वापरायचा रस्ता ते थेट मानवी मूल्य प्रत्येक बाबतीत.... अतिक्रमण...कशासाठी ?

🌱 वि४ 🌿


वापरायचा रस्ता ते थेट मानवी मूल्य प्रत्येक बाबतीत.... अतिक्रमण...कशासाठी ? 




IMAGE  SOURCE   INTERNET

स्वप्निल चव्हाण ,बुलडाणा


अतिक्रमण हा जितका महत्वाचा मुद्दा वाटतो तेवढाच दुर्लक्षित पण आहे..
खेड्यातच नव्हे तर मोठ्या शहरांमध्ये पण वाहनांसाठी असणाऱ्या रस्त्यावर लोकांची वस्ती दिसून येते......शहरांमध्ये तरी परिस्थिती थोडी आटोक्यात आहे...पण खेडे गावात लोक ती जागा आपल्या मालकीची असल्यासारख वर्तन करतात.....
आणि विशेष म्हणजे प्रशासन या गोष्टीमध्ये थोडं पण लक्ष घालत नाहीये.....

ह्या सध्या गोष्टीपासून सुरूवात केली अणि असंच पुढे गेल्यावर कळून येईल की प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण आढळून येते.....
आता कुठे कुठे होते यावर चर्चा करण्यापेक्षा त्या मागची कारणे अणि पर्याय काय करता येतील हा महत्वाचा मुद्दा आहे.......

बऱ्याच ठिकानी हे अतिक्रमण गरिबी मुळे दिसून येते....आणि तेच एक महत्त्वाचे कारण आहे slum area तयार होण्यासाठी.....अश्या लोकांना योग्य तो रोजगार उपलब्ध करून दिल्यास आणि राहायला विशिष्ट जागा उपलब्ध करून दिल्यास ही समस्या दूर होऊ शकते....हे करताना ते बेघर होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असेल......

शेवटी जनजागृती हे एक महत्त्वाचे अस्त्र असेल या गोष्टीसाठी......कारण प्रत्येक गोष्ट प्रशासन करू शकणार नाही .....लोक-सहभाग वाढवून जवळपास सर्व प्रशासकीय अडचणींना दूर करता येऊ शकते अस  माझं मत आहे ....

   साध्या सध्या गोष्टी बघितल्या तर लक्षात येईल की लोकांना एक तर काही फरक पडतचं नाही आणि ज्यांना काही फरक पडतो त्यांचं ऐकायला कोणी तयार नाही.....
अश्या परिस्थिती मध्ये लोकांनी एकत्र येऊन समस्येवर योग्य तो विचार करणे आणि पूरक योजना आखणे गरजेचे राहील.....

हे तर सोडाच पण अवैध पद्धतीने जंगलतोड करून मोठमोठे कारखाने उभे करण्यात येतात .....मान्य करता येईल की त्या मुळे रोजगार उपलब्द्ध होत आहे...पण निसर्गाच्या संपत्तींमध्ये होणारे अतिक्रमण आणि त्यामुळे निसर्गावर होणारे दुष्परिणाम याकडे दुर्लक्ष करता येणार नाही......

अतिक्रमण ही अशी समस्या आहे की जी प्रशासन आणि लोक-सहभाग यांच्या योग्य पर्याय योजनेमुळे दूर होऊ शकते.....

।।।।। धन्यवाद...।।



IMAGE  SOURCE   INTERNET

मयुरी राघुनाथ देवकर 

ता. माळशिरस

      सध्या सभोवताली पाहिलं तर आपल्याला काय परिस्थिती दिसते सगळीकडेच स्वार्थीपणाची प्रवृत्ती वाढत आहे आणि याच प्रवृत्तीमधून जे माझे आहे ते माझे अन जे दुसऱ्याचे आहे ते पण माझेच हि प्रवृत्ती वाढत जाऊन यातूनच अतिक्रमण चा उदय झाला.
      शहर असो वा खेडे अगदी आपल्या घराशेजारी रिकामी जागा असेल तर हळू हळू आपण त्या जागेवर कब्जा करतो.यामध्ये गाडी पार्किंग वगैरेचा समावेश होतो आता हेसुद्धा एक अतिक्रमणच झाले (आपल्याला वाटत नसले तरी.....) आपण प्रवास करताना तसेच रस्त्यावर चालताना रस्त्यावरच गाड्यांचे पार्किंग केलेले दिसते ,त्याचप्रमाणे फुटपाथ तर नावालाच फुटपाथ राहिले आहेत कारण त्याठिकाणी विविध प्रकारचे गाडे,चहाच्या टपऱ्या यांचेच वर्चस्व दिसते... हे सर्व आपण रोजच पाहत आहे परंतु आता यावर उपाय म्हणून प्रत्येकानेच पार्किंगच्याच ठिकाणी पार्कींग करणे गरजेचे आहे आपण स्वतःच जबाबदारीने वागायला शिकले पाहिजे.
आता प्रश्न राहिला तो फुटपाथवरील अतिक्रमणाचा .. हे काम प्रशासनाने मनावर घ्यायला हवे तरंच आपल्याला फुटपाथ म्हणजे कशासाठी असतात हे समजेल.....
         आतापर्यंत आपण जे पहिले ते आपल्याला दिसणारे अतिक्रमण पण सध्या ज्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे ते म्हणजे मानवी मूल्यांचे अतिक्रमण.....जे दिसतही नाही आणि कोणी सांगतही नाही..यामध्ये अगदी घरापासून ते नोकरीच्या ठिकाणी तसेच मित्रांमध्ये असेल,सार्वजनिक ठिकाणी असेल प्रत्येक ठिकाणी आज व्यक्तींच्या मनाचा कोंडमारा होत आहे. भौतिक साधनांनी माणसे जोडली गेली  पण मने मात्र दूर झाली आणि म्हणूनच हा वाढत चाललेला अतिक्रमणाचा भस्मासुर आपण लवकरच नष्ट करायला हवा तरंच मानसिक स्थेर्य लाभेल नाहीतर असं पण आज माणूस कसं जगतोय हेच विसरला आहे पण हीच परिस्थिती कायम राहिली तर जगणंच विसरून जाईल.आणि अशा प्रकारे होणारे अतिक्रमण कमी केले तरंच पुढच्या पिढीला आपण मानवी मूल्ये म्हणजे काय ते सांगू शकेल नाही तर सांगायलाही मानवी मूल्ये राहणार नाहीत…



IMAGE  SOURCE   INTERNET

किरण पवार

औरंगाबाद

                माणसानेच मुळात अतिक्रमणाला लागे बांधे असल्याप्रमाने जवळ केल आहे. अगदी दैनंदिन वापरातल्या मोबालचा हस्तक्षेप आणि अतिवापर असो किंवा मग आजकाल फुटपाथवर केल जाणार अतिक्रमण असो. विषयाच्या ओघाने तरी का असेना पण मानवी मूल्य हा शब्द चर्चेत आला. सध्या मानवी मूल्यांसारख्या विषयाची चर्चा आम्हाला नकोशीच असते. हे वास्तव आहे. पण मानवी मूल्यांचा ऱ्हास न होऊ देता त्यांना जोपासन गरजेच आहे. मानवी मूल्यात अतिक्रमण केलं ते हिंसा, खोटेपणा, भ्रष्टाचार, अविवेक या अशा बाबींनी. कारण स्वनिष्ठा आणि स्वत:शी प्रामाणिकपणा या दोन गोष्टींना आपल्याकडूनच नाहीस केलं गेलं.
             जिथे माणसाचा स्वतःवरचा ताबा सुटला तिथे भला तो माणूस इतर ठिकाणांना मोकळ कसं सोडेल?? म्हणूनच तर वापरायच्या रस्त्याच अतिक्रमण होत गेलं. आपण दैनंदिन जीवणात इतरवेळी म्हटलं तर सतत एखाद्या गोष्टीत दमदाटी करण्याचा प्रयत्न करत असतो. माणसाला तंत्रज्ञानासोबत जो अहंकार नावाचा आजार जडलाय त्याची ही प्रचीती आहे.एक महत्वाच उदाहरण इथे मुद्दाम नमूद करतो. ते म्हणजे, गोवा-मुंबई रस्ता कोकणच्या बऱ्याच भागातून चौपदरी होणार आहे. हा विकास आहे जो मानवाला हवा आहे. पण यातून कितीतरी वन्यजीव संपत्ती धोक्यात येणार आहे. सोबतच घाट कितीतरी किमीपर्यंत पोखरला जाणार आहे. कोकणच सौंदर्य नष्ट होणार तर आहेच आणि सोबतच झाडांचही प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी होणार. यात फायदा कमी आणि नुकसान अधिक आहे; हेच आजच्या माणसाला समजत नाही.........

IMAGE  SOURCE   INTERNET

अनिल गोडबोले
सोलापूर


भारतीय लोक म्हणून आपल्याकडे जग जेव्हा बघत असत तेव्हा त्यांचा दृष्टिकोन नेमका कसा असावा? असा विचार माझ्या डोक्यात आला. एखादा व्यक्ती एखादे मत तयार करताना त्या देशातील माध्यमाकडे बघत असतो.. उदा. वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडिया इत्यादी..

मग त्या देशाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला जातो.. भारताला नाग गारुडी यांचा देश म्हणून ओळख होती ती पुसून आता.. बलात्कार, भ्रष्टाचार आणि असंख्य सामाजिक प्रश्न असलेला देश म्हणून बघत नसेल ना?

असो... तर हा मुद्धा एवढ्या साठी की आपल नेमकं काय चुकत? याच मी केलेलं विश्लेषण..

आपण साधं निरीक्षण करू.. पेपरला बातमी येते त्या मध्ये सकारात्मक पणा आणि वास्तविकता किती ? व भावनिक बातम्या, अतिरंजित बातम्या किती?... याच्यावर लक्ष केंद्रित केले तर असे दिसते की प्रत्येक गोष्टी मध्ये स्वतःच्या मानसिकतेचा किंवा मतांच अतिक्रमण...

बलात्कार.. अतिक्रमणच! दुसरं काय? एखाद्या व्यक्तीला पॉवर साठी किंवा विकृतीसाठी वास्तुपेक्षा कमी समजण हा मानव अधिकार साठी अतिक्रमण च आहे...

रेल्वे, बस, ऑटो अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वतः अतिक्रमण करत आहेत किंवा त्या व्यवस्था अतिक्रमणाचा बळी ठरत आहेत..

आपण काय नेसावें, आपण काय प्यावे, आपण काय खावे, आणि या बाबतीत मला काय पाहिजे या पेक्षा आता कुठला ट्रेंड चालू आहे हेच दुकानदार सांगत असतो..
आपले पैसे घालून दुसऱ्याच्या सांगण्यावरून वस्तू घ्याव्या लागतात... अतिक्रमण!

तुम्ही तुमचा राजकारणांचा कोणता दृष्टिकोन ठेवता? हे चार लोकांत मांडा. आणि तो जर पटला नाही तर .. माझा मुद्धा वेगळा आहे एवढं न समजून घेता..
'तुझ्या सारख्या मूर्खामुळे भारत मागे आहे...' अस मत प्रदर्शित करणे हे देखील अतिक्रमण..

पैसे आणि सत्ता या खाली दबलेली न्यायव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था त्यामुळे होणारा सामान्य नागरिकांना त्रास... या अतिक्रमण बदल खूप फिल्म निघाले बॉलीवूड मध्ये..

देव, धर्म आणि धर्माचे ठेकेदार... एवढा भडिमार करत आहेत ना... की देवालाच बोलवायचं की काय... अस वाटत आहे.. आणि हेच लोक देशासाठी, धर्मासाठी एखाद्याचा बळी देतात किंवा आवाज उठवला तर गोळ्या घालतात.. अतिक्रमण

आरक्षण आणि अर्थव्यवस्था यावरील स्वयंघोषित तज्ञ ... बोलूच नये आपण यावर!


नातेवाईक, कुटुंब व्यवस्था आणि आधार व्यवस्था ही तर हक्काने आपल्या जीवनावर अतिक्रमण करते.. म्हणजे भावना अतिरेक खूप मदत किंवा आधार कमी..
फुकट सल्ले देण्याचे अतिक्रमण करत असतात..

लैगिकता काय असावी, पार्टनर कोणाला करावं, कधी लग्न करावं कोणासोबत करावं... एकनिष्ठता ठेवावी की नाही ठेवावी.. हा वरचा तो खालचा.. या सगळ्या बाबतीत ... स्त्री आणि पुरुष यांची होणारी घुसमट आणि त्यामुळे येणारी विकृती व गुन्हेगारी... हे अतिक्रमण केल्याचं उदाहरण आहे...


