रागाच्या भरात

रागाच्या भरात

🌱वि४🌿या व्हॉट्सअप ग्रुपवरून

रागाच्या भरात


SOURCE:- INTERNET

-अर्जुन(नाना) रामहरी गोडगे
सिरसाव ता.परंडा जि. उस्मानाबाद

          माझ्या राग दिवसागणिक वाढत होता.. करतोय काय करायचं ? करायचं काय हे मला माहित नव्हतं?? नुसती चिडचिड वाढत चालली होती. आई बापाच्या अघोरी कष्टावर जीवन जगत असलेला डोमकावळा अशी माझी ओळख हाय. काहीही काम न करता आयुष्यची सात वर्षे घालवली. तसं म्हटलं तर ज्या गोष्टी केल्या त्यामध्ये कधी यश मिळाले नाही. म्हणून कमालीचे नैराश्य आलं होतं. जगण्याची इच्छाच मेली होती. मी काय स्वतःला दूषणे देत जीवन कंठत होतो. म्हातारे आई बाप ज्या वयात मी त्यांचा आधार द्यावा, त्या काळात मी मात्र सुसंगती लागलो व्यसनी बनलो. नशा जोपर्यंत आहे तोपर्यंत मी ठीक असायचो .... एका गोष्टीचे सल मात्र होती आई बाप माझंमुळे काम करत होते.
           अशातच मी माझा मनात मनलो बस्स झालं जगणं आता मेलेलं बरं. " कपाळकरंटा मी" youtube जाऊन वेदना होणाऱ्या आत्महत्याचे व्हिडीओ बगू लागलो, अशी सर्व तयारी जोरात चालली होती. जवळपास महिनाभर हे सर्व चाललं होतं. बैचैन मन मात्र माझ्या मैत्रीनेणं ओळखलं.. मला सांगू लागली मरुन सर्व प्रश्न सुटत नसतात, उलट तुझे मरणही घरच्यांसाठी विशेष आईसाठी तिचंच मरण ठरेल. समाज ही तू मेल्यावर नावं ठेवायला मागपुढे बगणार नाही. तिच फिलॉसॉपी एकूण डोकं सुन्न झालं. ती बोलत होती त्यातला शब्दन शब्द खरा होता. पण मन मात्र काही ऐकायला तयार नव्हतं. जाऊ दे उडत गेली आंगणगाडी ... तिच एकूण घेतलं मी माझं पुढच्या तयारीला लागलो.
           कोणालाही न सांगता मारायचं हाच विषय मनात घोळत होता. नव्हे तर सुसाईड नोट माझं तयार होत्या. माझ्या आत्महत्या मी स्वतः केली आहे तरी यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये.  अशी नोट तयार करुन बस्स झालं जगणं म्हणून होस्टेलच्या चोथ्या मजल्यावर गेलो उडी टाकणार असे पक्क ठरवून गेलो होतो. आपण मारणार अशा शेवटचा मेसेज मैत्रिणीला टाकला. होस्टेलच्या पाठीमागे उडी टाकली. पाठीमागे जास्त कचरा असल्यामुळे मलो नाही पण पाय मात्र मोडला, डोक्यला जबर मार बसला हे मला दवाखान्यात गेल्यावर कळले. रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे चार महिने अंथरुणला खिळून होतो, त्याची सज्जा आजही भगतोय त्या वेळी केलेल्या मूर्खपणा मुळे आता पाश्चाताप होतंय. रागाच्या भरात कोणतेही पाऊल उचलू नये. जेणेकरुन आपल्याला तिची सज्जा दुप्पट भोगावी लागेल. "मनतात ना राग नि भीक माग"  हे आता मला पटलं आहे.

