प्रेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रेम

🌱वि४☘️ या व्हाट्सअप ग्रुपवरून



-रत्नाकर सातपुते

" हो, रखमा सारखा सगळ्यांचा माथा भडकलाच पाहिजे नाही तर मग असे तोंड झोडून घ्यायची वेळ येते... " कोंडाजी ने रखमाची बाजू घेत म्हटले.
" जग बदलले आपण पण बदलून घ्यावा आता...पण सायबुला हे अजून कसे पटत नाही काय माहित."
सखाच्या या मतावर रखमाने सखालाच विचारले,
" तुझ्या पोरीने असे केले असते तर सहन झाले असते का तुला ?"
" तुला काय झाले येवढे भडकायला..."
सखा गोंधळात पडला...तेव्हा कोंडाजी समजावत म्हणाला,
" ह्या गोष्टी घडायला आई बाप पण कारण असतात...मी,माझी बायको आणि माझी पोरे या पेक्षा इतरांचा विचारच करायचा नाही...पोरांना सांगायचे कोणाकडे लक्ष द्यायचे नाही,आई बाप सोडून कोणाला घाबरायचे नाही,लोकांना आपले चांगले झालेले देखवत नाही..."
त्यामुळे मग पोरे बेफिकीर होऊन वागू लागले.दुसऱ्या कोणाला घाबरणे संपले.पोरांची वाईट वर्तणूक कोणी बापाला सांगायला गेले तर बाप त्यालाच खस्कुन मोकळा व्हायचा,मग कोण कशाला काही सांगेल...साऱ्या गावाला आधी माहित होते,सायबुची पोरगी पर जातीच्या पोरा बरोबर पळून जाणार आहे म्हणून...पण कोणी सांगितले नाही.आता बसले हाय तोबा करीत...



- संदिप बोऱ्हाडे
   (वडगाव मावळ , पुणे)

     अस म्हणतात जग जिंकता येते प्रेमाने. पण फक्त ते प्रेम निस्वार्थ असायला पाहिजे..
जे रंग, रुप, जात, धर्म, श्रीमंती , गरिबी पाहून केले जात नाही त्याला ‘प्रेम’ म्हणतात.

    जगात सर्वात श्रेष्ठ प्रेम हे आईच सर्वांना माहिती असेलच पोटच्या लहान बाळाच्या प्रेमापोटी हिरकणी बुरुज उतरून गेली होती...
प्रेम करांव भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं..
प्रेम करावे बाबा आमटे यांच्यासारखं कुष्ठरोग्यांसारखे..
प्रेम कराव संत गाडगेबाबा यांच्यासारखे गरीब, दीन, दुबळ्यांवरील केलेले प्रेम..
प्रेम कराव  साने गुरुजींसारखे विद्यार्थ्यांनवरील प्रेम..

     प्रेम म्हणजे प्रेम असतं..
वडिलधार्यांवरच प्रेम , वास्तूवरच प्रेम , झाडांवरच प्रेम , प्राण्यांवरच प्रेम , भाषेवरच प्रेम , गावावरच प्रेम , माणसांवरच प्रेम ,
आणि हो प्रेमाला वय, वस्तू, विशिष्ट गोष्ट, किंवा कशाचीच गरज नसते...ते कोणावरही, कश्यावरही आणि कधीही होऊ शकते त्याला वेळ , काळ , मर्यादा कसलेही बंधन अजिबात नाही.

    आईच प्रेम, वडिलांचं प्रेम, भाऊ-बहिण यांच्या मधील प्रेम एवढच कशाला.... मित्र प्रेम, शेजारी प्रेम (शेजारीण प्रेम नव्हे) असे कितीतरी नाते संबंध आहेत जे प्रेमाच्या पायावर भक्कम उभे आहेत. या प्रेमाविषयी आपण किती बोलतो तर अगदी थोड म्हणजे जेवणातल्या मीठ एवढ... कारण ते जास्त झाल तरी खल जात नाही आणि कमी झाल तरी जाणवत ... आणि महत्त्वाच आहे ते प्रमाणात असण!.. हे प्रमाण देखील ज्याच्या त्त्यच्या चवीनुसार!.

    प्रेम ही भावना किती सुंदर आहे. मातृप्रेम, देशप्रेम, बंधुप्रेम, पुत्रप्रेम अशा कितीतरी परी तिला लाभल्यात. परंतु प्रेम म्हटले की आम्हाला आधी प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातील शरीर पातळीवरची प्रेमभावनाच दिसू लागते.

     प्रेम करावे कोणीही कुणावरही, त्याला नसाव तारखेचे बंधन, प्रेम करावे स्वतःवर , समाजावर , देशावर, सृष्टीवर , विचारांवर ,
प्रत्येकाने प्रेम करावे माणुसकीवर ..



-वाल्मीक फड
नाशिक.

प्रेम हे अनेक प्रकारचे असते.आईचे मुलांवर,पत्नीचे पतीवर,गुरुचे शिष्यावर,एका शेतकऱ्याचे आपले बैल व शेतीवर,ज्या देशात आम्ही रहातो त्या देशावर,प्रेमीकेचे प्रेमीकावर असे अनेक गोष्टींवर आपण प्रेम करत असतो.ज्या वस्तू किंवा व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीकडून आपल्या फार मोठ्या अपेक्षा असतात.चुकून त्या व्यक्तीकडून आपला काही अपेक्षाभंग झाला तर आपण खूप गंभीर होतो.म्हणूनच मला वाटतं पहील्यांदा  प्रेम देशावर करावं कारण ह्या देशात जन्म होणे म्हणजे एका सुसंस्कृत समाजात असल्याचा भास होतो.कारण इतर देशांत आपल्याला अशी संस्कृती बघायला मिळणार नाही.पण आजकाल काही लोकांना काय वेड लागलय काय माहीत माझ्या ह्या सुंदर देशाच्या विरोधात घोषणा देताना दिसत आहेत.
आणी दुसरे म्हणजे आपले आईवडील कारण त्यांच्यामुळेच आज आपण ह्या सुंदर जगात दिसत आहोत म्हणून त्यांच्यावर आपण जिवापाड प्रेम करावं.तसंच पशुपक्षी झाडे यावर तर खूपच प्रेम करावं कारण सुष्टिचे सर्व बदल हे भगवंत त्यांच्याकडे बघुनच करीत असतो.
आणी जीव गहाण टाकून प्रेम करावं देवावर कारण देवाने ही सृष्टी निर्माण केली नसती तर हा नरदेह आपल्याला मिळाला नसता आणी ह्या सुंदर देशात जन्म मिळाला नसता.म्हणूनच खूप खूप प्रेम करावं देवावर.



-अनिल गोडबोले
सोलापूर

पोथी पढी पढी जग मूआ
पंडित भया न कोय

ढाई आखर प्रेम का
पुढे सो पंडित होय..।।

कबिरांचा दोहा सगळं काही प्रेमबद्दल बोलून मोकळा होतो.

प्रेम ही भावना आहे, शुद्ध आहे चांगली आहे आणि ती असली पाहिजे.. तिला स्वार्थी पणा पेक्षा करुणेची जोड मिळाली तर ते प्रेम पवित्रच..
आम्ही प्रेम म्हणजे फक्त मुलं- मुली यांच्या बाबतीत बोलत नाही बर का..! 
पण" प्रेमाचा सप्ताह" चालू आहे ना.. तेव्हा शृंगारिक प्रेमबद्दल बोललेच पाहिजे..
ते भेटणं, ती हुरहुर, ती नजरानजर.. ते एकमेकांसाठी असणं.. दिसणं... फसण.. रुसणं.. हसणं.. बसणं.. आणि अजून बरच काही..
आपल्या साठी कोणीतरी आहे किंवा आपला विचार कोणीतरी करत आहे.. ही भावनाच इतकी भारी आहे..!!
मग हद्दी आणि सरहद्दी कसल्या लावता.. फक्त फरफट नको, नुसतच फिरवण् नको, खोटारडे पण नको..
त्याला/ तिला सांगू ना आपण.. मला तू फक्त या एवढ्या पुरती आवडतेस.. प्रेम वगैरे नंतर बघू..!
पण तेवढं डेरिंग यायला समाज ???
असो.. तरीही पूर्वी बागबगीचे नंतर लॉज, आता ओयो रूम भरून वाहतच आहेत.. सम्पूर्ण वर्षभर.  पण फक्त निमित्त पाहिजे हा आठवडा..

मस्त.. खुमासदार.. जीव तोडून प्रेम करा ना..!! बघा .. तुटलं तरी आपलं आहे ते..
ते पाडेल आणि सावरेल..
फक्त जरा जपून..
गुलाबी इश्क होऊन जाऊ दे..!

रक्षाबंधन - भावा बहिणीचे बदललेले भावनिक संदर्भ.


