अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-१)

🌱 वि४🌿या व्हाट्सअप ग्रुपवरून
अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-१)


Source:- INTERNET
-किरण पवार,
औरंगाबाद

याविषयी मला ठामपणे सांगायच आहे ते म्हणजे आपल्याला नास्तिकतेची गरज आहे. कारण *आस्तिक असण तुमच्यातल कुतूहल नष्ट करून टाकत.* कुतूहल एका प्रकारे जिद्दीचा उगम असतो. नास्तिकता प्रश्नांना पुरक आणि पडताळणीची उत्तरं शोधते.
          आजवर जेवढी आस्तिक लोक पाहिली तेवढ्यांमुळे नाहक अअंधश्रद्धेचे बळी पाहिले. धर्माच्या नावाखाली अन्याय पाहिला. आस्तिक लोकांना इतरांच स्वातंत्र्य हिरावून घेताना पाहिल. *खर तर आस्तिक लोकांना सर्व गुन्हे मी लेबलींगच्या नावाखाली करतानाच आजवर पाहिलं.*


Source:- INTERNET
-अनिल गोडबोले,
सोलापूर

हा प्रश्न मला खूप वेळा पडत आला आहे. नेमकं अस वातावरण आपल्या आजूबाजूला असत की आपण सरळ सरळ धार्मिक असाव अस वाटत... एखादा सण किंवा समारंभ होत असेल तर अस वाटत की देव आहे, हे एवढे लोक जर छाती ठोकून अनुभव आला आहे असं सांगतात तेव्हा नक्कीच आपण आस्तिक व्हायला पाहिजे... व्हायला पाहिजे काय... आहोतच आपण..
ते सण, घरात येणारे लोक, प्रसाद च्या नावाखाली विविध पदार्थांची रेलचेल, उदबत्त्यांचे वास, आरती चे स्वर, भजनातील तल्लीनपणा... हे सगळं आवडत. चांगलं असण्याची ताकद आहे असं वाटत जात..
तसेच उलट भूत, वाईट शक्ती, यांच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी, नशिबाच्या खेळावर मात करण्यासाठी अस्तिकता असल्याशिवाय पर्याय नाही असं मतच होत माझं....

