माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग


 

 विश्वनाथ कदम.  वसमत जिल्हा. हिंगोली



माझ्या परिवारातील सद्स्य, नातेवाईक, माझ्या गावातील प्रतिष्ठित नागरीक आणि माझे जिवलग मित्र...
 

           सर्वप्रथम मि आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहु  इच्छीतो..
 

       कारण आज ठिक  एक महीना पूर्वी (दि.७  मे) घडलेल्या घटनेतून माझ्या अमूल्य जिवाचे जतन करून, पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे राहन्यासाठी, जगण्यासाठी, संकटातून सावरण्यासाठी तुम्ही सर्वांनी जे मानसीक पाठबळ दिले, धैर्य दिले,  वाचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली,मनात नवचेतना जागरूक केली. त्यामुळे मि आपल्या सर्वांच्या जन्मोजन्मी ऋणात राहीन.
 

        नेमक  घडल आस कि नेहमी गावाकडे आले की मि  विहीर पाहण्यासाठी काम सुरू होते त्या विहरीत जायचो.     आसच  पाडव्याच्या दुस-या दिवशी विहरीत  पाहण्यासाठी गोलो  होतो, जाताना क्रेन मध्ये गेलो. पण काही वेळानंतर  त्या क्रेनच  ब्रेक तुटल मग काम करना-यांनी वर येण्यासाठी दोरी बांधुन दिली, माझ्या आगोदर दोन व्यक्ती त्या दोरीने वर आले(अंकुशराव आणि लोडबा)त्या नंतर मि वर येत असताना अर्ध्यात आल्यानंतर माझे त्या दोरीचे हात सुटले आणि मि खाली विहरीत पडलो...
 

   मि विहीरीत पडल्यानंतर एक खळबळ उडाली ,सगळ्याची धावपळ सुरू झाली. नेमके याक्षणी काय करावे? मला कस वर काढाव? हे सगळ्यांनाच प्रश्न पडले.  प्रत्येकाच्या मनात वेगवेळ्या शंका येत होत्या. त्यात  कुणी दोरी(धांद) आण, कुणी रूमाल आण, कुमी  बाज  आण.   कुणाच्या पायात चप्पल नको ( सोपान),कुणाच्या डोक्यावर रूमाल नको तर कुणाकडे तेवढी लांब दोरी नही. कुणी शेताकडे दोरी आनन्यासाढी धावतोय ,तर कुणी कुणाच्या घरी दोरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, जो तो आपल्या परिने प्रयत्न करतोय. विहीरीत जो व्यक्ति होता ( दिलीपराव) त्यांनी स्वतः चा रूमाल माझ्या डोक्याला बांधून रक्त 💉थाबवन्याचा प्रयत्न केला.  शेवटी पूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा करून एका तासानंतर बजेवर  बांधून मला वर काढले.
       
          काढल्या नंतर सरू झाला दवाखान्याचा प्रवास, सुदैवाने तेंव्हा गावात वाहन उपलब्ध होत (सुधाकरची गाडी) दवाखान्यात पोहोचताच उपचार सुरू झाले. त्यानंतर दिनांक ९ मे ला मला होश आली.माझ्या सोबत अस काही घडले हे कळाल.( यातल  मला काही माहीती नव्हत पण दवाखान्यातून परतल्यानंतर बर्याच जणांकडून ही घटना खुप वेळस कानी पडली.)

परंतु आज माझ्या वडीलांच्या प्रयत्नांनी आणि आशिर्वादाने, मोठ्या आत्याच्या प्रयत्नांनी आणि आशिर्वादाने, मोठा भाऊ आणि ताईच्या प्रयत्नांनी आणि आशिर्वादाने,  गावकर्यांच्या प्रयत्न आणि सहकार्याने आणि मित्रांच्या सोबतीने पुन्हा एकदा मि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळ आपल्यामुळे शक्य झाले त्यामुळे ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रयत्न केले त्यांच्या सदैव  ऋणात राहीन.. संकटाच  काय ते तर येण्यासाठीच असतात. स्वामी विवेकानंदांना सुद्धा शिकागोच्या धर्म परीषदेय गेल्यानंतर राहन्यासाठी व जेवनासाठी दारोदारी फिरावे लागले ,मि तर एक सामान्य व्यक्ति आहे. तुमच्या सोबतीने या संकटाचा सामना केला तसा कुठल्याही संकटाचा करेल.
     

