अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-२)

🌱 वि४🌿या व्हाट्सअप ग्रुपवरून

अस्तिकता की नास्तिकता… नेमकी कशाची गरज आहे अपल्याला?? (भाग:-२)


Source:- INTERNET
-अक्षय पतंगे,
आ. बाळापूर,
जि. हिंगोली

    वेद, धर्मसूत्रांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य मानणे म्हणजे आस्तिक. वेद,धर्मसूत्रांची भीती न बाळगता चिकीत्सा करणे म्हणजे नास्तिकता.
            अजून तरी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य,शिक्षण या आपल्या मुलभूत गरजा. असं तर नाही की, कुणी आस्तिक आहे म्हणून तो अन्नाशिवाय राहू शकतो आणि नास्तिक आहे म्हणून निवाऱ्या शिवाय राहू शकतो. मला वाटतं आस्तिक, नास्तिक असणं ही प्रत्येकाच्या स्वतंत्र विचारसरणीवर अवलंबून असतं.
          कट्टरतावाद संपवून अभय निर्माण करणं, शोषणापासून मुक्ती, गरिबी संपवणे, प्रत्येकास शुद्ध पाणी, तरुणांना रोजगार, zero hunger, Freedom of choice यांची गरज आहे.

         सत्य स्वीकारून मानवी कल्याणासाठी निरपेक्ष प्रयत्न करणं महत्वाचं वाटतं. डोळस वृत्ती ठेवून मानवी व्यवहार करणं हे आस्तिक, नास्तिक यापेक्षा चार पाऊल पुढेचं असेलं.  उदा. केरळच्या १.८४ लक्ष विद्यार्थ्यांना टिसीवर ना जातीचा उल्लेख केला, ना धर्माचा यामुळे ना तणाव, ना विद्वेष, ना दंगली.



