आजची स्पर्धा परीक्षा म्हणजे बेरोजगारांचा कुंभमेळा.

🌱वि४🌿 या व्हॉट्सअप ग्रुपवरून :

आजची स्पर्धा परीक्षा म्हणजे बेरोजगारांचा कुंभमेळा

(या विषयावर रविराज,तेजस महापुरे,अनिल गोडबोले,प्रफुल्ल,खटाव.,मधुकर लेंगरे,वैशाली गोरख सावित्री,बालाजी सानप, दिगंबर मोरे,मयुरी देवकर,करण ,हिंगोली, राहुल अनपट,अमोल
गायकवाड यांनी मांडलेले विचार नक्की वाचा.त्यांचे मत जसेच्या तसे दिलेत स्पेलिंग चुका असू शकतात)

रविराज:
आजकाल विद्यार्थी खूप अभ्यास करून पदवीधर होतात.पण नोकऱ्या नसल्यामुळे थेट स्पर्धा परिक्षेच्या कुंभमेळ्यात उडी मारत आहेत..तशी तिकडे स्पर्धा खूप वाढली आहेच त्यामुळे मिळेल त्या पोस्ट साठी तयारी करताना दिसतात..पण खरच कितीजण प्रामाणिक पणे प्रयत्न करतात हे सर्वाना माहीत आहे.अक्षरश इतके विध्यार्थी आहेत की जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात की जणू कुम्भमेळाच भरला आहे अस वाटत आहे..खर कारण तर बेरोज़गारी आहे. नोकऱ्या नसल्यामुळे हा उपाय सगळ्याना बरा वाटत आहे ..पण यात वावगं अस काही नाही..करेल त्याला यश मिळेलच पण ही किती  मोठी स्पर्धा आहे..पुणे शहर तर खास ह्याच स्पर्ध्धेसाठी ओळखलं जातंय..जो तो फक्त पुणे पुणे म्हणून अभ्यासला तिकडे जात आहे ...सगळ्यात जास्त बेरोज़गार mpsc न upsc चा पर्याय निवडतात..त्यामुळं ही परिस्थिती झाली आहे..अस मला वाट्त..
तरीही सर्वाना छान यश मिळेल असा आपण विचार करू शकतो

तेजस महापुरे :
हा  विषय हा फारच महत्त्वाचा वाटतो... सध्याचे युग स्पर्धेचे आहे... मग क्षेत्र कोणतेही असो..त्या पद्धतीने विद्यार्थी तयारी करत नाही... आपल्याला काय आवडत... हे योग्य वेळी न समजल्यामुळे निर्णय चुकतात....Mpsc upsc करणारे अनेक जण आहेत... पण खरं तर त्यातील बहुतांश मंडळी ही अधिकारी पदाला असलेले वलय पाहून या वाटेला आलेले असतात...अपुरी माहिती, अभ्यास करण्याची चुकीची पध्दत यामुळे ते यशस्वी होत नाहीत... खरतर अनिश्चितता हे स्पर्धा परीक्षा चे प्रमुख वैशिष्ट्य आहे... त्यामुळे यासाठी अभ्यास करत असलेल्या प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की हे काही अंतिम ध्येय नाही... आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी करण्या सारख्या आहेत...

अनिल गोडबोले:
स्पर्धा परीक्षा मुळात असतेच करिअर करण्यासाठी. आणि करिअर करणे म्हणजे पैसे मिळवणे... पैसे मिळवणे व ते ही कमी कष्ट जास्त पॉवर आशा रीतीने .... हे सर्व पाहिजे असेल तर सरकारी नोकरी पाहिजे
आणि सरकारी नोकरी पाहिजे तर परीकशा महत्वाची...
या परिक्षेकडे कोन येणार?... तर अर्थातच युवक आणि त्यातूनही बेरोजगार युवक...
मग त्याला कुंभमेळा म्हणावं का?
कुंभमेळ्यात स्नान केल्यावर पुण्य लागत म्हणतात(खर खोट नंतर बघू) इथे परीक्षा दिल्यावर काय मिळणार?
कुंभमेळ्यातल्या आखड्यासारखे इथे देखील कोचिंग क्लास वाले आहेत का?
जास्त कठोर तपश्चर्या म्हणजे अधिक लवकर मोक्ष... त्या प्रमाणे खूप प्रयत्न करणारा यशस्वी होतो का?

