2050 नंतरचे विश्व आणि भारत.

2050 नंतरचे विश्व आणि भारत.

IMAGE SOURCE:INTERNET

प्रदिप इरकर,वसई जिल्हा-पालघर

सण 2050..
तेव्हा परिस्थिती कशी असेल?
आता जसे जगात रेल्वे चे जाळे पसरले आहे तसे बुलेट ट्रेन चे पसरले असेल काय बरं?
सार्वजनिक ठिकाणी चढावे लागणारे जिन्यांऐवजी सगळीकडे उद्धवाहक(lift) की escalator असतील सगळी कडे?
2020 मधेच चीन जपान मधील काही बँकांनी सर्व कार्यालय रोबोट च्या हवाली केलं आहे तर 2050 मध्ये आपल्याला सर्वच बँकांमध्ये रोबोट च दिसतील काय?
मानवाची आपली वस्ती चंद्रावर बसवण्याचे स्वप्न कुठपर्यंत आले असेल बार तेव्हा?
जगातील देशांनी किती क्षमतेचे क्षेपणास्त्र विकसित केले असतील?
कोणीतरी दोन माथेफिरू प्रमुखांमुळे तिसरे महायुद्ध झाले असेल काय?
जर झालेच तर मनुष्य हा प्राणी पृथ्वीवर जिवंत राहील काय?

आता ह्या सर्वात भारत पण असेल काय स्पर्धेत की फक्त *इंडिया* च असेल?
डॉ.कलाम ह्यांनी म्हटलेलं 2020 पर्यंत राहील 2050 पर्यंत तरी महासत्ता होईल काय?
महासत्ता होणे म्हणजे नक्की काय बरं?आपल्या देशाच्या आर्मी ला सर्व देशांनी घाबरले पाहिजे की देशातील *सर्व* नागरिकांचा राहणीमान सुधारले असले पाहिजे व सर्व नागरिक आनंदी असले पाहिजेत?

जी गरीब श्रीमंत दरी आहे ती भरली असेल काय?

गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेले वातावरण असेल राहून देशात अराजकता माजलेली असेल काय?
आपल्या मताविरुद्ध मत मांडले तर तेव्हाही *देशद्रोही* हा ठपका ठेवलेला असेल काय?
सहिष्णुता उरली असेल काय बरं?
काश्मीर प्रश्न सुटलेला असेल काय?
पानसरे,कुलबर्गी ह्यांचे मारेकरी गजाआड असतील काय?
मनुष्य हा सामाजिक प्राण्याऐवजी रानटी प्राणी झाला असेल काय बरं??
मुख्य म्हणजे

तेव्हा माणूस माणसासारखा वागत असेल काय??
IMAGE SOURCE:INTERNET

शिरीष उमरे,नवी मुंबई

जवळपास बत्तीस वर्षानंतरचे जग कसे असेल याचा विचार करायचा म्हणजे बघुया बत्तीस वर्षापुर्वी काय स्थिती होती...
१९८६ ला भारतात वायफाय मोबाईल टॅब तर सोडा साधा पेजर व कॉम्प्युटर पण कीत्येक लोकांना माहीती नव्हते. एसटीडी फोन, झेरॉक्स, रोलवाले कॅमेरे ह्यांची सुरुवात होती. टुव्हीलर व फोरव्हीलर चे लिमिटेड ऑप्शन होते. एलईडी एलसीडी चे नाव पण नव्हते... नुकतेच कलर टीव्ही बाजारात आले होते. चाळीस वर्षा अगोदर अाण्विक शस्त्राच्या वापराने जागतिक युध्दविराम व शितयुद्ध सुरु होते. इंदिरा गांधी हे वादळ शमुन त्यांचा मुलगा जो व्यावसायिक पायलट होता त्याने प्रधानसेवक म्हणुन देशाची सुत्रे हातात घेतली होती.

आत्ता मागे वळुन बघितल्यावर लक्षात येते की व्यापाराचे जागतिकरण व विज्ञान प्रगतीमुळे भौतिक सुबत्ता वाढुन निसर्ग र्हास कसा भयानक होत गेला ...
आज लक्षात येते की पाण्यासाठी तिसरे महायुध्द होऊ शकते. जागतिक आर्थिक महत्वाकांक्षा पायी इराक सिरिया सारखे देश बेचिराख केल्या जातात. जागतिक कंपन्या विकसनशील देश चालवतात. भेसळ व भ्रष्टाचार ईतका वाढलाय की पुढच्या पिढीचे आयुष्य व भविष्य धोक्यात आहे. आफ्रीकन देशाच्या नागरिकांची विकासाच्या नावाखाली गिनीपिग म्हणुन कत्तल केली जाते. शस्रात्रे विकल्या जावी यासाठी स्वत:च्या देशावर हल्ल्याचा कट करवुन आपलेच नागरिक मरवल्या जातात. आतंकवादाच्या नावाखाली धार्मिक उन्माद माजवल्या जातोय.

एक छोटीशी चुक पुर्ण जगाला काही क्षणात राखेच्या ढीगात परिवर्तित करु शकते. जर हा वासनेचा स्वार्थाचा भस्मासुर थांबवला नाही तर २०५० तर दुरची गोष्ट झाली... २०२० सुध्दा बघणे शक्य होणार नाही.

ह्या घाणेरड्या राजकारणात बदल घडवायचा असेल तर चांगल्या माणसांची सक्त गरज आहे ह्या जगात... एक तर चांगले बना कीॅवा चांगल्यांना सपोर्ट करा. खरा विकास हा माणुसकी चा व निसर्गाचा गरजेचा आहे. बाकी सब बकवास
 IMAGE SOURCE:INTERNET

अभिजीत गोंडसे,सातारा

         आपल्या भारताची लोकसंख्या एवढी अफाट वाढत आहे की ११ जुलै २०१८ नुसार १३५ कोटी लोकसंख्या झाली आहे. या माणसाच्या गर्दीत रोजची जगण्याची लढाई करताना सकाळी उठलेला माणूस संध्याकाळी कायमची जागा रिकामी करुण जगाचा निरोप घेतो की काय ! अशी अवस्था आहे. यातच उद्या काय होणार हे सांगणे कठीणच ! तर मग २०५० च्या नंतर काय असेल. कशा पद्धतीने माणसाला जगण्यासाठी स्पर्धा करावी लागेल हे सांगणे म्हणजे फार कठीणच. तरी थोडाफार अंदाज लावू शकतो आपण .

           तसे पाहिले तर शंभर वर्षीनी जगाचा इतिहास बदलत असतो. जगाचा इतिहास बदलण्यासाठी प्रमुख देश हे अगदी शित युद्धा पासून किंवा त्याच्याही अगोदर राहिले ते म्हणजे अमेरिका आणि रशिया. अमेरिका हा आपण केंद्र बिंदू माणला तर जे काही अजून तिस एक वर्षीने होईल ते अमेरिकाच घडवून आणू शकेल. कोणताही देश महासत्ता झालेल्या देशाचे अनुकरण करत असतो. पण याच जोडीला रशिया आणि उत्तर कोरिया यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण असणार हे नक्कीच. सध्या बड्या देशांचे अध्यक्ष हे हुकूमशाही असल्या सारखे वागताना दिसून येते. उत्तर कोरिया तर अनु युद्धाची भाषा बोलताना दिसत आहे. तसेच एका बाजूला असलेला इसिस सारख्या संघटनेचे प्रश्न आहेतच. इराक , इराण हे तेल सम्राट देश यांची ही भूमिका महत्त्वाची राहणार आहे. जर युद्धाची ठिणगी पडली तर 'तेल' हाच युद्धाचा क्रेंद बिंदू असू शकतो. जगातील व्यापार पाहता आयात - निर्यात , वेगवेगळ्या होणाऱ्या जागतिक परिषदा आणि त्या अनुषंगाने होणारे करार हे घटक ही त्या - त्या देशात मोठ्या प्रमाणात बदल करु शकतील. याच बरोबर 'पुथ्वी' वाचवण्यासाठी आणखी आधुनिक पद्धतीने बदल होत राहतील. संरक्षण सामुग्री , वेगवेगळ्या प्रकारची क्षेपनास्ञे यात निश्चित बदल होत आहेत. आता या सर्वात आपला भारत कुठे आहे ? तर तो आहे.

