अपघात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अपघात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

लाखमोलाचा जीव आहे ना आपला! मग वाहतुकीच्या नियमांचे गांभीर्य घेणार केव्हा?(भाग-2)

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

लाखमोलाचा जीव आहे ना आपला! मग वाहतुकीच्या नियमांचे गांभीर्य घेणार केव्हा?(भाग-2)

         Source :Internet
बालाजी सानप,बीड:
माझ्या मते वाहतुकीच्या नियमांच्या म्हणावे तसे न होणाऱ्या पालनाला आपण तर जबाबदार आहोतच पण भरपूर लोकांना बेसिक नियम सोडले तर बाकी नियमच माहीत नाहीत, या अज्ञानाला जबाबदार कोण हा प्रश्न वेगळा आहे. परंतु माहीत असलेल्या नियमांपैकी आपण किती नियमांचे पालन करतो हेही पाहावे लागेल, आणि यामुळेच 99% अपघात घडत असतात.
      आमचे सर एकदा *New Zaland*  या देशांमध्ये त्यांच्या जावयाकडे गेले असताना बाहेर फिरायला जाताना त्यांच्या  गाडीने 80 ची लिमिट फक्त एक मिनिट पार केली, लिमिट तोडल्यामुळे त्यांना त्यांच्या मोबाईल वर 500 डॉलर दंडाचा त्यांना मेसेज आला, इतके महत्व तेथे सुरक्षेला देण्यात येते, सांगण्याचा तात्पर्य इतकाच की आपण  सुरक्षेच्या दृष्टीने खूपच मागे आहोत, आपल्याकडे अपघात झाल्यावर उपचाराअभवी अपघाती व्यक्ती मरण पावतो यापेक्षा आणखी दुर्भाग्य ते काय असणार.
      लोंकांची जनजागृती करण्याच काम ट्रॉफीक पोलीस (पोलीस खाते) "रस्ता सुरक्षा सप्ताह"द्वारे करते, पण पुन्हा वर्षभर त्याकडे दुर्लक्ष केले जाते ही शोकांतिका आहे.आपणही वाहतुकीच्या नियमांकडे सुरक्षेच्या  दृष्टीने तर पाहवेच पण एक आपली गरज म्हणून जर पाहिले तर अपघातांचे प्रमाण बरेच कमी होईल यात तिळमात्र शंका नाही.
      ‎             
       Source :Internet
रविराज आकोस्कर,लातूर:
भारताच्या फक्त काही निवडक शहरांत वाहतुकीचे सर्व नियम पाळले जातात.बाकी शहरांत आपण खरंच आपली उद्दाम व्रुत्ती सहजच एकमेकांना दाखवतो..हे सर्वानी अनुभवलं पण असेन .पण मग हा उद्दामपणा आपल्याला कुठेतरी नक्कीच भोवतो जसे की रोड आक्सिडेंट किंवा ट्रेफिक जाम..हे घडतं कारण आपला उद्दामपणा आणि निष काळजी पणा...मग तेंव्हा खरंच आपल्याला नियमांचा महत्व कळतं.पण तोवर खूप उशीर झालेला असतो ..
त्यामुळं आपल्या प्रत्येकाने स्वतः मध्ये बदल आणून मग समाजाचा विचार करावा..जर सर्वानी नियमानुसार वाहने चालवली तर खरच खूप छान समाज निर्माण होईल..
           Source :Internet
जयंत जाधव,लातूर:
एखाद्या गोष्टीचे मूल्य आपल्याला तेंव्हाच कळते जेव्हा ती गोष्ट  हरविल्यावर विकत घेण्याची गरज भासते.उदाहरणार्थ निसर्गाने मानवाला बरेच काही अगदी फुकट दिले आहे पण त्याचे उपकार ठेवेल तो माणूस कसला?अब्जावधी रूपये किंमत असलेले शरीर बाजारात कुठं ही मिळणार नाही.अर्थात वाहतूक नियमांचे पालन करणे आपल्याच उपयोगाचे ठरते.टाळी एका  हाताने कधीच वाजत नाही.आपण नियम तोडून ट्रॕफिकवाल्या पोलिसांना पैसे देऊन भ्रष्टाचारास खतपाणी घालतो. तसेही सध्या आर.टी.ओ सारखे खाते हे भ्रष्टाचाराचे कुरण ठरत आहे.विनोदाने म्हणा किंवा खरेपणाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी काही दिवसापूर्वी स्वतः म्हणाले की आर.टी.ओ विभाग कायमचा बंद करायला पाहिजे.
सारांश देशांत रस्ते वाहतूक नियमन व संचालनासाठी RTO विभागाला पूरक अशी नविन व्यवस्था अंमलात आणली पाहिजे व वाहतूक परवाना बाबतचे नियम कडक करुन नियम तोडणारे लोकांना शिक्षा ही कडक व्हायला पाहिजे.चिरीमिरी द्यायची व सुटका करुन घेण्याची पध्दती बंद झाली पाहिजे.तेवढा धाक कायद्याने करायला पाहिजे.
राहुल आनपट,मंगळवेढा:

मला वाटत प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावेत ...।

१) फोन चालू असताना गाडी चालवू नये.....
      आमचे मित्र बंधू  हेच उलट करत असतात ...मुद्दाम फोन वर बोलतात...। *समोर जर पोरी दिसल्या तर मग विचारू पण नका*

२) वेगाला आवरा......जीवाला सावरा ।
      *आमच्या मित्राना हे कधीच जमत नाही. Speed व्यसन झालं आहे त्यांच. आता हे सुधारणार नाहीत(सत्यता आहे)*

आई ची काळजी तर नाहीच नाही पण स्वतःची पण नाही .....।

       Source :Internet
चेतन दुबे, मुंबई:
मला अस वाटत की
कोणी दुसरा अपघाता साठी जवाबदार नसुन आपण स्वत असतो....

