे कारण त्यांच्या शाळेत प्रवेश घेणारी मुले अंगणवाडीतूनच येत असतात .म्हणून अंगणवाडीतच मुलांचा पाया भक्कम करण्यावर स्थानिक नागरिकांची धडपड कायम राहिली तर त्या बालकांचे प्राथमिक शिक्षण सुकर झाल्याशिवाय राहणार नाही.
__________________________________
शिरीष उमरे, मुंबई
लहानपणापासुन घरकोंबडा राहायची सवय नसल्याने आमच्यावेळेसचे बालकमंदीर म्हणजे आनंदी आनंदी गडे ! अशी स्थिती होती.  फारसे आठवत नाही पण गोपालकाला म्हणजे सामुहीक जेवण आणि सुसु ला आली तर ताईंना सांगणे एवढेच लक्षात आहे. बाकी वेळ मित्रांसोबत फुल मस्त्या ! काय खेळायचो हेही आठवत नाही....

थोडक्यात आईबाबा व्यतिरिक्त ताई व पोलीस आपल्याला चुक केली तर मारु शकतात ही सामाजिक जाणीव झाली होती. मैत्री म्हणजे निखळ आनंद व मज्जा हे उमगले होते. घर ते बालकमंदीर यामधे मोठे विश्व असते ह्याची जाता येता चुणुक बघितली होती. सामाजिक शिस्तेची पायाभरणी इथुनच झाली होती. 

आत्ताच्या अंगणवाड्या त्या मानाने बऱ्याच चांगल्या वाटतात. जगाची व शिक्षणाची खरी ओळख इथुन होत असल्याने ह्या एक वर्षात मुलांच्या मन, भावना व बुध्दी विकासाला चालना मिळते.  खरे तर एक माणुस कींवा नागरिक म्हणुन जी सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणेला सुरुवात होते त्यासाठी सुक्ष्म अभ्यासाची गरज आहे. विकसित देशात ह्याची फार काळजी घेतल्या जाते कारण ते उद्याचे नागरिक घडवत असतात.

 आपल्याकडे सुध्दा असा अभ्यास होणे गरजेचे आहे. ऑडीओ विडीओ इंपॅक्ट साधुन करमणुक, ज्ञान व संस्कृती यांची सांगड घातल्या जाऊ शकते. वेगवेगळ्या नाविण्यपुर्ण खेळांतुन टीमवर्क, खिलाडुवृत्ती व शारिरीक आरोग्याचे महत्व बिंबवल्या जाऊ शकते. त्यासाठी दुरदृष्टी असणारे नेते, शिक्षक व साधनसुविधांची गरज आहे...
___________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************