SOURCE:- INTERNET

-किरण पवार,
औरंगाबाद

मी इंजीनीअरींग दुसऱ्या वर्षाला असताना सोडली. घरचे सर्वजण नाराज होणार, हे स्वाभाविकच होतं. पण त्यातही वडीलांची नाराजी इतक्या जबरदस्त रोखात व्यक्त झाली की, ज्यामुळे मी मनातून त्यांचा तिरस्कार करू लागलो. त्यांनी दोन-तीन वेळा मारलही. पण त्यांचे शब्द मारापेक्षा अधिक झोंबले होते. त्या शब्दांमुळे माझ मन पूर्णपणे ढासळल होतं. आजही मी त्यांच्याशी जास्त स्पष्ट बोलू शकत नाही.
               मला शिक्षण घ्यायचं नव्हतं किंवा माझी ती पात्रता नव्हती, असं काहीच नव्हतं. फक्त मला इंजीनीअरींग नको होती. माझा बारावीचा निकाल आला  तेव्हापासूनच मी या गोष्टीला विरोध दर्शवला होता. पण वडील ऐकतील तर शप्पथ! माझा एक नातलग होता. आम्ही बारावी सोबतच ऊत्तीर्ण झालो. त्याचा निर्णय होता, तो इंजीनीअरींग करणार. आणि माझ्या घरच्यांच म्हणणं होतं, त्यानं जे केल तेच मीदेखील करावं. मला या गोष्टीचा भयंकर त्रासही होतं होता आणि रागही आला होता. शेवटी कुणालाच विचारलं नाही आणि सोडलं इंजीनीअरींगच शिक्षण.
              अर्ध्यात शिक्षण सोडल्याने हवं असलेलं शिक्षण घ्यायला सहा महिने जावे लागले. आणि आज मी आनंदाने ते शिक्षण घेतो आहे. मी अगदी जन्मापासून कधीच शेतात काम केल नव्हतं पण या सहा महिन्यात करावं लागल. पुढे शिक्षण घ्यायचय हा विचार ठाम असल्यामुळे मी आनंदाने ते काम केलही. पण "वडीलांच्या आणि समाजाच्या मते मी आता शिक्षण घेऊ नये," अशी कुरकुर सतत माझ्या मागे लागली होती. एकाच घरात राहूण मी वैरी असल्यासारखं वडील वागायचे. कुणा दुसऱ्याचा राग एके-दिवशी माझ्यावरच फुटला. त्यांनी त्या वेळी नकोनको ते शब्द  उच्चारले. या गोष्टीचा प्रचंड तिटकारा आला अाणि मी आत्महत्या करायचं ठरवलं.
            सकाळी कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडलो. लातूरच्या रेल्वेस्टेशनवर पोहोचलो. म्हटलं आता जी गाडी येईल तिच्यासमोर उडी मारून जीव देऊ. मनात विचारांचा गुंता अजूनही सुरूच होता. पण का कुणास ठाऊक, मी स्वतःलाच धीर दिला आणि म्हटलं, काहीही झाल तरी चालेल पण आत्महत्या करायची नाही. आणि संध्याकाळी सुखरूप घरी पोहोचलो. रागाच्या भरात काय करणारं होतो; हे भानावर आल्यावर समजलं. पण भानावर येण्यासाठी मैत्री कामी आली. एक अशी मैत्रीण त्यावेळी आयचष्यात होती जिने मला नैराश्यातून सावरायला खूप मदत केली. खरचं अविस्मरणीय आहे, ते सर्व.

