संगीत

संगीत

प्रतिक्षा बूध्दे,गडचिरोली.
मन आनंदी असो किंवा उदास...आजूबाजुला गर्दी असो किंवा एकांत...कोणत्याही परिस्थितीत संगीताची साथ उत्तमच. मागे मित्र सोडुन गेला एक कायमचा, तेव्हा कुणाच्याही सहानुभूतिपेक्षा किंवा तेवढ्यापुरतीच्या सोबतीपेक्षा मला आधार वाटायचा आमच्या दोघांच्याही आवडीच्या गाण्यांचा. ती गाणी मी सतत ऐकत होते चार दिवस, आजही कधी त्याची आठवण एकटी म्हणुन येत नाहीच, सोबत आणतेच कुठलीतरी एक धुन. मग मीही ते गाणं ऐकुन ऐकुन त्याला प्रत्यक्षात स्वत: सोबत अनुभवते. कधी केलेल्या गमती आठवुण हसायला येते तर कधी त्या संगीताचे गंभीर सुर नकळत वार करुन जातात मनावर... 
असं हे संगीताचं आणि माझं अभूतपूर्व नातं...आनंदात सुद्धा सर्वात जवळचा वाटनारा, भावनांच्या ओघा नुसार स्वत:ची गती, लय, ताल बदलुन हवं ते हवं तसंच व्यक्त करायला मदत करणारा केवळ संगीतच. एक राधा एक मीरा म्हणत प्रेमाच्या भिन्न व्याख्या असोत किंवा चंद्र आहे साक्षीला म्हणत भावविभोर होणं असो, संगीत असतोच सोबत का़यम. 'तुझसे नाराज नहीं जिंदगी हैराण हुं मैं' हे गाणं विशेष आवडीचं, त्याचं कारणही तेवढंच सुंदर. साधं स्मित करण्यावर सुद्धा किती गोष्टी जोडल्या असतात यांच किती सोप्प आणि तेवढंच सुरेख विश्लेषण आहे ते! भाव कोणताही असो, तो व्यक्त करायला संगीतातील रागांची साथ ही जगावेगळीच!माझी आणि संगीताची ही गट्टी मित्रांसोबतच घरच्यांच्याही ओळखीची आहेच. 
'आज मै उपर, आसमां नीचे' म्हणत मी घरी आले की आई समजुन जायची आजचा पेपर मस्त सोडवलाय पोरीने. आणि निकाल लागल्यावर 'पप्पु पास हो गया' आजही वाजतोच घरात.


