अवांतर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अवांतर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-२)

🌱 वि४🌿या व्हाट्सअप ग्रुपवरून

अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-२)


Source:- INTERNET
-अक्षय पतंगे,
आ. बाळापूर,
जि. हिंगोली

    वेद, धर्मसूत्रांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य मानणे म्हणजे आस्तिक. वेद,धर्मसूत्रांची भीती न बाळगता चिकीत्सा करणे म्हणजे नास्तिकता.
            अजून तरी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य,शिक्षण या आपल्या मुलभूत गरजा. असं तर नाही की, कुणी आस्तिक आहे म्हणून तो अन्नाशिवाय राहू शकतो आणि नास्तिक आहे म्हणून निवाऱ्या शिवाय राहू शकतो. मला वाटतं आस्तिक, नास्तिक असणं ही प्रत्येकाच्या स्वतंत्र विचारसरणीवर अवलंबून असतं.
          कट्टरतावाद संपवून अभय निर्माण करणं, शोषणापासून मुक्ती, गरिबी संपवणे, प्रत्येकास शुद्ध पाणी, तरुणांना रोजगार, zero hunger, Freedom of choice यांची गरज आहे.

         सत्य स्वीकारून मानवी कल्याणासाठी निरपेक्ष प्रयत्न करणं महत्वाचं वाटतं. डोळस वृत्ती ठेवून मानवी व्यवहार करणं हे आस्तिक, नास्तिक यापेक्षा चार पाऊल पुढेचं असेलं.  उदा. केरळच्या १.८४ लक्ष विद्यार्थ्यांना टिसीवर ना जातीचा उल्लेख केला, ना धर्माचा यामुळे ना तणाव, ना विद्वेष, ना दंगली.



Source:- INTERNET
-विशाल सातपुते,
 पंढरपूर

अस्तिक किंवा नास्तिक असणं हा त्या व्यक्तीचा दोष नसून त्याच्या जीवनातील विचारांचा किंवा अनुभवाचा सार आहे. मी स्वतः देव मानत नाही परंतु ,तूम्ही देव मानू नका  असे सांगण्याचा आधिकार मला नाही.कारण देव मानने किंवा नाही मानने हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. आज आपण विज्ञानवादी युगात देव असणं हे स्विकारू शकत नाही. आणि   देवाचे असणं हे नाकारूही शकत नाही.कारण ,काही गोष्टींना आपण वैज्ञानिक कारणे देऊ शकतो परंतु काही गोष्टींना आपण वैज्ञानिक कारणे देऊ शकत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर मी वयाच्या 19 व्या वर्षी पूणे ते पंढरपूर असा वारीचा चालत प्रवास केला. परंतु मला चालत असताना कसलाही ञास जाणवला नाही याचा अर्थ देवाने मला चालण्याची क्षमता दिली असा होत नाही, तर मी माझी स्वतःची काळजी घेतल्यामुळे ते शक्य झाले ,असे मी मानतो.याउलट मी पंढरपूरला पोहोचल्यावर मंदिरात गेलो नाही, जर देव खरंच असता तर त्याने माझे वाईट  करायला हवे होते ,उलट त्यावर्षीचा उत्कृष्ट विद्यार्थी वारकरी म्हणून माझा महाविद्यालयात सन्मान करण्यात आला. सांगण्याचा मुद्दा असा आहे की ,देव मानने किंवा नाही ही वैयक्तिक संकल्पना असू शकते. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. आठवलं म्हणून सांगतो, डिसेंबर 2015 मध्ये माझी स्वतःची लहान बहीण आजारी होती,ती स्वतःशीच बडबड करत असे.मधूनच काही वेळ घट्ट डोळे मिटून बसत असे.गावातील तसेच पंढरपूरमधील नामांकित डाॅक्टर चे असे मत होते की , तिचा मेंदूचा प्राॅब्लेम असून उपचाराअंती तो पूढील पाच ते सहा महिन्यात बरा होऊ शकतो. सर्व पर्याय जवळजवळ संपले  होते.अशावेळी आमची आजी तिला पाहण्यासाठी घरी आली होती. बोलता बोलता तिने देवाचा विषय काढला, तसा मी सर्वांना रागाने बोललो, एवढे डाॅक्टर उपचार करून थकले, आता देव तिला नीट करणार. परंतु आम्ही खेडेगावात राहात असल्यामुळे मी काॅलेजला गेल्यावर आईने त्या बाईला बोलवून देवाविषयी काही असेल तर सांगा अशी विनंती केली , त्यानुसार त्या बाईने सांगितले की , तुमच्या कुळदैवताची मंगळवारी पूजा करून ही सर्व परीस्थिती तूम्ही पूर्ववत करू शकता. योगायोगाने दूसर्या दिवशीच मंगळवार होता. सांगितल्याप्रमाणे सर्व पूजा वगैरे करून झाली , आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जी माझी लहान बहीण गेले 10-12 दिवस अंथरुणावर पडून होती, ती पुढच्या दिवशी बुधवारी स्वतः सर्व गोष्टी आवरून शाळेत गेली होती आणि ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी आपण विज्ञानवादी देवाचे अस्तित्व नाकारू शकत नाही. मान्य आहे की, देवाचा आणि तिच्या आजारी  असण्याचा काही संबंध नसेलही परंतु देवानेच मला ठिक केले ही तिची वेडी समजूत आजही कायम आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की, देव माझ्या पाठीशी आहे, या एकाच आशेवर आज लाखो लोक आपले अस्तित्व टिकवून असतील तर आपण त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. परंतु स्वतःच्या कर्मामुळं/ आळशी जीवनामूळे काही लोक दारिद्र्याकडे वळतात. अशावेळी ते देवाला दोष देतात. देवानेच माझे वाईट केले असे सांगतात. ते देव मानत नाहीत. मग त्यांना नास्तिक म्हणायचं का ? हाही प्रश्न आहेच. काही दिवसांपूर्वी नितिन भानगूडे पाटिल यांच्या भाषणातील एक वाक्य खूप छान वाटलं, ते असे की , तूम्ही स्वतःच तूमचे जीवन चांगले किंवा वाईट घडवू शकता . तूमचे चांगले किंवा वाईट करण्याचा अधिकार हा तूम्हाला स्वतःलाच आहे. कोणताही देव तूम्हाला कष्टाविणा फळ देणारच नाही, कष्टाला पर्याय नाही.  आज देशात हजारो वेगवेगळ्या प्रकारची देवस्थाने आहेत. एकीकडे मंदिरात लोक हजारो रुपये दान करून येतात परंतु घरी असलेले आई-बाप कधी अर्धपोटी तर कधी उपाशी झोपतात, याची त्यांना जाणीव नाही. आज अनेक अनाथाश्रम, वृध्दाश्रम याची वाढ होत आहे.आजच्या काळात लोक मंदिरात दान करू शकतात परंतु आई -वडिलांना दोन वेळच जेवण देऊ शकत नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जर देवच सर्व विश्वाचा निर्माता असेल तर त्याला दान देण्याइतके आपण मोठे आहोत का ? यावरही विचार व्हायला हवा. डाॅ.शाम मानव यांनी आपल्या एका मूलाखतीत असे सांगतात की जर देवाला नवस करून मूले होत असतील तर लग्न करण्याची गरजच काय? शेवटी जाता जाता एवढेच सांगतो की, आपल्या वाड-वडिलांनी परंपरागत ज्या देवाची जोपासना केली त्या देवावर ठेवायची असेलच तर श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा कदापि नको. कारण तूमची अंधश्रद्धा ही एखादा जीव नष्ट करू शकते.                                     तात्पर्य: -आज नास्तिकता मनाशी बाळगून परंपरागत अस्तिकताही जपणे ही काळाची गरज आहे.



Source:- INTERNET
-संजय साळुंके,
जळगांव

                आस्तिक म्हणजे देवाला मानणे व नास्तिक म्हणजे देवाला न मानणे. पण देव म्हणजे नेमकं कोण ? मंदिरातील दगडाची मुर्ती ? डोंगरावर विराजमान मुर्ती? तीर्थक्षेत्र ? गंगास्नान ? कुंभमेळयातील साधू ? का कुणी संधीसाधू? नव्हे नव्हे मित्रांनो , रंजले गांजलेले , दुःखी कष्टी , निराधार हुशार विद्यार्थी, अंध पंगू यांच्यात ज्याला देव दिसतो तो आस्तिक , मग तो देवळात जातो की नाही हे गौण ठरते. संत गाडगेबाबा पंढरीच्या वारीला दरवर्षी न चुकता जायचे पण मंदिरात कधीच गेले नाहीत, मात्र वारीत  चंद्रभागेच्या तीरावर दिवस भर स्वच्छता करून रात्री तेथेच अंधश्रद्धा, निरक्षरता, व्यसनाधीनता , जात पात विरोधात कीर्तन करायचे . आमचा देव कोणाला मानायचे यातच खरा गोंधळ होतो. संत तुकाराम महाराजांनी म्हटले , जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा , देव तेथेचि जाणावा। संत एकनाथ महाराज यांनी वाळवंटात तहानेने व्याकुळ गाढवात देव पाहून त्याला तीर्थ पाजून तहान भागवली. शेवटी भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, उघड्या नागड्याना वस्त्रं, गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी मदत, बेघराना निवारा, अंध पंगू रोग्यांना औषधोपचार, बेरोजगारांना रोजगार, पशू पक्षी प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींच्या विवाहासाठी मदत, व दुःखी निराश्यांना हिम्मत देणें म्हणजे आस्तिक , व हे न करता टिळा लावून गळा कापणे म्हणजे नास्तिकता. मंदिरात देव कधीच नसतो , तो असतो गरजूंच्या रूपात जगात सर्वत्र.आपण आपल्या मनाला विचारा आपण आस्तिक आहोत का नास्तिक ? नेमकी कशाची गरज आहे आपल्याला. धन्यवाद.


