आजचा तरुण आणि भगतसिंग

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

आजचा तरुण आणि भगतसिंग

नवनाथ वाघ,अहमदनगर.

एकदा असंच थेटर मध्ये एक चित्रपट पाहताना सुरुवातीला *अब भी जिसका खून न खोला, वो खून नहीं पानी है*...... अशा काही ओळी दिसल्या. तात्पुरता श्वास रोखून वाढावा अस सुद्धा कुणाला झाल नाही.

आमचं रक्त उसळत की; भाऊबंदकी मध्ये शेताचे बांध कोरताना, शेजारयाची जिरवायला,निवडणुका मध्ये, जत्रात मिरवायला, महागडे मोबाईल वापरायला. उरलंच तर, फ्लर्ट करायला,कुणा मागे मागे शेपुट हलवत फिरायला.

भगतसिंग हे हसत हसत फासावर गेलेले क्रांतिकारक ह्यापलीकडे फार तर 1 2 वाक्याचीच ओळख आपण पटवुन देतो. त्यांच्या कार्यातून पेटून उठायला त्यांची समर्पित भावना लक्षात घ्यायला हवी.

आज आपल्याला तरुणांचं बलिदान नकोय पण निदान देशासाठी समर्पित भावना पुरेशी आहे.

*.....जो देश के काम ना आए ओ बेकार जवानी है l* ही त्या थेटर मधल्या वाक्याची दूसरी ओळ होती.

देशाच्या काम येण म्हणजे काय ? आता बंदुका😱 घेऊन नेमकं कुठं उभा रहावं अस वाटत असेल. नाही, मग निदान स्वछता अभियानात एखादा फोटो तरी इन्स्टाग्रामवर असावा. 🤔🤔अम्म्मम नाही का, मग सामाजिक मोठी मदत तरी करावी.. नको का कुठून आणावा ना इतका पैसा.... अअम्म....काय करावं मग🧐

चला विकास करूयात का, नाही बुआ🤥, राजकारणापासून चार हात लांबच बर😒....

क्रांतिकारक बनायचय ना 🤗, भगतसिंगा सारख, चला मग जीव ओतून देऊ😎...अहो पण  ओतायचा कुठे?🤨

आहेत की अशा काही खास जागा,
आपल्या कामावर, क्षेत्रावर जीव ओतू, त्या क्षेत्रात नाविन्यता कशी आणता येईल ह्यावर भर घालू, त्यातून संशोधन वृत्तीवर भर घालत राहू.

व्यवसाय, नोकरीतुन योग्य पैसा कमवत राहू, निदान टॅक्स भरता येईल इतका रोजगार तरुणांनी उपलब्ध करून घ्यावा; त्यासाठी लागणारे कौशल्य वाढवावे. निदान टॅक्स च्या रूपाने देशाच्या कामी आलो तरी समाधानकारक व पुरेस मानून घेऊ.

आपली अभिप्रेत असलेली जवानी ह्यातून दिसून येईलच, फालतूपणा कमी,धाडसी व क्रियाशील तरुण निर्माण होतील तीच खरी भगतसिंह ह्यांना आदरांजली असेल. ते आपल्या रूपाने भारतभूमीत कार्य करत राहातील.

तुम्ही पाहिलेत का भगतसिंगाना ? चला मस्त सेल्फी काढू
*==========================*

अनिल गोडबोले,सोलापुर

भगतसिंग हे नाव घेतलं की नक्की काय आठवतं? त्यांनी केलेला काकोरी कट, घातलेल्या गोळ्या आणि संसदेतले बॉम्बस्फोट...
आणि हल्ली पिक्चर मुळे जालियनवाला बाग हत्याकांड, चंद्र शेखर आझाद व तुरुंगातील उपोषण आणि फाशी..( हे देखील खूप डिटेल झालं)

पण सोईस्कर रित्या ते ज्या विचारधारेतून वागत होते किंवा तसच का वागले आणि राजकीय मत या बद्दल जास्त बोललं जातं नाही असं मला वाटत.