Source:- INTERNET
-विशाल सातपुते,
 पंढरपूर

अस्तिक किंवा नास्तिक असणं हा त्या व्यक्तीचा दोष नसून त्याच्या जीवनातील विचारांचा किंवा अनुभवाचा सार आहे. मी स्वतः देव मानत नाही परंतु ,तूम्ही देव मानू नका  असे सांगण्याचा आधिकार मला नाही.कारण देव मानने किंवा नाही मानने हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. आज आपण विज्ञानवादी युगात देव असणं हे स्विकारू शकत नाही. आणि   देवाचे असणं हे नाकारूही शकत नाही.कारण ,काही गोष्टींना आपण वैज्ञानिक कारणे देऊ शकतो परंतु काही गोष्टींना आपण वैज्ञानिक कारणे देऊ शकत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर मी वयाच्या 19 व्या वर्षी पूणे ते पंढरपूर असा वारीचा चालत प्रवास केला. परंतु मला चालत असताना कसलाही ञास जाणवला नाही याचा अर्थ देवाने मला चालण्याची क्षमता दिली असा होत नाही, तर मी माझी स्वतःची काळजी घेतल्यामुळे ते शक्य झाले ,असे मी मानतो.याउलट मी पंढरपूरला पोहोचल्यावर मंदिरात गेलो नाही, जर देव खरंच असता तर त्याने माझे वाईट  करायला हवे होते ,उलट त्यावर्षीचा उत्कृष्ट विद्यार्थी वारकरी म्हणून माझा महाविद्यालयात सन्मान करण्यात आला. सांगण्याचा मुद्दा असा आहे की ,देव मानने किंवा नाही ही वैयक्तिक संकल्पना असू शकते. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. आठवलं म्हणून सांगतो, डिसेंबर 2015 मध्ये माझी स्वतःची लहान बहीण आजारी होती,ती स्वतःशीच बडबड करत असे.मधूनच काही वेळ घट्ट डोळे मिटून बसत असे.गावातील तसेच पंढरपूरमधील नामांकित डाॅक्टर चे असे मत होते की , तिचा मेंदूचा प्राॅब्लेम असून उपचाराअंती तो पूढील पाच ते सहा महिन्यात बरा होऊ शकतो. सर्व पर्याय जवळजवळ संपले  होते.अशावेळी आमची आजी तिला पाहण्यासाठी घरी आली होती. बोलता बोलता तिने देवाचा विषय काढला, तसा मी सर्वांना रागाने बोललो, एवढे डाॅक्टर उपचार करून थकले, आता देव तिला नीट करणार. परंतु आम्ही खेडेगावात राहात असल्यामुळे मी काॅलेजला गेल्यावर आईने त्या बाईला बोलवून देवाविषयी काही असेल तर सांगा अशी विनंती केली , त्यानुसार त्या बाईने सांगितले की , तुमच्या कुळदैवताची मंगळवारी पूजा करून ही सर्व परीस्थिती तूम्ही पूर्ववत करू शकता. योगायोगाने दूसर्या दिवशीच मंगळवार होता. सांगितल्याप्रमाणे सर्व पूजा वगैरे करून झाली , आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जी माझी लहान बहीण गेले 10-12 दिवस अंथरुणावर पडून होती, ती पुढच्या दिवशी बुधवारी स्वतः सर्व गोष्टी आवरून शाळेत गेली होती आणि ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी आपण विज्ञानवादी देवाचे अस्तित्व नाकारू शकत नाही. मान्य आहे की, देवाचा आणि तिच्या आजारी  असण्याचा काही संबंध नसेलही परंतु देवानेच मला ठिक केले ही तिची वेडी समजूत आजही कायम आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की, देव माझ्या पाठीशी आहे, या एकाच आशेवर आज लाखो लोक आपले अस्तित्व टिकवून असतील तर आपण त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. परंतु स्वतःच्या कर्मामुळं/ आळशी जीवनामूळे काही लोक दारिद्र्याकडे वळतात. अशावेळी ते देवाला दोष देतात. देवानेच माझे वाईट केले असे सांगतात. ते देव मानत नाहीत. मग त्यांना नास्तिक म्हणायचं का ? हाही प्रश्न आहेच. काही दिवसांपूर्वी नितिन भानगूडे पाटिल यांच्या भाषणातील एक वाक्य खूप छान वाटलं, ते असे की , तूम्ही स्वतःच तूमचे जीवन चांगले किंवा वाईट घडवू शकता . तूमचे चांगले किंवा वाईट करण्याचा अधिकार हा तूम्हाला स्वतःलाच आहे. कोणताही देव तूम्हाला कष्टाविणा फळ देणारच नाही, कष्टाला पर्याय नाही.  आज देशात हजारो वेगवेगळ्या प्रकारची देवस्थाने आहेत. एकीकडे मंदिरात लोक हजारो रुपये दान करून येतात परंतु घरी असलेले आई-बाप कधी अर्धपोटी तर कधी उपाशी झोपतात, याची त्यांना जाणीव नाही. आज अनेक अनाथाश्रम, वृध्दाश्रम याची वाढ होत आहे.आजच्या काळात लोक मंदिरात दान करू शकतात परंतु आई -वडिलांना दोन वेळच जेवण देऊ शकत नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. जर देवच सर्व विश्वाचा निर्माता असेल तर त्याला दान देण्याइतके आपण मोठे आहोत का ? यावरही विचार व्हायला हवा. डाॅ.शाम मानव यांनी आपल्या एका मूलाखतीत असे सांगतात की जर देवाला नवस करून मूले होत असतील तर लग्न करण्याची गरजच काय? शेवटी जाता जाता एवढेच सांगतो की, आपल्या वाड-वडिलांनी परंपरागत ज्या देवाची जोपासना केली त्या देवावर ठेवायची असेलच तर श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा कदापि नको. कारण तूमची अंधश्रद्धा ही एखादा जीव नष्ट करू शकते.                                     तात्पर्य: -आज नास्तिकता मनाशी बाळगून परंपरागत अस्तिकताही जपणे ही काळाची गरज आहे.



