तारुण्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तारुण्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आजचा तरुण आणि भगतसिंग

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

आजचा तरुण आणि भगतसिंग

नवनाथ वाघ,अहमदनगर.

एकदा असंच थेटर मध्ये एक चित्रपट पाहताना सुरुवातीला *अब भी जिसका खून न खोला, वो खून नहीं पानी है*...... अशा काही ओळी दिसल्या. तात्पुरता श्वास रोखून वाढावा अस सुद्धा कुणाला झाल नाही.

आमचं रक्त उसळत की; भाऊबंदकी मध्ये शेताचे बांध कोरताना, शेजारयाची जिरवायला,निवडणुका मध्ये, जत्रात मिरवायला, महागडे मोबाईल वापरायला. उरलंच तर, फ्लर्ट करायला,कुणा मागे मागे शेपुट हलवत फिरायला.

भगतसिंग हे हसत हसत फासावर गेलेले क्रांतिकारक ह्यापलीकडे फार तर 1 2 वाक्याचीच ओळख आपण पटवुन देतो. त्यांच्या कार्यातून पेटून उठायला त्यांची समर्पित भावना लक्षात घ्यायला हवी.

आज आपल्याला तरुणांचं बलिदान नकोय पण निदान देशासाठी समर्पित भावना पुरेशी आहे.

*.....जो देश के काम ना आए ओ बेकार जवानी है l* ही त्या थेटर मधल्या वाक्याची दूसरी ओळ होती.

देशाच्या काम येण म्हणजे काय ? आता बंदुका😱 घेऊन नेमकं कुठं उभा रहावं अस वाटत असेल. नाही, मग निदान स्वछता अभियानात एखादा फोटो तरी इन्स्टाग्रामवर असावा. 🤔🤔अम्म्मम नाही का, मग सामाजिक मोठी मदत तरी करावी.. नको का कुठून आणावा ना इतका पैसा.... अअम्म....काय करावं मग🧐

चला विकास करूयात का, नाही बुआ🤥, राजकारणापासून चार हात लांबच बर😒....

क्रांतिकारक बनायचय ना 🤗, भगतसिंगा सारख, चला मग जीव ओतून देऊ😎...अहो पण  ओतायचा कुठे?🤨

आहेत की अशा काही खास जागा,
आपल्या कामावर, क्षेत्रावर जीव ओतू, त्या क्षेत्रात नाविन्यता कशी आणता येईल ह्यावर भर घालू, त्यातून संशोधन वृत्तीवर भर घालत राहू.

व्यवसाय, नोकरीतुन योग्य पैसा कमवत राहू, निदान टॅक्स भरता येईल इतका रोजगार तरुणांनी उपलब्ध करून घ्यावा; त्यासाठी लागणारे कौशल्य वाढवावे. निदान टॅक्स च्या रूपाने देशाच्या कामी आलो तरी समाधानकारक व पुरेस मानून घेऊ.

आपली अभिप्रेत असलेली जवानी ह्यातून दिसून येईलच, फालतूपणा कमी,धाडसी व क्रियाशील तरुण निर्माण होतील तीच खरी भगतसिंह ह्यांना आदरांजली असेल. ते आपल्या रूपाने भारतभूमीत कार्य करत राहातील.

तुम्ही पाहिलेत का भगतसिंगाना ? चला मस्त सेल्फी काढू
*==========================*

अनिल गोडबोले,सोलापुर

भगतसिंग हे नाव घेतलं की नक्की काय आठवतं? त्यांनी केलेला काकोरी कट, घातलेल्या गोळ्या आणि संसदेतले बॉम्बस्फोट...
आणि हल्ली पिक्चर मुळे जालियनवाला बाग हत्याकांड, चंद्र शेखर आझाद व तुरुंगातील उपोषण आणि फाशी..( हे देखील खूप डिटेल झालं)

पण सोईस्कर रित्या ते ज्या विचारधारेतून वागत होते किंवा तसच का वागले आणि राजकीय मत या बद्दल जास्त बोललं जातं नाही असं मला वाटत.

आजचा तरुण हा जे काही वागत आहे ते विचार धारेतून वागत आहे का? हिंसेचे समर्थन करता येणार नाहीच पण त्यावेळी ती गोष्ट त्यांना का गरजेची वाटली? या बद्दल विचार होणे गरजेचे आहे.

त्यांच्या पक्षाचे नाव देखील रिप्लब्लिकन पक्ष होत. त्यांची राजकीय मत आणि नास्तिकता किंवा कुठल्याही मुद्ध्याला ठाम पणे नाकारण्याची किंवा जे बुद्धीला पटत आहे ते सर्वस्व ओतून करण्याची जिद्द असलेला तरुण आज पाहिजे आहे.

आजच्या तरुणांकडे सगळं काही आहे.. फक्त ती दृष्टी आली ना की भगतसिंग नक्की मुळापासून समजू लागतील

आणि शेवटी आता  "कातिल" ही आपलेच आहेत. "सरफारोश" पण आपले च आहेत. हा निरक्षीरविवेक कळला तर आम्ही ही म्हणू "सरफारोशी की तमन्ना आबा हमारे दिल मे है।"
*==========================

प्रविण, मुंबई

देशाप्रेमाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भगत सिंह
त्यागाची व्याख्या म्हणजे भगत सिंह
सळसळणारे रक्त म्हणजे भगत सिंह
अन्याया विरुद्धचा आवाज म्हणजे भगत सिंह
धर्मांधेशी बंड म्हणजे भगत सिंह
तरुण भारताची ओळख म्हणजे भगत सिंह
क्रांतीच दुसर नाव म्हणजे भगत सिंह

भगत सिह जगले ते देशासाठी. तो फासीचा शेवटचा क्षण जणू काही सांगत होता कि मृत्यू यावा तर असा. आयुष्य ला हि हेवा वाटावा अस होता तो क्षण होता. अनेक पैलू असलेले त्यांचे आयुष्य होत. ते लेखक होते, कवी होते, देशातील पहिले मार्क्सवादी, भाषेवर पकड असलेले ते उत्तम वाकपटू इ. अनेक पैलू त्यांच्या आयुष्यात होते. पण आजही हि भगत सिंह यांची देशभक्ती हीच काय ती लोकाना माहित आहे आणि जे काही चित्रपट आले त्यातही “राष्ट्रवाद” प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आला.  भगत सिंह हे पुरोगानी आणि वैज्ञानिक विचारांचे क्रांतीकारक होते. ते नास्तिक होते आणि शेवटच्या क्षणी पण त्यानी ईश्वर कडे प्रार्थना केली नाही. तरुणांना चीकीस्तिक रहाव, रूढी- परंपरावर टीका करावी, जे सद्सद्विवेक बुद्धीला पटते तेच स्वीकारावे आणि कोणत्याही विचारावर, व्यक्तीवर आंधळ्यासारखं विश्वास ठेऊ नये हीच त्यांची शिकवण होती. पण आजचा तरुणात ती बंडखोरी नाही दिसत. सध्या देशात जे चाललाय त्यावरून तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि टीकात्मक तरुणाची जात दुर्मिळ होतेय आणि भक्तांच प्राबल्य वाढतंय. प्रत्येक अन्यायाविरुद्धच्या आवाजात भगत सिंह आज हि जिवंत आहे आणि प्रत्येक तरुण मनातला भगत सिंह जागा करणे गरजेचे आहे.
शेवटी म्हणे ,भगत सिंग तुझे जिंदा होणा है

कल भी छल था आज भी छल है
छल में हर मनुष्य निर्बल है
उस छल का बल कम करना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है
*==========================*

अभय डोंगरदिवे

*मेरे सिने में जो आग है*
*लहू से लिपटा जैसे साज है,*
*भारत माता के कदमों पर*
*जान भी मेरी गिरवी आज हैं...*


*इन्कलाब का एक नारा हैं*
*जो हैं धधकता मेरे दिल में,*
*न्योछावर हैं धड़कन मेरी*
*इस मिट्टी के हर कण कण में...*


*बेंच दिया है ख़ुदको मेंने*
*देश को कई ज़माने से,*
*तन मन मेंरा इस धरती का*
*ना लौटूंगा मनाने से...*


*पागल बनकर प्यार करूं मैं*
*जान से भरी हथेली हैं,*
*पहला प्यार है मिट्टी मेरा*
*अब मौत भी बनीं सहेली हैं...*


*देश की गोद में आजादी को*
*चाहता हूं में गीत सुनाना,*
*अब इस बार हैं लिखना मुझको*
*अपने लहू से राग पुराना...*


*सरफ़रोशी चढ़ चुकी हैं*
*दिलों दिमाग और नस नस में,*
*शहिद बननेे चला है बेटा*
*है आंसु ना अब बस मैं...*
*================== ========*

गणेश भंडारी

आज आपल्या देशाचे भूषण असलेले व आपण सर्वांना अभिमान असलेले भगतसिंह यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना शत-शत नमन!

आपण भगतसिंहांना साधारणतः प्रखर देशभक्त, थोर क्रांतिकारक, देशासाठी बलिदान देणारे या रुपात ओळखतो. पण त्यांची केवळ एवढीच ओळख पुरेशी नाही. त्यांची साम्यवादी विचारसरणी, त्यांचे नास्तिक असणे, चिकित्सक वृत्ती, अभ्यासाची व नवीन गोष्टी शिकण्याची आवड हे इतर अनेक पैलू विचारात घेण्यासारखे आहेत; पण ते त्यांच्या देशभक्तीच्या व बलिदानाचा वलयापुढे दुर्लक्षितच राहिले. किंबहुना ते जाणूनबुजून दुर्लक्षित ठेवले गेले असे म्हणण्यासही वाव आहे.

आपणा तरुणांना भगतसिंहांचा आदर्श घेण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. पण बारकाईने पाहिले असता असा सल्ला देणाऱ्याला भगतसिंहांचा नेमका कोणता आदर्श अभिप्रेत असतो? नास्तिक्याचा? चिकित्सक वृत्तीचा? साम्यवादी विचारांचा? छे छे! काहीतरीच काय? तो आदर्श घेतला तर त्यांच्या दृष्टीने केवढा अनर्थ होईल!

वर चर्चा केलेल्या भगतसिंहांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा परिप्रेक्ष्यात आजचा तरुण नेमका कोठे आहे? आजचा तरुण-म्हणजे आपणच-आज आपण विविध लहानसहान गोष्टींतून आपली देशभक्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण भगतसिंहांना अपेक्षित असलेली देशभक्ती आपण अजूनही दाखवू शकलो नाहीत. आपण केवळ देशभक्तीच्या विविध प्रतिकांत व पर्यायाने आंधळ्या देशप्रेमात गुरफटत चाललो आहोत. देश या संकल्पनेच्या आपण करून घेतलेल्या आकलनातच लोच्या आहे! देश म्हणजे केवळ भौगोलिक क्षेत्र नसून त्या भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या माणसांचा मिळून देश बनतो हे अजून आपल्याला समजलेले नाही. देशातील माणसांवर होणाऱ्या अन्यायाची भगतसिंहांना भयंकर चीड होती. त्याविरुद्ध ते पेटून उठत. आज आपल्या डोळ्यांदेखत आपल्या देशबांधवांवर विविध प्रकारचा अन्याय होतोय. स्त्रियांवरील अत्याचार, आपलेच बांधव असलेल्या दलितांचा छळ, मजुरांचे शोषण, शेतकऱ्यांची पिळवणूक- किती उदाहरणे द्यावीत! आज आपल्या डोळ्यांदेखत हे सगळे घडत असताना पेटून उठतोय का आपण? होतेय का गरम आपले रक्त हे सारे पाहून? करतोय का आपण उघड विरोध या सर्वांचा? नाही ना? उलट बऱ्याचदा आपण या सगळ्यांचे निर्लज्जपणे समर्थनही करतो. जे थोडे लोक याविरुद्ध बोलतात, त्यांना वेड्यात काढतो. मग कोणत्या तोंडाने भगतसिंहांचा वारसा सांगणार आपण? आपल्याला अधिकार तरी आहे का तो?

