उद्योजकता नवकल्पना



विषय क्र ४ : उद्योजकता नवकल्पना

शिरीष उमरे, नवी मुंबई
निखिल खोडे, ठाणे
महेश एम. कामडी, नागपूर
श्रीकांत निवल यवतमाळ
हरिश पोटे
अजय तळेकर
शीतल शिंदे, दहिवडी जि .सातारा 
पवन खरात, अंबाजोगाई
अनिल गोडबोले, सोलापूर
राकेश पवार , मालेगाव
यशवंती होनमाने, मोहोळ
हरीदास यादवमंगळवेढा,जि.सोलापूर
नरेश शिवलिंग बदनाळे, जि.लातुर






उद्योजकता नवकल्पना.
शिरीष उमरे, नवी मुंबई


पुर्वी ग्रामीण भागात शेती मुख्य व्यवसाय असायचा व त्याला प्रेरक कींवा आधारित बरेचसे व्यवसाय असायचे. त्याकाळी त्या व्यवसायिकांना नारु/कारु कींवा अलुतेदार/ बलुतेदार म्हणायचे. ही सर्वसमावेशक सेवा पुरवणारी उद्योजकीय व्यवस्था उत्कृष्ट दर्जाची असायची. ह्यात कुंभार, लोहार, सुतार, सोनार, चांभार, तेली, माळी, न्हावी, परीट, कोळी, गवळी कास्तकार अशी बारापगडी कारभारी व्यवस्थेमुळे खेडी स्वयंपुर्ण असायची.

नंतरच्या जागतिक औद्योगिकरणांमुळे कारखाने व शहरे ह्यांचा विकास होत गेला. रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होत गेल्याने शहराकडे धाव वाढत गेली व खेडी भकास होत गेली. पाश्चीमात्य चंगळवादी जीवन शैलीकडे आकर्षित नवी पीढी आपली संस्कृती विसरुन गेली. कार्पोरेटच्या नोकरी रुपी गुलामीत धन्यता मानु लागली... दुरसंचार तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जग एक ग्लोबल व्हीलेज झाले. व्यापारिकरणाचे दुष्परिणाम जाणावायला लागल्यावर मिडलक्लास लोकांची कुंचबणा झाली... इकडे आड तिकडे विहीर... ज्यांना शक्य होते ते विकसीत देशात निघुन गेले व काही गांधींचा चला खेड्यांकडे ह्या मार्गावर चलण्याचा प्रयत्न करताहेत. बाकी आठ-दहा तास न आवडणार्या कामात मरमर मेहनत घेऊन हवापाणीअन्न प्रदुषणाचे चटके सहन करत कसेबसे जीवन घालवत आहेत.

भविष्याचा विचार केला तर ८०% परंपरागत नोकरीच्या संधी ह्या एआय (artificial intelligence) व रोबोटमुळे संपनार आहेत. डॉक्टरच्या ऐवजी रोबोट सर्जरी करतील तर मग कामगार वर्गाचे काय होईल ह्याचा विचार न केलेला बरा !!

मग अश्या वेळी काय करावे हा यक्षप्रश्न युवा पीढीसमोर आहे. उद्योजक विकासाच्या नावाखाली स्वातंत्र्यानंतर शासनाने काय दिवे लावले ते दिसतच आहे. शिक्षणाच्या नावाखाली डीग्रीची पुंगळ्या घेऊन बेरोेजगारांच्या झुंडी सगळीकडे फीरतांना दिसत आहेत. पोलीस भरतीच्या वेळी लाखो मुलांच्या गर्दीत इडली विकणारा केरळी, पुरीभाजी विकणारा सरदार कींवा केळे विकणारा युपीवाला भैया बघितले तर एक आशेचा कीरण दिसतो. गरज ही व्यवसायाची जननी असते म्हणतात ते उगीचच नाही. 

जरी आपल्या देशामध्ये संशोधन विकासाची बोंब आहे तरीही मी म्हणेन की सध्या त्याचीच नितांत गरज आहे. आपल्याला हवेत लाखो राँचो ( ३इडीयट फेम ). छोटे छोटे व्यावसायिक व देशी तंत्रज्ञान ( जुगाड नाही) यांची सक्त गरज आहे देशाला ! उद्योग काही रॉकेट सायन्स नाही. कोणीही शिकु शकतो व करु शकतो.

शासनाने डीसेंट्रलायजेशन व आर अँड डी वर पॉलीसी डीझाइन करायला हव्या. शिक्षणाचे थेअरी ऐवजी प्रॅक्टीकल असे स्वरुप व्हावे... 

शिक्षणासोबत जॉब व नंतर स्वतंत्र व्यवसाय हा मार्ग सध्यातरी योग्य वाटतो. त्यासाठी हवी घारीसारखी नजर.. संधी शोधत राहणे, अनुभव वाढवत राहणे व योग्य वेळ साधुन प्रगती करणे.. हा मंत्र युवांसाठी... 
त्यासाठी हवे विस्त्रुत वाचन व योग्य लोकांसोबत नेटवर्क.... बघा आभाळएवढे स्वप्न व फुटु द्या तुमच्या कल्पनेला भरारीचे पंख !! 

उद्योजकता नवकल्पना.
निखिल खोडे, ठाणे.

एखाद्या व्यक्तीने व्यवसायात विशिष्ट कौशल्य मिळवले असेल तर त्याला उद्योजकता नवकल्पक म्हणता येईल. व्यवसाय करताना उत्तमरित्या कसा करता येईल, त्यासाठी नवीन इनोव्हेटिव्ह विचारांची करण्याची नेहमीच गरज असते.


एखाद्या वस्तु मध्ये योग्य प्रक्रिया केली तर, त्या वस्तूची किंमत दुप्पट होते. उदाहरणार्थ तूरी पेक्षा तूर डाळची किंमत जास्त असते. घरीच डाळ बनवली आणि सप्लाय चेन निर्माण करून विक्री केली तर चांगल्या भावात जाईल. 

तसेच भाजीपाला, फुल व फळ आणि सी फुड सोलर ड्रायर ने वाळवुन त्याची शेल्फ लाइफ व कींमत वाढते. नंतर मार्केट व डीमांड नुसार विकता येतो.

एखाद्या शहरात छोट्या जागेत छोट हॉटेल किंवा रेसटॉरंट्स टाकून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आपण आपला व्यवसाय उक्तृष्ट रित्या करू शकतो.

आदिवासी भागात कडकनाथ कोंबडी व अंडे हा सुध्दा विक्री व्यवसाय सध्या जोमात सुरु आहे.

ग्रामीण भागात बायो कम्पोस्टेबल सॅनिटरी नॅपकीन्स चे उत्पादन कमी गुंतवणुकीतुन करता येऊ शकते. बांबु पल्प व उसाचा चिपाड/बगास आणि केळीचे खोड असा कच्चा माल कमी कीमतीत मिळु शकतो. 

व्यवसाय करताना व्यावसायिक वृत्ती, नवीन कल्पना वापरून व्यवसायासाठी प्रयत्नशिल असणे, कष्ट, आशावादी विचार, पैश्याचा आवक-जावक वर बारकाईने लक्ष ठेवणे या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. 

महेश एम. कामडी, नागपूर 
उद्योजकता नवकल्पना

आज आपण पाहत असाल तरुण पिढी ही नोकरी व फक्त सरकारी नोकरी कडे जास्त भर देत आहे असं दिसून पडत.
येवढाच नाही तर लग्न जरी करायचं म्हतल तर मुलगा काय करू जॉब करतो का
जॉब करतो तर सरकारी जॉब आहे का
पण उद्योग, व्यापार करत असेल तर का? चालत नाही का? का असे वागतात लोक
उद्योजकता नवकल्पना तर नाही म्हणता येणार फक्त आपण नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे मराठी माणूस
कल्पना तर जुनीच आहे फक्त दृष्टिकोन नवा ठेऊन समोर जायचं आहे. आज काय नाही आपल्या महाराष्ट्रात सर्वच आहे तरी म्हणतात मराठी माणूस उद्योगात मागे आहे का
पण असे नाही आज महाराष्ट्रीयन माणूस सुद्धा उद्योजकता वर्चस्व प्रस्थापित करण्यास मागे नाही.
आज भाजीपाल्याच्या छोट्याशा ठेल्यापासून D - mart पर्यंत सुधा गेला आहे. ओद्योगिक क्षेत्रातही आपली थाप मारत आहे मराठी माणूस.
"केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे"
फक्त स्वतःवर विश्वास हवा, जग आपल्याच हातात आहे मग




उद्योजक्ता नवकल्पना.
श्रीकांत निवल यवतमाळ
आजच्या जगात बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या मागील कारण म्हणजे आपल्या देशातील शिक्षण पद्धती. आपल्या देशात जे काही नवीन आले की सर्व त्याच्या मागे धावतात मग त्या साठी वाटेल ते करतात.वडील सुद्धा हा विचार करीत नाही की आपल्या मुलाला हे झेपेल की नाही व मग तो का एकदा मागे पडला की तो तिथेच थांबला. अशी आमच्या ग्रामीण भागातील मुलांची अवस्था झाली आहे. इंजिनिअरीग चे मुले खाली आणि ITI ची मुले खूप पगार घेत असल्याचे चित्र दिसत आहे.एखाद्याने जर एखादा धंदा टाकला की लगेच दुसरा पण तोच धंदा टाकणार मग दोघेचे धंदे हो अगर ना हो अशी आजची परिस्थिती आहे.
असो विषय भरकटत जात आहे.उद्योगजकाता नवकल्पना या विषयावर लिहायचे झाले तर देशातील ग्रामीण भागात शेतीवर आधारित लघुउद्योग युवकांनी करण्याची गरज आहे.विशिट भागात विशिष्ट पीक घेतल्या जाते. जसे आमच्या विदर्भ मध्ये तूर सोयाबीन आणि कापुस पिकण्याचे प्रमाण जास्त आहे परंतु या पिकांना भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या चे प्रमाण पण जास्त आहे. जर जर या पिकांवर जर त्या भागातील युवकांनी इंटरनेटच्या माध्यमातून लघुउद्योगाचा शोध घेऊन काही लघुउद्योग उभे करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपआपला कुवतीनुसार सहभाग देने गरजेचे आहे.शक्य झाल्यास सरकारी योजना चा वापर करून घेता येईल. अगदी जवळच्या ठिकाणी योग्य प्रक्रिया करून सेल करून शेतकऱ्यांना जास्त भाव मिळत असेल तर बेरोजगाराना काम मिळेल व शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल.व आत्महत्यचे प्रमाण कमी होईल. नाहीतर सरकारने सोयाबीनचे हमीभाव ठरला आहे 3399रुपये आणि मार्केट देत आहे 2800 ते2900रुपये या मध्ये शेतकऱयांचा खर्च पण निघत नाही.जर अश्या लघुउद्योगातून विशिष्ट प्रक्रिया करून एकाच दगडात दोन पक्षी मारले जाऊ शकत असेल तर काय हरकत आहे.फक्त आता गरज आहे युवकांनी पुढाकार घेण्याची व नवीन उधोजक संकल्पना साकारण्याची.असे माझे वयक्तिक मत आहे.


