प्रजासत्ताक भारतात हरवलेली प्रजा.

प्रजासत्ताक भारतात हरवलेली प्रजा.

🌱वि४🍀 या व्हाट्सअप ग्रुपवरून

प्रजासत्ताक भारतात हरवलेली प्रजा.


Source:- Internet

-वाल्मीक फड नाशिक 

प्रजासत्ताकचा अर्थ बर्याच वर्षाने लोकांना कळाला खरा पण जे आपले हक्क आपण देशाला महान बनविण्यासाठी वापरतो का? मला तर उघड दिसतंय की,प्रजासत्ताकच्या बाता करणारे अनेक लोक देशातील ज्या काही कायदा सुव्यस्थेच्या बाबी आहेत त्यावरच आक्षेप घेत असतात .प्रजेच्या हातात सत्ता असली म्हणून आपण ज्या देशात रहातो जेथे आपण खातो,पितो त्या स्थानाचा अपमान त्याच्याविरुद्ध घोषणा देणे असा होत नाही. 
गेल्या दशकापासून अशा अनेक गोष्टी घडत आहेत इथून मागे असे घडत नव्हते .मला ह्यामध्ये अधिकार मागण्यापेक्षा असलेल्या सरकारवरील नाराजी जास्त दिसते.मुळात ज्या सरकारने बहुमत मिळऊन सरकार स्थापन केलेले आहे व जो कायदा राज्यसभा आणी लोकसभा ह्या दोन्हीही सदनात बहुमताने पास झालेला आहे त्याचा विरोध करणे म्हणजेच शुद्ध राजकारण केल्या सारखेच आहे.देशात जवळजवळ नऊशेच्या आसपास विद्यापिठं आहेत परंतु एकच विद्यापिठ असं आहे की,तेथील विद्यार्थ्यांना प्रजासत्ताकच्या नावावर  आपली राजकारणाची पोळी भाजण्यासाठी भडकवले भडकवले जात आहे.काही गरीब विद्यार्थ्याला ह्यात काही रस नसताना त्यांच्या शैक्षणिक वर्ष वाया घालविण्याचे काम ह्या महाभागांकडून होत आहे.खरं तर त्यांचा हा प्रयत्न एक ठराविक माणसांची ओळख टिकवून ठेवण्यासाठीचा आहे आणी तो प्रजासत्ताकतेसाठी घातक आहे.
काही देशद्रोही तत्वे जेव्हा आपल्याच सैनिकांना दगड मारले जातात आणी सैन्य जेव्हा कारवाई करतं तेव्हा आपल्याच देशात खाणारे स्वताला बुद्जीवी समजणारे लगेच सैन्यावर टिका करायला लागतात.ते अशा टिका करु शकतात कारण प्रजासत्ताक.

