प्रेमावरती बोलू काही …. (भाग:-२)

प्रेमावरती बोलू काही …. (भाग:-२)

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

प्रेमावरती बोलू काही ….


Source:- INTERNET
-सागर मडावी,
यवतमाळ

येणार दुरावा अंतराचा
वाटून घेऊ
वाटणीत आठवणी आपल्या
साठवून ठेऊ

या अंतराच्या वाटणीत
काय माझे आणि तुझे ?
या वेळेलाही तिची किंमत
दाखवून देऊ

चंद्र कधी विसरला का त्याची कला ?
मग हे मन कसे बर विसरेल तुला
तू ये अमावस्ये पौर्णिमेच हे अंतर पार करून

जणू चंद्राच्या सुंदर कलेसारखी
अन सागराला मिळणाऱ्या नदिसारखी
*या सागराला भेटायला*....

*वाट बघतोय ...ये लवकर*..



Source:- INTERNET
-अनिल गोडबोले,
सोलापूर

प्रेम हा विषयच इतका भारी आहे ना.. माणूस आपोआपच रोमँटिक होऊन जातो. प्रत्येकाने आपल्या आपल्या वेळेत आणि त्या काळात बऱ्याच गमती जमती केलेल्या असतात. पण हे सगळं मांडण्यासाठी देखील धैर्य लागत.
आता या विषयावर लिहिताना.. माझ्या जीवनात प्रेम कधी होत ... असा विचार करत गेलो आणि तुम्हाला सांगतो थेट चौथी मध्ये पोहोचलो.

मी चौथी ला असताना शाळेने बालवाडी चालू केली होती. त्यामध्ये एक शिकवणार्या बाई होत्या, त्या मला आवडत असायच्या असा 'साक्षात्कार' आता मला झाला. कोकणातील टिपिकल मुलगी जी साडी नेसून, अबोलीच्या फुलांचा गजरा माळून शाळेत येत असे..
पण यात काही फार अर्थ नाही. पण एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे ... मी लहान पणा पासून प्रेमळ आहे.

मग पाचवी मध्ये असताना एक मुलगी आवडत होती . पण ती पाटीवरची पेन्सिल खायची . आठवी मध्ये हायस्कुल ला एक मुलगी आवडत होती.. (जो पर्यंत मित्र चिडवत नाहीत तो पर्यंत ते जगजाहीर होत नसे) पण दुसऱ्या वर्षी राखी पौर्णिमेला शाळेत रक्षा बंधनाचा कार्यक्रम झाला आणि तिने राखी बांधल्यामुळे ते सगळं समुद्रात वाहून गेले..

कॉलेज मध्ये मात्र एक मुलगी आवडली होती. पण ती हुशार होती.. सायन्स च्या मुलीला पटवायच असेल तर तुम्ही त्या पेक्षा जास्त हुशार असलं पाहिजे किंवा तस दाखवलं तरी पाहिजे... पण तिकडे ही बोंबाबोंब.
बारावी नंतर सोलापुरात आलो. सोलापुरात तर अशी भीती घातली होती की.. 'इथल्या मुलीच इतक्या डेंजर आहेत की त्या मुलांनाच फसवतात'. हे वाक्य डोक्यात असल्याने इकडे पूर्ण 3 वर्ष काहीही संशोधन केले नाही.

मास्टर डिग्री ला आल्यावर एक आवडली होती पण तिला आधीच एक बॉयफ्रेंड होता.. त्यामुळे तिकडे सगळंच बंद झालं..(एक प्रेम मिळू शकत नाही माणसाला..)

मग मी नोकरी करत असताना दवाखान्यात नोकरीला होतो. एक डॉक्टर कन्या होती.. तिला मी अवडायचो (पहिल्यांदा अस काहीतरी झालं) म्हणून मग प्रकरण चालू करावं म्हटलं तर त्या वर्षी त्यांच्या घरातून त्यांच्या जातीतला डॉक्टर मुलगा मिळाला मग तिनेच कॅन्सल केलं....

मग नंतर मोबाईल मुले देखील कॉलेज मधील कॉन्टॅक्ट वाढले तेव्हा कळलं की काही मुलीना मी आवडत होतो पण त्या बोलल्या नाहीत मला ज्या आवडत होत्या त्यांना मी बोललो नाही...
तर अशी खूप प्रकरण झाली... आणि शेवटी एकदा लग्न झालं... मग जेव्हा सहजीवन चालू झाल तेव्हा कळलं की प्रेम या शबदाचा अर्थच किती थोडक्यात घेतला..
एखादी व्यक्ती आपली आहे अस समजून घ्यायला देखील जे हृदय लागत.. एकमेकांची काळजी घेण्यासाठी असलेला भाव... सुख आणि जास्त दुःख वाटून घेत आलेले कितीतरी या 'आकर्षणा पेक्षा' जास्त प्रेम करत होते..