आजचा तरुण हा जे काही वागत आहे ते विचार धारेतून वागत आहे का? हिंसेचे समर्थन करता येणार नाहीच पण त्यावेळी ती गोष्ट त्यांना का गरजेची वाटली? या बद्दल विचार होणे गरजेचे आहे.

त्यांच्या पक्षाचे नाव देखील रिप्लब्लिकन पक्ष होत. त्यांची राजकीय मत आणि नास्तिकता किंवा कुठल्याही मुद्ध्याला ठाम पणे नाकारण्याची किंवा जे बुद्धीला पटत आहे ते सर्वस्व ओतून करण्याची जिद्द असलेला तरुण आज पाहिजे आहे.

आजच्या तरुणांकडे सगळं काही आहे.. फक्त ती दृष्टी आली ना की भगतसिंग नक्की मुळापासून समजू लागतील

आणि शेवटी आता  "कातिल" ही आपलेच आहेत. "सरफारोश" पण आपले च आहेत. हा निरक्षीरविवेक कळला तर आम्ही ही म्हणू "सरफारोशी की तमन्ना आबा हमारे दिल मे है।"
*==========================

प्रविण, मुंबई

देशाप्रेमाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भगत सिंह
त्यागाची व्याख्या म्हणजे भगत सिंह
सळसळणारे रक्त म्हणजे भगत सिंह
अन्याया विरुद्धचा आवाज म्हणजे भगत सिंह
धर्मांधेशी बंड म्हणजे भगत सिंह
तरुण भारताची ओळख म्हणजे भगत सिंह
क्रांतीच दुसर नाव म्हणजे भगत सिंह

भगत सिह जगले ते देशासाठी. तो फासीचा शेवटचा क्षण जणू काही सांगत होता कि मृत्यू यावा तर असा. आयुष्य ला हि हेवा वाटावा अस होता तो क्षण होता. अनेक पैलू असलेले त्यांचे आयुष्य होत. ते लेखक होते, कवी होते, देशातील पहिले मार्क्सवादी, भाषेवर पकड असलेले ते उत्तम वाकपटू इ. अनेक पैलू त्यांच्या आयुष्यात होते. पण आजही हि भगत सिंह यांची देशभक्ती हीच काय ती लोकाना माहित आहे आणि जे काही चित्रपट आले त्यातही “राष्ट्रवाद” प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आला.  भगत सिंह हे पुरोगानी आणि वैज्ञानिक विचारांचे क्रांतीकारक होते. ते नास्तिक होते आणि शेवटच्या क्षणी पण त्यानी ईश्वर कडे प्रार्थना केली नाही. तरुणांना चीकीस्तिक रहाव, रूढी- परंपरावर टीका करावी, जे सद्सद्विवेक बुद्धीला पटते तेच स्वीकारावे आणि कोणत्याही विचारावर, व्यक्तीवर आंधळ्यासारखं विश्वास ठेऊ नये हीच त्यांची शिकवण होती. पण आजचा तरुणात ती बंडखोरी नाही दिसत. सध्या देशात जे चाललाय त्यावरून तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि टीकात्मक तरुणाची जात दुर्मिळ होतेय आणि भक्तांच प्राबल्य वाढतंय. प्रत्येक अन्यायाविरुद्धच्या आवाजात भगत सिंह आज हि जिवंत आहे आणि प्रत्येक तरुण मनातला भगत सिंह जागा करणे गरजेचे आहे.
शेवटी म्हणे ,भगत सिंग तुझे जिंदा होणा है

कल भी छल था आज भी छल है
छल में हर मनुष्य निर्बल है
उस छल का बल कम करना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है
*==========================*

अभय डोंगरदिवे

*मेरे सिने में जो आग है*
*लहू से लिपटा जैसे साज है,*
*भारत माता के कदमों पर*
*जान भी मेरी गिरवी आज हैं...*


*इन्कलाब का एक नारा हैं*
*जो हैं धधकता मेरे दिल में,*
*न्योछावर हैं धड़कन मेरी*
*इस मिट्टी के हर कण कण में...*