उद्योजकता नवकल्पना
हरिश पोटे

उद्योग आणि उद्योजक म्हटलं की मनामधे आपसूक शहराचा विचार उतरतो
भारत हा युवकांचा देश, पण आज सरासरी पेक्षा ज्यास्त युवकांच्या मानसिकतेचा विचार केला तर आपल्याला समजते की आजचे युवक संकुचीत होत चालले आहेत विचारांच्या बाबतीत. नोकरशाहीच्या गुलामीचे शिकार होताना दिसतात, कमी वेळात पैसा कमावणे हे त्यांचे जणू धेय्यच बनल आह कीे काय ही शंका उदभवते कित्तेकदा. तर काही युवक परिस्थिशीची झगडताना दिसतातं. याहीपलिकडे जावून काही जन व्यवसायाचा विचार करतात आणि शेवटी शहराकडे वळताना दिसतात, मग शहरी लोकांची गरज, शहरातील गजबजलेला भाग, भांडवल, त्यावर आधारीत फायदा, आणि तोटाच झाला तर.. असे वेगवेगळे विचार घोंगावून लागतात..

पण शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे, त्याकडेही लक्ष वेधले गेले पाहीजे. पण आज तरूण उच्च शिक्षण घेऊन नोकरी साठी शहराकडे वळतात आणि तिथे वेगवेळ्या संधी शोधू लागतात आणि इथेही काही संधी न मिळाणारे स्पर्धा परिक्षांची तयारी करतात म्हणजे संपूर्ण प्रयत्न नोकरी भोवती फिरतात.

धेय्यवादी व मार्गदर्शक नेत्रृत्वाचा आणि शासनाच्या पोकळ नियोजनाचा परिणाम दिसतो. पण सध्याची नैसर्गिक परिसथिती पाहता शेती हा व्यवसाय देखिल अभ्यासपूर्वक करावा लागेल. त्याकरता सहकार चळवळीला पुनरोज्जिवीत करण्याची गरज पुन्हा भसते. तसेच संघटीत होऊन शेती सारखा व्यवसाय अभ्यासयुक्त उभा होऊ शकतो. तसेच वेगवळे लघु उद्योगांमधे उतरण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण शासकीय योजनांनद्वारे आपण मिळवू शकतो त्यासाठी तत्पर, चिकीत्सक, आभ्यासक व सतर्कता असे स्वभावगुण अंगीकीरण्याची क्षमता हवी. सतत समाजातील वेगवेगळ्या घटकाच्या संपर्कात व संवाद साधता यायला हवा या मधून नवनविन संधी व व्यवसायच्या कल्पना मिळतात. त्याचबरोबर पारंपारीक उद्योगही नवनवीन संधी उपलब्ध कारतायत त्यांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या बंधनाच्या मानसिकतेमधून बाहेर पडण्याची गरज आहे. शिक्षण हे बुद्धीला संमृद्ध करते नोकरीच्या क्षेत्रांबद्दल मर्यादा निर्माण करू शकत नाही. वेगवेगळे अनुभव आत्मसात करणे महत्वाचे आहे यातूनच एक उत्तम उद्योजक तयार होतो. 

शासनानेही त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडून धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. आैद्योगिक क्षेत्राचे झालेले केंद्रियकरण हे भक्त शहरांचाच विकास करू शकते. वेगवेगळे उद्योग हे ग्रामीण भागामधे देखिल घेऊन जाणे तेवढेच महत्वाचे आहे. भरभक्कम आरक्षित औद्योगिक क्षेत्र असण्यापेक्षा छोटी छोटी अंतराची मर्यादा असलेली औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मोठे उद्योग वेगवेगळ्या भागामधे पसरून रोजगार निर्मीतीतर होईलच पण विकास मोठ्याप्रमाणात होण्यास मदत होईल. तसेच आपल्या भागामधे आलेल्या उद्योगाला जोडउद्योग किंवा लघुउद्योगाच्या प्रेरणा युवकांना मिळतील आणि यामधून देखिल यशस्वी उद्योजक देश्याच्या विकासात हातभार लावतील..




अजय तळेकर
उद्योजक्ता नवकल्पना.

मित्रांनो आज सर्वच लोक हे नोकरी पाठी चालले आहे ,पण तोच प्रयत्न जर स्वताचा उद्योग उभा करण्यासाठी केला तर ना आपला कोण बॉस असेल ना आपन कुणाचे गुलाम असू.नोकरी करुण आपन जितकी इनकम मिळवनार त्यापेक्षा जास्त इनकम आपन आपल्या स्वताच्या व्यवसायात निर्माण करु शकतो सर्व आपल्या कामावर डिपेड़ आपन काय करतो .आणि व्यवसाय करायचा म्हटल तर कोणत्याही एका व्यवसायवर अवलंबून राहु नये त्या व्यवसयाला जोड धन्दा करावा म्हणजे हातामधे एक हातचा घेऊन काम करावे,

पण उद्योग करावा कसला
हा प्रश्न सर्वाणपुढे पडतो आपन जी गोष्ट करु शकतो ना अश्याच गोष्टीचा उद्योग व्यवसाय उभा करावा ,
जसे की शेतकरी बांधवाणी शेतीला जोडून पूरक असा दुग्ध व्यवसाय करावा ,पोल्ट्री फार्म करावे ,शेळीपालन करावे ,शहरी मंडळीनि शहर ठिकाणी कपड़ा दुकान मोबाईल शॉप हॉटेल .असे बरेच उद्योग असता त्यांची कमी शोधून तो व्यवसाय चालू करावे .
पण व्यवसायसाठी लागणारे भांडवल हे पहिल्यांदा कमी गुंतवणुकीतून करावे म्हणजे ना लॉस जाण्याची चिंता ना काय ,येणाऱ्या इनकम मधे आपले आर्थिक भांडवल जास्त गुंतवून उद्योग पण मोठा करता येतो ,
एक कोम्बडी एक अंडे देते त्या एका पासून त्याचे किती होता हे तर महितच असेल सर्वाना ,फक्त एकदा तुम्ही स्वताच्या हिमतिवर प्रयत्न करा लाइफ सक्सेस होईल शेवटी प्रयतनार्थी परमेश्वर.

ऊद्योजक्ता नव कल्पना 
शीतल शिंदे .
दहिवडी जि .सातारा 

आजची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणी मार्क्स , मेरीट , स्पर्धा , लक्षात घेता नोकरी मिळणे मिळवणे फार अवघड झाले आहे .
सुशिक्षित - बेरोजगारी वाढलेली पहावयास मिळते .आणी नव तरुण नोकरी न मिळाल्याच्या निमित्ताने भरकटतात .कोणी विचारले की स्वतःच्या पायावर उभे रहायचे प्रयत्न करतोय हे उत्तर . 

अरे दादा तु आत्ताही स्वतः च्या पायावरच उभा आहेस फक्त तुला आजूबाजूला पाहून तु तूझे पाऊल उचलायचे आहेस .

बघा जरा डोळसपणे आपल्या सभोवताली .वाडी वस्तीवर असाल तर शेतीबरोब छोटे दुकान, टफरि , दूध कलेक्शन , शेती मालासाठी चार चाकी ,शेलीपालण , कुकुट्पालण , फळबाग , फळ बाग विकत घेवून शहरात ताजे फळे भाजी पुरवणे इत्यादी व्यवसाय करू शकतात .

छोट्या गावात कापड दुकान -कफन सहित असावे .किराणा दुकान उन्हाळ्यात थंड पेये वाहतुकीचे वाहन व्यवस्था इत्यादी. 

निमशहरी भागात मुलांचे क्लास ,कराटे क्लास , डान्स , शिलाई , कापड दुकान , मुलांचे ड्रेस कोड ऑर्डर घेणे _ गारमेंट , पार्लर , ज्वेलरीआणी पुन्हा किराणा दुकान इत्यादी .

शहरात ngo मधे भरपूर कामे जॉब मिळतात .फक्त कष्ट करायची तयारी ठेवा .त्याबरोबर रूम भाड्याने पाहणे , प्लँट प्लॉट
विकणे , भुसार मालाचा व्यापार , नेट - काँप्युटर सेंटर , टायपिंग सेंटर , मोबाईल शॉप इत्यादी व्यवसाय करू शकता .

खरेतर व्यवसाय निवडताना तो परिसर , ठिकाण त्याची भौगौलीक परीस्थिती , मागणी - पुरवठा आणी खप याचा विचार करणे गरजेचे आहे .