Source:- INTERNET
-संजय साळुंके,
जळगांव

                आस्तिक म्हणजे देवाला मानणे व नास्तिक म्हणजे देवाला न मानणे. पण देव म्हणजे नेमकं कोण ? मंदिरातील दगडाची मुर्ती ? डोंगरावर विराजमान मुर्ती? तीर्थक्षेत्र ? गंगास्नान ? कुंभमेळयातील साधू ? का कुणी संधीसाधू? नव्हे नव्हे मित्रांनो , रंजले गांजलेले , दुःखी कष्टी , निराधार हुशार विद्यार्थी, अंध पंगू यांच्यात ज्याला देव दिसतो तो आस्तिक , मग तो देवळात जातो की नाही हे गौण ठरते. संत गाडगेबाबा पंढरीच्या वारीला दरवर्षी न चुकता जायचे पण मंदिरात कधीच गेले नाहीत, मात्र वारीत  चंद्रभागेच्या तीरावर दिवस भर स्वच्छता करून रात्री तेथेच अंधश्रद्धा, निरक्षरता, व्यसनाधीनता , जात पात विरोधात कीर्तन करायचे . आमचा देव कोणाला मानायचे यातच खरा गोंधळ होतो. संत तुकाराम महाराजांनी म्हटले , जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा , देव तेथेचि जाणावा। संत एकनाथ महाराज यांनी वाळवंटात तहानेने व्याकुळ गाढवात देव पाहून त्याला तीर्थ पाजून तहान भागवली. शेवटी भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, उघड्या नागड्याना वस्त्रं, गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी मदत, बेघराना निवारा, अंध पंगू रोग्यांना औषधोपचार, बेरोजगारांना रोजगार, पशू पक्षी प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींच्या विवाहासाठी मदत, व दुःखी निराश्यांना हिम्मत देणें म्हणजे आस्तिक , व हे न करता टिळा लावून गळा कापणे म्हणजे नास्तिकता. मंदिरात देव कधीच नसतो , तो असतो गरजूंच्या रूपात जगात सर्वत्र.आपण आपल्या मनाला विचारा आपण आस्तिक आहोत का नास्तिक ? नेमकी कशाची गरज आहे आपल्याला. धन्यवाद.


Source:- INTERNET
- जयंत जाधव,
लातूर

   माझ्या मते,आस्तिक व नास्तिक या संकल्पना किंवा गोष्टी  सामान्य मानसाच्या समजण्या पलीकडंची. ' देव 'ही काही लोकांनी खाजगी मालमत्ता करीन टाकली आहे. प्रत्येक जण देवाजवळ काही मागणी करतो त्यास आस्तिक म्हणणे योग्य नाही तर स्वार्थी  म्हणता येईल.
     देवाला देवळात राहू द्यावे.पण काही स्वार्थी लोकांनी त्याचे ऐवढे बाजारीकरण केले कि देव देवळातून केव्हाच पळून गेले.
      निसर्गातील 'सुपर नॕचरल पॉवर ' सूर्य,चंद्र,पृथ्वी,समुद्र,जल ,अग्नी,वायू इत्यादी गोष्टी माणसाला एक रुपया देखील न घेता कोणताही स्वार्थ न साधता लाखो किंमत असलेल्या गोष्टी अगदी फुकट देतात.पूजा करायची असली तर यांची करा.माणूस फक्त नावाला माणूस आहे.खरी माणूसकी ते दाखवतात.
        शाळेत असताना विज्ञानाचे सर म्हणायचे ,ऊर्जा अक्षय म्हणजे नष्ट होत नाही फक्त एका स्वरुपातून दुसऱ्या स्वरूपात बदलते. मग मी वर उल्लेख केलेल्या जाल,वायु,सूर्य या सुपर नॕचरल पॉवरला जर कोणी देव मानत असेल तर त्यांना नास्तिक म्हणता येणार नाही.या नैसर्गिक शक्तींच्या चांगली शिकवण म्हणजे एकमेकांना न स्वार्थ साधता मदत करणे कोणी शिकत असेल तर त्याला मी आस्तिक म्हणेल.
       तात्पर्य,एखादा माणूस एक तर आस्तिक असू शकतो वा एक तर नास्तिक.माझे वैयक्तिक मत असे आहे की,जिथे माणूसकी जपणा-या गोष्टी घडत असतील तिथे मी आस्तिक पण जिथे माणूसकीला अहितकारक घडत असेल तिथे मी नास्तिक असेल.