Source:- INTERNET
- जयंत जाधव,
लातूर

   माझ्या मते,आस्तिक व नास्तिक या संकल्पना किंवा गोष्टी  सामान्य मानसाच्या समजण्या पलीकडंची. ' देव 'ही काही लोकांनी खाजगी मालमत्ता करीन टाकली आहे. प्रत्येक जण देवाजवळ काही मागणी करतो त्यास आस्तिक म्हणणे योग्य नाही तर स्वार्थी  म्हणता येईल.
     देवाला देवळात राहू द्यावे.पण काही स्वार्थी लोकांनी त्याचे ऐवढे बाजारीकरण केले कि देव देवळातून केव्हाच पळून गेले.
      निसर्गातील 'सुपर नॕचरल पॉवर ' सूर्य,चंद्र,पृथ्वी,समुद्र,जल ,अग्नी,वायू इत्यादी गोष्टी माणसाला एक रुपया देखील न घेता कोणताही स्वार्थ न साधता लाखो किंमत असलेल्या गोष्टी अगदी फुकट देतात.पूजा करायची असली तर यांची करा.माणूस फक्त नावाला माणूस आहे.खरी माणूसकी ते दाखवतात.
        शाळेत असताना विज्ञानाचे सर म्हणायचे ,ऊर्जा अक्षय म्हणजे नष्ट होत नाही फक्त एका स्वरुपातून दुसऱ्या स्वरूपात बदलते. मग मी वर उल्लेख केलेल्या जाल,वायु,सूर्य या सुपर नॕचरल पॉवरला जर कोणी देव मानत असेल तर त्यांना नास्तिक म्हणता येणार नाही.या नैसर्गिक शक्तींच्या चांगली शिकवण म्हणजे एकमेकांना न स्वार्थ साधता मदत करणे कोणी शिकत असेल तर त्याला मी आस्तिक म्हणेल.
       तात्पर्य,एखादा माणूस एक तर आस्तिक असू शकतो वा एक तर नास्तिक.माझे वैयक्तिक मत असे आहे की,जिथे माणूसकी जपणा-या गोष्टी घडत असतील तिथे मी आस्तिक पण जिथे माणूसकीला अहितकारक घडत असेल तिथे मी नास्तिक असेल.

Source:- INTERNET
-नवनाथ कुसुम राजाभाऊ जाधव,
परभणी

   आस्तिक नास्तिक संकल्पना या आज जरी देवाशी संबंधित वाटत असल्या तरीही त्या मुलत: तशा नाहीत, त्या वेदांच्या मान्यतेशी संबंधित आहेत, त्या तशा गृहीत धरल्यास नास्तिक असणं आवश्यक आहे,  आजच्या रुढ अर्थाने देवत्वाशी जोडल्यास - 'देव मानायचा की नाही' हा खरा प्रश्न नाही, तर कोणता देव नाकारायचा आणि कोणता देव स्वीकारायचा हा खरा प्रश्न आहे, तर शोषण करणारा देव नाकारायचा जो पुरोहितांचे , भटजींचे (यातला 'जी' मला स्वत:ला मान्य नाही) हितसंबंध जपतो आणी रंजल्या, गांजल्यांना नडतो आणि शोषण न करणारा देव स्वीकारायचा , जो सगळ्या संतांनी सांगीतलेला आहे,             तिसरी एक संकल्पना आहे, आस्तिक म्हणजे सकारत्मकता आणि नास्तिक म्हणजे नकारात्मकता यादृष्टीने Be positive असणं केव्हाही चांगलं, याअर्थाने आस्तिक असावं.


Source:- INTERNET
-सागर राडे,
सांगली

आस्तिकता आणि नास्तिकता.. एकाच नाण्याच्या दोन बाजू. साधारणपणे आस्तिकता म्हणजे देव, आत्मा या किंवा अशाच न पाहिलेल्या गोष्टींचं अस्तित्व मानणे. याउलट नास्तिकता म्हणजे वर उल्लेख केलेल्या गोष्टींचं अस्तित्व नाकारणे. मग असं असेल तर आज आपल्याला यापैकी खरंच कशाची गरज आहे?
थोडेसे ऐतिहासिक संदर्भ देतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापन करत असताना *हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा* ह्या विचारानेच ते नेहमी कार्यरत राहिले. स्वराज्यातील कुठल्याही गड-किल्ल्यावर बघितलं तर तिथे एखादं तरी मंदिर आवश्य दिसेल. कुठलंही महत्वाचं कार्य असेल तर गडावरील देवाचं दर्शन ते घेत असत असे उल्लेख इतिहासात सापडतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ते आस्तिक होते याबाबत कुणाचंच दुमत नसेल.
पण तरीही *हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा* हा विचार घेऊन ते देवाच्या भरवशावर सगळं सोडून कधी स्वस्थ नाही बसले. अफजलखानाची स्वारी असेल, पन्हाळ्याचा वेढा असेल, शाहिस्तेखानाचं आक्रमण असेल किंवा आग्र्याची कैद असेल, ते कधी माझा देव बघून घेईल, तोच मला किंवा स्वराज्याला या संकटातून बाहेर काढेल असं नाही म्हणाले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी पूर्वतयारी केली. त्याप्रमाणे योजना आखल्या आणि स्वतः आघाडीवर राहून त्या संकटांचा सामना केला आणि यश मिळवलं.

तीच गोष्ट कुठल्याही मोहिमेची. आस्तिक लोकांना अमावस्या म्हणजे अशुभ दिवस वाटतो. पण बऱ्याच महत्वाच्या मोहिमा महाराजांनी अमावस्या किंवा त्याच्या आधीच्या रात्री पार पाडल्या. रात्रीच्या अंधाराचा अचूक फायदा घ्यायचा हाच विचार त्यामागे असायचा. हीच गोष्ट आग्र्याहून सुटकेनंतरची. महाराज आग्र्याहून सुखरूप स्वराज्यात दाखल झाले पण शंभूराजे सुरक्षित परत यावेळी म्हणून त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी पसरवली. तेवढ्याने लोकांचा विश्वास बसणार नाही ह्याची जाणीव असल्याने शंभूराजांच्या जिवंतपणीच त्यांचे क्रियाकर्मदेखील केले. समुद्र ओलांडल्याने दैवी कोप होतो ही तत्कालीन प्रचलित समजूत. पण तरीही महाराजांनी स्वतः सिंधुदुर्गाची उभारणी करण्यास सुरुवात केली कारण ह्या समजुतींपेक्षा शत्रूशी लढा देणं आणि त्यासाठी समुद्रावर हुकूमत असणं जास्त गरजेचं आहे हे महाराजांनी जाणलं होतं.
अशा कित्येक उदाहरणांतून महाराजांनी हेच दाखवून दिले की आपण आस्तिक असलो तरी फक्त रूढी-परंपरा म्हणून सगळ्याच गोष्टी पुढे चालवायच्या नसतात. तर त्यामागचा विचार समजून घेत प्रसंगी त्या रूढी-परंपरा झुगारून देण्यातच शहाणपण असतं. आणि त्याने आपल्याला झालाच तर फायदा होईल, नुकसान नक्कीच नाही.
म्हणूनच मी तर म्हणेन की आपल्यालाही आज अशाच आस्तिकतेची गरज आहे जी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी दाखवून दिली.