सगळ्यात शेवटी.. 'रस्त्यावर केलेले अतिक्रमण... भाजी विकून दोन रुपये जास्त कमवावे किंवा माझा माल जास्त ग्राहकाला पोहोचावा म्हणून फुटपाथवर बसलेला भाजीवाला, गाडीवाला, फेरीवाले हे तर सगळ्यात मोठे गुन्हेगार...

तसेच मोठे लोकांनी सरकारी जागेवर केलेले अनधिकृत बांधकाम यांनी म्हणजे पैसे देऊन अधिकृत करायचा मार्ग..

हुश्श...

एक अतिक्रमण ची गाडी यावी आणि त्यांनी वरील सर्व अतिक्रमण उचलून न्यावीत अस स्वप्न मला पडत असत तो पर्यंत... "कामावर जायचं नाही का?...कितीवेळ पसरलेले असता?" म्हणून बायको ने माझ्या सारख्यावर केलेलं अतिक्रमण...
या सर्वांचा मी निषेध करतो..!!



IMAGE  SOURCE   INTERNET

डॉ. विजयसिंह पाटील.. 

MBBS DA।  कराड....


माणूस हा प्रगती साधक प्राणी आहे, भौतिक ज्ञानात आपण प्रचंड प्रगती केलीय. ह्या प्रगतीने माणसाच्या, सुख सोयीत भरपूर भर घातलीय. ह्या बाह्य प्रगतीमुळे, आपल्या, आर्थिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक विचारांत बदल घडवून आणत आहे. जीवनाची पूर्वीची मूल्ये दररोज झपाटयाने बदलत आहेत. (मानसिक अतिक्रमण नं 1 )...
हा बदल जर निरोगी असता आणि जीवन चांगलं करण्यात वापरली गेली असता, तर जगात खरं सुख शांती नांदली असती..
पण असं होताना दिसत नाही.. उलट ह्या मूळ, ह्याचा परिणाम भयानक होत आहे. ह्या बद्दल आपण कधी विचारच करत नाही, कारण या नेत्र दीपक प्रगती ने आपणा सर्वांना भुलवून टाकलं आहे,, जो तो ह्याचा फायदा फक्त स्वतः साठी कसा होईल हे पाहतोय,स्वार्थी वृत्ती फार वाढत चाललीय ( अतिक्रमण 2)
प्रत्येक जण, मोह, लाभ, स्वार्थ, हिंसा, द्वेष, सूड, ह्या भावनांनी ग्रस्त आहे, माणसाचे वर्तन पशुपेक्षा हीन होत चालले आहे.
सध्या सर्व जग भोगवादी व जडवादी झालंय, व आपण हे सर्व नैसर्गिक समजून कळत नकळत स्वीकारत चाललो आहोत ( अतिक्रमण 3)
हे झालं आर्थिक...
अहंकार,,, माणूस, खोट्या अहंकाराच्या ओझ्या खाली दबला गेलाय,  (हेही अतिक्रमण)
सर्व सामान्य माणूस, , भय वा स्वार्थासाठी, राजकीय सत्तेपुढे नमतात. शक्तिशाली राजकर्त्याना मदत करतात, हेच धार्मिक शक्ती ना ही लागू पडते..
ह्या गुलामी वृत्ती मुळे, माणसाचे, मत स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, ह्यावर प्रतिबंध निर्माण होतो (अतिक्रमण4)
धार्मिक बाबतीत---
चर्च, मशिद, मंदिर, यांची परमेश्वराला खरंच गरज आहे का ? देव तिथं असेल तरी काय ?
आपण ग्रंथ, प्रार्थना, सण, दीक्षा, बाप्तिस्मा, या गोष्टींना महत्त्व देतो, हजारो वर्षे हेच चालू आहे, लोक धर्माच्या नावाखाली गळे कापत आहेत ( अतिक्रमण 5)

एकूण च काय तर, संपत्ती,  अहंकार , धर्म, राजकारण, सत्ता
हे सर्व आपल्या मनावरचे, अतिक्रमण, आहेत ...

उदा... फुटपाथ वरील फेरीवाले,, पहिल्यांदा पोटासाठी,,, ते भरलं की समाधान न मानता, मुलाला किंवा नातेवाईकाला, दुसऱ्या फुटपाथवर,,, ह्याला अंत नाही...

जोपर्यंत, सुखाची व्याख्या करण्यापेक्षा, आनंदाची व्याख्या, लोकांच्या मनात बिंबत नाही तोपर्यंत, हे असंच चालू राहणार, उलट वाढत जाणार.... वाईट वाटते ते ह्याच की, आपण वयक्तिक काहीही करू शकत नाही.... 🙏🙏🙏🙏🙏

विकासात्मक राजकारणासाठी काय करावे लागेल ?

विकासात्मक राजकारणासाठी काय करावे लागेल ?

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

विकासात्मक राजकारणासाठी काय करावे लागेल ?


Source:- INTERNET

-किरण पवार,
औरंगाबाद
जेव्हा आजकालचे सुशीक्षित तरूण मुल मी पाहतो तेव्हा हमखास एक चित्र पहायला मिळतं. ते म्हणजे, ही मुलं म्हणतात *सिस्टीमचा भाग व्हाव लागतं* (अर्थात भ्रष्टाचार करावा लागतोच ) अन्यथा जगण मुश्कील होतं. पण मग सत्य आणि न्यायासाठी आम्ही किंवा या देशान मागणी कुणाकडे म्हणून करायची? प्रत्येक अन्यायाच्या ठिकाणी आमचा तरुण गप्पच असतो. फक्त एखाद-दुसरं मोठ प्रकरण कुठे नजरेस पडलं की निघालो आम्ही रस्त्यांवर मोर्चे काढायला, त्यापेक्षा टमाटे फेकायला, लाखो लिटर दूध रस्त्यांवर ओतायला आणि बसेस फोडायला. *जर तरूणाने आज प्रत्येक छोट्याछोट्या गोष्टीचा जाब योग्य वेळी सरकारला विचारला असता तर कधी गरजच नसती पडली अशा मोर्च्यांची.* पण आमच्या सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या तरुणाकडे ती दुरदृष्टीच नाही.
जे झाल ते काल. पण आज आणि उद्या काय? हा विचार प्रत्येकानच करण गरजेच आहे. *प्रत्येक वेळी सरकारला दोष देताना जरा स्वत: कोणत्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आपण? हा प्रश्न स्वत:ला विचारा.* सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, विकासात्मक राजकारणासाठी तरुण सुशिक्षितांनी पुढे यावं. आपण दरवेळी फक्त भाषणांमधून हेच ऐकत आलोय; की तरुण नेतृत्व देशाला घडवू शकतं. *पण प्रत्यक्षात मात्र आजवर तरी एखादा इंजीनीअर मला राजकारणात आलेला पहायला मिळत नाही.* जरी एखादा असला तरी आकडा नगण्यच. आणखी महत्वाची बाब सांगायचीच म्हटलं तर तुमचा *causal approach* ( गोष्टीच गांभीर्य लक्षात न घेणं ) हा विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करतो.........
एम.पी.एस.सी. सारख्या इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरूणांनी जर ठरवलं तर विकासाच राजकारण ते सहज स्वबळावर निर्माण करू शकतात. कारण त्यांच्याकडे एखाद्या *राजकीय नेत्यापेक्षाही जास्त ज्ञान असतं.* पण हीच पोर जेव्हा *सहजरीत्या बोलून जातात ना की, ते आपल काम नाही.* तेव्हा मात्र वाईट वाटतं. मी असं अजिबात म्हणतं नाही की, ठरावीक क्षेत्राशीच निगडीत असलेले राजकारणात या पण किमान आता प्रयत्न करायला तर सुरुवात करा ना. एकविसव्या सदीचे नव्याचे नऊ दिवस संपले आता. *हीच वेळ आहे. पुन्हा संधीही नसेल अन् बदलाची अपेक्षादेखील.*
( काही चुकीच वाटलं तर क्षमस्व )



Source:- INTERNET

-अभिजीत गोडसे ,
 सातारा
खर तर राजकारण हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. रोजच आपला राजकारणाशी प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष संबंध येत असतो. कोणत्याही विषयावरील चर्च्या नंतर शेवट हा राजकारणा वरतीच येऊन थांबतो ! आपल्या देशात जर सहा महीण्याला कोणती ना कोणती निवडणूक असेतेच असते . छोट्या - मोठ्या राजकीय पक्षांचे उदंड पिक आपल्याकडे आहे. यांच्या जोडीला चळवळी , संघटना आहेतच. याचाच परिपाक म्हणून राजकारण हाच एक केंद्र बिंदू माणला तर काही वावगे ठरणार नाही . पण प्रश्न राहतो विकासात्मक राजकारणाचा. सत्तेवर कोणताही पक्ष असो . सरकारी धोरणाचा शेवटच्या माणसाला जर फायदा होत नसेल तर नक्कीच संबंधित सरकार किंवा पक्ष विकासात्मक राजकारणापासून आणि चांगल्या धोरणापासून लांब आहे असे म्हणायला काहीच हरकत नसावी .

विकासात्मक राजकारणासाठी काय करावे -


१) सर्वात महत्त्वाचे पक्षांची चिन्हे काढून टाकावी. घटनेत सांगितले आहे 'व्यक्तीने' निवडणूक लढवावी . समूहानी नव्हे. होते असे की ठराविक पक्षाचे किंवा सरकार चालवत असलेल्या पक्षाचे कोणत्याही निवडणूकी आगोदर जास्त प्रस्त असते. त्यांचा समूह बनलेला असतो. याचा फटका प्रत्यक्ष मतदान करताना बसतो. आपल्या मतदार संघात नक्की कोण उमेदवार उभा राहीला आहे याची माहिती न घेताच बरेच जण मतदानाच्या मशिनवर असलेल्या चिन्हावर मतदान करुण येतात. जरी 'त्या' चिन्हाचे पक्ष चांगले असले. सरकार चागले असेल. पण आपल्या मतदार संघात किंवा भागात संबंधित पक्षाचा काम करणारा उमेदवार हा चांगला असेलच असे नाही . म्हणून जर पक्षांची चिन्हे निवडणूक विभागणे हटवली तर समूहाने निवडणूक लढवली जाणार नाही .तर व्यक्तीने लढवली जाईल. पक्षाच्या चिन्हा एवजी संबंधित उमेदवाराचा फोटो लावता येवू शकतो. जेणे करून जनतेला समेजेल हा उमेदवार चांगला आहे का ? गुन्हेगार आहे का ? याची वर्तवणूक कशी आहे ? हे विचारात घेऊन जनता मतदान करेल. यातून चांगले उमेदवार राजकारणात जाण्यासाठी मदत होईल तसेच ठराविक समूह नष्ट होतील.

२) तरुणांचा देश आहे खरा .पण तरूण जास्त राजकारणात दिसत नाहीत.गुणवत्ता असून देखील मात्तबर मंडळी अशा तरूणांना अलगद बाहेर काढते. माञ एखाद्या नेत्यांचा , ज्येष्ठ राजकीय व्यक्तीचा नुकताच मिसरुट फुटलेला(अशिक्षित ) तरुण राजकारणात सहभागी होतो . जाहिर सत्कार करुण यांचे पक्षात आगमन करून घेतात. हे अशे तरुण राजकारणी ना समाजासाठी काही करत , ना युवकांनसाठी काही करत. युवकांची धोरणे पण अशांना माहिती नसतात. केलेच तर मिञ मंडळीचे वाढदिवस , समुद्राच्या ठिकाणी व्यायाम शाळा वगैरे .अशांन पेक्षा खरा युवा कार्येकर्ता राजकारणाची जाण असणारा मागे राहतो. घराणेशाही फक्त प्रत्येक पिढ्यानंवर सत्ता गाजवते.

३) राजकीय व्यक्ती घडवण्यासाठी किंवा राजकारणात करियर करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे.

४) पंचायत सभापती , उपसभापती , झेडपी अध्यक्ष नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष हे स्पर्धा परिक्षांन मार्फत भरल्यास युवकांना सद्धी मिळेलच याच बरोबर गुणात्मक व्यक्ती राजकारणात जाऊन नवनवे प्रयोगही करेल.

५) आमदार आणि खासदार ह्या जबाबदार पदांना शैक्षणिक अट ठेवावी.

६) राजकीय व्यक्तीना दिलेली कामे , ठराविक काळात पूर्ण केली का . हे पाहण्यासाठी स्वतंत्र यंञना तयार करणे गरजेचे आहे.

७) पंन्नास टक्के आरक्षण मिळवून राजकारणात उतरलेल्या स्त्रीच्याच्या नवरोबांचा हस्तक्षेप बंद करणे गरजेचे आहे. तसे आढळ्यास संबंधित स्त्रीयांचे एक वर्षेभरा साठी पदभार काढून घ्यावेत.अशी तरतुद असणे गरजेचे आहे.