तर या प्रशांची उत्तर "नाही' अशी आहेत.

स्पर्धेचं युग आहे आणि प्रत्येकाला परीक्षा द्यावी अशी वतन स्वसभावीक आहे..
याला सिरियसली घेत नाही ते आपण तरुण मंडळी....
काहीजण नुसते पेपर देतात मार्ग नाही दिशा नाही.. प्रयत्न नाहीत उगाचच पस होतो का कोणी...
आणि म्ग काहीच मिळत म्हणून कुंभमेळा

प्रफुल्ल ,खटाव(सातारा):
खरंतर बरोबर आहे ...बेरोजगारांचा कुंभमेळा म्हणजे स्पर्धा परीक्षा.आज भारतात म्हणा किंवा महाराष्ट्रात जर बेरोजगारीचा उच्च दर जो लपून आहे तो स्पर्धा परिक्षेमुळे...
एकदा जर शासनाने MPSC आणि UPSC चा पडदा हटवला तर शासनापुढं तसेच देशापुढं *बेरोजगारीचा* फार मोठा गंभीर प्रश्न उभा राहील.समजत नाही लोक का स्पर्धा परीक्षा निवडतात?सगळे प्रश्न काय या स्पर्धा परीक्षा देऊन सुटणार आहेत का?माझं तर स्पष्ट मत आहे.अजिबात नाही...ही जनता फक्त लाल दिव्यामाग धावणारी आहे.याना समाजतल्या प्रश्नचं काही पडलेलं नाही...काहीतरी तरी तात्विक उत्तर बनवायचं आणि मुलाखतीमधून यशस्वी व्हायचं.कशासाठी करायचं आहे?हेच बऱ्याच लोकांना माहीत नाही.त्यांने 50 टक्के गुण मिळवून upsc त यश मिळवले मला तर 51 टक्के आहेत... अशा अर्धबुद्धी विचारामुळे कुंभमेळा मोठा होत चाललाय.(आपल्याला काय जमत,आपल्या जमेच्या बाजू काय आहेत?हे तर नीट पाहिलं पाहिजे. नाहीतर उगीच मेंढरासारख त्या स्पर्धा परीक्षेची कळपात पळून आयुष्य देशोधडीला लावत खूप जण अजून तयारी करत आहेत.त्यांच्यासाठी शुभेच्छा💐💐

वैशाली गोरख सावित्री:
स्पर्धा परीक्षेच्या क्षेञात आज असख्य तरुण ,तरुणी पडलेल्या आहेत व आपल्या कष्टाची चिकाटीची बाजी लावण्याचा प्रयत्न करत आहेत तीही अत्यंत प्रामाणीकपणे कारण ह्या क्षेञात time passकरायला काय हे एक दिवसाच काम नाही जो पर्यत पास होत नाहीतोपर्यत करत राहण्याशिवाय पर्याय नसतो . ह्या स्पर्धैच्या कुंभमेळ्यात पडल्यावर कितीही इच्छा असली तरी माणूस बाहेर येत नाही .🔴 ह्या क्षेञात फक्त  arts ,com. , sci. एवढ्याच क्षेञातील लोक नसून eng.doc.करणारी पण ह्या क्षेञाकडे वळालेत ह्याला कारण काय आसू शकेल?
कारण त्यांना ही कळून चुकल आहे की त्याच्या क्षेञात चांगल्या नोकरीची खाञी नाही
🔴आज स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थिना एवढ्या मोठ्याप्रमाणात वळवले गेले आहे कारण आज समाज्यात चाललेल्या महत्वाचे प्रश्न संप्रदायकता , महीलांचे गंभीर प्रश्न ,शेतकर्रचे प्रश्न , झुंडशाही बेरोजगारी  अनेक बरेच प्रश्न ह्या गोष्टीविषयी त्यांनी विचार करु नये ,ह्याचा सरकारला जाब विचारु नये
🔴 ह्या क्षेञात जर आपण Rajyaseva ह्या परीक्षेचा विचार केला तर जास्तीत जास्त 300/400 जागा निघतात आणी फाॅर्म भरणार्रची संख्या अरते 2/अडीच लाख जर अडीच लाखातून 300 विद्यार्थिच पास झाले तर एक समाजशील प्राणी म्हणून विचार करावासा वाटतो बाकी विद्यार्थिनी करायच काय?🔴तर येथे main मुद्दा हा आहे की केक नाहीच आहे तूमच्या पूड्यात तरीहीव्यवस्थीत  कापून खावा