           जरी आपण विकसनशील असलो तरी ती आपली ओळख लवकरच पुसत जाताना दिसत आहे. नव्हे तर पुसनारच आणि एक 'विकसीत' झालेलो देश .अशी आपली ओळख संपूर्ण जगात होईल. महासत्ता होणारच किंवा त्या मार्गावर लवकर असनारच हे मात्र नक्कीच ! खरा बदल भारतात झाला तो १९९१ ला हे साल भारतासाठी खुप महत्त्वाचे आहे. उदारीकरण , खाजगीकरण , जागतिककरण ( उ खा जा) हे धोरण भारताने राबवले. सर्व क्षेत्रात भारताने मोठ्या प्रमाणात प्रगती केली. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. म्हणजे अगदी आत्ता - आत्ता फक्त ७० वर्षे झाली. त्या माणाणे खुप प्रगती झाली. आणि ती वाखण्याजोगी आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अंगाने भारत प्रगती करत आहे. संध्या आपला आर्थिक विकास दर ६.७ आहे. नक्कीच हा विकास दर वाढत जाताना दिसत आहे. अगदी मागील दहा- पंधरा वर्षीचा विचार केला तर दिसून येईल. की फारसे कोणाकडे मोबाईल फोन नव्हते , हे फेसबुक , ट्टीटर अशी माध्यमे नव्हती. आज ती सर्वांनकडे आहेत. हाच तर मोठा बदल झाला. डिजीटल युगात प्रवेश केला. आज इतर देशा प्रमाणे आपल्याकडेही निवडणूका या सोशल मिडीया वर लढवल्या जात आहेत! सांगायचा उद्देश हाच की बदल हा किती झपाट्याने होत आहे. अजून तिस एक वर्षी ने हे चित्र बदलेल घरातच मोबाईलवर ओटींग करता येईल. अजूनही काही भाग आपल्याकडे दारिद्रय रेषे खाली आहे. ही रेषा मुक्त होईल. सरकार कुणाचेही असो. आज भारतचा शिक्षणाचा टक्का वाढतोय बाहेरच्या देशात शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थीची संख्या झपाट्याने वाढत आहे. आणि याला सरकारी योजनाचे पाठबळ ही आहे. गेल्या चार - पाच वर्षीत सरकारने काही धाडसाने मोठ- मोठे करार केले , गुंतवणूक केली , अंतर्गत गुंतवणूक केली किंवा इथुन पुढे होईल याची फळे येणाऱ्या काही वर्षीत नक्कीच चाकायला मिळतील. त्या अनुषंगाने आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसून येतिल. संध्या भारताला जगात एक विशेष स्थान आहे. हे आपल्या सर्व सरकारच्या धोरणाची मुळ आहेत. हे नाकारता येत नाही. आपल्या देशातील 'लोकशाही' ही इतर देशासाठी मोठी प्रेरणाच आहे. परराष्ट्रीय धोरण आपले वाखण्याजोगे आहे. पर्यावरण , प्रदुषण , प्लास्टिक अशा घटकांनव तोडगा निघेल. दहशतवाद , अंतर्गत नक्षलवाद , शेजारी पाकिस्तान सारखे देश , जम्मू - काश्मीर , आरक्षण अशा मुद्दावर भारत नक्की मात करेल. थोडक्यात भारत हा तरुण अवस्थेत आहे. त्या अनुषंगाने प्रगतीची वाटचाल चालू राहील. अमेरिकेच्या 'न्यू वल्ड वेल्थ' च्या अहवालानुसार भारत जगात सहावा श्रीमंत देश आहे. तो पहिल्या तिन मध्ये नक्कीच आलेला दिसेल. तसेच २०१७ च्या 'विश्व आनंदी अहवाल' यादीत भारताचा क्रमांक १२२ आहे . तो नक्कीच पहिल्या ५० मध्ये येईल. २०५० नंतर विश्व आणि भारताचे वेगळे चिञ पहायला मिळेल.

                  अशा एकंदरीत चांगल्या वातावरणात आपण आहोत. की ज्या देशात गांधी , नेहरु , पटेल , आंबेडकर इ. राष्ट्रपुरुष होऊन गेले. येवढ्या जाती , धर्म , पंत , परंपरा आहेत. तरी आपण सर्व 'एक आहोत'. हेच काय ते आपले यश आहे. हेच आपल्याला २०५० नंतर देखील उपयोगी पडेल आणि त्याच वेळी आपण नक्कीच जगाच नेतृत्व करण्यासाठी पुढे असू .
IMAGE SOURCE:INTERNET 

सौदागर काळे,पंढरपूर

2050 नंतरचे जग आणि विशेषतः भारत कसा असेल! हे हातात नाही पण कसे असायला हवे? हा विचार करणं तरी हातात आहे.

1.ऑलिपींक मध्ये सुवर्णपदक तालिकेत भारत टॉप 5 मध्ये असलेले हवे.

2.देशाचा काश्मिर प्रश्न अहिंसा मार्गाने सुटलेला असायला हवा.

3.गरीबी हटाव ,अच्छे दिन,प्रत्येकी 15 लाख खात्यावर अशा भूलथापांना न भुलवण्याएवढा समाज साक्षर झालेला असावा.

4. अन्न, वस्त्र,निवारा, आरोग्य व शिक्षण या मूलभूत मानवी गरजांच्या समस्यांचा सामना करण्यासाठी जगातील सर्व देश एकत्र दिसायला हवेत.

5. ‎देशाच्या सुरक्षा यंत्रणेवरील खर्च कमी झालेला दिसावा.
IMAGE SOURCE:INTERNET

सचिन पाटील(शब्दवेडा),जळगाव

"अमेरीकन राष्ट्राध्यक्षांचा भारतासोबत मैत्री व्हावी म्हणून म्हसोबाला नवस"
ही बातमी सकाळी सकाळी आणि रात्रीच भेटलेल्या Fuck and forget relationshipची डील झालेल्या भौतिक प्रेयसीच्या कुशीतून बाहेर आलो...
आजही 2015 ते 2020 चा कालखंड आठवला की मनात आनंदाच्या लहरी ऊठतात आणि 1990 च दशकाच्या आठवणी तर जणू स्वर्ग सुखच आहे. पण आज 2050 साली काळ पुरता बदललाय...2020 साली महासत्ताक होण्याच स्वप्न पाहणारा माझा भारत खूप जवळचा वाटला पण मागच्या तीन दशकाच्या प्रवासात भारत महासत्ता झाला पण पूर्णतः नव्या रुपात समोर आला..
 आज गीतेच्या पारायणासाठी आम्ही जपानमध्ये जातो,तर म्हसोबाच्या यात्रेला अमेरीकेत..आपण तंत्रज्ञानात जगाचे बाप झालो पण आपलच तत्वज्ञान मागे सोडून आलो.अमेरीकन महीलामंडळ नऊवारीत भारतात आल आणि शाँर्ट कर्ट घातलेल्या भारतीय महीलांनी त्यांच जोरदार स्वागत केल..आज भौतिक सुखात लोळत असतांना अगदी घरातली देवपुजाही रोबोट करुन घेतोय आणि आई वडीलांचा आशिर्वादही online प्राप्त होतोय.
आज 2050ला देशात काय चाललय,तर भारत जागतिक महासत्ता होऊन दशक ऊलटलय,जगाला क्षणात नष्ट करण्याच बटन पंतप्रधानंच्या हातात आलाय आणि दहा वर्षापूर्वी नेस्तानाबूत झालेल्या केनियाच्या अध्यशांची आत्मा आपल्या पंतप्रधानांच्या अंगात आलीय..जगात सर्वाधीक लोकसंख्या असलेल्या भारताची लोक ही चंद्रावर भाड्याने राहताय आणि नव्याने सांपडलेल्या ग्रहाला देशाचे माजी पंतप्रधान नरेद्र मोदिंच नाव द्याव की स्वर्गीय राहुल गांधीच हा नवा राजकीय वादाने सरकार ब्लाँगच्या चव्हाट्यावर आलाय.मराठा क्रांती मोर्चाने आपल्या मराठा समाजाच्या सर्व टेक्नाँलाजी ब्लाक करुन सरकारला कोंडीत धरलय तर एका 22 वर्षीय तरुणावर होय तरुणावर झालेल्या बलात्काराने दिल्ली धगधगतेय. मुंबई हवाई कारच्या प्रदुषणाने धारावी ऊच्च वर्गीय मध्यम श्रीमंत बेरोजगारांनी रोजगार उपलब्धीचे मानवी कार्य मिळणार आहे.
2050 च्या युगात भारतासोबत विश्वाचा विचार केला तर भारतीय संस्कृतीच्या अस्तित्वाचे हुबेहुब दालन ऊभे केलेय,दक्षिण आफ्रिकेतील भव्य गीता मंदिराची पायाभरणी झालीय तर दुसरीकडे पाकिस्तानने महासत्ताक भारताला घाबरत युनोच्या माध्यमातून स्वताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषीत केलय.भारत महासत्ता झाला पण आपली संस्कृती-साहीत्य-कला-संगीतचा लोप करुन गेला असा खेद युनोने व्यक्त केला.
खरतर नवे ते हवे असल तरी जुने ते सोने याचा विसर जणू भारताला झालाय.2050 चा भारत आणि विश्व हा प्रवास भौतिक प्रगतीचा तर वैचारिक ,सांस्कृतिक अधपतनाचा ठरलाय.एकवेळ पाकीस्तान धर्मनिरपेक्ष होऊ शकतो पण भारतातला अंतर्गत कलह मात्र संपणारा दिसत नाही.
मग हा शब्दवेडा कवि जेव्हा ह्या अंगाने वास्तविकतेचा विचार करतो तेव्हा हेच म्हणावस वाटत.....
2050 च्या भारतात
तंत्रज्ञान वरचढ झालं
पण भारताच्या पंरपरेला
आपल्यांनीच पोखरुन नेल.