               खरच सदैव मि  तुमच्या सर्वांच्या ऋणात राहीन....



खरच माझ्या साठी हा प्रसंग खुप खुप प्रेरणादायी आहे.
__________________________________

अनिल गोडबोले
सोलापूर..

या विषयावर लिहिण्यासाठी प्रसंग शोधत होतो तर भली मोठी रांग लागली... आठवणींची.. कोणी कुठे.. कस.. आपल्याला प्रेरणा दिली असेल.. याची

लहान पणी मला आठवत आहे... तिसरीत असताना. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर भाषण दे... तू बोलशील व्यवस्थित" अशी प्रेरणा आमच्या एक शिक्षकांनी दिली.. आणि मी पहिल्यांदा शाळेबाहेर जाऊन एका कार्यक्रमात भाषण दिल..(अर्थात पाठांतर करून) पण त्या नंतर मात्र प्रत्येक वक्तृत्व स्पर्धा मी सहभाग घेतला.

त्या नंतर मला आठवत की बीएस्सी करून मी जॉब शोधत होतो... आणि मला समाजकार्य करणाऱ्या संस्थे मध्ये नोकरी मिळाली..."तिथे रोज, एच आय व्ही/ एड्स, कंडोम, आजार, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, ट्रक ड्रायव्हर.. या ठिकाणी काम करण्यात मला काहीच कळत नसे. कारण घरी किंवा मित्रात देखील असे विषय कुठे नसतात.. आणि डायरेक्ट रस्त्यावर उतरून माहिती द्यायची?... मी पळून जाण्याच्या विचारात होतो.... पण आमचे एक डॉक्टर होते.. त्यांनी मला समजावलं की तू नाहीतर कोणीतरी हे काम करणारच, त्या नंतर वेळोवेळी सामाजिक प्रश्नांची जाणीव होत गेली...

आता या टप्प्यावर आल्यानंतर मात्र एक प्रेरणादायी गोष्ट अशी घडली की... काही नोट्स वाचण्यासाठी मी मागच्या इ- मेल शोधत होतो. तेव्हा 2009 साली माझ्या एका मैत्रिणी ने पाठवलेला मेल मला पुन्हा वाचायला मिळाला, आणि माझ्या विषयी तीच जे मत होतं.. ते वाचून मला आश्चर्य आणि आनंद वाटला..

मी ज्या वेळेला मेल उघडत होतो तेव्हा डोक्यात बरेच विचार घोळत होते, 'इन्स्टिट्यूट, शिक्षक, पुढची बॅच, नियोजन, परिस्थिती बदलत जात आहे... वगैरे वगैरे तसेच आपण किती प्रयत्न करणार आहे? आयुष्यात कधी यशस्वी होणार की नाही.....आणि अचानक तो मेल।वाचला व आत्मविश्वास वाढला.

2009 साली पाठवलेला एक मेल, जेव्हा मोबाईल मध्ये मेल नव्हता.. नेट कॅफे शिवाय इंटरनेट उपलब्ध नसायचे... त्या वेळी पाठवलेला मेल.. आणि खर तर  तेव्हा जेवढा त्याचा अर्थ कळला नाही.. तेवढा आता समजला..
अचानक पणे विचार करण्याची पद्धत बदलली..

तर उत्तम प्रेरणादायी काय असेल? तर ते त्या त्या वेळी तुमचे नकारात्मक विचार बदलून तुम्हाला चांगलं वागायला भाग पाडत ते सर्व प्रेरणादायी.....
__________________________________

भूषण.
सोलापूर..