बस ५ मीनीट मधे पोचेन...
पोचलो रे....

अस बोलताच वाहन सुसाट पळवत सुटायच जनु काही स्पर्धा उसेन बोल्ट सोबतच आहे

जस जिंकल्या नंतर
गोल्ड मेडल भेटनार आहे

मात्र मेडल च्या नादात
आपल्या वर अवलंबीत असलेल्या माणसांचा विचार करतो का?

मला अस वाटत की भारतात
पश्चीम सांसकृती जाेरात पसरत आहे  आणी बरेच लोकांन ते आवडत आहे़ ़
युवा तर जास्तच आहेत

मग ह्या लोकांनी त्यांची
वाहतुकीचे नियम सुधा आचरले पाहीजे

स्व अनुषासन ( self discipline) सुधा तेवढच महत्वाच आहे

हिंदी मधे म्हण आहे
दुर्घटना से देर भली..
त्या मुळे आपण नियम पाळले पाहीजे

       Source :Internet
तेजस्विनी जाधव,इंदापूर,पुणे:
वाहने माणसाचे जीवन सोपे व सोयीचे व्हावे यासाठी अस्तित्वात आली, पण आज हिच वाहने आता माणसाच्या जीवावर बेताईला लागली आहेत. सर्वांना आज लवकरात लवकर खुप सारी कामे करायची आहेत खुप पैसा कमवायचा आहे नाव मिळवायचे आहे, पण या घाईत तो स्वतःला स्वतःचा देह किती महत्वाचा आणि मोलाचा आहे हे अजुन त्याला समजत नाही. नियम माणसाचा सुरक्षेसाठी असतात हे आजकाल माणसे विसरायला लागली आहेत. नियम तोडणे म्हणजे काय तरी खुप साहसी पणा दाखवत असलासारखं वाटते काही लोकांना पण हे चुकेच आहे.
आज खरी परिस्तिथी म्हंटली तर खुप लोकांना वाहतुकेच्या नेयमाबद्दल माहिती नसते पण काही नियम तर रस्स्यावर अगदी स्पष्टपणे असतात तरी त्याचं पालन लोकांकडून होत नाही आणि मग आपण पाहतोच रोज दहा ते बारा लोक मरतात वाहतीकेचे नियम न पाळल्यामुळं.
सर्वांनी वाहतोकेचे नियम पाळायला पाहीजेत आणि आपल्या या अनमोल देहाची जरा किंमत करायला शिकलं पाहिजे.
वाहने सावकाश चालवा आणि स्वतःचा जीव वाचवा .....

कृष्णकांत राईलकर,पालघर:
लाखमोलाचा खरोखरच आहेच हा जिव।
हल्लीच्या तरूण पिढीची येते  मात्र किव।
टुव्हिलरवर तर किती सुसाट घेतात धाव।
किती सांगूनही ना जातसे सेल्फिची हाव।
त्यापायी आज दुखाःत बुडाला एक गाव।
दुर्दैवाने"डहाणू"आहे त्या गावाचे हो नाव।
चाळीस विद्यार्थ्यांनी भरली होती ती नांव।
सेंडाँफ नंतर घेई सागरसफरीचा अनुभव।
लाटांवर भले होडी खात होतीच हेलकाव।
पण त्यातच सेल्फी चा म्हणे करुया सराव।
फोटोसाठीआला एका बाजूसमित्रसमुदाव।
नावाड्याने त् केला पोटतिडकीने मज्जाव।
पण सर्वांनाच लागली होती सेल्फिची हाव।
अश्यावेळी काळाने मात्र साधलाच हो डाव।
नाव उलटून सर्वांवर काळाचा पडला घाव।
अरेरे!पालकांच्या तर घेतला ह्रुदयाचा ठाव।
काळा समोर सगळे  सारखे,रंक किंवा राव।

        Source :Internet
गणेश भंडारी,अहमदनगर:
मनुष्य जीवन किती मूल्यवान आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. प्रत्येक मनुष्याची काही न काही किंमत ही असतेच. भले एखादा बाह्य समाजाच्या दृष्टीने निरुपयोगी असेल, पण त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीने तो लाखमोलाचा असतोच असतो. अशा या बहुमूल्य जीवनाची किंमत प्रत्येकाने जंलीच पाहिजे-स्वतःसाठी नसली तरी इतरांसाठी तरी!