भगतसिंहांना अभिप्रेत देशभक्ती आपण आपल्यात मुरवू शकलो नाही, त्यांच्या बाकीच्या गुणांचे अनुकरण तर दूरची गोष्ट. त्यांची साम्यवादी विचारधारा समजून घेण्याचा, तिचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे तर दूरच; पण कोणी थोडा डावीकडे झुकलेला दिसला तर आपण त्याला सरळ 'नक्षलवादी' हे लेबल लावून मोकळे होतो. आता तर त्यासाठी 'अर्बन नक्षल' ही नवीन टूम आलीय. जर भगतसिंह आज आपल्यात असते, तर त्यांना आपण पचवू शकलो असतो का? त्यांची आपण काय दशा केली असती याचा नुसता विचार करूनच अंगावर काटा येतो. ज्यांच्या देशप्रेमाचे आज आपण गोडवे गातो, त्यांची आपण देशद्रोही ठरवून केव्हाच बोळवण केली असती, त्यांना पाकिस्तानचे हस्तक, देशाचे शत्रू अशा पदव्याही बहाल केल्या असत्या.

भगतसिंहांची वृत्ती चिकित्सक होती. कोणत्याही गोष्टीवर ते आंधळेपणाने विश्वास ठेवत नसत. तिच्या मुळापर्यंत जाऊन, तिचा खरेखोटेपणा तपासून जर बुद्धीला पटले तरच त्या गोष्टीचा ते स्वीकार करत. त्यांच्या या चिकित्सक बुद्धीची झलक त्यांच्या 'मी नास्तिक का झालो' या निबंधात पाहायला मिळते. त्यांच्या या चिकित्सक वृत्तीची जरा आपल्याशी तुलना करूयात? चिकित्सक वृत्ती मुद्दाम अंगी बाणवावी लागते, त्यासाठी मनाला तसे वळण लावावे लागते. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. या प्रयत्नांचीच आपल्यात कमतरता आहे. परंपरेने चालत आलेल्या गोष्टींचा आपल्या मनावर इतका पगडा आहे, की त्यांची चिकित्सा न करताच आपण त्यांना कवटाळून बसतो. तर्काच्या कसोटीवर त्यांना परखीत नाहीत. नरेंद्र दाभोलकर, श्याम मानव ह्या लोकांनी आपल्याला तार्किक विचार करण्यास कितीही प्रवृत्त केले तरी आपण तो करीत नाही. एवढेच काय, एखाद्याने तसा विचार करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला साथ देणे, प्रोत्साहन देणे तर दूरच; उलट त्याची निंदा करतो, त्याला हतोत्सहित करतो. आजच्या तरुणांच्या दैनंदिन वागण्याचे जरा बारकाईने निरीक्षण केले, तर ते चिकित्सक वृत्तीच्या अभावी अंधश्रद्धांच्या चिखलात किती खोलवर रुतले आहेत याची कल्पना येईल.

भगतसिंहांची आणखी एक विशेषता म्हणजे चांना नवीन गोष्टी शिकण्याची, ज्ञान संपादन करण्याची असलेली आवड. फाशीच्या तख्तावर चढण्याचा अगदी आदल्या दिवसांपर्यंत त्यांची ज्ञानसाधना चालू होती. त्यांना अवघे तेवीस वर्षांचे आयुष्य मिळाले, पण त्या अल्पावधीत त्यांनी किती अफाट ज्ञान मिळवले होते, याची चुणूक त्यांच्या उपलब्ध लेखनावरून येते. आणि आजचा तरुण? मला वाटते, त्याची आणि पुस्तकांची कित्येक दिवस गाठच पडत नसावी! आजच्या इन्स्टंट मनोरंजनाच्या काळात आपण ज्ञानसाधना विसरूनच गेलो आहोत.

जर आपल्या तरुण पिढीने खरोखर भगतसिंहांचा आदर्श घेतला, आपल्यातून हजारो-लाखो नव्हे, पण काही शेकड्यांतच भगतसिंह आपल्या देशाला लाभले, तर आपल्या देशाचे चित्र आजच्यापेक्षा निश्चितच वेगळे असेल यात शंका नाही!
*==========================*
संदिप बोऱ्हाडे,वडगाव मावळ,पुणे
  फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे.. काय हा त्याग..'मेरी दुल्हन तो देश कि आझादी है! म्हणून घरातून निघून गेलेला एक तरुण..आम्ही तर स्वातंत्र्यांसाठी लढणारे क्रांतिकारक..फाशीच्या वेळी ते म्हणाले आम्हाला थेट तोफेच्या तोंडी द्या..तोफेचे गोळे आम्ही फुलासारखे झेलू. पण फाशीसारखी फुसकी शिक्षा आम्हा भारतमातेच्या सुपुत्रांना देऊ नका'' असे त्यांचे उद्गार..

   भगतसिंग हे एक क्रांतिकारी विचारांचे लेखक आणि पत्रकार होते. ते बाहेरून अत्यंत शांत, निग्रही विनम्र आणि हळवे वाटत असले ते अंतर्मनात अतिशय ज्वालाग्राही, तडफदार आणि कणखर होते. ते निरीश्वरवादी होते. पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नव्हता, पण जर पुनर्जन्म असलाच तर पुन्हा याच देशात जन्माला येण्याची त्यांची इच्छा होती. गुलामी आणि दारिद्ऱ्य हे जगातले सर्वांत घोर पाप असेल तर त्याच्यासाठी देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतःला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे त्यांचे विचार आणि लिखाण होते.

  भारतातील किती तरूणांनी शहिद भगतसिंह यांचे " मी नास्तिक का आहे " हे पुस्तक वाचले आहे? खरं तर भारतातील प्रत्येक तरूणांनी हे पुस्तक वाचले आणि समजून घेतले तर देशात फार मोठा बदल होऊ शकतो.

  तुरुंगात वाचण्यासाठी पुस्तके मिळावेत म्हणून, अन्नत्याग करणारा भगतसिंग सारखे क्रांतिकारक या देशात पुन्हा जन्माला आलेच नाहीत..
*==========================*

प्रविण,मुंबई

कल भी छल था आज भी छल है
छल में हर मनुष्य निर्बल है
उस छल का बल कम करना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है
जिन्दा लाशे घूम रही है
देशभक्ती किश्तोंमें बिक रही है
मुडदों  में जान डालना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है

किसान भूखा है, दलित पिछडा है
महिला अत्याचार का प्रथा बन रहा है
इंसानियत को जगाना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है

कोई धर्म पाला तो मर रहा है
कोई धर्म टाला तो मर रहा है
जातीव्यवथा को उठाके फेकना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है

कोई लिखनेके लिए डर रहा है
कोई बोलने के लिए डर रहा
आझाद देश में आझादी लाना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है
*==========================*
अर्चना  खंदारे, हिंगोली
 लिख रहा हू मैं अंजाम 
जिसका  कल  आगाज आयगा
मेरे  लहू  का  हर एक  कतरा
इन्कलाब  लायगा......
                                                     वरील  कविता  हि स्वतंत्र  पूर्व  काळा  मध्ये भगत सिन्ह यांनी देशातील युवा पिढीला उद्देशून म्हटली आहे,त्याच्या बलिदाना मुळे आज आपण स्वातंत्रोत्तर भारतात आहोत,त्यांनी जर त्या वेळी देशासाठी स्वतंत्र्यं क्रांती घडवून आणली नसती तर आज हि आपण गुलामगिरीच्या विळख्यात खितपत पडलेले असतो,भगत सिंह जी हे  स्वतंत्र पूर्व  काळातले वीर  क्रांतिकारक,चिकित्सक,साम्यवादी  विचारसरणीचे युवा होते , वयाच्या  23 व्या वर्षी त्यानीं मृत्यू  ला कवटाळून देशसाठी आत्म बलिदान  केले ,आज च्या युवा पिढी  ने त्यांचा  आदर्श  डोळ्या  पुढे  ठेऊन  देशासाठी  कार्य  करावे  पण  आज ची युवापिढी हि  धर्म  जात  पंथ  या  मध्ये गुरफटत चालली  आहे  आणि  त्याच  बरोबर  त्याच्या मनावर धार्मिक  ते  बाबत  च्या गोष्टी,दंतकथा बिंबवल्या  जात आहेत, भगत सिंघ  जी  ने देशासाठी बलिदान दिल  त्याचा  वारसा  हा  आज च्या युवा पिढी ने चालवत  ठेवावा म्हणजेच  त्यांनी  तरी  देशासाठी जीवदान  केले आज च्या युवा पिढी ला  जीवदान करण्याचीच  काही  गरज नाही,त्याच्या बलिदान देण्या मागचा उद्देश समोर ठेऊन आज देशासाठी आपणास  काही तरी करायचे आहे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवावा,आज देशामध्ये राजकीय कलह,जातीय दंगली  घडतांना दिसत आहेत म्हणून आपल्या देशास  सर्वधर्मनिरपेक्ष विचार,बोधीक,चिकित्सक,निस्वार्थी,कार्यतत्पर,साम्यवादी विचारसरणी आणि अष्टपैलुत्व गुण असलेली  युवा पिढी ची गरज आहे ,अस्या  तरुण  पिढीची  आज देशास जास्त  गरज आहे,तरच खऱ्या  अर्थाने  देशाचा  विकास  घडवून  आणता  येऊ  शकतो.भगत सिह हे प्रखर,ज्वलंत,नास्तिक  विचाराचे  व्याक्तीमत्व आपणास मिळालेलं  एक रत्न आहे.
अस्याया थोर  क्रांतिकारक विचारवंताचे  एक तरी गुण प्रत्येक  तरुणाने  आत्मसात  करायला  पाहिजे,तरच  आपण त्यांचे  खरे  वारसदार  आहोत असे म्हणता  येईल.
*==========================*

समीर वि. सरागे, जि.यवतमाळ

भारताच्या इतिहासातील  एक महान क्रांतिकारी होऊन गेले ते म्हणजे शहीद ए आझम  भगतसिंह.
 भगतसिंह आज या देशात हयात जरी नसले तरी त्यांचे विचार आणि शिकवण आजही आपल्या देशातील प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. जो युवक अवघ्या वय वर्षे २३ असतानी हसत हसत फ़ासावर चढला तो किती शुर आणि पराक्रमी  होते हे यावरून लक्षात येते.

भगतसिंगाना बालपणा पासुनच देशाभिमान व देशप्रेम होते. त्यांनी १९२६ मध्ये देशाच्या स्वातंत्र्या साठी नौजवान भारत सभेची स्थापना केली होती.  महात्मा गांधीनी जेव्हा १९२२ मध्ये चौरीचौरा  च्या घटने नंतर असहयोग आंदोलनास समाप्त करण्याची घोषणा केली तेव्हा त्यांचा अहिंसावादी विचारधारेशी मोहभंग झाला होता. आणि त्यांनी असे देखील सांगितले की, स्वतंत्र हे अहींसे ने नव्हे तर हातात शस्त्र घेऊन मिळत असते.२३ मार्च १९३१  च्या रात्री भगतसिंह, राजगुरु आणि
सुखदेव यांना  लाहोर षडयंत्र रचल्या प्रकरणी फाशी देण्यात आली. भगतसिंह नेहमी म्हणायचे १) बम और पिस्तूल से क्रांती नही आती ,क्रांती की तलवार विचारों की सान पर तेज होती है। २) व्यक्तियों को कुचलकर भी आप उनके विचार नही मार सकते। ३) निष्ठुर आलोचना और स्वतंत्र विचार ये क्रांतीकरी सोच के दो अहम लक्षण है।
इतके त्यांच्या देशाप्रती देशाच्या स्वातंत्र्या प्रति  भावना ज्वलंत होत्या  देशावर मरुन जायला देखील हे क्रांतिकारी तरुण मागेपुढे पाहत नव्हते. मौत तो मेरी दुल्हन है असे तें नेहमी त्यांच्या कुटुंबियाना म्हणायचे.  इतकी प्रचंड राष्ट्रभक्ति त्यांच्या नसा नसात होती.

परंतु अलीकडे आपण दृष्टिक्षेप टाकल्यास ती देशभक्तिची , देशहिताची भावना दिवसेंदिवस लुप्त होत असल्याचे दिसून येत आहे. कारण आज देशाभिमान जागृत होईल अश्या  प्रकारचे शिक्षण आज मिळने दुपस्त आहे. राष्ट्रीयत्वाची भावना कोणी जागृत करण्याचे काम करत नाही. यावर कोणी चर्चा करत नाही ,ना पाठ्यक्रमातून या क्रान्तिकाराना आजच्या तरुण पीढ़ी समोर आनण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही. तर कसे क़ाय देशप्रेमी या देशात घड़तील ( जन्माला येतील)?