माझी आजी, आई अशा कितीतरी व्यक्ती होत्या ज्यांनी काळजी घेतली
माझे वडील, भाऊ, काही जीवाला जीव देणारे मित्र यांच्यामुळेच तर या जीवनात मी उभा आहे हे सर्व प्रेम तर आहे..

सगळंच रोमँटिक आहे.. आता मी बायकोला म्हणालो एकदा ,"मी लग्न करीन दुसर".. तर मला वाटलं की ती भांडेल किंवा काहीतरी बोलेल तर ती चक्क हसायला लागली.... आणि म्हणाली, "भाजी निवडून घेता येते का..लग्न मी केलं तुमच्याशी नाहीतर नुसतेच बसला होता इतके दिवस.. हे घ्या डबा आणि जावा आता कामाला..'

अस इथपर्यंत प्रेम येऊन पोहोचला आहे.. असो तरी मी अजुन रोमँटिक, आणि सदाहरित असल्याची स्वप्न चुकून पडलीच तर अजूनही मोरपिसा प्रमाणे तरंगत जात असतो.. हे देखील एक प्रेमच आहे!

Source:- INTERNET
-सीताराम पवार,
पंढरपूर

तू टेन्शन घेऊ नकू मी आहे तोपर्यंत घरची काळजी करायची नाही फक्त शिक्षण, असं मनुन मला आधार आणि मानसिक पाठबळ देणाऱ्या माझा बंधुराया! मला राम लक्ष्मण यांच्या बंधू प्रेमाला लाजवेल असा प्रेम करणारा भाऊ भेटला त्यातच तो मित्रही झाला!
तस तर प्रेम काही दोन प्रियेसी-प्रियकर यांचे असते, अशी लहानपणापासून धारणा होती पण आता प्रेमाची व्याख्या समजली.
साने गुरुजींनि जगाला प्रेम अर्पण करण्याचे शब्ध वापरले, देश नाही, राज्य नाही जग!
अध्यात्मिक जीवनात सुद्धा प्रेमाला खूप महत्त्व आहे, संत म्हणतात"प्रेमविना भजन नाकविन मोती।अर्थविन पोती वाचु नये।
तर स्वा. सावरकरांनी अपल्या मातृभूमीवर प्रेम केले"ते म्हणतात ने मजसी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, अंगावरती शहारे आणते हे प्रेम।
तर एक पंथाचे वाक्य आहे"प्रेमाने बोला....
आईच्या प्रेमाबद्दल मी शब्दात वर्णनचं करू शकत नाही,त्याबद्दल लिहावं तेवढ थोडंच..
खरं तर मला प्रियेशी नाही, पण मैत्रणी-मित्र आहेत, त्यातल्या काही मुली आशा आहेत, माझ्यापाशी रडल्याही भाव म्हणून बहीण-बंधू प्रेम.
प्रेम कोणतंही असो ते खरंच अजरामर असते, एकदा तबला वाजवायांच्या तासाला गेलो असता, आमच्या सरांना तिकडून फोन आला बहुतेक मुलगा रडत होता, सर समजावून सांगत होते, मग शेवटी सरांनी मटले""शुक्रतारा मंद वारा, चांदणे पाण्यातूनई... मोबाईल वरूनच.त्यावेळी या प्रेमाने मात्र मला अंतर्मुख केलं...
तसं तर प्रेम काही आजचं होत असे नाही, खूप जुन्या काळापासू हे प्रेम अस्तित्वात आहे .कवी ना.धो. महानोर याचं वर्णन करताना लिहितात,
गडद जांभळं भरलं आभाळ, मृगतल्या सावल्याना भिलोरी भोवळ, खोलवर चिंब बाई मातीला दरवळ।
भिलोरी हाताला "मोराच गोंदण," चांदण्याचं बन बाई पेटलं पाण्याने,जांभळीच्या झाडाला सांगावा शकुन।
मणजे आजच्या शहरी प्रेमालाही लाजवेल अस मोरच गोंदण, आपल्या प्रियेसीच नाव, गोंदने अस होत....
प्रेम कोणावरही करा अगदी जीव ओतून करा,निस्वार्थी भावनेन


Source:- INTERNET
-गीताश्री मगर,
पुणे

#प्रेम_करण्याचा_अधिकार !
#प्रेम_जगण्याचा_अधिकार !