उच्य शिक्षण , त्यानंतर नोकरी , शेती - व्यापार - उद्योग आशा पध्हतीणे काम करणे गरजेचे आहे .

दुष्काळात टँकर ने पाणी पुरवणे , भुसार माल पुरवणे ईत्यादि .

जश्या प्रकारे किराणा दुकान वाला अनेक वस्तु आपल्या दुकानात ठेवतो तश्या प्रकारे आपल्या उदरनिर्वाह साठी आपल्या डोक्यात अनेक प्रकारचे उद्योग करण्याचे विचार येणे गरजेचे आहे .एकमेकांना पूरक असे व्यवसाय बरे पडतात .
महिलांसाठी भरत काम शिवणकाम , ज्वेलरी इत्यादी .

नोकरी नोकरी नोकरी नाही मिळाली तर काय करणार .मग हे करा नक्कीच जमेल .



उद्योजकता नवकल्पना
पवन खरात, अंबाजोगाई.
खरं तर नौकरी आणि व्यवसाय या दोन भिन्न टोकाच्या गोष्टी आहेत. अनेकांना नौकरी मध्ये आवड असते तर काहीना नोकरीची बांधीलकी नको वाटते म्हणून व्यवसायात आवड असते, पण काही लोकांना नोकरी मिळत नाही म्हणून व्यवसाय करावा लागतो.
पण मला एक वाटत नोकरी म्हणजे सर्वस्व आहे असं नाही किंवा नौकरी नाही म्हणून तुम्ही बेरोजगार आहेत असे नाही. नोकरी व्यतिरिक्त असे अनेक व्यवसाय आहेत ज्यावर तुम्ही तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा उत्तमरित्या उदर निर्वाह करू शकता.
व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची तीव्र ईच्छा शक्ती महत्वाची असते, आज ही भारत देशात नौकरी करणाऱ्या लोकांपेक्षा व्यवसाय करणारे लोक पुढे आहेत. आपल्याकडे अनेक उत्कृष्ट व्यावसायिक लोक आहे ज्यांनी खूप हालाकीच्या परिस्थिती मध्ये व्यवसायाची सुरवात केली, आज त्यांची स्थिती काय आहे आपणास चांगले ठाऊक आहे. उदा. रतन टाटा, अंबानी.

पैसा कमावण्यासाठी फक्त उच्च शिक्षण लागते असे नाही, ज्याला शिक्षणात रस नसेल तर त्याला व्यवसायात आवड असू शकते. पालकांना सुद्धा एक विनंती आहे, तर आपल्या पाल्याला शिक्षण आवड नसेल तर त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करियर करू द्या. त्यात व्यवसाय असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल.
"काही नौकर वर्गाला वाटतो व्यवसाय करणारा खूप सुखी आहे आणि व्यवसाय करणाऱ्या काही जणांना वाटत की नौकर वर्ग खूप सुखी आहे." पण नेकम अस नसतं. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. काही उणिवा असतात काही फायदे असतात.
पण जर आपल्या नोकरी मागणाऱ्या पेक्षा नौकरी देणारे होता आले तर काय हरकत ?

तस मला व्यवसायातील जास्त माहिती नाही
ईच्छा तशी खूप होती पण कधी योग्य आला नव्हता. पण आमच्या सुमेध आणि ईश्वर नावाच्या या दोन मित्रा मुळे मी या क्षेत्राकडे वळलो आणि तिघांनी मिळून छोटीशी सुरवात म्हणून फ्रेंड्स फास्ट फूड नावाचे एक कॉफी शॉप ची सुरुवात के

ली. सुरवात करताना बराच विचार केला की आपण जे करतो आहेत ते योग्य करतो आहेत का ? पण शेवटी एक निर्णय झाला की ,झाले तर नुकसान होईल नाही तर अनुभव तरी येईल.

"मुश्किले तो मन्नत से मांगी है,
जिंदगी इस रेस में डरना मना है।
सपनो को सांसो मे बसाना है,
अब डर को ही हर कदम डराना है । "


उद्योजगता नवकल्पना..
अनिल गोडबोले
सोलापूर

नोकरी करणे हा प्रकार सगळ्यात आवडता.. सेफ.. आणि जबाबदारी नसलेला प्रकार..

आपल्याला दुसऱ्याला दोष देत जगायला आवडत.. कारण कोनितरी आहे ज्यांच्याकडे बोट दाखवून आपण वाट्टेल तेवढं काम कमी पैशात कुरकुर करत केलो तरी एका प्रमोशन वर समाधानी राहणारा व तशी मानसिकता ठेवून शिक्षण देणारा एक वर्ग आहे...त्यातला मी देखील एक आहे.

उद्योजग असणे किंवा होणे हे व्यक्तिमत्व नसून.. ती एक जीवनशैली आहे.

काहीतरी कल्पना डोक्यात आणून प्रत्यक्ष लोकांच्या मनात ती उतरवणे आणि बाजारात आणणे या साठी प्रचंड कल्पकता, जिद्ध आणि हार न मानण्याची वृत्ति लागते.. व ती उद्योजक झाल्यावर येते.

एक काळ होता तेव्हा.. एक गोष्ट घ्यायची किंवा कल्पना घ्यायची.. मांडायची, मार्केटमध्ये आणायची.. प्रचंड जाहिरातीच्या जोरावर.. 2 रुपयांची वस्तू 3 किंवा 5 रुपयाला विकायची. फारच वाटलं तर प्रक्रिया करायची.. 

पण आता हे स्वरूप मागे पडत आहे. आपल्याला आपल्या वस्तूच ब्रँडिंग करता येणं गरजेच आहे, आणि तीच 2 रुपयांची वस्तू 100 रुपयाला विकण्याची तयारी ठेवावी लागते.. याला म्हणतात नवीन कल्पना (इंग्लिश मध्ये याला इंटरप्रूनेर शिप म्हणतात)

कल्पना काढा.. व्हर्च्युअल विका.. लोकांना उपयुक्त आहे हे पटवून द्या.. या मध्ये सेवा देणाऱ्या संस्था नफ्यात आहेत..

सोशल मीडिया मार्केटिंग करा.. ऑनलाईन हा नवीन ट्रेंड किंवा इ- कॉमर्स आहे..यावर काम।करू शकतो.. दरवेळी परदेशी लोकांना दोष देऊन उपयोग नाही..

फक्त या साठी संयम पाहिजे.. खरतर जीवनशैली आणि विचार त्या पद्धतीने पाहिजेत. पैसे उभे करण्यासाठी योग्य पद्धत आणि योग्य 'आर्थिक साक्षरता' पाहिजे ते शिकता येऊ शकत..

रॉबर्ट कियोसकी यांचं 'रिच डॅड पुर डॅड' वाचलं.. त्यात एक गोष्ट कळली की श्रीमंत लोकांबाबत भ्रामक कल्पना ठेवल्यात आपण त्या सोडल्या पाहिजेत

आणि सगळ्यात महत्त्वाचं भावनिक गुंतवणूक पाहिजे.. तुम्ही तुमचया सेवे बद्दल, व्यवसायात, कर्मचारी व प्रोडक्त या सर्वांना भावनिक आवाहन करून टिकवता आलं पाहिजे..

बाजारात विकण्याचे कौशल्य असेल तर कुठलीही नवनिर्मिती करू शकतो... नवीन उद्योजक उभे राहतील स्टार्ट अप मधून किंवा.. आपण चांगला धडा घेऊन अजून परिपक्व होऊ शकतो.. 
काळाची पावले ओळखा आणि उद्योजक व्हा...!!!!


उद्योजगता नवकल्पना
राकेश पवार 
मालेगाव 

आज सर्वाच 1च लक्ष असते की चांगला जॉब हवा अणि सर्व मूल मूली इंजीनियरिंग मागे लागतात कारण प्रत्येकाला 1 चांगला जॉब हवा असतो 
पण मूल उधोग क्षेत्राची का नहीं निवड करत मि मनतो उधोग म्हटले तर भांडवल लगते यामुळे कोणी उधोग करत नही पन मित्रा नो उधोग म्हणजे अपन स्वता त्याचे मालक ना की कोणाची गुलामी सरकी नोकरी उधोगासाठी आपले सरकारने नवनवीन योजना देत आहेत जसे की मुद्रा योजना स्वताचा व्यवसाय करता येईल त्या साठी आपले सरकार आपल्याला पैसे देतात 

आता शेती ला जोड़धंदा म्हणून दूध उत्पादन कुकुट पालन इत्यादि आज 1 चांगला व्यवसाय म्हणून हॉटेल्स खुप कही आहे करायला पन म्हणतात ना जिद्द अणि हिम्मत असावी लागते

मित्रानो माजा हा पहिलाच लेक आहे म्हणून माप करा चुकी झाली असेल तर 
धन्यवाद



उद्योजकता नवकल्पना
यशवंती होनमाने.
मोहोळ ...

'अरे नसते ते भीकेचे डोहाळे लागलेत , चांगली नौकरी सोडून म्हणे उद्योग करायचाय ' अस ऐकायला मिळत ज्यावेळी आपण नौकरी सोडून धंदा करायचा म्हणतो ...किती अवघड आहे ना ? ? ? आपण मुलांना स्वावलंबना चे धडे देतो आणि आपणच त्यांना गुलाम बनवतो ...नौकरी म्हणजे सुख आणि धंदा म्हणजे डोक्याला कटकट , वैताग , नुकसान , टेनशन , अस वाटत .
आपण कधी चांगला विचार च करत नाही ..अहो छोट्या मोठ्या उद्योग धंद्या मधूनच सरकारला जास्त महसूल मिळतो .उद्योगात जम बसेपर्यन्त थोडा त्रास हा होणारच ..नौकरी मध्ये पण होतोच की सुरवातीला त्रास ...पण एकदा का जम बसला मग त्याच उद्योगाची भरभराट होते ...अहो म्हणतात ना की बोलणाऱ्याचे खराब गहू पण विकतात ...अगदी तसेच स्किल्स पाहिजेत मग बघा ....
उद्योग धंद्यात फक्त स्वतःला सिध्द करता आल पाहिजे ..तुम्ही कशाचाही उद्योग करा पण ....मार्केट मध्ये टिकून रहा ....


