बदलती जीवनशैली... हानिकारक की लाभदायक!

बदलती जीवनशैली…हानिकारक की लाभदायक!

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

बदलती जीवनशैली... हानिकारक की लाभदायक!



Source:- INTERNET
-अनिल गोडबोले,
सोलापूर

आपण आज ताण तणाव असलेल्या आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी असलेल्या जीवनशैली मध्ये आहोत.
लहानंतल लहान मूल देखील 'टेन्शन आलाय' अस म्हणत. आपण जरा या जीवनाची 50 वर्षांपूर्वीच्या जीवनशैली सोबत तुलना करून बघुयात. एवढंच कशाला.. 20 वर्षा पूर्वीची जीवनशैली आठवा, एवढी स्पर्धा एवढं राजकारण, एवढी भीती आणि मोठेपणाची हौस बाळगून आपण जगतो आणि पैसे कमावतो... पुढे त्या पैशाचा उपयोग्य किती होतो आणि दुरुपयोग किती होतो... हा एक वेगळा संशोधनाचा मुद्धा.
तर जीवनशैली आपली चुकीची आहे... म्हणजे नेमकं काय? हे जरा आपण बघू.....

आपल्या कडे तंत्रज्ञान आलं आणि त्याने खूप सुखसोयी आणल्या, पण त्या सुखसोयीच्या आपण किती आहारी गेलो... ते आपल्यालाच कळलं नाही..
आपण सकाळी उठतो, प्रातर्विधी आटोपले की चहा घेतो, जो सकाळी सकाळी आपल्याला तरतरी देतो... तरतरी म्हणजे काय?.. टॅनिन नावाचं विष आहे जे रक्तात मिसळत त्यासोबत साखर शरीरात एकदम घेतली जाते.. जी खरतर आवश्यक नाही कारण पुन्हा जास्त झालेली साखर कमी करण्यासाठी लगेचच इन्सुलिन तयार करावे लागते.. पुन्हा डायबेटीस .. होण्याच्या करणामधील एक कारण.
त्यानंतर सोशल मीडिया(या बद्दल बोलेल तेवढं कमी आहे) इतर ताण तणाव... त्या मध्ये नाष्टा (जो संतुलित असणं अपेक्षित आहे.. आपल्या आहारात पिष्टमय पदार्थ सोडले आणि कॅलरीज सोडल्या तर बाकी पोषण काही मिळत नाही)
त्या नन्तर ऑफिस मध्ये काम (😳) असत खूप आपल्याला... जे शारीरिक पेक्ष्या मानसिक रित्या दमावणार असत.
दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, बिस्किटे रात्रीच (लाईट) जेवण या मध्ये आपण "संतुलित आहार" किती आणि कस घेतो!हे सांगताच येत नाही.
पुन्हा व्यसन असतील बोलूच नका.. रात्री टिव्ही उशिरा झोप आणि उशिरा उठणे... पुन्हा दुसरा दिवस..
यात आपण जीवन कुठे जगत आहोत?? आपले आनंद आपले छंद यावर काही काम करतो का?.. मित्र(व्यसन लावणारे नव्हे) आपल्या बाजूला किती असतात आणि स्वार्थी लोक किती असतात?
राजकारण, पैसे, रोजचे प्रश्न , आरोग्य, शिक्षण, महागड्या वस्तू, गाड्या अशी बरीच लिस्ट आहे जी मिळवण्याच्या किंवा ओरबाडून घेण्याचा नादात आपण आपलं जीवन एन्जॉय करत आहोत का?
जर वरील प्रश्नांची उत्तरे जर नकारार्थी असतील तर मला अस वाटत की नक्कीच आपलं काहीतरी चुकतंय....
तेव्हा विचार करा आणि बदल घडवा



Source:- INTERNET
-संगीता देशमुख,
हिंगोली

"बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे", "बदल ही काळाची गरज आहे", असं म्हटल्या जाते. पण तो बदल योग्य की अयोग्य हे त्याचा मानवाच्या जीवनावर होणाऱ्या परिणामावर अवलंबून आहे. मानवाचा इतिहास पाहता आजची बदलती जीवनशैली ही मानवास अतिशय घातक अशी बनलेली आहे. माणसाने विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा आपल्या जीवनात अतिवापर केल्याने त्याचा मानवास फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होत आहे. मानवाची आजची बदलती जीवनशैली मानवाच्या मानसिक,शारीरिक,सामाजिक विकासास घातक अशी ठरत आहे.
          पूर्वीच्या काळी सकाळ ही  ४ते ५ च्या दरम्यान व्हायची. घरातील स्त्रीपासून तर बाकी सर्व आबालवृद्ध ही एकामागोमाग सूर्योदयापूर्वीच उठायचे. स्वच्छ,निरोगी,शुद्ध हवा सगळ्यांना मिळायची आणि सकाळच्या सर्व कामातून सगळ्यांना योग्य तो व्यायाम आपोआपच व्हायचा. पूर्वी सकाळी शौचास बाहेर जाणे,हे सुध्दा नैसर्गिकपणे मॉर्निंग वॉक व्हायचा. आणि आज यंत्राचा वापर इतका वाढला की,चार पावले सुध्दा आजकालची  मुलंमुलीच नाहीतर स्त्रिया सुध्दा बाइकचाच वापर करत आहोत.घरात वॉशिंग मशीन,मिक्सर,ग्राइंडर,ओव्हन या सर्व यंत्राच्या वापरामुळे लठ्ठपणा ही घराघरातील आजची मुख्य समस्या बनली आहे. तसेच आजची पिढी अतिशय कमी वयातच मधुमेह,रक्तदाब अशा आजाराला बळी पडलेली आपल्याला दिसत आहेत.प्लास्टिकचा वापरही इतका वाढला की,कॅंसरसारखा आजार तर तीन घरापैकी एका घरात आढळतो. आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आजूबाजूची हवा,पाणी,माती,यात भयानक असे प्रदूषण वाढले आहे. आज ग्रामीण भागातील लोकसुद्धा वॉटर फिल्टरचेच पाणी पिताना  आढळून येतात. आपल्या शरीराला मिळणारे क्षार आपण असे कमी करून हाडांचा ठिसूळपणा करून घेतला. आज तरुणाईतील व्यसनाचे वाढते प्रमाण हाही एक चिंतेचा विषय आहे. आजचे व्यसन ही तरुणाईची फॅशन झाली आहे. आणि याला आवर घालण्यात आजकालची पालक असोत अथवा शिक्षक हे हतबल ठरले आहेत. त्यात आपल्याला विशेषतः शहरातील लोकांना मिळणारा भाजीपाला,फळे ही सुद्धा रासायनिक खतांचा,औषधींपासून,पावडर पासून पिकवलेली मिळत आहेत. पण आजची मुलंमुली ही इंटरनेटवर रात्री उशीरापर्यंत जागतात आणि सकाळी दहा वाजेपर्यंत झोपतात. घरचे जेवण घेण्यापेक्षा सकाळपासूनच फास्टफूडवर नास्तापासून तर रात्रीच्या  जेवणापर्यंत दिवस संपतो. शीतपेयांचा वापरही अतिप्रमाणात वाढलेला आहे. याचे व्हायचे ते दुष्परिणाम दृश्यरूपात आहेतच.
                   विज्ञान असो अथवा तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्रासारखे आहे. मानवी विकासासाठी त्याचा आपण सदुपयोग करून घ्यायला हवा. पण त्याचा दुरुपयोगच आपल्याला जास्त दिसून येतो. आज एका वर्षाच्या लेकराच्या हातात आपण मोबाईल देत आहोत. त्याच्या कोवळ्या डोळ्यावर आणि मेंदूवर काय विपरीत परिणाम होत असेल,याचा सुध्दा विचार आपण करत नाही. ऑफिसमध्ये कंप्युटरचा वापर हा अनिवार्य आणि हिताचा आहे परंतु सोशल मिडियामध्ये व्हाट्सॅप,फेसबुक यावर तरुणांचा किती वेळ वाया जातो! तरुणांची सर्व शक्ती व वेळ हा यातच जातो आहे. त्यात आपण नागरिक इतके अडकलो की,देशात बेरोजगारी किती वाढली,हेही रवीश कुमारसारख्या पत्रकाराला लक्षात आणून द्यावे लागते. दिवसाला दिला जाणारा १.५ जीबी मोफत डाटा हा तरुणांना दिशाभूल करत आहे.  पण याचे भान ना युवकांना आहे, ना सरकारला.... ही किती खेदाची बाब आहे!
                  आज माणूस भौतिक सुखाच्या अधीन झाल्याने झटपट पैसा कसा कमावता येईल,यासाठी तो प्रयत्न करतो आहे. त्यापायी मानसिक स्वास्थ्यही तो गमावून बसला आहे. आजचा काळ म्हणू म्हणू घरातील थोरामोठ्यांचा आदर,प्रेम या बाबी क्षुल्लक ठरत आहेत. चौकोनीच काय पण त्याही पुढे जाऊन आज त्रिकोणी कुटुंबपद्धती आली.  त्यातूनच वृध्दाश्रम आणि पाळणाघर यांचे नको तितके पेव फुटले आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे एक किंवा दोनच लेकरांचे निकोप संगोपन करणे कठीण होऊन बसले आहे. मोठी पालकच आपल्या लेकरांच्या मन:स्वास्थ्याला जपायचे म्हणून लेकरानाच भिऊन रहात आहे. माणूस माणसाच्याच प्रेमाला पारखा होत चालला आहे.  शेवटी माझ्यासारख्या सामान्य बाईच्या डोक्यात प्रश्न येतो,आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ वाचवायचा असे म्हणतो,तेव्हा वाचलेला वेळ आपण कोठे वापरत आहोत?वाचलेल्या वेळातून आपण ना समाजविकास साधत आहोत ना आत्मविकास! चौकोनी कुटुंबातील चौघांचे तोंड चार दिशेला झाली आहेत. चिडचिड,पाल्यांकडून अवास्तव अपेक्षा,पाल्यांचा उद्धटपणा,यात आईवडिलांची कुचंबणा! मग एवढे धावायचे तरी कशासाठी? हे सर्व पाहत, बदलत्या जीवनशैलीचा मानवी जीवनावर किती विपरीत परिणाम होतो,हे सुज्ञांस सांगणे न लगे.

