मला टायम नाही….मग नक्की तुझा वेळ जातोय तरी कुठं ?? (भाग:-२)


🌱वि४🌿  या व्हाट्सअप ग्रुप वरून

मला टायम नाही….मग नक्की तुझा वेळ जातोय तरी कुठं ?? (भाग:-२)


Source: Internet
अश्विनी कटकेमोड,नांदेड:
वेळ  हा शब्द  कानी पडताच  मला विश्वास नागरे पाटलांनी म्हटलेली कविता आठवते.                          'To realize the value of TIME'               आपण जर वेळेच महत्त्व  जाणल तर आपल्याला 'मला टायम नाही'  अस म्हणण्याची वेळ  येणार नाही. आयुष्य जस चाललय तस भरकटत जाऊ देण्यापेक्षा त्याला वेगळ वळण देण महतवाच असत.  नाहीतर आपल्या लोकांना जेव्हा आपली खरी गरज असती तेव्हा आपल्यावर 'टायम नाही'  अस म्हणण्याची वेळ येती.  उदाहरणच घायच झाल तर आई-वडिलासाठी आपल्याकडे  वेळेच्या नियोजना अभावी टायम नाही भेटत.                      आपण शिकत राहतो,  शिकत राहतो,  आणि शिकतच राहतो.  पण नौकरी मिळत  नाही  आणि आपला इथपर्यंत प्रवास  होईपर्यंत  आई-वडिल थकतात.  जेव्हा ते थकतात  तेव्हा आपण  नोकरीच्या  शोधात  लागतो.. आणि जेव्हा  ते  जास्त थकतात  तेव्हा आपण office च्या कामात किवा घर-गृहस्थी मध्ये  जास्त  व्यस्त  होतो.                              त्यामुळे आपण जेही करतोय  ते  गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे. जेणेकरून आपल्याला  योग्य वेळेत योग्य  गोष्टी  करायला  भेटतील  आणि खंत करण्याची,  टायम नाही भेटला,  'टायम नाही',  अस म्हणण्याची वेळ नाही येणार. म्हणून म्हणतात  योग्य  गोष्टी  योग्य  वेळेतच  छान वाटतात. मग ते लग्न  असो का नौकरी.  जेव्हा  वेळ  निघून गेलेली  असते तेव्हा  अनेक  जबाबदार्‍या  अंगावर  पडलेल्या  असतात.  नौकरी,  घर - दार,  आई-वडिल,  लेकर मग फक्त उरती ती खंत..  त्यामुळे  युवकांनी वेळेचा फायदा गायला हवा.  ते म्हणतात  ना वेळेच सोन करा.  ते करायला हव व हे वाक्य  विसरायला हव 'मला  टायम नाही'  मग आपोआपच  आपला टायम  जातोय कुठे  हे भविष्यात जाणयला सोयीस्कर  जाईल.


सूरज शेवाळे,मुंबई:
वेळ रात्री 9 ते 10 च्या दरम्यान जेवण करून पाय मोकळे करावे म्हणून गच्चीवर शतपावली करत होतो, डोक्यात उद्याच्या दिवसाचे नियोजनाचे विचार सुरू होते, अचानक कशात तरी पाय अडकला आणि चांगलाच पालथा झालो😣😣😣
कुठे काय आणि किती लागलाय याचा हिशोब करत सावरतोय तोच लक्ष गेलं आभाळाकडे
.
.
.
आणि दिसले सप्तर्षी , ध्रुव , शुक्रतारा , लाखो चांदण्या असे एक एक समोर दिसले आता उठू वाटत नव्हतं पार हरवून गेलो त्यात
.
.

नुसतं त्यांच्या कडे बघत राहिलो
.
.
मनाला वाटलं एवढे दिवस का नाही पडलो ?

