.....हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झाले/ झालो.(भाग-2)

🌱 *वि४* 🌿 व्हॉट्सअप ग्रुपवरून
.....हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झाले/ झालो.(भाग-2)

(यातील सर्व पुस्तकांचे छायाचित्रे गुगलवरून घेतले आहेत)
            
बालाजी सानप,बीड:
Dr. A. P. J. Abdul kalam यांचे आत्मचरित्र  *wing's of fire*  म्हणजेच मराठीत अनुवादित *अग्निपंख*  आणि एक अमेरिकन तरुण ते एक भारतीय साधू राधानाथ स्वामी महाराज असा प्रवास करणाऱ्या एका *अमेरिकन साधूचे the journey home* हे आत्मचरित्र हे दोन पुस्तके माझ्या मनाची भूक नेहमी भागवत असतात. माझा  जेव्हा केव्हा self confidence  कमी होतो, माझ्यातली negativity वाढायला लागते तेव्हा मी हे दोन्ही पुस्तके वाचत असतो, आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतो.
1) *अग्निपंख*
तमिळनाडु मधील रामेश्वर नावाच्या छोट्याश्या गावात एक नावड्याच्या घरी जन्म झालेला एक मुलगा देशातील सर्वोच्च स्थान राष्ट्रपती बनतो आणि देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळवतो.
त्यांचा हा ध्येयवेडा संघर्षमय जीवन प्रवास त्यांनी या पुस्तक रूपाने आपल्यासमोर ठेवला आहे, जगातील जो कोणी हे पुस्तक वाचेल त्याच्यामध्ये एक प्रकारची स्फुर्ती, उत्साह, नक्कीच निर्माण होतो हा माझा अनुभव आहे.हे आत्मचरित्र मला संपूर्ण पाठ असून सुद्धा मी  काही लीहू  शकत नाही करण मी जितकं लिहिणार तितकं कमीच आहे....
2) *the journey home*
अशांतीने भरलेल्या या जगात एका अमेरिकन तरुणाद्वारा आत्मशांतीचा आणि संतुष्टीचा शोध या आत्मचरित्रामध्ये दिला गेला आहे, रिचर्ड नावाचा एक अमेरिकन तरुणाने केलेला शिकागो(अमेरिका) ते वृन्दावन (मथुरा)पर्यंतचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे...शिकागो ते युरोप व युरोप ते वृन्दावन त्यांनी सुरू केलेली भ्रमंती  तुर्कस्तान,इराण, इराक, अफगानिस्तान, पाकिस्तान मधून जगाची अध्यात्माची राजधनी असणाऱ्या भारत देशात येऊन थांबते, व भगवद्गीतेच्या तत्वनानाने प्रभावीत  होऊन रिचर्ड प्रभूपाद स्वामी महाराजांचा अनुग्रह घेतो व राधानाथ स्वामी बनतो, सध्या महाराज हे संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करत आहेत....हा सारा प्रवास वाचताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही, हे पुस्तक वाचताना मला 8 तास कसे गेले ते सुध्या काळत नाही.वर्षातून कमीत कमी 2 वेळा ही दोन्ही पुस्तके वाचतो व मनाच्या भुकेला शांत करतो.....
जयंत जाधव,लातूर.
माझ्या आयुष्यात मी नेहमीच वाचन हे ठरवून नाही पण विषयानुरूप करत असतो.सामाजिक कार्ये विषयाचे शिक्षण घेताना व सामाजिक संस्थेमध्ये Adoption-दत्तक विधानाचे,Drug addiction centre -व्यसनमुक्ती केंद्रात व HIV/Aids counsellor म्हणून  कार्यरत असताना वाचन खुप करावे लागते.२००५ साली माझ्या वाचनात प्रा.रवी बापटले यांच्या द्वारे संकलित आरोग्य विषयक माहिती पुस्तक "ईच्छाशक्तीःएक संजीवनी" वाचण्यात आले ह्या पुस्तकातुन मला चांगलीच प्रेरणा मिळाली व तेव्हापासून HIV/Aids पिडितांसाठी पुर्णवेळ कार्य करण्याचे ठरवले ते आजपर्यंत चालू आहे.
महेश देशपांडे,पुणे
खरतर वाचलेल्या पुस्तकांबद्दल खुप काही सांगण्यासारख आहे. *खुप* पुस्तक, *विविध* विषयांवर असलेली पुस्तक, आत्मचरित्र, इतिहासपर, वैज्ञानिक, अगदी भयकथा इथपासुन, बालसाहित्य यासह अनेक विषयांवरिल पुस्तके वाचन्यात आली. माझ्याबाबतीत सांगायचं झाल तर, जरी मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरीही, मला छत्रपती शिवरायांवरिल पुस्तकाने मला प्रेरित केले अस मी म्हणेन. कारण , विं. दा च एक काव्य आहे त्यातील ओळ अतिशय सूचक आहे. ती अशी,
*इतिहासाचे घेऊन ओझे डोक्यावर ओझे ना नाचा ।*
*करुनि पदस्थल त्यांचे भविष्य त्यावर वेचा ।*म्हणजे इतिहासातील गोष्टी मार्गदर्शक म्हणून घेतल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपल्या भविष्याविषयी आखणि केली पाहिजे. संपूर्ण मानवजातिसाठी आदर्श राजा कोणी असेल तर ते म्हणजे आपले सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज. यांच्यावरील पुस्तकाने मि प्रेरित झालो. बऱ्याच लेखकांची शिवरायांवरील पुस्तके वाचली. त्यातून अनेक बोध घेण्यासारखे आहेत. पण, सर्वांचा विचार करत आपले अस्तित्व सिद्ध करण्याची जिद्द , धमक आपल्या मध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. यालाच सारासार विचार असे म्हणतात. काही लेखक, बाबासाहेब पुरंदरे, विश्वास पाटील व पुस्तके श्रीमानयोगी, राजा शिवछत्रपती इत्यादी.
आजही सर्वाना आवाहन की, शिवरायांचे चरित्र वाचा आणि फक्त वाचून न थांबता ते अंगिकारण्याचा त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न नक्की करा....
मराठी, हिंदी, इंग्रजी या तिनही भाषेमधील पुस्तके वाचलित. मराठीत सगळ्यात जास्त. इंग्रजी भाषेत थोड़े आणि इंग्रजी सुद्धा थोडेच वाचले पण, मराठीची गोडी खुप. चेतन भगत लिखित सर्व पुस्तके One night @ call centr शिवाय. तसेच अर्नब रॉय ई. लेखकांची पुस्तके वाचली.

Manjiri karambelkar:
मला सगळ्यात भावलेलं आणि कायम प्रेरणा देणारं पुस्तक म्हणजे रशियन लेखक बरीस पलेवोय यांचं *एका अस्सल माणसाची कहाणी*
युद्धात आपले दोन्ही पाय गमावलेला एक वैमानिक प्रचंड मेहनत आणि जिद्दीने परत सैन्यात जातो आणि कसा लढतो याचं पूर्ण वर्णन या पुस्तकात आहे.ही सत्यकथा आहे.
सिताराम ढगे,मंगळवेढा:
हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झालो.
ते पुस्तक म्हणजे आमचा बाप आणि आम्ही डॉ नरेंद्र जाधव लिखित ...
     हे पुस्तक अगदी अध्श्यासारखं    वाचलं.. ज्या क्षेत्रात असशील त्या क्षेत्रात तू टॉपला असाल पाहिजेस हा त्यांच्या वडिलांचा अट्टाहास ...भले तू चोर जुगारी हो पण अट्टील हो...
      मुलांना शिकवण्याची धडपड   आणि स्व जपण्याची ....शिकवण या सर्व बाबीचा उल्लेख येतो...
      ".खरच पुस्तक मस्तक घडवतात आणि अशी घडलेली मस्तके कुणापुढे नतमस्तक होत नाहीत...."
       