🔴कूभमेळ्यात उतरल्यावर मनासारखी अंघोळकरुन बाहेर येताही येत पण स्पर्धा परीक्षाच्या कूभमेळ्यात पडल्यावर आलातर येचालही उरती नाहीतरी डोळे झाकून बूडायची ही तयारी ठेवावी लागेल.

बालाजी सानप:
आज कालच्या तरुण मुलांना विचारलं ना "काय करतो रे सध्या...?" तर समोरून 99.99% एकच उत्तर येत ते म्हणजे "स्पर्धा परीक्षेची तयारी" यावरून आपल्याला समजू शकते की आपला विषय किती  व्यापक आहे.....
साधारण 12 वी झाली की खेड्यापाड्यातील मुले शहराच्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी येतात आणि भरती करत असताना स्पर्धा परीक्षेचे क्लास लावतात, आता काहीजण ध्येय म्हणून तर काहीजण घरचे फोर्स करत आहेत म्हणून क्लास करतात तर काहीजण त्याने लावला म्हणून मी पण लावला असा पण क्लास करतात(हे लोक जास्त प्रमाणात आहेत)...
बऱ्याच ठिकाणी जागा निघाल्यानंतर पाहण्यात येते की जागा असतात 150-200 आणि त्यासाठी फॉर्म येतात 10 हजार, 15 हजार(जास्त येतात पण उदाहरणांसाठी इतके देत आहे).
आणि जागा निघाल्या की त्या जागांच्या नावाखाली लगेच क्लासेस वाले त्यांची पोळी भाजून घेतात....

अस का होत तर काही ठिकाणी घरचे फोर्स करतात, तर  काही ठिकानी त्याने केलं म्हणून तो पण करतो, स्वतःला वाटत म्हणून करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे ही खरी वास्तविकता आहे. हा सर्व प्रकार थांबण्यासाठी अगोदर पालकांना आणि नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे असं मला वाटत,

पालकांना मार्गदर्शन का....?
तर सध्या समाजामध्ये विद्यार्थी दशेमध्ये मुलांना ९५% पालक विचारात नाहीत तूला काय करायचं आहे...? तुला काय बनायचं आहे...? ते फक्त सांगतात तुला हे करायचं आहे मग कस करणार ते कर, किती पैसे लागतील तितके घे पण कर...! ही मानसिकता कोठेतरी बदलायला हवी...!!

मुलांना मार्गदर्शन का....?
तर मुलांनी त्यांच्या अंगातील सुप्त  गुण ओळखून त्यांचं  carrier  ठरवायला हवं आणि त्यांच्या पालकांना  कस समजावून सांगू शकतो ? याविषयी तज्ज्ञांचं मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे...!!!