काहीच दिवसांपूर्वी ची गोष्ट...
13-14 ऑगस्ट ची..
मुंबई वरून 13 ला रात्र सोलापूर ला निघालेलो..
मुंबई सोलापूर प्रवास तसा नाविनही नाही आणि विशेषही नाही, त्यामुळे उत्साही वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता, रात्री 10:30 ते सकाळी 7:00 पर्यंतचा प्रवास असल्याने निवांत झोप घ्यायची हे ठरलेलं..
सोबत राजेश पण होता पण त्याची सीट दुसर्या डब्ब्यात असल्याने नाईलाजाने त्याला जावं लागलं.
रात्रीचे 11-11:30 वाजले, आता झोपुयात असं ठरवलं पण समोरच्या सीट वर दोघा मुस्लिम व्यक्तींच्या गप्पा सुरु होत्या...दोघेही चांगल्या मोठ्या घरातले आणि सुसंस्कृत दिसत होते आणि सभ्य...ते दोघेही वयाने मोठे असूनही एकदम अदबीने त्यांनी विचारलं की "तुम्हाला डिस्टर्ब तरी होत नाहीए ना, तस असेल तर आम्ही दुसरीकडे जातो?"
तस तर त्यांच्या आवाजाने मला झोप येत नव्हती, पण तरिही मी म्हटलं की मला काही डिस्टर्ब होत नाहीए..
शेवटी झोप काही लागेना.. वेळ जात होती आणि 2:30-3:00 च्या सुमारास ते दोघेपण झोपी गेले अन मलाही थोडी झोप लागली..
सकाळ झाली, 6:00 च्या आसपासची वेळ. डोळ्यांवर झोप स्पष्ट दिसत होती माझ्या, पण सोलापूर येणार असल्याने उठून बसणं गरजेचं होतं..
त्यातल्याच एकाने मला म्हटलं की, "हमारी वजहसे आपकी निंद पुरी नही हुई"
मी फक्त एक smile देऊन गप्प बसलो..कारण त्यांचा सभ्यपणा पाहून मलाही जास्त तक्रार करावीशी वाटलीच नाही..
थोड्या वेळाने तोंड धुवून आल्यावर टॉवेल काढण्यासाठी मी सॅक उघडली तर त्यात एक Badge आणि एक तिरंगा ठेवलेला त्यांनी पाहिला...
आणि मग एकदम सभ्य आवाजात त्यांनी विचारल की ," साहब क्या मै आपसे कुछ बात कर सकता हु?"
मी म्हटलं,"त्यात विचारण्यासारखं काय?"
तर तो माणूस सांगायला लागला, "साहब मेरा भी एक छोटा बच्चा है, वो भी अपने वतन से बेहद मूहब्बत करता है, अभी छोटासाही है, मगर मुझसे कहता है की बापू कल 15 अगस्त है, अपने तिरंगेका त्योहार है, मैने तो ऊसे यही सिखाया है की, बेटा सबसे पहले अपना वतन है, बाकी सब बाद मे, मै ऊसे आर्मी अफसर बनाना चाहता हु.."
मी केवळ ऐकत होतो..
परत मला म्हणाले की ," आप भी कभी मेरे बच्चे को मिलेंगे तो आप भी ऊसे इस मिट्टी से प्यार करने की बाते सिखा देना"
मी खरच काही बोलू शकत नव्हतो, मी फक्त मान हलवून होकार देत होतो..
मला ते म्हणाले की, "साहब, मै कभी कही भी खुद का मजहब अपने देश से बडा नही मानता, और यही बात मै अपने बच्चे को भी सिखाता हु"
त्यांचं बोलणं ऐकून खरच खूप समाधान ही भेटतं होत आणि आनंदही भेटतं होता, एवढ्या छोट्या मुलाला ते कित्ती मोठी गोष्ट शिकवत होते..

कुठे जाती भाषा धर्मासाठी लढणारे इतर लोक, अन कुठे असे देशावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारे लोक.. त्यांच्या बोलण्याने रात्रभरची मरगळ संपली...
ते म्हणतात ना की राष्ट्रनिष्ठेला कुठला धर्म नसतो कारण राष्ट्रनिष्ठा हा स्वतःच एक धर्म आहे..
शेवटी सोलापूर आल्यावर मी उतरत असताना, त्यांनी मला म्हटलं की ," साहब मैने अपने बेटे के लिए तीन झंडे लिए थे, उसमेसे एक आप रख लिजीए, मेरी ओर से आपको 15 अगस्त का तोहाफा,इससे बडा तोहफा मेरी नजर मे कुछ हो ही नही सकता"
.
निःशब्द...!!!
.
केवळ निःशब्द...
.
आजवर मला मिळालेल्या "One of the richest Gifts" पैकी एक गिफ्ट होत ते...
प्रत्येक माणूस जाती धर्माची आयडेंटिटी सोडून, भारतीय म्हणून स्वतःला ओळखु लागला तर मग Brotherhood तयार व्हायला आणखी कशाचीच गरज नाही पडणार..
कोण कुठला तो माणूस,पण त्याने फक्त एक "हिंदुस्थानी" ह्या नात्याने माझ्याशी आपुलकीचा बंध बांधला..
त्याने दिलेला तो तिरंगा एकदम सन्मानाने आणि अभिमानाने घेऊन त्याला शेवटच अभिवादन करून मी समाधानातच निघालो, एका भारतीयांची भेट झाल्याच्या समाधानात...मी निघालो प्रेरणा घेऊन, ह्या देशासाठी झटण्याची प्रेरणा घेऊन...
__________________________________


वाल्मीक फड निफाड नाशिक.