उलट आपल्याच देशात राहून ,याच देशातील साधन संपत्ति उपभोगुन, इथे नाव प्रतिष्ठा कामवुन स्वताला बुद्धिजीवी संबोधुन अर्बन नक्षल च्या स्वरुपात याच देशाला संपविन्याचे , मातीत घालनयचे षड्यंत्र  अलिकडे केल्या जात आहे.  कश्मीर भारताचा अंग नाही, भारत की बरबादी तक जंग रहेगी, हमे चाहिए आझादी, ही ब्रिदवाक्ये टुकड़े टुकड़े गैंग, आझादी  गैंग आणि  त्यांच्या पाकिस्तानची भक्ति करणाऱ्या समर्थका कडून सदैव होत असलेली आपल्याला दिसून येईल.  आणि याला अटकाव किंवा प्रतिबंध केला तर अभिव्यक्ति स्वातंत्र्य धोक्यात येण्याचा कांगवा केला जातो.  परंतु विरोधाभास म्हणजे जेव्हा आतंकवादी/ नक्षलवादी आपल्याच जवानाचे, पोलिसांचे मुडदे पाडतात तेव्हा ही आझादी आणि टुकड़े टुकड़े गैंग आणि त्यांचे समर्थक कोण्या बीळत लपतात कोणास ठाऊक?   भारत देशाचा ध्वज जाळने , दगडफेक करणाऱ्यांचे ,देशा विरुद्ध षड्यंत्र करणाऱ्यांचे(आतंकवादी/नक्षलवादी) यांचे समर्थन करणे , दंग्या च्या वेळी याच देशातील संपत्ति नष्ट करणे, आतंकवद्या करिता अर्ध्या रात्री न्यायाल्याचे दरवाजे उघड़ने वैगरे हे दृश्य वरुण भगतसिंग बघत असतील तर तें देखील दुखी होऊन रडत असतील आणि म्हणत असतील की मि  या देशाला व येथील जनतेला  स्वातंत्र्य मिळवून देण्या  करीता फ़ासावर लटकलो आणि आज हेच लोक याच देशाचे शत्रु झालेत या देशालाच संपविन्या करिता षड्यंत्र रचत आहेत? किती वेदना हॉट असतील त्यांना हे अलिकडचे दृश्य बघून! एवढेच नव्हे तर तत्कालीन सरकारच्या काळात भगतसिंगाना एका पाठ्यपुस्तका मध्ये आतंकवादी म्हणून दखविन्यात आले आहे. हा तर भगतसिंगाचा घोर अपमानच होय. ज्या तरुणाने देशासाठी बलिदान दिले त्याला आतंकवादी दखविन्यात येते यापेक्षा दूसरी शरमेची गोष्ट कोणती या देशात हा तर देशद्रोहच जनु.! आणि क़ाय आजची पीढ़ी या क्रान्तिकाराना समजून घेईल ? की राष्ट्रप्रेम आणि देशभक्ति करणे म्हणजे आतंकवादी होने होय का?

तसेही आजच्या तरूनपीढ़ी मध्ये देश ,स्वातंत्र्य या बद्दल अनास्था असल्याचे नेहमी दिसून येते एवढेच नव्हे तर देश किंवा देशभक्ति संदर्भात बोलने किंवा काही वक्तव्य करणे म्हणजे त्याला विशिष्ट राजकीय पक्ष किंवा एखाद्या विचारधारेशी जोड़ने हा होय आणि याला मेन स्ट्रीम मीडिया मधील काही चैनल , पत्रकार, डिझायनर बुद्धिजीवी, राजकीय व्यक्ति pramote करतात. म्हणजे देशभक्ति करणे ,त्याबद्दल बोलने म्हणजे धर्मनिर्पेक्षतेची गळचेपी किंवा हत्या करण्या सारखे होय. असे दाखविन्याचा किंवा भासविन्याचा नेहमी प्रयत्न होत असतो आणि या प्रकारच्या घटना इथेच या देशात घडतात याचे आश्चर्य वाटते. त्याचे कारणही तसेच आहे म्हणा कारण की,     फुकटात मिळालेल्या वस्तुला मोल आणि महत्व नसते अगदी तसेच स्वातंत्र्यचे देखील आहे कारण आजच्या या
 तरुणाना आपल्या पूर्वजा कडून स्वातंत्र्य हे फुकटात म्हणजे gift मिळाले आहे म्हणून त्यांना याची कीमत आणि महत्व नसणे स्वाभाविक आहे.

केवळ सोशल मिडियावर स्वातंत्र्य दिनी स्टेटस अपलोड करणे इथपर्यंत आपली राष्ट्रभक्ति  दिसने गरजेचे नाही.  कोणतेही  कार्य करण्या आधी ते देशहिताचे समजुनच करणे अभिप्रेत आहे. आणि देशभक्ति करणे म्हणजे सोशल मिडियावर स्टेटस टाकने किंवा देशभक्तीचे गोड़वे गाने मात्र नव्हे यउलट जे काही राष्ट्रहिताच्या बाबी आहेत त्याला महत्व आणि समर्थन देणे हे होय. कोणत्याही देशाची जनताच  ही त्या देशाची strenth ताकत असते. जसा विश्वास आणि आत्मीयता ही प्रत्येक कुटुंबातील सदस्याना बांधून ठेवते अगदी तसेच राष्ट्राभिमान आणि राष्ट्रभक्ति ही त्या देशातील जनतेला एका अटूट बंधनात बांधून ठेवन्यास महत्वाची भूमिका बजवतात. कारण जात, धर्म ,पंथ वर्ण ,गरीब ,श्रीमंत या पलीकडे राष्ट्रप्रेम ही भावनाच देशाच्या प्रत्येक नागरिकात असणे महत्वाचे आहे. आणि या  सिद्धांतावरच राष्ट्रभक्ति जीवंत आहे. म्हणून जगात प्रत्येक नगरिकाला त्या त्या राष्ट्राच्या नावाने ओळखल्या जात असते जसे  भारतीय नागरीकास भरतीय म्हणूनच इतरत्र  ओळखल्या जाते.

म्हणून देशाभिमान बाळगा , राष्ट्रहित जपा कोणत्याही देशकार्याला आपले म्हणून करा भारत हा तरुणांचा देश आहे परंतु हा देश केवळ हुल्लड़बजंचा , पश्चिमत्यांचे अनुकरण करणाऱ्यांचा, देशद्रोही नारे लावणाऱ्यांचा  किंवा त्यांचे समर्थन करणाऱ्यांचा नसून देशहित जोपासणाऱ्यांचा आहे. जेव्हा ही भावना प्रत्येक़ नागरिकात जागृत होईल  तेव्हाच राष्ट्रप्रेमी निर्माण होतील व या देशाचे टुकड़े करणाऱ्यांचे मनसूबे हानून पाड़तील हिच भगतसिंग ,राजगुरु ,सुखदेव या सारख्या क्रान्तिकाराना ख़री श्रद्धाजंलि असेल.
*जय हिंद*
Source of images internet

लव, सेक्स आणि अश्लीलता या कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे ?

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

लव, सेक्स आणि अश्लीलता या कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे ?

IMAGE SOURCE  INTERNET

शिरीष उमरे, नवी मुंबई

प्रेम, शारिरीक संबंध व अश्लीलता ह्याच्या परिवाख्या कालानुरुप बदलत आहेत...

💝प्रेम हे निस्वार्थी असतच पण त्यात अपेक्षाचे रोप उगवायला लागले की त्याला तडा जायला लागतात... 💔

प्रेम आईचे, मावशीचे, बहीणीचे, भावाचे, बाबाचे, मित्राचे, प्रियसीचे, पत्नीचे व मुलामुलीचे आणि सरतेशेवटी नातवंडांचे ह्या इंद्रधनुष्यी छटातुन 😍🌈व्यक्त होते. काही निसर्गप्रेमी, वाचनप्रेमी, क्रीडाप्रेमी, प्रवासप्रेमी, धनप्रेमी वैगेरे प्रकार पण आहेत. 🤩 ह्यातला व्यक्तीप्रेमी हा प्रकार भयंकरच असतो 😅 जसे चित्रपटातले नायक नायिका वा क्रीकेट फुटबॉलचे खेळाडुचे चाहते ...

शारिरीक संबंध हा अजुनही कुजबुज करण्याचा विषय !! तशी ह्याला राजमान्यता व जनमान्यता पुर्वीपासुन आहे. संयुक्त कुटुंब पध्दत तर शिवकालीन... त्यानंतर रामायणातील बहुपत्नीत्व ब्रह्मचरित्व तसेच महाभारतातील विवाहपुर्व व विवाहपश्चात शारिरीक संबंध, बहुपतीत्व आणि राजा शिखंडी चे नपुसंकलिंगी पात्र व गणिका व्यवसाय हे दर्शवते की आपली संस्कृती कीती प्रगल्भ होती. ह्या विषयावर वात्सायनाने लिहीलेला कामसुत्र हा अभ्यासपुर्ण ग्रंथ कींवा  मध्यप्रदेश मधील खजुराहो मंदीरातील अप्रतिम शिल्पकला वा गडचिरोली मधील आदिवास्यांची गोटुल ही मुक्तसहवासाची सहजिवनाची शैली असो... आपली संस्कृती ह्या विषयाच्या ज्ञानाने समृध्द होती.

 आता मात्र कुटुंबनियोजनाचे अज्ञानामुळे वाढणारी अनिर्बंध लोकसंख्या व त्यातुन निर्माण होणार्या समस्या, असुरक्षित संबंधांमुळे होणारे असाध्य रोग, शालेय शिक्षणात अंतर्भाव नसल्याने होणारे गैरसमज, शरीर रचनेचे अर्धवट ज्ञान, शारिरीक व मानसिक स्वच्छता नसणे व ह्यातुन होणारे विनयभंग बलात्काराचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. आज पुरुषप्रधान संस्कृती मुळे स्त्रीला उपभोगाची वस्तु समजणार्यांचा कडाडुन विरोध करणे व त्यावर कडक कार्यवाई होणे हे अत्यावश्यक आहे.

राहीला प्रश्न अश्लीलतेचा तर तो उदभवतो अशिक्षणामुळे व अनैतिकतेला मिळत असलेल्या बेकायदेशीर राजमान्यतेमुळे. विकृती जन्म घेते ह्यातुन व हा मानसिक रोग मिटवण्याची सामाजिक ईच्छा च दिसत नाही त्यामुळे शिक्षण अत्यावश्यक... जागतिक आरोग्य संघटनेचा अहवालानुसार दर पाच भारतियांपैकी एक हा मानसिक रोगी असतो 😳🤔 ह्यावर विचार होणे गरजेचे ...अर्थात सगळेच विकृत नसतात. ह्यात दैनंदिन जीवनशैलीमुळे होणारे ताणतणावाचे शिकार ह्यांचे प्रमाण ९०% असते. 😅



IMAGE SOURCE  INTERNET

डॉ. विजयसिंह पाटील,
 कराड

प्रेम हा मनाचा आविष्कार,,, सेक्स(कामजीवन)ही शरीराची गरज,,, व अश्लीलता ही मनाची विकृती व त्याला शरीराने दिलेली साथ, असं मी म्हणेन..

प्रथम प्रेम म्हणजे काय ते पाहू,,,
प्रेम म्हणजे, स्नेह, आपुलकी, जिव्हाळ्याची, तळमळीची तीव्र भावना...
प्रेमाचे काही प्रकार,,, नर नारी प्रेम,,, अपत्य प्रेम,,, कौटुंबिक प्रेम,,, पशुप्रेम इत्यादी..

