जगायचं कशासाठी?


जगताप रामकिशन शारदा,बीड

पडल कधी कोड विचारांना की जगायच कशासाठी
न घेता उसंत क्षणाचीही त्यांना सांगायचे
साने गुरुजींच्या प्रार्थनेतील खरा तो एकची धर्म जगाला सांगण्यासाठी
समाजात उभ्या केलेल्या मतलबी धर्माच्या भिंती भेदण्यासाठी
धर्मा धर्मात विभागलेला माणूस माणसात आणण्यासाठी
विश्वची माझे घर मानणाऱ्या भारताला विश्वगुरू करण्यासाठी
बुध्दाचा शांततेचा संदेश जगाला देण्यासाठी,
दाखवत भारतीय ऐश्वर्याची संपन्नता परकीय आक्रमणांना चोर ठरवण्यासाठी
पानिपतच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत हे सांगण्यासाठी
छातीवर पडलेल्या घावापेक्षा गाजवलेला पराक्रमाच्या पुनरावृत्तीसाठी
स्वातंत्र्य चळवळीत सांडलेल्या रक्ताला प्रणाम करण्यासाठी
बलिदान व्यर्थ गेले नाही हे स्वातंत्र्य सैनिकांना दाखवण्यासाठी
गांधींच्या तत्वांवर उभारलेल्या भारताचा डोलारा सांभाळण्यासाठी,
सुभाषबाबूंच्या भारताप्रतीच्या आदरांसाठी,
विवेकानंदांच्या विचारातील समाज पाहण्यासाठी
कलमांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी
भारतीय राज्यघटनेतील सर्वधर्मसमभाव रूजवण्यासाठी,
लोकशाहीच मंदिर नितीमुल्यांनी आदर्श अस सजवण्यासाठी,
समाजात पसरलेली विशमता मिटवण्यासाठी,
आदर्श भारत घडवताना कामी येण्यासाठी,
गटार गंगेची शुध्दता परत मिळवण्यासाठी
पिकाची प्रसन्नता शेतकऱ्यांच्या जीवनात आणण्यासाठी,
माणसाचा जन्म फुकट घालवला नाही अस शेवटी स्वतः च्या समाधानासाठी
----------------------------------–-----------–-----–----------

अर्चना खंदारे ,हिंगोली.

                  खरे तर हा प्रश्न  प्रत्येकाने स्वतःशी  करायला पाहिजे.कारण त्यामुळेच आपल्या जगण्याला एक नवी  दिशा  मिळू  शकेल.माणूस हा समाजशील  प्राणी  आहे आणि त्यामुळेच तो समूह  करून राहतो.समूहामध्ये आपले जीवन  व्यथित करीत असताना.समाजाशी  समरूप  असलेल्या प्रत्येक घटकाशी  त्याचा संबंध  येत असतो त्यातून त्याला चांगले वाईट अनुभव येतात.समाजात वावरताना  चांगले वाईट अनुभव घेत  असताना परिस्थिती नुसार  स्वतःसाठी  व समाजासाठी त्यामध्ये  अनुकूल  बदल करणे गरजेचे असते...
          
            आता इथे,माझ्या मता  विषयी लिहायचे  असता,मला माझ्या आई साठी जगायचं...आणि आहे तो पर्यंत हि आई साठीच  जगणार  यात  काही शंका  नाही.आणि त्या नंतर मला स्वतःसाठी जगायचं  कारण मी स्वतः हा एक चांगली व्यक्ती बनले तरच  मी इतरांचा आदर,त्यांचे हीत आणि त्यांच्या साठी चांगले कार्य  करेन. यावरून  मी कदाचित  स्वार्थी  हि वाटत असणार ,परंतु  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेऊन  मी बोलत आहे.जर,स्वतःला जेवढे  ज्ञान  संपन्न केले तर त्याच्या किती तरी पटीने  आपण इतरांसाठी  खूप काही करू शकतो.स्वतःला एखाद्या दिव्याच्या ज्योती  प्रमाणे पेटवत  ठेवले तरच आपण संपूर्ण जगाला प्रकाशमय  करू शकतो.आणि मला असच  जगायला आवडेल....
-------------------------------------------------------–---------

प्रविण, मुंबई

काही प्रश्न असे असतात की त्याची एकतर उत्तरे नसतात किंवा त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्यातीलच एक प्रश्न म्हणजे "जगायचं कशासाठी ?" विज्ञानाच्या साहाय्याने याची उकल करून पाहिली, अध्यात्माचा मार्ग निवडून पाहिलं पण हे कोड काही केल्या सुटत नाही. दोन दिवसांपूर्वी रॉबिन शर्मा यांच्या "who will cry when you die" या पुस्तकातील एक कथा वाचत होतो. त्यातील मुख्यपात्र हे अत्यंत समृद्ध आणि यशस्वी असत. मृत्यूशय्येवर असताना त्यांना विचारलं तुम्हाला जर हे आयुष्य दिल तर तुम्ही कोणती गोष्ट कराल? तो यशस्वी (?) "पुरुष म्हणाला मी तो माणूस होईल जो मला बनायचं होत" या उत्तरात आयुष्यच एक कडू सत्य दडलं आहे की आजही माणसाला आयुष्य जगायचं कशासाठी हे नाही कळलं?
___________________________________________

