जाण आई बापाची(भाग:२)

जाण आई बापाची(भाग:२)

🌱वि४🌿या व्हाट्सअप्प ग्रुपवरून

जाण आई बापाची(भाग:२)

Source: INTERNET
-शीतल शिंदे,दहिवडी

आई म्हणजे धरती नी  वडील म्हणजे आकाश .

 आई - वडील म्हणजे चंद्र , सूर्य तारे .आई वडील म्हणजे अनमोल रत्नांची खान .

आई म्हणजे मायेचा सागर ! जीवनाचा आधार ! आई वडील म्हणजे सर्व काही त्यांची तुलना कशाशीही होवू शकत नाही .

आज आपण ह्या सुंदर आशा जगात प्रवेश केला तो फक्त आणी फक्त आपल्या आई बाबा मूळे .त्यांच्या मूळे हे जग पाहायला मिळतेय .आपल्या जीवनामध्ये सतत आधार देणारे , चांगल्या वाईटाची जाणीव करून देणारी .त्यांचे उपकार तर नाही फेडू शकत पण त्यांच्या व्रूधापकाळात त्यांची सेवा करून , त्यांना समाधानी ठेवून थोडाफार प्रयत्न करू .

जो करतो आई बाबांची जाण त्याला नक्की मिळेल सुख - शांती समाधान !

ज्याच्या पाठीशी आहे आई बाबांचा हात तो तरेल या विश्वात !

जो ठेवील  आई बाबांची  जाण तो करेल सम्रुद्धीची नौका पार !

जो ठेवील आई बाबांना सुखात तो सहज करेल संकटावर मात !

आई बाबांसारखे दुसरे दैवत नाही!

या जगात आई बाबांशिवाय दुसरा  कोणताही परमेश्वर नाही !

त्या आईने स्वतः अर्धा पोटी राहून मुलांचे पोट भरलेले असते हे काही मी वेगळे सांगायला नको .सांगताना डोळ्यातून अक्षरशहा डोळे पानवतात .आणी ज्यांचे डोळे नसतील पानवत त्यांना स्वतःच्या मुलांची निगा राखताना , संगोपन करताना तरी नक्की आठवेल की आपल्या माता पित्याने आपल्याला कसे संभाळले असेल .दिवसभर शेतात राब राब राबून , पोटाला चिमटे घेर लहानाचे मोठे केले शिक्षण दिले आणी सोन्याचे दिवस दाखवले .

या जगात असे कोणतेही असे  न्यायालय नाही की जेथे मुलांच्या सर्व चुकांचा माफी मिळते .

ते न्यायायालय म्हणजे फक्त आई नी बाबा  

मात्र मुलांना त्याची जाणीव असणे फार गरजेचे आहे .त्यांचा तिरस्कार करू नका .कारण पुढे जावून आपण पण आई बाबा , आजी आजोबा होणार आहोत याची सर्वांना जाणीव असणे गरजेचे आहे .

समस्त माज्या भगिनींना मी एवढेच सांगेन की आपल्या सासू सासऱ्यानी  कष्ट घेतले म्हणून आपण साधरण जीवन जगतोय.त्यांच्याशी वागाताना आपले आई वडील आठवा .

सर्व बांधवांनी हेहि लक्षात ठेवले पाहिजे आपले आई वडील तसेच अर्धांगिनीचे आई वडील आहेत ...

source: INTERNET
-सुधाकर पार्वती प्रभाकर, पंढरपूर

जगामध्ये असा कोणी नाही की ज्याला आई बाबा बद्दल आपुलकी नाही किंव्हा प्रेम नाही .

परंतू एक समाजकार्याचा विद्यार्थी म्हणून मी जेंव्हा समाजामध्ये पाहतो तेंव्हा समजत की खरंच आज ज्या आई बाबानंमुळे आपण आहोत त्या आई बाबांबद्दलचा आजच्या मुलांचा आपुलकीचा किंव्हा प्रेमाचा झरा आटलेले दिसतो .