उद्योजकता नवकल्पना.
हरीदास यादव,
मंगळवेढा,जि.सोलापूर.

कोणताही नविन उद्योग करत असताना कांही गोष्टी खुपच महत्त्वाच्या असतात.

१) सळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जो उद्योग आपण करणार आहोत त्याची मनापासून आवड आसने गरजेचे आहे.

२) जो उद्योग निवडलेला आहे, त्याचे संपूर्ण ज्ञान असले पाहिजे.

३) आपण निवडलेला उद्योग यापूर्वी कुणी केला आहे का ते पाहिले पाहिजे, तो चालू आहे का ते पहावे जर बंद असेल तर तो का बंद आहे त्याची कारणे शोधून त्याच्या मुळापर्यंत जावून अभ्यास करावा लागेल.

४) कोणताही उद्योग असूद्या त्याची सुरुवात शक्य तेवढ्या लहान स्वरूपात करणे चांगले, कारण बाजापेठेचा अंदाज घेऊन पुढे उद्योग वाढवता येतो.

५) उद्योग भागीदारीत असो अथवा वैयक्तिक, सुरुवातीपासून हिशोब काटेकोरपणे ठेवणे फार गरजेचे असते.

६) शासन स्थरावरील सर्व परवानग्या, व अनुदानाविषयी माहिती करुन घेणे व योग्य वेळी कागदपत्रांची पुर्तता करणे गरजेचे असते.

७) शासकीय अनुदान हे उद्योगाला प्रोत्साहन देणेसाठी असते, ते आपल्या नफ्यात मोजू नये,त्याचा वापर संकट काळातील पुंजी म्हणून केल्यास खुप मदत होते.

८) अनुदान मिळतय म्हणून जर कोणी उद्योग करत असेल तर त्यांनी उद्योगात पडू नये. करण असे उद्योग बंद पडले आहेत.

९) बाजापेठेचा अभ्यास करुनच उद्योगाला सुरुवात करावी,उद्योगाची उभारणी करुन बाजाराचा शोध घेणे जिकिरीच काम होवू शकत.

१०) दर्जेदार उत्पादनाबरोबरच योग्य जाहिरात करणे ही महत्त्वाची बाब आहे. तसेच कोणत्याही उद्योगातील नफा-तोटा ३६५ दिवस म्हणजे एक वर्ष कळत नसतो, म्हणून एक वर्ष स्थिर राहून चिकाटीने,काटकसरीने व धैर्याने उद्योग करणे गरजेचे असते.

सर्वसाधारण पणे एवढ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर, उद्योगाचे यश व भरभराट याची देही याची डोळा पहायला मिळेल.

*तरुणाईची वेल कल्पकतेच्या जोरावर उद्योगाच्या यशशिखरावर विराजमान होवो,हिच सदिच्छा ...!*

उद्योजकता नवकल्पना...
नरेश शिवलिंग बदनाळे, जि.लातुर

मुळात उद्योजकता हा शब्दच खुप जड आहे...उद्योग सुरु करण्याच्या कल्पनेपेक्षा आणि उद्योग सुरु करण्याची कल्पना ही जेवढी सोपी वाटते तेवढी नाही असंही खुप जणांच मत असते हो आहेत ते बरोबर,कारण म्हणन्या इतके करणं सोप्प नाही आणि हे तितकंच खोटंपण आहे कारण जिद्द,मेहनत,चिकाटी,यासोबत हे इतके अवघड पण नाही...चला तर मग आपण त्याच्या अ आ ई कडे वळुया उद्योग,व्यापार,व्यवसाय,धंदा अशा अनेक नावांनी उद्योगाला ओळखलं जातं उद्योग म्हणजे काय तर अर्थशास्त्रात उद्योग ह्या शब्दाला मर्यादित अर्थ आहे. ह्या संदर्भात उद्योग म्हणजे ज्या उत्पादनसंस्थांत नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य किंवा पुढील उत्पादन प्रक्रियेस उपयुक्त, असा एकच प्रकारचा माल निर्माण केला जातो, अशा उत्पादनसंस्थांचा समूह.हे कदाचित सर्वांना ठाउक आहेच,उद्योगाचे प्रामुख्याने ३ प्रकार पडतात प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक विभाग. हे वर्गीकरण प्रामुख्याने या तीन विभांगातील उत्पादनाचे स्वरूप व त्यातील मानवी श्रमाचा भाग, ह्या दोन गोष्टी पुढे ठेवून केले आहे. प्राथमिक विभागातील कृषि-उद्योग, खनिकर्म, जंगल उद्योग, मच्छीमारी ह्यांचा जो तयार माल उपलब्ध होतो, त्यात निसर्गदत्त देणगीचा वाटा मोठा असून मालावरील प्रक्रियेत मानवी श्रमाचा भाग मर्यादित असतो. द्वितीयक विभागात नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून तिचे उपभोग्य वा पुढील टप्प्यांच्या वस्तूंच्या उत्पादनास योग्य, असे रूपांतर केले जाते. ह्या विभागात इतर आर्थिक व्यवहारांबरोबर अवजड उद्योगधंदे, भांडवली उद्योगधंदे, उपभोग्य वस्तूंचे उद्योगधंदे, कुटिरोद्योग, हस्तव्यवसाय, लघुउद्योग ह्यांचाही समावेश होतो. ह्या विभागातील मालाच्या उत्पादनात मानवी प्रयत्नाचा वाटा मोठा असतो. तृतीयक विभाग म्हणजे सेवा विभाग व वाहतूक, दळणवळण इत्यादी. ह्यात डॉक्टर, वकिलापासून घरगड्यापर्यंतच्या विविध तऱ्हांच्या व्यवसायांचा समावेश होतो. ह्या विभागाचे वैशिष्ट्य असे की, ह्यात दृश्य वस्तूंचे उत्पादन होत नाही.आणि हे उद्योग चालवणारा तो उद्योजक त्याची व्याख्या म्हणलं तर उद्योजकता म्हणजे Entrepreneurship उद्योजक म्हणजे Entrepreneur . हा शब्द इंग्रजी जरी असला तरी त्यांचं मुळ फ्रेंच भाषेमध्ये आहे. या शब्दाचा अर्थ आहे 'अशी व्यक्ती जी जोखिम घेते'. Someone who undertakes risk. उद्योजकाचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे 'जोखिम' आपल्याला उद्योजकता म्हणजे काय हे समजुन घ्यायचं असेल तर उद्योजक जोखिम का घेतो व कशी घेतो हे समजुन घेतलं पाहीजे. त्याचप्रमाणे उद्योगात संधी किती आहेत याचा विचारही करणे गरजेचे आहे. बाजारपेठेमध्ये कोणत्या गोष्टींना सतत मागणी असते, कोणकोणत्या नव्या संधी बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत आहेत, निवडलेल्या संबंधित उद्योगात किती संधी आहे याची माहिती घेणेही महत्त्वाचे ठरते.काही उद्योगांसाठी मोक्याची जागा असणे आवश्यक असते, तर काहींसाठी मोठे गोडाऊन अथवा साठवणूक करता येईल अशी मोठी जागा असणे गरजेचे असते. अशी जागा थोडी आतल्या बाजूला असली तरी चालते. ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री, हॉटेल, कपडे, औषधे, सौंदर्यप्रसाधने यांसारख्या उद्योगांसाठी तुम्हाला जागेची निवड काळजीपूर्वक करावी लागते. उदा. हॉटेल, मॉल, आदी उद्योगांसाठी पार्किंगच्या सोयीचा विचार करावा लागेल, अन्यथा त्याचा परिणाम उद्योगावर होईल. त्याचप्रमाणे काही उद्योग घरगुती असतील तर घराची रचना त्याप्रमाणे करावी आणि उद्योग सुरु करावा.परंतु उद्योग सुरु केला म्हणज खरा खेळ सुरु झाला आणि या खेळात शेवट पर्यंत कसे टिकुन राहायचे हे आपल्यावर असते त्यासाठी आपल्या प्रत्येक व्यवहारात, निर्णयात पारदर्शकता असली पाहिजे कोणाला तरी मागे टाकायचय या उद्देशाने नाही तर मला पुढे जायचय या उद्देशाने वाटचाल करायला हवी हे सर्व जो जाणतो तो खरा उद्योजक कल्पना जुनीच आहे काळाच्या गरजा नविन आहेत... 

हा लेख म्हणजे माझा उद्योग विषयावर वाचलेल्या विविध बाबींच एकत्रिकरण....


लैंगिकतेपलीकडले मित्रत्व

🌱वि४🌱व्हॉट्सअप ग्रुप.

लैंगिकतेपलीकडले मित्रत्व


शिरीष उमरे,नवी मुंबई
मी पृथ्वीतलावर अवतरलो तेंव्हाची माझी पहीली मैत्रिण  आई व त्यानंतर दुसरी माझी मावशी आणि तिसरी माझी बहीण !!!

हे मी मानतो की ही रक्ताची नाती व आपली संस्कृती ह्यामुळे ही मैत्री वरील विषयाला धरुन नाहीत. शिशुवयात व नंतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या दरम्यान विरुधलिंगी मैत्रीला काहीही समस्या नसतात.

सगळ्यात जास्त समस्या येतात उच्च माध्यमिक ते पदवी शिक्षणा दरम्यान ... कुमार वयातुन युवा... शरीरात होणारे नैसर्गिक बदल व मानसिक आणि भावनिक चढउतार थोडक्यात केमिकल लोचा  ... ह्या वयातली मुलामुलींची मैत्री !!