*बेंच दिया है ख़ुदको मेंने*
*देश को कई ज़माने से,*
*तन मन मेंरा इस धरती का*
*ना लौटूंगा मनाने से...*


*पागल बनकर प्यार करूं मैं*
*जान से भरी हथेली हैं,*
*पहला प्यार है मिट्टी मेरा*
*अब मौत भी बनीं सहेली हैं...*


*देश की गोद में आजादी को*
*चाहता हूं में गीत सुनाना,*
*अब इस बार हैं लिखना मुझको*
*अपने लहू से राग पुराना...*


*सरफ़रोशी चढ़ चुकी हैं*
*दिलों दिमाग और नस नस में,*
*शहिद बननेे चला है बेटा*
*है आंसु ना अब बस मैं...*
*================== ========*

गणेश भंडारी

आज आपल्या देशाचे भूषण असलेले व आपण सर्वांना अभिमान असलेले भगतसिंह यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना शत-शत नमन!

आपण भगतसिंहांना साधारणतः प्रखर देशभक्त, थोर क्रांतिकारक, देशासाठी बलिदान देणारे या रुपात ओळखतो. पण त्यांची केवळ एवढीच ओळख पुरेशी नाही. त्यांची साम्यवादी विचारसरणी, त्यांचे नास्तिक असणे, चिकित्सक वृत्ती, अभ्यासाची व नवीन गोष्टी शिकण्याची आवड हे इतर अनेक पैलू विचारात घेण्यासारखे आहेत; पण ते त्यांच्या देशभक्तीच्या व बलिदानाचा वलयापुढे दुर्लक्षितच राहिले. किंबहुना ते जाणूनबुजून दुर्लक्षित ठेवले गेले असे म्हणण्यासही वाव आहे.

आपणा तरुणांना भगतसिंहांचा आदर्श घेण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. पण बारकाईने पाहिले असता असा सल्ला देणाऱ्याला भगतसिंहांचा नेमका कोणता आदर्श अभिप्रेत असतो? नास्तिक्याचा? चिकित्सक वृत्तीचा? साम्यवादी विचारांचा? छे छे! काहीतरीच काय? तो आदर्श घेतला तर त्यांच्या दृष्टीने केवढा अनर्थ होईल!

वर चर्चा केलेल्या भगतसिंहांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा परिप्रेक्ष्यात आजचा तरुण नेमका कोठे आहे? आजचा तरुण-म्हणजे आपणच-आज आपण विविध लहानसहान गोष्टींतून आपली देशभक्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण भगतसिंहांना अपेक्षित असलेली देशभक्ती आपण अजूनही दाखवू शकलो नाहीत. आपण केवळ देशभक्तीच्या विविध प्रतिकांत व पर्यायाने आंधळ्या देशप्रेमात गुरफटत चाललो आहोत. देश या संकल्पनेच्या आपण करून घेतलेल्या आकलनातच लोच्या आहे! देश म्हणजे केवळ भौगोलिक क्षेत्र नसून त्या भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या माणसांचा मिळून देश बनतो हे अजून आपल्याला समजलेले नाही. देशातील माणसांवर होणाऱ्या अन्यायाची भगतसिंहांना भयंकर चीड होती. त्याविरुद्ध ते पेटून उठत. आज आपल्या डोळ्यांदेखत आपल्या देशबांधवांवर विविध प्रकारचा अन्याय होतोय. स्त्रियांवरील अत्याचार, आपलेच बांधव असलेल्या दलितांचा छळ, मजुरांचे शोषण, शेतकऱ्यांची पिळवणूक- किती उदाहरणे द्यावीत! आज आपल्या डोळ्यांदेखत हे सगळे घडत असताना पेटून उठतोय का आपण? होतेय का गरम आपले रक्त हे सारे पाहून? करतोय का आपण उघड विरोध या सर्वांचा? नाही ना? उलट बऱ्याचदा आपण या सगळ्यांचे निर्लज्जपणे समर्थनही करतो. जे थोडे लोक याविरुद्ध बोलतात, त्यांना वेड्यात काढतो. मग कोणत्या तोंडाने भगतसिंहांचा वारसा सांगणार आपण? आपल्याला अधिकार तरी आहे का तो?