घर-संसारात मदतीला
गूगल झाला राजी
पण कुठेतरी हरवुन गेली
गोष्ट सांगणारी आजी

फेसबूक,whats app,Insta ने
सार जग जवळ आलं
पण तुमच्या आमच्या ह्दयातल
अंतर मात्र वाढत गेल...

आध्यात्म ,संस्कार आणि संस्कृती
विसरुन सारी पाळमूळ
तंत्रज्ञानाचा जग आलं फसवं
असच काहीस असेल
2050 चा भारत आणि विश्व,
IMAGE SOURCE:INTERNET

सानप बालाजी,बीड

          2050 साली भारत एक भारत एक महासत्ता झालेला असेल,
पण सध्या भारताची जी एक ओळख आहे ती भारत विसरलेला असेल ती ओळख म्हणजे संपूर्ण जगाची *अध्यात्मिक राजधानी*.
सध्या भारतीय स्त्रिया आणि पुरुष पाश्चिमात्य लोकांचे अनुसरण करण्यात लागलेले आहेत,त्याचेच प्रकट रूप (विस्तारित रूप) आपल्याला येत्या काळात दिसेल असे मला वाटते. याचे उत्तम उदाहरण पहायचे झाल्यास ते खालील प्रमाणे आहे,
           1)सध्याची परिस्थिती पाहता *अमेरिकेच्या 70% विद्यापीठामध्ये भगवद्गीता शिकवली जाते* त्याउलट भारतामध्ये तसा प्रयोग होऊ लागला तर सरकारवर टीका होते.
          2)देश विदेशातील लोक भारतामध्ये आल्यावर किंवा त्यांच्या देशामध्ये धोती-कुर्ता, साडी इत्यादी भारतीय गोष्टींचे अनुकरण करत आहेत याची कितीतरी उदाहरणे माझ्याकडे आहेत, त्याउलट भारतामध्ये भारतीय नागरिक जीन्स, मिनी स्कर्ट, आणखी कशाचा कशाचा वाफर होऊ लागला.
          (इतकंच नव्हे तर माझ्या एका मित्राच्या कॉलेजमध्ये *be a professional* या ब्रीदवाक्याखाली विद्यार्थ्यांना भर वर्षभर विशेषतः संपूर्ण उन्हाळ्यात सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 पर्यंत *ब्लेझर* नावाचा प्रकार घालून दिवसभर घामामध्ये भिजत राहावं लागत आहे. मग ते ब्लेझरच वतातवरण भारतीयांना पोषक असो किंवा नको फक्त आणि फक्त पाच्छात्यांचे अनुकरण.)
          (आणि जे भारतीय लोक धोती, कुर्ता, पायजमा, नेहरू शर्ट, साडी इत्यादी घालतात त्यांच्याकडे वेगळ्या(तुच्छतेने) पाहणारेही काही नग भारतात आहेत)
          3)विदेशात आयुर्वेदावर रिसर्च चालू आहेत, आपण आपल्याच पूर्वजांच्या रिसर्च ला विसरून नको त्याच्या नादी लागत आहोत.
          भारत 2050 साली महासत्ता होणार यात तिळमात्रही शंका नाही पण,
माझ्यामते भारत आपली जुनी आणि खरी ओळख न विसरता व तंत्रज्ञानाच्या मदतीने 2050 साली जगातील 1 नंबरचा देश व्हावा अशी इच्छा.
IMAGE SOURCE:INTERNET

समीर सरागे,नेर,जि. यवतमाळ

आज आपला भारत देश विकसनशील देश , व्यापारी आणि औद्योगिक आणि कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु ईथुन 50 वर्षा नंतर भारत देशाची ओळख सर्वात लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखल्या जाणार आहे., कारण लोकसंख्याच्या बाबतीत भारत येत्या काळात चीन ला देखील मागे टाकेल , तेव्हा भारताची लोकसंख्या 160 कोटीच्या वर पोहोचलेली असेल

 वाढत्या लोकसंख्ये मुळे लिंग अनुपात बिघड़ला आहे. उत्तर प्रदेश बिहार आणि दक्षिण भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. 2017 मध्ये भारताची लोकसंख्या 119 कोटी 80 लाख नोंदविल्या गेली होती तर येणाऱ्या सन 2026 पर्यंत भारताची लोकसंख्या ही 38 कोटीने वाढेल

 ताज्या आकंड़ेवारि नुसार भारताची लोकसंख्या 130 करोड़ आहे ती सन 2050 पर्यंत 165 करोड़ ईतकी होईल व चिनची लोकसंख्या तो पर्यंत 142 करोड़ वर स्थिर होऊन जाईल.
लोकसंख्या ही जरी कोणत्याही देशाची ताकत असली तरीही तिचे राष्ट्रला नुकसान देखिल तेवढेच आहे. म्हणून चीनने कोणत्याच दबावाची पर्वा न करता एक परिवार एक मूल हा कायदा अमलात आनला. परंतु आपल्या देशात देशहितार्थ असे काही करण्याचा प्रयत्न झाला तर संविधान धोक्यात किंवा अमक्या अमकयाच्या धार्मिकते वर गदा अशे बालिश प्रश्न काही वचाळवीर बुद्धिजीवी आणि पुरोग़ाम्या कडून सतत होत राहील तेव्हा भारतात सद्या तरी हा कायदा नितांत गरज असून देखील होऊ शकत नाही.

भारताचे नेमके इथेच चुकले अन्‌ त्याचेही ‘परिणाम’ जगासमोर आहेत... जग-7.6 बिलियन, चीन 1,415,196, 638 आणि भारत 1,354,463,160.... युनायटेड स्टेट्‌स, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान, नायझेरिया, बांगलादेश, रशिया, जपान... हे लोकसंख्येच्या दृष्टीने पहिल्या दहात मोडणारे देश संख्येत तुलनेने खूप मागे आहेत. आजघडीला भारताची लोकसंख्या चीनच्या तुलनेत जराशी कमी वाटत असली, तरी लोकसंख्या ‘वाढी’च्या दरातील तफावत मात्र भारताला चीनची संख्या पार करायला पुढची काहीच वर्षे लागणार असल्याचे दर्शवते. त्यांच्या 0.39 च्या तुलनेत भारताचा 1.59 चा लोकसंख्या दरवाढीचा दर त्याच धोक्याची घंटा वाजवतोय्‌. वाढीचा घसरत चाललेला दर आणि प्रत्यक्षातील घटती लोकसंख्या, तरुणांच्या कमी होत चाललेल्या संख्येमुळे ‘म्हातार्‍यांचा देश’ ठरण्याची उद्भवलेली परिस्थिती, त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरते आहे. तर नेमकी त्याच्या उलट परिस्थिती भारताची आहे. हे खरे आहे की, गेल्या काही वर्षांत, वाढत्या महागाईमुळे म्हणा, कमालीच्या स्पर्धेमुळे म्हणा, की बदललेल्या परिस्थितीमुळे म्हणा, पण ‘एक दाम्पत्य-एक मूल’ असे सूत्र तर खुद्द नागरिकांनीच स्वीकारून टाकले आहे, सरकारच्या कुठल्याही बंधनाशिवाय! त्याचा स्वाभाविक परिणामही सर्वदूर दिसतो आहे. पण, तरीही हे नियंत्रण आणि त्यावरचे उपाय ही देशहितासाठीची ‘काळाची गरज’ न उरता काही लोकांच्या भावनिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचा भाग झाल्यानेही काही प्रश्न इथे उद्भवले आहेत.


 जगाच्या तुलनेत भारत देशाचा विचार केल्यास दर वर्षी भारताची लोकसंख्या ही ऑस्ट्रेलिया देश निर्माण करते.

तसेच वाढत्या लोकसंख्ये बरोबर भूख , गरीबी आणि महगाई ची समस्या देखील यक्षप्रश्न निर्माण करेल.

 एवढ़या मोठ्या वेगाने जर लोकसंख्या वाढत राहिली तर भारतातील नैसर्गिक संसाधन अपूरे पडतिल आजच आपल्याला पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवत आहे.तसेच दिवसें दिवस अन्न धान्याची उधभवनारी कमतरता ही महत्वाची समस्या असेल.कारण तेव्हा शेती करण्या करिता पाहिजे तितकी जमीन उपलब्ध नसणार. आजच्या घडिला इतकी वाहनांची संख्या वाढली आहे की, आत्ताच आपल्या महानगर आणि शहरातील रस्ते जाम झाले आहेत. ट्रैफिक हे चालत नाही तर रांगत असलेले आपल्याला दिसून येईल. इतकी वाहतूक कोंडी आहे. 2050 पर्यंत पेट्रोल - डीजल सारखे इंधनाचे स्त्रोत समपुष्टात येईल व त्यांची जागा इलेक्ट्रिक वाहने घेतिल, परंतु हे झाले परिवर्तन परंतु या सोबतच मानुष्याचा मृत्यदरात वाढ होईल.