ज्या आईने ९ महिने ९ दिवस मरणयातना सहन करून आपल्यला जन्म दिला , स्वतःच्या पोटाला चिमटा कढून आपल्या मुलांना लहानाचं मोठं केल . ज्या बापाने आपल्यासाठी काबाडकष्ट करून आपल्यला लहानच मोठं केल त्या आई बाबांच्या नशिबी म्हातारपणी मात्र घरामधे जागा नसते.

बदलती जीवनशैली , शहराचे आकर्षण , एकांतपणा , ग्रुहकलह यामुळे आजकालच्या मुलांना आईबापाची जाणीव राहिली नाही.
वाढती व्रूधाश्रमांची संख्या हे याचे उदहरण आहे.

हम दो , हमारे दो आई बाप को फेक दो ही भवना वाढीस लागली आहे .
एखाद्या आई बापाला ३ \ ४ मुले असताना सुध्दा ७०/७५ च्या वयामध्ये वेगळं राहून सवतःचा संसार करावा लगतो ही शोकांतीका आहे .
मात्रूदेव भव , पितृदेव भव ही भावना कमी झाली .
जिवंतपणी आई बापाच्या नशिबी मारणयातना आल्या .

मुलांना शिकवून मोठ केल , त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं ती मुलं परदेशात नोकरी साठी गेली. तीच मुलं आईच्या म्रुत्यू नंतर ही परत आली नाहीत.

काहींनी तर जमिनीच्या वाटणी वरून स्वतःच्या बापाला ट्रँक्टर खाली टाकले .
कित्येक आई बाप वेळेवर जेवण न मिळाल्याने मरण पावले .
हे सगळं पाहिल्यावर असं वाटत की खरंच या आई बाबांनी आपल्यला जन्म देवून चुकी तर केली नाही ना !

मला वाटत की प्रत्येकाने जर आपल्या आई बाबांच्या कष्टाची , त्यांच्या प्रेमाची जाणीव ठेवली तर नक्कीच ही वेळ त्यांच्यावर येणार नाही.

कारण  
आई माझा गुरु , आई माझी कल्पतरू . सौख्याचा सागरु आई माझी.

लहानपणी त्यांनी आपल्याला सांभाळल आता आपली वेळ आहे . याची जाणीव सर्वांनी ठेवू. मात्रूदेव भवं ,पितृदेव भवं !!

source: INTERNET
-वाल्मिकी फड, महाजनपुर

बर्याच वेळेस अनेक ठिकाणी मी बघतो की जसे आई आणी बाप आपले शत्रुच आहेत असे असं काही लोकांना वाटतं पण माझंतर परखड मत आहे की,आई बाप आपले दैवत आहे .आपण देव मिळवण्यासाठी किती प्रयत्न करतो तिथॅयात्रा करतो दानपुण्य करतो वाटेल ते करतो.माझे काही मत नाही पण ज्यांच्यामुळे आपण या जगात आलो हे सुंदर जग पाहीलं त्यांनाच आपण विसरू लागलो.बघा काय लागतं हो या म्हतार्या माणसांना जेवण तर त्यांच कमी झालेलं असतं त्यांना चांगल्या भरजरी वस्राचीही गरज नसते हवं असतं फक्त तुमचं प्रेम कुठेही बाहेर जाताना फक्त म्हणा की,आई किंवा बाबा मी येतो बघा ती बापडी तुम्ही रात्रभर नाही आलात तरी ते झोपणार नाही काही वाजलं तरी ऊठून बसतील .त्यांना असं वाटेल माझा बाळ आला वाटतं.आपल्या लोकांना आई बापा पेक्षा कुत्रे महत्वाची वाटायला लागलीय .नाही नाही मी काही म्हणत नाही कि,कुत्रे पाळू नका तोही मुका प्राणी आहे आपण त्यांनाही सांभाळले पाहीजे.पण आई बाप हे मायेचा सागर प्रेमाचा झरा आहेत जसं त्यांनी आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं जपलं आपल्यासाठी रात्र रात्र जागून काढली  त्यांची काळजी घेणे प्रत्येक मुलांची वा मुलींची नैतीक जबाबदारी आहे.भगवान गणेश आणी कातीॅकेय हे भगवान शिव आणी माता पावॅती यांचे पुत्र जेव्हा त्यांना सांगण्यात आले की,जो प्रथम प्रुथ्वीला प्रदक्षिणा मारून येईल त्याला पत्नी वगैरे काय असेल ते पण जेव्हा त्यांची शयॅत सुरू झाली तर कातीॅकेय आपले वाहन घेऊन प्रदक्षिणा मारायला गेले आणी इकडे गणपती बाप्पाने आपल्याच आईवडीलांना पाच प्रदक्षिणा घातल्या.थोडक्यात सांगायचे म्हणजे आईबापापेक्षा कोणीही मोठा नाही प्रत्यक्ष इश्वर सुद्धानाही म्हणून वाटतं प्रत्येक आपत्त्यांनी आपल्या आईबाबांची काळजी घ्यावी कमीत कमी त्रास देऊ नये फार प्रेम करत असतांत ते आपल्यावर,निष्काम प्रेम.