SOURCE:- INTERNET

-श्रीकांत निवल बाभूळगाव जि यवतमाळ

रागाच्या भरात हा अतिशय संवेदनशील विषय आहे.आज कोणाला कश्या गोष्टीचा राग येईल आणि त्याच्या हाताने स्वतःचे किंवा इतर व्यक्तीचे कश्या पध्दतीने नुकसान करेल यांचे पण सांगता येत नाही. जसे पती पत्नी यांच्यातील होणार राग कधी कोणत्या टोकाला जाऊ शकतो अशावेळी पतीने स्वतःच्या कुटूंबातील सर्व व्यक्तीचा जीव घेऊन स्वतः आत्महत्या केल्याचे आपण नेहमीच पेपरला वाचत आलो आहे.पॉपर्टी बाबात भावा भावाच्या भांडणात मारा-माऱ्या झालेल्या व खून झाल्याचे आपण पाहत आहे.बहिणीला छेडले म्हणून जीवानिशी मारून टाकल्याचे पाहतो.एकतर्फी प्रेमातून ऍसिड हला किंवा जीवनी मारल्याचे आपण ऐकून आहोत हे व इत्यादी प्रकार रागाचा भरात होतांनी आपण पाहत अहोत.माझे स्वतः चे सांगायचे झाले तर मी स्वतः 5 व्या वर्गात असताना साधा नवीन कम्पास घेऊन दिली नाही म्हणून गळ फास घेण्याचा प्रयत्न केला होता.परन्तु घर कुडाचे व घराची उंची कमी असल्यामुळे बासा वाकला माझे पाय जमिनीवर टेकले व सुदैवाने मी वाचलो.आज मी कुटूंब समुपदेशक म्हणून काम करीत असताना बऱ्याच व्यक्तींचे रागाच्या भरात तुटनारे कुटूंब जोडीत आहे. म्हणून कोणीही रागाच्या भरात टोकाचे निर्णय घेऊ नये.खूप टेंशन आले असेल तर त्या बाबत आपल्या जवळच्या माणसाशी चर्चा करावी आपल्या मनात घर करून असणाऱ्या गोष्टी कुणाला तरी सांगाव्या जेणे करून मन हलके होते.काही रांगा पासून दूर जाता येईल असे मार्ग शोधावे ,नाहीतर निसकोचपणे मनोविकार तज्ञाची भेट घ्यावी व त्यांचा सल्ला घ्यावा.
धन्यवाद..

SOURCE:- INTERNET

-सुधाकर पार्वती प्रभाकर -
पंढरपूर .

माणूस हा एक सामजिक प्राणी आहे. त्याला फक्त मेंदू आहे आणि तो बोलू शकतो म्हणून तो बाकीच्या प्राण्यांन पेक्षा वेगळा आहे .
आनंद , प्रेम , राग ह्या भावना भावना त्याच्यामधे जास्त प्रमाणत आहेतआणि त्या असणे ही आवश्यक आहे .
आज आपल्यला भवना आहेत म्हणून आपल्या जगण्याला अर्थ आहे . भावनाशुन्य माणूस भेटणे दुर्मिळ आहे . आज या धावत्या व बदलत्या युगात माणूस समाज्याच्या प्रति कही अंशी भवनाशून्य असला तरी कुटुंबा प्रति व स्वतः बद्दल आज ही तो भवनाविवश आहे .
या सर्व भवनामधील राग ही एक भावना. ती असणे हे आवश्यक आहे . परंतु आत्ताच्या परिस्तिथी मध्ये तो प्रमाणापेक्षा जास्त दिसून येतो . परंतू नको त्या वेळी अनावर झालेला राग आयुष्य अंधारात घेवून जातो, नाती तोडतो आणि आयुष्य सुध्दा संपवतो.
परंतू आज रागाच्या वाढत्या प्रमाणाची करणे पाहता असे लक्ष्यात येते की लहानपानापासुन मुलांना प्रेमच्या नावाने प्रत्येक लाड पुरवणे , नको त्या गोष्टी वेळे आधी देणे , हट्टी बनवणे, कोणत्याही गोष्टीला नाही न बोलणे आश्यामुळे मुले हट्टी होतात .परंतू कठिन परीस्थितीत अशी मुले परिस्थीला तोंड देऊ शकत नहित , अपयश पचवू शकत नाहीत , परिणामी ती रागीट बनतात आणि चुकीच्या गोष्टी करतात.
त्यामुळे मुलांना लहानपणापसुन नाही येकायला शिकवणे गरजेचे आहे . त्यांना काही गोष्टींसाठी वाट पहायला लावणे गरजेचे आहे .