आपण नेहमी ऐकतो, की माणूस हा सामाजिक प्राणी आहे. अगदी प्राचीन काळापासून म्हणजे माणसाच्या उत्पत्तीपासूनच त्याची इतर माणसांशी संपर्क ठेवण्याची भूक दिसून येते. त्यासाठी, इतरांच्या गाठीभेटी घेण्यासाठी, व्यापार व तीर्थाटनासाठी त्याला पूर्वीपासूनच वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून राहावे लागत आहे. अगदी सुरुवातीला त्याचे पाय हेच त्याच्यासाठी वाहतुकीचे साधन होते. पुढे तो यासाठी प्राण्यांचा वापर करू लागला. वाहतूक क्षेत्रातली सर्वात क्रांतिकारी घटना घडल्यानंतर म्हणजे चाकाचा शोध लागल्यानंतर या क्षेत्राचा चेहरा आमूलाग्र बदलला. पुढे पुढे जशी जशी वैज्ञानिक प्रगती होत गेली, तसतसा वाहतुकीच्या साधनांचा वेगही वाढत गेला. जसजसा वेग वाढत गेला, तसतसे अपघातांचे प्रमाणही वाढत गेले.

वाहतुकीच्या साधनांचा वाढलेला वेग, वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची वाढती गरज, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वाहनांच्या सामान्यांच्या आवाक्यात आलेल्या किमती व त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या यांमुळे वाहतुकीच्या नियमनाची गरज प्रकर्षाने जाणवू लागली व जनतेच्या जीविताचे व मालमत्तांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी बनल्याने सरकारला वाहतुकीच्या नियमनाची, नियंत्रणासाठी काही कायदे व नियम तयार करणे भाग पाडले.

          Source :Internet
आपण एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की वाहतुकीचे नियम हे आपल्याला त्रास देण्यासाठी नसून आपले रक्षण करण्यासाठी म्हणजेच आपल्या भल्यासाठीच आहेत. त्यांचे पालन करण्यात आपलेच हित आहे व त्यांचे उल्लंघन करणे आपल्यासाठीच धोकादायक आहे. ही गोष्ट एवढी स्पष्ट आहे, तरी मला अनेकदा याचे आश्चर्य वाटते, की आपल्या भल्यासाठी असलेली ही गोष्ट लोक सहजतेने का स्वीकारत नाहीत? माझ्या मते याला अनेक कारणे आहेत. नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम हे सरकारचे असते आणि सरकार ते पार पाडतही असते. आता सरकारकडून या अंमलबजावणीच्या कार्यात काही चुका या होतच असणार, जसे की यंत्रणेतील समन्वयाचा अभाव, भ्रष्टाचार इ. पण नियमांप्रति नागरिकांच्या उदासीनतेसाठी सर्वस्वी सरकारला जबाबदार धरणे सरकारवर अन्याय करणारे होईल. नागरिकांच्या या उदासीनतेमागे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मानवी प्रवृत्ती. मानवी स्वभाव हा मुळातच काहीसा बंडखोर आहे. एखादी सक्ती तो फार काळ खपवून घेत नाही. नियमांची बंधने त्याला जाचक वाटतात. दुसरे म्हणजे त्याचा अहंकार. आपण एखादा नियम मोडला म्हणजे आपण किती श्रेष्ठ, या भावनेने त्याचा अहंकार सुखावत असतो. त्यातही एखादा नियम मोडून त्यातून आपल्या 'वरच्या' पातळीवरील संपर्कांचा उपयोग करून सहीसलामत सुटणे ही तर त्याच्या अहंकारासाठी पर्वणीच! अजून एक म्हणजे, वेगाप्रति वाटणारे आकर्षण होय. काहीतरी धोका पत्करणे यातही आकर्षण वाटत असावे.

आपण नियमांप्रति उदासीनतेची कारणे पाहिली. यातूनच आपल्याला नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्यास प्रवृत्त करण्याचे नाविन्यपूर्ण उपाय सापडतील. सरकारने यासाठी खरोखर माणसाच्या मानसिकतेचा अभ्यास केला पाहिजे. आवश्यकता भासल्यास त्यासाठी मानसशास्त्रज्ञांची मदत घेतली पाहिजे.

आपण वर पाहिलेच, की मानवी प्रवृत्तीला नियम गे जाचक वाटत असतात. सरकार शक्यतो काय करते, की वाहतुकीचे नियम बनवते व त्यांचे जे लोक उल्लंघन करतील त्यांना शिक्षा करते, दंड ठोठावते. यामुळे लोकांच्या मनात या अंमलबजावणी यंत्रणांविषयी क्षोभ निर्माण होतो. यावर उपाय म्हणजे लोकांना दंडाने न समजावता प्रेमाने प्रवृत्त केले तर? म्हणजे कसे पहा: समजा जे हेल्मेट घालत नाहीत, त्यांना शंभर रुपये दंड करण्यापेक्षा जे हेल्मेट वापरतात त्यांना एक प्रमाणपत्र देऊन बघा! हे निश्चितच लोकांना हेल्मेट वापरण्याची प्रेरणा देईल.