आणि मग एक माणूस भाषण देताना, लेख लिहिताना किंवा शाळेत शिकलेला विज्ञानाचा संदर्भ देऊन संभाषण (वाद विवाद नव्हे) करू लागतो.. आणि आपल्याला ते पटत जात. मनात आत कुठेतरी हालत जात सगळं, केवढं मोठं असत्य आपल्या गळ्यात मारलं जात आहे, आणि ते पण किती पद्धतशीर पणे.. दाभोलकर खरे वाटायला लागतात.. भगतसिंग वाचताना आपलं मनच म्हणत... अरे हे तट खर आहे की, मग शोधत शोधत जाताना लेनिन, मार्क्स, अगदी प्रोटेस्टंट करणारा मार्टिन ल्युथर पासून अगदी थेट चार्वाक पर्यंत गाडी येऊन पोहोचते.
मधेच नास्तिक मेळावे काय भारतात, मध्येच एखादं राष्ट्र निधर्मी असून त्यांचा gdp आणि समाधानाने जगण्याची वृत्ती भन्नाट आहे असं कळत आणि ते पण बरोबर वाटायला लागतं
बुद्ध, महावीर, बसवेश्वर यांच्या पासून काल परवा पर्यंतच्या गाडगे बाबा चे विचार योग्यच वाटायला लागतात.
पांडुरंगाच्या चरणी जाणारे संत दाखवताना... हे लक्षात येत की हे नुसतेच शरण गेले नाहीत तर शिकवून गेले आहेत... जगायला..
'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा' अस वाचल्यावर वाटत की हे संत नक्कीच जो पांडुरंग शोधत आहे आणि आमच्या मनातला विठ्ठल हा वेगळा आहे.
मंदिरात जायला , मशिदीत जायला मन नकोच म्हणत, बाप्तिस्मा देऊन भूत काढणार्यांना जाऊन प्रबोधन करावं असं वाटत..
आणि या क्षणाला पुन्हा घरातले मोठे जाणते ज्यांनी आयुष्य बघितलं आहे .... ते सांगतात... 'हात जोड' आणि पुन्हा देव धर्म अस सुरू होत..
कितीवेळा तरी अशी आंदोलन मनात होत असतात.....
मी नास्तिक आहे असं न म्हणता फक्त तशा अर्थाचा मेसेज सोशल मीडियावर टाकला की फोन, मेसेज,... आणि बरच काही.
'एकच सांगतो तुला देव आहे किंवा नाही हे सोड.. विश्वास ठेवा.. देव तुझ्या मनात आहे..
देव असल्याशिवाय तर हा सगळा पसारा कसा चालला आहे?'
असा उपदेश चालू असताना.. कोणीतरी स्टीफन हौकिंग नावाचा माणूस सांगून जातो.... ' देव सोगट्या खेळताना कुठेतरी हरवतो त्या त्यालाच सापडत नाहीत आणि आपण नशीब म्हणून बसलोय....' देव नावाची कोणतीच वस्तू किंवा एनर्जी नाही...
अस बरच काही..... एवढं सगळं होऊन प्रश्न उरतो की ' मी आस्तिक की नास्तिक'
आणि शोध सुरू होत नेमकं काय सत्य आहे.. शेवटी सत्य हेच सापडत की..... दोन्ही बाजूची टोक गाठण्यापेक्षा आपण आपला मधला मार्ग काढावा... त्याबरोबर मनात प्रश्न येतो "ना घर का ना घाट का" अशी अवस्था तर होणार नाही ना आपली....
वाद घालण्यापेक्षा संवाद साधत नाही आपण आपले मुध्ये खरे म्हणून आपल्याच लोकांशी भांडत जातो.... एवढं बोलतो की नंतर भीती वाटते... " माझा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी तर होणार नाही ना?"
काही गोष्टी समजायला लागतात... निरीश्वरवादी तर फार पूर्वी पासून आहेत..
आपणच बऱ्याच गोष्टी एकात मिसळ केल्या आहेत.
नैतिक असण्यासाठी मला देव धर्म करण्याची गरज नाही तर विचार बुद्धी वादी असन गरजेच आहे... जेव्हा बुद्धी प्रश्न विचारते तेव्हा सगळी उत्तर मिळत नाहीत.... मिळत फक्त ' कसं जगावं' या वरच उत्तर..
आनंदी रहा, माणुसकी ठेवा, देव माना किंवा मनू नका पण आपले विचार समोरच्यावर थपवु नका, चुकीच घडत असेल तर आवाज उठवा...
आणि ठणकावून सांगा मला कुठल्याच कट्टरतेची गरज नाही.....मी सगळ्या सोबत इतरांना न दुखवता माझ्या मनाप्रमाणे राहू शकतो...
मी माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असे वागेन...
आता या वागण्याला तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा
मला तर वेगळं काही सांगण्याची गरज वाटत नाही
मला दोन्हीची गरज वाटत नाही.. फक्त ज्या गोष्टी काळाच्या कसोटीवर ज्ञान म्हणून टिकून आहेत... त्या गोष्टी साठी कुठल्याही काल्पनिक गोष्टीवर मला अवलंबून राहण्याची गरज नाही..!!



Source:- INTERNET
-करण बायस,
जि. हिंगोली

आस्तिकता आणि नास्तिकता ह्या दोन संकल्पना आपल्याला आणखी पण गोंधळून टाकतात.
असं म्हणतात अस्तिकता म्हणजे देवपूजा करणे, धर्म ग्रंथात किंवा धर्म गुरूंनी सांगितल्या प्रमाणे धार्मिक कर्मकांडात विश्वास ठेवणे असं काहीतरी आणि नास्तिकता म्हणजे या उलटं.
काही लोक मी किती अस्तिक आहे हे दाखवण्यासाठी पूजाप्रार्थना,गंध,धार्मिक कर्मकांड करणे आणि स्वतःला अस्तिक घोषित करतात.यामागे त्यांचा हेतू असतो तो म्हणजे मृत्यू नंतर त्यांना स्वर्ग पाहिजे असते,मोक्षप्राप्ती हवी असते.
या सगळ्या गोष्टींचा पाया  हे धर्मप्रचारक आहेत.
लोकांना हे धर्मप्रचारक असं पटवून देण्यात व्यस्त असतात की जो देवपूजा करतो, धर्मग्रंथांनी सांगितलेल्या मार्गावर चालतो तोच खरा अस्तिक असतो आणि जो या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक असतो.