माणूस म्हणून आपल्याला प्रकृतीने तोह्फ्या मध्ये जे काय काय दिलं आहे त्यात सगळ्यात सुंदर तोहफा म्हणजे “प्रेम” !
“प्रेम” नसते तर आपण फक्त जन्मलो असतो, मोठे झालो असतो हवं त्याच्याशी सेक्स केला असता, आपल्या सारखी एक पिढी तयार केली असती आणि इतर प्राण्यासारखं मरून गेलो असतो. पण प्रेम ही भावना आपल्याला खास बनवते, याहून पुढे जाऊन सांगायचं म्हणल तर आपल्याला “माणूस” बनवते.

माकडाचा माणूस केव्हा झाला अस जर मला हिस्ट्रीच्या प्राध्यापकाने विचारलं तर मी त्याला हेच सांगेन कि, “दोन पायावर चालणारी ही माकडं आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीला ‘व्यक्ती’ म्हणून समजून घ्यायला लागली. शारीरिक आकर्षण, सेक्स यांच्यासोबतच; याच्या पल्याड असलेल्या ‘प्रेम’ नावाच्या सुंदर भावनेला अनुभवायला लागली, समजून घ्यायला लागली. भाषेतून, स्पर्शातून ते व्यक्त करायला लागली ! ह्या सगळ्यांचा परिणाम ती समूहाने राहायला लागली, आपल्या छावी साठी, छाव्या साठी, पिलांनसाठी खोपटं बांधायला लागली, त्यांना खायला प्यायला लागणारे अन्न घरात शिजवायला लागली, अन्नासाठी लागणारे जिन्नस घराच्या आसपास पिकवायला लागली, शेती करायला लागली. एकूण काय तर स्थिर झाली.

एकमेकांमध्ये भावनांची, विचारांची देवाण घेवाण होयला लागली. बघता बघता अनेक घरांची वस्ती वसली, गावं वसली. त्याची शहर झाली. आणि ही बिन शेपटाची माकडं माणसात रुपांतरीत झाली. तर दोस्तानो एवढी सगळी कमाल कुणी केली ?? ओबिव्ह्सली प्रेमाने !
तर दोस्तांनो बिनदास्त प्रेम करा, प्रेम जगा आणि एक दिवस स्वतः प्रेम व्हा ! ☺

Source:- INTERNET
-श्रीनाथ कासे,
सोलापूर

तुझा सहवास जणू एखाद्या प्रेमगीतासारखे जात आहे,
तुझी आठवण जणू एखाद्या वीरहगीतासारखे जात आहे.

तुला बोललोच नाही जे जीवनी कधीही, आज बोलायचे आहे,
आयुष्य तुझ्याशिवाय एखाद्या म्रुगजळासारखे जात आहे.

कधी कुठल्याच रुपी सखे मला प्रेमजीवन मिळालेच नाही,
तुझ्याविना जीवन जणू मेघदूताच्या यक्षासारखे जात आहे.

नेमके अर्ध्यावर सोडून जावे काय असेही कोणास कोणी,
अनभिज्ञ जेथे सर्व, आयुष्य त्या किनाऱ्यासारखे जात आहे.

राहिले न या कवितेत दुःख आणि आठवणीशिवाय काही,
हा डाव, अर्ध्यावरती मोडलेल्या त्या कहाणीसारखे जात आहे.

Source:- INTERNET
-जयंत जाधव,
लातूर

माझ्या मते लोकांना जीवनात आनंदी राहायचे असेल तर प्रेमाची भूमिका खूप अत्यावश्यक आहे.प्रेमाची कमतरता असेल तर कोणीही सुखी बनणार नाही.प्रेम महत्त्वपूर्ण आहे पण फक्त प्रेमी युगुल जोडीतील नव्हे तर मित्र व कुटुंबातील प्रेम देखील महत्त्वाचे असते.मी एकटा राहतो ह्याला काही महत्त्व नाही,माझ्या सोबत एखादा पाळीव कुत्रा वा मांजर असेल तर त्याच्याशी असलेले स्नेह प्रेम मला आनंदी करण्यास महत्त्वाचे आहे आणी माझ्याकडे येवून किंवा भेटून वा बोलून कोणी खूष होत असेल तर हे प्रेमाचे रंग आयुष्य जगण्यासाठी खूप मोठी उर्जा देतात.
माझ्या प्रेमाच्या अनुभवावरून एक गोष्ट जास्त स्पष्ट करु इच्छितो मुलांच्या पेक्षा मुली अधिक व्यवहारी असतात.मुले सर्व मन खोलून व्यक्त होतात.मुली मात्र हातचा राखून ठेवतात.