 तसेच पेट्रोल डीजल ची वाहने समाप्त होऊन त्यांची जागा मेट्रो आणि विजेवर चालणाऱ्या गाड्या घेतिल ज्यामुळे प्रदूषण तर होणार नाही उलट त्या पर्यावरणाला खुप पूरक असेल. भारतातील शिक्षण व्यवस्था तोपर्यंत इतकी बदललेली असेल की, पुस्तक आणि विषयां एवजी एनिमेशन द्वारे पाठ्यक्रम शिकविल्या जाईल. आज सर्वाना इंटरनेट चे जसे वेड आहे तसेच वेड तेव्हाही असेल. त्यावेळी प्रत्येक जन डिजिटल वर्क करेल व तेव्हा चांगल्या चांगल्या तकनीक विकसित होईल जी आपल्याला उपयोगा करिता अत्यंत लाभदायक असेल.

2050 पर्यंत सरकारी नौकरी लागने फार दुरापस्त होऊन जाईल कारण एका आकडेवारी नुसार तेव्हा केवळ 15% लोकच सरकारी नौकरी करु शकतील बाकी लोकाना प्रायव्हेट जॉब करावा लागेल.

 सन 2050 ची जगातील बाकी राष्ट्रानी आता पासुनच तैयारी केली आहे. चीन , अमेरिका, यूएई आणि यूरोप सारख्या देशानी तर , प्रदूषण , ऊर्जा , वाहतूक ,ईंधन या करिता पर्याय शोधने सुरु केले आहे. व यावर काम देखील सुरु आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे यूएई सरकार ने तेथील कच्चा तेलाच्या विहिरी येणाऱ्या काळात संपनार आहेत असे जाहिर केले आहे.याचा अर्थ त्यांनी इतर देशाशी उदारमत वादी आणि आर्थिक धोरनात कमालीचे बदल केले आहेत. या कट्टर धार्मिक देशाने पर्यटन विकसावर लक्ष केंद्रित केले आहे म्हणून तेथील हुक़ूमशाह अब्दुल रेहमान शेख यांनी त्यांचे कट्टर धार्मिक कायदे शिथिल केलेले आहे. तीथे महिलांना वाहन चलविन्याचा परवाना नुकताच देण्यात आला तसेच महिलांना फुटबॉल सामने पाहण्याची परवानगी नुकतीच देण्यात आली आहे जी या पूर्वी नव्हती. तीथे भगवान श्री.कृष्णाचे भव्य मंदिर , बुर्ज खलीफा पेक्षा ही आकर्षक व ऊंच टॉवर उभे केले जाणार आहे. ज्या मुळे त्यांच्या पर्यटन व्यवसायात अधिक भर पडेल. व इतरही प्रकल्प राबविल्या जात आहे.

भारताने देखील अश्या प्रकारचे भविष्यतिल धोके लक्षात घेऊन यावर काम करणे गरजेचे आहे.
*=========================*

गळाभेट... 2019 ची चाचपणी की आताच्या सरकारची सत्त्वपरीक्षा.

गळाभेट... 2019 ची चाचपणी की आताच्या सरकारची सत्त्वपरीक्षा.

     (Source : Internet )
अर्जुन (नाना) रामहरी गोडगे
सिरसाव ता. परंडा जि. उस्मानाबाद

          परवा जो अविश्वास ठराव संसदेत मांडला त्यावेळी विरोधला सुद्दा माहीत होते की आपण तो जिकणार नाही, पण त्यांनी मोठ्या विश्वासने भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यास ते यशस्वी झाले. अविश्वास ठरवावेळी पालकांवर 326 विरुद्ध  126 असे आकडे झळकल्यानंतर मोदी सरकारला यकिंचित धोका नाही असे सिद्द झाले. सर्व मोजमाप आकडयात करणे चुकीचे ठरते. काही वेळा अविश्वास ठराव सरकारला एक पाऊल मागे घेयला, खिंडीत धरायला मदत करते. ह्या अविश्वास ठरावाने मोदी सरकारचे हात बळकट केले हे म्हणणे म्हणजे बावळटपणाचे ठरेल. हा अविश्वास ठराव 27 वा होता.  मोरारजी देसाई व अटलबिहारी वाजपेयी वगळता,अविश्वास ठरावाचा कोणत्याही सरकारवर परिणाम झाला नाही. आकड्यांमध्ये हरणार हे त्यांनाही माहीत असते. पण भारतीय लोकशाही मधील ते एक आयुध आहे त्याच्यातुन विरोधाच्या हातात काही गोष्टी गवसतात. राहुल गांधी बोलायला उभे राहिल्यावर हेटाळणीच्या स्वरांत 'हिंदी मध्ये बोला', 'पप्पू' , 'अब भूकंप अनेवाला है'  अशी विषशने लावून भाजपा खासदारानी जी टर उठवली ती पूर्वनियोजित कारस्थान वाटतं होत . यावेळी मात्र राहुल गांधी काहीही हातात न घेता 35 मिनिटाचे भाषण दिलं . त्यामध्ये अमित शाह च्या मुलाचा घोटाळा , राफेल घोटाळा त्यामुळे हमेशा राहुल गांधींवर हषणार्या भाजपा खासदाराचे चेहरे लाल झाले.  
           काय होत या भाषणात कोणताही कागद हातात नव्हता, आकडेवारी गणित नव्हते , सर्वसामान्य ला कळेल अशी भाषा होती. राफेल असो वा अमित शाह पुत्रावरील आरोप वा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा प्रत्येकावर दोन तीन वाक्यच बोलले पण ते बोलणं शैलीदार होते. त्यालाच भाजपाचा झालेला कडवा विरोध यात रोमँटिक गाण्याला संगीत दिल्यासारखं वाटतं होतं. यावेळी भाषण झाल्यानंतर राहुल गांधी नी मोदीला मारलेली मिठी .. याला काही जण "जादूची झप्पी "असेही म्हणाले पण असे काहीही नव्हते. या मिठीचा अर्थ सरळ होता . मोदीजी कॉग्रेसप्रेनित लोकांचा जो तिरस्कार करत आहात तो करू नये.तुम्ही नेहमी कॉग्रेसची नफरत करत असता, तुम्ही माझा तिरस्कार करत असता. माझ्याविषयीं नकारात्मक राजकारण सोडून द्यावे. तुमि आजपर्यत भाजपा वतीने छुप्या पदतीने राष्ट्रीय स्वयसेवक संघ, बजिरंग दल, विश्व हिंदू संगठना या संगठना पाठबळ देता समाजामध्ये तेढ निर्माण करता , हे समाजविघातक आहे, ही असली कुटील कारस्थाने सोडून घ्या असे त्यांना सागव्याचे आहे.  तुह्मी गांधी चा नेहरू चा जो अनादर करता ते चुकीचे आहे. कॉग्रेस हा अहिंसावादी पक्ष आहे.  भाषणाच्या शेवटी त्यांनी मोदीला त्यांनी मिठी मारली , डोळा मारुन त्यांनी सर्व कामावर पाणी फिरवले अशी टीका होऊ लागली.
         गळाभेट वर ज्या पदतीने टीका झाली ती पूर्ण चुकीची आहे. आजपर्यंत मोदीने किती जणांना गळाभेटी दिल्या त्या पूर्ण चुकीच्या मनव्या लागतील. राजकारणात "आपलं तो बाबू दुसऱ्याच ते कार्ट" अशी प्रवृत्ती बळावली आहे. मोदी बराक बराक आशी हाक मारली होती की. 2014 मध्ये तर मोदीने किती जणांना मिट्टया मारल्या होत्या त्या सर्व चुकीच्या मानणे बरोबर नाही.  भाजपच्या द्वेषाचा राजकारनाला कॉग्रेसने प्रेमाने दिलेले उत्तर आहे. त्यावर मोदीही बोलले 2014 मध्ये मोदीला साऱ्या देशाने मिठी मारली ह्याला आज अक्कल आली आहे. असं बोलणं चुकीच आहे . या सर्व प्रकारात राहुल गांधी यांनी केलेलं आरोप योग्य होते हे भाजपा खासदाराच्या लालबुंद वागण्यावरुन दिसून येते. बाकी 2019 ची निवडणूक भाजपासाठी सोपी राहिलेली नाही, मागच्या वेळीचा "पप्पू ब्रँड" या वेळी काम करण असे वाटत नाही. राजकारण हा प्रतिमांचा खेळ आहे हे मोदीने जाणले आहे,संसदेच्या पायरीवर डोकं ठेवणं ,स्वतःला सेवक म्हणणे आता जनतेला चकवणे सर्व काही झाले आहे. ह्या डाव आता राहुल गांधी खेळले तर ते पूर्ण चुकीचे म्हणने बरोबर नाही. "नौटंकी का जबाब नौटंकी से" एवढेच राहुल गांधी यांनी केले, पप्पू ब्रँड मोदी विकू शकत नाहीत दाखवून हे अविश्वास प्रस्ताव आणून.  ह्या सर्वात मध्ये मोदी शाह जोडी यांना वाटतं असलेल्या "सदैव अजिंक्य" या प्रतिमेला तडा देण्यास राहुल गांधी काही प्रमाणात यशस्वी झाले. पण ही गळाभेट निश्चितचं मोदी सरकारची सत्वपरीक्षा असणार आहे... सर्वात  महत्त्वाचे म्हणजे मोदी हे चरूर राजकारणी आहेत. पण राहुल गांधी ही हुशार होत असल्याची झलक त्यांनी दाखवून दिली.