राहुल आनपट,मंगळवेढा
आयुष्यात तुझ्यासारखी नकोय मला
तूच हवीय मला,
साथीला नसली तर चालेल पण,
जगण्याच्या प्रत्येक वळणावरती भेटायला येत ज मला ।
अग कसं जमतं तुला
इतकं सहन करायला
दुसऱ्यांच्या चुकांसाठी जिझायाला ।
होय मित्र हो मी तिच्याबद्दल बोलतो आहे ,जिने माझं आयुष्य तर बदलून टाकलंच पण त्यात स्त्री बद्दल पुन्हा एकदा मनात सन्मानित विचारच ,न मोडणार घर दिल त्या पुस्तकाचं अन तीच नाव  *'श्रावणी'*.
विजया ब्राम्हणकर लिखित पुस्तक *"श्रावणी"*.
होय त्यातील श्रावणी आहेच इतकी कष्टाळू । तिला थोडं मनात घेतलं की माणूस प्रेमात पडल असच तीच वर्णन ।
मला वाटतं प्रत्येक मुलीनं आणि प्रत्येक मुलांनी वाचायला हवं असं ते पुस्तक ।

या पुस्तकातून शिकलो फक्त
*जगणं काय असतं ?*
*जगायचं कस असतं ?*
दुःखाला सामोरे जाऊन यशाचं गड कशे चढायचे असतात ?
*प्रेम कुणावर करावं ?*
*लग्न करावं तर कुणाशी ?*
या सर्वांची उत्तर मला मिळाली ।
तुम्ही ही वाचा *श्रावणी*

हीच श्रावणी जिचं नाव मी माझ्या कॉलेज च्या बॅग वर 4 वर्ष झालं लिहून ठेवले आहे आणि ते अजून पुसलं गेलं नाही । याचं श्रावणाच्या नावावरून मी मित्राच्या मुलीच नाव *श्रावणी* ठेवलंय ।
धन्यवाद ज्यांनी हा विषय निवडला आणि सुचवला । या विषयाला बोलताना मला १२ वित पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले होते ।हीच श्रावणी मी पूर्ण वर्गाला सांगितली होती ।
पुस्तक :- *~श्रावणी~*
लेखिका :- विजया ब्राम्हणकर
वैशाली गोरख सावित्री:
मी आठवीत असताना पहिली कांदबरी माझ्या हातात पडली ती होती
महाश्वेता ~सूधा मूर्ती
ह्या कांदबरीनेही मला खूप प्ररीत केले. मला स्वताःकडे एक स्ञी म्हनून नाही तर माणूस म्हनून बघायला भाग पाडले,मूलींना शिक्षण घेने तर जरुरीचं आहेच पण नूसतं शिक्षण घेवून न थांबता स्वताः आर्थिकस्वतंञ होण महत्वाच अशा बर्रयच गोष्टी त्या वयातही माझ्यामनावर ठासून गेल्या . त्याचप्रमाणे आनंद यादव सरांच्या *झोंबीने* ही तेवढ्याच प्रमाणात खंबीर बनवल . आपल्या आयुष्यात काही दिवस असे असतात की तेव्हा आपण हसणं ही विसरलेलो असतो त्या दिवसात *एकटा जीव सदाशीव *ही दादा कोंडकेवरची कांदबरी वाचून एवडी हसत होती की माझी आज्जी मला विचारायची 'पोरे वेड तर लागलं नाही ना गं' .असचं कादबर्रनीच जगायला शिकवलं ,हसायलाही शिकवलं ,खंबीरही बनवलं .
पण मी ठामपणे म्हणू शकत नाही की एकाच कादंबरीने मला प्रेरीत केलं.प्रत्येक कादंबरीनेच काहीना काही शिकवलेलं आहे प्रेरीत केलं आहे .
सिताराम पवार,पंढरपूर:
आर आर पाटील यांचे"मी कसा घडलो" लहान पुस्तक आहे परंतु खुपचं प्रेरणादायी आहे.यामध्ये त्यांनी आपल्या लहानपणी आलेल्या कटू अनुभवावर कशी मात केली सांगितले आहे.कमवा व शिका या योजनेत काम करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. तेव्हा कमवा व शिका योजनेअंतर्गत पगरवढीसाठी त्यांनी प्रा.पाटील सरांना कसे पटवूनदिल हे मनाला चटका लावून जाते.
वक्तृत्व स्पर्धा धेमध्ये भाग घेऊन बक्षीस महत्वाचं नसून त्यात मिळणार पैसे खूप महत्वाचे होते.वडिलांचे निधन झाल्यावर त्यांनी पेपर दिला आणि त्यातते प्रथम क्रमांक पटकावला.कपडे नसल्याने त्यानी आपल्या वडिलांची जुनी कपडे काढून त्यापासून शर्ट शिवला त्यावेळी ते मनतात"वडील वारल्यानंतर आई जेवढं रडली नाही त्यापेक्षाही जास्त तेव्हा रडली कि जुना वडिलांचेशर्ट कापडवापरले"त्यांनी रोजगार हमी योजनेवरही काम केले, यातून "परस्थिती कशीही येवो आपण धैर्याने सामोरे जावे ही प्रेरणा क्षणोक्षणी मिळत राहते.
वीणा गवाणकर यांच"एक होता कार्व्हर "हे पुस्तक सुद्धा खूपच प्रेरणादायी आहे.