Source:- INTERNET
-श्रीपाद वडे,
सोलापूर

हा विषयास अनुसरून खरंच जेवढी लाभ दायक आहे तेवढी तोट्याची आहे पण माझ्या दृष्टीकोनातून खूप हानिकारक आहे .असं मला वाटत खरंच आपण Social मीडियाचा खूप अति वाईट हेतूने वापर करत आहोत असं मला वाटत ह्या मुळे बरेच आजर जडताण दिसत आहे.
आणि फार कमी दृष्टीने त्याचा वापर होताना दिसतो
जास्त प्रमाणात सर्वाना च हेच वेसण लागलेलं दिसत
त्यामुळे बद्दलणारी जीवन शैली ही लाभकारक न म्हणता हनिकरकच आहे..मी एका विषयास धरून बोललो पण असे खूप विषय आहेत की बद्दलणारी जीवन शैली तोट्याचीच आहे…


Source:- INTERNET
-महेश देशपांडे,
ढोकी
जि. उस्मानाबाद

सर्वप्रथम, हा विषय निवडला त्याबद्दल मी एडमिन टीम चे आभार मानतो..🙏🏻

खर पाहिल तर बदलती जीवनशैली हा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी आहे. आपण कोन आहोत? आपल्या अस्तित्वाच नेमक प्रयोजन काय आहे? हे दाखवून देणारी आहे. अस्तित्व यासाठी की, दैनंदिन जीवनात आपली स्वतःची मूल्य संभाळुन आपण खरच जगु शकतो का? याच उत्तर जर होय असेल तर लाभदायक आणि जर नसेल तर हानिकारक. उदाहरण द्यायच झाल तर अगदी साध घ्या सकाळी उठल्यावर आपण आई वडिलांना नमस्कार करतो का? ज्यांच्यामुळे आपल अस्तित्व आहे त्या व्यक्तिना आपण रोज नमस्कार केला पाहिजे हे एक जगण्याच मूल्य आहे ना... मग जर नसेल करत तर का नाही याचा शोध जाने त्याने घ्यावा...
दूसर उदाहरण द्यायच झाल तर, आपल्या आरोग्या बाबतीत घ्या... प्रत्येकाची शरीर पकृति वेगळी असते, मग त्यानुसार प्रत्येकजन काळजी घेतो का? या whatsapp वर असंख्य मेसेजेस येत असतात शरीर स्वास्थ्यसाठी काय चांगल आहे, काय नाही किंवा Do's and Dont's येत राहतात...
पण कधी स्वतःच्या शरीराशी संवाद साधला आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खर आहे की तुम्ही तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट अनुभवु शकता... जर तेवढे ध्यानमग्न झालात तर.. आणि मग नियंत्रित सुद्धा करू शकता.... कोणी लक्ष देत नाही.. अरे खरच बघा एकदा प्रयत्न करून शरीराशी संवाद करून..
नात्यांच्या बाबतीत ही गोष्ट अगदीच संवेदनशील झालीय. म्हणजे नव्या नवरिचे नउ दिवस अस आपण आजकाल वागतो आहोत का? एवढी माणस झालीत की कोनाकोणाल वेळ द्यायचा हाच प्रश्न पडतो... मग आपल मोबाईल घ्यायचा आणि चालू मेसेजेस. मोबाईल दिवसातुन किती वेळ वापरायचा हा एक गंभीर प्रश्न झालाय.. Addicted झालोय अस म्हणालात तरी चालेल.... ज्यांना जमत ते राहतात नियंत्रित.
अजुन बऱ्याच गोष्टी आहेत, समजजीवन, मानसिक आरोग्य, येणाऱ्या पीढिसमोरिल आदर्श... ही यादि न संपनारी आहे.
या सगळ्या गोष्टिंचा विचार केलात, तर काही बाबतीत बदलती जीवनशैली लाभदायक वाटेल, तर काही बाबतीत हानिकारक...

शेवटी गाण्याच्या दोन ओळी आहेत

*जीवन गाणे गातच राहावे, पुढे पुढे चालावे ।*
*रुसवे फुगवे विसरून जावे, पुढे पुढे चालावे।*


Source:- INTERNET
-पवन खरात,
अंबेजोगाई

माणसाच्या उप्तत्ती पासून माणूस स्वतःला गरजे नुसार बदलत गेला आहे. विज्ञानाच्या जोरावर अनेक सुख सोयी निर्माण करून अथांग प्रगत झाला.
 आयुष्याची शंभरी गाठणारा एकेकाळचा माणूस आज क्षणभंगुर झालेला आहे. कारण आज माणूस आज भाकरीच्या तुकड्यात समाधानी राहिलेला नाही. दारू ,सिगारेट,ड्रग्स या सारख्या गोष्टीच्या आहारी गेला आहे. त्याचा बरोबर खानपानातील बदलामुळे एक वेळ जेवण नाही मिळाले तरी चालेल पण औषध मात्र घ्यावीच लागतात.
   बदलत्या काळानुसार गरजा सुद्धा बदलत गेल्या . घरातील वयस्कर माणसाला घरात उच्च स्थान असल्याचे कारण त्यावेळी त्याला त्यांची गरज असायची . पण आज घरातील वयस्कर माणसांची गरज फक्त वृध्दाश्रमांना राहिली आहे, कारण स्वतःची मुलं जन्मदात्याला घराबाहेर हकालताना सुद्धा विचार करत नाहीत.
   माणूस आज खूप सुखी आहे फक्त इंटरनेट व मोबाईलच्या आभासी जगात . चार मित्राचं बोलणं ,भेटणं तर व्हाट्सअप्प ने कधीच बंद केले आहे, कारण समोरासमोर बसले चार मित्र सुद्धा एकमेकांना बोलण्या पेक्षा मोबाईल मध्ये जास्त बिझी असतात.
पण जेव्हा या खऱ्या दुनियेशी ओळख होते,एकटेपणा जाणवतो ,तेव्हा मात्र आत्महत्या शिवाय पर्याय उरत नाही.
आज या गोष्टीची खात्री पटली कि,
" पूर्वी माणूस माणसं जपायला आणि पैसा वापरायला शिकला,
आणि
आज माणूस पैसा जपायला आणि माणसं वापरायला शिकला । "


Source:- INTERNET
-जयंत जाधव,
 लातूर

  ज्या वेगानं विज्ञानाने प्रगती करुन आपल्याला वेगवेगळ्या सुख सुविधा निर्माण करुन दिल्या आहे.पण त्यात वेगानं असंख्य प्रकारच्या आजार व रोगांनी माणसाच्या शरीराला स्वतःच्या हक्काचे वस्ती बनविली आहे.नैराश्य व मानसिक तणाव,मधुमेह,हृदयरोग,अस्थमा इत्यादी रोग हे आधुनिक जीवनशैलीची देणग्या आहेत.सर्वात गंभीर बाब ही लैंगिक समस्या कित्येक जणांचे जीवन खराब करत आहे .
सामाजिक मुल्यांमध्ये झपाटयाने होणारा बदलाचे परिणाम म्हणजे लग्नाच्या पूर्वी लैंगिक संबंध ही रोजची साधी बाब बनली. लैंगिक स्वैरपणामुळे एच.आय.व्ही,सिफिलीस सारखे गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
आजची तरुण पिढी करियर बाबतीत खुप विचारी आहे.त्याला प्रचंड महत्त्व दिले गेल्यामुळे लग्ना आधी लैंगिक संबंध व नंतर गर्भ राहू नये यासाठी वापरल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेकी वापर यामुळे मुले होण्यात खूपच समस्या निर्माण झालेल्या आहे.
कित्येक सलग तास संगणकावरील कामाने हृदयविकार,उशिरा पर्यंतच्या पार्टी मधील धुम्रपान,दारु इ.मुळे नपुंसकता तसेच स्त्रीयांमध्ये मॕनोपॉज सारखे मासिक पाळी संदर्भातील आजाराच्या समस्या वाढत आहे.
उद्योग धंद्याच्या स्पर्धेत बहुराष्ट्रीय कंपनीच्या कामाची आधुनिक  पध्दतीने माणसांची जीवनशैली खूप प्रभावित झाली.दिवसाचे स्वरूप रात्रीत तर रात्रीचे दिवसात बदल झालाय.धावपळ वाढली.प्रत्येकाला पुढे जाण्याच्या घाई लागली. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण शॉटकटची मदत घेवून काही पण करण्यास तयार आहे.इंटरनेट व मल्टीनॕशनल कंपनीच्या मायाजाळाने तर जीवनशैलीला फारच बदलून टाकले.फास्ट-जंकफुड हे खाण्यास पोषक तर नसतात पण सर्वात महत्त्वाचे अस्वच्छ असतात.त्यातून अनेक रोगांची भीती असते.भारतात १०ते २५ वयोगटातील  सुमारे २३ लाख युवा दर वर्षी अकाली मरण पावतात.त्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेत.युवा म्हणजे देशाचा आधारस्तंभ व ऊर्जा असते.पण तेच असे पंगू झाले तर त्या देशाचे भवितव्य अंधारातच राहिल?(संदर्भ -जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद केले)
भारतात एकूण लोकांच्या ६५% हे ३५ वयोगटा खालचे आहेत.सर्वात मोठी अडचण युवकांच्या आरोग्य साठी परिणामकारक  असे धोरण नाही.त्यामुळे युवा भारता ऐवजी आजारी भारत म्हणून आपल्याला ओळखले जाऊ लागू शकते.