Source:- INTERNET
-क्षितिज गिरी, सातारा

मुद्दा आस्तिक किंवा नास्तिक चा नाहीच ।आस्तिक किंवा नास्तिक हे विचार बरोबर किंवा चुकीचे असेही आपल्याला म्हणता येणार नाही।दोनीही गोष्टीचे समर्थन होऊ शकते।पण खरा वाद याच्या नंतर सुरु होतो।
          मनापासून देवाची भक्ती करणे त्याला पूजने ।एकाद्यावर दया दाखवणे।ईश्वर आहे या भीतीने का होईना पण पुण्य (आपण कशाला पुण्य म्हणतो हा वादाचा मुद्दा असू शकतो) काम करणे।कोणत्याही नवीन कामात ईश्वर माझ्या बरोबर आहे या सकारात्मत दृष्टीने चालणे म्हणून पण खुप सारी मानसिक शक्ती आपल्याला भेटून जात।इथपर्यंत सर्व व्यवस्तीत चालू असते ।
              भक्ताच्या भोळेपणाचा भीतीचा किंवा कामजोरीचा फायदा घेऊन उघड  पणे त्याची पिळवणूक केली जाते।समाजामध्ये देव धर्म यांचे नाव घेऊ चुकीच्या गोष्टीना समर्थन दिले जाते। वेगवेगळ्या अधध्देला पाठिंबा दिला जातो।देवाच्या व धर्माच्या  नावावर चुकीच्या गोष्टी खपवल्या जातात।हि कथा देवाने किंवा धमग्रथांनी सांगितलि आहे तिचा खरी आहे अशी समजून किंवा भिती घातली जाते।नरकाची किंवा इतर भीती दाखवुन उघड उघड शोषण केले जाते।देवाचे नाव घेऊन आतापर्यंत खुप क्रुर भयानक अत्याचार घडवले गेले आहेत।व आजही घडवले जातात।त्याचे उघड उघड समर्थनही केले जाते।आणि कधी कधी तर अन्यायाला बाली पडणार पण त्याच्यावरील अन्यायाचे समर्थन करतो कारण त्याला त्याची जाणीवच नसते किंवा तो समाजाच्या विरोधान जायला घाबरत किंवा टाळत असतो ।आजही या नावावर कितीतरी निःपाप जीवांचे बाली पडले जातात किंवा मानसिक शोषण केले जात।त्यामुळे नको वाटते हि आस्तिता।पण परत प्रश पडतो यामध्ये सामान्य माणसाचा काय दोष तो तर निरपेक्ष भावनेने भगवंताला शरण गेला आहे।पण परत प्रश पडतो आपल्यावरील व सामाज्यावरील अन्यायाचे सरळपणे पाठींबा देणार्याला आस्तिक म्हणावे का ?
              नास्तिक योग्यआहे तीच बरोबर आहे त्याने सर्व प्रश सुटतील असेही वाटते।पण अशीही माणसे भेटतात ज्याचा देवावर विश्वास नसतो पण इथल्या जातीव्यवस्थेवर असतो।ते देव नाही म्हणून सरळ सरळ दुसऱ्याचे लुबाडून खातात किंवा त्या गोष्टीचे  समर्थन करतात।मग विचारचक्र सुरु होते व वाटायला लागते त्यापेक्षा आस्तिक बारा निदान तो त्याच्या अज्ञानात तरी सुखी आहे।पण काही किंवा बहुतांशी अशी लोक पण भेटतात ती नास्तिक असता आणि माणूसच माणसांचे होणारे शोषण थांबवू शकतो ।कुणीही दुसरा येणार नाही।या विचाराने प्रेरित असतात।आणि मग ते प्रसंगी पूर्ण समाजाचा पण का होईना पण विरोध करून पण आपले विचार ठामपणे मांडतात।आणि ते आमलात येण्यासाठी कृती पण करतात।किंवा देव नाही पण प्रेम दिल्याने प्रेम वाढते या विचाराच करून जेवढे दुसर्याचे व समाजाचे चांगले करता येईल ठेवढे ते करतात।
           कितीतरी आस्तिक लोक देव धर्माच्या नावाने चाललेल्या काळ्या बाजाराला विरोध करतात पण म्हणून ते लगेच नास्तिक होत नाही तर त्याची त्या दिशेने चालू असणारी ती एक वाटचाल असते।मग ती त्याच्या नकळत का होईना पण विद्रोह झालेला असतो ।मागे एक वाक्य माझ्या कानावर आले कुणीतरी म्हणाले सर्व धर्मग्रंथ वाचून मी नास्तिक झालो।त्यामुळे आपले अज्ञान हेच कारण आहे आपण आस्तिक असण्यामागे ।अंतिम सत्य हे नास्तिक कडे वाटचाल करते।पण त्यामुळे आपण अस्तिकतेल विरोध करू शकत नाही तर त्यातील फक्त अधश्रदेला करू शकतो ।व लोकांच्या लक्षात आणून देऊ शकतो देव धर्माच्या नावाने चालू असणारी प्रथा परंपरा कशी चुकीची आहे ते।त्यामुळे लोकांची हळूहळू वाटचाल हि नास्तिकतेकडे होईल त्यांना कळणारही नाही।पण यासाठी कायम करावी लागेल ती समाजजागृती आणि नेहमी प्रमाणे यामध्ये बाली जाईल तो सच्या नास्तिकांचा ।जे आज पर्यंत होत आले आहे तेच पूढे पण होईल।पण अशी समाजजागृती जर झाली नाही तर आपण काळाने खुप मागे खेचले जाऊ हे मात्र नक्की।जसे शिवशाही व पेशवाई मध्ये तफावत आली अगदी तशीच।
      शीमंतांना देव नसला तरी चालेल पण गरिबाला देव लागतो।क्षणा क्षना ला मानसिक शरीरींक संकटांना सामोरे जाणार्याला देव लागतो।कारण तेवढाच एक पर्याय त्याच्या कडे असतो तो हि शेवटचा ।पण याचाच गैर फायदा घेऊन आणखी त्याचे शोषण केले जाते ।होते काय उलटेच।
        आस्तिक माणसाकडे भरपूर प्रश्नांची उत्तरे नसतात किंवा तो त्याची चिकित्सा करत नाही आणि ती शोधण्याचा  प्रयन्त हि करत नाही।किंवा उत्तरे घावली तरी यामध्ये आपला काही फायदा नाही किंवा ते सत्य सीकारण्याची तेवढी हिम्मत नसते किंवा होत नाही।
आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासामध्ये झालेल्या क्रांत्या या रक्तरंजित किंवा लोकशाही मार्गाने झाल्यात त्यामुले थोडा अधिक प्रमाणात का होईना पण न्याय मिळाला ।आजही असाच न्याय मिळवावा लागतो।मग तो लोकशाही मार्गाने आसू किंवा प्रसंगी हुकूमशाही मार्गाने।पण न्याय देण्यासाठी कोणताच देव किंवा कोणीही आले नाही ।हजारो वर्षापासून चालत आलेली भारतातील अन्यायकारी जातीव्यवस्था असो किंवा जगातील स्त्री पुरुष असमानता असो किंवा जगातला काळा गोरा भेदभाव असू किंवा गुलामांचा व्यापार असू ।कितीही क्रूर अन्याय झाला लोखों कोट्यवधी लोक मारले गेले मग ते रोगामुळे असू  किंवा महायुद्धा मूळे किंवा एखाद्या हिंसाचारामध्ये कोणीही आले नाही वाचवायला आणि तसे कोणी येतहि नाही।त्यासाठी जगाच्या इतिहासमध्ये खुप जणांनी निस्वार्थी भावनेने समाजसेवा केली।आणि थोडा जास्त प्रमाणात का होईना पण न्याय मिळून आणला।आपले पूर्ण आयुष्य वेचले ।ते एकच आहे हे माहित असून पण ।पण आपण काय केले आपण फक्त त्यांना दगडांच्या मुर्त्या त्यामध्ये कैद केले।आणि एखांद्या भक्त प्रमाणे त्याचा जयघोष केला।आणि नेमकी त्याच्या विचारांचीच पायमल्ली करून आपण अस्तिकांनकडे वळालो ।मग खपवल्या गेल्या आजही जातात त्याच्या नावाने कोणत्याही गोष्टी।आपण मात्र आंधळे पणाने स्वीकारतो।आणि परत आपल्याला गरज भासू लागते नास्तिकतेची।खरच आपल्याला निस्वारती नास्तिकतेची गरज आहे।तरच आपण एका शोषण मुक्त समाजाची निर्मिती करू शकतो।
          आस्तिक म्हणजे अस्तित्व  मध्ये असणारी गोष्ट जशीच्या तशी स्वीकारणार आणि नास्तिक म्हणजे आस्तिक (अस्तित्वात असणाऱ्या) गोष्टीची चिकित्सा करून चुकीच्या गोष्टीचे समर्थन ना करता मनाला पटणाऱ्या सत्य गोष्ट स्वीकारने ।म्हणजे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करून बरोबर असणाऱ्या गोष्टी स्वीकारने मग त्या गोष्टी समाजाच्या विचारसरणीच्या विरोधात का असेना पण त्या आमलात आणणाऱ्याचा प्रवास आस्तिकते पासून नास्तिकते कडे होतो।


पवन खरात,अंबाजोगाई
जर देव या संकल्पने हि संदर्भ जोडला तर मी नास्तिक आहे,पण जर माणुसकी सोबत संदर्भ जोडला तर मी आस्तिक आहे ।

कारण मी जगात जिवंतपणी आई वडिलांचा छळ करणारे,  दोन वेळेची भाकरी खायला देण्यासाठी सुद्धा काणकुन करणारे  आणि मेल्यानंतर पुण्य मिळण्यासाठी लोकांना गोड जेवण खाऊ घालणारे असे नीच प्रवर्तीचे लोक सुद्धा अगदी जवळून पहिले आहेत.


     "अंगात देव येणे " हे वाक्य आपल्या सर्वांना परिचित आहे आणि विशेष म्हणजे फक्त आणि फक्त भारतातच ऐकायला मिळेल.
जर अंगात देव येऊन खालील प्रश्न सुटणार असतील,

1. एखादया अंथरुणावर पडलेल्या व्यक्तीला तंदुरुस्त करत असेल,हातात गळ्यात गंडे दोरे बांधून जर आजार नीट होत असता तर डॉक्टर जन्माला यायची गरज काय होती ?

2.जर उपासतापास करून एखाद्याची अधुरे स्वप्न पूर्ण होत असतील, तर दररोज भारतात भूक बळिले मरणारांची संख्या लाखोंमध्ये आहे, ज्यांना एक वेळच अन्न मिळणे मुश्किल आहे ,त्यांच्या स्वप्नचं काय?

3. जर देव अंगात येतो तर मग एखाद्याच्या अंगात आईन्स्टाईन , स्टीफन हॉकिंग्स,थॉमसन, न्यूटन ,आंबेडकर ,शिवाजी महाराज, यायला पाहिजेत, त्यामुळे देशाची प्रगती तरी होईल. असं का होत नाही?

 4.नेहमी अयशस्वी होणाऱ्याला यशस्वी करत असेल,तर या जगात कोणालाच अथक परिश्रम करायची गरज काय ?

माझ्या समोर घडलेला एक प्रसंग सांगतो,
ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघालो थोडं दूर गेल्यावरती एका घरासमोर एक देव्हारा आणि तुळस होती साधारणतः 10 मिनिटं पूर्वी पुजाकरून झाली असेल,मी त्यासमोर जळत असलेल्या अगरबत्ती वरून अंदाज लावला. एक 8 वर्षाची मुलगी एक 1 वर्षाचं बाळ कडेवर घेऊन  त्या घरासमोर भाकरी मागत  उभी राहिली होती, बाजूला एक कुत्रा उभा होता. तेवढ्यात त्या घरातून एक बाई भाकरी घेऊन आली आणि ती भाकरी त्या कुत्र्याला टाकली, तेव्हा मला खरंच खूप दुःख वाटलं पण एक गोष्ट मात्र मी शिकलो या जगात माणसाला जेवढी किंमत नाही त्यापेक्षा जास्त किंमत कुत्र्याला दिली जाते.