भगतसिंहांना अभिप्रेत देशभक्ती आपण आपल्यात मुरवू शकलो नाही, त्यांच्या बाकीच्या गुणांचे अनुकरण तर दूरची गोष्ट. त्यांची साम्यवादी विचारधारा समजून घेण्याचा, तिचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे तर दूरच; पण कोणी थोडा डावीकडे झुकलेला दिसला तर आपण त्याला सरळ 'नक्षलवादी' हे लेबल लावून मोकळे होतो. आता तर त्यासाठी 'अर्बन नक्षल' ही नवीन टूम आलीय. जर भगतसिंह आज आपल्यात असते, तर त्यांना आपण पचवू शकलो असतो का? त्यांची आपण काय दशा केली असती याचा नुसता विचार करूनच अंगावर काटा येतो. ज्यांच्या देशप्रेमाचे आज आपण गोडवे गातो, त्यांची आपण देशद्रोही ठरवून केव्हाच बोळवण केली असती, त्यांना पाकिस्तानचे हस्तक, देशाचे शत्रू अशा पदव्याही बहाल केल्या असत्या.

भगतसिंहांची वृत्ती चिकित्सक होती. कोणत्याही गोष्टीवर ते आंधळेपणाने विश्वास ठेवत नसत. तिच्या मुळापर्यंत जाऊन, तिचा खरेखोटेपणा तपासून जर बुद्धीला पटले तरच त्या गोष्टीचा ते स्वीकार करत. त्यांच्या या चिकित्सक बुद्धीची झलक त्यांच्या 'मी नास्तिक का झालो' या निबंधात पाहायला मिळते. त्यांच्या या चिकित्सक वृत्तीची जरा आपल्याशी तुलना करूयात? चिकित्सक वृत्ती मुद्दाम अंगी बाणवावी लागते, त्यासाठी मनाला तसे वळण लावावे लागते. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. या प्रयत्नांचीच आपल्यात कमतरता आहे. परंपरेने चालत आलेल्या गोष्टींचा आपल्या मनावर इतका पगडा आहे, की त्यांची चिकित्सा न करताच आपण त्यांना कवटाळून बसतो. तर्काच्या कसोटीवर त्यांना परखीत नाहीत. नरेंद्र दाभोलकर, श्याम मानव ह्या लोकांनी आपल्याला तार्किक विचार करण्यास कितीही प्रवृत्त केले तरी आपण तो करीत नाही. एवढेच काय, एखाद्याने तसा विचार करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला साथ देणे, प्रोत्साहन देणे तर दूरच; उलट त्याची निंदा करतो, त्याला हतोत्सहित करतो. आजच्या तरुणांच्या दैनंदिन वागण्याचे जरा बारकाईने निरीक्षण केले, तर ते चिकित्सक वृत्तीच्या अभावी अंधश्रद्धांच्या चिखलात किती खोलवर रुतले आहेत याची कल्पना येईल.

भगतसिंहांची आणखी एक विशेषता म्हणजे चांना नवीन गोष्टी शिकण्याची, ज्ञान संपादन करण्याची असलेली आवड. फाशीच्या तख्तावर चढण्याचा अगदी आदल्या दिवसांपर्यंत त्यांची ज्ञानसाधना चालू होती. त्यांना अवघे तेवीस वर्षांचे आयुष्य मिळाले, पण त्या अल्पावधीत त्यांनी किती अफाट ज्ञान मिळवले होते, याची चुणूक त्यांच्या उपलब्ध लेखनावरून येते. आणि आजचा तरुण? मला वाटते, त्याची आणि पुस्तकांची कित्येक दिवस गाठच पडत नसावी! आजच्या इन्स्टंट मनोरंजनाच्या काळात आपण ज्ञानसाधना विसरूनच गेलो आहोत.