Source:- INTERNET
-समीर सरागे,
नेर
जि यवतमाळ

विज्ञानाने जस जशी प्रगति केली तस तशी आपल्या जीवन शैलित देखील बदल होत गेले , पूर्वी आजच्या सारखी भरपूर वाहने नव्हती तरी देखील प्रत्येक व्यक्ति वेळेवर पोहोचत असे, आजच्या सारखे प्रगत वैद्यकीय उपचार नव्हते तरी देखील कोणी आजारी पड़त नसे , आजच्या सारखे माहिती तंत्रज्ञानाचे युग नव्हते तरीही प्रत्येकाचे समाजमन एकमेकांशी जुळलेले असायचे ,आजच्या सारखी प्रगत शैक्षणिक व्यवस्था नव्हती तरीही प्रत्येकाला शिक्षण मिळत असे, आजच्या सारखा औद्योगिक विकास नव्हता तरीही प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होत असे, वैगरे असो
आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. सगळीकडे वैज्ञानिक प्रगति झाली आहे. त्यामुळे मनुष्यजीवनात सुख सुविधाची फार मोठ्या प्रमाणात रेल चेल वाढली आहे.
आज प्रत्येक मनुष्य पैशाला केंद्रस्थानी ठेऊन आपले जीवन जगत आहे. म्हणजे पैसा भरपूर कमावला किंवा भरपूर संचय केला की आपला येणारा भविष्य काळ हा सुखात जाईल, असे वाटन्यात काही गैर नाही कारण सर्वानी आपल्या करिता सुखाची आणि समृद्धिची अपेक्षा करणे स्वाभाविक आहे.
परिस्थिति नुसार मनुष्याला बदलावे लागते आपल्या सवयी ,स्वभाव , कामाच्या पद्धति राहनीमान ,जीवनमान  यात कालांतराने बदल होत गेले आणि होत देखील राहणार कारण बदलाव हा निसर्गाचा आणि जगाचा नियम आहे. अलीकडे आपल्याला शहरी जीवन पद्धति कड़े बघितल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जानवेल की, शहरी भागातील जीवनमानात आजकाल अतिशय विरोधाभास आपल्याला दिसून येईल , शहरी भागाचा विचार करता आज तेथील प्रत्येक व्यक्ति रोजच्या धावपळी च्या व्यस्त दिनचर्येत  कर्तव्या बरोबरच स्वतःच्या कुटुंबच्या उदरनिर्वाहचा डोंगर देखील वाहत असतो रोज सकाळी कर्तव्यावर जाने तेथील कामाचा व्याप, वाहतुकीची पायपिट, कौटुंबिक जबाबदार्या या सर्वांच्या विवंचनेत त्याची मानसिक पातळी इतकी खालावून जाते की, त्याला डिप्रेषन, हाइपर टेंशन सारख्या व्याधीने तो ग्रस्त होऊ लागतो कारण कोणाच्यही जीवन कार्यात सुख हे केंद्रस्थानी असते आणि या सर्व गरजा भागविन्या करिता पैसा हा घटक महत्वाचा आहे. मुलांना चांगले शिक्षण द्यावे, आपल्यासारखे हाल-अपेअष्टा माझ्या मुलांच्या नशिबी नको , म्हणून बरेचसे पालक हल्ली आपल्या पाल्याणा दुचाकी वाहन, मोबाईल, लैपटॉप वैगरे वस्तु खरेदी करून देतात आणि खरेदी करुण देणे यात काही गैर नाही परंतु आपल्या पाल्याला  त्याने कष्टाच्या पेशाने कमाऊंन दिलेल्या या वस्तु तो गरज किंवा आवश्यकता म्हणून त्याचा वापर करतो की नाही याची शाहनिशा आजकालच्या सुज्ञ पालक वर्गाने करणे अनिवार्य आहे. माहिती तंत्रज्ञाना च्या या युगात नवनवीन उपकरणें हाताळने वा त्याचा वापर करणे योग्य आहे.परंतु केवळ मनोरंजन म्हणून त्याला उपयोगात आणने आणि आपला बहुमूल्य वेळ दवडने हे आजच्या तरुण आणि सुशिक्षित पिढीकड़ून कदापिही अपेक्षित नाही.
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धति अस्तित्वात होती किंबहुना आजही काही अंशी ती नावा पूरती अस्तित्वात असेल असो, या संयुक्त कुटुंब पद्धति मध्ये कुटुंबात एक प्रौढ़ व्यक्ति कुटुंब प्रमुख म्हणून असायची आणि या व्यक्तीचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर असायचा (कारण कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्या काही कर्तव्ये आणि जबबदरया असायच्या) त्यांच्या वर सामाजिक जबाबदारी देखील असायची ,सर्व कुटुंबातील मंडळी त्यांच्या आज्ञा चे पालन करायचे लहान मुले आणि नातवंडावर त्यांचे प्रामुख्याने लक्ष असायचे कारण यांचेच संस्कार रूपी शिक्षण भविष्यात त्यांना ऊपयोगी पड़त असे,  सर्व आपापली कामे चोख करायची ,कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण असायचे , संवादाच्या माध्यमातून एकमेकांशी जिव्हाळा आणि प्रेम राहत असे परंतु कालांतराने एकल कुटुंब पद्धति अस्तित्वात आली वाडयाची हस्त्या खेळत्या घराची जागा फ्लैट ने घेतली , जिव्हाळा आणि प्रेम हे प्रसंगावधान ठरू लागले आणि वडीलधारी मंडळी वृद्धाश्रमात धाडल्या जाऊ लागली याचे मुख्य कारण म्हणजे तशे संस्काररूपी शिक्षण आम्हला मिळणेच आता कायमचे बंद झाले आहे. आणि कॉन्वेन्ट व पाश्चात्य संस्कृतिचा प्रभाव दिवसेंदिवस आमच्यावर होत चालला आहे.
आजकाल ज्या पद्धतीने समाजाचा विकास झाला आहे त्यात संयुक्त कुटुंबाची जागा एकल कुटुंबाने घेतली आहे यामुळे आजच्या तरुण पिढीला ते वातावरण मिळत नाही  पूर्वी घरच्या मंडळी सोबत भोजन करतानी गप्पा ,गोष्टीच्या माध्यमातून वेळ घालवून प्रत्येकाला एक स्वस्थ जीवनशैली मिळत असे, परंतु एकल कुटुंबातिल व्यक्ति फार कठिन परिस्थितीत  किंवा क्वचितच एकमेकां करिता वेळ काढतात आणि आपला एकटेपना घालविन्या करिता ते पार्टी, पब किंवा बार याचा सहारा घेतात परिणामी ,दारू, सिगारेट, ड्रग्स,कोकेन सारख्या मादक पदार्थांच्या आहारी जाऊन आपले स्वास्थ्य बिघडवून घेतात. यात बहेरगावाहुन शिक्षण आणि रोजगारच्या शोधात  येणाऱ्या तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
कॉल सेंटर ,इंटरनेट नंतर आता सोशल मिडियानेही आपली जीवनशैली  बदलून टाकली आहे. रात्रभर जागरण करणे, मग उशिरा उठने आणि त्यानंतर  कामाला जाने हेच अलीकडे आपल्या सर्वांचे जीवन होऊन बसले आहे. यातही आजचे तरुण रोजगार आणि करिअरच्या शोधात इतरत्र भटकंति करत असतात यामुळे वेळी अवेळी खान-पान करणे फास्टफूड , डब्बाबंद किंवा होटेलातील खाने, कोल्ड्रिंक्स चा अतिवापर याकड़े आजचा तरुण वर्ग आकुष्ट झाला उलट ती एक फैशन बनली आहे. अलीकडे आपल्याला हर एक चौकात ,चायनीज , तळलेले पदार्थ असलेल्या स्टॉल वर तरुणांची गर्दी सहजच दिसून येईल, जिभेचे चोसले पुरविन्या करिता आपण हे पदार्थ खात असतो परंतु असले पदार्थ पोषनवीहिन तर असतातच सोबतच ते अनेक रोगाचे माहेरघर देखील असतात. परिणामी असले न-पचनारे पदार्थ खाऊन वजन वाढ, लट्ठपणा(Obecity) जे अनेक रोगांचे मुख्य कारण देखील आहे. खऱ्या अर्थाने हा रोग कुपोषणा पेक्षाही भयंकर आहे, यामुळे हृदयरोग, मधुमेह, कंबर आणि घुटने दुखी, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचे प्रमाणात वाढ, अनिद्रा वैगरेची संभावना अधिक प्रमाणात असते. मग यावर मात करण्या करिता तरुण वर्ग वेगवेगळ्या औषधिच्या आहारी जातात यात अनिद्रे  करिता झोपेच्या गोळ्या घेणे, मधुमेह कमी करण्या करिता इन्सुलीनचे इंजेक्शन वैगरे घेणे ,पैन किलर आणि एंटीबायोटिक यांचा अतिवापर यामुळे शरीरातील इतर अवयवा वर विपरीत परिणाम होऊन अधिक स्वास्थ्य बिघडवून घेतल्या जाते.
पूर्वी  घरातील स्त्रियां पहाटे उठायच्या  तेव्हा पासून त्यांची कामाची दिनचर्या सुरु व्हयची ते अगदी रात्री पर्यंत चलायची स्त्रियां सतत घरकामत असल्याने त्यांना त्यांना व्याधि आणि आजार होत नसत किंवा झाले तरीही ते क्वचितच होत कारण त्यांच्या या घरकाम करण्यामुळे एकप्रकारे व्यायाम होत असे परंतु आजची परिस्थिति बघता बऱ्याच कुटुंबात आपल्याला घरकाम करणाऱ्या स्त्रियां किंवा पुरुष नजरसे पडतिल
एवढेच नव्हे तर बाळाला जन्म देणाऱ्या मातेला देखील तिच्या स्वतःच्या बाळा करिता वेळ नसतो मग  त्या बाळाच्या संगोपन व पालनपोषणा करिता या महिला आया (Sarogate Mother) ठेवतात मग क़श्या प्रकारे त्या मुलांवर मातृत्वाचे -पितृत्वाचे संस्कार होतील ? म्हणजे यांना  मोबदला देऊन Sarogate Mother ठेवणे चालतील परंतु घरामध्ये वडिलधारी वृद्ध मंडळी नको आणि ती असतीलही एक तर वृद्धाश्रमात नाहीतर मग दूर गावी, आणि हीच पद्धत व आधुनिक जीवनशैली मग कायमची परंपरा बनत जाते  परिणामी वृद्धाश्रमा मध्ये अलीकडे आपणास वृद्धाचिं संख्या वाढलेली दिसून येत आहे व भविष्यात अधिक प्रमाणात दिसून येईल. कारण ही पद्धत अनुकरणीय होऊन जाईल ,आणि यात नवल वाटायला नको.
असो ,
प्रत्येकाने आपाआपली जीवनशैली ,राहनिमानाचा दर्जा ,सवयी आपल्या सोईनुसार व काळानुरूप  बदलून घेतल्या आहेत किंवा बदलने अनिवार्य आहे. आजचे २१ व्या शतकातील युग हे धावपळीचे आणि स्पर्धेचे आहे. त्यानुसार प्रत्येकाने आधुनिक जीवनशैलित आपल्या सवयी व कामाच्या पद्धति देखील बदलवायला हव्यात
बदल होने हा नियम जगाला, श्रुष्टिला  व तंत्रज्ञानाला देखील लागू आहे. त्याच प्रमाणे तो मनुष्यला देखील लागू आहे  यात दुमत नाही , परंतु या बदला बरोबर आपली नीति मूल्य , आपलेपन,प्रेम- जिव्हळा , नाते व संवाद या बाबी जपने देखील तितकेच महत्वाचे ठरते. या धकधकीच्य तनावपूर्ण जीवनात ज्ञान धारणा (Maditation), योगासने, प्राणायाम इत्यादिने आपण आपले कामाचा तान- तनाव दूर करु शकतो या आधुनिक जीवनशैलित या उपरोक्त बाबी दररोज अमलात आणल्यास आपण एक स्वस्थ जीवन तर  जगूच त्यासोबतच सामाजिक स्वास्थ्य टिकुण ठेवन्यास देखील तितकीच मदत होईल व ती काळाची गरज आहे.

अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-२)

🌱 वि४🌿या व्हाट्सअप ग्रुपवरून

अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-२)


Source:- INTERNET
-अक्षय पतंगे,
आ. बाळापूर,
जि. हिंगोली

    वेद, धर्मसूत्रांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य मानणे म्हणजे आस्तिक. वेद,धर्मसूत्रांची भीती न बाळगता चिकीत्सा करणे म्हणजे नास्तिकता.
            अजून तरी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य,शिक्षण या आपल्या मुलभूत गरजा. असं तर नाही की, कुणी आस्तिक आहे म्हणून तो अन्नाशिवाय राहू शकतो आणि नास्तिक आहे म्हणून निवाऱ्या शिवाय राहू शकतो. मला वाटतं आस्तिक, नास्तिक असणं ही प्रत्येकाच्या स्वतंत्र विचारसरणीवर अवलंबून असतं.
          कट्टरतावाद संपवून अभय निर्माण करणं, शोषणापासून मुक्ती, गरिबी संपवणे, प्रत्येकास शुद्ध पाणी, तरुणांना रोजगार, zero hunger, Freedom of choice यांची गरज आहे.

         सत्य स्वीकारून मानवी कल्याणासाठी निरपेक्ष प्रयत्न करणं महत्वाचं वाटतं. डोळस वृत्ती ठेवून मानवी व्यवहार करणं हे आस्तिक, नास्तिक यापेक्षा चार पाऊल पुढेचं असेलं.  उदा. केरळच्या १.८४ लक्ष विद्यार्थ्यांना टिसीवर ना जातीचा उल्लेख केला, ना धर्माचा यामुळे ना तणाव, ना विद्वेष, ना दंगली.