वयानुसार ही प्रेमाची नावं बदलतात.. लहानांबाबत स्नेह.. समान वयोगटातील प्रेम, उदा, पत्नीप्रेम, बंधू/भगिनी प्रेम, मित्र प्रेम इत्यादी.. आपल्याहुन वयाने जेष्ठ व्यक्ती साठी आदर...
मातेचे अपत्यावर असणारे प्रेम--ममत्व..
भक्ती हे प्रेमाचे परमोच्च रूप
प्रेमाची ही स्वरूपे फक्त मनुष्य प्राण्यात च आहेत असं नाही.. अपत्य प्रेम हे आपण सर्व प्राण्यांच्या त पाहतोच...
थोडक्यात प्रेम हे वैश्विक आहे व त्याला कसल्याही मर्यादा नाहीत

सेक्स /कामजीवन
आता, कामजीवन/ सेक्स ह्याबाबत पाहू...
काम  वा सेक्स ही शंभर टक्के शारीरिक गरज आहे, माणूस असो अथवा प्राणी, प्रत्येकाला सेक्स ची गरज असतेच असते. काही प्राण्यांत उदा, कुत्रा, ही भावना वर्षातून एकदाच येते ( ह्यामागचं कारण असे की, मादीला वर्षातून एकदाच पाळी येते, त्यालाच आपल्या कडे, मादी हीट वर आली अस म्हणतात).
मनुष्य प्राण्याचं तसं नाही,  काम क्रिया ही दैनंदिन जीवनातील एक गोष्ट आहे
कामक्रीडा/सेक्स ही दोघांनी मिळून करण्याची गोष्ट आहे. त्यात एकमेकांच्या आवडीचा विचार महत्वाचा आहे, त्याबद्दल बोललं पाहिजे, एकमेकांच्या मतांचा आदर ठेवला पाहिजे. ज्या गोष्टींचा त्रास होतो, त्या टाळायला पाहिजेत.
व जेंव्हा संभोगासाठी, दोघांच्या मनाची व शरीराची तयारी होईल, तेंव्हाच संभोग करणे योग्य

अश्लीलता...

अश्लीलता म्हणजे, माणसाचे काम इंद्रिये, नग्नता, व लैंगिक वर्तन, यांचा साहित्य, कला, व सार्वजनिक जीवनात, व्यक्त होणारा असभ्य ओंगळ, व्हलगर, आविष्कार होय. तो आक्षेपार्ह व अवैध असतो.
अश्लीलतेची कल्पना सामाजिक, कौटुंबिक व वयक्तिक नितीशी संबंधित आहे. ती संस्कृती शी निगडित असते. उदा. एका देशातील अश्लीलता, ही दुसऱ्या देशात अश्लीलता असेलच असे नाही.
अश्लीलता ही आक्षेपार्ह आहे हे साधारणपणे मान्य आहे. पण अश्लील म्हणजे काय, हे ठरविणे अवघड आहे.
विवस्त्र शरीर , लैंगिक वर्तन व विकृती, या अत्यंत खासगी गोष्टींचे प्रदर्शन केल्याने, लैंगिक वासना चाळवल्या जातात, . त्याच अनुकरण केल्यानं नैतिक अधःपतन होते, असं नितीवाद्यांना वाटतं.
तर दुसरा विवेकवादी गट, असभ्य व कामोत्तेजक (पोर्नोग्राफी), ह्यात फरक करून, कामोत्तेजकतेला आक्षेपार्ह मानतो.
अश्लीलता विषयक, प्रतिबंधक कायदे भारतात आहेत.
अश्लील साहित्य, नाटक, चित्रपट, प्रदर्शन, ह्यांना कायदेशीर मनाई आहे.
एक खटला गाजला, प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर, यांच्या काही कवितांवर अश्लीलतेचा खटल्यात (1947), त्यांना दोषमुक्त करण्यात आले.


IMAGE SOURCE  INTERNET

मयूर डुमणे ,
उस्मानाबाद

लव्ह / प्रेम
प्रेमासारखी सुंदर गोष्ट या जगात दुसरी नाही . इतर व्यक्तींप्रती  असलेला आदरभाव ,आपुलकी, काळजी म्हणजे प्रेम . मुलाला साधं खरचटल तरी आई चा जीव खाली वरी होतो ते आई च प्रेम असत . भूक लागलेल्या वासराने हंबरडा फोडल्याक्षणी गाई वासरांकडे धावून येते ते गाई च प्रेम . प्रेमाला जात, धर्म, प्रांत,देश अशा कोणत्याही चौकटी नसतात . भारतीय असलेली सानिया पाकिस्तानी असलेल्या शोएब वर प्रेम करू शकते तिथे देशाच्या शत्रुत्वाच बंधन आड येत नाही . या जन्मावर आणि या जगण्यावर शतदा प्रेम करावे असे मंगेश पाडगावकर सांगून गेले . इतरांवर प्रेम करण्याआधी व्यक्तीने पहिल्यांदा स्वतःवर प्रेम केले पाहिजे . स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय ? स्वतःमध्ये काही सुप्त प्रतिभा दडलेली असते त्या प्रतिभेवर आपण प्रेम केले पाहीजे .स्वतःच स्वतःचा आदर केला पाहिजे आपण आपल्या "स्व" वर प्रेम केलं पाहीजे . एकतर्फी प्रेमातून आत्महत्या अशी बातमी जेव्हा कानावर येते तेव्हा त्या व्यक्तीने खरच प्रेम केलेले असते का ? असा प्रश्न मला आवडतो म्हणून  पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करणे मला महत्वाचे वाटते .  द्वेष हा प्रेमाचा शत्रू आहे .द्वेषातून हिंसाचार जन्माला येतो तर प्रेमातून शांतता जन्माला येते . मानवतेचा धर्म वाढविण्यास, जोपासण्यास प्रेम मदत करते . साहित्य, कला, संगीत, विज्ञान अशा आवडत्या विषयां मध्ये झोकून देणे हे त्या विषयांप्रती असलेले आपले प्रेम च असते . द्वेषाने माणसे तोडली जातात तर प्रेमाने माणसे जोडली जातात .

सेक्स -
सेक्स ही मानवी शरीराची गरज आहे . अपत्य जन्माला घालणे हा एकमेव सेक्सचा उद्देश नाही . सेक्स ही वयात येणाऱ्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाची समान गरज आहे . वयात येत असताना स्त्री आणि पुरुषाच्या शरीरात हार्मोन्समुळे वेगवेगळे बदल होतात , त्यामुळे सेक्स ची जाणीव निर्माण व्हायला मदत होते .सेक्स करून बघण्याची इच्छा मनात निर्माण होते . लग्नाशिवाय सेक्स करता येत नाही असं सामाजिक बंधन समाजाने घालून दिले आहे अशावेळी masturbation हस्तमैथून करून सेक्स ची भूक भागविली जाते या मध्ये काहीही गैर नाही . लग्नाआधी सेक्स करण्यात मला काहीही चुकीचे वाटत नाही . शारीरिक भूक भागविण्यासाठी परस्पर संमतीने सुरक्षित रित्या लग्नाआधी सेक्स करणे यात मला काहीही गैर नाही . सध्य परिस्थितीत बेरोजगारीमुळे लग्नाच्या वयाचे प्रमाण वाढत आहे पूर्वी लवकर लग्न व्हायची त्यामुळे योग्य वयात सेक्स ची इच्छा पूर्ण व्हायची आता मात्र तशी परिस्थिती राहीली नाही . सेक्स करण्यासाठी स्त्री आणि पुरुषाची शारीरिक आणि मानसिक तयारी असणे एकमेकांवर विश्वास असणे गरजेचे आहे. सेक्स मधून स्त्री आणि पुरुषाला परमोच्च शारीरिक, मानसिक आनंद मिळतो . मानसिक आणि शारिरीक थकवा घालविण्यासाठी सेक्स सारखी दुसरी उपयुक्त गोष्ट नाही . पती आणि पत्नीमधील नात अधिक गठ्ठ करण्यासाठी सेक्स ही गोष्ट महत्वाची भूमिका बजावते . आपल्या जीवन साथी कडून काही कारणांमुळे सेक्स चा आनंद मिळत नसेल तर साथीदाराला विश्वासात घेऊन इतर व्यक्ती बरोबर संबंध ठेवण्यात काही सुद्धा गैर मला वाटत नाही. आपल्या  समाजात सेक्स या गोष्टीला नैतिकतेच्या बंधनात अडकवले जाते त्यामुळे सेक्स कडे पाहण्याचा दृष्टीकोन संकुचित झालेला आढळून येतो .दुर्देवाने अजूनही आपला समाज स्त्रीच्या योनीत तिचे चारित्र्य शोधतो . बलात्काराचे प्रमाण वाढण्यामध्ये समाजाची सेक्स कडे पाहण्याची संकुचित दृष्टीकोन कारणीभूत आहे . सेक्स ही मानवी शरीराची अभिव्यक्ती आहे सामाजिक बंधनामुळे ती दाबून ठेवणे घातक आहे ती जेवढ्या उत्स्फूर्तपणे बाहेर येईल तेवढे चांगले .
पुरुषप्रधान व्यवस्थेत सेक्स कडे फक्त पुरुषाची मक्तेदारी, गरज म्हणून पाहिले जाते . स्त्री कडे केवळ भोगवादी वस्तू म्हणून बघितले जाते हे अत्यंत चुकीचे आहे यांमुळे अनेक स्त्रियांची कुचंबणा होते . स्त्रियांना देखील सेक्स ची भावना, इच्छा असते  हे आपण समजून घेतले पाहिजे .
   सेक्स ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे प्रत्येकाने  या गोष्टीचा मनापासून कोणताही संकोच न बाळगता आनंद घेतला पाहीजे

अश्लीलता
मासिक पाळी , सेक्स, कंडोम यांविषयी बोलणे म्हणजे काही लोकांना अश्लील वाटते तर काहींना यात काही च अश्लील वाटत नाही म्हणजे व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अश्लीलता ठरते . अश्लीलता ही परिस्थितीजन्य असते कुटुंबात असताना जर आपण शिव्या दिल्या तर त्या अश्लील वाटू शकतात पण त्याच शिव्या जर आपल्या अत्यंत जवळच्या मित्रांमध्ये दिल्या तर त्यात आपल्याला काही च अश्लील वाटत नाही . समाजात राहताना काही सभ्यतेच्या मर्यादा पाळाव्या लागतात त्या मर्यादांचे उल्लंघन केल्यास अश्लीलता निर्माण होते . उदा . सार्वजनिक स्थळी आपण मोठ्या आवाजात शिव्या देणे ही गोष्ट माझ्या दृष्टीने अश्लील आहे . सेक्स ही प्रेमाने एकमेकांना समजून घेऊन करण्याची गोष्ट आहे पण सेक्स जर जबरदस्तीने हिंसक पद्धतीने होत असेल तर माझ्या दृष्टीने तो सेक्स अश्लील आहे . मुलींना पाहून मुलींना संकोच वाटेल असे हावभाव करणे ही अश्लील कृती आहे .

IMAGE SOURCE  INTERNET

जयंत जाधव, लातूर

नारळ हे आतून कसा निघेला हे जसं  सध्याच्या जगात ठोकपणे सांगू शकता नाही अगदी तसं लव म्हणजे प्रेम पुढे  कसे निघेल हे सांगता येत नाही.कारण प्रेमाचे संदर्भ परिस्थिती प्रमाणे सतत बदलत जाताना दिसतात. आजच्या काळात प्रेमात प्रेम कमी कामुकता व अश्लिलतेची भावना अधिक आहे. माझ्या सभोवताली असे बरेच सत्य घडलेले प्रसंग आहेत.लव सेक्स व अश्लिलता या गोष्टी क्रमाने घडणाऱ्या आहेत. एखादी गोष्ट पाहिजेच हा हट्ट देखील या घटना घडण्यास कारणीभूत ठरतात. एखाद्या स्त्रीने तुमचे प्रेम नाकारले तर तिला भावनात्मक पध्दतीने तिला भूरळ पाडून मी तुझ्या साठी काहीही करेल म्हणणारे एकदा की सावज आपल्या पाशात आले की मजा करुन तिला वा-यावर सोडणारे महाभाग गल्लो गल्ली सापडतात. शहाणपण हे कधी पण उशिरा येते पण आपल्याकडे डोळसपणा जर असला तर लव सेक्स व अश्लिलता या गोष्टी काही बिघडवू शकत नाही. सैराट चित्रपटातील सैराटपणाचे आयुष्य क्षणभर असते. वास्तव व चित्रपट यातील गोष्टीत बराच फरक असतो. खर प्रेम असेल तर रानावनात घडते. बाबा आमटे,डॉ.बंग-गडचिरोली,डॉ.कोल्हे- मेळघाट या व्यक्तीनी देखील प्रेम केले ते करताना त्यांनी सर्वच गोष्टी मिळवल्या आहेत. कामावर,पत्नीवर व निसर्गावरही केले.याला खरं प्रेम म्हणता येईल.