.Source: INTERNET
-महेश देशपांडे,ढोकी

या विषयी खरच मला शब्द अपुरे पडतात, कारण हे सगळं शब्दांच्या पलीकडे आहे.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की, तुमचं अस्तित्व हे फक्त आणि फक्त आई वडील यांच्यामुळेच आहे. त्यांच्याशिवाय आपण या जगात येऊ शकलो नसतो. आज जे कोणी आहोत. ते सर्व त्यांच्या कृपाशीर्वादाने आहोत...
आईच्या मनातलं जाणन किंवा वडिलांच्या मनातलं जाणन हे फक्त एक प्रामाणिक माणूसच करू शकतो...

प्रत्यकाने, जगात कुठेही असा अगदी कुठेही.
फक्त आपल्या आई वडिलांना विसरू नका बस्स..


Source: INTERNET
-सिद्धेश्वर आघाव, जालना

आई आणि बाप म्हणजे आपले अस्तीत्व.
आई बाप म्हनजे आपल कर्तुत्व.
आई बाप म्हणजे जगाण्याची कला.
आई- बाप म्हणजे अम्रुताचा झरा
आई-बाप म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील तो क्षण जो अजुन आलेलाच नाही.
आई-बाप म्हणजे जगण्याची ती कला जी अजुन जाणलीच नाही .
आई-बाप म्हणजे श्वास आणि पहीला घास आघाव सिध्देश्वर
                   

Source: INTERNET
-सचिन कंनाके,यवतमाळ

या विषयी खरच मला शब्द अपुरे पडतात, कारण हे सगळं शब्दांच्या पलीकडे आहे.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की, माझं अस्तित्व हे फक्त आणि फक्त आई वडील यांच्यामुळेच आहे. त्यांच्याशिवाय मी  या जगात येऊ शकलो नसतो. आज मी जे काही आहो. आणि ते सर्व त्यांच्या कृपाशीर्वादाने आहोत...
आईला मुलाच्या मनातलं जाणन किंवा वडिलांना त्याच्या मुलांच्या मनातलं जाणन हे फक्त  आई-वडीलच करू शकतात...

        मी माझ्या जीवनात माज्या आईला खूप कष्ट करताना पाहिले माझ्या जीवन माझ्या आयुष्याने अशी कलाटणी घेतली की त्या दुःखातून आज पण आठवण काढली तर खूप रडू दुःख वाटते.
     याचे कारण म्हणजे आम्ही लहान होतो आम्हाला तेव्हा कळत ही नव्हते तेव्हा माझ्या वडीलांचा मृत्यु झाला. तो दिवस हा आमच्या आयुष्यातला काळा दिवस आहे.
 तेव्हा अमच्यावरतर नाही पण जास्त विचार आईवर आला होता की जो घराचा आधार स्तंभ असतो. तो म्हणजे वडील असते. तेव्हा माझे वडील मृत्यु झाला तेव्हा पासून सर्व भार आईवर आला.
    