८) साठ टक्केच्या वर आपल्याकडे मतदान होत नाही . हे वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी जणजागृती करणे गरजेचे आहे. बरेचदा ओरड असते ग्रामीण भागात पैसे घेऊन , जेवनावळी करून मतदान केले जाते. हे बरोबर आहे आपल्याकडे निवडणूक ही दिवसापेक्षा राञीची जास्त रंगते. हे प्रकार बंद होणार नाहीत ! पण खेद हा शहरी लोकांचा आहे. मतदाना दिवशी सुट्टीचा फायदा घेऊन ही मंडळी पर्यटन करत असतात. स्वतःचा हक्क बजवत नाहीत. वरून आणखी सरकार कसे चांगले नाही , हे असे झाले पाहिजे आपल्या देशात , तसे झाले पाहिजे फक्त सचूणा देतात. स्वतःची अल्प बुद्धी पागळवतात काही तर मोठ मोठे लेख लिहून सरकारी धोरण कुठे चूकते ते सांगतात. अशांची किव करू वाटते. ग्रामीण भाग बरातरी मतदानाचा हक्क बजावतात. ते कसे का असेणा पण भारतभुमीला विसरत नाहीत.

9) निवडणूक वेळेस 'नोटा' हे बटन नविन केले मशीन वर . जास्त मते नोटाला पडली तर निवडणूक पून्हा घेण्यात यावी. याची अमंलबजावणी होने गरजेचे आहे.

१०) प्रादेशिक पक्ष मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. संबंधित विभागाणे नियमावली कडक करणे गरजेचे आहे.

११) भ्रष्ट नेते व धार्मिक तेड निर्माण होईल असे विधाने करणारे नेते यांना दहा वर्षीसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी.तसेच शिक्षाही व्हावी.

१२) आमदार आणि खासदार या लोकनेत्यांनी सभागृहात पाच वर्षीत कोणते प्रश्न विचारले हे संबंधित मतदारसंघाला कळण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोठमोठे फ्लेक्स लावावे. यासाठी एखादी यंञना असावी .

१३) शालेयस्थरावर पाचवी ते दहावी वर्गाला वर्षीतूण एकदा संबंधित मतदार संघातील नेत्यांनी कोणते प्रश्न मार्गि लावले. यासाठी किमाण दहा मार्कांचा प्रोजेक्ट सादर करण्यास सांगावे.जेणे करून विकासात्मक राजकारणाची आवड मुलांन मध्ये रुजेल.

१४) माघे कोणत्यातरी पक्षाने निवडणुका व्हायच्या आदी तिकिट देण्यासाठी उमेदवरांची परीक्षा घेतली . तसाच प्रयोग सर्व निवडणूक वेळेस करावा.

१५) राजकारणात ठराविक समाजाची लाँबी तयार होऊ नये म्हणून पहानी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी .

राजकीय व्यक्तींना आपल्याकडे प्रमाणापेक्षा जास्त माण-सम्माण दिला जातो. मुळात आपल्या कामासाठी ते आहेत. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आज नागरिक सर्वच आहेत . पण प्रत्येकाने 'सुजाण नागरिक' होणे गरजेचे आहे. असे जर झाले तर विकासात्मक राजकारण होण्यासाठी वेळ लागणार नाही .



Source:- INTERNET

-डॉ. दिलीप कदम,
अहमदनगर
1) प्रथम विकासाची व्याख्या नीट समजावून घ्यावी लागेल.
2) भारतीय संविधानाची मुलतत्वे आत्मसात करावी लागतील.

युवा मित्रांनी विषय विचार विस्तार करणे अपेक्षित🙏




Source:- INTERNET

-वैष्णवी सविता सुनील,
सातारा
*मुळात विकासात्मक राजकारण असं म्हणण्याची वेळ का यावी याचा विचार केला गेला पाहिजे .कारण राजकारण हे देशाच्या विकासासाठी आहे.पण सध्याची परिस्थिती पाहता विकासात्मक राजकारण ही नवी संकल्पना उदयाला येण्याची गरज वाटू लागली आहे.त्यासाठी सर्वात आधी आपण म्हणजे या देशाच्या तरुण पिढीने राजकारणावर नुसती चर्चा, टीकात्मक वक्तव्य करण्यापेक्षा स्वतः राजकारणात उतरायला हवं. राजकारणाबद्दल देशाच्या युवा पिढीने उदासीनता दाखवणे हे देशाच्या प्रगतीचा मार्गातील अडथळा आहे.....त्याचबरोबर देशात पक्षीय राजकारण फोफावू न देणे गरजेचे आहे.सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आपल्याला दिसून येईल की पक्षीय राजकारण कशा पद्धतीने चाललंय......आणि जर हे वेळीच थांबलं नाही तर धर्म ,जात ,पंथ,लिंग,भाषा,वर्ण यांच्या आधारावर जसा भेदभाव होतोय तसाच पक्षाच्या आधारावर भेदभाव होण्यास वेळ लागणार नाही आणि तेव्हा मात्र आपल्याला चर्चेसाठी खरं राजकारण म्हणजे काय हा विषय घ्यावा लागेल.......



Source:- INTERNET

-पवन खरात,
अंबाजोगाई
जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल ,तेव्हा या गोष्टींचा सुद्धा उल्लेख करावा लागेल की....
एकविसाव्या शतकात ज्यावेळेस कोरिया,अमेरिका सारखे राष्ट्र hydrogen bomb चे परिक्षण करत होते.......
जपान ,फ्रांस,ऑस्ट्रेलिया सारखे राष्ट्र technology च्या दुनियेत super power बनत होते......
चीन दर वर्षी स्वत: च्या नागरिकांना 1.25 crore नोकऱ्या देत होते .....
त्यावेळेस माझ्या भारत देशात नागरिकांना गाय,गोबर,गोमूत्र,मंदिर,मज्जिद,तलाक, लव-जिहाद,गोहत्या,नोटबंदी,blackmoney ,GST, योगा, वंदे मातरम् ,भारत माता की जय , आदि गोष्टींमधे गुतवुन राजकारणी सत्तेची खीर खाऊन आनंद साजरा करत होते.....

स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतर प्रश्न तोच आहे , आपला देश नक्की प्रगती करतो आहे की पावलं उलट्या दिशेने टाकतो आहे??????
सर्वधर्मसमभाव, समानता, धर्मनिरपेक्षता, एकात्मता या गोष्टी भारतीय संविधानाचा प्राण आहेत, या उलट आज धार्मिकता ,आर्थिक व मानसिक विषमता, घराणेशाही, गुन्हेगारी , दडपशाही हि या गचाळ राजकारणाची ठळक वैशिष्ट्ये बनली आहेत.


*जाती पातीचं राजकारण बस झालं कि आता*,
*पैसा चालवून तुम्ही काबीज केलीय हि सत्ता* !

*सत्ता मिळाली कि एकदा विसरता सारे आश्वासने* ,
*भरायला स्वतःचे खिशे निवडून दिले का जनतेने* ?

*तसं चुकलं नाही तुमच्या हाताने*,
*पैसा घेताय एक एक मताने* !

विकासात्मक राजकारणासाठी
1. मतदान आपला हक्क आहे , तो बजावलंच पाहिजे पण आपलं मत पैशापायी विकू नका .
2. मतदान हे पक्षाकडे बघून न करता उमेदवाराचे कर्तृत्व पाहून करा.
3. पोकळ अश्वासनांना बळी पडू नका, प्रत्येक राजकीय पक्ष नेहमीच अशी आश्वासने देत असतो फक्त सत्ता मिळे पर्यंत.
4. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि योग्य उमेदवार निवडा.
5. तरुण वर्गाने राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा.
6. राजकारण करत असताना आपण संविधानापेक्षा मोठे नाहीत याचे भान ठेवा.
7. आपल्या देशात जर लोकशाही टिकवायची असेल तर जाती पातीच , पैश्याच्या जोरावर राजकारण करू नका, जर कोणी करत असेल तर तुम्ही त्यांना मदत करू नका.
8. विकासात्मक राजकारण हेच आपल्या देशाला तारू शकेल अन्यथा लोकशाही मोडखालीस नक्की येईल.


Source:- INTERNET

-R. सागर,
सांगली
ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत प्रत्येक ठिकाणी उमेदवारासाठी त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी, सामाजिक क्षेत्रामधलं त्याचं कार्य, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याचा विकासाचा दृष्टिकोन या सर्वांवर आधारित पात्रतेचे निकष असायला हवेत. त्यानुसार तो उमेदवारीसाठी पात्र आहे की नाही हे ठरवायला पाहिजे.
बऱ्याचदा मतदारसंघातील जातीय-धार्मिक परिस्थितीचा अभ्यास करून त्यानुसार त्या विशिष्ट जाती-धर्माच्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. किंवा अलीकडच्या नव्या trendनुसार निवडून येण्याची क्षमता(जातीय-धार्मिक-आर्थिक) हा निकष लावून उमेदवारी दिली जाते. तसं न करता जी व्यक्ती खरंच आपल्या कर्तृत्वाने विकास करण्याची क्षमता ठेवते अशा व्यक्तीलाच उमेदवारी दिली पाहिजे.
प्रत्येक ठिकाणी नेते, त्यांचे कुटुंबीय, सगे-सोयरे यांनाच संधी न देता कधीतरी ज्यांना लोकांच्या समस्यांची जाणीव आहे अशांना संधी दिली पाहिजे.
.
शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही हेही खरंच आहे. या सगळ्या परिस्थितीला मतदारही थोड्याफार प्रमाणात जबाबदार असतात.
.
एकतर आपल्याकडे मतदार मतदानासाठी बाहेर न पडल्याने मतदानाची टक्केवारी कमी राहते. जिथे मतदानाची टक्केवारी कमी आहे तिथे प्रस्थापितांनाच बहुतांश संधी मिळत राहते. हा आपल्या समाजाचा-जातीचा-धर्माचा आहे त्यामुळे ह्यालाच मत दिलं पाहिजे ही मानसिकता अजूनही (विशेषतः खेड्यात) आढळते.
काही मतदार चलबिचल अवस्थेत असतात. मत कुणाला द्यायचं हे त्यांना मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यावर ठरवतात. अशा स्थितीत विकासात्मक राजकारण होऊ शकत नाही.