वैशाली सावित्री गोरख .पंढरपूर(पुणे)
             रक्षाबंधनाचा अर्थ मी पहिल्यापासून हाच ऐकत आलेय की भाऊ बहिणीच रक्षण करतो म्हणून बहीण भावाला राखी बांधते म्हणजेच धागा जो आयुष्यभर भावाने आपल्या पाठीशी उभे राहावे ह्याच प्रतीक आहे .पण माझ्या बाबतीत हे अतिशय वेगळं आहे मी जेव्हा लहान होते म्हणजे आठवी पर्यंत मी शाळेत कार्यक्रमाला डान्स घ्यायचे तेव्हा माझा भाऊ घरी येऊन आई जवळ खूप तक्रार करायचा एक मोठा भाऊ ह्या नात्यानं मला धाकात ठेवण्याचा तो प्रयत्न होता पण लवकरच आमच्या वेगळ्या आयुष्याला सुरुवात झाली ,जीवनाशी संघर्ष ,शिक्षणासाठी संघर्ष त्यात मला माझ्या भावाने प्रत्येक गोष्टीत साथ दिली ते पण अशा पद्धतीने की मी कधी वैचारिक रित्या स्वतंत्र झाले ते मलाच समजलं नाही .आमच्या घरात आम्ही दोघांनीही काम करून शिक्षण घेतलं त्यामध्ये माझ्या भावाने मला अकरावीच्या अडमिशन घेऊन दिल व सांगितले की इथून पुढचे तुज्या जीवनाचे प्रत्येक निर्णय तुझे असणार मग चुकली तरी त्याला जबाबदार तू स्वता असशील नि हीच माझी खरी सुरुवात होती .नंतर पुण्याला शिक्षणाला आल्यानंतर ही तेच झालं जेव्हा मी पुण्यात पहिल्यादा येणार होते त्यावेळेस मला सांगितल गेलं की एकटी ये ,पुण्यासारख्या शहरात एकटं येण म्हणजे माझ्या साठी खेड्यातील मुली साठी खूप अवघड गोष्ट होती पण मी ते ही धाडस केलं त्यावेळेस मी भैय्याला भांडायचे की तुला माझी काळजी नाही तू मला एकटीला कसा प्रवास कण्यासाठी सांगू शकतोस पण माझ्या लक्षात येत नव्हतं की ते माझं ट्रेनिंग चालू होतं एक सक्षम स्त्री ,बहीण,मुलगी बनण्याचं व त्यामुळे आज मी कुठेही धाडसाने जाऊ शकते .ज्यावेळेस मी मी एकटीने ट्रेक केला त्यावेळेस माज्या भावाला खूप आनंद झाला होता .आजही मी कुठे फिरायला जायचं असेल तर मला घरात कोणाला विचारावं लागत नाही फक्त काळजी नको म्हणून मीच सांगत असते.तो माझ्यापेक्षा तीन वर्षांने मोठा आहे तरीही मी त्याला त्याच्या नावाने बोलावते,हक्काने त्याला घरातील काम सांगू शकते व तो ती त्याची जबाबदारी म्हणून करतो. एक मित्र म्हणून माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी त्याला सांगते व त्याच्या ही सगळ्या गोष्टी विचारून घेते .आमच्या मधील हे नात कधीच भाव नि बहीनिच न राहता एक चांगला मित्र म्हणून तयार झालं आहे मी सामाज्यात पाहते की खूप जास्त प्रमाणात भाऊ आपल्या बहिणींवर नजर ठेवत असतात पण माझा भाऊ मला सांगत असतो हा हा फिल्म खूप छान आहे बघायचा असेल तर बघून ये .त्यानं स्वतःला डेव्हलप केलेली ही एक वेगळी विचारसरणी आहे त्यामुळे मी सक्षम होण्यास प्रयत्न झाला आहे .प्रश्न राहिला रक्षाबंधनाचा,दिवाळीतील भावाची ओवळणीचा ,नागपंचमीचा भावाचा उपवास तर मी ह्या कोणत्याच गोष्टी करत नाही नि आमच्या घरात होत ही नाहीत .माझा भाऊ रक्षण करण्यासाठी माझ्या पाठीशी उभा नाही तर मला सोबत घेऊन चालत आहे असे हे आमुचे बदलते भावनिक संबंध आहेत .



अर्जुन (नाना) रामहरी गोडगे,
सिरसाव ता-परंडा जि-उस्मानाबाद

नात प्रेमाचं तुझं अन माझं आहे ..
सय येते बारक्यापाणीच्या दिसाची..!!
गमावलले ते गोड दिवस..
आठवत राहतात आजही..!!
मनी भाव दाटत राहतोय..
हातातल्या राखीसोबत..!!
बंद हे प्रेमाचे नात आहे
ताई हे आपलं जन्मजन्मोचं आहे..!!


*संगीता देशमुख,वसमत*
          आपल्याला रक्षाबंधनाचा इतिहास फार प्राचीन आहे. इंद्राच्या खचलेल्या हातावर त्यांच्याच पत्नीने राखी बांधून पतीचा आत्मविश्वास वाढविला होता तर कृष्णाच्या जखमी बोटावर आपल्या पदराची चिंधी बांधून त्याच्याशी मैत्रीपूर्ण भावाचे संबंध प्रस्थापित केले होते. चित्तोडगढची राणी कर्मावतीने बहादूरशाहपासून  स्वतःच्या रक्षणासाठी मुघल हुमायूँला राखी बांधली होती. याचाच अर्थ असा की,हा सण आपण भावाबहिणीच्या ऋणानुबंधाचा मानत असलो तरी इतिहास पाहता हा सण रक्षणाचा आहे. आपण यास राखीपोर्णिमा म्हणत असलो तरी त्यापेक्षा रक्षणासाठी बांधलेला धागा म्हणून "रक्षाबंधन" हे नाव अधिक समर्पक वाटते. कोणी यास कजरी पोर्णिमा,कोणी राखीपोर्णिमा तर कोणी नारळीपोर्णिमा म्हणतात. रक्षणाच्याच हेतूने बांधले जाणारे हे बंधन,म्हणून रक्षाबंधन!  आज ही प्राचीन परंपरा आपल्यापर्यंत झिरपत आली आहे. कालानुरूप सर्वच बाबी आहे तशा आपण स्वीकारत नाहीत. आपल्या सोयीनुसार आपण काय स्वीकारायचे आणि काय नाकारायचे हे ठरवत असतो. तसाच हा अनेक सणांपैकी असणारा रक्षाबंधनाचा सण! 
            पूर्वी सासुरवाशीण बहीण भावाची आतुरतेने वाट पहायची. त्याला राखी बांधण्यापेक्षाही त्याच्याशी हितगुज साधून माहेरची वास्तपुस्त करणे,माहेरच्यांची सर्वांची ख्यालीखुशाली विचारणे आणि त्यासोबतच आपलेही मन मोकळे करणे घडायचे.  तिच्या साचलेला मनाचा निचरा व्हायचा. माहेरची खुशाली ऐकून अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटायचे. तेवढाच संसाराचा दाह कमी होऊन संसारात नव्याने हुरूप चढायचा. माहेरून येणारी माणसेच काय ती संपर्काचे माध्यम होते. परंतु आजकाल विवाहित मुलींना एकतर पूर्वीसारखा  सासुरवास नाही आणि दुसरे म्हणजे संपर्कासाठी हातात मोबाईलसारखे साधन आले. सर्वात महत्वाचे आजच्या चौकोनी कुटुंबात त्यांचीच सत्ता असल्याने भावनांच दमन होत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे या सण उत्सवात रस वाटत नाही. ज्या आस्थेने हे सण साजरे व्हायचे त्याविरुद्ध आता आस्था जाऊन तिथे दिखाऊपणा आला. आता सण साजरे करण्यामागे प्रतिष्ठा हा हेतू प्रभावी ठरतो आहे. आजकाल इथे पैशाची उधळण,भपकेबाजपणा आला. आई आपल्या घरातल्याच  लेकराला प्रत्यक्ष शुभेच्छा देण्याऐवजी आधी फेसबुकवर शुभेच्छा देऊ लागली. या सोशल मिडियाने माणसामाणसातले भौगोलिक अंतर कमी केले पण भावनिक अंतर मात्र निश्चितच वाढवले आहे. कारण आजकाल दिवस सेलीब्रेशनचे आहेत. प्रत्यक्षात कोणत्या बाबी होवोत अथवा न होवोत परंतु "कालाय तस्मै नम:" प्रमाणे आधी त्या बाबी सोशल मिडियावर अपलोड केल्या जातात. मग याला नाती तरी कशी अपवाद असतील? नातीही अशीच आज हळूहळू कोरडीठाक होत चालली आहेत. नात्यातील ओलावा नात्याच्या मुळांपर्यंत न पोहोचता तो सोशल मिडियावरच्या दिखाव्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. मग त्यात नाती कोणतीही असोत,तीही सवंग आणि उथळ जगात वहावत जात आहेत
कुटुंब अधिकाधिक छोटी होत चालली,घराच्या भिंती रुंदावू  लागल्या तशीच नात्यातील अंतरही रुंदावत आहे. नात्याला घट्ट बांधून ठेवणारी धागे आजकमकुवत झाली आहेत. परंतु भावा-बहिणीच्या नात्याचा घट्ट बांधून ठेवणारा राखीचा धागा मात्र जेवढा कोमल तेवढाच तो जबाबदारीत बांधून ठेवणारा राकट धागा आहे.  परंतु हे बहीणभावाचे नाते काही ठिकाणी कायद्याच्या चौकटीत जाऊ पहात आहे.
         पूर्वीची बहीण भावाला प्रेमाने जिंकून घेण्याचा प्रयत्न करायची तर आजच्या काही बहीणी भावाच्या संपत्तीत बरोबरीने वाटा मागून घेत आहेत. कायद्याने अधिकार मिळतो पण प्रेम उरत नाही. त्यामुळे आज रक्षाबंधन जवळ आले की,भावाच्या पायाना  बहिणीकडे जाताना जी ओढ होती त्यात आज थोडी धाकधुक आली,कारण बहीण राखीच्या बदल्यात साडीचोळीच्या रूपात काय मागेल,हे सांगू शकणार नाही. यात बहीण आहे आणि भाऊ सधन आहे,असेही काही नाही. बहीणही सधन असली तरी भावाच्या संपत्तीत तिला वाटा हवा असतो.  पण अशी उदाहरणे फार तुरळक आहेत. अजूनही अनेक बहिणी आपल्या भावाला फार श्रध्देने,आस्थेने राखी बांधतात. माझा भाऊ माझे रक्षण करीलच आणि आपण बांधलेल्या राखीने तो अजून सक्षम होईल,दीर्घायुषी होईल,अशी आशा बाळगतात. पण आजच्या काही बहिणी अशाही आहेत की,ज्या भावापेक्षा अधिक सक्षम आहेत. अनेक ठिकाणी त्याच आपल्या भावाच्या पाठीराख्या म्हणून कणखरपणे उभ्या आहेत. अनेक कमावत्या बहिणी आज अविवाहित राहून भावाच्या संसाराला तोलून धरणाऱ्या आहेत. आजच्या भावालाही आपली बहीण स्त्री म्हणून कमजोर वाटत नाही,तर ती भरभक्कम आधार वाटते. राखी ही  रक्षणाचे प्रतीक आहे. ती कोणी कोणाला बांधली,हे महत्वाचे नसून दोघेही एकमेकांचे रक्षक ठरावेत,एकमेकांना एकमेकांचा आधार वाटावा,हे आज अपेक्षित आहे. मला राखी माझी बहीण आहे तशी या जगातील प्रत्येक मुलगी,स्त्री ही कोणाची ना कोणाची बहीण आहे. माझ्या बहिणीसोबतच तिचे रक्षण झाले पाहिजे. स्त्रीवरचा अन्याय,अत्याचार थांबवता आला पाहिजे,तिच्यावर होणारे बलात्कार थांबवता आले पाहिजे,अशा उदात्त हेतूने भावाने ही राखी आपल्या बहिणीकडून बांधून घ्यायला हवी. मग ही फक्त बहीण भावापुरती राखीपोर्णिमा रहाणार नाही तर ती सुदृढ,निकोप समाजासाठी खरे "रक्षाबंधन" ठरेल. अशाच "जबाबदार  रक्षाबंधना" साठी सर्व बहीण आणि भावाना शुभेच्छा!