जर आपल्या तरुण पिढीने खरोखर भगतसिंहांचा आदर्श घेतला, आपल्यातून हजारो-लाखो नव्हे, पण काही शेकड्यांतच भगतसिंह आपल्या देशाला लाभले, तर आपल्या देशाचे चित्र आजच्यापेक्षा निश्चितच वेगळे असेल यात शंका नाही!
*==========================*
संदिप बोऱ्हाडे,वडगाव मावळ,पुणे
  फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे.. काय हा त्याग..'मेरी दुल्हन तो देश कि आझादी है! म्हणून घरातून निघून गेलेला एक तरुण..आम्ही तर स्वातंत्र्यांसाठी लढणारे क्रांतिकारक..फाशीच्या वेळी ते म्हणाले आम्हाला थेट तोफेच्या तोंडी द्या..तोफेचे गोळे आम्ही फुलासारखे झेलू. पण फाशीसारखी फुसकी शिक्षा आम्हा भारतमातेच्या सुपुत्रांना देऊ नका'' असे त्यांचे उद्गार..

   भगतसिंग हे एक क्रांतिकारी विचारांचे लेखक आणि पत्रकार होते. ते बाहेरून अत्यंत शांत, निग्रही विनम्र आणि हळवे वाटत असले ते अंतर्मनात अतिशय ज्वालाग्राही, तडफदार आणि कणखर होते. ते निरीश्वरवादी होते. पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नव्हता, पण जर पुनर्जन्म असलाच तर पुन्हा याच देशात जन्माला येण्याची त्यांची इच्छा होती. गुलामी आणि दारिद्ऱ्य हे जगातले सर्वांत घोर पाप असेल तर त्याच्यासाठी देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतःला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे त्यांचे विचार आणि लिखाण होते.

  भारतातील किती तरूणांनी शहिद भगतसिंह यांचे " मी नास्तिक का आहे " हे पुस्तक वाचले आहे? खरं तर भारतातील प्रत्येक तरूणांनी हे पुस्तक वाचले आणि समजून घेतले तर देशात फार मोठा बदल होऊ शकतो.

  तुरुंगात वाचण्यासाठी पुस्तके मिळावेत म्हणून, अन्नत्याग करणारा भगतसिंग सारखे क्रांतिकारक या देशात पुन्हा जन्माला आलेच नाहीत..
*==========================*

प्रविण,मुंबई

कल भी छल था आज भी छल है
छल में हर मनुष्य निर्बल है
उस छल का बल कम करना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है
जिन्दा लाशे घूम रही है
देशभक्ती किश्तोंमें बिक रही है
मुडदों  में जान डालना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है

किसान भूखा है, दलित पिछडा है
महिला अत्याचार का प्रथा बन रहा है
इंसानियत को जगाना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है

कोई धर्म पाला तो मर रहा है
कोई धर्म टाला तो मर रहा है
जातीव्यवथा को उठाके फेकना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है