SOURCE:- INTERNET

-प्रदिप इरकर
वसई,जि-पालघर

मानवाला असलेल्या अनेक भावनांपैकी राग ही एक भावना आहे.जशा अनेक भावना आजूबाजूच्या परिस्थिती वर अवलंबून असतात त्यांच्याप्रमाणेच राग ही सुद्धा एक भावना आहे.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात रागावर नियंत्रण मिळवणे खूप कठीण झाले आहे.फक्त एकाचा राग दुसऱ्या व्यक्तीवर काढणे हेच चक्र दररोज नियमितपणे सुरू आहे.मुंबईत लोकल मधून प्रवास करताना क्वचितच एखाद्या दिवशी भांडण व शिविगाळ न ऐकता प्रवास होतो नाहीतर कुरबुर ही चालूच असते.
बरं खूप राग येणे हे चांगले लक्षण आहे का?तर नक्कीच नाही.ह्या रागाचे फायदे सोडा पण नुकसान च अधिक होतात.आपल्या जवळच्या व्यक्ती रागामुळे आपल्या पासून दूर जातात हे रागावलेल्या व्यक्तीच्या लक्षात यायला खुप वेळ लागतो.रागामुळे नात्यातही दुरावे वाढतात हे लक्षात घ्यायला हवे.आपल्या जोडीदाराला आपल्याला काही सांगायचे असेल काहीवेळा मन हलके करावयाचे असेल तरी कधी कधी तो किंवा ती ते करू शकत नाही कारण आपला राग त्यांना माहीत असतो.
ज्याप्रमाणे मानवाची कोणतीही भावना अति झाली तर ती हानिकारक ठरते त्याचप्रमाणे राग ही आहे.व प्रत्येक जणांनी राग नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.तथागत गौतम बुद्धांनी शांततेचे मार्ग सांगीतले आहे परंतु किती जण त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात?
त्यांचे अनुयायी म्हणवणारे सुद्धा नाही.
योग हा एक दुसरा उपाय आहे.रोज योग केल्याने रागावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे असे मी मध्यंतरी वाचले आहे.परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात किती जण योग करतात हाही प्रश्न च आहे.
जे चांगले विचार विचारवंतांनी सांगितले आहेत,जे आपल्या भारतीय संस्कृती मध्ये फार पूर्वीपासून सुरू आहेत त्यांना काही वर्षांपासून जे अमुक तमुक जाती-धर्मांमध्ये  वाटणी केली आहे ते ही घातक च आहे.

शेवटी रागाबद्दल सांगायचे झालेच तर आपण रागाच्या भरात अनेक नाती तोडून टाकतो व ती जोडण्याचा ही प्रयत्न करत नाही.जर ते नाते महत्वाचे असेल तर आपला राग सोडावा व राग च महत्त्वाचा वाटत असेल तर मात्र ते नाते तुटलेच!

SOURCE:- INTERNET

-करण बायस
जि.हिंगोली

राग, अहंकार, लोभ, मोह या नकारात्मक भावना, जर या भावनांचा परिणाम एखाद्या व्यक्तीवर जास्त झाला असेल तर त्याचं व्यक्तिमत्त्व असंतुलित होते.
आणि जर याच भावना नियंत्रित ठेवले तर व्यक्तिमत्त्व निरोगी राहू शकतं.
राग मनाला अस्थिर करते आणि *निसर्गला अव्यवयस्थितपणा मान्य नाही.* कदाचित हेच कारण असेल राग शरीरासाठी चांगला नसतो.

रागाच्या भरात माणूस समोरच्याला काही विचार न करता बोलतो आणि हे रागात बोललेले शब्द तलवारी पेक्षा जास्त घाव करतात.हेच रागातील शब्द नात्यांमध्ये दुरावा पण आणतो.

रागात माणूस टोकाचे निर्णय घेण्यासाठी मागे पुढे बघत नाही, कधी कधी हेच निर्णय चुकीच्या ठरतात.

राग हा चांगला नसतो हे पूर्णपणे बरोबर म्हणता येणार नाही,थोडा राग पण करावा पण जर माणूस रागाच्या भरात त्याचा विवेक हरवत असेल तर ते काही कामाचे नाही.जर हाच राग जर आपण एक प्रेरक हेतुने वापरलं तर ते कामाचं ठरू शकतो.