अमोल धावडे ,अहमदनगर

बहन का प्यार किसी दुआ से कम नहीं होता,
वो चाहे दूर भी हो तो गम नहीं होता,
माना कि रिश्ते दूरियों से फीके पड़ जाते हैं,
लेकिन भाई-बहन का प्यार कभी कम नहीं होता।।

हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधन सण साजरा केला जातो. बहीण भावाच्या उदंड आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते त्याचप्रमाणे भाऊ तिच्या संरक्षणासाठी तिला वचन देतो व आयुष्यभर तिचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहतो हे सांगायचे कारण आज काही कामकाजानिमित्त बन पिंपरी या ठिकाणी गेलो होतो. गावाकडील लोकांचे प्रेम म्हणजे यात शँकाच नाही घरात कितीही गरिबी असली तरी घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत मनापासून करतात. आज एका मुलाच्या गृहभेटी दरम्यान चर्चा करत असताना सदर परिवारातील मुलीचा विषय निघाला. तिचे नाव मानसी नाव काल्पनिक किती शिक्षण झाले तर तिने सांगितले ९ वी तुन शिक्षण सोडले व आई वडिलांनासोबत शेतीचे काम करते. वडील दारू पितात पुढे शिक्षण करायचे नाही. वयाच्या १४ व्या वर्षी तिचा साखरपुडा केला. मुलीशी बोलत असताना तिला पुढे शिक्षण कारवायाचे आहे समजले. चहा घेवून झाल्यावर आम्ही निघालो तर मुलगी ओवळणी ताट घेऊन आली ते पाहून मी बोललो हे काय तर तिने सांगितले की दादा रक्षबंधन जवळ आली आहे तर तुम्हला राखी बांधायची आहे. ऐकुण आनंद झाला व मोठा भाऊ म्हणून तिने मला राखी बांधली आणि ओवाळणी म्हणून तिच्या पालकांना संगितले की मुलीचे शिक्षण बंद करू नका तिला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर मला निसंकोचपणे फोन लावा. आज मला आणखी एक छोटी बहीण मिळाली. देवाचे आभार. मी ठरवलंय की तिच्या पुढील भविष्यात कोणत्याही प्रकरची मदत लागो ती मी एक मोठा भाऊ म्हणून करण्यास तयार आहे. 
खरच गावाकडील जीवन खुप सुंदर व लोक त्याहूनही प्रेमळ असतात.😍😍
#Thanksमानसी..
सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा💐

लव, सेक्स आणि अश्लीलता या कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे ?

🌱वि४🌿व्हॉट्सअप ग्रुप

लव, सेक्स आणि अश्लीलता या कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे ?

IMAGE SOURCE  INTERNET

शिरीष उमरे, नवी मुंबई

प्रेम, शारिरीक संबंध व अश्लीलता ह्याच्या परिवाख्या कालानुरुप बदलत आहेत...

💝प्रेम हे निस्वार्थी असतच पण त्यात अपेक्षाचे रोप उगवायला लागले की त्याला तडा जायला लागतात... 💔

प्रेम आईचे, मावशीचे, बहीणीचे, भावाचे, बाबाचे, मित्राचे, प्रियसीचे, पत्नीचे व मुलामुलीचे आणि सरतेशेवटी नातवंडांचे ह्या इंद्रधनुष्यी छटातुन 😍🌈व्यक्त होते. काही निसर्गप्रेमी, वाचनप्रेमी, क्रीडाप्रेमी, प्रवासप्रेमी, धनप्रेमी वैगेरे प्रकार पण आहेत. 🤩 ह्यातला व्यक्तीप्रेमी हा प्रकार भयंकरच असतो 😅 जसे चित्रपटातले नायक नायिका वा क्रीकेट फुटबॉलचे खेळाडुचे चाहते ...

शारिरीक संबंध हा अजुनही कुजबुज करण्याचा विषय !! तशी ह्याला राजमान्यता व जनमान्यता पुर्वीपासुन आहे. संयुक्त कुटुंब पध्दत तर शिवकालीन... त्यानंतर रामायणातील बहुपत्नीत्व ब्रह्मचरित्व तसेच महाभारतातील विवाहपुर्व व विवाहपश्चात शारिरीक संबंध, बहुपतीत्व आणि राजा शिखंडी चे नपुसंकलिंगी पात्र व गणिका व्यवसाय हे दर्शवते की आपली संस्कृती कीती प्रगल्भ होती. ह्या विषयावर वात्सायनाने लिहीलेला कामसुत्र हा अभ्यासपुर्ण ग्रंथ कींवा  मध्यप्रदेश मधील खजुराहो मंदीरातील अप्रतिम शिल्पकला वा गडचिरोली मधील आदिवास्यांची गोटुल ही मुक्तसहवासाची सहजिवनाची शैली असो... आपली संस्कृती ह्या विषयाच्या ज्ञानाने समृध्द होती.

 आता मात्र कुटुंबनियोजनाचे अज्ञानामुळे वाढणारी अनिर्बंध लोकसंख्या व त्यातुन निर्माण होणार्या समस्या, असुरक्षित संबंधांमुळे होणारे असाध्य रोग, शालेय शिक्षणात अंतर्भाव नसल्याने होणारे गैरसमज, शरीर रचनेचे अर्धवट ज्ञान, शारिरीक व मानसिक स्वच्छता नसणे व ह्यातुन होणारे विनयभंग बलात्काराचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. आज पुरुषप्रधान संस्कृती मुळे स्त्रीला उपभोगाची वस्तु समजणार्यांचा कडाडुन विरोध करणे व त्यावर कडक कार्यवाई होणे हे अत्यावश्यक आहे.

राहीला प्रश्न अश्लीलतेचा तर तो उदभवतो अशिक्षणामुळे व अनैतिकतेला मिळत असलेल्या बेकायदेशीर राजमान्यतेमुळे. विकृती जन्म घेते ह्यातुन व हा मानसिक रोग मिटवण्याची सामाजिक ईच्छा च दिसत नाही त्यामुळे शिक्षण अत्यावश्यक... जागतिक आरोग्य संघटनेचा अहवालानुसार दर पाच भारतियांपैकी एक हा मानसिक रोगी असतो 😳🤔 ह्यावर विचार होणे गरजेचे ...अर्थात सगळेच विकृत नसतात. ह्यात दैनंदिन जीवनशैलीमुळे होणारे ताणतणावाचे शिकार ह्यांचे प्रमाण ९०% असते. 😅



IMAGE SOURCE  INTERNET

डॉ. विजयसिंह पाटील,
 कराड

प्रेम हा मनाचा आविष्कार,,, सेक्स(कामजीवन)ही शरीराची गरज,,, व अश्लीलता ही मनाची विकृती व त्याला शरीराने दिलेली साथ, असं मी म्हणेन..

प्रथम प्रेम म्हणजे काय ते पाहू,,,
प्रेम म्हणजे, स्नेह, आपुलकी, जिव्हाळ्याची, तळमळीची तीव्र भावना...
प्रेमाचे काही प्रकार,,, नर नारी प्रेम,,, अपत्य प्रेम,,, कौटुंबिक प्रेम,,, पशुप्रेम इत्यादी..

वयानुसार ही प्रेमाची नावं बदलतात.. लहानांबाबत स्नेह.. समान वयोगटातील प्रेम, उदा, पत्नीप्रेम, बंधू/भगिनी प्रेम, मित्र प्रेम इत्यादी.. आपल्याहुन वयाने जेष्ठ व्यक्ती साठी आदर...
मातेचे अपत्यावर असणारे प्रेम--ममत्व..
भक्ती हे प्रेमाचे परमोच्च रूप
प्रेमाची ही स्वरूपे फक्त मनुष्य प्राण्यात च आहेत असं नाही.. अपत्य प्रेम हे आपण सर्व प्राण्यांच्या त पाहतोच...
थोडक्यात प्रेम हे वैश्विक आहे व त्याला कसल्याही मर्यादा नाहीत

सेक्स /कामजीवन
आता, कामजीवन/ सेक्स ह्याबाबत पाहू...
काम  वा सेक्स ही शंभर टक्के शारीरिक गरज आहे, माणूस असो अथवा प्राणी, प्रत्येकाला सेक्स ची गरज असतेच असते. काही प्राण्यांत उदा, कुत्रा, ही भावना वर्षातून एकदाच येते ( ह्यामागचं कारण असे की, मादीला वर्षातून एकदाच पाळी येते, त्यालाच आपल्या कडे, मादी हीट वर आली अस म्हणतात).
मनुष्य प्राण्याचं तसं नाही,  काम क्रिया ही दैनंदिन जीवनातील एक गोष्ट आहे
कामक्रीडा/सेक्स ही दोघांनी मिळून करण्याची गोष्ट आहे. त्यात एकमेकांच्या आवडीचा विचार महत्वाचा आहे, त्याबद्दल बोललं पाहिजे, एकमेकांच्या मतांचा आदर ठेवला पाहिजे. ज्या गोष्टींचा त्रास होतो, त्या टाळायला पाहिजेत.
व जेंव्हा संभोगासाठी, दोघांच्या मनाची व शरीराची तयारी होईल, तेंव्हाच संभोग करणे योग्य

अश्लीलता...