हवीहवीशी वाटणारी ही मैत्री घरच्या बंधनातुन व समाजाच्या विचित्र नियमामुळे व आजही योग्य लैंगिक शिक्षण नसल्याने निखळ व निर्मळ राहत नाही.

उलट ह्यावर बंधने आणल्याने दबावातुन अजुन तिव्रता वाढते व नंतर  मुव्ही इंपॅक्ट म्हणा कींवा टीव्हीशो म्हणा कींवा मोबाईल म्हणा.... ही मैत्री वेगळ्याच मार्गाने पुढे जाते. ह्यात पालक, समाज व ह्या वयातला युवावर्ग ह्यांचे समापुदेशन गरजेचे आहे.

नंतरही ही मैत्री उच्च शिक्षण व करीअर दरम्यान आणि लग्नानंतरही विशुध्द मानल्या जात नाही. अश्या मैत्रीबद्दल गॉसिप, कुजबुज व संशय घेणे सुरुच असते. कधी उघडपणे तर कधी पाठीमागे घाणेरडे बोलणे ही विकृत मनोवृत्ती अजुनही जीवंत आहे.

गमंत अशी की मुलबाळ मोठी झालीत कींवा चाळीसी पन्नासी ओलांडली की परत ह्या मैत्री ला कोणी काही बोलणार नाही हा...

म्हणजे १२-४२ ह्या तिन दशकातल्या वयातली मैत्री ही लैंगिकतेपलीकडली असु शकते ह्या संकल्पनेला आपल्या देशात  कायदेशीर मान्यता असली तरी अजुनही नैतिक व सामाजिक मान्यता नाही.... हे बदलायला हवे... नाही का ?

अनिल गोडबोले,सोलापूर.
लैंगिकता आणि मैत्री हे वेगवेगळे विषय आहेत. त्याच्या पलीकडे जायचे म्हणजे काय करायचे? त्या पलीकडे किंवा अलीकडे मैत्री असते का? माझ्या लैंगिकतेचा आणि माझ्या मैत्री चा काय संबंध?...

मी एक सोशल वर्कर म्हणून काम करत होतो त्या संस्थे मध्ये सर्व एच. आय. व्ही. ची लागण झालेल्या व्यक्ती होत्या.  आम्ही संस्था निर्माण केली व त्यांना संचालक केलेलं होत.. पण मदत म्हणून किंवा एक प्रकल्प होता त्या साठी मी जात होतो. त्या मध्ये एक बाई (मुलगी आणि बाई मधला फरक कळत नाही मला) होत्या. नवरा एड्स ने गेलेला आणि आम्ही त्यांना समुपदेशन करून मार्गदर्शन करताना आमच्याच संस्थेत नोकरी दिलेली.. सर्वांसोबत काम करत असल्यामुळे सहाजिकच मैत्री झालेली. रोज संध्याकाळी मी त्यांना गाडीवरून त्यांच्या स्टॅन्ड पर्यँत सोडत असे..... या गोष्टीचा एवढा मुद्धा झाला की काही जणांनी परस्पर त्यांना सांगितलं की.. " तू एका चांगल्या माणसाला जाळ्यात ओढून चुकीच करत आहे." आणि त्यांनी मानसिक ताण घेतला...
 मला तसं कोणी समोर बोललं नाही पण ऑफिस ला त्या दिसल्या नाहीत म्हणून चौकशी करताना मला कळलं की तब्येत बरी नाही म्हणून..

मग काही दिवसांनी त्या ऑफिसला आल्या.. माझ्याशी बोलनात. जेवढं काम तेवढं बोलणं.. मी पण लक्ष दिलं नाही..

एके दिवशी त्यांना जायला उशीर झाला आणि गाडी चुकली व त्यांना गावात जायला दुसरी बस नव्हती.. फोन करून मदत मागवायची लाज वाटत असल्यामुळे त्यांची खूप द्विधा मनस्थिती झाली.. खूप स्ट्रेस मुळे चक्कर येऊन पडल्या.. एका रिक्षा वल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलं त्यांना.

मला दोन दिवसांनी कळलं तेव्हा मी भेटायला गेलो तेव्हा ही सर्व हकीकत ऐकून मला शॉक बसला.... तेव्हा मला देखील काही करावे कळत नव्हतं...

काही दिवसांनी संस्थे मध्ये एक व्याख्यान आयोजित केल होत.."स्वतःच स्वतःला दिलेला दोष"(सेल्फ स्टिंगमा) या वेळी मात्र मी गप्प न बसता एक सेशन माझं आयोजित केलं आणि त्याच नाव होतं "मैत्री आणि लोकांचा दृष्टिकोन"..

माझे मुद्धे सर्वाना पटले एवढंच नाही तर जेवढे इतर स्त्री पुरुष होते त्यांची देखील मत बदलली.

त्या कार्यक्रमा नंतर त्या मॅडम बोलत्या झाल्या ... मग प्रश्न असा उरला की , "नेमकं अडकलं होत काय?" तेव्हा एकच उत्तर दिलं मी की फक्त ज्याने तुम्हाला हा सल्ला दिला त्याला "मैत्री" हा शब्द कळलेला नाही.

वैयक्तिक जीवनात असे अनुभव येतात.. भिन्न लिंगाच्या व्यक्ती कडे लैंगिक आकर्षण नाही.. असं होत नाही. पण मैत्री ही भावना असेल तर दिसणं, जात, धर्म, पैसे, लिंग या गोष्टी आपोआप मागे पडतात.

काही समलिंगी लोक, ट्रान्स जेंडर लोक चांगले मित्र असू शकतात.. यावर कोणच विश्वास ठेवत नाही.. उलट मैत्री दाखवणारे केसाने गळा कापताना दिसतात..

आपण एखाद्या गोष्टी कडे कोणत्या भावनेने बघतो त्या प्रमाणे जग दिसत.. आणि ज्याला स्त्री पुरुष, पुरुष पुरुष, किंवा स्त्री- स्त्री अशी मैत्री दिसते त्याला खरच मैत्री कळलेली नाही..

अशा सर्व व्यक्तींना एकत्र करून एक कार्यशाळा घेऊन सांगावं लागत की.. तुझ्या मताने आमच्यात काही फरक पडणार नाही.. पण मानव होण्यातली एक पायरी समजलेली दिसत नाही.. तेवढं समजून घे.

जगताप रामकिशन शारदा,बीड.

अंधाऱ्या खोलीतही जो आपले अस्तित्व टिकवून जीवनाला जगण्याची एक नवीन उमेद देतो तो प्रकाशाचा किरण आणि मित्र सारखाच असतो की मैत्रिणी सारखा असतो. छे बाबा मित्र की मैत्रीण........ मित्र की मैत्रीण..........अरे काय हे . जाऊ देत त्याच्याशी आपली मैत्री असते. झाल समाधान. कशाला उगीचच मैत्रिला तो आणि तीच्या भानगडीत टाकताय. फक्त मैत्री बोला न सभ्य नागरिकांनों
हो ह्या भानगडी शब्दावरून आठवल तो आणि ती एकत्र दिसले की लोकांना भानगड आठवते आणि समाज तर इतका पुढे गेला आहे की तो आणि तो एकत्र दिसले तरी भानगड वाटते. अशा लोकांच्या सदविवेक बुद्धी ची मला कीव येते.
मित्र व मैत्रीण यापुढे जाऊन मैत्री ही संकल्पना समाज का स्वीकारत नाही? मग नेमका समाज कोण? तुम्ही मी आणि आपण . एक मुलगा आणि मुलगी मित्र म्हणटल्यावर आपण त्यांच्याकडे का उगीचच उत्सुकतेपोटी पाहतो.माणूस हा समाजशील प्राणी आहे तर मग मध्ये लिंगभेद का आणतो?  मुलाची पहिली मैत्रीण आई तर मुलीचा पहिला मित्र वडील मानत असू तर मग समाजात रक्ताच नात नसणाऱ्या दोन उभयलिंगी व्यक्तीमध्ये मैत्री का असू शकत नाही?
अशा या बुरसटलेल्या मानसिकतेमुळेच बरेच सुसंवाद घडायचे ते बिघडत आहेत. आणी कुतुहलापोटी अनेक चूकीच्या गोष्टी घडताना दिसत आहेत. याला आपल्या पाल्यांना दोष देण्यापेक्षा आपल्या मानसिकतेला दोष.देणे गरजेचे आहे. आपण त्यांना स्वतंत्र देऊन ते त्याचा वापर करतात की स्वैराचार हे पाहणे म्हणजे आपल्या मूल्यांची अग्नीपरिक्षा.
दोन उभयलिंगी व्यक्ती फक्त शारीरिक आकर्षणामुळेच मित्र बनतात हा गैरसमज नाही तर संसर्गजन्य रोग आहे बूरसटलेल्या मानसिकतेचा. कारण कारणीमीमांसा करताना जर सुसंवाद झाला नाही तर न्यूनगंड बळावतो म्हणून सुसंवाद महत्त्वाचा मग तो मैत्रीच्या नात्यात किंवा रक्ताच्या. आणि क्या कहेंगे लोग हा विचार सध्या तरी स्मशानात गाढण्याची वेळ आली आहे.
मैत्री च नात मैत्री पुरत मर्यादित ठेवून त्यातून उदभवलेल्या आशा आकांक्षा आणि ईच्छा यांना जोडून उगीचच निखळ मैत्रीला बदनाम करण चूकीचे आहे.