   (Source : Internet )
ज्ञानेश्वर तात्या टिंगरे
उस्मानाबाद.
मो.९७६७१७८०५२

मध्यंतरी काही कारणांनी ग्रुपवर कार्यरत राहता आलं नाही त्याबद्दल अगोदर सर्वांची माफी मागतो..🙏

मोदी सरकारच्या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने चर्चेसाठी एक विषय एडमीन टीम ने निवडला त्याबद्दल त्यांचे आभार ,कारण की या निमित्ताने लेखकाच्या मनातील राजकीय पैलूंवर प्रकाश पडेल व त्याचा इतरांना फायदा होईल असा त्यामागचा हेतू असेल, असो...

अविश्वास ठरावाच्या निमित्ताने जे काही घडले ते काही नवीन नव्हते.. सारा देश लोकशाहीच्या दरबारातील खेळ उभ्या डोळ्याने पहात होता, ज्यांना जे दिसलं त्यांनी ते मांडलं किंवा व्यक्त केलं. मला जे वाटलं ते मी खालील मुद्यांच्या आधारे लिहिण्याचा प्रयत्न करत आहे..

१. ज्यांना वाटलं की गळाभेट हि आपुलकीची किंवा माणुसकीची कृती होती त्यांनी संसदीय लोकशाही मध्ये वावरताना घातलेल्या नियमाकडे दुर्लक्ष केले आ7हे हे दिसून येते , स्पीकर नि त्याचवेळी सांगितले होते की He is not Narendra Modi, He is a Prime minister. पण याकडे सर्वानी दुर्लक्ष केलं.

२. गळाभेट घेणं हे वाईट नाही पण एका विशिष्ट हेतूने ते करणं आणि नंतर डोळा मारणं ह्याचा अर्थ सुज्ञ माणसांना सांगायची गरज नाही. मोदींनी बाहेर कोणालाही गळाभेट घेतली असेल तो देशाच्या रणनीतीचा भाग असतो त्याचा संबंध इथे जोडणं म्हणजे चुकीचे ठरेल.

३. काँग्रेसचे युवराज राहुल गांधींनी केलेलं भाषणं त्यांच्यातील राजकीय सुप्त गुणांची होत असलेल्या वाढीचे निदर्शक आहे पण त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण पण डोळ्यात अंजन घालणारे होते हे पण विसरता कामा नये.. ( आता सदस्यांच्या गोंधळात कोणाला ऐकायची इच्छा झाली नसेल तो भाग वेगळा ).

४. ज्या राजकीय पंडितांनी छातीठोकपणे सांगितले की इथुन पुढे मोदी सरकार सत्तेवर येणार नाही अशा सर्वांची बोलती आपल्या कार्याने बंद करून सुध्दा काही महाभाग अजूनही मोदींबद्दल गैरसमज पसरवत असतील तर त्यांची किव येते.

५. ज्या मोदींनी हिंदुत्ववादी संघटनांना हाताशी धरून द्वेष पसरवला तो कमी करावा ह्या हेतूने राहुल गांधी यांनी मिठी मारली असा युक्तिवाद जे करत आहेत त्यांना एकच सांगावेसे वाटते की या देशात द्वेषाची बीजे कोणी रोवली याचा इतिहास पहा.

६. मोदी सरकारची सत्त्वपरीक्षा आहे ती पुढील काळात, गेली कित्येक वर्षे ज्यांनी उभं आयुष्य एकमेकांना शत्रू समजून वागणूक दिली व सत्ता भोगली असे सत्तापिपासू लोक एकत्र आले म्हटल्यावर थोडे कष्ट घ्यावे लागतील.

७. थापा मारण्याचा प्रकार देश स्वतंत्र झाला तेव्हापासून सुरू आहे ( गरिबी हटाव ) तो आजपर्यंत लोकांना पचला देखील फक्त मोदींना बदनाम करून त्यांना आपल्या सारखेच दाखवून देण्याचा प्रयत्न चालू आहे..

मुद्दे भरपूर आहेत फक्त शब्द मर्यादा येतात त्यामुळे थांबतो.

जय हिंद..

   (Source : Internet )

शिरीष उमरे नवी मुंबई

एक सत्य त्यांचे, ज्यांना गळाभेट वाटते २०१९ ची चाचपणी !

दुसरे सत्य त्यांचे, ज्यांना गळाभेट वाटते आताच्या सरकारची सत्वपरिक्षा !! 

असे कीतीतरी प्रकाराचे, रंगाचे, ढंगाचे सत्य !!!!!!!!!

त्यातच एक सत्य हे की गळाभेट झाली याची जाणीव नसणारे भारतिय नागरिक जे पिढ्यांपिढ्या आपल्या कुटुंबाच्या प्राथमिक गरजांचा डोंगर सकाळपासुन संंध्याकाळपासुन राबराब राबुन हलवुन क्षणात रात्री उपाशी पोटी झोपी जाणारे .... ते नागरिक ज्यांना त्यांच्या हक्कांची माहीती नाही.... आणि ते, ज्यांना आपल्यावर अन्याय होतोय ह्याची जाणीव नाही... ते सुध्दा, ज्यांना आपले शोषण व वापर होत आहे हे कळत नाही... 

हे जळजळीत सत्य ज्यांना उमजत नाही, बोचत नाही, कळत नाही, समजवुन घ्यायचे नाही, हृदयात दुखत नाही अश्या कणखर, लोकशाहीचे मुखवटे लावणारे, वेगवेगळे रंगाचे झेंडे नाचवणारे, वेगवेगळ्या धर्माच्या अफुच्या गोळ्या बनवणारे, विकणारे, खाणारे,  विकृतीला राजमान्यता मिळवुन देणारे व ती मानणारे समस्त उच्चशिक्षीत भारतीय नागरिकांना माझा 🙏🏼🇮🇳


   (Source : Internet )

प्रविण, मुंबई

अविश्वासाचा ठराव हा सत्ताधारी पक्षासाठी खूपच महत्वाचा होता, जरी त्यांच्याकडे संख्याबळ होत तरीही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण रास्त होत. हा ठराव राहुल गांधी च्या भाषणाने गाजण्यापेक्षा त्यांच्या “बचाकाना” गळाभेटीने गाजला. मोदींच भाषण हे नेहमी प्रमाणे प्रभावी होत पण अर्ध सत्य सांगून असत्याला सत्य दाखवण्याचा एक यशस्वी प्रयत्न. हा प्रयत्न यशस्वी होता कारण बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांनी गळाभेटी ला पहिल प्राधान्य दिल जेणेकरून राहुल गांधींच्या आक्रमक भाषणावरून सर्व वाहिन्यांनी गळाभेटीवर आपले कॅमेरे फिरवले. त्यामुळे लोकांपर्यंत यावेळीही पूर्ण सत्य पोहचल नाही.
काही ठराविक मुद्द्यावर मला प्रकाश टाकायचा आहे.
पूर्ण भाषण हे फक्त भावनांचा “जुमला” होता. सतत “१२५ करोड जनाताने ....” अस म्हणून चेंडू जनतेच्या कोर्टात टोलवायाचा हे मोदिनी गेल्या चार वर्षात अनेकदा केलाय.
या भाषणात सुद्धा कॉंग्रेस चा इतिहास काढलाच. जेव्हा वर्तमान रिकामा असतो तेव्हा इतिहासात डोक खुपसाव लागत.
राफाल करार, शेतकऱ्यांच वाढीव उत्पन्न, १८००० घरात पोहोचलेली वीज, UGC मधले बदल यावर जे काही मोदी बोलले ते किती विश्वासाहर्त होते हे त्यानंच ठावूक.
२०१४ नंतर वाढलेला जातीवाद ह्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही पण तरीही मोदिनी जो जातीविरहित राजकारण चा केलेला दावा केविलवाणा होता.
मुळात मोदी सरकार आणि त्यांचे मेडियातले विकाऊ आणि सामान्य जनातेतले भोले भक्त त्यांच्या चुका मान्य करत नाही. हे पुन्हा एकदा दिसून आल.