म्हणूनच मला हे सांगायचे आहे कि ,
"जर देव या संकल्पने हि संदर्भ जोडला तर मी नास्तिक आहे,पण जर माणुसकी सोबत संदर्भ जोडला तर मी आस्तिक आहे ।"


अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-१)

🌱 वि४🌿या व्हाट्सअप ग्रुपवरून
अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-१)


Source:- INTERNET
-किरण पवार,
औरंगाबाद

याविषयी मला ठामपणे सांगायच आहे ते म्हणजे आपल्याला नास्तिकतेची गरज आहे. कारण *आस्तिक असण तुमच्यातल कुतूहल नष्ट करून टाकत.* कुतूहल एका प्रकारे जिद्दीचा उगम असतो. नास्तिकता प्रश्नांना पुरक आणि पडताळणीची उत्तरं शोधते.
          आजवर जेवढी आस्तिक लोक पाहिली तेवढ्यांमुळे नाहक अअंधश्रद्धेचे बळी पाहिले. धर्माच्या नावाखाली अन्याय पाहिला. आस्तिक लोकांना इतरांच स्वातंत्र्य हिरावून घेताना पाहिल. *खर तर आस्तिक लोकांना सर्व गुन्हे मी लेबलींगच्या नावाखाली करतानाच आजवर पाहिलं.*


Source:- INTERNET
-अनिल गोडबोले,
सोलापूर

हा प्रश्न मला खूप वेळा पडत आला आहे. नेमकं अस वातावरण आपल्या आजूबाजूला असत की आपण सरळ सरळ धार्मिक असाव अस वाटत... एखादा सण किंवा समारंभ होत असेल तर अस वाटत की देव आहे, हे एवढे लोक जर छाती ठोकून अनुभव आला आहे असं सांगतात तेव्हा नक्कीच आपण आस्तिक व्हायला पाहिजे... व्हायला पाहिजे काय... आहोतच आपण..
ते सण, घरात येणारे लोक, प्रसाद च्या नावाखाली विविध पदार्थांची रेलचेल, उदबत्त्यांचे वास, आरती चे स्वर, भजनातील तल्लीनपणा... हे सगळं आवडत. चांगलं असण्याची ताकद आहे असं वाटत जात..
तसेच उलट भूत, वाईट शक्ती, यांच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी, नशिबाच्या खेळावर मात करण्यासाठी अस्तिकता असल्याशिवाय पर्याय नाही असं मतच होत माझं....

आणि मग एक माणूस भाषण देताना, लेख लिहिताना किंवा शाळेत शिकलेला विज्ञानाचा संदर्भ देऊन संभाषण (वाद विवाद नव्हे) करू लागतो.. आणि आपल्याला ते पटत जात. मनात आत कुठेतरी हालत जात सगळं, केवढं मोठं असत्य आपल्या गळ्यात मारलं जात आहे, आणि ते पण किती पद्धतशीर पणे.. दाभोलकर खरे वाटायला लागतात.. भगतसिंग वाचताना आपलं मनच म्हणत... अरे हे तट खर आहे की, मग शोधत शोधत जाताना लेनिन, मार्क्स, अगदी प्रोटेस्टंट करणारा मार्टिन ल्युथर पासून अगदी थेट चार्वाक पर्यंत गाडी येऊन पोहोचते.
मधेच नास्तिक मेळावे काय भारतात, मध्येच एखादं राष्ट्र निधर्मी असून त्यांचा gdp आणि समाधानाने जगण्याची वृत्ती भन्नाट आहे असं कळत आणि ते पण बरोबर वाटायला लागतं
बुद्ध, महावीर, बसवेश्वर यांच्या पासून काल परवा पर्यंतच्या गाडगे बाबा चे विचार योग्यच वाटायला लागतात.
पांडुरंगाच्या चरणी जाणारे संत दाखवताना... हे लक्षात येत की हे नुसतेच शरण गेले नाहीत तर शिकवून गेले आहेत... जगायला..
'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा' अस वाचल्यावर वाटत की हे संत नक्कीच जो पांडुरंग शोधत आहे आणि आमच्या मनातला विठ्ठल हा वेगळा आहे.
मंदिरात जायला , मशिदीत जायला मन नकोच म्हणत, बाप्तिस्मा देऊन भूत काढणार्यांना जाऊन प्रबोधन करावं असं वाटत..
आणि या क्षणाला पुन्हा घरातले मोठे जाणते ज्यांनी आयुष्य बघितलं आहे .... ते सांगतात... 'हात जोड' आणि पुन्हा देव धर्म अस सुरू होत..
कितीवेळा तरी अशी आंदोलन मनात होत असतात.....
मी नास्तिक आहे असं न म्हणता फक्त तशा अर्थाचा मेसेज सोशल मीडियावर टाकला की फोन, मेसेज,... आणि बरच काही.
'एकच सांगतो तुला देव आहे किंवा नाही हे सोड.. विश्वास ठेवा.. देव तुझ्या मनात आहे..
देव असल्याशिवाय तर हा सगळा पसारा कसा चालला आहे?'
असा उपदेश चालू असताना.. कोणीतरी स्टीफन हौकिंग नावाचा माणूस सांगून जातो.... ' देव सोगट्या खेळताना कुठेतरी हरवतो त्या त्यालाच सापडत नाहीत आणि आपण नशीब म्हणून बसलोय....' देव नावाची कोणतीच वस्तू किंवा एनर्जी नाही...
अस बरच काही..... एवढं सगळं होऊन प्रश्न उरतो की ' मी आस्तिक की नास्तिक'
आणि शोध सुरू होत नेमकं काय सत्य आहे.. शेवटी सत्य हेच सापडत की..... दोन्ही बाजूची टोक गाठण्यापेक्षा आपण आपला मधला मार्ग काढावा... त्याबरोबर मनात प्रश्न येतो "ना घर का ना घाट का" अशी अवस्था तर होणार नाही ना आपली....
वाद घालण्यापेक्षा संवाद साधत नाही आपण आपले मुध्ये खरे म्हणून आपल्याच लोकांशी भांडत जातो.... एवढं बोलतो की नंतर भीती वाटते... " माझा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी तर होणार नाही ना?"
काही गोष्टी समजायला लागतात... निरीश्वरवादी तर फार पूर्वी पासून आहेत..
आपणच बऱ्याच गोष्टी एकात मिसळ केल्या आहेत.
नैतिक असण्यासाठी मला देव धर्म करण्याची गरज नाही तर विचार बुद्धी वादी असन गरजेच आहे... जेव्हा बुद्धी प्रश्न विचारते तेव्हा सगळी उत्तर मिळत नाहीत.... मिळत फक्त ' कसं जगावं' या वरच उत्तर..
आनंदी रहा, माणुसकी ठेवा, देव माना किंवा मनू नका पण आपले विचार समोरच्यावर थपवु नका, चुकीच घडत असेल तर आवाज उठवा...
आणि ठणकावून सांगा मला कुठल्याच कट्टरतेची गरज नाही.....मी सगळ्या सोबत इतरांना न दुखवता माझ्या मनाप्रमाणे राहू शकतो...
मी माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असे वागेन...
आता या वागण्याला तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा
मला तर वेगळं काही सांगण्याची गरज वाटत नाही
मला दोन्हीची गरज वाटत नाही.. फक्त ज्या गोष्टी काळाच्या कसोटीवर ज्ञान म्हणून टिकून आहेत... त्या गोष्टी साठी कुठल्याही काल्पनिक गोष्टीवर मला अवलंबून राहण्याची गरज नाही..!!



Source:- INTERNET
-करण बायस,
जि. हिंगोली

आस्तिकता आणि नास्तिकता ह्या दोन संकल्पना आपल्याला आणखी पण गोंधळून टाकतात.
असं म्हणतात अस्तिकता म्हणजे देवपूजा करणे, धर्म ग्रंथात किंवा धर्म गुरूंनी सांगितल्या प्रमाणे धार्मिक कर्मकांडात विश्वास ठेवणे असं काहीतरी आणि नास्तिकता म्हणजे या उलटं.
काही लोक मी किती अस्तिक आहे हे दाखवण्यासाठी पूजाप्रार्थना,गंध,धार्मिक कर्मकांड करणे आणि स्वतःला अस्तिक घोषित करतात.यामागे त्यांचा हेतू असतो तो म्हणजे मृत्यू नंतर त्यांना स्वर्ग पाहिजे असते,मोक्षप्राप्ती हवी असते.
या सगळ्या गोष्टींचा पाया  हे धर्मप्रचारक आहेत.
लोकांना हे धर्मप्रचारक असं पटवून देण्यात व्यस्त असतात की जो देवपूजा करतो, धर्मग्रंथांनी सांगितलेल्या मार्गावर चालतो तोच खरा अस्तिक असतो आणि जो या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक असतो.

आपल्या देशात वास्तवता ही आहे की लोकं मंदिरात जाऊन देवाला सोनं, पैसा दान करतात. त्या लोकांना कोण समजवाव की तुम्ही दिलेला सोनं आणि पैसा हा देवाकडे जात नाही (देवाकडे कशाची कमी असेल की ते आपल्याकडून घ्यायला बसले)ते तिथल्या महाराज आणि संस्थेच्या मंडळाच्या लोकांच्या पोटासाठी जातात.
या धर्मगुरूनी असं पटवून दिलं की जर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे काही केलं नाही तर तुमच्या वर देव नाराज होईल आणि तुमच्या अडचणी आणखी वाढतील.देव लोकांच्या अडचणी का वाढवेल त्याच्यासाठी तर सगळे एक समान आहेत.
देशाला लुटणारे हे लोक आणि पिळून निघणार  म्हणजे शेतकरी, बेरोजगार आणि गरीब लोक.आणि या लोकांनी समाजाची mentallity अशी बनवून ठेवली की हे गरीब लोक सुद्धा त्या धर्मप्रचारकांना नाव ठेवणार नाही.
आपण बघितलं बरेचसे समाजसुधारक असे होते की ते या गोष्टीत(लोकांच्या दृष्टिकोनातून नास्तिक) विश्वास ठेवत नव्हते पण त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला होता मग या समाजसुधारकांना काय म्हणायचे ? या समाजसुधारकांनी समाजासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न केला त्यांना माहीत होतं की धार्मिक कर्मकांड केल्यानं समाजाची प्रश्न सुटणार नाही.या धर्मप्रचारकांनी अशी परिस्थिती करून ठेवली की आपण या समाजसुधारकांना पण आठवत नाही किंवा लोकांपर्यंत त्यांना पोहचू दिलं नाही.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे लोकं एवढ्या श्रद्धेनं देवस्थानवर जातात तिथे पैसे टाकतात आणि म्हणतात आम्ही ते देवाला दिले अरे त्यात तुमचा काय फायदा झाला? सोनं देवाला चढवून काय फायदा झाला? देवाला नारळ फोडून काय फायदा झाला?
इथं शेतकरी आत्महत्या करत आहे, शाळेत मुलांना बरोबर शिकवलं जात नसल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे, वरून हे धर्मप्रचारक तरुण मुलांना भडकवतात आणि देशाचं भविष्य इथंच संपवायचं म्हणजे गरीब लोक गरीब राहावं,बेरोजगार लोक बेरोजगार राहावे!
हे धर्म, जात मानवनिर्मित आहेत आणि मानवांनी देवाला जाती/ धर्मानुसार वाटून घेतले.