        आणि त्यामध्ये आम्ही दोन भाऊ एक बहीण
त्याची सर्व जीमेदरी आईवर आली.
त्यावेळेस आम्ही 3 4 व 6 वर्षाचे होतो
 आणि तेव्हा पासून आमचे पालन पोषण पूर्ण माझ्या आईने केली मानून माझे आई वडील सर्व माझी आई आहे तिचे कर्ज आम्ही मारणार तरी उतरू शकत नाही.

       तरी माझ्या आईबद्दल दोन शब्द दयाचे आहे
    माझी आई पहिले मुंबईला राहत होती खूप सुन्दर
दिसत होती. ती तिथे कोणत्याच कामाला पण जात नव्हती म्हणजे वडील आईला कोणत्याच कामाला पाठवत नव्हते. तरी जेव्हा आम्ही गावाला आलो तेव्हा तर खुपच झाले. आई बाबा व आम्ही तरी उन्हाळ्यात आम्ही गावी हिंडायला आलो पण आम्हाला काय माहित की इकडे आलो तर गावीच राहणार तेव्हा जीवनात वडील एका एकी वारले तो एवढे मोठे संकट आले की आईला कोणताच गावाकडील कामाचा अनुभव नव्हता पण तीने तिच्या मनात आमच्या भविष्याचे पाहत होती जे काम तिने केले नाही पण
आमच्या साठी तिला उन्हात सगळे शेतीतले काम        शिकले  कष्ट काम केले
तिने स्वतः साठी काही केले नाही पण आम्हला काही कमी पडू दिले नाही.

 माझ्या आईला तीला कितीक बिमार आहे ते आम्हला सांगत नाही जिवनात तिचा पाय दुखतो, कानातून पस येतो, दात ठणकतो, डोके दुखते पण ती माझी आई आम्हाला  आज पर्यंत कळू देत नाही
    पण तिच्या मनातले दुःख मी जाणतो तिचे कर्ज खूप आणि खूप पण ते तिथे लिहून काही अर्थ नाही
    माझ्या आईने आमच्यासाठी स्वतःचे दुःख विसरली पण आम्ही माझ्या आईला लवकर माझ्या जवळून दूर जाऊ देणार नाही
    कारण माझ्या जीवनात माझी आई गेली तर
सर्वात अनाथ आम्ही राहणार त्याचे कारण वडिलांचे पण कोणीही नाही. आणि आईला पण कोणीच रिलॅटिव्ही नाही आहे. म्हणून जे काही आहे ते माझी आई आहे तिला आमच्या आयुष्यातुन व जीवनातून
केव्हाच दूर जाऊ देणार नाही.

     आई तुझ्या मूर्ती वाणी
                     या जगात मूर्ती नाही।
अनमोल जन्म दिला ग आई
             तुझे उपकार फिटणार नाही।१।
*******
  आपण या जगात आल्यानंतरआपले
        पहिले गुरू आपले आई-वडील
    त्याचा प्रेमळ आशिर्वाद हा
             आपल्याला मिळालेला व कधीही
    न सपंणारा प्रसाद आहे
आपण आपल्या आई वडिलांची जाण ठेवा कारण जे आई वडील स्वतासाठी एक पैसा खर्च करत नाही पण आपल्या मुलासाठी  खुल्या मनाने कोणतीही वस्तूची कमी पडू देत नाही. त्याच्या कष्टाची जाण ठेवा फालतू उधळ पटी करू नका
व कधीही आई वडिलांना स्वतःकडून दूर करू नका
Source: INTERNET
-ज्ञानेश्वर तात्या टिंगरे, उस्मानाबाद

अतिशय महत्वाचा विषय एडमीन टीमने लिखाणासाठी घेतला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो.

आई वडिलांना डावलून , आईवडिलांच्या कष्टाचं मोल न ओळखता मी स्वतः कसा आणि किती कालावधीत इतकी झेप घेतली हेच सांगण्यात बऱ्याच लोकांना हौस असते.. म्हणून की काय म्हातारपणी त्यांना वृद्धाश्रमात पाठवून त्यांच्यापासून सुटका करून घेतली जाते..
आजकाल आई वडिलांशी मनमोकळा संवाद साधला जात नाही, त्यांना हवा तो मानसन्मान दिला जात नाही, त्यांच्या कष्टाचं चीज करून शेवटी त्याचं श्रेय आई वडिलांना द्यावं असं कोणाला वाटत नाही, याला कारण काय ... ?