 उत्तर आले तुलाच वेळ नव्हता म्हणून 😊

Source: Internet

अमर चिखले,पुणे:
          आयुष्यात अगदी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति बिलगेट्स जरी असला तरीही त्याला दिवसाचे चोविसच तास भेटतात आणि सर्वसामान्य माणसालाही. मग आपला वेळ जातो तर नेमका कुठे? जो योग्य व्यवस्थापन करतो तो यसस्वी होतो. आणि असे म्हणतात की जे लोक म्हणतात माझ्याजवळ थोडा पण वेळ नाही परंतु त्या व्यक्ती विचलीत असतात वेळ त्यानां व्यवस्थापित करता येत नाही म्हणून ते असे म्हणतात.वेळ हा फक्त पैसे कमवण्यासाठी जात आहे परंतु फ़क्त पैसे कमवणे म्हणजे आयुष्य नसून निरोगी आयुष्य सुध्दा कमवता आले पाहिजे.परंतु आपण मात्र व्यवस्थेला दोष देतो की आपणाला सुविधा मिळत नाही म्हणून परंतु आपण आपला किती वेळ योग्य खर्च करतो त्याचा आपला आपणच विचार करावा . नेपोलियन वेळेच महत्त्व जाणू शकला नसता तर आदर्श सेनापती कधीच झाला नसता.
वेळेची तुलना पैश्याशी कधीच होऊ शकणार नाही कारण पैसे परत भेटतील पण वेळ नाही परत केव्हाच भेटू शकणार . आपला वेळ जास्त मोबाईलवर जातोय तसेच मालिका पाहण्यात जात आहे .परंतु जर वेळेचे योग्य व्यवस्थापण केले तर तशीच एखादी मालिका तुमच्या पण यशस्वी जीवनावर निघू शकेल .
           

Source: Internet


जयंत जाधव,लातूर:
मला माझ्या दहा वर्षाच्या भाचीने व्हाॕटस् अॕपवर पाठविलेला सर्वात सुंदर संदेश-
‎" सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही..
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही..
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही..आणि
सगळ्यांची नावं मोबाईलमध्ये नोंद आहेत.. पण;
चार शब्द बोलायला वेळ नाही."
मला वेळ नाही ह्या शब्दाचा एखाद्या ढाल सारखा वापर करायला लोक  शिकले आहेत.सर्वत्र वेळ नाही हा शब्द सहज कोणी पण वापरतात विशेषतः जवळचे मिञ,नातेवाईक.आपण किती व्यस्त आहेत हे दाखविण्यासाठी सतत मोबाइलवर बोलणे.ही बाब एक प्रकारे स्टेटस सिंबाॕल ठरला आहे .आपल्या जवळ वेळ नाही म्हणजे आपण खूप व्हि.आय.पी-महत्वाचे झालो हा गोड-गैरसमज आज चटकन पसरत आहे. दूसरी बाजूस अशी स्पष्ट करावी वाटते की आजच्या धावपळीच्या युगात सगळी कडे कामाचा व्याप खूप वाढला आहे.कार्यालयीन व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतांना समतोल साधता येत नाही म्हणून मला वेळ नाही असे म्हणणे स्वतःला फसवण्या सारखे आहे.कामाचे क्षेत्र कोणतेही असो तिथे चांगला पोशाख व वागणे हे ओघाने आलेच.जर असे नाही  झाले तर ते चुकीचे ठरेल.आज जग बरेच बदलले आहे.ह्या वर पुढील उपाय करून पाहता येईल - काही दिवसासाठी तुम्ही स्वतःचा वेळ खरोखर कसा घालवता यांच्या नोंदी लिहून ठेवा. निश्चितपणे तुम्हाला नवल वाटेल. टीव्ही पाहणे, इंटरनेटवर, चित्रपट पाहण्यात, फोनवर बोलण्यात, मित्रांना भेटण्यात तुम्ही किती वेळ घालवता? आता, तुम्ही ठरवलेल्या महत्त्वाच्या गोष्टींशी ही डायरी तपासून पाहा. तुम्हाला काय दिसते? कदाचित तुम्हाला फक्‍त टीव्ही पाहणे, फोनवर बोलणे, किंवा वेब-सर्फींग अशा सवयींचा विचार करावा लागेल आणि या गोष्टींमधूनच भरपूर वेळ काढता येईल!
थोडक्यात  नियोजन करुन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या त्याला  प्रथम प्राधान्य दया.याचा अर्थ तुम्ही टीव्ही पाहू नका किंवा वैरागी बना असे  अजिबात नाही. एवढेच की तुम्हाला “महत्त्वाच्या गोष्टी प्रथम” ह्या वचनाचे पालन करावे  लागेल.
At times you will feel your loved ones' presence. They may come to ... But the most important thing for you to know is that your loved ones want you to enjoy life.