रोटी,कपडा व मकान या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तशी सेक्स देखील आहे.पण ते करत असताना दोन्ही जणांच्या नात्यात समजसपणा,आपुलकी,त्याग इत्यादी भावनांचा मेळ असावा. भूक लागल्यावर अधास्या सारख खाल्ले की पोट बिघडत.तस सेक्सला देखील ही गोष्ट लागू पडते. सेक्स करताना समोर च्या जोडीदारची इच्छा महत्त्वाची असते.जबरदस्ती करुन फक्त भूक मिटवता येते पण तृप्ती किंवा संतुष्ट त्याचे काय?

माझी एक मैत्रीण आहे.दिसायला एकदम सुंदर.चार चौघात उठून दिसेल अशी पर्सनॕलिटी.ती नेहमी स्पष्ट म्हणते,एखादी गोष्ट सुंदर असेल तर त्याचे कौतुक नक्कीच करावे किंवा ती गोष्ट पाहाण्यास हरकत नाही पण ते पाहताना त्यात घाणेरडी वासना नसावी व अशा नजरेवाल्यांना ती धडा शिकवायला विसरत नाही.

IMAGE SOURCE  INTERNET

स्वप्नील चव्हाण ,
बुलडाणा

   विषय निघाला तर सर्वप्रथम ज्यांच्याकडे लक्ष जाते ते म्हणजे युवा पिढी...विशेषतः पौगोंडावस्थेत असणारे ......कारण हेच ते वय असतं की ज्या मध्ये तो व्यक्ती लव्ह आणि सेक्स च्या भावनांवर आवर घालतो की वर नमूद केल्याप्रमाणे अश्लीलतेकडे जातो हे ठरते........
प्रेम ...इंग्रजीत लव्ह म्हणूयात ...ही अशी गोष्ट आहे की कोना phd झालेल्या माणसाला ही सर्वस्वी स्पष्ट करता येणार नाही.......कारण प्रत्येक वेळी.... प्रत्येक ठिकाणी..व्यक्ती नुसार ते प्रेम बदलत जात...प्रत्येकासाठी त्याची व्याख्या वेगळी असू शकते....कोणाला टाईमपास करत करत प्रेम मिळत....तर कोणाचा प्रेम करत करत टाईमपास होऊन जातो......कोणासाठी प्रेमच सगळ काही असतं ....तर बरेच जण प्रेम आहे की नाही हेच ठरवू शकत नाहीयेत.....
...तर काय असतं हे प्रेम ...???
आपल्या गरजेसाठी करतो ते खरं प्रेम की प्रेम झाल्यावर आपल्या गरजा पूर्ण होतात ते खरं....??
हेच आणि असे बरेचशे प्रश्न निर्माण होतात या पौगोंडावस्थेत.... मग काय करावं....??
आणि मग ते सेक्स करावं का....लग्नाआधी कराव की लग्न होईपर्यंत थांबावं......

प्रेमाची व्याख्या तर नाही सांगता येणार पण....हे सगळे प्रश्न ज्या वयात पडतात त्याला नक्कीच आपण पौगोंडावस्था म्हणूयात......
थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेम हे देवाचं रूप आहे.....ज्याच्या अस्तित्वावर बरेच जण साशंक आहेत पण जे त्याला मानतात त्यांच्यासाठी ती सर्वोच्च शक्ती आहे.....कुठे आहे माहित नाही पण सदैव आपल्या सोबत असावं असं वाटतं...देव असो की प्रेम.....।।
सेक्स हा एक नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे आणि त्याबद्दल आपण अनेक भ्रम बनवून ठेवलेले आहेत त्यामुळेचं लोकांचे विचार अश्लीलता या प्रकारात मोडतात......

मी जास्त या मुद्द्यावर बोलन्यापेक्षा त्यातुन होणाऱ्या अडचणी आणि निवारण कस होईल याकडे वळतो.....
सर्वात महत्वाचे हे राहील की पालकांनी त्यांच्या पाल्याशी या गोष्टींबाबत बोलणे गरजेचे राहील.......योग्य त्या वयात योग्य त्या गोष्टींची माहिती करून देणे त्यांच्याशी चर्चा करणे खूप महत्त्वाचा उपाय होऊ शकतो असे मला वाटतं..... कारण प्रेम प्रकरणामध्ये धोका मिळाला म्हणून जीव देणारे बरेच जण आपण बघतोय....जर अश्या परिस्थितीमध्ये पालकांचा सपोर्ट मिळाला तर त्यांचा जीव वाचवण्यासाठी उपयुक्त राहील....कारण माय-बापासाठी त्यांच्या लेकराचा जीव सर्वात महत्वाचा असतो..बाकी सर्व गोष्टींपेक्षा.....
आणि यासोबतच पालक स्वतः बोलतात म्हणून त्यांना हे सर्व नैसर्गीक वाटेल आणि तो अश्लीलतेचा प्रश्न निर्माण होणारच नाही........
आणि हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पालक त्यांच्या मुलांशी बोलताना थोडं फ्री होऊ शकत नाहीत....जर असं झालं असत तर बरेच प्रॉब्लेम्स सोडवण्यात यश आलं असतं....
आणि या बाबतीत तरी थोडं सरळ सरळ बोलणं गरजेचं राहील ...ते इंडिरेक्टली बोलून त्यांना समजेल ही भावना ठेवू नये.....कारण तास इंडिरेक्टली बोलताना आपण बऱ्याच गोष्टी बोलतच नाहीत हे लक्षात राहत नाही....
......आणि एक विशेष म्हणजे आज काल मुलांना पॉर्न चं वाढत आकर्षण....अगदी एखाद्या व्यसनाप्रमाणे चिटाकून बसते ती सवय....आणि सोडणं तेवढचं कठीण होऊन जात....मला तर नेट वर ते उपलब्ध असण्याचं कारणंच आतापर्यंत कळलेलं नाहीये.....कारण त्यामुळेच अनेक जण सेक्स साठी प्रवृत्त होतात...कारण ते आपल्या भावना ताब्यात ठेवण्यात असह्य होऊन जातात......आणि बलात्कार सारखे अडथळे निर्माण होतायेत...... म्हणून पालकांचं मार्गदर्शन जर असेल तर हे आणि अशे बरेच अडथळे दूर होऊ शकतील असे मला वाटते........



IMAGE SOURCE  INTERNET

अनिल गोडबोले
सोलापूर

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रजनन संस्था असते. परंतु त्याचा विकास आणि त्याचे काम हे पौगंडवस्थेमध्ये (teen age) मध्ये चालू होते, हे काही कोणाला वेगळे सांगायला नको.

लव :- प्रेम या गोष्टीबद्दल बोलताना मी आईचे प्रेम, बाबांचे प्रेम, मित्र प्रेम या बद्दल अजिबात बोलत नाही. मी फक्त स्त्री आणि पुरुष या मध्ये होणाऱ्या भावनिक प्रेमाबद्दल बोलत आहे.

माणसाचे वागणे हे त्याच्या भावनेवर अवलंबून आहे त्यामुळे वयात आल्या नंतर प्रजनन होण्यासाठी किंवा आपल्या सारखा जीव जन्माला घालण्यासाठी स्त्री आणि पुरुष एकत्र यावे लागतात..
पण खरी इथंच तर गोची होते.. हे असे एकत्र येऊन जात नाहीत तर आयुष्यभर एकमेकांना आपल्या सोबत राहण्यासाठी बांधून ठेवण्यासाठी मानसिकरित्या एकत्र येतात.
तेव्हा आकर्षणातून सुरू झालेला प्रवास हा प्रेम आणि मग भावनिक गुंतवणूक इथपर्यंत येतो.

प्रेम हे स्त्री आणि पुरुष या मध्ये होत. किंवा समलिंगी संबंध असतील तर त्या जोडप्या मध्ये ही असू शकत. त्याला जात,धर्म, देश,संस्कार, दिसणं किंवा एकूणच अमुक बंधन असेल असं नाही.. पण आपल्याला अस वाढवलेलं आहे की आपण या सगळयांच्या नादात आपलं खर प्रेम विसरून जातो..
आणि मग खूप साऱ्या स्टोर्या चालू होतात


सेक्स:- प्रेम आहे हे दाखवण्याची किंवा अनुभवण्याची उच्च पातळी म्हणजे सेक्स. शारीरिक संबंध हे माणसाला शारीरिक आणि मानसिक सुख देण्यासाठी असतात. आपल्याकडे सगळ्यात जास्त (शक्यतो मुलींना) बंधन घातली जातात कारण लग्न होण्याआधी तिने कोणाशीही शरीर संबंध ठेवू नयेत. असे संबंध असलेली व्यक्ती(शक्यतो मुलगीच काही ठिकाणी मुलांना देखील त्रास असतो.. ) व्यभिचारी, वाईट चाल असलेली(भौतिक शास्त्रात नसलेली चालीची व्याख्या) किंवा वाया गेलेली मानतात.

तरीसुद्धा कधीकधी शारीरिक गरज ही शिकवणुकीच्या बाहेर वर्तन करायला भाग पाडते तेव्हा ते सगळं होत खर... पण नंतर ते खूप मानसिक ताण करून घेतात.

सेक्स फक्त प्रेम केलेले किंवा लग्न केलेले व्यक्ती एकमेकांसोबत करतात, असा खूप मोठा गैरसमज आपल्या संस्कृती मध्ये आहे. ज्याला जशी संधी मिळते तो त्या प्रेमाणे फायदा घेत असतो नाहीतर आपल्या कडे देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची आणि हल्ली तर असे काही तरुण मुलं आहेत जे असा व्यवसाय करतात त्याची खूप मोठी बाजार पेठ भरली नसती.

पॉर्न साईट च मार्केट आहे, गंमत म्हणून चालणारे सेक्स क्लब आहेत(अरेच्या ! हे तर आम्हाला माहीतच नव्हतं .. अस म्हणू नका), कॅज्युअल सेक्स च्या नावाखाली पण बरच काही चाललेलं आहे.. याच एक वेगळं मार्केट आहे पण तो काही आजचा विषय नाही..

आमच्या वेळेला नव्हतं बाबा असलं अस म्हणणाऱ्यांना फक्त त्यांना संधी मिळालेली नसते बाकी एड्स चा प्रसार भारतात झाला तेव्हा.. या एकनिष्ठ असण्याचा बुरखा टराटरा फाटलेला आहे.

या मध्ये कुठेही बलात्कार, अमिश दाखवून किंवा दाखवून केलेलं सेक्स, किंवा नकळत मनाविरुद्ध घेलेला फायदा याला अजिबात पाठिंबा नाही. ते चुकीचेच आहे.

ग्रुप सेक्स हा त्या ग्रुपवर अवलंबून आहे. समलिंगी संबंध हे देखील मान्य समंध आहेत. काहीच नाही तर हस्तमैथुन हा सुरक्षित प्रकार आहे.(जर एका पेक्षा अनेक व्यक्ती सोबत शरीर संबंध असतील तर निरोध चा वापर जरूर करा.. कारण गुप्तरोग आणि एड्स सारखे आजार वरून कळत नाहीत)


अश्लीलता:- सेक्स आणि प्रेम यांच्यामध्ये आलेली विकृती किंवा असंवेदनशीलता आणि माज आल्यामुळे माणूस जे वागतो ना.. ते वर्तन अश्लील वर्तन आहे.

विकृत मनोवृत्ती चे व्यक्तीच अश्लील असू शकतात. मुलांनी मुलींशी कसं वागायला पाहिजे किंवा मुलींनी मुलांशी कस वागायला पाहिजे या पेक्षा कस नाही वागायचं हे शिकवायची गरज आहे.
सामाजिक सभ्यता मोडणे, अश्लील हावभाव करणे हे सुदृढ मन नसलेली लक्षण आहेत. त्यांना मानसोपचार तज्ञाकडे ताबडतोब नेणं गरजेच आहे.

फार काही बोलणं गरजेच नाही फक्त.. कोणी कोणाशी प्रेम करावे कोणी कोणाशी सेक्स करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
पण एखाद्याच्या सन्मानाला ठेच पोहोचेल अस न वागणं हा मात्र संस्कृतीचा भाग असला पाहिजे.