आता ही गळाभेट पुढच्या निवडणुकांची चाचपणी असेल का? कदाचित असेल कारण यावेळी कॉंग्रेसला आणि इतर विरोधक पक्षांना “राफेल” चे खाद्य मिळाले आहे. असाच खाद्य “बोफोर्स” नावाने याच कॉंग्रेस विरुद्ध वापरलं गेल होत. कदाचित त्याचीच पुनारावृत्ती असेल आता. आणि बीजेपी कडे नेहमीचे राम मंदिर, हिंदू-मुसलमान आणि हल्लीचे भिडतंत्र असेल. पण तरीही NDA ची बाजू बळकट वाटते कारण “चेहरा” महत्वाचा आहे, जो NDA ने “मोदींच्या” रुपात दिलाय आणि कॉंग्रेस.....
शेवटी एकाच म्हणेन देशाचे मूळ मुद्दे बाजूलाच राहतील आणि जनता सुद्धा या मात्तबर पक्षांनी उठवलेल्या मुद्द्याला आपला मानून आंधळेपणाने मतदान करील.


   (Source : Internet )

*R. सागर, सांगली*
.
परवा संसदेत विद्यमान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झाला. अपेक्षेप्रमाणे तो बहुमताने फेटाळला गेला. सत्ताधारी NDA कडे असणारं संख्याबळ बघता हे अपेक्षितच होतं. त्यामुळं सरकारची सत्त्वपरीक्षा वगैरे गोष्ट इथे कुठेच जाणवली नाही. पण त्याचवेळी अविश्वास प्रस्तावापेक्षा चर्चा झाली ती राहुल गांधी-नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीचीच..
.
एक प्रकारे ही 2019ची चाचपणीच होती असं म्हणायला हरकत नाही. गेल्या काही वर्षात राहुल गांधींबद्दल जी पप्पूची प्रतिमा निर्माण केली जाते आहे त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मिळालेली ही एक संधी होती. अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यानच्या आपल्या भाषणात विविध मुद्द्यांना स्पर्श करून त्यांनी ती संधी बऱ्याच प्रमाणात साधायचा प्रयत्नही केला. पण दुधात मिठाचा खडा पडावा तसं त्यांच्या गळाभेटीनंतरच्या डोळा मारण्याच्या कृतीतून घडलं. आणि याच गोष्टीची ढाल करून आपल्या सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या मुद्द्यांना मुद्देसूद उत्तरं न देताच त्यांच्यावर टीका करण्यात धन्यता मानली.
.
तरीही यातून एक गोष्ट निश्चित झाली. अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान इतर अनेक पक्षातील नेत्यांनी आपापल्या भाषणातून सरकारवर टीका केलेली असतानाही मोदींनी आपला जास्तीत जास्त वेळ हा राहूल आणि काँग्रेसवर टीका करण्यातच घालवला. याचाच अर्थ असा होतो की विरोधक जी महाआघाडी करायचा प्रयत्न करत आहेत त्या महाआघाडीचं नेतृत्व राहूल गांधींनी करावं असं भले विरोधकांना वाटत नसलं तरी राहूल आणि काँग्रेस हेच आपले 2019 साठीचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत हे मोदींनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मान्य केलंय.

गुरुपौर्णिमा: समृद्ध अशी एक भारताची परंपरा

गुरुपौर्णिमा: समृद्ध अशी एक भारताची परंपरा

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

गुरुपौर्णिमा: समृद्ध अशी एक भारताची परंपरा

Source: INTERNET
-शिरीष उमरे
नवी मुंबई

जगातील पहीले विद्यापीठ व दहा हजार वर्षाचा गुरुकुल शिक्षण पध्दतीची गौरवशाली परंपरा असुनही आजकाल भारतीय इतिहासात डोकावण्याची भीती वाटायला लागली आहे.
राक्षसांच्या गुरुंनी आपला शिष्य बळीराज्याला वाचवण्यासाठी गमावलेला डोळ्याची कीमंत कशी मोजणार ?
एकलव्याचे गुरु वाचले तर काळजाला चर्रे पडतात....
शिवाजी महाराजांच्या खर्या खोट्या गुरुंच्या याद्या वाचल्या की हसावे की रडावे हे कळत नाही !!
ह्याउलट भारत रत्न भीमसेन जोशींच्या कीत्येक गुरुंवर्णनात  भावविभोर होतो आपण....
आता तर ट्युशन व युनिवर्सीटी संस्कृती त गुरु हा शब्द च अयोग्य वाटतो...
पण उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्याने मला आठवुन गेले माझे सगळे गुरु ज्यांनी निस्वार्थपणे मला घडवण्यात कष्ट घेतले.  रामा गुरुजी म्हणजे माझ्यासाठी शिक्षण क्षेत्रातले गाडगे महाराज 🙏🏼 त्यानंतर मंत्रमुग्ध होऊन सातवीत जागतिक पातळीवरचे शिकणे असे अमृतशिंपण करणारे आखरे सर, स्वत:चा आदर्श समोर ठेवुन जगण्याचा मार्ग दाखवणारे वैद्य सर, गणित सुलभ करणारे रानडे सर व इंग्रजीला सोपे करणारे अब्राहम सर ह्या सगळ्यांना साष्टांग नमस्कार ...
त्यानंतर ही व्यावसायीक जीवनाच्या अडीच दशकांमध्ये भेटलेल्या सगळ्या गुरुंच्या आठवणींनी मन उंचबळुन येत आहे. ह्या सगळ्यांना माझ्याकडुन असलेल्या अपेक्षापुर्तीची जाणीव आहे मला.  कृतज्ञता व्यक्त करुन प्रयत्नशील राहण्याचा वसा सोडुन लेखणी थांबवतो आता 🙏🏼


Source: INTERNET
-अर्जुन दत्तात्रय बर्गे
  अहमदनगर

आज गुरू पौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस।।आपल्या गुरुबद्दल आपण शब्दात पण ऋण कितीही व्यक्त केले तरी नाही व्यक्त करू शकत।।। ज्या व्यक्तीमुळे आपण घडलो त्यात आई वाडीलानंतर कोणाचा सिहाचा वाटा असेल तर ते आपले गुरू असतात।।।
आतापर्यंत इतिहासात रामायण महाभारतापासून गुरू संबंध येतो याना सगळ्यांना घडवण्यात गुरूचा वाटा आहे।।जस महाभारतात अर्जुननाला घडवण्यात द्रोणाचारय्या चा वाटा आहे।।।कर्णाला घडवण्यात परशुरामाचा वाटा उचलला।।होता हे महायोध्ये घडवले गेले कारण त्यात त्यांना घडवणारे हे त्यांचे गुरू त्यांच्या सोबत होते होते।।।
आणि आजही आपल्याला बाहेरच्या जगतात जगायच कस हे शिकवणारे आपले शिक्षक असतात।।माझ्या साठी प्रत्येक व्यक्ती ही गुरू। कारण येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती मला काहीतरी शिकून गेलाय।।।आपण प्रत्येकाकडून कळत नकळत आपण काहीतरी शिकत असतो।।।
हा देश घडवण्यात शिक्षक काचा वाटा असतो।।।कारण आज ही बाल हे उद्याचे तरुण पिढी हे देशाचे भविष्य आहे।।।शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असतो।।।।
आज कोणताही व्यक्ती घेतला तरी त्याने मागे वळून बघितलं तर शिक्षकांनी लहानपणी जे बाळकडू पाजलेत त्याची नक्की आठवण
झाल्याशिवाय राहणार नाही।।
शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नसतो तर पुस्तकी ज्ञान देता देता आपल्याला जगण्याची कला शिकऊन जात असतात।।।।
राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल.