Source: Interne
ज्ञानेश्वर तात्या टिंगरे,उस्मानाबाद:
नाही खरंच मला टायम नाही हो., मी गुंतवून घेतलं आहे स्वतःला माझ्या आभासी जगात मला माहिती नाही ते किती खरं किती खोटं आहे अन दुसरं म्हणजे मला त्या फंदात पण पडायला आवडत नाही.
नोकरी घर व ठराविक लोक यांच्या पलीकडे मला काही बघायला वेळ नाही.. तसा वेळ मिळतो पण मला तो देऊ वाटत नाही कारण मला फक्त आणि फक्त माझं दिसतं, दुसर्याच्या जीवनात डोकावून मला काय मिळणार आहे अन जर डोकावून पाहिलं तर मला ते काय देणार आहेत त्यांच्या समस्या सोडवल्या म्हणून ते मला थोडंच देवमाणूस म्हणून संबोधित करणार आहेत.
अन शेवटी मला देवमाणूस कोणी म्हटलं तरी आजकाल देवमाणूस कसा राहतो हे मी बघितलं आहे त्यामुळे मला ते उपकार बीपकार नकोत कोणाचे ,पाप पुण्याच्या भानगडीत मला नाही पडायचे.
झटपट श्रीमंत होता येतं का ? मला मान देणारे लोक आहेत का तिथं, माझ्या कुटुंबाला काही फायदा आहे का तुमच्या बोलण्याचा, का उगाचच नादी लावताय आम्हांला ?
तसा तर माझं निम्मं आयुष्य करिअर बनवण्यासाठी खर्च झालंय पुरती वाट लागता लागता राहिली आहे माझी नका सांगू मला टायमाचं, ?
माझ्या मित्रानं माझ्या मागून बंगला बांधला 2 कोटीची गाडी घेतली, मला अक्षरशः लाज वाटते मी अजून नवीन चार चाकी घेऊ शकलो नाही, ना नीट बंगला,
मला हे सगळं उभा करायच आहे काहीपण करून समजलं ?
माझं लग्नाच्या अगोदर सगळा टायम फालतू गोष्टीत गेला नको त्या ठिकाणी नको त्या वेळी मी तिथे जास्त खर्च केला मग तो वेळ असो की पैसा त्याची फळं मी आज भोगतोय.
कॉलेज जीवनात करियर घडवायचे सोडून आगाऊ शहाणपण केलं आख्खी जवानी वाईट कामासाठी खर्च केली त्यामुळे नाही आता वेळ मला कसलाही.
धावत्या जगात मला माझं अस्तित्व निर्माण करायचे आहे अन ते पण लोकांनी नाव काढलं पाहिजे नुसतं बघत राहिली पाहिजेत माझ्या बंगल्याला अन माझ्या गाडीला.
त्यो समाज, सेवा, परोपकारी वृत्ती ह्या गोष्टींचा मला लय झिट येतो बघा.
माझ्या स्वतःच्या आईबाबांना मी गावाकडं ठेवलं आहे कालांतराने त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा मी विचार करतोय अन तुम्ही मला समाजाचं सांगत आहात, खूळ लागलंय व्हय तुम्हाला,?
जावा तिकडं मला नाही असलं विचार करायला टायम बियाम..  



Source: Internet

प्रवीण दाभोळकर परळ ,मुंबई:

'नाही रे, ते करायला मला वेळ नाही मिळाला'..आपण सहज बोलून जातो आणि ही पण वेळही अशीच मारून नेतो. हळूहळू याची सवय होऊ लागते. लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात तेव्हा खाडकन जाग येते. काहीतरी चुकतंय..वेळापत्रक बिघडलय..आपल्यालाच जाणवू लागतं आणि आपण कामाला लागतो.

वेळ नाही असं म्हटलं की प्रश्न तिथेच संपतो, तो समोरच्यासाठी..आपल्या मनाला कधी विचारून पाहिलं का? खरंच मला वेळ नव्हता? मग काय केलं मी?  

आपली यादी तयार होते. तेव्हा कळत ज्या गोष्टींसाठी वेळ देण्याची तशी फारशी गरज नव्हती तिथेच खूप वेळ घालवला आपण. ते काम महत्वाचं अशी मनाची समजूत आपणच काढल्याच आपल्याला आठवत. अनेकदा "भावनिक" होऊन काम केल्याच आठवत. भावनेला वेळेत आणि पैशात मोजता येत नाही.