कोई लिखनेके लिए डर रहा है
कोई बोलने के लिए डर रहा
आझाद देश में आझादी लाना है
हर एक युवा में भगत सिंह जिंदा होना है
*==========================*
अर्चना  खंदारे, हिंगोली
 लिख रहा हू मैं अंजाम 
जिसका  कल  आगाज आयगा
मेरे  लहू  का  हर एक  कतरा
इन्कलाब  लायगा......
                                                     वरील  कविता  हि स्वतंत्र  पूर्व  काळा  मध्ये भगत सिन्ह यांनी देशातील युवा पिढीला उद्देशून म्हटली आहे,त्याच्या बलिदाना मुळे आज आपण स्वातंत्रोत्तर भारतात आहोत,त्यांनी जर त्या वेळी देशासाठी स्वतंत्र्यं क्रांती घडवून आणली नसती तर आज हि आपण गुलामगिरीच्या विळख्यात खितपत पडलेले असतो,भगत सिंह जी हे  स्वतंत्र पूर्व  काळातले वीर  क्रांतिकारक,चिकित्सक,साम्यवादी  विचारसरणीचे युवा होते , वयाच्या  23 व्या वर्षी त्यानीं मृत्यू  ला कवटाळून देशसाठी आत्म बलिदान  केले ,आज च्या युवा पिढी  ने त्यांचा  आदर्श  डोळ्या  पुढे  ठेऊन  देशासाठी  कार्य  करावे  पण  आज ची युवापिढी हि  धर्म  जात  पंथ  या  मध्ये गुरफटत चालली  आहे  आणि  त्याच  बरोबर  त्याच्या मनावर धार्मिक  ते  बाबत  च्या गोष्टी,दंतकथा बिंबवल्या  जात आहेत, भगत सिंघ  जी  ने देशासाठी बलिदान दिल  त्याचा  वारसा  हा  आज च्या युवा पिढी ने चालवत  ठेवावा म्हणजेच  त्यांनी  तरी  देशासाठी जीवदान  केले आज च्या युवा पिढी ला  जीवदान करण्याचीच  काही  गरज नाही,त्याच्या बलिदान देण्या मागचा उद्देश समोर ठेऊन आज देशासाठी आपणास  काही तरी करायचे आहे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवावा,आज देशामध्ये राजकीय कलह,जातीय दंगली  घडतांना दिसत आहेत म्हणून आपल्या देशास  सर्वधर्मनिरपेक्ष विचार,बोधीक,चिकित्सक,निस्वार्थी,कार्यतत्पर,साम्यवादी विचारसरणी आणि अष्टपैलुत्व गुण असलेली  युवा पिढी ची गरज आहे ,अस्या  तरुण  पिढीची  आज देशास जास्त  गरज आहे,तरच खऱ्या  अर्थाने  देशाचा  विकास  घडवून  आणता  येऊ  शकतो.भगत सिह हे प्रखर,ज्वलंत,नास्तिक  विचाराचे  व्याक्तीमत्व आपणास मिळालेलं  एक रत्न आहे.
अस्याया थोर  क्रांतिकारक विचारवंताचे  एक तरी गुण प्रत्येक  तरुणाने  आत्मसात  करायला  पाहिजे,तरच  आपण त्यांचे  खरे  वारसदार  आहोत असे म्हणता  येईल.
*==========================*

समीर वि. सरागे, जि.यवतमाळ

भारताच्या इतिहासातील  एक महान क्रांतिकारी होऊन गेले ते म्हणजे शहीद ए आझम  भगतसिंह.
 भगतसिंह आज या देशात हयात जरी नसले तरी त्यांचे विचार आणि शिकवण आजही आपल्या देशातील प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. जो युवक अवघ्या वय वर्षे २३ असतानी हसत हसत फ़ासावर चढला तो किती शुर आणि पराक्रमी  होते हे यावरून लक्षात येते.

भगतसिंगाना बालपणा पासुनच देशाभिमान व देशप्रेम होते. त्यांनी १९२६ मध्ये देशाच्या स्वातंत्र्या साठी नौजवान भारत सभेची स्थापना केली होती.  महात्मा गांधीनी जेव्हा १९२२ मध्ये चौरीचौरा  च्या घटने नंतर असहयोग आंदोलनास समाप्त करण्याची घोषणा केली तेव्हा त्यांचा अहिंसावादी विचारधारेशी मोहभंग झाला होता. आणि त्यांनी असे देखील सांगितले की, स्वतंत्र हे अहींसे ने नव्हे तर हातात शस्त्र घेऊन मिळत असते.२३ मार्च १९३१  च्या रात्री भगतसिंह, राजगुरु आणि
सुखदेव यांना  लाहोर षडयंत्र रचल्या प्रकरणी फाशी देण्यात आली. भगतसिंह नेहमी म्हणायचे १) बम और पिस्तूल से क्रांती नही आती ,क्रांती की तलवार विचारों की सान पर तेज होती है। २) व्यक्तियों को कुचलकर भी आप उनके विचार नही मार सकते। ३) निष्ठुर आलोचना और स्वतंत्र विचार ये क्रांतीकरी सोच के दो अहम लक्षण है।
इतके त्यांच्या देशाप्रती देशाच्या स्वातंत्र्या प्रति  भावना ज्वलंत होत्या  देशावर मरुन जायला देखील हे क्रांतिकारी तरुण मागेपुढे पाहत नव्हते. मौत तो मेरी दुल्हन है असे तें नेहमी त्यांच्या कुटुंबियाना म्हणायचे.  इतकी प्रचंड राष्ट्रभक्ति त्यांच्या नसा नसात होती.