महेश कामडी,नागपूर.
खूपच सुंदर असत हे मित्रत्व
गप्पा मारणे, फिरायला जाणे हॉटेल किंवा छोट्यामोठ्या टपरीवर चहा व बरेच काही.....या मैत्री मध्ये माणूस बिनधास्त पणे वागतो, सर्वांसी मिळून राहतो. जवळपास आपल्या सोबत घडणाऱ्या गोष्टी ही एकमेकांबरोबर शेअर करतो.
आणि मित्र म्हतलं की पुन्हा त्याचे पण मित्र असतात ज्यामुळे नवीन मित्रही मिळतात. कधी न भेटलेले, कधी न बोलले काही क्षणातच आपले से वाटतात.
पण आपल्या समाजात मुलगा - मुलगी एकत्र दिसले की का लोक वेगळा नजरेने पाहतात?
2 -3 मुल 2-3 मुली असल्या तर फारस कोणी लक्ष देत नाही पण दोघे सोबत असले की...आता तर सिटी मध्ये फारस कोणी लक्ष देत नाही, पण खेड्या गावात आजही असे पाहायला मिळते.
असो ...मी पण रिलेशशिपमध्ये रहलो आहे पण जी मजा जे प्रेम मित्र - मैत्रिणी बरोबर अनुभवतोय ते त्या संबंधात दूर पर्यंत सुधा दिसत नाही.लैंगिक संबंध ठेवण्यासाठी प्रेम करणे खूप ठिकाणी बघितलेच असेल पण असला काही विचार न ठेवता मित्र म्हणून जी मज्या असते ते कशातच नाही.थट्टा, मस्करी, भांडण, यात पण प्रेमच असतं.
आपल्याच मैत्रिणीची तिच्या मैत्रिणीसोबत मिळून टांग खीचने, चिडवणे.मला तर फार आवडत, आणि हेच खरे मित्रत्व जगात सर्वात सुंदर वाटत.संगीता देशमुख,वसमत
      मैत्री हे नाते सोडले तर सर्व नाती रक्तबंधनातून येतात. आणि ती कर्तव्यबुध्दीने निभावल्या जातात. पण मैत्री हे नाते मनाच्या बंधाने बांधलेली असतात. मग ही मैत्री कोणाशी,कधी आणि कशी होईल हे आपण सांगू शकत नाही. प्रेम वेगळे आणि मैत्री वेगळी! प्रेम हे एकाच व्यक्तीशी होऊ शकते पण मैत्री अनेकांसोबत असू शकते. आज आपण पुढारलेपणाच्या कितीही फुशारक्या मारत असलो तरी आजही आपल्याकडे स्त्री-पुरुष मैत्री म्हटले की,भुवया उंचावतातच! याचाच अर्थ अजूनही भारतीय मानसिकतेने हे नाते निखळ स्वीकारले नाही. पुरुष व स्त्री यांची मैत्री म्हटलं की,त्याला मैत्रीसारख्या पवित्र शब्दाने त्याचा उल्लेख न होता,लफडं,अफेअर असा उल्लेख केला जातो. कदाचित अशा नात्यात असा दृष्टिकोन नसतोही पण बऱ्याचदा तो मनात आणून दिल्या जातो आणि मग हे नाते जेवढे मोकळेपणाने रहात होते तो मोकळेपणा निघून जातो. आणि पुरुषाला कोणी चूक ठरवत नाही,स्त्रीलाच चूक ठरवत असल्याने ती स्वत:ला दोष देत रहाते.
          खरेतर अशा नि:स्वार्थ आणि निखळ मैत्रीचे नाते अनेकठिकाणी पाहिले. यात प्रमाण अतिशय नगण्य आहे पण मी पाहिलेले, अनुभवलेले आहे. कोणीतरी मन मोकळे करण्यासाठी एक मित्र किंवा मैत्रीण हा भेद विसरणे गरजेचे  आहे. आज सर्वच क्षेत्रात स्त्री पुरूष खांद्याला खांदा लावून काम करत आहे अशावेळी तिला मैत्रीसाठी एखादा पुरुष योग्य वाटत असेल तर त्यात वावगे ते का? लोक बोलतच रहातात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन आपण आपल्या नात्यात अंतर न येवू द्यायला हवे. मैत्री निखळ असेल तर हे लैगिंकतेच्या पलीकडचे मित्रत्व श्रेष्ठ ठरू शकते.

अर्जुन (नाना) गोडगे ,उस्मानाबाद
ही गोष्ट माझ्या जीवनातील....माझी एक मैत्रीण होती. आजही आहे..आमची फक्त मैत्री होती. आम्ही एकमेकांना सर्व गोष्टी सांगायचो.....आमची जवळीकता वाढत चालली होती पण आमच्यामध्ये मैत्री पलीकडे काहीच नव्हते....पण आमचे हितशत्रू काही कमी नव्हते....बगता बगता आमचे लफडं असल्याचे अफवा पसरली. कशाचं काय आणि कशाचं काय ??  मन बधिर झालं होतं तिला मी सर्वात जवळची मैत्रीण मानत होत आजही मनतोय...पण या समाजातील षंड लोकांनी आमचे नाते गंड बनवले. कोणत्याही क्षणी माझ्या मदतीला धावणारी एक जीवलग मैत्रीण दुरावली.

            समाज खरंच खूप डोळस आहे. नाही तिथं लक्ष देतो अन कोणत्याही नात्याला लैगिंकतेचा मुलामा देतो...माझासारखा लोकांना दुनियादारी पासून दूर न ठेवता त्याचा अविभाज्य भाग बनवतो....खरंच आपण लोकांना काहीच मनु शकत नाही. आजकाल काय करावं हे सुद्दा ठरवण्याचा अधिकार मला नाही.....मला खरं तर या समाजातील लोकांना राग येत नाही नाही तर माझीचं कीव येते. "च्या मारी" जी मैत्रीण होती ती म्हणजे माझे मन मोकळं करण्याचा एक कप्पा होती......समाजाच्या चाकोरीने तिला ही हिरावून बसलो.

            खरं तर आज लैंगिकशिक्षण ची गरज आहे प्राथमिक वर्गात....अर्ध आयुष्य मातीत गेलं तरी तरी माझी मैत्री एका लेडीज असणं म्हणजे लोक लफडं समजतात. खरं तर या सर्व गोष्टीना आपण जास्त महत्त्व देतो जे करायचं ते करत नाही त्यामुळे झ्याठात दुनिया असं म्हणून जगायचं ठरवलं आहे...बघू काय काय होतंय ते.....

अपेक्षा पाचुपते मुंबई.

संध्याकाळची वेळ होती, प्रचंड थकाव्यामुळे ट्रेन मध्ये बसल्या बसल्या डोळा लागला.गाढ झोपेत असताना खांद्याला राकट उबदार स्पर्श झाला मी दचकून वर पाहिले तर शेहेनाज उभी, तिने स्मित हास्य करत माझ्याकडे पाहिले.किती वेगळी दिसत होती ती आज , कमनीय बांध्यावर गडद निळ्या रंगाची साडी अधिकच खुलून दिसत होती.सावली परंतु तितकीच रेखीव, तिच्या खोल डोळ्यात वेगळीच चमक होती.सुंदर चंद्रावर जसे डाग राहावेत तशी तिच्या चेहऱ्यावरची बारीक खुरटी दाढी तिच्या सौंदर्यात बाधा आणत होती.तिने आनंदाने माझा हात हातात घेतला व चॉकलेट माझ्या हातावर ठेवत म्हणाली "तेरेको देख के ही चढी मे".हल्ली तिची नी माझी वारंवार भेट व्हायची कधी ट्रेन मध्ये तर कधी रेल्वे स्थानकावर.तीही माझ्याच स्थानकाजवळ राहत असल्याने बऱ्याच गप्पा व्हायच्या,परंतु इतर बायकांचे आम्हा दोघींवर लागलेले खोचक डोळे माझ्या नजरेतून सुटायचे नाहीत आम्हा दोघींमध्ये मैत्री केव्हा झाली कळलंच नाही.माझ्याकडे पैसे मागायला आलेल्या किन्नरशी माझी अशी मैत्री होईल अस कधी वाटलं नव्हतं.आजही मला आमची पहिली भेट आठवून  हसू फुटतं,जेव्हा तिची पैशांची मागणी मी नाकारलेली आणि ती नाक मुरडून निघून गेलेली.नंतर मला ती बऱ्याचदा दिसू लागली पैसे द्यायच्या निमित्ताने संवाद होऊ लागला संवादाचे रूपांतर गप्पांत आणि गप्पांचे मैत्रीत कधी झाले कळलंच नाही.ती पैसे मागत असली तरी स्वाभिमानी होती म्हणून कामासाठी प्रयत्न करण्याबद्दल सुचवलं होतं आणि ते तिने मिळवलं.एका भल्या माणसाने तिला स्वतःच्या वाखरीत टीकल्यांची पाकीट बनविण्याच काम दिलं परंतु त्या कामावर उदरनिर्वाह होत नसल्याने उरलेल्या वेळेत ती पैसे मागते. हातावरचं चॉकलेट पाहताना आठवणींनी
डोळ्यासमोर फेर धरला.चॉकलेट देऊन ती लगेचच पुढच्या स्थानकावर उतरली, तिने माझ्यासाठी ट्रेन मध्ये चढावं एवढी आमची मैत्री घट्ट झाली होती ह्याची जाणीव त्या घटनेनं करून दिली.
मैत्रीच्या पात्रतेत वयाची, लिंगाची, वर्णाची, जातीची जीविताची कसलीच अट नसते, मैत्री लहानग्या रोपट्या पासून निर्जीव बाकाशी होऊ शकते.परंतु माणसाने मैत्रीला नेहमीच विशिष्ट चाकोरीत बांधून ठेवले.समाजातील जुनाट विचारांच्या लोकांच्या मनात लैंगिकतेबद्दल  जळमटं घर करून आहेत ती वेळीच काढून टाकायला हवी तरच प्रत्येक जीविताला लैंगिकतेपलीकडे माणूस म्हणून जागायचा हक्का मिळेल.


महेश देशपांडे.ढोकी,धाराशिव
हा विषय खुप महत्वाचा आहे, याची अनेक कारणं देता येतील.
पण पहिल्यांदा आपल्या समाजात अजून लैंगिकता किंवा त्याविषयीची माहिती लोकांना नाहीच..