सर्व सुखसुविधा असणारा विद्यार्थी नापास होतो, त्यावेळी कामाधंदा समभाळून शिकणारा पहिला येतो. "कामाची ओढ, तळमळ" किती हे यातून दिसत.

"कमिटमेंट" हा शब्द दुधारी तलवारी सारखा काम  करतो. शब्दाला जगल्याने एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते. नाही जागल्यास काय होत याचा अनुभव प्रत्यक्षात घ्यावा.

प्रत्येक वर्ष ३६५ दिवसांनी भरलेलं कॅलेंडर घेऊन येत. जे सर्वांसाठी सारख असत. नवा संकल्प सर्वच करतात पण काही दिवसांनी त्याचा "प्राधान्यक्रम" बदललेला असतो. उदाहरण प्रत्येकाने आपापली ठरवावीत.

सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच शरीर, मन निरोगी, उत्साहित रहावं यासाठी दिवसातून किती वेळ देतो हे ठरवावं. "स्वयंशिस्ती"नंतर कुटुंब, नोकरी, समाज हे ओघाने आलंच.

सर्वांना सर्वच गोष्टी करायच्या असतात. पण प्रत्यक्षात ते शक्य नसतं. थोडक्यात काय तर आपण प्राधान्य, महत्व कोणत्या गोष्टीला देतो ते महत्वाचं. याच "वेळापत्रक" आखल तर मला वेळ मिळाला नाही हे सांगण्याची वेळ येणार नाही.


Source: Internet

R. सागर:

21व्या शतकात प्रवेश करता करता विज्ञानाने बऱ्याच गोष्टी साध्य केल्या. अगदी कुठलीही गोष्ट कधीही सहजपणे उपलब्ध होऊ शकते असा विश्वास दिला. पण हे होत असतानाच काही गोष्टी मात्र हरवत चालल्या. आजकाल सगळीकडे ऐकायला मिळणारं वाक्य म्हणजे 'वेळच मिळत नाही..' खरंच मला वेळ नाही या वाक्यात तथ्य आहे का? मला वेळ नाही या वाक्यामध्येसुद्धा दोन प्रकार आहेत. एक मला खरंच वेळ नाही, मी खूप व्यस्त आहे. आणि दुसरा म्हणजे माझ्याकडं वेळ आहे पण तो तुझ्यासाठी नाही कारण मी माझ्या वेळेनुसार प्राधान्यक्रम ठरवला आहे आणि त्यामध्ये तू कुठंच नाहीस.
.
सध्या मी नोकरीनिमित्त बाहेर राहतोय. तरीही महिन्यातून 2-3 वेळा घरी जाणं घडतंच. गावाकडं गेल्यावर दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळी निवांतपणे कधी बाहेर पडलोच तर कुठेतरी कट्ट्यावर 4 वयस्कर मंडळी बसलेली दिसतात. कधी त्यांच्याबद्दल विचार केला की लक्षात येतं की गेल्या कित्येक वर्षांपासून हा त्यांचा नित्यक्रम आहे. जेव्हा घरच्या जबाबदाऱ्या होत्या, कामात व्यस्त असायचे तेव्हाही आणि आताही.. कुणाकडेही आणि कुठलाही कार्यक्रम असू दे तिथे न चुकता हजर राहणाऱ्या त्यांच्या पिढीकडे बघितलं की प्रश्न पडतो की जर ते इतक्या वर्षांपासून आपले सगळे व्याप सांभाळून एकमेकांना सुख-दुःखात वेळ देत असतील तर आपल्याकडेच एकमेकांसाठी वेळ का नाही?
.
कदाचित आपल्याकडे वेळ नसण्यामागचं कारण हेही असेल की आजच्या स्पर्धेच्या वातावरणात भौतिक सुखाच्या शोधात फिरत असताना आहे त्यात समाधानी राहण्याची वृत्ती हरवत चाललीय. दुसऱ्याची प्रगती होत असताना कुठेतरी त्याच्याही पुढे जाण्याची सुप्त इच्छा आपल्याला खुणावत असते. त्यामुळेच वेळ असला तरी वेळ नाही असं भासवायचा प्रयत्न केला जातोय. त्यातच भरीस भर म्हणून मोबाईल हातात आलाय. त्या माध्यमातून सोशल मीडिया च्या आभासी दुनियेत आपण एकमेकांच्या खूपच जवळ वावरत असतो. तिथेही आपला बराच वेळ खर्च होतो. त्यामुळेही असेल आपण एखाद्याला प्रत्यक्ष वेळ देऊ शकत नाही.
.
काहीजण मात्र त्यातूनही वेळ काढून आपलं कार्य करत राहतात. त्याचंच उदाहरण म्हणजे आपली admin team. प्रत्येक आठवड्यासाठी नवीन विषय शोधणं, त्या विषयावर येणाऱ्या सगळ्या पोस्ट एकत्रित करून त्याचा ब्लॉग बनवणं हे सगळं काम ही team वेळात वेळ काढून करत असते. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्या कामातील सहकार्यासाठी आज ग्रुपवर सौदागर सरांची पोस्ट आली होती. ग्रुपमधलं कोणी आपल्या ब्लॉगसाठी योगदान देऊ इच्छित असेल तर तसं कळवा असं त्यांनी म्हटलं होतं. पण इथेही पुन्हा तेच. वैयक्तिक माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर खरंच माझ्याकडं तितका वेळ नाही याची जाणीव मला झाली त्यामुळं त्या पोस्टला इच्छा असूनही प्रतिसाद नाही देता आला.