मधुकर लेंगरे:
कोल्हाट्याचे पोर
हे पुस्तक वाचून   मी माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. या पुस्तकाचे वाचन करताना मि समाजातील बऱ्याच पैलूंना जवळून अनुभवले. विचारसरणी कशी आहे त्याच्या आयुष्यात येणारे प्रसंग त्यांच्या आयुष्यातील फरफट होते. हे पुस्तक वाचताना माला माझ्या स्वताची लाज वाटत होती. कि मि एवढे दिवस जे पाहत होतो ते ते सत्य नव्हते. यांना पन समाज का स्थान देत नाही त्याची एवढी हेळसांड करतोय हेच समजत नव्हते
आशितोष तरडे पुणे:
  ‎लहानपणापासून वाचनाची आवड होती म्हणून पुस्तकांशी मी संलग्न होतो पण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आणि प्रेरित करणार पुस्तक वाचनात यायचं अजून बाकी होत.प्रत्येकाच्या वाचनात असं एक पुस्तक नेहमीच येत कि त्यातली एखादी ओळ खूप आवडते व ती ओळ पुन्हा पुन्हा वाचण्याचा किंवा इतरांना ती सांगण्याचा मोह आवारतच नाही.पण प्रत्येक ओळीवर अस्थिर करणारी,भावनिक करणारी,क्षणार्धात डोळे पाणवणारी तर दुसऱ्याच क्षणी त्वेषाने क्रोधीत करणारी,खोल विचारांना उंचवटा देणारी *मृत्युंजय* हि शिवाजी सावंत यांची कादंबरी वाचनात आली आणि मराठीच्या प्रतिभाशाली भाषेचा जणू साक्षात्कार झाला.खर तर कादंबरीच्या पहिल्या पानापासूनच हि मी कधी संपवेन असं वाटायला लागत आणि कळत नकळत जेव्हा तिचा अर्धा पल्ला ओलांडतो तेव्हा ती संपूच नये अस राहून राहून मनाला वाटत.कर्णाच्या जीवनाची परिस्थितीच्या काटेरी कुंपणात गुरफटलेली लक्तर प्रत्येक पानावर उलगडताना आपल्या मनाची गुंतागुंत अधिक वाढत जाते आणि शेवटी लेखक आपल्याला अबोल करून सोडतो...
सौदागर काळे,पंढरपूर:
आपण घरात बसल्यानंतर कोणीतरी खिडकीतून डोकावत राहतं तसंच काही पुस्तक माझ्या मनात डोकावत राहिली.काही पुस्तकं हास्यक्लबला न जाताही मनमुराद हसण्यास शिकवत आली.काही पुस्तकं संस्कारची धडे देत राहिली.तर काही पुस्तकं डोळ्यातून पाणी काढू लागली,मला प्रौढ करू लागली, समाजाबद्दल  चिंता करण्यास भाग पाडू लागली अन स्वतःला चिंतन करण्यास शिकवू लागली.
                             लहानपणापासून पुस्तकासाठी भिकारी बनत आलो.तरीही झोळी रिकामी राहतच आली.अजूनही ती भूक भागू नये व तशी भविष्यात वेळ येऊ नये असं वाटत राहतं.शेवटी पुस्तकाशिवाय जगणं म्हणजे काठीचा आधार घेत जगण्यासारखं, अंधासारखं चाचपडत जगण्यासारखं.
                ‎
      आता इथं एखाद्या पुस्तकावर लिहिणे म्हणजे दुसऱ्या पुस्तकांवर  अन्याय केल्यासारखं,दुसऱ्या मित्राला विसरल्यासारखं.
                ‎
    पण ज्या पुस्तकानं मला आठवी किंवा नववीत(२००८) असेल तेव्हा प्रथम पुस्तकाद्वारे रडवलं होतं. एकाच रात्रीत ते उद्या मिळणार नाही म्हणून वाचून काढलं होतं. ते नंतर मला विद्यापीठासाठी अभ्यासक्रम म्हणुन आलं.ते पुस्तकं म्हणजे व्यंकटेश माडगूळकर यांची " *बनगरवाडी* "
                ‎
    या पुस्तकानं मला काय दिलं तर असा जेव्हा प्रश्न मनात येईल तेव्हा एका वाक्यात उत्तर देण्यासाठी शब्द असतील," *या पुस्तकानं मला माझ्या माणसांच्या व्यथाचं गाठोडं दिलं* "
                 
     या बनगरवाडीत मेंढरे राखणारे धनगर, घोंगडी विणणारे सनगर, शेती करणारे कुणबी व भटकंती करणारे रामोशी यांचा समावेश आहे.ही कादंबरी मानव-निसर्ग असा संघर्ष सांगते.म्हणून  ती वेगळी ठरते.
            
      ' _दशम्यांची पिशवी पाठीला मारून मी बनगरवाडीला निघालो होतो'_ ,असं जेव्हा कादंबरीमधील मास्तर म्हणतो तेव्हा ते वाक्य तेवढ्यापुरत मर्यादित न राहूं देता आपल्याही जीवनप्रवासाच्या कहाणीची सुरुवात करण्यास भाग पाडतं.
              ‎
     या पुस्तकातील मास्तरकडून मला प्रामाणिकपणा,जबाबदारी पार पाडणं, गावाच्या विकासासाठी नि:स्वार्थ झटणं,प्रत्येकाचं काम आपलं म्हणून करणं, सत्य बोलणे यासारखे साधे संस्कार तो न कळत देत राहतो.
            
     ‎" _एका गावात राहून एकमेकांशी भाषा करायची न्हाई ,हे बरं न्हाई ;मास्तर!_ "असं अगतिक होऊन बोलणारा गावचा कारभारी मला समंजसपणा शिकवतो.
             
‎" _पोरं साळत आली तर त्येसनी शिकव,गावाला शिकवायच्या भानगडीत पडू नकोस!_ "असा मास्तराला दम भरणारा दादू बालट्या मला समाजातल्या कुप्रवृत्ती व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतो.
             
  गावातल्या तालमीच्या उद्घाटनासाठी राजा येणार असतो.तालीम बनवत असताना "आयबू" उंचावरून पडतो.बेशुद्ध पडतो.तोपर्यंत राजा गावात येऊन उद्घाटन करून जातो.जेव्हा त्याला जाग येते तेव्हा मास्तराला म्हणतो, " _मास्तर,राजा आला का?_ " उत्तर येत ," _येऊन गेला._ "तेव्हा आयबू रडतो अन त्याच्याबरोबर आपण सुद्धा. तेव्हा त्याला आपण तालमीसाठी काम केल्याची शाबासकी नको असती तर दुरून डोळ्याने " *राजा* " कसा दिसतो ही पाहण्याची इच्छा असते.तीही त्याची अपूर्ण राहते.
             
‎या कादंबरीतील आनंदा,रामा, शेकूबा,नानी, अंजी,काकुबा ही पात्र सुध्दा खूप काही शिकवून जातात.
             
  ‎या पूर्ण पुस्तकात निसर्ग ओतप्रोत भरलेला आहे.दुष्काळामुळे बनगरवाडीतील एक एक जण जगण्यासाठी गाव सोडू लागतो तेव्हा ते वर्णन वाचणं असह्य होतं.
              ‎" _झाडे-झुडपे वाळून कोळ झाली. भुकेल्या मेंढरानी चगळ न चगळ वेचले.फुफाटा फार झाला. चक्रीवादळे होऊ लागली, विहिरिंचे पाणी आटले. वाडीचा हेळ आटला_ ." यासारखी दुष्काळाची वर्णने वाचत वाचत स्वतः आपण मूक होऊन जातो.
              ‎
   अन एकाच गोष्टीसाठी कादंबरी  प्रेरित करत राहते , " _तू पाण्याचा प्रत्येक थेंब वाचव","झाड लाव अन ते जगव"_
              ... *पलायन न करण्यासाठी.*

........हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झाले/ झालो.(भाग-1)


🌱 *वि४* 🌿 या व्हॉट्सअप ग्रुपवरून,
विषय :-......हेच ते पुस्तक ज्याने मी प्रेरित झाले/ झालो.(भाग-1)
            

(यातील सर्व पुस्तकांचे छायाचित्रे गुगलवरून घेतली आहेत)

