माझी कविता.

सौदागर काळे,पंढरपूर.

कविता समजली का?

माझी कविता मलाच कावते
सवाल जवाब करत राहते
क्षणोक्षणी,पदोपदी विचारते.
कविता समजली का?

तुझ्याच पोटासाठी मी 
कित्येकवेळा विकली गेली!
हे ऐकून पुन्हा पुन्हा भूक लागते.
कविता समजली का?

सोयीनुसार तू भूमिका बनवत गेला
तुझ्या सेल्फीसाठी भांडवल झाले
बाह्यरंग-अंतरंग नासवत राहिले.
कविता समजली का?

उकरंडा चाचपून उकरुन
आठवणी खालवर होत गेल्या
तेव्हा तोंडावरचा रुमाल हातात आला.
कविता समजली का?

प्रत्येक चौकात रेड सिग्नल दाखवून
नजरा सूक्ष्म करण्यास लावते
थांबवत राहते...म्हणत राहते..
कविता समजली का?

____________________________

अर्चना खंदारे ,हिंगोली.....
     पहिला स्पर्श तुझा.....

पावसाच्या पहिल्या   सरी  जश्या  जमिनीला मिळतात तसा  पहिला स्पर्श तुझा .....

ओळखीचा  पण अनोळखी  बनून  केलेला नकळत  भेटीमधला  पहिला स्पर्श तुझा.....

दुसऱ्यासाठी कस जगावं  असं सांगणारा  पहिला स्पर्श तुझा....

तू सर्वांमधून  खूप वेगळी  आहेस असं सांगणारा पहिला स्पर्श तुझा.....

स्वतःबरोबर दुसऱ्याची  काळजी  घे  म्हणणारा  पहिला स्पर्श तुझा..

आयुष्यामध्ये कितीही  संकटे  आली  तरी खचून  न जात  त्याचा सामना  कर  असं सांगणारा पहिला स्पर्श तुझा ....

आयुष्यात स्वतःला कधीच एकटं समजू नको,कारण तुझा आत्मविश्वास  तुझ्या सोबत आहे असं सतत  सांगणारा पहिला स्पर्श तुझा.....

खरंच मनाला एक विलक्षण  लावून  गेला पहिला स्पर्श तुझा....

पहिला स्पर्श तुझा.....

काही चुकल्यास  क्षमस्व ......

____________________________
रुपाली आगलावे, सांगोला...
                  जीवन
जीवन म्हणजे नक्की काय असतं?
कोणी हसत , कोणी नाचत,
कोणी रडत , कोणी हिरमुस्त, 
पण कसे ही असो ,
जीवन मात्र सगळ्याना हवं असतं।
     कोणी आलं की आनंद होतो,
     कोणी गेलं की दुःख होतं।
     येणं - जाणं चालू राहतं, तरीही
     जीवन मात्र सगळ्यांना हवं असतं
बरस्त्या पावसात जीवन कधी बहरून जातं,
कडक उन्हात कधी कधी करपुनही जातं।
बहरण, करपन चालू राहतं, तरीही
जीवन मात्र सगळयांना हवं असतं।
     वाऱ्याचा झोत कधी सुखावतो,
     कधी तोच झोत दुखातही विसावतो।
     सुख, दुःखाच येणं जाणं चालू राहतं, तरीही
     जीवन मात्र  सगळयांना हवं असतं।

____________________________

वाल्मीक फड निफाड नाशिक 
        पावसाची पुकार
वारा वहात आहे
ढगही पलीकडे जात आहेत,
मग पाऊस केव्हा येणार ?
माणूस खुश केव्हा होणार?
पावसाला मी विचारले तु का येत नाही?
तो म्हणाला हि तुमचीच चुक.
तुम्ही झाडे तोडली प्रदुषण केले ,
मी तरी काय करु माझे मनच रमत नाही.
मि जेव्हा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो,
तेव्हा हा वारा मला दुर कोठेही नेऊन घालतो .
झाडे तोडून तुम्ही शेती तयार केली,
डोंगर दर्यात सुद्धा नाही 
झाडी वेली.
आता तुम्ही एकच निर्धार करा,
वृक्षमय प्रदेश तुम्ही सर्वजण करा.
पाऊस पडेल चोहीकडे होईल सर्व शांत,
तुमच्या हाताने तुमचा होणार नाही अंत.

