कोरोना: वाढती बेरोजगारी व नैराश्य. (भाग-3/3)


अनिल गोडबोले,सोलापूर

लॉक डाउन, नवीन स्ट्रेन, वाढत जाणारे संसर्गाचे आकडे, लोकांचे होणारे मृत्यू आणि लसीचे राजकारण या गोष्टी एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला व्यापार, काम, पैसा करिअर, संधी  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशा.. या बाबतीत उदासीनता येत आहे.


लोक जगले तर व्यापार होईल असं सरकार म्हणत आहे व्यापारी म्हणतात की "कोरोना येईल जाईल पण जी मंदी येईल त्यात कोणीही राहणार नाहीत"


खर काय आणि खोट काय..! काहीच कळत नाही


यामुळे येत आहे प्रचंड निराशा त्याच्या पाठोपाठ येत आहे उदासीनता..  वाढत जाणारे आत्महत्येचे आकडे..


तरुणांच्या देशात तरुण मानसिक दुर्बल होणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे..


पण सर्व मित्रांनो आणि मैत्रिणींनो .. आज आपल्याकडे लढण्याशिवाय पर्याय नाही. सरकारला किंवा कोणालाही दोष देत बसलात तर नुकसान जास्त होईल..


काळ कठीण आहे खरा... पण संघर्ष करणे आपल्या हातात आहे.. अजिबात निराश न होता.. मानवी मेंदूने विचार करा.. मानवतेच्या भावनेने विचार करा.. 


आपण नक्की जिंकू .. हा आत्मविश्वास बाळगण्याची गरज जास्त आहे..


राजकारणी ,मीडिया, व्यवस्था यांचे पूर्णपणे धिंडवडे निघाले आहेत.. न्यायव्यवस्था तोकडी आहे.. 


आपण आपला मार्ग शोधावा, 'मला असच जगायचं आहे..!'हा हट्ट सोडून नवीन कौशल्य, नवीन ज्ञान, नवीन काम शोधावे..


जीवन अमूल्य आहे.. ते जाणून घेऊन आपण आपला बचाव करणं आणि पुढे जाण आपल्या हातात आहे.. 


स्वतःला संसर्ग होऊ देणार नाही.. माझ्यामुळे संसर्ग वाढू देणार नाही.. एवढी काळजी घेऊन आजचा काळ आपण काढला तरी येणाऱ्या काळात आपण नक्कीच पुढील जीवन जगू शकतो...


हारा वही जो लढा नहीं.. एवढंच लक्षात ठेवा आणि निराशेतून बाहेर या... दुसर्यानाही मदत करा.. मानवतेचाच विजय होईल याची खात्री मला आहे.


सौरव दुर्गेकार,अमरावती

गात जेव्हा जेव्हा मोठी संकटे आली होती तेव्हा तेव्हा जुन्या गोष्टी लयास जावून नव्या गोष्टी उदयास आल्या. निसर्गाचा नियमच आहे, “फक्त मजबूत असणारच जगेल (survival of thefittest)”. ज्यांनी काळाशी जुळवून घेतल ते टिकणार ज्यांनी बदल स्वीकारला नाही त्यांना निसर्गाने स्वीकारलं नाही. जर डायनासोर सारखे महाकाय प्राण्यांवर जर वाईट दिवस आलेच नसते तर लहान प्राणी आणि आपण तयार होऊन पृथ्वीवर नसतोच दिसलो.


माझ्या घराजवळील उदाहरण सांगतो,"अनंता दादा जो गेली 5 वर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता त्याने कोरोना आल्यावर आपल्याला नोकरी मिळणार नाही हे समजताच गुरांच्या पौष्टिक खाद्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला, त्यात यश मिळवून आज त्याने स्वतःच पक्क घर पण बांधलं. जर कोरोना आलाच नसता तर त्याला समजलच नष्ट की रोजगाराचे अन्य मार्ग पण आहेत. त्याने आमच्या गावाची गरज ओळखली की गावात हे हे उपलब्ध नाही हे उपलब्ध करून देवू...”

 

नैराश्य, त्याच्यासाठी ज्याने आलेल्या संकटाला आपला शेवट समजला, पुनर्जन्म, ज्याच्यासाठी ज्याने संकटाला सामोरे जाण्याची तयारी दाखवून नवीन संधी निर्माण करून संधीच सोनं केलं त्यांच्यासाठी.


बेरोजगारी नक्कीच वाढली. माझा मामा, ज्याच एक उपहारगृह आहे, पूर्वी त्याच्याकडे कामाला 13 माणसे होती, तेच कोरोणा नंतर 5, माणसांना द्यावा लागणारा पगार कमी झाल्याने कमाई खूप वाढली. जी पाच उरली आहे त्यांना चांगला पगार आहेच पण ज्यांना काम सोडावं लागलं त्यांच्या पोटावर पाय. मामा आणि असेच अनेक उद्योजक, दुकानदार तरी काय करणार, आता जास्त लोकांची गरज नाही म्हणून त्यांना काढावच लागेल. 