अनिल गोडबोले,सोलापूर:
मी स्वतः मास्टर डिग्री घेतली असल्यामुळे आणि NET झालेला  असल्यामुळे मला खूप पुस्तक वाचावी लागली(मनात असो वा नसो)
पण पहिल्यापासून वाचनाचा छंद असल्यामुळे इतर आणि अवांतर वाचन भरपूर आहे. माझ्या कडे असलेली पुस्तके आणि भेटलेली माणसे मला घडवत आली आहेत. त्यामुळे एक पुस्तक सांगणे खर तर कठीण आहे परंतु काही पुस्तके आहेत जी जीवनात बदल घडवायला किंवा आपल्या विचारात बदल व्हायला सुरुवात करतात.
1. श्यामची आई:- हे एक पुस्तक आहे ज्याच्याशी मी माझे बालपण आठवू शकतो.बाकीच मी दिलेलं आहेच आधीच्या विषयात.
2. मुसाफिर:- अच्युत गोडबोले यांचं आत्मचरित्र आहे जे खूप प्रेरणादायी वाटलं मला.
3. वपुरझा:- व.पू. काळे यांच वपूरझा हे पुस्तक माणसाला वास्तवदर्शी विचार करायला भाग पाडत.
3. 7 habits of highly effective people:- Stephen covey यांच हे एक पुस्तक अतिशय बदल घडवणार वाटलं मला. माणसाला यशासाठी लागणाऱ्या सवयी सांगितल्या आहेत
पु.ल. देशपांडे यांची तर सर्व पुस्तक आपल्याला अनुभव देऊन जातात
अपूर्वाई, पूर्वरंग, असामी असामी, बटाट्याची चाळ
वपू यांचा पार्टनर
मिरासदारांची मिरासदारी
चेतन भगत यांची one night @call center , five point someone, 3 mistakes of my life

Chicken soup for the soul:- jack Canfield and Mark Viktor  सगळे अनुवादित भाग
तर असो.... खूप लिस्ट आहे त्यातली काही महत्वाची आठवलेली...
खूप पुस्तक आहेत जी आता आठवत नाहीत ..
Syllabus च्या बाहेरची खप पुस्तके वाचन संस्कृती शिकवून गेली..
जाता जाता मुक्ता चैतन्य यांच "13 ते 23 मुलीच्या जीवनातील uncensord पाने" हे समुपदेशनाच्या कामाला आलं

राज इनामदार ,पंढरपूर
*अनवानी* हे अंकुश गाजरे सर लिखित पुस्तक मला खूप मनाला भावल. सरांची आणी माझी मैत्री खुप जुनी पण ..सरांनी लिहलेल पुस्तक मी खूप दिवसांनी म्हणजे गेल्या वर्षी वाचल .
    वाचताना हे पुस्तक कधी वाचून पूर्ण झाल हे समजलंच नाही. हे पुस्तक विद्यार्थी /विध्यार्थीनी यांना भरपूर असे प्रेरित करणार आहे ..लेखकाची भाषा अगदी सरळ ग्रामीण सोपी असल्याने वाचकाच्या पचनी पड़ते .
 आयुष्यात दिवसागनीक संकटे उभी राहत असताना .परिस्थितीच्या आधीन न जाता संकटाचाच्या डोक्यावर पाय देवून आपल शिक्षण पूर्ण करून .ऐक नामवंत लेखक व शाळेचा संस्थापक होण्यापर्यंतचा लेखकाचा प्रवास खूप प्रेरणा देवून जातो ....

निलेश पाटील,जळगांव:
My Experiments with Truths  he mahatma Gandhiji che "pustak" vachle va Maze "Mastak" "Natmastak" zale Gandhiji ni tyamadhe te Shakahari kase Zale tyacha kissa sangitala aahe Te lihtat; On that Night I ate Meat &I felt that The Goat was dancing in my stomach and from that night  I Became  Vegetarian. .... Ha kissa vachun mi suddha  prerit   zalo

रविराज आकोस्कर,लातूर:
"ही श्री ची इच्छा "हे पुस्तक श्रीनिवास ठाणेदार यांच...याच पुस्तकाने मला खूप प्रेरित केल..
मी सांगली ला शिकायला असताना एका फ्लॅट मधे राहत होतो..सहजच खूप बोर होतय म्हणून अपार्टमेंट च्या गची वर जाऊन टाइम पास करावा असा विचार केला..वर गचि वर जाताना अचानक मला ते पुस्तक एका कोपऱ्यात दिसलं.मी ते उचलून पाहिलं आणि आजुबाजुला कोन आहे ते बघितलं..मग आधी watchmen ला सांगून मी ते माज्या जवळ ठेवलं आणि त्यांना सांगितलं की कोणी विचारल तर सांगा माज्या कडे आहे म्हणून..
पण ते पुस्तक कोणाचं नव्हत पण अचानक ते तिथं कस हा विचार करू लागलो..नंतर जास्त विचार न करता मी वाचू लागलो...खूप सुंदर पुस्तक आहे अस वाटू लागलं..मी किमान 2 दिवसांत 6 वेळेस ते पुस्तक वाचत च राहिलो..खूप खोलवर परिणाम करत गेल ते पुस्तक माझ्यावर..नशीबाने ते पुस्तक मला भेटले म्हणून मी खूप खुष होतो..
खरच त्या पुस्तकाने खूप प्रेरणा दिली..आजही ते पुस्तक माझ्या साठी खूप प्रेरणा दायक आहे..
कठीण परिस्थिती मध्ये मी ते नकळत वाचतो..खूप धन्यवाद त्या पुस्तकाचे...
बर् ठीक आहे..

N.M.Patil,Buldhana:
‎आज पर्यंत मी अनेक पुस्तके वाचली आहेत. त्यापैकी सर्वात खास म्हणजे किशोर शांताबाई काळे यांचे *कोल्हाट्याचं पोरं* ही कादंबरी होय. खूप छान पुस्तक आहे.

अभिजीत गोडसे ,सातारा
‎ "न पाठवलेलं पञ" हे पुस्तक 'महाञया रा'  या लेखकांनी  लिहल आहे. या पुस्तकाने मला उत्तम आयुष्य कस जगायच हे साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलं . ओघवती आणि सरळ कुणालाही समजेल अशी सोपी भाषा या पुस्तकात आहे. निराशाने ग्रासलेल्या व्यक्तीला हे पुस्तक उठवते, चालायला लावते, येवढेच नव्हे तर आनंदाने त्या व्यक्तीला बोलत करते. मी अवांतर बरीच पुस्तके वाचत असतो. वेगवेगळ्या विषयावर भाष्य करणारी पुस्तके असतात .त्यातुन खुप काही भेटल आहे. भेटत आहे .पन या पुस्तकाने मी प्रेरित झालो .जिवन शिकवल तर याच पुस्तकाने. दोन वर्षी पुर्वी माझ्या मोठ्या भावाने हे पुस्तक मला भेट दिले आणि माझी जगण्याची परिभाषाच बदलुन गेली. हे पुस्तक मी वरचेवर सारखे वाचत असतो . पुस्तकातील कोणताही लेख उघडून वाचतो कोणती ना कोणती घटना या लेखाशी मिळती जुळती असते. खुप मोठ-मोठ्या गोष्टी अगदी सोप्या करुन सांगितल्या आहेत. तुम्ही दुःखा मधे , आनंदामधे , यशस्वी , अयशस्वी काहीही असा हे पुस्तक छानच वाटते..

या पुस्तकातले छोटसे मजकूर देतो -

 किती वेळ तुम्ही भिंतीवर टकरा देत राहणार ?
तुम्ही रक्तबंबाळ व्हाल, पण भिंत तुमच्यासाठी कधीच दुभंगणार नाही
‎  किती वेळ तुम्ही तुमच्या नशीबाला बोल लावत  
‎आंब्याच्या झाडाखाली संञ्यांची अपेक्षा करत थांबणार ?तुम्ही मरण जरी पावलात,
 तरी आंब्याच्या झाडावरून एकही संञं खाली टपकणार नाही.
जे असतं, ते असतं, जे नसतं,ते नसतं.
विचक्षणा म्हणजे हे समजणं की काय धरुन ठेवणआणि केव्हा सोडून द्यायचं.