आपल्या देशात वास्तवता ही आहे की लोकं मंदिरात जाऊन देवाला सोनं, पैसा दान करतात. त्या लोकांना कोण समजवाव की तुम्ही दिलेला सोनं आणि पैसा हा देवाकडे जात नाही (देवाकडे कशाची कमी असेल की ते आपल्याकडून घ्यायला बसले)ते तिथल्या महाराज आणि संस्थेच्या मंडळाच्या लोकांच्या पोटासाठी जातात.
या धर्मगुरूनी असं पटवून दिलं की जर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे काही केलं नाही तर तुमच्या वर देव नाराज होईल आणि तुमच्या अडचणी आणखी वाढतील.देव लोकांच्या अडचणी का वाढवेल त्याच्यासाठी तर सगळे एक समान आहेत.
देशाला लुटणारे हे लोक आणि पिळून निघणार  म्हणजे शेतकरी, बेरोजगार आणि गरीब लोक.आणि या लोकांनी समाजाची mentallity अशी बनवून ठेवली की हे गरीब लोक सुद्धा त्या धर्मप्रचारकांना नाव ठेवणार नाही.
आपण बघितलं बरेचसे समाजसुधारक असे होते की ते या गोष्टीत(लोकांच्या दृष्टिकोनातून नास्तिक) विश्वास ठेवत नव्हते पण त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला होता मग या समाजसुधारकांना काय म्हणायचे ? या समाजसुधारकांनी समाजासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न केला त्यांना माहीत होतं की धार्मिक कर्मकांड केल्यानं समाजाची प्रश्न सुटणार नाही.या धर्मप्रचारकांनी अशी परिस्थिती करून ठेवली की आपण या समाजसुधारकांना पण आठवत नाही किंवा लोकांपर्यंत त्यांना पोहचू दिलं नाही.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे लोकं एवढ्या श्रद्धेनं देवस्थानवर जातात तिथे पैसे टाकतात आणि म्हणतात आम्ही ते देवाला दिले अरे त्यात तुमचा काय फायदा झाला? सोनं देवाला चढवून काय फायदा झाला? देवाला नारळ फोडून काय फायदा झाला?
इथं शेतकरी आत्महत्या करत आहे, शाळेत मुलांना बरोबर शिकवलं जात नसल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे, वरून हे धर्मप्रचारक तरुण मुलांना भडकवतात आणि देशाचं भविष्य इथंच संपवायचं म्हणजे गरीब लोक गरीब राहावं,बेरोजगार लोक बेरोजगार राहावे!
हे धर्म, जात मानवनिर्मित आहेत आणि मानवांनी देवाला जाती/ धर्मानुसार वाटून घेतले.

आजकाल देवाच्या नावावर लोक पैसे सुद्धा कमवतात,म्हणजे देवाच्या मुर्त्या बनवणे, गणेशोत्सव, नवरात्री मध्ये हे जास्त होते पण कधी विचार केला का पाण्याचं प्रदूषण किती वाढत आहे, कधी विचार केला का पाण्यात राहणाऱ्या जीवनच इथं लोकांना वाटते आम्ही गणेशोत्सव, नवरात्री मध्ये 2-3 वेळा उपावासच खाऊन उपवास केला आणि त्या जीवाला मारून यांना पुण्य भेटणार? या लोकांना उपवास काय असते हे सुद्धा माहीत नाही.
आज तिरुपती ला एवढं सोनं चढवला जातो जर तोच देशाचे काही प्रश्न सोडवण्यात लावले तर काय जाते. जो संत, गुरू आपलं संपूर्ण आयुष्य एका फकीर सारखं राहून जगतो आज लोक तिथं जाऊन सोन्याचं सिंहासन,सोन्याचं छत्र देतात,ते संत जर आज असते तर त्यांनी हे स्वीकारलं असतं का?
आणि असं करून लोकांना वाटते की ते अस्तिक आहेत?