SOURCE:- INTERNET

-वैशाली गोरख सावित्री
पंढरपूर(पुणे)

रागाच्या भरात सगळ्यांनी जे जे केलंय ते सगळं मी केलं आहे,रागाच्या भरात घर सोडलं, रागाच्या भरात रडले ,रागाच्या भरात मैत्रिणीशी अबोला धरला,रागाच्या भरात तोंडाला येईल ते बोलले व नंतर पचतावले पण आहे .पण नंतर नंतर लक्षात यायला लागलं की ह्या सगळ्या गोष्टी पेक्षा रागाच्या भरात शांत राहण्याचा प्रयत्न केला तर खूप काही जिंकशील नि सद्या तेच करते .घरात कोणाचा राग आला ,भांडण झाले तर सरळ आपलं आपलं काम करत राहणे,आपल्याला आवडत्या गोष्टी करणे,गाणी ऐकणे ,मस्त फिरणे .व्हाट्स अँप वर कोणाचा राग आला तर क्षणात मित्रमैत्रिणींना ब्लॉक ही करते पण 5-10 मिनिटांनी राग गेलं की लगेच काढते व त्या व्यक्तीला चुकीची जाणीव होई पर्यंत शांत राहते .
      शेवटी रागाच्या भरात खूप काही केल्या नंतर कमी वयात पण चांगला अनुभव आल्यामुळे शांत राहणे हेच योग्य हे समजलं आहे .शेवटी बोलून ,भांडून,रागाला जाऊन नाती तोडण्यापेक्षा शांत राहून जोडलेली जास्त योग्य👍


SOURCE:- INTERNET

-नितीन लेंडवे
पंढरपूर
      खर तर मला शक्यतो राग येत नाही. पण एखादी गोष्ठी मुळे चिडचिड होते. त्यामुळे अकारण ओरडणे होते दुस-यावर. नंतर चुक पण लक्षात येते.
    थोडक्यात रागाला जाऊ नका, आणि दुस-याच्या रागाचे कारण ही नको बना.

SOURCE:- INTERNET

-अनिल गोडबोले
सोलापूर

मला रागाच्या भरात काही करावं लागलं नाही, हे माझं सुदैव.. पण मी जेव्हा जेव्हा रागाला आलो तेव्हा लक्षात आलं की रागाला येन हे चुकीची आहे..

इमोशनल इंटेलिजन्स (भावनिक) याची व्याख्या अशी सांगितली की "ज्या व्यक्तीला योग्य वेळेला योग्य व्यक्तीवर योग्य शब्दात योग्य प्रकारे रागावता येत त्याचा भावनांक जास्त असतो" अस म्हणतात..

पण मला मात्र सामाजिक क्षेत्रात क करावं लागल्यामुळे राग खूप जवळून बघावा लागला.
पेपर वाचताना "रागाच्या भरात... खून' किंवा "रागाच्या भरात... करायला गेला आणि जीव गेला" अशी विधान वाचली की भीती वाटायची.

मला पोलीस टाइम्स वाचतांना भयानक भीती जाणवायची. पण जेव्हा समुपदेशक म्हणून काम करू लागलो आणि रागाला येणारे लोक कळायला लागले..

राग आल्यावर चेहऱ्यावर हसू ठेवणारे बघितले.
राग एकाचा दुसऱ्यावर काढणारे बघितले
रागात अद्वतद्व बोलणारे बघितले.
'बघून घेईन' म्हणून आयुषच्या आयुष्य कोर्टात झगडताना बघितले..

पॅरा लीगल वोलेंटीआर म्हणून काम करताना जिल्हा कारागृहात कैदी बघितले.
मी गुन्हा केलाच नाही उगाचच आत टाकले आहे म्हणून रागारागाने तनंतनून बोलणारे बघितले..

सगळ्यात जास्त वाईट वाटले तेव्ह जेव्हा 302 चे कैदी सांगत होते..'तेवढी दोन मिनिट गेली असती तर साहेब मी इथे नसलो असतो' असे अनुभव सांगताना.. अतिशय भावणावश होऊन रडताना बघितलं आहे..