प्रसंग अनेक प्रकारचे येतात माणसावर परंतु प्रतिकूल परीस्थीती असताना जो त्यावर मात करुन तेही न डगमगता पुढे जात असतो तो खरा माणूस असतो असं मला वाटतय.
खरं म्हणजे प्रेरणा फक्त आपले चाललेलं आयुष्य आपल्याला येणारे उत्पन्न यावर आधारीत असली म्हणजे ती प्रेरणा बहुधा इतकी विशेष नाही.खरी प्रेरणा म्हणजे अशी कि,ती प्रेरणा मिळाल्याने माझे देशप्रेम वाढेल,माझ्या हातून समाजातील जे वैचारीक ,आर्थिक तसेच समाजिक दुष्टिने जे मागास घटक आहेत आणी त्यांची सेवा करायला जी प्रेरणा मिळेल त्या प्रेरणेला खरी प्रेरणा म्हणावी असे मला वाटते.
तसा मला गायनाचा नाटकाचा छंद लहानपणापासूनच पण जेव्हा मी आठवीत गेलो तेव्हा माझ्या बाबतीत एक प्रसंग घडला.शाळेत गॕदरींगच्या कार्यक्रमाची तयारी चालू होती ,काही मुले नाटकाचा सराव करत होती आणी मी पण त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होतो.शिक्षक वारंवार  सांगुनही राजाचे पाञ असलेल्या त्या मुलाच्या लक्षात काही गोष्टी येत  नव्हत्या.गुरुजी वैतागून गेले पण काही बोलता येत नव्हते.गुरुजींना पाहुन मी मनाचा धिटपणा दाखवत म्हणालो सर मी करुन दाखऊ. सरांनी आशाळभूत नजर माझ्यावर फिरवत मला मानेने होकार दिला.मीही आलेल्या संधीचं सोनं केलं असा राजाचा रुबाब दाखवला आणी मला त्या नाटकात राजाचे काम मिळाले.
जेव्हा माझे संवाद आणी अभिनय सरांनी पाहीला आणी माझ्या पाठीवर जेव्हा शाबासकीची थाप मिळाली मी तर कृतकृत्य झालो.
हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही कारण तिथून पुढे खर्या अर्थाने माझा कलाकारी प्रवास सुरु झाला.कविता लिहिने कथा लिहीने नाटक लिहून स्वताच कलाकार होऊन सादर करणे आणी म्हणूनच हा प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्व प्रसंगापेक्षा प्रेरणादायी आहे असे मी मानतो.
__________________________________


श्रीनाथ कासे,
सोलापूर.


