वसुंधरा सुंदर राहिली नाही

गजानन घुंबरे,परभणी

कधीकाळी नैसर्गीक साधनसंपत्तीने  संपन्न ,तिला पुरक जैवविविधता यांना आश्रय असणारी व आतापर्यंत तरी एकमेव असणारी सजीवसृष्टी म्हणजे ' पृथ्वी ' अर्थात वसुंधरा.या पृथ्वीवर आतापर्यंत बरेच युग झाले, उलथापालथ झाली. पण यादरम्यान तीची जी हानी झाली नाही , ती मात्र ( मानवी उत्क्रांतीचा सिंद्धात थोडा वेळ सोडला तर कुठून तरी एलीयन रुपी आलेल्या ) मानव नावाच्या स्वार्थी प्राण्याने हळू हळू भक्कास केली. एलियन यासाठी म्हणतो कि, मानव सोडून इतर सर्व जीव निसर्गाचे मित्र आहेत. त्यामुळे पृथ्वीवरिल नैसर्गीक समतोल राखल्या जायचा व जातो.या भुतलावर फक्त मानवालाच  फक्त  घ्यायचे कळते.ओरबाडणे, हिसकावणे, निचरा करणे एवढचं त्याला जमतं. मग मानव समुहातील त्याच्या सारख्या हाडामासाच्या व्यक्तीसोबत त्याचा हा व्यवहार तुम्हाला पहायला मिळेलं.

   आता हेच पहा पृथ्वीला सुंदर ठेवण्यात खरा वाटा असणारे, तीला सजीव ठेवणारे पाणी ज्याच्यावर सर्वांचा हक्क आहे. मानवाने केलेल्या बेसुमार , अमाप वापराने निसर्गहानी करण्यास कारणीभूत ठरलायं. जमीनीवर उपलब्ध साठे कमी पडले म्हणून पाचशे फुट खोलीवरून उपसा केला.मानवाच्या या कृत्यांने जमीनीच्या वरच्या भूस्थरात पाणी न राहील्याने झाडे नष्ठ झाली व होत आहेत. यामुळे हिरवळ कमी झालीयं, वाळवंट वाढलेत. जमिनिच्या आत ५० फुटांपर्यंत पाणी निचरा होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लोटतो. त्याखाली दोनशे फुटांपर्यंत जाण्यासाठी ५०ते १०० वर्ष जातात. कधी कधी आपण एखाद्या नवीन घेतलेल्या ५०० फुट बोअरवेलला लागलेले पाणी तीनशे वर्ष जुने असु शकते. पण त्याचे ते आपल्याला काय? तहान भागली ना बस्स ! आपल्या या वागण्याने निसर्ग समतोल मात्र बिघडला. जमीन कोरडी पाडली, झाडे वाळली, पाऊस कमी झाला आणि पाणीचं कमी झाल्याने जैवविविधतेचा पृथ्वीचा दागिना लुप्त होण्याच्या मार्गावर आलायं.

  आपल्याला फक्त घेता येत देणं जमतंच नाही.आपल्या अन् दुसऱ्याच्या हिश्याचेही घ्यायचे. घेतानाही बेमाप घ्यायचं मग त्याची किंमतही कळत नाही. मानवाने तयार केलेल्या पाणी मोजण्याच्या पर्जन्यमापकात जेंव्हा १०० मिमी पाऊस पडतो ना त्यावेळी १० लाख लिटर पाणी १०० गुंठ्यात पडलेलं असत. असे एक दोन पाऊस पडल्यावर ते पाणी वाहत  त्यातील फक्त १०% पाणी जमिनीत मुरल्या जातं.३०% वाफ होते तर उर्वरीत नदी व शेवटी समुद्रास मिळतं.

यातील मुरलेलं पाणी उपसा करताना आपण हे भान विसरतो  कि किमान आपल्या गरजे इतके तरि पाणी भूगर्भाला आपण परत दिलयं का? आपण किंमत असणाऱ्या वस्तुंच मोजमाप करतो . त्याचप्रमाणे सृष्टीला सजीव ठेवणाऱ्या पाण्याचे मोजमाप करण्यास शिकलो तर निसर्गाची अनमोल देण असणाऱ्या पाण्याची किंमत कळेल .

 आपल्या गरज इतके निसर्गा कडून हवं असेल तर परत देण्यास शिकावं लागेल ,उपशा इतके पाणी जमिनीत मुरवावे लागेल , एक झाड तोडण्यापूर्वी दोन आधी जोपासावी लागतील .तरचं समतोल साधला जाईल अन्यथा या वसुंधरेला कुरुप करत दुसऱ्या सजीव सृष्टीचा शोध घेत स्वार्थी ( सुरुवातीस एलियन यासाठी म्हणालो) मानव एके दिवशी निघून जाईल आणखी एखाद्या वसुंधरेला बेचिराख करण्यासाठी .

1 टिप्पणी:

  1. लाखो वर्षांचा वसुंधरेचा इतिहास आहे. एका जीवसृष्टीचा ह्रास आणि दुसरीचा उदय. जसा डायनासोर चा अंत.कारण जी भौतिक गोष्ट तयार झाली, तिचा अंत निश्चितच आहे. त्यामुळे मानवी अस्तित्वाचा अंत देखील निश्चितच होईल. फरक एवढाच की, वसुंधरेने निश्चित केलेल्या वेळेपूर्वी... त्याला कारण मानवी महत्वाकांक्षा :(

    उत्तर द्याहटवा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************