____________________________
महेश देशपांडे,मु. पो. ढोकी, जिल्हा उस्मनाबाद
कवीची उद्विग्न अवस्था आहे 

याउपर काही होईल असं काही वाटत नाही,
कारण, आठवणी मेल्यात लोकांच्या ।

आपले म्हणायाचे, तर काय संदर्भ देणार? 
एकत्र घातलेले दिवस ? छे छे ते तर शक्यच नाही ।
कारण आठवणी मेल्यात लोकांच्या ।

नव्या नवरीचे नऊ दिवस असतात तसे, नव्या नात्याचे नऊ दिवस अस काहीसं झालेलं आहे ।
कारण नात टिकवायच म्हटलं तर, सदासर्वकाळ एकत्र राहू शकत नाही आणि आठवणींशीवाय पर्याय नाही  ।
पण आठवणीच मेल्यात लोकांच्या । 

नात्याचं काय घेऊन बसलाय, ते समजायला खूप काळ जावा लागतो । कधी कधी एवढा काळ घालवूनही समजत नाही ।।
मग नात्याचा उलगडा कसा होणार ? माणसाच्या मनातल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर, बोललेल्या गोष्टी, भावना समजून घेणं महत्वाचं असत ।
यासाठी माणस आठवणीत तर राहायला पाहिजे ।
पण आठवणीच मेल्यात माणसांच्या .

____________________________
       किरण पवार , औरंगाबाद.
        आस उजेडाची .

तिमिरातून जातेयं सावकाश
तिला ओढ आहे प्रकाशाची,

नैराश्याच्या गर्तेत गुरफटलेली
तरी स्वप्ने पाहतेयं उज्वल आशेची,

धरूर ठेवलयं जखडल्या गेलीये
तरीही हालचाल आहे तिची वेगाची,

भांभावलेल्या प्रसंगात मनात डोकावतेयं
तिला जिद्द हवीये पुन्हा वर येण्याची,

काठोकाठ रस्ता अनोळखी काट्यांचा
तरीही ती चालतेयं वाट वणव्याची,

भयान सगळं अस्थिरलेलं झालयं
तरीही खूनगाठ घट्ट स्थिरावायची,

एकदा विस्कटलेलं आयुष्य पुन्हा जोडण्या निघालेली
धडधडणारी स्पंदना आहे ती ह्रदयाची.

                    या कवितेचा अर्थ थोडक्यात स्पष्ट करतो. या कवितेच्या म्हणण्यानुसार सांगायच असं आहे की, एक लहान मुलगा आहे ज्याचे निर्णय चुकल्यामुळे तो थोडा आयुष्यात मागे पडलायं. अशाने त्याच्या भोवतीच्या परिसरातील इतर व्यक्तिंनी त्याच खच्चीकरण भरपूर केलयं. पण तो अजून डगमगला नाहीये. थोडा नैराश्याच्या दिशेने तो चालल्यावर त्याच्या लक्षात येतं आणि तो पुन्हा नव्या आशेच्या शोधात स्वत:ला झोकून देतो. अशात थोडासा चलबिचल जरी झाला असला तरी उद्दिष्ट मात्र एकच आणि अंतिम आहे. अशातून बाहेर पडून नव्या ऊजेडात प्रवेश करण्याची त्याला घाई झाली आहे कारण हे सर्व ओझं नकोयं त्याला. आणि न डगमगता स्वत:ला सिद्द करण्याची जिद्द बाळगली आहे त्याने. ह्या सर्व भावना तो त्याच्या स्पंदनेत साठवून आहे. धन्यवाद!

____________________________
जगताप रामकिशन शारदा,बीड.
          माझी कविता

कवितेत बोलायचे असते,कवितेत चालायचे असते

मांडताना कोणालातरी आपण मात्र सांडायचे असते

कटु वास्तव गोड शब्दांत सांगायचे असते.

फुलाची कोमलता, ज्वालामुखी ची दाहकता

अलगद सौम्य शब्दांत मांडायची असते.

खदखदणार मन कवितेत खळखळून हसवायचे असते.

नाचता नाही आले आनंदात तरी शब्दांत मात्र गुणगुणायचे असते

वागण जरी बोथट असल तरीही शब्द मात्र धारदार ठेवायचे असतात.

सोबत असणाऱ्यांना भंडावून सोडायचे असते

सोडून गेलेल्या चे गुणगान करायचे असते.

कोरतील मनावर चित्र असे शब्द वापरायचे असतात

घालतील घाव मनावर असे शब्द वापरायचे नसतात.

शब्द जरी अस्त्र असले तरी ते वस्त्राप्रमाणे वापरायचे असतात

 शोभले स्वतःला तरीही इतरांवर मात्र लादायचे नसतात.

कोणी बोलेल विद्रोही, वेडा, प्रेमवीर

आपण मात्र रहायचं असत खंबीर

बोलणाऱ्यांचे शब्द मनावर घ्यायचे नसतात

भासले खास तर कवितेत घ्यायचे असतात.

ती सोडून गेली म्हणून कवितेत रडायच असत

तिच्या आठवणीने कविता झाली म्हणून

आनंदाने मनसोक्त नाचायच असत.

कवितेला च कधी कधी प्रेयसी मानायचे असते

शब्दा शब्दा न तीला नटवायचे असते.
____________________________

              रामदास हांडे, पुणे 
       मी देखील एक माणूस आहे फक्त वेश्या नाही.