माणूस हा समाजशील व पर्यायाने कुटुंबवत्सल प्राणी आहे, हे आपण जाणतोच. त्याच्या या कुटुंबवत्सलतेचा फायदा करून घेता येईल. नियमांचे उल्लंघन केल्याने अपघातात होणारे मृत्यू, त्यामुळे मृताच्या कुटुंबावर कोसळणारे आभाळ, त्याच्या कुटुंबियांची होणारी अवस्था यांची हृदय हेलवणारे दृश्ये जाहिराती, पथनाट्ये यांतून जनतेला दाखवली तर ती खूपच परिणामकारक ठरतील.

वाहनांसाठीचे विविध परवाने मिळवण्याची किचकट पद्धत भ्रष्टाचाराला जन्म देते. त्यातून पैसे देऊन अपात्र लोकांनाही परवाने मिळतात. तसेच परवान्यांचे, विम्याचे कागद सतत सोबत बाळगणे लोजांना गैरसोयीचे वाटू शकते. त्यातून मग लोक त्या नियमांप्रति उदासीन होतात व पळवाटा शोधतात, लाच देतात. जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कागदपत्रे सतत वाहनाबरोबर राहतील अशी व्यवस्था करता आली तर? वाहनाला चिप जोडणे यासारख्या उपयांद्वारे हे शक्य आहे.

         Source :Internet
लोकांमध्ये या नियमांविषयी जागृती निर्माण करणे हे खूपच महत्वाचे आहे. लोक वेळेवर त्यांच्या गंतव्य स्थळी पोचण्यासाठी वेगाने वाहने चालवत असतील तर त्यांना पाच दहा मिनिटे घरातून लवकर निघून सावकाश वाहन चालवूनही वेळेवर पोचता येते हे दाखवून देणे, वेळेचे नियोजन कसे करायचे याविषयी प्रशिक्षण देणे असे छोटे छोटे उपाय करता येतील. अजूनही खूप काही करता येईल. मनुष्याला नाविण्याचे आकर्षण असते हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे जागृतीसाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधणे महत्वाचे आहे.

वाहतूक पोलीस नियमांची अंमलबजावणी करण्याच्या यंत्रणेतील एक खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यांचे मनोबल वाढवले तर त्यांच्याकडून उत्कृष्ट कार्य करून घेता येईल. त्यासाठी त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, त्यांचे कामाचे तास, त्यांब मिळणार मोबदला यांचा अभ्यास करून त्यात योग्य त्या सुधारणा केल्या पाहिजेत. वाहतूक पोलीस उद्धट असतात असे आपण अनेकदा म्हणतो, पण ते असे का वागतात याचा कधी कोणी विचार केलाय? तो प्राधान्याने केला पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे नवीन काळानुसार त्यांच्यात व्यावसायिकता व सॉफ्ट स्किल्स मुरावली पाहिजेत. याचा खूप फायदा होईल.

एकंदरीत काय, तर लोकांसाठी नियम पाळणे ही शिक्षा न वाटता तो एक आनंददायी अनुभव व्हावा!

लाखमोलाचा जीव आहे ना आपला! मग वाहतुकीच्या नियमांचे गांभीर्य घेणार केव्हा?(भाग-1)

 🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

लाखमोलाचा जीव आहे ना आपला! मग वाहतुकीच्या नियमांचे गांभीर्य घेणार केव्हा?(भाग-1)
              Source :Internet

मयुरी देवकर,सोलापूर:
आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार प्रत्येकजण आपल्या स्वतः ला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे .अनुकूलन क्षमता साधण्यासाठी , सध्याच्या वातावरणामध्ये , वाढत चाललेल्या चंगळवादामध्ये माणूस आकंठ बुडुन चालला आहे . स्वतःवरील , समाजातील अन्याय तो सहन करत नाही व आज तो स्वतःच दु : ख , सुख ही वाटत बसत नाही .आजचा हा माणूस आउटडेटेडच झालाय कारण त्याला जाणीव आहे ती फक्त हक्कांची च ...आणि मग स्वतः च्या कर्तव्याच काय ? जाणिवाची चाड आणि संवेदनहीनतेची चीड आज आम्हांला कुठेच दिसत नाही .आणि म्हणूनच वाहतुकीच्या नियमांकडे आज आम्ही किती गाम्भिर्याने पाहतोय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे .वर्तमानपत्र वाचत असताना रोजच कुठेतरी अपघात झाल्याची बातमी आपल्याला वाचायला मिळते .अश्याप्रकारे अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे आणि याला आपण स्वतःच जबाबदार आहोत .आपली कर्तव्ये आज आपण पूर्ण विसरून चाललो आहोत आणि यामध्ये आपल्या लाखमोलाच्या जीवाची सुद्धा आपण पर्वा करत नाहीये ....काय म्हणावे या वेडेपणाला ? ? ?
         