Source:- Internet

-प्रविण, मुंबई

प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. भारतीय लोकशाही मध्ये भारतावर ज्यावेळी एकाधिकारशाहीची टांगती तलवार दिसली त्यावेळी या देशातील प्रजेने प्रजासत्ताक या शब्दाचा खरा अर्थ सत्ताधाऱ्यांना दाखवला. त्याची काही मोजकी उदाहरणे.
१. जेव्हा देशावर आणीबाणी लादली आणि "Indira is India and India is Indira" असा नारा सत्ताधाऱ्यांनी लावला त्यावेळी जनक्षोभ उसळून तत्कालीन प्रजने , भारतीयांनी सत्तापालट केला
२. भ्रष्टाचाराने देश ज्यावेळेस पोखरला जात होता त्यावेळी लोकपाल विधेयकाला समर्थनासाठी अवघा भारतवर्ष रस्त्यावर आला
३. आणि ज्यावेळेस एकाधिकारशाही ने जनमत विचार न करता समाजघातकी कायदे संमत करण्याचा धडाका सत्ताधाऱ्यांनी लावला त्यावेळेस पुन्हा एकदा जनता रस्त्यावर उतरली.
असे आणखीन काही उदाहरणे देता येतील पण ती "काही"च असतील. तेवढ्याने देश प्रजासत्ताक मानणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठाण्यासारखे होईल. 
2005 साली माहितीचा अधिकार ही अमंलात आणला गेला.  त्याचाच परिणाम लोकपाल ची चळवळ होती. पण आता तर हा कायदाच कमकुवत केला गेलाय.
*ग्राम* *स्वराज* 
गावातील प्रत्येक  निर्णयात लोकांचा सहभाग किती असतो?
ग्रामसभेला किती लोक उपस्थित असतात?
महिला ग्राम सभा अर्थपूर्णरीत्या किती गावात घेतली जाते?
यात सहभाग घेणे ही कोणाची जबाबदारी...?
शिक्षण, आरोग्य, रोजगार ह्याची गरज असताना धर्म-जात यावर मतदान कोण करत?
या प्रत्येक प्रश्नच उत्तर देश प्रजासत्ताक आहे की नाही याचंच उत्तर आहे. 73 व्या घटना दुरुस्तीनंतर देशात पंचायत राज लागू झाले, 
ग्राम स्वराज या देशाची काळाची गरज आहे हे गांधीनी फार आधीच जाणलं होत, पण ग्राम स्वराज च्या नावे सरपंच वर्ग आपल्या सात पिढ्यांचा उद्धार करण्यात व्यस्त आहेत. फार कमी महिला सरपंच या पतीच्या हस्तक्षेपाशिवाय काम करत आहेत, पण बहुसंख्य महिला सरपंच तसेच महिला पंचायत सदस्य या नामधारी आहेत.

  मी भारतातील वेगवेगळ्या राज्यातील ग्रामीण भागात फिरलो पण सत्ता कधीही लोकसत्ता वाटली नाही. उदाहरण द्यायचे झाले तर  रातलाम (मध्यप्रदेश) जिल्ह्यातील बाजना या तालुक्यात तेथील बँकिंग व्यवस्थेचा अभ्यास करताना एक वास्तव कळलं जे भरतात अनेक ठिकाणी पहावयास मिळेल. 94% लोक ही आदिवासी पण तालुक्यावर 1% बनिया लोकांचं राज्य. या शतकात ही या तालुक्यता अवाजवी दराने बेकायदेशीर कर्ज देऊन आदिवासी समाजाला कर्जबाजारी ठेवलं गेलंय.
पूर्ण भारतभरात मायक्रोफायनान्स कंपन्यांनी कायद्याच्या अडून सावकारी चालू केलेय, प्रत्येक गावात किमान 50 तरी अशी कुटुंब सापडतील की जे या कंपन्यांच्या कर्जा ने हैराण आहेत पण सरकारने कोणत्याही कंपन्यांवर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. करण या कंपन्या भांडवलशाही च्या सत्तेचा द्योतक आहेत आणि सरकार स्वतः त्यासमोर हतबल आहे.

एकंदर काय तर लोकशाहीत लोक नाहीत, संसदेत 'लोक'नेते नाहीत, कायदा बनावण्यात "लोक"सहभाग नाही, नियमांचं 'लोक' पालन नाही करत पण निवडणुकीत 'लोक'मत म्हणून लोकशाही. 

लोकशाही ही लोकसहभाग, लोकसत्ता, लोकमालकी या तत्वावर चालते आणि त्यात व्यक्तीपूजेला, धर्मांध शक्तीना, भेदभावाला आणि प्रत्येक लोकविरोधी कृतीला  कदापि स्थान नसले पाहिजे. पण या सर्वांना स्थान दिल्याने व्यक्ती देशापेक्षा मोठी होते आणि प्रजासत्ताक देशातून प्रजाच बाजूला सरली जाते.