मधुकर लेंगरे: 
हा विषय खरोखरच संवेदनशील आहे. आज प्रत्येक पालकांना आपली मुले क्लास वन अधिकारी झाली पहिजे असे वाटत आहे. पन स्पर्धा परीक्षेची आजची स्थिती व तयारी करुन घेणारी दुकाने यानी स्वप्ने  दाखवून वेगवेगळे आखाडेच जनु निर्माण आहेत. आमच्या आखाड्यात या लवकर स्नान होईल असे जनु आमिष दाखवले जात आहे. पन आंघोळ तर दुरच पाण्याचे दर्शन पन होत नाही या दुकानांच्या मदतीने. जर कोणी दुकानात न जाता पवित्र स्नान केले कि हे दुकानदार या साधुस काही पैसे देवून आपल्या आखाड्यात नेवून जनु प्रवचन सांगायला लावतात कि हे दुकान (आखाडा) किती पवित्र आहे. वरुन हे खोटे बोलून सांगतात कि आम्ही याच दुकानात( शिकलो )होतो या आखाड्यात खुप चांगले प्रवचन होते मग काय ग्रामीण भागातून जाणारे आपले मित्र नेमके याच ठिकाणी जावून फसतात. वरुन साधारणपणे एक लाख फि व रात्रभर रांगेत उभे राहून फसवणूक करुन घेतात.
स्थिती अशी आहे कि वर्षभरात साधारणपणे ३०० जागा राज्यसेवा, सरासरी ६००  जागा PSI, STI, ASST. या प्रकारातील असतात. एवढे विध्यार्थी तर एका आखाड्यात (दुकानात) असतात. एकट्या  सदशिव पेठेत अशे हजाराच्या वर आखाडे आहेत. यावरून या कुंभमेळ्याची किति भयानक परस्थिति आहे. हे पुण्यातील एका पेठेतील आहे अशी गल्लीबोळात किति तरि सधु निर्मिती केंद्रीय आहेत
प्रमुख शहर  :-  पुणे येथील ५०% अर्थव्यवस्था फक्त या कुंभमेळ्याच्या आधारावर चालेते इतर ठिकाणी असनारे आखाडे त्याचे महंत या उद्योगातुन कोट्यधीश झाले पन स्नान करण्यासाठी असलेले अजुन प्रतीक्षा करत आहेत त्यांच्या स्तिथी अशी झाली आहे साबण लावला आणि पाणी संपले धाड सोडून पन देता येत नाही आणि थांबायाचे तर अजुन किति पैसे लागतील याचा हिशोब लावत बसायचे. घरुन आत्ता अजुन किती दिवस पैसे मागनार वर्षभर पैसे सहज मिळतात पन तेथून पुढे परिस्थिती गंभीर बनत जाते. या कुंभमेळ्यात अनेकांचे हातोनात बळी जातात त्यांची नोंद कोणत्याही मदतीविना पुसली जाते. कित्येक आयुष्य उधवस्त होत आहेत या चिंतेतुन............

करण, हिंगोली:
आज काल कुणाला विचारलं काय चालू आहे त्यात maximum उत्तर येतात की स्पर्धा परीक्षा ची तयारी चालू आहे.
यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी time पास म्हणून करतात आणि खूप कमी विद्यार्थी मनापासून अभ्यास करतात.
पण आपण जर वास्तविकता बघितली तर या क्षेत्रात खूप कमी जागा निघतात आणि त्या जागे साठी compitation भरपूर असते.
माझं observation असं आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी अस विचार करतात की मला शिकून नौकरी करायची पण असं खूप कमी विचार करतात की मला शिकून दुसऱ्याला नौकरी द्यायची आहे आणि मला असं वाटतं की याच कारणामुळे भारतात बेरोजगारी जास्त आहे.
मला पण बरेच जण advise करतात की तू स्पर्धा परीक्षेची तयारी कर पण मला ते माझ्यासाठी मूर्खाता वाटली कारण मी विचार केला की या भारतात प्रत्येक जातीला आरक्षण आहे आणि मी open मध्ये मला स्पर्धा करून फायदा नाही बरोबर आहे कारण लोकांना हे आरक्षण आणखी कमी पडत आहे ते आणखी आरक्षण मागत आहेत आणि इथं जे अभ्यासू विद्यार्थी आहेत ते फक्त अभ्यास करत राहणार .खरतर या आरक्षणाची गरज नाही कोणालाच जर दम असेल तर त्याच्यावर लढा. आरक्षण सारखे विषय राजकारण करण्यासाठी फक्त.
या आरक्षणामुळे लोक थोडं relax राहायला लागत आहेत हे चुकीचं आहे.
ज्या वेळेस लोकांना या गोष्टी समजतील तेव्हा भारत खरा स्वतंत्र होईल.