Source:- INTERNET
-विशाल सातपुते,
 पंढरपूर

अस्तिक किंवा नास्तिक असणं हा त्या व्यक्तीचा दोष नसून त्याच्या जीवनातील विचारांचा किंवा अनुभवाचा सार आहे. मी स्वतः देव मानत नाही परंतु ,तूम्ही देव मानू नका  असे सांगण्याचा आधिकार मला नाही.कारण देव मानने किंवा नाही मानने हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. आज आपण विज्ञानवादी युगात देव असणं हे स्विकारू शकत नाही. आणि   देवाचे असणं हे नाकारूही शकत नाही.कारण ,काही गोष्टींना आपण वैज्ञानिक कारणे देऊ शकतो परंतु काही गोष्टींना आपण वैज्ञानिक कारणे देऊ शकत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर मी वयाच्या 19 व्या वर्षी पूणे ते पंढरपूर असा वारीचा चालत प्रवास केला. परंतु मला चालत असताना कसलाही ञास जाणवला नाही याचा अर्थ देवाने मला चालण्याची क्षमता दिली असा होत नाही, तर मी माझी स्वतःची काळजी घेतल्यामुळे ते शक्य झाले ,असे मी मानतो.याउलट मी पंढरपूरला पोहोचल्यावर मंदिरात गेलो नाही, जर देव खरंच असता तर त्याने माझे वाईट  करायला हवे होते ,उलट त्यावर्षीचा उत्कृष्ट विद्यार्थी वारकरी म्हणून माझा महाविद्यालयात सन्मान करण्यात आला. सांगण्याचा मुद्दा असा आहे की ,देव मानने किंवा नाही ही वैयक्तिक संकल्पना असू शकते. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. आठवलं म्हणून सांगतो, डिसेंबर 2015 मध्ये माझी स्वतःची लहान बहीण आजारी होती,ती स्वतःशीच बडबड करत असे.मधूनच काही वेळ घट्ट डोळे मिटून बसत असे.गावातील तसेच पंढरपूरमधील नामांकित डाॅक्टर चे असे मत होते की , तिचा मेंदूचा प्राॅब्लेम असून उपचाराअंती तो पूढील पाच ते सहा महिन्यात बरा होऊ शकतो. सर्व पर्याय जवळजवळ संपले  होते.अशावेळी आमची आजी तिला पाहण्यासाठी घरी आली होती. बोलता बोलता तिने देवाचा विषय काढला, तसा मी सर्वांना रागाने बोललो, एवढे डाॅक्टर उपचार करून थकले, आता देव तिला नीट करणार. परंतु आम्ही खेडेगावात राहात असल्यामुळे मी काॅलेजला गेल्यावर आईने त्या बाईला बोलवून देवाविषयी काही असेल तर सांगा अशी विनंती केली , त्यानुसार त्या बाईने सांगितले की , तुमच्या कुळदैवताची मंगळवारी पूजा करून ही सर्व परीस्थिती तूम्ही पूर्ववत करू शकता. योगायोगाने दूसर्या दिवशीच मंगळवार होता. सांगितल्याप्रमाणे सर्व पूजा वगैरे करून झाली , आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जी माझी लहान बहीण गेले 10-12 दिवस अंथरुणावर पडून होती, ती पुढच्या दिवशी बुधवारी स्वतः सर्व गोष्टी आवरून शाळेत गेली होती आणि ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी आपण विज्ञानवादी देवाचे अस्तित्व नाकारू शकत नाही. मान्य आहे की, देवाचा आणि तिच्या आजारी  असण्याचा काही संबंध नसेलही परंतु देवानेच मला ठिक केले ही तिची वेडी समजूत आजही कायम आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की, देव माझ्या पाठीशी आहे, या एकाच आशेवर आज लाखो लोक आपले अस्तित्व टिकवून असतील तर आपण त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. परंतु स्वतःच्या कर्मामुळं/ आळशी जीवनामूळे काही लोक दारिद्र्याकडे वळतात. अशावेळी ते देवाला दोष देतात. देवानेच माझे वाईट केले असे सांगतात. ते देव मानत नाहीत. मग त्यांना नास्तिक म्हणायचं का ? हाही प्रश्न आहेच. काही दिवसांपूर्वी नितिन भानगूडे पाटिल यांच्या भाषणातील एक वाक्य खूप छान वाटलं, ते असे की , तूम्ही स्वतःच तूमचे जीवन चांगले किंवा वाईट घडवू शकता . तूमचे चांगले किंवा वाईट करण्याचा अधिकार हा तूम्हाला स्वतःलाच आहे. कोणताही देव तूम्हाला कष्टाविणा फळ देणारच नाही, कष्टाला पर्याय नाही.  आज देशात हजारो वेगवेगळ्या प्रकारची देवस्थाने आहेत. एकीकडे मंदिरात लोक हजारो रुपये दान करून येतात परंतु घरी असलेले आई-बाप कधी अर्धपोटी तर कधी उपाशी झोपतात, याची त्यांना जाणीव नाही. आज अनेक अनाथाश्रम, वृध्दाश्रम याची वाढ होत आहे.आजच्या काळात लोक मंदिरात दान करू शकतात परंतु आई -वडिलांना दोन वेळच जेवण देऊ शकत नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जर देवच सर्व विश्वाचा निर्माता असेल तर त्याला दान देण्याइतके आपण मोठे आहोत का ? यावरही विचार व्हायला हवा. डाॅ.शाम मानव यांनी आपल्या एका मूलाखतीत असे सांगतात की जर देवाला नवस करून मूले होत असतील तर लग्न करण्याची गरजच काय? शेवटी जाता जाता एवढेच सांगतो की, आपल्या वाड-वडिलांनी परंपरागत ज्या देवाची जोपासना केली त्या देवावर ठेवायची असेलच तर श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा कदापि नको. कारण तूमची अंधश्रद्धा ही एखादा जीव नष्ट करू शकते.                                     तात्पर्य: -आज नास्तिकता मनाशी बाळगून परंपरागत अस्तिकताही जपणे ही काळाची गरज आहे.



Source:- INTERNET
-संजय साळुंके,
जळगांव

                आस्तिक म्हणजे देवाला मानणे व नास्तिक म्हणजे देवाला न मानणे. पण देव म्हणजे नेमकं कोण ? मंदिरातील दगडाची मुर्ती ? डोंगरावर विराजमान मुर्ती? तीर्थक्षेत्र ? गंगास्नान ? कुंभमेळयातील साधू ? का कुणी संधीसाधू? नव्हे नव्हे मित्रांनो , रंजले गांजलेले , दुःखी कष्टी , निराधार हुशार विद्यार्थी, अंध पंगू यांच्यात ज्याला देव दिसतो तो आस्तिक , मग तो देवळात जातो की नाही हे गौण ठरते. संत गाडगेबाबा पंढरीच्या वारीला दरवर्षी न चुकता जायचे पण मंदिरात कधीच गेले नाहीत, मात्र वारीत  चंद्रभागेच्या तीरावर दिवस भर स्वच्छता करून रात्री तेथेच अंधश्रद्धा, निरक्षरता, व्यसनाधीनता , जात पात विरोधात कीर्तन करायचे . आमचा देव कोणाला मानायचे यातच खरा गोंधळ होतो. संत तुकाराम महाराजांनी म्हटले , जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा , देव तेथेचि जाणावा। संत एकनाथ महाराज यांनी वाळवंटात तहानेने व्याकुळ गाढवात देव पाहून त्याला तीर्थ पाजून तहान भागवली. शेवटी भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, उघड्या नागड्याना वस्त्रं, गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी मदत, बेघराना निवारा, अंध पंगू रोग्यांना औषधोपचार, बेरोजगारांना रोजगार, पशू पक्षी प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींच्या विवाहासाठी मदत, व दुःखी निराश्यांना हिम्मत देणें म्हणजे आस्तिक , व हे न करता टिळा लावून गळा कापणे म्हणजे नास्तिकता. मंदिरात देव कधीच नसतो , तो असतो गरजूंच्या रूपात जगात सर्वत्र.आपण आपल्या मनाला विचारा आपण आस्तिक आहोत का नास्तिक ? नेमकी कशाची गरज आहे आपल्याला. धन्यवाद.


Source:- INTERNET
- जयंत जाधव,
लातूर

   माझ्या मते,आस्तिक व नास्तिक या संकल्पना किंवा गोष्टी  सामान्य मानसाच्या समजण्या पलीकडंची. ' देव 'ही काही लोकांनी खाजगी मालमत्ता करीन टाकली आहे. प्रत्येक जण देवाजवळ काही मागणी करतो त्यास आस्तिक म्हणणे योग्य नाही तर स्वार्थी  म्हणता येईल.
     देवाला देवळात राहू द्यावे.पण काही स्वार्थी लोकांनी त्याचे ऐवढे बाजारीकरण केले कि देव देवळातून केव्हाच पळून गेले.
      निसर्गातील 'सुपर नॕचरल पॉवर ' सूर्य,चंद्र,पृथ्वी,समुद्र,जल ,अग्नी,वायू इत्यादी गोष्टी माणसाला एक रुपया देखील न घेता कोणताही स्वार्थ न साधता लाखो किंमत असलेल्या गोष्टी अगदी फुकट देतात.पूजा करायची असली तर यांची करा.माणूस फक्त नावाला माणूस आहे.खरी माणूसकी ते दाखवतात.
        शाळेत असताना विज्ञानाचे सर म्हणायचे ,ऊर्जा अक्षय म्हणजे नष्ट होत नाही फक्त एका स्वरुपातून दुसऱ्या स्वरूपात बदलते. मग मी वर उल्लेख केलेल्या जाल,वायु,सूर्य या सुपर नॕचरल पॉवरला जर कोणी देव मानत असेल तर त्यांना नास्तिक म्हणता येणार नाही.या नैसर्गिक शक्तींच्या चांगली शिकवण म्हणजे एकमेकांना न स्वार्थ साधता मदत करणे कोणी शिकत असेल तर त्याला मी आस्तिक म्हणेल.
       तात्पर्य,एखादा माणूस एक तर आस्तिक असू शकतो वा एक तर नास्तिक.माझे वैयक्तिक मत असे आहे की,जिथे माणूसकी जपणा-या गोष्टी घडत असतील तिथे मी आस्तिक पण जिथे माणूसकीला अहितकारक घडत असेल तिथे मी नास्तिक असेल.

Source:- INTERNET
-नवनाथ कुसुम राजाभाऊ जाधव,
परभणी

   आस्तिक नास्तिक संकल्पना या आज जरी देवाशी संबंधित वाटत असल्या तरीही त्या मुलत: तशा नाहीत, त्या वेदांच्या मान्यतेशी संबंधित आहेत, त्या तशा गृहीत धरल्यास नास्तिक असणं आवश्यक आहे,  आजच्या रुढ अर्थाने देवत्वाशी जोडल्यास - 'देव मानायचा की नाही' हा खरा प्रश्न नाही, तर कोणता देव नाकारायचा आणि कोणता देव स्वीकारायचा हा खरा प्रश्न आहे, तर शोषण करणारा देव नाकारायचा जो पुरोहितांचे , भटजींचे (यातला 'जी' मला स्वत:ला मान्य नाही) हितसंबंध जपतो आणी रंजल्या, गांजल्यांना नडतो आणि शोषण न करणारा देव स्वीकारायचा , जो सगळ्या संतांनी सांगीतलेला आहे,             तिसरी एक संकल्पना आहे, आस्तिक म्हणजे सकारत्मकता आणि नास्तिक म्हणजे नकारात्मकता यादृष्टीने Be positive असणं केव्हाही चांगलं, याअर्थाने आस्तिक असावं.