मुलगा आणि मुलगी याशिवाय अजून एक प्रकारची व्यक्ती असते हे समजायला आत्ताच्या काळात जरी उशीर होत नसेल तरी, आधीच्या म्हणजे साधारण १० ते १५ वर्षांपूर्वी खुप उशीर व्हायचा आणि मग त्यातून त्याचा निव्वळ *विनोद* केला जायचा...
आता परिस्थिती निश्चित बदलली आहे, अगदी सरकारी पातळीवर देखील याची दखल घेतली जातेय. पण याहून महत्वाचं म्हणजे आपण समाजात असणारी माणसं हा बदल कितपत स्वीकारणार आहोत? हे आहे... जर बदल स्वीकारायचा असेल तर आपल्याला संबंध ठेवायला हवा.. आणि हा संबंध *मैत्री* च्या नात्याने अधिक दृढ होईल, समृद्ध होईल..
अनेकांना माहीतही नसेल की
*तृतीयपंथी लोकांच्या समस्या* यावर अगदी पीएच डी मिळवली आहे..पण त्या P. Hd पेक्षा मित्रत्वाच्या नात्याने त्या घटकाला आपलंसं केलं आणि त्यांना स्वीकारलं तर ते त्यांच्या -आपल्या सर्वांच्या हिताचं होईल. नाहीतर समजतील ही दरी अशीच राहील...

या विषयामध्ये, अगदी जवळचा विचार करायचा झालं तर फक्त मुलगा आणि मुलगी एकत्र दिसले तर काय फरक पडतो, हे फक्त अनुभवातूनच समजण्यासारखे आहे ते शब्दात व्यक्त होता येत नाही... खरच हे भयानक वास्तव आहे... मला ते शब्दबद्ध करता येत नाही... मुलगा आणि मुलगी यांच्या मैत्रीच्या नात्याविषयी एवढंच सांगू इच्छितो की मैत्री जरूर करावी... फक्त आपला विश्वास तुटू देऊ नये...

आपण खुप भाग्यवान असतो ज्यावेळेला आपल्याला *निखळ* मैत्री अनुभवायला मिळते...

‪शरद देशमुख‬:

   खरेतर या गोष्टींना मान्यता मिळायला अजून खूप वर्षे लागतील .आता कूठे याची सुरुवात झाली आहे .

याची कारणेही तशीच आहेत .भारतीय राज्य घटनेच्या आधी ज्या कायद्याप्रमाणे आपल्या देशात स्त्रियांना जी वागणूक दिली जात होती ती फार भयानक होती .स्त्री म्हणजे तिला कोणत्याही प्रकारचे अस्तीत्व नाही , ती उपभोगायची वस्तु असे पहिले जात होते .तिला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र नव्हते .आणी हीच रुढी परम्परा पुढे चालत आणलेली आहे आपण पुढे .

मात्र राज्य भारतीय घटनेने स्त्रियांना सर्व हक्क बहाल केलेत.

खरेतर हा विषय _
समानतेची जाणीव करून देणारा अभ्यास क्रम , लैंगिकता विषयी अभ्यासक्रम मुलांना अभ्यासात  द्यायला हवेत तेव्हा कुठेतरी मनामध्ये समानतेची भावना निर्माण होईल .

समाजामध्ये विरुद्ध लिंगी मैत्रीला अजूनही स्थान नाही .यामधे आपणच घरामध्ये आपल्या मुलांना या विषयी मार्गदर्शन केले पाहिजे .किशोरवयीण  मुलांमध्ये या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे .

राहिला प्रश्न 30 च्या पुढे या वयात सहसा जास्त शंकेच्या नजरेने  नाही पहिले जात परंतु समाज मान्यता कोठे आहे .ती विश्वासहार्यता सम्पादन करणे गरजेचे आहे आणी ते आपल्या हातात असते .

शुद्ध मन सदवासना असेल तर तर निखळ मैत्री टिकते .मैत्री म्हणजे मैत्रीच असावी त्यापलीकडे जावून काहीच नसावे तेव्हा समाजामध्ये हे नाते खरोखरच मान्य केले जाते आणी जाईल असे मला वाटते .
त्यासाठीच आई वडिलांचे मित्र मैत्रिणी आणी त्यांचे संबंध हे मुलांनी पाहिले पाहिजेत .आणी आपल्याही मित्र मैत्रिणींची ओळख करून देणे गरजेचे आहे .मुळात म्हणजे आपले मित्र मैत्रिणी कोण आहेत हे आपल्या आई बाबांना माहीत असणे गरजेचे आहे .
आज मुले मुली शिक्षणासाठी घरापासून लाम्ब राहतात त्यांच्यासाठी ह्या गोष्टींची गरज आहे आणी जबाबदारीचे वर्तन असेल तर मैत्रीला हा समाज नक्की मान्य करेल .

राहिला प्रश्न किन्नर चा .तर हे लोक खूप चांगले असतात .कोणालाही इजा पोहोवत नाहीत .आणी त्यांना नाही का मन , तेही माणूसच नव्हे तर माणसापेक्षा स्वभावाने चांगले असतात .त्यांच्याबद्दल आपण आपल्या मुलांमध्ये समानतेची भावना निर्माण केली पाहिजे .
मी परवाच पहिले एस टी स्टँडवर एक किन्नर  उभा असताना कॉलेजचे सर्व विध्यार्थी त्याची टिंगल उडवत होते .प्रश्न पडला मला खरेच मुलांना हा विषय सुद्धा अभ्यास हवा समानतेचा .

माझ्या बद्दल मैत्रीच्या नात्यामधे मागच्या पंधरा वर्षा पूर्वी सुद्धा , कॉलेज लाईफ मधे कधीही वाईट अनुभव आला नाही किंवा आई वडिलांकडून भावा कडून मुलगा मुलगी अशी वागणूक मिळाली नाही कारण तेवढा विश्वास सम्पादन केलाय .

आणी असेही आपल्याला रोज नवे मित्र मैत्रिणी भेटतातच की , जे आपल्याला मदत करतात ते पण आपले चांगले मित्रच असतात की ! फक्त आपण त्यांना मैत्री  हे नाव नाही देवू शकत तर चांगले परिचयाचे आहेत असे म्हटले तर समाज मान्यता देतो , कारण मैत्री हा शब्द अजून समाजामध्ये रूढ झालेला नाही .
असे  माझे मात आहे .

हरिश पोटे
भेट तशी योगायोगाचीच घडून आली कॉलेज मधे,तीला भेटला तो आणि त्याला भेटली ती.

सुरवातीला ओळख ही दोघांची आभ्यासा पुरतीच झाली होती हळूहळू त्यांची मैत्री मात्र वाढत होती. बाजूच्या डोळ्यांना का कुनास ठाऊक खुपत होती.

समरसता येवढी की, तीने बोलल की त्याने शीर डोलवायचं आणि त्याने बोलल की तीने ते उचलायच. दोघांची चर्चा म्हणजे वेळेची ही मंदी होती आणि कधी वाद होत नाही अशी कोल्ह्यांची खंत होती.

ती आणि तो जेव्हा हिंडत बरोबरी, जनता मात्र हळूहळू कुजबूजत होती सारी.जी भानगड दिसते ती असेल कारे खरी कारण जोडी दिसायलाही अगदिच होती न्यारी.

समाज्याच्या मानसिकतेला ते दोघे कायमच  धुडकाऊन मारत होते, त्या मधील मिश्किली काढून साऱ्या गप्पा त्यांच्या भरत होते.
ना कधी कॉफी ना कधी आईस्क्रिम, ना कधी आवर्जून भेटायचीच आस होती, तर ना कधी पडत्यात सावलीसाठी भुनभून होती.

तिने प्रसस्तावना दिली की त्याची मांडनी भक्कम होती, शास्त्र सगळे पालथे घालायचे मग जीवशास्त्र कसा वगळता. एवढं मंथन होऊनही नात्याला ना कधी वासनेचा वात होता.

जरी दूरदेशी गेली असली ती तरी मन मात्र मोकळ त्याच्याकडेच होत. त्याच्याही गणितांची तीच्याकडेच आहेत सुत्र. त्याच्या रोजनिशीत मैत्रीच्या पानावर तीच नाव वरच होत.

आता सगळे जन म्हतायत, एवढ चांगल सूत असताना मंगल करायला काय झाल होत, पण त्यांना कोण सांगे मैत्रीच नात बरोबर राहण्यापेक्षा सोबतीमधे ज्यास्त असत..

किरण पवार,औरंगाबाद.
तुम्ही-आम्ही म्हणजे सहसा सत्तरी, नव्वदी वा आपली एकविसाव्या शतकातली पिढी बऱ्यापैकी लैंगिकतेपलीकडच्या मित्रत्वाला स्विकारते. आदराने जपते. पण काही वेळा असं झालेलं अजूनही खेड्या-पाड्यात पहायला मिळत नाही. अहो इथे लोक मुलगा-मुलगी एकत्र येऊच नयेत, आणि आले तर त्यांच प्रेमप्रकरण चालूयं की काय? अशा विचार ठेवतात; त्या ठिकाणी कसं काय समलैंगिकतेला स्विकारलं जाईल? याचाही विचार व्हायला हवा. कारण लैंगिकतेपलीकडे जाऊन जर आपण एखाद नातं टिकवू शकत असू. आणि ते योग्य दिशेने असेल तर बऱ्याच वेळा अडचणींना सामोर जावं लागतं ते केवळ लोकांच्या मानसिकतेमुळे. आणि मुळात ही मानसिकताच आपल्याला त्यांच्यात हळूहळू रूजवावी लागणारं आहे. एकेक पाऊल त्यासाठीच तर टाकायचं आहे.
       लैंगिकतेपलीकडचे मित्रत्व जपणूक करतं काही अमूल्य क्षणांची. त्याचे मर्मबंध ज्याचे-त्याच्याचपाशी. हलकंफुलकं, रमवणारं, सावरणारंही असतचं की ते नातं.