तर मला वाटत आपण (भारतीय... आणि त्यातल्या त्यात मराठी माणूस) सगळ्या भावना एकाच भावनेत व्यक्त करतो..
प्रेम, ईर्षा, दुःख, आनंद, उदासी.... सगळं एकाच भावनेत दाखवतो आणि ते म्हणजे राग..


राग नसावा का? ... तर माझ्या मते नसावा... पण आपल्याला रागच नसेल तर आपण निर्लज्ज बनू.. तेव्हा राग असावा ... पण तो योग्य प्रकारे व्यक्त करता आला पाहिजे..

तर रागाला येण्यापेक्षा राग कामातून यशस्वी होऊन किंवा प्रयत्नातून दाखवून देणे आवश्यक आहे.

SOURCE:- INTERNET

-नवनीता (शैलेश भोकरे)
आळंदी

(या लेखातील सर्व ओळी अनुभवातून अवतरल्या आहेत. कृपया कल्पनाविलास समजू नये!)

रागाच्या भरात....
काहीच उरत नाही मागे...
अगदी काहीच नाही...
पश्चात्तापाशिवाय.

भडाभडा ओकल्यावर आणखी होणार तरी काय? साचलेली घानच ती. वेळोवेळी बाहेर पडली तर एकवेळ परवडलं. कितीतरी क्षण खर्ची करून,  'कधीच साथ सोडायाची नाही अश्या आणाभाका खाल्लेलं' नातं काही क्षणात मातीमोल होऊन जातं.
उरतो फक्त, त्या क्षणांचा सांगाडा आणि ओकताणाच्या स्मृती...
कधीकधी तर विनाकारण लहरी माणूस जे नको बोलायला ते बोलून जातो.
शब्दांना पाहिजे तसं वापरून जातो.
पुढचा नाजूक दिलाचा समंजस खेळाडू असेल तर बिचारा हवालदिल होऊन जातो या विचित्र खेळामुळे.
त्याच्या चुकांची मग तो गिनती करण्यात मग्न होतो.
भले तो चुकलेला असो वा नसो.

ओकणारा मात्र ओकताना मोकळा होत असतो; कधीही खाली केलं जाणार नाही असं ओझं पुढच्याच्या मनात भरत.

काही मनं तर इतकी प्रांजळ पाहिलीत मी जी, गरज नसताना रडत सुटतात. आणि रडताना पुढच्याला दोष न लावता, सरळ स्वतःच्या प्राक्तनाला भलं भुरं सूनावून मोकळे होतात. मग ते बिचारं प्राक्तन शून्यात नजर लावून बसतं, स्वतःच्या चुकीचे पाढे मोजत. या कामात ते एवढं गर्क होऊन जातं की प्रांजळ मनाकडे त्याचं लक्ष देणं राहून जातं. मग ते मन ढसाढसा रडत सुटतं, कधी या झाडाला कवळी मारतं, तर कधी त्या झाडासोबत जाऊन बडबड करत बसतं.
त्याला अगदी सुचनं बंद होऊन जातं,
नेमके घडलं काय?
घडतंय काय?
आणि या सर्वात माझा दोष तो कोणता?

तो ओकणारा मात्र स्वतःच्या मिशीला पिळी मारत मांडीवर मांडी मांडून बूट हलवत बसतो. कशी अद्दल घडवली म्हणत.

जेव्हढं ते प्रांजळ मन बावरतं, तेवढं याचं अंतर्मन असुरी सुखात बागडतं.
कसा धडा शिकवला..... म्हणत स्वतःची पाठ थोपटतं. गगनभरारी घेत या गावाला जाऊन सांगतं तर कधी त्या गावाला. त्याची बाजू उजळ वाटेल असा जो त्याचा गैरसमज झालेला असतो तो त्याला हे सर्व करण्यास उद्युक्त करतो. गाव मात्र फक्त टाळ्या घेतं, तोंडावर याच्याशी आणि पाठीमागे गाववाल्याशी.  
आणि जसजसा मग या ओकणाऱ्याचा गैरसमज गळून पडू लागतो तसतसा तो थंड होऊ लागतो.