Source:- INTERNET
-सागर राडे,
सांगली

आस्तिकता आणि नास्तिकता.. एकाच नाण्याच्या दोन बाजू. साधारणपणे आस्तिकता म्हणजे देव, आत्मा या किंवा अशाच न पाहिलेल्या गोष्टींचं अस्तित्व मानणे. याउलट नास्तिकता म्हणजे वर उल्लेख केलेल्या गोष्टींचं अस्तित्व नाकारणे. मग असं असेल तर आज आपल्याला यापैकी खरंच कशाची गरज आहे?
थोडेसे ऐतिहासिक संदर्भ देतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापन करत असताना *हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा* ह्या विचारानेच ते नेहमी कार्यरत राहिले. स्वराज्यातील कुठल्याही गड-किल्ल्यावर बघितलं तर तिथे एखादं तरी मंदिर आवश्य दिसेल. कुठलंही महत्वाचं कार्य असेल तर गडावरील देवाचं दर्शन ते घेत असत असे उल्लेख इतिहासात सापडतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ते आस्तिक होते याबाबत कुणाचंच दुमत नसेल.
पण तरीही *हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा* हा विचार घेऊन ते देवाच्या भरवशावर सगळं सोडून कधी स्वस्थ नाही बसले. अफजलखानाची स्वारी असेल, पन्हाळ्याचा वेढा असेल, शाहिस्तेखानाचं आक्रमण असेल किंवा आग्र्याची कैद असेल, ते कधी माझा देव बघून घेईल, तोच मला किंवा स्वराज्याला या संकटातून बाहेर काढेल असं नाही म्हणाले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी पूर्वतयारी केली. त्याप्रमाणे योजना आखल्या आणि स्वतः आघाडीवर राहून त्या संकटांचा सामना केला आणि यश मिळवलं.

तीच गोष्ट कुठल्याही मोहिमेची. आस्तिक लोकांना अमावस्या म्हणजे अशुभ दिवस वाटतो. पण बऱ्याच महत्वाच्या मोहिमा महाराजांनी अमावस्या किंवा त्याच्या आधीच्या रात्री पार पाडल्या. रात्रीच्या अंधाराचा अचूक फायदा घ्यायचा हाच विचार त्यामागे असायचा. हीच गोष्ट आग्र्याहून सुटकेनंतरची. महाराज आग्र्याहून सुखरूप स्वराज्यात दाखल झाले पण शंभूराजे सुरक्षित परत यावेळी म्हणून त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी पसरवली. तेवढ्याने लोकांचा विश्वास बसणार नाही ह्याची जाणीव असल्याने शंभूराजांच्या जिवंतपणीच त्यांचे क्रियाकर्मदेखील केले. समुद्र ओलांडल्याने दैवी कोप होतो ही तत्कालीन प्रचलित समजूत. पण तरीही महाराजांनी स्वतः सिंधुदुर्गाची उभारणी करण्यास सुरुवात केली कारण ह्या समजुतींपेक्षा शत्रूशी लढा देणं आणि त्यासाठी समुद्रावर हुकूमत असणं जास्त गरजेचं आहे हे महाराजांनी जाणलं होतं.
अशा कित्येक उदाहरणांतून महाराजांनी हेच दाखवून दिले की आपण आस्तिक असलो तरी फक्त रूढी-परंपरा म्हणून सगळ्याच गोष्टी पुढे चालवायच्या नसतात. तर त्यामागचा विचार समजून घेत प्रसंगी त्या रूढी-परंपरा झुगारून देण्यातच शहाणपण असतं. आणि त्याने आपल्याला झालाच तर फायदा होईल, नुकसान नक्कीच नाही.
म्हणूनच मी तर म्हणेन की आपल्यालाही आज अशाच आस्तिकतेची गरज आहे जी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी दाखवून दिली.


Source:- INTERNET
-क्षितिज गिरी, सातारा

मुद्दा आस्तिक किंवा नास्तिक चा नाहीच ।आस्तिक किंवा नास्तिक हे विचार बरोबर किंवा चुकीचे असेही आपल्याला म्हणता येणार नाही।दोनीही गोष्टीचे समर्थन होऊ शकते।पण खरा वाद याच्या नंतर सुरु होतो।
          मनापासून देवाची भक्ती करणे त्याला पूजने ।एकाद्यावर दया दाखवणे।ईश्वर आहे या भीतीने का होईना पण पुण्य (आपण कशाला पुण्य म्हणतो हा वादाचा मुद्दा असू शकतो) काम करणे।कोणत्याही नवीन कामात ईश्वर माझ्या बरोबर आहे या सकारात्मत दृष्टीने चालणे म्हणून पण खुप सारी मानसिक शक्ती आपल्याला भेटून जात।इथपर्यंत सर्व व्यवस्तीत चालू असते ।
              भक्ताच्या भोळेपणाचा भीतीचा किंवा कामजोरीचा फायदा घेऊन उघड  पणे त्याची पिळवणूक केली जाते।समाजामध्ये देव धर्म यांचे नाव घेऊ चुकीच्या गोष्टीना समर्थन दिले जाते। वेगवेगळ्या अधध्देला पाठिंबा दिला जातो।देवाच्या व धर्माच्या  नावावर चुकीच्या गोष्टी खपवल्या जातात।हि कथा देवाने किंवा धमग्रथांनी सांगितलि आहे तिचा खरी आहे अशी समजून किंवा भिती घातली जाते।नरकाची किंवा इतर भीती दाखवुन उघड उघड शोषण केले जाते।देवाचे नाव घेऊन आतापर्यंत खुप क्रुर भयानक अत्याचार घडवले गेले आहेत।व आजही घडवले जातात।त्याचे उघड उघड समर्थनही केले जाते।आणि कधी कधी तर अन्यायाला बाली पडणार पण त्याच्यावरील अन्यायाचे समर्थन करतो कारण त्याला त्याची जाणीवच नसते किंवा तो समाजाच्या विरोधान जायला घाबरत किंवा टाळत असतो ।आजही या नावावर कितीतरी निःपाप जीवांचे बाली पडले जातात किंवा मानसिक शोषण केले जात।त्यामुळे नको वाटते हि आस्तिता।पण परत प्रश पडतो यामध्ये सामान्य माणसाचा काय दोष तो तर निरपेक्ष भावनेने भगवंताला शरण गेला आहे।पण परत प्रश पडतो आपल्यावरील व सामाज्यावरील अन्यायाचे सरळपणे पाठींबा देणार्याला आस्तिक म्हणावे का ?
              नास्तिक योग्यआहे तीच बरोबर आहे त्याने सर्व प्रश सुटतील असेही वाटते।पण अशीही माणसे भेटतात ज्याचा देवावर विश्वास नसतो पण इथल्या जातीव्यवस्थेवर असतो।ते देव नाही म्हणून सरळ सरळ दुसऱ्याचे लुबाडून खातात किंवा त्या गोष्टीचे  समर्थन करतात।मग विचारचक्र सुरु होते व वाटायला लागते त्यापेक्षा आस्तिक बारा निदान तो त्याच्या अज्ञानात तरी सुखी आहे।पण काही किंवा बहुतांशी अशी लोक पण भेटतात ती नास्तिक असता आणि माणूसच माणसांचे होणारे शोषण थांबवू शकतो ।कुणीही दुसरा येणार नाही।या विचाराने प्रेरित असतात।आणि मग ते प्रसंगी पूर्ण समाजाचा पण का होईना पण विरोध करून पण आपले विचार ठामपणे मांडतात।आणि ते आमलात येण्यासाठी कृती पण करतात।किंवा देव नाही पण प्रेम दिल्याने प्रेम वाढते या विचाराच करून जेवढे दुसर्याचे व समाजाचे चांगले करता येईल ठेवढे ते करतात।
           कितीतरी आस्तिक लोक देव धर्माच्या नावाने चाललेल्या काळ्या बाजाराला विरोध करतात पण म्हणून ते लगेच नास्तिक होत नाही तर त्याची त्या दिशेने चालू असणारी ती एक वाटचाल असते।मग ती त्याच्या नकळत का होईना पण विद्रोह झालेला असतो ।मागे एक वाक्य माझ्या कानावर आले कुणीतरी म्हणाले सर्व धर्मग्रंथ वाचून मी नास्तिक झालो।त्यामुळे आपले अज्ञान हेच कारण आहे आपण आस्तिक असण्यामागे ।अंतिम सत्य हे नास्तिक कडे वाटचाल करते।पण त्यामुळे आपण अस्तिकतेल विरोध करू शकत नाही तर त्यातील फक्त अधश्रदेला करू शकतो ।व लोकांच्या लक्षात आणून देऊ शकतो देव धर्माच्या नावाने चालू असणारी प्रथा परंपरा कशी चुकीची आहे ते।त्यामुळे लोकांची हळूहळू वाटचाल हि नास्तिकतेकडे होईल त्यांना कळणारही नाही।पण यासाठी कायम करावी लागेल ती समाजजागृती आणि नेहमी प्रमाणे यामध्ये बाली जाईल तो सच्या नास्तिकांचा ।जे आज पर्यंत होत आले आहे तेच पूढे पण होईल।पण अशी समाजजागृती जर झाली नाही तर आपण काळाने खुप मागे खेचले जाऊ हे मात्र नक्की।जसे शिवशाही व पेशवाई मध्ये तफावत आली अगदी तशीच।
      शीमंतांना देव नसला तरी चालेल पण गरिबाला देव लागतो।क्षणा क्षना ला मानसिक शरीरींक संकटांना सामोरे जाणार्याला देव लागतो।कारण तेवढाच एक पर्याय त्याच्या कडे असतो तो हि शेवटचा ।पण याचाच गैर फायदा घेऊन आणखी त्याचे शोषण केले जाते ।होते काय उलटेच।
        आस्तिक माणसाकडे भरपूर प्रश्नांची उत्तरे नसतात किंवा तो त्याची चिकित्सा करत नाही आणि ती शोधण्याचा  प्रयन्त हि करत नाही।किंवा उत्तरे घावली तरी यामध्ये आपला काही फायदा नाही किंवा ते सत्य सीकारण्याची तेवढी हिम्मत नसते किंवा होत नाही।
आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासामध्ये झालेल्या क्रांत्या या रक्तरंजित किंवा लोकशाही मार्गाने झाल्यात त्यामुले थोडा अधिक प्रमाणात का होईना पण न्याय मिळाला ।आजही असाच न्याय मिळवावा लागतो।मग तो लोकशाही मार्गाने आसू किंवा प्रसंगी हुकूमशाही मार्गाने।पण न्याय देण्यासाठी कोणताच देव किंवा कोणीही आले नाही ।हजारो वर्षापासून चालत आलेली भारतातील अन्यायकारी जातीव्यवस्था असो किंवा जगातील स्त्री पुरुष असमानता असो किंवा जगातला काळा गोरा भेदभाव असू किंवा गुलामांचा व्यापार असू ।कितीही क्रूर अन्याय झाला लोखों कोट्यवधी लोक मारले गेले मग ते रोगामुळे असू  किंवा महायुद्धा मूळे किंवा एखाद्या हिंसाचारामध्ये कोणीही आले नाही वाचवायला आणि तसे कोणी येतहि नाही।त्यासाठी जगाच्या इतिहासमध्ये खुप जणांनी निस्वार्थी भावनेने समाजसेवा केली।आणि थोडा जास्त प्रमाणात का होईना पण न्याय मिळून आणला।आपले पूर्ण आयुष्य वेचले ।ते एकच आहे हे माहित असून पण ।पण आपण काय केले आपण फक्त त्यांना दगडांच्या मुर्त्या त्यामध्ये कैद केले।आणि एखांद्या भक्त प्रमाणे त्याचा जयघोष केला।आणि नेमकी त्याच्या विचारांचीच पायमल्ली करून आपण अस्तिकांनकडे वळालो ।मग खपवल्या गेल्या आजही जातात त्याच्या नावाने कोणत्याही गोष्टी।आपण मात्र आंधळे पणाने स्वीकारतो।आणि परत आपल्याला गरज भासू लागते नास्तिकतेची।खरच आपल्याला निस्वारती नास्तिकतेची गरज आहे।तरच आपण एका शोषण मुक्त समाजाची निर्मिती करू शकतो।
          आस्तिक म्हणजे अस्तित्व  मध्ये असणारी गोष्ट जशीच्या तशी स्वीकारणार आणि नास्तिक म्हणजे आस्तिक (अस्तित्वात असणाऱ्या) गोष्टीची चिकित्सा करून चुकीच्या गोष्टीचे समर्थन ना करता मनाला पटणाऱ्या सत्य गोष्ट स्वीकारने ।म्हणजे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करून बरोबर असणाऱ्या गोष्टी स्वीकारने मग त्या गोष्टी समाजाच्या विचारसरणीच्या विरोधात का असेना पण त्या आमलात आणणाऱ्याचा प्रवास आस्तिकते पासून नास्तिकते कडे होतो।