          Source :Internet
सारं काही बेताल असताना आम्ही कस म्हणतोय आमचं कस झकास चाललंय ...रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या व्यक्तींनी डाव्या बाजूने जावे की उजव्या हेसुद्धा या उच्छभ्रु समजल्या जाणाऱ्या लोकांनासुद्धा समजत नाही हीच खेदाची गोष्ट आहे .वाहन चालवत असताना प्रत्येक वाहनचालकाने जर वाहतूकीचे नियम पाळले तर खरंच सिग्नल तोडण्यासारख्या चुका घडतील का ? आज हजारो लोक वाहन चालवत असताना मोबाईल चा वापर करून लक्ष विचलित झाल्यामुळे म्रुत्यूमुखी पडतात .त्याचप्रमाणे वाहनांत बसल्यावर सीटबेल्ट न घातल्यामुळेसुद्धा म्रुत्यूचे प्रमाण वाढले आहे .आणि यामुळेच लाखमोलाचा जीव बाल्यावस्थेतच किंवा ऐन तारुण्यात गमवावा लागत आहे .आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा या वाहतुकीच्या नियमांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायला हवी आणि एवड्यारच न थांबता त्याची अंमलबजावनी करायला हवी आणि त्यासाठी कायदे करण्याऐवजी त्या नियमांकडे पाहण्याची आपली मानसिकताच बदलायला हवी तरच हा लाखमोलाचा जीव जतन होईल ......

सागर राडे,सांगली:
अधूनमधून whatsapp, फेसबुक वरून एक विनोद फिरत असतो. "एकदा एक अमेरिकन व्यक्ती भारतीय व्यक्तीला म्हणते आमच्याकडे रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडी चालवतात, तुमच्याकडे काय पद्धत आहे? त्यावर भारतीय व्यक्ती उत्तर देते आमच्याकडे तसं काही नसतं. समोरचा कुठल्या बाजूने येतोय त्यावर आमची बाजू ठरते.." यातला विनोदाचा भाग सोडला तरी यातलं कटू सत्य आपण नाकारू शकत नाही. कारण आपल्याकडे वाहतुकीचे नियम कधीच गांभीर्याने घेत नाहीत.
      Source :Internet
वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नको असं कुणीही कितीही सांगितलं तरी मोबाईलवर बोलायचा मोह आपण टाळत नाही. शक्य तितकी मान तिरकी करून बोलायची आपली कसरत सुरूच असते. सिग्नलवरदेखील बऱ्याचदा अशी स्थिती असते की आपण सिग्नलसाठी थांबलेलो असतो पण शेवटच्या 8-10 सेकंदात आपल्याला घाई होते आणि सिग्नल सुटायची वाट न बघताच आपण पुढे जातो. हीच 8-10 सेकंद धोकादायक ठरू शकतात याची जाणीवही आपल्याला असते पण आपलं सळसळणारं रक्त आपल्याला तिथे थांबू देत नाही. वाहनांचा वेग पाहिल्यानंतर तर "अति घाई, संकटात नेई" हा फलक रस्त्याची शोभा वाढवण्यासाठीच असतो की काय असा प्रश्न कधी कधी पडतो. मद्यपान करून बेफामपणे गाडी चालवणारे तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात. असाच कधीतरी आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टींचा फटका बसतो तेव्हा मात्र वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळायला पाहिजेत असा साक्षात्कार होतो. पण "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" ही म्हण बरेच चालक स्वतःला कधीच लागू करत नाहीत.
या सर्व गोष्टींसाठी प्रबोधनात्मक उपक्रम म्हणून आपल्याकडे 'रस्ते सुरक्षा सप्ताह'सारखे उपक्रम राबवले जातात. पण तरीही नियम हे मोडण्यासाठीच असतात हा विचार ज्यांच्या मनात कायमचा ठसलेला आहे त्यांना याचा काहीच फरक पडत नाही. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी कायदे आहेत. शिक्षेच्या तरतुदी आहेत पण सोबतच 5-50 रुपयांसाठी त्यांच्या चुकांवर पांघरून घालणारेदेखील आहेत. तरीही एखाद्यावर गुन्हा दाखल झालाच तरी त्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी कायद्यातील पळवाटा आहेतच. त्यामुळेच त्यासंबंधी कायद्याचा म्हणावा तितका धाक नाहीच.
       Source :Internet
राज इनामदार,पंढरपूर:
एकदा ऐका जंगलातुन गुरु आणी त्यांचे शिष्य चालले होते .शिष्यानी आपल्या गुरूंना एक प्रश्न विचारला की,  हे गूरूवर्य जीवनातील सर्वात मोठे दुःख कुठले .? ..गुरूंनी शिष्यानकडे पाहून स्मिथ हास्य केले .व म्हणाले जगात सर्वात मोठे तीन दुःख आहेत .व ते पुढील प्रमाणे आहेत .