आजकाल देवाच्या नावावर लोक पैसे सुद्धा कमवतात,म्हणजे देवाच्या मुर्त्या बनवणे, गणेशोत्सव, नवरात्री मध्ये हे जास्त होते पण कधी विचार केला का पाण्याचं प्रदूषण किती वाढत आहे, कधी विचार केला का पाण्यात राहणाऱ्या जीवनच इथं लोकांना वाटते आम्ही गणेशोत्सव, नवरात्री मध्ये 2-3 वेळा उपावासच खाऊन उपवास केला आणि त्या जीवाला मारून यांना पुण्य भेटणार? या लोकांना उपवास काय असते हे सुद्धा माहीत नाही.
आज तिरुपती ला एवढं सोनं चढवला जातो जर तोच देशाचे काही प्रश्न सोडवण्यात लावले तर काय जाते. जो संत, गुरू आपलं संपूर्ण आयुष्य एका फकीर सारखं राहून जगतो आज लोक तिथं जाऊन सोन्याचं सिंहासन,सोन्याचं छत्र देतात,ते संत जर आज असते तर त्यांनी हे स्वीकारलं असतं का?
आणि असं करून लोकांना वाटते की ते अस्तिक आहेत?

असं म्हणतात की देव हा आपल्यामध्ये(आपले अचेतन मन)आहे, हा देव आपली केलेली प्रत्येक प्रार्थना तो ऐकतो पण ती प्रार्थना अगदी मनापासून असली पाहिजे. आपले चेतन मनात कोणत्याही प्रकारची भीती, संशय नसला पाहिजे आणि  ही फक्त दगडाच्या देवसमोरच केली जाते असं नाही,आपण कोठेही असलो तरी प्रार्थना करू शकतो फक्त त्यात पवित्रता असली पाहिजे ,कोणाच्या प्रति वाईट गोष्टी नसल्या पाहिजे पाहिजे.अशावेळेस आपले अचेतन मन आपल्याला आपले उत्तर नक्कीच देते, हेच सांगण्याचे प्रयत्न संतांनी केले पण लोकांनी त्यांना पण देव बनवून धंदा चालू केला.
आज आपल्यात पण खूप क्षमता आहे आपण सुद्धा प्रगती करू शकतो पण लोकांना या धर्म, जातींनी खूप घट्ट पकडून ठेवलं आहे.

आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे जर प्रगती करायची असेल तर.


Source:- INTERNET
-सीताराम पवार,
पंढरपूर

आस्तिक मणजे  देव (वेद)मानणारे आणिनास्तिक(वेद) देव न मानणारे.आपल्या भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे नास्तिक मध्ये बौद्ध, जैन व चार्वाक याच्या विचारधारेचा समावेश होतो. खर तर म.गांधीजी मनतात "सत्य हाच ईश्वर आहे.स्वयंपूर्ण खेडी,भै  तिकवादाला विरोध, आज अपण यांत्रिकीकरण जगात आहोत, पुन्हा मंतोय जीवनशैली खूप बदलती आहे.त्यासाठी आपल्याला अध्यात्माची गरज आहे,अंतिम ध्येय सुखी-समाधानी जीवन जगणे हेच आहे,एवढी प्रगती होऊनसुद्धा आपण आणखी सुख शोधतोय? म फुलेंनी कोणीतरी निर्मिक आहे असे मानले आहे. मणी नाही भाव देवा मला पाव... अस गाडगेबाबा नि मटले आहे.तसेच नास्तिक विचारधारेतील बुद्ध, जैन विचारात कर्मकांड सोडून इतर बऱ्याच गोष्टी साम्य आहेत, प्रार्थना, विपश्यना, आता तर गावोगावी बुद्ध मूर्ती स्थापन होत आहेत.आत्मिक समाधानासाठी हे उपयोगाचे आहे. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा कर्मकांडाना विरोध केला,मनुन कर्मकांडाशिवाय भक्ती, अध्यत्म,माझा सुद्धा कर्मकांड, नवस बोलणे, याला विरोध आहे मला वाटते मूळ अस्तिकतेत हे नसावं काही स्वार्थी लोकांनी त्यात घुसफाळ असावं.बुद्ध मनतात स्वतःचा दीप स्वतःच बना. संत तुकाराम महाराज मनतात"1वेदांचा तो अर्थ आम्हशीच ठाव।येराणी वाहवा भार माथा।
2 वेद अनंत बोलिला।अर्थ इतुलाची शोधीला।
मूळ वेदांमध्ये कर्मकांड होती का पुन्हा काळानुसार त्यात घुसळली हे कळायला मार्ग नाही. अस्तिकता की नास्तिकता हे मणजे ,तत्वमीमांस की ज्ञानमीमांसा अस होईल, किंवा कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला. खरं तर आपल्या भारतात आस्तिक, नास्तिक दोघेही कडक नियमानुसार शक्यतो वागत नाहीत, आपल्यात विविधत्तेतून एकता आहे.जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन कृष्णमूर्तीनच्या पायाजवळ बसत. अनेक नोबेल विजेते वेडे झाले, आत्महत्या केल्या, कोणी चपला खाल्या,मला कुणाला हिनावायचे नाही पण, मानसिक शांताता, संतुलनासाठी काही गोष्टी मानसशास्त्रही मान्य करते. खर तर खराइशवरवाद आपल्याला वारकरी संप्रदाय कडून शिकायला भेटतो उदा. संत सावता माळी
कर्तव्य कर्म हाच खरा धर्म।
शेवटी ज्याची त्याची गरज वेगवेगली आहे ...


Source:- INTERNET
-सिमली भाटकर,
रत्नागिरी

माझ्या मते आस्तिकपणा व नास्तिकपणा ह्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत.देव देव करणे म्हणजे आस्तिक व न करणे म्हणजे नास्तिक असे अजिबात नाही.देऊळबंद चित्रपटात एक वाक्य आहे ,'परमेश्वर हे मानसाच्या प्रगल्भ बुद्धीला लागलेले ग्रहण आहे.मुळात हे ग्रहण आपण स्वतः लावून घेत असतो.परमेश्वर ही संकल्पना आपणच निर्माण केली व कधी धर्माच्या नावाखाली तर कधी जातीच्या नावाखाली वर्षानूवर्ष जोपासल्या आहेत.
मला माझ्या लेखातून कुणाच्या भावनांचे समर्थन करायचे नाही किंवा कुणाच्या भावना दुखाविण्याचा अजिबात उद्देश नाही.देवाच्या नावाखाली लोकांच्या मनात चाललेले युद्ध व त्यातूनच निर्माण होणारी अंधश्रध्दा यावर मला थोडेसे स्पष्टीकरण द्यायचे आहे.
झाडाचे एक लहान बीज जमिनीवर पडते.मातीत रुजते.त्याला योग्य पोषक वातावरण मिळाले कि अंकुर फुटून त्याचे मोठ्या वृक्षात रुपांतर होते.ह्या क्रियेला कुठली जादू म्हणता येईल का? कुणाकडे आहे  याचे उत्तर ? निश्चितपणे नाही.अगदी असच नात आहे आस्तिक व नास्तिक यामधील. आपल्याला समाजातील देवाचे स्थान किंवा नाव कमी करायचं नाही आणी देवाच्या नावाने चाललेला अंधश्रध्देचा काळाबाजार देखील थांबवायचा आहे.
राम,रहिम येशू हे एकच आहे व त्यांची शिकवण देखील सारखीच आहे.माणसाने विचारांनी मतभेद निर्माण केली,त्यातून वादविवाद,भांडणे सुरू झाली.मुळात विचारांची पातळी जशी उंचावते तसे माणसाचा समजूतदारपणा,त्याची परिस्थिती सभोवतालचे वातावरण व सर्वात महत्त्वाचे त्याची सकारात्मक विचार करण्याची पध्दती ,योग्य अयोग्य काय हे जाणून घेण्याची प्रवृत्ती  प्रगल्भ होते.
उदाहरणार्थ भाविक  लोक देवाला फुले,मोठ्या देणग्या घेऊन हजारो मैलांचा प्रवास पायी चालत देवस्थानात येतात. पण त्या ठिकाणी पाच मिनिटे देखील स्तब्ध उभे राहून आपल्या लाडक्या देवाला बघता येत नाही.कुत्र्याला हाकलून लावतात तसे दलाल भडवे भक्ताना मंदिरातून लवकर बाहेर काढतात .कित्येक वेळा चेंगराचेंगरीत भाविक यांचा मृत्यू होतो.येथे मानसाच्या बुद्धीमत्तेची दया येते व विचारांचा कस लागतो.देवस्थान गर्भ श्रीमंत होत आहे तिथे माणसांची गर्दी वाढते.पण अनाथाश्रम,वृध्दाश्रमातील लोकांना जगवण्यासाठी  इत्यादी ठिकाणी मात्र कुणी पुढं येत नाही.त्यासाठी बुद्धी व विचार असावे लागतात.
देवाला मानावे नक्की माना पण श्रध्देने. आपल चांगले होत नाही म्हणून लिंबू मिरची दूस-याचे दारात फेकणे हे सर्व प्रकार वाईट आहेत.ही श्रध्दा नाही,तर त्याला  वाईट भावना म्हणतात.दोन तासभर मंदिरात दर्शनासाठी लांब रांगा लावण्या ऐवजी मोकळ्या हवेत ॐ उच्चार करून प्राणायाम, योगासने करुन मन व शरीर दोन्ही निर्मळ करा म्हणजे साक्षात देव भेटल्याचा आनंद मिळेल.अशा  विचारांची अंगी जोपासना करा.
देवाला न मानणाऱ्या लोकांना नास्तिक म्हणण्या पेक्षा त्यांचे विचार समजून घ्या. हर एक माणसाची कोणावर ना कोणावर श्रध्दा असते.त्यांचे विचार वैज्ञानिक असू शकतात,वाचन मोठे असू शकते.देव मानणाऱ्याचे देखील अस असू शकते.आपण फक्त यातून अंधश्रध्दा दूर करायला पाहिजे.
उदा.महिलांना मासिक पाळी येणे ही शारीरिक व नैसर्गिक गोष्ट आहे .याचे विज्ञान सांगण्याची मला गरज नाही.पण या काळात तिने देवाला हात लावू नये,मंदिरात येऊ नये हे सर्व अंध कल्पना आहेत.मासिक पाळी काळात तिने एका जागी बसावे,आराम करावा ही गोष्ट ठिक आहे पण तिने गुपचूप ऐकलंच पाहिजे म्हणून देवाची लेबल्स लावून अंधश्रध्दा पसरवीणे कुठेतरी थांबायला पाहिजे.
माझ्या वाचनात एक सुंदर वाक्य आले आहे.संदर्भ आठवत नाही.ते वाक्य असे की,'मला येणारी मासिक पाळी जर श्राप आहे तर तुझे बाप बनणे देखील पाप आहे .' अशुद्ध रक्तातून जन्माला आलेले बाळ तुम्हाला चालते पण त्ता मातेचा स्पर्श नाही चालत.ही आस्तिकता नव्हे तर अंधश्रध्दा ठरते जी की समाजातून दूर करणे गरजेचे व महत्त्वाचे आहे.
लिहायला गेली तर कागद कमी पडेल. प्रत्येकाची विचार करण्याची पातळी वेगवेगळी असते आस्तिक व नास्तिक या चक्रव्युव्हात अडकण्यापेक्षा माणुसकीने जपून वागा,नात्यांना प्रेमाने बांधले पाहिजे.एकमेकांना मदत करून एक विकसित भारत घडविण्याचे दृष्टीने प्रयत्न करा.धर्म,जात,देव आस्तिक नास्तिक इत्यादी वादात न अडकता विचारांच्या प्रगल्भतेने माणसाच्या बुद्धीला लागलेले अंधश्रध्देचे ग्रहण दूर करु या.
एखादी गोष्ट कोणावरही लादण्यापेक्षा समजून सांगणे जास्त फायदेशीर ठरते.तात्पर्य  आज आस्तिकपणा-नास्तिकपणा करण्यापेक्षा माणसाला माणूसकीने साथ देणे ही काळाची गरज आहे.