पर्यटन विकास... रोजगाराची नवीन संधी


पर्यटन विकास... रोजगाराची नवीन संधी

शिरीष सरिता चंद्रशेखर उमरे
सीबीडी बेलापुर, नवी मुंबई

       पर्यटन शब्दासोबत आठवतात गोवा, राजस्थान, केरळ ही राज्ये !! परदेशी पर्यटक भारतात आले की ह्याच राज्यांमध्ये जास्त जातात. ह्यात इतिहासासोबत ह्या राज्यांनी पर्यटन विकास करण्यात मेहनतीचा सिंहाचा वाटा उचललेला आहे.
      गोवा त्याच्या खाद्य संस्कृती व सुंदर समुद्रकीनारा साठी प्रसिध्द तर केरळ निसर्ग व आयुर्वेदीक उपचारासाठी !! राजस्थान आपल्या वाळवंट व हस्तकला साठी जगाला मोहीत करतो.
       पर्यटनातुन होणारे उत्पन्न लक्षात आल्यावर जवळपास सगळ्याच राज्यांनी यावर काम करणे सुरु केले असले तरी त्यात बर्याच त्रुटी आहेत. मुलनिवासी लोकांना ह्याचे महत्व पटवुन देण्यात, त्यांना सुविधा व प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती करण्यात जवळपास सगळे च राज्ये अपयशी ठरली आहेत. पण खाजगी क्षेत्राने ह्या सुवर्णसंधीचा छान फायदा घेतला.  आज कृषीपर्यटन, वनपर्यटन व  आरोग्य पर्यटन हे आघाडी वर आहेत. मुलांमध्ये ट्रेकींग ची आवड निर्माण होत आहे. साहसी खेळ हे एक नविन पर्यटनाचे दालन निर्माण झाले आहे. भारतात नदी, झरे समुद्र, धबधबे, खाडी, कील्ले, राजवाडे, मंदीरे, वाळवंट, बर्फाळ भाग, जंगले, अभयारण्य, पर्वत, दर्या, डोंगरे अशी निसर्गाची देण आहे. खाद्य संस्कृती, रिती रिवाज, परंपरा, सण, पेहराव संस्कृती, भाषा संस्कृती, कला संस्कृती इतकी विवीधता आहे की युवा पीढीला प्रचंड संधी आहेत ह्या क्षेत्रात... आताच्या इंटरनेट व सामाजिक प्रसार माध्यामांमुळे ह्या व्यवसायाला छान गती आली आहे. होमस्टे व बॅकपॅकर ह्या परदेशी संकल्पना आता इथे रुळल्या आहेत. महाराष्ट्र तर कृषी/वन पर्यटनात आघाडीवर आहे. *निवास व न्याहारी* ह्या सरकारी उपक्रमाने पण छान बाळसे धरले आहे खास करुन कोकणात... नोकरीपेक्षा ह्यात व्यवसायाला जास्त वाव आहे... जितक्या सेवा नाविन्यपुर्ण व उत्कृष्ट तेवढे उत्पन्न जास्त !!
–------------------------------------------------------------------
संदिप थोरात,
अहमदनगर.
         निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याची आणि नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्याची माणसाची मुलभूत प्रवृत्ती पर्यटनाचा मूळ आधार आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला तेवढेच महत्व आहे. आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले असताना देशाबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या माणसाच्या ओढीने हे क्षेत्र सातत्याने विस्तारते आहे. दरवर्षी पर्यटन दिनाच्या ‍निमित्ताने या क्षेत्राशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा घडवून आणली जाते. वर्षभरासाठी एक संकल्पना निश्चित करून त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन जगभरात करण्यात येते. यापूर्वी सांस्कृतिक बंध, पर्यटन आणि जैवविविधता, महिलांसाठी संधी, पर्यावरण बदलास प्रतिसाद, क्रीडा आणि पर्यटन, खाजगी क्षेत्राचा सहभाग अशा विविध विषयांवर विचार करण्यात आला आहे.
यावर्षी ‘पर्यटन आणि विकास’ हा संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
        पर्यटन हा जगातील रसायने आणि इंधनानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय आहे. जगभरातील अनेक नागरिकांसाठी उत्कर्षाचे साधन आणि जीवनाची आशा म्हणून या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांवर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वाहतूक, हॉटेल्स, मनोरंजन आदी व्यवसायही पर्यटनाशी जोडले गेले आहेत.
पर्यटन व्यवसायामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण विषयक विकास होण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडून येतो. पर्यटकाला आवश्यक असणारी निवास, भोजन, वाहतूक, माहिती, मनोरंजन आदी व्यवस्थेसोबतच त्या भागातील उत्पादनांदेखील मागणी निर्माण होते. सांस्कृतिक आदानप्रदानाच्या माध्यमातून नागरिकांना एकमेकाशी जोडण्याचे कामदेखील पर्यटनाच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे पर्यटन विकासात नागरिकांचा जेवढा सहभाग वाढेल, तेवढेच त्या भागातील अर्थकारणालादेखील गती मिळते.
पर्यटनाबाबत विकासाच्या कल्पना मांडतांना त्या भागातील खास खाद्यसंस्कृती, पारंपरिक कला, साहित्य, लोकजीवन, निसर्ग याचा फारसा विचार केला जात नाही. पर्यटकांसाठी चांगल्या सुविधांएवढेच त्यांना नव्या जगाचे दर्शन होणे आणि रोजच्या जीवनापेक्षा नवा अनुभव मिळणे महत्वाचे असते. पाश्चात्य राष्ट्रांनी आपल्या परंपरेच्या खुणा याचसाठी खासकरून जपल्या आहेत आणि त्याचेच मार्केटींग उत्तमरित्या केले जाते.
–------------------------------------------------------------------

सौदागर काळे, पंढरपूर._
       पर्यटन हे खूप जणांचा जिव्हाळ्याचा विषय. आनंदाचा,मन हलकं करण्याचा, जगात नवीन काय चाललंय हे डोकावून पाहण्याचा विषय. प्रत्येकजण पर्यटनसाठी आपल्या राशीतील काही रक्कम राखीव ठेवत असतात. लहानपणी सहल हेच माध्यम पर्यटन म्हणून वाटायचं.पण आज बदलत्या काळाबरोबर पर्यटनाच्या शाखा सुद्धा वाढल्या.आजही ग्रामीण भागात *'जीवाची मुंबई'* करून आलो.असे खुपजण जुनी माणसं पारावर बसून खुमासदार वर्णन करत दुसऱ्यांना सांगत असतात.थोडक्यात तुमच्याकडे दृष्टी असेल तर सृष्टी नाहीतर कायमची निराशेची वृष्टी.
गावात जन्मला अन गावातच मेला अशी आपल्या नावापुढे पाटी लागू नये म्हणून प्रत्येकांनी विदेशात-देशात राहिलं, कमीतकमी आपल्या राज्यात तरी पर्यटन करायला हवं.
आपण बदलत चाललो,आपली जीवनशैली बदलत चालली अन आनंदाचे , विश्रांतीचे,अभ्यासाचे , अजून बरेच घटकांसाठी पर्यटनाच्या शाखा निर्माण होऊ लागल्या. नाहीतर अगोदर फक्त निसर्ग सौंदर्य,धार्मिक हेच पर्यटन आपलं असायचे.आज ऐतिहासिक,संशोधन, शेतीफेरफटका असे पर्यटन वाढू लागले अन रोजगारनिर्मिती आपसूक होऊ लागली.
         जिथे समुद्र तिथे वाळवंट,सर्वाधिक पाऊसाचे ठिकाण तिथे अवर्षण,जिथे पठार तिथे हिमालयसारखे पर्वत असे बरेच विरूद्धभास आपल्या देशात आढळतात.पण त्यांचे पर्यटन म्हणून उपयोग करायचे असेल तर विकास हवा.देशात धार्मिक स्थळे सोडून बाकीच्या क्षेत्रांना तुलनात्म विकासासाठी कमी निधी दिला जातो.
       प्रत्येक सरकारला पर्यटन विकास करताना या क्षेत्रात गुंतवणूक करताना एक भीती नक्की वाटत असेल की यातून इनपुट किती भेटेल!त्यामुळे संघटित युवकांनी सरकारच्या भरवश्यावर न बसता हे क्षेत्र नवनवीन कल्पनांनानी रोजगरनिर्मितचे आगार करायला हवे.
       उदाहरणार्थ म्हणून सांगायचे झाले तर साहित्य क्षेत्राच्या संबंधित निर्मिती केलेले *"पुस्तकांचे गाव- भिलार"* हे नवीन पर्यटन व रोजगरनिर्मितीचे स्टार्टअप आहे.
_पर्यटन विकासात माझ्या मते रोजगरनिर्मिच्या वाटा:-_
1.पुस्तकांचे गावच्या धर्तीवर शांत ,रमणीय ठिकाणी *स्पर्धा परीक्षेचे गाव* असे गाव सुद्धा निर्माण होऊ शकते.
2.पर्यटन ठिकाणी उदा.महाबळेश्वर सारख्या थंड ठिकाणी गरम असलेले मक्याचे कणसे (गोड)जास्त विकले जातात. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मागणीनुसार अशा प्रकारच्या पिकांची शेती करावी.
3.आज सगळ्यांकडे स्मार्ट फोन आहेत.पण   भेट देण्याच्या वेळेस खूप जणांची बॅटरी संपलेली असते.तेव्हा चार्जिंग करून देणे हा सुद्धा पार्टटायम रोजगार होऊ शकतो.(कोकण,मेळघाट सारख्या दुर्गम भागात हे संधीचे सोने करते)
4.कोकणसारख्या भागात किंवा पुणे-मुंबई यासारख्या मुख्य शहरातील विविध प्रसिद्ध स्थळे मनसोक्त पाहण्यासाठी आज खुपजण दूरवरून टू-व्हीलरवर सफर करतात.मुख्य ठिकाणी जागोजागी अशा टू-व्हीलर भाड्याने देण्याचा व्यवसाय होऊ शकतो.(हे पाऊल रिस्कचे असले तरी अटीच्या अधीन होऊ शकते)
5.संबंधित पर्यटनक्षेत्रातील हस्तउद्योग कलांचे, प्रसिद्ध वस्तूंचे डिजिटल मार्केटिंग करून एका वेबसाईटवर आणून विक्री करू शकतो.
6.जागोजागी संबंधित पर्यटनस्थळी त्या त्या भागातील आधुनिक पद्धतीने निर्मित आकर्षक खाद्यसंस्कृतीचे भोजन कक्ष निर्माण करू शकतो.
–------------------------------------------------------------------

प्रदिप इरकर
वसई,जि-पालघर
       पर्यटन हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे व प्रत्येकालाच ते करायला आवडतो.परंतु पर्यटन हा अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख घटक आहे फरक इतकाच की काही ठिकाणी पर्यटनाचा विकास झाला आहे तर काही ठिकाणी विकास झाला नाही.
        जर राज्यकर्त्यांनी मनावर घेतले तर कोणत्याही ठिकाणाला पर्यटनस्थळ बनवता येऊ शकते फक्त व्यवस्थित नियोजन तेथील नैसर्गिक रचना आजूबाजूचा परिसर व इतर तत्सम घटक ह्यांचा योग्य अभ्यास करता आला पाहिजे व योग्य असे धोरण असले पाहिजे.
   संपूर्णपणे पर्यटनावर आधारित अनेक ठिकाणांची नवे देत येतील.महाराष्ट्र हे नैसर्गिक देणगी लाभलेले,ऐतिहासिक वारसा असलेले,थोर महापुरुषांची भूमी असलेले राज्य आहे व पर्यटनाचा विकास करण्यासाठी हे घटक पुरेसे आहेत.
महाराष्ट्राला एकूण 720 km लांब समुद्रकिनारा लाभला आहे व ह्यावर जवळपास 48 नैसर्गिक बंदरे आहेत.अनेक मोठमोठ्या खाद्य आहेत.ह्यातून रो-रो सारख्या सेवा सुरू केल्या तर नक्कीच पर्यटनाबरोबरच होणाऱ्या वाहतूककोंडीला देखील उत्तम पर्याय ठरू शकतो.
         देशातील तसेच जगातील सर्वाधिक जैवविविधता लाभलेल्या प्रदेशांपैकी महाराष्ट्रातील सह्याद्री घाट हा एक प्रदेश आहे.पर्यटकांवर काही प्रमाणात बंधने टाकून हा प्रदेश व्यवस्थित रित्या जागतिक पर्यटन स्थळ बनवता येऊ शकते.
महाराष्ट्राला लाभलेले उंच उंच सरळ कडे असलेले डोंगराळ भागात ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या ही खूप आहे परंतु जर ह्याच ठिकाणी योग्य सोयी सुविधा व प्रशिक्षण देऊन ह्या ठिकाणांचा विकास केला तर जगभरातून पर्यटक ट्रेकिंग साठी महाराष्ट्रात येतील.
        ह्याच डोंगराळ भागात असलेली अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत.त्यातही उत्तम सोयी सुविधा उपलब्ध केल्यास ह्यांचा विकास होण्यास बराच वाव आहे.
ऐतिहासिक वारसा असलेले महाराष्ट्र हे राज्य आहे.अनेक गड- किल्ले,लेणी ,स्तूप,मंदिरे,चर्च,गावे महाराष्ट्रात  आहेत.
ह्यांचा विकास करून ऐतिहासिक महत्व प्रसिद्ध केले तर नक्कीच पर्यटकांना आकर्षित करू शकतो.
ज्याप्रमाणे परराष्ट्र धोरण वगैरे धोरणे आखली जातात त्याचप्रमाणे पर्यटन धोरण दरवर्षी जाहीर केले पाहिजे व पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.कोणत्याही पर्यटनस्थळाची माहिती पर्यटकापर्यंत पोहोचवण्यासाठी तेथील गाईड खूप महत्त्वाची भूमिका निभावतात आपल्या भारतातील बहुतांश गाईड हे परंपरंगात आहे.त्यांना पद्धतशीरपणे प्रशिक्षण देणाऱ्या तसेच या क्षेत्रात उतरू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून  देणाऱ्या  संस्था स्थापन करण्यात आल्या तर  नक्कीच या क्षेत्रात विलक्षण बदल घडून येतील.
–------------------------------------------------------------------


डॉ. दिलीप कदम,
अहमदनगर.

