वाचलेलं पुस्तक

वाचलेलं पुस्तक.

किरण पवार,औरंगाबाद.
          हल्ली नुकतचं मिर्झा ग़ालिब थोडेफार वाचून घेतले होते. त्यानंतर जवळजवळ 9-10 नवीन पुस्तकांची खरेदी करून ठेवली. सोबतच काही इंग्रजी साहित्याची खरेदीही केली. पण सगळ्याच पुस्तकांवरून नजर फिरवता वाटलं की, साने गुरुजींनी लिहलेली क्रांती पहिल्यांदा वाचावी. कधीकधी आतून आलेल्या भावना योग्या परिस्थितीत योग्या वाचायचा सल्ला देऊन जातात, हे खरचं आहे; मला बऱ्याचदा असं जाणवलं आहे. क्रांतीचा पहिला धडा वाचून संपवला वाटलं जणू की, यातून एका ठराविक दिशेला जाणारा संदेश साने गुरुजींना समाजाला द्यावयाचा असेल पण नंतर पुढे वाचत जाताना लक्षात आलं की, कशा प्रकारे साने गुरुजींनी महाराष्ट्रातील सामान्य जनतेपर्यंत गांधीजींच्या चळवळीचा धागा अगदी सोप्या गोष्टींमधून पोहोचवला. आजही काही लेखकांच्या मार्मिक कथांमधून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात जसं की; गिरीजा कीर उत्तम लिहायच्या, सुधा मुर्ती उत्कृष्ट लिहतात किंवा देवाचा शोध कथानकांमधून घेणारे अमीश असतील ज्यांनी मेलुहा, नांगांचे रहस्य पुढे सिरीजच लिहिली. शोध काय असतो आणि कथा किंवा गोष्टी काल्पनिक न ठेवता सत्यात वाटाव्यात असं लिखाणही साने गुरुजींनी केल्याचा प्रत्यय मला आला. क्रांती हे वाचताना खरचं आनंद मिळाला, सोबतच विचारांमधे अधिक प्रगल्भतेची भर पडली हे निर्विवाद.


केशव भिसे.शेगांव,बुलढाणा.
एक होता कार्व्हर हे पुस्तक मला खूप काही देऊन गेलं आधी फक्त या पुस्तकाविषयी ऐकून होतो पण कधी वाचले नाही पण एक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेत इंटरविव्ह साठी गेलो असता मला त्यांनी हे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला तसेच मला हे पुस्तक वाचून झाल्यावर माझी या पुस्तकाविषयी प्रतिकीय सुद्धा मागितली मी ते पुस्तक आणले आणि माझ्या परीने माझी प्रतिक्रिया देण्याचा प्रयन्त केला.आजच्या तरुण पिढीने एक वेळ हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे फक्त वाचून चालणार नाही तर या मध्ये ज्या प्रकारे कार्व्हर नि त्याच्या आयुष्यात संघर्ष करून त्याला जे काही मिळवायचे होते ते त्यांनीं मिळवले  यातून एक चांगली गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे आपण आपल्या जिवंत आपल्याजवळ काय नाही त्याच गोष्टीचा विचार करून त्याचा डोंगर करत असतो माझ्या जवळ हे नव्हते म्हणून मी ते करू शकले नाही फक्त परिस्थिती ला दोष देतो पण जेव्हा आपण प्रत्यक्षात जॉर्ज कार्व्हर संघर्ष आणि त्याची जीवन काम करण्याप्रति असणारी आवड त्याला त्या संकटांना सोडवण्याची ताकत देत असते. यात एक चांगले वाक्य आहे ते म्हणजे " तुम्ही कोणाला काही नवीन शिकवू शकत नाही मुळातच त्याच्यात जे काही आहे त्याचाच विकास करू शकता" या मुळे आपण आपल्यायत काय आहे हे पाहून त्याचा विकास करण्याचा पर्यंत आपण केला पाहिजे. त्याच बरोबर आपण नेहमी चिकित्सक वृत्ती ठेवून जे काही शिकायला मिळणार ते शिकत राहणे आणि नेहमी आपल्या दृष्टिकोन हा सकारात्मक ठेऊन प्रयन्त करत राहिले पाहिजे.त्याच बरोबर निसर्गा प्रति पाहण्याच्या सुद्धा आपण कसे असवणे या विषयी सुद्धां छान सांगितले आहे कार्व्हर सांगतो निसर्ग तुम्हाला देत आहे तर आपण याचा उपभोग घेत असताना 'संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण' ह्या गोष्टीचा विचार करून निसर्गाचा समतोल राखण्याचे पर्यंत करत राहणे.


जी.ए.नळंदवार,हिंगोली.
वपुर्झा -व.पु.काळे
अनेक पुस्तकांनी भुरळ घातली आहे...खासकरून आत्मचरित्र माणसांना प्रेरणा देतात...ऐतिहासिक पुस्तके भूतकाळातील घटना, महापुरुषांचे कार्याची ओळख करून देतात...अशा अनेक पुस्तकामध्ये..कुठे वास्तव्याची धग आढळते...तर कुठे कल्पनेचे अथांग थवे मांडले होते... अशाच एक जादुई लेखकांनी साकारलेलं, लेखणीने सत्यात उतरलेलं, वाचकांच्या उशाला बाळगावे वाटणारे पुस्तक म्हणजे 'वपुर्झा'...कोणतेही पान काढावे आणि वाचता वाचता डोक्यात झिंग चढावी, नशा यावी तसं होत...अनेक वाक्य आपल्या जिवनाशी चपखल लागू होतात...या पुस्तकामध्ये; मागच्या पुढच्या पानांचा एकमेकांशी संबंध नाही,अत्तरासारखं खूप खूप भावलेलं पुस्तक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************