पवन खरात,अंबाजोगाई
जर देव या संकल्पने हि संदर्भ जोडला तर मी नास्तिक आहे,पण जर माणुसकी सोबत संदर्भ जोडला तर मी आस्तिक आहे ।

कारण मी जगात जिवंतपणी आई वडिलांचा छळ करणारे,  दोन वेळेची भाकरी खायला देण्यासाठी सुद्धा काणकुन करणारे  आणि मेल्यानंतर पुण्य मिळण्यासाठी लोकांना गोड जेवण खाऊ घालणारे असे नीच प्रवर्तीचे लोक सुद्धा अगदी जवळून पहिले आहेत.


     "अंगात देव येणे " हे वाक्य आपल्या सर्वांना परिचित आहे आणि विशेष म्हणजे फक्त आणि फक्त भारतातच ऐकायला मिळेल.
जर अंगात देव येऊन खालील प्रश्न सुटणार असतील,

1. एखादया अंथरुणावर पडलेल्या व्यक्तीला तंदुरुस्त करत असेल,हातात गळ्यात गंडे दोरे बांधून जर आजार नीट होत असता तर डॉक्टर जन्माला यायची गरज काय होती ?

2.जर उपासतापास करून एखाद्याची अधुरे स्वप्न पूर्ण होत असतील, तर दररोज भारतात भूक बळिले मरणारांची संख्या लाखोंमध्ये आहे, ज्यांना एक वेळच अन्न मिळणे मुश्किल आहे ,त्यांच्या स्वप्नचं काय?

3. जर देव अंगात येतो तर मग एखाद्याच्या अंगात आईन्स्टाईन , स्टीफन हॉकिंग्स,थॉमसन, न्यूटन ,आंबेडकर ,शिवाजी महाराज, यायला पाहिजेत, त्यामुळे देशाची प्रगती तरी होईल. असं का होत नाही?

 4.नेहमी अयशस्वी होणाऱ्याला यशस्वी करत असेल,तर या जगात कोणालाच अथक परिश्रम करायची गरज काय ?

माझ्या समोर घडलेला एक प्रसंग सांगतो,
ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघालो थोडं दूर गेल्यावरती एका घरासमोर एक देव्हारा आणि तुळस होती साधारणतः 10 मिनिटं पूर्वी पुजाकरून झाली असेल,मी त्यासमोर जळत असलेल्या अगरबत्ती वरून अंदाज लावला. एक 8 वर्षाची मुलगी एक 1 वर्षाचं बाळ कडेवर घेऊन  त्या घरासमोर भाकरी मागत  उभी राहिली होती, बाजूला एक कुत्रा उभा होता. तेवढ्यात त्या घरातून एक बाई भाकरी घेऊन आली आणि ती भाकरी त्या कुत्र्याला टाकली, तेव्हा मला खरंच खूप दुःख वाटलं पण एक गोष्ट मात्र मी शिकलो या जगात माणसाला जेवढी किंमत नाही त्यापेक्षा जास्त किंमत कुत्र्याला दिली जाते.

म्हणूनच मला हे सांगायचे आहे कि ,
"जर देव या संकल्पने हि संदर्भ जोडला तर मी नास्तिक आहे,पण जर माणुसकी सोबत संदर्भ जोडला तर मी आस्तिक आहे ।"


अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-१)

🌱 वि४🌿या व्हाट्सअप ग्रुपवरून
अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-१)


Source:- INTERNET
-किरण पवार,
औरंगाबाद

याविषयी मला ठामपणे सांगायच आहे ते म्हणजे आपल्याला नास्तिकतेची गरज आहे. कारण *आस्तिक असण तुमच्यातल कुतूहल नष्ट करून टाकत.* कुतूहल एका प्रकारे जिद्दीचा उगम असतो. नास्तिकता प्रश्नांना पुरक आणि पडताळणीची उत्तरं शोधते.
          आजवर जेवढी आस्तिक लोक पाहिली तेवढ्यांमुळे नाहक अअंधश्रद्धेचे बळी पाहिले. धर्माच्या नावाखाली अन्याय पाहिला. आस्तिक लोकांना इतरांच स्वातंत्र्य हिरावून घेताना पाहिल. *खर तर आस्तिक लोकांना सर्व गुन्हे मी लेबलींगच्या नावाखाली करतानाच आजवर पाहिलं.*


Source:- INTERNET
-अनिल गोडबोले,
सोलापूर

हा प्रश्न मला खूप वेळा पडत आला आहे. नेमकं अस वातावरण आपल्या आजूबाजूला असत की आपण सरळ सरळ धार्मिक असाव अस वाटत... एखादा सण किंवा समारंभ होत असेल तर अस वाटत की देव आहे, हे एवढे लोक जर छाती ठोकून अनुभव आला आहे असं सांगतात तेव्हा नक्कीच आपण आस्तिक व्हायला पाहिजे... व्हायला पाहिजे काय... आहोतच आपण..
ते सण, घरात येणारे लोक, प्रसाद च्या नावाखाली विविध पदार्थांची रेलचेल, उदबत्त्यांचे वास, आरती चे स्वर, भजनातील तल्लीनपणा... हे सगळं आवडत. चांगलं असण्याची ताकद आहे असं वाटत जात..
तसेच उलट भूत, वाईट शक्ती, यांच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी, नशिबाच्या खेळावर मात करण्यासाठी अस्तिकता असल्याशिवाय पर्याय नाही असं मतच होत माझं....

आणि मग एक माणूस भाषण देताना, लेख लिहिताना किंवा शाळेत शिकलेला विज्ञानाचा संदर्भ देऊन संभाषण (वाद विवाद नव्हे) करू लागतो.. आणि आपल्याला ते पटत जात. मनात आत कुठेतरी हालत जात सगळं, केवढं मोठं असत्य आपल्या गळ्यात मारलं जात आहे, आणि ते पण किती पद्धतशीर पणे.. दाभोलकर खरे वाटायला लागतात.. भगतसिंग वाचताना आपलं मनच म्हणत... अरे हे तट खर आहे की, मग शोधत शोधत जाताना लेनिन, मार्क्स, अगदी प्रोटेस्टंट करणारा मार्टिन ल्युथर पासून अगदी थेट चार्वाक पर्यंत गाडी येऊन पोहोचते.
मधेच नास्तिक मेळावे काय भारतात, मध्येच एखादं राष्ट्र निधर्मी असून त्यांचा gdp आणि समाधानाने जगण्याची वृत्ती भन्नाट आहे असं कळत आणि ते पण बरोबर वाटायला लागतं
बुद्ध, महावीर, बसवेश्वर यांच्या पासून काल परवा पर्यंतच्या गाडगे बाबा चे विचार योग्यच वाटायला लागतात.
पांडुरंगाच्या चरणी जाणारे संत दाखवताना... हे लक्षात येत की हे नुसतेच शरण गेले नाहीत तर शिकवून गेले आहेत... जगायला..
'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा' अस वाचल्यावर वाटत की हे संत नक्कीच जो पांडुरंग शोधत आहे आणि आमच्या मनातला विठ्ठल हा वेगळा आहे.
मंदिरात जायला , मशिदीत जायला मन नकोच म्हणत, बाप्तिस्मा देऊन भूत काढणार्यांना जाऊन प्रबोधन करावं असं वाटत..
आणि या क्षणाला पुन्हा घरातले मोठे जाणते ज्यांनी आयुष्य बघितलं आहे .... ते सांगतात... 'हात जोड' आणि पुन्हा देव धर्म अस सुरू होत..
कितीवेळा तरी अशी आंदोलन मनात होत असतात.....
मी नास्तिक आहे असं न म्हणता फक्त तशा अर्थाचा मेसेज सोशल मीडियावर टाकला की फोन, मेसेज,... आणि बरच काही.
'एकच सांगतो तुला देव आहे किंवा नाही हे सोड.. विश्वास ठेवा.. देव तुझ्या मनात आहे..
देव असल्याशिवाय तर हा सगळा पसारा कसा चालला आहे?'
असा उपदेश चालू असताना.. कोणीतरी स्टीफन हौकिंग नावाचा माणूस सांगून जातो.... ' देव सोगट्या खेळताना कुठेतरी हरवतो त्या त्यालाच सापडत नाहीत आणि आपण नशीब म्हणून बसलोय....' देव नावाची कोणतीच वस्तू किंवा एनर्जी नाही...
अस बरच काही..... एवढं सगळं होऊन प्रश्न उरतो की ' मी आस्तिक की नास्तिक'
आणि शोध सुरू होत नेमकं काय सत्य आहे.. शेवटी सत्य हेच सापडत की..... दोन्ही बाजूची टोक गाठण्यापेक्षा आपण आपला मधला मार्ग काढावा... त्याबरोबर मनात प्रश्न येतो "ना घर का ना घाट का" अशी अवस्था तर होणार नाही ना आपली....
वाद घालण्यापेक्षा संवाद साधत नाही आपण आपले मुध्ये खरे म्हणून आपल्याच लोकांशी भांडत जातो.... एवढं बोलतो की नंतर भीती वाटते... " माझा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी तर होणार नाही ना?"
काही गोष्टी समजायला लागतात... निरीश्वरवादी तर फार पूर्वी पासून आहेत..
आपणच बऱ्याच गोष्टी एकात मिसळ केल्या आहेत.
नैतिक असण्यासाठी मला देव धर्म करण्याची गरज नाही तर विचार बुद्धी वादी असन गरजेच आहे... जेव्हा बुद्धी प्रश्न विचारते तेव्हा सगळी उत्तर मिळत नाहीत.... मिळत फक्त ' कसं जगावं' या वरच उत्तर..
आनंदी रहा, माणुसकी ठेवा, देव माना किंवा मनू नका पण आपले विचार समोरच्यावर थपवु नका, चुकीच घडत असेल तर आवाज उठवा...
आणि ठणकावून सांगा मला कुठल्याच कट्टरतेची गरज नाही.....मी सगळ्या सोबत इतरांना न दुखवता माझ्या मनाप्रमाणे राहू शकतो...
मी माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असे वागेन...
आता या वागण्याला तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा
मला तर वेगळं काही सांगण्याची गरज वाटत नाही
मला दोन्हीची गरज वाटत नाही.. फक्त ज्या गोष्टी काळाच्या कसोटीवर ज्ञान म्हणून टिकून आहेत... त्या गोष्टी साठी कुठल्याही काल्पनिक गोष्टीवर मला अवलंबून राहण्याची गरज नाही..!!