प्राची सुलक्षणा अनिल,मुंबई.
'मिले सूर मेरा तुम्हारा..तो सूर बने हमारा..'
हे गाणं प्रत्येकाने लहानपणी दूरदर्शनवर ऐकलंच असेल..भारतातल्या प्रसिद्ध गायकांनी गायलेलं आणि संगीतकारांनी संगीत दिलेलं हे गीत दोन दशकांपूर्वी जन्मलेल्या प्रत्येकाच्या मनात कोरलं गेलंय.. जवळपास त्याच काळात 'एक दिल चाहीए that's मेड इन इंडिया' हे अलिशा चिनाईचं गीत आलं होतं आणि त्याने युवापिढीच्या मनावर राज्य केलं..त्यानंतर बॉलिवूडमध्ये शाहरूख खानच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला.. मग ते 'चल छईया छईया' असो किंवा 'फिर भी दिल हैं हिंदुस्थानी' किंवा 'दो दिल मिल रहे हैं, मगर चूप के चूप के' किंवा 'आशिक हूं मैं, कातिल भी हूं, सब के दिलों में शामिल भी हूं' हे गाणं.. 
त्याही पूर्वीची राजेश खन्नाची गाणी तर कायच सांगावी.. अहाहा..!!
ती जवळपास सगळीच गाणी मला तोंडपाठ आहेत असं म्हणायला हरकत नाहीये.. मी जेव्हा कधी प्रवास करते, विशेषतः कारमध्ये.. तेव्हा ड्रायव्हरच्या बाजूची माझी सीट ठरलेली कारण मला माझ्या आवडीची जुनी गाणी वाजवायची असतात.. तसंच विमान प्रवास असेल किंवा रेल्वे किंवा बस.. प्रवासात खिडकीजवळ बसून इअर फोन्स टाकून गाणी ऐकत बसायला मिळालं तर जन्नतच मिळल्यासारखं वाटतं..कुठलंही गाणं संगीताशिवाय अपूर्ण आहे, निरर्थक आहे.. 
आपल्या चित्रपटसृष्टीत ए. आर. ,रेहमान, रवी शंकर, लता मंगेशकर, आर. डी. बर्मन, बिस्मिल्लाह खान, हरिप्रसाद चौरसिया, झाकीर हुसैन, भीमसेन जोशी, एस. डी. बर्मन, आशा भोसले, किशोर कुमार, जगजीत सिंग, एम. एस. सुब्बालक्ष्मी.. अशा कित्तीतरी दिग्गजांची नावं घेता येतील ज्यांनी आपल्याला अवीट संगीताचा खजिना दिलाय.. प्रत्येक गाणं ऐकताना प्रत्येक वेळी नवीन काहीतरी गवसतं आणि गाण्याला नवीन अर्थ मिळतो.. म्हणजे मी जेव्हा खूप खुश असते तेव्हा सहजच एखाद्या गाण्याची ओळ गुणगुणत असते.. जेव्हा खूप दुःखी (कधीकधीच) असते तेव्हाही कुठलं ना कुठलं गाणं मनाच्या कोपऱ्यात घोळत असतं.. अगदी कोणी कधी रागावलं तरी माझ्या मनातलं गाणं चालूच असतं.. (त्यामुळं ना, त्या रागावण्याकडे जास्त लक्ष जात नाय आणि लय मनस्ताप होत नाय एवढंच..)
कुठल्याही बिकट मनस्थितीतून बाहेर यायला मला गाण्यांची खूप मदत झालीये आणि म्हणूनच संगीत हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे..
शाहरुखच्या मुव्हीज बघताना लहानपणापासून मला वाटायचं की मलापण कोणीतरी माझ्यासाठी मस्त रोमँटिक गाणं म्हणून गुडघ्यावर बसून मागणी घालावं आणि मी लाजून (चक्क, कारण मला लाजता येत नाय..) त्याला हो म्हणावं.. पण ही माझी fantacy होती.. असलं कोणी काय करत नसतंय आणि आता ते शक्यही नाहीये तो भाग वेगळा.. पण असं, नेहमीच या संगीतामुळं मी स्वप्नांच्या दुनियेत रमत आलीये आणि त्यामुळं मला दुसऱ्यांच्या फालतू उचापतींमध्ये रसच राहिला नाय.. 
गंमत म्हणजे, हे संगीत एवढं प्रभावी असतंय की कधी कधी सहज एखादं sad गाणं ऐकताना आपल्यालाही आपला ब्रेकअप झाल्यासारखं वाटून दुःख होतंय.. माझ्याकडे प्रत्येक मुडसाठी गाणी आहेत.. पण राजेश खन्ना फेम 'मेरे दिल में आज क्या हैं, तू कहे तो मैं बता दू..', 'चलते चलते, मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना..' 'हसते हसते, कट जाये रस्ते, जिंदगी युं ही चलती रहे..' 'ना बोले तुम ना मैं ने कुछ कहा, मगर ना जाने ऐसा क्यूँ लगा..' 'दिलबर मेरे कब तक मुझे ऐसें ही तडपाओगे..' 'क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो..' ही असली काही भन्नाट गाणी मी कधीही केव्हाही आणि कितीही वेळ ऐकू शकते..खरं तर संगीत म्हणजे माणसाच्या आयुष्याचं टॉनिक आहे असं मला वाटतं.. ज्या माणसाला संगीत आवडत नसेल तो जगातला सगळ्यात गरीब मनुष्य असेल असं माझं मत आहे..  आणि आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला घरात बसावं लागतंय..पण तेव्हाही घरात मस्त गाणी ऐकत पडून राहण्यात मजाच काही वेगळी आहे..

सौदागर काळे,पंढरपूर.
सारं काही गावात..

पहाटेच्या पारी 
कोंबड्याचं आरवणं
गायीचं,वासराचं हंबरणं
देवळातल्या घंटीचा नाद
थापणाऱ्या भाकऱ्यांचा आवाज
खरकट्या भांड्याचा आणि काकणांचा संवाद
सारं काही संगीत,सारं काही गावात.

पहाटेच्या पारी
दुरून ऐकू येणारी ओराळी
अंघोळ करणाऱ्यांचा नामजप
झाडांच्या पानांची सळसळ
पाखरांचा किलबिलाट
बाळाचं हसणं-रडणं
सारं काही संगीत,सारं काही गावात.

पहाटेच्या पारी
हात पसरून दिल्या जाणाऱ्या जांभई
अंथरुण-पांघरूणाची झाडाझडती
कामावर जाणाऱ्या बायांची हाक
दुधांच्या धारांची लयबद्धता
पाखरं राखणाऱ्यांची तालबद्धता
सारं काही संगीत,सारं काही गावात.

#आठवडा123

(संबंधीत फोटो इंटरनेटवरून घेतली आहेत.) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************