Source:- INTERNET
-संदीप बोऱ्हाडे,
 पुणे

   आस्तिक आणि नास्तिक यांच्या दोन सोप्या व्याख्या आहेत देवाला जे मानतात ते आस्तिक आणि जे मानत नाहीत ते नास्तिक...सर्वसाधारण जे जन्माला येतात ते अस्तिकच असतात अस मला वाटत. कारण मी सुद्धा अस्तिकच होतो लहानपणी आजी , आजोबा
आई , वडील यांनी अनेक देवाच्या गोष्टी कथा सांगितल्या आणि हेच सगळे खरे आहे असा माझा विश्वास...परंतु जसेजसे वाचन आवडू लागले आणि अनेक पुस्तके वाचली तेव्हा मला या सगळ्या गोष्टींचे कोडे सुटले.
आजच्या दिवसाला मी या सगळ्या भाकड, काल्पनिक कथा मानतो. कारण आज मी एक नास्तिक आहे..मी कोणत्याही धर्माला देवाला मानत नाही मानवता हाच माझा धर्म आणि माणुसकी हाच माझा देव..मला तरी भविष्यात निधर्मी म्हणून मरायचे आहे..
   मी नास्तिक आहे म्हणजेच जगावर आणि या जगातला एक घटक म्हणून माझ्यावर एखाद्या दैवी शक्तीचे नियंत्रण आहे.
ती दैवी शक्ती व्यक्तीच्या आयुष्यात चांगले वाईट बदल घडवू शकते हे मला मान्य नाही. व्यक्ती आयुष्यात घडते किंवा बिघडते ती त्या व्यक्तीला उपलब्ध असलेल्या संधी आणि त्या संधीचा फायदा करून घेण्याची व्यक्तीची क्षमता या दोन घटकांमुळे. व्यक्तीच्या कर्तृत्वामध्ये कोणताही देव आणि दैव या घटकांचा यत्किंचितही संबंध नसतो. मन, मेंदू आणि मनगटावर माझा विश्वास आहे म्हणून मी नास्तिक आहे.
  सध्या धर्माचा मोठा सुळसुळाट तयार झाला आहे हिंदू,  मुस्लिम , इसाई या सगळ्याच धर्मातील लोक माझा धर्मच कसा श्रेष्ठ यांसाठी चढाओढ करताना दिसतात.. होय मी “नास्तिक” आहे... कारण आस्तिकांना मी देव-धर्म-जात-पात या निरर्थक मुद्द्यांवर भांडताना पाहतोय...इतिहास जर पहायचा झाला तर भारत पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांची विभागणी धर्माच्या नावावरच झाली..,,गोध्रा हत्याकांड, शिखांची कत्तल, अजूनही खूप उदाहरणे आहेत की धर्माच्या देवाच्या नावावर आजही अनेक लोकांच्या कत्तली केल्या जातात..आणि जे धर्मग्रंथ आहेत त्यापासूनच सुरवात होते एकमेकांच्या कत्तली करण्यासाठी तुम्ही गीता ,कुराण किंवा बायबल वाचा..सगळे धर्मग्रंथ आणि देव यांनी मनुष्यासाठी काय केले आहे..मनुस्मृती आणि शरियत हे दोन धर्माची पुस्तके वाचा किती भयानक प्रथा आहेत.
माझे स्पष्ट आहे की , माणसानेच देव आणि धर्मग्रंथ यांची निर्मिती केली आहे आपले पोट भरण्यासाठी...अज्ञानामुळे देवाची इतकी भीती घालून दिली आहे लोकांच्या मनात की भीतीनेच आजचा मनुष्य त्याचा गुलाम झाला आहे..33 कोटी देवांचे मला विशेष वाटते मला 33 देवांची तरी नावे सांगू शकाल का कोणी एकाच तरी पूर्ण नाव आहे का ?? अल्लाला देखील कोणीही पहिला नाही. माझ ठाम विश्वास आहे कोणतीही व्यक्ती ही आईच्या गर्भातूनच जन्म घेते.. बाकी देवांचे मला विशेष वाटते कोण आभाळातून आलाय , कोण जमिनीतून , कोण पाण्यातून , कोण नाकातून , हातातून पायातून , आणि अजूनही खूप काही.
   पोथ्या, पुराणे, ग्रह ,कुंडल्या ,
मुहूर्त , चमत्कार,  जात , पात , आणि धर्म यावर माझा काडीमात्र विश्वास नाही . कशाला हवेत ओ हे ..देव आहे तर शेतकरी आत्महत्या करतात , अगदी 2 महिन्याच्या निरागस लहान मुलीवर बलात्कार होतो..कित्येक अपघात होतात देवाला जाताना सुद्धा, आतंकवादी हमले होतात , कित्येक लोक उपाशी दररोज झोपतात, कित्येक लढाया आणि आतंकवाद याच्याच नावाने सुरू आहे, यांच्यासाठी देव का नाही काही करत?? कुठे आहे तो ??
होय, मी नास्तिक आहे कारण मी देवाला नाही तर देवाच्या अस्तित्वाला मानत नाही. पण म्हणुन देव नाही असं मी म्हणत नाही. हो देव अाहे. देव अनाथ लेकरांमध्ये आहे. देव गरीबांमध्ये आहे. देव भुकेल्यामध्ये आहे. देव पिडीतांमध्ये आहे. देव प्राण्यांमध्ये आहे. देव गरजवंतात आहे. देव जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे. त्यांची सेवा करणं किंवा त्यांच्या गरजेला उपयोगी पडणे हीच खरी देवाची भक्ती आहे. देवाचं अस्तित्व इतस्ततः पसरलेले असताना आपण मंदिरात का शोधावे त्याला?
आणि सगळ्यात महत्वाचे देव निसर्गामध्ये आहे.. 80 टक्के नोबेल पारितोषिक हे नास्तिक असलेल्या लोकांना मिळालेले आहेत. चार्वाक, गौतम बुद्ध , स्टीफन हौकींग , भगतसिंग असे अनेक नास्तिक महान पुरुष होऊन गेले. तुम्ही विचार तर करा?? की खरच अस असेल का हे होईल का?? तर्क लावायला शिका.. बहुतेक विकसित देश हे नास्तिक आहेत नाहीतर धर्माच्या नावावरील देशांची स्थिती तुम्ही पाहताच आहात. आणि हो देशापेक्षा कोणताही धर्म आणि संविधानपेक्षा कोणताही धर्मग्रंथ मोठा नाही. वास्तव स्वीकारा मित्रांनो वास्तव..आणि मी नक्कीच इथे सांगू इच्छितो की भारताला नास्तिकतेची खुप खूप गरज आहे.