अश्लीलता म्हणजे, माणसाचे काम इंद्रिये, नग्नता, व लैंगिक वर्तन, यांचा साहित्य, कला, व सार्वजनिक जीवनात, व्यक्त होणारा असभ्य ओंगळ, व्हलगर, आविष्कार होय. तो आक्षेपार्ह व अवैध असतो.
अश्लीलतेची कल्पना सामाजिक, कौटुंबिक व वयक्तिक नितीशी संबंधित आहे. ती संस्कृती शी निगडित असते. उदा. एका देशातील अश्लीलता, ही दुसऱ्या देशात अश्लीलता असेलच असे नाही.
अश्लीलता ही आक्षेपार्ह आहे हे साधारणपणे मान्य आहे. पण अश्लील म्हणजे काय, हे ठरविणे अवघड आहे.
विवस्त्र शरीर , लैंगिक वर्तन व विकृती, या अत्यंत खासगी गोष्टींचे प्रदर्शन केल्याने, लैंगिक वासना चाळवल्या जातात, . त्याच अनुकरण केल्यानं नैतिक अधःपतन होते, असं नितीवाद्यांना वाटतं.
तर दुसरा विवेकवादी गट, असभ्य व कामोत्तेजक (पोर्नोग्राफी), ह्यात फरक करून, कामोत्तेजकतेला आक्षेपार्ह मानतो.
अश्लीलता विषयक, प्रतिबंधक कायदे भारतात आहेत.
अश्लील साहित्य, नाटक, चित्रपट, प्रदर्शन, ह्यांना कायदेशीर मनाई आहे.
एक खटला गाजला, प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर, यांच्या काही कवितांवर अश्लीलतेचा खटल्यात (1947), त्यांना दोषमुक्त करण्यात आले.


IMAGE SOURCE  INTERNET

मयूर डुमणे ,
उस्मानाबाद

लव्ह / प्रेम
प्रेमासारखी सुंदर गोष्ट या जगात दुसरी नाही . इतर व्यक्तींप्रती  असलेला आदरभाव ,आपुलकी, काळजी म्हणजे प्रेम . मुलाला साधं खरचटल तरी आई चा जीव खाली वरी होतो ते आई च प्रेम असत . भूक लागलेल्या वासराने हंबरडा फोडल्याक्षणी गाई वासरांकडे धावून येते ते गाई च प्रेम . प्रेमाला जात, धर्म, प्रांत,देश अशा कोणत्याही चौकटी नसतात . भारतीय असलेली सानिया पाकिस्तानी असलेल्या शोएब वर प्रेम करू शकते तिथे देशाच्या शत्रुत्वाच बंधन आड येत नाही . या जन्मावर आणि या जगण्यावर शतदा प्रेम करावे असे मंगेश पाडगावकर सांगून गेले . इतरांवर प्रेम करण्याआधी व्यक्तीने पहिल्यांदा स्वतःवर प्रेम केले पाहिजे . स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय ? स्वतःमध्ये काही सुप्त प्रतिभा दडलेली असते त्या प्रतिभेवर आपण प्रेम केले पाहीजे .स्वतःच स्वतःचा आदर केला पाहिजे आपण आपल्या "स्व" वर प्रेम केलं पाहीजे . एकतर्फी प्रेमातून आत्महत्या अशी बातमी जेव्हा कानावर येते तेव्हा त्या व्यक्तीने खरच प्रेम केलेले असते का ? असा प्रश्न मला आवडतो म्हणून  पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करणे मला महत्वाचे वाटते .  द्वेष हा प्रेमाचा शत्रू आहे .द्वेषातून हिंसाचार जन्माला येतो तर प्रेमातून शांतता जन्माला येते . मानवतेचा धर्म वाढविण्यास, जोपासण्यास प्रेम मदत करते . साहित्य, कला, संगीत, विज्ञान अशा आवडत्या विषयां मध्ये झोकून देणे हे त्या विषयांप्रती असलेले आपले प्रेम च असते . द्वेषाने माणसे तोडली जातात तर प्रेमाने माणसे जोडली जातात .

सेक्स -
सेक्स ही मानवी शरीराची गरज आहे . अपत्य जन्माला घालणे हा एकमेव सेक्सचा उद्देश नाही . सेक्स ही वयात येणाऱ्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाची समान गरज आहे . वयात येत असताना स्त्री आणि पुरुषाच्या शरीरात हार्मोन्समुळे वेगवेगळे बदल होतात , त्यामुळे सेक्स ची जाणीव निर्माण व्हायला मदत होते .सेक्स करून बघण्याची इच्छा मनात निर्माण होते . लग्नाशिवाय सेक्स करता येत नाही असं सामाजिक बंधन समाजाने घालून दिले आहे अशावेळी masturbation हस्तमैथून करून सेक्स ची भूक भागविली जाते या मध्ये काहीही गैर नाही . लग्नाआधी सेक्स करण्यात मला काहीही चुकीचे वाटत नाही . शारीरिक भूक भागविण्यासाठी परस्पर संमतीने सुरक्षित रित्या लग्नाआधी सेक्स करणे यात मला काहीही गैर नाही . सध्य परिस्थितीत बेरोजगारीमुळे लग्नाच्या वयाचे प्रमाण वाढत आहे पूर्वी लवकर लग्न व्हायची त्यामुळे योग्य वयात सेक्स ची इच्छा पूर्ण व्हायची आता मात्र तशी परिस्थिती राहीली नाही . सेक्स करण्यासाठी स्त्री आणि पुरुषाची शारीरिक आणि मानसिक तयारी असणे एकमेकांवर विश्वास असणे गरजेचे आहे. सेक्स मधून स्त्री आणि पुरुषाला परमोच्च शारीरिक, मानसिक आनंद मिळतो . मानसिक आणि शारिरीक थकवा घालविण्यासाठी सेक्स सारखी दुसरी उपयुक्त गोष्ट नाही . पती आणि पत्नीमधील नात अधिक गठ्ठ करण्यासाठी सेक्स ही गोष्ट महत्वाची भूमिका बजावते . आपल्या जीवन साथी कडून काही कारणांमुळे सेक्स चा आनंद मिळत नसेल तर साथीदाराला विश्वासात घेऊन इतर व्यक्ती बरोबर संबंध ठेवण्यात काही सुद्धा गैर मला वाटत नाही. आपल्या  समाजात सेक्स या गोष्टीला नैतिकतेच्या बंधनात अडकवले जाते त्यामुळे सेक्स कडे पाहण्याचा दृष्टीकोन संकुचित झालेला आढळून येतो .दुर्देवाने अजूनही आपला समाज स्त्रीच्या योनीत तिचे चारित्र्य शोधतो . बलात्काराचे प्रमाण वाढण्यामध्ये समाजाची सेक्स कडे पाहण्याची संकुचित दृष्टीकोन कारणीभूत आहे . सेक्स ही मानवी शरीराची अभिव्यक्ती आहे सामाजिक बंधनामुळे ती दाबून ठेवणे घातक आहे ती जेवढ्या उत्स्फूर्तपणे बाहेर येईल तेवढे चांगले .
पुरुषप्रधान व्यवस्थेत सेक्स कडे फक्त पुरुषाची मक्तेदारी, गरज म्हणून पाहिले जाते . स्त्री कडे केवळ भोगवादी वस्तू म्हणून बघितले जाते हे अत्यंत चुकीचे आहे यांमुळे अनेक स्त्रियांची कुचंबणा होते . स्त्रियांना देखील सेक्स ची भावना, इच्छा असते  हे आपण समजून घेतले पाहिजे .
   सेक्स ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे प्रत्येकाने  या गोष्टीचा मनापासून कोणताही संकोच न बाळगता आनंद घेतला पाहीजे

अश्लीलता
मासिक पाळी , सेक्स, कंडोम यांविषयी बोलणे म्हणजे काही लोकांना अश्लील वाटते तर काहींना यात काही च अश्लील वाटत नाही म्हणजे व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अश्लीलता ठरते . अश्लीलता ही परिस्थितीजन्य असते कुटुंबात असताना जर आपण शिव्या दिल्या तर त्या अश्लील वाटू शकतात पण त्याच शिव्या जर आपल्या अत्यंत जवळच्या मित्रांमध्ये दिल्या तर त्यात आपल्याला काही च अश्लील वाटत नाही . समाजात राहताना काही सभ्यतेच्या मर्यादा पाळाव्या लागतात त्या मर्यादांचे उल्लंघन केल्यास अश्लीलता निर्माण होते . उदा . सार्वजनिक स्थळी आपण मोठ्या आवाजात शिव्या देणे ही गोष्ट माझ्या दृष्टीने अश्लील आहे . सेक्स ही प्रेमाने एकमेकांना समजून घेऊन करण्याची गोष्ट आहे पण सेक्स जर जबरदस्तीने हिंसक पद्धतीने होत असेल तर माझ्या दृष्टीने तो सेक्स अश्लील आहे . मुलींना पाहून मुलींना संकोच वाटेल असे हावभाव करणे ही अश्लील कृती आहे .

IMAGE SOURCE  INTERNET

जयंत जाधव, लातूर

नारळ हे आतून कसा निघेला हे जसं  सध्याच्या जगात ठोकपणे सांगू शकता नाही अगदी तसं लव म्हणजे प्रेम पुढे  कसे निघेल हे सांगता येत नाही.कारण प्रेमाचे संदर्भ परिस्थिती प्रमाणे सतत बदलत जाताना दिसतात. आजच्या काळात प्रेमात प्रेम कमी कामुकता व अश्लिलतेची भावना अधिक आहे. माझ्या सभोवताली असे बरेच सत्य घडलेले प्रसंग आहेत.लव सेक्स व अश्लिलता या गोष्टी क्रमाने घडणाऱ्या आहेत. एखादी गोष्ट पाहिजेच हा हट्ट देखील या घटना घडण्यास कारणीभूत ठरतात. एखाद्या स्त्रीने तुमचे प्रेम नाकारले तर तिला भावनात्मक पध्दतीने तिला भूरळ पाडून मी तुझ्या साठी काहीही करेल म्हणणारे एकदा की सावज आपल्या पाशात आले की मजा करुन तिला वा-यावर सोडणारे महाभाग गल्लो गल्ली सापडतात. शहाणपण हे कधी पण उशिरा येते पण आपल्याकडे डोळसपणा जर असला तर लव सेक्स व अश्लिलता या गोष्टी काही बिघडवू शकत नाही. सैराट चित्रपटातील सैराटपणाचे आयुष्य क्षणभर असते. वास्तव व चित्रपट यातील गोष्टीत बराच फरक असतो. खर प्रेम असेल तर रानावनात घडते. बाबा आमटे,डॉ.बंग-गडचिरोली,डॉ.कोल्हे- मेळघाट या व्यक्तीनी देखील प्रेम केले ते करताना त्यांनी सर्वच गोष्टी मिळवल्या आहेत. कामावर,पत्नीवर व निसर्गावरही केले.याला खरं प्रेम म्हणता येईल.