तर.. प्रेम करा.. सेक्स करा (सुरक्षित करा).. आनंदी रहा पण घाणेरडी हरकत किंवा त्याने एखाद्याला त्रास होईल असे वागलं तर त्याला मानसोपचार देण्यापलीकडे काही उपयोग नाही असं माझं मत आहे.

IMAGE SOURCE  INTERNET

अश्विनी खलिपे,
तोंडोली (सांगली)

          संध्याकाळ होताच रातराणीनं उमलावं, अंधाराच साम्राज्य सगळीकडे पसरलेलं असलं तरी डोळ्यांच्या वाटेने न येता नाकाच्या मार्गाने सुगांधाच्या रूपाने मनात घुसावं आणि त्यावेळी आपल्याला जे सुख, प्रसन्नता मिळते अगदी तीच हळुवार जपण्याजोगी भावना प्रेम झाल्यावर मनाला अनुभवता येते. प्रेम म्हटलं की मन आलंच आणि मन म्हंटल की प्रेम आलंच. प्रेम हे कोणत्या एका नात्यासाठी सिमीत नाही, जिथं नातं तिथं प्रेम असतं. आई-वडील, भाऊ-बहीण, मावशी-काका, आजी-आजोबा अशा अनेक नात्यांमध्ये प्रेम लपलेलं असतं आणि याव्यतिरिक्त म्हणाल तर मग राष्ट्रप्रेम,  पुस्तकप्रेम, मैत्रिप्रेम, प्राणिप्रेम अशा प्रेमाची गणना ही प्रेमातच केली जाते. याचाच अर्थ असा की एखाद्या गोष्टीचा आपल्याला लागलेला ध्यास म्हणजे प्रेम. पण या प्रेमाला ही काहीतरी मर्यादा असतात, मर्यादेपलीकडचे प्रेम हे स्वतःसाठी किंवा इतरांसाठी विनाशकारी ठरतं यात काही शंकाच नाही. प्रेमाची भावना कदाचित आतापर्यंत सर्वांना कळली असेलच आणि प्रेमाबद्दल इतक्या जणांनी लिहिलंय की आता त्याबद्दल लिहायला कदाचित काहीच शब्द उरले असावेत असं मला तरी वाटतंय.
          सध्या प्रेम असा शब्द जरी कानावर पडला तरी प्रत्येकाच्या मनात एकाच प्रेमाचा विचार डोकं वर काढतो आणि सगळ्यांच्या नजरा बदलतात. आताच्या प्रेमात पावित्र्य उरलेलंच नाही असं बोलणं ही वावगं ठरणार नाही, कारण प्रेम फक्त मनाची भूक म्हणून उरलेली नाही. प्रेमात त्याग, ओढ, निस्वार्थपणा, विरह कुठंच दिसत नाही. पूर्वी प्रेम नजरेतून मनात आणि नंतर लग्नाच्या रूपाने जगासमोर यायचं आणि आताच्या प्रेमात नजरा कुठं कुठं घुसतात त्याला सीमाच उरल्या नाहीत. एकंदरीत काय तर, आजचं प्रेम म्हणजे लॉजवरची गेम एवढंच झालंय...
          प्रेमानंतर जी भावना जन्म घेते ती म्हणजे सेक्स. सेक्स म्हणजे शारीरिक संबंध, शरीराला लागलेली भूक. मुलं-मुली वयात येताना शरीरात होण्याऱ्या अंतर्गत बदलांमुळे निर्माण होणारी शरीराची गरज म्हणजे शारीरिक संबंध. वयात येताना या भावना होणं आणि एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं स्वाभाविक असतं पण त्यालाही काहीतरी मर्यादा असावी लागते; म्हणून वेळीच काळजी घेणं योग्य असतं, कारण वाहणाऱ्या प्रवाहात जर स्वतःला झोकून दिलं तर अंत होणं निश्चित असतं. सेक्स च्या भावना प्रकृती साठी चांगल्या असतात असं डॉक्टरांचं ही म्हणणं आहे पण त्या मर्यादेबाहेर गेल्या तर त्याची विकृती व्हायला वेळ लागत नाही. विकृतीतूनच पुढे बलात्कारासारख्या घटना घडतात. सेक्स हा प्रकार खऱ्या अर्थाने लग्नानंतरचं योग्य असं वैयक्तिक माझं तरी मत आहे. सेक्स हे दोघांच्या सहमतीने करण्याची गोष्ट आहे, कारण यात फक्त शरीराची भूक शमवणं गरजेचं नसून; सुखाची प्रचिती करून देणाऱ्या भावनेला अनुभवणं ही तितकंच गरजेचं असतं. सेक्स हा विषय आजही एकांतात कुजूबुजण्याचा विषय आहे असं मानलं जातं, त्यामुळे याबाबतीतील संपूर्ण ज्ञान योग्य वयात स्पष्टपणे न मिळाल्यामुळे आजची पिढी चुकीच्या दिशेने भरकटत चाललेली दिसते.
          अश्लीलता काल्पनिक आहे असं माझं मत आहे, कारण अश्लील काय आहे व काय नाही हे निश्‍चितपणे ठरवणं शक्य नाही, ज्याच्या त्याच्या कल्पनेप्रमाणे ती उदयास येते. अश्लील म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, हे ठरविणे कठीण आहे, कारण अश्लीलता ही लैंगिक गोष्टींशी जरी निगडित असली तरी त्यासाठी इंग्लिश शब्द वापरले तर त्यात अश्लील काहीच वाटतं नाही, पण त्यासाठी जर ग्रामीण बोली भाषेतला शब्द उच्चारला तर तो अश्लील मानला जातो, म्हणून अश्लीलतेचा प्रश्न न काढलेलाच योग्य असं मला तरी वाटतंय.

प्रेम म्हणजे खरोखर प्रेम असते का ?(भाग:-२)

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

प्रेम म्हणजे खरोखर प्रेम असते का?(भाग:-२)


Source: Internet

-वैशाली पंडित,
हिंगोली

        ती म्हणजे खरच प्रेम असतं का प्रश्नच आहे कुणाचेही असो . प्रेमाची परिभाषा प्रेमाचा अर्थ अजून कुणाला समजलेच नाही. अनाकलनीय भावना असमज  विचार म्हणजे प्रेम . विल्यम शेक्सपियर यांनी म्हटल्याप्रमाणे ,,खरे प्रेम म्हणजे काय आत्तापर्यंत कोणाला समजू शकले नाही. परंतु साधारणतः प्रेम म्हणलं की समोर एकंद जोडपं किंवा मग लग्नाचा प्रेम असंच चित्र डोळ्यासमोर तरंगत. प्रेम हे एका सेकंदात किंवा एका दिवसात किंवा एकाच वेळी होण्याचे नाव नाही तर प्रेम एखाद्या झाडा प्रमाण असतं परिस्थिती वातावरण यांची सांगड घालून वाढत जातो तसंच प्रेमाचाही बाबतीत होतं प्रेम हे हळूहळू होत जातो हळूहळू वाढत जातो घट्ट होत जातं कालानुरूप परिस्थितीनुसार ते वाढत जातं पण ते कधी बदलत नाही. लहानपणी आपल्या आईचा आपल्यावर आणि आपल्या आईवर आपलं प्रेम असतं तेव्हापासून जेव्हा आपल्याला काही कळत पण नसत. पण थोडी समज यायला लागल्यावर हे प्रेम अजून घट्ट होत जात. प्रेम करण्यापेक्षा प्रेम निभवणं महत्त्वाचं असत. आई जन्मभर प्रेम निभावत असते तीच प्रेम कधीच बदलत नाही ते आहे  खरं प्रेम.
          दुसरा मुद्दा लग्नाचा किंवा सध्याच्या gf bf( प्रचलित) प्रेमी युगुलांचा. हा प्रश्न आजकाल फार वाढला आहे, फार लांब जाण्याची गरज नाही आजकाल समाजाचं हुबेहूब वर्णन चित्रपटांत दर्शविला जात आहे. याचं उदाहरण म्हणजे 2 वर्षांपूर्वी आलेला सैराट "हा चित्रपट.
       काय होतं? चित्रपटातील नायक-नायिका एकमेका खूप प्रेम करत असतात खुप प्रेम करतात (खर आहे की नाही हा वादाचा विषय) मंग काय होतं पण घरच्यांच्या विरोधामुळे ही दोघं पळून जाऊन लग्न करतात. काय गरज पडली त्यांना पळवून जाण्याची? चित्र
घरच्यांचा विरोध,,, आणि फक्त चित्रपटातच नव्हे तर खऱ्या आयुष्यात सुद्धा खर्चांचा विरोधामुळेच प्रेमीयुगुलांना असे सेराट निर्णय घ्यावे लागतात. आणि मग बेघर बेकारी लाचारी अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. इथे खर प्रेम नव्हतं कुणाच्याच खरं प्रेम नव्हतं,, ना त्यांच्या आई-वडिलांचा या दोघांचं. कारण त्यांनी आई-वडिलांना सोडून दिली काल-परवा मिळालेल्या प्रेयसी साठी प्रियकरासाठी. पण त्यांच्या आई-वडिलांचेही प्रेम नसेल कदाचित त्यांच्यावर कारण समाज आणि इतर त्यांना मुलीच्या सुखा पेक्षा जास्त महत्त्वाची होती.               आजकाल "लव जिहाद" नावाचा पण एक  प्रकार चालतो. फार काही माहिती नाही याबद्दल पण त्यामध्ये मुलगा मुलीला फसवतो, इथेही खरं प्रेम नाही कारण जर आपण आपल्या प्रेमाला ओळखू शकलो नाही ,समजु शकलो नाही तर ते खर प्रेम करू शकत. प्रेम हे दोन सारख्या व्यक्तींसाठी नसून दोन असामान्य व्यक्ती ने हा निर्णय घेऊन जगण्याच नाव आहे.  
            जर दोघही एकमेकांवर खरंच प्रेम करत असतील , आणि ते आपल्या आई-वडिलांवर पण प्रेम करत असतील  , तर त्यांच्यामध्ये त्यांना राजी करण्याची क्षमता असते हे पटवून देण्याची क्षमता असते की ते दोघे एकमेकांच्या लायक आहेत. ते दोघे आयुष्य सुखात घालवू शकतील. आणि त्याच्या आई-वडिलांचं पण त्यांच्यावर खरंच प्रेम असेल तर ते स्वतःच्या स्वरचित प्रतिष्ठेची काळजी न करता लग्नाला राजी होतील. मुलगा बेरोजगार आहे ,तर त्याला रोजगार ,व्यवसाय उभारण्यासाठी हातभार लावतील .कारण त्यांनी जर स्वतःच्या पसंतीनुसार मुलींचे लग्न केलं असतं तर आला नसता खर्च? दिला नसता हुंडा ? (हुंडा कायद्याने गुन्हा असला तरी) हे आहे का खरं प्रेम???? नाहीतर मुलगा काहीच करत नाही बेरोजगार आहेत मुलीला कस जायचं याप्रकारचे मायबाप,,,🤔 आणि इकडं मुलगी 18 वर्षाची कमवता मुलगा शोधला चाळीस वर्षाचा, कुरूप वयस्कर असला तरी चालेल ,मुलीला पसंद नसला तरी चालेल,( रूपाला महत्त्व नाही पण) तरीही हुंडा दिला 10 lakh ,20 तोळे सोनं, भांडीकुंडी ,हिरो होंडा गाडी ,सगळीकडे धुमधडाक्यात वरात डीजे, हे सगळं काय आहे खरं प्रेम की दिखावा.
विषय खूप खोल आहे पण शब्दाला मोल आहे ,त्यामुळे एवढाच की प्रेम ही खूप सुंदर आणि पवित्र भावना आहे. आणि ते आणखी सुंदर बनवता येत. पण समाजातील प्रतिष्ठा ,अहंकार ,न झुकण्याची  प्रवृत्ती या सर्व बाबी प्रेमाचा खूण करत आहेत.
          प्रेम खूप सुंदर आहे फक्त ते समजून घेता आलं पाहिजे , पारखता आलं पाहिजे, सगळ आयुष्य सुंदर बनून जाईल जर प्रेमाला योग्य दृष्टिकोनातून समजून घेतले तर ,,,,
       



Source: Internet

-नामदेव जाधव,
 जि. कोल्हापूर

             प्रेम म्हणजे खरचं प्रेम आणि फ़क्त प्रेम असतं. प्रेमा सारखी शुध्द सात्विक, भावना या जगात नाही.प्रेम आहे म्हणून माणूस माणसाला जोडला गेलाय.माणसाचे आयुष्य परिवर्तन करायचे असेल तर प्रेमासारखा दूसरा दुवा नाही.आजच्या काळात अनेक वेळा आपण तरुणांकडून प्रेमासाठी टोकाची पावले उचलेली पाहतो.पण ते कितपत योग्य आहे हे त्यांनाचं माहीत. प्रेम ही गोष्ट दाखवण्याची नसून ती अनुभवायची आहे,याचा जणु हल्ली विसर पडत चाललाय,. प्रेमात त्याग ही तितकीच महत्वाची भावना आहे. कधी कधी आपण आपल्या जोडीदारासाठी स्वतःला विसरायला हवं,व याची जाण जोडीदाराने ठेवायला हवी.मग अश्या प्रेमासाठी महागड्या वस्तूची गरज नाही की सुविधांची ,नात्यांतहवा तो फक्त विश्वास आणि प्रेमाचा ओलावा मग बघा हे प्रेमरुपी वृक्ष कसा भरतो ते.! सर्वाना जोडीदाराकडून ,आयुष्याकडून भरभरून  प्रेम मिळो या आशेसह इथं थांबतो.
             ‎धन्यवाद.