परंतु अलीकडे आपण दृष्टिक्षेप टाकल्यास ती देशभक्तिची , देशहिताची भावना दिवसेंदिवस लुप्त होत असल्याचे दिसून येत आहे. कारण आज देशाभिमान जागृत होईल अश्या  प्रकारचे शिक्षण आज मिळने दुपस्त आहे. राष्ट्रीयत्वाची भावना कोणी जागृत करण्याचे काम करत नाही. यावर कोणी चर्चा करत नाही ,ना पाठ्यक्रमातून या क्रान्तिकाराना आजच्या तरुण पीढ़ी समोर आनण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही. तर कसे क़ाय देशप्रेमी या देशात घड़तील ( जन्माला येतील)?

उलट आपल्याच देशात राहून ,याच देशातील साधन संपत्ति उपभोगुन, इथे नाव प्रतिष्ठा कामवुन स्वताला बुद्धिजीवी संबोधुन अर्बन नक्षल च्या स्वरुपात याच देशाला संपविन्याचे , मातीत घालनयचे षड्यंत्र  अलिकडे केल्या जात आहे.  कश्मीर भारताचा अंग नाही, भारत की बरबादी तक जंग रहेगी, हमे चाहिए आझादी, ही ब्रिदवाक्ये टुकड़े टुकड़े गैंग, आझादी  गैंग आणि  त्यांच्या पाकिस्तानची भक्ति करणाऱ्या समर्थका कडून सदैव होत असलेली आपल्याला दिसून येईल.  आणि याला अटकाव किंवा प्रतिबंध केला तर अभिव्यक्ति स्वातंत्र्य धोक्यात येण्याचा कांगवा केला जातो.  परंतु विरोधाभास म्हणजे जेव्हा आतंकवादी/ नक्षलवादी आपल्याच जवानाचे, पोलिसांचे मुडदे पाडतात तेव्हा ही आझादी आणि टुकड़े टुकड़े गैंग आणि त्यांचे समर्थक कोण्या बीळत लपतात कोणास ठाऊक?   भारत देशाचा ध्वज जाळने , दगडफेक करणाऱ्यांचे ,देशा विरुद्ध षड्यंत्र करणाऱ्यांचे(आतंकवादी/नक्षलवादी) यांचे समर्थन करणे , दंग्या च्या वेळी याच देशातील संपत्ति नष्ट करणे, आतंकवद्या करिता अर्ध्या रात्री न्यायाल्याचे दरवाजे उघड़ने वैगरे हे दृश्य वरुण भगतसिंग बघत असतील तर तें देखील दुखी होऊन रडत असतील आणि म्हणत असतील की मि  या देशाला व येथील जनतेला  स्वातंत्र्य मिळवून देण्या  करीता फ़ासावर लटकलो आणि आज हेच लोक याच देशाचे शत्रु झालेत या देशालाच संपविन्या करिता षड्यंत्र रचत आहेत? किती वेदना हॉट असतील त्यांना हे अलिकडचे दृश्य बघून! एवढेच नव्हे तर तत्कालीन सरकारच्या काळात भगतसिंगाना एका पाठ्यपुस्तका मध्ये आतंकवादी म्हणून दखविन्यात आले आहे. हा तर भगतसिंगाचा घोर अपमानच होय. ज्या तरुणाने देशासाठी बलिदान दिले त्याला आतंकवादी दखविन्यात येते यापेक्षा दूसरी शरमेची गोष्ट कोणती या देशात हा तर देशद्रोहच जनु.! आणि क़ाय आजची पीढ़ी या क्रान्तिकाराना समजून घेईल ? की राष्ट्रप्रेम आणि देशभक्ति करणे म्हणजे आतंकवादी होने होय का?