1) संधी पुर्वी पासुनच आहे पण मध्यमवर्गीय लोकांकडे नव्याने आलेल्या पैशामुळे वाढ झाली.
2) पर्यटन हा हंगामी आणि चढ उतार होणारा व्यवसाय आहे.
सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नका.
रोजीरोटीच्या नेहमीच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका.
3) सरकारच्या नुसत्या योजना आहेत.पुरेसे बजेटरी सेंगशन नसते.
त्याचा लाभ मिळवा पण अवलंबून राहु नका.
छोटी सुरुवात करा, खाचाखोचा समजून घेत वाढ करा.
4) आपला आणि आपल्या परिसराचा युनिक सेलिंग पॉइंट शोधा आणि तोच  घट्ट पकडून ठेवा.
दारू ,मटण, भाडयाच्या खोल्या एवढेच पर्यटन नसते.
बाहेरुन येणाऱ्या लोकांच्या अटी वर नव्हे तर तर तुमच्या नियमानुसार व्यवसाय वाढवा.
परिसराचे पर्यावरण आणि संस्कृति प्रदूषित होणार नाही याकडे कटेकोर लक्ष ठेवा.
​5) मला सुचलेल्या दोन संधी​
​i) नोकरदार शहरी भगिनींसाठी माहेर केंद्र​
​ii)जेष्ठनागरिकांसाठी तात्पुरते निवास केंद्र.​
चर्चा करायची असेल तर फोन करा
9423066330
–------------------------------------------------------------------

यशवंती होनामाने.
मोहोळ.  
     हा एक खुप छान पर्याय आहे.ज्याना खुप फिरण्याची आवड आहे,ज्यांना आपल्या आवडीचा उपयोग व्यवसाय म्हणून करायचा आहे ना त्यांना हा उत्तम पर्याय आहे.हल्ली लोकांना फिरायचे असते त्यांना ठिकाण ची  माहिती असते पण ती फक्त ऐकिव किंवा गूगल वर वाचलेली असते.अशावेळी त्यांना गरज असते ती गाइड ची.असा गाइड की जो त्यांना सगळी ठिकाणे नीट फिरवेल.त्यांना त्या पर्यटना चा आनंद घेता येईल.आपली आवड पण  जोपासली जाईल आणि रोजगार पण होईल.

–------------------------------------------------------------------

समीर सरागे,
नेर, जि. यवतमाळ
         भारत देश हा पर्यटना च्या बाबतीत ऊत्तम स्थान आहे.  पर्यटन म्हणजे जिथे निसर्ग रम्य वातावरण ,त्या राज्याची किंवा देशाची विविधता , कला, साहित्य , इत्यादि  होय. पर्यटन हा जगभर अत्यंत महत्वपूर्ण होत असलेला असा उद्योग आहे  भारतात ही या उद्योगाने अलीकडे चांगलीच जम पकडली आहे ,
       आज बऱ्याच देशात पर्यटन हाच मुख्य व्यवसाय आहे उदाहरण द्यायचे झाल्यास सिंगापुर ,मलेशिया, संयुक्त अरब अमीरात ,हांगकांग ,
स्वित्ज़रलैंड वैगरे देता येतील  या देशातील जीडीपी ग्रोथ वाढण्याचे हे  मुख्य कारण आहेत.
      मछिमारांचा देश म्हणून ओळख असलेल्या सिंगापुर हा देश एकदमच जगात आर्थिक महासत्ता म्हणून उदयास आला नाही तर त्याला देखील विकासभिमुख दृष्टिकोण अंगिकारवा  लागला .
      सिंगापुर असा देश आहे जेथिल भौगोलिक क्षेत्र अतिशय कमी आहे. जिथे  पानी सुद्धा विकत घ्यावे लागते आणि शेती साठी क्षेत्र देखील नाही , आपल्या देशा सारखी संसाधने आणि नैसर्गिक संपत्ति नाही तरी त्या देशाची अर्थव्यवस्था आज अतिशय मजबूत आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे  या देशाने पर्यटन व्यवसायाला दिलेले महत्व आणि त्यातून साधलेली आपली आर्थिक प्रगती. परंतु भारतात विकसाचीच एलर्जी असणाऱ्याना पर्यटनाचे महत्वच नेमके पटलेले नाही. पर्यटना सरख्या उद्योगला प्रत्येकच वेळी दुर्लक्षिल्या जाते हे दुर्दैवच म्हणावे लागेल,
      पर्यटन हा देशात जास्त परकीय चलन मिळवून देणारा तिसरा उद्योग आहे.
*पर्यटन क्षेत्रात भारतातील रोजगार
– ३.९५ कोटी
*जगातील एकूण उत्पन्नाच्या ९ टक्के आर्थिक उत्पन्न पर्यटन उद्योगातून निर्माण होते.
*जगातील११ पैकी १ रोजगार हा पर्यटनातून निर्माण होतो.
पर्यटना मुळे त्या गांव किंवा शहराला जागतिक दर्जा प्राप्त होतो.
पर्यटना हा असा उद्योग आहे ज्याला काही त्रुतु नसतो बाराही महीने चालणारा हा उद्योग आहे.
या माध्यमातून बऱ्याच लोकना आज देशात रोजगार उपलब्ध झाला आहे.
अगदी चहा कैंटीन पासून तर विमान प्रवासा पर्यंत हा उद्योग तेजीत आहे.
काही जण हौशी असतात ते दरवर्षी ठरवून सहकुटुंब पर्यटन करतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते.
आकडय़ांची भाषा
संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार जगात दरवर्षी २० कोटी लोक पर्यटनाच्या निमित्ताने घराबाहेर असतात. गेल्या दशकभरात ही संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. अर्थव्यवस्थांमधील चढउतारांच्या वातावरणातही लोकांचा पर्यटनाचा उत्साह कमी झालेला नाही. भारतातील परिस्थिती पाहिली तर पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांना परदेशी पर्यटक कसे वाढतील ही एकच चिंता असते, कारण आपल्याकडे परदेशी पर्यटक २ टक्के तर देशी पर्यटक  ९८ टक्के अशी स्थिती आहे, अर्थातच परकीय चलन मिळावे हा त्यामागचा हेतू आहे, पण देशी पर्यटकांकडेही पैसा नाही असे नाही. त्यांच्यामुळे पर्यटनस्थळाच्या ठिकाणी स्थानिक लोकांच्या विकासास चालना मिळू शकते.
*पर्यटकांनी कुठेही गेल्यानंतर त्या गावात कचरा व्यवस्थित कचरा पेटीतच टाकावा.
*पर्यटनस्थळाच्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असेच वर्तन असावे.
*ऐतिहासिक पर्यटनस्थळी गेल्यानंतर आपण तेथे आपली नावे कुणी पराक्रमी पुरुष किंवा स्त्री असल्याप्रमाणे कोरण्याचा मोह टाळावा.
*पर्यावरणस्नेही वाहतूक साधनांचा वापर करावा, जसे आग्रा येथे विजेवर चालणाऱ्या रिक्षा आहेत.
*तीर्थक्षेत्रांचे पर्यटन हा फार गांभीर्याने घेण्याचा विषय नाही असे समजले जाते, पण तिथेही लोकांनी अस्वच्छता टाळावी. वाराणसीमध्ये गंगेची दूरवस्था या पर्यटनाने झाली आहे. ’पंढरपूरमध्ये वारीच्या वेळी व इतर वेळीही काय स्थिती असते हे सर्वाना माहीत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी शासनाने स्वच्छतागृहे व इतर सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
*पर्यटकांनी देशात किंवा परदेशात पर्यटनाला जाताना आवश्यक ती ओळखपत्रे व इतर कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे.
       त्यात दुसरा मुद्दा असा की, तेथील स्थानिक लोकांनीही पर्यटकाला अवाच्या सव्वा किमती सांगून लूट करू नये. कारण आपली संस्कृती अतिथी देवो भव असेच सांगते. शहरी भागातील लोकांना त्यांच्या कामातून विसावा मिळावा म्हणून ते पर्यटनाला जातात.
         पर्यटन उद्योग हा मनोरंजन  आणि रोज़गारा बरोबरच देशाच्या विकासात देखील मोलाची भूमिका बजावितो
म्हणून पर्यटन उद्योग  जास्तीत विकसित करावा व शासनाने व जनतेने देखील याचे महत्व जाणून पुढील वाटचाल करणे  व युवकां करिता रोजगारच्य  नव्या संधी शोधने गरजेचे आहे.


 ( यातील प्रातिनिधिक सर्व छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत.)

नक्षलवाद आणि सरकारमधे फसलेला "आदिवासी विकास"

 नक्षलवाद आणि सरकारमधे फसलेला "आदिवासी विकास"


IMAGE SOURCE   INTERNET

संदिप बोऱ्हाडे,पुणे


 नक्षलवाद म्हटले कि आदिवासी समाजाकडे पाहिले जाते नक्षलवाद हीच आदिवासी समाजाची ओळख झालीय. आणि 99% आदिवासी लोक हे नक्षलवादी आहेत हे कटू सत्य आहे ते नाकारता येणार नाही. निसर्गाला देव मानून पूजा करणारा आदिवासी वरून दिसताना अगदीच खडकासारखा कठोर दिसतो....परंतु मनातून तो फणसाच्या बियांपेक्षा
ही गोड असतो. हे आपणास आदिवासी भागात गेल्यानंतर अनुभवायास मिळते. मग असे असताना आदिवासी कसा काय नक्षलवादी बनू शकतो ??

    आज प्रत्येक आदिवासी घरात एक नक्षलवादी आहे हि किती लोकांना माहित आहे आपल्याला नक्षलवादी म्हणजे हातात AK 47 बंदूक , कमरेला हेंड ग्रीनेड , आठ दहा मेगजीन हा पेहराव म्हणजे तुम्हाला नक्षलवादी वाटत असेल तर तुम्ही चुकताय , नक्षलवाद अभ्यासायची प्रत्येकाला गरज आहे असे मला वाटते .! नक्षलवाद म्हणजे फक्त गोळीबार ,बॉंबब्लास्ट नाही, ती एक चळवळ आहे ....आणि हि चळवळ आरक्षण या शुल्लक शब्दासाठी तयार झालेली नाही , हि चळवळ तयार झालीय ती आदिवासी परंपरा , संस्कृती , वनसंपदा वाचवण्यासाठी , वनांचे रक्षण कार्यासाठी आदिवासींच्या जमिनी वाचवण्यासाठी आणि आदिवासींचे शोषण थांबवण्यासाठी..

    आदिवासी गरीब.....एक वेळच्या अन्नाची मारामार अशी बिकट अवस्था असताना नक्षलवाद्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे, विस्फोटके यासाठी पैसा कुठून मिळतो? नक्कीच नक्षलवाडी कारवाया जर १००% आदिवासींकडून केल्या जात असतील तर त्यांच्याकडे यासार्वान्साठी लागणारा पैसा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे शक्यच नाही. कारण लोकांना शेतीत उत्पन्न नाही, रोजगाराच्या संधी नाहीत...त्या भागात पैसा मग तो कोणत्याही कारणासाठी असो उपलब्ध होवूच शकत नाही. मग असे असतानाही जर नक्षलवादी कारवायांमध्ये आदिवासी तरुण-तरुणी सहभागी होत असतील तर यागे खूप मोठे राजकीय वा सामाजिक षडयंत्र असू शकते. त्यात नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी जे पोलीस किंवा इतर सुरक्षा अधिकारी नेमले जातात ते सुद्धा आदिवासीच असतात....म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा हा आदिवासीच असतो. कोणी कोणाला मारले हे महत्वाचे नाही.....परंतु मारणारा हा आदिवासी होता किंवा आहे याचे दुख एक आदिवासी म्हणून मला वाटते. आणि ज्या भागात आजही रस्ते ,वीजदेखील नाहीत तिथे गरीब आदिवासी बांधवांकडे अत्याधुनिक हत्यारं आणि दारूगोळा कसा पोहोचतो हे मात्र मला न सुटलेले कोडे आहे.

    देश स्वतंत्र झाल्या नंतरही आजही माझा आदिवासी समाज अजूनही का विकासापासून दूर आहे.आमच्या डोंगरात कधी रस्ता,दवाखाना,शिकण्याची सोय नाही काहीही सुविधा नाही तरीही आदिवासी समाजाने कधीही आंदोलन केल नाही. का तर माझा समाज अल्प समाधानी कधी कोणलाही त्रास न देणारा म्हुणन की काय आज देशाच्या अनेक वर्षानंतर काही मतलबी राजकारणी लोकानी माझ्या समाजाचा संपायचा घाट घातला आहे.वाह.....रे राजकारणी लोकानो तुमच्या राजकारणासाठी आमच्या समाजाचा जर तुम्ही वापर करताय पण कधी या आधी आमच्या समाजाच्या विकासबद्दल भ्र शब्द काढला नाही,तुमच्या मालकीच्या टीवी मीडियावाल्यानी कधीही आदिवासी लोकाची खरी बाजु दाखवली नाही. आदिवासी लोकाची अजूनही सरकार दरबारी उपेक्षाच केली आहे आणि अजूनही करताय.कधी विकासाचा नावाखाली तर कधी नक्षलवादी ठरवून आमचा समाजाचा घात केला आहे.कधीही आमच्या समाजाच हित बघितल नाही पण राजकारण मात्र जोरात सुरु आहे.