Source: Internet

-राज इनामदार,
 पंढरपूर

*प्रेम करांव  भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं*
*मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं*

प्रेम म्हणजे अनोखी ओढ़ ..त्याचाच द्यास ...प्रत्यक्ष भेंट जरी नाही झालीना ....तरीही स्वप्नात आणी विचारानच्या महेफलित होणारी साखर भेट ...आणी त्याच भेटीच्या  गोडीची चव चाखत प्रत्येक्श भेट होईल याची मनाला काढलेली समजूत .प्रेम म्हणजे प्रार्थना आणी प्रेम म्हणजे त्याग ...प्रेम म्हणजे पूजा ...प्रेम म्हणजे ह्रुदयाच्या गाभाऱ्यात आपण जपून ठेवलेला हीरा .
प्रेम म्हणजे ..आपण जिच्यावर् प्रेम करतो ती आपल्याला मिळो न मिळो तिचे आपल्यावर् प्रेम असो नसो ..पण दररोज परमेश्वराच्या दरबारात डोळ्यांत अश्रु अनावर होवून देवाजवळ केलीली प्रार्थना... हे ईश्वरा सुखी ठेव त्याला ..उदंड आयुष्य लाभो त्याला ..त्याची सर्व दुख मला मिळो व माझे सर्व सुख त्याला मिळो ...अशी प्रियकराविषयी असणारी सदभावना ..
     मित्रहो प्रेम हे कधीच करून होत नसत ...प्रेमात सुंदरता ...श्रीमंती ..जातपात ..रंगरूप याला काहीही किंमत नसते प्रेम आंधळ असत ...कोणावरही होवू शकत
प्रेम ही गोष्ट अंतकरनातून निर्माण होत असते ...प्रेमाची ओढ़ अतिशय तीव्र असते ..तो एक विषाचाही प्याला आहे पंचवताही आला पाहिजे .
*खयालें यार तो हर गमको भुला देता है*
*जिसको पीना है ओ पिये जाम से  औरसागर से*
*मेरा साकी मुझे आँखोंसे पीला देता है*

आयुष्यात कितीही दुःख आली संकटे आली तर ..जेंव्हा जगण नकोस वाटत त्या वेळेस तिचा चेहरा आठवला की हलकीसी स्माईल ओन्ठावर यावी व सर्व दुःख विसरून जावे तिच्या आठवणीत.
मजनू आपल्या लैला ला भेटन्यासाठी जंगलातील वाटेवरून जात होता ...तो बेभान होवून चालला होता ...पायात काहीही घातलेलें नव्हते तरीही भर उन्हात चालला ..काँटे कुंटे तुडवून अनेक दगडांच्या ठेचा लागून पाय रक्तबम्बाळ झाल पण याला कळलच नाही ...हा  फक्त लैला लैला करत निघालेला ...
त्या वाटेत ऐक फकीर नमाज पढ़त होता ..हा मजनू त्या फकिरां समोरुण गेला ....फकिर लाल बूंद झाला व तो मजनू शिव्या देवु लागला ....तेंव्हा मजनु हसु लागला व म्हणाला ...माझ्या लैला ला ईश्वराने बनवल ती एक साधारण स्त्री असून सुधा ..तिच्या प्रेमात मी इतका व्यापून गेलोय ..इथंका आंधळा झालोय की तिच्या भेटीची ओढ इतकी आहे की ये फकीरजी तुंम्ही नमाज पढ़त आहात हे सुधा मला दिसलं नाही .
तुंम्ही तर मग लैला ला बनवनार्या ईश्वरावर् जर प्रेम करतो असे म्हणता तर मग तुमी नमाज पठण करत असतांना मी तुम्हांला दिसलोच कसा ? हे सांगा ...फकीर नीरुत्तर झाला ...
*तेरे प्रीत मे सुधबुध सब बीसरी*
*कबतलक रहेगी ये बेखबरी*

असे ऐका ठिकाणी अमीर खुसरो म्हणतात .

मजनु लैला वर् इतका प्रेम करत होता की त्याला जिकडे तिकडे फक्त लैलाच दिसायची
अर्जुनाची धनुष्यविद्यावर् इतके प्रेम होते की त्याला फक्त पक्ष्याचा डोळाच  दिसला
पुंडलिक आई वडिलांनवर् इतक प्रेम केल की साशात भेटायला आलेल्या पांडुरंगालाही भेटायला त्याच्याकडे वेळ नाही .
पोट्च्या लहान बाळाच्या प्रेमापोटी हिरकणी बुरुज उतरून गेली .
आम्हीं प्रेम मुलांवर करू  , आई वडीलानवर् , ईश्वरावर् करू आमच्या प्रेमाचा आलेख किती उंचीचा आहे हे पाहणे गरजेचा आहे .

प्रियशीला प्रियंकर पत्र लिहतो मी तुझ्यासाठी चंद्रसूर्य तोडून आणेल म्हणतो ..
जेंव्हा प्रियशी याला भेटीसाठी बोलवते तर हा म्हणतो सॉरी जानू आज़ आभाळ आलंय पावसाची शक्यता आहे त्यामुळे तूला भेटायला येवू शकत नाही ....😣...अरे जो माणूस आपल्या प्रियशीसाठी पावसात भिजू शकत नाही ..तो ..काय चंद्रसूर्य तोडून आणनार .
दररोज कपड़े बदल्याप्रमाणे प्रेम बदलणार्याना काय समजणार प्रेम ...नुसता कामं वासनाचा बाजार .....
प्रेम आतड्यावर असावे ...कातड्यावर् नको ....

ऐक शिकारी जंगलात हरनीची शिकार करताना हरनी च्या माघे धावत असतो ....काहीही करून त्याला त्या हरनीची शिकार करायचिंच होती ...पण अचानक पुढील वळणावर ते हरिण झुडपातूण गायब होत ..शिकारी खूप उदास व निराश होवून चालु लागतो ..त्याला समोर आदीवाशी लोकांची वस्ती दिसते तो तिथं जातो ...तेथील लोक त्याचा पाहूनचार करतात व त्याला सांगतात की आज़ रात्री आमच्या वस्तीवर उत्सव आहे तुंम्ही थाम्बा ......शिकारी त्यांच आमंत्रण स्वीकारून थांबतो ...
रात्र होती सगळीकडे शेकोटि पेटवून रोशनाई केली जाते ..व ती आदीवासी लोग विविध आभूषण घालून एका शेकोटि भोवती बेभान होवून नाचत असतात ..गाणी म्हणत असतात ...हे पाहून ढोल वाजनारा आणखीन जोराने ढोल वाजवत असतो .....तेवढ्यात तिथे हरिण येत शिकारी बघतो ...हरिण आयातिच सापडली म्हणून त्याला आनंद होतो ...बन्धुक उचलतो ..नेम धरतो ..गोळी झाड़नार तोच त्याला तेथील एक आदीवाशी माणूस त्याला अडवतो ...शिकारी म्हणतो ही माझी शिकार आहे .मला सोड मला शिकार करूदे नाहीतर तूला गोळी घालेन ...आदीवाशी म्हणतो मला गोळी घाल पण येकुन घे .
ही हरिण गेली पाँच वर्षे झाली इथे येतीय ...कारण पाँच वर्षापूर्वी हे हरिण याच्या प्रियकर हरणाबरोबर फिरत असतांना एका शिकार्याने हिच्या प्रियकर हरणांची शिकार केली ..त्या हरणाच्या कातड्यापासून ढोल बनवला गेला व तो ढोल आमच्याकडे आहे जेव्हा जेंव्हा त्या ढोलावर थाप पडते ...तेंव्हा तेंव्हा ती हरणाची कातडी या हरनीच्या आतडयाला साद घालते व हरिणी बेभान होवून अश्रु ढाळत आमच्या वस्तीत येते ...जो पर्यत ढोलचा आवाज़ बंद होत नाही ...तो पर्यंत थाम्बते  ........
मित्रहो एक प्राणी इतक पवित्र प्रेम करू शकत तर आपण का नाही
आता आपण आपल्या मनाला विचारू की खरच आपल प्रेम हे ..नक्की प्रेमच आहे का ?

खूप खुप फरक असतो खऱ्या प्रेमात व खोट्या प्रेमात .

आजकाल केल्या जाणाऱ्या प्रेमाला नक्की प्रेम म्हणता येईल का ? हेच समजत नाहीये .