यशवंती होनमाने .
    काय गंम्मत आहे ना , की आपल्याला प्रश्न पडतोय , जगायचं कशाला ? ? 
मला जगायचं आहे स्वतःसाठी , स्वप्नं पूर्ण करण्यासाठी , देवाने सुंदर जन्म दिलाय त्या जन्माचं सार्थक करण्यासाठी , ज्या समाजात राहतोय त्या समाजाचे देण देण्यासाठी , हे सुंदर असं जग बघण्यासाठी ....
मला जगायचं आहे स्वतःला सिध्द करण्यासाठी , माझ्या जवळच प्रेम मुक्तपणे उधळण्या साठी , जगात मुक्तपणे फिरण्यासाठी ....
मला जगायचं आहे जे जे हवं ते ते सगळ करण्यासाठी .....
_____________________________________________

वैशाली सावित्री गोरख.

      खरं तर हा प्रश्नच खूप विचार करायला लावणारा आहे की जगायचं कशासाठी? नि असा प्रश्न ही काही ठराविक वयातच पडू शकतो,नि त्या ठराविक वयातच स्वताला योग्य दिशा दिली तरच ह्या आपल्या जगण्याचं सार्थक होईल नाही तर सगळा आयुष्यातील महत्वाचा वेळ निघून जाईल,उतर वयात तुम्ही विचार करायला लागला की जगायचं कशासाठी तर ह्याला अर्थ राहणार नाही तर योग्य वयातच विचार करायला लागेल की जगायचं कशासाठी ? 
    सध्या तर सगळीकडे पाहिल्यावर नक्की लोक कशासाठी जगात असतील तेच कळत नाही म्हणजे काहीजण फक्त दिवस दिवस दीड जीबी डाटा संपवण्यासाठी जगतात ,म्हणजे तुम्हला समजलं असेलच की फक्त व्हाट्स अँप वरती स्टेट्स टाकण्यासाठी नि व्हाट्स अँप चे स्टेट्स बघण्यासाठी ,नि टिक टॉक चे व्हिडीओ करण्यासाठी काही तरुण पिढी जगतेय ,त्यानंतर काही तरुण पीडी प्रेमासाठी जगतेय ,नि प्रेम नाही सक्सेक झालं की एका क्षणात मारण्याची जिद्द ठेवतेय ,येथे ही दिसत की मग आपण फक्त प्रियकर किंवा प्रेयसी मिळवण्यासाठी जगतोय नि थोडही ह्यातून बाहेर येऊन जीवनाकडे वेगळ्या दृष्टीनेही पाहता येईल का? ह्याचा ही विचार न करता जगणारा तरुणवर्ग मी पाहिलाय. त्यामुळेच प्रश्न पडला की आपण का जगतोय .
      आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आयुष्य हे फक्त एकदाच आहे नि मग आपण विचार करतो की आयुष्य एकदा आहे तर ते मस्त जगलं पाहिजे पण नेमकं मस्त म्हणजे काय ? तर आपण मस्त ची पण व्याख्या खूप वेगळी केलेय, ब्रॅंडेड कपडे घालणे,हातात मोठे मोठे फोन असंण ,चार चाकी गाडी असंन म्हणजे मस्त पण हे सगळं आपण कोणाच्या जीवावर करतोय त्याचा विचार केला तर कळेल की जगायचं कशासाठी नि कोणाच्या जीवावर जगायचं , स्वतःच्या की घरच्यांच्या ?
मला तर स्पष्ट वाटत की जगायचंच आहे तर एक स्वतंत्र नि स्वताची अशी एक विचारसरणी घेऊन जगा , तुम्ही कोणत्याही गोष्टी साठी कोणावर अंकित राहू नका नि कोणाला तुमचा भार होऊ देऊ नका ,हे वाक्य मी एक मुलगी आहे म्हणून लिहलाय कारण आम्ही जेव्हा जन्म घेतो तेव्हाच आमच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी पालकांनी ,समाज्यानी ठरवून ठेवलेत नि त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच अस्तित्व नसणं ,स्वताची ओळख नसणं ,मी मुलगी आहे तर मला पहिल्यांदा कोणाची तर मुलगी म्हणून ओळखतील परत कोणाची तर बायको ,बहीण नि आई ,झालं माझं अस्तित्व एवढंच असेल , तर ह्या सगळ्यातून बाहेर जाऊन मला माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की मला बायको ,आई बनायचं नाही का तर मला हे सगळं असूनही स्वताची अशी एक ओळख हवीय नि ती निर्माण करण्यासाठी मला जगायचंय .
एक भारतीय नागरिक म्हणून सामाज्यात ज्या ज्या चुकीच्या गोष्टी चाललेत त्या त्या बद्दल मी न डगमगता बोलावं , माझं स्वतःच मत निर्माण करावं 
ह्या साठी मला जगायचंय. व मला आयुष्यात कधीच चुकीच्या गोष्टींना समर्थन करायचं नाही नि ह्या लाभलेल्या मोतीमोल आयुष्यात , वेगवेगळ्या लोकांच्या , खूप साऱ्या पुस्तकांच्या , निसर्गाच्या संगतीत मला माझं आयुष्याचं जगायचंय नि महत्वाची गोष्ट आपल्याला येणारे अनुभव गाठीशी बांधून त्यातून योग्य दिशा आयुष्याला देऊन मला जगायचंय .
_____________________________________________