   पोलीस किंवा मिलिटरी यांच्या कोणत्याच प्रयत्नातून आजपर्यंत तरी नक्षलवाद कुठे मोडीत निघाल्याचे आपणास ऐकिवात नसेल. मग जर हा नक्षलवाद असाच फोफावत राहिला तर उद्या हे सरकार नक्षलवाद्यांच्या नावाखाली संपूर्ण आदिवासी जमातीला बदनाम करून आपले अस्तित्व संपुष्टात आणण्यास मागे पुढे पाहणार नाही. मी  नक्षलवादाला बिलकुल सपोर्ट करीत नाहीये.आपल्या लोकशाही देशात आपल्याच नागरिकांवर होणारा कुठलाही सशस्त्र हल्ला आणि बंड पुकारणारी चळवळ ही संपवलीच पाहिजे.परंतु,मला त्याला संपूर्ण नष्ट झालेला पाहायचा आहे.आणि हा नक्षलवाद ज्या कारणासाठी तयार झाला ते कारणे देखील समूळ नष्ट होताना पाहायची आहेत.केवळ मुस्कटदाबी नाही तर डेमोक्रॅटिक मार्गानी हा प्रश्न सुटताना पहायचा आहे. आदिवासींची जमीन कारखानदारच काय पण सरकारही घेऊ शकत नाही या सुप्रीम काॅर्टाच्या निर्णय आहे.. आदिवासींना संविधानाने दिलेल्या स्वशासन व जमीनीचा हक्क अश्या अनेक गोष्टी आहेत पण कोणतही सरकार या गोष्टी मान्य करायला तयार नाहीत.




IMAGE SOURCE   INTERNET


    सोनी सोरी या महिलेची नक्षलवादाशी संबंधित कहाणी देखील तुम्ही गूगल वर serach करून पाहू शकता.
काही दिवसांपूर्वीच न्यूटन movie आला त्या picture ला अनेक पुरस्कार देखील मिळाले जरूर पहावा...
संघर्षाच्या अनुषंगाने तिथल्या आदिवासींचे कसे हाल होतात, हे खुबीनं दाखवलं आहे. चित्रपटाचा मुख्य हेतू हाच आहे. लष्कर आणि नक्षलींच्या लढ्यात मूळ आदिवासींना काय हवंय, याचा विचार कोणी करतंय का ? नक्षलप्रश्न खराच पण त्याच्या आड लपून, आदिवासींवर अन्याय करत भांडवलशाहीचं धन करणारी राजकीय व्यवस्था निर्माण झाली आहे का ? या सगळ्या अतिशय निराशाजनक परिस्थितीत एखादा प्रामाणिक अधिकारी त्रासदायक का होतो ? कर्तव्यपालन, प्रामाणिकपणा हे शब्द मागच्या पिढीतच निर्वतले का ? असे अनेक अनेक प्रश्न हा सिनेमा समोर ठेवतो. अस्वस्थ करतो.
एक फार छान संवाद आहे.

"क्या आप भी इनके जैसे निराशावादी है?"                   
"मैं तो आदिवासी हूं."




                                                                                                             IMAGE SOURCE   INTERNET


शिवाजी जन्माला यावा तो शेजारच्या घरात , आपल्याकडे का नको ...! नेत्यांच्या पोरांनी युवा नेता ,भाऊ , दादा , आमदार , डॉक्टर , इंजिनियर , मोठमोठे व्यवसायिक होत आहेत आणि आमच्या आदिवासी समाजाने नक्षलवादी व्हायचे हे मला पचत नाही. कदाचित शब्दांची मर्यादा ओलांडली असेल त्याबद्दल क्षमस्व...

नविन धर्म की धर्मनिरपेक्षता.... भारताला कशाची गरज आहे?

*नविन धर्म की धर्मनिरपेक्षता.... भारताला कशाची गरज आहे?*
श्रीनाथ कासे 
सोलापूर 


     मुळात धर्म म्हणजे काय ? जे आपल्या शाळेच्या दाखल्यावर लिहिलेले असते ते, का ?  की अजून काही व्यापक स्वरूप आहे. धर्म किंवा जात मिळवण्यासाठी माणूस काही मोठे काम करतो काय ? नवीन धर्म अस्तित्वात का येतो ? नवीन धर्म पाहिजे की धर्मनिरपेक्षता हवी ? असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील.
     मुळात माणूस पृथ्वीवर कसा निर्माण झाला ? पृथ्वीतलावर तो महाबलाढ्य कसा झाला ? हा प्रवास रोमांचित करणारा आहे. हजारो वर्षांपूर्वी माणूस योग्य काम आणि विचार करायला शिकला. त्याला अग्नी, लोखंड, निसर्ग आणि जगाचे ज्ञान मिळाले. असा माकड ते माणूस प्रवास एकंदरीत मोठा आहे. जंगलातुन बाहेर पडून कापडाची निर्मिती - खाण आणि धातू  या सगळ्यांचा वापर करून तो पुढे चालू लागला. या प्रवासात 'धर्म' नावाचा टप्पा नंतर समूहात आल्यावर आला. तोपर्यंत माणसांना धर्म नव्हता आणि जातही...
     आपल्या धर्मावर आणि जातीवर आपल्याला प्रचंड अभिमान असतो. ते असायला हवे का -नाही, हे निर्मितच जाणे. पण जेव्हा यामध्ये कट्टरपणा येतो तेंव्हा देश आणि विश्व धोक्यात येते. आपलाच धर्म श्रेष्ट बाकी सगळे बकवास असे म्हणणारे माझे काही सुशिक्षित मित्र आहेतच."धर्म किंवा जात मिळवण्यासाठी तुझा काहीच हात नव्हता ते तुला आपोआप मिळाले आहे" असे मी त्यांना गंमतीने म्हणत असतो.
      काही दिवसांपासून नवीन किंवा वेगळ्या धर्माची मागणी होत आहे. त्यांना मान्यता द्यायला काहींचा विरोध आहे तर काहींचा पाठींबा. दोघांचे म्हणणे आपापल्या पद्धतीनं कसे अभ्यासू आणि चांगले आहे, ते सांगत असतात. माझ्यामते लोकांना जिथे जास्तीत जास्त स्वातंत्र्य आणि आनंद मिळते त्या धर्मात त्यांनी रहायला काही हरकत नसावी.
    नवीन धर्म उदयास आल्या आणि पुढे अजून उदयास येतीलही...सर्जनशीलता आणि नाविन्याशिवाय मानवाचा विकास होत नसतो. जुन्या धर्मातील रुढी, परंपरा, संस्कृती यातील ज्या चुका आहेत त्या सुधारून तो धर्म बनत असतो पण माणूस हा चुकीचा पुतळा आहे त्यामुळे धर्मातही अनेक चुका असू शकतात. कुठलाही धर्म परिपूर्ण नसतो. धर्म ही अफूची गोळी असते त्यामुळेच बहुदा या विषयावर लिहिण्याचा सर्वजण टाळतात. 
      26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत करण्यात आला. संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष (Secular) हा शब्द 42 व्या संविधान संशोधनाद्वारे 1976 साली जोडण्यात आला. हा शब्द जोडण्याच्या अगोदर पुरातन काळापासूनच भारतात " सर्व धर्म समभाव " चालत आला आहे. या देशाला कुठलाही अधिकृत धर्म नाही. पण राज्यघटनेत आपला धर्म पाळण्याचा अधिकार व धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकाना अनुच्छेद 29 आणि 30 नुसार विशेष अधिकार देण्यात आले आहेत. 
शेवटी इतकेच सांगायचे आहे, 'नवीन धर्म हवे किंवा जुने धर्म हवे, की धर्मनिरपेक्षता ज्याचे त्याने ठरवायचे आहे. तुम्ही आता स्वतंत्र आहात आणि भारतीय राज्यघटना तुमच्या पाठीशी आहे.'

शिक्षणाचा खेळखंडोबा

शिक्षणाचा खेळखंडोबा

सिमाली भाटकर,रत्नागिरी
शिक्षण आजच्या काळातील प्राथमिक गरज सर्वांची पण खरंच हे शिक्षण मोफत मिळत का? बरं मिळालं तरी पुढे भविष्यात काय कारण 14 वर्षे मोफ़त शिकायला मिळत पण रोजगाराच्या संधी तर उच्चशिक्षित लोकांना मग सामान्य माणूस कुठे जाणार. उदा पैशा अभावी 10 वी शिकून जर शिपाई पदाचे अर्ज निघाले तर अक्षरशः अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी देखील अर्ज दाखल करतात. आता हे आपल्या देशातील बेरोजगारी चे कारण की अजून काही हा भाग नंतर पण अशा सामाजिक प्रश्न निर्माण होतोय.
        अगणित शिक्षण संस्था उदयास येतात त्यांची फ़ी तितकीच जास्त पण त्या खरच शासन मान्य आहेत की फक्त देखावा एखादा गरीब विद्यार्थी तिथ प्रवेश घेतो आणि तिथून बाहेर पडले की त्याला कळत आपण चुकीच्या ठिकाणी प्रवेश घेतला. काही ठिकाणी गुणवत्ता नाही तर पैसे किती देऊ शकतो विद्यार्थी यावर त्याचा प्रवेश निश्चित होतो.
मुळात याला जबाबदार कोण शासन की चुकीचे निर्णय घेणारे आपण. अशा संस्था भरमसाठ शुल्क आकारून विद्यार्थ्यांना नोकरी, वेगवेगळ्या प्रकारची सवलती असे लालच दाखवून त्यांची फसवणूक केली जाते.
     सरकारने यावर चर्चा करून उपाय योजने गरजेचे आहे. प्रवेश घेण्यासाठी लाखो रुपये डोनेशन म्हणून मागितले जाते अगदी शालेय शिक्षणापासून ते अभियांत्रिकी, मेडिकल वेगवेगळ्या क्षेत्रात आणि संवस्थेला मदत अस लेबल लावलं जात मग सरकार जे मदत देते ती कुठे जाते हा प्रश्न उपस्थित होतो.

    स्वतःच्या मुलाला शिकवण्यासाठी मग आई वडील जीवाचं रान करतात शेतकरी मायबाप तर घाम गाळून कष्ट करतात आणि त्यांच्या पाल्याची अशी फसवणुक झाली तर ते कोलमडून पडतात.
मला कोणत्याही प्रकारची शिक्षण पद्धती वरती आक्षेप नाही फक्त इतकंच म्हणायचे आहे की की जे ज्ञान आपण देतो त्यातून विद्यार्थी घडतो मग ईथेच त्याची फसवणूक झाली तर तो काय करेल.
      ज्ञान दिल्याने वाढते त्या ज्ञानाचं मंदिर अशी शाळेची महती आहे पण आजच्या काळात ती पैसे गोळा करणारी संस्था होऊन बसली आहे म्हणजे प्रवेश हवा तर पाहिलं दान करा.
    महात्मा फुले यांनी भारत घडावा म्हणून समाजास शिक्षण दिले शाळा स्थापन केल्या आजच्या भारतात फक्त नाव लौकिक व्हावा आणि पैसे मिळवण्याचं माध्याम म्हणून शाळा कॉलेज स्थापन होतात.
    अशा प्रकारे घडेल का भारतीय सुजाण नागरिक अपेक्षांच्या ओझ्याखाली आधीच दबलेला विद्यार्थी पुढे त्याच्या पाल्याला म्हणेल का शाळा मंदिर आहे विद्येचे?
कारण ज्या ज्ञानाने हा देश घडवायचा आहे त्याच बाजारीकरण कुठेतरी थांबलं पाहिजे नाहीतर आपला विद्यार्थी मित्र आयुष्य भर अपेक्षांच्या ओझ्याखाली राहील कारण माणूस जन्मा पासून मृत्यू पर्यंत तो शिकत असतो फक्त त्याला ते कळत नाही. आणि तो म्हणतो

अपेक्षांचं ओझं जेंव्हा जेंव्हा माथी येत आयुष्य तेंव्हा तेंव्हा,
एका पैजे सारख भासत,


अभिजीत गोडसे,सातारा
             ' माणसाच्या प्रत्येक समस्यांचे मुळ हे शिक्षणच आहे. जे राष्ट्र  शिक्षणावर गुंतवणूक करते. शिक्षणाची पाया भरणी करते तेच राष्ट्र 'विकसित' झालेले पहावयास मिळते. अशी बरीच उदाहरणे सांगता येतील. माणसाला अन्न , वस्ञ , निवारा याची जशी गरज आहे. त्याच प्रमाणे 'शिक्षणाची' ही  तेवढेच गरज आहे.


                शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे का ? या प्रश्नाचे उत्तर 'हो' असेच आहे. पूर्वी गुरू आणि शिष्य यांचे फार चांगले नाते असायचे. आजची परिस्थिती पूर्णच उलटी आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांचा फारसा काही वैचारिक संबंध येताना दिसत नाही . आलाच तर तो फक्त पुस्तकी ढोस पाजण्या पुरता चार भिंतीच्या वर्गात. सर्वात मोठा प्रश्न आहे तो    वाढती लोकसंख्या आणि याच प्रमाणात रोजगार उत्पन्न न होण्याचा . सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थीच्या हाताला काम नाही हे आज वास्तव आहे. एकीकडे हे चित्र पहायला मिळत असताना . दुसरीकडे शिक्षणात नव - नवे प्रयोग होताना  दिसत आहेत. झालेही पाहिजेत पण गिरणीतुन बाहेर आलेल्या पिठाला आज किंमत आहे का ? तर नाही. शिक्षण देणाऱ्या संस्था आज खूप झालेल्या आहेत. पण 'गुणवत्तापुर्ण शिक्षण' देणाऱ्या संस्था हाताच्या बोटावर मोजता येतील येवढ्याच आहेत. हे नाकारून चालणार नाही . मागील दशकात डि एड चे वारे आले. पुन्हा एमबिएचे आले. ते गेले कि डाँक्टर आणि इंजिनीयर आता यांची ही क्रेज गेली . परवा सरकारने चाळीस हजार फार्मसी काँलेज काढण्यासाठी परवानगी दिली. आगोदरच बेरोजगारी यात आणखी अशा काँलेजना परवानगी देऊन काय सांध्य होणार. त्यात पालकांची इच्छा असते मुलांनी खुप शिकावे. आमचा मुलगा इंजिनियर , डाँक्टर बनला पाहिजे. हे सर्व ठिक पण आज पाणटपरी असल्या सारखे जोगोजागी दवाखाने शहरी भागात दिसतात. महिन्याचे गाळ्याचे भाडे निघण्याची मुश्कील असते. तसेच इंजिनियरची तर फारच बिकट अवस्था खाजगी संस्थान मध्ये बारावीला छत्तीस टक्के पडलेल्याही अँडमीशन मिळते पाचव्या सहाव्या  लिस्टला नाव आले की भक्कम पैसा भरून पालकांची आणि मुलांची छाती फुगुण येते. पण हेच मुलं जेव्हा नामांकीत कंपनी मध्ये नोकरी शोधण्यासाठी जातात तेव्हा त्यांची त्यांना लायकी समजुन येते. टोलेजंग इमारती , स्विमींग तलाव , गार्डन , ड्रेस कोट अशां रंगीबेरंगी दिवा स्वप्नात मुल त्या काँलेजला शिकलेली असतात. जोडील कंञाटी पदावर अल्प पगारात काम करणारे तरुण प्राध्यापक असतात. येथे या गुरुजणांचे अल्प पगारात संसार चालत नाहीत ते अशा परिस्थिती मुलांना काय शिकवत असतील ? पण असो नातेवाईकांन मध्ये सांगायला झाले आमचा मुलगा इंजिनियर झाला.

           सहकारच पिक आपल्याकडे उंदड आहे. प्रत्येक मतदार संघामध्ये कारखाने जोडीला समाजसेवा म्हणून काढलेल्या टिनपाट संस्था. जो आमच्या शाळेत , संस्थेत प्रवेश  घेणार त्यालाच कारखान्याचे सदस्य होता येणार हा जणू काही  आदेशच. ग्रामीण बिचारा आदोगरच आर्थिक बाजू कमी असल्याने. पण पोरग शिकल पाहीजे आणि घराचा गाडा पण चालला पाहिजे  म्हणून  तो तरी काय करणार साखर तरी कमी पैशात मिळते. म्हणून आपल्या मुलांना अशा शाळेत प्रवेश घेण्यासाठी भाग पडले जाते. मतपेटी साठी केलेला हा राजकीय लोकांचा धंदाच असतो. निमशहरी भागात आणि शहरी भागात खाजगी क्लास वाल्यांचा काँलेजच्या, शाळेच्या  ठिकाणी प्रचंड धुडगूस सुरू असतो. दहावी, बाराही आणि विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांचा अक्षरशः आर्थिक पिळवणूक करुण घेतली जाते. मुलांच्या जिवावार हे क्लासवाले फोरच्युनर गाडीतून फिरायला लागले. तिकडे काँलेजीची फि भरायची आणि इकडे क्लासला येऊन बसायचे . म्हणजे काँलेजचे प्राध्यापक फुकटच पगार घेत असतात. बरीच विद्यापीठे बोगस डिग्री वाटत आमच्या  विद्यापीठाला कसे नँकचे 'ए'  नामांकण मिळले यांचा टिमका वाजवतात. खरे तर रोजगारासाठी बदलत्या परिस्थिती मध्ये गुणात्मक शिक्षण देणे फार गरजेचे आहे.

          शिक्षणाने व्यक्ती समृद्ध होते. परंतु जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी खायला लागते . या साठी हाताला काम पाहीजे. जर तेच मिळत नसेल तर ?

नवनाथ जाधव,परभणी
        महात्मा फुले म्हणतात, *शिक्षणाचा अव्हेर कराल,* *देशोधडीला जाल!* या एका वाक्यात शिक्षणाचे शिक्षणाचे महत्व फुले प्रभावीपणे प्रतिपादन करतात.  त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्यानंतर शाळा उघडण्याची मोहिम सुरुच राहिली.
         त्यांच्या शाळेतील अकरा वर्षे वयाची मुक्ता साळवे चिकित्सक पद्धतिने निबंध लिहिते, *आम्हाला धर्म आहे का?* या निबंधाला ब्रिटिश अधिकारी कँडी साहेबांच्या हस्ते बक्षिस मिळते, त्यावेळी  मुक्ता म्हणते, *"Sir, don't give us chocolate, give us library."*
         ही मुक्ता दिडशे वर्षापूर्वीची आहे, आज अशा मुक्ता घडताना आढळतात का? दिडशे वर्षापूर्वी अशी मुक्ता घडू शकली कारण शिक्षणव्यवस्था महात्मा फुलेंची होती, मुक्ता ही लहुजी साळवेंची नात होती म्हणजेच तिच्या घरी शैक्षणिक वातावरण होते. आजच्या शिक्षणाच्या खोळंब्याला शिक्षण व्यवस्था जशी जबाबदार आहे, तसाच पालकांचा शिक्षणविषयक दृष्टिकोणही जबाबदार आहे.
         आज *शिक्षणावर होणारा खर्च जेवढा जास्त तेवढे शिक्षण दर्जेदार* असे गणित बनत चालले आहे, *मातृभाषेपेक्षा इंग्रजी शाळेतून मिळणारे शिक्षण दर्जेदार असते* असाही गैरसमज वाढताना दिसतोय, अशा शाळांतून गुणात्मक शिक्षणापेक्षा बोलके पोपट तयार होण्यावर जास्त भर दिला जातो. आज जि.प./मनपा शाळांकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोण तयार होत आहे, याला प्रशासन, शिक्षक जसे जबाबदार आहेत त्याचप्रमाणे पालकही जबाबदार आहेत.
         जे पालक खाजगी शाळेत पैसे भरायला तयार असतात, तेच पालक खाजगी शाळेतील एका महिन्याएवढे पैसे  जिप/मनपा शाळेसाठी वर्षासाठीही द्यायला तयार होत नाहीत. जिप शाळांमध्ये नविन पिढीतील शिक्षक तळमळीतून अनेक उपक्रम राबवून गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी झटत आहेत, त्यांना पालकांनी साथसहयोग देण्याची गरज आहे.
         मुलांना क्लासेसला पाठवण्यापेक्षा त्याचा स्वतः तासभर अभ्यास घ्यावा, ही प्रवृत्ति वाढीस लागणे आवश्यक आहे, एक वर्ग शेतकरी कष्टकय्रांचा आहे, जे शारीरिक कष्ट करुन जगतात ते थकून येतात, त्यामूळे आपलं मूल पुस्तक उघडतय का? हे पहायलाही त्यांना वेळ नसतो, त्यांचा शिक्षणविषयक एवढा नकारात्मक दृष्टिकोण आहे. शहरी भागातील शिक्षित पालक मोबाइल आणि टिव्हीच्या बाहेर यायला बघत नाहीत.
         शिक्षणावर होणारा खर्च एकूण खर्चाच्या टक्केवारीत नगण्य आहे, तो वाढण्याची नितांत गरज आहे, शिवाय जिप शाळांतील शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढून घेऊन गुणात्मक दर्जा वाढावा, यासाठी प्रशासनाने मुल्यांकन पद्धति विकसित करुन त्याची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी पण विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्वपूर्ण पालकांची भूमिका आहे, आपण मुलांसाठी किती पैसे खर्च करतो, याबरोबरच आपण मुलांसाठी किती वेळ खर्च करतो याचाही लेखाजोखा पालकांनी ठेवावा.
               
सौदागर काळे,पंढरपूर.
तुमच्या घरातील एखादा व्यक्ती व्यसनी असेल तर घर पूर्ण लयाला जातं.पण जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा देश लयाला जाण्यासाठी 'बि'घडवलेलं शिक्षण दर्जा पुरेसा असतो. शिक्षण प्रक्रिया हा एक प्रवाह आहे.तो स्वच्छ वाहता ठेवणं देशासाठी,नव्या पिढीसाठी खूप गरजेचे आहे.पण आज हे क्षेत्र पाण्याचा उपसा न केलेल्या विहिरी सारखे झाले.म्हणजे समजा उपसा करायचे ठरवले तर नव्या पाण्याचा पर्याय लवकर उपलब्ध  होत नाही.अशा कात्रीत ही व्यवस्था सापडली आहे.

आपली विद्यापीठे काय करतात.कोणतं आणि कसलं शिक्षण देतात.कोणत्या दर्जाच्या दरवर्षी पदव्या वाटतात.नालंदा, तक्षशिलाचा वारसा सांगणारे जगाच्या क्रमवारीत का नसतात? आता यावर चर्चा करण्यात काहीच उपयोग नाही.

मराठीत एक म्हण आहे,'आडात नाही तर पोहऱ्यातच कुठून येणार.'अशा काही अर्थाची. तर दुसरी एक म्हण आहे,'अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं' पहिली म्हण शिक्षणाचा दर्जात्मक पाया मजबूत नाही,हे दर्शवते.तर दुसरी म्हण 'गिरपर भी टांग उपर' अशा आवेशात प्रदर्शन करणारी आहे.अशी अवस्था आज आमची झाली.

शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार होतो आहे.हे जगजाहीर आहे.अनेक खाजगी शिक्षण संस्था गरीब विद्यार्थ्यांच्या टाळूवरचे लोणी खाताना दिसत आहेत.शिक्षण शिकायला पैसा, नोकरीसाठी पैसा, नोकरीला लागलेले लोक पुन्हा हे चक्र अविरत चालू ठेवण्यासाठी जनतेला लुटताना पैसा हेच साधन वापरतात. अशावेळी महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील यांना , *"हेचि फळ मम काय तपाला"* असं वाटल्याशिवाय राहिलं नसेल.

शिक्षणातून रोजगारनिर्मिती सतत करायची  असेल तर विद्यापीठांना 'मागणी आणि पुरवठा' या अर्थशास्त्रीय सिद्धांताचा न थकता लवकचिकपणे जगाच्या बाजारपेठेत वापर करण्यासाठी सज्ज व्हायला हवं तरच भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्येचे संधीत रूपांतर करता येईल.पण आज देशातील शिक्षण व्यवस्था रोजगार निर्मिती करण्याऐवजी बेरोजगार निर्मितीचे कारखाने झाले आहेत.नुसते जत्रेतले फुगे निर्मित होत आहेत. धक्का लागण्याच्या आतच फुटण्याची जास्त शक्यता.

शिक्षणाचा खेळखंडोबा या शीर्षकाखाली कितीही कसरतीचे डाव मांडता येतील.तरी ते अपूर्णच राहतील.पण एक नव्हे अनेक धोक्याच्या घंटेचा घनानाद होऊ लागला आहे...देश अराजकतेकडे झुकू लागला आहे,नविन ऊर्जित तरुण मुलं दगड बनत आहेत;परिणामी दंगली घडू लागल्या, धर्म-जातीच्या अफूच्या गोळ्या मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागल्या आहेत,अजून बऱ्याच गोष्टीतून देश आतून पोखरला जात आहे; तिथे परक्यांचे बाँब हल्ले फिके पडत आहेत.

हे सारं घडण्याचं मूळ आहे....शिक्षण. हलकं,भ्रष्टाचारी, नीतिमूल्ये हरवलेलं , दर्जाहीन शिक्षण.

या शिक्षणाच्या खेळखंडोबाच्या नावाने नटरंग चित्रपटातील *"...खेळ मांडला...खेळ मांडला..."* हे गाणं ऐकत ऐकत थांबतो.