परत एकदा मला घडवणाऱ्या शिक्षकांचे मनापासून आभार
🙏🙏🙏😊


Source: INTERNET
-अनिल गोडबोले
सोलापूर

भारतात सुमारे 3500 वर्षापासून गुरू पौर्णिमा साजरी केली जाते अस म्हणतात.
महर्षी व्यास यांच्या जन्मतिथी नुसार ही गुरू पौर्णिमा साजरी केली जाते, असे म्हणतात.
भारतात हिंदू धर्म नुसार गुरू हा देवपेक्षा श्रेष्ठ मानला जातो.
मोक्ष मिळवण्यासाठी तसेच वाईट प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी गुरुची गरज असते असे हिंदू मानतात..
गुरू कोण?..
जो एखाद्या व्यक्तीला गुणाने आणि रूपाने(कर्तृत्वाने)उजळून टाकण्यासाठी मदत करतो तो गुरू.. अस माझ्या वाचनात आलेलं आहे.
आताचे शिक्षक, क्लास टिचर, प्राध्यापक, प्रशिक्षक, कोच, बॉस सगळ्यांना आपण गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो..
सगळ्या परिस्थितीत आपल्या मागे खंबीर असलेल्या व्यक्ती, मित्र.. मानणारे, आधार देणारे हे आपले गुरू असू शकतात..
आपल्याकडे व्यक्ती पूजक परंपरा आहे त्यामुळे ही परंपरा अजूनही चालू आहे.
बुद्धिस्ट परंपरे नुसार सारनाथ इथे बुद्धांनी आज च्या दिवशी पासून *बुद्धधम्म संघीनी* सुरू करून उपदेश सुरू केला होता. वर्षावास मध्ये ते एके ठिकाणी राहत असत. त्यामुळे बुद्ध परंपरे मध्ये देखील गुरू पौर्णिमा आहे.
आजचे पैसे घेऊन पुस्तक शिकवणारे गुरू या प्रकारात येतात का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
आई आणि वडील देखील गुरू स्थानी असू शकतात(असतातच असा दावा केला नाही कारण.. ती देखील माणसे आहेत, चुकू शकतात)
पण आपला जन्म आणि अस्तित्व यासाठी हे झगडत असतात त्यामुळे ते गुरू आहेतच..
बुवा आणि बाबा ... हे अध्यात्मिक गुरू आहेत, त्यांना गुरू का म्हणायच? हा वेगळा प्रश्न
लोक आज देवळात जातात.. पण गुरू तर देवा पेक्षा श्रेष्ठ आहे ना.. मग तो देवळात सापडतो का?
गुरूला आपण शुभेच्छा द्यायच्या की वंदन करायचे?.. आपण तेवढ्या योग्यतेचे असतो का?..
चेष्टा उडवणारे मेसेजेस गुरूचा अपमान नाही का? ही तर परंपरा नाही आपली!
जो आपल्याला काही न काही न काही शिकवतो तो गुरू या तत्वात बसणाऱ्या सगळयांना आपण गुरू म्हणायला तयार आहोत का?
द्रोणाचार्य अर्जुनाच्या विरुद्ध लढले होते.. पण देवाच्या सपोर्ट मुळे हरले होते.. अस आपण ऐकतो, वाचतो... मग गुरू श्रेष्ठ की देव??
खूपच प्रश्न झाले..
चांगल्या गोष्टी पुढे नेणें, आदर देणे,  नम्र होईन ज्ञान घेणे, सत्याची कास धरणे आणि संघर्ष करताना मार्गदर्शन करणे आणि जमेल तेवढा आधार देणे या गोष्टी गुरूच्या कर्त्यव्यात येतात.. अस मला वाटत..
आणि या गोष्टी करणाऱ्या व्यक्तीला गुरू म्हणतात अस मला वाटत..
माझ्या आयुष्यात अशा पद्धतीने भेटलेल्या सर्व व्यक्तींना मनापासून वंदन..
चांगल्या गोष्टी पुढे नेणें आपले कर्तव्य आहे.


Source: INTERNET
- नवनाथ कुसुम राजाभाऊ जाधव
तांदुळवाडी जि. परभणी 9421269723

गुरुपौर्णिमा हा दिवस मुलत: बौद्ध परंपरेशी संबंधीत आहे. तथागत बुद्धांना वैशाख पौर्णिमेला बोधी प्राप्त झाली. बोधी प्राप्त झाल्यानंतर तो संदेश इतरांना सांगायचा की नाही, याबद्दल त्यांच्या मनात संदेह होता, त्यांचे मन द्विधा अवस्थेत होते, पण नंतर धम्माचे ज्ञान इतरांना सांगायचे या निर्णयापर्यंत ते पोचले आणि आपल्या पाच सहकाऱ्यांना धम्माचा पहिला उपदेश केला. ज्यादिवशी त्यांनी धम्माचा पहिला उपदेश केला तो दिवस म्हणजे आषाढी पौर्णिमा होय. त्या दिवसापासून या पौर्णिमेला ‘गुरुपौर्णिमा’ असे संबोधले जाते. त्या दृष्टीने ही परंपरा समृद्ध आहे. बुद्धांनी जन्माने नव्हे तर ज्ञानाने मनुष्याचे श्रेष्ठत्व ठरते, असे प्रतिपादन केले. त्यामूळेच नाभिक समाजातील उपालीला बौद्ध धम्मातील महत्त्वाचा मानला गेलेला ‘विनयपिटक’ हा ग्रंथ अधिकृत करण्याचा अधिकार मिळतो.
दुसऱ्या बाजूला गुरुपरंपरेची वाटचाल विषमताधिष्टित असल्याचे दिसून येते. एकलव्याचा शिक्षणाचा अधिकार केवळ जन्मावरुन नाकारण्यात येतो. जो द्रोण हा अधिकार नाकारतो, तोच गुरुचा हक्क सांगून त्याचा अंगठा कापून घेतो. हे त्याच्या नसलेल्या गुरुत्वाला कलंकीत करणारं आहे.
‘गुरु तो सकळासी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहिन ।
तरी तयासीच शरण, अनन्यभावे असावे ।।
या जन्मावर आधारीत गुरुपरंपरेचाही एक काळाकुटृ इतिहास आहे. शिवाय या गुरुपरंपरेत गुरुला विलक्षण महत्त्व देण्यात आल्याचे पाहवयास मिळते. याच अहंगंडांतून शिवाजी महाराजांच्या गुरुपदी अनैतिहासीक अनेक गुरु बसवून त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे श्रेय लाटण्याचे विकृत प्रयत्न करण्यात आले. या परंपरेमूळेच संत तुकारामांनी बाजारबुणग्या गुरुपरंपरेवर हल्ले चढवले. याबाबतीतले त्यांचे अनेक अभंग आहेत. स्वत: ते पांडुरंगालाच गुरु मानतात.
‘माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु’ किंवा ‘तुका म्हणे वाट दावूनी सद्गुरू, राहिला हा दुरू पांडुरंग’
अशाप्रकारचे अनेक अभंग आहेत.
गुरुकूलात जन्माने शुद्र असणाऱ्यांना प्रवेश दिला जात नव्हता. हे लांछनास्पद आहे. या परंपरेचा आपल्याला अभिमान बाळगता येणार नाही. हे निश्चित.
गुरुचं महत्त्व आहे, ते समतेवर आधारलेलं असावं, कोणत्याही प्रकारचा दुजाभाव नसावा. आजच्या काळातही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता गुरुंनी आपलं योगदान द्यावं.
मला माझ्या आयुष्यात उभं राहण्यासाठी घडवणाऱ्या आई-वडिल सर्व गुरु यांना नमन करुन थांबतो.


Source: INTERNET
-नवनीता (शैलेश भोकरे)
आळंदी (दे), जि. पुणे
8805881583

तुम्ही आर्थिक, सामाजिक, वैचारिक, भौतिक वा आणखी कोणत्याही प्रकारची असेल ती प्रगती करता.. पण एक विशेष लक्षात असू द्या, एक देवमाणूस असा आहे जीवनात की ज्याच्या हातभारामुळेच तुम्ही जे काही आहात ते आहात.  एका आत्मज्ञानी, शरीराने वृध्द पण अंतरमनाने तरुण महात्म्याने वागावं तसं तो तुमच्याकडून, तुमच्यामागे कवडीचीही अपेक्षा ठेवत नाही; इर्षा, द्वेष हे म्हणजे काय? याबद्दलही तो अनभिज्ञ, म्हणजेच बोली भाषेत आपण ज्याला जळणं म्हणातो आजकाल, ते देखील या बहाद्दराला कोणत्या झाडाला येतं ठाऊक नाही.
कधीकधी वाटतं कृष्णाने गीता अर्जुनाला नव्हे यांनाच सांगितली असावी. तो श्लोक सर्वपरिचित आहेच की... कर्मण्ये वाधिकरस्त्ये...
अर्थही माहितीच आहे की आपल्याला,
पण एक सांगू? ही व्यक्ती आणि ह्याच्या सारखे अनेक,
खऱ्या अर्थाने तो अर्थ जगत असतात, आयुष्यभर आणि कदाचित त्यानंतरही....
अपेक्षा म्हणून काहीच नसतात तुमच्याकडून त्यांच्या.
वेळ मिळाला तर नजरेच्या पल्याड पाहण्याचा प्रयत्न करा,
तुम्हाला आढळेल तो भरून आलेला ऊर.
तुम्हाला पाहून ओसंडलेला पुर,
आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात न गवसलेला सुर!
वेडा असतो हा माणूस खरंच. आयुष्यभर झाडं लावतो पण फळं त्याला खायचीच नसतात. त्या फळांना परत तो उर्जित पाहून आणखी पेरतो आणि जंगलात भर घालत राहतो. नेत्रसुख त्याला मात्र आवडतं....
त्याचं नकळत ध्येयच असतंय ते. तुम्ही त्याला माझं हे पुराण ऐकवलंत तर तो हेही म्हणेल की, काहीही लिहिलंय. मी माझं काम करतोय, त्यात काही विशेष नाही.
पण त्यांना मग तुम्ही, त्यांच्या आयुष्यातल्या अशाच एका देवमाणसाबद्दल विचारा, मग पहा ते कसे नतमस्तक होतील, माझे शब्द त्यांना खऱ्याने कळतील आणि वळतीलही...
असा हा देवमाणूस जीव ओतून रोपटी लावत असतो आयुष्यभर, त्याला फळाची चव आवडायला तो खातंही नाही कधी.
त्याचा अत्यानंद कशात समावलाय माहितीये?
खालील वाक्य उच्चारणात... जेव्हा तो दुनियेला ओरडून सांगतो...