बदलत्या काळात संदर्भ बदलत गेले , लोकांची विचारशैली, आई वडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलत गेला , माणूस कोडग्या वृत्तीने वागू लागला, स्वतःही कोणाचे तरी आईवडील आपण होणार आहोत या गोष्टीचे भान तो विसरून गेला. नकळतपणे आई वडिलांची त्यांच्या माघारी टर उडवून आनंद घेणे त्याला सुखदायक वाटू लागले, प्रत्येक आईमध्ये एक बाप आणि प्रत्येक बापामध्ये एक आई लपलेली असते हे साधं सूत्र तो विसरून गेला.

त्या ईश्वराने निर्माण केलेली आई हा अलंकार असतो बाप हा त्यातील वर्ण असतो व आपण त्यातील अक्षर असतो आणि त्याशिवाय कुटुंबाची बाराखडी पूर्ण होत नसते हे त्याच्या मनात येत नाही.. आणि म्हणूनच की काय आईबापांची जाण तो आजकाल ठेवत नाही.

धन्यवाद.


Source: INTERNET
-नावनीता(शैलेश भोकरे),आळंदी

आपली संस्कृती सांगते,

मातृ देवो भव:
पितृ देवो भव:

लहानपणी स्वाध्याय असायचा तेव्हा रोज म्हणायचो आम्ही पण...

आता ही वचनं वाचून खरं तर हसू येतं! आजच्या संदर्भात जर ह्या ओळी वापरल्या तर विचारात मग्न होईल प्रत्येकजण. डोळ्यात अंजन घालणारी सूत्रं आहेत ही....

किती आहे आपल्याला आपल्या माय बापाची जाण?

लहान होतो तोपर्यंत त्यांच्या बोटाला धरून किंवा कडेवर घेऊन फिरल्याशिवाय बाहेर पडावं वाटत नव्हतं. दिवस त्यांचा सहवास लाभल्याशिवाय अपूर्ण वाटायचा....

पण जसजसं जग कळायला लागलं, तसतसं जग हुशार आणि आई बाप वेडे भासायला लागले. मग हळूहळू "शांत बसा तुम्हाला काय कळतंय!" ही वाक्यं रोजची होऊन गेली.

तारुण्यात तर वेगळीच नशा असते... माणूस हवेत असतो. अवलंबून असणारा मनुष्यप्राणी स्वयंपूर्ण व्हायच्या मार्गावर असतो. तेव्हाचा त्याचा तोरा काही निराळाच...

वडिलांचा कचरा होतो,
आई वेडी ठरते आणि
मित्र मैत्रिणी हुशार वाटायला लागतात.
संगत कशीही आणि कितीही टुकार असो,
घर नको नको वाटायला लागतं
आणि बाहेरचं जग हवंहवंसं.

लग्नानंतर तर बोलायलाच नको. अक्कल शिकवायला बाई येते... मग आई बापाचा सल्ला दुय्यम ठरतो.
"तुम्ही शांत बसा. पाहतो मी!"
ही वाक्यं मग नित्याची होऊन जातात. आणि ते, ज्यांनी आपल्याला या सुंदर विश्वात आणलं त्यांना कोपरा दाखवला जातो.
खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या पण आटोपतं घेतो.
कारण दुसऱ्याला ज्ञान शिकवण्यासाठी स्वतः अनुकरण करायला हवं!
आईवर खूप प्रेम करतो मी पण वडिलांशी तेवढा प्रेमळ संबंध नाही. त्यांच्याशी जेव्हा नाळ जुळेल तेव्हा लिहिण्यातव खरी मजा आहे....


शेवटी एवढंच सांगेल....
जाण तर नाहीच आपल्याला;
ध्यान तरी असू द्या?!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सहभागिता फॉर्म

Popular Posts

***************************************************************************************