असं म्हणतात की देव हा आपल्यामध्ये(आपले अचेतन मन)आहे, हा देव आपली केलेली प्रत्येक प्रार्थना तो ऐकतो पण ती प्रार्थना अगदी मनापासून असली पाहिजे. आपले चेतन मनात कोणत्याही प्रकारची भीती, संशय नसला पाहिजे आणि  ही फक्त दगडाच्या देवसमोरच केली जाते असं नाही,आपण कोठेही असलो तरी प्रार्थना करू शकतो फक्त त्यात पवित्रता असली पाहिजे ,कोणाच्या प्रति वाईट गोष्टी नसल्या पाहिजे पाहिजे.अशावेळेस आपले अचेतन मन आपल्याला आपले उत्तर नक्कीच देते, हेच सांगण्याचे प्रयत्न संतांनी केले पण लोकांनी त्यांना पण देव बनवून धंदा चालू केला.
आज आपल्यात पण खूप क्षमता आहे आपण सुद्धा प्रगती करू शकतो पण लोकांना या धर्म, जातींनी खूप घट्ट पकडून ठेवलं आहे.

आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे जर प्रगती करायची असेल तर.


Source:- INTERNET
-सीताराम पवार,
पंढरपूर

आस्तिक मणजे  देव (वेद)मानणारे आणिनास्तिक(वेद) देव न मानणारे.आपल्या भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे नास्तिक मध्ये बौद्ध, जैन व चार्वाक याच्या विचारधारेचा समावेश होतो. खर तर म.गांधीजी मनतात "सत्य हाच ईश्वर आहे.स्वयंपूर्ण खेडी,भै  तिकवादाला विरोध, आज अपण यांत्रिकीकरण जगात आहोत, पुन्हा मंतोय जीवनशैली खूप बदलती आहे.त्यासाठी आपल्याला अध्यात्माची गरज आहे,अंतिम ध्येय सुखी-समाधानी जीवन जगणे हेच आहे,एवढी प्रगती होऊनसुद्धा आपण आणखी सुख शोधतोय? म फुलेंनी कोणीतरी निर्मिक आहे असे मानले आहे. मणी नाही भाव देवा मला पाव... अस गाडगेबाबा नि मटले आहे.तसेच नास्तिक विचारधारेतील बुद्ध, जैन विचारात कर्मकांड सोडून इतर बऱ्याच गोष्टी साम्य आहेत, प्रार्थना, विपश्यना, आता तर गावोगावी बुद्ध मूर्ती स्थापन होत आहेत.आत्मिक समाधानासाठी हे उपयोगाचे आहे. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा कर्मकांडाना विरोध केला,मनुन कर्मकांडाशिवाय भक्ती, अध्यत्म,माझा सुद्धा कर्मकांड, नवस बोलणे, याला विरोध आहे मला वाटते मूळ अस्तिकतेत हे नसावं काही स्वार्थी लोकांनी त्यात घुसफाळ असावं.बुद्ध मनतात स्वतःचा दीप स्वतःच बना. संत तुकाराम महाराज मनतात"1वेदांचा तो अर्थ आम्हशीच ठाव।येराणी वाहवा भार माथा।
2 वेद अनंत बोलिला।अर्थ इतुलाची शोधीला।
मूळ वेदांमध्ये कर्मकांड होती का पुन्हा काळानुसार त्यात घुसळली हे कळायला मार्ग नाही. अस्तिकता की नास्तिकता हे मणजे ,तत्वमीमांस की ज्ञानमीमांसा अस होईल, किंवा कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला. खरं तर आपल्या भारतात आस्तिक, नास्तिक दोघेही कडक नियमानुसार शक्यतो वागत नाहीत, आपल्यात विविधत्तेतून एकता आहे.जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन कृष्णमूर्तीनच्या पायाजवळ बसत. अनेक नोबेल विजेते वेडे झाले, आत्महत्या केल्या, कोणी चपला खाल्या,मला कुणाला हिनावायचे नाही पण, मानसिक शांताता, संतुलनासाठी काही गोष्टी मानसशास्त्रही मान्य करते. खर तर खराइशवरवाद आपल्याला वारकरी संप्रदाय कडून शिकायला भेटतो उदा. संत सावता माळी
कर्तव्य कर्म हाच खरा धर्म।
शेवटी ज्याची त्याची गरज वेगवेगली आहे ...