Source:- INTERNET
-करण बायस,
जि. हिंगोली

आस्तिकता आणि नास्तिकता ह्या दोन संकल्पना आपल्याला आणखी पण गोंधळून टाकतात.
असं म्हणतात अस्तिकता म्हणजे देवपूजा करणे, धर्म ग्रंथात किंवा धर्म गुरूंनी सांगितल्या प्रमाणे धार्मिक कर्मकांडात विश्वास ठेवणे असं काहीतरी आणि नास्तिकता म्हणजे या उलटं.
काही लोक मी किती अस्तिक आहे हे दाखवण्यासाठी पूजाप्रार्थना,गंध,धार्मिक कर्मकांड करणे आणि स्वतःला अस्तिक घोषित करतात.यामागे त्यांचा हेतू असतो तो म्हणजे मृत्यू नंतर त्यांना स्वर्ग पाहिजे असते,मोक्षप्राप्ती हवी असते.
या सगळ्या गोष्टींचा पाया  हे धर्मप्रचारक आहेत.
लोकांना हे धर्मप्रचारक असं पटवून देण्यात व्यस्त असतात की जो देवपूजा करतो, धर्मग्रंथांनी सांगितलेल्या मार्गावर चालतो तोच खरा अस्तिक असतो आणि जो या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही तो नास्तिक असतो.

आपल्या देशात वास्तवता ही आहे की लोकं मंदिरात जाऊन देवाला सोनं, पैसा दान करतात. त्या लोकांना कोण समजवाव की तुम्ही दिलेला सोनं आणि पैसा हा देवाकडे जात नाही (देवाकडे कशाची कमी असेल की ते आपल्याकडून घ्यायला बसले)ते तिथल्या महाराज आणि संस्थेच्या मंडळाच्या लोकांच्या पोटासाठी जातात.
या धर्मगुरूनी असं पटवून दिलं की जर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे काही केलं नाही तर तुमच्या वर देव नाराज होईल आणि तुमच्या अडचणी आणखी वाढतील.देव लोकांच्या अडचणी का वाढवेल त्याच्यासाठी तर सगळे एक समान आहेत.
देशाला लुटणारे हे लोक आणि पिळून निघणार  म्हणजे शेतकरी, बेरोजगार आणि गरीब लोक.आणि या लोकांनी समाजाची mentallity अशी बनवून ठेवली की हे गरीब लोक सुद्धा त्या धर्मप्रचारकांना नाव ठेवणार नाही.
आपण बघितलं बरेचसे समाजसुधारक असे होते की ते या गोष्टीत(लोकांच्या दृष्टिकोनातून नास्तिक) विश्वास ठेवत नव्हते पण त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला होता मग या समाजसुधारकांना काय म्हणायचे ? या समाजसुधारकांनी समाजासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न केला त्यांना माहीत होतं की धार्मिक कर्मकांड केल्यानं समाजाची प्रश्न सुटणार नाही.या धर्मप्रचारकांनी अशी परिस्थिती करून ठेवली की आपण या समाजसुधारकांना पण आठवत नाही किंवा लोकांपर्यंत त्यांना पोहचू दिलं नाही.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे लोकं एवढ्या श्रद्धेनं देवस्थानवर जातात तिथे पैसे टाकतात आणि म्हणतात आम्ही ते देवाला दिले अरे त्यात तुमचा काय फायदा झाला? सोनं देवाला चढवून काय फायदा झाला? देवाला नारळ फोडून काय फायदा झाला?
इथं शेतकरी आत्महत्या करत आहे, शाळेत मुलांना बरोबर शिकवलं जात नसल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे, वरून हे धर्मप्रचारक तरुण मुलांना भडकवतात आणि देशाचं भविष्य इथंच संपवायचं म्हणजे गरीब लोक गरीब राहावं,बेरोजगार लोक बेरोजगार राहावे!
हे धर्म, जात मानवनिर्मित आहेत आणि मानवांनी देवाला जाती/ धर्मानुसार वाटून घेतले.

आजकाल देवाच्या नावावर लोक पैसे सुद्धा कमवतात,म्हणजे देवाच्या मुर्त्या बनवणे, गणेशोत्सव, नवरात्री मध्ये हे जास्त होते पण कधी विचार केला का पाण्याचं प्रदूषण किती वाढत आहे, कधी विचार केला का पाण्यात राहणाऱ्या जीवनच इथं लोकांना वाटते आम्ही गणेशोत्सव, नवरात्री मध्ये 2-3 वेळा उपावासच खाऊन उपवास केला आणि त्या जीवाला मारून यांना पुण्य भेटणार? या लोकांना उपवास काय असते हे सुद्धा माहीत नाही.
आज तिरुपती ला एवढं सोनं चढवला जातो जर तोच देशाचे काही प्रश्न सोडवण्यात लावले तर काय जाते. जो संत, गुरू आपलं संपूर्ण आयुष्य एका फकीर सारखं राहून जगतो आज लोक तिथं जाऊन सोन्याचं सिंहासन,सोन्याचं छत्र देतात,ते संत जर आज असते तर त्यांनी हे स्वीकारलं असतं का?
आणि असं करून लोकांना वाटते की ते अस्तिक आहेत?

असं म्हणतात की देव हा आपल्यामध्ये(आपले अचेतन मन)आहे, हा देव आपली केलेली प्रत्येक प्रार्थना तो ऐकतो पण ती प्रार्थना अगदी मनापासून असली पाहिजे. आपले चेतन मनात कोणत्याही प्रकारची भीती, संशय नसला पाहिजे आणि  ही फक्त दगडाच्या देवसमोरच केली जाते असं नाही,आपण कोठेही असलो तरी प्रार्थना करू शकतो फक्त त्यात पवित्रता असली पाहिजे ,कोणाच्या प्रति वाईट गोष्टी नसल्या पाहिजे पाहिजे.अशावेळेस आपले अचेतन मन आपल्याला आपले उत्तर नक्कीच देते, हेच सांगण्याचे प्रयत्न संतांनी केले पण लोकांनी त्यांना पण देव बनवून धंदा चालू केला.
आज आपल्यात पण खूप क्षमता आहे आपण सुद्धा प्रगती करू शकतो पण लोकांना या धर्म, जातींनी खूप घट्ट पकडून ठेवलं आहे.

आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे जर प्रगती करायची असेल तर.


Source:- INTERNET
-सीताराम पवार,
पंढरपूर

आस्तिक मणजे  देव (वेद)मानणारे आणिनास्तिक(वेद) देव न मानणारे.आपल्या भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे नास्तिक मध्ये बौद्ध, जैन व चार्वाक याच्या विचारधारेचा समावेश होतो. खर तर म.गांधीजी मनतात "सत्य हाच ईश्वर आहे.स्वयंपूर्ण खेडी,भै  तिकवादाला विरोध, आज अपण यांत्रिकीकरण जगात आहोत, पुन्हा मंतोय जीवनशैली खूप बदलती आहे.त्यासाठी आपल्याला अध्यात्माची गरज आहे,अंतिम ध्येय सुखी-समाधानी जीवन जगणे हेच आहे,एवढी प्रगती होऊनसुद्धा आपण आणखी सुख शोधतोय? म फुलेंनी कोणीतरी निर्मिक आहे असे मानले आहे. मणी नाही भाव देवा मला पाव... अस गाडगेबाबा नि मटले आहे.तसेच नास्तिक विचारधारेतील बुद्ध, जैन विचारात कर्मकांड सोडून इतर बऱ्याच गोष्टी साम्य आहेत, प्रार्थना, विपश्यना, आता तर गावोगावी बुद्ध मूर्ती स्थापन होत आहेत.आत्मिक समाधानासाठी हे उपयोगाचे आहे. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा कर्मकांडाना विरोध केला,मनुन कर्मकांडाशिवाय भक्ती, अध्यत्म,माझा सुद्धा कर्मकांड, नवस बोलणे, याला विरोध आहे मला वाटते मूळ अस्तिकतेत हे नसावं काही स्वार्थी लोकांनी त्यात घुसफाळ असावं.बुद्ध मनतात स्वतःचा दीप स्वतःच बना. संत तुकाराम महाराज मनतात"1वेदांचा तो अर्थ आम्हशीच ठाव।येराणी वाहवा भार माथा।
2 वेद अनंत बोलिला।अर्थ इतुलाची शोधीला।
मूळ वेदांमध्ये कर्मकांड होती का पुन्हा काळानुसार त्यात घुसळली हे कळायला मार्ग नाही. अस्तिकता की नास्तिकता हे मणजे ,तत्वमीमांस की ज्ञानमीमांसा अस होईल, किंवा कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला. खरं तर आपल्या भारतात आस्तिक, नास्तिक दोघेही कडक नियमानुसार शक्यतो वागत नाहीत, आपल्यात विविधत्तेतून एकता आहे.जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन कृष्णमूर्तीनच्या पायाजवळ बसत. अनेक नोबेल विजेते वेडे झाले, आत्महत्या केल्या, कोणी चपला खाल्या,मला कुणाला हिनावायचे नाही पण, मानसिक शांताता, संतुलनासाठी काही गोष्टी मानसशास्त्रही मान्य करते. खर तर खराइशवरवाद आपल्याला वारकरी संप्रदाय कडून शिकायला भेटतो उदा. संत सावता माळी
कर्तव्य कर्म हाच खरा धर्म।
शेवटी ज्याची त्याची गरज वेगवेगली आहे ...