नेमके प्रेरणा म्हणजे काय ? त्याचे प्रकार आणि त्याच्या मानवी जीवनातील स्थान, या सर्व गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे.
माझ्यामते, एखाद्या व्यक्तीला मानसिक, शारीरिक, धैर्य वाढवण्यासाठी आणि एखादा कार्य करण्यासाठी त्याला मदत करते ती प्रेरणा...
प्रेरणेचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक आंतरिक प्रेरणा, दोन बाह्य प्रेरणा.
मला प्रेरणा माझ्या वडिलांकडून मिळते. माझ्यासाठी सर्वात मोठा " प्रेरणेचा स्रोत "  म्हणजे माझे वडील. माझे वडील भारतीय सैन्यामध्ये होते. मला त्यांच्या सैन्य जीवनापासून प्रेरणा मिळत गेली. पुण्याच्या NDA मध्ये शस्त्र घर माझ्या वडिलांकडे असायचे . तिथे अनेक शस्त्र, बंदुका असायच्या. त्यामध्ये सर्वात छोट्या शस्त्रपासून पासून मोठे रायफल पर्यंत सर्व उपलब्ध असायचे. वडिलांचे मित्र मला माझ्या हातामध्ये, मला न उचलणारे रायफल द्यायचे आणि चालव म्हणायचे मी खूप प्रयत्न करायचो पण ते काय मला जमायचं नाही.
सेवानिवृत्तीनंतर आम्ही आमच्या गावाकडे राहायला आलो ग्रामीण भागांमध्ये लहानाचा मोठा झालो पाचवीला हायस्कूल मध्ये गेलो होतो तिथे प्रथम क्रमांक मध्ये उत्तीर्ण झालो. तिथे निबंध स्पर्धा घेतली जायचे तिथे मी भाग घ्यायचो आणि मनाला येईल ते लिहायचो आणि त्या लिखाणाने मला प्रेरणा मिळायची.
घरी शेती, फळबाग असल्यामुळे मी ते विकायला विविध आठवडी बाजारामध्ये जायचो. तेथे किरकोळ व्यापाराशी संपर्क यायचा. खरं मार्केटिंग काय असतं ?मी तिथेच शिकलो. पुढे जिल्ह्याच्या ठिकाणी मार्केट यार्डमध्ये शेतातील माल घेऊन जायचो. त्याला भाडे खूप जायचे म्हणून आम्ही मालवाहतुकीसाठी ऑटो रिक्षा घेतली. अकरावी आणि बारावी मध्ये मालवाहतुकीस साठी रिक्षा चालवायचो. रात्रभर वाहन चालवणे, दिवसभर शेतातील कामे यामध्ये मला ड्रायव्हर, व्यापारी आणि ट्रॅफिक पोलीस यांचा जवळचा संबंध यायचा. ड्रायव्हरचे काम खूपच कठीण असते. येथूनही मला प्रेरणा मिळाली.
पुढे शिक्षणामुळे गाव सोडणे आवश्यक होते त्यामुळे हे सर्व सोडून आपल्या शिक्षणाचा प्रवास सुरू केला तसेच राजकारणामध्ये आवड असल्यामुळे या ना पार्टीमध्ये उपस्थिती नोंदवायचो.राजकारणामध्ये दोन गोष्टी गरजेचे आहेत एक नंबर जात, दोन नंबर पैसा या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे समप्रमाणात आहे तोच यात टिकू शकतो. नंतर समजलं राजकारणापेक्षा समाजकारण करणे गरजेचे आहे. वडिलांची समाजसेवा गावाकडे सुरू होती. एकदा गावाकडे गेल्यावर समजले की राजीव गांधी पेन्शन योजनेसाठी काही विधवा स्त्रिया आणि दारिद्र्य रेषेखालील काही वृद्ध आपल्या घरी चकरा मारत होते. मी वडिलांना विचारलं नेमकं काय प्रकरण आहे. वडील नेहमीप्रमाणे माझ्याकडे बघितले आणि स्मितहास्य करत म्हणाले, मी जवळजवळ दोन महिने झाले त्यांच्यासाठी काम करतोय. यांचे सर्व फॉर्म भरलोय, यावर तलाठ्याची सही होत नव्हती. ते आता झालेले आहे. तलाठ्याच्या वरचा एक अधिकारी सही करण्यासाठी पैसे मागतोय. मी तर या लोकांना पैसे मागू शकत नाही, कोण विधवा आहे तर कोण वयोवृद्ध आहे. त्यांच्याकडे जिल्ह्याचे ठिकाणी जायला पन्नास रुपये नाहीत, ते कुठून पैसे देतील.
 मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. काही प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात आले आणि काही प्रकरणे स्थानिक पातळीवर रोखली गेली. जेव्हा एका वृद्धाच्या बँक खात्यात सहाशे रुपये जमा झाले. हा क्षण माझ्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी होता.

मागच्या वर्षी जेव्हां दसऱ्याच्या दिवशी गावाकडे गेलो होतो. तेव्हा गावातील एका शिक्षकाने विचारले काय करतोय सध्या ?  मी, एम बी ए झालाय सर, जॉब ला आहे. ते म्हणाले, अरे तू तर रिक्षा चालवायचा ना ? मी त्यांना एवढंच म्हटलं, सर तेव्हा त्याबरोबरच मी शिक्षणही घेत होतो.
वडिलांबरोबर एकदा केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली तो क्षण, कॉलेजमध्ये सामान्यज्ञान स्पर्धेनिमित्त माझा संस्थापक आणि कुलगुरू हस्ते सत्कार, तो क्षण, दिव्य मराठी मध्ये माझा राजश्री शाहू महाराज यांच्या वर लिहीलेला लेख पहिल्या पानावर आला होता तो क्षण, पुण्यनगरीमध्ये माझ्या तोडक्या मोडक्या कविता छापून यायच्या तो क्षण, याशिवाय बरीच कामे माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग आहेत.
टीप- (सर्व छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************