Source:- INTERNET
-सिमली भाटकर,
रत्नागिरी

माझ्या मते आस्तिकपणा व नास्तिकपणा ह्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत.देव देव करणे म्हणजे आस्तिक व न करणे म्हणजे नास्तिक असे अजिबात नाही.देऊळबंद चित्रपटात एक वाक्य आहे ,'परमेश्वर हे मानसाच्या प्रगल्भ बुद्धीला लागलेले ग्रहण आहे.मुळात हे ग्रहण आपण स्वतः लावून घेत असतो.परमेश्वर ही संकल्पना आपणच निर्माण केली व कधी धर्माच्या नावाखाली तर कधी जातीच्या नावाखाली वर्षानूवर्ष जोपासल्या आहेत.
मला माझ्या लेखातून कुणाच्या भावनांचे समर्थन करायचे नाही किंवा कुणाच्या भावना दुखाविण्याचा अजिबात उद्देश नाही.देवाच्या नावाखाली लोकांच्या मनात चाललेले युद्ध व त्यातूनच निर्माण होणारी अंधश्रध्दा यावर मला थोडेसे स्पष्टीकरण द्यायचे आहे.
झाडाचे एक लहान बीज जमिनीवर पडते.मातीत रुजते.त्याला योग्य पोषक वातावरण मिळाले कि अंकुर फुटून त्याचे मोठ्या वृक्षात रुपांतर होते.ह्या क्रियेला कुठली जादू म्हणता येईल का? कुणाकडे आहे  याचे उत्तर ? निश्चितपणे नाही.अगदी असच नात आहे आस्तिक व नास्तिक यामधील. आपल्याला समाजातील देवाचे स्थान किंवा नाव कमी करायचं नाही आणी देवाच्या नावाने चाललेला अंधश्रध्देचा काळाबाजार देखील थांबवायचा आहे.
राम,रहिम येशू हे एकच आहे व त्यांची शिकवण देखील सारखीच आहे.माणसाने विचारांनी मतभेद निर्माण केली,त्यातून वादविवाद,भांडणे सुरू झाली.मुळात विचारांची पातळी जशी उंचावते तसे माणसाचा समजूतदारपणा,त्याची परिस्थिती सभोवतालचे वातावरण व सर्वात महत्त्वाचे त्याची सकारात्मक विचार करण्याची पध्दती ,योग्य अयोग्य काय हे जाणून घेण्याची प्रवृत्ती  प्रगल्भ होते.
उदाहरणार्थ भाविक  लोक देवाला फुले,मोठ्या देणग्या घेऊन हजारो मैलांचा प्रवास पायी चालत देवस्थानात येतात. पण त्या ठिकाणी पाच मिनिटे देखील स्तब्ध उभे राहून आपल्या लाडक्या देवाला बघता येत नाही.कुत्र्याला हाकलून लावतात तसे दलाल भडवे भक्ताना मंदिरातून लवकर बाहेर काढतात .कित्येक वेळा चेंगराचेंगरीत भाविक यांचा मृत्यू होतो.येथे मानसाच्या बुद्धीमत्तेची दया येते व विचारांचा कस लागतो.देवस्थान गर्भ श्रीमंत होत आहे तिथे माणसांची गर्दी वाढते.पण अनाथाश्रम,वृध्दाश्रमातील लोकांना जगवण्यासाठी  इत्यादी ठिकाणी मात्र कुणी पुढं येत नाही.त्यासाठी बुद्धी व विचार असावे लागतात.