*तो, तो पहा माझा विद्यार्थी!*


Source: INTERNET
-अमोल धावडे
अहमदनगर
9604389472

*॥गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर
गुरु साक्षात् परब्रह्म, तैस्मय: श्री गुरुवे नमः॥*
गुरुपौर्णिमा- गुरू म्हणजे तरी काय आपल्याला ज्या व्यक्तीमुळे ज्ञान प्राप्त होते. आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. वर्षभरामध्ये ज्या काही पौर्णिमा येतात त्यामध्ये आषढ महिन्यात जी पौर्णिमा येते त्या दिवशी आपण गुरू प्रती असणारा आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करतो. आपला गुरू हा महान असतो त्याचा आदर त्याच दिवशी नसून आपण तो रोज  व्यक्त करायला हवा.
हिंदु धर्मांत महर्षी व्यास आदय गुरु समजले जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते असे मानले जाते. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. म्हणुनच गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.
आपल्या गुरूना आपण देवाचा दर्जा दयला हवा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थपना केली त्यांनीही आपल्या गुरुस्थानी रामदास स्वामी यांना ठेवले होती व त्यानं गुरू मानत असे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्याने आपल्या गुरूला गुरुदक्षिणा देण्याची प्रथा आहे. गुरुदक्षिणा म्हणजे आपण मोबदला किंवा बक्षीस समजतो परंतु जे गुरूकडून आपल्याला ज्ञान मिळते त्या ज्ञानाचा उपयोग करून समजसाठी आपण काहीतरी केले पाहिजे तेव्हा आपण आपल्या गुरुचे समाधान केले असे म्हणायला हरकत नाही.
लहणपणापासून आपले वेगवेगळे गुरू असतात आपला जन्म झाला तेव्हा आपले आई-वडील हे गुरू असतात कारण आपण त्यांच्या बोटाला धरून चालायला शिकतो. पुढील जीवनात आपले शिक्षक व सर त्यानंतर नोकरीच्या ठिकाणी आपले बॉस हे आपले गुरू असतात कारण या व्यक्तींकडून आपण नवीन काहीतरी शिकत असतो व त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला होत असतो. गुरू शिष्य ही परंपरा ही पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे.  अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य–द्रोणाचार्य, आगरकर–गांधी, सचिन तेंडुलकर–रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणं देता येतील.
गुरू शिष्यला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य मार्ग दाखवतो परंतू आजच्या स्थितीमध्ये योग्य गुरू न मिळाल्याने  लोक भोंदूबाबा, बुआलोग यांच्या आहारी जातात.
गुरू शिष्याचे नाते हे प्रेमळ असायला हवे. गुरू हा नेहेमी आपल्या शिष्याचे कसे चांगले होईल याचा विचार करतो. गुरू शिष्यबद्दल कधीही वाईट विचार करत नाही.

*या जीवनात मला जगायला शिकवल,*
*लढायला शिकवल*
*अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे*...
*असेच माझ्या पाठीशी उभे रहा*...
*माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे,*
*मग तो लहान असो वा मोठा,*
*मी प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकल आहे..*
*अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून नमस्कार.!*
*प्रत्येकाच्या जीवनात एकतरी गुरू असतो माझ्या जीवनातील सर्व गुरूंना सादर प्रणाम.

Source: INTERNET
-प्राची सोनवणे
अहमदनगर

वेळोवेळी या विषयावर अनेकजण व्यक्त होत असतात आणि गुरूंविषयी आपल्या भावना व्यक्त करतात.. खरंच किती सुंदर संकल्पना आहे ना गुरुशिष्यांची.. एखादी अनुभवसंपन्न व्यक्ती आपल्याकडे असलेलं अनमोल ज्ञान निःस्वार्थपणे पुढल्या पिढीला देते अन तितक्याच विश्वासाने ती पिढी ज्ञान ग्रहण करते .. अशा या देवाणघेवाणीतूनच गुरू शिष्याचं नातं दृढ होत जातं..
म्हणजे ना, आपल्या आयुष्यात विशेष असा एखादा व्यक्तीच कधीच गुरू नसतो.. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नकळत आपल्याला काहीतरी देऊन जाते..
आपले हे गुरू ना आपल्याला अचूक हेरतात आणि आपल्यातल्या उणिवा भरुन काढण्याचं काम करतात.. याचं एक सुंदर उदाहरण माझ्याकडे आहे.. शाळेत असताना मी वर्गात उत्तरं द्यायला घाबरते हे माझ्या वर्गशिक्षिकांनी अचूक हेरलं होतं.. जाणून बुजून त्या मला उभं करायच्या अन मला उत्तरं सांगायला लावायच्या.. बरं एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर मी दुसरीत असताना त्यांनी मला वक्तृत्त्व स्पर्धेत भाग घ्यायला लावला अन माझ्याकडून तयारी देखील करवून घेतली.. त्या स्पर्धेत मी जिंकणारच होते कारण माझ्या गुरूंनी माझी तयारी करून घेतली होती.. तोही दिवस होता गुरू पौर्णिमेचा अन मी गुरूशिष्य परंपरेची महती सांगणारी शिष्य कल्याणची गोष्ट सांगितली होती.. मी स्पर्धा जिंकल्याचं ऐकून माझ्या बाईंच्या डोळ्यात पाणी आलं होतं हे मी आजही विसरू शकत नाहीये..
त्यांनतर जीवनात अनेक गुरू भेटत गेले परंतु त्या बाईंची जागा कोणीच घेऊ शकलं नाही.. अन आजदेखील ती जागा रिकामीच आहे..
माटी से मूरत गढ़े, सद्गुरु फूंके प्राण।
कर अपूर्ण को पूर्ण गुरु, भव से देता त्राण।।
आजच्या काळात जरी डिजिटल गुरू असले तरी गुरूंचा उद्देश मात्र एकच आहे आणि तो म्हणजे ज्ञान दान करणे.. तेव्हा आयुष्यातील सर्व लहानमोठ्या गुरूंना त्रिवार वंदन..


Source: INTERNET
रविराज आकौसकर लातूर ..

खरंच आपला भारत अशा सुंदर  खूप रुढी आणिग परंपरेने नटलेला आहे .त्यातली एक परंपरा म्हणजे गुरुपौर्णिमा.
आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती देणारी व्यक्ती म्हणजे गुरु.त्याच गुरु च्या शिक्षणाची परतफेड आपण गुरुदक्षिणा देऊन करतो .
गुरुपौर्णिमेला आपण त्यांना वंदन करतो. त्यांचा आपल्यावर असलेला आशीर्वाद अनुभवतो..हाच तो दिवस जेव्हा आपण पूर्णपणे गुरु ला शरण जातो त्यांना खरी गुरुदक्षिणा देतो.
म्हणून तर शिष्य आणि गुरु यांचं नातं सर्वश्रेष्ठ मानलं जातं.
गुरु आहे तर सर्व ठीक आहे असा आपला विश्वास आहे .
या सर्व परंपरेमुळे बाहेर देश सुध्दा आपल्या देशांकडे आकर्षित झाला आहे .हे जग आपले अनुकरण करू लागले  आहे ..आपण खूप समरूध्ह होत चाललो आहोत.


Source: INTERNET
-यशवंती होनमाने
मोहोळ

     गुरूपूर्णिमा ,काय महत्व असेल हो याच ???गुरुपौर्णिमा म्हणजे असा एक दिवस की ज्या दिवशी आपण आपल्या गुरुजनांना वंदन करतो,त्यांचे पूजन करतो पण मला एक प्रश्न नेहमी पडतो की गुरु कोणाला म्हणायचे ???ज्यांनी आपल्याला विद्या दिली ते की ज्यांनी शिकवले  ते ??? आत्ता तुम्हाला वाटेल की यात काय फरक आहे दोन्ही पण एकच की.नाही फरक आहे की विद्या म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान आणि शिकवले म्हणजे जगायला,ज्ञाना चा उपयोग करायला,जग समजून घ्यायला.
     जीवन जगत असताना आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही गुरु च असते कारण ती आपल्याला काही ना काही तरी शिकवत च असते.आपण आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार करतो पण व.पु.च्या तू भ्रमत आहसी वाया या कादम्बरी मध्ये सांगितले की जो व्यक्ती आपल्याला त्रास देतो त्यालाच गुरु माना.त्यामुळेच आपल्याला जग कसे आहे ते कळते.म्हणून आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली गुरूच असते.ती आपल्याला नेहमीच काही ना काही तरी शिकविते.
       अशा सगळ्या गुरु ना माझे नेहमीच वंदन असेल.

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************