संवेदनशील मनाचा धनी असेल तर थोडा उलटखेळ रंगतो खरा, नाहीतर नालायक असेल तर सगळं विसरून पुढे सरकतो. एक मात्र खास, ते म्हणजे नालायकाला बहुदा प्रांजळ मनाची पुन्हा गरज वाटत नाही. आणि आठवणंही येत नाही. पण खरं सांगू, त्याच्या या असुरी आनंदात जाणून घेण्यासारखी अशी काही बात नाही.

खरा खेळ पाहण्यात मजा येते ती संवेदनशील मनाच्या धन्याची.
स्वतःचा अहं अजून जागा असतो त्यामुळे पुढचा माणूस जरी त्यावेळी महत्वाचा वाटत नसला तरी स्वतःची त्याला कुठेतरी लाज वाटू लागते. आपण एवढे क्रूर झालोच कसे? आपण असं बोलू शकतोच कसं? या सर्वांची कारणमीमांसा क्षणाचाही अंतर न ठेवता सुरू होते. न थांबण्याचा वादा करून ती आलेली असते तसेच भंडावून सोडण्याचाही प्रण. त्या ओंगळवाण्या स्मृती मग त्याला जाळू लागतात. जाळ एवढा भयावह नसला तरी तो सहन करणं मात्र अवघड होऊन जातं. एका मागून एक ओकत्या क्षणांची रिळ पटलावर सरकते. जी काही ठळक क्षणांवर येऊन थांबते आणि आणखी लाजिरवाणं करून जाते.

आपण जे केलंय ते खरंच बरोबर नाही. ..
हे करणं खरंच मानवीय नाही. ..
असा विचारांचा मारा मग सदसदविवेकबुद्धी जेव्हा करू लागते तेव्हा तोल सांभाळणं अवघड होऊन बसतं. सवय असेल तर ठीक, नाहीतर माणूस सरळ डोळे झाकून झोपी जातो आणि आवडणाऱ्या गोष्टींची स्वप्न रंगवू लागतो.

सवय असणारा मात्र एक एक पाऊल पुढे सरकतो. हाताला हात लाऊन छेडून पाहतो. दहा वेळा झिडकारलं तरी रागावत नाही. प्रयत्न थांबवत नाही. वाट पाहतो कधीतरी तो क्षण येईलच याची.
उद्या पुन्हा प्रयत्न करू म्हणत व काय केलं पाहिजे, याचा विचार करत झोपी जातो. त्या प्रांजळ मनाच्या सुखासीन क्षणांची चलचित्रं स्वप्नात पाहतो. सकाळी उठून पुन्हा कवळी घालतो, आणि मग बऱ्याच कवाळ्यांनंतर पुढचा पाजळतो आणि हसत गळेभेट घेऊन क्षितिजाच्या पलिकडे चालत जाऊ अश्या गप्पा मग पुन्हा सुरू होतात. गावाला एक आदर्श उदाहरण बनून दाखवण्याचा टाळ्या घेत.

पण कधीकधी हा असा पुढाकार न घेणारे, घरात निपचित पडून राहतात. आधी असलेला त्यांच्या खोलीतील अंधार मग हळूहळू आणखी गडद होत जातो. इतका, की मग तो गिळून टाकतो ओकणाऱ्याला त्या विध्वंसक सवयीमुळे......