Source:- INTERNET
-नवनाथ कुसुम राजाभाऊ जाधव,
परभणी

   आस्तिक नास्तिक संकल्पना या आज जरी देवाशी संबंधित वाटत असल्या तरीही त्या मुलत: तशा नाहीत, त्या वेदांच्या मान्यतेशी संबंधित आहेत, त्या तशा गृहीत धरल्यास नास्तिक असणं आवश्यक आहे,  आजच्या रुढ अर्थाने देवत्वाशी जोडल्यास - 'देव मानायचा की नाही' हा खरा प्रश्न नाही, तर कोणता देव नाकारायचा आणि कोणता देव स्वीकारायचा हा खरा प्रश्न आहे, तर शोषण करणारा देव नाकारायचा जो पुरोहितांचे , भटजींचे (यातला 'जी' मला स्वत:ला मान्य नाही) हितसंबंध जपतो आणी रंजल्या, गांजल्यांना नडतो आणि शोषण न करणारा देव स्वीकारायचा , जो सगळ्या संतांनी सांगीतलेला आहे,             तिसरी एक संकल्पना आहे, आस्तिक म्हणजे सकारत्मकता आणि नास्तिक म्हणजे नकारात्मकता यादृष्टीने Be positive असणं केव्हाही चांगलं, याअर्थाने आस्तिक असावं.


Source:- INTERNET
-सागर राडे,
सांगली

आस्तिकता आणि नास्तिकता.. एकाच नाण्याच्या दोन बाजू. साधारणपणे आस्तिकता म्हणजे देव, आत्मा या किंवा अशाच न पाहिलेल्या गोष्टींचं अस्तित्व मानणे. याउलट नास्तिकता म्हणजे वर उल्लेख केलेल्या गोष्टींचं अस्तित्व नाकारणे. मग असं असेल तर आज आपल्याला यापैकी खरंच कशाची गरज आहे?
थोडेसे ऐतिहासिक संदर्भ देतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापन करत असताना *हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा* ह्या विचारानेच ते नेहमी कार्यरत राहिले. स्वराज्यातील कुठल्याही गड-किल्ल्यावर बघितलं तर तिथे एखादं तरी मंदिर आवश्य दिसेल. कुठलंही महत्वाचं कार्य असेल तर गडावरील देवाचं दर्शन ते घेत असत असे उल्लेख इतिहासात सापडतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ते आस्तिक होते याबाबत कुणाचंच दुमत नसेल.
पण तरीही *हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा* हा विचार घेऊन ते देवाच्या भरवशावर सगळं सोडून कधी स्वस्थ नाही बसले. अफजलखानाची स्वारी असेल, पन्हाळ्याचा वेढा असेल, शाहिस्तेखानाचं आक्रमण असेल किंवा आग्र्याची कैद असेल, ते कधी माझा देव बघून घेईल, तोच मला किंवा स्वराज्याला या संकटातून बाहेर काढेल असं नाही म्हणाले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी पूर्वतयारी केली. त्याप्रमाणे योजना आखल्या आणि स्वतः आघाडीवर राहून त्या संकटांचा सामना केला आणि यश मिळवलं.

तीच गोष्ट कुठल्याही मोहिमेची. आस्तिक लोकांना अमावस्या म्हणजे अशुभ दिवस वाटतो. पण बऱ्याच महत्वाच्या मोहिमा महाराजांनी अमावस्या किंवा त्याच्या आधीच्या रात्री पार पाडल्या. रात्रीच्या अंधाराचा अचूक फायदा घ्यायचा हाच विचार त्यामागे असायचा. हीच गोष्ट आग्र्याहून सुटकेनंतरची. महाराज आग्र्याहून सुखरूप स्वराज्यात दाखल झाले पण शंभूराजे सुरक्षित परत यावेळी म्हणून त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी पसरवली. तेवढ्याने लोकांचा विश्वास बसणार नाही ह्याची जाणीव असल्याने शंभूराजांच्या जिवंतपणीच त्यांचे क्रियाकर्मदेखील केले. समुद्र ओलांडल्याने दैवी कोप होतो ही तत्कालीन प्रचलित समजूत. पण तरीही महाराजांनी स्वतः सिंधुदुर्गाची उभारणी करण्यास सुरुवात केली कारण ह्या समजुतींपेक्षा शत्रूशी लढा देणं आणि त्यासाठी समुद्रावर हुकूमत असणं जास्त गरजेचं आहे हे महाराजांनी जाणलं होतं.
अशा कित्येक उदाहरणांतून महाराजांनी हेच दाखवून दिले की आपण आस्तिक असलो तरी फक्त रूढी-परंपरा म्हणून सगळ्याच गोष्टी पुढे चालवायच्या नसतात. तर त्यामागचा विचार समजून घेत प्रसंगी त्या रूढी-परंपरा झुगारून देण्यातच शहाणपण असतं. आणि त्याने आपल्याला झालाच तर फायदा होईल, नुकसान नक्कीच नाही.
म्हणूनच मी तर म्हणेन की आपल्यालाही आज अशाच आस्तिकतेची गरज आहे जी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी दाखवून दिली.