तसेही आजच्या तरूनपीढ़ी मध्ये देश ,स्वातंत्र्य या बद्दल अनास्था असल्याचे नेहमी दिसून येते एवढेच नव्हे तर देश किंवा देशभक्ति संदर्भात बोलने किंवा काही वक्तव्य करणे म्हणजे त्याला विशिष्ट राजकीय पक्ष किंवा एखाद्या विचारधारेशी जोड़ने हा होय आणि याला मेन स्ट्रीम मीडिया मधील काही चैनल , पत्रकार, डिझायनर बुद्धिजीवी, राजकीय व्यक्ति pramote करतात. म्हणजे देशभक्ति करणे ,त्याबद्दल बोलने म्हणजे धर्मनिर्पेक्षतेची गळचेपी किंवा हत्या करण्या सारखे होय. असे दाखविन्याचा किंवा भासविन्याचा नेहमी प्रयत्न होत असतो आणि या प्रकारच्या घटना इथेच या देशात घडतात याचे आश्चर्य वाटते. त्याचे कारणही तसेच आहे म्हणा कारण की,     फुकटात मिळालेल्या वस्तुला मोल आणि महत्व नसते अगदी तसेच स्वातंत्र्यचे देखील आहे कारण आजच्या या
 तरुणाना आपल्या पूर्वजा कडून स्वातंत्र्य हे फुकटात म्हणजे gift मिळाले आहे म्हणून त्यांना याची कीमत आणि महत्व नसणे स्वाभाविक आहे.

केवळ सोशल मिडियावर स्वातंत्र्य दिनी स्टेटस अपलोड करणे इथपर्यंत आपली राष्ट्रभक्ति  दिसने गरजेचे नाही.  कोणतेही  कार्य करण्या आधी ते देशहिताचे समजुनच करणे अभिप्रेत आहे. आणि देशभक्ति करणे म्हणजे सोशल मिडियावर स्टेटस टाकने किंवा देशभक्तीचे गोड़वे गाने मात्र नव्हे यउलट जे काही राष्ट्रहिताच्या बाबी आहेत त्याला महत्व आणि समर्थन देणे हे होय. कोणत्याही देशाची जनताच  ही त्या देशाची strenth ताकत असते. जसा विश्वास आणि आत्मीयता ही प्रत्येक कुटुंबातील सदस्याना बांधून ठेवते अगदी तसेच राष्ट्राभिमान आणि राष्ट्रभक्ति ही त्या देशातील जनतेला एका अटूट बंधनात बांधून ठेवन्यास महत्वाची भूमिका बजवतात. कारण जात, धर्म ,पंथ वर्ण ,गरीब ,श्रीमंत या पलीकडे राष्ट्रप्रेम ही भावनाच देशाच्या प्रत्येक नागरिकात असणे महत्वाचे आहे. आणि या  सिद्धांतावरच राष्ट्रभक्ति जीवंत आहे. म्हणून जगात प्रत्येक नगरिकाला त्या त्या राष्ट्राच्या नावाने ओळखल्या जात असते जसे  भारतीय नागरीकास भरतीय म्हणूनच इतरत्र  ओळखल्या जाते.

म्हणून देशाभिमान बाळगा , राष्ट्रहित जपा कोणत्याही देशकार्याला आपले म्हणून करा भारत हा तरुणांचा देश आहे परंतु हा देश केवळ हुल्लड़बजंचा , पश्चिमत्यांचे अनुकरण करणाऱ्यांचा, देशद्रोही नारे लावणाऱ्यांचा  किंवा त्यांचे समर्थन करणाऱ्यांचा नसून देशहित जोपासणाऱ्यांचा आहे. जेव्हा ही भावना प्रत्येक़ नागरिकात जागृत होईल  तेव्हाच राष्ट्रप्रेमी निर्माण होतील व या देशाचे टुकड़े करणाऱ्यांचे मनसूबे हानून पाड़तील हिच भगतसिंग ,राजगुरु ,सुखदेव या सारख्या क्रान्तिकाराना ख़री श्रद्धाजंलि असेल.
*जय हिंद*
Source of images internet

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************