देवाला मानावे नक्की माना पण श्रध्देने. आपल चांगले होत नाही म्हणून लिंबू मिरची दूस-याचे दारात फेकणे हे सर्व प्रकार वाईट आहेत.ही श्रध्दा नाही,तर त्याला  वाईट भावना म्हणतात.दोन तासभर मंदिरात दर्शनासाठी लांब रांगा लावण्या ऐवजी मोकळ्या हवेत ॐ उच्चार करून प्राणायाम, योगासने करुन मन व शरीर दोन्ही निर्मळ करा म्हणजे साक्षात देव भेटल्याचा आनंद मिळेल.अशा  विचारांची अंगी जोपासना करा.
देवाला न मानणाऱ्या लोकांना नास्तिक म्हणण्या पेक्षा त्यांचे विचार समजून घ्या. हर एक माणसाची कोणावर ना कोणावर श्रध्दा असते.त्यांचे विचार वैज्ञानिक असू शकतात,वाचन मोठे असू शकते.देव मानणाऱ्याचे देखील अस असू शकते.आपण फक्त यातून अंधश्रध्दा दूर करायला पाहिजे.
उदा.महिलांना मासिक पाळी येणे ही शारीरिक व नैसर्गिक गोष्ट आहे .याचे विज्ञान सांगण्याची मला गरज नाही.पण या काळात तिने देवाला हात लावू नये,मंदिरात येऊ नये हे सर्व अंध कल्पना आहेत.मासिक पाळी काळात तिने एका जागी बसावे,आराम करावा ही गोष्ट ठिक आहे पण तिने गुपचूप ऐकलंच पाहिजे म्हणून देवाची लेबल्स लावून अंधश्रध्दा पसरवीणे कुठेतरी थांबायला पाहिजे.
माझ्या वाचनात एक सुंदर वाक्य आले आहे.संदर्भ आठवत नाही.ते वाक्य असे की,'मला येणारी मासिक पाळी जर श्राप आहे तर तुझे बाप बनणे देखील पाप आहे .' अशुद्ध रक्तातून जन्माला आलेले बाळ तुम्हाला चालते पण त्ता मातेचा स्पर्श नाही चालत.ही आस्तिकता नव्हे तर अंधश्रध्दा ठरते जी की समाजातून दूर करणे गरजेचे व महत्त्वाचे आहे.
लिहायला गेली तर कागद कमी पडेल. प्रत्येकाची विचार करण्याची पातळी वेगवेगळी असते आस्तिक व नास्तिक या चक्रव्युव्हात अडकण्यापेक्षा माणुसकीने जपून वागा,नात्यांना प्रेमाने बांधले पाहिजे.एकमेकांना मदत करून एक विकसित भारत घडविण्याचे दृष्टीने प्रयत्न करा.धर्म,जात,देव आस्तिक नास्तिक इत्यादी वादात न अडकता विचारांच्या प्रगल्भतेने माणसाच्या बुद्धीला लागलेले अंधश्रध्देचे ग्रहण दूर करु या.
एखादी गोष्ट कोणावरही लादण्यापेक्षा समजून सांगणे जास्त फायदेशीर ठरते.तात्पर्य  आज आस्तिकपणा-नास्तिकपणा करण्यापेक्षा माणसाला माणूसकीने साथ देणे ही काळाची गरज आहे.