दिगंबर मोरे:
आजकाल जे तो उठतो स्पर्धा परीक्षा classes ला शिव्या द्यायला लागतो.classesvale काही लोकांच्या घरी जात नाहीत क्लास लावा म्हणून सांगायला.स्पर्धा परीक्षा द्यायची की नाही हा निर्णय पुर्णतः स्वतःचा असायला हवा.आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की शेजाऱ्याने एखाद्या गोष्टीत यश मिळवले की आपल्यालाही ती गोस्ट करावी वाटते.मग त्यासाठी लागत असलेली मेहनत,जिद्द,चिकाटी,पात्रता इ गोष्टी विचारात कोण घेतात.मुळात जर खाजगी नौकर्यामध्ये अनिश्चितता वाढली आहे ,विकासाचा दर योग्य त्या प्रमाणात वाढत नसल्यामुळे कमी संधी आणि जास्त पुरवठा होत आहे.लोकांमध्ये बेरोजगारी चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.mpsc ची परीक्षा मराठीत असल्यामुळे इंगर्जी,गणित या विषयात आपण पारंगत नसलो तरी पुस्तके मराठीत असल्यामुळे बरेच विध्यार्थी स्वतःला तीन चार वर्षे आरामात फसवून घेण्यात!स्पर्धा परीक्षेचा मन लावून अभ्यास केला तर नौकरी ही एकमेव अपेक्षा केंव्हाच संपून जाईल. असा विध्यार्थी जरी स्पर्धा परीक्षेत यशस्वी नाही झाला तरी जीवनात जे क्षेत्र निवडले त्यात नक्कीच यशस्वी होईल आणि भारताचा सुजाण नागरिक म्हणून ही आपली कर्तव्ये निभावेल.

मयुरी देवकर:
खरंच आज याच  विषयावर मंथन करने गरजेचे आहे  कारण आज ज्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ते माहिती नाही , त्यांचे अधिकार , कर्तव्ये माहिती नाहीत पण लाल दिव्याची गाडी घेवुन माझा मुलगा /मुलगी  येयील अशी बऱ्याच पालकांची अपेक्षा वाढत चालली आहे . त्याचप्रमाणे आपण हे करू शकतो ....समाजात मिळणारा मान , सन्मान हे सूद्धा या स्पर्धा परीक्षाकडे वळण्याचे खूप मोटे कारण बनले आहे आणि परिणामी पदवी /पदव्युत्तर शिक्षण झाले की स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यासाठी पुणे किंवा मुम्बई ला स्थलान्टर करणे , ही तर आजची fashion बनत चालली आहे ....आणि तेथे जावून 80%मुले -मुली जिवाचे रान करून अगदी सगळे देहभान अर्पुण अभ्यास करतात ..परंतु जागांची कमतरता व विध्यार्थीची वाढती संख्या यामुळे सतत येणारे अपयश यामुळे तरुणांची मानसिकता बदलत चालली आहे व त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर वैफ्ल्यग्रस्त तरुणांची संख्या वाढत चालली आहे व परिणामी बेरोजगारी वाढली आहे आणि ती एवडी वाढली आहे की या तरुनायिकडे पहिले की खरंच कुम्भमेळ्याची च आठवण येते .....

राहुल अनपट:
स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी जरी भरपूर झाले असले तरी ज्याचे कष्ट त्याला फळ मिळते.यात काही साधू लोक आहेत(संधी साधू लोक)यात काही शंका नाही पण लोक ओळखणं माज्या भावंडना अजून समजत नाही.

मी सुद्धा स्पर्धा परीक्षा तयारी करत आहे .१वेळ सर्व परीक्षा दिलीय पण पास झालो नाही.आजही प्रयत्न चालूच आहे आणि करीत राहीन(प्रामाणिक)🙏

वरील काही प्रतिक्रिया ,मनोगत वाचली आमच्या बद्दल अन स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मित्रांबद्दल खूप काळजी वाटते त्याबद्दल धन्यवाद ।
*"जेव्हा काही करता येत तेव्हा काहीच करू वाटत नाही"*

अमोल गायकवाड:
     हो आजची स्पर्धा परीक्षा म्हणजे बेरोजगारांसाठी कुंभमेळा आहे परंतु यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील टॅलेंट एकाच क्षेत्रात एकवटतेयं .
    कितीतरी डोक्टर, इंजिनिअर प्रशासनात येतात यात काही गैर नाही पन त्या क्षेत्राचे काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************