Source: Internet

 -अभिजीत गोडसे,सातारा:

         पृथ्वीवर माणव प्राणी हा विचार करणारा प्राणी आहे . या बुद्धीजीवी माणवाणेच काय ती प्रगती केली आहे . माणवाचे आयुष्य जेमतेम ७० ते ९० वर्षे आहे . या छोट्याशा आयुष्यात माणवाला सर्व काही करायच आहे . आपली ध्येय , आपली  स्वप्न पुर्ण करायची आहेत . या छोट्या आयुष्यात थोडा तरी इतिहास पुढील पिढीला ठेऊन जायच आहे . आणि या सर्वांनसाठी महत्त्वाचे आहे. ती म्हणजे वेळ. वेळच गणित जमने म्हणजे ऐक प्रकारे कौशल्यच! आणि म्हणूनच आपल्याला सारखा  काणावर पडनारा शब्द म्हणजे मला टायम नाही ...

       आयुष्यात वर्षाचे बारा महीणे आणि रोजच्या दिवसराञी चे चोवीस तास हे प्रत्येकाला सारखेच . अगदी अलीकडे पहायल गेले तर देश स्वतंञ झाला तेव्हा गांधी , आंबेडकर , नेहरू इ. महामाणवानां आणि असख्य कार्यकर्ते यांना ही चोवीस तासच होते . जगाचा विचार केला तर अमेरिका , जपान , चिन , रशिया अशा प्रगतीशील देशांनाही चोवीस तासच होते . ज्यांनी इतिहास घडवला , मोठ - मोठे शोध लावले , वौविध्य पुर्ण  आसे काम केले या सर्वांना तेवढाच वेळ होता जेवढा आत्ता आपल्या आहे . मला वाटते वेळच गणित हे व्यक्ती नुसार बदलते .आणि व्यक्ती सुद्धा वेळेनुसार बदलते . आज जेष्ठ व्यक्तीला वेळ जात नाही आणि तरुण युवकाला वेळ पुरत नाही . ज्यांच डोक रिकाम आहे त्याला वेळचवेळ आहे .. जो धेय्यान झपाटलाय त्याला वेळ नाही .. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी असते . तसेच त्याचा 'वेळ' ही प्रत्येक वेळी वेगवेगळा असावा ! नक्कीच त्या परिस्थिती मधे मला टायम नाही हे वाक्य तो म्हणत असेल किंवा म्हणत नसेल ही ....

        आजच्या स्मार्ट जमाण्यात कुणालाच वेळ नाही असे वेळोवेळी होत आहे . अनुभवतो आहे . धावत्या जगा बरोबर स्पर्धा करता करता सर्वच मेटाकुटीला आले आहेत . पन एक वर्षीचे , एक महिन्याचे , एक आठवड्याचे , एक दिवसाचे , एका तासाचे नियोजन पुर्वीक वेळापञक केले तर नक्कीच मला टायम नाही हे वाक्य उच्चारने कमी होईल .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************