मला टायम नाही….मग नक्की तुझा वेळ जातोय तरी कुठं ?? (भाग:-२)


🌱वि४🌿  या व्हाट्सअप ग्रुप वरून

मला टायम नाही….मग नक्की तुझा वेळ जातोय तरी कुठं ?? (भाग:-२)


Source: Internet
अश्विनी कटकेमोड,नांदेड:
वेळ  हा शब्द  कानी पडताच  मला विश्वास नागरे पाटलांनी म्हटलेली कविता आठवते.                          'To realize the value of TIME'               आपण जर वेळेच महत्त्व  जाणल तर आपल्याला 'मला टायम नाही'  अस म्हणण्याची वेळ  येणार नाही. आयुष्य जस चाललय तस भरकटत जाऊ देण्यापेक्षा त्याला वेगळ वळण देण महतवाच असत.  नाहीतर आपल्या लोकांना जेव्हा आपली खरी गरज असती तेव्हा आपल्यावर 'टायम नाही'  अस म्हणण्याची वेळ येती.  उदाहरणच घायच झाल तर आई-वडिलासाठी आपल्याकडे  वेळेच्या नियोजना अभावी टायम नाही भेटत.                      आपण शिकत राहतो,  शिकत राहतो,  आणि शिकतच राहतो.  पण नौकरी मिळत  नाही  आणि आपला इथपर्यंत प्रवास  होईपर्यंत  आई-वडिल थकतात.  जेव्हा ते थकतात  तेव्हा आपण  नोकरीच्या  शोधात  लागतो.. आणि जेव्हा  ते  जास्त थकतात  तेव्हा आपण office च्या कामात किवा घर-गृहस्थी मध्ये  जास्त  व्यस्त  होतो.                              त्यामुळे आपण जेही करतोय  ते  गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे. जेणेकरून आपल्याला  योग्य वेळेत योग्य  गोष्टी  करायला  भेटतील  आणि खंत करण्याची,  टायम नाही भेटला,  'टायम नाही',  अस म्हणण्याची वेळ नाही येणार. म्हणून म्हणतात  योग्य  गोष्टी  योग्य  वेळेतच  छान वाटतात. मग ते लग्न  असो का नौकरी.  जेव्हा  वेळ  निघून गेलेली  असते तेव्हा  अनेक  जबाबदार्‍या  अंगावर  पडलेल्या  असतात.  नौकरी,  घर - दार,  आई-वडिल,  लेकर मग फक्त उरती ती खंत..  त्यामुळे  युवकांनी वेळेचा फायदा गायला हवा.  ते म्हणतात  ना वेळेच सोन करा.  ते करायला हव व हे वाक्य  विसरायला हव 'मला  टायम नाही'  मग आपोआपच  आपला टायम  जातोय कुठे  हे भविष्यात जाणयला सोयीस्कर  जाईल.


सूरज शेवाळे,मुंबई:
वेळ रात्री 9 ते 10 च्या दरम्यान जेवण करून पाय मोकळे करावे म्हणून गच्चीवर शतपावली करत होतो, डोक्यात उद्याच्या दिवसाचे नियोजनाचे विचार सुरू होते, अचानक कशात तरी पाय अडकला आणि चांगलाच पालथा झालो😣😣😣
कुठे काय आणि किती लागलाय याचा हिशोब करत सावरतोय तोच लक्ष गेलं आभाळाकडे
.
.
.
आणि दिसले सप्तर्षी , ध्रुव , शुक्रतारा , लाखो चांदण्या असे एक एक समोर दिसले आता उठू वाटत नव्हतं पार हरवून गेलो त्यात
.
.

नुसतं त्यांच्या कडे बघत राहिलो
.
.
मनाला वाटलं एवढे दिवस का नाही पडलो ?

 उत्तर आले तुलाच वेळ नव्हता म्हणून 😊

Source: Internet

अमर चिखले,पुणे:
          आयुष्यात अगदी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति बिलगेट्स जरी असला तरीही त्याला दिवसाचे चोविसच तास भेटतात आणि सर्वसामान्य माणसालाही. मग आपला वेळ जातो तर नेमका कुठे? जो योग्य व्यवस्थापन करतो तो यसस्वी होतो. आणि असे म्हणतात की जे लोक म्हणतात माझ्याजवळ थोडा पण वेळ नाही परंतु त्या व्यक्ती विचलीत असतात वेळ त्यानां व्यवस्थापित करता येत नाही म्हणून ते असे म्हणतात.वेळ हा फक्त पैसे कमवण्यासाठी जात आहे परंतु फ़क्त पैसे कमवणे म्हणजे आयुष्य नसून निरोगी आयुष्य सुध्दा कमवता आले पाहिजे.परंतु आपण मात्र व्यवस्थेला दोष देतो की आपणाला सुविधा मिळत नाही म्हणून परंतु आपण आपला किती वेळ योग्य खर्च करतो त्याचा आपला आपणच विचार करावा . नेपोलियन वेळेच महत्त्व जाणू शकला नसता तर आदर्श सेनापती कधीच झाला नसता.
वेळेची तुलना पैश्याशी कधीच होऊ शकणार नाही कारण पैसे परत भेटतील पण वेळ नाही परत केव्हाच भेटू शकणार . आपला वेळ जास्त मोबाईलवर जातोय तसेच मालिका पाहण्यात जात आहे .परंतु जर वेळेचे योग्य व्यवस्थापण केले तर तशीच एखादी मालिका तुमच्या पण यशस्वी जीवनावर निघू शकेल .
           

Source: Internet


जयंत जाधव,लातूर:
मला माझ्या दहा वर्षाच्या भाचीने व्हाॕटस् अॕपवर पाठविलेला सर्वात सुंदर संदेश-
‎" सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही..
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही..
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही..आणि
सगळ्यांची नावं मोबाईलमध्ये नोंद आहेत.. पण;
चार शब्द बोलायला वेळ नाही."
मला वेळ नाही ह्या शब्दाचा एखाद्या ढाल सारखा वापर करायला लोक  शिकले आहेत.सर्वत्र वेळ नाही हा शब्द सहज कोणी पण वापरतात विशेषतः जवळचे मिञ,नातेवाईक.आपण किती व्यस्त आहेत हे दाखविण्यासाठी सतत मोबाइलवर बोलणे.ही बाब एक प्रकारे स्टेटस सिंबाॕल ठरला आहे .आपल्या जवळ वेळ नाही म्हणजे आपण खूप व्हि.आय.पी-महत्वाचे झालो हा गोड-गैरसमज आज चटकन पसरत आहे. दूसरी बाजूस अशी स्पष्ट करावी वाटते की आजच्या धावपळीच्या युगात सगळी कडे कामाचा व्याप खूप वाढला आहे.कार्यालयीन व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतांना समतोल साधता येत नाही म्हणून मला वेळ नाही असे म्हणणे स्वतःला फसवण्या सारखे आहे.कामाचे क्षेत्र कोणतेही असो तिथे चांगला पोशाख व वागणे हे ओघाने आलेच.जर असे नाही  झाले तर ते चुकीचे ठरेल.आज जग बरेच बदलले आहे.ह्या वर पुढील उपाय करून पाहता येईल - काही दिवसासाठी तुम्ही स्वतःचा वेळ खरोखर कसा घालवता यांच्या नोंदी लिहून ठेवा. निश्चितपणे तुम्हाला नवल वाटेल. टीव्ही पाहणे, इंटरनेटवर, चित्रपट पाहण्यात, फोनवर बोलण्यात, मित्रांना भेटण्यात तुम्ही किती वेळ घालवता? आता, तुम्ही ठरवलेल्या महत्त्वाच्या गोष्टींशी ही डायरी तपासून पाहा. तुम्हाला काय दिसते? कदाचित तुम्हाला फक्‍त टीव्ही पाहणे, फोनवर बोलणे, किंवा वेब-सर्फींग अशा सवयींचा विचार करावा लागेल आणि या गोष्टींमधूनच भरपूर वेळ काढता येईल!
थोडक्यात  नियोजन करुन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या त्याला  प्रथम प्राधान्य दया.याचा अर्थ तुम्ही टीव्ही पाहू नका किंवा वैरागी बना असे  अजिबात नाही. एवढेच की तुम्हाला “महत्त्वाच्या गोष्टी प्रथम” ह्या वचनाचे पालन करावे  लागेल.
At times you will feel your loved ones' presence. They may come to ... But the most important thing for you to know is that your loved ones want you to enjoy life.


Source: Interne
ज्ञानेश्वर तात्या टिंगरे,उस्मानाबाद:
नाही खरंच मला टायम नाही हो., मी गुंतवून घेतलं आहे स्वतःला माझ्या आभासी जगात मला माहिती नाही ते किती खरं किती खोटं आहे अन दुसरं म्हणजे मला त्या फंदात पण पडायला आवडत नाही.
नोकरी घर व ठराविक लोक यांच्या पलीकडे मला काही बघायला वेळ नाही.. तसा वेळ मिळतो पण मला तो देऊ वाटत नाही कारण मला फक्त आणि फक्त माझं दिसतं, दुसर्याच्या जीवनात डोकावून मला काय मिळणार आहे अन जर डोकावून पाहिलं तर मला ते काय देणार आहेत त्यांच्या समस्या सोडवल्या म्हणून ते मला थोडंच देवमाणूस म्हणून संबोधित करणार आहेत.
अन शेवटी मला देवमाणूस कोणी म्हटलं तरी आजकाल देवमाणूस कसा राहतो हे मी बघितलं आहे त्यामुळे मला ते उपकार बीपकार नकोत कोणाचे ,पाप पुण्याच्या भानगडीत मला नाही पडायचे.
झटपट श्रीमंत होता येतं का ? मला मान देणारे लोक आहेत का तिथं, माझ्या कुटुंबाला काही फायदा आहे का तुमच्या बोलण्याचा, का उगाचच नादी लावताय आम्हांला ?
तसा तर माझं निम्मं आयुष्य करिअर बनवण्यासाठी खर्च झालंय पुरती वाट लागता लागता राहिली आहे माझी नका सांगू मला टायमाचं, ?
माझ्या मित्रानं माझ्या मागून बंगला बांधला 2 कोटीची गाडी घेतली, मला अक्षरशः लाज वाटते मी अजून नवीन चार चाकी घेऊ शकलो नाही, ना नीट बंगला,
मला हे सगळं उभा करायच आहे काहीपण करून समजलं ?
माझं लग्नाच्या अगोदर सगळा टायम फालतू गोष्टीत गेला नको त्या ठिकाणी नको त्या वेळी मी तिथे जास्त खर्च केला मग तो वेळ असो की पैसा त्याची फळं मी आज भोगतोय.
कॉलेज जीवनात करियर घडवायचे सोडून आगाऊ शहाणपण केलं आख्खी जवानी वाईट कामासाठी खर्च केली त्यामुळे नाही आता वेळ मला कसलाही.
धावत्या जगात मला माझं अस्तित्व निर्माण करायचे आहे अन ते पण लोकांनी नाव काढलं पाहिजे नुसतं बघत राहिली पाहिजेत माझ्या बंगल्याला अन माझ्या गाडीला.
त्यो समाज, सेवा, परोपकारी वृत्ती ह्या गोष्टींचा मला लय झिट येतो बघा.
माझ्या स्वतःच्या आईबाबांना मी गावाकडं ठेवलं आहे कालांतराने त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा मी विचार करतोय अन तुम्ही मला समाजाचं सांगत आहात, खूळ लागलंय व्हय तुम्हाला,?
जावा तिकडं मला नाही असलं विचार करायला टायम बियाम..  