चूक भूल झाल्यास शमा असावी 🙏



Source: Internet

-अनिल गोडबोले,
 सोलापूर

          “प्रेम” हा विषयच असा आहे कि त्यावर आपण कतीत बोलू तेवढ कमीच! या हिंदी चित्रपट सृष्टीने आणि एकंदरीत सर्व फिल्म वाल्यान हा विषय सतत वेगवेगळ्या माध्यमातून हा विषय अगदी ‘जिवंत” ठेवला आहे. तर सुरवातीला हा जो प्रश्न विचारला आहे त्या मागील कारण सुधा खासच आहे आणि ते नुसत १४ फेब्रुवारी ‘व्हॅलंटाईन डे’ पुरत मर्यादित नसून त्या मागे एक अर्थ दडलेला आहे.
आपण प्रेमाच्या खूप गप्पा मारतो. आईच प्रेम, वडिलांचं प्रेम, भाऊ-बहिण यांच्या मधील प्रेम एवढच कशाला.... मित्र प्रेम, शेजारी प्रेम (शेजारीण प्रेम नव्हे) असे  कितीतरी नाते संबंध आहेत जे प्रेमाच्या पायावर भक्कम उभे आहेत. या प्रेमाविषयी आपण किती बोलतो तर अगदी थोड म्हणजे जेवणातल्या मीठ एवढ... कारण ते जास्त झाल तरी खल जात नाही आणि कमी झाल तरी जाणवत ... आणि महत्त्वाच आहे ते प्रमाणात असण!.. हे प्रमाण देखील ज्याच्या त्त्यच्या चवीनुसार!.. तर जास्तीतजास्त वेळा स्त्री आणि पुरुष यांच्या मधील प्रेम संबंध बद्दल जास्त बोलाल गेलेलं आहे. शृंगार रस नावाचा एक रसच मुळात मराठी व्याकरण मध्ये आहे आणि तो रस ‘प्रणय’ या भावनेवर आधारित आहे. स्त्री आणि पुरुषांनी एकत्रित येणे ही निसर्गाची गरज आहे कारण त्या शिवाय प्रजनन होणार नाही. माणूस हा एक प्रगत प्राणी आहे त्यामुळे त्याच काही इतर प्राणी पक्ष्य प्रमाणे जीवन नाही त्यामुळे हे जीवन जगताना त्याने काही नियम घालून घेतले आहेत.
मानवी जीवन जगण्यासाठी घालून घेतलेल्या बंधनामध्ये माणूस एवढा गुरफटला आहे कि तो काही काल्पनिक गोष्टी त्या मध्ये मिसळून मूळ प्रेम भावनाच विसरला आहे. सता आणि शक्ती यांची लालसा माणसाला कुठलेही विधिनिषेध पाळायला लावत नाही तसेच काही लोकांना एवढी बंधन आहेत कि त्यांना जगणे मुश्कील झाले आहे.
प्रेम एक सुंदर भावना आहे जी एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीवर व्यक्त करत असतो. आता इथे जाणून बुजून व्यक्ती हा शब्द वापरला कारण शास्त्राच्या मते समलिंगी शरीरसम्बन्ध मध्ये hi प्रेम असते असे सिध्द झाले आहे. कोणी मानो किवा न मानो समलिंगी जोडपी सुधा “नॉर्मल” आहेत असे शास्त्र म्हणत आहे. प्रेम व्यक्त करताना व्यक्ती च्या भावनांचा आदर केला पाहिजे एवढ एकच सूत्र जर पाळल तर काही अवघड होत नाही.. पण अस होत नाही आणि तिथे समस्या निर्माण होते.
व्हॅलंटाईन डे च्या निमित्ताने सोशल मेडिया वर येणारे मेसेज वाचले किवा आजूबाजूला जर चित्र बघितले तर दोन्ही प्रकारची माणसे दिसतात. प्रेम करणारी आणि द्वेष करणारी आता या मध्ये अजून एक तिसरी अवस्था अशी आहे कि प्रेम करणार्याचा तिरस्कार करणारी ......
काही व्हिडिओ आले ग्रुप वरती या लोकांनी प्रेमी युगुलांना मारहाण केली.. किवा लग्न लाऊन दिल... आणि शेअर करणारे पण आनंदाने शेअर करत होते.. प्रेम करणे ही काही आपली संस्कृती नाही किवा प्रेम कशासाठी पाहिजे? पाश्चात्त्य लोकांच अंधानुकरण, किवा तरुणांना मजा मारण्यासाठी मोकळ केलेलं रान आहे.. अशा प्रतिक्रिया या तथाकथित “संस्कृती रक्षकाकडून” ऐकायला मिळतात. आज भारता मध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्या बघितली तर त्या मध्ये जास्तीत जास्त आत्महत्या ह्या “अपेक्षा भंग” या मानसिकते मुळे होतात. आपल्याला जर आपल्या मनाप्रमाणे जगता येत नसेल प्रेम करता येत नसेल तर केवळ बहर मोकळे पाने फिरणे म्हणजे स्वातंत्र्य आहे का? असा देखील प्रश्न पडतो.
या दोन्ही टोकाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या मुले असा प्रश्न पडला कि खरोखर हे प्रेम गरजेच आहे का? फक्त प्रजनन करणे एवढाच उद्देश मनुष्य जीवनाचा आहे का? निश्चितच नाही! त्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे. डोपामाईन नावाच्या संप्रेरकामुळे प्रेम होत अस म्हणतात पण जीवन जगण्याच्या भीती पोटी पुढच्या पिढीत हा आढळून येईल किवा नाही असा प्रश्न पडतो कधी कधी....
खर प्रेम माणसाला माणूस म्हणून विचार करयला भाग पाडते. एकटेपणा दूर होतो, अपेक्षा भंग हा पचवता देखील येतो, आपण आपल्या आयुष्यात काय मिळवलं पाहिजे हे कळत... प्रेम बंडखोरी करायला शिकवत. प्रेम माणसाला नवीन गोष्टी करायला भाग पाडत. आईनस्टाईन ला तर म्हणे आपण जेवलो आहोत कि नाही हे सुद्धा लक्षात राहत नसे एवढ तो त्याच्या विषयावर प्रेम करत असे.
या मध्ये मात्र एक सीमा रेषा आहे ती सगळ्यांनी समजून घेण गरजेच आहे. जबरदस्ती, अत्याचार. पैशाच्या जोरावर किवा दुसर्याच्या कमजोरीचा फायदा घेऊन प्रेम मिळवणे हा काही माणूस असल्याचा पुरावा नाही.
व्यक्ती स्वातंत्र्य भारताने मान्य केलेले असताना देखील अशा प्रकारे “moral पोलिसिंग” करणारे हे नेमक काय साध्य करत आहेत हे कळत नाही
तरी hi भावना हे प्रेम खरोखर आहे आणि ते त्यच अस्तित्व दाखवत राहत ... कधी रोमिओ आणि ज्युलियेट आणून कधी सैराट होऊन कधी कोणताही रूप घेऊन.... अजूनही इज्जत कशाशी खातात हे न कळलेल्या लोकांना अस समजावणार हा देखील प्रशन  आहे. मुलगी प्रेम केली तर इज्जत जाते, दुसर्या धर्मातली मुलगी किवा मुलगा असेल तर इज्जत जाते, पैसा कमी असण्याने इज्जत जाते ... पण बलात्कार क्र्नार्यामुळे इज्जत जाते हे कधी कळणार? अत्याचार करणारे भ्रष्टाचार करणारे या मुले किती नुकसान होत आहे हे अजूनही कळलेलं नाही
शेवटी एवढच सांगतो..... प्रेम होतच राहणार कानीही कितीही प्रयत्न करा.. पण या मध्ये विकृती ला थारा नाही. एक जोडीदार किवा अनेक जोडीदार हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. “त्याने प्रेम केळ किवा तिने प्रेम केल.. मला सांगा तुमच्या बापच काय गेल... “ या प्रश्नाच उत्तर पाडगावकर यांना अजूनही कोणी दिलेलं नाही
“एक आग का दर्या है.... और डुबके जाना है” हेच खर !!!!!



Source: Internet

-करण बायस,
हिंगोली

प्रेम म्हणजे...💓💓💓............?
      कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.प्रत्येक बाळाचं पाहिलं प्रेम असते आई.कारण आई बाळाला जन्म देते तेंव्हा पासून आई आणि बाळाचं प्रेमच नात तयार होते.

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.बाबा पण आपल्या मुला/मुली साठी एक अस पात्र असते ज्यांच्या प्रेमाची तुलना करता येत नाही.

मैत्री हे एक अस नातं असते जिथे आपल्याला आपल्या भावा बहिणीसारखं प्रेम करणारे मित्र मैत्रिणी भेटतात.

आपल्या घरातील आजी आजोबा असतात आपल्या वर प्रेम करणारे.

प्रेम हे प्रत्येक नात्यांमध्ये असते.आज माणसांचे एकमेकांशी जे चांगले संबंध आहेत ते प्रेमामुळेच आहेत.
पण प्रेम म्हंटल की सर्वात आधी आपल्याला couples आठवतात.आपल्या समाजात लोकांना या गोष्टींशी खूप problem आहे.कारण त्यांना वाटते यामुळे आपल्या संस्कृतीवर वाईट परिणाम होईल.ते सर्व अवलंबून असते ज्याच्या त्याच्या mentallity वर.

प्रेम म्हणजे फक्त एक शारीरिक attraction नसते.

आज काल आपण बघत आहोत की प्रेमाच्या नावावर होणाऱ्या वाईट घडामोडी.खरं प्रेमात अस काही होत नाही.प्रेमात हे एकमेकांना समजून घ्यावे
लागते, कोणी जर चुकत असेल तर एकाला समजूत काढावी लागते.जवळ असो वा लांब असो एकमेकांवर विश्वास पाहिजे.

आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यावेळेस आपण ‘I Love You’ अस बोलतो, या I चा खूप deep अर्थ आहे.म्हणजे ज्यावेळेस आपलं मन हे एखाद्या मनाशी पूर्णपणे मिळतो( by heart,not by mind)
ते प्रेम खर असते.एखाद्या व्यक्तीला बघितलं आणि तो/ती आपल्याला आवडलं की आपला mind हे dopamine नावाचं एक chemical secrete करते जो आपल्या brain ला आवडतो आणि समोरची व्यक्ती by mind आपल्याला आवडते जे की खरं प्रेम नसते.mind न प्रेम हे स्वार्थ साठी असतो.

एक उदाहरण देतो,प्रत्येक आई आपल्या बाळावर प्रेम करते ते प्रेम पूर्णपणे तिच्या feelings, emotions ने असते.ते प्रेम करावे लागत नाही ते पूर्णपणे by heart असते.आणि त्या heart च heart म्हणजे तिच्या बाळाचं heart.

आपण प्रेमाची व्याख्या काय करतो हे महत्त्वाचं आहे.
बऱ्याच जणांचं म्हणणं असते की love marraige हे यशस्वी होऊ शकत नाही पर्याय फक्त arrange marraige च आहे.पण मला वाटते की इथं प्रेम खरं असेल तर काही problem नाही येणार.Arrange marraige मध्ये आधी सगळ्यांच्या संमती ने लग्न होत आणि नंतर प्रेम,पण जर दोघांचे विचार वेगळे असतील तर खूप प्रॉब्लेम्स येतात.

एकदा प्रेम केल्यावर ते आयुष्यभर टिकवला पाहिजे,लग्नानंतर पूर्ण आयुष्य काढायचं असते ते पूर्ण आयुष्यभर टिकवून ठेवलं पाहिजे,प्रेमात एकमेकांनी एकदुसर्याल समजून घेतलं पाहिजे.

अस म्हणतात प्रेम झाल्यावर माणसात खूप काही बदल घडलेले दिसतात, मग ते प्रेम सजीव गोष्टीवर असो वा निर्जीव गोष्टीवर उदा. जर एखाद्याला music आवडत असेल तर त्या गोष्टीत स्वतःला पूर्णपणे झोकून देईल,त्याला त्या गोष्टींशी एक attachment तयार होईल.

जर आज आपल्या पिढीने प्रेम या विषयाचा अर्थ समजून घेतला तर येणाऱ्या पिढीत खरा बदल होईल आणि जे काही आज देशात वाईट गोष्टी होत आहेत त्या कमी होण्याच्या भरपूर शक्यता असतील. आणि जर  आपण आपल्या पुढच्या पिढीला अशाच प्रकारे टॉर्चर केलं आपल्या सारख बनवण्यात तर खुप प्रॉब्लेम्स होतील त्यांना त्यांच्या स्वतंत्र मनाने/बुद्धीने विचार करू दिले पाहिजे.

जर तुम्ही आमच्या मनाप्रमाणे वागला तरच तुमच्या वर आमचे प्रेम आहे, हे चुकीचं आहे हे वडीलधारी मंडळींनी समजून घेतलं पाहिजे.

ज्या वेळेस एखादा व्यक्ती relatinship मध्ये असतो त्याने समोरच्या व्यक्ती वर बंधन टाकणं हे सुद्धा चुकीचं आहे कारण ते आपले विचार आपण दुसऱ्यावर थोपणं हे बरोबर नाही.
आपण म्हणतो माझ्या देशावर माझे प्रेम आहे.पण किती जण देश स्वछ ठेवण्यास पुढं येतात,मनापासून?किती जण रस्त्यावरचे सिग्नल follow करतात?किती जण curroption करतात?

किती जण देशात शांतता टिकवतात?




Source: Internet

-जयंत जाधव,
 लातूर

       प्रेमाची व्याख्या करणे तसे खूप अवघड काम आहे व कोणाच्या सोबत तुलना करणे ही शक्य नाही.प्रेमात अपेक्षांची यादी फार कमी असावी लागते व देण्याची यादी मोठी असावी.सर्वात श्रेष्ठ प्रेम हे आईच आपल्या मुलांच्या विषयी असलेले प्रेम आहे .शाळेत असताना शिकायला मिळाले की ऊर्जा ही अक्षय असते .अगदी तसेच खरे प्रेम हे अक्षय म्हणजे न संपणार असते.आपल्याला जीवनात कोणी यावे हे जरी नशिब ठरवते पण आलेल्या माणसाला थांबून ठेवणे आपल्या मनाच्या  हाती असते.
प्रेमाच्या प्रवासात जीवनाचे बंध हे नेहमी पुढे घेऊन जाणारे असावेत.मागे ओढून नेणार हे प्रेम नसते ते असते स्वार्थ.
शेवटी Love means a person's face, on her motives, on the role, vision. To sacrifice love for proving love, to bear exploitation- compulsion, to sacrifice excessive sacrifice - these are wrong ideas. Because love means respect for the person's mentality, self-respect. Love means acceptance of qualities and conflicts -deficiencies. To know about the person's problems and to take the initiative to solve them, to make his life happy.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************