राजश्री:
एकच आवडतं पुस्तकं सांगणं तस अवघड.
आतापर्यंत वाचलेल्यातील ,
' तोत्तोचान ' ( खिडकी पासची चिमुरडी ) , मूळ लेखिका - तेत्सुको कुरोयानागी , अनुवाद , चेतना सरदेशमुख गोसावी .. हे अधिक भावले..
 शाळेतून काढून टाकलेल्या लहानग्या मुलीला एका जगावेगळ्या शाळेतील जगावेगळे हेडमास्तर किती सुरेख प्रकारे तिच्याही नकळत आकार देतात त्याची सुंदर कथा..
तोत्तोचान सारखेच तर असतो आपण लहानपणी आणि मोठेपणी सोसाकु कोबायशी होऊन आपल्या पेक्षा लहानग्या तोत्तोचानना जपायच असतं..
एका कोबायशिंनी घडवलेल्या एका तोत्तोचान ने जगातल्या कितीतरी अध्यापकांना प्रेरणा दिली.. या प्रत्येकाकडून त्यांच्या कार्यकाळात अजून मुठभर तोत्तोचान तयार झाल्या तर जग अजून सुरेल होईल ... प्रत्येकाला जगणं सुकर करणार असेल...
' स्पीड पोस्ट ' मूळ लेखिका शोभा डे , अनुवाद - अपर्णा वेलणकर ,
 आईने मुलांना लिहिलेली पत्रे पण मुले आणि बाबांनी सुद्धा आवर्जून वाचावी अशी...

विजय खिल्लारे,हिंगोली:
कोणतेही पुस्तक वाचल्या नंतर आपल्या त्यांच्यातून काहीतरी शिकायला मिळते.परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात अस एकतरी पुस्तक वाचणत येते .ते वाचल्या नतंर त्यांच्य जीवनाला कलाटणी भेटते,थोडक्यात तो प्रेरित होते.                                            ज्याप्रमाणे मा.फुले थॉमस पेन यांच्य  *right of man.*या पुस्तकानी प्रेरित झाले आणि समाज सुधारणा साठी आपले जीवन व्यथीत केले.         
  मी ज्या पुस्तकांनी 📚प्रेरित झालो ते पुस्तक होते *माझी आत्मकथा.*त्याचे लेखक आहेत *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* हे पुस्तक वाचताना मला जाणवले की परिस्थिति किती ही वाईट असली तरी आपण तीचा सामणा केला पाहिजे .डॉ .बाबासाहेब आंबेडकर प्रचंड वाचनवेडे होते . त्यानी पुस्तकासाठी राजगृह हि इमारत बांधली. ऐवढ प्रचंड प्रेम बाबासाहेबाचे पुस्तकावर होते ते म्हणाचे  मला माणसापेक्षा पुस्तकाचा सहवास फार आवडतो .त्यानी दलित शोषित समाजाच्या व्यथा वेदनांना वाचा फोडली त्यांचे ध्येय  मानवमुक्ती हेच होते. अत्याचारा विरोधात आवाज उठविण्यासाठी एक कुशल *पत्रकार* म्हणून
*मूकनायक* ,
* *बहिष्कृत भारत,*
*प्रबुद्ध भारत* *
व  *जनता*
पाक्षिक-साप्ताहिक सुरु केले...   बाबांसाहेबांसारखा जिद्दी माणूस शोधून ही सापडणार नाही.....
1) शाळेत शिकु देत नव्हते.
बॅरीस्टर झाले.              
2) पाणी देत नव्हते.
आख्खे चवदार तळे खुले केले.
3) हिंदू कायद्यात दलित समाजाला कुठेच स्थान नव्हते.भारताचा संपूर्ण कायदाच बाबासाहेबानी लिहीला.
4) त्यांना राहण्यासाठी जागा
दिली नाही.
आज सर्व सरकारी जागेत त्यांच्या कर्तृत्वामुळे
त्यांचे फोटो आणि पुतळे उभे आहेत.
सलाम त्यांच्या जिद्दीला....त्याचे चरित्र  वाचणारा  कोणताही व्यक्ति  नक्कीच प्रेरणा  घेईल...

प्रविण, मुंबई:
अनेक पुस्तके वाचनात आली आणि प्रत्येक पुस्तकाने विचारांमध्ये काहीना काही भर घातली आहे. त्यामुळे एखाद्या पुस्तकाविषयी लिहण खरच कठीण आहे. तरीही त्यातील काही पुस्तके खूपच भावली. त. त्यात मानावर कोरलेल आणि आचरणात उतरत असलेल पुस्तक म्हणजे “भगत सिंघ – समग्र साहित्य “.
हे वाचत वाचत समाज धर्म राजकारण इ विषयांवर टीकात्मक विचा करायला लागलो कळलाच नाही.
ह्या पुस्तकातून भागात सिंघ यांचा एक अभ्यासू चेहरा समोर येतो. वयाच्या १७ वर्षी “The Communist Manifesto” चे सखोल वाचन, तसेच रशिअन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती आणि भारतीय इतिहासाचा सखोल अभ्यास असणारे भागात सिंघ यातून मला समजले. त्यांचे भाविश्यातील भारत कसा असावा हा याबदालाचे मत त्यांची दूरदृष्टी दाखवते. trade dispute bill यावर कोर्टात केलेलं भाषण त्यांचे कायदेज्ञान दर्शविते.
मी नास्तिक का या लेखात त्यानी धर्मांध शक्तीवर केलेला प्रहार तसेच शेवटपर्यंत मतावर ठाम राहिलेले कठोर भगत सिघ पण यातून दिसले. ह्या पुस्तकातले त्यांचे लेखन हे एखादा खूप अनुभवी अशा अभ्यासू विचारवंतासारखे वाटते. पण त्यानी हे सर्व त्यांच्या वयाच्या १६ ते २३ या कोवळ्या तारुण्यात लिहिलेले आहे. त्यांचा हाच गुण त्यांना त्यावेळच्या तात्कालिक विचारवंताच्या पंक्तीत बसवतो.
ह्या संपूर्ण खंडात एक प्रसंग खूपच चित्तथरारक वाटला. तो म्हणजे संसदे मध्ये मोकळ्या जागी बॉम्ब फेकून जाणूनंबुजून करवून घेतलेली अटक, “सरकार बाहीर झालाय त्यांना फक्त धमाक्याचे आवाज ऐकायला येतात” हे घोषणा, कोर्टाचा राजकीय व्यासपीठ म्हणून केलेला वापर......इ
शहीद भगत आणि त्यांचे साथीदार हे खर तर हवा पाणी अन्न  यावर जगातच नव्हते. त्यांचे वेड होत भारतमातेचे स्वातंत्र्य आणि रामप्रसाद बिस्मिल यांच्या कविता हेच त्याचं अन्न.