रोटी,कपडा व मकान या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तशी सेक्स देखील आहे.पण ते करत असताना दोन्ही जणांच्या नात्यात समजसपणा,आपुलकी,त्याग इत्यादी भावनांचा मेळ असावा. भूक लागल्यावर अधास्या सारख खाल्ले की पोट बिघडत.तस सेक्सला देखील ही गोष्ट लागू पडते. सेक्स करताना समोर च्या जोडीदारची इच्छा महत्त्वाची असते.जबरदस्ती करुन फक्त भूक मिटवता येते पण तृप्ती किंवा संतुष्ट त्याचे काय?

माझी एक मैत्रीण आहे.दिसायला एकदम सुंदर.चार चौघात उठून दिसेल अशी पर्सनॕलिटी.ती नेहमी स्पष्ट म्हणते,एखादी गोष्ट सुंदर असेल तर त्याचे कौतुक नक्कीच करावे किंवा ती गोष्ट पाहाण्यास हरकत नाही पण ते पाहताना त्यात घाणेरडी वासना नसावी व अशा नजरेवाल्यांना ती धडा शिकवायला विसरत नाही.

IMAGE SOURCE  INTERNET

स्वप्नील चव्हाण ,
बुलडाणा

   विषय निघाला तर सर्वप्रथम ज्यांच्याकडे लक्ष जाते ते म्हणजे युवा पिढी...विशेषतः पौगोंडावस्थेत असणारे ......कारण हेच ते वय असतं की ज्या मध्ये तो व्यक्ती लव्ह आणि सेक्स च्या भावनांवर आवर घालतो की वर नमूद केल्याप्रमाणे अश्लीलतेकडे जातो हे ठरते........
प्रेम ...इंग्रजीत लव्ह म्हणूयात ...ही अशी गोष्ट आहे की कोना phd झालेल्या माणसाला ही सर्वस्वी स्पष्ट करता येणार नाही.......कारण प्रत्येक वेळी.... प्रत्येक ठिकाणी..व्यक्ती नुसार ते प्रेम बदलत जात...प्रत्येकासाठी त्याची व्याख्या वेगळी असू शकते....कोणाला टाईमपास करत करत प्रेम मिळत....तर कोणाचा प्रेम करत करत टाईमपास होऊन जातो......कोणासाठी प्रेमच सगळ काही असतं ....तर बरेच जण प्रेम आहे की नाही हेच ठरवू शकत नाहीयेत.....
...तर काय असतं हे प्रेम ...???
आपल्या गरजेसाठी करतो ते खरं प्रेम की प्रेम झाल्यावर आपल्या गरजा पूर्ण होतात ते खरं....??
हेच आणि असे बरेचशे प्रश्न निर्माण होतात या पौगोंडावस्थेत.... मग काय करावं....??
आणि मग ते सेक्स करावं का....लग्नाआधी कराव की लग्न होईपर्यंत थांबावं......

प्रेमाची व्याख्या तर नाही सांगता येणार पण....हे सगळे प्रश्न ज्या वयात पडतात त्याला नक्कीच आपण पौगोंडावस्था म्हणूयात......
थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेम हे देवाचं रूप आहे.....ज्याच्या अस्तित्वावर बरेच जण साशंक आहेत पण जे त्याला मानतात त्यांच्यासाठी ती सर्वोच्च शक्ती आहे.....कुठे आहे माहित नाही पण सदैव आपल्या सोबत असावं असं वाटतं...देव असो की प्रेम.....।।
सेक्स हा एक नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे आणि त्याबद्दल आपण अनेक भ्रम बनवून ठेवलेले आहेत त्यामुळेचं लोकांचे विचार अश्लीलता या प्रकारात मोडतात......

मी जास्त या मुद्द्यावर बोलन्यापेक्षा त्यातुन होणाऱ्या अडचणी आणि निवारण कस होईल याकडे वळतो.....
सर्वात महत्वाचे हे राहील की पालकांनी त्यांच्या पाल्याशी या गोष्टींबाबत बोलणे गरजेचे राहील.......योग्य त्या वयात योग्य त्या गोष्टींची माहिती करून देणे त्यांच्याशी चर्चा करणे खूप महत्त्वाचा उपाय होऊ शकतो असे मला वाटतं..... कारण प्रेम प्रकरणामध्ये धोका मिळाला म्हणून जीव देणारे बरेच जण आपण बघतोय....जर अश्या परिस्थितीमध्ये पालकांचा सपोर्ट मिळाला तर त्यांचा जीव वाचवण्यासाठी उपयुक्त राहील....कारण माय-बापासाठी त्यांच्या लेकराचा जीव सर्वात महत्वाचा असतो..बाकी सर्व गोष्टींपेक्षा.....
आणि यासोबतच पालक स्वतः बोलतात म्हणून त्यांना हे सर्व नैसर्गीक वाटेल आणि तो अश्लीलतेचा प्रश्न निर्माण होणारच नाही........
आणि हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पालक त्यांच्या मुलांशी बोलताना थोडं फ्री होऊ शकत नाहीत....जर असं झालं असत तर बरेच प्रॉब्लेम्स सोडवण्यात यश आलं असतं....
आणि या बाबतीत तरी थोडं सरळ सरळ बोलणं गरजेचं राहील ...ते इंडिरेक्टली बोलून त्यांना समजेल ही भावना ठेवू नये.....कारण तास इंडिरेक्टली बोलताना आपण बऱ्याच गोष्टी बोलतच नाहीत हे लक्षात राहत नाही....
......आणि एक विशेष म्हणजे आज काल मुलांना पॉर्न चं वाढत आकर्षण....अगदी एखाद्या व्यसनाप्रमाणे चिटाकून बसते ती सवय....आणि सोडणं तेवढचं कठीण होऊन जात....मला तर नेट वर ते उपलब्ध असण्याचं कारणंच आतापर्यंत कळलेलं नाहीये.....कारण त्यामुळेच अनेक जण सेक्स साठी प्रवृत्त होतात...कारण ते आपल्या भावना ताब्यात ठेवण्यात असह्य होऊन जातात......आणि बलात्कार सारखे अडथळे निर्माण होतायेत...... म्हणून पालकांचं मार्गदर्शन जर असेल तर हे आणि अशे बरेच अडथळे दूर होऊ शकतील असे मला वाटते........



IMAGE SOURCE  INTERNET

अनिल गोडबोले
सोलापूर

जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रजनन संस्था असते. परंतु त्याचा विकास आणि त्याचे काम हे पौगंडवस्थेमध्ये (teen age) मध्ये चालू होते, हे काही कोणाला वेगळे सांगायला नको.

लव :- प्रेम या गोष्टीबद्दल बोलताना मी आईचे प्रेम, बाबांचे प्रेम, मित्र प्रेम या बद्दल अजिबात बोलत नाही. मी फक्त स्त्री आणि पुरुष या मध्ये होणाऱ्या भावनिक प्रेमाबद्दल बोलत आहे.

माणसाचे वागणे हे त्याच्या भावनेवर अवलंबून आहे त्यामुळे वयात आल्या नंतर प्रजनन होण्यासाठी किंवा आपल्या सारखा जीव जन्माला घालण्यासाठी स्त्री आणि पुरुष एकत्र यावे लागतात..
पण खरी इथंच तर गोची होते.. हे असे एकत्र येऊन जात नाहीत तर आयुष्यभर एकमेकांना आपल्या सोबत राहण्यासाठी बांधून ठेवण्यासाठी मानसिकरित्या एकत्र येतात.
तेव्हा आकर्षणातून सुरू झालेला प्रवास हा प्रेम आणि मग भावनिक गुंतवणूक इथपर्यंत येतो.

प्रेम हे स्त्री आणि पुरुष या मध्ये होत. किंवा समलिंगी संबंध असतील तर त्या जोडप्या मध्ये ही असू शकत. त्याला जात,धर्म, देश,संस्कार, दिसणं किंवा एकूणच अमुक बंधन असेल असं नाही.. पण आपल्याला अस वाढवलेलं आहे की आपण या सगळयांच्या नादात आपलं खर प्रेम विसरून जातो..
आणि मग खूप साऱ्या स्टोर्या चालू होतात


सेक्स:- प्रेम आहे हे दाखवण्याची किंवा अनुभवण्याची उच्च पातळी म्हणजे सेक्स. शारीरिक संबंध हे माणसाला शारीरिक आणि मानसिक सुख देण्यासाठी असतात. आपल्याकडे सगळ्यात जास्त (शक्यतो मुलींना) बंधन घातली जातात कारण लग्न होण्याआधी तिने कोणाशीही शरीर संबंध ठेवू नयेत. असे संबंध असलेली व्यक्ती(शक्यतो मुलगीच काही ठिकाणी मुलांना देखील त्रास असतो.. ) व्यभिचारी, वाईट चाल असलेली(भौतिक शास्त्रात नसलेली चालीची व्याख्या) किंवा वाया गेलेली मानतात.

तरीसुद्धा कधीकधी शारीरिक गरज ही शिकवणुकीच्या बाहेर वर्तन करायला भाग पाडते तेव्हा ते सगळं होत खर... पण नंतर ते खूप मानसिक ताण करून घेतात.

सेक्स फक्त प्रेम केलेले किंवा लग्न केलेले व्यक्ती एकमेकांसोबत करतात, असा खूप मोठा गैरसमज आपल्या संस्कृती मध्ये आहे. ज्याला जशी संधी मिळते तो त्या प्रेमाणे फायदा घेत असतो नाहीतर आपल्या कडे देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची आणि हल्ली तर असे काही तरुण मुलं आहेत जे असा व्यवसाय करतात त्याची खूप मोठी बाजार पेठ भरली नसती.