1) *म्हाताऱ्या आई वडिलांनचा आधार असणारा , घरातील कमवता असा  मुलगा त्यांच्या डोळ्यादेखत मरने.*

2) *मुल लहान असताना त्यांच्या वडिलांनच निधन होने .व मुलांच्या डोक्यावरच पित्याच छत्र हरपने*

3) *एखादया विवाहीतेच्या पतीचे  ऐन तारुण्यात निधन होने.*

हे जगातील सर्वात मोठे तीन दुःख आहेत असे गुरुंनी सांगितले ...
   जरा विचार करा मित्रहो ज्यावेळी एकादी व्यक्ती वाहतुकीचे नियम पाळत नाही आणी बेभान होवून गाडी चालवत असतांना त्याचा अपघात झाला तर ? ? ? ? आणी त्यात त्याचा म्रुत्यू झाला तर ?????
मित्रहो वरील गुरुंनी सांगितलेले तिन्ही दुःख त्याच्या घरच्या लोकांवर कोसळणार आहेत .
ह्यापेक्षा मोठ दुसर दुर्दैव काय मग?
मित्रहो गेल्या दोन महिन्यामधील माझ्या समोरील दोन अपघातात तर मोटर सायकल वरील व्यक्तीच्या  अंगाला डोक्यापासून खाली साध खरचटल सुधा नव्हते. पण  त्यांचा म्रुत्यु झाला कारण त्यांच डोक डाम्बरी रस्त्यावर खरचटत गेल व मेंदूला मार लागला व जागीच म्रुत्यू झाला. पण त्याच वेळी ह्या लोकांनी हेल्मेट डोक्यावर घालून प्रवास केला असतां तर ही मेलेली माणसे आज आपल्या परिवारा सोबत दिसली असती.
शासनाने हेल्मेट सक्ती केली पण आपण हेल्मेटच्या ......घो म्हणतो व गाडीला kick मारून सुसाट जातो .
दुसरा अपघात तर इतका भयानक होता की बास ...कानात हेडफोन लावून मस्त गाणी ऐकत चाललेला तरुण गाडीचे दोनी आरसे काढलेले .गाडी 80-90 च्या स्पीडने जात असताना. ह्या तरुणाने वळताना side indicator लावला नाही ..अथवा हात देखील काढला नाही ...आरसे नसल्याने त्याला पाठीमाघुन येणारी ट्रक दिसली नाही .......गाडी सकट तो तरुण ट्रक खाली सापडून अक्षरशा त्याचा चिखल झाला. मित्रहो त्या तरुणाने side indicator लावला असतां .गाडीचे वेग मर्यादित ठेवला असतां .गाडीचे आरसे काढले नसते तर आज तो आपल्याला जिवंत दिसला असतां .
मित्रहो सांगायच एवढच आहे वाहतुकीचे नियम हे आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच आहेत .वाहतुकीचे नियम पाळू ...अपघातात टाळू
हे जीवन नाही पुन्हा पुन्हा

           Source :Internet
करण बायस ,हिंगोली:
आपण  विचार केला की खरच आपण वाहतुकीच्या नियमांचे पालन करतो का ? जास्तीत जास्त उत्तर नाही असणार.
आपल्या भारतात जास्तीत जास्त खेडी गाव ही महामार्गावर वसलेली आहेत याचा त्या गावातील लोकांनी विचार केला का की आपल्या सुरक्षेसाठी आपण त्या मार्गाच्या थोडं लांब राहील पाहिजे पण नाही लोक काय करतील अतिक्रमण का तर येणाऱ्या जाणार्यासाठी हॉटेल्स उघडतील किंवा रोड च्या बाजूला फळांचे, चॅट चे गाडे लावतील.तस तर सरकार यांच्या विरुद्ध कारवाई करत नाही आणि केली तर लोक त्याचा विरोध करतात.
एखादया शहरात गेलो तर अस आढळून येते की तिथले signal चालू नसतात आणि असले तरी त्याला कोणी follow करत नाही.आधी बघतील तिथं traffic पोलीस आहे का नसला तर ते पळवतील म्हणजे ज्यांचा सिग्नल हिरवा आहे त्यांना त्रास.आणि एवढाच नाही traffic पोलिसांना पण काळजी नसते त्यांना फक्त काढायचे असतात.राहिला प्रश्न traffic signal चा ते बंद असतात मला तर वाटते की तिथं light bill वाचवून भ्रष्टाचार होत असेल.
या गोष्टी साठी सरकारला जिमेदार ठरवता येणार नाही कारण आपण पण तेवढेच  जिम्मेदार आहोत जेवढं की traffic पोलीस department.
आपलं पण हे काम आहे की आपण स्वतःच्या जीवाची काळजी घेणे त्यासाठी आपण हेल्मेट वापरणे,वेग नियंत्रणात ठेवणे,signal follow करणे.
आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेत नाही पण याचा फायदा ambulance वाल्या पासून ते शेवटी जे जे पेशंट ला ट्रीट करतील त्यांना होतो.
त्यामुळे आपण आपली काळजी घेतली पाहिजे कारण आपण आपल्या घरच्यांसाठी खूप महत्वाचे आहोत कमीत कमी त्यांच्यासाठी एवढं तर करणं गरजेचं आहे.आणि आजकाल गाडीवर असताना मोबाईल चा वापर एक वाढला आहे मग ते किती पण traffic मध्ये आपण असलो तरी आपण कोणाचं कॉल आलं की उचलतो किंवा मग कानात headphone टाकतो हे चुकीचं आहे कारण त्यावेळी आपलं नियंत्रण हे गाडी चालवनायवर नसते.
So be carefull while driving ,Wear helmet and follow Traffic rules.