Source:- INTERNET
-सिमली भाटकर,
रत्नागिरी

माझ्या मते आस्तिकपणा व नास्तिकपणा ह्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत.देव देव करणे म्हणजे आस्तिक व न करणे म्हणजे नास्तिक असे अजिबात नाही.देऊळबंद चित्रपटात एक वाक्य आहे ,'परमेश्वर हे मानसाच्या प्रगल्भ बुद्धीला लागलेले ग्रहण आहे.मुळात हे ग्रहण आपण स्वतः लावून घेत असतो.परमेश्वर ही संकल्पना आपणच निर्माण केली व कधी धर्माच्या नावाखाली तर कधी जातीच्या नावाखाली वर्षानूवर्ष जोपासल्या आहेत.
मला माझ्या लेखातून कुणाच्या भावनांचे समर्थन करायचे नाही किंवा कुणाच्या भावना दुखाविण्याचा अजिबात उद्देश नाही.देवाच्या नावाखाली लोकांच्या मनात चाललेले युद्ध व त्यातूनच निर्माण होणारी अंधश्रध्दा यावर मला थोडेसे स्पष्टीकरण द्यायचे आहे.
झाडाचे एक लहान बीज जमिनीवर पडते.मातीत रुजते.त्याला योग्य पोषक वातावरण मिळाले कि अंकुर फुटून त्याचे मोठ्या वृक्षात रुपांतर होते.ह्या क्रियेला कुठली जादू म्हणता येईल का? कुणाकडे आहे  याचे उत्तर ? निश्चितपणे नाही.अगदी असच नात आहे आस्तिक व नास्तिक यामधील. आपल्याला समाजातील देवाचे स्थान किंवा नाव कमी करायचं नाही आणी देवाच्या नावाने चाललेला अंधश्रध्देचा काळाबाजार देखील थांबवायचा आहे.
राम,रहिम येशू हे एकच आहे व त्यांची शिकवण देखील सारखीच आहे.माणसाने विचारांनी मतभेद निर्माण केली,त्यातून वादविवाद,भांडणे सुरू झाली.मुळात विचारांची पातळी जशी उंचावते तसे माणसाचा समजूतदारपणा,त्याची परिस्थिती सभोवतालचे वातावरण व सर्वात महत्त्वाचे त्याची सकारात्मक विचार करण्याची पध्दती ,योग्य अयोग्य काय हे जाणून घेण्याची प्रवृत्ती  प्रगल्भ होते.
उदाहरणार्थ भाविक  लोक देवाला फुले,मोठ्या देणग्या घेऊन हजारो मैलांचा प्रवास पायी चालत देवस्थानात येतात. पण त्या ठिकाणी पाच मिनिटे देखील स्तब्ध उभे राहून आपल्या लाडक्या देवाला बघता येत नाही.कुत्र्याला हाकलून लावतात तसे दलाल भडवे भक्ताना मंदिरातून लवकर बाहेर काढतात .कित्येक वेळा चेंगराचेंगरीत भाविक यांचा मृत्यू होतो.येथे मानसाच्या बुद्धीमत्तेची दया येते व विचारांचा कस लागतो.देवस्थान गर्भ श्रीमंत होत आहे तिथे माणसांची गर्दी वाढते.पण अनाथाश्रम,वृध्दाश्रमातील लोकांना जगवण्यासाठी  इत्यादी ठिकाणी मात्र कुणी पुढं येत नाही.त्यासाठी बुद्धी व विचार असावे लागतात.
देवाला मानावे नक्की माना पण श्रध्देने. आपल चांगले होत नाही म्हणून लिंबू मिरची दूस-याचे दारात फेकणे हे सर्व प्रकार वाईट आहेत.ही श्रध्दा नाही,तर त्याला  वाईट भावना म्हणतात.दोन तासभर मंदिरात दर्शनासाठी लांब रांगा लावण्या ऐवजी मोकळ्या हवेत ॐ उच्चार करून प्राणायाम, योगासने करुन मन व शरीर दोन्ही निर्मळ करा म्हणजे साक्षात देव भेटल्याचा आनंद मिळेल.अशा  विचारांची अंगी जोपासना करा.
देवाला न मानणाऱ्या लोकांना नास्तिक म्हणण्या पेक्षा त्यांचे विचार समजून घ्या. हर एक माणसाची कोणावर ना कोणावर श्रध्दा असते.त्यांचे विचार वैज्ञानिक असू शकतात,वाचन मोठे असू शकते.देव मानणाऱ्याचे देखील अस असू शकते.आपण फक्त यातून अंधश्रध्दा दूर करायला पाहिजे.
उदा.महिलांना मासिक पाळी येणे ही शारीरिक व नैसर्गिक गोष्ट आहे .याचे विज्ञान सांगण्याची मला गरज नाही.पण या काळात तिने देवाला हात लावू नये,मंदिरात येऊ नये हे सर्व अंध कल्पना आहेत.मासिक पाळी काळात तिने एका जागी बसावे,आराम करावा ही गोष्ट ठिक आहे पण तिने गुपचूप ऐकलंच पाहिजे म्हणून देवाची लेबल्स लावून अंधश्रध्दा पसरवीणे कुठेतरी थांबायला पाहिजे.
माझ्या वाचनात एक सुंदर वाक्य आले आहे.संदर्भ आठवत नाही.ते वाक्य असे की,'मला येणारी मासिक पाळी जर श्राप आहे तर तुझे बाप बनणे देखील पाप आहे .' अशुद्ध रक्तातून जन्माला आलेले बाळ तुम्हाला चालते पण त्ता मातेचा स्पर्श नाही चालत.ही आस्तिकता नव्हे तर अंधश्रध्दा ठरते जी की समाजातून दूर करणे गरजेचे व महत्त्वाचे आहे.
लिहायला गेली तर कागद कमी पडेल. प्रत्येकाची विचार करण्याची पातळी वेगवेगळी असते आस्तिक व नास्तिक या चक्रव्युव्हात अडकण्यापेक्षा माणुसकीने जपून वागा,नात्यांना प्रेमाने बांधले पाहिजे.एकमेकांना मदत करून एक विकसित भारत घडविण्याचे दृष्टीने प्रयत्न करा.धर्म,जात,देव आस्तिक नास्तिक इत्यादी वादात न अडकता विचारांच्या प्रगल्भतेने माणसाच्या बुद्धीला लागलेले अंधश्रध्देचे ग्रहण दूर करु या.
एखादी गोष्ट कोणावरही लादण्यापेक्षा समजून सांगणे जास्त फायदेशीर ठरते.तात्पर्य  आज आस्तिकपणा-नास्तिकपणा करण्यापेक्षा माणसाला माणूसकीने साथ देणे ही काळाची गरज आहे.


Source:- INTERNET
-संदीप बोऱ्हाडे,
 पुणे

   आस्तिक आणि नास्तिक यांच्या दोन सोप्या व्याख्या आहेत देवाला जे मानतात ते आस्तिक आणि जे मानत नाहीत ते नास्तिक...सर्वसाधारण जे जन्माला येतात ते अस्तिकच असतात अस मला वाटत. कारण मी सुद्धा अस्तिकच होतो लहानपणी आजी , आजोबा
आई , वडील यांनी अनेक देवाच्या गोष्टी कथा सांगितल्या आणि हेच सगळे खरे आहे असा माझा विश्वास...परंतु जसेजसे वाचन आवडू लागले आणि अनेक पुस्तके वाचली तेव्हा मला या सगळ्या गोष्टींचे कोडे सुटले.
आजच्या दिवसाला मी या सगळ्या भाकड, काल्पनिक कथा मानतो. कारण आज मी एक नास्तिक आहे..मी कोणत्याही धर्माला देवाला मानत नाही मानवता हाच माझा धर्म आणि माणुसकी हाच माझा देव..मला तरी भविष्यात निधर्मी म्हणून मरायचे आहे..
   मी नास्तिक आहे म्हणजेच जगावर आणि या जगातला एक घटक म्हणून माझ्यावर एखाद्या दैवी शक्तीचे नियंत्रण आहे.
ती दैवी शक्ती व्यक्तीच्या आयुष्यात चांगले वाईट बदल घडवू शकते हे मला मान्य नाही. व्यक्ती आयुष्यात घडते किंवा बिघडते ती त्या व्यक्तीला उपलब्ध असलेल्या संधी आणि त्या संधीचा फायदा करून घेण्याची व्यक्तीची क्षमता या दोन घटकांमुळे. व्यक्तीच्या कर्तृत्वामध्ये कोणताही देव आणि दैव या घटकांचा यत्किंचितही संबंध नसतो. मन, मेंदू आणि मनगटावर माझा विश्वास आहे म्हणून मी नास्तिक आहे.
  सध्या धर्माचा मोठा सुळसुळाट तयार झाला आहे हिंदू,  मुस्लिम , इसाई या सगळ्याच धर्मातील लोक माझा धर्मच कसा श्रेष्ठ यांसाठी चढाओढ करताना दिसतात.. होय मी “नास्तिक” आहे... कारण आस्तिकांना मी देव-धर्म-जात-पात या निरर्थक मुद्द्यांवर भांडताना पाहतोय...इतिहास जर पहायचा झाला तर भारत पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांची विभागणी धर्माच्या नावावरच झाली..,,गोध्रा हत्याकांड, शिखांची कत्तल, अजूनही खूप उदाहरणे आहेत की धर्माच्या देवाच्या नावावर आजही अनेक लोकांच्या कत्तली केल्या जातात..आणि जे धर्मग्रंथ आहेत त्यापासूनच सुरवात होते एकमेकांच्या कत्तली करण्यासाठी तुम्ही गीता ,कुराण किंवा बायबल वाचा..सगळे धर्मग्रंथ आणि देव यांनी मनुष्यासाठी काय केले आहे..मनुस्मृती आणि शरियत हे दोन धर्माची पुस्तके वाचा किती भयानक प्रथा आहेत.
माझे स्पष्ट आहे की , माणसानेच देव आणि धर्मग्रंथ यांची निर्मिती केली आहे आपले पोट भरण्यासाठी...अज्ञानामुळे देवाची इतकी भीती घालून दिली आहे लोकांच्या मनात की भीतीनेच आजचा मनुष्य त्याचा गुलाम झाला आहे..33 कोटी देवांचे मला विशेष वाटते मला 33 देवांची तरी नावे सांगू शकाल का कोणी एकाच तरी पूर्ण नाव आहे का ?? अल्लाला देखील कोणीही पहिला नाही. माझ ठाम विश्वास आहे कोणतीही व्यक्ती ही आईच्या गर्भातूनच जन्म घेते.. बाकी देवांचे मला विशेष वाटते कोण आभाळातून आलाय , कोण जमिनीतून , कोण पाण्यातून , कोण नाकातून , हातातून पायातून , आणि अजूनही खूप काही.
   पोथ्या, पुराणे, ग्रह ,कुंडल्या ,
मुहूर्त , चमत्कार,  जात , पात , आणि धर्म यावर माझा काडीमात्र विश्वास नाही . कशाला हवेत ओ हे ..देव आहे तर शेतकरी आत्महत्या करतात , अगदी 2 महिन्याच्या निरागस लहान मुलीवर बलात्कार होतो..कित्येक अपघात होतात देवाला जाताना सुद्धा, आतंकवादी हमले होतात , कित्येक लोक उपाशी दररोज झोपतात, कित्येक लढाया आणि आतंकवाद याच्याच नावाने सुरू आहे, यांच्यासाठी देव का नाही काही करत?? कुठे आहे तो ??
होय, मी नास्तिक आहे कारण मी देवाला नाही तर देवाच्या अस्तित्वाला मानत नाही. पण म्हणुन देव नाही असं मी म्हणत नाही. हो देव अाहे. देव अनाथ लेकरांमध्ये आहे. देव गरीबांमध्ये आहे. देव भुकेल्यामध्ये आहे. देव पिडीतांमध्ये आहे. देव प्राण्यांमध्ये आहे. देव गरजवंतात आहे. देव जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे. त्यांची सेवा करणं किंवा त्यांच्या गरजेला उपयोगी पडणे हीच खरी देवाची भक्ती आहे. देवाचं अस्तित्व इतस्ततः पसरलेले असताना आपण मंदिरात का शोधावे त्याला?
आणि सगळ्यात महत्वाचे देव निसर्गामध्ये आहे.. 80 टक्के नोबेल पारितोषिक हे नास्तिक असलेल्या लोकांना मिळालेले आहेत. चार्वाक, गौतम बुद्ध , स्टीफन हौकींग , भगतसिंग असे अनेक नास्तिक महान पुरुष होऊन गेले. तुम्ही विचार तर करा?? की खरच अस असेल का हे होईल का?? तर्क लावायला शिका.. बहुतेक विकसित देश हे नास्तिक आहेत नाहीतर धर्माच्या नावावरील देशांची स्थिती तुम्ही पाहताच आहात. आणि हो देशापेक्षा कोणताही धर्म आणि संविधानपेक्षा कोणताही धर्मग्रंथ मोठा नाही. वास्तव स्वीकारा मित्रांनो वास्तव..आणि मी नक्कीच इथे सांगू इच्छितो की भारताला नास्तिकतेची खुप खूप गरज आहे.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************