पॉर्न साईट च मार्केट आहे, गंमत म्हणून चालणारे सेक्स क्लब आहेत(अरेच्या ! हे तर आम्हाला माहीतच नव्हतं .. अस म्हणू नका), कॅज्युअल सेक्स च्या नावाखाली पण बरच काही चाललेलं आहे.. याच एक वेगळं मार्केट आहे पण तो काही आजचा विषय नाही..

आमच्या वेळेला नव्हतं बाबा असलं अस म्हणणाऱ्यांना फक्त त्यांना संधी मिळालेली नसते बाकी एड्स चा प्रसार भारतात झाला तेव्हा.. या एकनिष्ठ असण्याचा बुरखा टराटरा फाटलेला आहे.

या मध्ये कुठेही बलात्कार, अमिश दाखवून किंवा दाखवून केलेलं सेक्स, किंवा नकळत मनाविरुद्ध घेलेला फायदा याला अजिबात पाठिंबा नाही. ते चुकीचेच आहे.

ग्रुप सेक्स हा त्या ग्रुपवर अवलंबून आहे. समलिंगी संबंध हे देखील मान्य समंध आहेत. काहीच नाही तर हस्तमैथुन हा सुरक्षित प्रकार आहे.(जर एका पेक्षा अनेक व्यक्ती सोबत शरीर संबंध असतील तर निरोध चा वापर जरूर करा.. कारण गुप्तरोग आणि एड्स सारखे आजार वरून कळत नाहीत)


अश्लीलता:- सेक्स आणि प्रेम यांच्यामध्ये आलेली विकृती किंवा असंवेदनशीलता आणि माज आल्यामुळे माणूस जे वागतो ना.. ते वर्तन अश्लील वर्तन आहे.

विकृत मनोवृत्ती चे व्यक्तीच अश्लील असू शकतात. मुलांनी मुलींशी कसं वागायला पाहिजे किंवा मुलींनी मुलांशी कस वागायला पाहिजे या पेक्षा कस नाही वागायचं हे शिकवायची गरज आहे.
सामाजिक सभ्यता मोडणे, अश्लील हावभाव करणे हे सुदृढ मन नसलेली लक्षण आहेत. त्यांना मानसोपचार तज्ञाकडे ताबडतोब नेणं गरजेच आहे.

फार काही बोलणं गरजेच नाही फक्त.. कोणी कोणाशी प्रेम करावे कोणी कोणाशी सेक्स करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
पण एखाद्याच्या सन्मानाला ठेच पोहोचेल अस न वागणं हा मात्र संस्कृतीचा भाग असला पाहिजे.

तर.. प्रेम करा.. सेक्स करा (सुरक्षित करा).. आनंदी रहा पण घाणेरडी हरकत किंवा त्याने एखाद्याला त्रास होईल असे वागलं तर त्याला मानसोपचार देण्यापलीकडे काही उपयोग नाही असं माझं मत आहे.

IMAGE SOURCE  INTERNET

अश्विनी खलिपे,
तोंडोली (सांगली)

          संध्याकाळ होताच रातराणीनं उमलावं, अंधाराच साम्राज्य सगळीकडे पसरलेलं असलं तरी डोळ्यांच्या वाटेने न येता नाकाच्या मार्गाने सुगांधाच्या रूपाने मनात घुसावं आणि त्यावेळी आपल्याला जे सुख, प्रसन्नता मिळते अगदी तीच हळुवार जपण्याजोगी भावना प्रेम झाल्यावर मनाला अनुभवता येते. प्रेम म्हटलं की मन आलंच आणि मन म्हंटल की प्रेम आलंच. प्रेम हे कोणत्या एका नात्यासाठी सिमीत नाही, जिथं नातं तिथं प्रेम असतं. आई-वडील, भाऊ-बहीण, मावशी-काका, आजी-आजोबा अशा अनेक नात्यांमध्ये प्रेम लपलेलं असतं आणि याव्यतिरिक्त म्हणाल तर मग राष्ट्रप्रेम,  पुस्तकप्रेम, मैत्रिप्रेम, प्राणिप्रेम अशा प्रेमाची गणना ही प्रेमातच केली जाते. याचाच अर्थ असा की एखाद्या गोष्टीचा आपल्याला लागलेला ध्यास म्हणजे प्रेम. पण या प्रेमाला ही काहीतरी मर्यादा असतात, मर्यादेपलीकडचे प्रेम हे स्वतःसाठी किंवा इतरांसाठी विनाशकारी ठरतं यात काही शंकाच नाही. प्रेमाची भावना कदाचित आतापर्यंत सर्वांना कळली असेलच आणि प्रेमाबद्दल इतक्या जणांनी लिहिलंय की आता त्याबद्दल लिहायला कदाचित काहीच शब्द उरले असावेत असं मला तरी वाटतंय.
          सध्या प्रेम असा शब्द जरी कानावर पडला तरी प्रत्येकाच्या मनात एकाच प्रेमाचा विचार डोकं वर काढतो आणि सगळ्यांच्या नजरा बदलतात. आताच्या प्रेमात पावित्र्य उरलेलंच नाही असं बोलणं ही वावगं ठरणार नाही, कारण प्रेम फक्त मनाची भूक म्हणून उरलेली नाही. प्रेमात त्याग, ओढ, निस्वार्थपणा, विरह कुठंच दिसत नाही. पूर्वी प्रेम नजरेतून मनात आणि नंतर लग्नाच्या रूपाने जगासमोर यायचं आणि आताच्या प्रेमात नजरा कुठं कुठं घुसतात त्याला सीमाच उरल्या नाहीत. एकंदरीत काय तर, आजचं प्रेम म्हणजे लॉजवरची गेम एवढंच झालंय...
          प्रेमानंतर जी भावना जन्म घेते ती म्हणजे सेक्स. सेक्स म्हणजे शारीरिक संबंध, शरीराला लागलेली भूक. मुलं-मुली वयात येताना शरीरात होण्याऱ्या अंतर्गत बदलांमुळे निर्माण होणारी शरीराची गरज म्हणजे शारीरिक संबंध. वयात येताना या भावना होणं आणि एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं स्वाभाविक असतं पण त्यालाही काहीतरी मर्यादा असावी लागते; म्हणून वेळीच काळजी घेणं योग्य असतं, कारण वाहणाऱ्या प्रवाहात जर स्वतःला झोकून दिलं तर अंत होणं निश्चित असतं. सेक्स च्या भावना प्रकृती साठी चांगल्या असतात असं डॉक्टरांचं ही म्हणणं आहे पण त्या मर्यादेबाहेर गेल्या तर त्याची विकृती व्हायला वेळ लागत नाही. विकृतीतूनच पुढे बलात्कारासारख्या घटना घडतात. सेक्स हा प्रकार खऱ्या अर्थाने लग्नानंतरचं योग्य असं वैयक्तिक माझं तरी मत आहे. सेक्स हे दोघांच्या सहमतीने करण्याची गोष्ट आहे, कारण यात फक्त शरीराची भूक शमवणं गरजेचं नसून; सुखाची प्रचिती करून देणाऱ्या भावनेला अनुभवणं ही तितकंच गरजेचं असतं. सेक्स हा विषय आजही एकांतात कुजूबुजण्याचा विषय आहे असं मानलं जातं, त्यामुळे याबाबतीतील संपूर्ण ज्ञान योग्य वयात स्पष्टपणे न मिळाल्यामुळे आजची पिढी चुकीच्या दिशेने भरकटत चाललेली दिसते.
          अश्लीलता काल्पनिक आहे असं माझं मत आहे, कारण अश्लील काय आहे व काय नाही हे निश्‍चितपणे ठरवणं शक्य नाही, ज्याच्या त्याच्या कल्पनेप्रमाणे ती उदयास येते. अश्लील म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, हे ठरविणे कठीण आहे, कारण अश्लीलता ही लैंगिक गोष्टींशी जरी निगडित असली तरी त्यासाठी इंग्लिश शब्द वापरले तर त्यात अश्लील काहीच वाटतं नाही, पण त्यासाठी जर ग्रामीण बोली भाषेतला शब्द उच्चारला तर तो अश्लील मानला जातो, म्हणून अश्लीलतेचा प्रश्न न काढलेलाच योग्य असं मला तरी वाटतंय.

प्रेमावरती बोलू काही …. (भाग:-२)

प्रेमावरती बोलू काही …. (भाग:-२)

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

प्रेमावरती बोलू काही ….


Source:- INTERNET
-सागर मडावी,
यवतमाळ

येणार दुरावा अंतराचा
वाटून घेऊ
वाटणीत आठवणी आपल्या
साठवून ठेऊ

या अंतराच्या वाटणीत
काय माझे आणि तुझे ?
या वेळेलाही तिची किंमत
दाखवून देऊ

चंद्र कधी विसरला का त्याची कला ?
मग हे मन कसे बर विसरेल तुला
तू ये अमावस्ये पौर्णिमेच हे अंतर पार करून

जणू चंद्राच्या सुंदर कलेसारखी
अन सागराला मिळणाऱ्या नदिसारखी
*या सागराला भेटायला*....

*वाट बघतोय ...ये लवकर*..



Source:- INTERNET
-अनिल गोडबोले,
सोलापूर

प्रेम हा विषयच इतका भारी आहे ना.. माणूस आपोआपच रोमँटिक होऊन जातो. प्रत्येकाने आपल्या आपल्या वेळेत आणि त्या काळात बऱ्याच गमती जमती केलेल्या असतात. पण हे सगळं मांडण्यासाठी देखील धैर्य लागत.
आता या विषयावर लिहिताना.. माझ्या जीवनात प्रेम कधी होत ... असा विचार करत गेलो आणि तुम्हाला सांगतो थेट चौथी मध्ये पोहोचलो.

मी चौथी ला असताना शाळेने बालवाडी चालू केली होती. त्यामध्ये एक शिकवणार्या बाई होत्या, त्या मला आवडत असायच्या असा 'साक्षात्कार' आता मला झाला. कोकणातील टिपिकल मुलगी जी साडी नेसून, अबोलीच्या फुलांचा गजरा माळून शाळेत येत असे..
पण यात काही फार अर्थ नाही. पण एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे ... मी लहान पणा पासून प्रेमळ आहे.