         Source :Internet
ज्ञानेश्वर टिंगरे ,उस्मानाबाद:
एक म्हण आहे, ' पुढच्याच ठेस मागचा शहाणा ' पण आज रस्त्यावर घडणाऱ्या अपघाताच्या बाबतीत हि म्हण विडंबन म्हणून अशी होईल..मूलग्यास ठेच बाप शहाणा..
इथं मुलगा व बाप हे मी प्रतीक म्हणून वापरले आहे..
रस्ते, सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलीस, राजकीय हस्तक्षेप, यांना जरा बाजुला ठेउ.
एक जबाबदार नागरिक म्हणून आपली काही भूमिका आहे हे बरेच जण विसरले आहेत..घरातील एखादी व्यक्ति अपघातात मृत्यु पावल्याशिवाय कांहीचे डोकं ठिकाणावर येतच नाही अशी बरीच कुटुंब समाजात आहेत.माणूस शिक्षण घेऊन आडानी व्यक्तीसारखे वागतो , डोळ्यासमक्ष कितीतरी अपघात त्याने जवळून अनुभवलेले असतात तरीसुद्धा एखाद्या अंध माणसासारखी त्याची पळापळ चालूच राहते..
कायद्याचे राज्य अपेक्षीनारे कितीजण कायदा पाळतात.( फक्त वाहतूक नियमाबद्दल बोलतोय ).
वाहतूक नियमाचे जरा बाजूला ठेवा..आजकाल काही लोकाना कशाचेच भान राहिले नाही, स्पीड मध्ये गाडी चालवणे, स्टाइल मध्ये वाहतूक नियम मोडने, स्वतःच्या प्रवासात दुसऱ्याचा किंचीतदेखील विचार न करने हे आजकाल एक फॅड आले आहे असे खेदाने म्हणावे लागते.
आपल्यावर कोणाची तरी जबाबदारी आहे याचे भान आज तो विसरत चालला आहे. एखाद्या कुटुंबातील चालती बोलती व्यक्ति अचानक जर या जगातून निघून गेली तर त्या कुटुंबावर काय आभाळ कोसळते हे मी अगदी जवळून पाहिलं आहे.
इथं एक सांगावसं वाटतं कि पालकांनी आपल्या कमी वयाच्या पाल्याना हातांत गाडी देण्याचे लाड करू नयेत, योग्य वयात समज आल्यानंतर सर्व गोष्टींची जाणीव करून देऊन त्याला परवानगी देण्यास हरकत नाही.
कानात हेडफोन घालून गाणी ऐकत किंवा फोन वर बोलत ड्राइविंग करनाराना एकच सांगावसं वाटतं ती गाणी ऐकण्याच्या नादात तुम्हांला पाणी पाजण्याची वेळ येणार नाही याची खबरदारी घ्या अन फोन वर बोलत बोलत ड्राइव करतांना तुमचा कॉल डाइरेक्ट यमराजाशी सुद्धा कनेक्ट होऊ शकतो याचं भान राहू द्या..

समीर सरागे,यवतमाळ:
वाहतुक हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेतील अभिवज्य घटक असतो. वाहतुकी शिवाय देशाच्या प्रगत अर्थव्यवस्थेची कल्पना करुच शकत नाही. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था सुरळीत  चालण्या करीता जशी चलन रूपी साधनांची आवश्यकता असते अगदी तसेच व्यापार ,उद्योग व परिवहन सेवा सुरळीत  चालण्या करिता  रस्ते  व वाहनांची आवश्यकता असते.  रस्ते या वरील तिन्ही प्रणालीचा पाया आहे. देशाच्या ऐकून वाहतुकीचा भार हा रस्ते वाहतुकीवर असतो. आणि  देशाच्या अर्थ व्यवस्थेत रस्ते हे रक्तवाहीन्याचे काम करतात. रसत्यांचे जाळे एकमेकांशी जोडले गेले की, वाहना द्वारे त्यावरून वाहतूक सुरु केल्या जाते. परंतु हल्ली रस्ते अपघातांचे प्रमाण  गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढले आहे.  याचा अर्थ वाहनांची झपाट्याने वाढलेली संख्या त्यातही  खाजगी वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या अलीकडे आपल्याला दिसुन येत आहे.

             Source :Internet
देशाची लोकसंख्या जशजशी वाढली त्याच प्रमाणे लोकांच्या गरजा मध्ये देखील वाढ होत आहेत. सार्वजनिक  परिवहन सेवा देखील अपुरी पड़त असल्यामुळे लोकांचा खाजगी वाहन खरेदी कड़े कल दिवसेंदिवस वाढत  चालला आहे. परिणामी रसत्यावर वाहनांच्या सर्वत्र रांगाच्या रांगा असलेल्या आपल्याला दिसुन येईल यामध्ये अपघात होणाऱ्या खाजगी वाहनांची संख्या सर्वात जास्त आहे. कारण असे की, आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांकडे वेळ नसतो आणि त्यांना वाहतुकीचे लादलेले नियम मान्य नसतात (किंवा कांटाळा येतो)आणि त्यांना त्यांच्या जीवा पेक्षा एखादे काम महत्वाचे असते.