अक्षय पतंगे,हिंगोली:
"एका दिशेचा शोध"
 भारताच्या उज्ज्वल उद्यासाठी लिहीलेल्या पुस्तकात लेखक संदीप वासलेकरांनी "एका दिशेचा शोध" घेतला. प्रत्येकांचे जगणे सुंदर व्हावे, हा मानवतेचा संदेश लेखंकानी दिला. भारतीय संस्कृतीचे संस्कार हे सध्याच्या जगासमोरील आव्हानांचा एक चांगला पर्याय आहे, ही सहज जाणिव होते. मूठभर धनिकांचे संपत्तीचे प्रदर्शन, त्यांचा बडेजाव, चंगळवाद, ऐषाराम यामुळे आपला देश भरपूर प्रगतीच्या वाटेवर आहे, असे फसवे चित्र उभे केले जाते, हे स्पष्ट करतानाचं बैलगाडी अर्थव्यवस्थेतील ८० कोटी लोक सापळ्यातच अडकून राहिले, असे  लेखक सांगतात. जगातील महत्वाच्या प्रश्न सोडविण्यासाठी वसुधैव कुटुम्बकम् चा संदेश पुर्ण करण्यासाठी लेखकांनी नियती, निश्चय, निर्मीती चा आम्हां युवकांना दिलेला संदेश मला प्रेरणा व दिशा देणारा ठरला. 

मोबाईल व इंटरनेटच्या अतिवापरामुळे जग ऑनलाइन पण मी माझ्यातही ऑफलाइन ! आता यावर उपाय काय?

🌱वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

विषय:-मोबाईल व इंटरनेटच्या अतिवापरामुळे जग ऑनलाइन पण मी माझ्यातही ऑफलाइन ! आता यावर उपाय काय?


(यातील सर्व इमेज गुगलवरून घेतल्या आहेत.)

जयंत जाधव,लातूर:
सर्वप्रथम विषयाला सुरूवात करण्यापूर्वी कोणत्याही विषयाच्या  दोन बाजू असतात.चांगली व वाईट,चांगले निर्माण होण्यासाठी वेळ लागतो व वाईट घडण्यास काही क्षण  पुरेसे ठरतात.इंटरनेट हे दुधारी शस्ञ आहे. विवेकशील व्यक्तीच्या हाती असेल तर नक्कीच त्याचा विधायक कामासाठी उपयोग करता येतो.वाईट माणसाच्या हाती जर असेल तर समाजाच्या व वैयक्तिक दृष्टीने पण घातक ठरते. एका सर्वेक्षण वरुन असे सिद्ध झाले आहे आजचे युवक बहुतांशी इंटरनेटचा वापर हे टाईम पास,नको त्या गोष्टी साठी करत आहेत हे वास्तव आहे.यावर उपाय माहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे शेवटी आभासी जगात किती जगावे हे माणसाला ठरवता आले पाहिजे.इंटरनेट व मोबाइलच्या अतिवापर समस्येवर उपाय करताना सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की, इंटरनेट हे सध्याचं सत्य  आहे. त्याचे उपयोग  खुप आहेत. त्यामुळेच सुरुवातीपासून मुलांवर पालकांचं विवेकी नियंत्रण असणं गरजेच आहे. पहिलीपासूनच संगणक  शिकत असलेली, किंवा त्यापेक्षा जाऊन वयाच्या ४-५ वर्षांपासूनच आईवडिलांचा मोबाइल हाताळण्याची मुलांना सवय लागते. त्यातूनच बटणं दाबताना त्यावरील इंटरनेटच्या मोहजाळात ते ओढले जाऊ शकतात. म्हणूनच सुरुवातीपासूनच पीसी वा मोबाइल गेम्स, इंटरनेट वगरे आपल्या उपस्थितीत व ठरावीक वेळच वापरण्याची युक्तीने सवय लावणं जमल्यास वय वाढल्यावरही आईवडिलांचे ऐकण्याची सवय लागते.

Chandu Diwase ,parbhani:
whole world is online through mobile and Internet but I'm offline in myself*
today's life is so fast.to live the smart and good  life in this generation mobiles are the most helping media.through these media people connect with each other on this universe at any distance and any time.we can get any information on fingers through internet.we can travel through using GPS,ticke booking,shopping,online payments lot of thing we can do in a very small time without asking anyone...after invention of mobile and internet humans life becomes more luxuries......whenever new things invented  there are always  some good and also bad side  effects come out.Because of the Havy use of mobile and internet people got addicted to them....they have been forgetting lot of thing like playing,face to face contact and lot more..we can't avoid them to use but we can use them in a limit...this the only way to come online our self.we have to keep balance between our other activities and mobile internet.if we use mobile internet and our all activities in balance then there will not any problem come out.


तेजस्विनी जाधव,इंदापूर:
आजचे युग म्हणजे कॉम्पुटरचे युग ,मोबाईल चे युग एका चुटकीसरशी सगळी माहिती हातात, मग कोणता का  विषय असो,हे एक चांगलीच गोष्ट आहे पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की काही उपयोग नाही.
  आजच्या काळात हेच झाले आहे लोकांमध्ये ऑनलाइन ही एक जगण्याची पुरवणी आहे हे विसरून त्याला तोअस्सल जगणेच समजायला लागला आहे.
ऑनलाईन म्हंटल की आपल्याला पहिलं आठवते व्हाट्सएप.
व्हाट्सएप  हे एक असें साधन आहे की ,काही लोक दिवस भर फक्त याचासाठीच जगतात काय असे वाटते .स्वतःकडे लक्ष द्यायल त्यांना जास्त time नाही पण व्हाट्सएपच्या मेससेजेस साठी एका पायावर तयार,मी असेच एकदा माझ्या मित्रमैत्रिणीना विचारले  की कधी काय लिहले आहे का तर एकच उत्तर असते काही लोकांच, की वेळ नाही मिळत. पण ऑनलाईन बघितलं तर दोन दोन तास कसला तरी फालतूक स्लॅम बुक पुर्ण करत असताना दिसतात, उदाहरण झाले तर मला हा अवॉर्ड द्या आणि तो अवॉर्ड द्या,आणि ते एक गाजलेले तुमचच्या बेस्ट लोकांना हे पाठवा आणि ते पाठवा आणि मला पण पाठवा जर मी बेस्ट असेल तर, आणि असा बराच गोष्टी.............
आपण ऑनलाइन चा उपयोग कशासाठी करायला पाहीजे व किती करायला पाहीजे हेच विसरून गेलो आहोत.
हजारो मैल दुर असणाऱ्याची मने जपता जपता आपण आपल्या जवळच्याच लोकांना तर नाही ना विसरत??..
रोज सकाळी उठल्या उठल्या सर्वाना good मॉर्निंग बोलायचं लक्षात येते पण , आई बाबा च्या पाया पडायला मात्र फक्त परीक्षेची सकाळ आठवते....... यावरून मी स्वतःला कोठे तरी विसरत आहे असे नाही का वाटत????? स्वतःला काय वाटते स्वतःबद्दल? याच्याबद्दल विचार करायचा सोडून दुसऱ्याला काय वाटतेय माझ्याबद्दल हेच  आजकाल खुप जनांना वाटते ,आणि  या बदलामध्ये, या ऑनलाइन चा थोडा प्रमानात का होईना पण हात आहे असे मला वाटते...... 
ऑनलाईन च्या सवयी मूळ माणसाची स्वतः विचार करण्याची क्षमता कमी होत आहे, फक्त कॉपी पेस्ट ची सवय लागली आहे ...
या सर्वांवर उपाय म्हणजे ऑनलाईन चा मर्यादीत वापर ,आणि महत्वाचा एक चांगला ऑनलाइन गोष्टी चा वापर म्हनजे वि4 सारखे व्हाट्सएप ग्रुप.......
        (प्रत्येक गोष्ट ला एक चांगली आणि वाईट बाजु असते पण माणसे मोबाईल मुळे कशी ऑफलाईन झाली आहेत म्हणजेच माणसातली माणुसकी कशी संपत चाली आहे ,यांच्या बद्दल मी माझे मत मांडले आहे..)
        ‎
कृष्णकांत राईलकर,पालघर:
खरोखर हा  प्रश्न फारच दिवसेंदिवस बिकट होत चाललाय .आपण खरोखरच मोबाईलच्या आहारी गेलो आहोत.
परतीचे दोर पण कापून टाकलेत,कारण मोबाईल बंदचा तर आपण विचारही करु शकत नाही.इंटरनेट, वँटसँप, फेसबुक,इंस्टाग्राम....ही यादी तर हनुमानाच्या शेपटीप्रमाणे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.आज कोणी पाहूणे म्हणून कोणाकडे जाणे म्हणजे त्यांच्या नेट-रुटिनला डिस्टर्बच.सगळी नाती आपापसात संवाद साधतात! पण कशाच्या माध्यमाने ? तर नेटच्या माध्यमाने.कबूल आहे की नेटवर  भरपूर माहिती उपलब्ध असते.पण या माहितीच्या मायाजालात जर तुम्ही पण गटांगळ्या खाणार असू,अर्थात आपला बहुतांश वेळ जर त्या मायाजालातच घालणार असू तर दुर्दैवाने आपले आपणच अनहित करत आहोत .