अनिकेत कांबळे,कोल्हापूर.

 खरं तर विषय मांडणी करणं हेच एक अवघड काम आहे कारण लैगिकता हा आजकाल चा गंभीर विषय मांनला जातो, आणि मैत्री हा निखळ विषय आहे...एकमेकांची मैत्री ही लैगिकतेपलीकडच नात होऊ शकत, कारण संपूर्ण जग एका बाजूला प्रत्येक व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहत तर काही देशामध्ये मुलगा आणि मुलगी यामध्ये तफावत केली जाते,
खरं तर ज्यावेळी गावाकडचा विषय येतो तेंव्हा मैत्री दिसत नाही तर त्यामध्ये प्रेमापर्यत विषय जातात,आणि तीच मुलं मुली शहरात मोठ्या कॉलेजात जातात तेंव्हा एखादी मुलगी किंवा मुलगा त्याच्या जवळ जरी बसला तरी त्याला अस वाटत की यार ही आपल्यावर प्रेम करते किंवा like करते, खरं तर शहरी विभाग इतका मॉडर्न झालाय की कोण मित्र आणि कोण प्रियकर हेच समजत नाही..पुस्तक वाचून काढल्यासारखी धडाधड आपसूक मित्र आणि प्रियकर बदलले जातात..आणि हे वास्तव आहे..
मग लैगितकडेपलीकडचं प्रेम आपण जपतो का??कारण माझ्या वयक्तिक मतानुसार आजकाल ही नाती मनापासून नाही तर शरीरापासून जोडली जातात..कारण मनाची नाती दीर्घकाळ टिकतात..आणि शरीराची गरज असे पर्यंत...!!!आणि माणसं मनाला नाही शरीराला प्राधान्य देतात


अर्चना खंदारे,हिंगोली.
21 व्या शतकाच्या  पहिल्या दशकामध्ये लैंगिकतेपलीकडचे  मैत्रत्व या विषयावर जर विचार करायचा  झाला तर थोडं विचित्र वाटेल पण आताच्या  या दुसऱ्या दशकामध्ये लैगिकता किंवा लैगिकतेपलीकडचे मैत्रत्व असो  काही जास्त फरक पडत नाही कारण आज ची तरुण पिढी हि फार हुशार झाली आहे, का तर ठिकठिकाणी  या विषयांबाबत समुपदेशन होताना दिसत आहेत .
             पण आपला समाज आज हि आपला ( समाजाचा )  दृष्टीकोन बदलायला तयार नाहीय. कारण दोन  व्यक्ती सोबत दिसल्या कि आपला समाज त्यान्च्या विषयी गैरसमज  निर्माण करतो.
              
             दोन व्यक्त एकमेकांशी भावनेने  जवळ येतात .काही ठिकाणी असं हि पाहायला  मिळते की,एका ठिकणि काम करणारे दोन व्यक्ती हे खुप जवळ असतात ,म्हणजेच  त्यान्ना एकमेकांची सवय झालेली असते व या सवयीतूनच त्यांच्या मध्ये गाढ  मैत्री तयार होते.मग सोबत चालणे ,बोलणे ,हसणे,सुख - दुःखामध्ये एकमेकांना साथ  देणे इत्यादी सर्व गोष्टी या मैत्री मध्ये होतात.मग हि मैत्री मुलां- मुलीं तसेच  लग्न झालेल्या स्त्री- पुरुषा मध्ये हि होवू शकते.
          
            पण आज हि काही मुले-  मुली या नात्याला प्रेमाचं नाव  देतात आणि थोडा गैरसमज झाला कि मग एकमेकांविषयी  द्वेष करतात .त्याने / तिने आपल्या बरोबर वाईट केलं आहे म्हणून  या नात्याचा शेवट करतात.आज हि अस्या या नात्यामध्ये मैत्री मध्ये दृढतेची वा विस्वासाची  गरज आहे..
                 नाही तर हा समाज तयार आहेच....अस्या निर्माण केलेल्या  नात्यांवर आपली मते मांडायला ....
मग त्या समाजामध्ये आपण हि येतोच .....


डॉ. विजयसिंह पाटील.कराड.

'लैंगिकते पलीकडचे मित्रत्व ' हा विषय माझ्या मंदबुद्धीच्या डोक्यात घोंगावत होता. त्या विचारात गुंग असल्याने शेजारी कावळे सर ,घारे, घोलप साहेब ,शिपु नाना  इत्यादी सर्व जण बसल्याचे लक्षातही आले नाही .(यावरून आपणास माझ्या एकाग्रतेबद्दलचं कौशल्य लक्षात आले असेलच.)
" एव्हड्या कसल्या विचारात पडलाय " असं घोलप साहेबांनी विचारताचं मी भानावर आलो.

गंभीर चेहऱ्याने मी "लैंगिकतेपलीकडचे मित्रत्व याबाबत आपलं मत काय "असा प्रश्न विचारून मी माझी या अवघड प्रश्नातून मान अलगद सोडवून घेतली.
"कश्याच्या पलीकडलं मैतर म्हनाला?" असा ढगाच्या गडगडाटी आवाजातआणि काठी जमिनीवर आपटून शिपुनानाचा प्रश्न डायरेक्ट मलाचं. ( शिपुनाना अस्सल ग्रामीण/गावठी व्यक्तिमत्व.) नानांना कसे समजावावं ह्या घोर चिंतेत मी पडत असतानाच घारे नानांच्या कानी लागले.

"शेक्ष व्हयं , हंग असं मराठीत बोला की राव , या सांबाला समजल असं बोला की ऑ "..(शिपु नाना स्वतः ला कधी सांबा म्हणतात तर कधी गब्बर, तसं ते स्वतः ला बरंच काही म्हणतात .) पुढं ' शेक्षला मैतरी कशाला लागती ' असा अत्यंत भाबड्या चेहऱ्याने प्रश्न उपस्थित केला. घारे परत नानांच्या कानाला लागले. हातातील काठी हनुवटीला लावून नाना मोठ्या आश्चर्याने माझ्याकडे बघत बसले.(त्यांना बहुतेक विषयचं कळला नसावा .)
" नॉनसेन्स, हा काय विषय झाला की प्रश्न ? काहीही. आय म सॉरी , बट इट इजअ व्हेरी स्टुपीड क्वशन , एनीवे ,जाऊदे " असं म्हणताचं मी निष्पापपणे  " बरोबर आहे सर तुमचं " असं म्हणून सपशेल माघार घेतली.

"ओ गुर्जी, आमाला कळल असं बोला की , ऑ, न्हायतर मी जातू घराकडं " असं मोठयाने काठी आपटून नाना गडगडले. घारेनी त्यांना बळेबळे बसवून घेतले.
" हा प्रश्न योग्य का नाही याचं कारण दिलं तर बरं होईल  ' घोलप साहेब म्हणाले. " अक्षी बराबर बोलला सायेब, म्या बी हेच म्हणतुया " इति शिपुनाना..
कपाळावर आठ्या घालून कावळे सर " त्याच असं आहे, लैंगिकता आणि मित्रत्व ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या दोन्हींचा संबंधच काय ?, पुरुषाची आणि स्त्रीची फक्त मैत्री असूच शकत नाही, आपला समाजात हे शक्य आहे असं वाटतं तुम्हाला ? "
आत्ता कुठं शिपुनानाच्या डोक्यात प्रकाश पडला. " बिन लफडयाची मैतरी म्हणता व्हय ? छ्या छ्या , असं व्हईल तरी का कुठं ? ह्याच्यावरनं  आठवलं " नाना काय बोलणार याचा अंदाज आल्याने घारेनी नानाला थांबवलं .. .कावळे सरांच्या तोंडावर कडवट कुजकं हास्य पसरलं .(नाना कधी न्हवे ते आपल्या बाजूने आहे या विचाराने ते खुशीत आले आणि चक्क चहाची ऑर्डर दिली.)

गोडबोले आपल्या मृदू स्वरात म्हणाले '
तुकाराम महाराज म्हणत ' बीज भाजुनी केली लाही ! आम्हा जन्ममरण नाही !!
तुकोबांनी भक्तीच्या तव्यावर वासनांच्या लाह्या केल्या. लाह्या पेरून काही उगवत नाही.
मैत्री चा जन्म भावनेतून होतो. मैत्रीत मानसिक जवळीक अधिक असते.
व. पु. म्हणतात 'निखळ मैत्री तील विलक्षण ताकद म्हणजे त्यातील सहजता .सायी खालच्या दुधाला सायीच दडपण वाटत नाही. साय दुधातूनच तयार होते. आणि दुधावर छत धरते.  मैत्री तशी असावी.

शेवटी आबा म्हणाले ' ते समदं बरोबर हाय असं मानलं तरी, समजा एक बाई आनी एक बाप्या यांची तुमी म्हनता तसी दोस्ती हाय, पन माजी शंका अशी की, गड्याला वाटणार की ही आपल्यावर फिदा हाय, भले तिच्या मनात तसा इचार नसला तरीही,, आनी दुसरी बाजू मंजे, गड्याच्या मनात काय न्हाय, पन बाय इचार करती , माज्यातच काय तरी दोष हाय.. कशी राहणार वो यांची दोस्ती  ?

घोलप साहेब  " स्त्रियांची ही जागतिक समस्या आहे, स्त्रियांना आपल्या सर्व स्वाभाविक क्षमतांसह जीवन निर्वेध पणे जगता यावे यासाठी पुरुषांनी आपली मानसिकता थोडी बदलावी. जग बदलाच्या वाटेवर उभे आहे पण पुरेसा वेग नाही. तो यावा ही सर्वांची भावना असावी.

(यातील संबधित छायाचित्रे इंटरनेटवरवरून घेतलेली आहेत.)

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************