377 चा निर्णय आणि समाजात उमटत असलेल्या प्रतिक्रिया

377 चा निर्णय आणि समाजात उमटत असलेल्या प्रतिक्रिया

🌱 वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

377 चा निर्णय आणि समाजात उमटत असलेल्या प्रतिक्रिया


अनिल गोडबोले
सोलापूर

सुप्रीम कोर्टाचा 377 कलम वरील समलैंगिक संबंध हे गुन्हेगारी आरोपातून वगळावे हा ऐतिहासिक निर्णय वाचला आणि त्यावर सगळी कडे विविध प्रकारची चर्चा होऊ लागली.(या आधी होत नव्हती असं नाही.. पण आता वेगळ्या पद्धतीने होऊ लागली).
एक जण म्हणतो..."पण कितीही झालं तरी ते अनैसर्गिक च आहे ना..!"
"यांना बरं करण्यासाठी काही उपाय नाही का?"
"हे काय खूळ अजून.. आधीच मॉडर्न च्या नावाखाली काय पण चाललंय आता कायद्यांने मान्यता पण.."
"आता भारतीय संस्कृती होती नव्हती तेवढी सम्पून जाईल.!"
चर्चेचा सूर असा तर..
व्हाट्सअप वर .. विविध जोक.. त्याची भाषा.. असो
तर मूळ मुद्धा असा आहे की .. हे का झालं?..
तर विज्ञानाने हे सिद्ध केलेले आहे की.. समलैंगिक ता ही विकृती नाही. प्राण्यामध्ये पण समलैंगिक संबंध होत असतात.. आणि या मध्ये गुन्हेगारी तर अजिबात नाही.
अनैसर्गिक संभोगाचा कायदा.. असं ज्याला मानलं जायचं त्यावर कोर्टाने असे संबंध अजिबात गुन्हेगारी नाहीत हे मान्य केलेले आहे(भारतीय मानसिक शास्त्र संस्था)
पण आपण ज्या दृष्टीने बघतो त्या दृष्टीने हर जग बघून उपयोग नाही..
या साठी माणूस सेक्स का करतो? हे समजून घेतलं पाहिजे.
माणूस हा प्राणी फक्त प्रजनन साठी सेक्स करत नाही. सेक्स आनंद मिळवण्यासाठी करतात, सेक्स सहजीवन जगण्यासाठी करतात, जीवनातील या अमाप चिंता आहे त्या घालवण्यासाठी देखील सेक्स करतात.
कोणी कोणाशी सेक्स करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे(मी अजिबात असुरक्षित संबंध मान्य करत नाही.. ज्यातून लैंगिक आजार होण्याची शक्यता आहे त्यांनी योग्य खबरदारी घ्यावी)
एखादा व्यक्ती शरीरातील बदलामुळे, हार्मोनल बदलामुळे, किंवा आवड म्हणून तसेच वर्तन बदलांमुळे समलैंगिक होऊ शकतो.. (बदल आणि विकृती या मध्ये फरक आहे).
तर त्या मध्ये नैतिकता आड येतच नाही मुळात.. ज्याला त्याला आनंदी होण्याचा अधिकार आहे.
या वर बाहेरील देशात आधीच खूप जनजागृती झालेली आहे.. भारतात आता होत आहे..
आता पर्यंत हे संबंध चोरी छुपे होत होते. सुरक्षितता नव्हती, भीती होती, अपमान होता.. आणि योग्य मार्गदर्शन करणारे कमी लोक होती..
आता ही दरी मिटून जावी ही अपेक्षा..
LGBTQ नावाची समूदाय असणारी माणस या निर्णयाने हॅपी आहेत.. आणि कोणाचा काही तोटा नाही त्यामुळे फार संस्कृती जोपासण्यात अर्थ नाही(आधी एड्स ने बरच चित्र स्पष्ट केलं।आहे)
तर शेवटचा मुद्धा.. याना बर करायच म्हणजे काय करायच?.. आजार आहे का तो?..तुम्हाला पटत नसेल तर समजून घ्या .. मी पुरुष सारखा राहतो ही जशी प्रकृती आहे तशी ट्रान्स जेंडर (हिजडा) ही पुरुषाच्या शरीरातील बाई आहे.. हे जेवढं लवकरात लवकर मान्य करू तेवढं सुदृढ समाजासाठी चांगलं आहे..
लेस्बियन आणि गे लोकांच्या समस्या वेगळ्या आहेत.
बाय सेक्सउल आणि ट्रान्स जेंडर च्या समस्या दूर व्हाव्यात ही देखील इच्छा आहे..
तर आपण खरच मॉडर्न किंवा प्रगत मानव होणार असू तर या बाबी समजून घेतल्या पाहिजेत.
अर्थात कोणताही बदल लगेच होत नाही.. पण सुरुवात नक्कीच चांगली आहे.



-करण बायस
जि. हिंगोली

भारतातील आयपीसी 377 नुसार समलैंगिकता हा गुन्हा होता. पण भारतीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयानुसार समलैंगिकता हा गुन्हा नसून प्रत्येकाला त्याच्या मर्जी नुसार जगण्याचा अधिकार आहे.प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा विचार करून हा कायदा रद्द केला आहे.
 हा  एलजीबीटी व्यक्तीसाठी हा एक ऐतिहासिक आणि दिलासा देणारा निर्णय आहे.आपल्या समाजाची मानसिकतेनुसार हे आजपर्यंत अनैसर्गिक मानलं जायचं आजपर्यंत हे लोक कायद्याच्या नजरेत गुन्हेगार आणि समाजात दुय्यम मानले जायचे पण मानवतेच्या दृष्टिकोनातून हा योग्य निर्णय झाला,आता भारतातील समजला पण हा निर्णय मानवतेच्या दृष्टिकोनातून बघायला हवा.
समलैंगिक संबंधांना जवळपास बऱ्याच देशांमध्ये मान्यता आहे आणि भारतात हे आजपर्यंत एक कायदेशीर गुन्हा होता पण आता कायद्यानुसार हे सुद्धा मान्य केले.
आता गरज आहे समाजाने स्वतःची मानसिकता बदलायची, गरज आहे या निर्णयाला स्वीकारायची आणि या लोकांना समाजात सन्मान देण्याची आणि हे होत नसेल तर कमीत कमी त्यांना कमी लेखू नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************