मग पाचवी मध्ये असताना एक मुलगी आवडत होती . पण ती पाटीवरची पेन्सिल खायची . आठवी मध्ये हायस्कुल ला एक मुलगी आवडत होती.. (जो पर्यंत मित्र चिडवत नाहीत तो पर्यंत ते जगजाहीर होत नसे) पण दुसऱ्या वर्षी राखी पौर्णिमेला शाळेत रक्षा बंधनाचा कार्यक्रम झाला आणि तिने राखी बांधल्यामुळे ते सगळं समुद्रात वाहून गेले..

कॉलेज मध्ये मात्र एक मुलगी आवडली होती. पण ती हुशार होती.. सायन्स च्या मुलीला पटवायच असेल तर तुम्ही त्या पेक्षा जास्त हुशार असलं पाहिजे किंवा तस दाखवलं तरी पाहिजे... पण तिकडे ही बोंबाबोंब.
बारावी नंतर सोलापुरात आलो. सोलापुरात तर अशी भीती घातली होती की.. 'इथल्या मुलीच इतक्या डेंजर आहेत की त्या मुलांनाच फसवतात'. हे वाक्य डोक्यात असल्याने इकडे पूर्ण 3 वर्ष काहीही संशोधन केले नाही.

मास्टर डिग्री ला आल्यावर एक आवडली होती पण तिला आधीच एक बॉयफ्रेंड होता.. त्यामुळे तिकडे सगळंच बंद झालं..(एक प्रेम मिळू शकत नाही माणसाला..)

मग मी नोकरी करत असताना दवाखान्यात नोकरीला होतो. एक डॉक्टर कन्या होती.. तिला मी अवडायचो (पहिल्यांदा अस काहीतरी झालं) म्हणून मग प्रकरण चालू करावं म्हटलं तर त्या वर्षी त्यांच्या घरातून त्यांच्या जातीतला डॉक्टर मुलगा मिळाला मग तिनेच कॅन्सल केलं....

मग नंतर मोबाईल मुले देखील कॉलेज मधील कॉन्टॅक्ट वाढले तेव्हा कळलं की काही मुलीना मी आवडत होतो पण त्या बोलल्या नाहीत मला ज्या आवडत होत्या त्यांना मी बोललो नाही...
तर अशी खूप प्रकरण झाली... आणि शेवटी एकदा लग्न झालं... मग जेव्हा सहजीवन चालू झाल तेव्हा कळलं की प्रेम या शबदाचा अर्थच किती थोडक्यात घेतला..
एखादी व्यक्ती आपली आहे अस समजून घ्यायला देखील जे हृदय लागत.. एकमेकांची काळजी घेण्यासाठी असलेला भाव... सुख आणि जास्त दुःख वाटून घेत आलेले कितीतरी या 'आकर्षणा पेक्षा' जास्त प्रेम करत होते..

माझी आजी, आई अशा कितीतरी व्यक्ती होत्या ज्यांनी काळजी घेतली
माझे वडील, भाऊ, काही जीवाला जीव देणारे मित्र यांच्यामुळेच तर या जीवनात मी उभा आहे हे सर्व प्रेम तर आहे..

सगळंच रोमँटिक आहे.. आता मी बायकोला म्हणालो एकदा ,"मी लग्न करीन दुसर".. तर मला वाटलं की ती भांडेल किंवा काहीतरी बोलेल तर ती चक्क हसायला लागली.... आणि म्हणाली, "भाजी निवडून घेता येते का..लग्न मी केलं तुमच्याशी नाहीतर नुसतेच बसला होता इतके दिवस.. हे घ्या डबा आणि जावा आता कामाला..'

अस इथपर्यंत प्रेम येऊन पोहोचला आहे.. असो तरी मी अजुन रोमँटिक, आणि सदाहरित असल्याची स्वप्न चुकून पडलीच तर अजूनही मोरपिसा प्रमाणे तरंगत जात असतो.. हे देखील एक प्रेमच आहे!

Source:- INTERNET
-सीताराम पवार,
पंढरपूर

तू टेन्शन घेऊ नकू मी आहे तोपर्यंत घरची काळजी करायची नाही फक्त शिक्षण, असं मनुन मला आधार आणि मानसिक पाठबळ देणाऱ्या माझा बंधुराया! मला राम लक्ष्मण यांच्या बंधू प्रेमाला लाजवेल असा प्रेम करणारा भाऊ भेटला त्यातच तो मित्रही झाला!
तस तर प्रेम काही दोन प्रियेसी-प्रियकर यांचे असते, अशी लहानपणापासून धारणा होती पण आता प्रेमाची व्याख्या समजली.
साने गुरुजींनि जगाला प्रेम अर्पण करण्याचे शब्ध वापरले, देश नाही, राज्य नाही जग!
अध्यात्मिक जीवनात सुद्धा प्रेमाला खूप महत्त्व आहे, संत म्हणतात"प्रेमविना भजन नाकविन मोती।अर्थविन पोती वाचु नये।
तर स्वा. सावरकरांनी अपल्या मातृभूमीवर प्रेम केले"ते म्हणतात ने मजसी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, अंगावरती शहारे आणते हे प्रेम।
तर एक पंथाचे वाक्य आहे"प्रेमाने बोला....
आईच्या प्रेमाबद्दल मी शब्दात वर्णनचं करू शकत नाही,त्याबद्दल लिहावं तेवढ थोडंच..
खरं तर मला प्रियेशी नाही, पण मैत्रणी-मित्र आहेत, त्यातल्या काही मुली आशा आहेत, माझ्यापाशी रडल्याही भाव म्हणून बहीण-बंधू प्रेम.
प्रेम कोणतंही असो ते खरंच अजरामर असते, एकदा तबला वाजवायांच्या तासाला गेलो असता, आमच्या सरांना तिकडून फोन आला बहुतेक मुलगा रडत होता, सर समजावून सांगत होते, मग शेवटी सरांनी मटले""शुक्रतारा मंद वारा, चांदणे पाण्यातूनई... मोबाईल वरूनच.त्यावेळी या प्रेमाने मात्र मला अंतर्मुख केलं...
तसं तर प्रेम काही आजचं होत असे नाही, खूप जुन्या काळापासू हे प्रेम अस्तित्वात आहे .कवी ना.धो. महानोर याचं वर्णन करताना लिहितात,
गडद जांभळं भरलं आभाळ, मृगतल्या सावल्याना भिलोरी भोवळ, खोलवर चिंब बाई मातीला दरवळ।
भिलोरी हाताला "मोराच गोंदण," चांदण्याचं बन बाई पेटलं पाण्याने,जांभळीच्या झाडाला सांगावा शकुन।
मणजे आजच्या शहरी प्रेमालाही लाजवेल अस मोरच गोंदण, आपल्या प्रियेसीच नाव, गोंदने अस होत....
प्रेम कोणावरही करा अगदी जीव ओतून करा,निस्वार्थी भावनेन


Source:- INTERNET
-गीताश्री मगर,
पुणे

#प्रेम_करण्याचा_अधिकार !
#प्रेम_जगण्याचा_अधिकार !

माणूस म्हणून आपल्याला प्रकृतीने तोह्फ्या मध्ये जे काय काय दिलं आहे त्यात सगळ्यात सुंदर तोहफा म्हणजे “प्रेम” !
“प्रेम” नसते तर आपण फक्त जन्मलो असतो, मोठे झालो असतो हवं त्याच्याशी सेक्स केला असता, आपल्या सारखी एक पिढी तयार केली असती आणि इतर प्राण्यासारखं मरून गेलो असतो. पण प्रेम ही भावना आपल्याला खास बनवते, याहून पुढे जाऊन सांगायचं म्हणल तर आपल्याला “माणूस” बनवते.

माकडाचा माणूस केव्हा झाला अस जर मला हिस्ट्रीच्या प्राध्यापकाने विचारलं तर मी त्याला हेच सांगेन कि, “दोन पायावर चालणारी ही माकडं आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीला ‘व्यक्ती’ म्हणून समजून घ्यायला लागली. शारीरिक आकर्षण, सेक्स यांच्यासोबतच; याच्या पल्याड असलेल्या ‘प्रेम’ नावाच्या सुंदर भावनेला अनुभवायला लागली, समजून घ्यायला लागली. भाषेतून, स्पर्शातून ते व्यक्त करायला लागली ! ह्या सगळ्यांचा परिणाम ती समूहाने राहायला लागली, आपल्या छावी साठी, छाव्या साठी, पिलांनसाठी खोपटं बांधायला लागली, त्यांना खायला प्यायला लागणारे अन्न घरात शिजवायला लागली, अन्नासाठी लागणारे जिन्नस घराच्या आसपास पिकवायला लागली, शेती करायला लागली. एकूण काय तर स्थिर झाली.

एकमेकांमध्ये भावनांची, विचारांची देवाण घेवाण होयला लागली. बघता बघता अनेक घरांची वस्ती वसली, गावं वसली. त्याची शहर झाली. आणि ही बिन शेपटाची माकडं माणसात रुपांतरीत झाली. तर दोस्तानो एवढी सगळी कमाल कुणी केली ?? ओबिव्ह्सली प्रेमाने !
तर दोस्तांनो बिनदास्त प्रेम करा, प्रेम जगा आणि एक दिवस स्वतः प्रेम व्हा ! ☺

Source:- INTERNET
-श्रीनाथ कासे,
सोलापूर

तुझा सहवास जणू एखाद्या प्रेमगीतासारखे जात आहे,
तुझी आठवण जणू एखाद्या वीरहगीतासारखे जात आहे.

तुला बोललोच नाही जे जीवनी कधीही, आज बोलायचे आहे,
आयुष्य तुझ्याशिवाय एखाद्या म्रुगजळासारखे जात आहे.

कधी कुठल्याच रुपी सखे मला प्रेमजीवन मिळालेच नाही,
तुझ्याविना जीवन जणू मेघदूताच्या यक्षासारखे जात आहे.

नेमके अर्ध्यावर सोडून जावे काय असेही कोणास कोणी,
अनभिज्ञ जेथे सर्व, आयुष्य त्या किनाऱ्यासारखे जात आहे.

राहिले न या कवितेत दुःख आणि आठवणीशिवाय काही,
हा डाव, अर्ध्यावरती मोडलेल्या त्या कहाणीसारखे जात आहे.