Source:- Internet

-वैशाली सावित्रीबाई गोरख
 ग्राफिक डिझाइनर.पंढरपूर(मुंबई)

सद्या भारतात जी परिस्थिती दिसतेय त्यावरून तर आपण हेच म्हणू शकतो की प्रजा हरवलेली आहे , सध्या भारत हा प्रजासत्ताक नाही तर राजासत्ताक देश झाला आहे, येथे जनतेला काय हवंय ह्याचा विचार केला जात नाही तर राजाचा जो अजेंडा ठरलेला आहे त्याप्रमाणे सगळं होतय, मग प्रजेन त्याचा विरोध करो, आंदोलन करो राजा ला काही फरक पडत नाही, नि आज भारतातील स्वतःला सुशिक्षित मानणारी बऱ्या पैकी तरुण पिढी अशी आहे की त्यांना देशात काय चाललंय हे ही माहीत नाही, त्याचं अस म्हणणं आहे की आपण आपल्या राजाला गादीवर बसवलंय म्हणजे राजा आपला सगळ्या प्रजेचा विचार करूनच निर्णय घेईल .नि त्यातील थोड्या फार जागृत असलेल्या प्रजेला माहीत आहे की राजा चुकीच्या नि त्यांना जे हवंय तेच लागू करतोय तर त्यांना देशद्रोही आहेत अशी लेबल लावली जातात एवढंच नाही तर रॉड घेऊन मारलं जात,अटक ही केली जाते. नि बाकीच्या प्रजा ही तेच करतेय राजा बोलला ते देशद्रोही आहेत तर आहेत पण स्वतःच्या विचाराने ,चिकित्सा करून पहावं काय चाललंय ह्या साठी त्या उरलेल्या प्रजेला मोबाईल च्या दुनियेतुन वेळ नाहीय , अशा प्रकारे प्रजासत्ताक भारतात दोन प्रकारे हरवलेली प्रजा भेटतेय आपल्याला. आपल्या प्रजासत्ताक भारतात प्रजा हरवायला फक्त राजा जबाबदार नाहीय तर येथील प्रजा च जास्त प्रमाणात त्याला जबाबदार आहे असं मला वाटतं.


Source:- Internet

-अनिल गोडबोले
  सोलापूर

प्रजा"सत्ताक" देश म्हणजे ज्या देशात प्रजा सत्तेच्या केंद्रस्थानी असते ती व्यवस्था... आता हे मोजण्यासाठी कोणताही निकष नाही, परंतु आपण "प्रतिनिधी व्यवस्था" निवडलेली असल्यामुळे ज्या प्रक्रियेद्वारे ज्यांचे जास्त प्रतिनिधी येणार ते राज्यकारभार करणार..... अशी नियमावली आहे...

तर या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन प्रजेसाठी, प्रजेच्या वतीने निर्णय घेणारे सरकार हे प्रजासत्ताक असणार आहे..

आता भारतामध्ये याच्या उलट होत आहे का? असा संभ्रम निर्माण झाला आहे परंतु अजूनही प्रजासत्ताक च आहे असे माझे ठाम मत आहे.. लढण्याचे सामर्थ्य अजूनही पैसेवाल्यानी हिरावून घेतले नाही..

प्रजा आपलीच आहे राज्यकर्ते देखील आपल्यातले आहेत.. चांगल्या व वाईट गोष्टी आपल्यातच आहेत, त्या दूर झाल्या तर नक्कीच"प्रजासत्ताक" झाल्याशिवाय राहणार नाही.

लोकांनी लोकांचे लोकांसाठी उभी केलेली व्यवस्था चुकीची असू शकते पण ती वाईट असू शकत नाही.. लोक लढतील, शिकतील आणि राजकारण देखील या बाजूने झुकेल असा मला विश्वास आहे.

फक्त या मध्ये लढावं लागेल, बलिदान जातील त्यांचंच फार दुःख होत आहे.. प्रजासत्ताक दिन आणि सर्व प्रजेला ही बाजू लवकरात लवकर समजून येईल एवढीच अपेक्षा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************