Source: Internet

प्रवीण दाभोळकर परळ ,मुंबई:

'नाही रे, ते करायला मला वेळ नाही मिळाला'..आपण सहज बोलून जातो आणि ही पण वेळही अशीच मारून नेतो. हळूहळू याची सवय होऊ लागते. लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात तेव्हा खाडकन जाग येते. काहीतरी चुकतंय..वेळापत्रक बिघडलय..आपल्यालाच जाणवू लागतं आणि आपण कामाला लागतो.

वेळ नाही असं म्हटलं की प्रश्न तिथेच संपतो, तो समोरच्यासाठी..आपल्या मनाला कधी विचारून पाहिलं का? खरंच मला वेळ नव्हता? मग काय केलं मी?  

आपली यादी तयार होते. तेव्हा कळत ज्या गोष्टींसाठी वेळ देण्याची तशी फारशी गरज नव्हती तिथेच खूप वेळ घालवला आपण. ते काम महत्वाचं अशी मनाची समजूत आपणच काढल्याच आपल्याला आठवत. अनेकदा "भावनिक" होऊन काम केल्याच आठवत. भावनेला वेळेत आणि पैशात मोजता येत नाही.

सर्व सुखसुविधा असणारा विद्यार्थी नापास होतो, त्यावेळी कामाधंदा समभाळून शिकणारा पहिला येतो. "कामाची ओढ, तळमळ" किती हे यातून दिसत.

"कमिटमेंट" हा शब्द दुधारी तलवारी सारखा काम  करतो. शब्दाला जगल्याने एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते. नाही जागल्यास काय होत याचा अनुभव प्रत्यक्षात घ्यावा.

प्रत्येक वर्ष ३६५ दिवसांनी भरलेलं कॅलेंडर घेऊन येत. जे सर्वांसाठी सारख असत. नवा संकल्प सर्वच करतात पण काही दिवसांनी त्याचा "प्राधान्यक्रम" बदललेला असतो. उदाहरण प्रत्येकाने आपापली ठरवावीत.

सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच शरीर, मन निरोगी, उत्साहित रहावं यासाठी दिवसातून किती वेळ देतो हे ठरवावं. "स्वयंशिस्ती"नंतर कुटुंब, नोकरी, समाज हे ओघाने आलंच.

सर्वांना सर्वच गोष्टी करायच्या असतात. पण प्रत्यक्षात ते शक्य नसतं. थोडक्यात काय तर आपण प्राधान्य, महत्व कोणत्या गोष्टीला देतो ते महत्वाचं. याच "वेळापत्रक" आखल तर मला वेळ मिळाला नाही हे सांगण्याची वेळ येणार नाही.


Source: Internet

R. सागर:

21व्या शतकात प्रवेश करता करता विज्ञानाने बऱ्याच गोष्टी साध्य केल्या. अगदी कुठलीही गोष्ट कधीही सहजपणे उपलब्ध होऊ शकते असा विश्वास दिला. पण हे होत असतानाच काही गोष्टी मात्र हरवत चालल्या. आजकाल सगळीकडे ऐकायला मिळणारं वाक्य म्हणजे 'वेळच मिळत नाही..' खरंच मला वेळ नाही या वाक्यात तथ्य आहे का? मला वेळ नाही या वाक्यामध्येसुद्धा दोन प्रकार आहेत. एक मला खरंच वेळ नाही, मी खूप व्यस्त आहे. आणि दुसरा म्हणजे माझ्याकडं वेळ आहे पण तो तुझ्यासाठी नाही कारण मी माझ्या वेळेनुसार प्राधान्यक्रम ठरवला आहे आणि त्यामध्ये तू कुठंच नाहीस.
.
सध्या मी नोकरीनिमित्त बाहेर राहतोय. तरीही महिन्यातून 2-3 वेळा घरी जाणं घडतंच. गावाकडं गेल्यावर दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळी निवांतपणे कधी बाहेर पडलोच तर कुठेतरी कट्ट्यावर 4 वयस्कर मंडळी बसलेली दिसतात. कधी त्यांच्याबद्दल विचार केला की लक्षात येतं की गेल्या कित्येक वर्षांपासून हा त्यांचा नित्यक्रम आहे. जेव्हा घरच्या जबाबदाऱ्या होत्या, कामात व्यस्त असायचे तेव्हाही आणि आताही.. कुणाकडेही आणि कुठलाही कार्यक्रम असू दे तिथे न चुकता हजर राहणाऱ्या त्यांच्या पिढीकडे बघितलं की प्रश्न पडतो की जर ते इतक्या वर्षांपासून आपले सगळे व्याप सांभाळून एकमेकांना सुख-दुःखात वेळ देत असतील तर आपल्याकडेच एकमेकांसाठी वेळ का नाही?
.
कदाचित आपल्याकडे वेळ नसण्यामागचं कारण हेही असेल की आजच्या स्पर्धेच्या वातावरणात भौतिक सुखाच्या शोधात फिरत असताना आहे त्यात समाधानी राहण्याची वृत्ती हरवत चाललीय. दुसऱ्याची प्रगती होत असताना कुठेतरी त्याच्याही पुढे जाण्याची सुप्त इच्छा आपल्याला खुणावत असते. त्यामुळेच वेळ असला तरी वेळ नाही असं भासवायचा प्रयत्न केला जातोय. त्यातच भरीस भर म्हणून मोबाईल हातात आलाय. त्या माध्यमातून सोशल मीडिया च्या आभासी दुनियेत आपण एकमेकांच्या खूपच जवळ वावरत असतो. तिथेही आपला बराच वेळ खर्च होतो. त्यामुळेही असेल आपण एखाद्याला प्रत्यक्ष वेळ देऊ शकत नाही.
.
काहीजण मात्र त्यातूनही वेळ काढून आपलं कार्य करत राहतात. त्याचंच उदाहरण म्हणजे आपली admin team. प्रत्येक आठवड्यासाठी नवीन विषय शोधणं, त्या विषयावर येणाऱ्या सगळ्या पोस्ट एकत्रित करून त्याचा ब्लॉग बनवणं हे सगळं काम ही team वेळात वेळ काढून करत असते. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्या कामातील सहकार्यासाठी आज ग्रुपवर सौदागर सरांची पोस्ट आली होती. ग्रुपमधलं कोणी आपल्या ब्लॉगसाठी योगदान देऊ इच्छित असेल तर तसं कळवा असं त्यांनी म्हटलं होतं. पण इथेही पुन्हा तेच. वैयक्तिक माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर खरंच माझ्याकडं तितका वेळ नाही याची जाणीव मला झाली त्यामुळं त्या पोस्टला इच्छा असूनही प्रतिसाद नाही देता आला.


Source: Internet

 -अभिजीत गोडसे,सातारा:

         पृथ्वीवर माणव प्राणी हा विचार करणारा प्राणी आहे . या बुद्धीजीवी माणवाणेच काय ती प्रगती केली आहे . माणवाचे आयुष्य जेमतेम ७० ते ९० वर्षे आहे . या छोट्याशा आयुष्यात माणवाला सर्व काही करायच आहे . आपली ध्येय , आपली  स्वप्न पुर्ण करायची आहेत . या छोट्या आयुष्यात थोडा तरी इतिहास पुढील पिढीला ठेऊन जायच आहे . आणि या सर्वांनसाठी महत्त्वाचे आहे. ती म्हणजे वेळ. वेळच गणित जमने म्हणजे ऐक प्रकारे कौशल्यच! आणि म्हणूनच आपल्याला सारखा  काणावर पडनारा शब्द म्हणजे मला टायम नाही ...

       आयुष्यात वर्षाचे बारा महीणे आणि रोजच्या दिवसराञी चे चोवीस तास हे प्रत्येकाला सारखेच . अगदी अलीकडे पहायल गेले तर देश स्वतंञ झाला तेव्हा गांधी , आंबेडकर , नेहरू इ. महामाणवानां आणि असख्य कार्यकर्ते यांना ही चोवीस तासच होते . जगाचा विचार केला तर अमेरिका , जपान , चिन , रशिया अशा प्रगतीशील देशांनाही चोवीस तासच होते . ज्यांनी इतिहास घडवला , मोठ - मोठे शोध लावले , वौविध्य पुर्ण  आसे काम केले या सर्वांना तेवढाच वेळ होता जेवढा आत्ता आपल्या आहे . मला वाटते वेळच गणित हे व्यक्ती नुसार बदलते .आणि व्यक्ती सुद्धा वेळेनुसार बदलते . आज जेष्ठ व्यक्तीला वेळ जात नाही आणि तरुण युवकाला वेळ पुरत नाही . ज्यांच डोक रिकाम आहे त्याला वेळचवेळ आहे .. जो धेय्यान झपाटलाय त्याला वेळ नाही .. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी असते . तसेच त्याचा 'वेळ' ही प्रत्येक वेळी वेगवेगळा असावा ! नक्कीच त्या परिस्थिती मधे मला टायम नाही हे वाक्य तो म्हणत असेल किंवा म्हणत नसेल ही ....

        आजच्या स्मार्ट जमाण्यात कुणालाच वेळ नाही असे वेळोवेळी होत आहे . अनुभवतो आहे . धावत्या जगा बरोबर स्पर्धा करता करता सर्वच मेटाकुटीला आले आहेत . पन एक वर्षीचे , एक महिन्याचे , एक आठवड्याचे , एक दिवसाचे , एका तासाचे नियोजन पुर्वीक वेळापञक केले तर नक्कीच मला टायम नाही हे वाक्य उच्चारने कमी होईल .

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************