दिपाली  वडणेरे ,नाशिक
       
जगायचं कशासाठी खरंतर  ह्याच एका प्रश्नाच्या  उत्तरासाठी अपण जगत असतो असे  म्हणायला काहीच हरकत नाही असे मला तरी वाटते ...
            कशासाठी  जगायचे ? एक गहण प्रश्न आहे  पण जर विचार केलाच ना तर एवढे कठीणही नाही  आणि एवढे सोपेही नाही जगणे.... पण एक मात्र  नक्की की आपल्यापुढे  कशीही परिस्थिती  उभी राहो चांगली वा वाईट पण आपण तिला नेहमी धैर्याने,  विचारपूर्वक  आणि हसत हसत सामोर गेले पाहीजे माझ्या मते कदाचित यालाच जिवन जगण्यची कला म्हणतात .. कोणी आपल्या बाबतीत काहीही बोलो पण आपण फक्त  एकच करायचं आपली परिस्थिती , आपल्याला  किती  सुख-दुःख आहे हे बघूनच  दुसर्याच्या सुख -दुःखाची जाणिव करायला  हवी.... दुसऱ्याचे सुख पाहून पाहून आपण स्वतः दुखी व्हायचे आणि दुःख पाहून हसायचे त्यापेक्षा  दुसर्‍याच्या  सुख-दुःखात आपले  सुख-दुःख मानता यायला हवे .....
         बाकी जात - पात सोडून माणूस म्हणून जगण्यासाठी  आणि माणूसकी हाच धर्म  अन् हीच जात यासाठी जगावे.....मी पणा सोडून गरिब-श्रीमंती असा भेद न करता समोरचा  व्यक्ती  पण मानूसच आहे याची जाणिव  ठेऊनच त्याच्याशी तुच्छतेने  न बोलता- वागता नम्रतेते वागण्यासाठी जगायचे.....कुटुंबासाठी विशेष म्हणजे  आई - वडिलांसाठी  जगायचे.... त्यांची सेवा करण्यासाठी जगायचे......पण त्याआधी स्वतःसाठी जगायचे ....स्वतःसाठी का म्हणून ???  हा सर्वात मोठा  प्रश्न ;  तर स्वतःसाठी  ह्या म्हणून जगायचे की आधी आपण नम्रतेने ,  शांततेने वागायला - बोलायला हवे अन् विवेकातुन राहायला हवे थोडक्यात जर आपल्याला दुसर्याकडून चांगले वागण्याची , बोलण्याची , अपेक्षा  असेल तर स्वतःपासून  मी सुरूवात करेन आधी समोरच्याला आदर - सन्मान , देईन तेव्हाच पण स्वतःकडील नम्रता मात्र  कधीट नाही सोडणार कारण नम्रतेते  राहीले तर न होणाऱ्या गोष्टी ज्यांचा आपण विचारही केलेला नसतो त्या गोष्टी घडतात....ज्यातुन अनपेक्षित  आणि सुखद आनंद देणारे क्षण घडून येतात .... या आनंदाच्या क्षणांचा आनंद घेण्यासाठी जगायचे..... 
          दुसर्‍याला  दोष देण्याऐवजी त्यांच्या  चुका शोधण्याऐवजी आपण कुठे चुकतोय हे शोधता आले पाहीजे  आपलो चुकी आपल्याला शोधायचीय अन् आपल्यात नविन बदल  कसा करून घेता येईल  यासाठी जगायचेय.... 
        जिवनात काहीतरी नविन करायचे अन् त्याचा मनसोक्त  आनंद घ्यायचाय कुणालाही न दुखावता यासाठी जगायचेय..... यासाठीच जगायचेय.....
        विषयच असा आहे की खूप काही लिहीता येईल आणि या विषयावर प्रत्येकाचे  वेगवेगळे  विचार पण खरचं विचार करण्यासारखे  आणि जीवनाला  एक नविन कलाटणी ( वळण , दिशा ) देणारे आहेत .....

1 टिप्पणी:

  1. जीवन उदासीन, दुःखात, दुसऱ्या ला आपल्या पासून त्रास होत असेल तर जगून काय उपयोग आहे.

    उत्तर द्याहटवा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************