Source:- INTERNET
-क्षितिज गिरी, सातारा

मुद्दा आस्तिक किंवा नास्तिक चा नाहीच ।आस्तिक किंवा नास्तिक हे विचार बरोबर किंवा चुकीचे असेही आपल्याला म्हणता येणार नाही।दोनीही गोष्टीचे समर्थन होऊ शकते।पण खरा वाद याच्या नंतर सुरु होतो।
          मनापासून देवाची भक्ती करणे त्याला पूजने ।एकाद्यावर दया दाखवणे।ईश्वर आहे या भीतीने का होईना पण पुण्य (आपण कशाला पुण्य म्हणतो हा वादाचा मुद्दा असू शकतो) काम करणे।कोणत्याही नवीन कामात ईश्वर माझ्या बरोबर आहे या सकारात्मत दृष्टीने चालणे म्हणून पण खुप सारी मानसिक शक्ती आपल्याला भेटून जात।इथपर्यंत सर्व व्यवस्तीत चालू असते ।
              भक्ताच्या भोळेपणाचा भीतीचा किंवा कामजोरीचा फायदा घेऊन उघड  पणे त्याची पिळवणूक केली जाते।समाजामध्ये देव धर्म यांचे नाव घेऊ चुकीच्या गोष्टीना समर्थन दिले जाते। वेगवेगळ्या अधध्देला पाठिंबा दिला जातो।देवाच्या व धर्माच्या  नावावर चुकीच्या गोष्टी खपवल्या जातात।हि कथा देवाने किंवा धमग्रथांनी सांगितलि आहे तिचा खरी आहे अशी समजून किंवा भिती घातली जाते।नरकाची किंवा इतर भीती दाखवुन उघड उघड शोषण केले जाते।देवाचे नाव घेऊन आतापर्यंत खुप क्रुर भयानक अत्याचार घडवले गेले आहेत।व आजही घडवले जातात।त्याचे उघड उघड समर्थनही केले जाते।आणि कधी कधी तर अन्यायाला बाली पडणार पण त्याच्यावरील अन्यायाचे समर्थन करतो कारण त्याला त्याची जाणीवच नसते किंवा तो समाजाच्या विरोधान जायला घाबरत किंवा टाळत असतो ।आजही या नावावर कितीतरी निःपाप जीवांचे बाली पडले जातात किंवा मानसिक शोषण केले जात।त्यामुळे नको वाटते हि आस्तिता।पण परत प्रश पडतो यामध्ये सामान्य माणसाचा काय दोष तो तर निरपेक्ष भावनेने भगवंताला शरण गेला आहे।पण परत प्रश पडतो आपल्यावरील व सामाज्यावरील अन्यायाचे सरळपणे पाठींबा देणार्याला आस्तिक म्हणावे का ?
              नास्तिक योग्यआहे तीच बरोबर आहे त्याने सर्व प्रश सुटतील असेही वाटते।पण अशीही माणसे भेटतात ज्याचा देवावर विश्वास नसतो पण इथल्या जातीव्यवस्थेवर असतो।ते देव नाही म्हणून सरळ सरळ दुसऱ्याचे लुबाडून खातात किंवा त्या गोष्टीचे  समर्थन करतात।मग विचारचक्र सुरु होते व वाटायला लागते त्यापेक्षा आस्तिक बारा निदान तो त्याच्या अज्ञानात तरी सुखी आहे।पण काही किंवा बहुतांशी अशी लोक पण भेटतात ती नास्तिक असता आणि माणूसच माणसांचे होणारे शोषण थांबवू शकतो ।कुणीही दुसरा येणार नाही।या विचाराने प्रेरित असतात।आणि मग ते प्रसंगी पूर्ण समाजाचा पण का होईना पण विरोध करून पण आपले विचार ठामपणे मांडतात।आणि ते आमलात येण्यासाठी कृती पण करतात।किंवा देव नाही पण प्रेम दिल्याने प्रेम वाढते या विचाराच करून जेवढे दुसर्याचे व समाजाचे चांगले करता येईल ठेवढे ते करतात।
           कितीतरी आस्तिक लोक देव धर्माच्या नावाने चाललेल्या काळ्या बाजाराला विरोध करतात पण म्हणून ते लगेच नास्तिक होत नाही तर त्याची त्या दिशेने चालू असणारी ती एक वाटचाल असते।मग ती त्याच्या नकळत का होईना पण विद्रोह झालेला असतो ।मागे एक वाक्य माझ्या कानावर आले कुणीतरी म्हणाले सर्व धर्मग्रंथ वाचून मी नास्तिक झालो।त्यामुळे आपले अज्ञान हेच कारण आहे आपण आस्तिक असण्यामागे ।अंतिम सत्य हे नास्तिक कडे वाटचाल करते।