SOURCE:- INTERNET

-सीमाली भाटकर,
रत्नागिरी

       रागाच्या भरात विषय फारच छोटा पण गंभीर आहे. कारण या जगात राग कसला कुणाला कधी केंव्हा कुठे कशा पद्धतीने येईल याचा अंदाज येऊ शकत नाही आणि खात्रीपूर्वक सांगू शकत नाही.
      समाजशास्त्र च्या भाषेत सांगायचे झाले तर माणूस हा समाजशील प्राणी आहे. आणि साहित्यिक म्हणावे तर राग हा एक रस आहे. त्यामुळे या जगात अस कुणी नाही ज्याला राग येत नाही आणि तस असेल तर मग पाहिले त्याला प्रणाम. तर असा हा राग प्रत्येकाला येतो. फक्त प्रत्येक माणसाच्या मनात त्याच्या विचार करण्याच्या बुद्धिमक्ततेचा कौल लावता त्याची पातळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात असते.
      त्यातून कधी गुन्हा घडतो तर कधी स्वतः जबाबदार समजुन ती व्यक्ती जीवन त्यागते एकूणच काय जीवन उध्वस्त होत एक तर स्वतःच आणि इतरांचं देखील. म्हणुन रागाला थोडा आवर घालून या रागातून काही चांगल्या गोष्टी घडू शकतात हे लक्षात घेता आला पाहिजे.
      या जगात कितीतरी स्त्रिया आहेत त्यांच्यावर अन्याय होतात. हुंडाबळी, रेपकेस, कौटुंबिक हिंसाचार असे अनेक आणि कित्येक ऑफिसात बॉस नावाचा पात्र हे राग येण्या जोग असत. पण त्या रागाच्या भरात आपल्या हातून खूपच चुका होतात आपल्या बहिणीच हुंडाबळी जाण यातून भाऊ त्याचा बदला घेतात. पण कुणी कधी हा विचार करत का माझी बहिण गेली इतर कुणाची जाऊ नये म्हणून प्रयत्न व्हावा.
     ऑफिसमध्ये होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी बॉस नावाचा प्राणी नसावा पेक्षा सामंजस्य साधणार व्यक्तिमत्त्व असावा हा प्रयत्न केला तर.
        जातीयवादी आंदोलक म्हणून उभे राहण्यापेक्षा मुळात रागाने जाती धर्म मनातून काढून टाकले तर. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच खूप प्रश्न आणि गुन्हे कमी होतील मित्रानो. फुटपाथ वर राहणार्यांना भाकरीचा तुकडा आणि मायेची पाखर हवी कारण दरोडा आणि चोरी जन्मजात नसत काहीवेळा परिस्थिती, संस्कार, आणि शिक्षण हे जबाबदार ठरत.
         शादी मे जरूर आना ही फिल्म कुणी पहिली तर लक्षात येते प्रेमात फक्त बलात्कार होत नाही तर कधी कधी व्यक्तिमत्त्व देखील बदलत. आणि माणूस शिपाई वरून आयएएस होतो.
        फक्त तिथे कस लागतो तो तो तुमच्या माझ्या विचार आणि बुद्धी चा. एखादया क्षणी आपण जितका चांगला विचार करून पाहू आपण तितके चांगले घडतो. परिस्थिती प्रत्येक माणसाची वेगळी आणि अडचणी वाद हे नेहमीच असतात पण त्या काळात तुम्ही किती आणि कसा विचार करता यातून तुमचं भवितव्य ठरत.
       शब्दाची अट आहे म्हणून इतकंच सांगेन राग वाईट प्रवृत्ती चा करा, जागा जमीन पैसा यातून फक्त नाती तुटतात साध्य काहीच नाही. बलात्कार प्रवृत्ती वरती फक्त मोर्चे नको मनातून त्या विकृती चा राग करा आणि काढून टाका ती राक्षसी वृत्ती.
      जाती पेक्षा माणुसकीला मान द्या जातीय तेचा द्वेष करून मनातून काढून टाका.
        गरीब श्रीमंतीच्या माज आणि गरवापेक्षा आपुलकीचा शब्द ठेवा.
       म्हणजे रागाच्या भरात घडणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्ती ला आणि गुन्ह्यांना आळा बसेल. कारण या जगात परिस्थिती फार मोठी गुन्हेगार आहे ज्याला ती सांभाळता आली तो तरला नाही तो गुन्हेगार ठरला.
   खूप महत्त्वाचे आयुष्यात विचार करायला, माफी मागायला आणि माफ करायला शिका अर्धेअधिक प्रश्न त्यातूनच सुटतील.
       म्हणून रागाच्या भरात राग नसावा लोभ असावा आणि अगदीच अनावर झाला अंकरूपी कोंदणात आपल्या प्रियजनांना आठवा आणि रागाला मिटवा.
  धन्यवाद,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************