Source:- INTERNET
-संदीप बोऱ्हाडे,
 पुणे

   आस्तिक आणि नास्तिक यांच्या दोन सोप्या व्याख्या आहेत देवाला जे मानतात ते आस्तिक आणि जे मानत नाहीत ते नास्तिक...सर्वसाधारण जे जन्माला येतात ते अस्तिकच असतात अस मला वाटत. कारण मी सुद्धा अस्तिकच होतो लहानपणी आजी , आजोबा
आई , वडील यांनी अनेक देवाच्या गोष्टी कथा सांगितल्या आणि हेच सगळे खरे आहे असा माझा विश्वास...परंतु जसेजसे वाचन आवडू लागले आणि अनेक पुस्तके वाचली तेव्हा मला या सगळ्या गोष्टींचे कोडे सुटले.
आजच्या दिवसाला मी या सगळ्या भाकड, काल्पनिक कथा मानतो. कारण आज मी एक नास्तिक आहे..मी कोणत्याही धर्माला देवाला मानत नाही मानवता हाच माझा धर्म आणि माणुसकी हाच माझा देव..मला तरी भविष्यात निधर्मी म्हणून मरायचे आहे..
   मी नास्तिक आहे म्हणजेच जगावर आणि या जगातला एक घटक म्हणून माझ्यावर एखाद्या दैवी शक्तीचे नियंत्रण आहे.
ती दैवी शक्ती व्यक्तीच्या आयुष्यात चांगले वाईट बदल घडवू शकते हे मला मान्य नाही. व्यक्ती आयुष्यात घडते किंवा बिघडते ती त्या व्यक्तीला उपलब्ध असलेल्या संधी आणि त्या संधीचा फायदा करून घेण्याची व्यक्तीची क्षमता या दोन घटकांमुळे. व्यक्तीच्या कर्तृत्वामध्ये कोणताही देव आणि दैव या घटकांचा यत्किंचितही संबंध नसतो. मन, मेंदू आणि मनगटावर माझा विश्वास आहे म्हणून मी नास्तिक आहे.
  सध्या धर्माचा मोठा सुळसुळाट तयार झाला आहे हिंदू,  मुस्लिम , इसाई या सगळ्याच धर्मातील लोक माझा धर्मच कसा श्रेष्ठ यांसाठी चढाओढ करताना दिसतात.. होय मी “नास्तिक” आहे... कारण आस्तिकांना मी देव-धर्म-जात-पात या निरर्थक मुद्द्यांवर भांडताना पाहतोय...इतिहास जर पहायचा झाला तर भारत पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांची विभागणी धर्माच्या नावावरच झाली..,,गोध्रा हत्याकांड, शिखांची कत्तल, अजूनही खूप उदाहरणे आहेत की धर्माच्या देवाच्या नावावर आजही अनेक लोकांच्या कत्तली केल्या जातात..आणि जे धर्मग्रंथ आहेत त्यापासूनच सुरवात होते एकमेकांच्या कत्तली करण्यासाठी तुम्ही गीता ,कुराण किंवा बायबल वाचा..सगळे धर्मग्रंथ आणि देव यांनी मनुष्यासाठी काय केले आहे..मनुस्मृती आणि शरियत हे दोन धर्माची पुस्तके वाचा किती भयानक प्रथा आहेत.
माझे स्पष्ट आहे की , माणसानेच देव आणि धर्मग्रंथ यांची निर्मिती केली आहे आपले पोट भरण्यासाठी...अज्ञानामुळे देवाची इतकी भीती घालून दिली आहे लोकांच्या मनात की भीतीनेच आजचा मनुष्य त्याचा गुलाम झाला आहे..33 कोटी देवांचे मला विशेष वाटते मला 33 देवांची तरी नावे सांगू शकाल का कोणी एकाच तरी पूर्ण नाव आहे का ?? अल्लाला देखील कोणीही पहिला नाही. माझ ठाम विश्वास आहे कोणतीही व्यक्ती ही आईच्या गर्भातूनच जन्म घेते.. बाकी देवांचे मला विशेष वाटते कोण आभाळातून आलाय , कोण जमिनीतून , कोण पाण्यातून , कोण नाकातून , हातातून पायातून , आणि अजूनही खूप काही.
   पोथ्या, पुराणे, ग्रह ,कुंडल्या ,
मुहूर्त , चमत्कार,  जात , पात , आणि धर्म यावर माझा काडीमात्र विश्वास नाही . कशाला हवेत ओ हे ..देव आहे तर शेतकरी आत्महत्या करतात , अगदी 2 महिन्याच्या निरागस लहान मुलीवर बलात्कार होतो..कित्येक अपघात होतात देवाला जाताना सुद्धा, आतंकवादी हमले होतात , कित्येक लोक उपाशी दररोज झोपतात, कित्येक लढाया आणि आतंकवाद याच्याच नावाने सुरू आहे, यांच्यासाठी देव का नाही काही करत?? कुठे आहे तो ??
होय, मी नास्तिक आहे कारण मी देवाला नाही तर देवाच्या अस्तित्वाला मानत नाही. पण म्हणुन देव नाही असं मी म्हणत नाही. हो देव अाहे. देव अनाथ लेकरांमध्ये आहे. देव गरीबांमध्ये आहे. देव भुकेल्यामध्ये आहे. देव पिडीतांमध्ये आहे. देव प्राण्यांमध्ये आहे. देव गरजवंतात आहे. देव जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे. त्यांची सेवा करणं किंवा त्यांच्या गरजेला उपयोगी पडणे हीच खरी देवाची भक्ती आहे. देवाचं अस्तित्व इतस्ततः पसरलेले असताना आपण मंदिरात का शोधावे त्याला?
आणि सगळ्यात महत्वाचे देव निसर्गामध्ये आहे.. 80 टक्के नोबेल पारितोषिक हे नास्तिक असलेल्या लोकांना मिळालेले आहेत. चार्वाक, गौतम बुद्ध , स्टीफन हौकींग , भगतसिंग असे अनेक नास्तिक महान पुरुष होऊन गेले. तुम्ही विचार तर करा?? की खरच अस असेल का हे होईल का?? तर्क लावायला शिका.. बहुतेक विकसित देश हे नास्तिक आहेत नाहीतर धर्माच्या नावावरील देशांची स्थिती तुम्ही पाहताच आहात. आणि हो देशापेक्षा कोणताही धर्म आणि संविधानपेक्षा कोणताही धर्मग्रंथ मोठा नाही. वास्तव स्वीकारा मित्रांनो वास्तव..आणि मी नक्कीच इथे सांगू इच्छितो की भारताला नास्तिकतेची खुप खूप गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************