जे काही होत ते चांगल्यासाठीच होत, या दृष्टीने बघितलं तर सगळ्यांना अशक्य वाटणारं ऑनलाइन शिक्षण या कोरोनाने आणून दाखवील, या क्षेत्रात जुन्या नोकऱ्या गायब करून नवीन नोकऱ्या आल्या. शाळेचं उदाहरण बघितल तर, घंटा वाजविणाऱ्या मामाच्या जागी आता एसएमएस वर remainder पाठवणे हे एक काम आलं, साफसफाई करणे याच्या जागी फाईल्स आणि व्हिडिओ जंक काढून व्यवस्थित बॅकअप तयार करणे, म्हणजे आताचं सफाईच काम बनलं. असच सगळ्या कामा कडे बघता येईल. 


तरुण नेहमी शोक व्यक्त करायचे की जुने लोक नोकरीवरून. निघणार नाही तर आम्ही नोकरी करणार कोठे? घ्या तुमचं काही काम कोरोना ने करून टाकलं. नवीन जगाला लागणारे नवीन कौशल्य शिका, नाहीतर काही खर नाही ब्वा….


संगीता देशमुख,वसमत

कोरोना हा आजार किती वास्तव आहे,हे माहीत नाही,परंतु त्याच्या आधारावर देशात जे राजकारण सुरू झालंय ते मात्र अत्यंत जीवघेणे आहे. आज आजूबाजूला परिस्थिती एवढी भयावह झाली की,आता जिवंत राहण्यासाठी माणूस धडपडतोय.कोरोना हा आजार किती वास्तव आहे,हे माहीत नाही,परंतु त्याच्या आधारावर देशात जे राजकारण सुरू झालंय ते मात्र अत्यंत जीवघेणे आहे. आज आजूबाजूला परिस्थिती एवढी भयावह झाली की,आता जिवंत राहण्यासाठी माणूस धडपडतोय.

       वास्तव हे आहे की,मागील काही वर्षांपासून देशात नोकरभरतीच नाही.वाढती लोकसंख्या आणि शासनाची उदासीनता पहाता आजचे शिक्षण हे वांझोटे झाले आहे. त्यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल,याची शाश्वती आजचे शिक्षण देऊ शकत नाही. समाज माध्यमातून तरुणांना अनेक सल्ले देण्यात येवू लागले की,नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय शोधा. मग तरुणाई काहीतरी व्यवसाय शोधात फिरू लागले. तरुणाई इतकी गोंधळलेली की,कोणता व्यवसाय सुरू करायचे म्हटले तर पुरेसे भांडवल नाही, भांडवल जमा केले तर त्याची शाश्वती नाही.सरकार उठसुठ हे विक,ते विक सुरू आहे. त्यातूनही अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,ज्यांच्या टिकल्या ते अर्ध्यावर आले. यात कहर म्हणजे, कोरोनाचे जागतिक संकट!  तरुणांची होती नव्हती आशा या कोरोनाने हिरावून घेतली. तरुणांचे स्वप्न पहाता पहाता कोसळलीत. तरुण नैराश्याच्या खाईत इतके कोसळले की,तरुणांच्या आत्महत्या वेगाने वाढल्या. ते मानसिक रुग्ण होण्याचीही प्रमाण प्रचंड वाढले. तरुणांचीच बेरोजगारी हा प्रश्न नाही तर,अनेक कमावते हात याकाळात घरात लॉकडावून झाले. घरातील पोटे लॉकडावून झालीत. देशात अशी अवस्था असताना आजही सरकार लक्ष न देता निवडणुका,राजकारण यालाच प्राधान्य देत आहे. देशातील वाढती बेरोजगारी,जनतेची हतबलता,नैराश्य,हे सगळे जाणीवपूर्वक जनतेपासून लपवून जनतेची दिशाभूल केली जात आहे.

कोरोनाच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद!ऑनलाइन शिक्षण हा फक्त दिखावा ठरला. सामान्य पर्यंत एकही दिवसाचे शिक्षण पोहोचलेच नाही. कारण अजूनही अशा अनेक लोकांकडे स्मार्ट फोन नाहीत आणि काहीजणांकडे आहेत त्यांच्याकडे तेवढा डेटा नाही.अनंत अडचणीतून देश जात आहे. देशात उत्तम शिक्षण(स्वावलंबी बनवेल असे) आणि प्रत्येकाच्या हाताला काम कसे मिळेल, याचे नियोजन शासनाने करायला हवे,अन्यथा देशात तरुणांचे नैराश्य व त्यातून होणाऱ्या आत्महत्या हा कोरोनापेक्षाही भयानक समस्येला देशाला सामोरे जावे लागेल. कोणत्याही सरकारचे आजची तरुणाई हे प्राधान्य असायला हवे. आज  कोरोनापेक्षाही सवंग राजकारणामुळे देशाची अवस्था आतून पोखरलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************