पण त्यामुळे आपण अस्तिकतेल विरोध करू शकत नाही तर त्यातील फक्त अधश्रदेला करू शकतो ।व लोकांच्या लक्षात आणून देऊ शकतो देव धर्माच्या नावाने चालू असणारी प्रथा परंपरा कशी चुकीची आहे ते।त्यामुळे लोकांची हळूहळू वाटचाल हि नास्तिकतेकडे होईल त्यांना कळणारही नाही।पण यासाठी कायम करावी लागेल ती समाजजागृती आणि नेहमी प्रमाणे यामध्ये बाली जाईल तो सच्या नास्तिकांचा ।जे आज पर्यंत होत आले आहे तेच पूढे पण होईल।पण अशी समाजजागृती जर झाली नाही तर आपण काळाने खुप मागे खेचले जाऊ हे मात्र नक्की।जसे शिवशाही व पेशवाई मध्ये तफावत आली अगदी तशीच।
      शीमंतांना देव नसला तरी चालेल पण गरिबाला देव लागतो।क्षणा क्षना ला मानसिक शरीरींक संकटांना सामोरे जाणार्याला देव लागतो।कारण तेवढाच एक पर्याय त्याच्या कडे असतो तो हि शेवटचा ।पण याचाच गैर फायदा घेऊन आणखी त्याचे शोषण केले जाते ।होते काय उलटेच।
        आस्तिक माणसाकडे भरपूर प्रश्नांची उत्तरे नसतात किंवा तो त्याची चिकित्सा करत नाही आणि ती शोधण्याचा  प्रयन्त हि करत नाही।किंवा उत्तरे घावली तरी यामध्ये आपला काही फायदा नाही किंवा ते सत्य सीकारण्याची तेवढी हिम्मत नसते किंवा होत नाही।
आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासामध्ये झालेल्या क्रांत्या या रक्तरंजित किंवा लोकशाही मार्गाने झाल्यात त्यामुले थोडा अधिक प्रमाणात का होईना पण न्याय मिळाला ।आजही असाच न्याय मिळवावा लागतो।मग तो लोकशाही मार्गाने आसू किंवा प्रसंगी हुकूमशाही मार्गाने।पण न्याय देण्यासाठी कोणताच देव किंवा कोणीही आले नाही ।हजारो वर्षापासून चालत आलेली भारतातील अन्यायकारी जातीव्यवस्था असो किंवा जगातील स्त्री पुरुष असमानता असो किंवा जगातला काळा गोरा भेदभाव असू किंवा गुलामांचा व्यापार असू ।कितीही क्रूर अन्याय झाला लोखों कोट्यवधी लोक मारले गेले मग ते रोगामुळे असू  किंवा महायुद्धा मूळे किंवा एखाद्या हिंसाचारामध्ये कोणीही आले नाही वाचवायला आणि तसे कोणी येतहि नाही।त्यासाठी जगाच्या इतिहासमध्ये खुप जणांनी निस्वार्थी भावनेने समाजसेवा केली।आणि थोडा जास्त प्रमाणात का होईना पण न्याय मिळून आणला।आपले पूर्ण आयुष्य वेचले ।ते एकच आहे हे माहित असून पण ।पण आपण काय केले आपण फक्त त्यांना दगडांच्या मुर्त्या त्यामध्ये कैद केले।आणि एखांद्या भक्त प्रमाणे त्याचा जयघोष केला।आणि नेमकी त्याच्या विचारांचीच पायमल्ली करून आपण अस्तिकांनकडे वळालो ।मग खपवल्या गेल्या आजही जातात त्याच्या नावाने कोणत्याही गोष्टी।आपण मात्र आंधळे पणाने स्वीकारतो।आणि परत आपल्याला गरज भासू लागते नास्तिकतेची।खरच आपल्याला निस्वारती नास्तिकतेची गरज आहे।तरच आपण एका शोषण मुक्त समाजाची निर्मिती करू शकतो।
          आस्तिक म्हणजे अस्तित्व  मध्ये असणारी गोष्ट जशीच्या तशी स्वीकारणार आणि नास्तिक म्हणजे आस्तिक (अस्तित्वात असणाऱ्या) गोष्टीची चिकित्सा करून चुकीच्या गोष्टीचे समर्थन ना करता मनाला पटणाऱ्या सत्य गोष्ट स्वीकारने ।म्हणजे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करून बरोबर असणाऱ्या गोष्टी स्वीकारने मग त्या गोष्टी समाजाच्या विचारसरणीच्या विरोधात का असेना पण त्या आमलात आणणाऱ्याचा प्रवास आस्तिकते पासून नास्तिकते कडे होतो।