Source:- INTERNET
-राज इनामदर,
पंढरपूर


प्रेम यशस्वी झाल तर जीवन अमृत 💏
विरह आला तर ..रोज थोडं थोडं करून मारणार विष 🙏
....काय सांगू विष जगू देईना 😢 आणी अमृत मरु देईना 🙂
रोज आरसा पाहताना ..चेहरा तिचा ...
डोक्यात सतत विचार तिचा
ह्रुदय माझ पण त्यात घर तीच .
माझ वागणं , चालणे, बोलणं यावर सर्व नियंत्रण तीच .
मी माझा नाहीये ..माझा माझ्यावर ताबाच नाहीये
तिच्या नावाचं नुसतं अद्याक्षर जरी कुठं दिसलं तरी माझ्या चेहऱ्यावर आनंदाच्या लहरी येतांत .
तुझी एक नजर माझ जीवन बनविते वेडे .....
आणी तिच्या नावाचा कागद जरी खिशात ठेवला तरी लोकं विचारतायत अत्तर कुठलं लावले आहे म्हणून ...तुच सांग प्रेमा नावं कुणाचं सांगु
💑



Source:- INTERNET
-नरेश शिवलिंग बदनाळे,
लातूर

What is love...?
' प्रेम ' म्हणजे नक्की काय ?
प्रेम हे विष म्हणुन घ्यायचं की अमृत म्हणुन प्यायचं हे ज्याचं त्याच्यावर अवलंबुन असतं खरे तर प्रेम ही संकल्पनाच मुळी कडाक्याच्या उन्हात हलकिशी पावसाची सर यावी आणि धगधगत्या वसुंधरेला शीतलतेची भेट द्यावी आणि त्या शीतलतेचा सुगंध सगळ्या असमंतात चिरकाल दरवळावा अशी आहे प्रेमाला माझा विरोध नाही प्रेमामुळेच तर कित्येकांच्या जीवनात बदल घडुन येतात त्यांच्या वाळवंटा सारख्या रुक्ष जीवनात हिरवळ निर्माण होते
त्याग,पावित्र्य आणि एकनिष्ठतेचे दुसरे नाव प्रेम आहे प्रेम ही अतिशय व्यापक संकल्पना आहे प्रेम ही अतिशय निरागस निर्मळ भावना असते इतर कुणापेक्षाही एकमेकांवर अतुट विश्वास ठेवणं म्हणजे प्रेम एकमेकांना समजुन घेणं म्हणजे प्रेम एकमेकांच्या जीवनात सहभागी होता येणं म्हणजे प्रेम निस्वार्थ पणे किंवा तिच्यासाठी झिजणं म्हणजे प्रेम एकमेकांच्या सुखांचा विचार करणं म्हणजे प्रेम प्रेमात पडल्यावर आपली मते एकमेकांवर लादु पये कारण प्रत्येकाला आपले जीवन स्वतंत्रपणे जगण्याचे स्वातंत्र्य आहे प्रेमात पडणे याचा अर्थ आपण पारतंत्र्यात जाणं किंवा कुणाचं तरी स्वातंत्र्य हिरावुन घेणं असा नव्हे तर आयुष्याची वाट चालताना एकाकीपणे मार्गस्थ राहिलो तर मार्ग लवकर संपत नाही वाट निरर्थक वाटते पण जर कुणी सोबत असेल तर आयुष्याला अर्थ प्राप्त होतो वाटेत लागणाऱ्या उन पावसाळ्यात आधार देणारं कुणीतरी असावंठेच लागली तर तर हाताचा आधार देणारं आपली काळजी घेणारं आपल्याला आपलं म्हणणारं असं कुणीतरी असावं हा त्या मागचा नकळत हेतु असतो प्रेम हा पोरखेळ नव्हे प्रेमामुळेच एखाद्याच्या आयुष्यात पालवी टिकुन राहते आणि प्रेमामुळेच एखाद्याच्ये उध्वस्त होवुन आयुष्याची राखरांगोळी होते हे नेहमी लक्षात ठेवायला हवं.
कुणीतरी आपल्याला आवडतय यापेक्षा आपण कुणालातरी आवडतोय ही गोष्ट फार आनंद देणारी असते आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तिने आपल्यावरही प्रेम करावं असं आवश्यक नसतं प्रेमाच्या पूर्णत्वाला 'लग्न' हे नाव दिलंच पाहिजे असं आवश्यक नाही प्रेमात पडणं हा सर्वात सुखद आनंददायी अनुभव आहे पण आपल्या सुखाची आपल्या कुटुंबाला झळ पोहचणार याची जबाबदारीही आपणच घेतली पाहीजे