पुण्याच्या बुधवार पेठेचा रस्ता
तुम्हास ठाऊक आहे।
कधी माणूस म्हणुनी भेटा मला
मी देखील एक माणुस आहे।

तरुण येतात म्हातारे येतात
येतातही बिना लग्नाचे।
देहवर्ती स्वार होऊनी
लचके तोडतात अब्रूचे।

ईच्छा नाही माझी इथे
इशारे तुम्हास करण्याची।
मजबुरीने गळा अवळलाय
सवय लागलेय गुदमरण्याची।

ग्राहक म्हणुनी सर्वच येतात
तुम्ही माणूस म्हणुनी या।
माणसातल्या माणुसकीचे
दर्शन मजला द्या।

____________________________

दत्तात्रय विश्वनाथ डोईफोडे, वाशिम.
माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग।

माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग,
आठवताना होतं माझं मन नेहमी दंग,
आयुष्यात मिळाली खूप माणसांची संग,
ज्यांनी नाही केली प्रार्थना माझी भंग।

एकच आहे माझं देवाला मागणं,
असावं सर्वांचं समानतेने वागणं,
ह्याच गोष्टी देतात मला जीवनात प्रेरणा,
मनात घट्ट करतात सामाजिकतेची धारणा।

कोठून मिळते हो सर्वांनाच सुख,
सर्वाना असते लालसेचीच भूख,
हेच खरं कारण आहे या जगाचं दुःख,
प्रेरणादायी प्रसंग करतील सर्वांना अंतर्मुख।

कोण आहेत बरें प्रेरणादायी मानव,
आहेत का ते देव - देवता दानव,
माझ्या मते आहे आहे सर्व प्रेरणादायी,
फक्त घ्यावे सर्वांनी मनीं न करता घाई।

____________________________

 स्वप्नील चव्हाण, मेहकर
      "......कळेना...!! "

सुचलीस तू मला एखाद्या चारोळीसारखी
पण यमक मात्र जुळेना,
ध्रुवपदापर्यंत अगदी छान जमलं पण कडव्यात काय लिहावं ते मात्र कळेना......

तू सुंदर आहेस की तूच सुंदर आहेस
हे कोड काही सुटेना,
मी तुझ्याकडे बघतो का मी तुझ्याकडेच बघतो 
हे माझं मलाच कळेना.....

लख्ख प्रकाशात मला तू सवलीसारखी अंधुक भासलीस,
पण तापतांना या उन्हामध्ये मला तूच हवीशी वातलीस....
प्रकाश मोठा की ऊन मोठं
हे तंत्र काही उमजेना,
मला सावली पाहिजे का तीच सावली पाहिजे हे माझं मलाच कळेना......

THEORY चा पेपर जरा कठीणच जातो
कारण पाठांतर मला काही जमेना,
तू भेटलीस मला MCQ पेपर सारखी 
पण उत्तर कोणतं गिरवावं तेच कळेना.....

मला तू जेवणातील मिठासारखी भासलीस
पण जेवण खारट होऊ नये याचीही भीती वाटलीच,
"भाजीत मीठ की मिठात भाजी" हा प्रश्न लोकांना पडतोच कसा हे काही समजेना,
आणि अळणी जेवण्याऐवजी मीठ टाकूनच का जेवाव वाटतंय हे माझं मलाच कळेना........
____________________________
ऋषिकेश खिलारे
✍🌹मेळघाट होळी🌹

आमच्या ताईसाहेबांची बोली
आली रे आली होळी आली...

आदिवासी संस्कृती सजली भारी,
गारा मट्टी करू लगली सारी,
मिळून सारवले घर अंगन सारे ।।

🎋 गोठानाच्या मध्यभागी उभारली हीरव्या बांबूची होळी,
बांबूच्या शेडांवर बांधली पाळण्याची दोरी।
परंपरागत सणासुदीला पुजेचा घाट अन आडा पटेल चा भलताच थाट।।

🎋 नवनवीन कपड्यात सजली पोर सारी,
पुरी न जीलू चा सुगंध हरेक दारी
झुमकी म्हणे रामकीले बनाया भेजा माया घरी ।।
🎋 पेटली रे पेटली होळी पेटली,
ढोलक्याने तालात वाजवला ढोल
एका हातात दशत्ती अन एका हातात थपकी
होळीच्या अवतीभवती पोरी करतात गदली
🎋 सगळेच घेतात गाठीभेटी
देवान-घेवाण प्रेमाची
उधळण असते पाच दीवस
पळस फुलांच्या रंगाची
🎋 दुसऱ्या दीवशी दारोदारी मागतात फगवा
आलू की संबज्जी मिठा नही लगता
भोकरबरडी जाणाबाई जलदी जलदी देना
पोरी न पोर गातात गाणी
जमवला फगवा की करतात मेजवानी
🎋 रंगपंचमीच वादळवारं सुटतं
सारे पोर पोरी रंगान भिजततं
पंचमिला माहोल निरोपाचा थाटतं
आता गावकरी घेतात होळीची शेवटची भेट
संगीत नृत्याची मैफिल डोळ्यात साठते थेट!
कोरकूचा सण 'होळी लय भारी'
गोडं लावते 'दीवाळीले' पणत्या दारी
संकल्प

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************