फेसबुक वरील समाजसेवा



प्रविण, मुंबई

महाराष्ट्राला सामाजिक सुधारकांची फार मोठी परंपरा आहे, अगदी संत ज्ञानेश्वर, तुकारामांपासून ते डॉ दाभोळकर, अण्णा हजारे पर्यंत. या मातीं देशकार्य आणि समाजकार्यात मोलाचा वाटा उचलला आहे. पण त्याच बाजारीकरण मात्र या परंपरेतील नाही. आज फेसबुक वरची समाजसेवा म्हणजे बाजारीकरण आणि कथित सामाजिकबांधिलकीच जाहीर प्रदर्शन झाले आहे. अगदी क्षुल्लक प्रसंगाचे फोटो टाकून कोणावर तरी उपकार केल्याचा आव आणला जातो. काही स्टेटस तर असे भन्नाट असतात का कळताच नाही नेमकं काय म्हणावं  ते "पूरग्रस्तांना मदत केली फीलिंग शोषली रिस्पॉन्सईबाल विथ करण, प्राची अँड 13 अदर्स"
या सोशल मीडिया च्या मायाजालात एक कळलं की फेसबुक कधीच फेस (चेहरा)बुक नव्हतं नाही आणि नसेल
________________________________________


            अभिजीत गोडसे , सातारा

              सामाजिक कार्य हा आपल्याकडे फारसा चर्चेत नसणारा विषय. दरवर्षीचा मॅगसेस पुरस्कार जाहीर झाल्यानंतर थोडीफार आपल्याकडे झालीस तर एक-दोन सामाजिक कार्यकर्त्यांची चर्चा होत राहते. कारण आपल्याला राजकीय गप्पातून सामाजिक गप्पांनकडे यायला मुळात वेळच नसतो.असो..शाहू, फुले , आंबेडकर , आगरकर , अलिकडचे आमटे , हजारे , कोल्हे इ. सामाजिक कार्य करणारी फळी होती / आहे.. शाश्वत विकासाकडे या सर्वांचे लक्ष होते.. आगरकरांनी तर राजकीय सुधारणा ऐवजी अगोदर सामाजिक सुधारणा झाल्याच पाहिजेत हाच मुद्दा रेटून धरला होता.. कारण या सर्वांनी देशहित आणि समाजहित हेच पाहिले आणि पाहत आहेत.. यांची महती पिढ्यानपिढ्या चालूच राहील.
        भारतामध्ये १९९१ नंतर खर्या अर्थाने दूरसंचार क्रांती उदयास आली.. भारत नवीन क्षेत्रांमध्ये चमकू लागला. आत्ता अलीकडे आलेले फेसबुक या माध्यमाने तर निवडणुका कशा जिंकायच्या हेसुद्धा दाखवून दिले.. या माध्यमाचा जेवढा फायदा आहे तेवढा तोटा देखील आहे. संपूर्ण जग या माध्यमाने व्यापले. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत या फेसबुकने प्रत्येकाला जोडले, देशात परदेशात मुखवटा नसणारी माणसं यांचे आचार-विचार चांगल्या वाईट घटना फेसबुकने पादक्रांत केल्या. आणि खऱ्या अर्थानं याच्यामुळे हा फेसबुकचा चव्हाटा चांगलाच फुलला. अलीकडच्या सात-आठ वर्षांमध्ये आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून समाजासाठी काहीतरी केले पाहिजे अशा भावनेने प्रेरित झालेली नवयुवक या फेसबुकच्या वाटेवरून समाजसेवा करू लागले.. कारण कमी कालावधीमध्ये कमी कामांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणजे हा फेसबुक चव्हाटा.. अलीकडच्या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना बाबा आमटे कोण आहेत हे देखील माहीत नसेल पण ते फेसबूक वर फार मोठे सामाजिक कार्यकर्ते असतात.. अर्थात स्वयंघोषित देखील.. हे सामाजिक कार्यकर्ते फेसबुक वरील लाईक आणि कमेंट या आभासी माध्यमातून आपण किती थोर सामाजिक कार्यकर्ते आहोत याची त्यांना जाणीव होत राहते.. मागील महिन्यात पूरग्रस्तांना अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी खूपच तळमळीने फेसबुक चव्हाट्यावर मदत केली आहे असो.
       आपल्याकडे समाधानी माणूस कोणाला म्हणावे तर आपली एक ठराविक व्याख्या असते. ज्याच्या कडे गाडी, स्वतःचं घर, चार पैसे  आहेत.म्हणजे तो समाधानी पण त्याच्यापलिकडेही जग आहे हे त्याला आयुष्य संपलं तरी सुद्धा कळत नाही किंवा त्याच्या गावी ही नसते.. तसेच फेसबूक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम त्याच्यापलिकडेही जग आहे. हे अशा माध्यमातील चव्हाट्या मध्ये खेळणाऱ्या आणि त्यातल्या त्यात चव्हाट्यात राहून सामाजिक कार्य कर्त्यांना हे कळायला हवे. नाहीतर या फेसबुकच्या रंगीबेरंगी दुनियेत स्वतःचा बेरंग झालेला कळणार देखील नाही. आणि वयोवृद्ध झाल्यानंतर आपण  वेळ किती घालवला..हे सर्व वर्ष मोजून   त्याचा स्वतःला आणि  समाजाला काही उपयोग देखील होणार नाही.
________________________________________


 अनिल गोडबोले
सोलापूर

समाज सेवा करणे हा आनंदाचा किंवा व्यवसायाचा भाग असू शकतो. आज व्यवसायिक समाज कार्यकर्ते समाजकार्याचे शिक्षण घेऊन काम करत आहेत.

काहीजण इतर सर्व व्यवसाय सोडून समाज कार्यामध्ये भरपूर जण येत आहेत... कारण काय ... तर तयार होणारी समाजातील प्रतिमा आणि  आणि वारेमाप प्रसिद्धी..

समाज सेवा करण्यासाठी निस्वार्थ राहून कार्य करता येईल पण भुकेल्या पोटाने कोणच समाजकार्य करू शकत नाही.. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे व्यक्तिमत्व आता होणे नाही.

तर मुद्धा आहे फेसबुक वरील फोटोचा तो टाकावा किंवा न टाकावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे..

काम करण्याला पैसे मिळतात ही बाब जरी खरी असली तरी.. पैसे मिळण्यासाठी प्रसिद्धी करावी लागते..

पूरग्रस्त मदत करताना आपण पाहिले की सर्वांनी केलेली मदत आपल्याला कळाली..
आता याच्या आड काही लोक... खोटे फोटो किंवा थोड्या कामाची मोठी प्रसिद्धी मिळवून मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतात..

काहीजण खोट्या हृदयद्रावक कथा मांडत असतात हे केल्या मूळे खर काम करणारे मागे पडतात, हे देखील खरे आहे..

पण तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आणि चांगले परिणाम असणारच.. पण खरे आणि खोटे समाज सेवक ओळखल्या शिवाय आपण विश्वास ठेवू नये.

बाकी समाज सेवा करण्यासाठी फेसबुकची गरज नाही, हे सत्य आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************