पवन खरात,अंबाजोगाई
जर देव या संकल्पने हि संदर्भ जोडला तर मी नास्तिक आहे,पण जर माणुसकी सोबत संदर्भ जोडला तर मी आस्तिक आहे ।

कारण मी जगात जिवंतपणी आई वडिलांचा छळ करणारे,  दोन वेळेची भाकरी खायला देण्यासाठी सुद्धा काणकुन करणारे  आणि मेल्यानंतर पुण्य मिळण्यासाठी लोकांना गोड जेवण खाऊ घालणारे असे नीच प्रवर्तीचे लोक सुद्धा अगदी जवळून पहिले आहेत.


     "अंगात देव येणे " हे वाक्य आपल्या सर्वांना परिचित आहे आणि विशेष म्हणजे फक्त आणि फक्त भारतातच ऐकायला मिळेल.
जर अंगात देव येऊन खालील प्रश्न सुटणार असतील,

1. एखादया अंथरुणावर पडलेल्या व्यक्तीला तंदुरुस्त करत असेल,हातात गळ्यात गंडे दोरे बांधून जर आजार नीट होत असता तर डॉक्टर जन्माला यायची गरज काय होती ?

2.जर उपासतापास करून एखाद्याची अधुरे स्वप्न पूर्ण होत असतील, तर दररोज भारतात भूक बळिले मरणारांची संख्या लाखोंमध्ये आहे, ज्यांना एक वेळच अन्न मिळणे मुश्किल आहे ,त्यांच्या स्वप्नचं काय?

3. जर देव अंगात येतो तर मग एखाद्याच्या अंगात आईन्स्टाईन , स्टीफन हॉकिंग्स,थॉमसन, न्यूटन ,आंबेडकर ,शिवाजी महाराज, यायला पाहिजेत, त्यामुळे देशाची प्रगती तरी होईल. असं का होत नाही?

 4.नेहमी अयशस्वी होणाऱ्याला यशस्वी करत असेल,तर या जगात कोणालाच अथक परिश्रम करायची गरज काय ?

माझ्या समोर घडलेला एक प्रसंग सांगतो,
ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघालो थोडं दूर गेल्यावरती एका घरासमोर एक देव्हारा आणि तुळस होती साधारणतः 10 मिनिटं पूर्वी पुजाकरून झाली असेल,मी त्यासमोर जळत असलेल्या अगरबत्ती वरून अंदाज लावला. एक 8 वर्षाची मुलगी एक 1 वर्षाचं बाळ कडेवर घेऊन  त्या घरासमोर भाकरी मागत  उभी राहिली होती, बाजूला एक कुत्रा उभा होता. तेवढ्यात त्या घरातून एक बाई भाकरी घेऊन आली आणि ती भाकरी त्या कुत्र्याला टाकली, तेव्हा मला खरंच खूप दुःख वाटलं पण एक गोष्ट मात्र मी शिकलो या जगात माणसाला जेवढी किंमत नाही त्यापेक्षा जास्त किंमत कुत्र्याला दिली जाते.

म्हणूनच मला हे सांगायचे आहे कि ,
"जर देव या संकल्पने हि संदर्भ जोडला तर मी नास्तिक आहे,पण जर माणुसकी सोबत संदर्भ जोडला तर मी आस्तिक आहे ।"


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************