आजच्या पिढिची प्रेमाची व्याख्या ही निव्वळ वासनेशी निगडीत आहे शरीराच्या सुखापलीकडे प्रेमाचे इतर अगणित रंग अनुभवण्याइतका वेळ आजच्या तारुण्याकडे नाही त्याच्या सगळ्या भावना इनोसन्ट झाल्या आहेत 'रात गई बात गई ' चा सगळा मामला आहे आज प्रेमात पडलात उद्या प्रपोज केलं आणि परवा लगेच डेटिंग असं प्रेम नसतं असु ही नये
प्रेम म्हटल्यावर कोणाच्याही मनात अनंत तरंग उठतील ही भावना प्रत्येकासाठी वेगवेगळीअसते पण ही प्रत्येकवेळी 'तो' आणि 'ति' त्याच्याच भोवती फिरणारी का ?
राधा कृष्ण यांच निस्सिम प्रेम आपण पुरातन काळापासुन ऐकत आलेलो आहोत पण 'मिरा' तिचं काय साक्षात प्रेम म्हणजे त्यागमुर्तीच ती तिनं सुद्धा श्री कृष्णावर नितांत प्रेम केलं एवढच नव्हे तर त्याच्या नावासाठी तिनं आपलं घर संसार राजवाडा नातेवाईक सर्वांना सोडुन ध्रुत वस्त्र परिधान करुन वीणा घेवुन श्री कृष्ण रसात न्हावुन निघाली हे प्रेम नव्हे तर काय ? कोण समजणार तिला ?
प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नसुन आत्यंतिक विश्वास त्याग जीवनातील कोणतीही बेरीज वजाबाकीचे गणित नसणारी भावना , सच्चा प्रेमाचा अनुभव प्रत्येकानं एकदातरी घ्यायलाच हवा हल्लीच्या धावपळीच्या जगात धावणारी 'ती' आणि 'तो' त्यांना कुठे वेळ असतो अशा भावना ओळखायला आणि पारखायला ?
आपल्या प्रत्येकाला कोणीतरी आवडत असतं मग ते आपल्या नात्यात असो किंवा मित्र मैत्रिणीत असो त्याचं स्थान इतरांपेक्षा वेगळच असतं आपण कशाच्या ना कशाच्या निमित्तानं एकमेकापासून आपल्या माणसापासुन दुरवर राहत असतो तेव्हा आपलं मन मात्र सारखं त्याच्या आठवणीनं सारखं व्याकुळ (अस्वस्थ ) होत असतं लग्नानंतर आपण आपल्या सगळ्यांपासुन दुरावतो त्याच्या आठवणी त्याचा लाभलेला सहवास आपल्याला सारखी त्याच्या भेटीची ओढ लावत असतो खरच,मन फार गुढ असते ते कधी कुठे गुंतत भिरभिरत काहीच कळत नाही पण मनाला वाटतं तस करायला हवं ( मिळावं ) हा भाव मात्र सर्वांना समजतो
आपल्या माणसापासुन आपणदुर असताना अचानक आवडत्या माणसाचा माणसाचा फोन येतो आणि आपल्या आजुबाजूच सगळं वातावरण अगदी बदलुन जातं संपूर्ण जग सुंदर होऊन जातं आपलं आवडतं माणुस साधसंच काहीतरी आणि ते आपल्याला मनापासुन आवडतं आपल्या सगळ्यांनाच हवी असते थोडीशी माया ती मिळते त्यामुळेच ते माणुस आपल्या आवडीचं होतं त्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगली वाटते बेसुर गाणं असो वा चारोळी, नुसत्या आठवणीनं ऱ्हदयात खोलवर दाटल्यासारखं वाटतं आणि मग डोळ्यात अश्रु दाटतात खरंच एकदा अनुभवुन पहा आपल्या आवडत्या माणसाची माया ! आपल्या प्रत्येकांच कोणीतरी असतं त्यातले भाव कधी बोलके असतात तर कधी अबोल फरक इतकाच असतो पण मनातली अधीरता तितकीच असते. त्यासाठी आयुष्यात जुळावंच आपलं आवडीच नातं त्यातल्या त्यात आपल्या आवडत्या माणसाला आपण मनापासुन आवडत असाल तर मग काय ? अवघ जीवनच सुगंधी होऊन जातं त्याचा आनंद अमाप असतो.तो कधी शब्दात मावत नाही हे मात्र अगदी खरं.....! 'ILU' 'This is love'......💞

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************