बदलती माणसे,बदलते पर्यावरण.

बदलती माणसे,बदलते पर्यावरण.

                                                Photo: Google

किरण पवार,औरंगाबाद.
सध्या माणसांच दैनंदिन राहणीमान बऱ्याच प्रमाणात बदलल्याच आपल्याला पहायला मिळतयं पण त्या राहणीमानाचे हकनाक परिणाम आज आपण पर्यावरणावर झालेले पाहतोय. मुळात माणसाला विनाशाकडे जाण्याची हौस असतेच पण मग अशात हकनाक प्राण्यांनी का मरावं? हा प्रश्न ऊभा राहतो. आॅस्ट्रेलिया किती बेचिराख होऊन बसलं आणि माणूस हतबल होऊन सगळं पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हता...
            मी पर्यावरण जरा मनातलं बोलतो आज... झाली मनाची शांती. काय मिळवलत माझा ऱ्हास करून. माझ्यापुढे सर्व गुन्हे क्षम्य ठरले असते तुमचे. पण तुम्ही तर मलाच बरबाद करायला उठलात. एकवेळा नाही तर कित्येक वेळा मी तुम्हाला सांकेतिकरित्या खुणावलही की, बाबांनो सुधरा आता तरी. माझ्याशिवाय तुम्हीही नाही जगू शकत, हे वारंवार सांगण्याची वेळ माणसासारख्या समजुतदार प्राण्यावर यावी. माणसा आजच्या तुझ्या आस्तित्वाच्या नाशाला सर्वस्वी फक्त आणि फक्त तूच जबाबदार आहेस. अजूनही वेळ हाताबाहेर गेली नाही, योग्य काय हे ठरवून मर्यादेत जगायला शिक. प्रत्येक गोष्टीला आपापली बंधन असतात. ही बंधने मात्र तू स्वत:ला अहंकाराच्या भावनेत पाहताना हरवून बसलास. तुझ्या अहंकारापायी टेक्नॉलॉजी आणि विज्ञानाला तू अमूल्य ठरवून निसर्गाला कमी लेखत आलास आजवर. आता अंत असाच एकेकाचा होणार. विनाश अटळ आहे. आणि आता अर्थहीण आहे रे जगणं! काय ठेवलयं यात सांग जरा... मला कधीकधी वाटतं थेट फेकून द्याव सारं थोडांड असलेलं हे लख्तर अंगास चिटकवून ठेवलेलं. तू खंबीर आहेस तर तुझी कृपा बाबा, माझ्यात नाहीये तेवढा धीर. हीच काय ती माझी अक्षम्य चूक असेल. मोहापायी अडून राह्यलंय हे जग. बघं ना म्हणजे एका वाळवंटातल्या तलावातल्या पाण्याने हजारो पक्षी क्षणात खाक व्हावेत का? चूक कोणाची म्हटलं तर इकडे तिकडे बोट फिरतात सहज आपली. पण त्या निश्पाप मुक्तपणे आकाशात स्वैर करणाऱ्या मुक्या जिवांच्या शवाच आता काय करायचं? आज बदलत चाललेल्या पर्यावरणाच्या कोपण्याला जबाबदार कोणयं रे? तू मात्र उत्तर देऊ नकोस. कारण तुला फक्त तात्विक नी बौद्धिक वाद करून तावून सुलाखून सोडायचयं सर्व. तू कधीच अंतर्मनातल्या स्वैर भाबड्या मनाला जगासमोर मांडायचा प्रयत्नही करणार नाहीस, दाखवत राहशील फक्त चुकचुकती सहानुभूती. मला नकोसयं हे असं जग ज्यात क्षणाचीही हल्ली श्वाश्वती उरली नाहीये, मग ती पक्ष्यांची असो, प्राण्यांची वा इतर.

वाल्मीक फड,नाशिक 
खरंय माणसे आज बदलली आहे कारण जुन्या काळात माणसे जशी बोलायची तेच करायची.एखाद्याला शब्द दिला तर जुना माणूस त्या शब्दाखातर आपल्या जिवाची पर्वा न करता दिलेला शब्द पाळत असायचा.आणी आताचा माणूस समोरचा आपल्या पुढे जातो की,काय?त्याच्याकडे आपल्यापेक्षा जास्त काही असो नये.अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील.आजची माणसे इतकी बदलली की त्यांना देव नावाची शक्ती आहे तिच्यावर विश्वास नाहीतर मग यांचा विश्वास कोणावर तर आत्ता आलेल्या नेत्यांवर.
जुन्या काळात निवडणुकीत उभा असलेला एखादा उमेदवार जर गावात आला आणी एखाद्या गावातील जाणकार वृद्ध माणसाने त्या उमेदवाराच्या पाठीवर हात ठेवला की त्याला लोक मतदान करायचे परंतु आत्ता तर उलट आहे दिवसभर एका उमेदवाराबरोबर फिरणार आणी संध्याकाळी दुसऱ्याबरोबर माणूस असा दुफळी झाला आहे आणी माणसांच्या ह्या अनेक चुकांमुळे निसर्गाने सुद्धा आपला रंग बदलायला सुरुवात केलेली आहे.
पर्यावरणाची पुरती वाट लागली आहे.दिवसातून तीन वेळेस हवामान बदलत आहे.उन्हाळा,हिवाळाआणी पावसाळा हे तीनही एकाच दिवसात बघायला मिळत आहे,जसा माणूस बदलला तसाच निसर्गही बदलू पहात आहे.
म्हणून माणसाने सदविचारी,विवेकी वागले पाहीजे तेव्हाच निसर्गाकडून आपल्याला तशीच साथ मिळेल.

                  Photo: Google

प्रतिक्षा बूध्दे,गडचिरोली.

कसे केव्हा दिस गेले 
जेव्हा मातीच आई होती
काळ्या आईच्या कुशीत
ज्योत आयुष्याची होती... 

आज कुणाला कळना
कोण मास हा चालला
त्याच्या शेतकरी जीवाचा
जणु हाडोक संपेना...

सार्या जगाचा पोशींदा
आज उपाशीच मेला
त्यांचं लेकरु कोवळं
तो ही शहरास निघाला... 

कसे केव्हा दिस गेले
पोरं माडावर होती
दुर आकाशी पतंग
त्याची हाती दोरी होती...

गाव माडही ओसाड
गर्दी शहरात झाली
कसा पडला दुष्काळ
नदी मनीची आटली...

कधी कळेल का मला
कसा देव भूत झाला
ज्यांची जागा मंदिरात
तोच मदिरा प्यायला...
...प्रति_ksha

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************