Pradip Erakar:
Kharetar hya topic vr lihan mhnjech ek vegala badal suru zala aahe asa vattey.
jevha apan lahan hoto tevha aplyala gavatun talavavrun groundvarun kuthun tari aai shodhun aanychi karan apn gharich nasayche,khelayche,bagadayche pn aajchi paristhiti agadi viruddha aahe,mulanna baljabarine ground var pathvyla lagtey te karan mhnje Mobile.
June mitraprem aata rahilach nahi asa vattey karan mobile hach aaata *so called best friend* zala aahe.katu asala tri hech satya aahe.
asyla tr  social media mule 1000  friend ahet pan jevha manatli ekhadi gosht kiva dukh kiva sukhachi ekhadi batmi kiva kahihi n sangtahi mitrana samzt ase te aata *feeling sad* *feeling happy* *feeling disturbed* ne ghetali aahe.bar hya feelingcha parinam tri hotoy ka konavr to jo bhetun dilela dhir ase to miltoy ka aata?
aaj kal college chya group(group kasala kalap asa mhanav lagel ata) madhe sudha samorasmor aselele mitra ekmekana n bolata social networking var hajaro km dur aslelya anolkhi friend sobat friendship karat astat.
kharch aahe ata yavar upay tasa fakt sath ch asel,te premache don apulkiche shabd astil,te milun misalun ekhadya mitrachi udavleli tar hi asu shakel jenekarun kahi velasathi tari kamit kami *ONLINE VISHWA CHYA MAYAJALATUN OFFILINE VISHWATIL SATYAKDE* yeta yeil..

महेश देशपांडे,पुणे:
एक संख्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून सांगु इच्छितो. माणसाला नेहमी *हाव* असते, मग ती कोणत्याही गोष्टीची असते. हे १००% खरे आहे. ज्यांना नाही ते संत झाले. मोबाईल आणि नंतर इंटरनेट चे जाळे हा त्याच हव्यसापोटि केलेला एक प्रयत्न. *प्रयत्न* यासाठी की, त्याच्या यशस्वितेविषयी सगळेच साशंक. मोबाईल व इंटरनेट मुळे
आपण नक्कीच आत्मकेंद्रित झाले आहोत. कुठलीही गोष्ट *स्वतःला* समजून घ्यायची असेल तर त्यविषयी आपण चिंतन, मनन करणे अत्यावश्यक. मग चिंतन कराच, की आपण मोबाईल मुळे खरच आत्मकेंद्रित झाले आहोत. माझ स्पष्ट मत आहे की, काहीही अगदी काहीही झाले तरी, *जगबुड़ी झाली तरी* आपण या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित केला पाहिजे. याला  *मृगजळ* देखील म्हणता येईल. *वेळेच* महत्व प्रत्येकाला खरच समजल आहे का? हा अनुत्तरित प्रश्न आहे. *विचार* या ग्रूपचा मुख्य उद्देश हा वेगवेगळ्या विषयांवर फक्त भाष्य न करता, त्याहीपुढे जाऊन त्यावर सगळ्यांनी चिंतन मनन करून *शाश्वत* कार्यकृति अखावी. मोबाईल वापर किंवा इंटरनेट वापरावर *वैयक्तिक पातळीवर* नियंत्रण आणने हा सध्यातरी उपाय दिसतो आहे. अन्यथा, चीनी सरकार प्रमाणे,आपल्या सरकार ला कार्यवाही करावी लागेल. मग बसा....
कालच्या अहवालानुसार, भारत जगात प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे मोबाईल डेटा वापरण्यात...
दूसरा महत्वाचा मुद्दा, फक्त निरिक्षण करा की, किती जणांना *मोबाईल* कसा, का, किती वापरावा हे समजते ?...

श्रेयश कराळे ‎,पंढरपूर:
           अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, पण त्याचबरोबर अजून एक वस्तू जीवनावश्यक बनली आहे ती म्हणजे मोबाईल.. आणि पूर्वी लँडलाइन होता फक्त इनकमिग आणि आऊटगोइंग होते आता त्यात प्रगती होत होत वायरलेस फोन आले  अजून वेगवेगळे कंपनीचे फोन तयार करू लागले, पाहिजेल तसे  Specification वाले मिळू लागले.
           आता तर अशी क्रेझ अलीय की प्रत्येकाजवळ Android फोन असला पाहिजे..तसेच आती महत्त्वाचे म्हणजे  अनलिमिटेडचा पॅक असला पाहिजे.... त्यामुळे मुले तासनतास बिझी असतात,
ज्यादातर वेळ हा सोशल मीडियावर वाया घालवतात. हाच वेळ तर ऑनलाईन स्टडीसाठी किंवा चांगल्या कामासाठी केला तर...
‎          गुगलवर एका क्लिकद्वारे कोणतीही माहिती चुटकीसरशी मिळते.. माझ्यामते मोबाईल व इंटरनेटचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा उदा.Online Youtube Channels, ऑनलाईन Pdf बुक्स , Telegarm..
‎           खरंच हा विषय गंभीर आहे मोबाईल मुळे लोक एकमेकांपासून दूर चाललाय, माणुसकी हरवत चाललेय, मोबाईलमध्ये नंबर आहे पण फोन करायला वेळ नाही..बोलायला वेळ नाही.. 
‎तरीपण मी मोबाइल व इंटरनेट च्या वापरामुळे जग ऑनलाईन पण मी माझ्यातच ऑफलाईन....

डॉ.सितम सोनवणे  ‬:
  ‎हे सत्य आहे. रिलायन्य च्या जाहिराती नुसार करलो दुनीया मुठ्ठीमे म्हणून सर्वानी हातात स्मार्ट फोन घेऊन जगाशी नाते जोडले पण घरात माणसं  अबोल झाली शेजारी आसुन बोलत नाहीत. पण वाॕटस्आप, नेटवर आगदी शुभेच्छा सुध्दा काॕपी पेस्ट करत आसल्या मोबाईल ,इंटरनेट च वापर करत आहोत मी माझ्यात माञ आॕफलाईन  आहे . हे सत्य आहे. त्याचा आनुभव मी स्वत: ही घेत आहे.