Source:- INTERNET
-जयंत जाधव,
लातूर

माझ्या मते लोकांना जीवनात आनंदी राहायचे असेल तर प्रेमाची भूमिका खूप अत्यावश्यक आहे.प्रेमाची कमतरता असेल तर कोणीही सुखी बनणार नाही.प्रेम महत्त्वपूर्ण आहे पण फक्त प्रेमी युगुल जोडीतील नव्हे तर मित्र व कुटुंबातील प्रेम देखील महत्त्वाचे असते.मी एकटा राहतो ह्याला काही महत्त्व नाही,माझ्या सोबत एखादा पाळीव कुत्रा वा मांजर असेल तर त्याच्याशी असलेले स्नेह प्रेम मला आनंदी करण्यास महत्त्वाचे आहे आणी माझ्याकडे येवून किंवा भेटून वा बोलून कोणी खूष होत असेल तर हे प्रेमाचे रंग आयुष्य जगण्यासाठी खूप मोठी उर्जा देतात.
माझ्या प्रेमाच्या अनुभवावरून एक गोष्ट जास्त स्पष्ट करु इच्छितो मुलांच्या पेक्षा मुली अधिक व्यवहारी असतात.मुले सर्व मन खोलून व्यक्त होतात.मुली मात्र हातचा राखून ठेवतात.


Source:- INTERNET
-राज इनामदर,
पंढरपूर


प्रेम यशस्वी झाल तर जीवन अमृत 💏
विरह आला तर ..रोज थोडं थोडं करून मारणार विष 🙏
....काय सांगू विष जगू देईना 😢 आणी अमृत मरु देईना 🙂
रोज आरसा पाहताना ..चेहरा तिचा ...
डोक्यात सतत विचार तिचा
ह्रुदय माझ पण त्यात घर तीच .
माझ वागणं , चालणे, बोलणं यावर सर्व नियंत्रण तीच .
मी माझा नाहीये ..माझा माझ्यावर ताबाच नाहीये
तिच्या नावाचं नुसतं अद्याक्षर जरी कुठं दिसलं तरी माझ्या चेहऱ्यावर आनंदाच्या लहरी येतांत .
तुझी एक नजर माझ जीवन बनविते वेडे .....
आणी तिच्या नावाचा कागद जरी खिशात ठेवला तरी लोकं विचारतायत अत्तर कुठलं लावले आहे म्हणून ...तुच सांग प्रेमा नावं कुणाचं सांगु
💑



Source:- INTERNET
-नरेश शिवलिंग बदनाळे,
लातूर

What is love...?
' प्रेम ' म्हणजे नक्की काय ?
प्रेम हे विष म्हणुन घ्यायचं की अमृत म्हणुन प्यायचं हे ज्याचं त्याच्यावर अवलंबुन असतं खरे तर प्रेम ही संकल्पनाच मुळी कडाक्याच्या उन्हात हलकिशी पावसाची सर यावी आणि धगधगत्या वसुंधरेला शीतलतेची भेट द्यावी आणि त्या शीतलतेचा सुगंध सगळ्या असमंतात चिरकाल दरवळावा अशी आहे प्रेमाला माझा विरोध नाही प्रेमामुळेच तर कित्येकांच्या जीवनात बदल घडुन येतात त्यांच्या वाळवंटा सारख्या रुक्ष जीवनात हिरवळ निर्माण होते
त्याग,पावित्र्य आणि एकनिष्ठतेचे दुसरे नाव प्रेम आहे प्रेम ही अतिशय व्यापक संकल्पना आहे प्रेम ही अतिशय निरागस निर्मळ भावना असते इतर कुणापेक्षाही एकमेकांवर अतुट विश्वास ठेवणं म्हणजे प्रेम एकमेकांना समजुन घेणं म्हणजे प्रेम एकमेकांच्या जीवनात सहभागी होता येणं म्हणजे प्रेम निस्वार्थ पणे किंवा तिच्यासाठी झिजणं म्हणजे प्रेम एकमेकांच्या सुखांचा विचार करणं म्हणजे प्रेम प्रेमात पडल्यावर आपली मते एकमेकांवर लादु पये कारण प्रत्येकाला आपले जीवन स्वतंत्रपणे जगण्याचे स्वातंत्र्य आहे प्रेमात पडणे याचा अर्थ आपण पारतंत्र्यात जाणं किंवा कुणाचं तरी स्वातंत्र्य हिरावुन घेणं असा नव्हे तर आयुष्याची वाट चालताना एकाकीपणे मार्गस्थ राहिलो तर मार्ग लवकर संपत नाही वाट निरर्थक वाटते पण जर कुणी सोबत असेल तर आयुष्याला अर्थ प्राप्त होतो वाटेत लागणाऱ्या उन पावसाळ्यात आधार देणारं कुणीतरी असावंठेच लागली तर तर हाताचा आधार देणारं आपली काळजी घेणारं आपल्याला आपलं म्हणणारं असं कुणीतरी असावं हा त्या मागचा नकळत हेतु असतो प्रेम हा पोरखेळ नव्हे प्रेमामुळेच एखाद्याच्या आयुष्यात पालवी टिकुन राहते आणि प्रेमामुळेच एखाद्याच्ये उध्वस्त होवुन आयुष्याची राखरांगोळी होते हे नेहमी लक्षात ठेवायला हवं.
कुणीतरी आपल्याला आवडतय यापेक्षा आपण कुणालातरी आवडतोय ही गोष्ट फार आनंद देणारी असते आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तिने आपल्यावरही प्रेम करावं असं आवश्यक नसतं प्रेमाच्या पूर्णत्वाला 'लग्न' हे नाव दिलंच पाहिजे असं आवश्यक नाही प्रेमात पडणं हा सर्वात सुखद आनंददायी अनुभव आहे पण आपल्या सुखाची आपल्या कुटुंबाला झळ पोहचणार याची जबाबदारीही आपणच घेतली पाहीजे
आजच्या पिढिची प्रेमाची व्याख्या ही निव्वळ वासनेशी निगडीत आहे शरीराच्या सुखापलीकडे प्रेमाचे इतर अगणित रंग अनुभवण्याइतका वेळ आजच्या तारुण्याकडे नाही त्याच्या सगळ्या भावना इनोसन्ट झाल्या आहेत 'रात गई बात गई ' चा सगळा मामला आहे आज प्रेमात पडलात उद्या प्रपोज केलं आणि परवा लगेच डेटिंग असं प्रेम नसतं असु ही नये
प्रेम म्हटल्यावर कोणाच्याही मनात अनंत तरंग उठतील ही भावना प्रत्येकासाठी वेगवेगळीअसते पण ही प्रत्येकवेळी 'तो' आणि 'ति' त्याच्याच भोवती फिरणारी का ?
राधा कृष्ण यांच निस्सिम प्रेम आपण पुरातन काळापासुन ऐकत आलेलो आहोत पण 'मिरा' तिचं काय साक्षात प्रेम म्हणजे त्यागमुर्तीच ती तिनं सुद्धा श्री कृष्णावर नितांत प्रेम केलं एवढच नव्हे तर त्याच्या नावासाठी तिनं आपलं घर संसार राजवाडा नातेवाईक सर्वांना सोडुन ध्रुत वस्त्र परिधान करुन वीणा घेवुन श्री कृष्ण रसात न्हावुन निघाली हे प्रेम नव्हे तर काय ? कोण समजणार तिला ?
प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नसुन आत्यंतिक विश्वास त्याग जीवनातील कोणतीही बेरीज वजाबाकीचे गणित नसणारी भावना , सच्चा प्रेमाचा अनुभव प्रत्येकानं एकदातरी घ्यायलाच हवा हल्लीच्या धावपळीच्या जगात धावणारी 'ती' आणि 'तो' त्यांना कुठे वेळ असतो अशा भावना ओळखायला आणि पारखायला ?
आपल्या प्रत्येकाला कोणीतरी आवडत असतं मग ते आपल्या नात्यात असो किंवा मित्र मैत्रिणीत असो त्याचं स्थान इतरांपेक्षा वेगळच असतं आपण कशाच्या ना कशाच्या निमित्तानं एकमेकापासून आपल्या माणसापासुन दुरवर राहत असतो तेव्हा आपलं मन मात्र सारखं त्याच्या आठवणीनं सारखं व्याकुळ (अस्वस्थ ) होत असतं लग्नानंतर आपण आपल्या सगळ्यांपासुन दुरावतो त्याच्या आठवणी त्याचा लाभलेला सहवास आपल्याला सारखी त्याच्या भेटीची ओढ लावत असतो खरच,मन फार गुढ असते ते कधी कुठे गुंतत भिरभिरत काहीच कळत नाही पण मनाला वाटतं तस करायला हवं ( मिळावं ) हा भाव मात्र सर्वांना समजतो
आपल्या माणसापासुन आपणदुर असताना अचानक आवडत्या माणसाचा माणसाचा फोन येतो आणि आपल्या आजुबाजूच सगळं वातावरण अगदी बदलुन जातं संपूर्ण जग सुंदर होऊन जातं आपलं आवडतं माणुस साधसंच काहीतरी आणि ते आपल्याला मनापासुन आवडतं आपल्या सगळ्यांनाच हवी असते थोडीशी माया ती मिळते त्यामुळेच ते माणुस आपल्या आवडीचं होतं त्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगली वाटते बेसुर गाणं असो वा चारोळी, नुसत्या आठवणीनं ऱ्हदयात खोलवर दाटल्यासारखं वाटतं आणि मग डोळ्यात अश्रु दाटतात खरंच एकदा अनुभवुन पहा आपल्या आवडत्या माणसाची माया ! आपल्या प्रत्येकांच कोणीतरी असतं त्यातले भाव कधी बोलके असतात तर कधी अबोल फरक इतकाच असतो पण मनातली अधीरता तितकीच असते. त्यासाठी आयुष्यात जुळावंच आपलं आवडीच नातं त्यातल्या त्यात आपल्या आवडत्या माणसाला आपण मनापासुन आवडत असाल तर मग काय ? अवघ जीवनच सुगंधी होऊन जातं त्याचा आनंद अमाप असतो.तो कधी शब्दात मावत नाही हे मात्र अगदी खरं.....! 'ILU' 'This is love'......💞

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************