घाई करण्याच्या नादात वाहनाला over take करते वेळी अपघात संभवतो तसेच कोण कोणत्या वाहनाला tail Light नसने , Head light नसने , Indicater , wiper नसने किंवा यापैकी काही नादुरुस्त असणे हे देखील अपघातांचे मुख्य कारण आहे. म्हणजे वाहतूक नियमां मध्ये वरील बाबीवर प्रामुख्याने भर दिल्या गेला आहे. जर महा मार्गावर प्रवास करताना वाहतूक पोलिसांना एखाद्या वाहनांवर Head light , tail light , indicater नसलेला आढळल्यास तेही रात्रीच्य वेळी तर ते आपल्याला  भारी चालान तर करेलच सोबतच तुमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतिल की, तुम्ही सुजान नागरिक असून  अश्या प्रकारचा बेजबाबदार पणा कसा क़ाय  करु शकता? आणि तुमचा वाहन परवाना रद्द करण्याची तंबी देखील देईल.
आणि ते एका दृष्टीने योग्यच आहे. कारण जो कोणी नियम कायदे पाळणार नाही त्याला शासन वहायलाच हवे. अलीकडे प्रकाशित झालेल्या एका आकडेवारी नुसार भारतात सन 2016 या वर्षात 1 लाख 51 हजार लोंकाना आपले प्राण गमवावे लागले. तसेच 18 ते 45 या वयोगटातील अपघातात मृत पावलेल्या बाळीची संख्या तब्बल 60% इतकी आहे. यावरून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन होते की नाही व त्याला वाहन चालक  गांभीर्याने घेतात की, नाही याची प्रचिती आपल्याला येईल. वाढती वाहनांची संख्या , अपूरे रस्ते, वाहतुकीची भीषण कोंडी लक्षात घेता सरकारने रस्ते चौपदरी करणाचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे. सोबतच शहरात रसत्याच्या दुतर्फ़ा वाढलेले अतिक्रमण हे देखील अपघातांचे मुख्य कारण होऊन बसले आहे.

महानगरा मध्ये हेलमेट सख्ती करण्यात आलेली आहे. परंतु त्याला पाहिजे तसा प्रतिसाद नागरिकांकडून मिळतानी दिसत नाही. मग अशा वेळी वाहतूक पोलिसांना हेलमेट नसणाऱ्यांना चालान करणे भाग पडले. यावरही देखील काही जनांची ओरड सुरु झाली. परंतु बाबानो कोणत्याही सरकावर  त्यांच्या देशाच्या नागरिकांची  व त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असते आणि वाहनांची अवाढव्य वाढत असलेली संख्या त्यात अपघातांचे वाढलेले प्रमाण ,म्हणून  सरकारला काही उपाययोजना अमलात आनने गरजेचे असते. म्हणून हेलमेट सख्ती करण्यात आली.

        Source :Internet
रस्ता सुरक्षा पंधरवाड़ा दरवर्षी  पाळण्यात येतो. राज्य शासनाच्या परिवहन विभागा कडून अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात अपघात कोणत्या कारणा मुळे होतात , अपघात टाळण्या करिता क़ाय क़ाय केले पाहीजे. यावर अधिकारी मंडळी  मार्गदर्शनपर भाषणे देतात.  तरीही वाहन चालका मध्ये या बाबत पाहिजे तशी जागरूकता निर्माण झालेली नाही. आणि अपघातांची संख्या देखील कमी झालेली नाही.वाहनांची इतकी प्रचंड संख्या की , रस्ते देखील कमी पड़त आहे.परिणामी अपघातात वाढ. भारत देशात दरवर्षी traffic मध्ये आपन जवळ जवळ 8 हजार कोटी रूपयाचे इंधन जाळतो,   अपघात आणि इंधनाचा प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर खाजगी वाहनांची संख्या कमी करून  सार्वजनिक वाहनांची संख्या वाढविने आज गरजेचे आहे.आणि सार्वजनिक वाहनांचाच उपयोग नागरीका कडून जास्तीत जास्त व्हायला हवा या करिता उपाय योजना करण्यात याव्यात.  तसेही खाजगी वाहन आज परवडन्या सारखे नाही. इंधनाचे वाढते दर, अरुंद रस्ते, रेंगाळंनार traffic ,RTO विभागाचा ससेमीरा ई.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे पालकने आपल्या पल्याला दुचाकी एवजी सार्वजनिक वाहनांतुन प्रवास करण्याची सवय लावावी अथवा सायकल चा वापर करण्यास सांगावे. यामुळे देखील अपघातात घट होईल कारण या अपघातात युवा जास्त प्राण गमावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चीन सारख्या देशात वाहतुकी संदर्भात कड़क कायदे आहेत. तीथे मुलाचे 18 वर्षे वय होई पर्यंत  वाहन न चालवन्यचे नियम आहेत.
म्हणून आपल्या कड़े वहतुकीचे नियम  अधिक कड़क करणे गरजेचे आहे.

कायदे आणि नियमां पेक्षा नागरिकांनी  आपल्या अमूल्य प्राणाचे आणि  वाहतुकीचे महत्व जाणून  स्वतः सुजान व जागरूक नागरिक असल्याचा परिचय द्यावा आणि अपघात टाळावा  
कारण जीवा पेक्षा वाहन महत्वाचे नाही.  

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************