अनंता  गोळे,अमरावती:
“मनुष्य हा समाजशील प्राणी आहे” या वाक्यात मानवी जीवनातील अस्तित्वाच  प्रतीक दडलेलं आहे. या समाजाच्या निर्मितीबरोबरच मानवी गरजाआधारित ढळण्याची प्रक्रिया या समाजात  सामावलेली आहे. जसजशी मानवी समाजाची प्रकृती बदलत गेली तसतशी या समाजरूपी रचनेने स्वतःची कूसही फेरली. यातूनच नानाविध संकल्पनांना आणि संशोधनाना मान्यता मिळाली. मनुष्य दैनंदिन रहाटगाडग्या व्यतिरिक्त जगण्याच्या वेगवेगळ्या वाटा शोधू लागला आणि अशातच त्याला मनाला ताजेतवाने करणाऱ्या , नव्याने ऊर्जा देणाऱ्या मनोरंजनाचा शोध लागला हि पक्रिया तशी खूप विस्तृत! पण स्वतःला आनंद मिळवण्याच्या प्रयत्नातून तो नानाविध साधने तयार करत गेला याचबरोबर हि साधने काम सोपी आणि सरळ करणारी यंत्रेही झाली व मनोरंजनही करू लागली. मग काय माकडाच्या हाती तुपाचा गोळा लागल्या प्रमाणे मनुष्य त्याचा आस्वाद घेऊ लागला. पुस्तके , वृत्तपत्रे,Tv , टेलिफोन, कॉम्पुटर , इत्यादी साधनांद्वारे मनुष्य व्यक्त होऊ लागला, सगळीकडे आनंदीआनंद असताना 21 शतक उजाडले आणि मानवी अस्तित्वावरच प्रश्न या मानवाने निर्माण केलेल्या साधनांद्वारे उपस्थित होऊ लागले .त्यातल्या त्यात मोबाइल आणि इंटरनेटने तर पुरता गोंधळ उडवून दिला, प्रश्न उरतोय याचा मानवी जीवनावर काय परिणाम होतायत……..
            तोंडाचा चंबू आणि विस्फारलेले डोळे आणि दोन बोट वर करून फोटो काढण्याच्या नादात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात रोज वाचायला येतात आणि मनावर गर्द काजळी येते. ज्या वयात आनंदाने खेळायचे वय असते त्या वयात काय ते सहा सात इंचाचे खेळणे घेऊन बसायचे. किती अपडेट ठेवायचं स्वतःला? किती जाहीर करायचं? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण किती?. अहो प्रातर्विधी पासून हा कार्यक्रम सुरु होतो तो दुलइत नकळत डोळा लागतो म्हणून बंद होतो. किती मॅसेजेस किती विडिओ; किती ऑडिओ;काय म्हणे सुविचार;काय ते सल्ले ;काय ते नानाविध अजुबे; काय ते जीवघेणे प्रॅन्क; काय ते हास्यकल्लोळ उडवणारे प्रसंग; किती रंग नि किती गंध ! ना प्रांताची सीमा; ना जातीची; ना धर्माची; साधा गावरान भोळसट एखादी दैनंदिन क्रिया दाखवून हजारोंच्या चाहता होतो  आणि लाखात लोळणारे मंत्री , नट, नट्या किंवा प्रसिद्ध व्यक्तिमत्व आपल्या एखाद्या वाह्यात कृतीने हसणे बनतो. सगळ्यासाठी समता खऱ्या अर्थाने इथेच आली असं जाणवतेय. कोणी उच्च नाही कोणी नीच हि नाही, सगळं कसं क्षणार्धात समोर. जगातला कोणताच विषय आता आमच्या पासून दूर नाही मागितलं कि हजर हि वास्तविकता झालीय. पण याच वास्तविकतेंन आता भयानक रूप धारण केलंय,,,,,,,,,
                     परवा परवा कोणतातरी ब्लु व्हेल गेम आला होता खूप थैमान माजवला त्याने, हे एक मोबाईल च्या अपयशाच भौतिक मूल्यमापन झालं! मनोरंजपासून सुरु झालेला हा खेळ हा कधी आम्हाला खेळवू लागला आणि आम्ही यातले प्यादे बनून कसे मृत्युमुखी पडू लागलो आमचं आम्हालाही कळलं नाही.  आम्ही स्वतःला कधी यात गमावून बसलो हेही आम्हाला कळलं नाही. आम्ही इथून सातशे मैल दूर दक्षिण आफ्रिकेच्या भूकंबळीत सामील झालो पण रस्त्याने भीक मागणाऱ्या पोराला पोटभर खाऊ घालायला विसरलो, आम्ही दुःख व्यक्त केलं सिरीयात होणाऱ्या हत्येवर पण नकळत दहशतवाद असणाऱ्या शेतकऱ्यांचा आत्महत्येवर आम्ही गप्पच. आम्ही आनंदी झालो उरलेलं अन्न फेकू नका असा संदेश देणाऱ्या विडिओ वर पण मेळघाटात हजारो मुले नुसतं एकवेळच अन्न नाही म्हणून मेले याच आम्हाला काहीच सोयरसुतक नाही. मित्रानो आम्ही खूप शेयर केले शिवाजी पण किल्ल्यांचा दगडही जपू शकलो नाही. आम्ही बुद्धाला हि खूप शेयर केलं पण अस्पृश्यता संपवू शकलो नाही, आम्ही शेयर केले गाडगे अन तुकडोजीही, पण किती देश स्वच्छ आणि किती खेडी स्वयंपूर्ण आहेत हा संशोधनाचाच विषय आहे ? आम्ही बाबासाहेबाना खूप शेयर केलं पण आजही आम्ही त्यांना पूर्ण आत्मसात करू शकलो का?आम्ही वंदन केल जिजाऊ अन सवित्रीचेही पण किती अत्याचार आणि बलात्कार कमी झाले हे लक्षात असू द्या. आमच हे आधुनिकतेच ढोंग बेगडी ठरलं. आम्ही विश्वाच्या नादात विषयच विसरलो. आणि नको तेथे नाक खुप्सु लागलो. आम्ही प्रगत हातातल्या मोबाईल न झालो पण मनातली घाण तशीच ठेऊन जगू लागलो. आणि स्वतःच स्वतःला संपवण्याच्या स्पर्धेत अडकून बसलो. मोबाइल , इंटरनेट वाईट आहे असाही भाग नाही पण आमची कृती हि मोबाईल मध्ये वाचलेल्या शब्दाशी प्रामाणिक असते काय याचाही कधी विचार व्हावा. मोबाईल कडे लक्ष देताना आईबाबकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणजे पावलं . अदभुत चित्रपटांच्या दुनियेत आम्ही स्वतःच ध्येयही शाबुतच ठेवायला हवं. प्रत्येक पावलाला आधुनिकतेची जोड असावी पण ती कुणाला चिरडणारी नसावी तर स्वीकारणारी असावी.
मी या विषयाची एकच बाजू मांडली असं नाही प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच !  मी त्या अल्प शब्दात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय बस! प्रत्येकाने राजहंस होऊन जगावे असा हा काळ आलाय, खूप पाहावे आणि मोजकेच घ्यावे हि जगाची रीत झालीय. धन्यवाद!

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************