शिरीष उमरे
शैक्षणिक क्षेत्रात घुसलेले राजकारणी व संधीसाधु कार्पोरेट नी शिक्षणाचा धंदा करुन टाकलाय. दर्जेदार प्राथमिक शिक्षण सारखी अत्यावश्यक गोष्ट सरकार पुर्ण करु शकली नाही तर चांगले नागरिक कुठुन तयार होणार ? शिक्षणातुन कारकुन व सांगकामे तयार होणार असतील तर छोटे उद्योजक व चांगले व्यवस्थापक कसे जन्माला येतील ? हे दृष्ट चक्र तोडणे तेव्हाच शक्य आहे जेंव्हा चांगल्या मानसिकतेची लोक निवडुन दिल्या जातील व ज्यांच्या मदतीने हा खेळखंडोबा मोडुन नविन शिक्षणप्रणाली स्थापित करता येईल. आज जपान, जर्मनी, स्वीडन व नॉर्वे सारख्या छोट्या देशांकडुन खुप काही शिकण्यासारखे आहे. ते माणुसकी व निसर्ग जपणारे नागरिक घडवतात.

समीर सरागे,यवतमाळ
   शिक्षणाने मानुस मोठा होतो ,   शिकल्या सवरल्याने  मनुष्यला योग्य - अयोग्यतेची जाणीव होते, शिक्षणानेच मानुष्य प्रगती साधु शकतो  आणि शिक्षण हे तर बाघिनिचे दूध आहे आणि हे दुध पिल्या नंतर मानुस गुरगुरल्या शिवाय राहत नाही असे ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. शिक्षणाचे खरे महत्व क़ाय हे तेव्हा कळले।
शिक्षणाची मोठी परंपरा लाभलेल्या या देशात पूर्वी  गुरुकुल  शिक्षा पद्धति अस्तित्वात होती  आणि आज देखील प्रख्यात शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांच्या माध्यमातून आपल्याला उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे. परंतू आज जागतिकीकरणाच्या युगातच या शिक्षणाचा खेळखंडोबा का झाला? याची बरीच कारणे आहेत. शिक्षण हे दान राहिले नसून तो आता एक प्रकारे कॉरपोरेट व्यवसाय होऊन बसला आहे.

सोबतच  नोकरी मिळविण्याचे साधन म्हणून देखील शिक्षणाकडे पाहण्याची प्रवृत्ती वाढीस लागली हे महत्त्वाचे कारण सांगता येईल. कारण की चांगले शिकले म्हणजे चांगली नोकरी मिळेल असा गोड़ गैरसमज आजकाल पालकांच्या मनात येत आहे. अर्थात ते बऱ्यास अंशी योग्यही आहे. मग याचबरोबर येणारा नोकर भरतीतील भ्रष्टाचार, कारकुनी पद्धतीचे शिक्षण, अभ्यासक्रमातील दोष, संस्थाचालकांचा हस्तक्षेप आणि त्यामुळे शिक्षणाचे झालेले बाजारीकरण या बाबी खेळखंडोबा होण्यास कारणीभूत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक कारणे सांगता येतील.

आजकालचे पालक स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यास कोणत्याच प्रकारची कसर शिल्लक ठेवत नाही. इतके त्यांनी शिक्षणाचे महत्व जानले आहे. आणि याचाच गैर फायदा घेऊन काहिनी आपली शैक्षणिक दुकाने थाटली आहेत

कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण असो, आज जागतिकीकरणाच्या युगात शिक्षणाला बाजारू स्वरूप प्राप्त झालेले आहे. मूळात विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांवर आजच्या व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. त्यांच्यावर व्यवस्थेमुळे विविध बंधने येत आहेत, काहीवेळा आणली जात आहेत. विनाअनुदानित तत्त्वावर बरेच प्राध्यापक कित्येक वर्षे काम करत आहेत. परंतु संस्थाचालकांचा हस्तक्षेप आणि प्राचार्यांचा बुजगावणेपणा ,सरकारचे महाविद्यालयांतील विविध बाबींवर नसणारे नियंत्रण किंवा या दोहोंचे असणारे लागेबांधे यांमुळे विनाअनुदानित तत्त्वावरील या प्राध्यापकास न्याय मिळत नाही. उपाशी पोटी ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे ह्या दोन्ही गोष्टी आजच्या काळात न केलेल्याच बऱ्या. अर्थात शिक्षणप्रणालीमध्ये यामुळे काय फरक पडत असेल हा संशोधनाचा मुद्दा आहे.

असो, राज्यात आज कितीतरी शाळा विना अनुदानित तत्वावर सुरु आहेत  आणि त्यातही शासनाने शिक्षक भरती बंद केलेली आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शासन प्रत्येक गांव खेड़यात शिक्षणाचा अधिकार या  घटका अंतर्गत प्रत्येक सर्व सामान्य मुला पर्यंत शिक्षण पोहचविन्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु हे अभियान खरच यशस्वी होत आहे का? कारण की अलीकडे प्रार्थमिक शाळा या बहु अंशी  केवळ गप्पा मारण्याच्या आणि गले लट्ठ पगार मिळविन्या पुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. या उलट कॉन्वेन्ट कड़े पालकांचा कल जास्त दिसून येतो आहे केवळ मुलाला इंग्रजी बोलता ,वाचता येते बस्स मात्र एवढेच आजकालच्या पालकाना त्याचे अप्रूप वाटत आहे. परंतु केवळ इंग्रजी येणे म्हणजे गुणवत्ता नव्हे हे समजने देखील तेवढेच गरजेचे आहे. या कॉन्वेन्ट कड़े कल वाढण्याचे कारणही तसेच आहे, सरकारी शाळांचा दिवसेंदिवस खालावत चाललेला दर्जा, शाळांची दुर्दशा , शिक्षकाना  नसलेले संगनकाचे ज्ञान ई. तसेच शिक्षाकाना दिल्या जाणारी अशैक्षणिक कामे हे देखील एक मुख्य कारण आहे ज्यामुळे शिक्षक आपले पाठ्यक्रम पूर्ण करु शकत नाही. या मुळे विद्यर्थ्यांचा अपुर्या  शैक्षणिक गुनवत्ते बरोबरच व्यक्तिमत्व विकास देखील
खूंटतो आहे.

शिक्षणाचा खेळखंडोबा होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अभ्यासक्रम. पारंपरिकते बरोबर नवीन अभ्यासक्रम स्विकारायला आपली अभ्यास मंडळे का तयार होत नाहीत? हा सुद्धा आणखी संशोधनाचा मुद्दा आहे. काळानुरूप अभ्यासक्रम बदलायला हवेत जेणेकरून कोणताही विद्यार्थी काळाच्या ओघात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर टिकू शकेल. अभ्यासमंडळांमध्ये अशा प्रकारचे गट आहेत जे स्वत:च्या ओळखीच्या फडतूस लेखकांच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करतात. ही पद्धत रूढ झाल्यामुळे प्राध्यापकांना ती नाइलाजास्तव शिकवावी लागतात आणि विद्यार्थ्यांनाही सहन करावी लागतात. परिणामी विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास होत नाही. एकच एक दृष्टिकोन तयार होतो. यावरही नियंत्रण असायला हवे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देता येईल. मराठीसारख्या विषयामधून नोकरी, व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. उदा. पटकथालेखन, पत्रकारिता, मुद्रितशोधन, प्रकाशनव्यवसाय, सुत्रसंचालन, नियतकालिकांचे संपादन, भाषांतरकार इत्यादी. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमाची गरज आहे, असे प्रत्येकच विषयात/क्षेत्रात योग्य अभ्यासक्रम तयार करायला हवेत.

शिक्षणातील खेळखंडोबा होण्यासाठी सर्वात जास्त कोणती गोष्ट कारणीभूत असेल तर, ती आहे नोकरभरतीतील भ्रष्टाचार. या वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित झाला आहे. नोकरभरतीत पैशाची देवाण घेवाण केली जाते त्यामुळे गुणपत्ताधारक विद्यार्थ्याला डावलले जाते. अशा चांगल्या विद्यार्थ्याला डावलल्यामुळे विविध दोषांनी परीपूर्ण असलेले शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते परिणामी त्यामधून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे पहावयास मिळते. सरकार विविध शिक्षणसंस्थांना भरभरून अनुदान देते परंतु ते विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वापरले जाते का?

भारतावर इग्रंजानी तब्बल दिडशे वर्ष राज्य केले. आपल्या मधून कारकून निर्माण करण्याच्या दृष्टीने भारतीय शिक्षणाचा पाया घातला गेला. हे सर्वज्ञात आहेच. पण तीच शिक्षणपद्धती आज लागू केली जात असेल तर, हे आजच्या काळात तरी पटण्यासारखे नाही. मग असा प्रश्न निर्माण होतो की, आपण स्वातंत्र्यात आहोत की पारतंत्रात? आपण उदयाची नवी पिढी घडवतोय की कारकून? भारत महासत्ता कसा होईल हा तर फारच मोठा प्रश्न आहे. एकीकडे आपण मंगळापर्यंत मजल मारली परंतु दुसरीकडे आपल्याच देशात आपल्या उदयाच्या भावी पिढीमुळे काय प्रश्न आहेत. याच्याकडे आपण कधी पाहणार आहोत. आजच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झालाच आहे. अपवादात्मक काही शिक्षण संस्था वगळता सर्रास संस्थाचालकाचा होणारा हस्तक्षेप, अभ्यासक्रमातील दोष, नोकरभरतीतील भ्रष्टाचार, कारकुनी पद्धतीचे शिक्षण, या सर्व बाबींमुळे आपली भावी पिढी काळाच्या ओघात टिकू शकेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. आज देशभरात असंख्य ठिकाणी उच्चशिक्षण, तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत आणि त्यामध्ये दरवर्षी भर पडत आहे. आपल्या शिक्षणाचा हेतू काय आहे? हेच अजून बऱ्याच अंशी समजलेले दिसत नाही. आणि त्यामधून भविष्यकालीन ध्येयधोरणे निश्चित झालेली दिसत नाही. शिक्षणाचा हेतू विशिष्ट विषयातील ज्ञान संपादन करणे व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून घेऊन समस्यांचे निराकरण करणे जीवन अधिक सुखी, सुरक्षीत, सुसह्य करणे हा आहे. ही गोष्ट आपल्या विस्मरणात गेली आहे.

बऱ्याचदा असे लक्षात येते की, अलीकडील इंग्रजी माध्यमांमुळे सर्वजण इंग्रजीकडे आकर्षित झालेले आहे आणि त्याशिवाय पर्यायच नाही अशी धारणा निर्माण झालेली आहे. परंतु या देशातील असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे घेतली तर आपल्या असे लक्षात येईल की, त्यांनी आपले शिक्षण मातृभाषेतून घेतले होते आणि जी गोष्ट मातृभाषेतून अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते ती दुसऱ्या कोणत्याही भाषेतून समजू शकत नाही. अर्थात् दुसऱ्या भाषा आत्मसात करू नये असे म्हणणार नाही.

एकेकाळी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अभियांत्रिकीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले होते , मुलाला मोठा इंजीनियर  करण्याचे स्वप्न बाळगुन पालक आपल्या पाल्याना इंजीनियरिंग मध्ये प्रवेश घेण्या करिता प्रवृत्त करीत असतात, मात्र आता हा उत्साह ओसरलेला आहे.  त्यामुळे या महाविद्यालयाची आज मोठीच अड़चन झाली आहे. सन 2016 मध्ये इंजीनियरिंगच्या 44% जागा रिक्त होत्या 2017 मध्ये 43% आणि 2018 मध्ये  इंजीनियरिंगच्या  तब्बल 40 % जागा रिक्त आहेत ही घसरगुंडी महाराष्ट्र राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाची आहे.
गेल्या काही वर्षात कुत्र्यांच्या छत्रर्या सारखी महाविद्यालये उगवली प्रांत इंजीनियरिंग कड़े वाढलेला ओघ आता आटला आहे.
अलीकडे  पालक  आपल्या पाल्याला चुकुनही इंजीनियरिंग कड़े जाण्याचा सल्ला देत नाही. महाराष्ट्रात सद्या 360 अभियांत्रिकी तर 447 पालीटेक्निक कॉलेजेस आहेत 2017 साली 1 लाख 44 हजार जागा पैकी 65 हजार जागा रिक्त आहेत. अशी बिकट परिस्थिति या अभियांत्रिकीची आहे. या घसरनीचे मूळ कारण विद्यर्थ्यांच्या मते पदवी मिळाल्या नंतर  अपुर्या संधी मध्ये आहे. या पेक्षा विद्यर्थ्यांचा कल फार्मेसी कड़े  जास्त आहे.

 म्हणून भविष्यात दर्जेदार व गुणात्मक शिक्षणा साठी अभ्यसक्रमात बदल करून प्रत्यक्षिक व व्यवसायभिमुख  शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. कारण शिक्षणा बरोबरच बेरोजगरीची समस्या देखील निकाली काढ़ायची आहे. कारण बेरोजगारी हा देखील यक्ष प्रश्न आपल्या पुढे उभा आहे.


वरील सर्व प्रातिनिधिक छायाचित्रे इंटरनेट वरून घेतलेली आहेत.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************